स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
०८ मे २०२४
अंतनिर्मित (intrusive/plutonic) अग्निजन्य खडकांचे प्रकार
१) डाईक (dyke)
-भूगर्भातील तप्त लाव्हारस भूकवचामध्ये असलेल्या उभ्या भेगांमध्ये साचतो व तो थंड होऊन लांबवत खडकांची निर्मिती होते त्यास डाईक असे म्हणतात
-उदाहरणार्थ इंग्लंडच्या उत्तर भागात क्लिवलँड डाईक ज्याची उंची सुमारे दीडशे मीटर आहे
२) सिल (sill )व शीट
-जलजन्य किंवा रूपांतरित खडकांच्या आडव्या भेगेत लावारस येऊन साचतो व कालांतराने थंड होऊन खडकाची निर्मिती होते ते त्यास सील असे म्हणतात
-याच पातळ किंवा कमी जाडीच्या खडकास शीट असे म्हणतात
३) लॅकोलिथ(lacolith)
-भूगर्भातील तप्त लावारस भूपृष्ठाकडे येण्याचा प्रयत्न करतो तेव्हा काही ठिकाणी खडक घुमटासारखे वर उचलले जातात आणि निर्माण होणाऱ्या पोकळीमध्ये हे लाव्हारसाचे निक्षेपण होते हे आणि त्यापासून घुमटाकार खडक तयार होतात त्यास लकोलिथ असे म्हणतात
-याची निर्मिती ती जलजन्य खडकांमध्ये होते
-संयुक्त संस्थानातील उटाह राज्यातील लासाल पर्वत आणि हेनरी पर्वत ही प्रमुख उदाहरणे आहेत
४) लोपोलीथ
-जेव्हा लाव्हारस खोलगट किंवा उथळ भागात साचतो आणि कालांतराने थंड होऊन बशीच्या(saucer shaped) आकारासारखा आकार निर्माण होतो त्यास लोपोलिथ असे म्हणतात
५) फेकोलिथ(phacolith)
-भूगर्भातील खडकांना जेव्हा घडीचा आकार प्राप्त होतो तेव्हा अशा खडकांमध्ये अपनती आणि अभिनती असतात . तेथे लाव्हारसाचे निक्षेपण होऊन वलयाकार भूआकार निर्माण होतो त्यास फेकोलीथ असे म्हणतात
६) बेथोलिथ (batholith)
-पृथ्वीच्या भूगर्भामध्ये तप्त लावारस वर येण्याचा प्रयत्न करतो , तेव्हा भूकवचामधील विस्तीर्ण व खोलगट पोकळीमध्ये लाव्हारसाचे निक्षेपण होते, येथे तयार होणाऱ्या विस्तीर्ण खडकाला batholith असे म्हणतात
1857 पूर्वीचे उठाव
1. रामोशांचा उठाव
०१. सासवडच्या सत्तू नाईकच्या नेतृत्वाखाली सर्वप्रथम रामोशी समाज एकत्रित आला. सत्तू नाईक, साताऱ्याचा चित्तूरसिंग नाईक व पुरंदरचा उमाजी नाईक हे रामोशांचे प्रमुख नेते होते. पुण्याच्या आग्नेय भागात रामोशांची जास्त दहशत होती.
०२. सत्तू नाईकच्या नेतृत्वाखाली उमाजी नाईक व त्याचा भाऊ अमृता नाईक यांनी पुण्याजवळ भांबूर्ड्याचा लष्करी खजिना १९२४-२५ साली लुटला. पुण्यातून रामोशांच्या हकालपट्टीसाठी ब्रिटिशांनी जवाहरसिंग रामोशी यास सासवडचा अंमलदार बनविले. पण उमाजी व सत्तू नाईकाने जवाहरसिंग व त्याच्या मुलाच्या मुसक्या आवळल्याने त्याने इंग्रजांची नोकरी सोडून दिली.
०३. सत्तू नाईकनंतर रामोशांचे नेतृत्व उमाजी नाईककडे आले. भूजाजी, येसाजी, कृष्णाजी व अमृता हे उमाजीचे विश्वासू साथीदार होते. उमाजी स्वतःला राजे म्हणवून घेत असे. पुण्यातील पुरंदर तालुक्यातील भिवरी या गावी १७९१ साली उमाजीचा जन्म झाला होता.
०४. ब्रिटीश काळात रामोशांची संख्या १८००० होती. दरम्यानच्या काळात उमाजीने एका यात्रेत तलवारीने कोतवालाचे तुकडे करून पोलिसांत दहशत पसरविली. उमाजीला पकडण्यासाठी ब्रिटिशांनी १८२६ साली पहिला जाहीरनामा काढला. यानुसार उमाजी व त्याचा साथीदार पांडुजी यांना पकडून देणाऱ्यास १०० रु. इनाम जाहीर केले. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.
०५. सरकारने पुन्हा जाहीरनामा काढून इनामाची रक्कम १२०० रु केली. आणि जाहीरनाम्यात असे म्हटले कि, सरकारला मदत नाही केलीत तर बंडवाल्यात सामील झालात असे समजण्यात येईल. यावेळी उमाजीस पकडून देण्याचा विडा उचलणाऱ्या शिवनाक महारास रामोशांनी ठार केले.
०६. त्यावेळी उमाजीचा धाक पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, जेजुरी, सासवड व मराठवाड्याच्या काही भागात होता. यावेळी पुण्याचा कलेक्टर एच.डी. रॉबर्टसन याने वेळोवेळी जाहीरनामा काढून उमाजीला पकडण्याचे ठरविले. कोणीच गद्दारी न केल्यामुळे त्यांच्या हाती काहीच आले नाही.
०७. रॉबर्टसनने दरम्यान कोकणावर वचक बसविण्यासाठी बंडखोरांची माहिती देणाऱ्यासाठी खास बक्षीस जाहीर केले. या काळात उमाजीने ठाणे व रत्नागिरी जिल्ह्यातील लोकांनी ब्रिटीशांकडे महसूल न भरता उमाजींकडे द्यावा असे जाहीर केले. याच्या परिणामस्वरूप भोर संस्थानातील १३ गावांनी उमाजीकडे महसूल भरला.
०८. शेवटी ब्रिटिशांनी उमाजीची बायको, दोन मुले व एक मुलगी यांना अटक केली. त्यामुळे कुटुंबाखातर उमाजी ब्रिटिशांना शरण आला. ब्रिटिशांनी त्याचे सर्व गुन्हे माफ करून त्याला सरकारी नोकरी दिली. पुणे व सातारा जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम उमाजीकडे देण्यात आले. पण पुढे नंतर १३ गावांच्या महसुलावरून उमाजी व ब्रिटीश यांच्यात वाद सुरु झाला.
०९. १८३१ साली ब्रिटिशांनी जाहीरनामा प्रसिद्ध करून उमाजीला पकडण्याची जबाबदारी कॅप्टन अलेक्झांडर व कॅप्टन मैकिन्तोश यांच्याकडे सोपविली.उमाजी, येसाजी, मुंजाजी व कृष्णाजी यांना पकडून देणाऱ्यास ५००० रुपये व २ बिघा जमीन बक्षीस देण्याचे जाहीर केले. त्यापैकी एकट्या उमाजीस पकडून देणाऱ्यास २५०० रुपये व १ बिघा जमीन जाहीर करण्यात आली.
१०. बक्षिसाच्या आमिषाला बळी पडून एकेकाळचे त्याचे जवळचे साथीदार काळू रामोशी व नाना रामोशी यांनी गद्दारी केली. उमाजीचा जुना शत्रू बापूसिंग यानेही त्यांना मदत केली. १५ डिसेंबर १८३१ रोजी कॅप्टन मैकिन्तोशने पुण्याच्या मुळशी तालुक्यातील अवळस येथे उमाजीला अटक केली. ३ फेब्रुवारी १८३२ रोजी उमाजीला फाशी देण्यात आली.
११. उमाजी नाईकनंतर रामोशांनी दौलतराव नाईक याच्या नेतृत्वाखाली लढा सुरु ठेवला. सह्याद्रीच्या खोऱ्यात येसूबाईच्या डोंगरात दौलतराव नाईक व मेजर डैनियल यांच्यात चकमक झाली त्यात नाईक व त्याचे सहकारी मारले गेले. मारताना नाईकांनी फडकेंना विनंती केली कि, रामवंशी (रामोशी) पुढे स्वार्थासाठी दरोडे घालणार नाहीत याची दक्षता घ्या.
१२. त्यानंतर नाशिक व अहमदनगर भागात राघू भांगरे याने ब्रिटिशाविरुद्ध लढा दिला. २० सप्टेंबर १८४४ रोजी राघू भांगरेनी एका पोलिस अधिकाऱ्यासह ७ पोलिसांना ठार केले. ब्रिटिशांना सहाय्य करणाऱ्या पाटलांची नाके त्याने कापली. त्याच्या बंदोबस्तासाठी ब्रिटिशांनी ५००० रुपयाचे बक्षीस जाहीर केले. त्याला पकडण्याची जबादारी पाटील व कुलकर्ण्यावर सोपविली.
2. कोळ्यांचा उठाव
०१. १८२८, १८३९, १८४४ ते १८४८ या दरम्यान महाराष्ट्रात कोळ्यांनी तीन टप्प्यात उठाव केला. रामजी भांगडिया, रघु भांगडिया, बापू भांगडिया, चिमणाजी जाधव व नाना दरबारे यांनी या उठावाचे नेतृत्व केले.
०२. १८२४ साली मुंबई भागात कोळ्यांनी नेटिव्ह इन्फ्रंटीकडून उठाव केला. ब्रिटिशांनी तो उठाव मोडून काढला. म्हणून १८२८ साली मुंबई पोलिसातील कोळी अधिकारी रामजी भांगडिया यांनी नोकरीचा राजीनामा देऊन त्या भागात कोळ्यांचे नेतृव केले. त्यांनी मुंबई भागात दोन वर्षे ब्रिटीशांशी लढा दिला. हा उठाव दडपून टाकण्यासाठी कॅप्टन अलेक्झांडर व कॅप्टन मैकिन्तोश आले व त्यांनी हा उठाव मोडून काढला.
०३. १८३९ साली कोळ्यांनी पुण्यात अचानक उठावास सुरुवात केली. त्यावेळी आता संपूर्ण राज्य कोळ्यांच्या ताब्यात आहे अशी घोषणा दिली. कोळ्यांनी दुसऱ्या बाजीरावास पेशवेपद देऊन मराठी राज्याची पुनर्स्थापना केली.
०४. यावेळी घोडनदी जवळील सरकारी खजिन्याला १५० कोळ्यांनी वेढा घातला. त्यावेळी पुण्याचा आसिस्टंट कलेक्टर रोज याने कोळ्यांच्या बंदोबस्तासाठी पुण्याहून सैन्य मागविले. यावेळी ५४ कोळ्यांवर खटले भरून २८ जणांना कमीअधिक प्रमाणात शिक्षा दिली व दोघांना फाशी देण्यात आली.
०५. १८४४ साली कोळ्यांनी शस्त्रास्त्रे व माणसे जमवून रघु भांगडिया व बापू भांगडिया यांच्या नेतृत्वाखाली पुणे, नाशिक, सातारा. नगर व पुरंदर याभागात परत उठाव केला.
०६. नाणे घाट व माळशेज घाट ताब्यात घेऊन कोळ्यांनी कोकणचा मार्ग अडविला. इंग्रज अधिकारी कॅप्टन जेलने या उठावाचा बंदोबस्त केला. १८४५ मध्ये ब्रिटिशांनी बापू भांगडियाला पकडले. १८५० पर्यंत ब्रिटिशांनी महाराष्ट्रातील कोळ्यांचा कायमचा बंदोबस्त केला.
3. भिल्लांचे उठाव
०१. १८१८ मध्ये ब्रिटिशांनी खानदेश ताब्यात घेतला. भिल्लांची वस्ती विशेषतः याच भागात असल्याने भिल्लांच्या मनात इंग्रजाबद्द्ल द्वेष निर्माण झाला. त्यामुळे त्यांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केला. त्रिंबकजी डेंगळे, भिल्ल नाईक, दसरत व धानजी, हरिया (हिरा), निहाल, सेवाराम सोनार (घिसाडी), भागोजी नाईक, खर्जासिंग, भीमा नाईक, उचेतसिंग पवार यांनी या उठावाचे नेतृत्व केले.
०२. त्रिंबकजी ढेंगळे हा दुसऱ्या बाजीरावचा मित्र व मराठा सरदार होता. दुसऱ्या बाजीरावच्या पराभवानंतर डेंगळेला ठाण्याच्या तुरुंगात ठेवण्यात आले. तेथून तो पळाला व त्याने भिल्लांना इंग्रजांविरुद्ध बंड करण्यास चिथविले. त्याने उठावाची सूत्रे त्याचे पुतणे गोदाजी व महिपा डेंगळे यांच्यावर सोपविली. तत्कालीन कलेक्टर कॅप्टन ब्रिग्जने उठावाचा बंदोबस्त करण्यासाठी भिल्लांचे मुडदे पाडले व डोंगरातील वाटघाटांवर सैन्य ठेऊन त्यांची रसद बंद केली.
०३. पण याउलट मुंबईचा गवर्नर माउंट एल्फिन्सटन याने मात्र भिल्लांना पेन्शन व काम देऊन त्यांचा बंदोबस्त केला.त्यांची वेगळी तुकडी उभारून आडमाळावर त्यांना तैनात केले. नादीरसिंह या भिल्ल डाकुस त्याच्या सहकाऱ्यांच्या मदतीनेच पकडण्यात आले.
०४. नोकऱ्या देऊनही भिल्ल थंड झाले नाहीत. त्यांनी उठाव सुरूच ठेवला. इंग्रजांनी भिल्लांच्या बंदोबस्तासाठी त्यांना माफी देण्याची घोषणा केली. यावेळी भिल्लाचे नेतृत्व सातमाळ्याचा भिल्ल नाईक करत होता. कॅप्टन ब्रिग्ज ने भिल्ल नाईकास पकडून त्याला फाशी दिली यासोबत शेख सादुल्ला यास कठोर शिक्षा केली.
०५. डसरत व धानजी हे लासूरच्या भिल्लांचे प्रमुख होते. त्यांनी १८२० मध्ये विशेषतः सातपुडा प्रदेशात गावे व घरे बेचिराख करण्याचे सत्र चालविले. त्यांच्या टोळीत शेख दुल्ला हा पेंढारी सामील झाला. मेजर मोरीन याने १०० मैलांवरील महत्वाच्या जागा जिंकल्याने दक्षिण भिल्लांच्या प्रमुखाना शरणागती पत्करावी लागली.
०६. १८२२ मध्ये सातमाळ्याचा हरिया व सातपुड्याचा निहाल भिल्ल यांनी भिल्लांच्या उठावाचे नेतृत्व केले. यांच्या काळात अंदाधुंदी, बलात्कार व शोषणास मर्यादा राहिल्या नाहीत. यावेळी कॅप्टन रॉबिन्सन याने भिल्लांना यशस्वीरित्या दडपले.
०७. १८२५ मध्ये सेवाराम सोनारच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केला. यावेळी राजकीय नेत्यांनीसुद्धा याला पाठींबा दिला. सेवारामने साताराच्या राजाच्या नावाने बनावट पत्रे तयार केली व ती राजाच्या आदेशानुसार बागलान तालुक्यातील भिल्लांना वाटली. ही पत्रे भिल्लांनी उठाव करण्यासंदर्भातील होती.
०८. त्यानुसार भिल्लांनी लुटालूट केली. त्यांनी उतारपूरवर हल्ला केला व तेथील लुट मुरली महाल या किल्ल्यात ठेवली. लेफ्टनंट औट्रम याने यातील काही लुट परत मिळविली व सेवाराम व त्याच्या सहकाऱ्यांना पकडले. सेवारामबाबत औट्रम ने मवाळ भूमिका घेतली व भिल्लांच्या जमिनी परत दिल्या.
०९. १८२८ पर्यंत भिल्लांचे उठाव कमी झाले पण संपले नव्हते. पानिपतच्या लढाईत मरण पावलेल्या पवारांचा पणतू उचेतसिंग पवार याने धारच्या पवारांकडून गादी मिळविण्यासाठी भिल्लांना सोबत घेऊन दोन वेळा हल्ला केला होता. दोन्ही वेळेस तो पराभूत झाला.
१०. मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यात भिल्ल लोकांनी कोनारराव याच्या नेतृत्वाखाली इंग्रजांविरुद्ध बंड केले. पण सुसूत्रता नसल्याने इंग्रजांना बंड दडपून टाकणे सोपे ठरले.
११. काजरसिंग नाईक याने १८७५ च्या वेळी खानदेशात ब्रिटीशांविरुद्ध भिल्लाच्या उठावात नेतृत्व केले. तो पूर्वी ब्रिटीशांच्या पोलिस दलात होता. त्याने ब्रिटीशांचा ७ लाखाचा खजिना लुटला. १८५७ च्या अंबापाणी लढाईत भिल्लची ब्रिटीशांशी लढाई झाली. यात स्रियांचाही सहभाग होता.
4. गौंड जमातीतील उठाव
०१. १८१७-१८ च्या काळात नागपूरचे राजे अप्पासाहेब भोसले यांनी गौंड या आदिवासी जमातीच्या प्रमुखांच्या मदतीने इंग्रजांविरुद्ध उठाव केला. बेतूर येथे इंग्रजी फौजेचा त्यांनी पराभव केला. भोसलेंनी रणजीतसिंहासह अनेक हिंदी संस्थानिकांचे मन वळवून इंग्रंजांच्या विरुद्ध उठाव करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही. शेवटी त्यांना इंग्रजांकडून पराभव पत्करावा लागला. १८४० मध्ये भोसलेंचा जोधपुर येथे मृत्यू झाला.
5. हटकरांचा उठाव
०१. मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात हंसाजी नाईक हटकर यांचे छोटेसे राज्य होते. नोव्हाचा किल्ला हंसाजीचा प्रमुख आधार होता. त्यावेळी मराठवाडा हा इंग्रजांचा मांडलिक निजामच्या ताब्यात होता. हंसाजीने १८१९-२० मध्ये निजाम व इंग्रजांच्या विरुद्ध उठाव केला.
०२. मेजर पिटसन, कॅप्टन इव्हान्स डेविड, कॅप्टन मैडोज टेलर यांनी ४००० सैनिकांसह हंसाजीवर हल्ला केला. इंग्रजांनी नोव्हा किल्ल्यावर तोफा डागून तो किल्ला ताब्यात घेतला. तेव्हा हंसाजीने उमरखेड येथून इंग्रजांशी लढा दिला. इंग्रजांनी हंसाजी हटकर याचा पराभव केला व त्याचे राज्य ताब्यात घेतले.
6. धर्माजी प्रतापरावाचा उठाव
०१. बीड येथे धर्माजी प्रतापराव याने १८१८ मध्ये निजामाला विरोध केला. हा उठाव मोडण्यासाठी निजाम सरकारने ११ जुलै १८१८ रोजी नवाब मुर्तुजा यारजंग याला लेफ्टनंट जेम्स सदरलैंड याच्या नेतृत्वाखाली रवाना केले. ३० जुलै १८१८ रोजी सदरलैंडने धर्माजी लपून बसलेल्या दिवे गावातील किल्ल्याला वेढा घातला. त्यामुळे धर्माजी व त्याचा भाऊ कंपनीच्या हाती आले.
7. कोल्हापूरच्या गडकरींचा उठाव
०१. १ ऑक्टोबर १८१२च्या तहाने कोल्हापूर कंपनीचे मांडलिक झाले होते. १८२१ साली गादीवर बसलेले शहाजी बाबासाहेब इंग्रजद्वेष्टे होते. त्यांना राणी जिजाबाईपासून चौथा शिवाजी व राणी दिवणाबाईपासून चिमासाहेब अशी दोन अपत्ये होती.
०२. १८३८ मध्ये राजे शहाजीचा मृत्यू झाला. त्यांची दोन्ही मुले अल्पवयीन असल्याने राण्यांनी राज्यकारभार पाहिला. पण त्यांचे आपापसांत पटत नसल्याने इंग्रजांनी मध्ये हस्तक्षेप केला. इंग्रज सरकारने राज्यकारभार सुधारण्यासाठी दाजीकृष्ण पंडित यास दिवाण नेमले. हे धाकट्या राणीस व त्यांच्या समर्थकांस आवडले नाही.
०३. दाजी पंडितने शेतसारा वसूल करण्यासाठी मामलेदाराची नेमणूक केली. मामलेदार हे गडकरीपेक्षा कनिष्ट असल्याने गडकरींनी त्याकडे शेतसारा भरण्यास नकार दिला. सामानगडावर वसुलीसाठी आलेल्या मामलेदारांच्या माणसांना गाडकऱ्यांनी मारले. त्यामुळे दाजी पंडितने बेळगावहून सैन्य मागविले.
०४. कॅप्टन औट्रमच्या नेतृत्वाखालील १२०० सैनिकांनी सामानगडावर हल्ला केला व गडकऱ्यांचा पराभव केला. ऑक्टोबर १८४४ मध्ये बंडवाल्यांनी प्रतीसरकारची स्थापना केली व दाजी पंडितास पकडून कोल्हापूरचा ताबा घेतला. त्यासोबतच सामानगडही ताब्यात घेतला. पण गडकऱ्यांना पुढे कोल्हापूरहून मदत न मिळाल्यामुळे गडकरी शरण आले
पोलीस भरती
1】' राजुला प्रेमाचे पत्र आले ' या वाक्यातील अलंकार ओळखा ?
1)चेताणगुणोक्ती
2)ससंदेह
3)श्लेष
4)अपन्हुती
उत्तर- श्लेष
2】' त्याने अभ्यास केला ' प्रयोग ओळखा ?
1)भावे प्रयोग
2)कर्तरी प्रयोग
3)कर्मणी प्रयोग
4)संकीर्ण प्रयोग
उत्तर- कर्मणी प्रयोग
3】' श्रीरामनवमी ' हा शब्द किती अक्षरी आहे ?
1)सहा 2)सात
3)नऊ 4)आठ
उत्तर- सहा
4】विसर्ग हा एक ..... वर्ण आहे.
1)तालव्य 2)ओष्ठय
3)कंठय 4)दंततालव्य
उत्तर- कंठय
5】' मला परीक्षेत पहिला नंबर मिळाला पाहिजे ' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता ?
1)आज्ञार्थी 2)स्वार्थी
3)विध्यर्थी 4)संकेतार्थी
उत्तर- विध्यर्थी
6】खालील वाक्यातील अलंकार ओळखा
शरीराच्या ठेवणीप्रमाणे नीलूच्या सवयी व स्वभावही वेगळा होता
1)रूपक 2)उपमा
3)उत्प्रेक्षा 4)स्वभावोक्ती
उत्तर- उपमा
7】यक्षप्रश्न असणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ असणारा पर्याय निवडा ?
1) महत्वाची गोष्ट असणे
2) योग्य प्रश्न असणे
3) अयोग्य प्रश्न असणे
4)महत्वाची गोष्ट नसणे
उत्तर- योग्य प्रश्न असणे
8】मी खूप लिहू लागलो-कविता, कथा, चित्रपटकथादेखील !
वरील वाक्याचा प्रकार सांगा ?
1)मिश्र वाक्य
2)संयुक्त वाक्य
3)केवल वाक्य
4)संयुक्त-मिश्र वाक्य
उत्तर- केवल वाक्य
9】अबीरमंजिरी या सामासिक शब्दाचा प्रकार सांगा ?
1)अव्ययीभाव समास
2)तत्पुरुष समास
3)द्वंद्व समास
4)बहूव्रीही समास
उत्तर- द्वंद्व समास
10】गर्द या शब्दाच्या विरुद्ध अर्थचा शब्द निवडा ?
1)पातळ 2)विरळ
3)दाट 4)कमी
उत्तर- विरळ
11】कपडा शिवताना कडेने सोडलेल्या जागेस काय म्हणतात?
1)माया 2)तट
3)सूत 4)तीर
उत्तर- माया
12】कोल्हा : लबाड : : सिंह : ?
1)चपळ 2) हिंस्र
3) राजा 4) आळशी
उत्तर- हिंस्र
13】' रुधिर ' या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द निवडा?
1)पाणी 2)रक्त
3)म्हातारा 4)दारू
उत्तर- रक्त
14】खलीलपैकी वेगळा पर्याय ओळखा?
1)नोटा 2)लाटा 3)गोटा 4)वाटा
उत्तर- गोटा
15】अनुक्रमे पुलिंगी-स्त्रीलिंगी-नपुसकलिंगी असलेला पर्याय ओळखा?
1)मन-भाव-भावना
2)वाट-रास्ता-वळण
3)देश-मातृभूमी-राष्ट्र
4)पाणी-लाट-समुद्र
उत्तर- देश-मातृभूमी-राष्ट्र
16】समोर असलेल्या नमुन्याप्रमाणे जसेच्या तसे लिहिणे म्हणजेच......होय?
1)श्रुतलेखन 2)गतिलेखन
3)शुद्धलेखन 4)अनुलेखन
उत्तर- अनुलेखन
17】खालीलपैकी भाषेची ग्रहनात्मक कौशल्ये कोणती आहेत?
1)वाचन-लेखन
2)भाषण-लेखन
3)वाचन-श्रवण
4)भाषण-श्रवण
उत्तर- वाचन-श्रवण
18】वेगळा पर्याय निवडा ?
1)पानिपत 2)झाडाझडती
3)मृत्युंजय 4)महानायक
उत्तर- मृत्युंजय
19】वेगळा पर्याय निवडा ?
1)खग 2)अचल
3)शैल 4)नग
उत्तर- खग
20】वेगळा पर्याय निवडा ?
1)मृग 2)सारंग
3)कुरंग 4)कुंजर
उत्तर- कुंजर
21】खालील पर्यायात संयुक्त क्रियापद असलेला पर्याय निवडा.
1)येऊन कर 2)पाळायला जा
3)मारून ये 4)खाऊन जा
उत्तर- पाळायला जा
22】'तू फूल तोडलेस' या वाक्याचा प्रयोग सांगा?
1)कर्तृ-कर्म 2)कर्तृ-भाव
3)कर्म-भाव 4)कर्म-कर्तृ
उत्तर- कर्तृ-कर्म
23】वेगळा पर्याय निवडा.
1)भेरी 2)पडघम
3)नगारा 4)तकलुबी
उत्तर- तकलुबी
24】'अंगांत मांग शिरणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा?
1) त्वेष चढणे
2) अंगात वारे येणे
3) चांगले कृत्य करणे
4) वाईट गोष्ट बोलणे
उत्तर- त्वेष चढणे
25】'पहिली वस्तू मागणारा' या शब्द समुहासाठी योग्य शब्द सांगा?
1) भिकारी 2) मागरा
3) हावरट 4) मळगी
उत्तर- मागरा
26】मोठा भाऊ या टोपणनावाने कोणास ओळखले जाते?
1) वि. वा. शिरवाडकर
2) प्र. के. अत्रे
3) कृ. के. दामले
4) चि. त्र्यं. खानोलकर
उत्तर- वि. वा. शिरवाडकर
महाराष्ट्राविषयी माहिती
▪️ महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (1646 मी.) ता. अकोले, जि - अहमदनगर.
▪️महाराष्ट्राला 720 कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.
▪️महाराष्ट्राची राजधानी - मुंबई
▪️उपराजधानी - नागपूर.
▪️महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - 36
▪️महाराष्ट्राने भारताचा 9.7 टक्के भाग व्यापलेला आहे.
▪️महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.
▪️महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.
▪️ महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे.
▪️ विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.
▪️विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.
▪️महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.
▪️महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.
▪️महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.
▪️महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.
▪️महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे
▪️महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.
▪️महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.
▪️महाराष्ट्रातील 100 टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.
▪️महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.
▪️महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.
▪️भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.
▪️भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.
▪️महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.
▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.
▪️भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.
▪️ महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.
▪️पढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.
▪️गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.
▪️परवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.
▪️गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.
▪️जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.
▪️औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.
▪️पणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.
▪️महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.
▪️कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.
▪️कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.
▪️विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.
▪️विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.
▪️महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.
▪️विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.
▪️सत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि - बुलढाणा येथे आहे.
▪️ सत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.
▪️राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि - अमरावती येथे आहे.
▪️ सत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.
▪️बरह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.
▪️ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.
▪️ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.
▪️ महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि - नाशिक.
▪️पणे ही पेशव्यांची राजधानी आहे.
▪️कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.
▪️आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.
▪️ मबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात
▪️यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.
▪️ महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.
▪️नशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.
▪️महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.
▪️शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.
▪️महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.
▪️शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.
▪️ जञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.
▪️तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.
▪️भारतातील पहिला पेट्रोरसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे.
▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.
▪️रायगड जिल्ह्यात - कातकरी, ठाणे जिल्ह्यात - वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.
भारतातील प्रमुख नद्या, उपनदया लांबी
1. नदी = उगम = लांबी = उपनदया = कोठे मिळते
2. गंगा = गंगोत्री = 2510 = यमुना, गोमती, शोण = बंगालच्या उपसागरास
3. यमुना = यमुनोत्री = 1435 = चंबळ, सिंध, केण, बेटवा = गंगा नदिस अलाहाबाद जवळ
4. गोमती = पिलिभीत जवळ = 800 = साई = गंगा नदिस
5. घाघ्रा = गंगोत्रीच्या पूर्वेस = 912 = शारदा, राप्ती = गंगा नदिस
6. गंडक = मध्य हिमालय (नेपाळ) = 675 = त्रिशूला = गंगा नदिस पटण्याजवळ
7. दामोदर = तोरी (छोटा नागपूर पठार) = 541 = गोमिया, कोनार, बाराकर = हुगळी नदिस
8. ब्रम्हपुत्रा = मानस सरोवराजवळ (तिबेट) = 2900 = मानस, चंपावती, दिबांग = गंगा नदिस बांग्लादेशामध्ये
9. सिंधु = मानस सरोवराजवळ (तिबेट) = 2900 = झेलम, चिनाब, रावी, सतलज, बियास = अरबीसमुद्रास
10. झेलम = वैरीनाग = 725 = पुंछ, किशनगंगा = सिंधु नदिस
11. रावी = कुलू टेकडयामध्ये (हिमाचल प्रदेश) = 725 = दीग = सिंधु नदिस
12. सतलज = राकस सरोवर = 1360 = बियास = सिंधु नदिस
13. नर्मदा = अमरकंटक (एम.पी) = 1310 = तवा = अरबी समुद्रास
14. तापी = मुलताई टेकडयामध्ये (म.प्रदेश) = 702 = पूर्णा, गिरणा, पांझरा = अरबी समुद्रास
15. साबरमती = अरवली पर्वत = 415 = हायमती, माझम, मेखो = अरबी समुद्रास
16. चंबळ = मध्य प्रदेशामध्ये = 1040 = क्षिप्रा, पार्वती = यमुना नदिस
17. महानदी = सिहाव (छत्तीसगड) = 858 = सेवनाथ, ओंग, तेल = बंगालच्या उपसागरास
18. गोदावरी = त्र्यंबकेश्वर = 1498 = सिंदफणा, दूधना, पैनगंगा, प्राणहीता, वर्धा, मांजरा, वैनगंगा, इंद्रावती = प्रदेशात राजमहेद्रीजवळ
19. कृष्णा = महाबळेश्वर = 1280 = कोयना, वारणा, भीमा, वेन्ना, पंचगंगा, तुंगभद्रा = बंगालच्या उपसागरास आंध्र प्रदेशात
20. भीमा = भीमाशंकर = 867 = इंद्रायणी, मुळा-मुठा, घोड, निरा, सिना, मान = कृष्णा नदिस.
21. कावेरी = ब्रम्हगिरी (कर्नाटक) = 760 = भवानी, सुवर्णवती, कर्नावती = बंगालच्या उपसागरास (तामिळनाडु)
22. तुंगभ्रद्रा = गंगामूळ (कर्नाटक) = 640 = वेदावती, हरिद्रा, वरद = कृष्णा नदिस
भारतातील प्रमुख नद्या, उपनदया लांबी
नदी:-उगम:-लांबी:-उपनदया:-कोठे मिळते
गंगा:-गंगोत्री:-2510:-यमुना, गोमती, शोण:-बंगालच्या उपसागरास
यमुना:-यमुनोत्री:-1435:-चंबळ, सिंध, केण, बेटवा:-गंगा नदिस अलाहाबाद जवळ
गोमती:-पिलिभीत जवळ:-800:-साई:-गंगा नदिस
घाघ्रा:-गंगोत्रीच्या पूर्वेस:-912:-शारदा, राप्ती:-गंगा नदिस
गंडक:-मध्य हिमालय (नेपाळ):-675:-त्रिशूला:-गंगा नदिस पटण्याजवळ
दामोदर:-तोरी (छोटा नागपूर पठार):-541:-गोमिया, कोनार, बाराकर:-हुगळी नदिस
ब्रम्हपुत्रा:-मानस सरोवराजवळ (तिबेट):-2900:-मानस, चंपावती, दिबांग:-गंगा नदिस बांग्लादेशामध्ये
सिंधु:-मानस सरोवराजवळ (तिबेट):-2900:-झेलम, चिनाब, रावी, सतलज, बियास:-अरबीसमुद्रास
झेलम:-वैरीनाग:-725:-पुंछ, किशनगंगा:-सिंधु नदिस
रावी:-कुलू टेकडयामध्ये (हिमाचल प्रदेश):-725:-दीग:-सिंधु नदिस
सतलज:-राकस सरोवर:-1360:-बियास:-सिंधु नदिस
नर्मदा:-अमरकंटक (एम.पी):-1310:-तवा:-अरबी समुद्रास
तापी:-मुलताई टेकडयामध्ये (म.प्रदेश):-702:-पूर्णा, गिरणा, पांझरा:-अरबी समुद्रास
साबरमती:-अरवली पर्वत:-415:-हायमती, माझम, मेखो:-अरबी समुद्रास
चंबळ:-मध्य प्रदेशामध्ये:-1040:-क्षिप्रा, पार्वती:-यमुना नदिस
महानदी:-सिहाव (छत्तीसगड):-858:-सेवनाथ, ओंग, तेल:-बंगालच्या उपसागरास
गोदावरी:-त्र्यंबकेश्वर:-1498:-सिंदफणा, दूधना, पैनगंगा, प्राणहीता, वर्धा, मांजरा, वैनगंगा, इंद्रावती:-प्रदेशात राजमहेद्रीजवळ
कृष्णा:-महाबळेश्वर:-1280:-कोयना, वारणा, भीमा, वेन्ना, पंचगंगा, तुंगभद्रा:-बंगालच्या उपसागरास आंध्र प्रदेशात
भीमा:-भीमाशंकर:-867:-इंद्रायणी, मुळा-मुठा, घोड, निरा, सिना, मान:-कृष्णा नदिस
कावेरी:-ब्रम्हगिरी (कर्नाटक):-760:-भवानी, सुवर्णवती, कर्नावती:-बंगालच्या उपसागरास (तामिळनाडु)
तुंगभ्रद्रा:-गंगामूळ (कर्नाटक):-640:-वेदावती, हरिद्रा, वरद:-कृष्णा नदिस
महाराष्ट्रातील नद्यांचा संगम व तेथील महत्त्वाची स्थळे
🔸परवरा नदी व मुला नदी - नेवासे,
अहमदनगर
🔸मळा व मुठा नदी - पुणे
🔸गोदावरी व प्राणहिता - सिंगेचा,
गडचिरोली
🔸तापी व पूर्णानदी - श्रीक्षेत्र चांगदेव
तिर्थक्षेत्र, जळगाव
🔸कष्णा व वेष्णानदी - माहुली,
सातारा
🔸तापी व पांजरानदी - मूडवद, धुळे
🔸कष्णा व पंचगंगा - नरसोबाची वाडी,
सांगली
🔸कष्णा व कोयना - कराड, सातारा
🔸गोदावरी व प्रवरा - टोके,
अहमदनगर
🔸कष्णा व येरळ - ब्रम्हनाळ, सांगली.
नागरिकत्व: काय आहे नेहरू-लियाकत करार?
- मंजूर होण्यापूर्वी नेहरू-लियाकत कराराचा अनेक नेत्यांनी दाखलाGदिला. भारत आणि पाकिस्तान या दोन देशाच्या प्रमुखांमध्ये सहा दिवस चाललेल्या चर्चेनंतर ८ एप्रिल १९५० रोजी दिल्ली करार झाला, ज्याला दिल्ली पॅक्ट असंही बोललं जातं.
- नेहरू-लियाकत नावाने प्रसिद्ध असलेला हा करार उभय देशांमधील अल्पसंख्यांकांचे अधिकार सुनिश्चित करण्यासाठी टाकलेलं पाऊल होतं. याशिवाय दोन्ही देशातील युद्ध टाळणं हाही या कराराचा महत्त्वाचा उद्देश होता.
-१९४७ च्या फाळणीनंतरचा रक्तरंजित इतिहास सर्वांना परिचित आहे. दोन्हीही बाजूंना दंगली उसळल्या, ज्यात लाखो लोकांचा मृत्यू झाला, हजारो महिलांवर बलात्कार करण्यात आला, अल्पवयीन मुलींचं अपहरण झालं आणि त्यांचं जबरदस्तीने धर्मांतर करण्यात आलं. या संघर्षामुळे दोन्ही देशातील अल्पसंख्यांक असुरक्षित होते.
- डिसेंबर १९४९ मध्ये भारत-पाकिस्तानमधील व्यापारिक संबंधही बंद झाले. जीव वाचवण्यासाठी अल्पसंख्यांक घर-दार सर्व काही सोडून निघून गेले. लाखोंच्या संख्येने हिंदू-मुस्लिमांचं स्थलांतर झालं.
- स्वतःचा देश सोडून जे लोक कुठेही गेले नाही, त्यांना संशयास्पद नजरेने पाहिलं जाऊ लागलं.
इतिहास सराव प्रश्न
Ques. कादिरी संप्रदाय चा प्रवर्तक कोण होता?
A. अब्दुल कादिर गिलानी 👍
B. ख्वाजा अब्दुलला
C. दारा शिकोह
D. मोईनुद्दीन चिश्ती
Ques. 1857 ई चेे विद्रोहाची सुरूवात कुठुन झाली ?
A. बलिया
B. फैजाबाद
C. बराकपुर 👍
D. उत्तर प्रदेश
Ques. 1857 ई च्या विद्रोहात सर्वप्रथम बलिदान कोणी दिले ?
A. मंगल पांडे 👍
B. भगत सिंह
C. तात्या टोपे
D. चंद्रशेखर आजाद
Ques. 1857 ई च्या विद्रोहात कानपूर मध्ये नेतृत्व कोणी केले
A. मंगल पांडे
B. तात्यां टोपे 👍
C. रानी लक्ष्मी बाई
D. नाना साहेब
Ques. 1857 ई च्या विद्रोहात विशेष बाब काय होती ?
A. कंपनीचा विरोध
B. हिंदू-मुस्लिम ऐक्य 👍
C. भारताचे स्वातंत्र्यासाठी लढा
D. ब्रिटीश सरकारचा विरोध
भारतीय सुधार समितीची स्थापना कधी झाली ?
A. 1864
B. 1854
C. 1857 👍
D. 1942
भारतीय राष्ट्रीय आंदोलनाच्या 1885 ते 1905 च्या काळाला काय म्हणले जाते ?
A. उदारवादी काळ 👍
B. उग्रवादी काळ
C. पूंजीवादी काऴ
D. क्रांतीकारी काळ
हिंदुस्तान सरकारच्या 1935 च्या कायद्याची पार्शवभूमी कोणत्या घटनांनी तयार केली ?
अ. मुडिमन समिती आणि तिचा अहवाल
ब. सायमन कमिशन
क. नेहरू रिपोर्ट
ड. बॅरिस्टर जिन्नांचे 14 मुद्दे
वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?
A. अ, ब , आणि क
B. ब, क, आणि ड
C. अ, ब आणि ड
D. अ, ब, क आणि ड 👍
भारतीय कांग्रेसची स्थापना कोणा द्वारे झाली ?
A. व्योमेश चंद्र बैनर्जी
B. डॉ. ए. ओ. ह्यूम 👍
C. गोपाल कृष्ण गोखले
D. महात्मा गांधी
Ques. कादिरी संप्रदायाचा प्रवर्तक कोण होता?
A. अब्दुल कादिर गिलानी 👍
B. ख्वाजा अब्दुलला
C. दारा शिकोह
D. मोईनुद्दीन चिश्ती
Ques. 1857 ई चेे विद्रोहाची सुरूवात कुठुन झाली ?
A. बलिया
B. फैजाबाद
C. बराकपुर 👍
D. उत्तर प्रदेश
Ques. 1857 ई च्या विद्रोहात सर्वप्रथम बलिदान कोणी दिले ?
A. मंगल पांडे 👍
B. भगत सिंह
C. तात्या टोपे
D. चंद्रशेखर आजाद
Ques. 1857 ई च्या विद्रोहात कानपूर मध्ये नेतृत्व कोणी केले
A. मंगल पांडे
B. तात्यां टोपे 👍
C. रानी लक्ष्मी बाई
D. नाना साहेब
Ques. 1857 ई च्या विद्रोहात विशेष बाब काय होती ?
A. कंपनीचा विरोध
B. हिंदू-मुस्लिम ऐक्य 👍
C. भारताचे स्वातंत्र्यासाठी लढा
D. ब्रिटीश सरकारचा विरोध
Polity question answer
प्रश्न : संविधान के प्रारूप पर कितने दिन बहस हुई
Question : How many days debate on the draft constitution
उत्तर : 114 दिन✅
Answer : 114 days✅
प्रश्न : संविधान सभा के कुल कितने अधिवेशन हुए
Question : How many sessions were held in the Constituent Assembly
उत्तर : 12✅
Answer : 12✅
प्रश्न : संविधान सभा को भारतीय संसद में कब परिवर्तित किया गया था
Question : When the Constituent Assembly was changed into the Indian Parliament
उत्तर : 24 जनवरी 1950 को✅
Answer : On 24 January 1950✅
प्रश्न : भारत कब गणतंत्र बना
Question : When did India become a republic
उत्तर : 26 जनवरी 1950 को✅
Answer : On 26 January 1950✅
प्रश्न : 26 जनवरी 1950 को संविधान को लागू करने के लिए क्या कारण थे
Question : What was the reason for applying the Constitution on January 26, 1950
उत्तर : 26 जनवरी 1930 को भारतीय राष्ट्रीय कांग्रेस द्वारा प्रथम स्वाधीनता दिवस मनाया गया था✅
Answer : First Independence Day was celebrated by the Indian National Congress on January 26, 1930.✅
प्रश्न : संविधान सभा द्वारा भारतीय राष्ट्रीय ध्वज को मान्यता कब दी गई
Question : When the Indian National Flag was recognized by the Constituent Assembly
उत्तर : 22 जुलाई 1947 को✅
Answer : On July 22, 1947✅
प्रश्न : राष्ट्रपति को अधिकारिक रूप में कब मान्यता मिली
Question : How the President was officially recognized
उत्तर : 26 जनवरी 1950 को✅
Answer : On 26 January 1950✅
प्रश्न : भारत के राष्ट्रीय गान को अधिकारिक मान्यता किस दिन प्राप्त हुई
Question : On which day was the official recognition of the National Anthem of India
उत्तर : 24 जनवरी 1950 को✅
Answer : On 24 January 1950✅
सराव प्रश्न
[प्र.१] 'नेटिव्ह इंप्रूव्मेंट सोसायटी'ची स्थापना कोणी केली?
अ] बाबा पदमनजी
ब] ना. म. जोशी
क] बाळशास्त्री जांभेकर
ड] गोपाळ हरी देशमुख
उत्तर
क] बाळशास्त्री जांभेकर
-------------------
[प्र.२] 'लक्ष्मीज्ञान' हा ग्रंथ कोणी लिहिला?
अ] गोपाळ कृष्ण गोखले
ब] आचार्य अत्रे
क] गोपाळ हरी देशमुख
ड] साने गुरुजी
उत्तर
क] गोपाळ हरी देशमुख
-------------------
[प्र.३] १९२१ च्या राष्ट्रीय सभेच्या अहमदाबाद अधिवेशनाचे अध्यक्ष चित्तरंजन दास हे तुरुंगात असल्यामुळे त्यांच्या ऐवजी ______________ यांनी प्रभारी अध्यक्षपद भूषवीले.
अ] मौलाना महमद अली
ब] हाकीम अजमल खान
क] बॅ. हसन इमाम
ड] मदन मोहन मालवीय
उत्तर
ब] हाकीम अजमल खान
{हाकीम अजमल खान हे चित्तरंजन दास यांचे जवळचे मित्र होते. १९२२ च्या गया अधिवेशनाचे अध्यक्षपद चित्तरंजन दास यानी भूषवीले.}
-------------------
[प्र.४] 'देशप्रेमाने ओथम्बलेला हिमालायासारखा उत्तुंग महापुरुष' असे वासुदेव बळवंत फडके यांचे वर्णन कोणत्या वृत्तपत्राने केले?
अ] केसरी
ब] मराठा
क] अमृतबझार पत्रिका
ड] तरुण मराठा
उत्तर
क] अमृतबझार पत्रिका
{१८७९ साली फडकेंच्या आटकेनंतर हा लेख छापून आला होता.}
-------------------
[प्र.५] २३ मार्च १९१८ रोजी मुंबई येथे भरविण्यात आलेल्या 'अस्पृश्यता निवारक परिषदेचे' अध्यक्ष कोण होते?
अ] शाहू महाराज
ब] वि. रा. शिंदे
क] सयाजीराव गायकवाड
ड] बाबासाहेब आंबेडकर
उत्तर
क] सयाजीराव गायकवाड
{अस्पृश्यता निवारणाची पहिली परिषद.}
-------------------
[प्र.६] १९४१ साली ___________ यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे 'संयुक्त महाराष्ट्र सभा' स्थापन झाली.
अ] रामराव देशमुख
ब] टी. जे. केदार
क] शंकरराव देव
ड] स. का. पाटील
उत्तर
अ] रामराव देशमुख
रामराव देशमुख-१९४१-संयुक्त महाराष्ट्र सभा
टी. जे. केदार-१९४२-महाराष्ट्र एकीकरण परिषद
शंकरराव देव-१९४६-संयुक्त महाराष्ट्र समिती[बेळगाव]
-------------------
[प्र.७] १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्यात ____ प्रमुख विभाग व ______ जिल्हे होते.
अ] ४ प्रमुख विभाग व २४ जिल्हे
ब] ४ प्रमुख विभाग व २६ जिल्हे
क] ५ प्रमुख विभाग व २४ जिल्हे
ड] ५ प्रमुख विभाग व २६ जिल्हे
उत्तर
ब] ४ प्रमुख विभाग व २६ जिल्हे
{विभाग- मुंबई , पुणे , नागपूर, औरंगाबाद}
{जिल्हे २६ होते. नंतर ९ जिल्ह्यांचे विभाजन होऊन आता ३५ जिल्हे आहेत.}
-------------------
[प्र.८] ११ डिसेंबर १९४६ रोजी दिल्ली येथे झालेल्या घटना समितीच्या बैठकीत _ _ _ _ _ _ यांची संविधान समितीचे कायमस्वरूपी उपाध्यक्ष म्हणून निवड झाली.
अ] पंडित नेहरू
ब] वल्लभभाई पटेल
क] जे. बी. क्रपलनी
ड] एच. सी. मुखर्जी
उत्तर
ड] एच. सी. मुखर्जी
{त्याआधी फ्रँक अँथोनी हे हंगामी उपाध्यक्ष होते}
-------------------
[प्र.९] घटना समितीच्या झेंडा समितीचे अध्यक्ष कोण होते?
अ] पंडित नेहरू
ब] जे. बी. क्रपलनी
क] वल्लभभाई पटेल
ड] डॉ. राजेन्द्रप्रसाद
उत्तर
ब] जे. बी. क्रपलनी
-------------------
[प्र.१०] ९२वी घटना दुरुस्ती कोणत्या परिशिष्टाशी संबधित आहे?
अ] सातव्या
ब] आठव्या
क] नवव्या
ड] दहाव्या
उत्तर
ब] आठव्या
१) खालील पैकी कोणाचा अखिल भारतीय कांग्रेस पक्षाच्या स्थापनेत सहभाग होता ?
अ) श्री. डब्ल्यू . सी. बॅनर्जी
ब) श्री. दिनशॉ वाच्छा
क) श्री. विल्यम वेडेरबर्न
ड) वरील सर्व.✅
२) खालीलपैकी कोणती संघटना कांग्रेस प्रणित नाही?
अ) कांग्रेस सेवा दल
ब) युक्रांद✅
क) एन एस यू आय
ड) आय एन टी यू सी
३) कांग्रेस पक्षातील हाय कमांड म्हणजे खालीलपैकी कोण असते?
अ) पक्षाध्यक्ष
ब) पक्ष उपाध्यक्ष
क) कांग्रेस कार्यकारी समिती ✅
ड) यापैकी नाही
४) खालीलपैकी योग्य विधाने निवडा.
१) राष्ट्रीय कॉंग्रेस ही लोकशाही तत्वावर आधारित असलेली संघटना होती.
२) १८८५ साली राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना झाली.
३) राष्ट्रीय सभेवर गांधीजींच्या विचारांचा प्रभाव असला तरी दुसऱ्या महायुद्धात भारताने इंग्रजांना मदत करावी या गांधीजींच्या निर्णयाविरुद्ध राष्ट्रीय सभेने ठराव संमत केला होता.
अ) फक्त १ व ३
ब) फक्त १ व २
क) फक्त २ व ३
ड) वरील सर्व ✅
५) कॉंग्रेसमधील जहाल व मवाळ गटातील प्रमुख पूरक असलेले पर्याय निवडा ?
१) विचारसरणीत भिन्नता
२) आंदोलन मार्गातील भिन्नता
३) मागण्यात भिन्नता
४) स्वराज्य व स्वातंत्र्य मुद्यावर मतभेद
अ) १, ३ व ४
ब) २, ३ व ४
क) १, २ व ३✅
ड) १, २ व ४
६) खालीलपैकी कोणते उद्दिष्ट कॉंग्रेसच्या स्थापनेशी संबंधित नाही ?
अ) भारतीय लोकाचा असंतोष कमी करणे.
ब) इंग्रज प्रशासनाच्या चुका दुरुस्त करणे
क) विविध प्रश्नावर लोकमत तयार करणे
ड) जहाल व मवाळामध्ये समन्वय प्रस्थापित करणे✅
७) भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर राष्ट्रीय सभा बरखास्त करण्यात यावी असे खालीलपैकी कोणाचे मत होते ?
अ) सी. राजगोपालाचारी
ब) आचार्य कृपलानी
क) महात्मा गांधी ✅
ड) जयप्रकाश नारायण
८) खालीलपैकी कोणती योजना कांग्रेस कार्यकाळातील नाही ?
अ) मनरेगा
ब) किसान विकास पत्र
क) सुकन्या समृद्धी✅
ड) अन्न सुरक्षा
९) २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला पूर्ण भारतात किती जागा मिळाल्या ?
अ) ४४ ✅
ब) ४८
क) ५२
ड) ६१
१०) खालीलपैकी कोणत्या कॉंग्रेस नेत्याने भारत देशाचे गृहमंत्रीपद भूषवले नाही?
अ) पी. चिदंबरम
ब) पी.व्ही. नरसिंहाराव
क) इंदिरा गांधी
ड) पृथ्वीराज चव्हाण ✅
RRB NTPC Exams -2021 (अति संभाव्य प्रश्नोत्तरे )
#1. भारतात सापडलेले सर्वात मोठे जुने शहर कोणते आहे? - हडप्पा
#2."स्वराज हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे" असे कोणी म्हटले? - बाळ गंगाधर टिळक
#3. महात्मा गांधींचे राजकीय गुरू कोण होते? - गोपाळ कृष्ण गोखले
#4. दिल्लीवर राज्य करणारी पहिली मुस्लिम महिला शासक / सर्वप्रथम महिला शासक कोण होती? - रझिया सुल्तान
#5. सिंधू सभ्यतेचे पट्टानगर (बंदर) कोणते होते? - लोथल
#6. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे संस्थापक कोण होते? - ए.ओ. ह्यूम
#7. कोणते वेद गद्य आणि श्लोक या दोन्ही मध्ये रचले गेले आहेत? - यजुर्वेद
#8. भारतातील पहिले वृत्तपत्र कोणी सुरू केले? - सय्यद अहमद खान
#9. बौद्ध धर्म कोणाच्या शासनकाळात हीनयान आणि महायान या दोन भागात विभागला गेला होता? - कनिष्क
#10. लोदी घराण्याचा शेवटचा शासक कोण होता? - इब्राहिम लोदी
#11. प्रथम जैन संगीत कोठे आयोजित केले गेले होते? - पाटलिपुत्र (आताचे पटना)
#12. ऋग्वैदिक समाजातील सर्वात लहान घटक कोणते होते? - कुल किंवा कुटुंब
#13. कोणत्या शासकाकडे शक्तिशाली नौसेना होती? - चोल
#14. संकीर्तन प्रणालीचे जनक कोण होते? - चैतन्य
#15. कोणत्या मुगल शासकास 'आलमगीर' म्हटले जाते? - औरंगजेब
#16. 'शहीद आजम' ही पदवी कोणाला दिली गेली? - भगतसिंग
#17. सायमन कमिशनच्या निषेधाच्या वेळी लाठीचार्जात कोणत्या राजकारण्यांचा मृत्यू झाला? - लाला लाजपत राय
#18. वहाबी चळवळीचे प्रवर्तक कोण होते? - सय्यद अहमद
#19. बुद्धांनी महापरिनिर्वाण कोणत्या ठिकाणी केले? - कुशीनारा / कुशीनगरमध्ये
#20. कॉंग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? - व्योमेश चंद्र बॅनर्जी
राष्ट्रीय कॉंग्रेसच्या स्थापनेपूर्वीच्या संस्था .
🅾️जमीनदारांची संघटना
१८३७ मध्ये बंगालमधील काही जमीनदारांनी एकत्र येऊन 'लॅंड होल्डर्स असोसिएशन' या नावाची संस्था स्थापन केली. राजकीय हक्क मिळविणे व त्याद्वारे आपल्या अडचणी दुर करुन घेणे ही या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट होते. त्यासाठी या जमीनदारांनी सनदशीर मार्गाचा अवलंब केला. ज्या इंग्रजांना भारतीयांबदल सहानुभूती वाटत होती. त्यांचीही मदत या कामासाठी घेण्यात आली होती. तसेच इंग्लंडमधील ब्रिटिश इंडिया सोयायटीशीही सहकार्य करण्यात आले.
🅾️"इंडियन असोसिएशन ऑफ बंगाल' १८५१ मध्ये डॉ. राजेंद्रलाल मित्र, रामगोपाल घोष इत्यादिकांनी स्थापली. तिचे कार्य काही काळ चालून ती बंद पडली. तिचे पुनरुज्जीवन इंडियन असोसिएशन ऑफ बेंगॉल प्रेसिडेन्सी या नावाने १८७६ साली सुरेंद्रनाथ बॅनर्जींच्या नेतृत्वाखाली कलकत्ता येथे झाले.
🅾️बरिटिश इंडियन असोसिएशन
०१. या संस्थेची स्थापना १८५१ मध्ये झाली. यासाठी लॅंड ओनर्स असोसिएशन या नव्या संस्थेची स्थापना झाली. या संस्थेचे सुरुवातीचे सदस्य फक्त जमीनदार असले तरी नंतर यात व्यापारी उद्योगपती डॉक्टर, वकील, वृत्तपत्रकार यांचाही समावेश या संघटनेत झाला. या संघटनेचा दृष्टिकोन राष्ट्रीय स्वरुपाचा होता. बंगालमधील इतर संस्थांची तिचे चांगले संबंध होते. मद्रासमध्येही या संघटनेची शाखा काढण्यात आली होती.
🅾️ ईस्ट इंंडिया असोसिएशन
१८६५ साली लंडनमध्ये दादाभाई नौरोजी आणि उमेशचंद्र बॅनर्जी यांनी 'लंडन इंडियन सोसायटी'ची स्थापना केली. एक वर्षानंतर या सोसायटीचे रुपांतर 'ईस्ट इंडिया असोसिएशन' मध्ये झाले. ही संस्था लवकरच ब्रिटिशांमध्ये लोकप्रिय झाली. या संस्थेत सेवानिवृत्त इंग्रज अधिकारी होते. मुबई, मद्रास, कलकत्ता येथे या संघटनेच्या शाखा स्थापन झाल्या. त्या १८८४ पर्यत जोमाने कार्य करीत होत्या. पुढे ब्रिटिशांची सहानूभूती कमी झाली आणि या संस्थेचा प्रभाव हळूहळू कमी कमी होत गेली.
🅾️पणे सार्वजनिक सभा
०१. न्यायमूर्ती रानडे यांचे उजवे हात म्हणून ओळखले जाणारे गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांनी पुण्यात १८७० साली सार्वजनिक सभेची स्थापना केली. १८७१ मध्ये न्या. रानडे यांनी या संस्थेला राष्ट्रीय स्वरूप प्राप्त करून दिले. लॉर्ड लिटन या व्हाईसरॉयने १८७७ च्या जानेवारीत दिल्लीला एक मोठा दरबार भरवून इंग्लंडंच्या राणीला भारताची साम्राज्ञी अशी पदवी अर्पण केली.
०२. या प्रसंगी सार्वजनिक सभेने सम्राज्ञीला एक मानपत्र समर्पण केले. मानपत्रात हिंदी जनतेचे हक्क आणि हिंदी राष्ट्राच्या अंतकरणातील राजकीय आकांक्षा स्पष्टपणे नमुद केल्या होत्या. तसेच या निमित्ताने जमलेल्या सर्व प्रांतातील लोकप्रतिनिधीपूढे व राजेराजवाडयांपुढे अखिल भारतीय ऐक्याची, हिंदी पार्लमेंटची कल्पना आणि निरनिराळया प्रांतांतून आलेल्या राजकीय कार्यकर्त्याना राष्ट्रीय सभेची कल्पना सुचविली.
🅾️मद्रास महाजन सभा
मद्रासमध्ये १८८४ साली हिंदू या वृत्तपत्राचे संपादक जी सुब्रम्हण्य अय्यर यांनी माहजन सभा नावाची संस्था केली होती. स्थानिक संस्थांच्या जानेवारी १८८५ मध्ये झालेल्या अधिवेशात कायदेमंडळाचा विस्तार करण्याची त्यात भारतीयांना प्रतिनिधीत्व देण्याची न्यायपालिका व राजस्वकार्य स्वतंत्र असण्याची मागणी करण्यात आली होती.
🅾️इडियन असोसिएशन
०१. २६ जुलै १८७५ रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 'इंडियन असोसिएशन' नावाची संस्था स्थापन केली. मध्यम वर्गातील लोकांच्या विचारांचे प्रतिनिधीत्व करणे आणि सार्वजनिक कार्यात भाग घेणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश होता व त्यासाठी ही संस्था कार्य करीत होती. या संस्थेच्या वतीने डिसेंबर १८८३ मध्ये कलकत्यास इंडियन नॅशनल कॉन्फरन्स चे पहिले अधिवेशन बोलविण्यात आले.
०२. या अधिवेशात सनदी परीक्षा उच्च शिक्षण, कायदेमंडळातील प्रतिनिधित्च इ. प्रश्नांवर चर्चा झाली. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी विविध प्रांतांचे दौरे काढून जाहीर व्याख्यानांमधून सरकारी धोरणावर टीका केली. त्यामुळे ठिकठिकाणी नवीन संस्था निघू लागल्या.
🅾️ इडियन नॅशनल युनियन
१८८४ च्या शेवटी 'इंडियन नॅशनल युनियनची' स्थापना हयूम यांनी केली. भारताचे संघटन करणे. नैतिक सामाजिक व राजकीय दृष्टिने भारताचा विकास साधणे. सरकार व जनता यांच्यात प्रेमाचे संबंध प्रस्थापित करणे इ. या संघटनेची उदिष्टे होती. त्यातूनच राष्ट्रीय सभेचा उदय झाला.
🅾️ २६ ऑगस्ट १८५२ रोजी बॉम्बे असोसिएशनची जगन्नाथ शंकरशेठ, डॉ. भाऊ दाजी इत्यादिकांनी स्थापना केली. तिचे कार्य काही वर्षांनी बंद पडले. तिचे पुनरुज्जीवन बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनमध्ये ३१ जून १८८५ साली झाले. या स्थानिक प्रयत्नांना अखिल भारतव्यापी रूप १८८५ साली आले.
चालू घडामोडी :- 07 मे 2024
◆ दरवर्षी 7 मे रोजी जागतिक ॲथलेटिक्स दिन जगभरात साजरा केला जातो.
◆ भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स नासाच्या स्टारलाइनर मोहिमेअंतर्गत तिसऱ्यांदा अंतराळात जाणार आहेत.
◆ नेपाळच्या नवीन 100 रुपयांच्या नोटेचा नकाशा भारतातील तीन प्रदेश दर्शवितो.
◆ इम्फाळ, मणिपूर येथे ‘स्कूल ऑन व्हील्स योजना’ सुरू करण्यात आली आहे.
◆ भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने दुबई येथे आयोजित 'अरेबियन ट्रॅव्हल मार्ट 2024' मध्ये भाग घेतला आहे.
◆ ‘कर्मयोगी भारत’च्या संचालक मंडळाची 12 वी बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली आहे.
◆ सुनीता विल्यम्स ने 2006 आणि 2012 वर्षी अंतराळात प्रवेश केला होता.
◆ IIT इंदौर च्या सुवर्णा चॅटर्जी यांच्या नेतृत्वाखाली चमूने रेडिओ उत्सर्जनाचा शोध लावला आहे.
◆ माद्रिद खुली टेनिस स्पर्धेचे पुरूष एकेरीचे विजेतेपद पटकावणारा आंद्रेई रुबलेव्ह रशिया देशाचा टेनिस खेळाडू आहे.
◆ भारतीय खगोल शास्त्रज्ञांनी GMRT या दुर्बिणीच्या मदतीने रेडिओ उत्सर्जनाचा शोध लावला आहे.
◆ 2024 या वर्षाच्या जागतिक अस्थमा दिनाची(7मे) थीम "अस्थमा शिक्षा सशक्तिकरण" ही आहे.
◆ चीन ने इंडोनेशिया या देशाच्या संघाचा पराभव करून थॉमस कप बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.
◆ चीन ने अकराव्यांदा थॉमस कप पुरुष बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.
◆ उबेर कप 2024 महिला बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद चीन ने सोळाव्यांदा पटकावले आहे.
◆ 26 वी भारत अशियान वरिष्ठ अधिकारी यांची बैठक नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती.
◆ नॅशनल अँटी टॉपिंग एजन्सी NADA ने बजरंग पुनिया या कुस्तीपटू ला निलंबित केले आहे.
◆ जोस राउल मुलिनो यांची पनामा या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
०७ मे २०२४
राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ वर्णनात्मक पद्धतीने होणार की नाही, या बद्दल उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते.
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ वर्णनात्मक पद्धतीने होणार की नाही, या बद्दल उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. अखेरीस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्यसेवा मुख्य परीक्षेचा वर्णनात्मक (लेखी) पॅटर्न २०२५ पासूनच लागू करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.माहिती अधिकारातून हा संभ्रम दूर झाला असून, विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता वर्णनात्मक पॅटर्नची तयारी सुरु करावी. एमपीएससीकडून परीक्षांचे निकाल लावण्यास दिरंगाई होत आहे. तसेच परीक्षांचे वेळापत्रक पाळले जात नाही.
त्यामुळे राज्यसेवा मुख्य परीक्षेचा वर्णनात्मक (लेखी) पॅटर्न २०२५ लागू होण्याची शक्यता कमी आहे. हा पॅटर्न लागू करण्यासाठी वेळेची मर्यादा वाढवली जाऊ शकते. अशी चर्चा स्पर्धा परीक्षा क्षेत्रात रंगली आहे.
यामुळे राज्यसेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रामाचे वातावरण होते. त्यामुळे एका विद्यार्थ्यांने माहिती अधिकारातून ही माहिती एमपीएससीला विचारली होती. त्यावर एमपीएससीने ही माहिती दिली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या मनात असलेला संभ्रम दूर झाला आहे.
औरंगाबाद खंडपीठामध्ये शपथपत्र...
खंडपीठात आयोगाने दिलेल्या शपथपत्रामध्ये सुद्धा वर्णनात्मक परीक्षा २०२५ पासून लागू करण्यासंबंधी बाब अधोरेखित केली आहे. आयोगाने दिलेल्या शपथपत्रामध्ये कायदा व सुव्यवस्था व विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी लागणारा वेळ ही बाब लक्षात घेऊनच निर्णय २०२५ पासून लागू करण्यासंबंधी आयोगाने निर्णय घेतला ही बाब नमूद केलेली आहे. २०२४ मध्ये होणारी राज्यसेवा परीक्षा ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीने होणारी शेवटची परीक्षा असणार आहे.
चालू घडामोडी :- 06 मे 2024
◆ फ्रान्स मध्ये पार पडलेल्या इंटरपोल परीषद(महासभा) ला भारतातर्फे प्रवीण सुद उपस्थित होते.
◆ बांगलादेशा मध्ये 03 ते 20 ऑक्टोंबर 2024 या कालावधी दरम्यान ICC महिला टी20 क्रिकेट वर्ल्ड कप आयोजित करण्यात येणार आहे.
◆ भारत आणि इंडोनेशिया देशाच्या संयुक्त संरक्षण सहकार्य समितीच्या 7व्या बैठकीचे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले होते.
◆ 'ला लिगा फुटबॉल' स्पर्धेचे विजेतेपद 'रेयाल माद्रिद' संघाने पटकावले आहे.
◆ माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेचे महिला एकेरीचे विजेतेपद मिळवणारी इगा स्विओटेक 'पोलंड' या देशाची टेनिस पटू आहे.
◆ वस्तू व सेवा कराच्या अपिलीय न्याधिकरण च्या अध्यक्षपदी संजय कुमार मिश्रा यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.
◆ पेंशन विभागाने सरकारी निवृत्त कर्मचाऱ्या साठी 'भविष्य' पोर्टल लाँच केले आहे.
◆ भारतीय हवाई दलाने C295 वाहतूक विमान फ्रान्स या देशाकडून खरेदी केले आहे.
◆ AFC under 23 Asia cup पुरुष 2024 चे विजेतेपद जपान ने पटकावले आहे.
◆ AFC under 23 Asia cup पुरुष 2024 च्या अंतिम फेरीत जपानने उझबेकिस्तान चा पराभव केला आहे.
◆ AFC under 23 Asia Cup पुरुष 2024 चे आयोजन कतार येथे करण्यात आले होते.
◆ UNICEF ने करिना कपूर या भारतीय अभेनेत्रेची राष्ट्रीय राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे.
◆ उत्तराखंड टुरिझमने "नक्षत्र सभा" ही भारतातील पहिली खगोल- पर्यटन मोहीम सुरू केली.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
०६ मे २०२४
राष्ट्रीय सभेची (काँग्रेस ) महत्वाची अधिवेशन
🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖
क्र. स्थळ वर्ष अध्यक्ष व महत्व
••••••••••••••••••••••••••••••••••••••••
1. मुंबई 1885 व्योमेशचंद्र बॅनर्जी
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
2. कोलकाता 1886 दादाभाई नौरोजी
1ले पारशी अध्यक्ष
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
3. चेन्नई 1887 बद्रूद्दीन तैयबजी
1ले मुस्लिम अध्यक्ष
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
4. अलाहाबाद 1888 जॉर्ज यूल
1ले परदेशी अध्यक्ष
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
16वे. लाहोर 1900 नारायण गणेश
चंदावरकर
1ले मराठी अध्यक्ष
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
22वे. कोलकाता 1906 दादाभाई
नौरोजी
'स्वराज्य' हे ध्येय
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
23वे सुरत 1907 डॉ.रासबिहारी घोष
- जहाल मवाळ फूट
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
25वे. लाहोर 1909 पं.मदनमोहन
मालवीय
- रौप्य महोत्सवी
अधिवेशन
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
32वे. लखनौ 1916 बाबू अंबिकाचरण
मुझुमदार
- जहाल मवाळ युती
- काँग्रेस-मुस्लिम लीग
युती
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
33वे. कोलकाता 1917 श्रीमती ऍनि
बेझंट
-1ली स्त्री अध्यक्षा
-1ली परदेशी स्त्री
अध्यक्षा
- या अधिवेशनात वि .रा. शिंदे यांनी मांडलेला अस्पृश्यता विरोधी ठराव संमत करण्यात आला.
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
36वे. नागपूर 1920 चक्रवर्ती विजय
राघवाचार्य.
- असहकराचा ठराव
मंजूर
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
41वे. कानपूर 1925 सरोजिनी नायडू
- 1 ली भारतीय
महिला अध्यक्षा
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
44वे. लाहोर 1929 पं.जवाहरलाल नेहरू
- संपूर्ण स्वातंत्र्याचा
ठराव
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
45वे. कराची 1931 सरदार वल्लभभाई
पटेल
- मूलभूत हक्काचा
ठराव
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
50वे. फैजपूर 1936 पं. जवाहरलाल
नेहरू
- सुवर्ण महोत्सवी
अधिवेशन
- ग्रामीण भागातील
1 ले अधिवेशन
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
60वे. आवडी 1955 यु. एन. ढेबर
- समाजवादी
धोरणाचा ठराव
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
78वे. मुंबई 1985 राजीव गांधी
- काँग्रेस शताब्दी
अधिवेशन.
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
* इतर काही महत्वाची माहिती ::
- 1924 बेळगांव महात्मा गांधी
- लोकमान्य टिळक हे एकदाही काँग्रेस चे अध्यक्ष बनू शकले नाहीत.
- भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी
काँग्रेस अध्यक्ष ::
आचार्य जे. बी. कृपलानी (1946-1947)
- स्वातंत्र्यापूर्वी काँग्रेसचे सर्वात जास्त काळ अध्यक्षपद भूषविलेली व्यक्ती ::
मौलाना आझाद (1940-1946)
- स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचे सर्वात जास्त काळ अध्यक्षपद भुषविलेली व्यक्ती ::
सोनिया गांधी (1998- 2017).
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖
चालू घडामोडी :- 05 मे 2024
◆ करीना कपूरची UNICEF इंडियाच्या राष्ट्रीय राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
◆ एअर मार्शल नागेश कपूर यांनी एअर फोर्स ट्रेनिंग कमांडचा पदभार स्वीकारला आहे.
◆ हार्वर्ड प्रोग्राम सुरू करणारे चंदीगड विद्यापीठ हे भारतातील पहिले विद्यापीठ ठरले आहे.
◆ सुबोध कुमार (IAS) यांची आयुष मंत्रालयात संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
◆ सानिया कद्रे यांची J&K साठी ग्रॅपलिंग कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
◆ रोड नेटवर्कमध्ये(रस्ते आणि महामार्गाचे जाळे) प्रथम स्थानी अमेरिका हा देश आहे.
◆ रोड नेटवर्क अर्थात रस्ते आणि महामार्गाच्या जाळ्यामध्ये भारताने चीनला मागे टाकत जगात दुसरा क्रमांक पटकावला आहे.
◆ भारत देशाने स्वदेशी बनावटीचे पहिले मानव रहित बॉम्बर विमान बनवले आहे.
◆ भारताचे स्वदेशी बनावटीचे पहिले मानव रहित बॉम्बर विमान 'फ्लाईंग वेज डिफेन्स अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजी' या कंपनीने बनवले आहे.
◆ भारताने बनवलेल्या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या मानव रहित बॉम्बर विमानाला FWD-200B असेही म्हंटले जाते.
◆ जगातील व भारतातील पहिली CNG बाईक बजाज या कंपनीने तयार केली आहे.
◆ ICC ने जाहीर केलेल्या क्रमवारीत भारत देशाच्या क्रिकेट संघाने वनडे व टी-20 मध्ये अव्वल स्थान कायम राखले आहे.
◆ काँगो देशाने मंकी पॉक्स या विषाणू ला आरोग्य आणीबाणी म्हणून जाहीर केले आहे.
◆ जगातील सर्वाधिक उंच वेधशाळा जपान या देशात स्थापित करण्यात आली आहे.
◆ चीन ने आपल्या चांगई चांद्रयान मोहिमे सोबत पाकिस्तान या देशाचा आयक्यूब- क्यू उपग्रह प्रक्षेपित केला आहे.
◆ चीन पहिल्यांदा आपल्या चांद्रयान मोहिमेमध्ये पाकिस्तान या देशाच्या ऑर्बिटर चा समावेश केला आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━