Thursday 18 February 2021

गृहनिर्माण मंत्रालयाचे ‘पेय जल सर्वेक्षण’



🔰गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाच्यवतीने जल जीवन अभियान (शहरी) अंतर्गत प्रायोगिक तत्वात ‘पेय जल सर्वेक्षण’ या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे.


🅾️ठळक बाबी


🔰शहरांमध्ये पाण्याचे न्याय्य वितरण, सांडपाण्याचा पुनर्वापर आणि पाण्याचे प्रमाण व पाण्याच्या गुणवत्तेच्या संदर्भात जलसंपदेचा नकाशा तयार करणे अश्या बाबींचे सर्वेक्षण केले जाईल.


🔰ह सर्वेक्षण आग्रा, बदलापूर, भुवनेश्वर, चूरू, कोची, मदुराई, पटियाला, रोहतक, सूरत आणि तुमकूर या 10 शहरांमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे.


🔰जल जीवन अभियान (शहरी) SDG-6 च्या अनुषंगाने सर्व 4,378 वैधानिक छोट्या शहरांमधील नळाद्वारे सर्व घरांना पाणीपुरवठा करून सार्वभौमिक संरक्षण प्रदान करण्यासाठी रचलेले आहे.


🔰सस्थात्मक यंत्रणेच्या विकासासह 20 टक्के पाण्याची मागणी पुनर्वापरायोग्य पाण्याद्वारे भागविली जाण्याची शक्यता आहे.

जल जीवन अभियान


🔰जल जीवन अभियानाचा शुभारंभ 15 ऑगस्ट 2019 रोजी करण्यात आला. केंद्र सरकार या मोहिमेच्या अंतर्गत देशातील सर्व भागात स्वच्छ पाणी पुरवठा करण्याचा उद्देश आहे.


🔰2024 सालापर्यंत सर्व घरांना नळाने पाणी देणे हे योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. योजनेमार्फत प्रत्येक कुटुंबाला नळाने पाणी पुरविणे, दरडोई 55 लिटर पाणीपुरवठा, शुद्ध पाणी देण्याचा संकल्प, सार्वजनिक नळाद्वारे कुटुंबांना पाणीपुरवठा ही योजनेची वैशिष्ट्ये आहेत.

No comments:

Post a Comment

Latest post

Important Lakes in India

🔹डल झील :- जम्मू-कश्मीर 🔹वुलर झील :- जम्मू-कश्मीर 🔹बैरीनाग झील :- जम्मू-कश्मीर 🔹मानस बल झील :- जम्मू-कश्मीर 🔹नागिन झील :- जम्मू-कश...