Friday 14 October 2022

महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वाचे मुद्दे



‘गुरु नानक’ हे शीख धर्माचे संस्थापक मानले जातात.
गुरु गोविंदसिंग नांदेड मध्ये मुक्कामी असताना इ.स.1708 मध्ये दोन पठाणांकडून त्यांची हत्या झाली.
19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला.
10 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट झाली.
6 जून 1674 रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.
3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे रायगडावर निधन झाले.
1761 मध्ये तिसरे पानीपतचे युद्ध घडून आले.

1761 मध्ये तिसरे पानीपतचे युद्ध घडून आले.
1802 मध्ये इंग्रज आणि मराठे यांच्यात वसईचा तह होऊन मराठ्यांनी तैनाती फौज स्वीकारली.
शिवाजी महाराजांनी जमीन मोजण्यासाठी एक काठी तयार केली होती तिला ‘शिवशाही काठी’ असे म्हटले जात असे.
शिवाजी महाराजांनी दोन नाणी सुरू केली होती त्यामध्ये ‘होन’ हे सोन्याचे तर ‘शिवराई’ हे तांब्याचे नाणे होते.
दक्षिण भारतामध्ये ‘नायनार आणि अलवार’ या भक्ती चळवळी उदयास आल्या.
महाकवी सूरदास यांनी ‘सुरसागर’ हे काव्य लिहिले.
शिलाहार राजे प्रथम राष्ट्रकूटाचे व नंतर चालुक्य व यादवांचे अंकित झाले. चालुक्य राजा दुसर्‍या पुलकेशीने आपला मुलगा चंद्रादित्य यास सामंत म्हणून 630 च्या सुमारास नेमले व चांदोर सध्याचे चंद्रपुर ही आपली राजधानी बनवली.

23 जून 1757 च्या प्लासीच्या युद्धात बंगालच्या नवाबचा पराभव करून ब्रिटीशांनी बंगालमध्ये आपली सत्ता निर्माण केली.
1818 मध्ये मराठ्यांची सत्ता संपुष्टात आली.

No comments:

Post a Comment

Latest post

हिमालयातील 8000 मी.उंचीपेक्षा जास्त उंची असणारी शिखरे..

-----------------======---------------------- शिखर               उंची(मी)             स्थान ---------------------------------------------...