Monday 18 May 2020

कर्मवीर भाऊराव पाटील


🔵 जीवन, शिक्षण व समाजकार्य 🔵

🔺भाऊरावांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील कुंभोज या गावी 22 सप्टेंबर 1887 रोजी
एका जैन कुटूंबात झाला.

🔺 त्यांचे वडिल इस्ट इंडिया कंपनीत लिपिक म्हणून नोकरीस होते.

🔺 सांगली जिल्ह्यातील ऐतवडे बुद्रुक हे त्यांचे मूळ गाव होय

🔺भाऊरावांचे प्राथमिक शिक्षण कुंभोज, दहिवडी, विटे इत्यादी ठिकाणी झाले.

🔺 पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले

🔺 राहण्याची सोय जैन बोर्डिंगमध्ये करण्यात आली होती

🔺 राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला

🔺 साताऱ्यात जाऊन शिकवण्या घेऊ लागले. याच काळात त्यांनी मदवानमास्तर, भाऊसाहेब कुदळे, नानासाहेब येडेकर आदि मंडळींबरोबर दुधगावात ‘दुधगाव शिक्षण मंडळ’ स्थापन केले

🔺 संस्थेचे चिन्ह बोधी व्रुक्ष आहे, याच्या खालीच सिद्धार्थ गौतमांना द्न्यानप्राप्ती झाली होती म्हणुन

🔺 सातारा जिल्ह्यातील काले या गावी दिनांक "४ ऑक्टोबर १९१९" रोजी भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली.

🔺 त्यांचा सत्यशोधक समाजाच्या कार्याशी जवळून संबंध आला

🔺 महात्मा फुले यांना गुरू मानूनच त्यांनी शैक्षणिक प्रसाराचे कार्य केले. 
‘प्रत्येक गावात शाळा’; ‘बहुजन समाजातील शिक्षक’ व ‘शिक्षक प्रशिक्षण’ – या सूत्रांचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.

🔺 भाऊरावांनी महाराजा सयाजीराव हायस्कूल या नावाने देशातले ‘कमवा आणि शिका’ या पद्धतीने चालणारे पहिले "फ्री ॲन्ड रेसिडेन्शियल हायस्कूल" सुरू केले.

🔺 भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून ‘कमवा व शिका’ हे कल्पना स्वीकारून मोठे काम केले.

🔺 २५ फेब्रुवारी १९२७ रोजी महात्मा गांधींच्या हस्ते सातार्यातील वसतिगृहाचे "श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाउस" असे नामकरण केले गेले.

🔺 १६ जून १९३५ रोजी रयत शिक्षण संस्था नोंदणीकृत (रजिस्टर) झाली. याच साली सातार्‍यात भाऊरावांनी ‘सिल्व्हर ज्युबिली ट्रेनिंग कॉलेज’ सुरू केले.

🔺  १९४७ साली भाऊराव पाटलांनी साताऱ्यात "छत्रपती शिवाजी कॉलेज" ची, तर  १९५४ साली कऱ्हाड येथे "सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज" ची स्थापना केली.

🔺प्रशिक्षित शिक्षकांची उणीव जाणवू लागली, म्हणून त्यांनी प्रथम महात्मा फुले अध्यापक विद्यालय व पुढे १९५५ मध्ये सातारा येथे मौलाना आझाद यांच्या नावाने आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सुरू केले

🔺 केंद्र सरकारने पद्मभूषन पुरस्कार दिला

🔺 1959 साली पुणे विद्यापीठाने डी लिट ही पदवी दिली

🔺9 मे 1959 या दिवशी पुण्याच्या ससून रुग्णालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांचे निधन झाले.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...