Sunday 11 June 2023

लक्षात ठेवा

 🔸१) रियासतकार सरदेसाई हे १८५७ च्या उठावास 'भारतीय जनतेत धुमसत असलेल्या असतोषाचा स्फोट' असे मानतात, तर महाराष्ट्रातीलच दुसरे एक विचारवंत न. र. फाटक है या उठावास केवळ .... असे संबोधतात.

- 'शिपाई गर्दी'


🔹२) 'विद्यार्थी, शेतकरी व मध्यमवर्गीयांचा उठाव' या शब्दांत १८५७ च्या उठावाचे वर्णन कोणी केले आहे?

- डॉ. अंबिका प्रसाद


🔸३) सन १८५८ च्या कायद्यामुळे (राणीच्या जाहीरनाम्यामुळे) लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला 'व्हाइसरॉय' झाला. तर पहिला 'भारतमंत्री' होण्याचा मान .... यास मिळाला.

- लॉर्ड स्टॅन्ले


🔹४) 'कोलकाता ते अलाहाबाद' हा लोहमार्ग .... या व्हाइसरॉयच्या कारकिर्दीत तयार झाला.

- लॉर्ड कॅनिंग


🔸५) ब्रिटिश पार्लमेंटने इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हीस 'कैसर-इ-हिंद' ही पदवी दिली. व्हाइसरॉय लॉर्ड लिटनने १ जानेवारी, १८७७ रोजी भारतात मोठा दरबार भरवून ही पदवी घोषित केली. हा दरबार कोठे भरला होता ?

- दिल्ली


🔸१) 'तलावांचा जिल्हा' ही उपाधी कोणत्याही एकाच जिल्ह्यास द्यावयाची झाल्यास ती .... जिल्ह्यास द्यावी

लागेल.

- गोंदिया


🔹२) नर्मदा प्रकल्पामधील सहभागी राज्ये ....

- महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरात


🔸३) 'धुळे' शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे?

- पांझरा


🔹४) महाराष्ट्राला शिसे आणि जस्त मिळवून देणारा जिल्हा .... 

- नागपूर


🔸५) 'ताडोबा' व 'असोलामेंढा' ही धरणे ..... या जिल्ह्यात आहेत.  

- चंद्रपूर


🔸१) मॅडम ब्लाव्हट्स्की व हेन्री स्टील ऑलकॉट यांनी इ. स. १८७५ मध्ये न्यूयॉर्क येथे 'थिऑसॉफिकल सोसायटी' या संस्थेची स्थापना केली. या संस्थेची शाखा मुंबई येथे सुरू झाली ....

- इ. स. १८७९


🔹२) इ. स. १८९८ मध्ये बनारस येथे 'हिंदू विद्यालया'ची स्थापना केली....

- अॅनी बेझंट


🔸३) .... हे विवेकानंदांचे गुरू होत.

- रामकृष्ण परमहंस


🔹४) .... यांच्या प्रयत्नांचे फलित म्हणूनच इ. स. १८७२ मध्ये बालविवाहाला आळा घालणारा 'सिव्हिल मॅरज अॅक्ट' संमत झाला.

- ईश्वरचंद्र विद्यासागर


🔸५) स्त्रियांची गुलामी नष्ट झाली पाहिजे या विचाराच्या .... या मुस्लीम समाजसुधारकाने विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मुस्लीम समाजाला आधुनिक पाश्चात्य संस्कृतीचे महत्त्व समजावून सांगण्याचे कार्य केले..

- मौलवी चिरागअली


🔸१) लष्करामध्ये दक्षिण आघाडी (Southern Command) व उत्तर आघाडी (Northern Command) असे दोन विभाग पाडून .... याने लष्कर अधिक सुसज्ज बनविले.

- लॉर्ड किचनेर


🔹२) एकूणच भारतीय राजकारणावर व भारताच्या भवितव्यावर दूरगामी परिणाम घडवून आणणारी कर्झनच्या कारकिर्दीतील सर्वांत महत्त्वाची घटना ....

- १९०५ मधील बंगालची फाळणी


🔸३) कर्झनने केलेली बंगालची फाळणी पुढे १९११ मध्ये .... याच्या कारकिर्दीत रद्द केली गेली.

- लॉर्ड हार्डिंग्ज


🔹४) १२ डिसेंबर, १९११ रोजी दिल्ली येथे भव्य दरबार भरवून बंगालची फाळणी* रद्द केल्याची घोषणा केली गेली. ही घोषणा कोणी केली ?

- ब्रिटिश सम्राट पंचम जॉर्ज


🔸 ५) इ. स. १८३५ मध्ये मुद्रण स्वातंत्र्यावरील बंदी उठविणाऱ्या .... या ब्रिटिश गव्हर्नर जनरलला 'मुद्रण स्वातंत्र्याचा उद्गाता' म्हणून गौरविले जाते.

- चार्ल्स मेटकाफ


🔸१) फक्त .... हा खंड वाळवंटाशिवाय आहे किंवा त्या खंडात कोणतेही वाळवंट नाही. 

- युरोप


🔹२) .... हे ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च शिखर होय. 

- माऊंट कॉशिस्को (२,२२८ मी.)


🔸३) एटना हा इटलीतील जागृत ज्वालामुखी कोणत्या बेटावर आहे ?

- सिसिली


🔹४) नदीपात्रातील खडकांच्या जोडांमध्ये दगड-गोटे आढळले आहेत. पाण्याच्या प्रवाहामुळे हे दगड -गोटे एकाच ठिकाणी वर्तुळाकार दिशेने फिरत आहेत. कालांतराने येथे तयार होणाऱ्या भूरूपास काय म्हणाल?

- कुंभगर्त किंवा रांजणखळगा


🔸५) लोएस मैदान हे भूरूप वाऱ्याच्या ...... कार्यामुळे तयार होते.

- निक्षेपण


🔸१) कल्याणकारी राज्य ही आदर्श कल्पना भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या भागात नमूद आहे? 

- मार्गदर्शक तत्त्वे


🔹२) सर्वोच्च न्यायालय हे अभिलेखाचे न्यायालय असल्याचे घटनेच्या कलम .... मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. 

- १२९


🔸३) सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशास पदावरून दूर करण्यासाठी जी प्रक्रिया अवलंबावी लागते; तीच प्रक्रिया उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास बडतर्फ करतानाही अवलंबावी लागते. हे विधान ....

- बरोबर आहे.


🔹४) उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास राजीनामा द्यावयाचा झाल्यास त्याने तो कोणाकडे सादर करावा लागतो ?

- राष्ट्रपती


🔸५) केंद्र-राज्य संबंधांसंदर्भात या आयोगाचा अहवाल महत्त्वपूर्ण मानला जातो ....

- न्या. सरकारीया आयोग


🔸१) १ ऑक्टोबर, १९५३ रोजी अस्तित्वात आलेले ..... हे भाषिक तत्त्वावरील भारतातील पहिले राज्य होय,
- आंध्र राज्य

🔹२) २ जून, २०१४ रोजी आंध्र प्रदेश राज्याचे विभाजन करण्यात येऊन तेलंगाणा हे भारतातील २९ वे राज्य निर्माण झाले. तेलंगाणा प्रदेशाचा समावेश असलेले मूळ आंध्र प्रदेश राज्य केव्हा आकारास आले होते ?
- १ नोव्हेंबर, १९५६

🔸३) .... हा घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख असून त्याच्या नावाने राज्याचे कार्यकारी आदेश काढले जातात.
- राज्यपाल

🔹४) राज्यपाल त्याचे कार्यकारी अधिकार थेट किंवा दुय्यम अधिकाऱ्यांद्वारा वापरू शकतो, असे कलम १५४ मध्ये म्हटले आहे. दुय्यम अधिकारी या संज्ञेत कोणाचा समावेश होतो ? 
- सर्व मंत्री व मुख्यमंत्री

🔸५) घटक राज्याच्या राज्यपालास राजीनामा द्यावयाचा असल्यास त्याने तो .... कडे सादर करावा लागतो.
- राष्ट्रपती


No comments:

Post a Comment

Latest post

प्रमुख राजवंश व त्यांचे संस्थापक सम्राट आणि अंतिम सम्राट

❑ नन्द वंश  संस्थापक ➛ महापद्‌म / उग्रसेन अंतिम शासक ➛ धनानंद ❑ मौर्य वंश  संस्थापक ➛ चंद्रगुप्त मौर्य  अंतिम शासक ➛ बृहद्रथ  ❑ गुप्त वंश  स...