सदरील लढाई ही पेशवे व हैद्राबादचा निजाम यांच्यात फेब्रुवारी-मार्च 1795 साली महाराष्ट्रातील
अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा (ता. जामखेड) येथे झालेली एक निर्णायक लढाई होती.
मराठा साम्राज्यवादी विस्तार करू इच्छिणाऱ्या नाना फडणवीसने हैद्राबादच्या निजामाकडे थकलेल्या चौथाईची मागणी केली होती. निजामाचा मंत्री मुशिर मुल्कने सदरील मागणी फेटाळून लावताच पेशवा, दौलतराव शिंदे (मादजी शिंदेचा
वारस), तुकोजी होळकर व दुसरा रघुजी भोसले यांच्या संयुक्त फौजांनी मार्च 1795 मध्ये निजामाच्या प्रदेशावर आक्रमण केले.
यावेळी निजामाने ब्रिटिशांकडे मदत मागितली असता ब्रिटिशांनी सदरील मदत नाकारली. परीणामी उघड्या मैदानावर मराठ्यांना तोंड देण्याचे सामर्थ्य निजामाकडे नसल्याने निजामाने खर्डा येथील किल्ल्याचा आश्रय घेतला. या किल्याला लगेचच मराठ्यांनी वेढा घातला व या किल्याला होणारा पाणी पुरवठा व अन्न पुरवठा खंडीत करुन किल्ल्या भोवती तोफा रचल्या.
अखेर भयग्रस्त निजामाने 13 मार्च 1795 साली तहाची याचना करून लढाईतून माघार घेतली व या तहाने सदरील लढाईची सांगता झाली. या लढाईत पराभुत झाल्यावर निजामानेही इंग्रजांची साथ सोडून दिली.
या तहातील अटींनुसार,
निजामाने मराठ्यांना 5 कोटी रुपये, थकलेल्या चौथाई देण्याचे मान्य केले.
स्वत:च्या ताब्यातील प्रदेशांपैकी एक तृतीअंश प्रदेश मराठ्यांचा स्वाधीन केला.
दौलताबादचा किल्ला तसेच त्याच्या भोवतालचा प्रदेश पेशव्याला देण्यात आला.
तसेच वऱ्हाडचा प्रदेश नागपूरच्या भोसल्यांना देण्यात आला.
Saturday 15 October 2022
इ.स. 1795 :- खर्ड्याची लढाई
Subscribe to:
Post Comments (Atom)
Latest post
वाचा :- इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये
◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले ◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन ◾️...
-
(०१) राष्ट्रीय ग्राहक दिन केव्हा साजरा केला जातो ? उत्तर- २४ डिसेंबर. (०२) सायकलचा शोध कोणी लावला ? उत्तर- मॅकमिलन. (०३) 'कुरल...
-
राज्यशास्त्र: 1)रंजन कोळंबे सर. 2)किशोर लवटे - पंचायतराज. 3)एम.लक्ष्मीकांत(ठराविक टॉपिक). अर्थशास्त्र: 1)किरण देसले सर - पार्ट 1. भूगोल: महा...
-
◾️भारत रत्न पुरस्कार 2024 :- कर्पूरी ठाकूर, लालकृष्ण अडवाणी, व्ही. नरसिंह राव, चौधरी चरण सिंह, एम.एस. स्वामीनाथन, ◾️महाराष्ट्र भूषण पुरस्क...
No comments:
Post a Comment