10 December 2024

खटल्यांचे वर्गीकरण


💥 प्रस्तावनेसंदर्भातील खटले

1. बेरुबारी यूनियन वि. भारतीय संघ (1960)

2. गोलखनाथ वि. पंजाब राज्य (1967)

3. केशवानंद भारती वि. केरळ राज्य (1973)

4. इंदिरा नेहरू गांधी वि. राजनारायण (1975) 

5. मिनर्वा मिल वि. भारतीय संघ (1978)


💥घटनादुरुस्ती संदर्भातील खटले

▪️कलम 368

1. शंकरी प्रसाद वि. भारतीय संघ (1951)

2. सज्जन सिंग वि. राजस्थान (1954)

3. गोलकनाथ वि. पंजाब राज्य (1967) 

4. केशवानंद भारती वि. केरळ (1973)


💥मूलभूत हक्कांसंदर्भातील खटले

1. ए. के. गोपालन वि. मद्रास राज्य (कलम 13) (1950)

2. चंपकम दोराइराजन वि. मद्रास राज्य (कलम 15) (1951)

3. इंद्रा सहानी वि. भारतीय संघ (कलम 15) (1993)

4. मनेका गांधी वि. भारतीय संघ (कलम 21) (1978)

5. एस. आर. बोम्मई वि. भारतीय संघ (कलम 25 ते 28) (1994)


💥आणीबाणी संदर्भातील खटले

▪️कलम 352 ते 360

1. मिनव्हा मिल वि. भारतीय संघ (1980)

2. एस. आर. बोम्मई वि. भारतीय संघ (1994)


👉 यापूर्वी आपण basic structure संदर्भात सर्व खटले दिलेले आहेत ते सुद्धा परीक्षेपूर्वी वाचून घ्या.

03 October 2024

BIS Recruitment 2024


BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्या जागांसाठी भरती प्रक्रिया प्रसिद्ध करण्यात आली असून या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. भारतीय मानक ब्युरो मध्ये ऑफिसर पदाच्या भरतीसाठी उमेदवारांसाठी एक चांगली सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन केले असून उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 पर्यंत आहे.



भारतीय मानक ब्युरो अंतर्गत होणाऱ्या नोकरीसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारे सर्व माहिती पुढीलप्रमाणे दर्शवलेली आहे यामध्ये पदाचे नाव, पदांची संख्या, जाहिरात क्रमांक, वयाची मर्यादा, नोकरी ठिकाण ,महत्त्वाच्या तारखा ,ऑनलाइन अर्ज कसा करायचा, परीक्षा शुल्क, वेतन श्रेणी, निवड प्रक्रिया, या सर्व बाबींची माहिती पुढीलप्रमाणे दिलेली आहे इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी सर्व माहिती सविस्तरपणे काळजीपूर्वक वाचून अर्ज सादर करायचा.


BIS Recruitment 2024 Notification

👉पदाचे नाव (Name Of The Posts) : भारतीय मानक ब्युरो अंतर्गत होणाऱ्या नोकरीसाठी पुढील पदांची पदभरती होणार आहे. पदाचे नाव आणि पुढील प्रमाणे –


असिस्टंट डायरेक्टर ( ऍडमिनिस्ट्रेशन आणि फायनान्स) : 01

असिस्टंट डायरेक्टर ( मार्केटिंग आणि अफेअर्स) : 01

असिस्टंट डायरेक्टर ( हिंदी) : 01

पर्सनल असिस्टंट : 27

असिस्टंट सेक्शन ऑफिसर : 43

असिस्टंट (Computer Aided Design) : 01

स्टेनोग्राफर ; 19

सीनियर सिक्रेट रिअल असिस्टंट : 128

जूनियर सेक्रेटरी असिस्टंट : 78

टेक्निकल असिस्टंट (Laboratory) : 27

सीनियर टेक्निशियन ; 18

टेक्निशियन ( इलेक्ट्रिशियन/ वायरमन) : 01

✍️पदांची संख्या (Total Posts ) : या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 पदांची पदभरती होणार आहे.


📒शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) : भारतीय मानक ब्युरो अंतर्गत होणाऱ्या नोकरी भरतीसाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता हे पदानुसार विविध आहे. पुढील प्रमाणे –


पद क्रमांक 1 : CA/CWA/MBA/ (Finance) + 03 वर्षाचा अनुभव

पद क्रमांक 2 : एमबीए मार्केटिंग किंवा मास कम्युनिकेशन मधील पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा किंवा सामाजिक कार्यात पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा पाच वर्षाचा अनुभव

पद क्रमांक 3 : हिंदी/ इंग्रजी पदव्युत्तर पदवी आणि 05 वर्षाचा अनुभव

पद क्रमांक 4 : पदवीधर

कृपया अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक पहा.


✈️ नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत


✅वयाची अट (Age Limit) : भारतीय मानक ब्युरो अंतर्गत होणाऱ्या नोकरीसाठी उमेदवारांचे वयाची मर्यादा पुढीलप्रमाणे दिलेली आहे.


पद क्रमांक 1 ते 3 : 18 ते 35 वर्षे

पद क्रमांक : 4 ते 6 आणि 10 : 18 ते 30 वर्षे

पद क्रमांक 7 ते 9, 11 & 12 : 18 ते 27 वर्षापर्यंत

👉 अर्ज पद्धत : भारतीय मानक ब्युरो अंतर्गत होणाऱ्या नोकरीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे त्या वेबसाईटच्या माध्यमातून उमेदवारांनी अर्ज करावा इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.


BIS Recruitment 2024 Qualification

💵अर्ज शुल्क (Fees) : या भरतीसाठी पुढीलप्रमाणे अर्ज शुल्क आहे.


पद क्रमांक 1 ते 3 ; जनरल/OBC : 800/-

पद क्रमांक 4 ते 12 : जनरल/ ओबीसी : ₹500/-

(SC/ST/PWD/ महिला ; शुल्क नाही)


👉निवड प्रक्रिया (Selection Process) : – या नोकरीसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया ही परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे.


💵 वेतन / पगार (Pay Scale ) : या भरती प्रक्रियेमध्ये अंतिम निवड होणाऱ्या उमेदवारांना 19,900 ते 1,77,500 इतका पगार प्रति महिना दिला जाणार आहे. तसेच इतर आवश्यक असणारे भत्ते सुद्धा मिळणार आहेत,


✅ परीक्षा (Exam) : नंतर कळवण्यात येईल


📒जाहिरात PDF येथे क्लिक करा 

✅अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा

👉ऑनलाइन अर्ज करा येथे क्लिक करा 

BIS Recruitment 2024 Apply Online Last Date

👉ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last Date of Online Application) : भारतीय मानक ब्युरो मध्ये होणाऱ्या नोकरीसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे.


BIS Recruitment 2024 Apply Online

भारतीय मानक ब्युरो मध्ये होणाऱ्या नोकरी भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

ऑनलाइन अर्जामध्ये उमेदवारांनी सर्व माहिती सविस्तरपणे काळजीपूर्वक भरायचे आहे.

तसेच आवश्यक असणारे कागदपत्रे अपलोड करावयाचे आहेत.

भारतीय मानक ब्यूरो मध्ये

सरनाम्यासंबंधित खटले

☀️प्रस्ताविका घटनेचा भाग आहे की नाही याबाबत विवाद निर्माण झाला होता.


☀️याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे खटले :-


⭐️1) बेरूबारी युनियन खटला (1960):-

    💡(कलम 143 अंतर्गत सल्ला)

    💡प्रस्ताविका➡️ घटनेचा भाग 😀

                               त्यामुळे दुरुस्ती😀


⭐️केशवानंद भारती खटला (1973):-

        💡प्रस्ताविका ➡️घटनेचा भाग ✅

                               ➡️दुरुस्ती शक्य✅

(मूलभूत संरचना न बदलता कलम 368 अंतर्गत शक्य आहे.)


⭐️3)एलआयसी ऑफ इंडिया खटला (1995):- 

       💡प्रस्ताविका➡️अविभाज्य भाग✅

                          ➡️दुरुस्ती करता येते✅


⭐️सरनामाबाबत लक्षात असू द्या  :-


📌USA 1st to have Preamble संकल्पना USA घटनेवरून

💫Start USA WE,THE PEOPLE

💫Start IND WE, THE PEOPLE


⭐️संविधान समितीत :-


🔴ठराव - 13 Dec 1946 - पं. ज. नेहरू

🔴अनुमोदन- पुरुषोत्तमदास टंडन

🔴पारित- 22 Jan 1947

🔴दि.26 Nov 1949 ला स्विकृत

[National law day -1979-2015; Constitution Day -2015 पासून]


💡दुरुस्ती :-

💫42th CAA-18 Dec 1976

                🔴Secularism (धर्मनिरपेक्ष)

                🔴Socialist (समाजवाद)

                🔴Integrity (एकात्मता)

🔓CAA लागू - 3 Jan 1977


➡️सरनामाबद्दल Thinker आणि त्यांची मते :-


✅गांधीजी- "माझ्या स्वप्नातील भारत"

✅पालखीवला -"राज्य घटनेचा ओळखपत्र"

✅P. T. भार्गव-" राज्यघटनेचा आत्मा, गुरुकिल्ली, आभूषण, गद्यकाव्य, मौल्यवान, स्थान केंद्रभागी"

✅मा.CJI सिक्री-"राज्यघटनेचा अंत्यत महत्वपूर्ण भाग"

✅अल्लादी कृष्णस्वामी अयर-"दिर्घकालीन स्वप्न"

✅K.M.मुन्सी-"राजकीय कुंडली, HOROSCOPE"

✅हिदायतुल्लाह -"एक दृढ निश्चय, क्रांतिच बदलू शकेल"

✅J.B. कृपलानी-"अचंबीत तत्वे"

✅अर्नेस्ट बार्कर-"मुख्य तत्व,The Key-कुंजी नोट"


प्रस्ताविका/ सरनामा/ उद्देशपत्रिका


              (PREAMBLE)

- सरनामा म्हणजे, "राज्यघटनेची प्रारंभिक माहिती".

- संविधान ज्या तत्त्वज्ञानावर आधारलेले आहे ते तत्वज्ञान सरनाम्यात समाविष्ट आहे.

- जगात सर्वप्रथम "अमेरिका" राष्ट्राच्या घटनेत सरनामा लिहिला गेला.

- भारताने  आपल्या घटनेत सरनामा असावा ही बाब "अमेरिकेकडून" स्वीकारली.

- 1919 चा भारत सरकार कायदा (माँटफर्ड) याला सरनामा होता. मात्र 1935 च्या कायद्याला सरनामा नव्हता.

- पं जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946 ला उद्दिष्टांचा ठराव मांडला. हा ठराव घटनासमिती समोरचा दिशादर्शक होता.

- हा ठराव घटनासमितीने 22 जानेवारी 1947 ला बिनविरोधपणे संमत केला.

- हा उद्दिष्टांचा ठराव म्हणजे सरनामा नाही. मात्र सरनामा हा या उद्दिष्टांच्या ठरावावर आधारित आहे.

- 22 जानेवारी ला उद्दिष्टांचा ठराव जरी संमत झाला असेल. तरी मूळ सरनामा हा  घटना संमत झाल्यावर संमत  करण्यात आला.

- भारतीय सरनाम्याची सुरुवात "आम्ही भारताचे लोक" तर अमेरिकेच्या सरनाम्याची सुरुवात ही आम्ही अमेरिकेचे लोक अशी आहे.

:
1) उद्दिष्टांचा ठराव मांडला ?
    - पं. नेहरू

2) उद्दिष्टांचा ठराव मांडला तो दिनांक ?
    - 13 डिसेंबर 1946

3) उद्दिष्टांचा ठराव स्वीकारला?
    - 22 जानेवारी 1947

4) सरनामा असावा हा आदर्श कोणाचा किंवा सरनामा असलेली जगातील पहिले संविधान?
  - अमेरिका

Combine पूर्व परीक्षा Polity

Revision साठी Important Topics 


घटना निर्मिती : पार्श्वभूमी (कायदे), घटनासमिती, सरनामा, संघराज्य 

मूलभूत हक्क, कर्तव्य, मार्गदर्शक तत्वे

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ,

राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ

संसद, विधिमंडळ, न्यायालये,

विविध आयोग + घटनात्मक पदे जसे CAG, महान्यायवादी etc घटनादुरुस्ती, आणीबाणी

सूची - विषय,

घटनेतील महत्वाची कलमे, भाग, परिशिष्टे

संसदीय समित्या 


Polity चा अभ्यास करताना काही नियम & अपवादात्मक काही गोष्टी असतात त्यावर थोडं focus. For ex - काही गोष्टी घटनेत नमूद असतात & काही गोष्टी संकेतानुसार असतात, या प्रकारच्या बऱ्याच गोष्टी असतात, वाचत असताना लक्षपूर्वक वाचा


पंचायतराज

यावर Generally 1-2 प्रश्न विचारले जातात

मागच्या वर्षी ग्रामपंचायत + ग्रामसभेवर 2 प्रश्न होते + 1 प्रश्न अभियान वर विचारला होता.


पंचायत राज वाचताना तुलनात्मक chart / table format मध्ये notes किंवा पुस्तकात असेल तर या पद्धतीने वाचा. कारण 2 प्रश्नांसाठी 200 पानं वाचणं थोडं धोकादायक आहे.

त्यामुळे ग्रामपंचायत + पंचायत समिती + zp

महानगरपालिका + नगरपरिषद + पालिका

यांचं comparison chart format मध्ये असेल तर ते revise करा + PYQS

पंचायराज विषयी समित्या - imp शिफारशी,

73rd + 74th घ. दु.

11 वी, 12 वी अनुसूची - विषय 



2020 मध्ये polity चे questions as compared to previous papers थोडे अवघड होते. 

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 1. आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्क स्थगित होण्याची प्रक्रिया आपण कोणत्या देशाच्या घटनेवरून स्वीकारली आहे?

१. जापान ची घटना 

२. आयरिश घटना

३. ऑस्ट्रेलियाची घटना 

४. वायमार प्रजासत्ताक ची घटना✅


2. खालीलपैकी कोण मसुदा समितीचे सदस्य नाही?

१. के एम मुंशी 

२. एन माधवराव 

३. टी टी कृष्णमाचारी 

४. जे बी कृपलानी✅


3. खाली दिलेल्या पर्यायातील अचूक पर्याय निवडा.

१. संविधान सभेत एकूण 379 सदस्य होते

२. संविधान सभेच्या निर्मितीची रचना ऑगस्ट ऑफर मध्ये करण्यात आली 

३. संविधान सभेच्या निवडणुकांमध्ये दहा जागा अपक्षांना मिळाल्या 

४. 1949 मध्ये संविधान सभेने भारताच्या राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाला अनुमोदन दिले✅


4. खालील विधानांचा विचार करा..

अ) भारतीय संसद पूर्णपणे सार्वभौम नाही 

ब) सर्वोच्च न्यायालय पूर्णपणे सर्वोच्च नाही

१. फक्त अ बरोबर

२. फक्त ब बरोबर

३. दोन्ही चूक

४. दोन्ही बरोबर✅


5. खालीलपैकी योग्य विधान ओळखा.

अ) संविधान सभेच्या सदस्यांची निवडणूक प्रत्यक्षपणे प्रौढ मतदानाच्या आधारे घेण्यात आली.

ब) संस्थानिकांना मिळालेल्या 93 जागा भरू शकल्या नाहीत कारण संस्थानिकांनी संविधान सभेत भाग न घेण्याचा निर्णय घेतला.

१. फक्त अ बरोबर

२. फक्त ब बरोबर✅

३. दोन्ही चूक

४. दोन्ही बरोबर


6. समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द कितव्या घटना दुरुस्तीने प्रास्ताविकेत समाविष्ट करण्यात आले?

१. 41

२. 43

३. 44

४. यापैकी नाही✅


7. घटनेच्या संघ राज्य शासन व्यवस्थेवर विविध तज्ञांची मते खाली दिलेली आहेत त्यातील अयोग्य जोडी ओळखा.

१. अर्ध संघराजीय - के सी व्हेयर

२. सहकारी संघराज्य - ग्रेन विल ऑस्टिन 

३. वाटाघाटीचे संघराज्य - मॉरीस जोन्स 

४. केंद्रीकरणाची प्रवृत्ती असलेले संघराज्य - एच सी मुखर्जी✅


8. 42 वी घटनादुरुस्ती किती सली संमत करण्यात आली?

१. 1974

२. 1975

३. 1976 ✅

४. 1977 


9. घटनेच्या सरनाम्यातून खालीलपैकी काय दिसून येते?

1. साध्य करावयाचे आदर्श

2. शासन व्यवस्था 

3. सत्तेचा स्त्रोत

१. फक्त 1

२. फक्त 2

३. 1, 2

४. 1, 2, 3✅


10. राज्यघटनेच्या कोणत्या भागात घटनाकारांची भूमिका दिसून येते?

१. राज्यघटनेचा सरनामा✅

२. मार्गदर्शक तत्त्वे 

३. मूलभूत कर्तव्य

४. आणीबाणीच्या तरतुदी



१९२६) खालील विधाने विचारात घ्या.

   अ) भारतीय संविधानाने ब्रिटीश संसदीय प्रारुपाचे अनुकरण केले आहे.

   ब) भारतात संविधान सर्वश्रेष्ठ आहे, संसद नव्हे.

   क) भारतातील न्यायालयांना संसदेने पारित केलेल्या कायद्याची संविधानिकता तपासण्याची सत्ता प्राप्त नाही.

         वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

   1) फक्त अ  

  2) अ व ब    

3) अ व क    

4) अ, ब आणि क

उत्तर :- 2


१९२७) खालीलपैकी कोणती राज्यघटनेची मुलभूत वैशिष्टये समजता येतील ?

   अ) राज्यघटनेचे सर्वश्रेष्ठत्व 

   ब) न्यायालयीन पुनर्विलोकन

   क) कल्याणकारी राज्य 

    ड) घटनादुरुस्ती बाबतचे संसदेचे मर्यादित अधिकार

   1) अ, ब, क    

2) अ, ब     

 3) अ, ब, ड    

4) अ, ब, क, ड

उत्तर :- ४


१९२८) भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?

   1) पंडित जवाहरलाल नेहरू 

   2) सच्चिदानंद सिन्हा

   3) डॉ. राजेंद्र प्रसाद     

 4) डॉ. बी. आर. आंबेडकर

उत्तर :- 4



१९२९) संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते ?

   1) डॉ. बी. आर. आंबेडकर   

 2) डॉ. राजेंद्र प्रसाद

   3) जवाहरलाल नेहरू    

  4) बी. एन. राव

उत्तर :- 4


१९३०) संघीय शासन व्यवस्थेमध्ये  ?

   1) सत्तेचे केंद्रीकरण केलेले असते    

  2) सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असते

   3) यामध्ये केवळ एकच सरकार असते  

  4) यामध्ये केवळ प्रांतीय सरकारे असतात

उत्तर :- 2


२०२१) खालीलपैकी किंमतवाढीस कोणते एक कारण नाही ?

   1) तुटीचा अर्थभरणा    

2) लोकसंख्या वाढ

   3) बेरोजगारीत वाढ    

4) प्रशासकीय खर्चात वाढ

उत्तर :- 3


२०२२) भारत सरकारच्या शेतकी किंमत आयोगाचे (Agricultural Prices Commission) प्रमुख उद्दिष्टय कोणते आहे ?

   1) समतोल किंमत रचना   

 2) समन्वित किंमत रचना

 3) 1 व 2 दोन्ही      

4) कोणतेही नाही

उत्तर :- 3


२०२३) भारतासारख्या विकसनशील देशामध्ये जगातील एकूण मुलांच्या संख्येपैकी 20 टक्क्याहून कमी मुले आढळतात. परंतु ...............   टक्के मुले ही कुपोषित आहेत. 

   1) 30 टक्के

    2) 35 टक्के 

   3) 40 टक्के

    4) 45 टक्के

उत्तर :- 3


२०२४) कोणत्या स्थितीमध्ये GDI चे मूल्य HDI च्या मूल्यापेक्षा कमी असणार ?

   1) जेव्हा देशामध्ये लैंगिक भेद केला जात नाही.  

  2) जेव्हा देशामध्ये लैंगिक भेद केला जातो.

   3) जेव्हा लैंगिक समता ही संविधानकरित्या सुनिश्चित केली जाते.

   4) वरीलपैकी कोणतेही नाही.

उत्तर :- 2


२०२५) योग्य पर्याय निवडा.

     भारत सरकारच्या रोजगार हमी कायदा 2004 मधील तरतूदी

   अ)वर्षातून 100 दिवस रोजगाराची हमी.   

  ब) रोजगार निर्मितीसाठी सार्वजनिक कामे करणे.

   क) रोजगार करणा-या व्यक्तीला किमाल वेतनाची हमी.

   1) वरील सर्व चूक 

   2) वरील सर्व बरोबर    

   3) अ व ब बरोबर    

4) केवळ क बरोबर

उत्तर :- 2



२०२६) खालीलपैकी योग्य तो पर्याय निवडून रिक्त जागा भरा.

   .................. सरकारने ऑगस्ट 2002 मध्ये पहिला राजवित्तीय जबाबदारी कायदा संमत केला.

   1) कर्नाटक  

  2) केरळ      

   3) तामिळनाडू  

  4) पंजाब

उत्तर :- 1


२०२७) बाराव्या वित्त आयोगानुसार केंद्राच्या स्थूल महसुलातील किती टक्के वाटा हा राज्य सरकारांना दिला जातो ?

 1) 38.0%  

 2) 46.0%    

 3) 37.0%    

4) 42.0% 

उत्तर :- 1


२०२८) सार्वजनिक लेखा – समिती त्यांचा अहवाल खालील सभेला तयार करते.

  1) संसद  

  2) राष्ट्रपती    

  3) पंतप्रधान  

  4) वित्त – मंत्री

उत्तर :- 1


२०२९) 1991 नंतर पुढीलपैकी कोणत्या वर्षी परकीय चलन साठयात घट झाली ?

  1) 1993 – 94  

  2) 2000 – 01    

  3) 2007 – 08  

  4) 2008 – 09

उत्तर :- 4


२०३०) अ) जुलै 1991 मध्ये भारतीय रूपयाचे 18 टक्के अवमूल्यन करण्यात आले.

    ब) अवमूल्यनामुळे व्यापारतुट भरून काढण्यास मदत होते.

 1) फक्त अ बरोबर आहे.     

 2) फक्त ब बरोबर आहे.

 3) अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत. 

 4) अ आणि ब दोन्हीही चूक आहेत.

उत्तर :- 3


१९५१) योग्य क्रम लावा. (मुलभूत कर्तव्य)

  अ) राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा सन्मान करणे   

  ब) सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे

  क) नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करणे    ड) भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणे

1) अ, ब, क, ड    

2) अ, ड, क, ब   

3) अ, ब,  ड, क   

4) अ, ड, ब, क

उत्तर :- 2


१९५२) ‘मुलभूत कर्तव्या’ बाबतच्या खालील विधानांचा विचार करा.

   अ) म्हटले तर त्यांना काही महत्त्व नसते.

   ब) ती 42 व्या घटनादुरुस्तीने राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली.

   क) ही कर्तव्ये राज्यघटनेच्या विभाग IV अ मध्ये व कलम 51 अ मध्ये दिली आहेत.

   ड) अशीच कर्तव्ये अमेरिका व ऑस्ट्रेलियामध्ये आहे.

          वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

  1) अ, ब  

 2) ब, क     

 3) क, ड    

 4) अ, ब, क

उत्तर :- 4


१९५३) खालीलपैकी कशाचा मुलभूत कर्तव्यांशी संबंध नाही ?

   अ) ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढयास स्फूर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शांची जोपासना करून त्यांचे अनुकरण करणे.

   ब) आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे मोल जाणून तो जतन करणे.

   क) कमकुवत घटकांच्या विशेषत: अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधात वृद्धी करणे.

   ड) ऐतिहासिक हितसंबंधाच्या आणि राष्ट्रीय दृष्टया महत्त्वाच्या स्मारकांचे रक्षण करणे.


1) अ, ब    

2) ब, क      

3) क, ड      

4) फक्त ड

उत्तर :- 3


१९५४)  भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने दोन वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहे ?

  1) डॉ. राजेंद्र प्रसाद   

 2) डॉ. झाकीर हुसेन

  3) आर. व्यंकटरमण्‍  

 4) के. आर. नारयणन्

उत्तर :- 1


१९५५) भारतात राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदार कोण असतात ?

 1) लोकसभेचे निर्वाचित सदस्य  

 2) राज्यसभेचे निर्वाचित सदस्य

 3) विधानसभेचे निर्वाचित सदस्य   

 4) वरील सर्वच

उत्तर :- 4



पोलीस भरती सराव प्रश्न


Q1.भारतीय राज्यघटनेच्या सहाव्या अनुसूचीमध्ये कोणत्या राज्यातील आदिवासी भागांच्या संदर्भात विशेष प्रशासकीय तरतुदी आहेत?

उत्तर :- आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम


Q2. कर्कवृत्त कोणत्या देशातून जात नाही?

उत्तर :- नेपाळ


Q3. अन्न आणि कृषी संघटना (FAO) चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?

उत्तर :-  रोम, इटली


Q4. ऑलिम्पिक इतिहासात सर्वाधिक सुवर्णपदके कोणाकडे आहेत?

उत्तर :- लारिसा लॅटिनिना


Q5. खालीलपैकी कोणता स्त्रोत मौर्य साम्राज्याच्या नगर प्रशासनाची तपशीलवार माहिती देतो?

उत्तर :- मेगास्थनीज इंडिका


Q6. मीराबाई चानू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

उत्तर :- भारतोलन


Q7. भारताच्या 2011 च्या जनगणनेचे बोधवाक्य खालीलपैकी कोणते होते?उत्तर :- आपली जनगणना, आपले भविष्य


Q8. भारतातील वनक्षेत्राची टक्केवारी अंदाजे किती टक्के आहे?

उत्तर :-  24%


Q9. __च्या नमुन्यासाठी लीड क्रोमेटची चाचणी घेतली जाते.

उत्तर :- हळद पावडर


Q10. भारताच्या राज्यघटनेत ____ मध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेला प्रोत्साहन देणे समाविष्ट आहे.

उत्तर :- राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे

भारतीय राज्यघटनेची प्रमुख व महत्त्वाची वैशिष्ट्ये – भारतीय राज्यघटनेतील तरतुदींचे महत्त्वाचे स्त्रोत पुढीलप्रमाणे…

भारतीय राज्यघटनेची प्रमुख व महत्त्वाची वैशिष्ट्ये –
महत्वाचे मुद्दे
भारतीय राज्यघटनेची प्रमुख व महत्त्वाची वैशिष्ट्ये –
भारतीय राज्यघटनेतील तरतुदींचे महत्त्वाचे स्त्रोत ....

१) लिखित घटना

भारतीय राज्यघटनेचे स्वरूप लिखित आहे. लिखित घटना एका निश्चित वेळी तयार केली जाते व एका निश्चित तारखेपासून अधिनियमात व अमलात येते.

भारतीय राज्यघटनेचे स्वरूप लिखित आहे मात्र ब्रिटनची राज्यघटना अलिखित स्वरुपाची आहे.

सध्या भारताच्या घटनेत २५ भाग ४६१ कलमे आणि १२ अनुसूची आहेत. अमेरिकेच्या राज्यघटनेची तुलना करावयाचे झाल्यास अमेरिकेच्या घटनेत केवळ ७ कलमे आहेत.

भारतीय घटना विस्तृत का?

भारतीय घटनेमध्ये जगातील विविध देशांच्या घटनांचा अभ्यास करून चांगल्या वैशिष्ट्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये केला असल्यामुळे घटना विस्तृत झाली आहे.

देशाच्या प्रशासनाचे तपशीलवार विवेचन भारतीय राज्यघटनेमध्ये आहे.

केंद्र व राज्याची सामायिक एकच घटना असल्यामुळे घटनेचा विस्तार वाढला आहे.

कलम ३७० कलम ३७१ ते कलम ३७१ (J) मध्ये राज्यांची संबंधित विशेष तरतुदी देण्यात आल्या आहेत.
भारतीय संघराज्य व्यवस्था बळकट करण्यासाठी केंद्र-राज्य संबंध तपशीलवार देण्यात आले आहेत.
मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्त्वे मूलभूत कर्तव्य यांचे विस्तृत स्पष्टीकरण घटनेमध्ये भर घालते.
इतर देशांच्या घटनांचा अभ्यास व त्या या देशातील महत्त्वाच्या कलमांचा अंतर्भाव यामुळे भारतीय राज्यघटनेचा आकार वाढला आहे.

२) राज्यघटनेचे विविध स्त्रोत rajyaghatanechi vaishishte

सुमारे ६० देशांच्या घटनांचा विचार करून त्यातील महत्त्वाच्या तरतुदींचा समावेश भारतीय घटनेमध्ये करण्यात आलेला आहे.

भारत सरकार कायदा १९३५ नुसार भारतीय राज्यघटनेचा संरचनात्मक आराखडा मांडण्यात आलेला आहे या कायद्यातील सुमारे २५० तरतुदी स्वीकारण्यात आल्या आहेत.

घटनेचा तात्विक भाग म्हणजे मूलभूत हक्क हे अमेरिकेच्या घटनेवरून स्वीकारण्यात आले आहेत तर मार्गदर्शक तत्वे आयरिश घटनेवरून घेण्यात आले आहेत.

घटनेच्या राजकीय भागाचा विचार करता ब्रिटनच्या घटनेवर आधारलेली संसदीय शासन व्यवस्था भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेली आहे.

कॅनडा जर्मनी फ्रान्स जपान दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया रशिया इत्यादी देशांच्या घटनेचा प्रभाव भारतीय राज्यघटने वरती दिसून येतो. याच कारणामुळे भारतीय राज्यघटनेला उसनी घटना(Borrowed Constitution), ठीगळांचे कार्य(patchwork), पश्चिमेचे अनुकरण(slavish imitation of the west), अशा टीका केल्या जातात. मात्र यामध्ये भारतीय परिस्थितीला अनुसरून त्यामध्ये बदल करण्यात आलेले आहे म्हणून हे सुंदर ठिकाणांचे कार्य आहे असे संबोधले जाते.

भारतीय राज्यघटनेतील तरतुदींचे महत्त्वाचे स्त्रोत पुढीलप्रमाणे…

भारत सरकार कायदा १९३५ – भारत सरकारच्या १९३५ च्या कायद्यानुसार संघराज्य व्यवस्था, न्यायव्यवस्था, लोकसेवा आयोग, आणीबाणीच्या तरतुदी, राज्यपालाचे पद, प्रशासकीय तपशील इत्यादी भाग स्वीकारण्यात आलेला आहे. भारतीय राज्यघटना ही मूलतः भारत सरकार कायदा १९३५ वर आधारित आहे. rajyaghatanechi vaishishte
ब्रिटिश घटना – संसदीय शासन व्यवस्था, कॅबिनेट, द्विगृही संसद, फर्स्ट पास्ट पोस्ट सिस्टीम, कायदा करण्याची पद्धत, कायद्याचे राज्य, एकच नागरिकत्व आणि विशेषाधिकार हे ब्रिटिश घटनेवरून स्वीकारण्यात आले आहेत.

अमेरिकेची घटना – मूलभूत हक्क, उपराष्ट्रपती, न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य, न्यायिक पुनर्विलोकन, राष्ट्रपती वरील महाभियोग, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची पदावरून दूर करण्याची पद्धत याबाबी अमेरिकेच्या घटनेवरून स्वीकारण्यात आलेल्या आहेत.

कॅनडा ची घटना – प्रभावी केंद्र असलेले संघराज्य शेषाधिकार, राज्यपालाची नेमणूक, सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकारक्षेत्र या बाबी कॅनडाच्या घटनेवरून स्वीकारण्यात आलेल्या आहेत.
आयरिश घटना – मार्गदर्शक तत्त्वे, राष्ट्रपतींची निवडणूक, राज्यसभेतील सदस्यांचे नामनिर्देशन या बाबी आयरिश घटनेवरून स्वीकारण्यात आलेल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाची घटना – समवर्ती सूची, संयुक्त बैठक, व्यापार व वाणिज्य चे स्वातंत्र्य या बाबी ऑस्ट्रेलियाच्या घटनेचा अभ्यास करून स्वीकारण्यात आलेल्या आहेत.
जपानची घटना – कायद्याने प्रस्थापित पद्धत
सोवियत रशिया ची घटना – मूलभूत कर्तव्य, प्रस्ताविकातील सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाचा आदर्श

वेईमर घटना (जर्मनी) – आणीबाणीच्या कालावधीतील तरतुदी व मूलभूत हक्कांमध्ये होणारा बदल
दक्षिण आफ्रिका – घटना दुरुस्ती ची पद्धत, राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक
फ्रान्सची घटना – गणराज्य, प्रास्ताविकेल स्वातंत्र्य, समता, बंधुता या गोष्टी फ्रान्सच्या घटनेवरून घेण्यात आलेल्या आहेत.

३) संघराज्य व्यवस्था (rajyaghatanechi vaishishte) – भारतीय घटनेने संघराज्य व्यवस्था स्वीकारलेली आहे संघराज्य व्यवस्थेची वैशिष्ट्ये आपल्या घटनेमध्ये आढळतात. केंद्र व घटक राज्य सरकारांचे अस्तित्व, अधिकारांची विभागणी, घटनेची स्वच्छता घटनेची ताठरता स्वतंत्र न्याय व्यवस्था द्विगृही कायदे मंडळ इत्यादी.

घटनेमध्ये गैर संघात्मक किंवा एकात्मक वैशिष्ट्ये ही आढळतात. त्यामध्ये प्रभावी केंद्रशासन एकच घटना एकेरी नागरिकत्व घटनेची लवचिकता एकात्मिक न्यायव्यवस्था अखिल भारतीय सेवा.

म्हणूनच भारतीय राज्यघटनेचे वर्णन अर्ध-संघराज्यीय (k.c. व्हेअर), वाटाघाटीचे संघराज्य (मॉरीस जोन्स) सहकारी संघराज्य (ऑस्टिन), केंद्रीकरण्याची प्रवृत्ती असलेले संघराज्य (इवोर जिनिंग)

४) संसदीय शासन पध्दती (rajyaghatanechi vaishishte)

भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार ब्रिटनच्या घटनेवरून केलेला आहे. अध्यक्षीय शासन व्यवस्थेत कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ पूर्णपणे विभक्त असतात मात्र संसदीय शासन व्यवस्थेमध्ये यांच्यामध्ये समन्वय व सहकार्य असते.

संसदीय शासन व्यवस्थेमध्ये मंत्रिमंडळाचे निवड कायदे मंडळाच्या सदस्याकडून केली जाते व मंत्रिमंडळ म्हणजेच कार्यकारी मंडळ हे कायदेमंडळाला जबाबदार असते. राष्ट्रप्रमुख हे नामधारी कार्यकारी प्रमुख असतात तर शासन प्रमुख हे वास्तव कार्यकारी प्रमुख असतात.

भारतीय संसदीय शासन व्यवस्थेची वैशिष्ट्ये
राष्ट्रपती नामधारी प्रमुख पंतप्रधान वास्तव प्रमुख
मंत्री कायदेमंडळाच्या सदस्य असणे.

मंत्रिमंडळाची कायदेमंडळा प्रति जबाबदारी
कनिष्ठ सभागृह चे विसर्जन
बहुमताचे सरकार
या वैशिष्ट्यामुळे संसदीय शासन व्यवस्थेला जबाबदार शासन व्यवस्था किंवा कॅबिनेट शासन व्यवस्था असेही म्हणतात. या व्यवस्थेमध्ये पंतप्रधानांची भूमिका महत्त्वाचे असल्याने पंतप्रधान शासनव्यवस्था असेही म्हटले जाते.

भारतीय संसदीय शासन व्यवस्था व ब्रिटिश संसदीय शासन व्यवस्थेमध्ये मूलभूत फरक आहे ब्रिटिश पार्लमेंट प्रमाणे भारतीय संसद सार्वभौम संस्थां नाही.

भारतीय राज्यसंस्था ही एक गणराज्य आहे व ब्रिटिश राज्यसंस्था ही राजेशाही आहे.

५) ताठर व लवचिक (rajyaghatanechi vaishishte)

भारताची राज्यघटना अति ताठर ही नाही व अति लवचिकही नाही यामुळे ताठरता व लवचिकता याचे एकत्रीकरण भारतीय राज्यघटनेमध्ये दिसून येते. ताठर घटनेची घटना दुरुस्ती पद्धत कठीण असते उलट लवचिक घटनेची घटना दुरुस्ती सोपी असते.

भारतीय राज्यघटनेच्या कलम 368 मध्ये घटना दुरुस्ती ची पद्धती देण्यात आली आहे.

घटनेच्या काही तरतुदींमध्ये बदल करण्यासाठी संसदेच्या विशेष बहुमताची आवश्यकता असते.

घटनेतील संघराज्याची वैशिष्ट्ये यामध्ये बदल करण्यासाठी वरीलप्रमाणे विशेष बहुमता बरोबरच निम्म्या राज्यांचे समर्थन आवश्यक असते.

या पद्धतीने घटना दुरुस्ती करणे अवघड असल्याने घटना ताठर मानली जाते. मात्र घटनेच्या काही तरतुदी मध्ये केवळ साध्या बहुमताने बदल करता येतो याबाबतीत घटना लवचिक आहेत.

६) संसदीय सार्वभौमत्व व न्यायिक सर्वोच्चता याचे संतुलन (rajyaghatanechi vaishishte) – भारतीय राज्यघटनेत कायदे मंडळ व न्याय मंडळ यांच्यामध्ये अधिकाराबाबत योग्य संतुलन राखण्यात आले आहे. संसदेला कायदा व घटना दुरुस्ती करण्याचे अधिकार आहेत आणि संसदेने केलेले कायदे घटनादुरुस्त्या घटनात्मक आहेत किंवा नाहीत हे ठरवण्याचा अधिकार न्यायालयांना आहे. यात न्यायालयांना सर्वोच्चता आहे. म्हणजेच भारतीय संसद पूर्णपणे सार्वभौम नाही आणि सर्वोच्च न्यायालय सुद्धा सर्वोच्च नाही तर दोघांच्या अधिकारांमध्ये संतुलन निर्माण करण्यात आलेले आहे. केशवानंद भारती खटला 1973 नुसार असे संतुलन निर्धारित करण्यात आले.

७) स्वतंत्र व एकात्मिक न्यायव्यवस्था – (rajyaghatanechi vaishishte)

भारताच्या घटनेने कायदेमंडळ कार्यकारी मंडळ यांच्याबाबतीत संघराज्य व्यवस्था निर्माण केलेली आहे मात्र न्याय व्यवस्था एकात्मिक ठेवण्यात आली आहे. एकात्मिक न्यायव्यवस्थेत सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालय अशी क्रमबद्ध शृंखला आहे. भारताच्या घटनेने सर्वोच्च न्यायालयाला संघराज्य न्यायालय, अपीलाचे न्यायालय, मूलभूत हक्काचा हमीदाता, घटनेचा संरक्षक बनवले आहे.

८) मूलभूत हक्क –

लोकशाहीमध्ये नागरिकांना समान हक्क प्राप्त होतात. नागरी जीवनासाठी हे मूलभूत हक्क असतात.भारताच्या घटनेने असे हक्क उपलब्ध करून दिले आहेत. मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ट असल्याने ते प्राप्त करून घेता येतात. हे हक्क नागरिकांना शासन संस्थे विरुद्ध उपलब्ध आहेत. मूलभूत हक्क मुळे देशात राजकीय लोकशाहीच्या संकल्पनेची पूर्तता करण्याचे कार्य करतात. असे मूलभूत हक्क व मर्यादित नसून त्यावर बंधने आहेत.

९) राज्यधोरणाची मार्गदर्शक तत्त्वे (rajyaghatanechi vaishishte) –

मार्गदर्शक तत्वे भारतीय घटनेचे एक वैशिष्ट्य आहे.ही तत्वे कल्याणकारी राज्याची निर्मिती करून लोकांना सामाजिक व आर्थिक न्याय मिळवून देण्यासाठी समाविष्ट करण्यात आलेली आहेत. मार्गदर्शक तत्वे न्यायप्रविष्ट नाहीत मात्र देशाच्या प्रशासनात सरकारला मार्गदर्शक आहेत. घटनेच्या प्रारंभा नंतर मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्वे यापैकी वरचढ कोण असा प्रश्न निर्माण झाला. यावेळी मिनर्वा मिल खटला १९८० मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निवाडा दिला की भारतीय घटनेतील मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्वे संतुलनाच्या आधार शिलेवर आधारलेली आहेत.

१०) मूलभूत कर्तव्य – (rajyaghatanechi vaishishte)

स्वर्ण सिंह समितीच्या शिफारशीनुसार ४२ वी घटनादुरुस्ती १९७६ मध्ये मूलभूत कर्तव्य कलम ५१ अ मध्ये अंतर्भूत करण्यात आली. यात दहा मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट करण्यात आली. २००२ मध्ये ८६ व्या घटनादुरुस्तीने अकरावे कर्तव्य अंतर्भूत करण्यात आले.

११) आणीबाणी विषयक तरतुदी (rajyaghatanechi vaishishte)-

घटनाकर्त्यांनी कारभार चालवणे अवघड असण्याच्या स्थितीची कल्पना करून आणीबाणीची तरतूद केली. अशा कारभाराच्या स्थितीमध्ये देशाची राजकीय लोकशाही व्यवस्था व घटना यांचे संरक्षण करता यावे यासाठी आणीबाणीच्या तरतुदी दिलेल्या आहेत.

घटनेमध्ये तीन प्रकारच्या आणीबाणीची तरतूद आहे

३५२ कलमानुसार राष्ट्रीय आणीबाणी युद्ध, परकीय आक्रमण किंवा सशस्त्र उठाव या कारणावरून पुकारले जाते.
३५६ कलमा अंतर्गत घटक राज्यातील आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट स्पष्ट करण्यात आलेली आहे.
३६० कलमानुसार भारताच्या वित्तीय स्थैर्य किंवा पत धोका निर्माण झाल्यास अशी आणीबाणी पुकारता येते.
१२) एकेरी नागरिकत्व –

संघराज्य शासन व्यवस्थेत दुहेरी नागरिकत्व दिले जाते. त्यामुळे नागरिकांना राज्य सरकारचे व केंद्र सरकारचे असे दोन प्रकारचे हक्क प्राप्त होतात.भारतीय जनतेला मात्र भारतीय घटनेने एकच नागरिकत्व बहाल केलेले आहे. देशातील प्रादेशिक भिन्नता कमी करून नागरिकांमध्ये राष्ट्रवादाची एकच भावना वाढीस लावणे हा उद्देश एकेरी नागरिकत्व मागे आहे.

१३) सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धत –

भारतीय लोकशाही एक व्यक्ती एक मत या तत्वावर चालते. कलम ३२६ मध्ये सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या व्यवस्थेची तरतूद आहे. भारतीय घटनेत सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या पद्धती द्वारे राजकीय समानता प्रस्थापित करते.

१४) धर्मनिरपेक्ष राज्य (rajyaghatanechi vaishishte) –

भारतीय राज्यघटनेने धर्मनिरपेक्ष राज्याची निर्मिती केली आहे. प्रस्ताविका व्यतिरिक्त कोठेही धर्मनिरपेक्ष शब्द आढळत नाही. मात्र घटनेतील विविध तरतुदी वरून धर्मनिरपेक्षता दिसून येते.भारतात सकारात्मक धर्मनिरपेक्षता स्वीकारण्यात आलेली आहे. यामध्ये राज्य कोणत्याही धर्माचा पुरस्कार करणार नाही मात्र सर्व धर्मांना समान वागणूक दिली जाते.

पोलीस भरतीसाठी महत्वाचे 150 प्रश्न उत्तरे :-


1) जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे?

➡️ नाईल (4,132 मैल)


2) जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे?

➡️ आशिया


3) जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे?

➡️ रशिया


4) जगातील सर्वात मोठे धरण कोणते आहे?

➡️ थरी गोर्जस डँम (three gorges dam)


5) जगातील सर्वात मोठ्या आकाराचे फुल कोणते आहे?

➡️ राफलेशिया अर्नोल्डिया (Rafflesia Arnoldia)


6) जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे?

➡️ गरीनलँड (Greenland)


7) जगातील सर्वात मोठा प्राणी कोणता आहे?

➡️ अटार्टिक ब्ल्यू व्हेल (Antartic Blue Whale)


8) जगातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे?

➡️ माउंट एव्हरेस्ट


9) सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण कोणते आहे?

➡️ मौसीमराम


10) जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे?

➡️ जफ बेझोस


11) जगातील सर्वात महागडी गाडी कोणती आहे?

➡️ बगाटी ला व्हॉइचर नॉइर (Bugatti La Voiture Noire)


12) जगातील सर्वात उंच बिल्डिंग कोणती आहे?

➡️ बर्ज खलिफा


13) जगातील सर्वात लहान देश कोणता आहे?

➡️ वहॅटिकन सिटी


14) पृथ्वीवर एकूण किती महासागर आहे? 

➡️ 5


15) जगातील सर्वात मोठी कंपनी कोणती आहे?

➡️ वॉल-मार्ट


16) जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता आहे?

➡️ कतार


17) जगातील सर्वात गरीब देश कोणता आहे?

➡️ कांगो


18) जगातील सर्वात मोठा धबधबा कोणता आहे? 

➡️ एजल फॉल्स


19) जगातील सर्वात जलद धावणारी रेल्वे कोणती आहे?

➡️ जपानमधील बुलेट ट्रेन


20) जगातील सर्वात कमी लोकसंख्या असणारा देश कोणता आहे?

➡️ वहॅटिकन सिटी (लोकसंख्या 1000)


21 जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता आहे?

➡️ चीन


22) जगातील सर्वात विषारी साप कोणता आहे? 

➡️ इनलंड ताईपान


23) आकाशगंगेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे?

➡️ गरु


24) आकाशगंगेतील सर्वात लहान ग्रह कोणता आहे?

➡️ बध


25) वर्षातील सर्वात मोठा दिवस कोणता आहे?

➡️ 21 जून


26) वर्षातील सर्वात लहान दिवस कोणता आहे?

➡️ 22 डिसेंबर


27) जगातील सर्वात मोठा समुद्र कोणता आहे?

➡️ पसिफिक समुद्र


28) जगातील सर्वात लहान समुद्र कोणता आहे?

➡️ आर्टिक समुद्र


29) जगातील सर्वात लहान पक्षी कोणता आहे?

➡️ बी हमिंग बर्ड


30) जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता आहे?

➡️ शहामृग


31) चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती कोण?

➡️ नील आर्मस्ट्रॉंग


32) विमानाचा शोध कोणी लावला?

➡️ राईट बंधू


33) अस्तित्वात असलेला जगातील सर्वात प्राचीन धर्म?

➡️ सनातन धर्म


34) जगात सर्वात आधी परमाणु हमला झालेले नगर कोणते?

➡️ हिरोशिमा


35) जगातील प्रथम महिला प्रधानमंत्री कोण?

➡️ एस. भंडारनायके (लंका)


36) जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर कोणते आहे?

➡️ टोकियो


37) जगातील सर्वात मोठे महाकाव्य कोणते आहे?

➡️ महाभारत


38) सर्वात जास्त विकला जाणारे इंग्रजी वर्तमानपत्र कोणते आहे?

➡️ द टाइम्स ऑफ इंडिया


39) जगातील सर्वात लांब भुयार कोणते आहे?

➡️ नार्वे सुरंग


40) जगातील सर्वात मोठी भिंत कोणती आहे?

➡️ गरेट वॉल ऑफ चीन


41) पुस्तक मुद्रित करणारा पहिला देश कोणता?

➡️ चीन


42) स्वतंत्र भारताचे प्रथम पंतप्रधान कोण होते?

➡️ पडित जवहरलाल नेहरू


43) जगातील सर्वात जुने लोकतंत्र कोणते आहे?

➡️ यनायटेड स्टेट ऑफ अमेरिका


44) भारतावर आक्रमण करणारा पहिला युरोपियन शासक कोण?

➡️ सिकंदर


45) हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी लावला?

➡️ दयाराम साहनी


46) शीख धर्माचे शेवटचे गुरु कोण होते?

➡️ गरुगोविंद सिंग


47) भारताची प्रथम महिला शासक कोण होती?

➡️ रझिया सुलतान


48) भारतातील सर्वात पहिला चित्रपट कोणता?

➡️ राजा हरिश्चंद्र


49) भारतातील सर्वात प्रथम रंगीत चित्रपट कोणता?

➡️ झाशीची राणी


50) भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात कोणी केली होती?

➡️ लॉर्ड मेकॉले


1) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ?

उत्तर -- सावित्रीबाई फुले 

-------------------------------------------------

2) ' सावरपाडा एक्सप्रेस ' कोणाला म्हणतात ?

उत्तर -- कविता राऊत ( धावपटू)

-------------------------------------------------

3) महाराष्ट्रातील पहिली महिला डाॅक्टर कोण ?

उत्तर -- आनंदीबाई जोशी 

-------------------------------------------------

4) महाराष्ट्रातील भारतरत्न मिळविणारी पहिली महिला कोण ?

उत्तर -- लता मंगेशकर 

------------------------------------------------

5) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?

उत्तर -- इंदिरा गांधी 

-------------------------------------------------

6) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?

उत्तर -- प्रतिभाताई पाटील 

------------------------------------------------

7) भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण ?

उत्तर -- कल्पना चावला

------------------------------------------------

8) भारतरत्न मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?

उत्तर -- इंदिरा गांधी 

------------------------------------------------

9) एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ?

उत्तर -- बचेंद्री पाल 

------------------------------------------------


10) भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण ?

उत्तर -- मीरा कुमार 

------------------------------------------------

11) भारताच्या पहिल्या महिला आय. पी. एस. अधिकारी कोण ?

उत्तर -- किरण बेदी 

-----------------------------------------------

12) भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण ?

उत्तर -- मीरासाहेब फातेमा बीबी 

------------------------------------------------

13) भारताच्या पहिल्या महिला वैमानिक कोण ?

उत्तर -- प्रेमा माथूर

------------------------------------------------

14) ' भारताची सुवर्णकन्या ' कोणाला म्हणतात ?

उत्तर -- पी. टी. उषा 

------------------------------------------------

15) अंजली भागवत ही कोणत्या क्रीडाप्रकारासाठी प्रसिद्ध आहे ?

उत्तर -- नेमबाजी 

------------------------------------------------

16) पहिली भारतीय विश्वसुंदरी कोण ?

उत्तर -- सुश्मिता सेन 

------------------------------------------------

17)भारतातील पहिली नोबेल पारितोषिक विजेती महिला कोण ?

उत्तर -- मदर तेरेसा

------------------------------------------------

18) ' सायना नेहवाल ' ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- बॅडमिंटन

-----------------------------------------------

19) ' सानिया मिर्झा ' कोणत्या खेळाशी निगडीत आहे ?

उत्तर -- लाॅन टेनिस 

-----------------------------------------------

20) ' मेरी काॅम ' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर -- बाॅक्सिंग 

-------------------------------------------------


21) ' पूर्णिमा महतो ' हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- तिरंदाजी 

-------------------------------------------------

22) ' आरती साहा ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- जलतरण

-------------------------------------------------

23) ' रोहिणी खाडिलकर ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- बुध्दिबळ 

-------------------------------------------------

24) ' कर्नामा मल्लेश्वरी ' ही कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- वेट लिफ्टिंग 

-------------------------------------------------

25) ' कोसबाडच्या टेकडीवरून ' हे आत्मवृत कोणाचे आहे ?

उत्तर -- अनुताई वाघ...



◆ ----------- यांनी  'सेंट्रल हिंदू कॉलेज' ची स्थापना  केली.

     - ॲनी बेझंट

       

◆ ------ हा देशातील भारतरत्‍न नंतरचा दुसर्‍या क्रमांकाचा नागरी पुरस्कार आहे.

  - पद्‍म विभूषण


◆ 1920 मध्ये भरलेल्या अस्पृश्य परिषदेचे अध्यक्ष पद ------ ह्यांनी भूषविले. 

    - राजर्षी शाहू महाराज


◆ इला भट्ट ह्या गांधीवादी समाज सेविका 1972 साली स्थापन्यात आलेल्या कोणत्या गैर-सरकारी संस्था (NGO) च्या संस्थापक आहेत❓ 

    - सेवा

 

◆ शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात.

   - औरंगाबाद


◆ जेट विमानाच्या उड्डाणाला न्यूटनचा गति विषयक  नियम लागू होतो❓

     - तिसरा


◆  दुधात  -------  ह्या घटकाचे प्रमाण सर्वाधिक असते.

   - शर्करा


◆ अति प्रचंड खजिन्या मुळे चर्चेत आलेले पद्‍मनाभ स्वामी मंदिर कोणत्या राज्यात आहे❓

    - केरळ


◆ राज्य घटना दुरुस्तीची पद्धती कोणत्या कलमा मध्ये स्पष्ट करण्यात आली आहे❓

      - 368


◆ गावातील कोतवालांची संख्या कशावरून ठरवली जाते❓

    - लोकसंख्या


◆ गोपाळ गणेश आगरकर हे पंडिता रमाबाई यांच्या ------  ह्या संस्थेचे शुभचिंतक होते. 

    - शारदा सदन

 

◆ अतिरिक्त मद्यपानाने  ------- ची कमतरता जाणवते.

   - थायामिन


◆ हुंडरू धबधबा भारताचा कोणत्या शहराजवळ आहे❓

    - रांची


◆ फेकरी कोणत्या हा औष्णिक विद्युतप्रकल्प जिल्ह्यात आहे? 

     - जळगाव


◆ ------ हा कॅल्शियम कार्बोनेटचा प्रकार आहे.

     - संगमरवर


◆ 1917 व 1934 च्या दरम्यान महात्मा गांधी मुंबईत कोठे रहात असत? 

    - मणि भवन

 

◆ भारतीय नौसेनेच्या प्रथम एअर स्टेशनचे नाव काय होते?

    - आयएनएस गरुड


◆ कॉम्प्यूटरच्या भाषेत एसडीआरएएम चा विस्तार काय आहे❓

    - सिंक्रोनस डायनॅमिक रॅम

 

◆ मिनिकॉय, कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाचे प्रांत आहेत❓

     - लक्षद्वीप


◆ कॉम्प्यूटरच्या भाषेत एस.एल.आय.पी. (स्लिप) चा विस्तार काय आहे❓

    - सिरीअल लाइन इंटरनेट प्रोटोकॉल

 

◆ भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे❓

      - १२ लाख चौ.कि.मी.


◆ नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार -----

      - दख्खनचे पठार


◆ महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे❓

     - मध्य प्रदेश


◆ महाराष्ट्राच्या ------  कडे सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत.

   - उत्तरे

 

◆ परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला ___ म्हणतात. 

    - निर्मळ रांग

 

◆ 'V' आकाराची दरी कशामुळे तयार होते? 

     - नदीचे अपघर्षण


◆  लोहखनिजाचे साठे विदर्भात कोठे आढळत नाहीत❓

    - किन्हाळा


◆ दगडी कोळश्याचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे❓

   - Lignite


◆ बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते❓

    - औरंगाबाद

 

◆ Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो❓

   - पाचगणी


Q1.अकबराने बांधलेल्या उपासनागृहाचे नाव काय होते?

उत्तर :- इबादत खाना


Q2.खालीलपैकी कोणत्या समितीचे वर्णन अंदाज समितीची ‘जुळी बहीण’ म्हणून केले जाते?

उत्तर :- लोकलेखा समिती


Q3.भारतात प्रच्छन्न बेरोजगारी कोणत्या क्षेत्रात अस्तित्वात आहे?

उत्तर :- कृषी क्षेत्र


Q4.भारतात ‘उन्हाळी मान्सून’ पाऊस कोठे पडतो?

उत्तर :- पश्चिम किनारा


Q5.परिसंस्थेतील घटकांच्या चक्राला_असे म्हणतात.

उत्तर :- जैव-रासायनिक चक्र


Q6.‘गरिबी हटाव’चा नारा कोणत्या पंचवार्षिक योजनेत देण्यात आला होता?

उत्तर :- चौथी योजना


Q7. इकोलॉजिकल कोनाडा ही संकल्पना पहिल्यांदा कोणामार्फत मांडण्यात आली?

उत्तर :- जे. ग्रिनेल


Q8.काश्मिर हरिण आढळणारे एकमेव अभयारण्य कोणते आहे?

उत्तर :- दाचीगम


Q9.इको-मार्क हे कोणत्या प्रकारच्या भारतीय उत्पादनांना दिले जातात?

उत्तर :- पर्यावरणास अनुकूल


Q10.राष्ट्रपतीपदाची रिक्त जागा किती महिन्यात भरली जाणे आवश्यक आहे?

उत्तर :- 6 महिने

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Note - हे प्रश्न तुम्हाला आगामी होणाऱ्या पोलिस भरती मध्ये नक्की दिसतील .