Friday 27 December 2019

झाशीची राणी लक्ष्मीबाई

अवधच्या भागातील क्रांतीचे नेतृत्व मौलाना अहमदुल्लाशाह (वाजीद अलीशाह) व बेगम हजरत महल हे करीत
होते.
क्रांतिकारकांनी लखनौचे कमिश्नर हेनरी लॉरेन्स यांना ठार केले होते. जनरल नील हे लखनौच्या वेढ्यातच
ठार झाले. त्यांच्या जागी कॅम्पबेलची नियुक्ती झाली. त्यांनी जंगबहादूरच्या नेपाळी सैनिकांच्या सहकार्याने ३१
मार्च १८५८ रोजी लखनौ जिंकले. मात्र अवधमधील तालुकेदाराने गनिमी काव्याने इंग्रजांशी प्रतिकार चालूच ठेवला.
झाशीतील भारतीय सैनिकांनी सशस्त्र क्रांतीस प्रारंभ केला। झांशीच्या राणी लक्ष्मीबाईनेसुद्धवा मेरी झाँशी नही दुँगी'
अशी गर्जना करीत इंग्रजांशी लढा सुरू केला. त्यांनी 'दामोदरराव' या अल्पवयीन दत्तक मुलास गादीवर बसवून
राज्यकारभार हातात घेतला. सर हय रोज यांनी २२ मार्च १८५८ रोजी झाशीच्या किल्ल्यास वेढा दिला. या
वेढ्यातून लक्ष्मीबाई निसटल्या व त्या काल्पीला गेल्या. याच ठिकाणी तात्या टोपे व नानासाहेबांशी त्यांनी पुढील
कार्यक्रमाबद्दल चर्चा केली. इंग्रजांच्या हातात काल्पी गेल्यानंतर ते तिघेही ग्वाल्हेरला गेले. ग्वाल्हेरचे राजे
जिवाजीराव शिंदे हे इंग्रजांचे मित्र होते; परंतु त्यांचे सैन्य क्रांतिकारकांना जाऊन मिळाल्यामुळे १ जून १८५८ रोजी
ग्वाल्हेरचा किल्ला क्रांतिकारकांनी जिंकला. सर ह्यू रोज यांनी तात्या टोपेंचा पराभव करून ग्वाल्हेरच्या किल्ल्यावर
हल्ला केला. राणी लक्ष्मीबाईने १९ दिवस ग्वाल्हेरचा किल्ला लढविला व इंग्रजांशी झुंज दिली; परंतु इंग्रज सेनापती
सर ह्यू रोज यांच्याशी लढतानाच त्या भयंकर जखमी झाल्या व त्यामध्येच त्या १८ जून १८५८ रोजी मरण पावल्या.
१८५७ च्या क्रांतीचे केंद्र स्थळ उत्तर भारत होते. दिल्ली, मेरठ, आग्रा, अलाहाबाद, अवध, पाटणा, रोहिलखड या
भागात क्रांतिकारकांनी आपापली सरकारे स्थापन केली होती. मध्य भारतात महधार, ग्वाल्हेर, इंदौर, अजमेरा, सागर
व निमच ही क्रांतीची केंद्रे होती. महाराष्ट्रात पेठ , नाशिक, सातारा, बीड, औरंगाबाद, खानदेश, अहमदनगर,
कोल्हापूर, बेळगाव व धारवाड ही क्रांतीची ठिकाणे होती. नानासाहेब, बहादूरशाह, तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई,
भगवंतराव कोळी, रंगो बापूजी, कुंवरसिंह, अमरसिंह, मौलवी अहमदशाह, बेगम हजरत महल व खान बहादूर खान
यांनी ठिकठिकाणी क्रांतीचे नेतृत्व केले. मौलवी अहमदशहा यांची इंग्रजांनी हत्या केली. विविध प्रकारे भेद नीतीचा
अवलंब करून लॉर्ड कॅनिंग यांनी सन १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धाचा बीमोड केला. या युद्धात ३० हजार भारतीय
सैनिक व एक लाख नागरिक मारले गेले.

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...