०९ ऑक्टोबर २०२०

भारत सरकारच्या केंद्रीय योजना

 


1) स्टार्ट अप इंडिया, स्टॅन्ड अप इंडिया


▪️परारंभ - १६ जानेवारी २०१६


▪️उद्देश - या योजनेअंतर्गत नवउद्योजकांना त्यांचा व्यवसाय [स्टार्ट अप ] सुरु करण्यासाठी साहाय्य केले जाते.

__________


2) दीन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना [DDUGKY]


▪️परारंभ - २५ सप्टेंबर २०१४


▪️योजनेचा उद्देश - ग्रामीण युवकांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षित करणे आहे.

__________


3) प्रसाद [Piligrimage Rejuvenation and Spiritual Augmentation Drive]


▪️परारंभ - ९ मार्च २०१५


▪️योजनेचा उद्देश - या योजनेअंतर्गत अमृतसर, अजमेर, अमरावती, द्वारका, गया, कांचीपुरम, केदारनाथ, कामाख्य, मथुरा, पुरी, वाराणसी, वेल्लकनी, या तीर्थक्षेत्रामध्ये जागतिक दर्जाच्या पर्यटनासाठी पायाभूत सुविधा विकसित करण्यात येत आहेत.

__________


4) उडाण योजना


▪️परारंभ - १४ नोव्हेंबर २०१४


▪️योजनेचा उद्देश - या योजनेअंतर्गत उच्च तांत्रिक शिक्षणासाठी मुलींना प्रोत्साहन दिले जाते.

__________


5) प्रधानमंत्री उज्वला योजना


▪️परारंभ - १४ नोव्हेंबर २०१४


▪️योजनेचा उद्देश - या योजनेअंतर्गत दारिद्ररेषेखालील ५ कोटी महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले जात आहे.

__________


6) नमामि गंगे प्रकल्प


▪️परारंभ - १० जुलै २०१४


▪️उद्देश - गंगा नदीचे शुद्धीकरण, संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे.

__________


7) सेतू भारतम प्रकल्प


▪️परारंभ - ४ मार्च २०१६


▪️उद्देश - रेल्वे क्रॉसिंगपासून सर्व राष्ट्रीय महामार्ग मुक्त करण्यासाठी आणि २०१९ राष्ट्रीय महामार्गावरील जुन्या पुलांच्या दुरुस्तीसाठी ही योजना राबविण्यात येत आहे. यासाठी ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

१० चालू घडामोडी २६ एप्रिल २०२५

१. भारत सरकारने अलीकडेच किती नवीन आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांना मान्यता दिली आहे? अ. ३००० बी.५००० सी.७००० डी.१०,००० उत्तर: डी. १०,००० स्...