16 April 2025

नियंत्रक आणि महालेखा परीक्षक

     नियंत्रक आणि महालेखाकार (कॅग) भारत लेख 148 स्थापना करून एक अधिकार आहे, भारतीय संविधानाच्या , जे ऑडिट सर्व पावत्या आणि खर्च या भारत सरकारच्या आणि राज्य सरकार , संस्था आणि अधिकारी सेवनाने यांनी आर्थिक त्या सरकार. कॅग ही सरकारी मालकीच्या कंपन्यांचे बाह्य ऑडिटरही आहेआणि सरकारी कंपन्यांचे पूरक लेखापरीक्षण करते, म्हणजेच कोणतीही नॉन-बँकिंग / बिगर-विमा कंपनी ज्यात केंद्र सरकारची इक्विटी हिस्सा कमीतकमी 51१ टक्के किंवा विद्यमान सरकारी कंपन्यांच्या सहाय्यक कंपन्यांचा हिस्सा आहे. कॅगचे अहवाल संसद / विधिमंडळात मांडले जातात आणि लोकलेखा समित्यांनी (पीएसी) आणि सार्वजनिक उपक्रमांवरील समित्यांनी (सीओपीयू) विचारात घेतल्या आहेत, ज्या भारतीय संसदेत आणि राज्य विधानमंडळातील विशेष समित्या आहेत . कॅग भारतीय ऑडिट अँड अकाउंट्स विभागाचे प्रमुख देखील आहेत, ज्याचे कामकाज भारतीय ऑडिट आणि अकाउंट्स सर्व्हिसेसच्या अधिका by ्यांमार्फत केले जातात आणि देशभरात (०१.०3.२०२० पर्यंत), 43,576 employees कर्मचारी आहेत.


नियुक्ती

नियंत्रक आणि भारत महालेखापरीक्षक नियुक्त केले राष्ट्रपती भारत  एक शिफारसीचे अनुसरण पंतप्रधान . भेटीनंतर, त्याने / तिला राष्ट्रपतींसमोर शपथ किंवा कबुली द्यावी लागेल.



कॅग कर्तव्ये

घटनेतील तरतुदीनुसार कॅगचा (डीपीसी) (कर्तव्ये, अधिकार व सेवा अटी) कायदा १ 1971.. लागू करण्यात आला. विविध तरतुदींनुसार, कॅगच्या कर्तव्यांमध्ये ऑडिट समाविष्ट आहेः

भारतीय समेकित निधी व राज्य व केंद्र शासित प्रदेश विधानसभेचे असणारी पावती व खर्च.

ट्रेडिंग, मॅन्युफॅक्चरिंग, नफा आणि तोटा खाती आणि ताळेबंद आणि इतर सहाय्यक खाती कोणत्याही सरकारी विभागात ठेवली जातात; शासकीय कार्यालये किंवा विभागांत ठेवलेली स्टोअर व साठा यांचे लेखा

कंपनी अ‍ॅक्ट, २०१ of मधील तरतुदीनुसार सरकारी कंपन्या .

संबंधित कायद्याच्या तरतुदीनुसार संसदेने बनविलेल्या कायद्यांनुसार किंवा त्या अंतर्गत स्थापना केलेली महामंडळे.

केंद्र आणि राज्य सरकारांच्या एकत्रित निधीतून प्राधिकरणास आणि संस्थांना मोठ्या प्रमाणात वित्तपुरवठा केला जातो. एकत्रीकृत निधीकडून भरीव अर्थसहाय्य दिले गेलेले नसले तरीही कोणाचे किंवा प्राधिकरण, त्याचे लेखापरीक्षण सीएंडएजीकडे सोपविले जाऊ शकते.

विशिष्ट उद्देशाने संस्था व प्राधिकरणास शासनाने दिलेले अनुदान व कर्ज.

तांत्रिक मार्गदर्शन व समर्थन (टीजीएस) अंतर्गत पंचायती राज संस्था आणि शहरी स्थानिक संस्था यांचेकडे सोपविलेले ऑडिट.


भारतीय राज्यघटना

पार्श्वभूमी:

दुसरे महायुध्द संपुष्टात आल्यानंतर, भारतीयांने ज्या आश्वासनावर ब्रिटिशांना मदत केली. ते आश्वासन पूर्ण करण्यासाठी १९४२ मध्ये स्टॅफोर्ड क्रिप्स यांच्या नेतृत्वाखाली एक आयोग भारतात पाठवण्यात आले. मात्र स्टॅफोर्ड क्रिप्स यांनी जो अहवाल तयार केला त्यामध्ये भारताच्या स्वातंत्र्याविषयी कोणत्याही प्रकारचा उल्लेख करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे भारतातील नेत्यांकडून या अहवालाविषयी नाराजी व्यक्त करण्यात आली.

त्यानंतर १९४६ मध्ये ‘त्रिमंत्री मंडळ’ भारताविषयी निर्णय घेण्यासाठी पाठवण्यात आले. या मंडळामध्ये पॅट्रिक लॉरेन्स, स्टॅफोर्ड क्रिप्स व ए.व्ही. अलेक्झांडर यांचा समावेश होता. या मंडळाच्या शिफारशीनुसार ब्रिटीश सरकारने भारताच्या स्वातंत्र्याची मागणी स्वीकारली होती. त्यामुळे भारतामध्ये सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या कॉंग्रेसने या मंडळाचा अहवाल स्वीकारला होता.

या त्रिमंत्री योजनेच्या शिफारशीमध्ये स्वतंत्र भारताची राज्यघटना बनवण्याची एक महत्वाची शिफारस होती. या शिफारशीनुसार जुलै १९४६ मध्ये घटना परिषदेच्या निवडणुका घेण्यात आल्या. निवडून आलेल्या सदस्यांची पहिली बैठक ९ डिसेंबर १९४६ मध्ये घेण्यात आली.


घटना परिषदेची रचना :

१) घटना परिषदेतील सदस्यांची संख्या- ३८९ यामध्ये २९६- सदस्य ब्रिटिश भारतातील होते, तर ९३- सदस्य हे भारतीय संस्थानातील होते.

2) निवडण्यात आलेले सदस्य हे १० लाख लोकसंख्येमागे एक सदस्य या प्रमाणात निवडण्यात आलेले होते.

3) भारतातील सर्व समाजातील प्रतिनिधींना सभासदत्व देण्यात आलेले होते.

4) निवडून आलेल्या सदस्यांमध्ये कॉंग्रेसचे २०८ सदस्य होते. मुस्लीम लीगचे ७३ सदस्य होते. तर इतर छोट्या पक्षांना एकूण १५ जागा मिळाल्या होत्या.


घटना परिषदेचे कार्य:

I. ९ डिसेंबर १९४६ मध्ये या परिषदेच्या प्रत्यक्ष कार्याला सुरवात झाली.

II. घटना परिषदेच्या पहिल्या बैठकीचे हंगामी अध्यक्ष म्हणून डॉ. सच्चिदानंद सिन्हा यांची निवड करण्यात आली.

III. ११ डिसेंबर १९४६ मध्ये राजेंद्र प्रसाद यांची घटना परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

IV. मात्र मुस्लीम लीगकडून घटना परिषदेवर बहिष्कार घालण्यात आला होता.

V. त्यामुळे २११ सदस्यांच्या घटना निर्मितीच्या कार्याला सुरवात झाली.


घटनेचा उद्देश ठराव:

कोणतेही कार्य करत असताना आपल्या समोर उद्दिष्ट असावे लागते. उदा. आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना आपल्या समोर अधिकारी बनण्याचे उद्दिष्ट असते. त्याप्रमाणे भारत हा स्वातंत्र्यानंतर लोकशाही देश बनणार होता. त्यामुळे भारतीय राज्यघटना निर्माण करत असताना घटना परिषदेसमोर काही उद्दिष्ट असणे आवश्यक होते. त्यामुळे १३ डिसेंबर १९४६ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय राज्यघटनेचा ठराव मांडला.

1) प्रशासनविषयक : ही घटना परिषद असे जाहीर करते कि, भारत देश स्वतंत्र, सार्वभौम, गणराज्य आहे व या देशाच्या प्रशासनासाठी आम्ही ही राज्यघटना निर्माण करू.

2) संघविषयक: सध्या भारतामध्ये समाविष्ट असणारा भुप्रदेश, राज्याचा भूप्रदेश, ब्रिटीश भारताबाहेरील भारताचा इतर भाग ज्यांना सार्वभौम भारताचा घटक बनण्याची इच्छा आहे, या सर्वांचा एक संघ असेल.

3) न्याय स्वातंत्र्य, समता यांची हमी व संरक्षण: न्याय- सामाजिक, राजकीय, आर्थिक यांच्या बाबतीत समता- दर्जा, संधी आणि कायद्यासमोर यांच्या बाबतीत स्वातंत्र्य- विचार, उच्चार, श्रद्धा, उपासना, व्यवसाय आणि संघटना या बाबतीत.

a) अल्पसंख्यांक व मागासांना संरक्षण: अल्पसंख्यांक, मागास आणि आदिवासी, वंचित व मागास वर्ग यांना पुरेसे संरक्षण

b) राज्यघटनेचा स्त्रोत- भारतीय लोक: सार्वभौम स्वतंत्र भारत, तिचे घटनात्मक भाग आणि शासनाची सत्ता आणि अधिसत्ता याचा स्त्रोत भारतीय लोक असतील.

c) सार्वभौम हक्क: गणराज्याची अखंडता व सभ्य राष्ट्राच्या न्याय व कायद्याप्रमाणे तिचा जमीन, समुद्र आणि हवाई क्षेत्र यावरचे सार्वभौम हक्क अबाधित राखला जाईल.

d) जगात मनाचे स्थान: ही प्राचीन भूमी, जगात तिचे न्याय हक्क आणि सन्मान प्राप्तल करेल. त्याचबरोबर मानवी समाजाचे कल्याण व जागतिक शांततेसाठी पूर्णपणे योगदान करेल.

e) स्वायतता : भारतीय भूभागाला राज्यघटनेप्रमाणे स्वायत्त एककाचा दर्जा दिला जाईल.





घटना परिषदेची इतर महत्वाची कामे

I. राष्ट्रीय ध्वज स्वीकारला – २२ जुलै १९४७

II. राष्ट्रकुल सदस्यत्वाला मंजुरी देण्यात आली.- मे १९४९

III. राष्ट्रगीताचा स्वीकार करण्यात आला- २४ जानेवारी १९५०

IV. राष्ट्रीय गीताचा स्वीकार करण्यात आला- २४ जानेवारी १९५०

V. पहिले राष्ट्रपती म्हणून राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली- २४ जानेवारी १९५०


घटना परिषदेविषयी विशेष महत्वाचे

या घटना परिषदेची स्थापना करण्यात आल्यापासून तिचे कामकाज २ वर्ष ११ महिने व १८ दिवस चालले. शेवटची बैठक २४ जानेवारी १९५० रोजी झाली. घटनापरिषदेने देशांच्या घटनांचा अभ्यास केला. या परिषदेवर एकूण कालावधीमध्ये ६० लाख रुपये खर्च झाले. या परिषदेचे एकूण ११४ दिवस अधिवेशन चालले.


घटना समितीतील महत्वाच्या समित्या व त्यांचे अध्यक्ष

अ. क्र.   समितीचे नाव   समितीचे अध्यक्ष

१   संघराज्य घटना समिती   पं. जवाहरलाल नेहरू

२.   केंद्रीय उर्जा समिती   पं. जवाहरलाल नेहरू

३.   मसुदा समिती   डॉ. बाबासाहेब आंबेडकर

४.   प्रांतीय राज्यघटना समिती   सरदार पटेल

५.   राज्य समिती   पं. जवाहरलाल नेहरू

६.   सुकाणू समिती   डॉ. राजेंद्र प्रसाद

७.   सभागृह समिती   पट्टाभी सीतारामय्या


मसुदा समिती

आपण पाहिलेल्या समितीमध्ये मसुदा समितीचे कार्य हे महत्वाचे होते. कारण, या समितीने घटनेला लिखित स्वरूप प्राप्त करून दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली २९ ऑगस्ट १९४७ मध्ये मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. या समितीमध्ये सात सदस्यांचा समावेश करण्यात आलेला होता.

१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( अध्यक्ष)

२) एन. गोपालस्वामी अय्यंगार

३) अल्लादी कृष्णास्वामी अय्यर

४) के.एम.मुन्शी

५) सय्यद मोहमद शादुल्ला

६) एन. माधव राव

७) टी. टी. कृष्णम्माचारी ( यांची निवड खैतानच्या मृत्युनंतर करण्यात आली.)

मसुदा समितीने घटना परिषदेतील वेगवेगळ्या समित्यांसोबत चर्चा केली. त्याचबरोबर देशातील वेगवेगळ्या गटांबरोबर चर्चा करून आपला मसुदा फेब्रुवारी १९४८ मध्ये प्रसिध्द केला.

तो मसुदा प्रसिद्ध केल्यानंतर लोकांना त्यावर चर्चा करण्यासाठी व त्यावर आपले मत मांडण्यासाठी आठ महिन्यांचा कालावधी देण्यात आला. ज्या लोकांना आपले मत मांडावयाचे आहे त्यांच्यासाठी पत्राद्वारे आपले मत मांडण्यास परवानगी देण्यात आली.

- लोकांकडून आलेल्या मतानुसार काही दुरुस्त्या करण्यात आल्या. काही दुरुस्त्या करण्यात येऊन ऑक्टोबर १९४८ मध्ये पुन्हा मसूदा तयार करण्यात आला.


मसुद्याचे कायद्यात रुपांतर कसे झाले ?


पहिले वाचन

४ नोव्हेंबर १९४८ मध्ये मसुदा घटना परिषदेसमोर ठेवण्यात आला. या परिषदेमध्ये मसुद्यावर सर्वसाधारण ५ दिवस चर्चा करण्यात आली. या वाचनामध्ये काही दुरुस्त्या सुचवण्यात आल्या.


दुसरे वाचन

दुसऱ्या वाचन १५ नोव्हेंबर १९४८ ते १७ ऑक्टोबर १९४९ या कालावधीदरम्यान करण्यात आले. पहिल्या वाचनामध्ये ज्या दुरुस्त्या सुचवण्यात आलेल्या होत्या त्यावर चर्चा करण्यात आली.


तिसरे वाचन

तिसरे वाचन १९ नोव्हेंबर १९४९ रोजी करण्यात आले. हे एक औपचारिक वाचन होते. कारण ज्या काही दुरुस्त्या होत्या त्या दुसऱ्या वाचनादरम्यान करण्यात आलेल्या होत्या. या वाचनानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेला मसुदा मान्यतेसाठी घटना समितीसमोर ठेवला.

२६ नोव्हेंबर १९४९ मध्ये घटना परिषदेकडून राज्यघटनेला मान्यता देण्यात आली.


राज्य घटना प्रत्यक्ष लागू

- २६ जानेवारी १९५० रोजी राज्य घटना प्रत्यक्ष लागू करण्यात आली. २६ जानेवारी ही तारीख निवडण्याचे कारण म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये २६ जानेवारी १९३० रोजी पूर्ण स्वराज्याची घोषणा करण्यात आलेली होती.


अश्याच महत्वाच्या माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-



राज्य घटनेची वैशिष्ट्ये :


a)विस्तृत लिखित राज्यघटना:

जगामध्ये दोन प्रकारच्या राज्यघटना अस्तित्वात आहेत. लिखित राज्यघटना व अलिखित राज्यघटना. अमेरिकेच्या राज्यघटनेकडे पाहिल्यास या घटनेमध्ये फक्त १४ कलमे आहेत.

मात्र भारताच्या राज्यघटनेमध्ये ८ परिशिष्टे व ३९५ कलमे होती. सध्या १२ परिशिष्टे व ४५० कलमांचा समावेश करण्यात आला आहे.


b) विविध स्त्रोतांपासून निर्मिती:

- राज्यघटना बनवत असताना इतर देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करण्यात आला.

- या राज्यघटनेवर १९३५ च्या कायद्याचा जास्त प्रमाणावर प्रभाव दिसून येतो.

- अमेरिकन राज्यघटनेवरून मुलभूत हक्क / न्यायालयीन पुनर्विलोकन या बाबींचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला.

- आयर्लंडच्या राज्यघटनेवरून मार्गदर्शक तत्वांचा स्वीकार करण्यात आला.


c) मुलभूत हक्क:

- राज्यघटनेनुसार देशातील नागरिकांना काही मुलभूत हक्क देण्यात आलेले आहेत.

- राज्यघटनेमध्ये एकूण सहा प्रकारचे मुलभूत हक्क देण्यात आले आहेत.

- मुलभूत हक्कांचा समावेश राज्यघटनेच्या तिसऱ्या विभागामध्ये करण्यात आला आहे.


d) लवचिक व ताठर राज्यघटना :

- अमेरिकन राज्यघटना ही खूपच ताठर आहे. कारण या राज्यघटनेतील कलमांमध्ये सहजासहजी बदल / दुरुस्त्या करता येत नाहीत.

- तर ब्रिटिश राज्यघटना ही खूपच लवचिक आहे.

- मात्र घटनाकर्त्यांनी या दोन्हींचा विचार करून मधला मार्ग निवडला आहे.

- काही कलमांची दुरुस्ती ही सहज करता येते तर काही कलमांच्या दुरुस्तीसाठी विशेष अशा बहुमताची गरज असते.


e) मुलभूत कर्तव्य :

- १९७६ च्या ४२ व्या घटनादुरुस्तीन्वये राज्यघटनेमध्ये एकूण ११ कर्तव्यांचा समावेश करण्यात आला आहे.

- मुलभूत कर्तव्यांचा राज्यघटनेमध्ये समावेश करण्यासाठी स्वर्ण सिंग समितीची स्थापना करण्यात आली होती.

- या समितीच्या शिफारसीनुसार राज्यघटनेमध्ये मुलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला.

- मात्र मुलभूत कर्तव्यांबाबत कायदेशीर बंधने घालण्यात आलेली नाहीत.

- ही केवळ आदर्शे आहेत.


f) निधर्मी राष्ट्र:

- पाकिस्तानसारखे राष्ट्र हे एक इस्लाम धर्म असणारे राष्ट्र आहे.

- मात्र भारतामध्ये वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात. कोणत्या एका धर्माला जास्त महत्व न देता सर्वांना समानता देण्यात आली आहे.

- सार्वजनिक सुव्यवस्था, नितीमत्ता, आरोग्य यांना बाधा न आणता सर्वांना धार्मिक आचरण करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

- अल्पसंख्यांकांना शिक्षण संस्था स्थापण्याचा व चालवण्याचा अधिकार देण्यात आला आहे.


g) मार्गदर्शक तत्व:

- घटनेच्या चौथ्या भागामध्ये मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आला आहे.

- शासनाने आपला राज्यकारभार कोणत्या उद्देशासाठी करावा- हे स्पष्ट करणारी मार्गदर्शक तत्वे घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.

- ही मार्गदर्शक तत्वे- राजकीय, सामाजिक, आर्थिक, मानवहित, आरोग्य यासंबंधी आहेत.

- या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी कशी होते, त्यावरून त्या राज्याच्या शासनाच्या कार्याचे मूल्यमापन होत असते.


h) एकेरी नागरिकत्व :

- अमेरिकेमध्ये संघाचे व राज्याचे असे वेगवेगळे नागरिकत्व दिले जाते.

- भारतामध्येही अनेक राज्य अस्तित्वात आहेत, मात्र या प्रत्येक राज्यांना वेगवेगळे नागरिकत्व न देता सर्वांसाठी एकच (एकेरी) नागरिकत्व देण्यात आले आहे.


i) स्वतंत्र व एकेरी न्यायव्यवस्था :

- संपूर्ण देशासाठी एकसूत्री न्यायव्यवस्था निर्माण करण्यात आली आहे.

- सर्व देशासाठी सर्वोच्च न्यायालय हे अंतिम न्यायालय आहे. (apex court)


j)मतदानाचा अधिकार :

- पहिल्यांदा २१ वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तींना मतदानाचा अधिकार देण्यात आला होता.

- मात्र १९८९ मध्ये ५१ व्या घटनादुरुस्तीनुसार १८ वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तींना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे.


k)आणीबाणीची तरतूद :

- काही घटनात्मक पेचप्रसंगाच्या वेळी देशामध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असते, अशा वेळी आणीबाणी लागू केली जाते. हे आणीबाणी लागू करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना देण्यात आले आहेत.

- या आणीबाणीच्या काळामध्ये केंद्र हे प्रबळ बनते. राज्याचे सर्व अधिकार केंद्राकडे जात असतात.


l) त्रि–स्तरीय सरकारची स्थापना:

- केंद्र, राज्य, पंचायत राज

- यानुसार पूर्ण देशासाठी केंद्र सरकार अस्तित्वात असून, ही एक उच्च अशी शासनव्यवस्था आहे.

- प्रत्येक राज्यासाठी राज्य सरकारची निर्मिती करण्यात आली आहे.

- तर जिल्हा- तालुका- ग्राम( खेडे) यासाठी पंचायतराजची स्थापना करण्यात आली आहे.


राज्यघटनेविषयीचे काही दोष:

1. घटना निर्मिती करण्यासाठी जी घटना परिषद बनवण्यात आली होती, त्यातील सदस्यांची निवड ही प्रत्यक्ष मतदानाद्वारे करण्यात आली नव्हती.

2. लॉर्ड विस्काऊट सायमन व विन्स्टन चर्चिलच्या मते, “ भारतीय राज्यघटना ही हिंदू लोकांपासून बनवण्यात आलेली आहे.”

3. काहींच्या मते, “ घटना परिषद ही वकील- राजकीय व्यक्तींची बनलेली होती.”


  अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com

MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा अभ्यासक्रम




MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा
अभ्यासक्रम



पेपर- १ (गुण २०० - कालावधी २ तास)

1.राज्य ,राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्त्वपूर्ण चालू घडामोडी.

2.भारताचा इतिहास (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ

3.महाराष्ट्र , भारत आणि जगाचा भूगोल- भौतिक , सामाजिक आणि आर्थिक.

4.महाराष्ट्र व भारत - राज्यव्यवस्था आणि शासन- राज्यघटना , राजकीय व्यवस्था , पंचायती राज , शहरी प्रशासन , शासकीय  धोरणं ,  हक्कविषयक घडामोडी इत्यादी .

5.आर्थिक आणि सामाजिक विकास- शाश्वत विकास , गरिबी , समावेशन , लोकसंख्याविषयक मुद्दे , सामाजिक धोरणं इ.

6.पर्यावरणीय परिस्थिती ,जैव विविधता , हवामान बदल (सर्वसामान्य मुद्दे )

7. सामान्य विज्ञान


पेपर- 2 (गुण २०० - कालावधी २ तास)

▪️इंटरपर्सनल स्किल्स (कम्युनिकेशन स्किलसह)

▪️तर्कशुद्ध युक्तिवाद आणि मीमांसा/ पृथ:करण क्षमता (लॉजिकल रिझनिंग आणि अॅनालिटिकल अॅबिलिटी)

▪️निर्णय क्षमता व प्रश्नांची उकल ( डिसिजन मेकींग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग)

▪️सामान्य बुद्धिमापन क्षमता (जनरल मेंटल एबिलिटी)

▪️बेसिक न्यूमरसी , डेटा इंटरप्रिटेशन (चार्ट , ग्राफ , टेबल्स) (दहावीचा स्तर असेल)

▪️इंग्लिश व मराठी भाषा आकलन क्षमता - कॉम्प्रिहेन्शन स्किल (दहावीस्तर)



 राज्यसेवा पूर्व परीक्षा पुस्तके

▪️ इतिहास- डॉ अनिल कठारे
▪️समाजसुधारक- के सागर
▪️भूगोल- ए. बी. सवदी
▪️भारताची राज्यघटना आणि शासन- लक्ष्मीकांत
▪️पंचायतराज- के सागर
▪️भारतीय अर्थव्यवस्था- रंजन कोळंबे
▪️विज्ञान आणि तंत्रज्ञान- अनिल कोलते
▪️गणित क्लुप्त्या आणि उत्तरे- पंढरीनाथ राणे
▪️बुद्धिमत्ता चाचणी- अनिल अंकलगी
▪️राज्यसेवा C-SAT गाईड- अरिहंत प्रकाशन
▪️चालू घडामोडी– लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, चाणक्य मंडल मासिक,

राज्यघटना महत्वाचे मुद्दे


1)घटनानिर्मिती:-


➡️TIMELINE पूर्ण पाठ करा.

➡️घटनेचे स्रोत 

➡️ मसुदा समिती ( सदस्य पाठ करा)

➡️ कबिनेट मिशन योजना आणि तरतुदी निवडणूक ( निवडून आलेले सदस्य).

➡️भारतीय स्वातंत्र्य चा कायदा आणि बदल 

➡️दार आयोग ,jvp समिती ,पाक आयोग तरतुदी ,अहवाल पाठ करा .

➡️ राज्यनिर्मिती क्रम आणि संबंधित घटनादुरुस्ती


⭕️मलभूत हक्क :-

➡️कलम 25-29 

➡️कलमे आणि जोड्या जुळवा

➡️कलमे अपवाद (25-29 , 15-19कलम 32 :- कोणाविरुद्ध देऊ शकतो आणि  कोणाविरुद्ध नाही . 

➡️कलम 13 आणि कायदा ह्यात समाविष्ट घटक .

➡️ कलम 19 आणि  अपवाद*(IMP)


⭕️मार्गदर्शक तत्वे :- 

➡️ कोणत्या घटनादुरुस्ती ने  कोणते टाकले गेले करा EXPECTED प्रश्न.

➡️ कलम 44,40,39 ,48,41,43 पाठ करा 

➡️ नयायप्रविष्ट नाही आणि महत्वाचे मुद्दे,काय प्रस्थापित करतात ते बघून घ्या .

➡️ मलभूत हक्क आणि DPSP फरक करून घ्या .

➡️कलम 351 हिंदी भाषा संबंधित तत्वे .


⭕️मलभूत कर्तव्ये:-

➡️ करम येऊ शकतो .

➡️ कोणत्या समिती ने टाकले आणि संबंधित घटनादुरुस्ती टाकले .

➡️ नयायप्रविष्ट आहे नाही or परकीयांना उपलब्ध की नाही करून घ्या 

➡️कर्तव्ये वाचून घ्या कोणते आहे कोणते नाही चूकओळखायला येऊ शकतो.



⭕️✔️ राष्ट्रपती ,उपराष्ट्रपती, & राज्यपाल महत्वाचे कलमे (राष्ट्रपती अनुमोदन ,निवडणूक सहभाग ?कार्य शपथ ,कार्यकाळ ,क्षमादान )


♦️ घटनात्मक आयोग आणि बिगर घटनात्मक आयोग (1 प्रश्न compulsory)

➡️ राज्य निवडणूक आयोग (25 वर्ष)

➡️मानवी हक्क आयोग ,राज्य महिला आयोग 

➡️ नयायालय (SC ,HC,:- अध्यक्ष पात्रता ,इतर न्यायाधीश तरतुदी )

➡️ पचायत राज :-


♦️समिती आणि अहवाल


♦️  गरामपंचायत ,सरपंच ,जिल्हा परिषद ,पंचायत समिती (ह्या बाहेर अजून प्रश्न नाही)

♦️ महान्यायवादी ,महाधिवक्ता (कार्यकाळ ,पदच्युत ? नेमणूक ,कलमे   मतदान?)

♦️ससद ,राज्यविधिमंडल :- विधेयक ,zero hour,  प्रस्ताव ,समित्या करा .

♦️पतप्रधान ,मुख्यमंत्री कार्य तरतुदी .

♦️घटनादुरुस्ती :- प्रकार ,संमती कधी पर्यंत करा .

♦️ CAG :- कार्यकाळ ,पदच्युत पद्धत( PYQ FOCUS )



⚠️⚠️वरील सर्व topic focus असू द्या एकदा नजर फिरवून घ्या polity हा अत्यंत सोपा वाटतो परंतु पेपर ला गेल्यावर चांगले चांगल्या लोकांची wicket पडते म्हणून आपली पडायला नको तर हे topic वाचून व्यवस्थित करूनच घ्या 7-8 मार्क्स हमखास मिळतील.


😱वरील विषयाचा मी तज्ञ नाही केवळ आयोगाच्या मागील 10 वर्षाच्या ANALYSIS वरून हे TOPIC काढलेले आहे ह्याची सर्वांनी नोंद घ्यावी नसेल केले हे टॉपिक तर नक्की करा झाला तर 1000% टक्के फायदा आणि 0% तोटा होईल ही शाश्वती😜😜


पंचायतराज संबंधित घटनादुरुत्या

७३ वी घटना दुरुस्ती ( १९९२ – ९३ )

           ग्रामविकास राष्ट्रविकासाचा मूलभूत पाया मानला जातो. भारतीय राह्यघटनेच्या कलम ४० मध्ये ग्रामपंचायतीचा उल्लेख आढळतो. परंतु हे कलम राज्याच्या मार्गदर्शक तत्वामध्ये येत असल्यामुळे याकडे राज्यांनी दुर्लक्ष केले. भारतामध्ये प्राचीन कालखंडापासून पंचायतराज संस्था अस्तित्वात आहेत. परंतु या संस्थांना घटनात्मक दर्जा नसल्यामुळे पाहिजे त्या प्रमाणामध्ये या संस्थांचा विकास झाला नाही. पंचायतराज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात यावा. अशी शिफारस सर्वप्रथम १९८६ मध्ये डॉ. एल. एम. सिंघवी या समितीने केली होती.


            ग्रामीण भागात सत्तेचे विकेंद्रीकरण होण्यासाठी व पंचायतराज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा देण्यासाठी पहिला प्रयत्न राजीव गांधी यांनी केला ‘नया पंचायतराज’ नावाचे ६४ वे घटनादुरुस्ती विधेयक १९८९ ला संसदेत सादर केले. परंतु अपयश आले. तसेच व्ही. पी. सिंग व चंद्रशेखर यांनीही प्रयत्न केले.


– पंचायतराज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात यावा अशी शिफारस प्रथम डॉ. एल. एम. सिंघवी यांनी केली.

– राजीव गांधी यांनी सर्वप्रथम १५ मे  १९८९ ला ‘नाय पंचायतराज’ नावाचे ६४ वे पंचायतराज घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर केले.

– १९८९ ला व्ही. पी.सिंग व चंद्रशेखर यांनीही पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्याचा प्रयत्न केले.

– १९९० ला लोकसभा विसर्जित झालयामुळे या विधेयकावर चर्चा होऊ शकली नाही.

-१९९२ ला पी. व्ही. नरसिंहराव यांनी पंचायतराज संबधी ७३ वे घटना दुरुस्ती विधेयक तयार केले.

– २२ डिसेंबर १९९२ ला या विधेयकावर लोकसभेत बहुमत सिद्ध.

– २३ डिसेंबर १९९२ ला या विधेयकावर राज्यसभेत बहुमत सिद्ध. व त्यानंतर या विधेयकास १७ राज्याची विधिमंडळाची मंजुरी मिळाली.

– २० एप्रिल १९९३ ला या विधयेकावर राष्टत्रपतीची स्वाक्षरी होऊन पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त झाला.

– २४ एप्रिल १९९३ पासून ७३ व्या घटना दुरुस्तीच्या अंबलबजावणी सुरु.

– २४ एप्रिल १९९४ पर्यंत या शिफारशी सर्व राज्यांना लागू करण्याचे बंधनकारक आले.

– २०१० पासून २४ एप्रिल हा दिवस संपूर्ण देशामध्ये ‘पंचायतराज दिन’ म्हणून पाळला जातो.

– भारतीय राज्यघटनेच्या कलम २४३ ( A ते O ) मध्ये पंचायतराजची तरतूद करण्यात आली. व भारतीय राज्यघटनेला ११ वे परिशिष्ट जोडण्यात आले व त्यामध्ये एकूण २९ विषयांचा समावेश करण्यांत आला आहे.

– ७३ व्या घटनादुरुस्ती विधेयकास बिहार व पश्चिम बंगाल या राज्यांनी विरोध दर्शविला होता.


 ७३ व्या घटनादुरुस्तीचे वैशिष्ट्य / परिणाम / भूमिका :


१) पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त कलम २४३ ( A ते O )

2) राज्यघटनेला अकरावे परिशिष्ट जोडण्यात आले. ( त्यामध्ये एकूण २९ विषयांचा समावेश आहे. )

३) जिल्हा ग्रामसभा व पंचायत व्याख्या कलम ( २४३ )

४) ग्रामसभेला घटनात्मक दर्जा प्राप्त कलम २४३ ( A )

५) त्रिस्तरीय पंचायत राज संस्थेची तरतूद कलम २४३ ( B )

६) पंचायत राज संस्थांची रचना निश्चित कलम २४३ ( C )

७) पंचायत राजमध्ये राखीव जागांची तरतूद कलम २४३ ( D )

अ ) महिलांसाठी ३३ टक्के राखीव जागा

ब ) इतर मागासवर्गीय ( OBC ) २७ टक्के राखीव जागा

क ) अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती ( SC / ST ) यांना लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव जागा.


८) पंचायतीत राज संस्थांचा कार्यकाल निश्चित कलम २४३ (E)

९) पंचायत राज सदस्यांची अपात्रता कलम २४३ ( F )

१०) पंचायतराजसंस्था सत्ता अधिकार व जवाबदाऱ्या २४३ ( G )

११) पंचायत राज संस्थासंबधी वित्तीय तरतुदी कलम २४३ ( H )

१२) राज्य वित्त आयोगाची स्थापना कलम २४३ ( I )

१३) पंचायत राज संस्थांचे हिशोब व ऑडिट कलम २४३ ( J )

१४) पंच्यात्तराजच्या निवडणूका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोग कलम २४३ ( K )

१५) केंद्रशासित प्रदेशाबाबत तरतुदी कलम २४३ ( L )

१६) काही प्रदेशाला ७३ व्या घटनादुरुस्तीमधून सूट कलम २४३ ( M )

१७) सध्या अस्तित्वात असलेल्या पंचायती चालू ठेवणे कलम २४३ ( N )

१८) पंचायत संस्थांचा निवडणूक प्रक्रियेत न्यायालयाचा हस्तक्षेप नाही कलम २४३ ( O )



अर्थव्यवस्था प्रश्न सराव


1) भारतात आर्थिक नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने रुजावे यासाठी सर्वप्रथम प्रयत्नात येतात.

   अ) श्री. एम. एन. रॉय यांचे पुस्तक “प्लॅन्ड इकॉनॉमी फॉर इंडिया”

   ब) श्री. विश्वेश्वरय्या यांचे “टेन यिअर पिपल्स प्लॅन”

        वरील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

   1) केवळ अ   

   2) केवळ ब 

   3) दोन्ही     

   4) एकही नाही


उत्तर :- 4


2) राज्यांचा एकत्रित निधी वाढवण्यासाठी खालीलपैकी कोणती उपाययोजना बाराव्या वित्त आयोगाने (2005-10) सुचविली आहे ?

   1) ग्रामपंचायत आणि नगरपालिकांचा वित्तीय साधनांना पूरक निधी

   2) विकेंद्रीकरणाच्या प्रक्रियेस प्रोत्साहन देणे

   3) रस्ते आणि पूल बांधणे

   4) आर्थिक विकासास चालना देणे


उत्तर :- 2


3) भारताच्या दहाव्या पंचवार्षिक योजनेनुसार (2002-2007) शेती क्षेत्रामधून अजूनही ............. टक्के रोजगार निर्मिती होत आहे.

   1) 50.3   

   2) 40.4    

   3) 45.0     

  4) 58.4


उत्तर :- 1


4) दारिद्रय निर्मुलन (गरीबी हटाओ) आणि आत्मनिर्भरता ही .............. पंचवार्षिक योजनेची प्रमुख उद्दिष्टे होती.

1) तिस-या    

2) पाचव्या   

3) दुस-या    

4) सहाव्या


उत्तर :- 2


5) उत्तरांचल, छत्तीसगड, झारखंड या राज्यांची निर्मिती ............. या पंचवार्षिक योजनेत झाली.

   1) नवव्या    

  2) सातव्या  

  3) आठव्या   

  4) वरीलपैकी नाही


उत्तर :- 1



6) योग्य जोडया जुळवा.

   अ) 1 ली योजना      i) उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरण प्रतिमान    

   ब) 2 री योजना      ii) हॅरॉड, डोमर प्रतिमान

   क) 8 वी योजना      iii) महालनोबिस प्रतिमान

   ड) 11 वी योजना    iv) पुरा प्रतिमान

  अ  ब  क  ड

         1) i  ii  iii  iv

         2) ii  iii  iv  i

         3) ii  iii  i  iv

         4) iv  i  ii  iii


उत्तर :- 3


7) खालीलपैकी कोणते घटक भारतामधील  आर्थिक नियोजनाचे अपयश आहेत ?

   अ) अल्प दरडोई उत्पन्न आणि वृद्धी दर

   ब) दारिद्रय आणि बेकारी

   क)‍ संथ औद्योगिकरण

   ड) उत्पन्न आणि संपत्तीमधील विषमता

   1) ब, ड आणि क 

   2) अ आणि ब   

   3) अ, ब आणि क  

  4) ब आणि ड


उत्तर :- 4


8) भारतीय नियोजन मंडळाने प्रादेशिक असमतोल कमी करण्यासाठी धोरणात्मक उपाय योजना स्वीकारलेल्या आहेत. त्या 

     खालीलप्रमाणे –

   अ) मागास प्रदेशाचा प्रत्यक्ष विकास करण्यासाठी विशेष क्षेत्र विकास कार्यक्रम राबविणे.

   ब) मागास प्रदेशातील उद्योग प्रकल्पांना सवलतीचा वित्तपुरवठा स्टेट बँक ऑफ इंडिया कडून देणे.

   क) मागास प्रदेशात खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे.

         वरीलपैकी कोणते/ती विधान/ ने बरोबर आहे/ आहेत  ?


   1) अ आणि क     

   2) ब आणि क   

   3) फक्त अ    

   4) अ, ब आणि क


उत्तर :- 1


9) भारतातील आठ अग्रगण्य उद्योगपतींनी 1950 च्या दशकात तयार केलेल्या आर्थिक विकासाच्या योजनेस ............ म्हणतात.

   1) बॉम्बे प्लॅन (योजना)   

   2) गांधी योजना   

   3) नेहरू योजना   

   4) पंचवार्षिक योजना


उत्तर :- 1


10) भारतातील कोणत्या राज्याने पहिल्यांदा विकेंद्रीत नियोजन अंगिकारले ?

     1) कर्नाटक  

     2) महाराष्ट्र    

     3) गुजरात  

    4) राजस्थान


उत्तर :- 4

आतरराज्यीय जलविवाद न्यायाधिकरणे

💥 ( Mpsc Combine focus)

▪️कष्णा ( 1969) :- महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश

▪️गोदावरी (1969):-  महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रधेश, ओरीसा

▪️नर्मदा (1969) :- राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र

▪️रावी व बियास ( 1986) :- पंजाब, हरियाणा, राजस्थान

▪️कावेरी (1990) :- कर्नाटक, केरळ, तामीळनाडू, पाँडेचरी

▪️कष्णा - 2 (2004 ) :- महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश

▪️वसंधरा (2010) :- ओडीसा, आंध्रप्रदेश

▪️महादयी (2010):- गोवा, कर्नाटक, माहाराष्ट्र.

▪️महानदी (6 ऑगस्ट 2018 ) :- ओडीसा, छत्तीसगड.

१९९१ च्या नरसिंहम समितीच्या शिफारशी


🅾️आर्थिक व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी एम. नरसिंहम यांनी  1991 मध्ये खालील शिफारसी केल्या.

१. या समितीने पुढील पाच वर्षांत कायदेशीर तरलता प्रमाण (एसएलआर) 38. cent टक्क्यांवरून 28 टक्क्यांपर्यंत तरलतेचे प्रमाण कमी करण्याची शिफारस केली.

२. या समितीने निर्देशित कर्ज कार्यक्रम रद्द करण्याची शिफारस केली.


🅾️या समितीच्या मते व्याज दर बाजार दलांनी निश्चित केले पाहिजेत. व्याजदराच्या निर्धारणात रिझर्व्ह बँकेने हस्तक्षेप करू नये.

🅾️या समितीने बँकांची लेखा प्रणाली सुधारण्याबाबतही सांगितले.

🅾️या समितीने बँकांच्या कर्जाची वेळेवर पुनर्प्राप्ती करण्यासाठी विशेष न्यायाधिकरण स्थापनेवर जोर दिला.

🅾️. नरसिंहम समितीने बँकांच्या पुनर्रचनेवरही भर दिला. या समितीनुसार or किंवा banks आंतरराष्ट्रीय बँका, or किंवा १० राष्ट्रीय बँका आणि काही स्थानिक बँका आणि काही ग्रामीण बँका एका देशाच्या आत असाव्यात.

🅾️ या समितीने शाखा परवाना रद्द करण्याची शिफारस केली.

🅾️नरसिंहम समितीने आपल्या देशात परकीय बँकिंगला प्रोत्साहन देण्याची शिफारस केली.

🅾️. या समितीने बँकांवरील दुहेरी नियंत्रण रद्द करण्याची शिफारस केली.

🅾️यापूर्वी वित्त मंत्रालय आणि रिझर्व्ह बँकेचे बँकांकडून नियंत्रण होते. केवळ रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखालीच बँकांचे नियंत्रण करावे, अशी सूचना नरसिंहम समितीने केली.

15 April 2025

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.



१. भारत

- हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील चौथा देश ठरला. 
- रशिया, चीन आणि अमेरिकेने ही क्षमता यशस्वीरित्या प्रदर्शित केली
- DRDO ने आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे 30-किलोवॅट लेसर-निर्देशित-ऊर्जा शस्त्र प्रणाली Mk-II(A) DEW ची चाचणी घेतली .

२. तेलंगणा.

- राज्यात अनुसूचित जातींमध्ये आरक्षणाचे वर्गीकरण लागू करणारे तेलंगणा हे भारतातील पहिले राज्य बनले.
- संदर्भ 
"१ ऑगस्ट २०२४ रोजी, दविंदर सिंग विरुद्ध पंजाब राज्य खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने ६:१ बहुमताने निर्णय दिला की राज्य सरकारला संविधानाच्या कलम १५ आणि १६ नुसार आरक्षणाच्या उद्देशाने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमध्ये उप-वर्गीकरण तयार करण्याचा अधिकार आहे"

४. पी. शिवकामी

- नीलम कल्चरल सेंटरने पी. शिवकामी - एक प्रसिद्ध लेखिका, माजी आयएएस अधिकारी आणि कार्यकर्त्या - यांना त्यांच्या महत्त्वपूर्ण साहित्यिक आणि सामाजिक योगदानाची दखल घेऊन व्हर्चोल दलित साहित्य पुरस्कार प्रदान.

५. कार्लोस अल्काराझ.

- स्पॅनिश टेनिस स्टार कार्लोस अल्काराझने उल्लेखनीय लवचिकता दाखवून मोंटे कार्लो मास्टर्स २०२५ चे विजेतेपद पटकावले.
- इटलीच्या लोरेन्झो मुसेट्टीला हरवले.

६. BatEchoMon

- भारतातील पहिली स्वयंचलित वटवाघळांची देखरेख प्रणाली, बॅटइकोमॉन , रिअल-टाइम ध्वनिक विश्लेषण वापरून वटवाघळांच्या प्रजाती शोधण्यासाठी आणि त्यांचे वर्गीकरण करण्यासाठी यशस्वीरित्या विकसित करण्यात आली आहे.
- विकसित: इंडियन इन्स्टिट्यूट फॉर ह्युमन सेटलमेंट्स (IIHS), बेंगळुरू.

७. STELLAR

- केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने ( CEA ) STELLAR लाँच केले , जे भारतातील पहिले पूर्णपणे स्वदेशी संसाधन पर्याप्तता मॉडेल आहे, ज्याचा उद्देश राज्यांमध्ये वीज निर्मिती, प्रसारण आणि साठवणूक नियोजन अनुकूल करणे आहे
- STELLAR हे वीज निर्मिती, प्रसारण, साठवणूक आणि मागणी प्रतिसादाच्या एकात्मिक नियोजनासाठी एक नवीन पिढीचे सॉफ्टवेअर साधन आहे.

13 April 2025

ठळक बातम्या.१३ मार्च २०२५.


१. डॉ. अम्ब्रीश मिथल 

-डॉ. अंबरीश मिथल यांना २०२५ च्या कमिटी ऑफ सायंटिफिक अॅडव्हायझर्स (CSA) मेडल ऑफ अचिव्हमेंटने सन्मानित करण्यात आले.


२. मध्य प्रदेश.

- सागर जिल्ह्यात २५८.६४ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेले एक नवीन वन्यजीव अभयारण्य घोषित केले.
- मध्य प्रदेश सरकारने १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बी.आर. आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त.


३. पद्मश्री पुरस्कार विजेते दरिपल्ली रामय्या ("वनजीवी")

- समर्पित पर्यावरणवादी आणि पद्मश्री पुरस्कार विजेते दरीपल्ली रमैया यांचे तेलंगणातील खम्मम येथे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले.
- "वनजीवी" किंवा "चेट्टू रमैया" म्हणून ओळखले जाते.
- पखम्मम जिल्ह्यात १ कोटींहून अधिक रोपे लावली.
- पद्मश्री पुरस्कार पर्यावरण संवर्धन कार्यासाठी २०१७ मध्ये पुरस्कार मिळाला.

४.विराट कोहली.

- आयपीएलच्या इतिहासात एकत्रित १००० चौकार आणि षटकार मारणारा पहिला खेळाडू बनून विक्रमी नोंद केली.
- बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यादरम्यान.
- त्याच्याकडे आता ७२१ चौकार आणि २७९ षटकार आहेत.

५. मॉरिशस.

- आंतरराष्ट्रीय सौर आघाडी (ISA) सोबत देश भागीदारी फ्रेमवर्क (CPF) वर स्वाक्षरी करणारा मॉरिशस हा पहिला आफ्रिकन देश आणि जागतिक स्तरावर चौथा देश .
- ISA बद्दल 
१.२०१५ मध्ये पॅरिसमधील COP21 दरम्यान भारत आणि फ्रान्सने लाँच केले.
२.ध्येय : जागतिक स्तरावर, विशेषतः उष्णकटिबंधीय देशांमध्ये सौरऊर्जेचा प्रचार करणे.
३.ध्येय : २०३० पर्यंत सौरऊर्जेसाठी १ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक जमवणे.

६.सिंगापूर विमानतळ.

- माद्रिद येथे आयोजित स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड्स २०२५ नुसार सिंगापूर चांगी विमानतळाने पुन्हा एकदा जगातील सर्वोत्तम विमानतळाचा किताब पटकावला.
- सिंगापूर चांगी विमानतळाला १३ व्यांदा जगातील सर्वोत्तम विमानतळाचा किताब मिळाला.
- दिल्ली आयजीआय विमानतळ: भारत आणि दक्षिण आशियातील सर्वोत्तम विमानतळ.
- टॉप ३ विमानतळांची यादी
१.सिंगापूर चांगी विमानतळ / सिंगापूर
२.हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ / कतार
३.टोकियो आंतरराष्ट्रीय विमानतळ (हनेडा) / (जपान)

12 April 2025

ठळक बातम्या.१२ मार्च २०२५.


१. नियतकालिक कामगार शक्ती सर्वेक्षण (PLFS) २०२४ 

- सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जारी केला.
- सध्याच्या साप्ताहिक स्थितीतील कामगार शक्ती निर्देशक (CWS): 
१. अखिल भारतीय कामगार दल सहभाग दर (LFPR):  ५६.२% वर स्थिर राहिला. 
२. कामगार लोकसंख्या प्रमाण (WPR): अखिल भारतीय WPR ५३.५% वर जवळजवळ अपरिवर्तित राहिला.
३. बेरोजगारी दर (UR): अखिल भारतीय बेरोजगारी दर ५.०% वरून ४.९% पर्यंत घसरला. 

२. नवीन पांबन पूल.

- रामेश्वरम आणि भारताच्या मुख्य भूमीमधील संपर्क वाढवणारा भारतातील पहिला उभ्या लिफ्ट रेल्वे सागरी पूल.
- रेल विकास निगम लिमिटेड (RVNL) द्वारे डिझाइन.
- जुन्या पांबन पुलाचे बांधकाम १९११ मध्ये सुरू झाले आणि १९१४ मध्ये वाहतुकीसाठी खुले करण्यात आले . हा भारतातील पहिला समुद्री पूल होता.

३. जगातील पहिलं 3D प्रिंटेड रेल्वे स्टेशन 

-जपानमध्ये फक्त 6 तासांत बांधले.
- जगात प्रथमच, वेस्ट जपान रेल्वे कंपनीने अरीदा सिटीमध्ये 3D प्रिंटेड रेल्वे स्टेशन बांधले.
- नवीन हत्सुशिमा स्टेशन 1948 पासून अस्तित्वात असलेल्या जुन्या लाकडी रचनेच्या जागी बांधण्यात आले.
 
४. महाराष्ट्र.

-' ई-कॅबिनेट’ असणारे महाराष्ट्र सातवे राज्य
- उत्तराखंड, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि त्रिपुरा यांच्यानंतर ‘ई-कॅबिनेट’ प्रणाली लागू करणारे सातवे राज्य.
- ई-कॅबिनेट हे राज्य सरकारांना इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन पद्धतीने कॅबिनेट बैठका आयोजित करण्यासाठी एक शक्तिशाली सॉफ्टवेअर. 
- एनआयसीने विकसित केलेले, ते बैठकांमध्ये तंत्रज्ञानाचा जास्त वापर.

04 April 2025

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग)

- कलम: 315

- स्थापना: 1926

- संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य

- कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती

- काढून टाकण्याचा अधिकार: कलम 317, 


 📚 MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग)

- कलम: 315

- संरचना: 1 अध्यक्ष + 5 सदस्य

- कार्यकाल: 6 वर्षे किंवा 62 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राज्यपाल

- काढून टाकण्याचा अधिकार: कलम 317( राष्ट्रपती)


 🗳️ CEC (मुख्य निवडणूक आयुक्त)

- कलम: 324

- स्थापना: 26 जानेवारी 1950

- संरचना: 1 मुख्य निवडणूक आयुक्त + 2 निवडणूक आयुक्त

- कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती

- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशाच्याप्रमाणे.


 🗳️ SEC (राज्य निवडणूक आयुक्त)

- कलम: 243K/ZK

- संरचना: 1 राज्य निवडणूक आयुक्त

- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राज्यपाल

- काढून टाकण्याचा अधिकार: उच्च न्यायालयाचे न्यायाधीशाच्याप्रमाणे.


 💰 CAG (महालेखा परीक्षक)

- कलम: 148

- स्थापना: 1858

- संरचना: 1 महालेखा परीक्षक

- कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती

- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशाप्रमाणे.


 ⚖️ Lokpal (लोकपाल)

- कायदा: लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम, 2013

- स्थापना: 2019

- संरचना: 1 अध्यक्ष + 8 सदस्य (4 न्यायिक + 4 गैर-न्यायिक)

- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती

- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीच्या आधारे राष्ट्रपती.




⚖️ Lokayukta (लोकायुक्त)

- कायदा: राज्यस्तरीय कायदे

- स्थापना: विविध राज्यांमध्ये साधारणतः 1972-1980

- संरचना: 1 अध्यक्ष + 1 सदस्य (राज्यानुसार बदलतो)

- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राज्यपाल

- काढून टाकण्याचा अधिकार: राज्यस्तरीय कायद्यानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या/उच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार राज्यापल 


 👥 NHRC (राष्ट्रीय मानवाधिकार आयोग)

- कायदा: मानवाधिकार संरक्षण अधिनियम, 1993

- स्थापना: 1993

- संरचना: 1 अध्यक्ष + 12 सदस्य (2 न्यायिक + 3 निलंबित सदस्य + इतर)

- कार्यकाल: 3 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती

- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती.


👥 SHRC (राज्य मानवाधिकार आयोग)

- कायदा: मानवाधिकार संरक्षण अधिनियम, 1993

- स्थापना: विविध राज्यांमध्ये साधारणतः 1994-2001

- संरचना: 1 अध्यक्ष + 2 सदस्य

- कार्यकाल: 3 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राज्यपाल

- काढून टाकण्याचा अधिकार: राज्यपाल सर्वोच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार.


🕵️ CVC (केंद्रीय सतर्कता आयोग)

- कायदा: केंद्रीय सतर्कता आयोग अधिनियम, 2003

- स्थापना: 1964

- संरचना: 1 केंद्रीय सतर्कता आयुक्त + 2 सतर्कता आयुक्त

- कार्यकाल: 4 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती

- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीच्या आधारे राष्ट्रपती.




👨‍⚖️ CAT (केंद्रीय प्रशासनिक न्यायाधिकरण)

- कायदा: प्रशासनिक न्यायाधिकरण अधिनियम, 1985

- स्थापना: 1985

- संरचना: 1 अध्यक्ष + 65 सदस्य

- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती

- काढून टाकण्याचा अधिकार: 


👨‍⚖️  MAT (राज्य प्रशासनिक न्यायाधिकरण)

- कायदा: राज्य प्रशासकीय न्यायाधिकरण अधिनियम, 1985

- स्थापना: 1991

- संरचना: 1 अध्यक्ष + -- सदस्य (वाढवता येते)

- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती

- काढून टाकण्याचा अधिकार: 


📰 PCI (प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया)

- कायदा: प्रेस कौन्सिल अधिनियम, 1978

- स्थापना: 1966

- संरचना: 1 अध्यक्ष + 28 सदस्य

- कार्यकाल: 3 वर्षे

- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती

- काढून टाकण्याचा अधिकार:



 📋 Administrative Reforms Commission (प्रशासनिक सुधार आयोग)

- कायदा: प्रशासनिक सुधार आयोग कायदा, 1966

- स्थापना: 1966

- कामाचा ध्येय: सरकारी प्रणालीचे सुधार आणि महत्त्वाच्या प्रशासनिक क्षेत्रातील समस्यांचे समाधान

- संरचना: 1 अध्यक्ष + अनेक सदस्य

ठळक बातम्या. ०४ मार्च २०२५.

१.छत्तीसगडचा पहिला सुपरक्रिटिकल थर्मल पॉवर प्रकल्प.


- कोरबा जिल्ह्यात पहिला सुपरक्रिटिकल थर्मल पॉवर प्रोजेक्ट (SCTPP) स्थापन होणार.

- आधीच अस्तित्वात असलेल्या १,३४० मेगावॅट क्षमतेच्या प्लांटमध्ये १,३२० मेगावॅट (Mw) ची क्षमता जोडली जाईल.


२. वक्फ कायद्याचे कलम ४०


- वक्फ दुरुस्ती विधेयक २०२५ हे १९९५ च्या विद्यमान वक्फ कायद्यात सुधारणासाठी. 

-सर्वात वादग्रस्त बदल म्हणजे कलम ४० काढून टाकणे.

- वक्फ कायद्याच्या कलम ४० नुसार वक्फ बोर्डाला मालमत्ता वक्फ आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार आहे.

- वक्फ ट्रिब्यूनलमध्ये आव्हान दिल्याशिवाय मंडळाचे निर्णय अंतिम असतात.


३. राजस्थान.


- २७५ रेल्वे स्थानकांसह राजस्थान हे सौरऊर्जा प्रकल्प असलेल्या सर्वाधिक रेल्वे स्थानकांमध्ये देशात आघाडीवर.

- महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर होता, राज्यातील २७० रेल्वे स्थानकांवर सौर ऊर्जा प्रकल्प बसवले.

- भारतीय रेल्वेने २०२५-२६ पर्यंत १००% विद्युतीकरण साध्य करण्याचे लक्ष्य ठेवले आहे . 

- २०३० पर्यंत रेल्वेने निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन करणारे बनण्याचे लक्ष्य ठेवले आहे. 


४. बाकू ते बेलेम रोडमॅप


- ब्राझीलमध्ये झालेल्या ११ व्या ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीत भारताने सर्व ११ ब्रिक्स राष्ट्रांना 'बाकू ते बेलेम रोडमॅप'ला पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

-ज्याचा उद्देश हवामान कृतीसाठी २०३५ पर्यंत दरवर्षी १.३ ट्रिलियन डॉलर्स जमवणे आहे.


५. ChaSTE


- चांद्रयान-३ मोहिमेदरम्यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरून मौल्यवान थर्मल डेटा प्रदान करून, कोणत्याही खगोलीय पिंडाच्या पृष्ठभागाखाली यशस्वीरित्या प्रवेश करणारे आणि तापमान मोजणारे ChaSTE हे पहिले उपकरण बनले.

- १ सेमी अंतराने ते १० सेमी खोलीपर्यंत तापमानातील फरक मोजते .


६.कन्नडिप्पया जीआय टॅग


- केरळमधील पारंपारिक आदिवासी चटई असलेल्या कन्नडिप्पयाला भौगोलिक संकेत (GI) टॅग देण्यात आला आहे.

- ज्यामुळे अशी मान्यता मिळालेली ही राज्यातील पहिली आदिवासी हस्तकला आहे.

- कन्नडिप्पया , ज्याचा अर्थ "आरशाची चटई" आहे, ही एक हाताने विणलेली चटई आहे जी रीड बांबूच्या मऊ आतील थरांपासून बनवली जाते .


बांगलादेशातील घटनांचे दक्षिण आशियातील अल्पसंख्याकांवरील प्रतिबिंब


🔹 बांगलादेशातील राजकीय अस्थिरता, विशेषतः ऑगस्ट 2024 मध्ये पंतप्रधान शेख हसीना यांची सत्ता गमावल्यावर हिंदूंवरील वाढलेला हिंसाचार, यामुळे धार्मिक अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

🔹 संपूर्ण दक्षिण आशियात अल्पसंख्याकांच्या परिस्थितीचा सातत्याने ऱ्हास होत आहे, ज्यामुळे या भागातील शांतता आणि स्थिरता धोक्यात आली आहे.


🔥 फाळणी आणि तिचे परिणाम

📌 1947 ची फाळणी धार्मिक अल्पसंख्याकांचे प्रश्न सोडवण्यासाठी करण्यात आली होती, विशेषतः हिंदू-मुस्लिम वाद सोडवण्यासाठी.

📌 परंतु, यामुळे धार्मिक ध्रुवीकरण वाढले आणि भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशात अल्पसंख्याकांवरील अन्याय आणि हिंसा वाढली.

📌 मोहाजिर, निर्वासित हिंदू आणि निर्वासित मुस्लिम यांच्या विस्थापनामुळे मोठे सामाजिक आणि राजकीय तणाव निर्माण झाले.


💢 फाळणीचे परिणाम:

✅ भारतात मुस्लिम अल्पसंख्यांकांसाठी काही प्रमाणात सुरक्षितता होती, पण पाकिस्तान आणि बांगलादेशात हिंदूंची स्थिती खूपच बिकट झाली.

✅ हिंदू आणि ख्रिश्चन यांसारख्या इतर अल्पसंख्याकांवरही हल्ले होत राहिले.


🤝 नेहरू-लियाकत करार आणि त्याचे अपयश

📜 1950 मध्ये नेहरू-लियाकत करार झाला, जो भारत-पाकिस्तान दरम्यान अल्पसंख्याकांचे हक्क सुनिश्चित करण्यासाठी करण्यात आला होता.

❌ परंतु, पाकिस्तानात मुस्लिम बहुसंख्य धोरणामुळे बांगलादेशातील बंगाली मुस्लिमांचे हक्क डावलले गेले.

⚠️ परिणामी, 1971 मध्ये बांगलादेशचा जन्म झाला.


🚨 महत्त्वाचा धडा:

🔹 केवळ राजकीय करार आणि करारपत्रे पुरेसे नाहीत!

🔹 लोकशाही मूल्ये आणि सामाजिक समरसता हीच अल्पसंख्यकांच्या सुरक्षेची खरी हमी ठरू शकते.


🇮🇳🤝🇧🇩 भारत-बांगलादेश संबंध आणि हिंदूंची स्थिती

🔹 1971 मध्ये भारताने बांगलादेशाच्या मुक्तिसंग्रामात मोठी भूमिका बजावली, पण सध्या दोन्ही देशांतील संबंध तणावपूर्ण आहेत.

🔹 बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याक सतत अत्याचाराचा बळी ठरत आहेत.

🔹 काही विश्लेषकांचे मत आहे की ही हिंसा फक्त शेख हसीनाच्या पतनानंतरची राजकीय उलथापालथ नसून, बांगलादेशातील वाढत्या धार्मिक कट्टरतेचे प्रतिबिंब आहे.


💡 भारताची भूमिका:

✅ भारताने हिंदूंच्या सुरक्षेच्या मुद्द्याला केवळ द्विपक्षीय संबंधांच्या चौकटीत पाहू नये.

✅ बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण हे संपूर्ण दक्षिण आशियाच्या शांततेसाठी आवश्यक आहे.

🏛️ दक्षिण आशियातील अल्पसंख्याकांचे भविष्य


💡 सुधारणा कशा करता येतील?

🔹 🆕 नवीन धोरणे आणि कायदे – धार्मिक अल्पसंख्याकांचे संरक्षण करणाऱ्या सुधारित धोरणांची आवश्यकता आहे.

🔹 📚 इतिहासाचा योग्य अभ्यास – फाळणीमधील चुकीच्या निर्णयांपासून धडा घेऊन नव्या पिढीला सर्वसमावेशक दृष्टिकोन शिकवला पाहिजे.

🔹 🤝 एकत्रित प्रयत्नांची गरज – भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश यांनी अल्पसंख्याकांच्या अधिकारांसाठी संयुक्त प्रयत्न करायला हवेत.


🚨 भारताची जबाबदारी:

❌ केवळ बांगलादेशातील हिंदूंसाठी चिंता व्यक्त करून भारतीय मुस्लिमांकडे दुर्लक्ष करणे चुकीचे आहे.

✅ सर्व अल्पसंख्याकांच्या सुरक्षेसाठी तटस्थ आणि प्रभावी धोरण हवे.


📢 निष्कर्ष

✅ धार्मिक अल्पसंख्यांकांचा प्रश्न हा केवळ इतिहासातील घटना नसून, तो दक्षिण आशियातील शांततेसाठी निर्णायक मुद्दा आहे.

✅ धार्मिक सहिष्णुता आणि सामाजिक समरसता वाढवण्यासाठी प्रभावी धोरणे आवश्यक आहेत.

✅ राजकीय पक्षांनी केवळ बहुसंख्याकांच्या भावनांवर राजकारण न करता, सर्वधर्मीयांना समान अधिकार मिळतील याकडे लक्ष द्यावे.

📌 शांतता आणि स्थिरता राखण्यासाठी भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश यांनी एकत्र येऊन अल्पसंख्याकांच्या हक्कांसाठी ठोस पावले उचलणे ही काळाची गरज आहे! ✊🔥


भारतीय संघाची एकात्मक वैशिष्ट्ये


१) राज्यघटनेची लवचिकता

2) केंद्राकडे अधिक अधिकार

३) राज्यसभेत राज्यांचे असमान प्रतिनिधित्व 

४) कार्यपालिका हा विधिमंडळाचा एक भाग आहे 

5) राज्यसभेपेक्षा लोकसभा अधिक शक्तिशाली 

६) आणीबाणीचे अधिकार 

7) एकात्मिक न्यायपालिका 

8) एकल नागरिकता   

९) राज्यपालांची नियुक्ती

10) नव्या राज्यांची निर्मिती                                                                                                                                                                                                                                                                                                 11) अखिल भारतीय सेवा 

12) एकात्मिक निवडणूक यंत्रणा  

13) राज्यांच्या विधेयकांवरील VETO  

14) इंटिग्रेटेड ऑडिट मशिनरी 

15) प्रमुख अधिकाऱ्यांना हटविण्याचे अधिकार

काही महत्त्वाचे प्रश्न व उत्तर


✏️  मानवी शरीरातील सर्वात मोठा स्नायू कोणता ? 

👉 Gluteus Maximus ( मांडीमध्ये )  


✏️  मानवी हृदयाचे वजन सामान्यता किती असते ? 

👉 360 ग्रॅम  


✏️ पक्ष्यांचे हृदय किती ( Chamber ) चेंबर मध्ये विभागलेले असते ?

 👉 4 चेंबर   


✏️   वनस्पती आणि प्राणी यांना जोडणारा दुवा म्हणून कशाचा उल्लेख कराल ? 

 👉 युग्लिना


✏️ चिंच आणि द्राक्ष मध्ये कोणते आम्ल असते ? 

 👉 टॉर्टरिक आम्ल 


✏️  अन्न पचवण्यासाठी _ आम्लाचा उपयोग होतो ? 

👉  हायड्रोक्लोरिक आम्ल ( HCL ) 


✏️ ' बेकिंग पावडर ' तयार करण्यासाठी कोणते आम्ल वापरले जाते ? 

👉  टोर्टरिक आम्ल 


✏️ ' तडीत वाहक ' बनवण्यासाठी कशाचा वापर करतात ? 

 👉 तांबे


✏️ ' तडीत वाहकाचा ' शोध कोणी लावला ?  

👉 बेंजामिन फ्रँकलिन 


✏️ ' Islets of Langerhans ' शरीरातील कोणत्या भागाशी संबंधित आहे  ?

 👉  Pancreas ( स्वादुपिंड ) 


✏️  हृदयापासून शरीराकडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिनीला काय म्हणतात ? 

👉  Artery ( धमनी  )


✏️  मानवी हृदय किती ( Chamber ) चेंबर मध्ये विभागलेले असते  ? 

👉  4 चेंबर  


✏️  मृत RBC नष्ट करण्याचे काम शरीरातील कोणता भाग करतो ? 

👉  यकृत


✏️ मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते ? 

👉  फिमर 


✏️  ' ग्लूकोज + ग्लूकोज  ' ह्या दोन रेणू पासून बनणारी शर्करा कोणती ? 

👉   माल्टोज


✏️ सशामध्ये किती गुणसूत्रे असतात ? 

👉 44 गुणसूत्र


✏️  गुणसूत्र ( Cromosome ) ही संज्ञा कोणी दिली  ? 

👉   डब्ल्यू. वॉल्टेयर  


✏️ ' Entomology ' मध्ये कशाचा अभ्यास केला जातो ? 

👉 कीटकांचा 


✏️  Pisum sativa हे कशाचे वैज्ञानिक नाव आहे  ? 

👉  वाटाणा 


✏️  Centrosome ( तारकाकाय  ) शोध कोणी लावला  ? 

👉  बोबेरी   


✏️  ' Factory of protein ' कशाला म्हटले जाते ? 

👉  रायबोसोम्स ( Ribosome ) 


✏️  पेशींमधील ' निर्जीव रचना ' म्हणून कशाचा उल्लेख केला जातो ? 

👉  Vacuoles 


✏️ निष्क्रिय म्हणजेच नोबेल वायूचा शोध लावण्याचे श्रेय कोणाला दिले जाते ? 

👉  Ramsay ( रॅम्से ) 


✏️ वायुमंडळामध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा निष्क्रिय वायू कोणता ? 

👉 ऑरगॉन ( Ar  ) 


✏️ विमानांच्या टायरमध्ये कोणता वायू भरलेला असतो  ? 

👉  हेलियम 


✏️  गॅमा किरणांचे नामकरण कोणी केले होते ? 

👉 रुदरफोर्ड 


✏️   सर्व विद्युत चुंबकीय तरंग कशाच्या बनलेल्या असतात  ? 

👉  फोटॉन  


✏️  मानवाची कमाल श्राव्य सीमा किती ( डेसिबल ) असते  ?

 👉  95 dB  


✏️  पाऱ्यापासून ( mercury ) तयार होणाऱ्या थर्मामीटरचा शोध कोणी लावला ? 

👉  फॅरेनहाईट 


✏️  बेंझिनचा शोध कोणी लावला  ? 

👉  मायकल फॅरेडे  


✏️ आधुनिक आवर्त सारणी मध्ये एकूण किती अधातू मूलद्रव्य आहेत ? 

👉 22 अधातू  


✏️  अन्नधान्यांचे संरक्षक म्हणून कशाचा वापर केला जातो ? 

👉 ॲल्युमिनियम फॉस्फाईड 


✏️ गन पावडर ( बारुद ) चा शोध कोणी लावला  ? 

👉 रॉजर बेकन 

विशेषणाचे प्रकार


विशेषण म्हणजे नाम किंवा सर्वनामाच्या गुण, संख्या, प्रमाण, स्वरूप, रंग, अवस्था किंवा इतर वैशिष्ट्यांचे वर्णन करणारे शब्द. विशेषणांचे मुख्य प्रकार खालीलप्रमाणे आहेत:


१. गुणवाचक विशेषण (Adjective of Quality)

 • जे विशेषण एखाद्या नामाचा गुणधर्म किंवा स्वरूप दर्शवतात.

 • उदा: सुंदर (सुंदर फुल), मोठा (मोठा डोंगर), थंड (थंड पाणी)


२. संख्यावाचक विशेषण (Adjective of Number)

 • जे नामांची संख्या किंवा क्रम दर्शवतात.

 • प्रकार:

 • निश्चित संख्यावाचक: जे ठरावीक संख्या दर्शवतात.

 • उदा: एक (एक मुलगा), दोन (दोन झाडे), पाच (पाच पुस्तके)

 • अनिश्चित संख्यावाचक: जे अचूक संख्या न दर्शवता काही प्रमाणात असण्याचा अंदाज देतात.

 • उदा: काही (काही मुले), बरेच (बरेच लोक)

 • क्रमवाचक: जे नामांचा क्रम दर्शवतात.

 • उदा: पहिला (पहिला क्रमांक), तिसरा (तिसरा दिवस)


३. प्रमाणवाचक विशेषण (Adjective of Quantity)

 • जे एखाद्या वस्तूचे प्रमाण दर्शवतात.

 • उदा: थोडे (थोडे दूध), पुरेसे (पुरेसा वेळ), संपूर्ण (संपूर्ण गाव)


४. दर्शक विशेषण (Demonstrative Adjective)

 • जे एखाद्या नामाचा निर्देश करतात.

 • उदा: हा (हा मुलगा), ती (ती स्त्री), ते (ते घर)


५. संबंधवाचक विशेषण (Possessive Adjective)

 • जे कोणत्या तरी व्यक्तीच्या किंवा वस्तूच्या मालकीचा संबंध दर्शवतात.

 • उदा: माझा (माझा मित्र), तुझी (तुझी वहिनी), त्यांचे (त्यांचे घर)


६. प्रश्नार्थक विशेषण (Interrogative Adjective)

 • जे प्रश्न विचारण्यासाठी वापरले जातात.

 • उदा: कोणता (कोणता रंग?), किती (किती वेळ?), कसला (कसला खेळ?)


७. सार्वनामिक विशेषण (Relative Adjective)

 • जे वाक्यात आधी आलेल्या नामाशी संबंधित असतात.

 • उदा: जसा (जसा गुरु, तसे शिष्य), जितका (जितका अभ्यास, तितका फायदा)

खाली ५० महत्त्वाचे मराठी वाकप्रचार आणि त्यांचे अर्थ दिले आहेत:


१. अडला हरी गाढवाचे पाय धरी – अडचणीत सापडलेला कोणाकडूनही मदत घेतो.


२. अंधारात तीर मारणे – अंदाजाने काही करणे.


३. अक्कल गहाण टाकणे – विचार न करता वागणे.


४. आगीतून फुफाट्यात पडणे – एका संकटातून बाहेर येताच दुसऱ्या संकटात अडकणे.


५. आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन – अपेक्षेपेक्षा अधिक लाभ मिळणे.


६. उगाच तोंडाला फेस आणणे – विनाकारण वाद घालणे.


७. उचलले पाउल आणि लागली बेडी – काही करण्याआधीच अडचण येणे.


८. एखाद्याच्या तोंडाला पाने पुसणे – कुणाला काहीच न मिळू देणे.


९. ओसरीला कुत्रे भुंकत नाही – कोणतीही किंमत न उरणे.


१०. काकास हेवा करणे – आपल्यापेक्षा कमी असलेल्या व्यक्तीचा हेवा करणे.


११. कापसाला आग लागणे – विनाकारण मोठे नुकसान होणे.


१२. काडीमोड करणे – संबंध तोडणे.


१३. काठावरचे लोणी खाणे – दुसऱ्याच्या श्रमावर आपले पोट भरणे.


१४. कानाला खडा लावणे – पुन्हा अशी चूक न करण्याची शपथ घेणे.


१५. कुळकर्णीपेक्षा शिपाई मोठा – लहान व्यक्तीकडे अधिक सत्ता असणे.


१६. खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी – ऐषारामात जगायचे नाहीतर काहीच नाही.


१७. खाल्ल्या मिठाला जागणे – प्रामाणिक राहणे.


१८. गाढवाला गुळाचा गोडवा काय? – अज्ञानी व्यक्तीला चांगल्या गोष्टीचे महत्त्व नसते.


१९. गुळाला मुंगळ्यांची लागण होणे – चांगल्या गोष्टीकडे अनेक जण आकर्षित होणे.


२०. गोऱ्ह्याला गोचीड न लागणे – कोणतीही अडचण न येणे.


२१. चोराच्या उलट्या बोंबा – चुकी करणारी व्यक्तीच इतरांना दोष देणे.


२२. चोराच्या हाती काठी – चोरालाच अधिकार मिळणे.


२३. चार लोकांत नाचणे – इतरांसमोर अपमान होणे.


२४. झाडून टाकणे – पूर्ण साफसफाई करणे किंवा काढून टाकणे.


२५. टाळी दोन हातांनी वाजते – भांडणात दोघेही जबाबदार असतात.


२६. डोक्यावरून पाणी जाणे – परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाणे.


२७. तोंड चालवणे – फक्त बोलणे पण कृती न करणे.


२८. तोंड उघडता तोच घोळ – ज्या व्यक्तीने काही बोलले की अडचण निर्माण होते.


२९. तोंडपाटी करणे – पाठांतर करणे.


३०. तोंडाला पाने पुसणे – काहीच न मिळणे.


३१. दगड उचलून पायावर मारणे – स्वतःच स्वतःचे नुकसान करून घेणे.


३२. दुधाची तहान ताकावर भागवणे – गरजेची गोष्ट न मिळाल्यावर दुसऱ्याच गोष्टीवर समाधान मानणे.


३३. डोंगर पोखरून उंदीर निघाला – खूप मेहनत घेतल्यावर काहीही उपयोग न होणे.


३४. देव तारी त्याला कोण मारी – नशिबाने ज्याचे रक्षण केले आहे त्याला कोणीही नुकसान पोहोचवू शकत नाही.


३५. नाचता येईना अंगण वाकडे – स्वतःला काही येत नसताना बाहेरच्या गोष्टींवर दोष देणे.


३६. पाय आपटणे – हट्टीपणा करणे.


३७. पाठ थोपटणे – कौतुक करणे.


३८. पाय घसरला की डोक्यावर आपटतो – चुकीचे पाऊल उचलल्यावर मोठे नुकसान होणे.


३९. पीळ पडणे – क्रोध येणे किंवा वैतागणे.


४०. फडतूस माणूस – साधी किंवा कमी महत्त्वाची व्यक्ती.


४१. बकरीसारखे वागणे – भित्रेपणाने वागणे.


४२. बैल गेला आणि झोपा केला – वेळ निघून गेल्यावर उपाय शोधणे.


४३. भाजीला मीठ जसे – जसे शोभून दिसते तसे.


४४. माथी मारणे – जबरदस्तीने जबाबदारी घालणे.


४५. माकडाच्या हाती कोलीत – अज्ञान व्यक्तीकडे मोठी सत्ता देणे.


४६. मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? – कठीण काम करायला कोणी पुढे येत नाही.


४७. मुसळ केरात टाकणे – उपयुक्त वस्तू फेकून देणे.


४८. रांगोळी उठवणे – नाश करणे.


४९. लंगडी मारणे – कपट करणे.


५०. वेळेवर तुरी सांडणे – योग्य वेळी काम न होणे.

ISRO महत्त्वपूर्ण मोहीमा



🔹आर्यभट्ट (1975)  :- पहिला भारतीय उपग्रह.

🔸INSAT (1983)  : दूरसंचार, प्रसारण, आणि हवामानशास्त्र यासाठी उपग्रह मालिका.

🔹चांद्रयान-1 (2008)  :- चंद्रावर पाण्याचा शोध.

🔸मंगलयान (2014) :- पहिली भारतीय मंगळ मोहीम.

🔹PSLV (2017)  : एकाच मोहिमेत 104 उपग्रह प्रक्षेपित केले.

🔸चांद्रयान-2 (2019)  :- चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचे अन्वेषण.

🔹चांद्रयान-3 (2023)  :- चंद्रावर यशस्वी उतरण.

🔸आदित्य-L1 (2023)  : पहिली सौर मोहीम सूर्याचा अभ्यास करण्यासाठी.

🔹NISAR (2024)  :- 12 दिवसांत पृथ्वीचे mapping करणार (संयुक्त NASA-ISRO मोहीम).

🔸गगनयान (2024)  :- पहिली मानव अवकाश मोहीम.

🔹SPADEX (2024)  : जुळी उपग्रह मोहीम.

🔸मंगलयान-2 (2024)  : दुसरी मंगळ मोहीम.

🔹शुक्रयान-1 (2031)  : पहिली शुक्र ग्रह मोहीम.

🔸चांद्रयान-4 (2027)  : चंद्रावरून नमुने गोळा करून पृथ्वीवर आणणारी मोहीम, JAXA सह सहयोगाने.

दोन मार्क साठी फिक्स हे लक्षातच ठेवा :


✅ पहिला मधुबन हनी पार्क - महाबळेश्वर ( सातारा )

✅ दुसरा मधुबन हनी पार्क - बोरिवली ( मुंबई )


✅ पहिले सौरग्राम गाव - मान्याचीवाडी ( सातारा )

✅ पहिले फळाचे गाव - धुमाळवाडी ( सातारा )


✅ पहिले पुस्तकाचे गाव - भिलार ( सातारा )

✅ पहिले मधाचे गाव - मांघर ( सातारा )


✅ पहिले झाडांचे पुनर्वसन गाव - म्हसवे ( सातारा )

✅ पहिले डिजिटल गाव - हरिसाल ( अमरावती )


✅ पहिले कॅशलेस गाव - घसई ( ठाणे )

✅ पहिले वायफाय गाव - पाचगाव ( नागपूर ) 


✅ पहिले आधार गाव - टेंभली ( नंदुरबार )

✅ पहिले कवितांचे गाव - उभादांडा ( सिंधुदुर्ग )

✅ भारताचे पहिले गाव - माना ( उत्तराखंड )

काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा


◾️मध्यप्रदेश : ऑनलाईन समन्स आणि वॉरंट सुरू करणारे पाहिले राज्य बनले आहे

◾️महाराष्ट्र : 500 अब्ज डॉलर अर्थव्यवस्थेचा टप्पा ओलांडणारे भारतातील पहिले राज्य

◾️तमिळनाडू - कन्याकुमारी येथे समुद्रावरील भारतातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन झाले

◾️महाराष्ट्र : धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित करणारे भारतातील पाहिले राज्य

◾️महाराष्ट्र : गुगल क्लासरुम सुरु करणारे देशातील पहिलं राज्य

◾️केरळ : भारतातील पहिले 100% साक्षर राज्य

◾️त्रिपुरा : प्लॅस्टिक ओळखपत्र मतदारांना वाटणारे पहिले राज्य 

◾️आंध्रप्रदेश : जन-सुरक्षा कायदा करणारे पहिले राज्य 

◾️महाराष्ट्र - गुन्हे सिद्धतेकरिता मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन' सुरू करणारे देशातील पहिले राज्य 

◾️पश्चिम बंगाल : मानवाधिकार न्यायालय सुरू करणारे पहिले राज्य :- पश्चिम बंगाल

◾️उत्तराखंड : लोकायुक्त संमत करणारे पहिले राज्य 

◾️राज्यस्थान : जानकी दूध बँक चालविणारे पहिले राज्य

◾️हिमाचल प्रदेश : भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य

◾️दिल्ली : भारतातील पहिले बाल न्यायालय सुरू करणारे राज्य 

◾️पश्चिम बंगाल : भारतातील पहिले महिला न्यायालय सुरू करणारे राज्य 

◾️सिक्कीम : मिनरल वॉटर बाटल्यांवर बंदी घालणारे पहिले राज्य 

◾️कर्नाटक : 'आरोग्य अदालत' सुरु करणारे पहिले राज्य 

◾️सिक्कीम : भारतातील पहिले धुम्रपानमुक्त राज्य

◾️पंजाब : निकोटिनवर बंदी घालणारे भारतातील पहिले राज्य 

◾️केरळ : सौर ऊर्जेवरील पहिली बोट (आदित्य) सुरू करणारे पहिले राज्य 

◾️कर्नाटक : कृषी आधारित अर्थसंकल्प सादर करणारे पहिले राज्य 

◾️हरियाणा : बालक जन्मतःच त्याची आधार नोंदणी करणारे पहिले राज्य 

◾️राज्यस्थान : पंचायत निवडणुकांत शैक्षणिक पात्रता बंधनकारक करणारे पहिले राज्य

◾️पंजाब : मृदा स्वास्थ्य कार्ड सुरू करणारे पहिले राज्य 

◾️मध्यप्रदेश : सेवा हमी कायदा (RTS) संमत करणारे पहिले राज्य 

◾️दिल्ली : ई-रेशनकार्ड वितरित करणारे पहिले राज्य

◾️आंध्रप्रदेश : ई-कॅबिनेटचा वापर करणारे भारतातील पहिले राज्य

◾️गुजरात : ऑनलाईन मतदान राबविणारे पहिले राज्य 

◾️मेघालय : जन-धन योजनेची 100% अंमलबजावणी करणारे पहिले राज्य 

◾️तेलंगणा : पदवीपर्यंत लैंगिक शिक्षण सक्तीचे करणारे पहिले राज्य 

◾️दिल्ली :भारतातील पहिली फूड बैंक सुरू करणारे राज्य 

◾️राज्यस्थान : होमिओपॅथिक विद्यापीठ सुरू करणारे पहिले राज्य

◾️महाराष्ट्र : स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांना 33% आरक्षण देणारे पाहिले राज्य 

◾️महाराष्ट्र : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना सुरू करणारे पाहिले राज्य

◾️महाराष्ट्र : महिला आरक्षण देणारे : भारतातील पाहिले राज्य

◾️दिल्ली : देशातील पहिले केरोसीनमुक्त शहर 

◾️केरळ:  हे सर्वांना इंटरनेटचा मूलभूत हक्क देणारे पहिले राज्य बनले आहे

◾️राज्यस्थान :आरोग्य हक्क कायदा’ लागू करणारे राजस्थान हे देशातील पहिले 

◾️उत्तराखंड :पूर्व-प्राथमिक स्तरावर "नवीन शैक्षणिक धोरण" लागू करणारे पाहिले राज्य

◾️कर्नाटक : ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर (GCC) धोरण आणणारे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.

◾️उत्तराखंड : विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकीत मुलींसाठी 50% जागा राखीव ठेवणारे  पहिले राज्य

◾️उत्तराखंड : जगातील पहिला सकल पर्यावरण उत्पादन निर्देशांक 

◾️राज्यस्थान : रस्ता सुरक्षा कृती योजना स्वीकारणारे पहिले राज्य ठरणार आहे

◾️केरळ : जैवविविधतेची नोंद करणारे पहिले राज्य ठरले आहे

◾️बिहार : ट्रैफिक चे ऑडिट करणारे पाहिले राज्य

◾️बिहार : इथेनॉल प्रोत्साहन धोरण लागू करणारे देशातील पाहिले राज्य


शक्तिपीठ महामार्ग...

◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोवा(802 किलोमीटर)


◾️महाराष्ट्रात : 700 किलोमीटर आहे 

◾️जिल्हे:  वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यातून जाणार आहे.


◾️6 पदरी चा महामार्ग

📌 सुरवात  : पवनार, वर्धा जिल्हा , महाराष्ट्र

शेवट : पत्रादेवी , उत्तर गोवा जिल्हा , गोवा


एकूण 9385 हेक्टर जमिनीचे भूसंपादन करावे लागणार आहे. 


◾️1 हेक्टर म्हणजे = 2.471 एकर होते


◾️अपेक्षित खर्च - 86,300 कोटी


📌 महामार्गात येणारी महत्वाची देवस्थाने 

🦙सवाग्राम, पोहरादेवी, माहुरगड शक्ततपीठ, सचखंड गुरुद्वारा, औंढ्या नागनाथ, परळी वैजनाथ, आंबाजोगाई शक्तिपीठ, तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट,औदुंबर दत्त मंदिर सांगली,8 नरसोबाची वाडी, जोतिबा देवस्थान, महालक्ष्मी मंदिर, संत बाळूमामा - आदमापूर, कुणकेश्वर आणि पत्रादेवी ही दवस्थाने जोडली जाणार आहेत

समृद्धी महामार्ग....

📌 मुंबई - नागपूर द्रुतगती मार्ग म्हणून ओळखला जातो 


जिल्हे :  हा मार्ग 10 जिल्ह्यांमधील नागपूर-वर्धा-अमरावती-वाशिम-बुलढाणा-जालना-औरंगाबाद-नाशिक-अहमदनगर-ठाणे 392 गावांमधून जातो

अधिकृत नाव : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग

◾️6 पदरी महामार्ग


सुरवात  : आमणे गाव, ठाणे जिल्हा

शेवट : शिवमडका गाव, नागपूर जिल्हा


🛑 असा आहे समृद्धी महामार्ग

- नागपूर ते मुंबई  

- लांबी : 701 किलोमीटर

- 120 मीटर रुंदीचा महामार्ग

- मार्गिका : 4 + 4

- वाहन वेगमर्यादा : सपाट जमिनीवर या मार्गावर वाहनांची वेगमर्यादा ताशी 150 किमी असेल व सह्याद्री घाटात ताशी 100 किमी असेल.

- हा महामार्ग 10 जिल्ह्ंयातून, 26 तालुक्यांतून आणि 390 गावांमधून जाणार आहे आणि या मार्गामुळे मुंबई आणि नागपूरमधील प्रवास ८ तासात पूर्ण होईल 

- समृद्धी महामार्गाचे नवीन नाव हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग  

- समृद्धी महामार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन केले आहे  

भारतीय घटनेत घेतलेल्या गोष्टी :


संसदीय शासन पद्धती : इंग्लंड

मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड

मूलभूत हक्क : अमेरिका

न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका

न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिका

कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड

सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड

कायदा निर्मिती : इंग्लंड

लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया

संघराज्य पद्धत : कॅनडा

शेष अधिकार : कॅनडा

जीवनसत्त्वे आणि त्यांची रासायनिक नावे

 👉जीवनसत्व- ए A

🔺रासायनिक नाव= रेटिनॉल

🔺 कमतरता रोग= रात्री अंधत्व

🔺 स्त्रोत= 🥕 गाजर, 🥛 दूध, 🥚 अंडे, 🍓 फळ🍉


👉 जीवनसत्व – बी 1

🔺रासायनिक नाव= थायमिन

🔺 कमतरता रोग= बेरी-बेरी

🔺 स्रोत= 🥜 शेंगदाणे, बटाटे, 🥦 भाज्या🍆


👉 जीवनसत्व - B2

🔺 रासायनिक नाव= Riboflavin

🔺 कमतरतेचे रोग= त्वचेवर पुरळ येणे, डोळ्यांचे रोग

🔺स्रोत= अंडी, दूध, हिरव्या भाज्या


👉 जीवनसत्व – B3

🔺रासायनिक नाव= पॅन्टोथेनिक ऍसिड

🔺 कमतरता रोग= जळणारे पाय, राखाडी केस

🔺 स्रोत= 🍗 मांस🍖,🥛 दूध, 🍅 टोमॅटो, शेंगदाणे🥜


👉 जीवनसत्व- B5

🔺 रासायनिक नाव = निकोटीनामाइड (नियासिन)

🔺 कमतरता रोग= मासिक पाळीचे विकार (पेलाग्रा)

🔺 स्रोत = 🍗Meat🍖, 🥜शेंगदाणे, बटाटे


👉 जीवनसत्व- B6

🔺रासायनिक नाव = पायरिडॉक्सिन

🔺 कमतरता रोग = अशक्तपणा, त्वचा रोग

🔺 स्रोत = 🥛 दूध, 🍗 मांस, 🥦 भाजीपाला 🍆


👉 जीवनसत्व – H/B7

🔺रासायनिक नाव= बायोटिन

🔺 कमतरता रोग= केस गळणे, त्वचा रोग

🔺 स्रोत= यीस्ट, गहू, अंडी


👉 व्हिटॅमिन - B12

🔺 रासायनिक नाव= सायनोकोबालामिन

🔺 कमतरतेचे रोग= अशक्तपणा, पांडू रोग

🔺 स्रोत= 🍗मांस, 🍖काजेली, 🥛दूध


👉 व्हिटॅमिन सी C

🔺रासायनिक नाव= एस्कॉर्बिक ऍसिड

🔺 कमतरता रोग= स्कर्वी, हिरड्यांना आलेली सूज

🔺स्रोत= आवळा, 🍋 लिंबू, 🍑 संत्रा, 🍊 संत्रा


👉 जीवनसत्व - डी D

🔺रासायनिक नाव=कॅल्सीफेरॉल

🔺 कमतरता रोग=मुडदूस

🔺स्रोत=सूर्यप्रकाश, दूध, अंडी


👉 जीवनसत्व - ई E

🔺 रासायनिक नाव= टेकोफेरॉल

🔺 कमतरता रोग= प्रजनन क्षमता कमी होणे

🔺 स्रोत= 🥦हिरव्या भाज्या, 🍚लोणी, दूध🥛


👉 जीवनसत्व- के K

🔺रासायनिक नाव= Phylloquinone

🔺कमतरता रोग= रक्त गोठण्यास अपयश

🔺 स्रोत = 🍅 टोमॅटो, 🥦 हिरव्या भाज्या, 🥛 दूध

29 March 2025

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या?

अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला.

ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न  भीमजी पारेख ता गुजराती व्यक्तीने केला.

क  हुगळी येथे बंगाली  भाषेचे व्याकरण 1778 ला छापले गेले.

वरीलपैकी कोणते विधान/ने  योग्य आहे/आहेत?

1  फक्त  अ

2  फक्त  ब  व क

3  फक्त  ब

4  वरील सर्व✅🙏


 1780 साली जेम्स हिकी याने दि बेंगोल गॅझेट नावाचे भारतातील पहिले वृत्तपत्र सुरू केले ते इंग्रजी भाषेतील......... होते?

1  दैनिक

2  साप्ताहिक✅🙏

3  मासिक

4  त्रैमासिक


 दि कलकत्ता गॅझेट कोणत्या साली सुरू करण्यात आले?

1    1782

2    1784✅🙏

3    1781

4    1783


 वृत्तपत्र व साल याबाबतची  अयोग्य जोडी ओळखा?

अ   दि बॉम्बे कुरियर   1790

ब   दि बॉम्बे  गॅझेट    1792✅

क  द कलकत्ता क्रॉनिकल  1786

ड  द मद्रास कुरियर   1788


अ.  1813 च्या चार्टर अॅक्ट नुसार ईस्ट इंडिया कंपनीची व्यापाराची मक्तेदारी संपुष्टात आली

ब.  1824 ला भारतीय सुती  कापडाच्या आयातीवर 67.5 टक्के इतका कर आकारला जात होता

क  भारतीय मलमलीच्या कापडावर 35% इतका कर आकारला जात होता 

वरील पैकी चुकीचे विधान कोणते आहे ते ओळखा?

1 फक्त अ

2 फक्त ब

3. ब आणि क

4   फक्त क✅🙏


 कमिटी ऑफ सर्किट खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे,,?

A   विल्यम बेंटिक

B   लोर्ड कॉर्नवॉलीस

C   वॉरन हेस्टींग✅🙏

D   लॉर्ड क्लाइव्ह


 सर सय्यद अहमद खान यांना सर ही पदवी कोणी बहाल केली?

1 मुस्लिम जनता

2 मुस्लिम खलिफा

3 ब्रिटिश प्रशासन✅🙏

4. यापैकी नाही


हेन्री डेरोझिओ यांच्या विषयी खालील विधाने विचारात घ्या?

अ. ते पुरोगामी विचाराचे होते.

ब. ते महिलाच्या हक्कांचे पुरस्कर्ते होते.

वरीलपैकी योग्य असलेली विधाने कोणती ?

1. फक्त अ

2. फक्त ब

3. फक्त अ आणि ब✅🙏

4. वरीलपैकी एकही नाही


 हेन्री डेरोझिओ यांनी सुरु केलेली तरुण बंगाल चळवळ विषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ?

अ. त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेतले.

ब. ही चळवळ राजा राममोहन राय यांच्या पेक्षाही आधुनिक आहे.

1. फक्त अ

2. फक्त ब✅🙏

3. फक्त अ, ब

4. दोन्ही नाहीत


 तत्त्वबोधिनी सभा खालीलपैकी कोणी स्थापन केली ?

1. राजाराम मोहन राय

2. द्वारकानाथ टागोर

3. देवेंद्रनाथ टागोर✅🙏

4. रवींद्रनाथ टागोर


तत्त्व बोधिनी पत्रिका” हे खालीलपैकी काय होते ?

1. बंगाली मासिक✅🙏

2. बंगाली साप्ताहिक

3. संस्कृत मासिक

4. संस्कृत साप्ताहिक


 खालीलपैकी कोणते पुस्तक देवेंद्रनाथ टागोर यांनी लिहिले ?

अ. ब्रम्ह धर्म

ब. ब्राम्हो धर्म  विजम

1. फक्त अ

2. फक्त ब

3. फक्त अ, ब✅🙏

4.  दोन्ही नाहीत


 नियामक कायदा १७७३ विषयी खालील विधाने विचारात घ्या.

अ. बंगालच्या गव्हर्नरला “बंगालचा गव्हर्नर जनरल” बनविण्यात आले.

ब. त्याला मदत करण्यासाठी पाच सदस्यीय “कार्यकारी परिषद” बनविण्यात आले.

1. फक्त अ✅🙏

2. फक्त ब

3. फक्त अ, ब

4. दोन्ही नाहीत



*वेद भाष्य भूमिका हा ग्रंथ कोणी लिहिला?*

*उत्तर स्वामी दयानंद सरस्वती*

🦋


जैन तत्वज्ञानाचा असा दावा आहे की जग निर्माण आणि राखून ठेवलेले आहे?

अ) सार्वभौम कायदा.🍫🍫

ब) सार्वभौम सत्य.

क) सार्वभौम विश्वास.

ड) सार्वभौमिक आत्मा.



प्रश्न 1.अलेक्झांडर ने जेव्हा प्राचीन भारतावर आक्रमण केले त्यावेळी मगध साम्राज्यचा राजा कोण होता?

1)चंद्रगुप्त मौर्य

2)महापदमानंद

3)धनानंद✅✅

4)कालअशोक



2.तुघलक वंशाचा संस्थापक कोण?

1)मोहम्मद तुघलक✅✅

2)फिरोज तुघलक

3)जल्लाउद्दीन तुघलक

4)गाझी मलिक


खालील पैकी कोणत्या राजाने गंगैकोड हे बिरुद स्वतःस लावून घेतले?

1)पहिला राजराजा

2)दुसरा राजराजा

3)पहिला राजेंद्र✅

4)दुसरा राजेंद्र


4.चंद्रगुप्ताने धनानंदचा कसा पराभव केला याचे सविस्तर वर्णन कोणत्या ग्रंथात आहे?

1)इंडिका

2)अर्थशास्त्र

3)मुद्रा राक्षस✅

4)यापैकी नाही


5 सिंधू संस्कृतीतील अति दक्षिणेकडे असलेले ठिकाण कोणते?

1)उज्जैन

2)लोथल

3)आलमगिरपूर

4)दायामाबाद✅



6 गायत्री मंत्र हा कोणत्या वेदामध्ये आहे?

1)ऋग्वेद✅✅

2)यजुर्वेद

3)सामवेद

4)अथर्ववेद



7 खालील विधाने पाहा.

अ)युआन श्वान्ग हा यात्री चंद्रगुप्त द्वितीय च्या काळात भारतात आला होता

ब)फाहिआण हा यात्री हर्षवर्धन च्या काळात भारतात आला होता


M)फक्त अ बरोबर ब चूक.

P)फक्त ब बरोबर अ चूक

S)दोन्ही विधाने बरोबर✅✅

C)दोन्ही विधाने चूक.



8.राज्याचे सप्ताअंग हा सिद्धांत कोणी दिला आहे?


1)समुद्रगुप्त

2)मॅगेस्थिनस

3)चंद्रगुप्त

4)विष्णुगुप्त✅



खालील महाजनपदांचा उत्तेरकडून दक्षिणेकडे योग्य क्रम लावा.

A. कंभोज B. गांधार C. अश्मक D. अवंती

1)A,B,C,D

2)A,B,D,C✅

3)B,A,D,C

4)B,A,C,D


कोणत्या युद्धाने दिल्लीच्या सुल्तानशाहीचा आरंभ झाला?

ऊत्तर= तराई चे द्वितीय युद्धाने


तराई चे पाहिले युद्ध कधी व कोनाकोणामध्ये झाले?

उत्तर = 1191

            पृथ्वीराज चौहान (विजयी) वि मोहम्मद घोरी (पराभूत)


🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁


शिक्षण हा समाज क्रांतीचा पाया आहे, असे कोण म्हणाले???


A】 कर्मवीर भाऊराव पाटिल🎂🎁

B】 अण्णाभाऊ साठे

C】 डॉ. बाबासाहेब आंबेडकर

D】 पेरियार रामास्वामी



🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁


शाक्य दंडपाणी आणि यशोधरा यांचे नाते काय???

A】 सासरा - सुन

B】 मित्र - मैत्रीण

C】 भाऊ - बहिण

D】 बाप - मुलगी🎂



🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁


भागवत गीता म्हणजे दूसरे तिसरे काही नसून बौद्धांच्या धर्म ग्रंथातील चोरी आहे असे कोणी म्हटले???

A】 प्रबोधनकार ठाकरे

B】 अण्णाभाऊ साठे

C】 डॉ. बाबासाहेब आंबेडकर🎂

D】 शाहू महाराज

 

🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁



विश्वरत्न डॉ. बाबासाहेबांचे एम.ए चे शिक्षण केंव्हा पूर्ण झाले???

A】 १९१४

B】 १९१५🎂

C】 १९१६ 

D】 १९१७


🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁


भगवान बुध्द यांनी प्रथम किती लोकांना धम्मदीक्षा दिली???

A】 पाच🎂

B】 दोन

C】 सात

D】 तीन


🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁


मुक्ता साळवे ही कोणाची विद्यार्थिनी होती???

A】राष्ट्रपिता फुले

B】 केळूसकर गुरूजी

C】 सावित्रीआई फुले🎂

D】 फातिमा शेख


🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁


१०】 शहाजी राजे यांच्या वडिलांचे नाव काय???

A】 रामजी

B】 संताजी

C】 लहुजी

D】 मालोजी🎂


🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁


पुणे करार केंव्हा झाला ?

 24 सप्टेंबर 1932




Police Bharti

#1. भारतात सापडलेले सर्वात मोठे जुने शहर कोणते आहे? - हडप्पा


#2."स्वराज हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे" असे कोणी म्हटले? - बाळ गंगाधर टिळक


#3. महात्मा गांधींचे राजकीय गुरू कोण होते? - गोपाळ कृष्ण गोखले


#4. दिल्लीवर राज्य करणारी पहिली मुस्लिम महिला शासक / सर्वप्रथम महिला शासक कोण होती? - रझिया सुल्तान


#5. सिंधू सभ्यतेचे पट्टानगर (बंदर) कोणते होते? - लोथल


#6. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे संस्थापक कोण होते? - ए.ओ. ह्यूम


#7. कोणते वेद गद्य आणि श्लोक या दोन्ही मध्ये रचले गेले आहेत? - यजुर्वेद


#8. भारतातील पहिले वृत्तपत्र कोणी सुरू केले? - सय्यद अहमद खान


#9. बौद्ध धर्म कोणाच्या शासनकाळात हीनयान आणि महायान या दोन भागात विभागला गेला होता? - कनिष्क


#10. लोदी घराण्याचा शेवटचा शासक कोण होता? - इब्राहिम लोदी


#11. प्रथम जैन संगीत कोठे आयोजित केले गेले होते? - पाटलिपुत्र (आताचे पटना)


#12. ऋग्वैदिक समाजातील सर्वात लहान घटक कोणते होते? - कुल किंवा कुटुंब


#13. कोणत्या शासकाकडे शक्तिशाली नौसेना होती? - चोल


#14. संकीर्तन प्रणालीचे जनक कोण होते? - चैतन्य


#15. कोणत्या मुगल शासकास 'आलमगीर' म्हटले जाते? - औरंगजेब


#16.  'शहीद आजम' ही पदवी कोणाला दिली गेली? - भगतसिंग


#17. सायमन कमिशनच्या निषेधाच्या वेळी लाठीचार्जात कोणत्या राजकारण्यांचा मृत्यू झाला? - लाला लाजपत राय


#18. वहाबी चळवळीचे प्रवर्तक कोण होते? - सय्यद अहमद


#19. बुद्धांनी महापरिनिर्वाण कोणत्या ठिकाणी केले? - कुशीनारा / कुशीनगरमध्ये


#20. कॉंग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? - व्योमेश चंद्र बॅनर्जी


#21. भरतनाट्यम कलाकुसर असलेल्या भगवान नटराजांचे प्रसिद्ध मंदिर कोठे आहे? - चिदंबरम


#22. गौतम बुद्धांनी उपदेश देण्यासाठी कोणती भाषा वापरली? - पाली


#23. कुतुब मीनारचे काम कोणत्या शासकाने पूर्ण केले? - इल्तुतमिश


#24. 'लीलावती' या पुस्तकाशी संबंधित आहे - गणित


#25. डोंगर तोडुन इलोराचे जगप्रसिद्ध कैलासनाथ मंदिर कोणी बनविले? - राष्ट्रकूट


#26. चिनी प्रवासी ह्नेनसांग कोणाच्या शासनकाळात भारतात आला होता? -  हर्षवर्धन 


#27. बनारस हिंदू विद्यापीठाचे (बी.एच.यू.) संस्थापक कोण होते? - मदन मोहन मालवीय


#28. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? - लॉर्ड माउंटबॅटन


#29. देवी लक्ष्मीची मूर्ती कोणत्या मुस्लीम शासकाच्या काळात नाण्यावर होत्या? - महंमद गौरी


#30. कलशोकाची(कालाशोक) राजधानी कोणती होती? - पाटलिपुत्र (आताचे पटना)


#31. गायत्री मंत्राची रचना कोणी केली? - विश्वामित्र


#32. लंडनमध्ये 'इंडिया हाउस' ची स्थापना कोणी केली? - श्यामजी कृष्ण वर्मा


#33. कोणत्या गुप्त राजाला 'कविराज' म्हटले जाते? - समुद्रगुप्त


#34. अकबराच्या इतिहासकारांपैकी अकबर यांना इस्लामचा शत्रू कोणी म्हटले होते? - बदायूनी


#35. भक्तीला तत्वज्ञानाचा आधार देणारे पहिले आचार्य कोण होते? - शंकराचार्य


#36. कोणत्या नगराला 'शिराजे हिंद' म्हटले जाते? - जौनपूर


#37. चालुक्य घराण्याचा सर्वात प्रसिद्ध शासक कोण होता? - पुलकेशिन दुसरा


#38. मुहम्मद घोरीने 1192 A.D. मध्ये ताराईनच्या दुसर्‍या युद्धात कोणत्या राजाचा पराभव केला होता? - पृथ्वीराज चौहान


#39. भारतीयांचा रेशीम मार्ग कोणी सुरू केला? - कनिष्क


#40 'गुलरुखी' म्हणून कोणाला ओळखले जात असे? - सिकन्दर लोदी


#41. भारतात ब्रिटीशांचे वर्चस्व प्रस्थापित करणारे युद्ध कोणते होते? - प्लासीचे युद्ध


#42. जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर कोण होते? - महावीर


#43. ​​'सत्यमेव जयते' हा शब्द कोठून घेतला आहे? - मुंडकोपनिषद


#44. भारतात प्रथम सोन्याच्या चलनांची सुरूवात कोणी केली? - इंडो-बॅक्ट्रियन


#45. जहांगीरच्या दरबारात पक्ष्यांचे सर्वात मोठे चित्रकार कोण होते? - मन्सूर

आर्य


◾️जवळपास 4000 वर्षापूर्वी वायव्येकडील खैबर खिंडीमधून अनेक टोळ्या भारतात सप्तसिंधुच्या प्रदेशात आल्या. 


◾️या टोळ्या आग्नेय युरोपातील कॉकेशस पर्वतच्या भागातून भारतात आल्या असाव्यात असे म्हटले जाते. 


◾️आर्यांनी सिंधू / हडप्पा संस्कृतीवर हल्ला करून नवी आर्य संस्कृती स्थापन केली


◾️या लोकांना आर्य म्हणून ओळखले जात असे. या लोकांना गुरांना चारण्याकरिता मोठमोठी कुरणे हवी असत. 


◾️गुरे ही त्यांची संपत्ती होती. 


◾️ सिंधु नदी ही त्याच्या इच्छेला पूरक अशी होती म्हणून त्यांनी तेथेच वसाहत स्थापन केली. 


◾️त्यानंतरच्या काळात आलेल्या टोळ्या गंगा-यमुनेच्या परिसरात स्थिर झाल्या. 


◾️आर्य लोकांनी उत्तर भारतात आपल्या वसाहती स्थापन केल्या. 


◾️आर्य लोक निसर्गप्रेमी होते. त्यांनी वेगवेगळ्या देवतांना प्रसन्न करण्याकरिता अनेक कवणे रचली. 


◾️त्यांच्या कवनाचा संग्रह म्हणजे वेद होय. 


◾️आर्यांनी चार वेद लिहिले

1)........

2)........

3)........

4)........


◾️आर्यांनी वेदांची रचना केली म्हणून ही संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती म्हणून ओळखली जाते. 


◾️ वैदिक वाड्मय जगातील सर्वात प्राचीन वाड्मय म्हणून ओळखले जाते.


◾️ आर्य हे शस्त्रधारक असून त्यांनी टोळ्यांच्या रूपाने भारतात प्रवेश केला. 


◾️ जनावरे  ही त्यांची प्रमुख संपत्ती होती. गुरांना आवश्यक असलेली कुरणे आणि पाण्याची सोईमुळे हे लोक सिंधुच्या खोर्‍यात स्थायिक झाले. 


◾️ हे टोळ्याच्या रूपाने राहत असे आणि आपआपसात लढाया करीत असे. 


◾️यापैकी भरत नावाची टोळी सर्वात पराक्रमी होती. या टोळीच्या नावावरून आपल्या देशाला भारत असे नाव पडले.


◾️सिंधुचा प्रदेश अपूर्ण पडल्यामुळे, यापैकी काही टोळ्या लोक गंगा-यमुनेच्या खोर्‍यात सरकल्या. व त्यांनी त्या भागात वस्ती केली. 


◾️म्हणून या प्रदेशाला आर्यवर्त असे नांव पडले.


◾️देशाला सद्या 4 नावांनी ओळखले जाते. 

भारत, India, आर्यावर्त, हिंदुस्थान


तैनाती फौज पद्धत (Subsidiary Force)

💥1. लॉर्ड वेलस्ली


०१. रिचर्ड वेलस्लीचा जन्म १७६० मध्ये झाला. तो इंग्लंडच्या संसदेचा सदस्य होता. कंपनीच्या नियंत्रण मंडळाचाही तो सदस्य होता. १७९८ मध्ये सर जॉन शोअर नंतर वेलस्लीला गवर्नर बनविण्यात आले.


०२. शांततेच्या धोरणाचा त्याग करीत वेलस्लीने सरळ सरळ युद्धनीतीचा अवलंब केला. शांततेच्या व अलिप्ततेच्या धोरणाचा कंपनीच्या शत्रुना फायदा मिळेल असे त्याचे मत होते. तत्कालीन इंग्लंड मंत्रीमंडळानेही वेलस्लीच्या धोरणाला पाठींबा दिला.


०३. मराठा प्रदेशावर विजय म्हणजे भारतीय जनतेवर उपकार आहे असे वेलस्लीचे मत होते. इंग्रजांच्या कल्याणकारी सत्तेचे वर्चस्व मराठे का मान्य करीत नाहीत हे वेलस्लीला न उलगडलेले कोडे होते. स्वतःच्या धोरणाला न्याय्य, तर्कसंगत, संयमी व शांत अशी विशेषणे लाऊन वेलस्ली मराठ्यांच्या राजकारणाला 'विकृत, कारस्थानी व कपटी अशी संभावना करत होता.

2. तैनाती फौज पद्धत (Subsidiary Force)


०१. तैनाती फौजेची सुरूवात प्रथम फ्रेंचांनी केली. १७४८४९ मध्ये डूप्ले व चंदासाहेब यांच्यात करार होऊन फ्रेंचांनी आपली फौज नबाबाच्या मदतीसाठी ठेवली. त्याबद्दल नबाबने डूप्लेला पॉंडिचेरीजवळचा मुलूख तोडून दिला. यातच पुढे इंग्रजांनी सुरू केलेल्या तैनाती फौजेचा उगम आहे. अशाच तऱ्हेचा करार १७६० मध्ये इंग्रजांनी मीर कासीमशीही केला होता.


१८ व्या शतकाच्या अखेरच्या काळात शांततामय वातावरण निर्माण झाले तर इंग्लंडमधील औद्योगिक क्रांतीनंतर तयार झालेले अतिरिक्त उत्पादन भारताच्या बाजारात खपवता येईल असा ब्रिटीश व्यापाऱ्यांचा कयास होता. यासाठी कंपनीने तीन मार्ग अवलंबिले. थेट युद्ध पुकारणे व पूर्वी अंकित केलेल्या प्रदेशावरील आपली पकड मजबूत करणे. यासोबतच तैनाती फौज पद्धत त्यापैकी एक होती.


०२. वॉरन हेस्टिंग्जने थोड्या फार प्रमाणात तैनाती फौजेची योजना अंमलात आणली होती. पण वेलस्लीने भारतात खऱ्या अर्थाने तैनाती फौजेचा प्रसार केला आणि एतद्देशीय संस्थानिकांना ब्रिटिश अंमलाखाली आणले व भारताचे ब्रिटिश साम्राज्यात रूपांतर केले.


०३. वेलस्लीने प्रथम निजामाकडची फ्रेंच फौज काढून टाकण्यास सांगून त्या जागी इंग्रज फौज ठेवून तैनाती फौजेच्या योजनेला मूर्त स्वरूप दिले. पुढे त्याने या योजनेची सक्ती केली व जे एतद्देशीय संस्थानिक फौज ठेवून घेणार नाहीत, अशांबरोबर काहीतरी निमित्त काढून युद्धे केली.


०४. आल्फ्रेड लायलने भारतीय युद्धात कंपनीच्या भाग घेण्याबाबत चार अवस्था सांगितल्या आहेत.


* आपल्या भारतीय मित्रांना युद्धात मदत करण्यासाठी कंपनी आपली फौज किरायाने पाठवत असे. ह्याअंतर्गत १७६८ मध्ये निजामाशी तह झाला होता.


* आपल्या मित्रांच्या मदतीने कंपनी स्वतःच युद्धात भाग घेऊ लागली


* कंपनीची मित्रराज्ये कंपनीला सैनिकाऐवजी पैसा पुरवू लागली. ज्याच्या आधारावर कंपनीने इंग्रज अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सानिक भरती करून त्यांना प्रशिक्षण देऊन शस्त्रसज्ज करण्यास प्रारंभ केला. पुढे गरजेनुसार हेच प्रशिक्षित सैन्य मित्रराज्यांना देऊन त्याऐवजी कंपनी पैसा घेऊ लागली. उदा. १७९८ चा हैद्राबाद तह


* शेवटच्या अवस्थेत कंपनीने मित्रराज्यांच्या संरक्षणाची जबाबदारी पत्करून त्याकरिता तैनाती फौज त्या राज्यात ठेवणे सुरु केले. त्याऐवजी कंपनी पैसे न घेता त्या राज्यातून काही प्रदेश घेऊ लागली. १८०० मध्ये निजामाशी झालेला तह.


०५. सर्वप्रथम प्रयोग १७६५ मध्ये अवधसोबत केला. यावेळी राजधानी लखनौत इंग्रज रेसिडेंट ठेवण्याचे अवधने मान्य केले. १७८७ मध्ये कंपनीने कर्नाटक नवाबाला विनंती केली कि त्याने इंग्रजान्शिवाय दुसऱ्या युरोपियन शक्तीशी संबंध ठेऊ नये.


०६. १७९८ मध्ये सर जॉन शोअरने अवधच्या नवाबाशी तह करताना अशी अट घातली कि नवाबाने इंग्रजांव्यतिरिक्त इतर युरोपियनांना सेवेत घेऊ नये व कोणताही संबंध ठेऊ नये.


०७. पैशाऐवजी प्रदेशाची मागणी करणे हा एक नैसर्गिक टप्पा होता. भारतीय राज्ये धन कबुल करीत असत पण त्यांची फेड न झाल्याने रक्कम वाढत जाई. म्हणून कंपनीने तैनाती फौजेचा खर्च म्हणून प्रदेशाची मागणी सुरु केली. ह्या प्रदेशावर कंपनीची सार्वभौम सत्ता प्रस्थापित होत असे.


०८. ब्रिटिशांनी आपल्या सहा बटालियन हैदराबादेत ठेऊन फ्रेंचांना हाकलून दिले. या फौजेचा खर्च म्हणून ब्रिटिशांनी २ लाख ४१ हजार ७१० पौंड निजामकडून वसूल केले. फौजेचा वाढता खर्च झेपेनासा झाल्याने निजामाने आपल्या संस्थानचा काही भाग ब्रिटीशांच्या हवाली केला.


3. तैनाती फौजेच्या अटी


०१. भारतीय राज्यांच्या परराष्ट्र संबंधावर कंपनीचे नियंत्रण राहील. दुसऱ्या राज्यांशी बोलणी, युद्ध वगैरे कंपनीच्या माध्यमातून होईल. संस्थानांनी परस्पर कोणतेही युद्ध करू नये व कुणाशीही परस्पर बोलणी करू नये. आपापसांतील तंट्याचा निकाल इंग्रज करतील तो संस्थानिकांनी मान्य करावा.


०२. संस्थानिकांनी आपली स्वतःची फौज ठेऊ नये. त्याऐवजी राज्यांना शांतता व सुव्यवस्थेसाठी कंपनीची मोठी फौज ठेवावी लागेल. ह्या फौजेचे नियंत्रण इंग्रज अधिकाऱ्याच्या हातात राहील. त्याऐवजी ती राज्ये कंपनीला पूर्ण अधिकारयुक्त प्रदेश देईल. लहान राज्ये मात्र धन देत असत.


०३. ह्या राज्यांना आपल्या राजधानीत इंग्रज रेसिडेंट ठेवावा लागेल. तैनाती फौजेचे अधिकारी इंग्रजच असावेत.


०४. कंपनीच्या परवानगीशिवाय राज्यांना दुसऱ्या युरोपियनांना सेवेत ठेवता येणार नाही.


०५. राज्याच्या अंतर्गत कारभारात कंपनी हस्तक्षेप करणार नाही.


०६. राज्याचे अंतर्गत व बाह्य शत्रूपासून कंपनी संरक्षण करेल.


4. तैनाती फौजेचे कंपनीला झालेले फायदे


०१. तैनाती फौज पद्धतीने साम्राज्य निर्मितीच्या प्रक्रियेत फितूर शत्रूसारखी भूमिका पार पाडली. कंपनीचे संरक्षण असल्याने भारतीय राज्ये दुर्बल बनली. हि पद्धती स्वीकृत केलेल्या राज्यात गवर्नर जनरल आपल्या प्रतिनिधीमार्फत उपस्थित राहत असे. आता ही राज्ये आपसात विशेषतः इंग्रजांविरुद्ध कोणताही संघ बनवू शकत नसत.


०२. ह्यामुळे कंपनीला भारतीय राज्यांच्या खर्चात एक महान सैन्य उपलब्ध झाले.


०३. राज्यांच्या राजधानीत कंपनीचे सैन्य राहत असल्याने देशातील मोक्याच्या जागांवर कंपनीचे नियंत्रण प्रस्थापित झाले.


०४. ह्या पद्धतीमुळे कंपनीचे सैन्य आपल्या राजकीय सीमांच्या बराच दूर निघून गेले. परिणामी युद्ध झालेच तर त्याचा कोणताही आर्थिक भार कंपनीवर पडत नव्हता. तसेच युद्धक्षेत्र बरेच दूर असल्याने कंपनीचा प्रदेश सुरक्षित राहिला.


०५. तैनाती फौज पद्धतीमुळे कंपनीला वाटत असलेली फ्रेंचांची भीती नेहमीकरिताच नाहीशी झाली. कारण तहानुसार कोणतेही तैनाती फौज स्वीकारलेले राज्य कंपनीच्या अनुमतीशिवाय कोणत्याही युरोपियनाला सेवेत ठेऊ शकत नव्हते.


०६. राज्यांचे परराष्ट्र संबंध कंपनीच्या नियंत्रणात आल्याने भारतीय राज्यांच्या भांडणात कंपनी मध्यस्थ बनली


०७. तैनाती फौजेच्या अधिकाऱ्यांना भरपूर वेतन मिळू लागले. तसेच ह्या राज्यातील इंग्रज रेसिडेंट अतिशय प्रभावशाली बनून कालांतराने राज्याच्या अंतर्गत कार्भाराठी हस्तक्षेप करू लागले.


०८. सार्वभौमत्वसंपन्न असा बराच प्रदेश कंपनीला मिळाल्याने कंपनीचे साम्राज्य वाढले. १७९२ आणि १७९९ मध्ये युद्धात म्हैसूरचा मिळालेला प्रदेश निजामाने १८०० मध्ये कंपनीला दिला. १८०१ मध्ये अवधच्या नवाबाने रोहिलखंड आणि दक्षिण दोआब प्रदेश कंपनीला देऊन टाकला.



तैनाती फौजेमुळे झालेली भारतीय राज्यांची हानी


०१. परराष्ट्र संबंध कंपनीच्या नियंत्रणात गेल्याने भारतीय राज्ये आपले सार्वभौमत्व गमावून बसली. लष्करीदृष्ट्याही राज्ये दुर्बल बनली. परिणामी भारतीय राज्यांचे मानसिक बळ खच्ची झाले. त्यामुळे भारतीय राज्यांना अंततः ते अतिशय हानिकारक ठरले. प्रजेलाही त्याचा त्रास भोगावा लागला.


०२. राज्यांच्या दैनंदिन कारभारात इंग्रज रेसिडेंटचा हस्तक्षेप इतका वाढला कि प्रशासन चालविणे कठीण होऊन बसले.


०३. ही पध्दती स्वीकारलेली राज्ये लवकरच दिवाळखोर बनली. कंपनी या राज&##2381;यांच्या उत्पन्नाचा अंदाजे १ भाग घेत होती, पण ही रक्कम इतकी जास्त असे की बहुतेक राज्यांकडे रक्कम थकीत राहू लागली. इंग्रज लष्करी अधिकाऱ्यांचे वेतन प्रचंड होते आणि लष्करी साहित्य इतके महाग होते की राजांना आपल्या प्रजेवर मोठया प्रमाणावर कर लादणे भाग पडले.


०४. रक्कम देणे शक्य झाले नाही तर कंपनी राजाकडून त्याच्या राज्याच्या प्रदेशाची मागणी करीत असे. पण हा भूप्रदेश फार मोठा असे. वेलस्लीच्या कंपनीच्या संचालकांना एका प्रसंगी लिहिले की ४० लक्ष रु ऐवजी आम्ही ६२ लक्ष वार्षिक उत्पन्नाचा प्रदेश मागितला आहे.


* तैनाती फौजेची ही पद्धत निजाम (१७९८ व १८००), म्हैसूर (१७९९), तंजावर (१७९९), सुरत (१७९९), बडोदा (१८००), कर्नाटक (१८०१), अवध (१८०१), पेशवा (१८०२), नागपूरचे भोसले (१८०३), शिंदे (१८०४), जोधपुर, जयपूर, मछेरी, बुंदी व भरतपूर या राज्यांनी स्वीकारली.


6. १८०० नंतर भारताच्या सीमा


०१. १८०५ मध्ये कंपनीचे नियंत्रण भारताच्या पश्चिम तटासह सिंधू नदीच्या मुखापासून कन्याकुमारीपर्यंत, बंगालची खाडी आणि ब्रह्मदेशच्या सीमेपर्यंत व तेथून थेट पंजाबपर्यंत होते. अवध, नागपूर, ग्वाल्हेर, इंदोर, बडोदा, हैद्राबाद, मैसूर , त्रावणकोर ही राज्ये कंपनीची संरक्षित राज्ये बनली होती.


०२. नाशिकपासून कोंकण किनारपट्टीसह कोल्हापूरपर्यंत पेशव्यांचे वर्चस्व, गुजरातमध्ये गायकवाड, मध्यभारतात होळकर व शिंदे आणि नागपूर भागात भोसले असा मराठ्यांचा प्रदेश होता.


०३. सतलज नदीच्या दोन्ही काठावर मिसल (म्हणजे शिखांची लहान लहान राज्ये) बऱ्याच मोठ्या प्रदेशावर होती. पंजाबमध्ये शक्तिशाली राजा म्हणून रणजीतसिंगचा उदय होत होता.


०४. मुलतान, सिंध, पश्चिम पंजाब आणि काश्मीरमध्ये मुसलमान सरदार राज्य करीत होते.


०५. वेलस्लीनंतर तटस्थ धोरणाचा पुरस्कार करणारा र्लॉड कॉर्नवॉलिस दुसर्‍यांदा भारतात गव्हर्नर जनरल म्हणून आला पण येथे लवकरच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या जागेवर सर बार्लो (१८०५-१८०७) हा गव्हर्नर जनरल म्हणून आला. त्याने शिंदे व होळकर यांच्याशी समझोत्याचे करार करुन त्यांचे काही प्रदेश परत केले.


०६. बर्लोनंतर र्लॉड मिंटो हा गव्हर्नर जनरल झाला (१८०७-१८१३) यानेही तटस्थतेचे धोरण स्वीकारले. याच्या कारकिर्दीतचत शिख राजा रणतिजसिंग याच्यांशी करार होऊन इंग्रजी राज्य व शीख राज्य यांच्यात सतलज नदी ही हद ठरविण्यात आली होती.


०७. याच सुमारास इंग्रज सरकारने १८१३ चा सनदी कायदा पास करुन कंपनीची व्यापाराची मक्तेदारी संपुष्टात आणली आणि र्बोड ऑफ कंट्रोल मार्फत इंग्रज सरकार कंपनीच्या कारभारावर अंतिम अधिकार गाजवेल असे जाहीर केले.


ब्रह्मपुत्र नदी



◆आशियातील ही एक प्रमुख नदी तिबेटमध्ये उगम पावून ईशान्य भारतातून वाहत जाऊन पुढे बांगला देशात गंगा नदीला मिळते. लांबी २,९०० किमी. पाणलोट क्षेत्र ९,३५,५०० चौ. किमी. हिमालयाच्या कैलास पर्वतश्रेणीत सस. पासून ७,२०० मी. उंचीवर (८२० १०’ पू. रेखांश व ३०० ३१ ’ उ. अक्षांश) चेमा-युंगडुंग या हिमनदीतून ब्रह्मपुत्रा उगम पावते.

◆हे उगमस्थान मानसरोवरापासून सु. १०० किमी. तर सिंधू नदीच्या उगमापासून सु. १६० किमी. अंतरावर आहे. प्राचीन हिंदू धर्मग्रंथांतील उल्लेखांनुसार ब्रह्मपत्रेचा उगम मिचिनू पर्वतातल्या ब्रह्मकुंडातून झाल्याचे मानले जाते. कुबी, आंगसी व चेमा-युंगडुंग हे या नदीचे तीन शीर्ष प्रवाह होत.

◆भारतात ब्रह्मपुत्र महानद असाच या नदीचा निर्देश करण्यात येत असे. या नदीशी अनेक आख्यायिका निगडित असून त्या महाभारत कालिकापुराण कालिदासाचा रघुवंश यांसारख्या संस्कृत साहित्यातूनआढळतात. ‘लौहित्य’ (म्हणजे लाल रंगाची) असेही तिचे नाव असून परशुरामाने क्षत्रिय संहाराने रक्तरंजित झालेला परशू ब्रह्मपुत्रेच्या प्रवाहात धुतल्याने तिचे पाणी लाल झाले, अशी एक आख्यायिका आहे.

◆आसाममधील आहोमांच्या राजवटीत रूढ असलेल्या आहोम भाषेत तिला ‘नाम-दाओ-फी’ म्हणजे ‘तारकांची नदी’ असे नाव होते. ‘बुलुम बुथुर’ म्हणजे बुडबुड्यांची नदी या तिच्या मूळ नावाचे संस्कृतीकरण होऊन ब्रह्मपुत्र हा शब्द बनला असावा. आसामी लोक अनेकदा ‘दर्याच’ म्हणून तिचा उल्लेख करतात.

◆ब्रह्मपुत्रा नदीला तिबेटमध्ये त्सांगपो (म्हणजे शुद्ध करणारी), भारताच्या अरुणाचल प्रदेशात दिहांग, आसाममध्ये ब्रह्मपुत्रा तर बांगला देशात जमुना असे म्हणतात. चिनी लोक हिला या-लू-त्सांगपू चिअँग या नावाने ओळखत असून तिबेटमध्ये तिला काही स्थानिक नावेही आहेत.

◆उगमानंतर ही नदी दक्षिणेकडील हिमालयाची मुख्य पर्वतश्रेणी व उत्तरेकडील नीएन-चेन-टांगला पर्वतश्रेमी यांच्यामधून हिमालयाच्या मुख्य श्रेणीला समांतर अशी पश्चिम-पूर्व देशेने वाहत जाते. तिबेट मधील ब्रह्मपुत्रा नदीचा एकूण प्रवाह सु. १,२९० किमी. आहे.

◆या भागातील पी ठिकाणापासून पुढे ती एकदम ईशान्यवाहिनी होऊन ग्याल परी व नामचा बारवा या पर्वतीय प्रदेशातील मोठमोठ्या खोल व अरुंद निदऱ्यांमधून उड्या घेत वाहू लागते. तेथे प्रवाहमार्गात अनेक द्रुतवाह व प्रपातमाला आढळतात. नंतर ती दक्षिणवाहिनी होऊन हिमालय पार करते व भारतात प्रथम सिआँग व पुढे दिहांग नावांनी प्रवेश करते. तिबेटमध्ये त्सांगपोला डावीकडून जो-का त्सांगपू (रागा त्सांगपो), ला-सा हो(चीचू), नि-यांग हो (ग्यामडा चू) तर उजवीकडून न्येन-चू हो (न्यांग) ह्या उपनद्या येऊन मिळतात. चीचू या उपनदीतीरावरच ल्हासा हे तिबेटच्या राजधानीचे ठिकाण आहे.

◆भारतात सदियाजवळ तिला दिबांग व लुहित या उपनद्या मिळाळ्यावर ती नैऋत्यवाहिनी होते व येथून पुढे ती ब्रह्मपुत्रा नावाने ओळखली जाते. येथूनच तिचे पात्र विशाल होऊन त्यात अनेक बेटांचीही निर्मिती झाल्याचे आढळते. माजुली हे अंतर्गत मोठ्या बेटांपैकी एक बेट या नदीमुळेच निर्माण झाले आहे.

◆आसाममध्ये ब्रह्मापुत्रेचा एक फाटा खेरकुटिया नावाने ब्रह्मपुत्रेपासून वेगळा होतो. पुढे हा फाटा उत्तरेकडून येऊन मिळणाऱ्या सुबनसिरी नदीसह धनसिरीच्या मुखासमोरच मूळ प्रवाहाला येऊन मिळतो. यामुळे ब्रह्मपुत्रेचा मूळ प्रवाह व तिचा खेरकुटिया हा फाटा यांदरम्यान माजुली या १,२५६.१५ चौ. किमी. क्षेज्ञाच्या बेटाची निर्मिती झाली आहे. ब्रह्मपुत्रेला भारतात उत्तरेकडून सुबनसिरी, भरेळी, मानस, चंपावती, सरलभंगा, कोपिली या उपनद्या येऊन मिळतात. आसाममधील ब्रह्मपुत्रेचे खोरे ‘आसामचे खोरे’ म्हणून ओळखले जाते. या खोऱ्याची लांबी सु. ७५० किमी. व रुंदी सरासरी ८०
बांगला देशात प्रवेश करताच जमुनेला उत्तरेकडून तोरसा, जलढाका, तिस्ता या उपनद्या येऊन मिळतात. पुढे गायबांडच्या दक्षिणेस जमुना (ब्रह्मपुत्रा) नदीपासून जुनी ब्रह्मपुत्रा हा नदीप्रवाह वेगळा होतो. हाच ब्रह्मपुत्रा नदीचा मूळ प्रवाहमार्ग होय. हा प्रवाहमार्ग जमालपूर व मैमनसिंगवरून आग्नेय दिशेने वाहत गेल्यावर पुढे भैरवबाझारजवळ मेघना नदीला मिळतो; तर जमुना (ब्रह्मपुत्रा) नदीचा सध्याचा मुख्य प्रवाह दक्षिणेस वाहत जाऊन ग्वालंदोच्या उत्तरेस गंगा नदीला मिळतो. तत्पूर्वी जमुनेला बारल, अत्राई, हुरासागर यांचा संयुक्त प्रवाह उजवीकडून येऊन मिळतो.

◆तसेच धालेश्वरी व बडी गंगा या शाखा तिच्यापासून वेगळ्या होऊन स्वतंत्रपणे मेघना नदीला मिळतात. ग्वालंदोपासूनचा गंगा-जमुना यांचा संयुक्त प्रवाह पद्मा नदी म्हणून ओळखला जातो. पुढे पद्मा नदीला उत्तरेकडून मेघना येऊन मिळाल्यावर त्यांचा संयुक्त प्रवाह मेघना या नावाने ओळखला जातो. मेघना खाडीमधून व इतर उपप्रवाहांमधून ही नदी बंगालच्या उपसागराला मिळते.

◆एकोणिसाव्या शतकापर्यंत ब्रह्मपुत्रेच्या वरच्या टप्प्याविषयी अज्ञानच होते. किंबहुना त्सांगपो व दिहांग (ब्रह्मपुत्रा) ही एकच नदी आहे. या

पोलीस भरती प्रश्नसंच

 महाराष्ट्राचे आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे?

उत्तर--नाशिक💐✅


 महाराष्ट्राच्या उत्तर सीमेला कोणत्या पर्वताची रांग आहे? 

उत्तर----सातपुडा💐✅


महाराष्ट्रात चुंनखडीचे साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत?

उत्तर--यवतमाळ💐✅


 महाराष्ट्र राज्यातील सर्वात लांबीचा महामार्ग कोणता ? 

उत्तर---national highway 6 💐✅


स्वातंत्र्य वीर सावरकरांचे जन्मस्थान कोणते? 

उत्तर- भगुर (जी नाशिक )💐✅

 

महाराष्ट्रातील शिखांची दक्षिण काशी कोणती? 

उत्तर--नांदेड💐✅

 

छत्रपती शाहू महाराजांनी गुळाची बाजारपेठ कोणत्या जिल्ह्यात स्थापन केली? 

उत्तर---कोल्हापूर येथे 1895 ला💐✅


महाराष्ट्रातील कापसाची प्रसिद्ध बाजारपेठ कोठे आहे? 

उत्तर--अमरावती💐✅

 

पुणे जिल्ह्यातील कोणते शहर बटाट्याच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे? 

उत्तर--जुन्नर💐✅


पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या काठी आहे? 

उत्तर---भीमा💐✅


 महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखरकारखाना कोठे स्थापन करण्यात आला होता?

उत्तर---प्रवरानगर(जी अहमदनगर )💐✅


 महाराष्ट्रातील जिल्हयांची संख्या ---

>>>36💐✅


महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात ?

उत्तर ---- गोदावरी💐✅


महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? 

उत्तर---गोदावरी💐✅


महाराष्ट्रातील सर्वाधिक आवर्षंनग्रस्त जिल्हा कोणता?

उत्तर---अहमदनगर💐✅


संत गाडगेबाबाचे नाव दिलेले विद्यापीठ कोठे आहे ?

उत्तर---अमरावती💐✅

 

भारतातील पहिले पक्षी अभयअरण्य कोठे स्थापन करण्यात आले? उत्तर

--कर्नाळा जिल्हा रायगड💐✅

 

यशवंतरावांच्या समाधी स्थळास कोणते नाव देण्यात आले?

उत्तर---प्रीतिसंगम💐✅

 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी कोठे आहे? 

उत्तर---मोझरी (जी. अमरावती.)💐✅

 

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या प्रकल्पास म्हणतात? 

उत्तर--कोयना प्रकल्प💐✅


 महाराष्ट्रातील मातीचे धरण ? 

उत्तर--गांगपूर जिल्हा नाशिक💐✅


 महाराष्ट्रातील कोणत्या शहरास बावन्न दरवाज्यांचे शहर म्हणून ओळखले जाते? 

उत्तर--औरंगाबाद💐✅


 लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? 

उत्तर---बुलढाणा💐✅


(०१)  राष्ट्रीय ग्राहक दिन केव्हा साजरा केला जातो ?

उत्तर- २४ डिसेंबर.


(०२)  सायकलचा शोध कोणी लावला ?

उत्तर- मॅकमिलन.


(०३)  'कुरल' या तामिळ महाकाव्याचे मराठीत भाषांतर कोणी केले ?

उत्तर- पांडूरंग सदाशिव साने.


(०४)  भारताने आॅलिम्पिक स्पर्धेत प्रथम कधी भाग घेतला ?

उत्तर- १९२० मध्ये.


(०५)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिले विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतीगृह कोठे सुरू केले ?

उत्तर- सोलापूर.


(०६)  भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे ?

उत्तर- वड.


(०७)  विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला ?

उत्तर- थाॅमस अल्वा एडिसन.


(०८)  कोणती आंतरराष्ट्रीय टेनिस खेळ स्पर्धा हिरव्या गवताच्या मैदानात खेळली जाते ?

उत्तर- विंबलडन.


(०९)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रथम महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह केव्हा केला ?

उत्तर- २० मार्च १९२७.


(१०) साखरेचे रासायनिक रेणूसूत्र काय आहे ?

उत्तर- C₁₂H₂₂O₁₁ 


(११)  भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोणास म्हणतात ?

उत्तर- दादासाहेब फाळके.


(१२)  डिझेल इंजिनचा शोध कोणी लावला ?

उत्तर- रूडाल्फ डिझेल.


(१३)  'फटका' या काव्यप्रकाराचे जनक कोणास म्हणतात ?

उत्तर- अनंत भवानीबाबा घोलप/ अनंत फंदी


(१४)  व्हाॅलिबाॅल खेळातील बाॅलचे वजन किती ग्रॅम असते ?

उत्तर- २७० ते २८० ग्रॅम.


(१५)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज समता संघ केव्हा स्थापन केला ?

उत्तर- ४ सप्टेंबर १९२७.


(१६)  महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी कोणती ?

उत्तर- पुणे.


(१७)  वाफेच्या इंजिनचा शोध कोणी लावला ?

उत्तर- जेम्स वॅट.


(१८)  'एकच प्याला' या प्रसिद्ध विडंबन नाटकाचे लेखक कोण आहे ?

उत्तर- राम गणेश गडकरी.


(१९)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची मुंबई विद्यापीठाच्या निवड समितिवर निवड केव्हा झाली ?

उत्तर- ८ जुलै १९३०.


(२०) ग्लुकोजचे रेणुसूत्र काय आहे ?

उत्तर- C₆H₁₂O₆ 


(२१)  राष्ट्रध्वजातील केशरी रंग कशाचे प्रतिक आहे ?

उत्तर- त्याग आणि शौर्य.


(२२)  टेलिफोनचा शोध कोणी लावला ?

उत्तर- अलेक्झांडर ग्रॅहम बेल.


(२३)  ना. धों.महानोर यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते ?

उत्तर- रानकवी.


(२४)  अर्जून पुरस्कार कधी दिला जातो ?

उत्तर- २९ आॅगस्ट.


(२५)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमामाई यांचे महापरिनिर्वाण केव्हा झाले ?

उत्तर- २७ मे १९३५.


(२६)  न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे ?

उत्तर- किवी.


(२७)  ग्रामोफोनचा शोध कोणी लावला ?

उत्तर- थाॅमस अल्वा एडिसन.


(२८)  मुकुंदराजाचा हा मराठीतील पहिला ग्रंथ,असे एक मत आहे ?

उत्तर- विवेकसिंधू.


(२९)  'सनी डेज' हे पुस्तक कोणाचे आहे ?

उत्तर- सुनील गावस्कर.


(३०) डाॅ.,बाबासाहेब आंबेडकर यांनी आचार्य अत्रे यांच्या कोणत्या चित्रपटाचे उद्घाटन केले ?

उत्तर- महात्मा फुले.


(३१)  अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे शासकीय निवासस्थान कोणते आहे ?

उत्तर- व्हाइट हाऊस.


(३२)  अंधासाठीच्या लिपीचा शोध कोणी लावला ?

उत्तर- ब्रेल लुईस.


(३३)  ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते ?*

उत्तर- अरूणा ढेरे.


(३४)  'गोल्डन गर्ल' हे पुस्तक कोणाचे आहे ?

उत्तर- पी. टी. उषा.


(३५)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुणे गोखले अर्थशास्त्र संस्थेत कोणत्या विषयावर भाषण केले ?

उत्तर- फेडरेशन व्हर्सेस फ्रिडम.


(३६) मराठीतील पहिली ज्ञात ऐतिहासिक कादंबरी कोणती ?

उत्तर- मोचनगड, गुंजीकर यांची 


(३७)  महाराष्ट्रातील विधानसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते ?

उत्तर- सयाजीराव लक्ष्मण सीलप


(३८)  देशातील पहिला स्वच्छ निर्मल जिल्हा कोणता ?

उत्तर- कोल्हापूर.


(३९)  श्यामची आई या चित्रपटाचे निर्माते  ?

उत्तर- प्र.के.अत्रे 


(४०)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला ?

उत्तर- 1990 


(४१)  तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये कोणत्या नदीच्या पाण्यावरून वाद आहे ?

उत्तर- कावेरी नदी.


(४२)  पेनिसिलीनचा शोध कोणी लावला ?

उत्तर- अलेक्झांडर फ्लेमिंग.


(४३)  आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते ?

उत्तर- कृष्णाजी केशव दामले.


(४४)  अमेरिकेचा कार्ल लुईस कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- अॅथेलेटिक्स.


(४५)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती दहन केव्हा केली ?

उत्तर- २५ डिसेंबर १९२७.

 

(४६)  सात टेकड्याचे शहर कोणते आहे ?

उत्तर- रोम.


(४७)  डायनामाइटचा शोध कोणी लावला ?

उत्तर- आल्फ्रेड नोबेल.


(४८)  आधुनिक मराठी कांदबरीचे जनक कोणास म्हटले जाते ?

उत्तर- ह. ना. आपटे.


(४९)  'प्लेईंग टू विन' हे पुस्तक कोणाचे आहे ?

उत्तर- सायना नेहवाल.


(५०)  डाॅ.,बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोणत्या संस्थेचे ब्रीद वाक्य 'शिका,संघटित व्हा,संघर्ष करा.' हे होते ?

उत्तर- बहिष्कृत हितकारिणी सभा.

नदया व त्यांचे उगमस्थान:-



गंगा =>गंगोत्री ( उत्तराखंड )

यमुना => यमुनोत्री ( उत्तराखंड )

सिंधू => मानसरोवर (तिबेट )


नर्मदा =>मैकल टेकडया , अमरकंटक ( मध्यप्रदेश )

तापी =>सातपुडा पर्वत , बैतुल (मध्यप्रदेश )

महानदी =>नागरी शहर( छत्तीसगड )

ब्रम्हपुत्रा =>चेमायुंगडुंग( तिबेट )


सतलज =>कैलास पर्वत( तिबेट )

व्यास => रोहतंग खिंड ( हिमाचल प्रदेश )

गोदावरी =>त्र्यंबकेश्वर , नाशिक

कृष्णा => महाबळेश्वर


कावेरी => ब्रम्हगिरी टेकड्या , कूर्ग ( कर्नाटक )

साबरमती =>उदयपूर , अरावली टेकड्या ( राजस्थान )

रावी =>चंबा ( हिमाचल प्रदेश )

पेन्नर => नंदी टेकड्या , चिकबल्लापूर ( कर्नाटक )

_______________________________