Ads

20 June 2024

भारतातील महाजनपदे

Mpsc History

भारतातील महाजनपदे:

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

संघटीत राज्यव्यवस्थेचा उद्य :

आर्य लोकांनी भारतात टोळ्यांच्या रूपांने प्रवेश केला. कालांतराने त्यांच्या संघर्ष सुरू झाला. प्रराक्रमी टोळ्यांच्या नेत्यांनी राज्यव्यवस्था निर्माण केली. ही राज्ये जनपदे आणि महाजनपदे म्हणून ओळखली जात असे.

भारतीय वेद, पुराण, रामायण, महाभारत जैन आणि बौद्ध ग्रंथाच्या अभ्यासावरून इसवी सन पूर्व सहाव्या शतकात भारतात अंग (उत्तर बिहार), मगध (दक्षिण बिहार), कोसी (बनारस), कोसल (आयोध्या), विदेह (उत्तर बिहार), मल्य (गोरखपूर), चेंदी (बुंदेलखंड), वस्त (अलाहाबाद), कुरू (दिल्ली व मीरत), पांचाल (बरेली), मस्त्य (जयपूर), अश्मक (गोदावरीचा भाग), अवंती (माळवा), गांधार (अफगाणिस्थान), सुरसेन (मथुरा), कुंभोज (दक्षिण पश्चिम क्षेत्र) असे एकूण सोळा महाजनपदे होती असा उल्लेख मिळतो.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

महाजपदकालीन राज्यव्यवस्था :

महाजनपदकालीन राज्य व्यवस्था ही राजेशाही पद्धतीची होती. राज्यकारभाराच्या प्रक्रियेत राजा हा सर्वात वरच्या स्थानी असला तरी, बहुतांशी निर्णय खालील संस्थांमार्फत घेतले जात असे.

गणपरिषद – ही राज्यातील ज्येष्ठ लोकांची परिषद असे. राज्यातील सर्वोच्च अधिकार व राज्यकारभाराचे अधिकार गणपरिषदेकडे असे.

कार्यकारी मंडळ – राज्याचा दैनंदिन कारभार चालविण्याकरिता कार्यकारी मंडळ असे.
सभासद कार्यकारी मंडळामध्ये प्रस्ताव मांडीत आणि त्यावर बहुमताने निर्णय घेतला जात असे.


❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

पराक्रमी राज्ये :

कालांतराने गणपरिषदेचे महत्व कमी होवून राजेशाहीला महत्व प्राप्त झाले.
या राजेलोकांच्या विस्तारवादी धोरणामुळे काही महाजनपदे विशेष प्रसिद्धीला आली. त्यामध्ये कोसल, वत्स, अवंती आणि मगध विशेष नावारूपास आली.
कोशल – हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळ आणि उत्तरप्रदेश यामधील भाग म्हणजे कोसल होय.
साकेत ही या राज्याची राजधानी होती.

कोसलचा राजा प्रसेनजित हा गौतम बुद्धाच्या समकालीन होता. या राजाचा मगध साम्राज्याचे पराभव करून कोसल आपल्या राज्यात समाविष्ट केले.
वत्स – अलाहाबाद जवळील प्रदेश हा वत्स राज्याची राजधानी कौशांबी म्हणून ओळखला जात असे. हे शहर त्या काळात तलम रेशमी कापडाकरिता जगप्रसिद्ध होते.

अवंती – आजचे उज्जैन शहर हे अवंतीची राजधानी होती. हे शहर त्या काळात व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्धीला आले होते.
मगध – गंगा व शोण नदीच्या खोर्‍यातील परीसरात मगध राज्य पसरले होते.

बिहारमधील राजगृह हे या राज्याची राजधानी होती. या ठिकाणी होवून गेलेल्या पराक्रमी राजे लोकांनी मगध साम्राज्य नावारूपास आणले.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

बिंबिसार :

बिंबिसार हा मगध राज्याचा पहिला पराक्रमी राजा होवून गेला.
त्याने आपल्या विस्तारवादी धोरणामुळे काशी, अंग, मंद्र, अवंती आणि कोसल राजांचा पराभव करून ती राज्ये मगध साम्राज्यात सामील केली.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

अजातशत्रू :

हा राजा गौतम बुद्धाच्या समकालीन, असून त्याने अनेक गणराज्य आपल्या साम्राज्यात सामील करून घेतली.
या राजाने जैन व बौद्ध धर्माला राजाश्रय दिला.
पहिली धर्मपरिषद अजातशत्रूने राजगृह येथे बोलाविली होती.

शिशुनाग :

या राजाने उत्तर भारतातील सर्व गणराज्ये एकत्र करून समर्थशाली मगध साम्राज्य निर्माण केले.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

नंद राजे (इसवी सनपर्व 364 ते 324) :

या काळात मगध राज्यात पराक्रमी नंद घराने नावारूपास आले. या घराण्यातील राजे लोकांनी आपल्या साम्राज्याचा विस्तार तक्षशिला ते हिमालय आणि कर्नाटक पर्यंत केला होता.

या काळात मगध साम्राज्य प्राचीन भारताच्या इतिहासातील पहिले साम्राज्य म्हणून ओळखले जाते.
या घराण्यातील शेवटचा राजा म्हणजे धनानंद होय.
नंद राजांच्या काळातच भारतात परकीयांनी आक्रमण करण्यास सुरुवात केली होती.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

परकीय आक्रमणे :

भारतातील संपत्तीचे वर्णन ऐकूण बर्‍याच परकीय राजांनी भारतावर आक्रमण केले आणि भारतातील संपत्ती लुटून नेली.

प्राचीन काळापासून संपत्तीच्या परकीय राजांनी भारतावर आक्रमण केले आहे.

भारतात पहीले परकीय आक्रमण मगध साम्राज्याच्या उदयाच्या काळात झाले.

इराणचा राजा डार्युश राजाचे आक्रमण :

मगध साम्राज्याच्या उदयाच्या काळात इराणचा सम्राट दार्युश ने वायव्यकडील गांधार व सिंध प्रांतावर आक्रमण करून ते प्रदेश जिंकले.

भारतावर आक्रमण करणारा तो पहिला परकीय होता.
या घटनेमुळे भारत व इराण यांच्यात राजनेतिक संबंध प्रस्तापित होवून व्यापर व कलेच्या क्षेत्रात देवाण घेवाण सुरू झाली.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

अलेक्झांडर उर्फ सिकंदरचे आक्रमण (इसवीसन पूर्व 326) :

ग्रीक राजा सिकंदरने इराणच्या राजाचा पराभव केला. त्यानंतर त्याने भारतावर आक्रमण केले.
सिकंदरने सिंधु नदी ओलांडून गांधार प्रांतात प्रवेश केला. त्यांच्या सेनेने रावी नदीच्या तीरावर असलेल्या पुरू राजाचा पराभव केला.

मगध पर्यत मात्र तो येवू शकला नाही.
भारतातून माघारी जात असतांना इसवी सन पूर्व 323 मध्ये बॉबिलान येथे मरण पावला.
सिकंदरच्या स्वारीमुळे भारत व ग्रीक यांच्या राजनैतिक संबंध प्रस्तापित झाले.

ग्रीकांच्या शिल्पकलेचा भारतीय शिल्पकलेवर प्रभाव पडून त्यामधून गांधार शिल्पकला शैली उदयास आली.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

महाजनपदे आणि त्यांच्या राजधानीची नगरे :



१. काशी - वाराणसी
२. कोसल - श्रावस्ती
३. अंग - चंपा
४. मगध - गिरीव्रज / राजगृह

५. वृज्जी / वज्जी - वैशाली
६. मल्ल / मालव - कुशिनार / कुशीनगर
७. चेदि - शुक्तिमती / सोध्थिवती
८. वंश / वत्स - कौशांबी

९.  कुरु - इंद्रप्रस्थ / इंद्रपट्टण
१०. उत्तर पांचाल - अहिच्छत्र,
       दक्षिण पांचाल -कांपिल्य
११. मत्स्य - विराटनगर
१२. शूरसेन - मथुरा

१३. अश्मक / अस्सक-पोटली / पोतन / पोदन
१४. अवंती - उज्जयिनी आणि महिष्मती
१५.  गांधार - तक्षशिल
१६.  कंबोज - राजपूर

वैदिक काळ आणि महाजनपदे

वैदिक काळ....
वेद हे आर्य धर्माच्या मूलस्थानी आहेत.वेद हे अनादी आहेत म्हणजे काय या प्रश्नाची चर्चा आधुनिक कालखंडात सुरू झाली.विशेषतः वेदांच्या अभ्यासाकडे जेंव्हा पाश्चात्य लोकांना आपले लक्ष वळविले तेंव्हा इतर गोष्टींच्या बरोबरच त्यांनी वेदांच्या कालनिर्णयाकडे चर्चा सुरू केली.

ख्रिस्ती शकापूर्वी १००० वर्षाच्या पलीकडच्या काळात वेदरूपी काव्ये रचली असावीत असे दिसते. वैदिक साहित्य भारताच्या सर्वाधिक प्राचीन साहित्य असल्याचे मानले जाते. वैदिक साहित्याची भाषा संस्कृत आहे. चार वेद म्हणजे वैदिक साहित्याचा मूळ गाभा आहे. या वेदान्च्या ग्रथाना 'संहिता' असे म्हणतात.'विद्' म्हणजे जाणणे आणि 'वेद' म्हणजे 'ज्ञान' असा अर्थ आहे. वेद मौखिक परम्परेने जतन केले गेले.[१७]

आजच्या बिहारमधील नालंदा विद्यापीठ हे जगातील सर्वांत पहिले बौद्धविद्यापीठ मानले जाते .


__________________________________
महाजनपदे .......

गौतम बुद्ध आपल्या शिष्यांना उपदेश करताना

सोळा प्रमुख महाजनपदे

नालंदा विद्यापीठ हे जगातील सर्वांत पहिले विद्यापीठ मानले जाते
वैदिक काळाच्या शेवटच्या काळात ज्यांचा महाभारतात उल्लेख आहे अशी प्राचीन भारताच्या राज्ये महाजनपदे म्हणून उदयास आली. यांचे वेदांमध्ये, बौद्ध व जैन धर्माच्या साहित्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख आढळतात. मगध,काशी, कोसल, अंग, मल्ल, चेदी, वत्स , कुरु पांचाल, मत्य, शूरसेन, आसक, अवंती, गांधार, कंबोज अशी १६ प्रमुख महाजनपदे साधारपणे इसपूर्व १००० ते ५०० च्या आसपास अस्तित्वात होती. यांचा विस्तार आधुनिक अफगणिस्तानपासून ते बंगालपर्यंत तर दक्षिणेकडे महाराष्ट्रपर्यंत होता व सर्व प्रमुख महाजनपदे ही गंगा नदीच्या खोऱ्यात होती. सिंधू संस्कृती नंतरचे मोठे नागरीकरण या काळात झाले.

या महाजपदांहून वेगळे अशी अनेक लहान सहान राज्ये भारतीय उपखंडात सर्वत्र पसरली होती. बहुतांशी त्यांचे अधिपत्य वांशिक असे तर काही वेळा निवडीप्रमाणे असे. शिकण्याची प्रमुख भाषा संस्कृत होती तर बोलीभाषा अनेक असण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात प्राकृत ही प्रमुख बोली भाषा बोलली जात होती. मराठी व हिंदी भाषांचे मूळ प्राकृत भाषेत असण्याची शक्यता आहे. लहान सहान राज्ये व जनपदे ही चार प्रमुख महाजनपदांच्या अधिपत्याखाली होती. ती म्हणजे कोसल, अवंती,मगध व वत्स.[१८]

वैदिक काळात हिंदू धर्म असा अस्तित्वात नव्हता,वैदिक पूजा- पाठ पद्धतींवर पुजारी वर्गाचे वर्चस्व होते.वैदिक धर्मातूनच पुढे हिंदू धर्माचा उदय झाला. महाजनपदांच्या काळात भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचा हिस्सा असणाऱ्या तत्त्वज्ञानाचा विकास झाला, उपनिषदे व इतर वेदोत्तर साहित्यामधून त्याकाळी आलेले प्रचंड मोठे वैचारिक बदल दर्शावतात. द्वैत अद्वैतवाद्, तसेच नास्तिकवाद, पदार्थवाद, अजिविकवाद इत्यादी मतप्रवाह त्याकाळी अस्तित्वात होते, जैन धर्म व बौद्ध धर्माची तात्त्विक बांधणी याच सर्व तत्कालीन ऊहापोहाचा निकाल आहे असे मानतात.हे भारताचे वैचारिक सुवर्णयुग होते असे मानतात.

गौतम बुद्धांना इसपूर्व ५३७ मध्ये आत्मज्ञानाचा साक्षात्कार झाला व ते बुद्ध म्हणून ओळखले जाऊ लागले. याच सुमारास जैनांचे २४ वे तीर्थंकर महावीर यांनाही महानिर्वाण स्थिती प्राप्त झाली. बौद्ध धर्माची व जैन धर्माची सुरुवात झाली.[२०] जैन धर्मियांच्या श्रद्धे प्रमाणे त्यांचीही परंपरा जुनी आहे. वेदांमध्येही काही जैन तीर्थंकरांचा संदर्भ आढळतो[२१]

बुद्ध धर्माची व जैन धर्माच्या शिकवणीत जी साध्या व विरक्त राहणीची शिकवण होती ती जनसामान्यांमध्ये लवकर पसरली. तसेच त्याचा उलटा प्रभाव वैदिक परंपरांवरही पडला, शाकाहार, अहिंसा हे भारतीय संस्कृतीचे महत्त्वाचा भाग बनले. जैन धर्माचा प्रभाव भारतापुरतेच मर्यादित राहिला तर बौद्ध भिक्कूंनी बौद्ध धर्म भारताबाहेरही पसरवण्यास मदत केली.

जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

💐 मासे कोणत्या इंद्रियाद्वारे श्वसन करते ?

🎈कल्ले.


💐 आध्रप्रदेशातील नृत्यशैली कोणती ?

🎈कचिपुडी.


💐 सत्री - पुरूष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला ?

🎈ताराबाई शिंदे.


💐 भारताच्या प्रथम महिला लोकसभा सभापती कोण ?

🎈मीरा कुमार.


💐 महाराष्ट्रातील विमान कारखाना कोठे आहे ?

🎈ओझर मिग.( नाशिक )


💐 महाराष्ट्र राज्याची पूर्व - पश्चिम लांबी किती आहे ?

🎈८०० किमी.


💐 चिल्का हे खारया पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे ?

🎈ओरिसा.


💐 चित्रनगरी हे मराठी चित्रपट निर्मितीचे केंद्र कोठे आहे ?

🎈कोल्हापूर.


💐 ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे ?

🎈बीड.


💐 चदनाचे सर्वांधिक उत्पादन कोठे होते ?

🎈कर्नाटक.



1). नुकतीच बातमीत असलेली "फ्लोर टेस्ट" म्हणजे काय?

उत्तर - विधिमंडळात बहुमत दाखवणे


2). एशियन ट्रॅक सायकलिंग चॅम्पियनशिप 2022 मध्ये कोणत्या देशाने अव्वल स्थान पटकावले आहे?

उत्तर - जपान


3). दरवर्षी आंतरराष्ट्रीय नाविक दिन कधी साजरा केला जातो?

उत्तर - 25 जून


4). भारताने अलीकडेच पृष्ठभागावरून हवेत मारा करणाऱ्या VL-SRSAM क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोठे केली?

उत्तर - ओडिशा


५). कोणत्या देशाने अलीकडेच फ्रेंच रॉकेटने "GSAT-24" उपग्रह प्रक्षेपित केला आहे?

उत्तर भारत


६). कोणत्या देशाच्या सिनेटने नुकतेच बंदूक नियंत्रण विधेयक मंजूर केले आहे?

उत्तर अमेरीका


7) नुकतेच NITI आयोगाचे नवीन CEO कोण बनले आहे?

उत्तर - परमेश्वरन अय्यर


8). अलीकडे चर्चेत असलेली 'वरदा नदी' ही कोणत्या नदीची उपनदी आहे?

उत्तर - तुंगभद्रा नदी


💐 कजीबी कोणत्या देशाची गुप्तचर संस्था आहे ?

🎈रशिया.


💐 राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा केला जातो ?

🎈२५ जानेवारी.


💐 डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?

🎈सोनेगांव. ( नागपूर )


💐 मौर्य वंशाचे शेवटचे राजा कोण होते ?

🎈बहद्रथ.


💐 सयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय कोठे आहे ?

🎈नयूयॉर्क.


💐 दौलताबाद किल्ला कोठे आहे ?

🎈औरंगाबाद.


💐 चीन या देशाचा राष्ट्रीय खेळ कोणता ?

🎈टबल टेनिस.


💐 विवेकसिंधू हा ग्रंथ कोणी लिहिला ?

🎈मकुंदराज.


💐 शरीराचे तापमान मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात ?

🎈थर्मामीटर.


💐 आयझॅक न्यूटन कोणत्या देशाचे शास्त्रज्ञ होते ?

🎈इग्लंड.


💐 हिरोशिमा व नागासाकी ही शहरे कोणत्या देशात आहे ?

🎈जपान.


💐 दिवस व रात्र कोठे समान असतात ?

🎈विषुववृत्त.


💐 जागतिक अन्न व कृषी संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?

🎈रोम.


💐अलेक्झांडर उर्फ सिंकदर यांच्या गुरूचे नाव काय होते ?

🎈अरिस्टॅटल.


💐 छत्रपती संभाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते ?

🎈सईबाई.


💐 कदारनाथ प्राचीन मंदीर भारतातील कोणत्या राज्यात आहे ? 

🎈उत्तराखंड.


💐 'मेरा भारत महान' हा नारा कोणी दिला ?

🎈राजीव गांधी.


💐 ऑस्कर पुरस्काराची सुरूवात कधी झाली ?

🎈१९२९ मध्ये.


💐 नर्मदा नदी कोठे जाऊन मिळते ?

🎈अरबी समुद्र.


💐 'काॅस्टिक सोडा' याचे शास्त्रीय नाव काय आहे ?

🎈सोडियम हायड्राक्साइड.


महाराष्ट्राचा इतिहास

*⭕️ मौर्य ते यादव ⭕️*


*(इ.स.पू. २२० ते इ.स. १३१०)*



*👉 मौर्य साम्राज्याचा काळ*


महाराष्ट्राचा कोकण विभाग हा प्राचीन काळांत मौर्य साम्राज्याच्या (इ.स.पू. ३२१-१८४) हिस्सा होता. या काळात महाराष्ट्राने भरभराटीचा व्यापार आणि बौद्धधर्माचा विकास पाहिला. पण मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासाबरोबर महाराष्ट्रावरील मौर्य सत्ता संपुष्टात आली, आणि या प्रदेशावर निरनिराळ्या घराण्यांची सत्ता प्रस्थापित होऊ लागली.



*👉 सातवाहन साम्राज्याचा काळ*


सातवाहन हे महाराष्ट्राचे पहिले ज्ञात राजघराणे होय. त्यांचा काळ इ.स.पू. साधारणतः २२० ते इ.स. २२५ पर्यंतचा मानला जातो. अर्थात या कालखंडाबाबत मतभेद आहेत. प्रतिष्ठान अथवा पैठण ही त्यांची राजधानी आणि सिम्मुक सातवाहन हा या घराण्याचा मूळ पुरुष. महाराष्ट्राच्या राजकीय. सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने सातवाहनांचा कालखंड हा अतिशय महत्त्वाचा गणला जातो. सातव्या शतकातील हाल राजाने महाराष्ट्री प्राकृत भाषेत संकलित केलेले गाथासप्तशती हे काव्य ही सातवाहनांची साहित्याला मोठी देणगी. हिंदूंचा शालिवाहन शक सातवाहनांनीच सुरू केला.



*👉 वाकाटकांचा काळ*


वाकाटक (इ.स. २५० ते ५२५) राजांनी विदर्भ आपल्या वर्चस्वाखाली आणला होता. वाकाटक काळात राजाश्रयामुळे महाराष्ट्राची साहित्य, कला आणि धर्म या क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती झाली. अजिंठ्याची १६, १७, १९ या क्रमांकांची लेणी ही वाकाटक काळातील आहेत. भित्ति-चित्रांची कला या काळात अतिशय विकसित झाली होती.



*👉 कलाचुरींचा काळ*


वाकाटकांनंतर कलचुरी राजघराण्याने इसवी सनाच्या सहाव्या शतकात महाराष्ट्राच्या काही भागांवर राज्य केले. महिष्मती ही त्यांची राजधानी होती.



*👉 बदामी चालुक्य आणि कल्याणी चालुक्यांचा काळ*


वाकाटकांचे महत्त्वाचे राजघराणे म्हणजे चालुक्यांचे. महाराष्ट्राचा भूप्रदेश त्यांच्याकडे इ.स. ५५० ते ७६० आणि इ.स. ९७३ ते ११८० या दोन कालखंडांत होता. जयसिंह हा या घराण्याचा संस्थापक आणि बदामी ही त्याची राजधानी. त्रैमहाराष्ट्रिकाचा स्वामी आणि या घराण्याचा सर्वश्रेष्ठ राजा दुसरा पुलकेशी याने नाशिक येथे आपले महत्त्वाचे ठाणे केले होते. चालुक्य राजे हिंदू धर्माचे अभिमानी होते त्यांनी मंदिरे बांधण्याच्या कामी मौलिक कामगिरी केली होती.



*👉 वाकाटक, चालुक्य व राष्ट्रकूटांचा काळ*


वाकाटकांच्या(इस.२५०-५२५) राज्यात विदर्भ समाविष्ट झाला. या कालखंडात कला, धर्म व तंत्रज्ञानात प्रगती होत गेली. सहाव्या शतकात बदामीच्या चालुक्यांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता आली. दंतिदुर्ग या राष्ट्रकूट राजाने इ.स. ७५३ च्या सुमारास चालुक्यांचा पराभव केला आणि गुलबर्गा जिल्ह्यातील मान्यखेत (मालखेड) आपली राजधानी बनविली. कल्याणी शाखेच्या तैलप चालुक्याने इ.स. ९७३ च्या सुमारास राष्ट्कूटांची सत्ता संपुष्टात आणून चालुक्यांची राजवट दुसऱ्यांदा प्रस्थापित केली. वेरूळ येथील जगप्रसिद्ध कैलास लेणे हे पहिला कृष्ण या राष्ट्रकूट राजाने बांधले.



*👉 यादवांचा काळ*


महाराष्ट्राच्या काही भागावर कल्याणीच्या चालुक्यांची सत्ता इ.स.११८९ पर्यंत टिकली. यादवांनी त्यांचा पराभव केला व इ.स. १३१०पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. गोव्याचे कदंब, कोकण आणि कोल्हापूर येथील शिलाहार राजे हे चालुक्य आणि राष्ट्रकूट यांचे मांडलिक म्हणून राज्य करीत होते. यादवांनी त्यांची सत्ता संपुष्टात आणली. यादवांनी महाराष्ट्राचा बराचसा भाग आपल्या आधिपत्याखाली आणला होता. यादव राजांनी धार्मिक सहिष्णुतेचे धोरण अवलंबिले होते. त्यांनी मराठी भाषेला राजाश्रय दिला आणि तिला राजभाषेचा दर्जा प्राप्त करून दिला. भक्तिसंप्रदायाचे उद्‌गाते आणि महाराष्ट्राचे सर्वश्रेष्ठ संतकवी ज्ञानेश्वर महाराज हे याच यादव काळात उदयास आले. नवव्या शतकात नाशिक जिल्ह्यांतील चांदोर या ठिकाणी यादवांची पहिली राजधानी होती. इ.स. ११८७ च्या सुमारास भिल्लम राजाने ती देवगिरी येथे आणली.

परमुख राजवंश आणि संस्थापक



▪️ हर्यक वंश                    - बिम्बिसार


▪️ नन्द वंश                      - महापदम नन्द


▪️ मौर्य साम्राज्य              - चन्द्रगुप्त मौर्य


▪️ गप्त वंश                      - श्रीगुप्त


▪️ पाल वंश                      - गोपाल


▪️ पल्लव वंश                   - सिंहविष्णु


▪️ राष्ट्रकूट वंश                  - दन्तिदुर्ग


▪️ चालुक्य-वातापी वंश     - पुलकेशिन प्रथम


▪️ चालुक्य-कल्याणी वंश  - तैलप-द्वितीय


▪️ चोल वंश                      - विजयालय


▪️ सन वंश                       - सामन्तसेन


▪️ गर्जर प्रतिहार वंश         - हरिश्चंद्र/नागभट्ट


▪️ चौहान वंश                  - वासुदेव


▪️ चदेल वंश                    - नन्नुक


▪️ गलाम वंश                  - कुतुबुद्दीन ऐबक


▪️ खिलजी वंश  - जलालुद्दीन फिरोज ख़िलजी


▪️ तगलक वंश                - गयासुद्दीन तुगलक


▪️ सयद वंश                    - खिज्र खान


▪️ लोदी वंश                    - बहलोल लोदी


▪️ विजयनगर साम्राज्य     - हरिहर / बुक्का


▪️ बहमनी साम्राज्य          - हसन गंगू


▪️ मगल वंश                    - बाबर

महत्त्वाचे आहे सर्व वाचून काढा

महत्वाच्या विकास योजना


1. रोजगार हमी योजना :

सुरुवात – 1952

उद्दिष्ट – ग्रामीण विकास घडवून आणण्यासाठी सर्वांगीण मदत करणे.

पार्श्वभूमी – श्री.वि.स. पागे यांच्या शिफारशीवरून 1965 मध्ये सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात ही योजना राबविली त्यानंतर 1969 मध्ये काही निवडक भागात प्रयोगिक तत्वावर ही योजना लागू करण्यात आली.

26 जानेवारी 1978 रोजी महाराष्ट्र शासनाने रोजगार हमी कायदा करून ही योजना सर्व महाराष्ट्रभर लागू केली.

रोजगाराची हमी देणारा भारतातील प्रथम प्रयोग.

‘मागेल त्याला काम’ तत्वावर ही योजना सुरू केली.

योजनेचे स्वरूप :

शक्यतो शारीरिक कष्टाची कामे असतात.

या योजनेसाठी 6 मार्गानी पैसा उपलब्ध होतो.

18 वर्षावरील स्त्री-पुरूषांना कामे दिली जातात.

मजुरी दर आठवड्याला दिली जाते.

कामे कामगाराच्या घरापासून 8 कि.मी. अंतराच्या आत असतात.


2. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम (I.R.D.P.)

सुरुवात – 1978

उद्दिष्ट – ग्रामीण भागाचा एकत्रित विकास करणे.

स्वरूप –

जे लोक दारिद्र्य रेषेखाली जीवन जगतात त्याच्या सामाजिक व आर्थिक स्थितीत बदल घडवून आणणे.

हा कार्यक्रम चालविण्यासाठी केंद्र – राज्य 50:50 या प्रमाणात खर्च करतात.

महाराष्ट्रात हा कार्यक्रम 2 ऑक्टोंबर 1980 पासून सर्व पंचायत समित्यामध्ये सुरू आहे.


3. अवर्षण प्रवण विभाग कार्यक्रम (D.P.A.P.)

सुरुवात – 1974-75

उद्दिष्ट – राज्यातील दुष्काळी भागातील लोकांना दुष्काळाशी यशस्वीरीत्या मुकाबला करता यावा.


4. ग्रामीण युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण योजना (TRYSEM)

सुरुवात – 15 ऑगस्ट 1979

उद्दिष्ट – ग्रामीण भागातील तरुणांना स्वयंरोजगार करता यावा. यासाठी त्यांना शेती व शेती संबंधित व्यवसायाचे प्रशिक्षण देणे.

स्वरूप –

ही योजना IRDP चा विस्तारित भाग आहे.

लाभार्थी हा 15 ते 35 वयोगटातील असावा.

प्रशिक्षण कालावधी 6 महिने असतो.

प्रशिक्षित तरुणांना अर्थसाहाय्य व 10,000 रु. पर्यंत कर्ज मिळू शकते.


5. जवाहर रोजगार योजना (JRY)

सुरुवात – 1 एप्रिल 1989

उद्दिष्ट – ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करणे.

स्वरूप –

या योजनेचे मूळ रोजगार हमी योजनेत आहे.

ही योजना राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम व ग्रामीण भूमीहीन रोजगार हमी कार्यक्रम यांचे विलीनीकरण करून तयार केली आहे.

या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील किमान एका व्यक्तीस वर्षातील किमान 100 दिवस रोजगार मिळेल याची हमी दिली जाते.

या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी ग्रामपंचायत करते.

या योजनेवर होणारा खर्च 80% केंद्र सरकार व 20% राज्य सरकार करते.    


6. नेहरू रोजगार योजना

सुरुवात – 1989-90 शहरी भागाचा विकास

उद्दिष्ट – नागरी भागातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे.


7. संजय गांधी निराधार योजना

सुरुवात – 2 ऑक्टोंबर 1980

उद्दिष्ट – स्वत:चा उदरनिर्वाह करू न शकणार्‍या निराधार व्यक्तींना आर्थिक सहाय्य करणे.


8. संजय गांधी स्वावलंबन योजना

सुरुवात – 2 ऑक्टोंबर 1980

उद्दिष्ट – स्वयंरोजगार करण्यासाठी लाभार्थीना कर्ज उपलब्ध करून देणे.


9. श्रमशक्तीतून ग्राम विकास

सुरुवात – 22 जून 1989

उद्दिष्ट – गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी रोजगार उपलब्ध करून देणे.

ही योजना हमी योजनेअंतर्गत राबविली जाते.


10. फलोत्पादन विकास योजना

सुरुवात – 21 जून 1990

उद्दिष्ट -राज्यात जास्तीत जास्त फळांची लागवड करणे.

ही योजना रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविली जाते.

ही योजना राबविण्याची अंतिम जबाबदारी जिल्हाधिकारी यांची असते.


11. श्रमजीवी कुटुंब कल्याण योजना

सुरुवात – 1 ऑगस्ट 1982

उद्दिष्ट – अपघातात मृत्यू पावणार्‍या अथवा अपंग होणार्‍या असंरक्षित कुटुंबियांना अर्थसहाय्य करणे.


12. इंदिरा गांधी भूमिहीन वृद्ध शेतमजूर सहाय्य योजना

सुरुवात – 19 नोव्हेंबर 1991

उद्दिष्ट – 65 वर्षावरील पुरुष व 60 वर्षावरील स्त्रियां की ज्यांना काम होत नाही अशा व्यक्तींना अर्थसहाय्य देणे.


13. पीक विमा योजना

सुरुवात – 1985

उद्दिष्ट – शेतकर्‍यांच्या पीकांचा विमा उतरविणे. ज्यामुळे अवर्षण काळात शेतकर्‍यांना आर्थिकसहाय्य मिळते.


14. पंतप्रधान रोजगार योजना

सुरुवात – 1994-95

उद्दिष्ट – बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगार करण्याकरिता अर्थसहाय्य करणे.


15. इंदिरा आवास योजना

सुरुवात – 1985

उद्दिष्ट – दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाना पक्की घरे बाधण्यासाठी आर्थिक मदत करणे.

शेवटचे 12 दिवस 📖 काय करावं ? काय वाचावं ?

जास्त मार्क मिळवून देणारे विषय 👇 करमानुसार 


1) Polity : यामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळू शकतात. जे काही वाचलय ते व्यवस्थित revise करा.  राज्यपाल, राज्यसभा, विधानपरिषद, आणिबाणी, राज्य-केंद्रशासीत प्रदेशांची निर्मिती, नागरिकत्व, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश, लोकपाल, विभागीय परिषदा, चर्चेतील कलमे जसे कलम 370, 371A to J, कलम-131, वित्त आयोग, मानवी हक्क आयोग, हिंदी भाषा , latest घटनादुरुस्त्या, अँग्लो इंडियन, SC-ST आरक्षण असे काही मुद्दे गेली 1-2 वर्ष चर्चेत होते , या घटकांवर प्रश्न विचारण्याची जास्त शक्यता आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, संसद, विधिमंडळ, पंतप्रधान, मुख्यमंत्री, घटनेची वैशिष्ट्य, घटना समिती, मुलभुत हक्क,  कर्तव्य, तत्त्वे इ यावर जास्त focus करा.


2) भूगोल : आतापर्यंत जे काही वाचलं असेल ते revise करा. State board ची 6 वी ते 12 वी ची पुस्तकं व्यवस्थित revise करा. 

भूगोल मध्ये असे काही घटक आहेत ज्यावर आयोग वारंवार प्रश्न विचारतो, जसे पृथ्वीची निर्मिती- सिध्दांत, भूकंप, ज्वालामुखी , अक्षवृत्ते, रेखावृत्ते , वारे, भूरूपे, 

भूगोल मध्ये विधान- कारण-स्पष्टीकरण,  जोड्या लावा असे प्रश्न जास्त असतात.


3) अर्थशास्त्र : यामध्ये 6-7 ठराविक टॉपिक आहेत ज्यावर हमखास प्रश्न असतात, जसे दारिद्र्य, बेरोजगारी,  लोकसंख्या, शाश्वत विकास, समावेशक योजना , चलनवाढ,  वेगवेगळे निर्देशांक- MPI, HDI, GHI, GDI इ. अशा गोष्टींवर जास्त focus करा.


4) चालू घडामोडी : फेब्रुवारी 2024 ते एप्रिल 2025 पर्यंतच्या घडामोडींवर जास्त focus करा.

त्यानंतरच्या घडामोडी एकदा नजरेखालून घाला. 

राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय, आर्थिक ,सामाजिक , विज्ञान- पर्यावरण यावर जास्त focus करा. 

Sports घडामोडी आगोदर काही वाचलं नसेल तर आता skip करू शकता .


5) विज्ञान  : या घटकांवर 20 प्रश्न असतात पण दर्जा थोडा अवघड असतो,  त्यामुळे जे वाचलय ते व्यवस्थित revise करा. State board + Ncert वाचलं असेल तर परत तेच करा. यामध्ये 12+ मार्क्स पण चांगले आहेत,  बऱ्याच जणांना एवढेच मार्क्स मिळवणं अवघड जातं.


6) इतिहास- प्राचीन- मध्ययुगीन साठी state board वाचा तेच revise करा, हडप्पा, महाजनपदे, बौद्ध-जैन धर्म,  मौर्य, गुप्त, हर्षवर्धन, सातवाहन, राजे- महाराजे- घराणे- उपाध्या, लढाया,  गुलाम घराणे, खिलजी, तुघलक, विजयनगर, बहामणी, मुघल, मराठे, ब्रिटिश-सत्ता स्थापना, भारतीय राज्यांबरोबरच्या लढाया व त्यादरम्यान केलेले तह जसे इंग्रज-मराठे, इंग्रज-म्हैसूर, इंग्रज-शीख  इ.  , काँग्रेस, गांधी युग, महत्त्वाच्या चळवळी , महत्त्वाचे समाजसुधारक, उठाव, 

शेवटच्या दिवसात ( इथून पुढे इतिहास विषयाला जास्त वेळ देऊ नये, त्याऐवजी, Polity, अर्थशास्त्र, भूगोल या विषयांना जास्त वेळ द्या) 


7) पर्यावरण  : 5 प्रश्न असतात, 1-2 प्रश्न करार कधी लागू केला- तारीख विचारली जाते, असे facts विचारले जातात,  Ipcc, COP परिषदा, ओझोन , वातावरणातील हरितगृह वायू यावर  बऱ्याचदा प्रश्न असतो,  

यावेळेस रामसर करार- स्थळे  व वाळवंटीकरणाविरूध्द करार UNCCD यावर प्रश्न विचारण्याची शक्यता आहे.


PYQ व विश्लेषण पुस्तक असेल तर ते व्यवस्थित 1-2 वेळेस वाचा यातून चांगल्या पध्दतीने Revision होईल.


आतापर्यंत जे काही वाचलं असेल ते revise करा, नवीन काहीही वाचू नका. 




सर्वाना ALL THE BEST ✌️

पोलीस भरती प्रश्नसंच

 (०१)  राज्य स्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?

उत्तर- मुख्यमंत्री.


(०२)  लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे ?

उत्तर- अरबी समुद्र.


(०३)  पारो विमानतळ कोणत्या देशात आहे ?

उत्तर- भूतान.


(०४) कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर- रायगड.


(०५)  रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोंठे सुरू झाली ?

उत्तर- महाराष्ट्र.


(०६)  अग्नीपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?

उत्तर- ए. पी. जे. अब्दुल कलाम.


(०७)  रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली ?

उत्तर- स्वामी विवेकानंद.


(०८)  जागतिक हास्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १० जानेवारी.


(०९)  रोमेश पठानिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- हाॅकी.


(१०)  भारतातील प्रथम महिला भारतरत्न कोण आहे ?

उत्तर- इंदीरा गांधी.

 

(११)  आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- डाॅ. नरेंद्र जाधव.


(१२)  भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वांत लहान राज्य कोणते ?

उत्तर- सिक्किम.


(१३)  जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो ?

उत्तर- २० फेब्रुवारी.


(१४)  अतनू दास हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- तिरंदाजी.


(१५)  भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण आहे ?

उत्तर- सरोजनी नायडू.


(१६)  चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- जयंत नारळीकर.


(१७)  महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर- सातारा.


(१८)  जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- २३ मार्च.


(१९)  नरेश कुमार हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- टेनिस.


(२०)  भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहे ?

उत्तर- मीरा कुमार.


(२१)  उचल्या हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- लक्ष्मण गायकवाड.


(२२)  'जन-गण-मन' हे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे ?

उत्तर- रविंद्रनाथ टागोर.


(२३)  जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- ७ एप्रिल.


(२४)  ओमप्रकाश दहिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- कुस्ती.


(२५)  भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला कोण आहे ?

उत्तर- आरती शहा.


(२६)  उपरा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- लक्ष्मण माने.


(२७)  भारताचे राष्ट्रपतीपद भूषविणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण ?

उत्तर- प्रतिभा पाटील.


(२८)  जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १७ मे.


(२९)  दीप्ती शर्मा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- क्रिकेट.


(३०)  भारतातील प्रथम महिला राजदूत कोण आहे ?

उत्तर- विजयालक्ष्मी.


(३१)  मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- अच्च्युत गोडबोले.


(३२)  कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वांत जास्त तेल असते ?

उत्तर- मका.


(३३)  जागतिक रक्तदान दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १४ जून.


(३४)  अदिती अशोक हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- गोल्फ.


(३५)  भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण आहे ?

उत्तर- कल्पना चावला.


(३६)  समिधा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- साधना आमटे.


(३७)  भारतातील सर्वांत मोठे प्राणीसंग्रहालय कोठे आहे ?

उत्तर- कोलकाता.


(३८)  जागतिक व्याघ्रदिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- २९ जुलै.


(३९)  मनू भाकर हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- नेमबाजी.


(४०)  दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती कोण आहे ?

उत्तर- रझिया सुलताना.


(४१)  नाशिक शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

उत्तर- गोदावरी.


(४२)  शिवसिंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- बाॅक्सिंग.


(४३)  भारतातील सर्वांत लांब नदी कोणती आहे ?

उत्तर- गंगा.


(४४)  राष्ट्रीय सांख्यिकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?

उत्तर- प्रा. सुरेश तेंडुलकर.


(४५)  जागतिक वनमहोत्सव दिवस कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १ आॅगस्ट.


(४६)  सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

उत्तर- कृष्णा.


(४७)  चिराग चंद्रशेखर शेट्टी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- बॅडमिंटन.


(४८)  भारतातील सर्वांत लांब लेणी कोणती आहे ?

उत्तर- अजिंठा.


(४९)  काक्रापारा अणुविद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे ?

उत्तर- गुजरात.


(५०)  जागतिक ओझोन दिवस कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १६ सप्टेंबर 

सहावी पंचवार्षिक योजना


☀️कालावधी➖1 एप्रिल 1980 ते 31 मार्च 1985
🔅भर➖दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती
🌀परतिमान➖अलन मान व अशोक रुद्र

🔥कार्यक्रम

⏩1980➖एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम
⏩1980➖राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम
⏩1983➖गरामीन भूमिहीन रोजगार हमी योजना

✍️1982➖गरामीण भागातील महिला व मुलाचा विकास(डेन्मार्क च्या मदतीने)

🔥दोन पोलाद प्रकल्प

🔘विशाखापट्टणम
🔘सालेम पोलाद

✍️15 एप्रिल 1980➖6 बँक राष्ट्रीयीकरण

🔘1982➖एक्सझीम बँक
🔘जलै 1982➖नाबार्ड

👉या दरम्यान देशाला अन्नधान्य बाबत स्वयंपूर्ण घोषित करण्यात आले
👉सर्वाधिक यशस्वी योजना मानली जाते

🔥वद्धी दर

👁‍🗨सकल्पित➖5.2 टक्के
👁‍🗨साध्य➖5.54 टक्के
________________________________

19 June 2024

𝐍𝐄𝐖𝐒 𝐁𝐎𝐎𝐒𝐓𝐄𝐑

❇️ भारतीय संघाचे फुटबॉल कोच इगोर स्टिमक यांना पदावरुन हटवण्यात आले

◾️ते क्रोएशियाई देशाचे आहेत
◾️2019 मध्ये त्यांना मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले होते
◾️कार्यकाळ मागच्यावर्षी एआयएफएफने वाढविला होता
◾️पुरुष संघाच्या निराशादायी कामगिरीचा आढावा घेतल्यानंतर सर्वसंमतीने क्रोएशियाचे 56 वर्षांचे स्टिमक यांना हटविण्याचा निर्णय घेण्यात आला

❇️ न्यूझीलँड वेगवान गोलंदाज "लोकी फर्ग्युसनने" 4 षटकांत एकही धाव न देता 3 बळी घेत विक्रम केला.
◾️आंतरराष्ट्रीय टी-२० मॅच मध्ये
◾️4 षटके धाव न देणारा तो दुसरा खेळाडू आहे
◾️पहिला खेळाडू  कॅनडाचा "साद बीन झफर" आहे
◾️मॅच : न्यूझीलँड Vs पापुआ न्यू गिनी

❇️ एस्टोनियाचा फलंदाज " साहिल चौहान" याने टी-२० क्रिकेटमध्ये "सर्वांत वेगवान शतक" ठोकले.
◾️27 चेंडूत 100 धावा
◾️27 चेंडूत 13 षटकार आणि 5 चौकारांसह 100 धावा
◾️ख्रिस गेलं चा 30 बॉल मध्ये 100 धावा रेकॉर्ड त्याने मोडला
◾️आंतरराष्ट्रीय सामन्यातील एका डावात सर्वाधिक 18 षटकार मारण्याचा विक्रम पण साहिल चौहान" त्याच्याच नावावर आहे
◾️भारताच्या ऋषभ पंतने टी-20 क्रिकेटमध्ये  32 चेंडूत शतक ठोकले आहे.

❇️ शिवाजी महाराजांनी शौर्य दाखवले ती वाघनखे इंग्लंडच्या म्युझियममधून आणण्यात येणार आहेत.
◾️जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात
◾️सातारा प्राचीन वस्तू संग्रहालयामध्ये आणणार
◾️सलग 10 महिने पहाण्यास उपलब्ध रहाणार

❇️ सर्वोत्कृष्ट शाळा पुरस्कारांसाठी 5 भारतीय शाळांची निवड
◾️इंग्लंडमध्ये वार्षिक जागतिक सर्वोत्तम शाळा पुरस्कारांसाठी शाळांची यादी करण्यात आली आहे.
◾️ जागतिक सर्वोत्तम शाळा पुरस्कारांसाठी विविध श्रेणींमध्ये 5 भारतीय शाळांची नावे अंतिम 10 मध्ये देण्यात आली आहेत.
⭐️ मध्य प्रदेशातील 2 शाळा
⭐️ दिल्ली 1 शाळा,
⭐️महाराष्ट्र 1 शाळा
⭐️ तामिळनाडूमधील 1 शाळा
◾️मुंबईतील पब्लिक स्कूल एल के वाघजी इंटरनॅशनल (IGCSE) या शाळेचा यात समावेश आहे
◾️शाळांना 50 हजार डॉलर बक्षीस निधी मिळणार आहेत
◾️इंग्लंडमधील T4 Education या संस्थेने कोविड काळात ही संकल्पना पुढे आणली होती

❇️ जगातील सर्वांत उंच पुलावरून ट्रेन धावली
◾️जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात हा पूल
◾️चिनाब नदीवर बांधला आहे
◾️सांगलदान ते रियासीपर्यंत पहिली चाचणी ट्रेन चालवली
◾️उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला लिंक (USBRL) प्रकल्प 272 किमीचा आहे आणि 209 किमी टप्प्याटप्प्याने कार्यान्ति झाला आहे.
◾️उंची : चिनाब नदीच्या वर 359 मीटर (सुमारे 109 फूट) 
◾️आयफेल टॉवरपेक्षा 35 मीटर उंच आहे.
‼️ आजच्या न्यूज पेपर मधील काही महत्वाच्या गोष्टी  दिल्या आहेत एवढ्या वाचून झोपा 😊🎆

-------------------------------------------

18 June 2024

𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫

❇️ पंजाब पोलीसांनी 'मिशन निश्चय' योजना सुरू केली आहे

◾️उद्देश : पंजाब पोलिसांनी ड्रग्जची मागणी आणि पुरवठा याबाबत गुप्तचर माहिती गोळा करण्यासाठी सीमावर्ती गावांमध्ये 'मिशन निश्चित' सुरू केले
◾️पंजाब पुलिस + BSF + गावातील समिती हे मिळून
◾️ 15 ते 21 जून दरम्यान राबविले जाणार आहे 
◾️सुरवात फाजिल्का जिल्ह्या ( पंजाब पासून)
◾️भारतातील सुमारे 42 गावांतील रहिवाशांपर्यंत हे अभियान राबविणार
◾️फाजिल्का जिल्हा : पाकिस्तानला लागून असलेल्या 553 किमी लांबीच्या पंजाब सीमेपैकी 108 किमी  जिल्ह्यात आहे.

❇️ काही महत्वाचे उत्सव लक्षात ठेवा
◾️रज महोत्सव : ओडीसा
◾️बन्नी महोत्सव - आंध्रप्रदेश
◾️लोसांग महोत्सव - सिक्किम
◾️सिग्मो महोत्सव - गोवा
◾️तानसेन महोत्सव - ग्वालियर, MP
◾️गीता महोत्सव - कुरुक्षेत्र, हरियाणा
◾️हेथाई अम्मन उत्सव - तमिळनाडू
◾️जल्लीकट्टू महोत्सव - तमिलनाडु
◾️कंबाला महोत्सव - कर्नाटक
◾️मकरविलक्कू उत्सव - केरळ
◾️हेमिस त्सेचुमहोत्सव: लडाख
◾️ऊंट महोत्सव - बीकानेर, राजस्थान
◾️मरू महोत्सव - जैसलमेर, राजस्थान

❇️ चर्चेतील आणि महत्वाची बंदरे लक्षात ठेवा
◾️गोपालपुर पोर्ट : ओडीसा
◾️मुंद्रा पौर्ट - गुजरात
◾️हरफा पोर्ट- इजराईल
◾️हाजीरा पोर्ट - गुजरात
◾️धामरा पोर्ट - ओडीसा
◾️चाबहार पोर्ट - इराण ( भारत विकसित)
◾️ग्वादर पोर्ट - पाकिस्तान ( चीन विकसित)
◾️दुक्कम पोर्ट - ओमान
◾️कांडला पोर्ट - गुजरात ( दिन दयाळ पोर्ट)
◾️विझिंगम पोर्ट - केरळ

❇️ चर्चेतील व्यक्ती आणि वादक लक्षात ठेवा
◾️राजीव तारानाथ : सरोद वादक
◾️पंडित रविशंकर - सितार वादक
◾️पन्नालाल घोष - बासरी वादक
◾️भजन सोपारी - संतूर वादक
◾️पंडित शिवकुमार - संतूर वादक
◾️अली अमजद खान - सरोज वादक
◾️गणेश राजगोपालन - व्हायोलिन वादक
◾️पंडित रामनारायण - सारंगी वादक
◾️S बालचंद्रन - वीणा वादक
◾️विश्व मोहन भट्ट - वीणा वादक
◾️उस्ताद झाकीर हुसेन - तबला वादक
◾️उस्ताद बिस्मिल्ला खान - शहनाई वादक
◾️पंडित हरिप्रसाद चौरसिया -बासरी वादक
◾️डॉ. लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम -व्हायोलिन वादक

आज जी माहिती आहे ती एकदम व्यवस्थित वाचून घ्या ✌️
-------------------------------------------

17 June 2024

जिल्हा परिषदेबद्दल संपूर्ण माहिती


1.  जिल्हा परिषद ही पंचायतराजमधील महत्वाची संस्था असून त्यातील शिखर संस्था म्हणून ओळखली जाते.


2.   नाईक समितीच्या शिफारशिनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समितीअधिनियम 1961 कलम क्र.6 नुसार प्रत्येक जिल्हयासाठी नागरी जिल्हे सोडून एक जिल्हा परिषद स्थापन करण्यात आली. महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थापना 1 मे, 1962 रोजी करण्यात आली.


📌. रचना -  प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये एक अध्यक्ष आणि जिल्हापरिषद सदस्य मिळून एक जिल्हापरिषद निर्माण करण्यात येईल.


📌. सभासद संख्या -  प्रत्येक जिल्हापरिषदेमध्ये लोकसंख्येनुसार राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिल्याप्रमाणे कमीत 50 व जास्तीत जास्त 75 इतके सभासद असतात. हे सर्व सदस्य प्रत्यक्ष निवडणुकीव्दारे निवडले जातात. 


📌. स्वीकृत सदस्य पद्धत पुर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे सर्व सभापती हे जिल्हापरिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात.


📌.  सभासदांची निवडणूक -  प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने राज्यनिर्वाचन आयोग दर पाच वर्षानी होते.


📌.  पात्रता (सभासदांची) - जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडणूक लढविण्याकरिता पुढील पात्रतेच्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.


1.    तो भारताचा नागरिक असावा.


2.    त्याच्या वयाची 21 वर्ष पूर्ण झालेली असावी.


3.    1961 च्या कायद्याप्रमाणे (जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम) किंवा त्यामध्ये केलेल्या बदलानुसार पात्र असावा.


📌.  आरक्षण : -.   1961 च्या जिल्हा परिषद स. अधिंनियमातील कलम क्र. 12/2 (A) विशिष्ट जागा राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे.


📌.  तसेच महिलांसाठी राखीव जागांची तरतूद 110 व्या घटना दुरूस्तीनुसार सहयोगी सदस्य घेण्याची पद्धत बंद करण्यात आली. फक्त सर्व पंचायत समित्यांचे सभापती जिल्हा परिषदेचे सदस्य असतात.


📌. कार्यकाल : -  5 वर्ष इतका असतो परंतु काही कारणावरून जिल्हापरिषद विसर्जित करण्याचा अधिकार राज्यशासनाला आहे. अशी जिल्हा परिषद विसर्जित झाल्यानंतर या तारखेपासून 6 महिन्यांच्या आत निवडणुका घेणे बंधनकारक आहे.


📌.  अध्यक्ष / उपाध्यक्षाची निवड : जिल्हा परिषदेतील निवडून आलेल्या सदस्यांमधुनच अध्यक्ष/उपाध्यक्षांची निवड केली जाते. परंतु काही कारणांवरून त्यांच्या निवडीच्यावेळी तंटा निर्माण झाल्यास त्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत विभागीय आयुक्ताकडे तक्रार करावी लागते. त्याने दिलेल्या निर्णयाविरुद्ध 30 दिवसांच्या आत राज्य सरकारकडे तक्रार करावी लागते.


📌.  कार्यकाल : अध्यक्ष / उपाध्यक्षांचा कार्यकाल इ.स 2000 च्या तरतुदींनुसार अडीच वर्ष इतका करण्यात आला आहे.


📌.  राजीनामा :


1.    अध्यक्ष - विभागीय आयुक्ताकडे


2.    उपाध्यक्ष - जिल्हा परिषद अध्यक्षाकडे


मानधन :


1. अध्यक्ष - 20,000/-


📌.  अविश्वासाचा ठराव :  - अध्यक्ष/उपाध्यक्षाची निवड झाल्यापासून 6 महिन्यांपर्यंत अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही आणि तो फेटाळल्यास त्या तारखेपासून 1 वर्षापर्यंत मांडता येत नाही.


📌.  सचिव - . जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव हा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो.


📌.  बैठक :-.  जिल्हा परिषदेच्या एका आर्थिक वर्षात चार बैठका होतात. म्हणजेच दर तीन महिन्यांनी एक बैठक घेतली जाते.


📌.  मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) :-  प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी एक प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमलेला असतो. तो भारतीय प्रशासन सेवेसाठी आयएएस दर्जाचा अधिकारी असतो. त्याची नेमणूक आणि बदली करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे.

राजकीय भूगोल

राजकीय भूगोल

✔️महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्रफळाचे जिल्हे :-
       १) अहमदनगर -17048चौ.किमी
       २) पुणे    - 15663चौ.किमी
       ३) नाशिक    - 15530चौ.किमी
       ४) सोलापूर    - 14895चौ.किमी
       ५) गडचिरोली  - 14412चौ.किमी

Tricks:- "आपुन सोला गडी खेळू कबड्डी"

✔️ महाराष्ट्रातील सर्वात कमी क्षेत्रफळाचे जिल्हे:-
         1) मुंबई शहर  - 157चौकिमी
         2) मुंबई उपनगर - 446चौ.किमी
         3) भंडारा  - 3896चौ.किमी
         4) ठाणे   - 4214चौ.किमी
         5) हिंगोली   -  4524चौ.किमी



महत्त्वाचे विविध ऑपरेशन

❇️ऑपरेशन नमस्ते:-

✍कोरोनाचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कराने सुरू केले.

❇️ऑपरेशन मिशन सागर:-

✍विविध देशांना वैद्यकीय साहित्य पुरवण्यासाठी भारताने सुरू केले.

❇️ऑपरेशन शिल्ड:-

✍कोरोना चा सामना करण्यासाठी दिल्ली सरकारने सुरू केले.

❇️ऑपरेशन समुद्र सेतू:-

✍इतर देशात अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी नौदलने सुरू केले.

❇️ऑपरेशन संजीवनी:-

✍मालदीव ला वैद्यकीय साहित्य पुरवण्यासाठी भारतीय हवाई दलने सुरू केले.

❇️ऑपरेशन क्रॅकडाऊन 2:-

✍गुन्हेगार ची झाडाझडती घेण्यासाठी नागपूर पोलिसांनी सुरू केले.

❇️ऑपरेशन ब्लॅक फेस:-

✍चाईल्ड पोर्नोग्राफी वर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी सुरू केले.

❇️ऑपरेशन मुस्कान:-

✍अपहरण झालेल्या मुलांना शोधण्यासाठी पालघर पोलिसांनी सुरू केले.



महाराष्ट्रातील पंचायतराज

 आधूनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या अथक , लोककल्याणकारी व पारदर्शक विचारकृतीमधुन जन्मास आलेले पंचायत राज........सध्या संपूर्ण राज्यात चर्चेस आहे.

 कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ?
  - स्थानिक स्वराज्य संस्था

  राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती ?
  -  2 ऑक्टोबर 1953

 बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली ?
  - 16 जानेवारी 1957

 बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती ?
  - वसंतराव नाईक समिती

 वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती ?
  - 27 जून 1960

  वसंतराव नाईक त्याकाळी कोणत्या पदावर कार्यरत होते ?
  - महसूल मंत्री

 वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या ?
  - 226

 वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती. त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली ?
  - जिल्हा परिषद

 पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत ?
  - तीन (ग्रामपंचायत-पंचायत समिती-जिल्हा परिषद)

 महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला ?
   - 1  मे 1962

 ‘महसुली खेड्या’ची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली आहे ?
  -  महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966

 महाराष्ट्रात ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असते ?
  -  7 ते 17

 ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्यशासनाच्या वतीने कोण ठरविते ?
  - जिल्हाधिकारी

 ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे  ?
  - जिल्हाधिकारी

 ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो ?
  - 5 वर्षे

 ग्रामपंचायतीचा कार्यकाळ  कधी पासून मोजला जातो ?
  - पहिल्या सभेपासून

 ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष/पीठासन अधिकारी कोण असतात?
  - तहसीलदार

 सरपंच/उपसरपंच यांच्या निवडणूकीबाबतच्या वादावर अंतिम निर्णय कोण घेते ?
  - विभागीय आयुक्त

 उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
  - सरपंच

 सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
  - पंचायत समिती सभापती

 पुरुष सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
  - दोन तृतीयांश (2/3)

 महिला सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
  - तीन चतुर्थांश (3/4)

 पंचायत समिती उप-सभापती आणि इतर पंचायत समिती  सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
  - पंचायत समिती सभापती

 पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
  - जिल्हा परिषद अध्यक्ष

 जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
  - संबंधित विषय समिती सभापती

 जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितींचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
  - जिल्हा परिषद अध्यक्ष

 जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
  - विभागीय आयुक्त

 कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र ग्रामपंचायतीचा नोकर नसतो ?
  -  ग्रामसेवक

 ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो ?
   - जिल्हा परिषदेचा.

कोहिमा लढाई.



🅾️१६-एप्रिल १८च्या दरम्यान ब्रिटिश व भारतीय सैन्यांची कुमक आडवाटेने कोहिमाला पोचली व त्यांनी जपान्यांचा प्रतिकार करण्यास सुरुवात केली.


🅾️ या प्रतिहल्ल्यानंतर जपानी सैन्याने कोहिमा रिज सोडली पण कोहिमा-इंफाळ रस्ता त्यांच्याच ताब्यात राहिला. मेच्या मध्यापासून जून २२ पर्यंत ब्रिटिश आणि भारतीय सैन्याने हळूहळू माघार घेणार्‍या जपानी सैन्याला मागे रेटत रस्ता काबीज केला.


🅾️ तिकडून इंफाळकडूनही चालून आलेल्या दोस्त सैन्याशी त्यांनी मैल दगड १०९ येथे संधान बांधले व इंफाळला पडलेला वेढा मोडून काढला.


🅾️  इ.स. १९४४च्या सुरुवातीस युनायटेड किंग्डमने भारतातून म्यानमार (तेव्हाचा ब्रह्मदेश) आणि तेथून आग्नेय आशियामध्ये ठाण मांडून बसलेल्या जपान्यांना हुसकावण्यासाठीची तयारी सुरू केली होती. यासाठी त्यांनी ईशान्य भारतातील मिझोरम प्रदेशातील इंफाळ शहरात आपले इंडियन फोर्थ कोअर हे सैन्यदल जमवले होते.


🅾️ याला काटशह देण्यासाठी जपानने उ-गो मोहीम या नावाखाली प्रतिआक्रमण करण्याचे ठरवले.


🅾️ जपानच्या पंधराव्या सैन्यदलाच्या मुख्याधिकारी लेफ्टनंट जनरल रेन्या मुतागुची याने या मोहिमेला अधिक मोठे करण्याचे ठरवले.


🅾️ मतागुचीच्या आराखड्याप्रमाणे जपानी सैन्य फक्त चौथ्या कोअरला अडवण्यासाठी नाही तर ब्रिटिश भारतावर आक्रमण करण्यासाठीच चालून जाणार होते. यात ईशान्य भारतातून घुसून थेट भारताच्या मध्यापर्यंत धडक मारण्याची महत्त्वाकांक्षी योजनाही होते.