Thursday 8 October 2020

जेव्हा तुम्ही बरीच पुस्तके वाचता तेव्हा काय होते?



भिकाऱ्यात पण माणुस दिसायला लागतो.

चोरामध्ये चोरी करण्याचे कारण दिसायला लागते.

प्रेम आणि वासणा यातला फरक कळायला लागतो.

एखाद्याची चुक झाल्यावर त्याला माफ करण्याची ताकद येते.

कोणत्या ठिकाणी बोलावे आणि कुठे बोलु नये हे कळते.

चाकु, बंदुक यांच्यापेक्षा शब्द जास्त तीक्ष्ण असतात हे समजते.

आई वडीलांची किंमत कळायला लागते.

ब्रेकअप, घटस्फोट, जवळच्या व्यक्तीचे मरण…. या गोष्टी म्हणजे पुर्ण जीवन संपले हा गैरसमज दुर होतो. या गोष्टी पण इतर गोष्टी सारख्याच सामान्य वाटायला लागतात.

प्राण्यांबद्दल आपुलकी वाटायला लागते.

सोशल मिडिया वर हासऱ्या चेहऱ्याचे फोटोज् टाकुण खुश आहेत असं दाखवणारे लोक खऱ्या आयुष्यात किती दुःखी आहेत हे समजते.

कलाकार चित्रपटात नाटक/काम करतात. खऱ्या आयुष्यात पण खुप नाटकं करणारी कलाकार आपल्या जवळ असतात हे पण समजते.

या जगात १% चागली लोक आहेत आणि १% वाईट लोक आहेत .राहीलेले आपण सर्व फक्त अनुयायी आहोत, काहीजण चांगल्या लोकांचे अनुकरण करून चांगले होतात तर काहीजण वाईट लोकांचे अनुकरण करून वाईट होतात, हे पण समजते.

प्रोत्साहनामुळे हरलेला व्यक्ति जिंकु शकतो, हे पण समजायला लागते.

हारल्यावर किंवा नापास झाल्यावर आत्महत्येचा विचार पण मनात येत नाही.

करोडोची संपत्ती असणाऱ्या मध्ये गरिब तसेच दिवसाचे २००/- कमवणाऱ्यामध्ये श्रीमंत दिसायला लागतो.

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...