Saturday 18 July 2020

लॉर्ड डलहौसी

 हा ब्रिटीश भारतातीलस्कॉटिशवंशीय वासाहतिक प्रशासक आणि गव्हर्नर जनरल होता.

 इ.स. १८४८ साली लॉर्ड डलहौसी हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर जनरल म्हणुन भारतात आला. त्या वेळी इंग्रनी राजसत्तेचे वर्चस्व हिंदुस्तानात स्थापीत झाले होते. असे असले तरी प्रत्यक्ष अप्रत्य्क्षपणे हिंदुस्तानातील छोटेमॊठे राजे अथवा संस्थानीक हे त्यांच्या प्रदेशातील राज्य कारभार पाहात असत.

या मुळे इंग्रजांचे एकछत्री साम्राज्य स्थापन होण्यास अडचणी होत होत्या. त्यामुळे लॉर्ड डलहौसीने या ना त्या कारणाने संस्थाने गिळंकृत करण्यास सुरुवात केली. त्यातील प्रमुख कारण असे ते दत्तक विधान नाकारणे. एखादा राजा अथावा संस्थानीक निपुत्रिक मरण पावला तर त्याच्या जवळच्या वारसाला अथवा हिंदु धर्मशात्राप्रमाणे त्याने दत्तक घेतलेल्या व्यक्तीला गादीवर बसवण्यास परवानगी नाकारणे ही डलहौसीची नीती होती.
यास व्यपगत सिद्धांत/डॉक्ट्रीन ऑफ लॅप्स असे म्हणतात. याने भारतातील अनेक संस्थाने खालसा केली

.लॉर्ड डलहौसी व्हाईसरॉय असताना भारताचे पहिले पोस्टाचे तिकीट छापले

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...