Sunday 2 February 2020

अर्थसंकल्प Live 2020 : उद्योग आणि दळणवळण

⚡ अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाला संसदेत सुरुवात :

👉 *भाषणातील ठळक मुद्दे* :

▪ भारतीय उत्पादनाचा निर्यातीवर भर, प्रत्येक जिल्हा निर्यात केंद्र व्हावा यासाठी प्रयत्न करणार.

▪ मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्मिती भारतात व्हावी यासाठी सरकार प्रयत्न करणार.

▪ उद्योगांसाठी 27 हजार 300 कोटींची तरतूद, पायाभूत सुविधांसाठी 100 लाख कोटींची तरतूद.

▪ रस्ते विकासावर सरकारचा भर, 2 हजार किलोमीटरचे किनारी रस्ते तयार करणार.

▪ देशभरात 9 हजार किलोमीटरचा इकॉनॉमिक कॉरिडॉर तयार करणार.

▪ दिल्ली -मुंबई एक्सप्रेस वे 2023 पर्यंत पूर्ण करणार,

▪ 550 रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा देणार, रेल्वेच्या रिकाम्या जागेत सौर प्रकल्प उभारणार.

▪ तेजस सारख्या गाड्यांनी पर्यटन स्थळे जोडणार, पीपीपी तत्वावर रेल्वेच्या खाजगीकरणाची चाचणी करणार.

▪ मुंबई-अहमदाबाद दरम्यान जलद रेल्वे गाड्या वाढविणार.

▪ उडान योजनेअंतर्गत 100 नव्या विमान तळांची निर्मिती करणार.

📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी

No comments:

Post a Comment

Latest post

भारतातील महत्वाचे जलविद्युत प्रकल्प

🔶मचकुंदी प्रकल्प  मुचकुंदी नदीवरील आंध्रप्रदेश व ओरिसा या राज्यांचा संयुक्त प्रकल्प. जलपुत येथे मुचकुंदी नदीवर धारण. मुख्य उद्देश वीजनिर्मि...