Monday 20 January 2020

भूगोल प्रश्नसंच 20/01/2020

1) पृष्ठीय सिंचन पध्दतीची (प्रवाह पध्दती) क्षमता कशी सुधारता येऊ शकते ?
   अ) पाटाचे अस्तरीकरण करून    ब) जमिनीचे योग्य सपाटीकरण करून
   क) मोकाट पध्दतीने पाणी देऊन
   1) अ आणि ब फक्त    2) ब आणि क फक्त
   3) अ आणि क फक्त    4) अ, ब आणि क
उत्तर :- 1

2) खालीलपैकी कोणत्या राज्यात एरंडरीचे उत्पादन अधिक होते ?
   1) गुजरात आणि आंध्रप्रदेश    2) महाराष्ट्र आणि कर्नाटक
   3) तामिळनाडू आणि ओरीसा    4) राजस्थान आणि बिहार
उत्तर :- 1

3) शाश्वत शेतीच्या उद्दीष्ट पूर्तीसाठी कोणत्या शेती पध्दतीचा सहभाग महत्त्वाचा असतो ?
   1) सेंद्रिय शेती        2) कोरडवाहू शेती
   3) पावसावर आधारित शेती    4) चारा – गवत शेती
उत्तर :- 1

4) पडणा-या पावसाच्या संवर्धनासाठी खोल जमिनीत खालीलपैकी कोणती पध्दत अतिशय महत्त्वाची आहे ?
   1) जमिनीच्या वरच्या थरात बदल करणे    2) जमिनीच्या वरच्या थरात विशिष्ट आंतररचना करणे (कॉनफिगरेशन)
   3) खोल नांगरट करणे        4) जमिनीशी उभे आच्छादन करणे
उत्तर :- 2

5) अ) वालुकामय मातीमध्ये चिकन माती पेक्षा जास्त रिकाम्या जागा असतात.
    ब) चिकणमाती वालुकामय मातीपेक्षा जास्त पाणी समावून घेऊ शकते.
   वरील विधानांबाबत खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे ?
   1) अ आणि ब पैकी एकही बरोबर नाही    2) अ बरोबर पण ब चूक आहे
   3) अ चूक पण ब बरोबर आहे      4) दोन्ही अ आणि ब बरोबर आहे
उत्तर :- 3

1) कोणत्या प्रकारच्या मशागतीचा हेतू जमिनींची धूप थांबविण्यासाठी व पिकांची चांगली वाढ होऊन अधिक उत्पादनसाठी आहे ?
   1) धानांच्या ताटांचे बुडरवे, आच्छादन व मशागत    2) शुन्य मशागत
   3) कमीत कमी मशागत          4) प्राथमिक मशागत
उत्तर :- 1

2) खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमाच्या प्रस्थापनाला / विकासाला भारत सरकारच्या कृषि मंत्रालयाने हातभार लावला ?
   1) अवर्षण प्रणव क्षेत्र कार्यक्रम (डी.पी.ए.पी.)     
   2) वाळवंट विकास कार्यक्रम (डी.पी.पी.)
   3) कोरड वाहु प्रदेशासाठी राष्ट्रीय पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम (एन.डब्लु.डी.पी.आर.ए.)
   4) बहुव्याप्ती असलेला पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम (काऊडेप)
उत्तर :- 3

3) भारतात मिट्टी बचाओ (माती वाचवा) चळवळीला कुठे सुरवात झाली ?
   1) नागपूर, महाराष्ट्र    2) म्हैसूर, कर्नाटक   
   3) दारभंगा, बिहार    4) होशंगाबाद, मध्यप्रदेश
उत्तर :- 4

4) पिकांना स्फुदराची जास्तीत जास्त उपलब्धता होण्यासाठी जमिनीचा सामू या दरम्यान असतात.
   1) 4.5 – 6    2) 6 – 7   
   3) 7.5 – 8.5    4) 7.0 – 8.5
उत्तर :- 2

5) कमी पावसाच्या प्रदेशातील बागायती जमिनी कशामुळे क्षारयुक्त व चोपण (अल्कली युक्त) होतात ?
   1) कमी प्रमाणात अन्नद्रव्याचा निचरा    2) पीक अवशेषांचा अती वापर
   3) असंतुलीत खतांचा वापर      4) पाण्याच्या बाष्पीभवनामुळे पृष्ठभागातील थरांमध्ये क्षारांची वाढ
उत्तर :- 4

1) पिकांच्या योग्य वाढीसाठी पोयटा (लोम) मातीत, हवा : पाणी : घन पदार्थ........................ प्रमाणात असावेत:
   1) 20:30:50    2) 30:30:40    3) 25:30:45    4) 25:25:50
उत्तर :- 4

2) मध्यवर्ती वाळवंट विभाग संशोधन केंद्र जोधपरू हे कोणत्या संशोधनाशी संबंधित आहे ?
   1) जमीन धुपीचे परिणाम     
   2) पाण्याने होणा-या धुपीचे परिणाम
   3) वा-याने होणा-या धुपीचे परिणाम   
   4) वरीलपैकी कोणतेही नाही
उत्तर :- 3

3) डोंगराळ प्रदेशात जमिनीची धूप थांबविण्यासाठी बेंच टेरेंसींग सर्वसाधारणपणे या उतारापर्यंत करण्यात येते ........................
   1) 16% ते 33%    2) 3% ते 5%     
   3) >10%      4) 40% ते 45%
उत्तर :- 1

4) जमिनीचा पोत म्हणजे
   1) मातीच्या खनिजांची रचना    2) मातीच्या कणांची रचना
   3) सेंद्रीय पदार्थाची रचना      4) यापैकी काहीही नाही
उत्तर :- 4

5) आम्लधर्मीय जमिनी ................... यांच्या निच-यामुळे तयार होतात ?
   1) पालाश, सोडियम, तांबे, चुना   
   2) मॉलिबडेनम, चुना, मॅग्नेशियम, सोडियम
   3) चुना, मॅग्नेशियम, पालाश, हाइड्रोजन 
   4) चुना, सोडियम, मॅग्नेशियम, पालाश
उत्तर :- 4

No comments:

Post a Comment

Latest post

भारतातील प्रमुख धरणे आणि नदी प्रकल्प

𝟏)  इडुक्की धरणा- पेरियार नदी - केरळ 𝟐)  उकई प्रकल्प - तापी नदी (तापी नदी) - गुजरात 𝟑)  काकरापार प्रकल्प - तापी नदी (तापी नदी) - गुजरा...