Ads

17 April 2024

स्वतंत्र भारताची राज्यघटना

🔅लोकनियुक्त घटना समितीची कल्पना सर्व प्रथम मानवेंद्रनाथ रॉय यांनी १९२७ मध्ये सायमन कमिशन पुढे मांडली भारतमंत्री र्बकन हेड यांच्या आवाहनानुसार भारतीय नेत्यांनी नेहरू रिर्पोट च्या स्वरुपात १९२८ मध्ये घटनेबाबतच्या शिफारशी देण्यात आल्या होत्या. गोलमेज परिषदेतही घटना निर्मितीबाबत कॉंग्रेसने आग्रह धरला. ३० मार्च १९४२ रोजी क्रिप्स योजना जाहीर झाली. त्यानुसार महायुध्द समाप्तीनंतर भारतासाठी एक घटना परिषद नेमण्याचे आश्र्वासन देण्यात आले व १९४६ च्या कॅबिनेट मिशन त्रिमंत्री योजनेनुसार घटना समितीच्या निर्मितीची तरतूद करण्यात आली.


🔅 तरिमंत्री योजनेनुसार १० लाख लोकांमागे एक अशा प्रमाणात प्रतिनिधींची निवड करण्यात येऊन घटना परिषदेची निर्मिती झाली. या परिषदेमध्ये सर्वसामान्य २१० मुस्लीम ७८ शीख ४ इतर ४ अशा २९६ प्रतिनिधींची निवड करण्यात आली. घटना समितीचे हंगामी अध्यक्ष म्हणून डॉ. सच्चिदानंद सिन्हा निवडले गेले. त्यांच्या अध्याक्षतेखाली अध्यक्षपदी डॉ. राजेंद्रप्रसाद यांची निवड झाली घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणुन डॉ. एच. सी. मुखर्जी यांची तर समितीचे सल्लागार म्हणून डॉ. बी. एन. राव यांची निवड झाली. याचबरोबर सा समितीमध्ये प्रमुख सदस्य म्हणुन पंडित नेहरू, सरदार पटेल, डॉ. आंबेडकर, डॉ. राधाकृष्णन, के.एम. मुन्शी डॉ. जयकर इत्यादींचा सहभाग होता.


🔅 घटना परिषदेमार्फत २९ ऑगस्ट १९४७ रोजी मसूदा समितीची निवड झाली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची मसूदा समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्याचबरोबर बी. एन. राव, एस, एन. मुखर्जी, इ. मसुदा समितीचे सदस्य म्हणून काम पाहिले घटनेच्या मसुद्यामध्ये ३१५ कलमे व ७ परिशिष्टे आहेत. घटना समितीने भारताच्या राष्ट्रध्वजाची निर्मिती केली. तर गुरुदेव रविंद्रनाथ टागोरांच्या भारत भाग्य विधाता, या गीताला राष्ट्रगीताचा मान देण्यात आला. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी नवीन राज्यघटनेला मंजूरी देण्यात आली. राज्यघटना निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान अत्यंत महत्वपूर्ण आहे.


🔅 महणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात. २६ जानेवारी १९५० पासून नवीन राज्यघटनेनुसार देशाचा कारभार सुरु झाला. म्हणून हा दिवस सर्व देशभर साजरा केला जातो. भारताचे संविधान हा राज्यघटनेचा अत्यंत महत्वपूर्ण भाग आहे. घटनेची ध्येये आणि उद्दिष्टे यात प्रतिबिंब्ंिात झाली आहेत. भारताचे संविधान खालीलप्रमाणे.


🔶 भारताचे संविधान


🔅 आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक, व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्र्वास, श्रध्दा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता:

निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा आणि त्या सर्वामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्र्वासन देणारी बंधूता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करुन,

आमच्या संविधान सभेस आज दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.



💠 भारतीय राज्यघटनेची वैशिष्टे :-



(१) लिखित घटना


भारताची राज्यघटना लिखित स्वरुपाची आहे. इंग्लंडच्या घटनेप्रमाणे ती अलिखित नाही. राज्यकारभाराबाबतचे नियम, कोणाचे काय अधिकार व कर्तव्य याबाबतची माहिती राज्यघटनेत देण्यात आयली आहे. घटना लिखित असली तरी काही अलिखित परंपरा पाळल्या जातात. उदा. एकच व्यक्ती तीन वेळा भारताचा राष्ट्रपती होऊ शकत नाही.



(२) जगातील सर्वात मोठी विस्तृत राज्यघटना


भारतीय राज्यघटना व्यापक व विस्तारित स्वरुपाची आहे. घटनेमध्ये ३९५ कलमे, ९ परिशिष्टे आहेत, केंद्र व प्रांत यांचे स्वरूप व अधिकार, न्यायव्यवस्थेचे अधिकार, निवडणूक आयोगाचे अधिकार, याची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. यामुळे भारतीय राज्यघटना जगातील इतर देशांच्या तुलनेत विस्तृत स्वरूपाची आहे.



(३) लोकांचे सार्वभौमत्व


घटनेनुसार जनता सार्वभैाम आहे. जनतेच्या हाती खरी सज्ञ्ल्त्;ाा आहे. कारण जनता आपल्या प्रतिनिधीमार्फ़त राज्यकारभार चालविते राष्ट्रप्रमुखाची (राष्ट्रपती) निवड जनता आपल्या प्रतिनिधीकरवी करते. निवडणुकीच्या माध्यमातुन जनता आपणास आवश्यक असा बदल घडवून आणू शकते. २६ जानेवारी १९५० पासून घटनेनुसार देशाचा राज्यकारभार सुरु झाला म्हणून २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन राष्ट्रीय सण म्हणुन साजरा केला जातो.


(४) संसदीय लोकशाही


स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीयांनी लोकशाही शासनपध्दतीची मागणी केली होती. घटनाकारांनी इंग्लंडचा आदर्श समोर ठेवून संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला. लोसभा व राज्यसभेची निर्मिती करण्यात आली. लोकसभेतील सदस्य पक्ष आपले मंत्रिमंडळ (कार्यकारीमंडळ) बनवतो. कार्यकारी मंडळ हे कायदेमंडळाला जबाबदार आहे. लोकसभा, राज्यसभा व राष्ट्रपती, मिळून भारतीय संसद निर्माण झाल्याचे दिसून येते.


(५) संघराज्यात्मक स्वरूप


भारतीय घटनेने संघराज्यात्मक शासनपध्दतीचा स्वीकार केला आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यात सत्तेचे विभाजन करण्यात आले. आहे. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ यांना आपआपले अधिकार देण्यात आले आहेत. मात्र आणीबाणीच्या वेळी भारतीय संघराज्याचे स्वरूप एकात्म झाल्याचे दिसून येते.



(६) घटना अंशत परिवर्तनीय व अंशत परिदृढ


लिखित व अलिखित याप्रमाणेच परिवर्तनीय व परिदृढ असे घटनेचे प्रकार आहेत. इंग्लंडची राज्यघटना अतिशय लवचीक तर अमेरिकेची राज्यघटना अतिशय ताठर स्वरूपाची आहे. भारतीय राज्यघटना इंग्लंइतकी लवचीक नाही व अमेरिकेइतकी ताठरही नाही. भारतीय घटनादुरुस्तीची पध्दत कलम ३६८ मध्ये देण्यात आलेली आहे. एखाद्या साधारण मुद्यावर संसदेच्या साध्या बहुमताने घटनेत दुरुस्ती करण्यात येते मात्र राष्ट्रपतीची निवडणूक पध्दत केंद्र व प्रांत यांचे अधिकार, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, इ. महत्वपूर्ण बाबीविषयी घटनेत दुरुस्ती करताना संसदेच्या २/३ सदस्यांची अनुमती निम्म्याहून अधिक घटक राज्याच्या विधिमंडळाची अनुमती आवश्यक असते. त्यामुळे भारतीय घटना अंशत, परिवर्तनीय व अंशत परिदृढ अशा स्वरुपाची बनविण्यात आली आहे.


(७) मूलभूत हक्क


भारतीय राज्यघटनेत व्यक्तीच्या मूलभूत अधिकारावर भर देण्यात आला आहे. कलम १२ ते ३५ मध्ये मूलभूत हक्क्ांचा समावेश करण्यात आलेला आहे. स्वातंत्र्य समता शैक्षणिक व सांस्कृतिक हक्क, धार्मिक स्वातंत्र्य संपत्तीचा हक्क, पिळवणुकिविरुध्द हक्क इ. महत्वपूर्ण हक्क व्यक्तीला देण्यात आलेले आहेत. हक्काबरोबरच व्यक्तीला काही कर्तव्यही पार पाडावी लागतात. हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. घटनेत व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचा समावेश हे घटनेचे महत्वाचे वैशिष्टे आहे.


(८) धर्मनिरपेक्ष राज्य


भारत हे धर्मातील राष्ट्र संबोधण्यात आले आहे. कोणत्याही विशिष्ट धर्माला राजाश्रय न देता सर्व धर्माना समान लेखण्यात आले आहे. प्रत्येकाला आपआपल्या धर्माप्रमाणे प्रार्थना करण्याचा, आचरण ठेवण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. सर्व धर्मीयांना समान लेखण्यात आले. असून धर्म, जात पंथ, याद्वारे भेदभाव न करता सर्वाना समान संधी देण्यात आली आहे.



(९) एकेरी नागरिकत्व


अमेरिकन व स्वित्झर्लंड या देशामध्ये केंद्र व प्रांत यांचे दुहेरी नागरिकत्व देण्यात आलेले आहे. भारतात संघराज्यात्मक पध्दतीचा स्वीकार केलेला असूनही केंद्राचे व घटक राज्याचे असे वेगळे नागरिकत्व व्यक्तीस देण्यात आलेले नाही. प्रत्येक भारतीय यास संघराज्याचे नागरिकत्व देण्यात आलेल आहे. राष्ट्रीय ऐक्य वाढीस लागावे यासाठी एकेरी नागरिकत्वाची पध्दत स्वीकारण्यात आली .


(१०) एकच घटना


ज्याप्रमाणे एकेरी नागरिकत्वाच पुरस्कार करण्यात आलेला आहे. त्याप्रमाणेच देशातील सर्व नागरिकांसाठी एकाच घटनेची तरतूद करण्यात आली आहे. घटक राज्यांना स्वतंत्र अशी घटना बनविण्याचा अधिकार नाही. घटक राज्यांना संघराज्याबाहेर फुटून निघण्याचा अधिकार नाकारण्यात आलेला आहे



(११) राज्यघटना हीच सर्वश्रेष्ठ


देशाचा सर्वोच्च कायदा म्हणजे त्या देशाची राज्यघटना होय. राज्यघटनेच्या सर्वश्रेष्ठत्वाला आव्हान देता येत नाही. राष्ट्रपती, राज्यपाल, न्यायाधीश, मंत्री यांना राज्यघटनेची एकनिष्ठ राहण्याबाबत शपथ घ्यावी लागते.


(१२) जनकल्याणकारी राज्याची निर्मिती


भारताचा राज्यकारभार जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींमार्फ़त चालतो. भारताचा राष्ट्रपती हा इंग्लंडच्या राजाप्रमाणे वंश परंपरेनुसार नसतो, तर अप्रत्यक्ष निवडणूक पध्दतीने निवडण्यात येतो. जनता आपणास हवे असणारे सरकार निर्माण करू शकते व हे सरकार जनकल्याणासाठी बांधील असते.


(१३) मार्गदर्शक तत्वे


व्यक्तीला मूलभूत हक्कांना कायदेशीर मान्यता असते. मूलभूत हक्कांची शासनाकडून किंवा एखाद्या व्यक्तीकडून पायमल्ली झाल्यास संबंधिताला न्यायालयात दाद मागता येते. मात्र मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीत हे धोरण लागू पडत नाही. मार्गदर्शक तत्वे व्यक्तीला कल्याणासाठी असली तरी ती सरकारने पाळलीच पाहिजेत असे सरकारवर बंधन नसते. मार्गदर्शक तत्वे ही नावाप्रमाणे मार्ग दाखविण्यासाठी उपयुक्त ठरतात. भारतीय घटनेतील काही निवडक मार्गदर्शक तत्वे पुढीलप्रमाणे


(१) जीवनावश्यक गोष्टी सर्वाना मिळाव्यात 

(२) राज्यातील सर्वासाठी एकच मुलकी कायदा असावा 

(३) राज्यातील सर्व स्त्री -पुरुषांना समान वेतन असावे. 

(४) १४ वर्षाखालील सर्व मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण असावे 

(५) संपत्तीचे केंद्रीकरण होऊ नये 

(६) देशातील साधनसंपज्ञ्ल्त्;ा्ीचे समाजहिताच्या दृष्टीने वाटप व्हावे. 

(७) दारुबंदी व इतर उपायांनी लोकांच्या आरोग्याचे रक्षण व्हावे.



(१४) स्वतंत्र न्यायालय व्यवस्था


लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी न्यायालयांना स्वातंत्र्य असणे आवश्यक आहे. भारतास एकेरी न्यायव्यवस्था आहे. सुप्रीम कोर्ट, हाय कोर्ट, जिल्हा, कोर्ट व इतर दुय्यम न्यायालये यांची एक साखळी निर्माण करण्यात आली आहे. न्याय व्यवस्थेवर राजकीय सत्तेचा दबाब येऊ नये यासाठी विधिमंडळ व कार्यकारीमंडळ यांच्या पासून न्यायमंडळाची व्यवस्था स्वतंत्र करण्यात आली आहे. न्यायाधीशांची नेमणूक बदली, बढती, पगार, या सर्व गोष्टींना संरक्षण देऊन न्यायाधीशांकडून कार्यक्षम व निपक्षपाती न्यायाची अपेक्षा करण्यात आली आहे.



(१५) राष्ट्रपती व त्यांचे आणीबाणीचे अधिकार


भारताचा राष्ट्रपती घटनात्मक प्रमुख आहे. त्यांची निवड संसद सदस्य व विधानसभा सदस्यांकडून क्रमदेय निवड पध्दतीने होत असते. सर्व महत्वपूर्ण गोष्टी राष्ट्रपतींच्या नावे होत असल्या तरी प्रत्यक्षात मंत्रिमंडळाच्या हाती सज्ञ्ल्त्;ाा केंदि्रत झाली आहे. भारताच्या राष्ट्रपतीला कायदेविषयक अंमलबजावणीविषयक आर्थिक बाबीविषयी घटक राज्याविषयक, न्यायविषयक व संकटकाल विषयक अशा सहा प्रकारचे अधिकार देण्यात आलेले आहेत. भारतीय राष्ट्रपतीला मिळालेला संकटकाल विषयक अधिकार अत्यंत महत्वाचा आह


(१६) हिंदी भाषेस राष्ट्रभाषेचा दर्जा


भारतीय राज्यघटनेत भाषाविषयक धोरण स्पष्ट करण्यात आले आहे. अनुच्छेद ३४३ मध्ये स्पष्ट घोषणा करण्यात आली आहे की, भारत या संघराजयाची अधिकृत भाषा देवनागरीतील हिंदी ही राहील. प्रादेशिक राज्यकारभार ज्या त्या प्रादेशिक भाषेमधून चालविण्याबाबत घटनेत स्पष्ट करण्यात आले आहे. इंग्रजी एक जादा भाषा म्हणून राहील. आंतराष्ट्रीय व्यवहार व हिंदी समजू न शकणार्या राज्यांना केद्र सरकारशी व्यवहार करण्यासाठी इंग्रजीचा वापर करता येईल.


(१७) प्रौढ मताधिकार


भारतीय लोकशाहीने प्रौढ मतदार पध्दतीचा स्वीकार केलेला आहे. १८ वर्षावरील सर्व स्त्री पुरुषास मतदानाचा अधिकार देण्यात आलेला. आहे निवडणूक मंडळाची निर्मिती करण्यात आली आहे. लोकसंख्या व विस्ताराच्या दृष्टीने भारतासारख्या विशाल देशात प्रौढ मताताधिराने लोकशाहीचा प्रयोग राबविण्यात येत आहे. सनदी नोकरांच्या निवडीसाठी पब्लिक सर्व्हिस कमिशन (लोकसेवा अयोग मंडळ) ची स्थापना करण्यात आली आह

मार्गदर्शक तत्वांची उपयुक्ततता :

📌डॉ. आंबेडकर - राजकीय लोकशाहीपासून वेगळी असलेली आर्थिक लोकशाही. घटनेचे आगळेवेगळे व नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये. ही तत्वे अमलात न आणणाऱ्या सरकारला न्यायालयांमध्ये नसला तरी जनतेच्या दरबारात जाब द्यावाच लागेल.


📌B.N. राव - राज्यसंस्थेच्या प्राधिकारांसाठी नैतिक तत्वे, त्यांच्यात किमान शैक्षणिक मूल्य आहे.


.📌N.M. सिंघवी - घटनेला जीवन प्रदान करणाऱ्या तरतूदी.


📌M.C. छगला (माजी सरन्यायाधीश) - मार्गदर्शक तत्त्वांची पूर्ण अंमलबजावणी झाल्यास देश पृथ्वी वरील स्वर्ग बनेल. त्यांच्यात किमान शैक्षणिक मूल्य आहे.


📌M.C. सेटलवाड - न्यायालयास उपयुक्त beacon-light व प्रस्ताविकेचे विस्तारण करणारी तत्वे. 


📌गरॅनव्हिल ऑस्टिन - मार्गदर्शक तत्वाच्या अंमलबजावणीद्वारे देशातील सामाजिक क्रांती ची उद्दिष्टे साध्य होतील.


📌ईवोर जेनिंग्ज - Pious aspiration.


📌अनंत नारायण - अ-वादयोग्य आणि अमूर्त.


📌 गलॅडहिल - "इतर काही गोष्टी करण्यासाठी शासनाला दिलेल्या विधायक सूचना.'


📌K.V.राव - “या मागील खरा हेतू भारताला पोलिस राज्य नव्हे तर कल्याणकारी राज्य बनविण्याचा आहे."


🎯मार्गदर्शक तत्वांवरील टिका :


📌K.T. शहा - Pious Superfluities, बँकेच्या सोयीनुसार वटविता येणारा चेक.


📌नसिरोद्दीन - नववर्षाचा निश्चय जो 2 जानेवारीला मोडला जातो.


📌T.T. कृष्णमाचारी - भावनांची खरी केराची टोपली.


📌K.C. व्हेअर - कंटाळवाणा नैतिक उपदेश, जरी या घोषणांना कितीही प्रमाणात वचन मानावयाचे ठरले तरीही

त्यांच्यामुळे राज्यघटनेला अपकिर्ती प्राप्त होईल.


📌K. संथानम - या तत्वांनी केंद्र विरुद्ध राज्य, राष्ट्रपती विरुद्ध पंतप्रधान, राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री असा घटनात्मक संघर्ष निर्माण केला.

"अविश्वास प्रस्ताव (No Confidence Motion) )"



🅾️2018 साली लोकसभेत सद्याच्या सरकार विरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव "तेलगू देसम पार्टीने" (TDP) मांडला होता. प्रस्ताव मात्र संमत झाला नसल्याने सरकार स्थिर आहे यावर्षी  होणाऱ्या परीक्षासाठी अविश्वास प्रस्तावाबाबत घटनात्मक आणि सभागृहात काय तरतुदी  आहेत त्याचा आढावा.....


🅾️कलम 75 सांगते की, मंत्रिमंडळ सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असते. त्यामुळे लोकसभेत बहुमत असे पर्यंत मंत्रिमंडळ सत्तेवर राहते. मंत्रीमंडळावर अविश्वासाचा प्रस्ताव मांडून लोकसभा त्याला सत्तेवरून हटवू शकते.


1) राज्यघटनेत कुठेही विशेष अशी अविश्वास प्रस्तावाची तरतूद नाही.


2) अविश्वास प्रस्ताव हा फक्त लोकसभेत मांडता येतो. राज्यसभेत नाही.


3) अविश्वास प्रस्तावाची तरतूद लोकसभेच्या कार्यपद्धती मध्ये आहे.


4) लोकसभेचा कोणताही खासदार (सत्ताधारी अथवा विरोधी) हा लोकसभेत अविश्वास प्रस्ताव मांडू शकतो.


5) प्रस्ताव मांडण्यासाठी कामकाजाच्या दिवशी सकाळी 10 वाजता लोकसभा सचिवांकडे नोटीस देणे बंधनकारक आहे.


6) प्रस्ताव मांडताना 50 लोकसभा सदस्यांचे समर्थन बंधनकारक आहे.


7) वरील सगळी प्रक्रिया पूर्ण झाली की लोकसभा अध्यक्ष प्रस्तावावर चर्चा व मतदान कधी होणार हे सांगतात.


८) सभागृहात जर हा प्रस्ताव मंजूर झाला. त्या सरकारला राजीनामा द्यावा लागतो.


9) प्रस्तावावर मतदान हे आवाजी किंवा मतविभागणी करून होते.


10) अविश्वास प्रस्ताव मांडताना करणे देण्याची गरज नसते.


11) अविश्वास प्रस्ताव फक्त मंत्रिमंडळाविरुद्ध मांडता येतो.

Economy Revision करताना खालील घटक प्रधान्यक्रमाने करा.

 नमस्कार,

Combine पुर्व साठी अजून जवळपास 75 दिवसांचा वेळ शिल्लक आहे.. इथून पुढच्या economy च्या revision प्लॅन विषयी चर्चा करूयात.

बघा आता Economy साठी इथून पुढे नक्कीच Roadmap कसा असायला पाहिजे याविषयी थोडं बघूयात.


1.आता Revision करताना खालील घटक प्रधान्यक्रमाने करा.

फायदा होईल.


1. सार्वजनिक वित्त

2. करसंरचना

3. गरिबी व बेरोजगारी

4. शासकीय योजना

5. बँकिंग व RBI

6. कृषी उद्योग सेवा

7. परकीय व्यापार व व्यवहारतोल

8. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था

9. पंचवार्षिक योजना

10.लोकसंख्या 

11.राष्ट्रीय उत्पन्न

12.LPG

13. किंमती व चलनवाढ

14. मूलभूत संकल्पना      


2. आता Pyq solving सोबत basic बुक्स वाचण्यावरती लक्ष द्या.


जास्त Focus हा Content / Facts वरती दया. त्या चांगल्या Revise करून घ्या.


3.आता Basic books (कोळंबे / देसले जे वाचले असेल ते ) ची चांगली revision करून घ्या. कारण आत्ता जर Facts revise झाल्या नाहीत तर Exam मध्ये Confusion जास्त होते.  


4.आयोगाच्या Trend शी Touch मध्ये राहण्यासाठी 2020,2021,2022 चे Pyq दररोज बघत चला.

हे सर्वच विषयांना लागू होते.  


5. आणि कुठल्याच विषयाला Overestimate किंवा Underestimate करू नका Exam मध्ये Paper कसा येईल त्यानुसार प्रत्येक विषयाचे Marks ठरत असतात.

So आत्ता Revision वरती Focus करा.


सर्वांना शुभेच्छा!💐💐


The Achievers Mentorship.


Aniket Thorat.

STI 2019

ASO 2019

भारतातील बेरोजगारी चे मोजमाप

✍मोजमाप करण्यासाठी तीन प्रमुख स्त्रोत आहेत.

1)दशवार्षिक जनगणनेचे अहवाल

2) राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटनेचे अहवाल

3) रोजगार व प्रशिक्षण संचालनालय यांच्याकडील नोंदणीची आकडेवारी                       

✍यापैकी राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटनेची आकडेवारी महत्त्वाची मानली जाते. यासाठी पंचवार्षिक सर्वेक्षणे केली जातात. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्था रोजगार व बेरोजगारीचे आकडे जमा करण्यासाठी तीन प्रमुख पद्धतींचा वापर करते.

🌹1)  नित्य प्रमुख व दुय्यम दर्जा –
                        नित्य प्रमुख दर्जा या संकल्पनेत एका वर्षांमध्ये व्यक्ती अधिक काळासाठी आर्थिक कृतीशी संबंधित असतो. त्यामध्ये 365 दिवसांमध्ये मोठ्या कालावधीसाठी जे व्यक्ती आर्थिक कामात गुंतलेले असतात. ते नित्य प्रमुख दर्जावर रोजगारात असल्याचे समजले जाते.
                या 365 दिवसांमध्ये एखादी दुय्यम आर्थिक कृती त्या व्यक्तींनी केली तर तीस दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी ही दुय्यम आर्थिक कृती केलेली असेल तर तो दुय्यम दर्जावरही रोजगारात असल्याचे मानले जाते. या दोन्ही बाबींचा एकत्रित विचार करून नित्य प्रमुख व दुय्यम दर्जाच्या ठरवला जातो. भारतातील बेरोजगारी

🌹2)  चालू आठवडी दर्जा –
                        सात दिवसांच्या कालावधीमधील एका व्यक्तीच्या आर्थिक कृतींचा समावेश चालू आठवडी किंवा साप्ताहिक दर्जा यामध्ये होतो. सात दिवसांच्या कालावधीमध्ये एका दिवसात किमान एक तास काम करणाऱ्या व्यक्तीस रोजगारी समजले जाते.

🌹3)  चालू दैनिक दर्जा –
                    चालू दैनिक दर्जाच्या या पद्धतीमध्ये व्यक्ती दररोज आर्थिक कृतीमध्ये किमान चार तास काम करणे आवश्यक असते. याच्या आधारावर ती चालू दैनिक दर्जा काढला जातो.

2030 सालासाठी शाश्वत विकास ध्येये (SDGs)


●ध्येय 1: दारिद्र्याचे संपूर्ण उच्चाटन


●ध्येय 2: शून्य उपासमार (उपासमार थांबवणे, अन्न सुरक्षा आणि सुधारित पोषक आहार साध्य करणे आणि शाश्वत शेतीस प्रोत्साहन देणे)


●ध्येय 3: सर्वांसाठी निरोगी आरोग्य आणि सर्व वयोगटातील सर्वांसाठी कल्याणाचा प्रचार करणे


●ध्येय 4: सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण (सर्वसमावेशक आणि न्याय गुणवत्तापूर्ण शिक्षण सुनिश्चित करणे आणि सर्वांसाठी आजीवन शिक्षण संधींचा प्रचार करणे)


●ध्येय 5: स्त्री-पुरुष समानता (लैंगिक समानता प्राप्त करणे आणि सर्व महिला व मुलींना सशक्त करणे)


●ध्येय 6: सर्वांसाठी स्वच्छ पाणी आणि स्वच्छता


●ध्येय 7: सर्वांसाठी स्वस्त, विश्वासार्ह, शाश्वत आणि स्वच्छ ऊर्जा


●ध्येय 8: सर्वांसाठी सभ्य काम आणि आर्थिक वाढ (सतत, सर्वसमावेशक आणि शाश्वत आर्थिक वाढ, पूर्णकाळ आणि उत्पादनक्षम रोजगार तसेच सभ्य कामांना प्रोत्साहन देणे)


●ध्येय 9: उद्योग, नवकल्पना आणि पायाभूत सुविधा (लवचिक अश्या पायाभूत संरचना तयार करणे, सर्वसमावेशक आणि शाश्वत औद्योगिकीकरणास आणि नवकल्पनांना प्रोत्साहन देणे)


●ध्येय 10: असमानता कमी करणे (देशांच्या आतमधील आणि देशांदरम्यान असलेली असमानता कमी करणे)


●ध्येय 11: शाश्वत शहरे आणि मानवी वस्ती


●ध्येय 12: शाश्वत उपभोग आणि उत्पादन


●ध्येय 13: हवामानविषयक कार्य (हवामानातील बदल आणि त्यांचे परिणाम टाळण्यासाठी त्वरित कारवाई करणे)


●ध्येय 14: जलजीवन (शाश्वत विकासासाठी महासागर, समुद्र आणि सागरी स्त्रोतांचे संवर्धन आणि सातत्यपूर्ण वापर)


●ध्येय 15: थल जीवन (जमिनीवर पर्यावरणविषयक व्यवस्थेच्या शाश्वत वापराला प्रोत्साहन देणे आणि त्यांचे रक्षण आणि पुनर्संचयन करणे, वनांचे शाश्वत व्यवस्थापन करणे, वाळवंटीकरणाशी लढा देणे तसेच भूमी नापीक होण्यास थांबविणे आणि परिस्थितीला उलट करणे आणि जैवविविधतेची हानी थांबविणे.


●ध्येय 16: शांती, न्याय आणि बळकट संस्था (सर्वांसाठी न्यायपूर्ण व्यवस्था तयार करणे, शाश्वत विकासासाठी शांतीपूर्ण आणि सर्वसमावेशक मानवी समाजांना प्रोत्साहन देणे, सर्व सर्व स्तरांवर प्रभावी, जबाबदार आणि सर्वसमावेशक संस्था तयार करणे.


●ध्येय 17: ध्येयांसाठी भागीदारी (शाश्वत विकासासाठी वैश्विक भागीदारीची अंमलबजावणी आणि पुनरुत्थान करण्यास उद्देशांना भक्कम करणे.


🔷 UNESCAP बाबत 🔷


🅾️‘आशिया व प्रशांत क्षेत्रासाठीचा संयुक्त राष्ट्रसंघ आर्थिक व सामाजिक आयोग’ (UN Economic and Social Commission for Asia and the Pacific -UNESCAP) हे आशिया व प्रशांत क्षेत्राच्या विकासासाठी तयार करण्यात आलेली संयुक्त राष्ट्रसंघाची एक क्षेत्रीय शाखा आहे. त्याची स्थापना सन 1947 मध्ये केली गेली आणि त्याचे मुख्यालय बँकॉक (थायलँड) येथे आहे.

गिफेन वस्तू (Giffen Goods)




🔰 हलक्या, निकृष्ट आणि कनिष्ठ दर्जाच्या वस्तू म्हणजे गिफेन वस्तू. गिफेन वस्तूंबाबतची संकल्पना ब्रिटिश संख्याशास्त्रज्ञ सर रॉबर्ट गिफेन यांनी प्रथम मांडली.

🔰 गिफेन वस्तू या संकल्पनेत एखाद्या वस्तूची किंमत घटल्यास उपभोक्ता त्या वस्तूच्या मागणीत वाढ करण्याऐवजी घट करतो; याउलट, त्या वस्तूची किंमत वाढल्यास मागणीत घट करण्याऐवजी वाढ करतो, यालाच गिफेनचा विरोधाभास असे म्हणतात.

🔰 उदा., केकच्या तुलनेत ब्रेड; गव्हाच्या तुलनेत ज्वारी व बाजरी; शुद्ध तुपाच्या तुलनेत वनस्पती तूप; नामांकित (Branded) कपड्यांच्या तुलनेत जाडेभरडे कपडे; नामांकित चप्पल, बूट यांच्या तुलनेत साध्या चप्पल, बूट; शुद्ध सोन्याच्या दागिन्यांच्या तुलनेत बेन्टेक्सचे दागिने इत्यादी. गिफेन वस्तू ही संकल्पना वस्तूच्या भौतिक गुणवत्तेपेक्षा उत्पन्नाशी निगडीत आहे.

🔰 उदा., बाजारात पाव स्वस्त झाल्यावर गरीब लोक त्याची मागणी वाढवण्याऐवजी कमी करून वाचणारा पैसा दुसऱ्या पर्यायी वस्तूंवर (उदा., केक इत्यादी) खर्च करतात.

🔰 गिफेन वस्तू या संकल्पनेमुळे मागणीच्या सिद्धांताची बाजू भक्कम झाल्याचे दिसते. निकृष्ट दर्जाच्या वस्तू किंवा गुणवत्ताधारक वस्तू या बाबी उपभोक्ताच्या उत्पन्नानुसार ठरतात. या वस्तूंच्या किमतींचे त्यांच्या मागणीवर धनात्मक व ऋणात्मक हे दोन्ही परिणाम दिसून येतात.

🔰 गिफेन वस्तूंचा उपभोक्ता वर्ग त्या त्या देशातील दारिद्र्य, गरिबी यांची वास्तव स्थिती दर्शवितो. शासनाला विकसननीती तसेच कल्याणकारी नीती बनविताना अथवा राबविताना या संकल्पनेचा मार्गदर्शक म्हणून उपयोग होतो.

🔰 गिफेन वस्तूंच्या बाबतीत उपभोक्त्याच्या उत्पन्नाचा उपभोगावरील परिणाम आकृतीच्या साह्याने स्पष्ट करता येतो. यासाठी उपभोक्त्याची उत्पन्नरेषा अथवा अंदाजपत्रकीय रेषा, समवृत्ती-वक्र आणि उपभोक्त्याचा उपभोग-वक्र या सैद्धांतिक साधनांचा उपयोग करता येतो.

सहस्त्रक विकास लक्ष्य (millennium development goals)



(1) अति दारिद्र्य व भुकेची निर्मूलन करणे

Eradicate extreme poverty and hunger


(2) सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण साध्य करणे

achieve universal primary education


(3) जेंडर संबंधित प्रोत्साहन देणे व महिलांचे सबलीकरण करणे

promote gender equality and empower women


(4) बाल मर्त्यातेचे प्रमाण कमी करणे

reduce child mortality


(5) माता आरोग्यात सुधारणा घडवून आणणे

improve maternal health


(6) एच आय व्ही/एड्स मलेरिया व इतर रोगांशी सामना करणे

combat HIV/AIDS malaria and other diseases


(7) पर्यावरणीय शाश्वतता साध्य करणे

ensure environmental sustainability


(8) विकासासाठी जागतिक भागीदारी निर्माण करणे

develop a global partnership for development,

Science questions

  
Q.1 Which animal never drinks water in its entire life? 
(A) Kangaroo
(B) Hippopotamus
(C) Rat
(D) Kangaroo rat

Ans .  D

Q.2 What is the physical phase of life called?
(A) Protoplasm
(B) Cytoplasm
(C) Organelles
(D) None of the above

Ans .  A

Q.3 The largest cell is ________________
(A) Nerve Cell
(B) Ovum
(C) The egg of an Ostrich
(D) None of the above

Ans .  C

Q.4 Which is the largest human cell?
(A) Liver
(B) Skin
(C) Spleen
(D) Ovum

Ans .  D

Q.5  _________________ is the longest cell.
(A) Nerve Cell
(B) Skin
(C) Spleen
(D) None of the above

Ans .  A

Q.6 What is the name of the cells in the body that engulf foreign particles like bacteria?
(A) Phagocytes
(B) Globulin
(C) Fibrinogen
(D) Albumin

Ans .  A

Q.7 There are _____ number of muscles in human.
(A) 638
(B) 637
(C) 639
(D) 640

Ans . C

Q.8 What is the life span of RBC?
(A) 130 days
(B) 110 days
(C) 100 days
(D) 120 days

Ans .  D

Q.9 What is the life span of WBC?
(A) 2-15 days
(B) 3-15 days
(C) 4-15 days
(D) 5-20 days

Ans .  A

Q.10 Which is the vertebrate that has a two-chambered heart?
(A) Fish
(B) Snake
(C) Blue Whale
(D) Crocodile

Ans .  A





_________________________

Q.1 Due to contraction of eyeball, a long-sighted eye can see only 

(A) farther objects which is corrected by using convex lens

(B) farther objects which is corrected by using concave lens

(C) nearer objects which is corrected by using convex lens

(D) nearer objects which is corrected by using concave lens


Ans . B


Q.2 Which one among the following is not correct about Down’s syndrome? 

(A) It is a genetic disorder

(B) Effected individual has early ageing

(C) Effected person has mental retardation

(D) Effected person has furrowed tongue with open mouth


Ans . B

 
Q.3 Insects that can transmit diseases to human are referred to as

(A) carriers

(B) reservoirs

(C) vectors

(D) incubators

Ans . C

 
Q.4 Which of the following diseases are transmitted from one person to another?

AIDS


Cirrhosis


Hepatitis B


Syphilis


Select the correct answer using the code given below:

Code:

(A)1, 2, 3 and 4

(B) 1, 3 and 4 only

(C) 1 and 2 only

(D) 2, 3 and 4 only


Ans . B

 
Q.5 One of the occupational health hazards commonly faced by the workers of ceramics, pottery and glass industry is

(A) stone formation in gall bladder

(B) melanoma

(C) silicosis

(D) stone formation in kidney


Ans . C

 
Q.6 The anti-malarial drug Quinine is made from a plant. The plant is

(A) Neem

(B) Eucalyptus

(C) Cinnamon

(D) Cinchona


Ans . D

 
Q.7 To suspect HIV/AIDS in a young individual, which one among the following symptoms is mostly associated with?

(A) Long standing jaundice and chronic liver disease

(B) Sever anaemia

(C) Chronic diarrhoea

(D) Severe persistent headache

Ans . C

 
Q.8 Hypertension is the term used for

(A) Increase in heart rate

(B) Decrease in heart rate

(C) Decrease in blood pressure

(D) Increase in blood pressure


Ans . D

महत्त्वाचे प्रश्नसंच


1. भारतीय संविधानाने भारताचे वर्णन —– केले आहे.

संघराज्य
विधानमंडळ
राज्यांचा संघ
विधान परिषद
उत्तर : राज्यांचा संघ

2. कोलकाता उच्चन्यायालयाचे अधिकार क्षेत्र —— या संघराज्य क्षेत्रात विस्थारित केलेले आहे.

दिल्ली
अंदमान-निकोबार बेटे
पौंडेचेरी
दीव व दमण
उत्तर : अंदमान-निकोबार बेटे



3. ग्रामपंचायतीचा पंचांची निवडणूक —– पद्धतीने होते.

प्रत्यक्ष मतदान
अप्रत्यक्ष मतदान
प्रौढ मतदान
प्रौढ पुरुष मतदान
उत्तर : प्रौढ मतदान

4. गोगलगाय —– या संघात मोडते.

मोलुस्का
आर्थोपोडा
इकायनोडमार्ट
नेमॅटोडा
उत्तर : मोलुस्का

5. संतृप्त हायड्रोनकार्बनमधील दोन कार्बन अणूंमध्ये —– असतो.



एकेरी बंध
दुहेरी बंध
तिहेरी बंध
यापैकी एकही नाही
उत्तर : एकेरी बंध

6. —– हा सूर्याच्या सगळ्यात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात लहान ग्रह आहे.

शुक्र
बुध
मंगळ
पृथ्वी
उत्तर : बुध

7. ‘स्पीड पोस्ट’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

मुल्क राज आनंद
शोभा डे
अरुंधती राय
खुशवंत सिंग
उत्तर : शोभा डे

8. नियोजित आलेवाडी बंदर —— जिल्ह्यात आहे.

सिंधुदुर्ग
ठाणे
रत्नागिरी
रायगड
उत्तर : ठाणे

9. —– शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणतात.

मुंबई
बंगलोर
कानपूर
हैदराबाद
उत्तर : बंगलोर

10. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत स्त्रियांसाठी किती जागा राखीव असतात?

01
02
03
यापैकी एकही नाही
उत्तर : यापैकी एकही नाही

11. भारतातील संसदीय व्यवस्थेचा —— हा केंद्रबिंदु आहे.

मुख्यमंत्री
महाधीवक्ता
पंतप्रधान
महान्यायवादी
उत्तर : पंतप्रधान



12. 10 kg वस्तुमान असलेला पदार्थ जमिनीपासून 10 मी. उंच नेला. त्याठिकाणी गुरुत्वीय त्वरण 9.8 असेल, तर त्या पदार्थाला प्राप्त झालेली स्थितिज ऊर्जा किती?

9800 J
980 J
98 J
9.8 J
उत्तर : 980 J

13. ‘संवाद कौमुदी’ हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?

राजा राममोहन रॉय
केशव चंद्र सेन
देवेंद्रनाथ टागोर
ईश्वरचंद्र विद्यासागर
उत्तर : राजा राममोहन रॉय

14. ‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ हा ग्रंथ कोणी लिहिला?

डॉ. बी.आर. आंबेडकर
वि.रा. शिंदे
महात्मा जोतिबा फुले
भास्करराव जाधव
उत्तर : वि.रा. शिंदे

15. खालीलपैकी कोणत्या खेळाशी कविता राऊत हे नाव जोडले आहे?

अॅथलेटिक्स
कुस्ती
क्रिकेट
स्विमींग
उत्तर : अॅथलेटिक्स

16. कोणत्या प्राण्याला ‘राष्ट्रीय वारसा’ हा दर्जा भारत सरकारने बहाल केला?

हत्ती
वाघ
सिंह
हरिण
उत्तर : हत्ती

17. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराने वयाची —— वर्षे पूर्ण केलेली असावीत.

21
25
30
35
उत्तर : 35

18. महाराष्ट्र राज्यात पंचायत राज्य पद्धती —– साली सुरू झाली.

1 मे 1960
1 मे 1961
1 मे 1962
1 मे 1965
उत्तर : 1 मे 1962



19. सध्या महाराष्ट्राचा विधानसभेत —– सभासद संख्या आहे.

78
238
250
288
उत्तर : 288

20. खालीलपैकी कोणता वायू हवेपेक्षा हलका आहे?

CO२
H२S
SO२
NH३
उत्तर : NH३



 प्र.१ हवामान बदल कमी करण्यासाठी सक्रिय भूमिका बजावण्याच्या उद्देशाने राज्याच्या पर्यावरण मंत्रालयाचे नाव बदलून 'पर्यावरण व हवामान बदल मंत्रालय' ठेवण्याच्या प्रस्तावाला कोणत्या राज्याने नुकतेच मान्यता दिली?

1.महाराष्ट्र ✔️
2.उत्तर प्रदेश
3.गुजरात
4.मध्य प्रदेश

 प्र.२ हवामान, पाऊस, पूर यावर वास्तविक-वेळ माहिती आणि सतर्कतेसाठी कोणत्या राज्याने मेघासंदेश अॅप व वरुणमित्र वेब पोर्टल सुरू केले?

१.मध्य प्रदेश
२.कर्नाटक ✔️
३.ओडिशा  ‌‌
४. पश्चिम बंगाल


 प्र३. संरक्षण मंत्रालयाने "मेक इन इंडिया" उपक्रमाला चालना देण्यासाठी स्थानिक पुरवठादारांकडून किती वस्तू खरेदी करण्यास मान्यता दिली?

१.12
२.16
३.26 ✔️
४. 22



प्र.४ नेव्हीमध्ये महिला अधिकार्‍यांना सेवानिवृत्तीसाठी किती महिन्यांत कायमस्वरूपी कमिशन देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत?

१.8 महिने
२.3 महिने ✔️
३.6 महिने
४.12 महिने


 प्र.५ ड्रायव्हिंग लायसन्स अॅपला नाव द्या, जे सरकारने नुकतेच सादर केले आहे?

१.जी-यात्रा
२.सारथी ✔️
३.स्पॉटिफाई
४.मी-परिवाहन

 प्र.६ जपानच्या मदतीने पूर्ण केलेला पैठण (जयकवाडी) जलविद्युत प्रकल्प नदीवर आहे ?

१. गंगा
२. कावेरी
३.नर्मदा
४.गोदावरी ✔️


प्र.७  रेडक्लिफ लाइन ही एक सीमा आहे ?

१.भारत आणि पाकिस्तान ✔️
२.भारत आणि चीन
३.भारत आणि म्यानमार
४.भारत आणि अफगाणिस्तान


 प्र.८. त्रिपिताक ही पवित्र पुस्तके आहेत ?

१.बौद्ध ✔️
२.हिंदू
३.जैन
४.वरीलपैकी नहीं


 प्र.९ तुलसीदास, रामचरितमानस यांचे लेखक खालील पैकी कोणत्या शासकाचे समकालीन होते?

१.अकबर ✔️
२.हुमायूं
३.शाहजहां
४. शेरशाह सुरी



 प्र. १० हसणारा गॅस म्हणजे काय?

१. नायट्रस ऑक्साईड ✔️
२.कार्बन मोनॉक्साईड
३.सल्फर डाय ऑक्साईड ४.हायड्रोजन पेरोक्साइड





 प्र.११ सिनेमाच्या विकासातल्या सेवांसाठी सर्वोच्च पुरस्कार कोणाच्या नावावर दिला जातो?

१.राज कपूर
२.दादा साहेब ✔️
३.मीना कुमारी
४.अमिताभ बच्चन


स्पष्टीकरण:- 1969 या वर्षीपासून या पुरस्काराला सुरुवात झाली आहे. पहिलं पुरस्कार देवकी राणी यांना देण्यात आले आहे


 प्र.१२जगातील पहिला बायनरी अंक संगणक कोणी बनविला: झेड 1 ...?

१.कोनराड झुसे ✔️
२.केन थॉम्पसन
३.लन ट्यूरिंग
४.जॉर्ज बुले



 प्र.१३ खालीलपैकी कोणती जागा चिकनकारी कार्यासाठी प्रसिद्ध आहे, जी भरतकामाची पारंपारिक कला आहे?

१.लखनौ ✔️
२.हैदराबाद
३.जयपूर
४.म्हैसूर



 प्र.१४ पुढीलपैकी कोणता इंग्रजी चित्रपट हिंदीमध्ये डब केला गेला?

१.अलादीन ✔️
२.युनिव्हर्सल सोल्जर
३.वेग
४.लोह माणूस


Q.15  जागतिक यकृत दिन २०१९ ची  थिम काय होती ?

➡️ Love Your Liver and Live Longer



🟣 : ब्रिटीश गव्हर्नर जनरल 'मॉडर्न इंडिया मेकर' म्हणून ओळखले जातात?

1⃣ लॉर्ड कॅनिंग
2⃣ लॉर्ड डलहौसी✅✅✅
3⃣ लॉर्ड कर्झन
4⃣ लॉर्ड माउंटबॅटन

___________________________
 🟤 भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते?

1⃣ मौलाना अबुल कलाम
2⃣ एम. ए. जिन्ना
3⃣ बद्रुद्दीन तायबजी✅✅✅
4⃣ रहीमतुल्ला एम सयानी

___________________________
🔴 पढीलपैकी कोणत्या वर्षात ब्रिटीश कारभाराची राजधानी कलकत्ता ते
दिल्ली येथे स्थानांतरित झाली?

1⃣ 1911✅✅✅
2⃣ 1857
3⃣ 1905
4⃣ 1919

___________________________
🟠 खालीलपैकी कोणते कार्यक्रम-वर्ष संयोजन चुकीचे आहे?

1⃣ चौरी चौरा - 1922
2⃣ भारत सोडा - 1942
3⃣ दांडी मार्च - 1931✅✅✅
4⃣ बगालचे विभाजन - 1905

___________________________
🟢भारत स्वातंत्र्याच्या वेळी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष होते.?

1⃣ जवाहरलाल नेहरू
2⃣ राजेंद्र प्रसाद
3⃣ सी राजगोपालाचारी
4⃣ ज.बी.कृपलानी✅✅✅



.  सोन्याच्या निर्देशांक बनवताना सोन्यात काय मिसळतात. ?

A. चांदी
B. *तांबे ☑️*
C.  पितळ
D. कांस्य

  'ऑरोजिन ऑफ स्पेसीज'' चे लेखक कोण आहेत?

A. कार्ल मार्क्स
B. लैमार्क
C. *चार्ल्स डार्विन ☑️*
D. मेंडले


 *997.  'लेडी विथ द लैप' म्हणून कोणाला ओळखले जाते?

A. *फ्लोरेंन्स नाईटिंगेल ☑️*
B. मदर टेरेसा
C. अ‍ॅनी बेसेंट
D.  सरोजिनी नायडू


 'दास कँपिटल 'चे निर्माता कोण आहेत?

A. दांते
B. रुसो
C. लाश्की
D. *कार्ल्स मार्क्स ☑️*


 कापूस/ कपास  उत्पादक देश कोणता आहे?

A.  भारत
B. *चीन ☑️*
C. U.S.A
D.  कॅनडा




  फुटबॉलचा 'काळा मोती' कोणाला म्हटले जाते.?

A. *पेले*
B. मॅराडोना
C.. इयान थॉर्पे
D. आंद्रे अगासी


  बांगलादेश कोणत्या वर्षी स्वतंत्र झाला?

A. 1970
B. *1971 ☑️*
C. 1972
D. 1974


  सर्वात मोठा प्राणी /पशू मेळावा कोठे आयोजित केला जातो?

A. उज्जैन
B. *सोनपूर (बिहार) ☑️*
C. बनारस
D. भागलपूर


  'वन पँरीस  टू इंडिया ’चे लेखक कोण आहेत?

A.  नीरद.  सी. चौधरी
B.  *ई.  एम फॉस्टर ☑️*
C. चार्ल्स डिकेन्स
D. शेक्सपियर


 कोलकाता शहराचे शिल्पकार कोण होते?

A. जाँब  चारनाँक
B. एस.  के.  मुखर्जी
C. अहमद लाहोरी
D. जार्ज स्टीफन




💥 महाराष्ट्रात पहिला लोह - पोलाद प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात उभारण्यात आला?
1) मुंबई
2) चंद्रपूर
3) नागपूर
4) ठाणे

उत्तर :- 2
चंद्रपूर


💥 भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्या महाराष्ट्रात एकवटली आहे ?
1) 9.36%
2) 9.48%
3) 9.27%
4) 9.28%

उत्तर :- 4
 9.28 टक्के


💥 बांग्लादेशातून वाहणारा गंगेचा प्रवाह
' मेघना ' या नावाबरोबर ........ या नावानेही ओळखला जातो.
1) शारदा
2) बियास
3) काली
4) पद्मा

उत्तर - 4

पद्मा


💥 उडणारी खार व भुंकणारे हरीण यांसारखे प्राणी असलेले ' भगवान महावीर राष्ट्रीय उद्यान ' कोणत्या राज्यात आहे ?
1) महाराष्ट्र
2) गोवा
3) आसाम
4) हिमाचल प्रदेश


उत्तर :- 2
         गोवा राज्यात आहे.

💥 सर्यफूलाच्या उत्पादनात कोणत्या राज्याचा देशात पहिला क्रमांक लागतो?
1) मध्यप्रदेश
2) गुजरात
3) कर्नाटक
4) उत्तरप्रदेश


उत्तर - 3

 कर्नाटक

💥 ' नलसरोवर ' हे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात वसले आहे ?
1) महाराष्ट्र
2) गुजरात
3) राजस्थान
4) ओरिसा

उत्तर :- 2
           गुजरात

( आलेला प्रश्न राज्यसेवा परीक्षा )

 💥 1909 चा ' मोर्ले - मिंटो सुधारणा कायदा ' पास होण्यासाठी भारत सेवक समाजाच्या वतीने इंग्लंड ला गेलेली व्यक्ती कोण होती ?
:-
1) न्या. रानडे
2) दादाभाई नौरोजी
3) फिरोजशहा मेहता
4) गोपाळ कृष्ण गोखले


उत्तर :- 4
        गोपाळ कृष्ण गोखले

💥 आपल्या मृत्युनंतर केशवपन करणार नाही अशी आपल्या पत्नीकडून शपथ घेणारे समाज सुधारक कोण ?
1) गोपाळ गणेश आगरकर
2) लोकहितवादी
3) न्यायमूर्ती रानडे
4) गोपाळ कृष्ण गोखले

उत्तर :- 1
         गोपाळ गणेश आगरकर


💥 ' शिमगा ' ह्या सणाला देशातील बीभत्स सणांच्या यादीत प्रथम क्रमांक देऊन त्यावर प्रखर टीका करणारे निर्भिड समाज सुधारक कोण  ?
1) गोपाळ गणेश आगरकर
2) लोकहितवादी
3) न्यायमूर्ती रानडे
4) गोपाळ कृष्ण गोखले


उत्तर :- 1
         गोपाळ गणेश आगरकर


💥 पढील पैकी कोणत्या समाज सुधारकांनी ईश्वराचे अस्तित्व मान्य केले नाही. परंतु त्यांचा उल्लेख " देव न मानणारा देवमाणूस " असा केला जातो.?
1) लोकहितवादी
2) महात्मा फुले
3) सुधारक
4) गोपाळ कृष्ण गोखले


उत्तर :- 3
           सुधारक
        ( गोपाळ गणेश आगरकर )

💥 महर्षी कर्वे यांनी 3 जून 1916 मधे स्थापन केलेल्या पहिल्या महिला विद्यापीठासाठी त्यांना कोठून प्रेरणा मिळाली होती ?
1) इंग्लंड विमेन्स युनिव्हर्सिटी
2) कॅनडा  विमेन्स युनिव्हर्सिटी
3) ऑस्ट्रेलिया विमेन्स युनिव्हर्सिटी
4) जपान विमेन्स युनिव्हर्सिटी


उत्तर :- 4
         जपान विमेन्स युनिव्हर्सिटी वर आधारित पुस्तक त्यांनी वाचले होते व याच प्रकारची स्त्रियांसाठी स्वतंत्र असे विद्यापीठ भारतात देखील असावे ह्या विचारातून पुढे भारतातील पहिले स्वतंत्र महिला विद्यापीठ पुणे येथे स्थापन झाले.

ह्या विद्यापीठाचे सुरुवातीचे नाव:-
" भारतवर्षीय महिला विद्यापीठ " असे होते.
पुढे ते ( SNDT महिला विद्यापीठ ) ह्या नावाने ओळखले जाऊ लागले......
आता ह्याचे मुख्यालय हे मुंबई ला आहे हेही येथे लक्षात ठेवावे....

💥( ISRO - इस्रो ) ची स्थापना केव्हा करण्यात आली.?
( Indian Space Research Organization )
1) 26 August 1961
2) 15 August 1969
3) 14 August 1979
4) 14 October 1969

उत्तर :- 2
        मुख्यालय - बंगळूरू


💥 ( DRDO - संरक्षण संशोधन आणि विकास संस्था ) ची स्थापना कोणत्या वर्षी झाली.?
1) 1969
2) 1980
3) 1958
4) 1979

उत्तर :- 3
        1958 मध्ये झाली

💥 पढील पैकी कोणत्या व्हायरस चा शोध सर्वप्रथम लागला ?
1) पोलिओ
2) HIV
3) TMV
4) HTLV

उत्तर :- 3
         ( TMV )


💥 पक्षांद्वारे होणाऱ्या ' परागणाला '
 ( Pollination ) काय म्हणतात ?
1) हाइड्रोफिली
2) एन्टोमोफिली
3) एम्ब्रिओफिली
4) ऑर्निथोफिली

उत्तर :- 4
         ऑर्निथोफिली


समाजसुधारक आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था


 

👉 अ.क्र स्थापन केलेल्या संस्था स्थापना समाजसुधारक


👉 1. ब्राहमो समाज 20 ऑगस्ट 1828 राजा राममोहन रॉय


👉 2. तत्वबोधिनी सभा 1838 देवेंद्रनाथ टागोर


👉 3. प्रार्थना समाज 31 मार्च 1867 दादोबा पाडुरंग तर्खडकर, रानडे, भांडारकर


👉 4. परमहंस सभा 31 जुलै 1849 भाऊ महाराज , दादोबा पाडुरंग तर्खडकर


👉 5. आर्य समाज 10 एप्रिल 1875 स्वामी दयानंद सरस्वती


👉 6. रामकृष्ण मिशन 1898 स्वामी विवेकानंद


👉 7. थिऑसॉफिकल सोसायटी 1875 कर्नल ऑलकॉट व मादाम ल्लाव्हट्स्कि


👉 8. सत्यशोधक समाज 1875 महात्मा फुले


👉 9. भारत कुषक समाज 1955 पंजाबराव देशमुख


👉 10. महिला विद्यापीठ 3 जुन, 1916 महर्षि कर्वे


👉 11. भारत सेवक समाज 1906 - गोपाल कृष्णा गोखले


👉 12. पिपल एज्युकेशन सोसायटी 1945-46 डॉ. बाबासाहेब आंबेडकर


👉 13. रयत शिक्षण संस्था 1919 कर्मवीर भाऊराव पाटील


👉 14. द मोहमेडन लिटररी सोसायटी - अब्दुल लतीफ


👉 15. मोहनमेडन अँग्लो - सर सय्यद अहमद खान


👉 16. डिप्रेस्ट क्लासेस मिशन 1906 विठ्ठल रामजी शिंदे


👉 17. मुस्लिम लीग 30 डिसेंबर, 1906 मोहसीन उल मुलम


👉 18. प्रतिसरकार 1942 सातारा क्रांतीसिंह नाना पाटील


👉 19. आझाद दस्ता - भाई कोतवाल


👉 20. लालसेना - जनरल आवारी


👉 21. आझाद रेडिओ केंद्र 1942 उषा मेहता व विठ्ठल जव्हेरी


👉 22. मित्रमेळा 1900 नाशिक स्वातंत्र्यवीर सावरकर



चालू घडामोडी :- 16 एप्रिल 2024

◆ अभिनेते अमिताभ बच्चन यांना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे.

◆ ACC पुरुष प्रीमिअर चषकामध्ये नेपाळच्या दीपेंद्र सिंगने एका षटकात 6 षटकार ठोकून इतिहास रचला.

◆ जगातील सर्वाधिक वयाच्या जुळ्या लोरी आणि जॉर्ज शेपेल यांचे वयाच्या 62 व्या वर्षी पेन्सिल्व्हेनिया येथे निधन झाले आहे.

◆ दरवर्षी 16 एप्रिल रोजी जगभरात जागतिक आवाज दिन साजरा केला जातो.

◆ लॉरेन्स वोंग हे सिंगापूरचे नवे पंतप्रधान होणार आहेत.

◆ युनायटेड किंग्डमने पाकिस्तानचा समावेश पर्यटकांसाठी अत्यंत धोकादायक देशांच्या यादीत केला आहे.

◆ इंडोनेशियन बॅडमिंटनपटू 'जोनाथन क्रिस्टी'ने आशिया बॅडमिंटनचे विजेतेपद पटकावले आहे.

◆ केंद्र सरकारने 'आशिष कुमार चौहान' आणि 'श्रीधर वेंबू' यांची विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) सदस्य म्हणून नियुक्ती करणारी अधिसूचना जारी केली आहे.

◆ ज्येष्ठ अभिनेते राम चरण यांना चेन्नई वेल्स विद्यापीठाने मानद डॉक्टरेट प्रदान केली आहे.

◆ आयपीएल मध्ये सनरायझर्स हैदराबाद या संघाने एका डावात सर्वाधिक 22 षटकार मारण्याचा विक्रम केला आहे.

◆ पिकांच्या नोंदीसाठी केंद्र सरकारने "डिजिटल पीक सर्वेक्षण" हा पथदर्शी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

◆ बजरनी बेनेडिक्टसन यांची आइसलँड या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे.

◆ युरोप आणि जपान देशाच्या Bepicolombo या मिशन व्दारे बुध या ग्रहाचा अभ्यास करण्यात येणार आहे.

◆ Knife: Mediations After An Attempted Murder या पुस्तकाचे लेखक सलमान रश्दी हे आहेत.

◆ क्रिस्टलीना जॉर्जिया यांची IMF च्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून पुन्हा 5 वर्षसाठी निवड करण्यात आली आहे.

◆ 41 वी एशियन बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा 2024 चीन या देशात आयोजित करण्यात आली होती.

◆ IPL 2024 मध्ये दोन शतक झळकावणारा जॉस बटलर[इंग्लंड] पहिला फलंदाज ठरला आहे.[RR]

◆ IPL 2024 मध्ये पाचवे शतक झळकावणारा फलंदाज सुनील फिलिप नरेन[वेस्ट इंडिज] ठरला आहे.[KKR]

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

16 April 2024

महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग

 🔻Q. महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?


1) न्या रंगनाथ मिश्रा.

2) न्या. H. L. दत्तू

3) न्या. अरविंद सावंत✅✅✅अचूक उत्तर

4) श्री. M. A. सयिद


----------------------------------------------------------


🔻स्पष्टीकरण :-


❤️ महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग :-


📌स्थापना :- 6 मार्च 2001

     ⭐️मानवी अधिकार संरक्षण अधिनियम, 1993 नुसार


📌अध्यक्ष :- उच्च न्यायालयाचे माजी  न्यायाधीश


➡️पहिले अध्यक्ष :- न्या. अरविंद सावंत (2001- 02) 


➡️कार्यरत अध्यक्ष :- कमलकिशोर ताटेड (2022 पासून)


----------------------------------------------------------


❤️ राष्ट्रीय मानव अधिकार आयोग :-


📌 स्थापना  :- 12 ऑक्टोबर 1993

         ⭐️मानवी अधिकार संरक्षण अधिनियम, 1993 नुसार


📌अध्यक्ष :- सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश 


➡️पहिले अध्यक्ष :- न्या. रंगनाथ मिश्रा (1993 - 96) 


➡️कार्यरत अध्यक्ष :- न्या. अरुण कुमार मिश्रा (2021 पासून)


----------------------------------------------------------

📌📌

⚠️Note :- पश्चिम बंगाल राज्य मानवी हक्क आयोग स्थापन करणारे पहिले (1995) राज्य ठरले आहे.

चालू घडामोडी :- 15 एप्रिल 2024

◆ नवीन शिक्षण धोरणानुसार नव्या पद्धतीने शिक्षण देण्यासोबतच नवे नेतृत्व घडवण्यासाठी प्रेरणा उत्सवाची सुरुवात वडनगर गुजरात येथून करण्यात येणार आहे.

◆ भारतात तयार करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक मोटारीची परदेशात निर्यात करणारी सिट्रोन ही पहिली बहुराष्ट्रीय कंपनी ठरली आहे.

◆ भारत आणि सिंगापूर या देशाच्या सर्वोच्च न्यायालयात AI तंत्रज्ञानावर दोन दिवसीय परिषद आयोजित करण्यात येणार आहे.

◆ BARTI आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने लंडन येथे शास्वत सर्वसमावेशक विकास आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर या विषयावर अंतरराष्ट्रिय परिषदेचे अयोजन करण्यात आले.

◆ आतापर्यंत एकूण 31 मानवांनी पृथ्वीच्या वातावरणा बाहेर उड्डाण करून अंतराळात प्रवेश केला आहे.

◆ स्वदेशी बनावटीच्या मॅन पोर्टेबल अँटी टँक गायडेड मिसाईल प्रणालीची DRDO ने यशस्वी चाचणी घेतली आहे.

◆ जगातील जर्मनी देशाच्या प्राणी संग्राहलयात जगातील सर्वात वयस्कर गोरिला आहे.

◆ डस्टलिक 2024 युद्ध सराव भारत आणि उझबेकिस्तान या देशात सुरू झाला आहे.

◆ यावर्षी होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत Athletics मध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना जागतिक अथलेटीक्स महासंघातर्फे 50 हजार अमेरिकन डॉलर बक्षिसाची घोषणा करण्यात आली आहे.

◆ IPL मध्ये सर्वाधिक धावा करणारा SRH संघ पहिल्या व दुसऱ्या स्थानी आहे.

◆ कॅनडाच्या गार्डनर फाऊंडेशनचा ग्लोबल हेल्थ मधील जॉन डक्स पुरस्कार 2024 डॉ. गगनदीप कांग मिळाला आहे.

◆ देशात आसाम राज्यात 14 ते 20 एप्रिल दरम्यान रोंगाली बिहू उत्सव साजरा करण्यात येतो.

◆ राष्ट्रीय न्यायिक अकादमी च्या प्रमुखपदी अनिरुद्ध बोस यांची निवड करण्यात आली आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

IMPORTANT CURRENT #GK



🟣1. भारतातील पहिली पॉड टॅक्सी 🚕सेवा - उत्तर प्रदेश


🟣2. आंतरराष्ट्रीय मल्टीमोडल लॉजिस्टिक पार्क 🚚- जोगीघोपा (आसाम)


🟣3.🏥 मुलांसाठी 'डिजिटल हेल्थ कार्ड' - उत्तर प्रदेश


🟣4. 💧राज्य जल बजेट (वॉटर बजेट) स्वीकारत आहे - केरळ


🟣5. 🚇 भारतातील पहिला 'अंडरवॉटर रोड बोगदा - मुंबई'


🟣6.♻️ भारतातील पहिले 'ग्रीन एव्हिएशन इंधन उत्पादन - पानिपत (हरियाणा)'


🟣7. ☀️सौर उर्जेवर चालणारी पर्यटक बोट 'सूर्यांशू' - केरळ


🟣8. पर्यटनाला चालना देण्यासाठी 'मरीना' विकसित करणारे - कुंदापूर (कर्नाटक)


🟣9.📳भारतातील पहिले 'डिजिटल सायन्स पार्क' - केरळ


🟣10.📒 संविधान अंतर्गत भारतातील पहिला पूर्ण साक्षर जिल्हा - कोल्लम (केरळ)


🟣11. 📱भारतातील पहिला 'सेमी-कंडक्टर प्लांट' उघडला - ढोलेरा (गुजरात)


🟣12. ♿️ दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र विभाग स्थापन - महाराष्ट्र


🟣13. 🛫 विमानतळावरील भारतातील पहिले 'रीडिंग लाउंज' - लाल बहादूर शास्त्री (वाराणसी)


🟣14.⚡️ 2030 पर्यंत सरकारी विभागांमध्ये 100% इलेक्ट्रॉनिक वाहने - केरळ


🟣15. 📮भारतातील पहिले 3D-मुद्रित पोस्ट ऑफिस - बेंगळुरू


🟣16.🚇 अंडरवॉटर मेट्रो ट्रेनची यशस्वी चाचणी - कोलकाता


🟣17. अंधांच्या नावाने ओळखले जाणारे गाव - माना (उत्तराखंड)


🟣18. दृष्टीदोष नियंत्रण धोरणाची अंमलबजावणी करणारे राज्य - राजस्थान


🟣19. भारतातील पहिले 'हायब्रीड साउंडिंग रॉकेट लॉन्च साइट - पट्टीपुलम (तामिळनाडू)


🟣20. पहिले 'कार्बन न्यूट्रल व्हिलेज' विकसित - भिवंडी तालुका (महाराष्ट्र)


🟣21. भारतातील पहिले 'सौर ऊर्जा-चालित शहर'  - सांची (मध्य प्रदेश)

लक्षात ठेवा

🔸१) दुर्गाराम मंछाराम यांच्या सहकार्याने दादोबा पांडुरंग यांनी १८४४ मध्ये 'मानवधर्म सभा' या सभेची स्थापना केली. कोठे ?

- सुरत


🔹२) दादोबा पांडुरंग यांनी मुंबई येथे 'परमहंस सभे'ची स्थापना केली .... 

- ३१ जुलै, १८४९


🔸३) हिंदुधर्मातील स्त्रियांची दुःस्थिती व विशेषतः विधवा स्त्रियांची दयनीय स्थिती यांवर प्रकाश टाकणारी 'यमुना पर्यटन' ही कादंबरी लिहिली .... 

- बाबा पद्मनजी


🔹४) सन १८६७ मध्ये मुंबई येथे 'प्रार्थना समाजा'ची स्थापना करण्यात आली. या समाजाच्या स्थापनेचे श्रेय विशेषत्वाने देण्यात येते .... यांना.

- आत्माराम पांडुरंग


🔸५) .... रोजी मुंबईतील कोळीवाडा (मांडवी) येथील समारंभात जोतीराव फुले यांना 'महात्मा' ही पदवी दिली गेली.

- ११ मे, १८८८



🔸१) इ. स. १८४८ मध्ये आपल्या स्वतःच्या घरात मुलींची मुंबईतील पहिली शाळा स्थापन केली ....

- नाना शंकरशेठ


🔹२) मुंबई व पुणे दरम्यान रेल्वे सेवा सुरू व्हावी यासाठी जमशेदजी जिजीभाय यांच्याबरोबरच .... यांनीही विशेष प्रयत्न केले होते.

- नाना शंकरशेठ


🔸३) एरवी इंग्रजी राजवटीचे समर्थन करणाऱ्या .... यांनीच वेळप्रसंगी “दिवाळखोर सरदारांचा धूर्त कारभारी जसा संसार पाहतो तसे इंग्रज सरकार या देशाचा कारभार पाहत आहे." अशा शब्दांत ब्रिटिश शासनावर टीका केली. 

- लोकहितवादी


🔹४) अहमदनगरचे डेप्युटी कलेक्टर म्हणून काम करीत असताना .... यांनी १८५७ चे भिल्लांचे बंड मोडून काढले.

- दादोबा पांडुरंग


🔸५) स्वधर्मात राहून इतर धर्मातील चांगल्या धर्मतत्त्वांचा स्वीकार करावयाचा व स्वधर्मात सुयोग्य दिशेने परिवर्तन घडवून आणावयाचे, असे मानणारा सुधारकांचा एक वर्ग देशात एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर कार्यरत होता. अशा प्रकारच्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून आपणास ..... यांनी स्थापन केलेल्या 'मानव धर्मसभा' व 'परमहंस सभा' यांचा उल्लेख करावा लागेल.

- दादोबा पांडुरंग


🔸१) पृथ्वीवरील दोन स्थानांमधील रेखावृत्तीय अंशात्मक अंतरास .... मिनिटांनी गुणले असता त्या दोन ठिकाणातील स्थानिक वेळेतील फरक समजू शकतो. 

- चार


🔹२) विषुववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस २३°३०' अक्षवृत्ता पर्यंतच्या प्रदेशात सूर्यकिरण लंबरूप पडतात. त्यामुळे त्या भागात तापमान जास्त असते. या पट्ट्यास काय म्हणतात? 

- उष्ण पट्टा


🔸३) पृथ्वी लंबवर्तुळाकार मार्गाने सूर्याभोवती फिरत असल्याने तिचे सूर्यापासूनचे अंतर सारखे नसते. जेव्हा पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते तेव्हा त्या स्थितीस .... म्हणून ओळखले जाते.

- उपसूर्य स्थिती


🔹४) चमकणाऱ्या विजेमुळे हवेतील काही ऑक्सिजनचे .... वायूत रूपांतर होते..

- ओझोन


🔸५)आपल्या आकाशगंगेचा व्यास किमान .... लाख प्रकाशवर्षे असावा. 

- एक

🔸१) २१ मार्च व २३ सप्टेंबर या दोन दिवशी संपातस्थिती निर्माण होते. म्हणून या दोन दिवसांना ..... असे म्हणतात.
- संपातदिन

🔹२) ज्या वेळी पृथ्वीचा कोणताही एक ध्रुव सूर्याकडे जास्तीत जास्त कललेला असतो तेव्हा त्या स्थितीस .... असे म्हणतात.
- अयनस्थिती

🔸३) २१ मार्च या संपातदिनाला उत्तर गोलार्धात ..... म्हणून ओळखले जाते.
- वसंत संपात 

🔹४) २३ सप्टेंबर या संपातदिनाला उत्तर गोलार्धात .... म्हणून ओळखले जाते. 
- शरद संपात

🔸५) पृथ्वीला सूर्याभोवती एक अंश फिरण्यास किती वेळ लागतो ?
- चार मिनिटे

15 April 2024

महाराष्ट्रातील पंचायतराज


◆ कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ?

  - स्थानिक स्वराज्य संस्था


◆ राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती ?

  -  2 ऑक्टोबर 1953


◆ बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली ?

  - 16 जानेवारी 1957


◆ बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती ?

  - वसंतराव नाईक समिती


◆ वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती ?

  - 27 जून 1960


◆  वसंतराव नाईक त्याकाळी कोणत्या पदावर कार्यरत होते ?

  - महसूल मंत्री


◆ वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या ?

  - 226


◆ वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती. त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली ?

  - जिल्हा परिषद


◆ पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत ?

  - तीन (ग्रामपंचायत-पंचायत समिती-जिल्हा परिषद)


◆ महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला ?

   - 1  मे 1962


◆ ‘महसुली खेड्या’ची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली आहे ?

  -  महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966


◆ महाराष्ट्रात ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असते ?

  -  7 ते 17


◆ ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्यशासनाच्या वतीने कोण ठरविते ?

  - जिल्हाधिकारी


◆ ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे  ?

  - जिल्हाधिकारी


◆ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो ?

  - 5 वर्षे


◆ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ  कधी पासून मोजला जातो ?

  - पहिल्या सभेपासून


◆ ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष/पीठासन अधिकारी कोण असतात?

  - तहसीलदार


◆ सरपंच/उपसरपंच यांच्या निवडणूकीबाबतच्या वादावर अंतिम निर्णय कोण घेते ?

  - विभागीय आयुक्त


◆ उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

  - सरपंच


◆ सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

  - पंचायत समिती सभापती


◆ पुरुष सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?

  - दोन तृतीयांश (2/3)


◆ महिला सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?

  - तीन चतुर्थांश (3/4)


◆ पंचायत समिती उप-सभापती आणि इतर पंचायत समिती  सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

  - पंचायत समिती सभापती


◆ पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

  - जिल्हा परिषद अध्यक्ष


◆ जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

  - संबंधित विषय समिती सभापती


◆ जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितींचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

  - जिल्हा परिषद अध्यक्ष


◆ जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

  - विभागीय आयुक्त


◆ कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र ग्रामपंचायतीचा नोकर नसतो ?

  -  ग्रामसेवक


◆ ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो ?

   - जिल्हा परिषदेचा


◆ ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते ?

  - जिल्हा परिषदेच्या जिल्हानिधी तून


◆ ग्रामीण भागात ‘बालविवाह प्रतिबंधक अधिकारी’ म्हणून कोण कार्य पाहतो ?

  - ग्रामसेवक


◆ ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोठे आहेत ?

   -  शिंदेवाही (चंद्रपूर) आणि मांजरी (पुणे)


◆ ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे ?

  -  राज्यशासनाला


◆ सरपंच समितीचा पदसिध्द सचिव म्हणून कोण काम पाहते ?

   -  विस्तार अधिकारी


◆ गटविकास  अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे  ?

  - ग्रामविकास खाते


  ◆ जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?

  - जिल्ह्याचे पालकमंत्री


◆ जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात ?

  -  जिल्हाधिकारी


◆ जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात ?

  -  दहा (स्थायी+9 विषय समित्या)


◆ जिल्हा परिषदेच्या  समित्या  कोणत्या आहेत ?

  - स्थायी, कृषी,समाजकल्याण, शिक्षण, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण व पेयजल पुरवठा


◆ जिल्हा परिषदेच्या स्थायी समितेचे पदसिध्द अध्यक्ष  कोण असतात ?

  -  जिल्हा परिषद अध्यक्ष


◆  महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोण आहे.?

  -  वसंतराव नाईक

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)


प्रश्न.1) महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणच्या राजघराण्याच्या गंजिफा कलेसह लाकडी खेळण्यांना भारत सरकारकडून GI टॅग प्राप्त झाले आहे?

उत्तर - सावंतवाडी


प्रश्न.2) कोणता खेळाडू आयपीएल मध्ये ३ हजार धावांचा टप्पा पार करणारा सर्वात युवा फलंदाज ठरला आहे?

उत्तर - शुभमन गील


प्रश्न.3) भारतातील कोणत्या जैन अध्यात्मिक गुरू ना अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षांच्या सुवर्ण सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?

उत्तर - लोकेश मुनी


प्रश्न.4) QS रँकिंग नुसार कोणते विद्यापीठ भारतातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ ठरले आहे?

उत्तर - JNU विद्यापीठ नवी दिल्ली


प्रश्न.5) इटलीत खुल्या स्किफ युरो चॅलेंज नौकायान स्पर्धेत मिश्र गटात मुंबई च्या आनंदी चंदावरकर हिने कोणते पदक जिंकले आहे?

उत्तर - कांस्य 


प्रश्न.6) लंडन येथील जागतिक पातळीवरील कॉमनवेल्थ युवा चॅम्पियन २०२४ साठी कोणाची निवड करण्यात आली आहे?

उत्तर - दारासिंग खुराणा


प्रश्न.7) जागतिक आरोग्य संघटनेच्या हिपॅटायटीस अहवाल २०२४ नुसार रुग्णाच्या बाबतीत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे?

उत्तर - तिसऱ्या


प्रश्न.8) जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगात सर्वाधिक हिपॅटायटीस चे रुग्ण कोणत्या देशात आहेत?

उत्तर -  चीन


प्रश्न.9) पिटर हिग्ज यांचे निधन झाले. त्यांना कोणत्या साली नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते?

उत्तर - 2013


प्रश्न.10) राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दीन कधी साजरा करण्यात येतो?

उत्तर -11 एप्रिल


प्रश्न.1) महाराष्ट्रात सर्वाधिक मतदारांची संख्या कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर - पुणे 


प्रश्न.2) आयपीएल मध्ये दोन वेळा ५ विकेट घेणारा जसप्रीत बुमराह कितवा गोलंदाज ठरला आहे?

उत्तर - चौथा


प्रश्न.3) महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर - हरेंद्र सिंग


प्रश्न.4) आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोल बोर्ड च्या सदस्य पदी कोणाची निवड करण्यात आली आहे?

उत्तर - जगजित पवाडिया


प्रश्न.5) आशियाई विकास बँकेने आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी भारताच्या GDP वाढीचा दर किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला आहे?

उत्तर - 7%


प्रश्न.6) हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स नुसार भारत देश कितव्या कितव्या स्थानावर आहे?

उत्तर - तीसऱ्या 


प्रश्न.7) हूरून युनिकॉर्न इंडेक्स २०२४ नुसार कोणता देश प्रथम स्थानावर आहे?

उत्तर - अमेरीका 


प्रश्न.8) मानवी अंतराळ उड्डाणासाठी आंतरराष्ट्रीय दिवस केव्हा साजरा केला जातो ?

उत्तर - 12 एप्रिल


प्रश्न – अलीकडेच आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा खेळाडू कोण बनला आहे?

उत्तर - विराट कोहली


प्रश्न – गंगू रामसे यांचे नुकतेच निधन झाले, ते कोण होते?

उत्तर - सिनेमॅटोग्राफर


प्रश्न – जर्दाळू ब्लॉसम फेस्टिव्हल 2024 नुकताच कुठे सुरू झाला?

उत्तर - लडाख


प्रश्न – नुकताच जर्मन लोकशाही पुरस्कार कोणाला मिळेल?

उत्तर - युलिया लानाया


प्रश्न – कोणत्या देशाने अलीकडेच आपला रोजगार व्हिसा कार्यक्रम बदलला आहे?

उत्तर - न्यूझीलंड


प्रश्न – अलीकडेच F1 जपानी ग्रां प्री 2024 कोणी जिंकले आहे?

उत्तर - मॅक्स वर्स्टॅपेन


प्रश्न – भारतीय तटरक्षक दलाने अलीकडेच जलचर केंद्राचे उद्घाटन कोठे केले आहे?

उत्तर - तामिळनाडू


प्रश्न – अलीकडे कोणत्या राज्यातील मिरज शहरात बनवलेल्या सतारला तानपुरा हा GI टॅग मिळाला आहे?

उत्तर - महाराष्ट्र


प्रश्न – नुकताच CRPF शौर्य दिवस कधी साजरा करण्यात आला?

उत्तर – ९ एप्रिल


प्रश्न – IPEF द्वारे नुकतेच क्लीन एनर्जी इन्व्हेस्टर फोरम कोणत्या देशात आयोजित केले जाईल?

उत्तर - सिंगापूर


प्रश्न – नुकतेच कोणत्या शहरात राष्ट्रीय महिला हॉकी लीगचे उद्घाटन होणार आहे?

उत्तर - रांची


प्रश्न – वित्त आयोगाचे सदस्य म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर - मनोज पांडा


प्रश्न – भारताने अलीकडेच कोणत्या देशात सिटवे बंदरावर ऑपरेशनल नियंत्रण मिळवले आहे?

उत्तर - म्यानमार


प्रश्न – कोणत्या देशाने अलीकडे रशियाकडून सर्वाधिक कच्चे तेल आयात केले आहे?

उत्तर - चीन


प्रश्न – अलीकडे कोणत्या देशाचे सैन्य माउंट एव्हरेस्टवरून कचरा गोळा करण्याची मोहीम सुरू करणार आहे?

उत्तर - नेपाळ


प्रश्न – ECI ने अलीकडे कोणते नवीन ॲप लाँच केले आहे?

उत्तर – सुविधा पोर्टल


प्रश्न – नुकताच मार्च 2024 चा ICC प्लेयर ऑफ द मंथ कोण बनला आहे?

उत्तर - माइया बाउचर आणि कामिंदू मदिन्स


प्रश्न – जागतिक होमिओपॅथी दिन नुकताच कधी साजरा करण्यात आला?

उत्तर - 10 एप्रिल


प्रश्न – अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने सुरक्षा आव्हानांचे मूल्यांकन केले आहे आणि दहशतवादावर विचारांची देवाणघेवाण केली आहे?

उत्तर - कझाकस्तान


प्रश्न – अलीकडेच त्याच्या नवीन लोगोचे अनावरण कोणी केले आहे?

उत्तर - CCL


प्रश्न – कोणत्या देशाने अलीकडेच WTO मध्ये तांदूळासाठी शांतता कलम लागू केले आहे?

उत्तर भारत


प्रश्न – अलीकडे हिपॅटायटीसच्या बाबतीत कोणता देश अव्वल आहे?

उत्तर - चीन


प्रश्न – नुकताच नवीन वर्ष उगादी सण कोठे साजरा करण्यात आला?

उत्तर - तेलंगणा आणि आंध्र प्रदेश


प्रश्न – अलीकडेच, कोणत्या मिशनसाठी इस्रो टीमला प्रतिष्ठित जॉन अल हा पुरस्कार देण्यात आला? जॅक स्विगर्ट जूनियरची पुरस्कारासाठी निवड झाली आहे?

उत्तर - चांद्रयान ३


प्रश्न – नुकताच आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिन कधी साजरा करण्यात आला?

उत्तर - 12 एप्रिल


प्रश्न – नुकतीच आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डवर कोणाची निवड झाली आहे?

उत्तर - जगजित पावडिया


प्रश्न – अलीकडेच भारत आणि कोणत्या देशामध्ये संयुक्त लष्करी सराव डस्टलिक सुरू होणार आहे?

उत्तर - उझबेकिस्तान


प्रश्न – T20 क्रिकेटमध्ये 7000 किंवा त्याहून अधिक धावा करणारा आठवा भारतीय कोण आहे?

उत्तर - सूर्यकुमार यादव


प्रश्न – अलीकडेच नौदल प्रमुखांनी कोणत्या राज्याच्या कारवार नौदल तळावर नवीन सुविधांचे उद्घाटन केले आहे?

उत्तर - कर्नाटक


प्रश्न – भारतीय लष्कराने अलीकडेच रणगाडाविरोधी मार्गदर्शित क्षेपणास्त्रांचा सराव कोठे केला आहे?

उत्तर - सिक्कीम


प्रश्न – नुकतेच स्वामी विवेकानंद U20 फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन कोठे झाले?

उत्तर - छत्तीसगड


प्रश्न – नुकतीच आशिया कुस्ती स्पर्धा 2024 कोणत्या देशात आयोजित केली जात आहे?

उत्तर - किरगिझस्तान

सामान्य ज्ञान (GK) प्रश्नोत्तरे



(1) सौरऊर्जा ___ स्वरुपात असते.

1) प्रकाश प्रारणांच्या

*2) विद्युत चुंबकीय प्रारणांच्या ✅*

3) अल्फा प्रारणांच्या

4) गामा प्रारणांच्या 


----------------------------


(2) बटाट्यांना मोड येऊ नये म्हणून त्यावर _ प्रारणांचा मारा करतात.

1) अल्फा

2) बिटा

3) गॅमा ✅

4) क्ष-किरण 


----------------------------


(3) पदार्थाच्या एका ग्रॅम-मोलमधील रेणूंची संख्या ......... इतकी असते.

1) M

*2) N ✅*

3) A

4) X

----------------------------

(4) जीवभूरसायन चक्रात कार्बन प्रमाण.........आहे.

*1) ०.०३% ✅*

2) ०.३%

3) ३%

4) ०.००३%


----------------------------

(5) खालीलपैकी कोणती वनस्पती टेरीडोफायटा या सवंहिनी वनस्पती वर्गात येत नाही.

1) फिलीसीनी

*2) मुसी ✅*

3) लायकोपोडियम

4) इक्विसेटीनि 


----------------------------


(6) मानव पालेभाज्यांतील सेल्युलोज पचवू शकत नाही,कारण..........हे विकर त्याच्या जठरात नसते.

1) *सेल्युलेज ✅*

2) पेप्सीन

3) सेल्युलीन

4) सेल्युपेज 

----------------------------


(7) पाण्याची घनता ................ ला उच्चतम असते.

*1) ४℃ ✅*

2) २५℃

3) ०℃

4) ७३℃

----------------------------


*(8) आधुनिक जैवतंत्रज्ञान ............. पातळीवर कार्य करते.*

1) अवअणू

2) अणू

*3) रेणू ✅*

4) पदार्थ 

भारत : स्थान व विस्तार




◼️भारत अक्षवृत्तीयदृष्ट्या उत्तर गोलार्धात व रेखावृत्तीयदृष्ट्या पूर्व गोलार्धात आहे. 


◻️अक्षवृत्तीय स्थान : ८० ४' उत्तर ते ३७० ६' उत्तर अक्षवृत्त


◼️रेखावृत्तीय स्थान : ६८०७' पूर्व ते ९७० २५' पूर्व रेखावृत्त


◻️सर्वांत दक्षिणेकडील टोक : इंदिरा पॉईंट (६०४५' उत्तर अक्षवृत्त)


◼️पूर्व पश्चिम जास्तीत जास्त अंतर : २९३३ किमी 


◻️दक्षिण-उत्तर जास्तीत जास्त अंतर : ३२१४ किमी


◼️क्षेत्रफळ : ३२,८७, २६३ चौरस किमी (जगात सातवा क्रमांक)


◻️भूसीमा लांबी : १५२०० किमी.


◼️सागरी किनारा लांबी : ७,५१७ किमी


◻️सर्वांत उत्तरेकडील स्थान : दफ्तार (जम्मू आणि काश्मीर)


◼️सर्वांत दक्षिणेकडील स्थान : कन्याकुमारी/इंदिरा पॉईंट


◻️सर्वांत पूर्वेकडील स्थान : किबिथू (अरुणाचल प्रदेश)


◼️सर्वांत पश्चिमेकडील स्थान : घुअर मोटा (राजस्थान)


◻️सर्वांत उंच स्थान : के-२ (गॉडवीन ऑस्टिन) (८६११ मी) (काराकोरम रांग)


◼️सर्वांत खोल बिंदू : कुट्टानाद (-२.२ मी) (केरळ)


◻️सागरी सीमा : ६ देशांशी संलग्न


◼️भू सीमा : ७ देशांशी संलग्न


सर्व स्पर्धा परीक्षासाठी उपयुक्त


◾️भारतातील पहिले 100% साक्षर राज्य :- केरळ

◾️भारतातील पहिले सेंद्रिय राज्य व पहिले निर्मल राज्य :- सिक्कीम

◾️प्लॅस्टिक ओळखपत्र मतदारांना वाटणारे पहिले राज्य :- त्रिपुरा

◾️जन-सुरक्षा कायदा करणारे पहिले राज्य :- आंध्र प्रदेश

◾️मानवाधिकार न्यायालय सुरू करणारे पहिले राज्य :- पश्चिम बंगाल

◾️लोकायुक्त संमत करणारे पहिले राज्य :- उत्तराखड

◾️देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य :- दिल्ली

◾️जानकी दूध बँक चालविणारे पहिले राज्य :- राजस्थान

◾️भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य :- हिमाचल प्रदेश

◾️भारतातील पहिले बाल न्यायालय सुरू करणारे राज्य :- दिल्ली

◾️भारतातील पहिले महिला न्यायालय सुरू करणारे राज्य :- प. बंगाल

◾️मिनरल वॉटर बाटल्यांवर बंदी घालणारे पहिले राज्य :- सिक्किम

◾️GST विधेयकास मान्यता देणारे भारतातील पहिले राज्य :- आसाम

◾️राज्य GST कायद्यास मान्यता देणारे भारतातील पहिले राज्य :- तेलंगणा

◾️'आरोग्य अदालत' सुरु करणारे पहिले राज्य :- कर्नाटक

◾️भारतातील पहिले धुम्रपानमुक्त राज्य :- सिक्किम

◾️निकोटिनवर बंदी घालणारे भारतातील पहिले राज्य :- पंजाब

◾️सौर ऊर्जेवरील पहिली बोट (आदित्य) सुरू करणारे पहिले राज्य :- केरळ

◾️कृषी आधारित अर्थसंकल्प सादर करणारे पहिले राज्य :- कर्नाटक

◾️बालक जन्मतःच त्याची आधार नोंदणी करणारे पहिले राज्य :- हरियाणा

◾️पंचायत निवडणुकांत शैक्षणिक पात्रता बंधनकारक करणारे पहिले राज्य :- राजस्थान

◾️मृदा स्वास्थ्य कार्ड सुरू करणारे पहिले राज्य :- पंजाब

◾️सेवा हमी कायदा (RTS) संमत करणारे पहिले राज्य :- मध्य प्रदेश

◾️ई-रेशनकार्ड वितरित करणारे पहिले राज्य :- दिल्ली

◾️ई-रिक्षा सुरू करणारे पहिले राज्य :- दिल्ली

◾️ई-कॅबिनेटचा वापर करणारे भारतातील पहिले राज्य :- आंध्र प्रदेश

◾️भारतातील पहिले ई-न्यायालय :- हैद्राबाद उच्च न्यायालय

◾️ऑनलाईन मतदान राबविणारे पहिले राज्य :- गुजरात

◾️जन-धन योजनेची 100% अंमलबजावणी करणारे पहिले राज्य :-मेघालय

◾️पदवीपर्यंत लैंगिक शिक्षण सक्तीचे करणारे पहिले राज्य :- तेलंगणा

◾️भारतातील पहिली फूड बैंक सुरू करणारे राज्य :- दिल्ली

◾️होमिओपॅथिक विद्यापीठ सुरू करणारे पहिले राज्य :- राजस्थान

◾️स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांना 33% आरक्षण देणारे राज्य :- महाराष्ट्र

......𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫 ...

 ◾️"चंद्रयान प्रकल्प 4 "- ISRO प्रमुख एस सोमनाथ यांनी खुलासा केला आहे 2040 पर्यत ISRO चंद्रावर अंतराळवीर उतरवणार आहे


पृथ्वीच्या कक्षेबाहेर इस्रोच्या पाच मोहीम👇👇

1] 'चांद्रयान-1' :- 22 ऑक्टोबर 2008

2] 'मंगळयान' :- 05 नोव्हेंबर 2013

3] 'चांद्रयान-2' :- 22 जुलै 2019

4] 'चांद्रयान-3' :- 14 जुलै 2023

5] 'आदित्य एल-1' :- 02 सप्टेंबर 2023


◾️फ्रेंच ऑटोमेकर Citroën ही भारतात उत्पादित इलेक्ट्रिक वाहने (EVs) आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात करणारी पहिली बहुराष्ट्रीय कार उत्पादक बनली आहे.

⭐️Citroën ही इंडोनेशिया ला 500 EV गाड्या देणार आहे


◾️जागतिक होमिओपॅथी दिवस 10 एप्रिल, 2024


◾️Tata Advanced Systems Ltd (TASL ) ने सॅटेलॉजिकच्या सहकार्याने, भारताचा खाजगी क्षेत्रातील निर्मित सब-मीटर रिझोल्यूशन पृथ्वी निरीक्षण उपग्रह, TSAT-1A चे यशस्वी प्रक्षेपण केले आहे

⭐️7 एप्रिल रोजी इलॉन मस्कच्या स्पेसएक्स फाल्कन 9 रॉकेटवर केनेडी स्पेस सेंटर, फ्लोरिडा येथून TSAT-1A चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले


◾️QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रैंकिंग 2024

⭐️ IIT बॉम्बे अभियांत्रिकीमध्ये जागतिक स्तरावर 45 व्या क्रमांकावर आहे


◾️सुश्री जगजीत पावडिया यांची न्यूयॉर्क येथे झालेल्या निवडणुकीत 2025-2030 या कालावधीसाठी आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ नियंत्रण मंडळावर निवड झाली आहे


◾️आशियाई विकास बँकेने FY25 साठी भारताचा GDP वाढीचा अंदाज पूर्वीच्या 6.7% वरून 7% पर्यंत वाढवला आहे.

⭐️FY26 साठी, ने ते 7.2% वर्तवला आहे


◾️आशियाई विकास बँक /Asian Development Bank 


⭐️मुख्यालयः मांडलुयोंग, फिलीपिन्स

⭐️स्थापनाः 19 डिसेंबर 1966

⭐️अध्यक्षः मासात्सुगु असाकावा


◾️15 वा वित्त आयोग या

⭐️अध्यक्ष - NK सिंग आहेत

⭐️स्थपणा - नोव्हेंबर 2017 


◾️16 व्या वित्त आयोग

⭐️अध्यक्ष - अरविंद पंगरियार

⭐️स्थपणा - 31 डिसेंबर 2023


◾️दरवर्षी 9 एप्रिल रोजी

 CRPF दिवस

 साजरा केला जातो


◾️झिम्बाब्वे देशाने स्वतःचा नवीन चलन ZiG (जीग ) लॉन्च केली


◾️शक्ती महोत्सव 

⭐️संगीत अकादमी शक्ती महोत्सवाचे आयोजन करनार आहे 9 ते 17 एप्रिल दरम्यात 

⭐️हयात संगीत आणि नृत्य होईल

⭐️याचे आयोजन देशातील 7 शक्तीपीठांच्या मध्ये होणार आहे


◾️देशातील 7 शक्तिपीठे मध्ये शक्ती महोत्सवाचे आयोजन  

⭐️गुवाहाटी चे कामाख्या मंदिर (आसम) 

⭐️कोल्हापुर चे महालक्ष्मी मंदिर (महाराष्ट्र) 

⭐️कांगड़ा चे ज्वालामुखी मंदिर (हिमाचल प्रदेश)

⭐️उदयपुर चे त्रिपुरी सुंदरी मंदिर (त्रिपुरा) 

⭐️बनासकंठा चे अंबाजी मंदिर (गुजरात) 

⭐️देवघर चे जय दुर्गा शक्ती पीठ (झारखंड)

⭐️उज्जैन चे  हरसिद्धि मंदिर (मध्य प्रदेश)


◾️30 मार्च ला राजयस्थान स्थपणेला 75 वर्षे पूर्ण

⭐️1949 मध्ये स्थापना


◾️हुरुन ग्लोबल यूनिकॉर्न इंडेक्स 2024 रिपोर्ट

⭐️यूनिकॉर्न स्टार्टअप मध्ये भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो 

🔥अमेरीका - पहिला ( 703 स्टार्टअप )

🔥चीन - दुसरा ( 340 स्टार्टअप )

🔥भारत - तिसरा ( 67 स्टार्टअप )

यात 68 होते Byjus कमी झालं एक - बायजूस जगात सर्वात जास्त वैल्यू डिस्ट्रॉयर स्टार्टप बनले


भारतातील सर्वोत्तम मूल्यवान युनिकॉर्न

⭐️स्वीगी  - 8 Billion $

⭐️ड्रीम 11 - 8 Billion $

⭐️रेझर पे - 7.5 Billion $


🔥स्विगी आणि ड्रीम11 जगात 83 वा क्रमांक आहे 

🔥रेझर पे चा जगात 93 वा क्रमांक आहे


◾️ऑपरेशन 'नन्हे फरिश्ते' अंतर्गत 1064 जणांची सुटका.

⭐️ऑपरेशन नन्हे फरिश्ते' रेल्वे कडून राबवले जाते

⭐️ऑपरेशन नान्हे फरिश्तेचा उद्देश विविध कारणांमुळे हरवलेल्या किंवा त्यांच्या कुटुंबापासून विभक्त झालेल्या मुलांना पुन्हा जोडणे हा आहे.


◾️आइसलँडने नवीन पंतप्रधान म्हणून बजार्नी बेनेडिक्ट्सन निवड

⭐️कॅटरिन जेकोब्सडोटीर यांच्या जागी त्यांची निवड
⭐️जानेवारी ते नोव्हेंबर 2017 या 10 महिन्यासाठी सरकारमध्ये पंतप्रधान होते.
⭐️बेनेडिक्ट्सन यांनी जेकोब्सडोटीरच्या सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणूनही काम केले आहे

◾️आइसलँड देशाबद्दल माहिती
⭐️उत्तर अटलांटिक महासागरात स्थित बेट देश 
⭐️उत्तर अमेरिका आणि युरोपमधील  भौगोलिक सीमेवर असलेला देश
⭐️राजधानी, रेकजाविक (“बे ऑफ स्मोक्स”),
⭐️लोकसंख्या: 317,000
⭐️क्षेत्रः 39,769 चौरस मैल (103,001 चौरस किलोमीटर)

◾️वरिष्ठ आयपीएस अधिकारी अनुराग कुमार यांची सीबीआयच्या सहसंचालकपदी नियुक्ती

⭐️2004 च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी आहेत
⭐️सध्या पोलीस संशोधन आणि विकास ब्युरो (BPR&D) मध्ये कार्यरत आहेत.
⭐️आसाम-मेघालय केडरचे अधिकारी आहेत
⭐️CBI स्थापना: 1 एप्रिल 1963
⭐️CBI मुख्यालय: नवी दिल्ली.
➡️CBI चे सध्याचे संचालक प्रवीण सूद आहेत

◾️US-INDIA टॅक्स फोरमच्या अध्यक्षपदी तरुण बजाज यांची नियुक्ती
⭐️यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक अँड पार्टनरशिप फोरम (USISPF) ने त्यांची नेमणूक केली
⭐️ते माजी महसूल सचिव आणि माजी आर्थिक व्यवहार सचिव आहेत
⭐️बजाज हे 1988 च्या बॅचचे हरियाणा कॅडरचे आयएएस अधिकारी

◾️Tax Forum म्हणजे
⭐️Tax forum म्हणजे दोन्ही देशतील व्यवहारादरम्यान Tax धोरणे ठरवणे
⭐️टॅक्स फोरम 25 फेब्रुवारी 2020 रोजी अधिकृतपणे सुरू
⭐️US-INDIA टॅक्स फोरममध्ये सुमारे 350 सदस्य कंपन्या आहेत

◾️ T20 मध्ये 500 षटकार मारणारा रोहित शर्मा पहिला भारतीय बनला आहे
⭐️वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यादरम्यान, टी-20 क्रिकेटमध्ये 500 षटकार मारण्याचा टप्पा गाठला. 
⭐️T20 क्रिकेट सामन्यात 500 किंवा त्याहून अधिक षटकार मारणारे फलंदाज
🏏1056 - ख्रिस गेल
🏏860 - किरॉन पोलार्ड
🏏678 - आंद्रे रसेल
🏏548 - कॉलिन मुनरो
🏏500* - रोहित शर्मा

◾️नायजेरिया मेनिंजायटीसवर (मेंदुज्वर) लस आणणारा पहिला देश बनला आहे
⭐️लाशीचे नाव : Men5CV/MenFive
⭐️नायजेरिया हा आफ्रिकेतील 26 देशांपैकी एक आहे ज्यात मेंदुज्वराचे प्रमाण जास्त आह.



खाडी नदी जिल्हा

 खाडी      नदी       जिल्हा 

━━━━━━━━━━━━━━━━━━━

▪️दातीवार ➖ तानसा वैतरणा =पालघर

▪️वसई ➖ उल्हास =पालघर

▪️ठाणे ➖ उल्हास=ठाणे


▪️मनोरी ➖ दहिसर=मुंबई

▪️मालाड / मोर्वे ➖ अशिवरा=मुंबई उपनगर

▪️माहीम ➖ मिठी=मुंबई उपनगर


▪️पनवेल ➖ पाताळगंगा=रायगड

▪️धरमतर ➖अंबा=रायगड

▪️राजपुरी ➖ काळ =रायगड


▪️बाणकोट ➖ सावित्री =रायगड/रत्नागिरी

▪️केळशी ➖ भरजा=रत्नागिरी

▪️दाभोळ ➖ विशिस्टी=रत्नागिरी


▪️जयगड ➖ शास्त्री=रत्नागिरी

▪️भाट्ये ➖काजळी =रत्नागिरी

▪️पूर्णगड ➖ मुचकुंदी= रत्नागिरी


▪️जैतापूर ➖ काजवी =रत्नागिरी

▪️विजयदुर्ग ➖ शुक=रत्नागिरी/सिंधुदुर्ग

▪️देवगड ➖ देवगड=सिंधुदुर्ग


▪️आचरा ➖ आचरा=सिंधुदूर्ग 

▪️कालावली ➖गड =सिंधुदुर्ग

▪️कर्ली ➖ कर्ली=सिंधुदुर्ग

जाणून घ्या बाबासाहेबांविषयीच्या दहा विशेष गोष्टी


#History 


१. प्रज्ञावंत बाबासाहेबांनी संपादित केलेल्या पदव्या : 


डॉ. आंबेडकरांनी तब्बल ३२ पदव्या संपादित केल्या होत्या. यामध्ये बीए, एमए, पीएचडी (अर्थशास्त्र), एमएससी (Provincial Decentralization of Imperial Finance in British India), बॅरिस्टर इन लॉ, डीएससी (The Problem of the Rupee – Its origin and its solution), एलएलडी (HIS achievements, Leadership and authoring the constitution of India), डी.लिट. या काही महत्वाच्या पदव्या आहेत.


२. आंबेडकरांनी लिहिलेले महत्वाचे ग्रंथ : 


Caste in Hindu (1916), The problem of Rupee (1923), Annhilation of Caste (1935), Federation Versus Freedom (1939), Ranade, Gandhi and Ginnah (1943), Communal Deadlock and a Way to solve it (1945), What congress and Gandhi have done to the untouchables? (1945), Pakistan or Partition of India (1945), State and Minorities (1947), Maharashtra as a Linguistic state (1948), The untouchable (1948), Who were shudra (1945), Buddha and his Dhammas (1957).


३. डॉ. आंबेडकरांनी सुरु केलेली वर्तमानपत्रे : 


मूकनायक (१९२०), बहिष्कृत भारत (१९२७), समता (१९२८), जनता (१९३०), प्रबुद्ध भारत (१९५६, जनताचे नामांतर).



४. महत्वाचे सत्याग्रह / आंदोलने : 


महाडचे चवदार तळे सत्याग्रह, (२० मार्च १९२७), मनुस्मृती दहन (२५ डिसेंबर १९२७), शेतकऱ्यांची चळवळ (१९२८), पर्वती देवालय प्रवेश (१९२९), काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह (१९३१), पुणे करार (१९३२), येवला परिषद (१९३५), बौद्ध धर्मात प्रवेश (१४ ऑक्टोबर १९५६), बावीस प्रतिज्ञा.


५. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या महत्वपूर्ण संस्था/संघटना :


बहिष्कृत हितकारिणी सभा (१९२४), समता सैनिक दल (१९२७), स्वतंत्र मजूर पक्ष (१९३६), शेड्युल कास्ट फेडरेशन (१९४२), पिपल्स एज्युकेशन सोसायटी (१९४५), भारतीय बौद्ध महासभा (१९५५).



६. बाबासाहेब आंबेडकरांच्या गाजलेल्या घोषणा : 


‘मी अस्पृश्य जातीत जन्माला आलो, ते माझ्या हाती नव्हते. हिंदू म्हणून मी जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही’.

‘जे आपला इतिहास विसरतात ते कधीही इतिहास घडवू शकत नाहीत’

‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’

‘स्वातंत्र, समता, बंधुता शिकवणाराच धर्म मला प्रिय वाटतो’

‘जीवन हे मोठे असण्यापेक्षा महान असायला हवे’


७. बाबासाहेबांना मिळालेले पुरस्कार / सन्मान : 


१९५५ मधील काठमांडू येथील जागतिक बौद्ध परिषदेत ‘बोधीसत्व’ ही उपाधी प्रदान, १९९० मध्ये ‘भारतरत्न’ हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आला.


८. बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू :


चित्रकार : बी. आर. मडिलगेकर यांच्याकडून त्यांनी चित्रकलेचे प्रशिक्षण घेतले होते. बाबासाहेबांना व्हायोलिन वाजवण्याचीही आवड होती.

पत्रकार : ‘ज्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो त्यासाठी वर्तमानपत्र त्यांचा आवाज होऊ शकते असे सांगणाऱ्या’ बाबासाहेबांचे नाव तत्कालीन ब्राह्मणेतर पत्रकारितेत अग्रस्थानी घेतले जाते.

राजकारणी : बाबासाहेब भारताच्या राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. तसेच ते स्वतंत्र भारताचे पहिले मजूर मंत्रीही होते.

अर्थतज्ज्ञ : ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या त्यांच्या ग्रंथातून प्रेरणा घेऊन १९३५ साली भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली.

तत्वज्ञ : स्वातंत्र, समता आणि बंधुता या तत्वांवर विश्वास ठाम विश्वास असणाऱ्या बाबासाहेबांनी हीच तत्वे राज्यघटनेत समाविष्ट केली.


९. बाबासाहेबांच्या कार्याबद्दल फारशा चर्चिल्या न गेलेल्या गोष्टी : 


दुसऱ्या महायुद्धानंतर भारताची आर्थिक घडी बसवण्यात बाबासाहेबांचे मोठे योगदान होते. त्यासाठी नेमलेल्या रिकन्स्ट्रक्शन कमिटी ऑफ काऊन्सिलचे (आरसीसी) सदस्य होते. तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी त्यांच्यावर सिंचन आणि विजेच्या प्रश्नांबाबत जबाबदारी सोपवली होती., ‘दामोदर नदी खोरे’ आणि ‘सोने नदी खोरे’ प्रकल्प तसेच देशातील सर्वात मोठ्या ‘हिराकुड धरण’ प्रकल्पाचे काम बाबासाहेबांच्या अखत्यारित झाले. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेत आणि लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एलआयसी)च्या स्थापनेत बाबासाहेबांचा मोठा वाटा होता. ‘जय भीम’ या घोषणेनंतर देशात ‘जय हिंद’ ही घोषणा सुरु झाली.


१०. बाबासाहेबांचे लेखन : 


भारतातील कोणत्याही राजकीय नेत्याने केले नाही एवढे प्रचंड लेखन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले आहे. पूर्ण झालेले एकूण २२ ग्रंथ आणि पुस्तिका, १० अपूर्ण राहिलेले ग्रंथ, १० निवेदने किंवा साक्षीपुरावे, १० शोधनिबंध, लेख आणि परीक्षणं इतके प्रचंड लिखाण डॉ. आंबेडकरांनी केले आहे. विशेष म्हणेज त्यांनी हे सर्व लिखाण इंग्रजीतून केलेले आहे.