Wednesday 26 August 2020

"सिंधू"च्या चर्चेवर भारत आणि पाकिस्तानची चकमक वाढली



🔷 Indus Water Treaty 🔷

🔶पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे अध्यक्ष अयुब खान यांनी 19 सप्टेंबर 1960 रोजी सिंधू नदी पाणी वाटप करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

🔶जागतिक बँकेच्या मध्यस्थीने हा करार झाला होता.

🔶या संदर्भातील वाद तंटे सोडवण्यासाठी सिंधू आयोगाची स्थापना करण्यात आली.

🔶करारानुसार बियास , रावी आणि सतलज या तीन पूर्वेकडील नद्यांचे पाणी भारतात विनाअट वापर करू शकणार.

🔶पश्चिमेकडील नद्यांतून भारताला एकूण पाण्यापैकी 20 टक्के पाणी उपलब्ध आहे.

🔶सिंधू, चिनाब आणि झेलम या तीन पश्चिमेकडील नद्यांचे पाणी पाकिस्तान प्राधान्याने वापरू शकणार.

🔶भारत या पश्चिमेकडील नद्यांवर 3.6 दशलक्ष एकर फूट इतक्या पाणी साठवणीच्या सुविधा बांधू शकतो.

🔴 सिंधू नदी 🔴

🔷ही दक्षिण आशियामधील एक प्रमुख नदी आहे.

🔷तिबेट , भारत व पाकिस्तान मधून वाहणारी नदी.

🔷उगम - मानसरोवर , तिबेट.

🔷मुख - अरबी समुद्र, कराची.

🔷उपनद्या - गिलगिट , काबुल , सतलज , बियास , चिनाब , झेलम , रावी.

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...