Ads

06 May 2022

भारतरत्न पुरस्कार,पुरस्काराचे स्वरूप,भारतरत्न पुरस्कार विजेत्यांची यादी

भारतरत्न पुरस्कार

पुरस्काराचे स्वरूप

भारतरत्न पुरस्कार विजेत्यांची यादी

भारत रत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे.

देशासाठी सर्वोच्च त्याग करणार्या किंवा भारताची किर्ती जगभरात वृद्धीगंत करणार्या व्यक्तीस भारत रत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देवून गौरविले जाते. अशा व्यक्तींनी उभी हयात यासाठी घालविलेली असते.

अनेकांना तर हा सन्मान मरणोत्तर दिला गेला आहे. आतापर्यंत समाज सेवा, कला, साहित्य, विज्ञानतंत्रज्ञान, कारखानदारी ही क्षेत्रे व सनदी सेवा बजावलेल्या व्यक्तींनाच हा पुरस्कार दिला गेला आहे. १९५५ साली कायद्यात काही बदल करून मरणोपरांत ‘भारतरत्न’ देण्याची सोय उपलब्ध करून घेण्यात आली.

आत्तापर्यंत ४५  जणांना ‘हा अत्युच्च सन्मानाचा भारतरत्न पुरस्कार लाभलेला आहे. त्यात तीन नावे परदेशी व्यक्तींची आहेत. नुकतेच,भारतरत्न पुरस्काराच्या निवड प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्या लोकांनाही आता या पुरस्काराने सन्मानीत करता येऊ शकते.यातील निवडक श्रेणीला भारतरत्न देण्याची अट काढुन टाकण्यात आली आहे. तशी अधिसूचना व राजपत्र जारी करण्यात आले आहे.

फेब्रुवारी १९५४ साली पहिला पुरस्कार डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते दिला गेला.

१९९२ साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मरणोपरांत ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात आले होते. सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या एका जनहितयाचिकेचा आधार घेवून नेताजींना दिलेला हा पुरस्कार परत काढून घेण्यात आला. त्या याचिकेत नेताजींच्या मृत्युचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याने त्यांना मरणोपरांत ‘भारतरत्न’ पुरस्कार देणे अवैध आहे असा युक्तिवाद करण्यात आलेला होता.

______________________________

पुरस्काराचे स्वरूप

सध्याचे ‘भारतरत्नपुरस्काराचे स्वरुप म्हणजे एका सोनेरी पिंपळाच्या पानावर एका बाजूला मधोमध सूर्यप्रतीमातिच्याखालीभारतरत्नअसे शब्द व दुसऱ्या बाजूला देशाचे राष्ट्रीय चिन्ह “चौमुखी सिंहाची प्रतीमा’ अशा प्रकारचे पदक आहे.  हा पुरस्कार मिळवणाऱ्यांना इतर कुठलीही विशेष पदवी किंवा मानधन वगैरे मिळत नाही. पण त्यांना -
* Indian order of precedence मध्ये ७वे स्थान मिळते.
* भारतात मोफत 1st class विमान व रेल्वेचा प्रवास
* टँक्समधुन सुट, पेन्शन ५०% किंवा पंतप्रधानाच्या पगाराएवढी
* राज्यसभा व लोकसभेच्या अधिवेशनास हजर राहू शकतात
* z प्रकारची सेक्युरीटी
* गणतंत्र व प्रजासत्ताक दिवसाचे प्रमुख आतिथी
* त्यांच्या एका नातेवाईकाला सरकारी नोकरी

___________________________

भारतरत्न पुरस्कार विजेत्यांची यादी
क्रमांक

नाव

जन्म-मृत्यु

पुरस्कृत वर्ष

क्षेत्र

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

(१८८८-१९७५)

१९५४

भारताचे माजी राष्ट्रपती व नामांकीत शिक्षणतज्ञ

चक्रवर्ती राजगोपालचारी

(१८७८-१९७२)

१९५४

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व शेवटचे गव्हर्नर जनरल

डॉ. चंद्रशेखर वेंकट रमण

(१८८८-१९७०)

१९५४

प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ

डॉ. भगवान दास

(१८६९-१९५८)

१९५५

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते

डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या

(१८६१-१९६२)

१९५५

पहिले अभियंता 'बँक ऑफ म्हैसूर' ची स्थापना

जवाहरलाल नेहरू

(१८८९ -१९६४)

१९५५

भारताचे पहिले पंतप्रधान व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले काँग्रेसचे लोकप्रिय नेते

गोविंद वल्लभ पंत

(१८८७-१९६१)

१९५७

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व उत्तर प्रदेशाचे प्रथम मुख्यमंत्री

भारताचे दुसरे गृहमंत्री

डॉ. धोंडो केशव कर्वे

(१८५८-१९६२)

१९५८

समाजसुधारक, शिक्षणप्रसारक

डॉ. बिधान चंद्र रॉय

(१८८२-१९६२)

१९६१

पश्चिम बंगालचे पहिले मुख्यमंत्री व वैद्यक

१०

पुरूषोत्तम दास टंडन

(१८८२-१९६२)

१९६१

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व शिक्षणप्रसारक

११

डॉ. राजेंद्र प्रसाद

(१८८४-१९६३)

१९६२

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले राष्ट्रपती

१२

डॉ. झाकिर हुसेन

(१८९७-१९६९)

१९६३

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे राष्ट्रपती

१३

डॉ. पांडुरंग वामन काणे

(१८८०-१९७२)

१९६३

शिक्षणप्रसारक

१४

लाल बहादूर शास्त्री (मरणोत्तर)

(१९०४-१९६६)

१९६६

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे दुसरे पंतप्रधान

१५

इंदिरा गांधी

(१९१७-१९८४)

१९७१

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान

१६.

वराहगिरी वेंकट गिरी

(१८९४-१९८०)

१९७५

कामगार युनियनभारताचे चौथे राष्ट्रपती

१७.

के. कामराज (मरणोत्तर)

(१९०३-१९७५)

१९७६

भारतीय स्वतंत्रता चळवळीत भाग, मद्रास जाज्याचे मुख्यमंत्री

१८

मदर तेरेसा

(१९१०-१९९७)

१९८०

ख्रिश्चन मिशनरी समाजसुधारक, मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या संस्थापक

१९.

आचार्य विनोबा भावे (मरणोत्तर)

(१८९५-१९८२)

१९८३

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व समाजसुधारक

२०.

खान अब्दुल गफार खान

(१८९०-१९८८)

१९८७

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील पहिले बिगर भारतीय नेते

२१.

एम. जी. रामचंद्रन (मरणोत्तर)

(१९१७-१९८७)

१९८८

चित्रपट अभिनेते व तमिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री

२२.

भीमराव रामजी आंबेडकर (मरणोत्तर)

(१८९१-१९५६)

१९९०

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अर्थतज्ञ, राजकीय नेते

२३.

नेल्सन मंडेला

(जन्म १९१८-२०१३)

१९९०

वर्णभेद विरोधी चळवळीचे प्रणेते

२४.

राजीव गांधी (मरणोत्तर)

(१९४४-१९९१)

१९९१

भारताचे सातवे पंतप्रधान

२५.

सरदार वल्लभभाई पटेल ( मरणोत्तर)

(१८७५-१९५०)

१९९१

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले गृहमंत्री

२६.

मोरारजी देसाई

(१८९६-१९९५)

१९९१

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पाचवे पंतप्रधान

२७.

मौलाना अबुल कलाम आझाद (मरणोत्तर)

(१८८८-१९५८)

१९९२

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले शिक्षणमंत्री

२८.

जे. आर. डी. टाटा

(१९०४-१९९३)

१९९२

उद्योजक

२९.

सत्यजित रे

(१९२२-१९९२)

१९९२

बंगाली चित्रपट निर्माते

३०.

ए. पी. जे. अब्दुल कलाम

(जन्म १९३१)

१९९७

भारताचे ११वे राष्ट्रपती

३१.

गुलझारीलाल नंदा

(१८९८-१९९८)

१९९७

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पंतप्रधान

३२.

अरुणा आसफ अली‎ (मरणोत्तर)

(१९०६-१९९५)

१९९७

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेत्या

३३.

एम.एस. सुब्बुलक्ष्मी

(१९१६-२००४)

१९९८

कर्नाटक शैलीतील गायिका

३४.

चिदंबरम्‌ सुब्रमण्यम्

(१९१०-२०००)

१९९८

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे माजी कृषीमंत्री

३५.

जयप्रकाश नारायण (मरणोत्तर)

(१९०२-१९७९)

१९९९

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते

३६.

रवी शंकर

(१९२०-२०१२)

१९९९

प्रसिद्ध सितारवादक

३७.

अमर्त्य सेन

(जन्म १९३३)

१९९९

प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ

३८.

गोपीनाथ बोरदोलोई‎ (मरणोत्तर)

(१८९०-१९५०)

१९९९

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व आसामचे मुख्यमंत्री

३९.

लता मंगेशकर

(जन्म १९२९)

२००१

पार्श्वगायिका

४०.

बिसमिल्ला खान

(१९१६-२००६)

२००१

शहनाईवादक

४१.

भीमसेन जोशी

(१९२२-२०११)

२००८

हिंदुस्थानी शास्त्रीय गायक

४२.

सी.एन.आर.राव

(जन्म-१९३४)

२०१४

शास्त्रज्ञ

४३.

सचिन तेंडूलकर

जन्म-इ.स.१९७३

२०१३

क्रिकेटपटू

४४.

मदनमोहन मालवीय (मरणोत्तर)

(१८६१-१९४६)

२०१४

स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाचे योगदान देणारे, बनारस हिंदू विश्वविद्यापीठ व हिंदू महासभेचे संस्थापक, प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ

४५.

अटलबिहारी वाजपेयी

(जन्म १९२४)

भारतीय ज्ञानपीठ कार्य व विविध योजना

भारतीय ज्ञानपीठ

कार्य व विविध योजना

ज्ञानपीठ पुरस्कार

प्रसिद्ध उद्योगपती स्वर्गीय साहू शांतिप्रसाद जैन यांनी १८ फेब्रुवारी १९४४ रोजी वाराणसी येथे स्थापन केलेली आणि भारतीय साहित्य-संस्कृतीच्या अभिवृद्धयर्थ कार्य करणारी प्रख्यात संस्था.

शांतिप्रसादांच्या सुविद्य पत्‍नी स्व. श्रीमती रमा जैन ह्या संस्थेच्या स्थापनेपासून १९७५ पर्यंत अध्यक्षा होत्या.

वाराणसी येथे १९४४ मध्ये भरलेल्या अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषदेच्या अधिवेशनानिमित्त अनेक विद्वान एकत्र जमले होते.

त्यांनी शांतिप्रसादांना देशात भारविद्येच्या विविध शांखांतील सखोल संशोधनासाठी तसेच प्राचीन ग्रंथ संपादून प्रकाशित करण्यासाठी विविध योजना आखून कार्य करीत राहणारी एखादी संस्था असण्याची नितान्त गरज असल्याचे सांगितले. ही गरज लक्षात घेऊन शांतिप्रसादांनी 'भारतीय ज्ञानपीठ' ही विश्वस्त संस्था स्थापन केली. स्थापनेच्या वेळी शांतिप्रसादांनी म्हटले, की 'दुर्मिळ प्राचीन भारतीय ग्रंथांचे संशोधन, संपादन व प्रकाशन करणे तसेच सद्यकालीन भारतीय भाषांतील मौलिक सार्वजनिक वाङ्‍मयास लोकोदयासाठी उत्तेजन देणे ह्या हेतूने भारतीय ज्ञानपीठाची स्थापना केली आहे.

कार्य व विविध योजना. --------

ज्ञानपीठाच्या कार्यविकासाचे चार प्रमुख टप्पे दिसून येतात :

(१) पहिल्या टप्प्यात 'मूर्तिदेवी ग्रंथमाले'ची योजना आखून भारतविद्येतील प्राचीन ग्रंथांचे-विशेषतः जैन आचार्यांच्या-संशोधन, संपादन व प्रकाशन हा कार्यक्रम हाती घेण्यात आला. हे ग्रंथ संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश, प्राचीन कन्नड व तमिळ भाषेतील होते. मूलतः नाथुराम प्रेमींनी मुंबई येथे सुरू केलेल्या 'माणिकचंद्र ग्रंथमाले'चेही पुनरूज्‍जीवन करून ती तडीस नेणे याचाही अंतर्भाव या टप्प्यात होता.

(२) दुसऱ्या टप्प्यात 'लोकोदयग्रंथमाले' चा विकास करण्यात आला. मान्यवर आधुनिक भारतीय लेखकांच्या सर्जनशील ग्रंथांचे प्रकाशन करणे तसेच नवोदित होतकरू लेखकांना उत्तेजन देऊन त्यांच्याही ग्रंथांचे प्रकाशन या टप्प्यात करण्यात आले.

(३) तिसऱ्या टप्प्यात विशिष्ट कालखंडात निर्माण झालेल्या पंधरा भारतीय भाषांतील एका उत्कृष्ट सर्जनशील ग्रंथाची दरवर्षी निवड करण्यात येऊन त्याला एक लाख रूपयांचा (१९८२ पासून दीड लाख) पुरस्कार देण्याची योजना कार्यवाहीत आली.

(४) चौथ्या टप्प्यात पुराभिलेख व पुरातत्त्वीय सर्वेक्षण व संवर्धनाची योजना हाती घेण्यात आली; तसेच जैनांनी निर्माण केलेल्या कलावस्तूंचा व ग्रंथांचा सखोल अभ्यास व संशोधन करण्याच्या योजना आखण्यात आल्या. चौथ्या टप्प्यातच (अ) संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश इ. भाषांत उपलब्ध असलेल्या भगवान महावीरांच्या सर्व काव्यत्मक चरित्रांचे संपादन व प्रकाशन करणे, (आ) 'जैन आर्ट अँड आर्किटेक्चर' या विषयावरील अधिकृत ग्रंथ तयार करून त्याचे प्रकाशन करणे आणि (इ) जैन पुरातत्त्वीय कलावस्तूंच्या छायाचित्रांचे संकलन व संग्रह करणे या योजनांचाही अंतर्भाव होता.

या विविध योजनांखाली भारतीय ज्ञानपीठाने आजवर सु. सहाशे ग्रंथ प्रसिद्ध केले असून ते संस्कृत, प्राकृत, पाली, अपभ्रंश, हिंदी, तमिळ, कन्नड, उर्दू, इग्रंजी इ. भाषांत आहेत.

भारतीय पुरातत्त्वीय संशोधन योजनेद्वारा जैन कलेचे सर्वेक्षण, संशोधन व संकलन सुरू आहे. आजवर एतद्‍विषयक सु. दहा हजार छायाचित्रे जमविण्यात आलेली असून ती शास्त्रशुद्ध रीतीने संगृहीत केली आहेत.

भगवान महावीरांच्या २५०० व्या निर्वाणमहोत्सवानिमित्त संस्कृत, अपभ्रंश व कन्नड भाषेतील उपलब्ध महावीर चरित्रकाव्यांच्या संपादनाची व प्रकाशनाची जबाबदारीही ज्ञानपीठाने अंगावर घेतली आहे. महावीरांचे तत्त्वज्ञान तसेच आपली सांस्कृतिक परंपरा यांवर पंचवीस ग्रंथ प्रकाशित करण्याची योजनाही आहे. जैन आर्टं अँड आर्किटेक्चर (३ खंड, १९७४-७५) हा अनेक उत्कृष्ट चित्रे-छायाचित्रे असलेला संदर्भग्रंथही प्रसिद्ध झाला आहे.

देशाच्या सर्व स्तरांतील व विविध प्रदेशांतील थोर विद्वानांचा व सर्जनशील साहित्यिकांचा हातभार या महान सांस्कृतिक-साहित्यिक कार्यास लाभत आहे. संस्थेचे सध्याचे प्रमुख कार्यालय नवी दिल्ली येथे असून वाराणसी येथे शाखा कार्यालय आहे.

भारतीय ज्ञानपीठाचे संस्थापक, अध्यक्ष व इतर पदाधिकारी पुढीलप्रमाणे आहेतः स्व. साहू शांतिप्रसाद जैन (संस्थापक); स्व. श्रीमती रमा जैन (अध्यक्षा-१९४४-७५); श्रीयांसप्रसाद जैन (विद्यमान अध्यक्ष); ए. के. जैन (व्यवस्थापक व विश्वस्त) व लक्ष्मीचंद्र जैन (संचालक).


ज्ञानपीठ पुरस्कार -------

भारतीय ज्ञानपीठ १९६६ पासून दरवर्षी आधुनिक भारतीय भाषांतील एका सर्वोत्कृष्ट, मौलिक व सर्जनशील ग्रंथास म्हणजे त्याच्या कर्त्यास एक लाख रूपयांचा पुरस्कार देते. १९८२ पासून पुरस्काराची रक्कम वाढवून दीड लाख रूपये करण्यात आली आहे. हा पुरस्कार भारतातील एक अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. हा पुरस्कार देण्यामागील ज्ञानपीठची कल्पना अशी, की आधुनिक भारतीय भाषा अनेक असल्या, तरी त्यातील सांस्कृतिक आशय हा सारखाच आहे आणि त्यांचा आत्माही एकच-भारतीय-आहे.

१९६६ मध्ये पहिला पुरस्कार (१९६५ चा) दिला गेला. आजवर विविध भारतीय भाषांतील २० प्रतिभासंपन्न लेखकांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले आहे. १९८१ चा १७ वा पुरस्कार प्रख्यात पंजाबी कवयित्री अमृता प्रीतम यांना, तर १९८२ चा १९८२ चा १८ वा पुरस्कार हिंदी कवयित्री महादेवी वर्मा यांना देण्यात आला. आजवर १८ भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेल्या साहित्यिकांची यादी मागील पानावर दिली आहे.

पुरस्कारासाठी निवड झालेली साहित्यकृती ही अनेक परीक्षकांच्या नजरेखालून जाते व तिच्या योग्यायोग्यतेबाबत चिकित्सा होऊनच तिची पुरस्कारासाठी निवड केली जाते.

प्रत्येक भाषेतील काही तज्ञ लेखक समीक्षकांची सल्लागार व परीक्षक म्हणून नियुक्ती केली जाते. पुरस्कार प्राप्त सिहित्यिकाचा ज्ञानपीठातर्फे मोठ्या समारंभपूर्वक आदसरत्कार करून एखाद्या ख्यातकीर्त नेत्याच्या वा नामांकित विद्वान व्यक्तीच्या हस्ते त्यास पुरस्काराची रक्कम व पुरस्काराचे प्रतीक असलेली, चौदा पाकळ्यांच्या कमळावर (चौदा भाषांचे प्रतीक) उभ्या असलेल्या वाग्‍देवीची ब्राँझ मूर्ती दिली जाते. वाग्‍देवीची मूळ मूर्ती धार (म. प्रदेश) येथील सरस्वती मंदिरातील असून ती राजा भोज याने १०३५ मध्ये प्रतिष्ठापित केली. सध्या ती लंडनच्या ब्रिटिश संग्रहालयात आहे. पुरस्कारप्राप्त कृतीची व तिच्या लेखकाची वैशिष्टये सांगणाऱ्या प्रशस्तिपत्रासह (सायटेशनसह) त्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या समारंभानिमित्त कवितावाचन, कविसंमेलन, नृत्य, संगीत यांसारखा सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केला जातो.

भारतीय ज्ञानपीठाचे ज्ञानोदय हे प्रसिद्ध हिंदी मासिकपत्र असून त्यातून नवोदित होतकरू भारतीय लेखकांचे लेखन प्रसिद्ध केले जाते.

ज्ञानपीठ पत्रिका हे संस्थेचे दुसरे मासिक असून त्यातून विविध भारतीय भाषांतील विद्वान लेखकांचे दर्जेदार लेखन प्रसिद्ध होते.

भारतरत्न पुरस्कार महत्वाचे मुद्दे

भारतरत्न पुरस्कार -----------

महत्वाचे मुद्दे

भारतरत्न पुरस्कार

२०१९ चे भारतरत्न पुरस्कार मिळवणारे भारतातील रत्ने

भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती 2021
भारतरत्न पुरस्कार या विषयी सविस्तर माहिती ती या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

भारतरत्न पुरस्कार भारत देशातील एक अत्यंत महत्त्वाचा पुरस्कार आहे.

इतकेच नव्हे तर भारतरत्न पुरस्कार देशातील नागरी पुरस्कार मधील सर्वोच्च पुरस्कार आहे. भारतरत्न पुरस्कार व्यतिरिक्त भारतामध्ये पद्मविभूषण पद्मभूषण पद्मश्री असे विविध नागरी पुरस्कार आहेत.

भारतरत्न पुरस्काराची सुरुवात पुरस्काराचे स्वरूप आणि आत्तापर्यंत किती लोकांना हा पुरस्कार देण्यात आला याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

भारतरत्न पुरस्काराची सुरुवात २१ जानेवारी १९५४ पासून झाली.

भारतरत्न पुरस्काराचे स्वरूप सूर्याची प्रतिकृती आणि देवनागरी लिपी मध्ये भारतरत्न लिहिलेले ब्राँझ धातू पासून बनवलेल्या पिंपळाच्या पानाचा आकार असलेले स्मृतिचिन्ह राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केलेली सनद आणि गळ्यात घालण्याचे पदक अशा स्वरुपात दिले जाते. या पुरस्कारांमध्ये रोख रकमेचा समावेश नसतो.

एका वर्षांमध्ये जास्तीत जास्त तीन लोकांना हा पुरस्कार देण्यात येतो. अपवाद फक्त १९९९ या वर्षीचा आहे. १९९९ मध्ये चार लोकांना हा पुरस्कार देण्यात आलेला होता. पुरस्काराविषयी अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे जनता सरकार जेव्हा देशांमध्ये अस्तित्वात आले तेव्हा १९७७ मध्ये या पुरस्कारा वरती बंदी घालण्यात आलेली होती. मात्र १९८० मधले इंदिरा गांधी सरकारने हा पुरस्कार देण्याची पुन्हा सुरुवात केलेली आहे.

आपल्या भारत देशाचा अत्यंत मानाचा पुरस्कार असल्याने या पुरस्काराची प्रतिष्ठा देखील तितकीच उच्च दर्जाची आहे.

भारत रत्न पुरस्कार आज पर्यंत ४८ व्यक्तींना प्रदान करण्यात आलेला आहे.

भारतरत्न पुरस्कार सुरूवातीला म्हणजे १९५४ मध्ये पुढील व्यक्तींना बहाल करण्यात आला.

१) सी राजगोपालचारी
२) डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन
३) सी व्ही रमण

आज पर्यंत भारत रत्न पुरस्कार मरणोत्तर सुद्धा बहाल करण्यात आलेला आहे. मरणोत्तर पुरस्कार मिळालेली पहिली व्यक्ती लाल बहादूर शास्त्री हे होते.

आज पर्यंत दोन परदेशी व्यक्तींना सुद्धा भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे.

खान अब्दुल गफार खान यांना १९८७ मध्ये तर नेल्सन मंडेला यांना १९९० मध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे.

भारतरत्न पुरस्कार विजेते राष्ट्रपती ------------

१) डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन  –  १९५४
२) डॉक्टर राजेंद्र प्रसाद  – १९६२
३) झाकीर हुसेन  – १९६३
४) वराहगिरी वेंकट गिरी  – १९७५
५) डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम  – १९९७
६) प्रणव मुखर्जी  – २०१९
राष्ट्रपती पुरस्कार हा आतापर्यंत पाच महिलांना मिळाला आहे

१) इंदिरा गांधी   -१९७१
२) मदर तेरेसा   -१९८०
३) अरुणा आसफ अली  – १९९७
४) एम एस   सुब्बुलक्ष्मी  – १९९८
५) लता मंगेशकर  – २००१
राष्ट्रपती पुरस्कार आतापर्यंत सात पंतप्रधानांना मिळाला आहे

१) पंडित जवाहरलाल नेहरू – १९५५
२) लालबहादूर शास्त्री – १९६६
३) इंदिरा गांधी – १९७१
४) मोरारजी देसाई – १९९१
५) गुलजारी लाल नंदा – १९९७
६) राजीव गांधी – १९९१
७) अटल बिहारी वाजपेयी – २०१५

आजपर्यंत सर्वाधिक भारतरत्न रत्न पुरस्कार प्राप्त नागरिक महाराष्ट्र राज्याचे आहेत.

महाराष्ट्रातील एकूण नऊ व्यक्तींना आजपर्यंत भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे.

महाराष्ट्र पाठोपाठ उत्तर प्रदेश राज्याचा नंबर लागतो. उत्तर प्रदेश राज्य एकूण आठ व्यक्तींना हा पुरस्कार मिळालेला आहे.

२०१९ चे भारतरत्न पुरस्कार मिळवणारे भारतातील रत्ने
१) प्रणव मुखर्जी
२) भूपेन हजारिका
३) नानाजी देशमुख

2019 चा भारतरत्न पुरस्कार नानाजी देशमुख भूपेन हजारिका यांना मरणोत्तर मिळालेला आहे.

______________________________

भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती 2021
१) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन 
२) चक्रवर्ती राजगोपालचारी
३) डॉ. चंद्रशेखर वेंकट रमण
४) डॉ. भगवान दास
५) सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या
६) पंडित जवाहरलाल
७) नेहरू गोविंद वल्लभ पंत
८)  महर्षी धोंडो केशव कर्वे
९) बिधान चंद्र रॉय
१०) पुरुषोत्तम दास टंडन
११) डॉ. राजेंद्र प्रसाद
१२) डॉ. जाकिर हुसैन
१३) डॉ. पांडुरंग वामन काणे
१४) लाल बहादूर शास्त्री
१५) इंदिरा गांधी
१६) वराहगिरी वेंकट गिरी
१७) के कामराज
१८) मदर तेरेसा
१९) आचार्य विनोबा भावे
२०) खान अब्दुल गफार खान
२१) मुर्दुर गोपाला रामचंदम 
२२) भीमराव रामजी आंबेडकर
२३) नेल्सन मंडेला
२४) राजीव गांधी
२५) सरदार वल्लभभाई पटेल
२६)मोरारजीभाई देसाई
२७) मौलाना अबुल कलाम आझाद
२८) जहांगीर रतनजी दादाभाई टाटा
२९) सत्यजित रे 
३०)एपीजे अब्दुल कलाम
३१) गुलजारी लाल नंदा
३२) अरुणा असिफ अली
३३)एम एस सुब्बलक्ष्मी
३४)सि. सुब्रमण्यम
३५)जयप्रकाश नारायण 
३६) पंडित रविशंकर
३७) अमर्त्य सेन
३८) गोपीनाथ बोरदोलोई
३९) लता मंगेशकर
४०) उस्ताद बिस्मिल्ला खा
४१)पंडित भीमसेन जोशी
४२)सचिन तेंडुलकर
४३) सी एन आर राव
४४)अटल बिहारी वाजपेयी
४५)पंडित मदनमोहन मालवीय
४६) प्रणव मुखर्जी
४७) नानाजी देशमुख
४८)भूपेन हजारिका.

विविध पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय

❇️ विविध पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय

◆ नोबेल : रविंद्रनाथ टागोर

◆ ज्ञानपीठ : जी शंकर कुरुप

◆ मॅगसेसे : विनोबा भावे

◆ वर्ल्ड फूड प्राईझ : स्वामीनाथन

◆ दादासाहेब फाळके : देविका राणी

◆ परमवीर चक्र : सोमनाथ शर्मा

◆ गोल्डन ग्लोब : एक आर रहमान

◆ मॅन बुकर : अरुंधती रॉय

◆ एबेल पुरस्कार : श्रीनिवास वर्धन

◆ ऑस्कर पुरस्कार : भानु अथिया

◆ महाराष्ट्र भुषण : पु. ल. देशपांडे खेलरत्न

━━━━━━━━━━━━━━━

यशाचा राजमार्ग चालू घडामोडी

.    चालू घडामोडी

१) पहिला “लता मंगेशकर पुरस्कार" कोणाला घोषित झाला आहे?

- नरेंद्र मोदी

२) "नॉट जस्ट ए नाईट वाचमन माय इनिंग्स विथ बीसीसीआय" पुस्तक कोणाचे आहे?

- विनोद राय

३) अलीकडेच कोणत्या दक्षिण आशियाई देशाने स्वतःला “डीफालटर" घोषित केले आहे?

- श्रीलंका

४) नुकतेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री यां “१०६४ भष्टाचार विरोधी app" सुरु केले आहे ?

- उतराखंड
५) अलीकडेच कोणत्या राज्याच्या "कांगडी चाय" ला GI tag भेटला आहे ?

- हिमाचल प्रदेश

६) भारत आणि कोणत्या देशात “२ + २ डायलोग" आयोजित केला आहे?

- अमेरिका

७) सध्या चर्चेत असलेले "उमिया माता मंदिर" कोणत्या राज्यात आहे?

- गुजरात

८) दरवर्षी "मानवी अंतराळ उड्डाणाचा आंतरराष्ट्रीय दिवस " केव्हा साजरा करण्यात येतो?

- १२ एप्रिल

यशाचा राजमार्ग चालू घडामोडी

Q. 1) कोणता देश "संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटन" मधून बाहेर पडला आहे?
- रशिया

Q.2) "BADMINTON एशिया चाम्पिं अनशिप २०२२" कोठे आयोजित होणार आहे? - मनिला, फिलिपाईन्स

Q. 3) "वर्ल्ड कॉंग्रेस ऑफ ACCOUNTANTS" चे आयोजन कोठे होणार आहे?
- मुंबई

Q. 4) "क्वार जलविद्युत योजना" कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे?
- जम्मूकाश्मीर

Q. 5) चर्चेत असलेले "मालचा महाल" कोठे आहे?
- दिल्ली

Q.6) NASSCOM च्या CHAIRMAN पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
- कृष्णन रामानुजन

Q.7 ) चर्चेत असलेले पर्सीवरेस रोवर" कोणत्या अंतरीक्ष एजेन्सी शी संबंधित आहे?

- नासा

Q.8) "टाईम्स हायर एजुकेशनइम्पेक्त (THE) रेन्किंग २०२२" नुसार पहिले स्थान कोणाला प्राप्त झाले आहे?

- वेस्टर्न सिडनी युनिवर्सिटी

Q.9) "बीटकॉईनला" आपले आधिकारिक चलन करणारा दुसरा देश कोण बनला आहे?
- मध्य आफ्रिकी गणराज्य

________________________

१) "ईमान्यूअल मक्रोन" यांची कोणत्या देशाचे दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदी नियुक्ती झाली आहे?
✅️ - फ्रांस

२) "वर्ल्ड मिलिटरी एक्सपेंडीचर रिपोर्ट २०२१ नुसार भारत सैन्य खर्चामध्ये कितव्या क्रमांकावर आहे?
✅️- ३

३) २४ वे "उन्हाळी बधीर ऑलम्पिक" कोणत्या देशात आयोजित होणार आहे?
✅️ - ब्राझील

४) चर्चेत असलेले "उर्जा प्रवाह" जहाज भारताच्या कोणत्या दलाचे आहे?
✅️INDIAN COAST GUARD

५) संरक्षण मंत्रालयाने कोठे "डेफ कनेक्ट २.०" चे अयोजन केले आहे?
✅️- दिल्ली

६) कोणत्या राज्य सरकारने "स्पेसटेक फ्रेमवर्क कार्यक्रम सुरु केला आहे?
✅️ तेलंगना

७) कोणत्या देशाने "ट्रायलटरल कोर्पोरेशन फंड" सुरु केले आहे?
✅️- भारत

८) सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने किती युटूब चनेल वर "सुरक्षेच्या कारणाने" बंदीघातली आहे?
✅️ १६

९) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोठे देशातील पहिले "सामुदायिकरेडीओ स्टेशन" "दुध वाणी" चेउद्घाटन केले आहे?
✅️- गुजरात

१०) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कितव्या "रायसीनाडायलोग" चे उद्घाटन केले आहे?
✅️- ७ व्या

शिवांगी सिंग राफेल उडवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला वैमानिक

#OneLiner

⚫️ शिवांगी सिंग राफेल उडवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला वैमानिक
#1st

🔰 फ्लाइट लेफ्टनंट शिवांगी सिंग या राफेल लढाऊ विमान उडवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला वैमानिक ठरल्या आहेत.

🔰 प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात त्या भारतीय वायुसेनेच्या चित्ररथामध्ये सहभागी झाल्या होत्या.


🔰 भारतीय वायुसेनेच्या चित्ररथामध्ये सहभागी होणाऱ्या त्या द्वितीय महिला वैमानिक आहेत.

🔰 भावना कांत 2021 सालच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात भारतीय वायुसेनेच्या चित्ररथामध्ये सहभागी होणाऱ्या पहिल्या महिला वैमानिक ठरल्या होत्या.

🔰 शिवांगी सिंग या मूळच्या बिहारच्या असून 2017 मध्ये भारतीय हवाई दलात सामील झाल्या आहेत.

त्या सध्या अंबाला येथील गोल्डन ॲरोज स्क्वाड्रनचा भाग आहेत.