07 August 2020

राज्यसेवा प्रश्नसंच


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

जगातला सर्वात उंच रेल्वे पूल कुठे बांधण्यात येत आहे?

(A) उत्तराखंड
(B) जम्मू व काश्मीर✅✅
(C) लडाख
(D) मणीपूर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या संस्थेत “विमेन आंत्रेप्रेनेऊरशिप अँड एंपोवरमेंट (WEE) कोहोर्ट” उपक्रमाचा प्रारंभ केला गेला?

(A) भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्ली✅✅
(B) भारतीय विज्ञान संस्था, बेंगळुरू
(C) भारतीय व्यवस्थापन संस्था, अहमदाबाद
(D) महिला व बाल विकास मंत्रालय

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या बँकेनी ‘कोना कोना उम्मीद’ मोहीमेचा प्रारंभ केला?

(A) फेडरल बँक
(B) HDFC बँक
(C) कोटक महिंद्रा बँक✅✅
(D) ICICI बँक

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

“स्वच्छ भारत रेव्होल्यूशन” या पुस्तकाचे संपादक कोण आहेत?

(A) जयदीप गोविंद
(B) समीर कुमार
(C) व्ही. राधा
(D) परमेश्वरन अय्यर✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या संस्थेच्यावतीने “सहकार कूपट्यूब NCDC चॅनेल” कार्यक्रमाचा प्रारंभ केला?

(A) राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र
(B) राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ✅✅
(C) राष्ट्रीय दुग्ध संस्कृती संग्रह
(D) राष्ट्रीय हवामान माहिती संस्कृती

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या संस्थेच्यावतीने भारत आणि रशिया यांच्यामधील संशोधन व विकास तंत्रज्ञान कार्यक्रमासाठी 15 कोटी रुपयांचा निधी उभारण्यात आला?

(A) विज्ञान व तंत्रज्ञान विभाग✅✅
(B) जैवतंत्रज्ञान विभाग
(C) गृह मंत्रालय
(D) परराष्ट्र कल्याण मंत्रालय

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या मंत्रालयाने ‘नॅशनल ट्रान्झिट पास सिस्टम (NTPS)’ याचे अनावरण केले?

(A) गृह मंत्रालय
(B) पर्यावरण, वन आणि हवामानातले बदल मंत्रालय✅✅
(C) वाणिज्य व उद्योग मंत्रालय
(D) परराष्ट्र कल्याण मंत्रालय

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या राज्यात नवी अत्याधुनिक ‘मध परीक्षण प्रयोगशाळा’ आहे?

(A) गुजरात✅✅
(B) राजस्थान
(C) उत्तरप्रदेश
(D) मध्यप्रदेश

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणते आठव्या कलमान्वये उद्योगपतींच्या नेतृत्वात एक कंपनी तयार करणारे पहिले राज्य ठरले?

(A) महाराष्ट्र
(B) केरळ
(C) तेलंगणा
(D) कर्नाटक✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

‘युनायटेड स्टेट्स स्पेस फोर्स’चे बोधवाक्य काय आहे?

(A) सेम्पर फोर्टिस
(B) डी ओप्रेसो लिबर
(C) सेम्पर सुप्रा ✅✅
(D) यापैकी नाही

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणती अंतराळ संस्था ‘ASTHROS’ मोहीम प्रक्षेपित करणार आहे?

(A) स्पेसएक्स
(B) इस्रो
(C) ईएसए
(D) नासा✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

‘मल्टि-इंटरऑपरेबल क्यूआर कोड’ची शिफारस करणाऱ्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या समितीचे प्रमुख कोण आहेत?

(A) डी. बी. पाठक✅✅
(B) कुश तनेजा
(C) अशोक कुमार गुप्ता
(D) संजीव चड्ढा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणती संस्था GAIL मर्यादित कंपनीच्या सहयोगाने ‘कॉम्प्रेस्ड बायोगॅस’ प्रकल्प उभारणार आहे?

(A) BHEL
(B) NTPC
(C) CCSL✅✅
(D) HPCL

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणाची इंडियन ओव्हरसीज बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी या पदावर नेमणूक झाली?

(A) संभव जैन
(B) अनसूया उइके
(C) गणेशी लाल
(D) पार्थ प्रतिम सेनगुप्ता✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणाची टाटा AIA लाइफ इन्शुरन्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नेमणूक झाली?

(A) नवीन तहिलयानी✅✅
(B) ऋषी श्रीवास्तव
(C) विभा पडळकर
(D) आशिष वोहरा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या  गव्हर्नर  जनरलनि  इनाम  कमिशन  1828  ला  नेमले .

A) लॉर्ड  विलियम बेंटिक ✅✅
B) लॉर्ड  हेस्टिंग्स
C) लॉर्ड  वेलस्ली
D) लॉर्ड मेयो
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

बॉम्बे  ठाणे  रेल्वे  कोणत्या  वर्षी  सुरु  झाली.

A) 1852
B) 1853✅✅
C) 1854
D) 1855
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

इ. स .  1848 ते  1856 या   काळात  अनेक  संस्थाने  कोणी  खालसा  केली.

A) लॉर्ड  रिपन
B) लॉर्ड  विलियम  बेंटिक
C) लॉर्ड कॉर्नवालिस
D) लॉर्ड  डलहौसी ✅✅
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


इ. स. 1800 मध्ये कोणी  हिंदी  लोकांसाठी  कलकत्ता येथे  फोर्ट  विलियम  महाविद्यालयाची  स्थापना  केली.

A) लॉर्ड  मेकॅले
B) लॉर्ड  बेंटिक
C) लॉर्ड  वेलस्ली ✅✅
D) लॉर्ड  डलहौसी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


शासकीय  कर्मचाऱ्यावर   राष्ट्रीय  काँग्रेसशी  संबंध  ठेवण्यास कोणी  बंदी  घातली.

A) लॉर्ड  कर्झन
B) लॉर्ड  डफरीन ✅✅
C) लॉर्ड रिपन
D) ए.  ओ.  ह्यूम

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

जागतिक व्याघ्र दिन कधी साजरा करण्यात येतो.?

19 जुलै
29 जुलै ✅✅
30 जून
30 जुलै

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कारगिल विजय दिवस भारतीय भुदलाच्या कोणत्या विजयी मोहीमेच्या स्मृतीत पाळला जातो?

(A) ऑपरेशन कॅक्टस
(B) ऑपरेशन पवन
(C) ऑपरेशन विजय ✅✅
(D) ऑपरेशन ब्लॅक टोरनॅडो

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या संस्थेनी ‘उन्नत भारत अभियान’साठी TRIFED सोबत सामंजस्य करार केला?

(A) भारतीय विज्ञान संस्था, बंगळुरू
(B) भारतीय व्यवस्थापन संस्था, अहमदाबाद
(C) भारतीय तंत्रज्ञान संस्था, मद्रास
(D) भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्ली ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या राज्यात चौथ्या खेलो इंडिया युवा क्रिडा स्पर्धेचे आयोजन केले जाणार?

(A) हरयाणा✅✅
(B) राजस्थान
(C) उत्तरप्रदेश
(D) मध्यप्रदेश

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणाची वेस्टर्न एअर कमांडच्या प्रमुखपदी नेमणूक झाली?

(A) एअर मार्शल विवेक राम चौधरी✅✅
(B) एअर मार्शल व्ही. आर. चौधरी
(C) एअर मार्शल बी. सुरेश
(D) एअर मार्शल आय. पी. विपिन

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📶 कोणत्या मंत्रालयाने ‘BIS-केअर’ अॅपचे अनावरण केले?

(A) ग्राहक कल्याण, खाद्यान्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय ✅✅
(B) खाद्यान्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय
(C) कॉर्पोरेट कल्याण मंत्रालय
(D) अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्रालय

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📶 कोणत्या संस्थेनी स्टार्टअप उद्योग आणि नवसंशोधकांसाठी ‘डेअर टू ड्रीम 2.0’ ही स्पर्धा आयोजित केली?

(A) भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)
(B) संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO)✅ ✅
(C) NTPC मर्यादित
(D) भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📶 कोणत्या मंत्रालयाने ‘नॉलेज रिसोर्स सेंटर नेटवर्क (KRCNet)’ याचे उद्घाटन केले?

(A) विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय
(B) जलवाहतूक मंत्रालय
(C) भूशास्त्र मंत्रालय ✅✅
(D) ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालय

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📶 राजस्थानमध्ये तयार झालेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यपालाच्या अधिकारांविषयी खालील विधाने विचारात घ्या:

1. कलम 174 अन्वये राज्यपाल योग्य वाटेल त्यावेळी आणि कोणत्याही ठिकाणी सभा बोलवू शकतात.


2. कलम 163 मध्ये असे नमूद आहे की राज्यपाल आपली कार्ये केवळ मंत्रिमंडळाच्या मदतीने आणि त्यांच्या सल्ल्यानुसार करावी आणि ते स्वतःची विवेकबुद्धी वापरू शकत नाही.

📌 दिलेले कोणते विधान अचूक आहे?

(A) केवळ 1 ✅✅
(B) केवळ 2
(C) 1 आणि 2
(D) यापैकी नाही

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📶 निधन झालेले आमला शंकर कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?

(A) बालकांच्या शिक्षणाचे प्रवर्तक
(B) मानवी हक्क कार्यकर्ता
(C) पत्रकार
(D) नृत्यदिग्दर्शक✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📶 कोणत्या देशाने सामाजिक न्याय आणि संघ-स्थापना बैठकीसाठी पहिल्यांदाच क्रिकेट सामना आयोजित केला?

(A) न्युझीलँड
(B) ऑस्ट्रेलिया
(C) दक्षिण आफ्रिका ✅✅
(D) इंग्लंड

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या सार्वजनिक संस्थेनी स्मार्ट ग्रिड तंत्रज्ञान क्षेत्रात प्रशिक्षण, संशोधन आणि उद्योजकता विकास यासाठी IIT कानपूर या संस्थेसोबत सामंजस्य करार केला?

(A) भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड
(B) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन
(C) पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन✅✅✅
(D) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या देशाने पारंपरिक औषधी आणि होमिओपथी क्षेत्रातल्या परस्पर सहकार्यासाठी भारतासोबत सामंजस्य करार केला?

(A) केनिया
(B) झिम्बाब्वे✅✅
(C) मोझांबिक
(D) मलावी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या देशाने अॅंटीमायक्रोबियल रेझिस्टन्स विषयक संशोधनासाठी भारतासोबत करार केला?

(A) ब्रिटन✅✅✅
(B) संयुक्त राज्ये अमेरिका
(C) स्पेन
(D) कॅनडा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणाला भूशास्त्र मंत्रालयाकडून ‘जीवनगौरव उत्कृष्ठता पुरस्कार 2020’ने सन्मानित करण्यात आले आहे?

(A) अशोक साहनी✅✅
(B) डॉ. एस. एस. बाबू
(C) जे. के. भट्टाचार्य
(D) टी. चक्रवर्ती

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या राज्यात / केंद्रशासित प्रदेशात पवन हंस या कंपनीने उडान योजनेच्या अंतर्गत प्रथम हेलिकॉप्टर सेवेचा शुभारंभ केला?

(A) हिमाचल प्रदेश
(B) जम्मू व काश्मीर
(C) सिक्किम
(D) उत्तराखंड✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

भारतीय हवाई दलाच्या कोणत्या पथकाला ‘गोल्डन अॅरोज’ म्हणून संबोधले जाते?

(A) स्क्वॉड्रॉन 12
(B) स्क्वॉड्रॉन 102
(C) स्क्वॉड्रॉन 17✅✅
(D) स्क्वॉड्रॉन 8

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या देशासोबत भारतीय रिझर्व्ह बँकेनी 400 दशलक्ष डॉलरच्या चलनाची अदलाबदल करण्यासाठी करार केला?

(A) इथिओपिया
(B) सेनेगल
(C) सेशेल्स
(D) श्रीलंका ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

काश्मीर खोऱ्यातल्या कोणत्या मसाल्याला केंद्र सरकारकडून GI टॅग प्राप्त झाला?

(A) कोशूर माऱ्त्सिवागुन
(B) कोशूर झुर
(C) काश्मीर कहवा
(D) केसर ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या मंत्रालयाने भाडेतत्वावर देण्याच्या संदर्भातल्या भारतीय लेखा मानदंडांमध्ये दुरुस्ती केली?

(A) वाणिज्य व उद्योग मंत्रालय
(B) कॉर्पोरेट कल्याण मंत्रालय ✅✅
(C) कायदा व न्याय मंत्रालय
(D) अर्थमंत्रालय

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

2020 साली जागतिक हेपॅटायटीस दिनाची संकल्पना काय आहे?

(A) इन्व्हेस्ट इन एलिमीनेटिंग हेपॅटायटीस
(B) हेपॅटायटीस फ्री फ्युचर✅✅
(C) फाइंड द मिसिंग मिलियन्स
(D) मेकिंग हेपॅटायटीस एलिमीनेशन ए रीयालिटी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या देशात भारत निर्यातीला चालना देण्यासाठी कापूस साठविण्यासाठी गोदाम उभारणार आहे?

(A) व्हिएतनाम✅✅
(B) म्यानमार
(C) अफगाणिस्तान
(D) फिलीपिन्स

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या मंत्रालयाने ग्रामीण विकास कार्यक्रमांचे मूल्यांकन करण्यासाठी “वित्तीय व्यवस्थापन निर्देशांक” जाहीर केला?

(A) सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
(B) मनुष्यबळ विकास मंत्रालय
(C) कामगार व रोजगार मंत्रालय
(D) ग्रामीण विकास मंत्रालय✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी तयार केलेल्या भारतीय हवामान विभागाच्या (IMD) मोबाइल अॅपचे नाव काय आहे?

(A) ऋतू
(B) जलवायू
(C) मौसम ✅✅
(D) अवधी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या मंत्रालयाने ‘BIS-केअर’ अॅपचे अनावरण केले?

(A) ग्राहक कल्याण, खाद्यान्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय ✅✅
(B) खाद्यान्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय
(C) कॉर्पोरेट कल्याण मंत्रालय
(D) अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्रालय

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

___ या दिवशी ‘जागतिक युवा कौशल्य दिन’ साजरा केला जातो.

(A) 14 जुलै
(B) 15 जुलै✅✅
(C) 13 जुलै
(D) 12 जुलै

प्रश्न मंजुषा

Q.1..... बँक राष्ट्रीयीकरण दिवस म्हणून ओळखला जातो.
1 १९ जुलै √√√√
2 ३१ आॅक्टोबर
3  २३ एप्रिल
4 १ व ३

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.2 NRHM ची सुरुवात .......या वर्षी करण्यात आली.
1  २००७
2  २००४
3  २००५√√√√√√
4  २०१३

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.3  भारतातील बेकारीसाठी खालीलपैकी कोणते कारण महत्त्वाचे नाही
1  कामगारांची वाढती संख्या
2  अयोग्य तंत्रज्ञान
3  प्रभावी मागणीची     
कमतरता
4  कामगारांसाठी संरक्षित कायदा√√√√

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.4...... मध्ये सर्वप्रथम वैज्ञानिक पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न गणना करण्यात आली?
1  १९४८-४९
2  १९३१-३२√√√√
3  १९११-१२
4  १८६७-६८

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.5  खालीलपैकी कोणती घटना पंचवार्षिक योजना चालु असताना घडली नाही?
1   चलन निश्चलीकरन
2   रुपयाचे अवमूल्यन√√√√
3   १ व २  दोन्ही घडले
4  १ व २ दोन्ही घडले नाही

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.6  रिझर्व्ह बँकेच्या पत नियंत्रणाचे दैनंदीन वापराचे साधन कोणते?
1   बँकदर
2  रोख राखीव प्रमाण
3  वैधानिक रोखता प्रमाण
4  रेपो आणि रेव्हर्स रेपो व्यवहार√√√√

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.7  खाद्याबाबतच्या आवडी व अग्रक्रम स्थिर असताना उत्पन्न वाढत असताना अन्नावरील प्रत्यक्ष खर्च जरी वाढत असला तरी उत्पन्नापैकी अन्नावर केलेल्या खर्चाचे प्रमाण कमी होते हे सांगणारा नियम म्हणजे......... होय.
1  "से" चा बाजार विषयक नियम
2  उपभोगाचा मानसशास्त्रीय नियम
3  एंजल चा नियम√√√√√
4  फिलिप्स वक्ररेषा

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.8  १८६७ मध्ये भारताचे राष्ट्रीय उत्पन्न.... तर दरडोई उत्पन्न..... इतके होते.
1  २० कोटी व ३४० रुपये वार्षिक
2  २४० कोटी व २० रुपये वार्षिक
3  ३४० कोटी व २० रुपये वार्षिक √√√√√√
4  ३४० कोटी वार्षिक व २०  रुपये मासिक

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.9 पहिल्या पंचवार्षिक योजने दरम्यान खालीलपैकी....... मध्ये वाढ झाली नाही?
1  अन्नधान्य उत्पादन
2  राष्ट्रीय उत्पन्न
3  दरडोई उत्पन्न
4  किमतीचा निर्देशांक√√√√√√

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.10  भारत निर्माण योजनेमध्ये पुढील पैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही?
अ. ग्रामीण शिक्षण
ब. ग्रामीण आरोग्य
क. ग्रामीण पाणीपुरवठा
ड. ग्रामीण रस्ते
1   अ आणि ब  √√√√√
2   ब आणि क
3   क आणि ड
4  अ आणि ड

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.11  खालीलपैकी कोणते घटक १९६६-१९६९ दरम्यान भारतातील नियोजन खंडित होण्यास कारणीभूत होते?
1  चीन -भारत युध्द
2  भारत पाकिस्तान संघर्ष
3  आर्थिक मंदी
4  राजकीय अस्थिरता √√√√√

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.12  तीव्र मंदी दूर करण्यासाठी सरकारने मुद्दाम घडवून आणलेली तेजीची/ चलन वाढची परिस्थिती म्हणजे ....... होय.
1  मुद्रा अवपात
2  मुद्रा संस्फीती√√√√√
3  स्टगफ्लेशन
4  स्टगनेशन

📖📖📖📖📖📖📖📖📖

[Q.13  भारत सर्वाधिक निर्यात कोणत्या राष्ट्राला करतो?
1  यु एस ए √√√√√√ 
2  यु के 
3  चीन  
4  सिंगापूर

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.14 १९६९ च्या १४ बँकांच्या राष्ट्रीयीकरणाला खालीलपैकी कोणाचा विरोध होता?
अ इंदिरा गांधी
ब  मोरारजी देसाई
क जयप्रकाश नारायण
ड  रिझर्व्ह बँक
1  अ आणि क
2  ब आणि  ड√√√√√√
3  ब आणि  क
4  क आणि ड

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.15  तिसऱ्या पंचवार्षिक योजने दरम्यान खालीलपैकी...... मध्ये घट झाली नाही.
1  अन्नधान्य उत्पादन
2  राष्ट्रीय उत्पन्न
3  परकीय चलन साठा
4  किमतीचा निर्देशांक√√√√√

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.16  भारतात मध्यवर्ती   बँकेची शिफारस कोणी केली नव्हती?
1   हिल्टन यंग आयोग
2   चेंबर्लिन आयोग
3   फौलर समिती
4   मॅकलेगन समित✅

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.17  ........ ही कंपनी 'मोती' या नावाने युरिया उत्पादन करते.
1  राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर ली.
2  मद्रास फर्टिलायझर ली.
3  हिंदुस्थान फर्टिलायझर ली.√√√√√√√
4  वरील सर्व

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.18 राष्ट्रसभेकडून कोणत्या वर्षी राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना करण्यात आली होती?
1  १९४६
2  १९३८√√√√√
3  १९२९
4  १९२५

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.19 सरकारच्या तुटीच्या अर्थभरणाचा खालीलपैकी कोणता स्रोत नाही?
1  रिझर्व्ह बँकेकडून व व्यापारी बँकेकडून कर्ज घेणे
2  नवीन चलन निर्मिती
3  स्वतःच्या रोख रकमेतून पैसे काढणे
4  जमा झालेले महसूल√√√√√

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.20 प्रत्येक कार्यक्रमाचे ज्यामध्ये मूल्यमापन केले जाते ते..... अंदाजपत्रक होय.
1  रोख
2  बहुआयामी
3  शून्याधारीत√√√√√
4  यापैकी नाही

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.21 सार्वजनिक खर्चाचा आधुनिक सिध्दांत कोणी मांडला?
1 प्रो पिकॉक व प्रो वाईजमन√√√√√√
2 प्रो पिगु
3 डॉ मार्शल
4 वरील पैकी नाही

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.22 अप्रत्यक्ष करांचा समाजावर... परिणाम होत?
1  पुरोगामी
2  न्याय्य
3  प्रतिगामी√√√√√√
4  प्रमाणशीर

📖📖📖📖📖📖📖📖

रावबहादुर गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी.


🅾(फेब्रुवारी १८, इ.स. १८२३ - ९ ऑक्टोबर इ.स. १८९२)
.इ स.च्या एकोणिसाव्या शतकात होऊन गेलेले मराठी पत्रकार, समाजसुधारक व इतिहासलेखक होते. 

🅾प्रभाकर नावाच्या साप्ताहिकातून लोकहितवादी या टोपणनावाने यांनीसमाजसुधारणाविषयक शतपत्रे (वस्तुतः संख्येने १०८) लिहिली. .
 
🅾भाऊ महाजन उर्फ गोविंद विठ्ठल कुटें हे प्रभाकर साप्ताहिकाचे संपादक होते. वर्तमानपत्रात लिहिलेल्या एका ‘शतपत्रांचा इत्यर्थ‘ मथळ्याच्या पत्रात त्यांनी सुधारक विचारांच्या त्यांच्या लेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे.

🅾मुळात संख्येने १०० असलेल्या या निबंधांत त्यांनी ‘संस्कृतविद्या‘, पुनर्विवाह‘, पंडितांची योग्यता‘, ‘खरा धर्म करण्याची आवश्यकता‘, ‘पुनर्विवाह आदी सुधारणा‘ ही पाच आणि अधिक तीन अशा आठ निबंधांची भर घातली.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

रावबहाद्दुर नारायण मेघाजी लोखंडे.

🅾 (जन्म: इ.स. १८४८; मृत्यू : ९ फेब्रुवारी, इ.स. १८९७)

🅾हे एक भारतीय कामगार पुढारी होते.

🅾नारायण मेघाजींचे मूळ गाव  पुणे जिल्ह्यातील सासवडजवळचे कन्हेरसर.

🅾माळी शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या लोखंडे यांनी गरीब परिस्थितीतून माध्यमिक शिक्षण पुरे केले.

🅾सुरुवातीस रेल्वे खात्यात कारकून म्हणून व पुढे पोस्ट खात्यात काही काळ नोकरी केल्यावर, लोखंडे यांना मुंबईच्या मांडवी भागात एका कापड गिरणीत भांडारपालाची नोकरी मिळाली.

🅾तेथे त्यांना दहशतीच्या वातावरणात, दिवसातून १३-१४ तास काम करीत असलेले गिरणी कामगार आढळले; त्यांना आठवडयाची सुटीही मिळत नसे; परिणामी लोखंडे यांनी नोकरी सोडून स्वतःस कामगार चळवळीस वाहून घेण्याचे ठरविले.

🅾त्याकरिता ते कामगार वस्तीतच राहू लागले. त्यांनी बाँबे मिल हँड्‌स असोसिएशन ही गिरणी कामगार संघटना २३ सप्टेंबर १८८४ रोजी स्थापली.
ही कामगार संघटना भारतातील संघटित कामगार चळवळीची सुरुवात मानली जाते.

🅾 इ.स.च्या १९व्या शतकात प्रथमच सुरू झालेल्या भारतातील कामगार चळवळीचे जनक म्हणून नारायण मेघाजी लोखंडे ओळखले जातात.

🅾लोखंडे हे महात्मा फुल्यांनी स्थापलेल्या सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेचे अध्यक्षही होते.
तसेच सत्यशोधक चळवळीतली त्यांची कामगिरीही महत्त्वपूर्ण मानली जाते.

🅾लोखंडे यांच्या पत्‍नीचे नाव गोपिकाबाई व मुलाचे नाव गोपीनाथ असे होते.

🧩पत्रकारिता...

🅾इ.स. १८८० मध्ये पुण्यात बंद पडलेले दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचे पहिले मुखपत्र लोखंडे यांनी मुंबईत सुरू केले.

🅾हे नियतकालिक शेतकरी-कामकरी वर्गाची बाजू हिरिरीने मांडे; त्यांच्या हालअपेष्टांना, दुःखाला वाचा फोडून सरकाचे व जनतेचे लक्ष वेधून घेत असे.
लोखंडे यांनी गुराखी या नावाचे एक दैनिकही काढले होते.

🅾सक्तीचे शिक्षण, दारूबंदी, मागासलेल्यांना नोकरीत प्रवेश, विद्यार्थ्यांना सवलती, शेतकऱ्यांना जंगलच्या कायद्यामुळे होणारा त्रास, विधवांच्या केशवपनास बंदी वगैरे अनेक प्रश्नांना लोखंडे यांनी दीनबंधूमधून वाचा फोडली.

🅾रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची दुर्दशा झाली असल्याचा पहिला आवाज दीनबंधूने उठविला.

🧩पुरस्कार आणि सन्मान...

🅾लॉर्ड लॅन्सडाऊन च्या काळात मुंबईत १८९३ मध्ये झालेल्या हिंदू-मुसलमानांच्या दंगलीत शांतता प्रस्थापित करण्याचे काम नारायण मेघाजी लोखंडे यांनी केले.
या कामगिरीबद्दल इंग्रज सरकारने त्यांना ‘रावबहादूर’ ही पदवी बहाल केली.

🅾ब्रिटिश सरकारने लोखंडे यांनी कामगारांसाठी केलेल्या कामगिरीची दखल देऊन त्यांना ‘जे.पी.’ (जस्टिस ऑफ पीस) हा किताब देऊन त्यांचा गौरव केला.

🧩प्लेगने मृत्यू...

🅾मुंबईत इ.स. १८९६ मध्ये प्लेगची मोठी साथ उसळली. या साथीत अनेक लोक मृत्युमुखी पडले. याही वेळी पुढाकार घेऊन लोखंडे यांनी सरकारी मदतीने प्लेगग्रस्तांसाठी एक ‘मराठा इस्पितळ’ काढले; परंतु दुर्देवाने लोखंडे यांनाच प्लेगने पछाडले व त्यातच त्यांचा अंत झाला.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

विठ्ठल रामजी शिंदे.

🅾जन्म - 23 एप्रिल 1873, जामखिंडी, कर्नाटक.

🅾मृत्यू - 2 जानेवारी 1944.

🅾1932 - 33: बडोदा संस्थानचे सयाजीराव गायकवाड परितोषिक.
'महाराष्ट्राचे अपेक्षित मानकरी' गं. बा. सरदार.'निष्काम कर्मयोगी', भाई माधवराव बागल.

🅾जनतेकडून 'महर्षी' ही पदवी.
अस्पृश्यता निर्मूलनाचा प्रश्र्न राष्ट्रीय एकात्मतेशी जोडला.

🧩संस्थात्मक योगदान :

🅾1905 - मुंबई येथे तरुण अस्तिकांचा संघ स्थापन.

🅾18 ऑक्टोबर 1906 - डिप्रेस्ड क्लास मिशनची मुंबई येथे स्थापना. पहिले अध्यक्ष - न्या. चंदावकर.

🅾1910 - जेजूरी येथे मुरळी प्रतिबंधक चळवळ.द्याराम गिड्डमल यांच्या सहकार्याने 'सेवा सदन' ही संस्था.

🅾अनाथाश्रम - रावजी भोसले यांच्या सहकार्याने पंढरपूर येथे देवदासी प्रथा व व्यसनमुक्ति कार्य.ब्राहय समाजाच्या प्रसारासाठी ब्राहय पोस्टल मिशनची स्थापना.

🅾23 मार्च 1918 - अस्पृश्यता निवारक संघ.

🅾1918 - मराठा समाजात जागृतिंनिर्माण करण्यासाठी मराठा राष्ट्रीय संघाची स्थापना.

🅾1920 - पुण्यातील दुष्काळ पीडितांसाठी दुष्काळ आपत्ती निवारण संस्था.

🅾1937 - स्त्रियांसाठी अहिल्याश्रम.

🅾1923 - तरुण ब्रहयो संघ.

🅾1937 - बहुजन पक्षाची स्थापना.
स्त्रियांसाठी आर्यमहिला समाज, कौटुंबिक उपासना मंडळ.वृद्धंनसाठि संगत सभा.

🧩लेखन :

🅾प्रार्थना समाजाच्या सुबोध पत्रिकेत लेखन.1903 - प्रार्थना समाजाच्या सदस्यांसाठी उपासना हे साप्ताहिक.

🅾1903 - अ‍ॅमस्टारडॅम येथे जागतिक धर्म परिषदेत 'हिंदुस्थानातील उदारधर्म' हा निबंध वाचला.Thiestic Directory जागतिक उदार धर्माची माहिती सांगणारा धार्मिक ग्रंथ लिहाला.

🅾Untouchable India,
History Of Partha,
भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
माझ्या आठवणी व अनुभव हे आत्मचरित्र .

🧩वैशिष्ट्ये :

🅾शिमग्याच्या सणातील बीभत्स प्रकारांना आळा बसावा म्हणून जनजागृती मोहीम.अस्पृश्यानसाठी रूपी फंड हा उप्रकार.

🅾1904 - मुंबई धर्म परिषद.

🅾1905 - अहमदनगर जवळ भिंगार येथे अस्पृश्योध्दाराची शपथ.

🅾1918 - मुंबई येथे अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद भरविली. अध्यक्ष सायाजीराव गायकवाड.

🅾1924 - वायकोम सत्याग्रह (त्रावनकोर), अस्पृश्य सत्याग्रहात सहभाग.

🅾1935 - बडोदा मराठी साहित्य संमेलनात तत्वज्ञान व समाजशास्त्र शाखेचे अध्यक्ष.

🅾स्त्रियांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जपान मधील विद्या पिठाच्या धर्तीवर भारतात महिला विद्यापीठे व्हावीत, असे मत.
शाहू महाराजांनी क्षात्र जगतगुरुपदी मराठा व्यक्ति नेमल्याबद्दल निषेध केला.

💠💠विठ्ठल रामजी शिंदे ऊर्फ महर्षी शिंदे.💠💠

🅾 ( जमखिंडी, २३ एप्रिल, इ.स. १८७३ - २ जानेवारी, इ.स. १९४४) हे मराठी समाजसुधारक, धर्मसुधारक व लेखक होते.

🧩जीवनसंपादन...

🅾शिंदे यांनी पुण्याच्या फर्गुसन कॉलेजमधून बी.ए.ची पदवी मिळवली. कायद्याच्या शिक्षणाचे प्रथम वर्ष उत्तीर्ण केल्यावर ते एल्एल.बी. परीक्षेकरिता मुंबईला गेले.तेथे ते प्रार्थना समाजातदाखल झाले. १८ ऒक्य़ोबर, इ.स. १९०६ रोजी महर्षी शिंदे यांनी ‘'डिप्रेस्ड क्लास मिशन’' या संस्थेची स्थापना केली. त्यांनी इ.स. १९२८ साली पुणे येथे शेतकरी परिषद भरवली.

🧩लेखनसंपादन..

🅾शिंदे यांनी वेगवेगळ्या कालखंडात रोजनिशी लिहिली. पहिल्यांदा १८९८ मध्ये फर्ग्युसन कॉलेजात शिकत असताना, मग १९०१-३ या काळात इंग्लंडमध्ये धर्मशिक्षण घेत असताना, व त्यानंतर कायदेभंग सहभागाबद्दल शिक्षा झाल्यानंतर १९३० साली येरवडा तुरुंगात असताना त्यांनी रोजनिशींचे लेखन केले आहे.

🅾याशिवाय १९२८ साली शिंदे यांनी 'ब्राह्मसमाज शतसांवत्सरी सफर' नावाची रोजनिशी लिहिली आहे. या चारही रोजनिशीत महर्षी शिंदे यांच्या प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडते.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

महादेव गौविंद रानडे.


  
🅾 जन्म - १८ जानेवारी १८४२
     ( निफाड, नाशिक )

🅾 मृत्यू - १६ जानेवारी १९०१

🅾 रानडे यांना हिंदी अर्थशास्त्राचे जनक म्हनुन संबोधले जाते

🅾 तसेच त्यांना पदवीधरांचे मुकुटमणी म्हनतात.रानडे हे अक्कलकोटी राज्याचे कारभारी होते.

🅾 रानडे हे गौपाळ कृष्ण गौखले यांचे गुरू होते. त्यांना महाराष्ट्राच्या प्रबोधनाचे जनक म्हटले जाते.

🅾 समाजसुधारकांसाठी सर्वांगीन प्रतिमान मांडनारे प्रज्ञावंत रानडे हे आर्थिक राष्ट्रवादी होते.

🅾 १८८७ - सामाजिक परीषद

🅾 १८९० - औद्योगिक परीषद

🧩 संस्थात्मिक योगदान -

🅾 १८६५ - विधवा विवाहोत्तेजक मंडळी

🅾 १८६७ - मुंबई येथे प्रार्थना समाज स्थापनेत सहभाग

🅾 १८७० - सार्वजनिक सभा स्थापनेत सहभाग

🧩उद्दिष्ट -

🅾थंड गौळा होउन पडलेल्या समाजात विचार , संघटना व कृतीची सांगड घालन्यासाठी व्यासपीठ उभे केले.

🅾वकृत्वत्तेजक सभा - पुणे

भारतातील परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक

💠💠 (FDI in India).💠💠

🅾ऑगस्ट 1991 मध्ये केंद्र सरकारने स्विकारलेल्या उदरीकरणाच्या धोरणामुळे देशात परकीय तंत्रज्ञान व परकीय प्रत्यक्ष गुंतवणुकीचा मार्ग सुलभ झाला.

🅾परकीय प्रत्यक्ष गुंतवणुकीची संमती व्यवस्था (Approval to FDI in India) – भारतात परकीय प्रत्यक्ष गुंतवणुकीस दोन प्रकारे संमती दिली जाते –

1) Automatic Route आणि

2) Government Approval Route.

1) परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक संमत करण्यात आली आहे. Automatic Route व्दारे परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक करण्यासाठी भारत सरकारची किंवा रिझर्व्ह बँकेची पूर्व संमती घेण्याची आवश्यकता नसते. मात्र गुंतवणुकानंतर (inward remittances प्राप्त होण्यास सुरुवात झाल्यापासून) 30 दिवसांच्या आत रिझर्व्ह बँकेच्या संबंधित विभागीय कार्यालयास गुंतवणुकीची अधिसूचना देऊन कागदपत्रांची पूर्तता करावी लागते.

2) ज्या क्षेत्रांमध्ये Automatic Route संमत नाही अशा क्षेत्रांमध्ये गुंतवणूक Government Approval Route व्दारे संमत केली जाते. अशा गुंतवणुकीसाठी सरकारच्या पूर्व संमतीची आवश्यकता असते.

💠भारतावरील परकीय कर्ज (Foreign Debt Burden on India).💠💠

🅾भारतावरील परकीय कर्जाचे आकडे दर तीन महिन्यांनी प्रकाशित केले जातात, प्रत्येक वर्षातील पहिल्या व चौथ्या तिमाहीच्या परकीय कर्जाचे आकडे आर.बी.आय. मार्फत, तर दुसर्याे व तिसर्याक तिमाहीच्या परकीय कर्जाचे आकडे वित्त मंत्रालयामर्फत प्रकाशित केले जातात.

🅾मार्च 2012 च्या शेवटी भारताचे परकीय कर्ज वाढून $345.8 अब्ज एवढे झाले होते. मार्च 2011 अखेर असलेल्या $ 305.9 अब्ज कर्जाच्या तुलनेत त्यात 39.9 अब्ज डॉलर्सची वाढ घडून आली.

🅾मार्च 2012 च्या अखेरीस भारताच्या या परकीय कर्जाची चलननिहाय विभागणी (Currency Composition) पुढीलप्रमाणे- अमेरिकन डॉलर (55%), भारतीय रुपया (21.4%), जपानी येन (9.4%), SDRs(8.7%), तर उर्वरित युरो व पाउंडच्या स्वरुपात होते.

💠💠भारताचा कर्जबाजारी देशांपैकी क्रमांक.💠💠

🅾1991 मध्ये भारत तिसरा सर्वात मोठा कर्जबाजारी देश होता. (पहिला- ब्राझिल, दूसरा-मेक्सिको)

🅾1998 मध्ये –  9 वा

🅾1999 मध्ये – 10 वा

🅾2000 मध्ये –  9 वा

🅾2002 मध्ये –  8 वा

🅾2004 मध्ये –  8 वा

🅾2006 मध्ये –  5 वा

🅾2008 मध्ये –  5 वा

🅾जागतिक बँकेच्या ‘Global Development Finance, 2012’ नुसार 2010 मध्ये विकसनशील राष्ट्रांपैकी भारत हा 5 व्या क्रमांकांचा सर्वाधिक कर्जबाजारी देश होता. (पहिला-चीन, दूसरा- रशिया, तिसरा- ब्राझिल, चौथा-तृर्कस्थान)

🅾जागतिक बँकेने 1997 पर्यंत भारताचा समावेश अती कर्जबाजारी देशांमध्ये (Severly Indented) केला होता. 1998 मध्ये मात्र भारत मध्यम कर्जबाजारी देश (Moderately Indebted) गणला गेला. 1999 पासून मात्र भारताचा समावेश कमी कर्जबाजारी देशांमध्ये (Less Indebted) केला जात आहे.

💠💠भारतावरील परकीय कर्जाची वैशिष्टये.💠💠

🅾मार्च 2012 च्या शेवटी भारतावरील परकीय कर्ज 345.8 अब्ज डॉलर्स इतके झाले होते. ही रक्कम जी.डी.पी.च्या 20 टक्के इतकी होती.

🅾या एकूण परकीय कर्जापैकी 78.18 अब्ज डॉलर्स इतके अल्पकालीन कर्ज होते, तर 267.64 अब्ज डॉलर्स इतके दीर्घकालीन कर्ज होते.

🅾गेल्या काही वर्षांमध्ये अल्पकालीन तसेच दीर्घकालीन कर्जाच्या रकमेत सतत वाढ होत आहे.   

🅾मार्च 2012 अखेर एकूण परकीय कर्जापैकी अल्पकालीन कर्जाचे प्रमाण 22.6 टक्के, तर दीर्घकालीन कर्जाचे प्रमाण 77.4 टक्के होते.

🅾एकूण परकीय कर्जाचे देशाच्या GDP शी असलेले प्रमाण मार्च 2012 च्या शेवटी 20 टक्के होते. (मार्च 2010 : 17.3 टक्के)

🅾अल्पकालीन कर्जाचे परकीय चलन साठयाशी असलेले प्रमाण मार्च 2012 च्या शेवटी 50.1 टक्के होते. (ते मार्च 2011 च्या शेवटी 42.3 टक्के इतके होते.)

🅾देशाच्या परकीय चलन साठयाचे एकूण परकीय कर्जाशी असलेले प्रमाण (FOREX cover of external debt) मार्च 2011 अखेर 99.6 टक्के होते. ये कमी होऊन मार्च 2012 अखेर 85.1 टक्के इतके कमी झाले. हे प्रमाण 100 टक्क्यांपेक्षा कमी असण्याचा अर्थ असा होतो की देशाच्या परकीय चलन साठयापेक्षा देशाच्या एकूण परकीय कर्जाचे प्रमाण अधिक होणे होय. असे 2002-03 नंतर प्रथम मार्च 2011 अखेर घडले आहे.

🅾ऋण सेवा गुणोत्तर (Debt service ratio) मार्च 2011 अखेर 4.2 टक्के होते. ते मार्च 2012 अखेर 5.6 टक्के इतके वाढले झाले.

🅾ऋण सेवा गुणोत्तर हे एकूण कर्ज सेवेपोटी देय रकमेचे (मुद्दल व व्याज) परकीय चालू खात्यावरील जमेशी असलेले गुणोत्तर असते. (i.e. Proportion of gross debt service payments to external current receipts, excluding receipts on account of official transfers).

🅾एकूण परकीय कर्जापैकी सरकारी कर्जाचे प्रमाण मार्च 2012 अखेर 23.7 टक्के इतके होते. गैर-सरकारी कर्जाचे प्रमाण मार्च 2012 अखेर 76.3 टक्के इतके होते. गेल्या काही वर्षापासून एकूण परकीय कर्जापैकी सरकारी कर्जाचे प्रमाण साधारणत: कमी होत आहे, तर गैर सरकारी कर्जाचे प्रमाण वाढत आहे.

🅾सरकारी कर्जामध्ये केंद्र तसेच राज्य सरकारांनी घेतलेल्या बहुपक्षीय तसेच व्दिपक्षीय कर्जांचा समावेश होतो. बहुपक्षीय कर्जापैकी IBRD, ADB सारख्या संस्थांकडून मिळणारी कर्जे गैर-सुलभ (non-concessional) असून बाजार दराने प्राप्त होतात, तर IDA, IFAD, OPEC कडून मिळणारी कर्जे सुलभ अटींवर (concessional) प्राप्त होतात. अशा कर्जांचा दर कमी व  परतफेडीचा कालावधी अधिक असतो.

🅾2010-11 मध्ये सरकारी कर्जापैकी सर्वाधिक बहुपक्षीय कर्जे IDA कडून, तर त्याखालोखाल IBRD व ADB कडून प्राप्त झाली. सर्वाधिक व्दिपक्षीय कर्जे जपानकडून, तर त्याखालोखाल जर्मनी व अमेरिकेकडून प्राप्त झाली.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

online Test Series