महाराष्ट्राच्या माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचं करोनाची लागण झाल्याने निधन झालं आहे. करोनाचा संसर्ग झाल्याने त्यांना सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान प्रकृती बिघडल्याने पहाटे चार वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती मिळत आहे. निवृत्त सनदी अधिकारी आणि महाराष्ट्राच्या पहिल्या स्त्री निवडणूक आयुक्त म्हणून नीला सत्यनारायण यांची ओळख होती. नीला सत्यनारायण १९७२ आयएएस बॅचच्या सनदी अधिकारी होत्या.
नीला सत्यनारायण यांची लोकप्रिय सनदी अधिकारी म्हणून त्यांची ओळख तर होतीच. पण आपल्या रुक्ष आणि अतिशय धकाधकीच्या कामात व्यग्र असतानाही त्यांनी आपली संवेदनशीलता जोपासली होती. लेखनातून त्या नेहमी व्यक्त होत राहिल्या. कवयित्री म्हणून त्या अधिक परिचित असल्या, तरी त्यांचे स्तंभलेखनही अनेकांना आवडत होतं. नीला सत्यनारायण यांनी हिंदी, मराठी, इंग्रजी या तिन्ही भाषांमधून पुस्तकं लिहिली. याशिवाय १५० हून अधिक कविता लिहिल्या. त्यांच्या काही पुस्तकांवर चित्रपटदेखील तयार करण्यात आले.
Wednesday 15 July 2020
माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचं करोनामुळे निधन
Subscribe to:
Post Comments (Atom)
Latest post
वाचा :- इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये
◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले ◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन ◾️...
-
(०१) राष्ट्रीय ग्राहक दिन केव्हा साजरा केला जातो ? उत्तर- २४ डिसेंबर. (०२) सायकलचा शोध कोणी लावला ? उत्तर- मॅकमिलन. (०३) 'कुरल...
-
राज्यशास्त्र: 1)रंजन कोळंबे सर. 2)किशोर लवटे - पंचायतराज. 3)एम.लक्ष्मीकांत(ठराविक टॉपिक). अर्थशास्त्र: 1)किरण देसले सर - पार्ट 1. भूगोल: महा...
-
◾️"भारताचा" पहिला अर्थसंकल्प : 7 एप्रिल 1860 जेम्स विल्सन ◾️"स्वतंत्र भारताचा" पहिला अर्थसंकल्प : 26 नोव्हेंबर 1947 ...
No comments:
Post a Comment