०८ सप्टेंबर २०२५

जागतिक भूगोलातील विशेष ठिकाणे

     जगातील सर्वात मोठा महासागर - पॅसिफिक महासागर


·         महासागरातील सर्वात जास्त खोल गर्ता - मारीयाना गर्ता (पॅसिफिक महासागर) 


·         सर्वात मोठे आखात - मेक्सिकोचे आखात (अमेरिका)15,42,990 चौ.कि.मी. 


·         सर्वात मोठा उपसागर - हडसन बे (कॅनडा) - 12,32,320चौ.कि.मी. 


·         सर्वात मोठा व्दिपकल्प - अरेबिया 


·         सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश - सुंदरबन (प.बंगाल) 


·         सर्वात मोठे भूखंड - युरेशिया (युरोप+आशिया)  


·         सर्वात लहान भूखंड - ऑस्ट्रेलिया - 76,87,120 चौ.कि.मी. 


·         सर्वात मोठे बेट - ग्रीनलँड - 21 लाख 75 हजार चौ.कि.मी. 


·         सर्वात मोठे व्दिपसमूह - इंडोनेशिया (13,000) बेटे


·         सर्वात उंच शिखर - माऊंट एव्हरेस्ट (8848 मी) 


·         सर्वात मोठी पर्वतरांग - हिमालय पर्वताची 


·         सर्वात मोठे व उंचीवरील पठार - तिबेटचे पठार. 


·         सर्वात मोठी नदी व खोरे - अॅमेझोन (द. अमेरिका)


·         सर्वात लांब नदी - नाईल ( आफ्रिका) 6671कि.मी. 


·         सर्वात लांब हिमनदी - लॅम्बर्ट हिमनदी (अंटार्क्टिका) 402कि.मी. 


·         सर्वात उंच धबधबा - एंजल धबधबा (व्हेनेझुयेला) 936.6मी. 


·         सर्वात मोठे खार्‍या पाण्याचे सरोवर - कॅस्पियन समुद्र (रशिया व इराण यांच्या दरम्यान) 3,93,900 चौ.कि.मी. 


·         सर्वात गोड्या खार्‍या पाण्याचे सरोवर - सुपिरीयर सरोवर (अमेरिका 82,110 चौ. किमी) 


·         सर्वाधिक उंचीवरील सरोवर - टिटीकाका (द.अमेरिका - पेरु व बोलव्हीया यांच्या दरम्यान) 


·         सर्वात मोठे वाळवंट - सहारा (आफ्रिका) 90,65,000चौ.कि.मी. 


·         सर्वात कमी तापमानाचे ठिकाण - वोस्टोक (अंटार्क्टिका) उणे 89.6 सें. 


·         सर्वात उष्ण ठिकाण - डेथ व्हॅली (अमेरिका) 


·         सर्वात मोठा देश (आकारमान) - रशिया 1,70,75,400चौ.कि.मी. 


·         सर्वात मोठा ज्वालामुखी (कुंड) - टोबा (सुमात्रा बेट) क्षेत्रफळ 1755 चौ.कि.मी. 


·         सर्वात छोटा देश (आकारमान) - व्हेटिकन सिटी (44हेक्टर) 


·         सर्वाधिक शेजारी असणारा देश - चीन 13 शेजारी 


·         सर्वाधिक लोकसंख्येचा देश - चीन 126 कोटी (2011) 


·         सर्वात कमी लोकसंख्येचा देश - व्हेटकिन सिटी - 900 फक्त (2011) 


·         सर्वात जास्त घनदाट वस्तीचा प्रदेश - मकाव (चीनच्या दक्षिण किनार्‍यावरील पोर्तुगीज वसाहत) दर चौ.कि.मी. ला24,411 व्यक्ती. 


·         सर्वात विरळ वस्तीचा प्रदेश - अंटार्क्टिका. लोकसंख्येची घनता अंदाजे (दर 3000 चौ.कि.मी. ला एक व्यक्ती) 


·         सर्वाधिक वस्तीचे शहर - टोकियो (जपान) - 2 कोटी 70लाख (2000) 


·         सर्वाधिक उंचीवरील राजधानी - ला पाझ (बोलेव्हीया) समुद्रसपाटीपासून उंची 3600 मी. 


·         सर्वात मोठे बंदर (विस्ताराने) - न्यूयॉर्क 


·         सर्वात गजबजलेले बंदर - रोटरडॅम (हॉलंड) 


·         सर्वात मोठे लोहमार्गाचे जाळे - अमेरिका एकूण लांबी2,95,000 कि.मी. 


·         सर्वात मोठे रस्त्यांचे जाळे - अमेरिका एकूण लांबी 62 लाख कि.मी. 


·         सर्वात लांब मानवनिर्मित कालवा - सुवेझ कालवा (इजिप्त)162 कि.मी. 


·         सर्वात लांब बोगदा - न्यूयॉर्क डेलावेअर जलवाहिनी 170कि.मी.


·         सर्वात लांब बोगदा (रेल्वे) - सेइकन रेल टनेल जपान. समुद्राखालून जाणारा 2 बेटे 53.85 कि.मी. 


·         सर्वात लांब बोगदा (रस्ता) - सेंट गॉटहर्ड, स्वित्झर्लंड (16किमी.) 


·         सर्वाधिक उंचीवरील रेल्वे स्टेशन - बोलीव्हीयामधील कंडोर स्टेशन (4800 मी) 


·         सर्वात मोठे रेल्वे स्टेशन - ग्रँड सेंट्रल टर्मिनल (न्यूयॉर्क) 


·         सर्वाधिक उंचीवरील विमानतळ - ल्हासा विमानतळ, तिबेट उंची 4363 मी. 


·         सर्वात मोठे विमानतळ - राजा खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळ, रियाध (अरबस्तान) विस्तार 222 चौ.कि.मी. 


·         सर्वात मोठे स्टेडीयम - झेकोस्लावियातील प्राग येथील स्ट्राव्ह स्टेडीयम सुमारे


·         सर्वात मोठे मुक्त विद्यापीठ - नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी 


·         सर्वात मोठा पुतळा - हैदराबाद येथील हुसेनसागर तलावातील भगवान बुद्धाचा पुतळा, वजन सुमारे 350 टन,इंची 17.2 मीटर 


·         सर्वात मोठा नियोक्ता - भारतीय रेल्वे - सुमारे 16.5 लाख कर्मचारी 


·         सर्वात मोठी बँक - वर्ल्ड बँक, वॉशिंग्टन  


·         सर्वाधिक शाखा असणारी बँक - भारतीय स्टेट बँक 


·         सर्वात मोठे संग्रहालय - अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री, न्यूयॉर्क 


·         सर्वात मोठे ग्रंथालय - लायब्ररी ऑफ काँग्रेस, वॉशिंग्टन


·         सर्वात जुनी भाषा - चीन 6000 - 7000 वर्ष जुनी.

०६ सप्टेंबर २०२५

चालू घडामोडी :- 05 सप्टेंबर 2025



◆ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या सन्मानार्थ भारताने 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला.

◆ 2025 च्या शिक्षक दिनाची थीम "पुढील पिढीच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे" ("Inspiring the Next Generation of Learners") आहे.

◆ जागतिक शिक्षक दिन हा दरवर्षी 5 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो.

◆ 2024 च्या जागतिक शिक्षक दिनाची थीम "Valuing Teacher Voices" होती.

◆ स्टार्टअप्स आणि नवोन्मेषकांना पाठिंबा देण्यासाठी DPIIT आणि ICICI बँकेने सामंजस्य करार केला.

◆ भारतीय वंशाचे अमेरिकन अमित क्षत्रिय यांची नासाच्या असोसिएट प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ लेखक अमीष त्रिपाठी यांनी त्यांची 'द चोला टायगर्स: द अवेंजर्स ऑफ सोमनाथ' ही कादंबरी लाँच केली.

◆ अनुभवी लेग-स्पिनर अमित मिश्राने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

◆ IAS अधिकारी पियुष गोयल यांनी खाण मंत्रालयाच्या सचिवपदाचा पदभार स्वीकारला.

◆ केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) 2025 जाहीर केले.

◆ राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) 2025 च्या एकूण क्रमवारीत IIT मद्रास अव्वल स्थानावर आहे. 

◆ भारतीय विज्ञान संस्था (IISc) बंगळूरूची NIRF 2025 नुसार देशातील सर्वोत्तम विद्यापीठ म्हणून घोषणा करण्यात आली आहे.

◆ NIRF 2025 नुसार IIM अहमदाबाद हे भारतातील पहिल्या क्रमांकाचे व्यवस्थापन महाविद्यालय ठरले आहे.

◆ नमुना नोंदणी प्रणाली (SRS) 2023 च्या अहवालानुसार, मणिपूर राज्यात सर्वात कमी बालमृत्यू दर (IMR) नोंदवला गेला आहे.

०१ सप्टेंबर २०२५

रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2025

घोषणा

➤ 31 ऑगस्ट 2025 रोजी, फिलिपाइन्सचे माजी राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या 118 व्या जयंतीनिमित्त घोषणा.

➤ एकूण 3 व्यक्ती/संस्था सन्मानित.


पुरस्कार विजेते 2025

➤ एजुकेट गर्ल्स (भारत) – ग्रामीण मुलींच्या शिक्षणासाठी कार्य; हा पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय संस्था.

➤ शाहिना अली (मालदीव) – पर्यावरण संरक्षणातील योगदान.

➤ फ्लेवियानो अँटोनियो एल. विलानुएवा (फिलिपाइन्स) – सामाजिक योगदानासाठी.


एजुकेट गर्ल्स संस्थेबद्दल

➤ स्थापना: 2007, संस्थापिका – सफीना हुसेन.

➤ मुख्यालय: मुंबई.

➤ कार्यक्षेत्र: भारतातील 4 राज्यांतील 30,000+ गावे.

➤ उद्दिष्ट: 2035 पर्यंत 1 कोटी विद्यार्थ्यांना शिक्षणाची उपलब्धता आणि गुणवत्ता सुधारणे.

➤ वैशिष्ट्य: समुदाय-आधारित स्वयंसेवकांच्या मदतीने शाळाबाह्य मुली पुन्हा शाळेत आणणे.


रॅमन मॅगसेसे पुरस्काराबद्दल

➤ ओळख: "आशियाचा नोबेल".

➤ स्थापना: 1957.

➤ उद्दिष्ट: आशियातील उत्कृष्ट व्यक्ती व संस्थांच्या योगदानाला सन्मानित करणे.

➤ क्षेत्रे: शासकीय सेवा, सामुदायिक नेतृत्व, पत्रकारिता, साहित्य, सर्जनशील कला, शांतता व आंतरराष्ट्रीय समज.



भारत भेटीवर आलेले परदेशी प्रवासी

1. निअरकस (Nearchus) (326-324 BC)

✅️ ➤ अलेक्झांडरचा आरमार प्रमुख

✅️ ➤ नंद वंशातील धनानंदाच्या काळात भारत भेट

✅️ ➤ ‘The Voyage of Nearchus from Indus’ (Arrian ने लिहिले)

✅️ ➤ जिम्नोसोफिस्ट (नग्न संन्यासी) यांचा उल्लेख

✅️ ➤ बौद्ध धर्माचा उल्लेख नाही


2. मेगास्थनीज (Megasthenes) (302-298 BC)

✅️ ➤ चंद्रगुप्त मौर्याच्या काळात भेट

✅️ ➤ सेल्यूकस निकेटरचा राजदूत

✅️ ➤ 'Indica' हे पुस्तक लिहिले

✅️ ➤ चंद्रगुप्तास Sandrocottus म्हटले

✅️ ➤ भारतात गुलामगिरी नाही, असे निरीक्षण


3. डेमाकस (Deimachos) (320-273 BC)

✅️ ➤ बिंदुसाराच्या काळात भेट

✅️ ➤ अँटिओकस I चा राजदूत

✅️ ➤ बिंदुसाराला 'अमित्रघात' असे संबोधले


4. हेलीओडोरस (Heliodorus) (110 BC)

✅️ ➤ ग्रीक राजा अँटिअल्किदासचा राजदूत

✅️ ➤ सुंग वंशातील भगभद्र राजाच्या काळात भेट

✅️ ➤ विदिशा येथील ‘Besnagar’ मध्ये स्तंभ उभारला

✅️ ➤ स्वतःला ‘परम भागवत’ म्हटले


5. टॉलेमी (Ptolemy) (130 AD)

✅️ ➤ ग्रीक भूगोलवेत्ता

✅️ ➤ संगम युगात दक्षिण भारतात भेट

✅️ ➤ 'Geography of India' हे पुस्तक

✅️ ➤ तामिळनाडूमधील सहा किनारी ठिकाणांचा उल्लेख


6. फाह्यान (Fa-Hien) (405-411 AD)

✅️ ➤ चिनी बौद्ध भिक्षु

✅️ ➤ गुप्त सम्राट चंद्रगुप्त-II (विक्रमादित्य) च्या काळात भेट

✅️ ➤ 'Fo-kwo-ki' (Travels of Fa-Hien) पुस्तक

✅️ ➤ 6 वर्ष भारतात वास्तव्य

✅️ ➤ पाटलीपुत्रच्या समृद्धीचे वर्णन


7. ह्युएन सांग (Huien Tsang) (630-645 AD)

✅️ ➤ हर्षवर्धनाच्या काळात भेट

✅️ ➤ नालंदा येथे योगशास्त्राचा अभ्यास

✅️ ➤ ‘Si-Yu-Ki’ पुस्तक

✅️ ➤ पल्लव नरेश नरसिंहवर्मन व चालुक्य राजा पुलकेशिन-II यांच्या दरबारातही भेट


8. वांग हुअन्से (Wang Xuance) (648-664 AD)

✅️ ➤ तांग राजवंशाचा राजदूत

✅️ ➤ 16 वर्ष भारतात वास्तव्य

✅️ ➤ बंगालमध्ये जैन धर्म फोफावल्याचे निरीक्षण


9. इ-शिंग (I-Xing) (671-695 AD)

✅️ ➤ ह्युएन सांगचा शिष्य

✅️ ➤ ‘A record of Buddhist Religion’ हे पुस्तक

✅️ ➤ हर्षवर्धनाच्या काळात भेट


10. सुलैमान (Sulaiman) (850 AD)

✅️ ➤ अरब व्यापारी

✅️ ➤ देवपालाच्या काळात पाला साम्राज्याला भेट

✅️ ➤ पाला साम्राज्याला ‘Ruhma’ म्हणतो

✅️ ➤ राष्ट्रकूट अमोघवर्ष I च्या दरबारातही भेट


11. अल-मसूदी (Al-Masudi) (957 AD)

✅️ ➤ अरब प्रवासी

✅️ ➤ प्रतिहार राजवटीत भेट

✅️ ➤ ‘Muruj-al-Zahab’ हे पुस्तक

✅️ ➤ अरबांचा हेरोडोटस म्हणून ओळख

✅️ ➤ भारत व इटलीची तुलना, रोम = वाराणसी


12. अल-बिरूनी (Alberuni) (1024-1030 AD)

✅️ ➤ महमूद गझनीसोबत भारतात आगमन

✅️ ➤ 'Indology' चा जनक

✅️ ➤ ‘Tahqiq-i-Hind’ हे पुस्तक

✅️ ➤ इतर पुस्तके : Qanun-i-Masudi (खगोलशास्त्र), Jawahir-fil-Jawahir (खनिजशास्त्र)


13. मार्को पोलो (Marco Polo) (1292-1294 AD)

✅️ ➤ इटालियन प्रवासी

✅️ ➤ काकतीय राणी रुद्रमादेवीच्या काळात दक्षिण भारतात भेट

✅️ ➤ पांड्य राजा मद्वर्मन कुलशेखराचाही उल्लेख

✅️ ➤ गरम हवामान, लोक फक्त लंगोट परिधान करतात

✅️ ➤ मिरी व निळा (Indigo) पिकांची माहिती


14. इब्न बतुता (Ibn Battuta) (1333-1347 AD)

✅️ ➤ मोरोक्कोचा प्रवासी

✅️ ➤ मोहम्मद बिन तुघलकाच्या काळात भारतात

✅️ ➤ दिल्लीचा काझी नेमला गेला

✅️ ➤ ‘Rihla’ हे पुस्तक लिहिले


15. शिहाबुद्दीन अल-उमारी (1348 AD)

✅️ ➤ दमास्कसहून भारतात

✅️ ➤ ‘Masalik albsar fi-mamalik al-amsar’ या पुस्तकात भारताचा सविस्तर उल्लेख


16. निकोलो कॉन्ती (Nicolo Conti) (1420-1421 AD)

✅️ ➤ इटालियन व्यापारी

✅️ ➤ विजयनगरातील संगम वंशाच्या देव राय I च्या काळात भेट

✅️ ➤ विजयनगरला ‘Bizenegalia’ म्हणतो

✅️ ➤ सती, गुलामगिरी, बहुपत्नीत्व यांचा उल्लेख


17. अब्दुर रज्जाक (Abdur Razzak) (1443-1444 AD)

✅️ ➤ फारसी राजदूत (शाहरुख – तैमूरी वंश)

✅️ ➤ देव राय II च्या काळात विजयनगरात भेट

✅️ ➤ मलबार कोझिकोड येथील झमोरीन दरबारात वास्तव्य

✅️ ➤ ‘Matla-us-Sadain wa Majma-ul-Bahrain’ हे पुस्तक


18. अथानासियस निकिटीन (Athanasius Nikitin) (1470-1474 AD)

✅️ ➤ रशियन व्यापारी

✅️ ➤ बहमनी सुलतान मुहम्मद III च्या काळात भारतात

✅️ ➤ ‘The Journey Beyond Three Seas’ हे पुस्तक

✅️ ➤ 4 वर्षे भारतात वास्तव्य


19. ड्यूआर्टे बार्बोसा (Duarte Barbosa) (1500 AD)

✅️ ➤ पोर्तुगीज प्रवासी

✅️ ➤ विजयनगरातील तुलुव वंशाच्या काळात

✅️ ➤ केरळमध्ये १६ वर्ष वास्तव्य

✅️ ➤ मल्याळमचा अभ्यास व जातिप्रथा यांचे वर्णन

✅️ ➤ ‘Book of Duarte Barbosa’ पुस्तक


20. डोमिंगो पेस (Domingo Paes) (1520-1522 AD)

✅️ ➤ पोर्तुगीज प्रवासी

✅️ ➤ कृष्णदेवरायाच्या काळात भेट

✅️ ➤ कृष्णदेवराय – विद्वान व परिपूर्ण राजा

✅️ ➤ देवदासी प्रथेचे वर्णन


21. फर्नाओ नुनीझ (Fernao Nuniz) (1535-1537 AD)

✅️ ➤ पोर्तुगीज व्यापारी, घोडा विक्रेता

✅️ ➤ अच्युतदेवरायाच्या काळात भेट

✅️ ➤ महानवमी सणाचे विस्तृत वर्णन

74 वी घटनादुरूस्ती

◆कलम - 243 P - व्याख्या


◆कलम - 243 Q - नगरपालिकांचे घटक व स्तर


◆कलम - 243 R - नगरपालिकांची रचना


◆कलम - 243 S - वार्ड समित्यांची रचना आणि मांडणी


◆कलम - 243 T - अनुसूचीत जात जमाती साठी राखीव जागा


◆कलम - 243 U - नगरपालिकांचा कालावधी


◆कलम - 243 V - सदस्यांची अपात्रता 


◆कलम - 243 W - नगरपालिकाचा हक्क  व जबाबदर्‍या


◆कलम - 243 X - कर बसवण्याचे आधिकार व वित्तव्यवस्था


◆कलम - 243 Y - वित्त आयोगाचा आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रस्थापना 


◆कलम - 243 Z - नगरपालिकेच्या हिशेबांचे लेखापरीक्षण


◆कलम - 243 ZA - नगरपालिकांच्या निवडणुका  


◆कलम - 243 ZB - केंद्रशासित प्रदेशांना नगरपालिका कायदा


◆कलम - 243 ZC - विशिष्ट प्रदेशांना नगरपालिका कायदा लागू न करणे. 


◆कलम - 243 ZD - जिल्हा नियोजनासाठी समिती 


◆कलम - 243 ZE  -  मेट्रोपोलीटन विकासासाठी समिती 


◆कलम - 243 ZF - नगरपालिका सबंधित विद्यमान कायदा व तरतुदी चालू  ठेवण्यासाठी


◆कलम - 243 ZG - नगरपालिका निवडणूकात कोर्टाच्या हस्तक्षेपास मनाई

प्रधानमंत्री जनधन योजना (PMJDY) – 11 वर्षे : Banking the Unbanked


1.योजनेची सुरुवात

➤ ऑगस्ट 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली.


2.मुख्य उद्देश

➤ बँकिंग सुविधांपासून वंचित असलेल्या नागरिकांना बँकिंग प्रणालीशी जोडणे.


3.प्रमुख लाभ

✅️ ➤ प्रत्येक वंचित व्यक्तीसाठी बेसिक सेव्हिंग बँक खाते उघडण्याची सोय.

✅️ ➤ रुपे कार्डासह अपघाती विमा संरक्षण :

▪️ रु. 1 लाख (28 ऑगस्ट 2018 नंतर उघडलेल्या खात्यांकरिता रु. 2 लाख).

✅️ ➤ पात्र धारकांसाठी ओव्हरड्राफ्ट सुविधा – जास्तीत जास्त रु. 10,000.


4.PMJDY खात्यांशी संलग्न योजना

➤ थेट लाभ हस्तांतरण (DBT).

➤ प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY).

➤ प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY).

➤ अटल पेन्शन योजना (APY).

➤ मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट & रिफायनान्स एजन्सी बँक (MUDRA) योजना.


5.महत्त्व

➤ आर्थिक समावेशनाची सर्वात मोठी पायरी.

➤ गरीब आणि वंचित वर्गासाठी औपचारिक बँकिंग व विमा सुरक्षेचा विस्तार.

पर्यावरण – बहुपर्यायी प्रश्न व उत्तरे

प्रश्न 1 : 'Environment' हा शब्द कोणत्या भाषेतून घेतला आहे?

➤ (2) फ्रेंच


प्रश्न 2 : दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

➤ (2) ५ जून


प्रश्न 3 : १९७२ मध्ये स्टॉकहोम परिषद कुठे भरली होती?

➤ (2) स्वीडन


प्रश्न 4 : 'Only One Earth' हा घोषवाक्य कोणत्या परिषदेत स्वीकारला गेला?

➤ (3) स्टॉकहोम परिषद


प्रश्न 5 : पर्यावरणाचे घटक कोणते नाहीत?

➤ (3) सूर्य


प्रश्न 6 : परिसंस्था या संकल्पनेची व्याख्या सर्वप्रथम कोणी केली?

➤ (2) टेन्सले


प्रश्न 7 : खालीलपैकी कोणते प्राकृतिक परिसंस्था आहे?

➤ (3) जंगल


प्रश्न 8 : भारताला जैवविविधतेच्या दृष्टीने काय मानले जाते?

➤ (2) बहुविविध देश


प्रश्न 9 : जैवविविधतेवर सर्वाधिक धोका कोणामुळे निर्माण होतो?

➤ (4) शिकारी व जंगलतोड


प्रश्न 10 : भारतातील सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या राज्यात आहे?

➤ (1) मध्यप्रदेश

३१ ऑगस्ट २०२५

26 ते 30 ऑगस्ट - खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)

1) अहमदाबाद येथे झालेल्या कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये मीराबाई चाणूने कोणते पदक जिंकले ?

⭐️ सुवर्ण पदक


2) BCCI चे अध्यक्ष कोण होते ज्यांनी नुकतेच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे ?

⭐️ रॉजर बिन्नी 


3) रॉजर बिन्नी यांच्या राजीनाम्यानंतर BCCI चे कार्यवाहू अध्यक्ष कोण बनले आहेत ?

⭐️ राजीव शुक्ला 


भारतातील कोणत्या निमलष्करी दलाने त्यांचे पहिले महिला कमांडो युनिट सुरू केले आहे ?

⭐️ CISF 


5) FSSAI चे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

⭐️ बरजित पून्हानी 


6) भारतीय सैन्याने पहिला आरोग्य सेतू सराव कोणत्या राज्यात आयोजित केला ?

⭐️ आसाम 


7) अलीकडेच ऑपरेशन संस्कार कोणत्या राज्यात राबवण्यात आलेले आहे ?

⭐️ राजस्थान 


8) सोळाव्या आशियाई नेमबाज स्पर्धेत भारताच्या सिफ्ट कौर समराने महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन मध्ये कोणते पदक जिंकले ?

⭐️ सुवर्णपदक 


9) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात 'मेक इन इंडिया' बॅटरी इलेक्ट्रिक वाहन ' ई-वितारा चे व हायब्रीड बॅटरी इलेक्ट्रो प्लांट चे उद्घाटन केले ?

⭐️गुजरात 


10) भारतातील पहिल्या शहरी सार्वजनिक रोप-वे ची चाचणी कोणत्या शहरात घेण्यात आली ?

⭐️वाराणसी 


11) पहिली आंतरराष्ट्रीय पाली परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती ?

⭐️कॅंडी


12) कोणत्या अंतराळ संस्थेने SURYA नावाचे अभूतपूर्व कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल विकसित केले आहे ?

⭐️NASA 


13) न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या (NDB) उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

⭐️राजीव रंजन 


14) ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज असोसिएशन ऑफ इंडिया (AAAI) च्या अध्यक्षपदी  कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

⭐️श्रीनिवासन के. स्वामी


15) अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्या नावावर नवीन विद्यार्थी शिष्यवृत्ती जाहीर केली आहे ?

⭐️उत्तर प्रदेश 


16) प्रेमचंद पूख्रम्बम यांना ललित अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ते कोणत्या राज्याचे आहे ?

⭐️मणिपूर 


17) चर्चेत असलेला यमुना जल पाईपलाईन प्रकल्प कोणत्या दोन राज्या मधला आहे ?

⭐️हरियाणा व राजस्थान


18) अलीकडील अहवालानुसार देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण ठरले आहेत ?

⭐️चंद्रबाबू नायडू


19) नुकतेच महाराष्ट्रातील किती गावे इंटेलिजंट करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे ?

⭐️3500


20) लिथूआनिया या देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत ?

⭐️ इंगा रुगीनीन 


21) ड्युरंड कप 2025 कोणत्या संघाने जिंकले आहे ?

⭐️ North East United 


22) इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट ने जारी केलेल्या स्मार्ट सिटी इंडेक्स 2025 मध्ये कोणते शहर पहिल्या क्रमांकावर आहे ?

⭐️ रीच 


23) महिला समानता दिवस कधी साजरा करण्यात येतो ?

⭐️ 26 ऑगस्ट


24) जागतिक सरोवर दिवस केव्हा साजरा केला जातो ?

⭐️27 ऑगस्ट 


25) दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा दिवस कधी साजरा करण्यात येतो ?

⭐️ 29 ऑगस्ट

२९ ऑगस्ट २०२५

तैनाती फौज

 ◾️ या पध्दतीमध्ये इंग्रज फौजेचा सर्व खर्च हा ती फ़ौज ज्यांच्याकडे आहे ( राजाने ) त्यांनी करावयाचा   


◾️ लॉर्ड वेलस्लिने 1798 मध्ये सर्वप्रथम निजामावर 'तैनाती फौजेचा' अवलंब केला.


🔹 निजामाने या तैनाती फौज चा खर्च द्यायचा

🔹 निजामाचे परराष्ट्र धोण मात्र इंग्रज ठरवू लागले. 


⚔️ निजाम 1798

⚔️ टिपू सुलतान  1799

⚔️ अयोध्येचा नवाब 1801

⚔️  दुसरा बाजीराव पेशवा 1802


 यांच्यावर तैनाती फौजेची सक्ती करण्यात आली.


अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


गव्हर्नर जनरल डलहौसीने या काळात खालसा/विलीनीकरण झालेल्या राज्यांचा क्रम


♦️ सातारा 1848.

♦️जैतपूर- 1849.

♦️संभलपूर व ओरछा- 1849.

♦️बघाट 1850.

♦️उदयपूर - 1852.

♦️झाशी - 1853.

♦️नागपूर-1854.

♦️करौली- 1855.

♦️अवध - 1856.



⭕️♦️⚠️ गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलस्लीच्या काळात तैनाती फौज

स्वीकारणारी राज्याचा क्रम:-

♦️हैदराबाद - 1798.

♦️म्हैसूर - 1799.

♦️तंजावर - 1799.

♦️अवध - 1801.

♦️पेशवा - 1802.

♦️भोसले - 1803.

♦️शिंदे - 1804.

२७ ऑगस्ट २०२५

Mpsc प्रश्न सराव


1) भीमा व गोदावरी नद्यांची खोरी खालील पर्वत रांगेमुळे अलग होतात.

   1) बालाघाट    2) महादेव    3) सातपुडा    4) अजिंठा


उत्तर :- 1


2) उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या खो-यांचा क्रम बरोबर आहे ?

   1) तापी, गोदावरी, सीना, भीमा, कृष्णा    2) तापी, गोदावरी, सीना, कृष्णा, भीमा

   3) भिमा, गोदावरी, तापी, कृष्णा, सीना    4) तापी, सीना, गोदावरी, कृष्णा, भिमा


उत्तर :- 1


3) खालील कोणते विधान चुकीचे आहे ?

   अ) दक्षिण पठारात गोदावरीचे खोरे दुसरे सर्वात मोठे खोरे असून ते भारताचे 10% क्षेत्र व्यापते.

   ब) गोदावरीनंतर कृष्णा नदीचे खोरे सर्वात मोठे आहे.

   क) महानदीचे खोरे पठारातील तिसरे सर्वांत मोठे खोरे आहे.

   ड) नर्मदा व कावेरी नद्यांचे खोरे जवळपास सारखे आहे.

   1) ब      2) क      3) ड      4) कोणतेही नाही


उत्तर :- 4


4) खालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्रात पुणे आणि सोलापूर व पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा आहे ?

   1) गोदावरी    2) भीमा      3) कृष्णा      4) वरील एकही नाही


उत्तर :- 2


5) योग्य जोडया लावा.

  धबधबे      ठिकाण

         अ) मार्लेश्वर      i) सातारा

         ब) ठोसेघर      ii) रत्नागिरी

         क) सौताडा      iii) अहमदनगर

         ड) रंधा      iv) बीड


    अ  ब  क  ड


           1)  ii  iii  i  iv

           2)  iv  iii  ii  i

           3)  i  iv  iii  ii

           4)  ii  i  iv  iii


उत्तर :- 4



1) महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते ?

   1) तापी    2) वैनगंगा    3) नर्मदा      4) कृष्णा


उत्तर :- 2


7) पुढील कोणते /ती विधान/ ने योग्य आहेत ?

   अ) सहस्त्रकुंड धबधबा वैनगंगा नदीवर आहे.

   ब) वणी हे गाव निरगुडावर वसलेले आहे.


   1) केवळ अ योग्य  2) केवळ ब योग्य    3) अ व ब दोन्ही योग्य  4) अ व ब योग्य नाहीत


उत्तर :- 2


8) जोडया लावा.

  जिल्हा      धबधबा

         अ) अहमदनगर    i) सौताडा धबधबा

         ब) अमरावती    ii) सहस्त्रकुंड धबधबा

         क) बीड      iii) रंधा धबधबा

         ड) यवतमाळ    iv) मुक्तागिरी धबधबा

    अ  ब  क  ड


           1)  ii  iii  iv  i

           2)  i  iv  iii  ii

           3)  iii  iv  i  ii

           4)  iv  ii  iii  i


उत्तर :- 3


9) खालील विधाने पहा.

   अ) भिमा ही कृष्णेची उपनदी आहे.

   ब) इंद्रायणी ही भिमेची उजव्या तीरावरील उपनदी आहे.

   क) भोगवती ही सिना नदीची उपनदी आहे.

   1) विधान अ आणि ब बरोबर आहेत.    2) विधान अ आणि क बरोबर आहेत.

   3) विधान ब आणि क बरोबर आहेत.    4) सर्व विधाने बरोबर आहेत.


उत्तर :- 4


10) खालील कोणती तापीची उपनदी नाही ?

   1) पूर्णा    2) पांझरा    3) दुधना      4) गिरणा


उत्तर :- 3


1) कोणत्या राजकीय पक्षाचे सभेत केवळ एक उमेदवार निवडून आले होते ?

   अ) कृषक प्रजा पक्ष    ब) शेडयूलड् कास्टस् फेडरेशन

   क) कम्युनिस्ट पक्ष    ड) अपक्ष

   1) फक्त अ, क, ड    2) फक्त ब, क, ड    3) फक्त अ, ब, ड    4) फक्त अ, ब, क

उत्तर :- 4


2) खालील विधाने विचारात घ्या :

   अ) भारतीय संविधान समितीची पहिली बैठक 9 ते 23 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्ली येथे पार पडली.

   ब) सरदार हुकूम सिंग, के.टी. शाह, महावीर त्यागी हे भारतीय घटना समितीतील बिगर काँग्रेस पक्षाचे सदस्य होते.

   क) संविधान सभेच्या पहिल्या बैठकीस मुस्लीम लीगचे सर्व सदस्य हजर होते.

         वरीलपैकी कोणते / ती विधान  / ने बरोबर आहे / त ?

   1) अ आणि ब      2) ब आणि क    3) अ आणि क    4) अ, ब आणि क


उत्तर :- 1


3) सर्वोच्च न्यायालयाने काही  वैशिष्टयांना संविधानाची पायाभूत वैशिष्टये म्हणून मान्यता दिलेली आहे. पुढीलपैकी कोणत्या वैशिष्टयांचा त्यात समावेश होतो ते सांगा ?

   अ) समतेचे तत्व      ब) न्यायालयीन पुनर्विलोकन  

   क) संघराज्य      ड) सार्वभौमत्व

   1) अ, ब, क, ड      2) ब, क, ड    3) अ, ब, क    4) अ, ड, क


उत्तर :- 1


4) भारताच्या संघराज्यात्मक पध्दतीबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

   1) राज्यघटनेत ‘संघराज्य’ हा शब्दप्रयोग कोठेही केलेला नाही.

   2) संघराज्यातून फुटून बाहेर पडण्याचा अधिकार राज्यांना नाही.

   3) अखिल भारतीय सेवा संघराज्य तत्वाचा भंग करतात.

   4) राज्यपालाच्या नेमणूकीची पध्दत भारताने अमेरिकन पध्दती प्रमाणे स्वीकारली आहे.


उत्तर :- 4


5) भारतात खालीलपैकी कोणत्या तरतुदी या संघराज्य पध्दतीच्या विरोधी आहेत ?

   अ) राज्ये अविनाशी नाहीत.    ब) आणीबाणी तरतूदी

   क) अखिल भारतीय सेवा      ड) राज्यघटनेचे सर्वश्रेष्ठत्व    

   इ) राष्ट्रपतीव्दारे राज्यांचा विधेयकावर नकाराधिकार


   1) अ, ब, क, ड    2) ब, क, ड, इ    3) अ, ब, क, इ    4) ब, क, इ


उत्तर :- 3



6) कोणत्या समित्यांमध्ये डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केले ?

   अ) मूलभूत अधिकार समिती    ब) अल्पसंख्यांक उपसमिती    

   क) सल्लागार समिती      ड) राज्ये समिती


   1) फक्त अ, ब, क    2) फक्त ब, क, ड    3) फक्त अ, ब, ड    4) फक्त अ, क, ड


उत्तर :- 1


7) भारतीय संघराज्य व्यवस्थेला ‘वाटाघाटीचे संघराज्य’ असे कोणी संबोधले आहे ?

   1) के. सी. व्हिअर    2) आयव्हर जेनिंग्ज  3) ग्रॅनव्हिल ऑस्टिन  4) मॉरिस जोन्स


उत्तर :- 4


8) ‘भारत हे संघराज्य आहे’ यास खालीलपैकी कोणते तत्व आधार देत नाही ?

   1) एक राज्यघटना      2) व्दिगृही कायदेमंडळ  

   3) राज्यघटनेची सर्वोच्चता    4) न्यायालयीन पुनर्विलोकन


उत्तर :- 1


9) भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे ?

   1) स्वातंत्र्य      2) समता      3) न्याय      4) बंधुभाव


उत्तर :- 3


10) भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रीकेमध्ये ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवादी’ या शब्दांचा समावेश 1976 च्या .............  घटनादुरुस्तीनुसार करण्यात आला.

   1) 44 वी      2) 41 वी      3) 42 वी      4) 46 वी


उत्तर :- 3

भारतीय राज्यघटनेची प्रमुख व महत्त्वाची वैशिष्ट्ये

भारतीय राज्यघटनेची प्रमुख व महत्त्वाची वैशिष्ट्ये –

महत्वाचे मुद्दे
भारतीय राज्यघटनेची प्रमुख व महत्त्वाची वैशिष्ट्ये –
भारतीय राज्यघटनेतील तरतुदींचे महत्त्वाचे स्त्रोत पुढीलप्रमाणे…


१) लिखित घटना

भारतीय राज्यघटनेचे स्वरूप लिखित आहे. लिखित घटना एका निश्चित वेळी तयार केली जाते व एका निश्चित तारखेपासून अधिनियमात व अमलात येते.भारतीय राज्यघटनेचे स्वरूप लिखित आहे मात्र ब्रिटनची राज्यघटना अलिखित स्वरुपाची आहे.

सध्या भारताच्या घटनेत २५ भाग ४६१ कलमे आणि १२ अनुसूची आहेत. अमेरिकेच्या राज्यघटनेची तुलना करावयाचे झाल्यास अमेरिकेच्या घटनेत केवळ ७ कलमे आहेत.

भारतीय घटना विस्तृत का?

भारतीय घटनेमध्ये जगातील विविध देशांच्या घटनांचा अभ्यास करून चांगल्या वैशिष्ट्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये केला असल्यामुळे घटना विस्तृत झाली आहे.

देशाच्या प्रशासनाचे तपशीलवार विवेचन भारतीय राज्यघटनेमध्ये आहे.
केंद्र व राज्याची सामायिक एकच घटना असल्यामुळे घटनेचा विस्तार वाढला आहे.
कलम ३७० कलम ३७१ ते कलम ३७१ (J) मध्ये राज्यांची संबंधित विशेष तरतुदी देण्यात आल्या आहेत.
भारतीय संघराज्य व्यवस्था बळकट करण्यासाठी केंद्र-राज्य संबंध तपशीलवार देण्यात आले आहेत.
मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्त्वे मूलभूत कर्तव्य यांचे विस्तृत स्पष्टीकरण घटनेमध्ये भर घालते.
इतर देशांच्या घटनांचा अभ्यास व त्या या देशातील महत्त्वाच्या कलमांचा अंतर्भाव यामुळे भारतीय राज्यघटनेचा आकार वाढला आहे.



२) राज्यघटनेचे विविध स्त्रोत rajyaghatanechi vaishishte

सुमारे ६० देशांच्या घटनांचा विचार करून त्यातील महत्त्वाच्या तरतुदींचा समावेश भारतीय घटनेमध्ये करण्यात आलेला आहे.

भारत सरकार कायदा १९३५ नुसार भारतीय राज्यघटनेचा संरचनात्मक आराखडा मांडण्यात आलेला आहे या कायद्यातील सुमारे २५० तरतुदी स्वीकारण्यात आल्या आहेत.

घटनेचा तात्विक भाग म्हणजे मूलभूत हक्क हे अमेरिकेच्या घटनेवरून स्वीकारण्यात आले आहेत तर मार्गदर्शक तत्वे आयरिश घटनेवरून घेण्यात आले आहेत.

घटनेच्या राजकीय भागाचा विचार करता ब्रिटनच्या घटनेवर आधारलेली संसदीय शासन व्यवस्था भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेली आहे.

कॅनडा जर्मनी फ्रान्स जपान दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया रशिया इत्यादी देशांच्या घटनेचा प्रभाव भारतीय राज्यघटने वरती दिसून येतो. याच कारणामुळे भारतीय राज्यघटनेला उसनी घटना(Borrowed Constitution), ठीगळांचे कार्य(patchwork), पश्चिमेचे अनुकरण(slavish imitation of the west), अशा टीका केल्या जातात. मात्र यामध्ये भारतीय परिस्थितीला अनुसरून त्यामध्ये बदल करण्यात आलेले आहे म्हणून हे सुंदर ठिकाणांचे कार्य आहे असे संबोधले जाते.

भारतीय राज्यघटनेतील तरतुदींचे महत्त्वाचे स्त्रोत पुढीलप्रमाणे…
भारत सरकार कायदा १९३५ – भारत सरकारच्या १९३५ च्या कायद्यानुसार संघराज्य व्यवस्था, न्यायव्यवस्था, लोकसेवा आयोग, आणीबाणीच्या तरतुदी, राज्यपालाचे पद, प्रशासकीय तपशील इत्यादी भाग स्वीकारण्यात आलेला आहे. भारतीय राज्यघटना ही मूलतः भारत सरकार कायदा १९३५ वर आधारित आहे. 



ब्रिटिश घटना – संसदीय शासन व्यवस्था, कॅबिनेट, द्विगृही संसद, फर्स्ट पास्ट पोस्ट सिस्टीम, कायदा करण्याची पद्धत, कायद्याचे राज्य, एकच नागरिकत्व आणि विशेषाधिकार हे ब्रिटिश घटनेवरून स्वीकारण्यात आले आहेत.


अमेरिकेची घटना – मूलभूत हक्क, उपराष्ट्रपती, न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य, न्यायिक पुनर्विलोकन, राष्ट्रपती वरील महाभियोग, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची पदावरून दूर करण्याची पद्धत याबाबी अमेरिकेच्या घटनेवरून स्वीकारण्यात आलेल्या आहेत.


कॅनडा ची घटना – प्रभावी केंद्र असलेले संघराज्य शेषाधिकार, राज्यपालाची नेमणूक, सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकारक्षेत्र या बाबी कॅनडाच्या घटनेवरून स्वीकारण्यात आलेल्या आहेत.


आयरिश घटना – मार्गदर्शक तत्त्वे, राष्ट्रपतींची निवडणूक, राज्यसभेतील सदस्यांचे नामनिर्देशन या बाबी आयरिश घटनेवरून स्वीकारण्यात आलेल्या आहेत.


ऑस्ट्रेलियाची घटना – समवर्ती सूची, संयुक्त बैठक, व्यापार व वाणिज्य चे स्वातंत्र्य या बाबी ऑस्ट्रेलियाच्या घटनेचा अभ्यास करून स्वीकारण्यात आलेल्या आहेत.


जपानची घटना – कायद्याने प्रस्थापित पद्धत


सोवियत रशिया ची घटना – मूलभूत कर्तव्य, प्रस्ताविकातील सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाचा आदर्श


वेईमर घटना (जर्मनी) – आणीबाणीच्या कालावधीतील तरतुदी व मूलभूत हक्कांमध्ये होणारा बदल


दक्षिण आफ्रिका – घटना दुरुस्ती ची पद्धत, राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक


फ्रान्सची घटना – गणराज्य, प्रास्ताविकेल स्वातंत्र्य, समता, बंधुता या गोष्टी फ्रान्सच्या घटनेवरून घेण्यात आलेल्या आहेत.


३) संघराज्य व्यवस्था (rajyaghatanechi vaishishte) – भारतीय घटनेने संघराज्य व्यवस्था स्वीकारलेली आहे संघराज्य व्यवस्थेची वैशिष्ट्ये आपल्या घटनेमध्ये आढळतात. केंद्र व घटक राज्य सरकारांचे अस्तित्व, अधिकारांची विभागणी, घटनेची स्वच्छता घटनेची ताठरता स्वतंत्र न्याय व्यवस्था द्विगृही कायदे मंडळ इत्यादी.

घटनेमध्ये गैर संघात्मक किंवा एकात्मक वैशिष्ट्ये ही आढळतात. त्यामध्ये प्रभावी केंद्रशासन एकच घटना एकेरी नागरिकत्व घटनेची लवचिकता एकात्मिक न्यायव्यवस्था अखिल भारतीय सेवा.

म्हणूनच भारतीय राज्यघटनेचे वर्णन अर्ध-संघराज्यीय (k.c. व्हेअर), वाटाघाटीचे संघराज्य (मॉरीस जोन्स) सहकारी संघराज्य (ऑस्टिन), केंद्रीकरण्याची प्रवृत्ती असलेले संघराज्य (इवोर जिनिंग)

४) संसदीय शासन पध्दती (rajyaghatanechi vaishishte)

भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार ब्रिटनच्या घटनेवरून केलेला आहे. अध्यक्षीय शासन व्यवस्थेत कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ पूर्णपणे विभक्त असतात मात्र संसदीय शासन व्यवस्थेमध्ये यांच्यामध्ये समन्वय व सहकार्य असते. संसदीय शासन व्यवस्थेमध्ये मंत्रिमंडळाचे निवड कायदे मंडळाच्या सदस्याकडून केली जाते व मंत्रिमंडळ म्हणजेच कार्यकारी मंडळ हे कायदेमंडळाला जबाबदार असते. राष्ट्रप्रमुख हे नामधारी कार्यकारी प्रमुख असतात तर शासन प्रमुख हे वास्तव कार्यकारी प्रमुख असतात.

भारतीय संसदीय शासन व्यवस्थेची वैशिष्ट्ये
राष्ट्रपती नामधारी प्रमुख पंतप्रधान वास्तव प्रमुख
मंत्री कायदेमंडळाच्या सदस्य असणे
मंत्रिमंडळाची कायदेमंडळा प्रति जबाबदारी
कनिष्ठ सभागृह चे विसर्जन
बहुमताचे सरकार
या वैशिष्ट्यामुळे संसदीय शासन व्यवस्थेला जबाबदार शासन व्यवस्था किंवा कॅबिनेट शासन व्यवस्था असेही म्हणतात. या व्यवस्थेमध्ये पंतप्रधानांची भूमिका महत्त्वाचे असल्याने पंतप्रधान शासनव्यवस्था असेही म्हटले जाते.

भारतीय संसदीय शासन व्यवस्था व ब्रिटिश संसदीय शासन व्यवस्थेमध्ये मूलभूत फरक आहे ब्रिटिश पार्लमेंट प्रमाणे भारतीय संसद सार्वभौम संस्थां नाही.

भारतीय राज्यसंस्था ही एक गणराज्य आहे व ब्रिटिश राज्यसंस्था ही राजेशाही आहे.

५) ताठर व लवचिक (rajyaghatanechi vaishishte)

भारताची राज्यघटना अति ताठर ही नाही व अति लवचिकही नाही यामुळे ताठरता व लवचिकता याचे एकत्रीकरण भारतीय राज्यघटनेमध्ये दिसून येते. ताठर घटनेची घटना दुरुस्ती पद्धत कठीण असते उलट लवचिक घटनेची घटना दुरुस्ती सोपी असते.

भारतीय राज्यघटनेच्या कलम 368 मध्ये घटना दुरुस्ती ची पद्धती देण्यात आली आहे.

घटनेच्या काही तरतुदींमध्ये बदल करण्यासाठी संसदेच्या विशेष बहुमताची आवश्यकता असते.

घटनेतील संघराज्याची वैशिष्ट्ये यामध्ये बदल करण्यासाठी वरीलप्रमाणे विशेष बहुमता बरोबरच निम्म्या राज्यांचे समर्थन आवश्यक असते.

या पद्धतीने घटना दुरुस्ती करणे अवघड असल्याने घटना ताठर मानली जाते. मात्र घटनेच्या काही तरतुदी मध्ये केवळ साध्या बहुमताने बदल करता येतो याबाबतीत घटना लवचिक आहेत.


६) संसदीय सार्वभौमत्व व न्यायिक सर्वोच्चता याचे संतुलन (rajyaghatanechi vaishishte) – भारतीय राज्यघटनेत कायदे मंडळ व न्याय मंडळ यांच्यामध्ये अधिकाराबाबत योग्य संतुलन राखण्यात आले आहे. संसदेला कायदा व घटना दुरुस्ती करण्याचे अधिकार आहेत आणि संसदेने केलेले कायदे घटनादुरुस्त्या घटनात्मक आहेत किंवा नाहीत हे ठरवण्याचा अधिकार न्यायालयांना आहे. यात न्यायालयांना सर्वोच्चता आहे. म्हणजेच भारतीय संसद पूर्णपणे सार्वभौम नाही आणि सर्वोच्च न्यायालय सुद्धा सर्वोच्च नाही तर दोघांच्या अधिकारांमध्ये संतुलन निर्माण करण्यात आलेले आहे. केशवानंद भारती खटला 1973 नुसार असे संतुलन निर्धारित करण्यात आले.

७) स्वतंत्र व एकात्मिक न्यायव्यवस्था – (rajyaghatanechi vaishishte)

भारताच्या घटनेने कायदेमंडळ कार्यकारी मंडळ यांच्याबाबतीत संघराज्य व्यवस्था निर्माण केलेली आहे मात्र न्याय व्यवस्था एकात्मिक ठेवण्यात आली आहे. एकात्मिक न्यायव्यवस्थेत सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालय अशी क्रमबद्ध शृंखला आहे. भारताच्या घटनेने सर्वोच्च न्यायालयाला संघराज्य न्यायालय, अपीलाचे न्यायालय, मूलभूत हक्काचा हमीदाता, घटनेचा संरक्षक बनवले आहे.

८) मूलभूत हक्क

लोकशाहीमध्ये नागरिकांना समान हक्क प्राप्त होतात. नागरी जीवनासाठी हे मूलभूत हक्क असतात.भारताच्या घटनेने असे हक्क उपलब्ध करून दिले आहेत. मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ट असल्याने ते प्राप्त करून घेता येतात. हे हक्क नागरिकांना शासन संस्थे विरुद्ध उपलब्ध आहेत. मूलभूत हक्क मुळे देशात राजकीय लोकशाहीच्या संकल्पनेची पूर्तता करण्याचे कार्य करतात. असे मूलभूत हक्क व मर्यादित नसून त्यावर बंधने आहेत.

९) राज्यधोरणाची मार्गदर्शक तत्त्वे (rajyaghatanechi vaishishte) –

मार्गदर्शक तत्वे भारतीय घटनेचे एक वैशिष्ट्य आहे.ही तत्वे कल्याणकारी राज्याची निर्मिती करून लोकांना सामाजिक व आर्थिक न्याय मिळवून देण्यासाठी समाविष्ट करण्यात आलेली आहेत. मार्गदर्शक तत्वे न्यायप्रविष्ट नाहीत मात्र देशाच्या प्रशासनात सरकारला मार्गदर्शक आहेत. घटनेच्या प्रारंभा नंतर मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्वे यापैकी वरचढ कोण असा प्रश्न निर्माण झाला. यावेळी मिनर्वा मिल खटला १९८० मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निवाडा दिला की भारतीय घटनेतील मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्वे संतुलनाच्या आधार शिलेवर आधारलेली आहेत.

१०) मूलभूत कर्तव्य – (rajyaghatanechi vaishishte)

स्वर्ण सिंह समितीच्या शिफारशीनुसार ४२ वी घटनादुरुस्ती १९७६ मध्ये मूलभूत कर्तव्य कलम ५१ अ मध्ये अंतर्भूत करण्यात आली. यात दहा मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट करण्यात आली. २००२ मध्ये ८६ व्या घटनादुरुस्तीने अकरावे कर्तव्य अंतर्भूत करण्यात आले.

११) आणीबाणी विषयक तरतुदी (rajyaghatanechi vaishishte)-

घटनाकर्त्यांनी कारभार चालवणे अवघड असण्याच्या स्थितीची कल्पना करून आणीबाणीची तरतूद केली. अशा कारभाराच्या स्थितीमध्ये देशाची राजकीय लोकशाही व्यवस्था व घटना यांचे संरक्षण करता यावे यासाठी आणीबाणीच्या तरतुदी दिलेल्या आहेत.

घटनेमध्ये तीन प्रकारच्या आणीबाणीची तरतूद आहे

३५२ कलमानुसार राष्ट्रीय आणीबाणी युद्ध, परकीय आक्रमण किंवा सशस्त्र उठाव या कारणावरून पुकारले जाते.
३५६ कलमा अंतर्गत घटक राज्यातील आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट स्पष्ट करण्यात आलेली आहे.
३६० कलमानुसार भारताच्या वित्तीय स्थैर्य किंवा पत धोका निर्माण झाल्यास अशी आणीबाणी पुकारता येते.



१२) एकेरी नागरिकत्व –

संघराज्य शासन व्यवस्थेत दुहेरी नागरिकत्व दिले जाते. त्यामुळे नागरिकांना राज्य सरकारचे व केंद्र सरकारचे असे दोन प्रकारचे हक्क प्राप्त होतात.भारतीय जनतेला मात्र भारतीय घटनेने एकच नागरिकत्व बहाल केलेले आहे. देशातील प्रादेशिक भिन्नता कमी करून नागरिकांमध्ये राष्ट्रवादाची एकच भावना वाढीस लावणे हा उद्देश एकेरी नागरिकत्व मागे आहे.


१३) सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धत –

भारतीय लोकशाही एक व्यक्ती एक मत या तत्वावर चालते. कलम ३२६ मध्ये सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या व्यवस्थेची तरतूद आहे. भारतीय घटनेत सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या पद्धती द्वारे राजकीय समानता प्रस्थापित करते.


१४) धर्मनिरपेक्ष राज्य (rajyaghatanechi vaishishte) –

भारतीय राज्यघटनेने धर्मनिरपेक्ष राज्याची निर्मिती केली आहे. प्रस्ताविका व्यतिरिक्त कोठेही धर्मनिरपेक्ष शब्द आढळत नाही. मात्र घटनेतील विविध तरतुदी वरून धर्मनिरपेक्षता दिसून येते.भारतात सकारात्मक धर्मनिरपेक्षता स्वीकारण्यात आलेली आहे. यामध्ये राज्य कोणत्याही धर्माचा पुरस्कार करणार नाही मात्र सर्व धर्मांना समान वागणूक दिली जाते.

राज्यपालाच्या विशेष जबाबदाऱ्या

▪️371 :-  महाराष्ट्र

👉 विदर्भ व मराठवाड्यासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळाची स्थापना करणे.


 ▪️371 :- गुजरात

👉 सौराष्ट्र व कच्छसाठी स्वंतत्र वैधानिक विकास मंडळाची स्थापना.


 ▪️371(A) :- नागालँड 

   13 (घटनादुरुस्ती ) 1962

👉 नागाहिल्स व ट्युएनसांग प्रदेशात कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित तरतुदी करणे.


▪️371(B) :- आसाम

(22(घटनादुरुस्ती) 1969 हे कलम समाविष्ठ).

👉 आदिवासी क्षेत्राच्या प्रशासनासंबंधी तरतुदी करणे.


▪️371(B) :- :-मणिपूर

(27 (घटनादुरुस्ती) 1971 ने समाविष्ठ)

👉 राज्यातील डोंगराळ प्रदेशाच्या प्रशासनासंबंधी तरतुदी करणे.


▪️371(F) :-  सिक्कीम

(36 घटनादुरुस्ती) 1975 ने समाविष्ठ)

👉  शांतता व जनतेच्या विविध गटांच्या सामाजिक आर्थिक विकास सुनिश्चित करण्यासाठी तरतुदी.


▪️371(H) :-अरुणाचल प्रदेश

 (55(घटनादुरुस्ती) 1986 ने समाविष्ट)


👉 राज्यातील कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित तरतुदी.


▪️371(D) &(E) :- आंध्रप्रदेश व तेलंगणासाठी विशेष तरतुदी


▪️371(G) :- मिझोरमसाठी

👉 (53 घटनादुरुस्ती 1986 ने समाविष्ठ)


▪️371(I) :-गोव्यासाठी विशेष तरतुदी

👉 (56 घटनादुरुस्ती 1987 ने समाविष्ठ)


▪️371(j) :-कर्नाटक - हैद्राबाद प्रदेशासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळाची स्थापना.

 👉 (98 घटनादुरुस्ती 2012 ने समाविष्ट).


पक्षांतरबंदी कायदा

५२व्या घटनादुरुस्तीअन्वये इ.स. १९८५ साली पक्षांतरबंदी कायदा करण्यात आला.

◾️यामध्ये लोकसभा व राज्य विधीमंडळातील सदस्यांना पक्षांतराच्या आधारे अपात्र ठरविण्याची तरतूद करण्यात आली आहे.

◾️तसेच यासंदर्भात विस्तृत असे १०वे परिशिष्ट समाविष्ट करण्यात आले आहे.

◾️पक्षांतरबंदी कायद्याचा प्रमुख हेतू पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या सदस्याने पक्षातच राहिले पाहिजे आणि पक्षाच्या आदेशाचे पालन केले पाहिजे हा होता.

◾️या कायद्यान्वये एखाद्या सभागृहाच्या स्वतंत्र निवडून आलेल्या सदस्याने जर अशा निवडणुकीनंतर कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश घेतला तर तो गृहाचा सदस्य राहण्यास अपात्र ठरतो.

◾️तसेच सभागृहात पदग्रहण केल्यानंतर सहा महिन्यंच्या कालावधीनंतर जर नामनिर्देशित सदस्याने कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश घेतला तर तो त्या सभागृहाचा सदस्य राहण्यास अपात्र ठरतो.

◾️ तया सदस्याचे सदस्यत्व रद्द करण्याचा अधिकार सभागृहाचा अध्यक्ष/सभापती यांना आहे.

▪️पण २/३ पेक्षा जास्त सदस्यांनी पक्षांतर केल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द होत नाही.

पोलीस भरतीसाठी येणारे भारतीय राज्यघटना मधील प्रश्नसंच

Q. भारताने राज्यघटना स्वीकार ........ रोजी केली

२६ नोव्हेंबर १९४९.


Q. भारतीय राज्य-घटना कधी अमलात आली ?

२६ जानेवारी १९५०.


Q. घटना समितीचे अध्यक्ष कोण होते ?

डॉ.राजेंद्रप्रसाद.


Q. भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी......घटना  आहे ?

लिखित.


Q. भारतीय राज्यघटना तयार  करण्यास किती कालावधी लागला ?

०२ वर्षे ११ महीने १८ दिवस.


Q. भारतीय संविधान हे ....... आहे

अंशता संघात्मक व अंशता एकात्मक.


Q. भारतात नागरिकत्व कोणत्या पद्धतीचे आहे ?

एकेरी.


Q. भारताने संसदीय शासन पद्धती  कोणत्या देशातून स्वीकारली आहे ?

इंग्लंड.


Q. संघराज्य पद्धत कोणत्या देशातून स्वीकारली आहे ?

अमेरिका.


Q. मूळ भारतीय घटनेत मूळ किती मूलभूत अधिकार होते ?

०७.


Q. ४४व्या घटनादरूुस्ती नुसार हा  मूलभूत अधिकार रद्द झाला ?

संपत्तीचा


Q. ४२व्या घटना दरुस्तीत कोणते शब्द उद्देशपत्रिकेत जोडले गेले ?

समाजवादी , धर्मनिरपेक्ष,अखंडता.


Q. मूलभूत अधिकारांशी संबंंधीत कलमे कोणती ?

कलम १२ ते ३५.


Q. संसदेशी समंधित कलम कोणते ?

कलम ७९ ते १२२.


Q. राज्यसभेत सर्वात जास्त प्रतींनिधी कोणत्या राज्यांचे असतात ?

उत्तर प्रदेश.


Q. घटने नुसार राज्यसभेची कमाल सदस्य संख्या किती ?

२५०.


Q. संसदेच्या दोन अधिवेशना मधील कालावधी जास्तीत जास्त ----एवढा असावा ?

सहा महिने.


Q. राज्य मंत्रिमंडळ संयुक्तपणे कोणाला जबाबदार असते ?

विधानसभा.


Q. संसदेच्या दोन्ही सभागहृाचे निर्वाचित सदस्य कोणाची निवड करतात ?

उपराष्ट्रपती.


Q. राज्याच्या आर्थिक व्यवहारावर पुर्ण नियंत्रण कोणाचे असते ?

विधिमंडळाचे.


Q. महाराष्ट्राच्या विधान सभेत  निर्वाचित सभासदाची संख्या किती असते ?

२८८


Q. मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण हे राज्याचे ----- कार्य होत ?

कल्याणकारी.


Q. ----- हा राज्याचा नामधारी प्रमुख असतो ?

राज्यपाल.


Q. शेती  हा विषय कोणत्या सूचित देण्यात आला आहे ?

राज्यसूची.


Q. विधान परिषदेच्या सदस्याचा कार्यकाळ किती असतो ?

०६ वर्षे.


Q. लोकसभा हे कोणते सभागृह आहे ?

अस्थायी.


Q. एखादे विधेयक हे धन विधेयक आहे की नाही हे ठरवण्याचे अधिकार कोणाचा असतो ?

लोकसभा अध्यक्ष


Q. संकटकालीन काळात लोकसभा किती ने वाढवण्यात येते ?

०१ वर्षानी.


Q. संघसूचित किती विषयाचा समावेश आहे ?

९७.


Q. राज्यसूचित किती विषयाचा समावेश आहे ?

६६


Q. संमवर्ती सूचित किती विषय आहे ?

४७.


Q. संमवती सूचित विषय वर कायदा कोण बनवू शकते ?

केंद्र व राज्य सरकार.


Q. लोकसभेचे मुदतपूर्व विर्सजन करण्याचा अधिकार कोणास आहे ?

राष्ट्रपती.


Q. राष्ट्रपति कोणत्या कलम ने  संपूर्ण देशात आणीबाणी लावू शकतात ?

३५२.


Q. आतापर्यत भारतात किती वेळा राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आली ?

०३ वेळा.


Q. दुहेरी शासन व्यवस्था असलेल्या पद्धतीला काय म्हणतात ?

संघराज्य.


Q. स्वातंत्राच्या हक्काचा समावेश भारतीय राज्य घटनेच्या ----- या 

कलमात करण्यात आला आहे ?

कलम १९ ते २२.


Q. भारतीय संसदेतील सर्वात मोठी समिती कोणती ?

अंदाज समिती.


Q. ४२ वी घटना दुरुस्ती खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत कार्यात आली  होती ?

१९७६.


Q. जास्तीत जास्त किती दिवस अर्थ विधेयक राज्यसभा स्वत: कडे ठेवू

शकते ?

१४ दिवस.


Q. घटना परिषदेची निर्मिती ---- मध्ये कॅबिनेट मिशन च्या शिफारशी नुसार झाली ?

२४ मार्च १९४६.


Q. भारतात घटनात्मक रित्या किती भाषाना मान्यता देण्यात आली ?

२२.


Q. पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कधी घेण्यात आल्या होत्या ?

१९५२.


Q. वटहुकुम राष्ट्रपती कोणत्या कलम ने काढतात?

१२३.


Q. घटना समितेचा पहिले अधिवेशन केव्हा झाले ?

०९ डिसेंबर १९४६.

सराव प्रश्नसंच

1) आर्थिक आणीबाणी राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार लागते ?

अ) कलम ३५२

ब) कलम ३५६

क) कलम ३६०

ड) कलम ३६२

=======================

 उत्तर............ क) कलम ३६० 

=======================

२) ४४ व्या घटनादुरुस्तीने कलम ३५२ मधील कोणती तरतूद बदलण्यात आली ?

अ) युद्ध

ब) परकीय आक्रमण

क) अंतर्गत अशांतता

ड) वरीलसर्व

==========================

 उत्तर......... क) अंतर्गत अशांतता 

==========================

३) कोणतेही विधेयक (धनविधेयक सोडून) विधान परिषद किती दिवस विलंब करू शकते ?

अ) दोन महिने

ब) तीन महिने

क) चार महिने

ड) सहा महिने

=====================

 उत्तर....... क) चार महिने  

=====================

४) भारतात कोणत्या केंद्रशाशीत प्रदेशाला स्वतःचे उच्च न्यायालय आहे ?

अ) चंडीगड

ब) लक्षद्वीप

क) दिल्ली

ड) महाराष्ट्र

=====================

 उत्तर..... क) दिल्ली  

=====================

५) कनिष्ठ न्यायालयावर देखरेख करण्याचा अधिकार कुणाला आहे ?

अ) उच्च न्यायालय

ब) सर्वोच्य न्यायालय

क) दोन्ही

ड) यापैकी नाही 

========================

 उत्तर........ अ) उच्च न्यायालय 

========================

६) कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालयात याचिका दाखल करता येते ?

अ) कलम १३

ब) कलम ३२

क) कलम २२६

ड) यापैकी नाही

=====================

 उत्तर....... क) कलम २२६  

=====================

७) केंद्र व राज्य यांच्यातील संबधावर प्रकाश टाकण्यासाठी १९८३ मध्ये कोणत्या आयोगाची नेमणूक करण्यात आली ?

अ) राजमन्नार आयोग

ब) सच्चर आयोग

क) सरकारिया आयोग

ड) व्ही. के. सिंग

==========================

 उत्तर....... क) सरकारिया आयोग 

==========================

८) राज्य घटनेतील कोणत्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली आहे ?

अ) कलम २८०

ब) कलम २८२

क) कलम २७५

ड) कलम २८४

=====================

 उत्तर....... अ) कलम २८० 

=====================

९) आंतरराज्जीय नदी विवाद सोडविण्यासाठी राज्य घटनेत कोणत्या कलमाची तरतूद करण्यात आली आहे ?

अ) कलम २६१

ब) कलम २६२

क) कलम २६३

ड) कलम २६४

=====================

 उत्तर....... ब) कलम २६२ 

=====================

१०) निवडणूक आयोगाची तरतूद कोणत्या कलमानुसार राज्यघटनेत आहे ?

अ) कलम ३२४

ब) कलम ३२५

क) कलम ३२६

ड) कलम ३२७

=====================

 उत्तर........ अ) कलम ३२४ 

=====================

११) खालीलपैकी कोणती समिती निवडणुका सुधारनांशी संबंधित नाही ?

अ) संथानाम समिती 

ब) वांछू व गोस्वामी समिती 

क) तारकुंडे समिती 

ड) गोपालकृष्णन समिती 

========================

 उत्तर....... अ) संथानाम समिती 

========================

१२) राष्टीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

अ) पाच वर्षे

ब) सहा वर्षे 

क) तीन वर्षे

ड) दोन वर्षे

=====================

 उत्तर........ अ) पाच वर्षे  

=====================

१३) राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी कुणाची नियुक्ती होते ?

अ) उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश

ब) सर्वोच्य न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश

क) उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश

ड) सर्वोच्य न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश

=====================

 उत्तर...... पर्याय (ड) 

=====================

१४) आचारसंहिता तयार करण्याचे काम कोण करते ?

अ) केंद्र सरकार

ब) राज्य सरकार

क) जिल्हाधिकारी

ड) निवडणूक आयोग

========================

 उत्तर....... ड) निवडणूक आयोग 

========================

१५) कलम १६९ नुसार विधानपरिषदेची निर्मिती करण्याचा अधिकार कुणाला असतो ?

अ) केंद्र

ब) राज्य

क) दोन्ही

ड) यापैकी नाही

=====================

 उत्तर.......... ब) राज्य  

=====================


भारतीय संविधान :


1. भारतीय राज्यघटनेच्या ----- कलमानुसार स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे?

 19 ते 22

 31 ते 35

 22 ते 24

 31 ते 51

उत्तर : 19 ते 22


2. राज्यसभेचे सभापती आपला राजीनामा ----- यांच्याकडे सादर करतात.

 राष्ट्रपती

 उपराष्ट्रपती

 पंतप्रधान

 राज्यपाल

उत्तर : राष्ट्रपती


3. सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायधिशांची नेमणूक ----- करतात?

 राष्ट्रपती

 राज्यपाल

 पंतप्रधान

 सरन्यायाधिशांच्या सल्ल्याने राष्ट्रपती

उत्तर : सरन्यायाधिशांच्या सल्ल्याने राष्ट्रपती


4. ----- रोजी पंडित नेहरूंची घटनेची उद्देशपत्रिका/प्रस्तावना लिहिली?

 11 डिसेंबर 1946

 29 ऑगस्ट 1947

 10 जानेवारी 1947

 9 डिसेंबर 1946

उत्तर : 11 डिसेंबर 1946


5. भारतीय राज्यघटेनेच्या ----- परीशिष्टात विविध शपथ व नमुने दिलेले आहेत.

 परिशिष्ट-1

 परिशिष्ट-2

 परिशिष्ट-3

 परिशिष्ट-4

उत्तर : परिशिष्ट-3


6. सध्या समावर्ती सूचीमध्ये ----- विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे.

 47

 48

 52

 यापैकी नाही

उत्तर : 47


7. भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?

 डॉ. आंबेडकर

 डॉ. राजेंद्रप्रसाद

 पंडित नेहरू

 लॉर्ड माऊंटबॅटन

उत्तर : डॉ. राजेंद्रप्रसाद


8. घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?

 डॉ. राजेंद्रप्रसाद

 डॉ. आंबेडकर

 महात्मा गांधी

 पंडित नेहरू

उत्तर : डॉ. आंबेडकर


9. खालीलपैकी संसदेचे स्थायी सभागृह कोणते?

 लोकसभा

 विधानसभा

 राज्यसभा

घटनात्मक आयोग

उत्तर : राज्यसभा


10. लोकसभापतीची निवड कोण करतो/करते?

 लोकसभा सदस्य

 मंत्रीमंडळ

 राज्यसभा सदस्य

 राष्ट्रपती

उत्तर :  लोकसभा सदस्य


11. लोकसभेची मुदत किती वर्ष असते?

 1.8 वर्षे

 6 वर्षे

 4 वर्षे

 5 वर्षे

उत्तर : 5 वर्षे


12. राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो?

 राष्ट्रपती

 सभापती

 उपराष्ट्रपती

 पंतप्रधान

उत्तर : उपराष्ट्रपती


13. खालीलपैकी राज्यसूचीतील विषय कोणता?

 संरक्षण

 तार

 पोस्ट

 जमिनमहसूल

उत्तर : जमिनमहसूल


14. लहान मुलाला प्रथम नागरीकत्वाचे धडे ----- पासून मिळतात.

 कुटुंब

 शाळा

 दोन्हीही

 मंदिर

उत्तर : दोन्हीही


15. भारताचा घटनात्मक प्रमुख कोण असतो?

 राष्ट्रपती

 उपराष्ट्रपती

 पंतप्रधान

 सरन्यायधीश

उत्तर : राष्ट्रपती


16. भारतात कोणत्या प्रकारातील शासनप्रणाली आहे?

 लष्करी

 अध्यक्षीय

 हुकूमशाही

 संसदीय

उत्तर : संसदीय


17. राष्ट्रपती राज्यसभेवर किती खासदार नेमतात?

 18

 12

 16

 20

उत्तर : 12


18. राज्यघटनेमध्ये एकूण सूची किती?

 2

 1

 3

 4

उत्तर : 3


19. योजना आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात?

 राष्ट्रपती

 उपराष्ट्रपती

 पंतप्रधान

 अर्थमंत्री

उत्तर : पंतप्रधान


20. राज्यसभेच्या सदस्याचा कालावधी किती वर्षे असतो?

 4 वर्षे

 5 वर्षे

 6 वर्षे

 कायमस्वरूपी

उत्तर : 6 वर्षे

लॉर्ड कर्झन (१८९९-१९०५)

👉 लॉर्ड कर्झन १८९९ मध्ये व्हाइसरॉय म्हणून भारतात आला. 

कर्झन भारतास आशियाचा राजकीय आधारस्तंभ समजत. व्हाइसरॉयपदी येण्यापूर्वी कर्झन भारतात चार वेळा आलेला होता. 

१८९९-१९०० दरम्यान भारतात दुष्काळाबरोबर एन्फ्ल्युएंझा व मलेरियाची साथ पसरली. दुष्काळाची व्याप्ती महाराष्ट्र व गुजरातमध्ये होती. 

दुष्काळ निवारणार्थ व्हाइसरॉय कर्झनने १९०१ मध्ये लॉर्ड मॅक्डोनल समिती नेमली. 

१९०१ मध्ये वायव्य सरहद्द प्रांत निर्माण करून टोळीवाल्यांचा बंदोबस्त केला. १९०० चा कलकत्ता कॉर्पोरेशन कायदा केला. 

कर्झन स्थानिक स्वराज्य संस्थांचा कट्टर शत्रू समजला जात होता. 

१८९९ मध्ये कर्झनने भारतीय चलन कायदा संमत करून भारतासाठी सुवर्णप्रमाण स्वीकारले. 

पोलीस खात्यातील अकार्यक्षमता व भ्रष्टाचार आदी गरकारभाराची चौकशी करण्यासाठी अ‍ॅन्ड्र फ्रेझर समिती १९०२ मध्ये नेमली. 

कर्झनने १९०५ मध्ये पोलीस खात्याची पुनर्रचना केली. १९०२ साली सर रॅली यांच्या अध्यक्षतेखाली युनिव्हर्सिटी कमिशन नियुक्त केले व या कमिशनच्या शिफारशीनुसार १९०४ मध्ये हिंदी विद्यापीठाचा कायदा संमत केला. 

१९०१ मध्ये संस्थानिक राजपुत्रांकरिता इंपीरिअल कॅडेट कोअरची स्थापना केली. १९०१ मध्ये इंग्लंडच्या व्हिक्टोरिया राणीचा मृत्यू झाला. 

१९०३ मध्ये दुसरा दिल्ली दरबार भरवून अमाप पसा खर्च केला. 

कर्झनने पुराणवस्तू संशोधन खाते निर्माण केले. त्यासाठी प्राचीन स्मारक कायदा संमत करून घेतला. त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी घोडचूक म्हणजे ७ जुल १९०५ रोजी केलेली बंगालची फाळणी ही होय.

 तिचा मुख्य उद्देश प्रशासकीय कारणापेक्षा हिंदू-मुस्लीम फूट पाडणे हा होता. 

सरकारी यंत्रणेची कार्यक्षमता वाढविण्यासाठी एक नियमावली तयार करून त्याने राजकारणात कार्यक्षमता या बाबीला महत्त्व दिले. 

कर्झनने भारतात आल्यानंतर १२ खाती नेमून विविध समित्या नेमल्या. त्यामुळे त्याची कारकीर्द समिती प्रशासन म्हणतात. लष्कर सरसेनापती, परंतु फाळणी प्रकरणामुळे तो बराच वादग्रस्त ठरला.


👉 कर्झनच्या शेती सुधारणा :

१९०० मध्ये पंजाबात जमिनीच्या हस्तांतरणाचा कायदा अमलात आणला. ज्याअन्वये शेतकऱ्यांव्यतिरिक्त इतरांना जमिनी घेण्यास बंदी घातली. 

१९०१ मध्ये शेतकी खात्याची स्थापना केली. त्याने कृषी महानिरीक्षकाची नेमणूक केली. बंगाल प्रांतातील पुसा येथे कृषी संशोधन केंद्राची स्थापना केली. सावकारांच्या पाशातून शेतकऱ्याची मुक्ती होण्यासाठी १९०४ मध्ये सहकारी पतपेढी कायदा केला. 

कर्झनच्या कालावधीत पुष्कळ नवीन रेल्वेमार्ग (सहा हजार मल लांब) बांधले. रेल्वे कारभारात कार्यक्षमतेसाठी सर रॉबर्टसन समिती नेमली. 

कर्झनने ताजमहलचे सौंदर्य वाढविण्यासाठी इराणहून दिवे आणले. ब्रिटिश साम्राज्याचे वैभव दर्शविण्यासाठी कलकत्ता येथे राणी व्हिक्टोरियाच्या स्मरणार्थ व्हिक्टोरिया मेमोरिअल हॉल उभारला. 

कर्झनने बंगलोर येथे सर जमशेदजी टाटा विज्ञान संस्थेची स्थापना केली. 

सामान्यज्ञान प्रश्नोत्तरे इतिहास (भारत)(History)


1. १८५७ च्या उठावाच्या वेळी झाशी येथे कोणाचे राज्य होते?

राणी लक्ष्मीबाई 

पेशवे नानासाहेब ✅

बहादूरशहा जफर

ईस्ट इंडिया कंपनी


2. न्यायमूर्ती रानडे यांनी कोणत्या उद्देशाने सामाजिक परिषदेची स्थापना केली?

राजकीय प्रश्नावर चर्चा करण्याकरिता  

सामाजिक प्रश्नाला राजकीय व्यासपीठ मिळवून देण्याकरिता ✅

सामाजिक प्रश्नावर चर्चा करण्याकरिता

भारतीय लोकांच्या आर्थिक प्रश्नाचा अभ्यास करण्याकरिता 


3. खालीलपैकी ............. येथे १८५७ चा उठाव झाला नव्हता?

अलाहाबाद  

दिल्ली

मद्रास ✅

रामनगर


4. ……… या संतांचे गुरू जनार्दन स्वामी होते?

संत ज्ञानेश्वर 

संत एकनाथ ✅

संत तुकाराम

संत नामदेव


5. १९१९ मध्ये सातारा जिल्याह्यात रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली?

कर्मवीर वि.रा. शिंदे 

कर्मवीर भाऊराव पाटील ✅

छत्रपीत शाहू महाराज

भास्करराव जाधव


6. सत्तीची चाल बंद व्हावी म्हणूण बंगाल प्रांतात कोणी आंदोलन सुरु केले होते?

राजा राममोहन रॉय ✅  

ईश्वरचंद्र विद्यासागर

व्दारकाप्रसाद टागोर

केशवचंद्र सेन


7. इंग्लंडप्रमाणे भारतातही पार्लमेंट असावी अशी मागणी कोणी होती?

लोकमान्य टिळक  

महात्मा गांधी

गोपाळ हरी देशमुख ✅

न्यायमूर्ती रानडे


8. साता-याचा राजा प्रतापसिंहाने आपला वकील म्हणून इंग्लंडला कोणास पाठविले होते?

रंगो बापूजी ✅

तात्या टोपे

अजीमुल्ला खान

अहमदशहा 


9. मद्रास येथे होमरूल लीगची स्थापना कोणी केली?

लोकमान्य टिळक 

गोपाळ कृष्ण गोखले

डॉ. अॅनी  बेझंट ✅

सरोजिनी नायडू


10. कोणत्या राज्यात नामदेवांची अनेक मंदिरे आहेत?

मध्य प्रदेश 

बिहार

पंजाब ✅

गुजरात


१) भारतात सती प्रथा बंद आंदोलन कोणी सुरु केले?

A. जगन्नाथ शंकरशेठ✅

B. राजा राममोहन रॉय 

C. ईश्वरचंद्र विघासागर

D. केशवचंद्र सेन


२) इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र कोणी सुरु केले होते?

A. शिवराज परांजपे 

B. सेनापती बापट

C. महंमद इकबाल

D. महात्मा गांधी✅


३) ज्ञानेश्रर महाराजांनी भगवदगीतेवर कोणता ग्रंथ लिहिला?

A. भावार्थदिपिका 

B. अमॄतानुभव

C. ज्ञानेश्वरी✅

D. हरिपाठ


४) इ.स १३५० मध्ये संत नामदेवांनी कोठे समाधी घेतली?

A. देहू 

B. आळंदी

C. पैठण

D. पंढरपूर✅


५) दासबोध हा ग्रंथ कोणत्या संताचा आहे?

A. रामदास स्वामी✅ 

B. चांगदेव

C. संत तुकाराम

D. संत सावता माळी


६) शाळेत शिक्षण घेत असतानाच मराठी व्याकरणाचे पुस्तक लिहिणारे?

A. विष्णूशास्त्री पंडित 

B. लोकहितवादी

C. दादोबा पांडुरंग तर्खडकर✅

D. बाळशास्त्री जांभेकर


७) महर्षि धोंडो केशव कर्वे यांना कोणत्या विद्यापीठाने एल.एल.डी. ही पदवी देऊन सन्मानित केले?

A. बनारस विद्यापीठ 

B. पुणे विद्यापीठ

C. श्रीमती ना.दा.ठाकरसी महिला विद्यापीठ

D. मुंबर्इ विद्यापीठ✅


८) १९५० मध्ये जगदंब कुष्ठ निवासाची स्थापना कोणी केली?

A. डॉ. शिवाजीराव पटवर्धन✅ 

B. डॉ. बाबासाहेब आंबेडकर

C. बाबा आमटे

D. छत्रपती शाहू महाराज


९) ज्ञानेश्वर महाराजांचे समकालीन संत कोण होते?

A. संत रामदास 

B. संत नामदेव✅

C. संत तुकाराम

D. संत एकनाथ


१०) स्थानिक स्वराज्य संस्थाचा कायदा कोणी केला?

A. रिपन✅

B. लिटन

C. डफरीन 

D. कॉर्नवॉलिस.


इतिहास : सराव प्रश्नसंच


*१) भारतात सती प्रथा बंद आंदोलन कोणी सुरु केले?*

A. जगन्नाथ शंकरशेठ✅

B. राजा राममोहन रॉय 

C. ईश्वरचंद्र विघासागर

D. केशवचंद्र सेन


*२) इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र कोणी सुरु केले होते?*

A. शिवराज परांजपे 

B. सेनापती बापट

C. महंमद इकबाल

D. महात्मा गांधी✅


*३) ज्ञानेश्रर महाराजांनी भगवदगीतेवर कोणता ग्रंथ लिहिला?*

A. भावार्थदिपिका 

B. अमॄतानुभव

C. ज्ञानेश्वरी✅

D. हरिपाठ


*४) इ.स १३५० मध्ये संत नामदेवांनी कोठे समाधी घेतली?*

A. देहू 

B. आळंदी

C. पैठण

D. पंढरपूर✅


*५) दासबोध हा ग्रंथ कोणत्या संताचा आहे?*

A. रामदास स्वामी✅ 

B. चांगदेव

C. संत तुकाराम

D. संत सावता माळी


*६) शाळेत शिक्षण घेत असतानाच मराठी व्याकरणाचे पुस्तक लिहिणारे?*

A. विष्णूशास्त्री पंडित 

B. लोकहितवादी

C. दादोबा पांडुरंग तर्खडकर✅

D. बाळशास्त्री जांभेकर


*७) महर्षि धोंडो केशव कर्वे यांना कोणत्या विद्यापीठाने एल.एल.डी. ही पदवी देऊन सन्मानित केले?*

A. बनारस विद्यापीठ 

B. पुणे विद्यापीठ

C. श्रीमती ना.दा.ठाकरसी महिला विद्यापीठ

D. मुंबर्इ विद्यापीठ✅


*८) १९५० मध्ये जगदंब कुष्ठ निवासाची स्थापना कोणी केली?*

A. डॉ. शिवाजीराव पटवर्धन✅ 

B. डॉ. बाबासाहेब आंबेडकर

C. बाबा आमटे

D. छत्रपती शाहू महाराज


*९) ज्ञानेश्वर महाराजांचे समकालीन संत कोण होते?*

A. संत रामदास 

B. संत नामदेव✅

C. संत तुकाराम

D. संत एकनाथ


*१०) स्थानिक स्वराज्य संस्थाचा कायदा कोणी केला?*

A. रिपन✅

B. लिटन

C. डफरीन 

D. कॉर्नवॉलिस.


विभक्ती व त्याचे प्रकार

🔰 नामे व सर्वनामे यांचा वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना ‘विभक्ती’ असे म्हणतात.


🔰 नामाचे किंवा सर्वनामचे रूप तयार करण्यास त्याला जी अक्षरे जोडली जातात त्यांना ‘प्रत्यय’ असे म्हणतात.


🔰 नामांच्या किंवा सर्वनामांच्या क्रियापदांशी किंवा इतर शब्दांशी असणारा संबंध 8 प्रकारचा असतो, म्हणून विभक्तीचे एकूण 8 प्रकार पडतात.


⭕️ परथमा – प्रत्यय नाहीत – प्रत्यय नाहीत – 

      कर्ता


⭕️ वदितीया – स, ला, ते – स, ला, ना, ते – 

      कर्म


⭕️ ततीया – ने, ए, शी – ने, शी, ही, ई – करण


⭕️ चतुर्थी – स, ला ते – स, ला, ना, ते – 

      संप्रदान


⭕️ पचमी – ऊन, हून – ऊन, हून – अपादान


⭕️ षष्टी – चा, ची, चे – चा, ची, चे – संबंध


⭕️ सप्तमी – त, ई, आ – त, ई, आ – 

     अधिकरण


⭕️ सबोधन – नो – संबोधन

इतिहासाचे महत्त्वाचे प्रश्न व उत्तरे.

[प्र.१] 'नेटिव्ह इंप्रूव्मेंट सोसायटी'ची स्थापना कोणी केली?

अ] बाबा पदमनजी

ब] ना. म. जोशी

क] बाळशास्त्री जांभेकर

ड] गोपाळ हरी देशमुख


उत्तर

क] बाळशास्त्री जांभेकर 

-------------------

[प्र.२] 'लक्ष्मीज्ञान' हा ग्रंथ कोणी लिहिला?

अ] गोपाळ कृष्ण गोखले

ब] आचार्य अत्रे

क] गोपाळ हरी देशमुख

ड] साने गुरुजी


उत्तर

क] गोपाळ हरी देशमुख 

-------------------

[प्र.३] १९२१ च्या राष्ट्रीय सभेच्या अहमदाबाद अधिवेशनाचे अध्यक्ष चित्तरंजन दास हे तुरुंगात असल्यामुळे त्यांच्या ऐवजी __________ यांनी प्रभारी अध्यक्षपद भूषवीले.

अ] मौलाना महमद अली

ब] हाकीम अजमल खान

क] बॅ. हसन इमाम

ड] मदन मोहन मालवीय


उत्तर

ब] हाकीम अजमल खान 

{हाकीम अजमल खान हे चित्तरंजन दास यांचे जवळचे मित्र होते. १९२२ च्या गया अधिवेशनाचे अध्यक्षपद चित्तरंजन दास यानी भूषवीले.} 

-------------------

[प्र.४] 'देशप्रेमाने ओथम्बलेला हिमालायासारखा उत्तुंग महापुरुष' असे वासुदेव बळवंत फडके यांचे वर्णन कोणत्या वृत्तपत्राने केले?

अ] केसरी

ब] मराठा

क] अमृतबझार पत्रिका

ड] तरुण मराठा


उत्तर

क] अमृतबझार पत्रिका 

{१८७९ साली फडकेंच्या आटकेनंतर हा लेख छापून आला होता.} 

-------------------

[प्र.५] २३ मार्च १९१८ रोजी मुंबई येथे भरविण्यात आलेल्या 'अस्पृश्यता निवारक परिषदेचे' अध्यक्ष कोण होते?

अ] शाहू महाराज

ब] वि. रा. शिंदे

क] सयाजीराव गायकवाड

ड] बाबासाहेब आंबेडकर


उत्तर

क] सयाजीराव गायकवाड 

{अस्पृश्यता निवारणाची पहिली परिषद.} 

-------------------

[प्र.६] १९४१ साली _______ यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे 'संयुक्त महाराष्ट्र सभा' स्थापन झाली.

अ] रामराव देशमुख

ब] टी. जे. केदार

क] शंकरराव देव

ड] स. का. पाटील


उत्तर - अ] रामराव देशमुख 

रामराव देशमुख-१९४१-संयुक्त महाराष्ट्र सभा 

टी. जे. केदार-१९४२-महाराष्ट्र एकीकरण परिषद 

शंकरराव देव-१९४६-संयुक्त महाराष्ट्र समिती[बेळगाव] 

-------------------

[प्र.७] १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्यात ____ प्रमुख विभाग व __ जिल्हे होते.

अ] ४ प्रमुख विभाग व २४ जिल्हे

ब] ४ प्रमुख विभाग व २६ जिल्हे

क] ५ प्रमुख विभाग व २४ जिल्हे

ड] ५ प्रमुख विभाग व २६ जिल्हे


उत्तर

ब] ४ प्रमुख विभाग व २६ जिल्हे 

{विभाग- मुंबई , पुणे , नागपूर, औरंगाबाद} 

{जिल्हे २६ होते. नंतर ९ जिल्ह्यांचे विभाजन होऊन आता ३५ जिल्हे आहेत.} 

-------------------

 [प्र.८] ११ डिसेंबर १९४६ रोजी दिल्ली येथे झालेल्या घटना समितीच्या बैठकीत _ _ _ _ _ _ यांची संविधान समितीचे कायमस्वरूपी उपाध्यक्ष म्हणून निवड झाली.

अ] पंडित नेहरू

ब] वल्लभभाई पटेल

क] जे. बी. क्रपलनी

ड] एच. सी. मुखर्जी


उत्तर - ड] एच. सी. मुखर्जी 

{त्याआधी फ्रँक अँथोनी हे हंगामी उपाध्यक्ष होते} 

-------------------

[प्र.९] घटना समितीच्या झेंडा समितीचे अध्यक्ष कोण होते?

अ] पंडित नेहरू

ब] जे. बी. क्रपलनी

क] वल्लभभाई पटेल

ड] डॉ. राजेन्द्रप्रसाद


उत्तर- ब] जे. बी. क्रपलनी 

-------------------

[प्र.१०] ९२वी घटना दुरुस्ती कोणत्या परिशिष्टाशी संबधित आहे?

अ] सातव्या

ब] आठव्या

क] नवव्या

ड] दहाव्या


उत्तर - ब] आठव्या 

{९२वी घटना दुरुस्ती(२००३)- बोडो, डोंगरी, मैथिली, संथाळी या चार भाषांचा आठव्या परिशिष्टामध्ये समावेश करण्यात आला.}


34. वसईचा प्रसिध्द तह कोणत्या वर्षी घडून आला ? 

A. सन 1801 

B. सन 1802 ✔️

C. सन 1803 

D. सन 1818 


35. तैनाती फौज भारतात कोणी सुरू केली ? 

A. अकबर 

B. औरंगजेब 

C. लॉर्ड वेलस्ली ✔️

D. लॉर्ड कॉर्नवालीस 


36. सतीबंदीचा कायदा कोणत्या वर्षी पास झाला ? 

A. सन 1829 ✔️

B. सन 1859 

C. सन 1929 

D. सन 1959 


37. विधवा पुर्नविवाहाचा कायदा कधी पास झाला ? 

A. सन 1926 

B. सन 1936 

C. सन 1946 

D. सन 1956 ✔️


38. इंग्रजांनी भारतातील पहिली वखार कोठे उभारली ? 

A. चंद्रनगर 

B. सुरत ✔️

C. कराची 

D. मुंबई 


39. कोणत्या साली भारतात विद्यापीठ कायदा पास झाला ? 

A. सन 1834 

B. सन 1864 

C. सन 1894 

D. सन 1904 ✔️


40. भारतात येणारे पहिले युरोपियन कोण ? 

A. इंग्रज 

B. फ्रेंच 

C. डच 

D. पोर्तुगीज ✔️


41. नेफा हे ______ चे जुने नाव आहे. 

A. मणिपूर 

B. मेघालय 

C. अरुणाचल प्रदेश ✔️

D. त्रिपुरा 


42. खालीलपैकी भाषिक आधारावर निर्मिती झालेले पहिले राज्य कोणते ? 


A. महाराष्ट्र 

B. आंध्रप्रदेश ✔️

C. गुजरात 

D. आसाम 


43. IIM मध्ये प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणती प्रवेश परीक्षा द्यावी लागते ? 

A. NET 

B. JEE 

C. GATE 

D. CAT ✔️


44. भारत सरकार कोणत्या दिवशी 'राष्ट्रीय मतदार दिन' म्हणून साजरा करते ? 

A. 12 जानेवारी 

B. 15 जानेवारी 

C. 25 जानेवारी ✔️

D. 26 जानेवारी 


45. स्वतंत्र तेलंगणाची मागणी कशावर आधारलेली होती ? 


A. भाषिक महत्त्वाकांक्षा 

B. प्रादेशिक असंतुलन ✔️

C. फुटीरतावादी राजकारण 

D. राज्याच्या स्वायत्ततेशी 


46. मोटार वाहनांमुळे _____________ प्रकारचे प्रदूषण होते . 

A. हवेमधील 

B. प्राथमिक 

C. दुय्यम 

D. प्राथमिक व दुय्यम दोन्ही प्रकारचे ✔️


47. ई-मेलचा अर्थ ________________ असा आहे. 

A. इलेक्ट्रॉनिक मेल ✔️

B. इलेक्ट्रिकल मेल 

C. इलेक्ट्रोमॅग्नेटीक मेल 

D. इलेक्ट्रोस्टॅटीक मेल 


48. खालीलपैकी कोणत्या महामार्गावर 'खंबाटकी घाट' लागतो ? 

A. मुंबई-पुणे 

B. मुंबई-गोवा 

C. मुंबई-आग्रा 

D. पुणे-बेंगळूरु ✔️


49. खालीलपैकी कोणता प्रत्यक्ष कर आहे ? 

A. व्यवसाय कर ✔️

B. मूल्यवर्धित कर 

C. सेवा कर 

D. विक्री कर 


50. महाराष्ट्रातील आदिवासी विकासाच्या चळवळीशी कोण संबंधित नव्हते ? 

अ. सेनापती पांडुरंग बापट   ब. अनुताई वाघ   क. ताराबाई मोडक   ड.केशवराव जेधे 

A. ब, ड 

B. अ, क 

C. अ, ड ✔️

D. ब, क

महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नसंच

१) खालील पैकी कोणाचा अखिल भारतीय कांग्रेस पक्षाच्या स्थापनेत सहभाग होता ?
अ) श्री. डब्ल्यू . सी. बॅनर्जी
ब)  श्री. दिनशॉ वाच्छा
क) श्री. विल्यम वेडेरबर्न
ड) वरील सर्व.

२) खालीलपैकी कोणती संघटना कांग्रेस प्रणित नाही?
अ) कांग्रेस सेवा दल
ब)  युक्रांद
क) एन एस यू आय
ड) आय एन टी यू सी

३) कांग्रेस पक्षातील हाय कमांड म्हणजे खालीलपैकी कोण असते?
अ) पक्षाध्यक्ष
ब) पक्ष उपाध्यक्ष
क) कांग्रेस कार्यकारी समिती 
ड) यापैकी नाही

४) खालीलपैकी योग्य विधाने निवडा.
१) राष्ट्रीय कॉंग्रेस ही लोकशाही तत्वावर आधारित असलेली संघटना होती.
२) १८८५ साली राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना झाली.
३) राष्ट्रीय सभेवर गांधीजींच्या विचारांचा प्रभाव असला तरी दुसऱ्या महायुद्धात भारताने इंग्रजांना मदत करावी या गांधीजींच्या निर्णयाविरुद्ध राष्ट्रीय सभेने ठराव संमत केला होता.

अ) फक्त १ व ३
ब) फक्त १ व २
क) फक्त २ व ३
ड) वरील सर्व 

५) कॉंग्रेसमधील जहाल व मवाळ गटातील प्रमुख पूरक असलेले पर्याय निवडा ? 
१) विचारसरणीत  भिन्नता 
२) आंदोलन मार्गातील भिन्नता 
३) मागण्यात  भिन्नता 
४) स्वराज्य व स्वातंत्र्य मुद्यावर मतभेद 

अ) १, ३ व ४
ब) २, ३ व ४
क) १, २ व ३
ड) १, २ व ४

६)  खालीलपैकी कोणते उद्दिष्ट कॉंग्रेसच्या स्थापनेशी संबंधित नाही ?
   
अ) भारतीय लोकाचा असंतोष कमी करणे.
ब) इंग्रज प्रशासनाच्या चुका दुरुस्त करणे 
क) विविध प्रश्नावर लोकमत तयार करणे 
ड) जहाल व मवाळामध्ये समन्वय प्रस्थापित करणे

७) भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर राष्ट्रीय सभा बरखास्त करण्यात यावी असे खालीलपैकी कोणाचे मत होते ?

अ) सी. राजगोपालाचारी  
ब) आचार्य कृपलानी 
क) महात्मा गांधी 
ड) जयप्रकाश नारायण 

८) खालीलपैकी कोणती योजना कांग्रेस कार्यकाळातील नाही ?
अ) मनरेगा
ब) किसान विकास पत्र
क) सुकन्या समृद्धी
ड) अन्न सुरक्षा

९) २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला पूर्ण भारतात किती जागा मिळाल्या ?
अ) ४४ 
ब) ४८
क) ५२
ड) ६१

१०) खालीलपैकी कोणत्या कॉंग्रेस नेत्याने भारत देशाचे गृहमंत्रीपद भूषवले नाही?
अ) पी. चिदंबरम
ब) पी.व्ही. नरसिंहाराव
क) इंदिरा गांधी
ड) पृथ्वीराज चव्हाण 



1. 1869 साली महात्मा गांधींचा जन्म _____ ह्या ठिकाणी झाला.

A. सुरत
B. बडोदा
C. पोरबंदर 
D. नाताळ (दक्षिण आफ्रिका)

2. गांधीजी कोणत्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत गेले ?

A. 1890
B. 1893 
C. 1896
D. 1899

3. महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते ?

A. आफ्रिकन ओपिनियन
B. इंडियन ओपिनियन 
C. नाताळ काँग्रेस
D. ब्लॅक सॅल्युट

4. दक्षिण आफ्रिकेत गांधीजींनी कोणत्या आश्रमाची स्थापना केली होती ?

A. साबरमती आश्रम
B. सेवाग्राम आश्रम
C. फिनिक्स आश्रम 
D. इंडियन आश्रम

5. महात्मा गांधींनी भारतात सर्वप्रथम सत्याग्रह कोठे केला ?

A. दिल्ली
B. मुंबई
C. अहमदाबाद
D. चंपारण्य 

6. कोणत्या वर्षी गांधीजींनी गुजरातमधील खेडा येथे सत्याग्रह केला होता ?

A. सन 1916
B. सन 1918 
C. सन 1919
D. सन 1920

7. जालियानवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी कोणते कमिशन नेमले होते ?

A. सायमन कमिशन
B. हंटर कमिशन 
C. रिपन कमिशन
D. वूड कमिशन

8. _ साली गांधीजींनी 'हरिजन' हे साप्ताहिक सुरू केले.

A. सन 1930
B. सन 1933 
C. सन 1936
D. सन 1939

9. 'सरहद्द गांधी' या नावाने कोणाला ओळखले जाते ?

A. आगा खान
B. खान अब्दुल गफार खान 
C. महात्मा गांधी
D. मोहम्मद अली जीना

10. ____ रोजी लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला.

A. 1 ऑगस्ट 1920 
B. 1 ऑगस्ट 1925
C. 1 ऑगस्ट 1929
D. 1 ऑगस्ट 1935

11. भारतीय घटनेत सुरूवातीला किती कलमे होती ?

A. 6
B. 8 
C. 10
D. 12

12. देशात आर्थिक आणीबाणी कोणत्या कलमानुसार जारी केली जाते ?

A. कलम 356
B. कलम 360 
C. कलम 365
D. कलम 368

13. भारत सरकारला कायदेविषयक सल्ला कोण देतो ?

A. कायदामंत्री
B. राष्ट्रपती
C. सरन्यायाधीश 
D. लोकसभा सभापती

14. भारतात खरी कार्यकारी सत्ता कोणाकडे असते ?

A. भारतातील सनदी अधिकारी
B. भारताचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती
C. पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ 
D. भारताचे सर्वोच्च न्यायालय

15. राज्यसभा लोकसभेने मंजूर केलेले अर्थविधेयक किती काळापर्यंत रोखून ठेवू शकते ?

A. 14 दिवस 
B. एक महिना
C. चार महिना
D. एक वर्ष

16. विधानसभेत कमाल किती सदस्य असतात ?

A. 250
B. 270
C. 350
D. 500 

17. केंद्र-राज्य विवाद खालीलपैकी कोणत्या संस्थेकडून सोडविले जातात ?

A. उच्च न्यायालय
B. नियोजन मंडळ
C. आंतरराज्यीय परिषद
D. यापैकी कोणी नाही 

18. राज्यपालाचा कार्यकाळ सामान्यतः किती असतो ?

A. कायम
B. 5 वर्षे 
C. 6 वर्षे
D. 10 वर्षे

19. भारताने घटनादुरुस्तीची पध्दत कोणत्या देशाकडून घेतली ?

A. अमेरिका
B. दक्षिण आफ्रिका 
C. कॅनडा
D. आयर्लंड

20. भारतात केंद्रीय वित्त आयोगाची स्थापना दर किती वर्षांनी केली जाते ?

A. 3 वर्षे
B. 4 वर्षे
C. 5 वर्षे 
D. 6 वर्षे

21. रक्तात असणाऱ्या प्रथिनाला काय म्हटले जाते ?

A. मायोसीन
B. फायब्रीनोजन 
C. केसीन
D. व्हिटेलीन

22. एक ग्रॅम प्रथिनांमधून किती उष्मांक मिळतात ?

A. 10
B. 8
C. 6
D. 4 

23. खालीलपैकी कोणते खरे फळ आहे ?

A. सफरचंद
B. काजू
C. अननस
D. नारळ 

24. TRIPS आणि TRIMS ह्या संज्ञा कोणत्या यंत्रणेशी निगडीत आहेत ?

A. WTO 
B. IMF
C. IBRD
D. ADB

25. वातावरणातील कोणता थर हा दाट असून तो एकूण वातावरणाच्या 85% इतका व्यापलेला आहे ?

A. मिसोस्फियर
B. थर्मोस्फियर
C. ट्रोपोस्फियर 
D. स्ट्रॅटोस्फियर

26. एकक क्षेत्र जमिनीवर पीक वाढीच्या कालावधीत पर्णक्षेत्र निर्माण करण्याच्या क्षमतेला काय म्हणतात?

A. पर्णक्षेत्र निर्देशांक
B. पर्णक्षेत्र कालावधी 
C. पीक वाढीचा दर
D. तुलनात्मक पीक वाढीचा दर

27. महाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह _____ येथे झाला.

A. संगमनेर, रत्नागिरी, मालवण
B. वडाळा, मालवण, शिरोडा 
C. शिरोडा, संगमनेर, ठाणे
D. कल्याण, मालवण, शिरोडा

28. युनेस्कोने पर्यावरण शिक्षणाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कोणाच्या मदतीने आंतरराष्ट्रीय पर्यावरण शिक्षण कार्यक्रम अंमलात आणला ?

A. WHO
B. WWF
C. IEEP
D. UNEP 

29. खालीलपैकी कोणते शहर कृष्णा-पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे ?

A. कराड
B. कोल्हापूर
C. नरसोबाची वाडी 
D. सातारा

30. _______ यांनी स्वामी दयानंद सरस्वतींना 'आर्यसमाज' स्थापनेसाठी मदत केली.

A. स्वामी विवेकानंद
B. आगरकर
C. गोखले
D. लोकहितवादी 

31. कोणत्या साली गोव्यामध्ये पोर्तुगीजांनी आपली सत्ता स्थापन केली ?

A. सन 1500
B. सन 1510 
C. सन 1520
D. सन 1530

32. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

A. सन 1500
B. सन 1550
C. सन 1600
D. सन 1650

33. प्लासीची लढाई ______ रोजी झाली.

A. 23 जानेवारी 1757
B. 23 जून 1
C. जून 1758
D. 31 मार्च 1751.

34. वसईचा प्रसिध्द तह कोणत्या वर्षी घडून आला ?

A. सन 1801
B. सन 1802 
C. सन 1803
D. सन 1818

35. तैनाती फौज भारतात कोणी सुरू केली ?

A. अकबर
B. औरंगजेब
C. लॉर्ड वेलस्ली 
D. लॉर्ड कॉर्नवालीस

36. सतीबंदीचा कायदा कोणत्या वर्षी पास झाला ?

A. सन 1829 
B. सन 1859
C. सन 1929
D. सन 1959

37. विधवा पुर्नविवाहाचा कायदा कधी पास झाला ?

A. सन 1926
B. सन 1936
C. सन 1946
D. सन 1956 

38. इंग्रजांनी भारतातील पहिली वखार कोठे उभारली ?

A. चंद्रनगर
B. सुरत 
C. कराची
D. मुंबई

39. कोणत्या साली भारतात विद्यापीठ कायदा पास झाला ?

A. सन 1834
B. सन 1864
C. सन 1894
D. सन 1904 

40. भारतात येणारे पहिले युरोपियन कोण ?

A. इंग्रज
B. फ्रेंच
C. डच
D. पोर्तुगीज 

41. नेफा हे ______ चे जुने नाव आहे.

A. मणिपूर
B. मेघालय
C. अरुणाचल प्रदेश 
D. त्रिपुरा

42. खालीलपैकी भाषिक आधारावर निर्मिती झालेले पहिले राज्य कोणते ?

A. महाराष्ट्र
B. आंध्रप्रदेश 
C. गुजरात
D. आसाम

43. IIM मध्ये प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणती प्रवेश परीक्षा द्यावी लागते ?

A. NET
B. JEE
C. GATE
D. CAT 

44. भारत सरकार कोणत्या दिवशी 'राष्ट्रीय मतदार दिन' म्हणून साजरा करते ?

A. 12 जानेवारी
B. 15 जानेवारी
C. 25 जानेवारी 
D. 26 जानेवारी

45. स्वतंत्र तेलंगणाची मागणी कशावर आधारलेली होती ?

A. भाषिक महत्त्वाकांक्षा
B. प्रादेशिक असंतुलन 
C. फुटीरतावादी राजकारण
D. राज्याच्या स्वायत्ततेशी

46. मोटार वाहनांमुळे _____________ प्रकारचे प्रदूषण होते .

A. हवेमधील
B. प्राथमिक
C. दुय्यम
D. प्राथमिक व दुय्यम दोन्ही प्रकारचे 

47. ई-मेलचा अर्थ ________________ असा आहे.

A. इलेक्ट्रॉनिक मेल 
B. इलेक्ट्रिकल मेल
C. इलेक्ट्रोमॅग्नेटीक मेल
D. इलेक्ट्रोस्टॅटीक मेल

48. खालीलपैकी कोणत्या महामार्गावर 'खंबाटकी घाट' लागतो ?

A. मुंबई-पुणे
B. मुंबई-गोवा
C. मुंबई-आग्रा
D. पुणे-बेंगळूरु 

49. खालीलपैकी कोणता प्रत्यक्ष कर आहे ?

A. व्यवसाय कर 
B. मूल्यवर्धित कर
C. सेवा कर
D. विक्री कर

50. महाराष्ट्रातील आदिवासी विकासाच्या चळवळीशी कोण संबंधित नव्हते ?

अ. सेनापती पांडुरंग बापट ब. अनुताई वाघ क. ताराबाई मोडक ड.केशवराव जेधे

A. ब, ड
B. अ, क
C. अ, ड 
D. ब, क


曆曆曆曆曆曆曆曆曆曆曆

प्रार्थना समाज

🔸दादोबा पांडुरंग यांचे बंधू आत्माराम पांडुरंग यांच्या अध्यक्षतेखाली ३१ मार्च १८६७ रोजी प्रार्थनासमाजाची स्थापना झाली. पुणे, नगर, सातारा इ. ठिकाणी प्रार्थनासमाजाच्या शाखा निघाल्या.


🔸सबोध-पत्रिका' या नावाचे मुखपत्रही प्रार्थना समाजाने चालविले होते.


🔸परमहंस सभेचे प्रकट रूप असलेल्या प्रार्थना समाजाचे स्वरूप हे बंगालमधील ब्राह्मो समाजाची मिळतेजुळते असले तरी ब्राह्मो समाजाचा अनुभव महाराष्ट्रातील परिस्थिती लक्षात घेऊन महादेव गोविंद रानडे आणि रा गो भांडारकर यांनी प्रार्थना समाजाची तत्त्वे आणि उपासना पद्धती निश्‍चित केली होती.


🔸शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा आहे असे मत मांडणाऱ्या रानडे यांच्या विचारांचा प्रभाव प्रार्थना समाजाच्या कार्यकर्त्यांवर होता. प्रार्थना समाजाचे कार्यकर्ते लक्ष्मण भिकोबा चव्हाण यांनी सन १८७६मध्ये मुंबईतील चाळवाडी येथे पहिली रात्रशाळा सुरू केली


🔸परार्थना समाजाचे कार्यकर्ते उमाया लालशंकर यांनी अनाथ मुलांसाठी आधारगृह सुरू केले


🔸प्रार्थनासमाजाची धर्मतत्त्वे : 

(१) परमेश्वराने हे सर्व ब्रह्मांड निर्माण केले. तोच एक खरा ईश्वर. तो नित्य, ज्ञानस्वरूप, अनंत, कल्याणनिधान, आनंदमय, निरवयव, निराकार, एकमेवाद्वितीय, सर्वांचा नियंता, सर्वव्यापी, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, कृपानिधी, परमपवित्र व पतितपावन असा आहे. 

(२) केवळ त्याच्याच उपासनेच्या योगे इहलोकी व परलोकी शुभ प्राप्त होते. (३) त्याच्या ठायी पूज्यबुद्धी व अनन्यभाव ठेवून त्याचे मानसिक भजन-पूजन करणे व त्यास प्रिय अशी कृत्ये करणे, हीच त्याची खरी उपासना. (४) प्रतिमा व इतर सृष्ट पदार्थ यांची पूजाअर्चा किंवा आराधना करणे हा ईश्वरोपासनेचा खरा प्रकार नव्हे. 

(५) परमेश्वर सावयव रूपाने अवतार घेत नाही आणि कोणताही ग्रंथ साक्षात ईश्वरप्रणीत नाही.

 (६) सर्व मनुष्ये एका परमेश्वराची लेकरे आहेत, म्हणून भेदभाव न राखता परस्परांशी त्यांनी बंधुभावाने वागावे, हे ईश्वरास प्रिय आहे.


🔸रानडे-भांडारकर, वामन आबाजी मोडक, नारायण गणेश चंदावरकर, द्वा. गो. वैद्य, विठ्ठल रामजी शिंदे वगैरेंच्या व्याख्यानांचे व प्रवचनांचे जे संग्रह उपलब्ध आहेत, त्यांवरून प्रार्थनासमाजाची ओळख पटते. उपनिषदे, इतर सर्व धर्मग्रंथांतील पारमार्थिक व नैतिक सिद्धांत प्रार्थनासमाज मानतो. साधकाला मध्यस्थाशिवाय म्हणजे पुरोहिताशिवाय अंतःप्रेरणेतून व स्वानुभवातून सत्याचे ज्ञान होऊ शकते. विवेकबुद्धीने धर्म व नीतितत्त्वे समजू शकतात. आत्मपरीक्षण आणि आत्मनिवेदनप्रधान असा हा प्रवृत्तिमार्ग आहे. सर्वांगीण सामाजिक सुधारणेचा पाया सद्धर्म व सदाचरणावर आधारित असावा, यावर प्रार्थनासमाज भर देतो.


२२ ऑगस्ट २०२५

महत्त्वाच्या समाजसुधारकांचे आणि त्यांच्या कार्याचे वर्णन

 महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या समाजसुधारकांचे आणि त्यांच्या कार्याचे वर्णन केले आहे:

ठक्कर बाप्पा:

गांधीजींनी त्यांना भिल्लांचे धर्मगुरू म्हटले. त्यांनी 1922 मध्ये भिल्ल सेवा मंडळाची स्थापना केली आणि 1932 मध्ये स्थापन झालेल्या हरिजन सेवक संघाचे ते सचिव होते.


बाळासाहेब खेर:

त्यांनी ठाणे जिल्ह्यातील वारली जमातीसाठी कार्य केले.


शामराव व गोदावरी परुळेकर:

त्यांनी किसानसभेच्या माध्यमातून वारली समाजासाठी कार्य केले आणि 1945 मध्ये शामराव परुळेकर यांनी उंबरगाव तालुक्यातील झरी येथील आदिवासी परिषदेत वेठबिगारी नष्ट करण्याचे आवाहन केले.


ताराबाई मोडक:

त्यांनी ठाणे जिल्ह्यातील कोसबाड येथे शैक्षणिक कार्याला सुरुवात केली आणि आदिवासी मुलांसाठी अंगणवाड्या व कुरणशाळा सुरू केल्या.


अनुताई वाघ:

ताराबाई मोडक यांच्या सहवासातून प्रेरणा घेऊन त्यांनी आदिवासींच्या प्रगतीसाठी 'कोसबाड प्रकल्प', पाळणाघरे आणि बालवाड्या सुरू केल्या. त्यांचे 'कोसबाडच्या टेकडीवरून' हे प्रसिद्ध ग्रंथ आहे.


डॉ. रामराव वाडिवे:

त्यांनी आदिवासी सेवा सुधार समितीची स्थापना केली.


पांडुरंग ढवळा साबळे

१९५१ मध्ये 'ओम आदिवासी आदिशक्ती सेवा संघ' ची स्थापना केली, तसेच आदिवासी कल्याण केंद्रे आणि शाळा सुरू केल्या आणि वेगळ्या आदिवासी राज्याची वकिली केली.


कॉम्रेड रेवाजी पांडुरंग चौधरी (देवजीभाई)

जव्हारमध्ये सक्तीची मजुरी रद्द करण्यासाठी काम केले, आदिवासी सेवा संघटना स्थापन केल्या आणि आश्रम शाळा आणि कामगार संघटना सुरू केल्या.


सुखदेव बाबुराव उईके (बाबूजी उईके)

'जंगल बचाओ, मानव बचाओ' (जंगल वाचवा, मानवता वाचवा) चळवळीचे नेतृत्व केले आणि 'आम्ही आमच्या आरोग्यासाठी' (आम्ही आमच्या आरोग्यासाठी) संस्थेची स्थापना केली.


मेंढालेखा (गडचिरोली) येथील देवाजी तोफा

जंगलांवर पारंपारिक आदिवासी हक्क मिळवण्यासाठी "आमच्या गावत आम्हीच सरकार" (आमच्या गावात, आम्हीच सरकार आहोत) या घोषणेचे समर्थन केले.


कॉ. नजूबाई आट्या गावित 

'श्रमिक महिला संघ' स्थापन केला

पठाराचे प्रकार (Types of Plateau)

1. पर्वतांतर्गत पठार (Intermontane Plateau):

वैशिष्ट्य: पर्वतरांगांनी पूर्णतः किंवा अंशतः वेढलेले पठार.

उदाहरणे: तिबेट पठार (हिमालय, कुनलून व तिएनशहा पर्वतरांगांनी वेढलेले), बलुचिस्तान पठार (हिंदुकुश पर्वतरांग).


2. पर्वतपदीय पठार (Piedmont Plateau):

वैशिष्ट्य: पर्वताच्या पायथ्याशी तयार झालेले पठार.

उदाहरणे: माळवा पठार, अॅप्लेशियन पठार, कोलोरॅडो पठार.


3. ज्वालामुखी पठार (Lava Plateau):

वैशिष्ट्य: ज्वालामुखीमुळे तयार झालेले पठार.

उदाहरणे: कोलंबिया पठार, ओनटाँग, जावा पठार, दख्खन पठार.


4. हिमनदीच्या खनन कार्यामुळे तयार झालेले पठार (Glacier Erosion Plateau):

वैशिष्ट्य: हिमनदीच्या खनन कार्यामुळे तयार झालेले पठार.

उदाहरणे: स्कँडेनेव्हियन पठार, ग्रीनलँड पठार.


5. खंडीय पठार (Continental Plateau):

वैशिष्ट्य: समुद्राने किंवा मैदानांनी वेढलेला उंच भूभाग.

उदाहरणे: आफ्रिका खंड, मादागास्कर बेट, पश्चिम ऑस्ट्रेलिया.

२० ऑगस्ट २०२५

मौर्यकालीन भारत :

 🔴मौर्य साम्राज्याची स्थापना :

⚫️नंद घराण्यातील शेवटचा राजा धनानंद हा अत्यंत जुलमी होता.

🟤 त्याने चाणक्य नावाच्या ब्राम्हण व्यक्तीचा भर दरबारात अपमान केला.

🟢त्याचा बदला म्हणून आर्य चाणक्यने चंद्रगुप्त मौर्याच्या नेतृत्वाखाली राजे लोकांना एकत्र करून धनानंदाचा पराभव केला आणि चंद्रगुप्ताच्या नेतृत्वाखाली मौर्य साम्राज्याची स्थापना केली.


🔴चंद्रगुप्त मौर्य :

⚫️चंद्रगुप्त मौर्य हा मौर्य साम्राज्याचा संस्थापक असून भारताचा पहिला सम्राट होय. 

🟤त्याने आपल्या राज्याचा विस्तार काबूल, कंदाहार, हेरात ते पश्चिमेकडील सौराष्ट्रपर्यंत आपल्या राज्याचा विस्तार केला होता.

🟢बिहारमधील पाटलीपुत्र (पाटणा) ही त्याच्या राज्याची राजधानी होती.

🔵ग्रीकचा राजा सेल्युकस निकोटरने आपला राजदूत म्हणून मेगॉस्थनिस यास राजदूत म्हणून चंद्रगुप्ताच्या दरबारी पाठविले होते.

🟤 त्यांने मेगॉथिसने तत्कालीन परिस्थितिचे वर्णन इंडिका नावाच्या ग्रथांत केले होते.

🔴चंद्रगुप्ताने आपला मुलगा बिंदुसार याचेकडे राज्य सोपवून संन्यास घेतला.

⚫️ त्याचे श्रवणबेळगोळा येथे निधन झाले.

🟢बिंदुसार नंतर मौर्य वंशात सम्राट अशोक हा पराक्रमी राजा आला.



🔴सम्राट अशोक :

⚫️चंद्रगुप्तानंतर मौर्य साम्राज्यातील सम्राट अशोक हा दूसरा पराक्रमी राजा होय.

🟤त्याने पूर्वेस बंगालचा उपसागर ते पश्चिमेस अरबी समुद्र, वायव्येस काबूल नदीपर्यंत आणि उत्तरेस नेपाळ ते दक्षिणेस कावेरी नदीपर्यंत मगध साम्राजाच्या विस्तार केला होता.

🟤कलिंगच्या युद्धाच्या घटनेमुळे सम्राट अशोकाच्या जिवनास वेगळेच वळण लागले.

🔴कलिंग युद्ध (इसवी सन पूर्व 261) :

⚫️सम्राट अशोकाने साम्राज्य विस्ताराच्या उद्देशाने कलिंगवर स्वारी केली.

🟤या युद्धात भयंकर रक्तपातानंतर अशोकाला विजय मिळाला.

🔵या घटनेमुळे व्यथित होवून अशोकाने पुढे युद्ध न करण्याचा निर्णय घेतला आणि बौद्ध धर्माचा स्विकार केला.



🔴बौद्ध धर्माचा प्रसार :

⚫️बौद्ध धर्माला राजाश्रय मिळाल्यामुळे अशोकाच्या काळात बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला.

🟤बौद्ध धर्माच्या प्रसारातील पाटलीपुत्र येथे बौद्धधर्म परिषद बोलविण्यात आली होती.

🟢जागोजागी शिलालेख आणि स्तंभ उभे केले सांची बौद्ध स्तूप व अशोक स्तंभ याच काळात उभारले गेले.

🔵आपली मुलगी संघमित्रा आणि मुलगा महेंद्र यास श्रीलंकेस बौद्ध धर्माच्या प्रसाराकरिता पाठविले होते.


🔴मौर्यकालीन राज्य व्यवस्था :

🟤मौर्य कालामध्ये राजाला सल्ला देण्याकरिता मंत्रीपरिषद निर्माण करण्यात आली होती.

⚫️जिल्ह्याचा प्रमुख रज्जुक, तालुक्याचा प्रमुख गोप व गावा प्रमुख ग्रामणी म्हणून ओळखला जात असे.

🟢मौर्य कालीन लोकजीवन :

🔴मौर्य काळातील लोकजीवन कृषिप्रधान होते.

🔵 त्याचबरोबर चकाकी असलेली भांडी तयार करणे, नौकाबांधणी, कापड तयार करणे, व्यापार इत्यादी उद्योग भरभराटीस आले होते.

🟢विविध व्यापार्‍यांचे संघ स्थापन करण्यात आले होते, त्यांना श्रेणी असे म्हणत.


🔴मौर्यकालीन कला व साहित्य :

🟤सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर शिल्पकलेस राजाश्रय दिला.

⚫️यामुळे सारनाथ येथील स्तंब व सांची येथील बौद्ध सतूपासारखे स्मारके बांधली गेली. 

🟢मौर्य काळामध्ये संस्कृत भाषेबरोबर पाली आणि अर्धमागधी भाषेत बरेच साहित्य लिहिले गेले.

⚫️चाणक्याचे अर्थशास्त्र, पाणिणीचे व्याकरण आणि बौद्ध धर्मातील त्रिपिटक याच काळात लिहिले गेले.    




पोलीस भरती प्रश्नसंच

 १) कोणती प्रजाती कागदनिर्मितीमध्ये प्रामुख्याने वापरली जाते

A. निलगिरी✔️

B. सागवान

C. देवदार

D. साल


2)  महाराष्ट्रात सहकार तत्त्वावर सर्वात पहिला हातमाग . . .. येथे सुरु झाला

A. सातारा

B. भिंवडी

C. इचलकरंजी✔️

D. मुंबई


३) महाराष्ट्र अभियंात्रिकी संशोधन संस्था मेरी कोठे आहे.

A. नागपूर

B. मुंबई

C. पुणे

D. नाशिक✔️


४) कायमस्वरुपी व हंगामी हिमाच्छादित प्रदेशाच्या दरम्यानचा प्रदेश कोणत्या नावाने ओळखतात.

A. हिमक्षेत्रे

B. हिमटोपी

C. हिमनदी

D. वरीलपौकी नाही✔️


५)  खालीलपौकी कोणत्या राज्यात एरंडीचे उत्पादन अधिक होते

A. गुजरात आणि आंध्र प्रदेश✔️

B. महाराष्ट्र आणि कर्नाटक

C. तामिळनाडू आणि ओरिसा

D. राजस्थान आणि बिहार


६) खालीलपौकी कोणते शहर कृष्णा - पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे

A. कराड

B. कोल्हापूर

C. नरसोबाची वाडी✔️

D. सातारा


७)  महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण . . . . आहे.

A. 0.21✔️

B. 0.25

C. 0.27

D. 0.1


८)  खालील पौकी चंद्रपूर जिल्ह्यातील कोणती आदिवासी जमात केद्र शासनाने अतिमागास जमात म्हणून जाहीर केली

A. कोळंब

B. माडिया गोंड✔️

C. परधान

D. वरील सर्व


९)  खालीलपौकी लोकसख्येच्या दृष्टीने जगातील सर्वात लहान देश कोणता.

A. मोन्ॉको

B. सन म्ॉरिनो

C. चीन

D. व्हॅटिकन सिटी✔️


१०)  . . .. हा ऊसाचा सुधारित वाण क्षारयुक्त जमिनीसाठी शिफारस करण्यात आला आहे

A. को, 76032

B. को. एम 88121

C. को. एम. 0265✔️

D. को. एम. 7125


११)  महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात जास्त साठे . . . .येथे आहेत

A. उमरखेड

B. बल्लारपूर

C. कामटी✔️

D. सावनेर


१२)  खालीलपौकी कोण्ेती महाराष्ट्रात विमुक्त जात नाही


A. बेरड

B. रामोशी

C. कैकाडी

D. गारुडी✔️


१३)  पृथ्वीचा केद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो

A. सियाल✔️

B. सायमा

C. निफे

D. शिलावरण


१४)  कोणती नदी अरबी समुद्राला मिळते.

A. तापी✔️

B. कावेरी

C. महानदी

D. कृष्णा


१५)  महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नौऋत्य मान्सून वा·यांच्या दोन्ही शाखांपासून पाऊस मिळतो

A. मराठवाडा

B. कोकण

C. खानदेश

D. विदर्भ✔️


१. वटवाघूळ उडत असताना _ ध्वनी निर्माण करतात.

A) लघु वारंवारतेचा 

B) उच्च वारंवारतेचा ✅

C) मध्यम वारंवारतेचा

D) यापैकी नाही


२. कोणते पाणी सर्वात स्वच्छ जल म्हणून ओळखले जाते?

A) विहिरीतील 

B) नळाचे 

C) तलावाचे

D) पावसाचे ✅


३. कुष्ठरोगाच्या जिवाणूंचा शोध कोणत्या शास्त्राज्ञाने लावला?

A) डॉ. हॅन्सन ✅ 

B) डॉ. रोनॉल्ड

C) डॉ. बेरी

D) डॉ. निकेल्सनू


४. ७ कि.मी. = डेकामीटर ?

A) ७० 

B) ७०० ✅

C) ७०००

D) ०.७००


५. खालीलपैकी कोणते औषध क्षयरोगासाठी वापरतात?

A) स्ट्रेप्टोमायसिन ✅

B) पेनिसिलिन

C) डेप्सॉन

D) ग्लोब

भारतीय नदी(INDIAN RIVERS


*1 सिन्धु नदी* :-

•लम्बाई: (2,880km)

• उद्गम स्थल: मानसरोवर झील के निकट

• सहायक नदी:(तिब्बत) सतलुज, व्यास,

झेलम, चिनाब,

रावी, शिंगार,

गिलगित, श्योक जम्मू और कश्मीर, लेह

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*2 झेलम नदी*

•लम्बाई: 720km

•उद्गम स्थल: शेषनाग झील,

जम्मू-कश्मीर

•सहायक नदी: किशन, गंगा, पुँछ लिदार,करेवाल,

सिंध जम्मू-कश्मीर,

कश्मीर


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*3 चिनाब नदी*

•लम्बाई: 1,180km

•उद्गम स्थल: बारालाचा दर्रे के निकट

•सहायक नदी: चन्द्रभागा जम्मू-कश्मीर

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*4 रावी नदी*

•लम्बाई: 725 km

•उद्गम स्थल:रोहतांग दर्रा,

कांगड़ा

•सहायक नदी :साहो, सुइल पंजाब


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*5 सतलुज नदी*

•लम्बाई: 1440 (1050)km •उद्गमस्थल:मानसरोवर के निकट राकसताल

•सहायक नदी : व्यास, स्पिती,

बस्पा हिमाचल प्रदेश, पंजाब

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*6 व्यास नदी*

•लम्बाई: 470

•उद्गम स्थल: रोहतांग दर्रा •सहायक नदी:तीर्थन, पार्वती,

हुरला


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*7 गंगा नदी*

•लम्बाई :2,510 (2071)km •उद्गम स्थल: गंगोत्री के निकट गोमुख से

• सहायक नदी: यमुना, रामगंगा,

गोमती,

बागमती, गंडक,

कोसी,सोन,

अलकनंदा,

भागीरथी,

पिण्डार,

मंदाकिनी, उत्तरांचल,

उत्तर प्रदेश,

बिहार,

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*8 यमुना नदी*

•लम्बाई: 1375km

•उद्गम स्थल: यमुनोत्री ग्लेशियर

•सहायक नदी: चम्बल, बेतवा, केन,

टोंस, गिरी,

काली, सिंध,

आसन

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*9 रामगंगा नदी*

•लम्बाई: 690km

•उद्गम स्थल:नैनीताल के निकट एक हिमनदी से

• सहायक नदी:खोन

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*10 घाघरा नदी*

•लम्बाई: 1,080 km

•उद्गम स्थल:मप्सातुंग (नेपाल)

• सहायक नदी:हिमनद शारदा, करनली,

कुवाना, राप्ती,

चौकिया

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*11 गंडक नदी*

•लम्बाई: 425km

•उद्गम स्थल: नेपाल तिब्बत सीमा पर मुस्ताग के निकट •सहायक नदी :काली गंडक,

त्रिशूल, गंगा

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*12 कोसी नदी*

•लम्बाई: 730km

•उद्गम स्थल: नेपाल में सप्तकोशिकी

(गोंसाईधाम)

•सहायक नदी: इन्द्रावती,

तामुर, अरुण,

कोसी

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*13 चम्बल नदी*

•लम्बाई: 960 km

•उद्गम स्थल:मऊ के निकट जानापाव पहाड़ी से

•सहायक नदी :काली सिंध,

सिप्ता,

पार्वती, बनास

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*14 बेतवा नदी*

•लम्बाई: 480km

•उद्गम स्थल: भोपाल के पास उबेदुल्ला गंज के पास मध्य प्रदेश

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*15 सोन नदी*

•लम्बाई: 770 km

•उद्गमस्थल:अमरकंटक की पहाड़ियों से

•सहायक नदी:रिहन्द, कुनहा 


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*16 दामोदर नदी*

•लम्बाई: 600km

•उद्गम स्थल: छोटा नागपुर पठार से दक्षिण पूर्व

•सहायक नदी:कोनार,

जामुनिया,

बराकर झारखण्ड,

पश्चिम बंगाल


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*17 ब्रह्मपुत्र नदी*

•लम्बाई: 2,880km

•उद्गम स्थल: मानसरोवर झील के निकट (तिब्बत में सांग्पो)

•सहायक नदी: घनसिरी,

कपिली,

सुवनसिती,

मानस, लोहित,

नोवा, पद्मा,

दिहांग अरुणाचल प्रदेश, असम

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*18 महानदी*

•लम्बाई: 890km

•उद्गम स्थल: सिहावा के निकट रायपुर

•सहायक नदी: सियोनाथ,

हसदेव, उंग, ईब,

ब्राह्मणी,

वैतरणी मध्य प्रदेश,

छत्तीसगढ़,

उड़ीसा

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*19 वैतरणी नदी*

• लम्बाई: 333km

•उद्गम स्थल:क्योंझर पठार उड़ीसा

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*20 स्वर्ण रेखा*

•लम्बाई: 480km

•उद्गम स्थल ;छोटा नागपुर पठार उड़ीसा,

झारखण्ड,

पश्चिम बंगाल

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*21 गोदावरी नदी*

•लम्बाई: 1,450km

•उद्गम स्थल: नासिक की पहाड़ियों से

•सहायक नदी:प्राणहिता,

पेनगंगा, वर्धा,

वेनगंगा,

इन्द्रावती,

मंजीरा, पुरना महाराष्ट्र,

कर्नाटक,

आन्ध्र प्रदेश

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*22 कृष्णा नदी*

•लम्बाई: 1,290km

•उद्गम स्थल: महाबलेश्वर के निकट

•सहायक नदी: कोयना, यरला,

वर्णा, पंचगंगा,

दूधगंगा,

घाटप्रभा,

मालप्रभा,

भीमा, तुंगप्रभा,

मूसी महाराष्ट्र,

कर्नाटक,

आन्ध्र प्रदेश

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*23 कावेरी नदी*

•लम्बाई: 760km

•उद्गम स्थल: केरकारा के निकट ब्रह्मगिरी

•सहायक नदी:हेमावती,

लोकपावना,

शिमला, भवानी,

अमरावती,

स्वर्णवती कर्नाटक,

तमिलनाडु

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*24 नर्मदा नदी*

•लम्बाई: 1,312km

•उद्गम स्थल :अमरकंटक चोटी

•सहायक नदी: तवा, शेर, शक्कर,

दूधी, बर्ना मध्य प्रदेश,

गुजरात


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*25 ताप्ती नदी*

•लम्बाई: 724km

•उद्गम स्थल: मुल्ताई से (बेतूल)

•सहायक नदी: पूरणा, बेतूल,

गंजल, गोमई मध्य प्रदेश,

गुजरात


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*26 साबरमती*

•लम्बाई: 716km

•उद्गम स्थल: जयसमंद झील

(उदयपुर)

•सहायक नदी:वाकल, हाथमती राजस्थान,

गुजरात


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*27 लूनी नदी*

•उद्गम स्थल: नाग पहाड़ •सहायक नदी:सुकड़ी, जनाई,

बांडी राजस्थान,

गुजरात,

मिरूडी,

दख्खन पठार


‘दक्षिण’ या संस्कृत शब्दाचा ‘दख्खन’ हा अपभ्रंश असून, दक्षिण म्हणजे उजव्या हाताकडील अथवा दक्षिण दिशेकडील. यावरूनच दख्खन पठार अशी संज्ञा पडली असावी. या पठाराचा उल्लेख रामायण, महाभारत व मार्कंडेय, मत्स्य, वायु या पुराणांत अनेक वेळा आढळतो.


पहिल्या शतकात एका ग्रीक मार्गनिर्देशकाने लिहिलेल्या पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी या ग्रंथात या पठाराचा ‘दचिन बदेस’, तर पाचव्या शतकात आलेला चिनी प्रवासी फाहियान याच्या वृत्तांतात Ta–Thsin असा उल्लेख आढळतो. तसेच अभिजात संस्कृत साहित्यात व कोरीव लेखांत याचा ‘दक्षिण पथ’ असा उल्लेख आढळतो. सातवाहन राजांच्या कारकीर्दीत सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी यास ‘दक्षिणापथपति’ अशी उपाधी दिलेली होती.


दक्षिण पथावर सातवाहन, चोल, चालुक्य, राष्ट्रकूट, देवगिरीचे यादव व होयसळ इ. वंशांचे राज्य होते. तेराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत या पठाराविषयी फार थोडी  माहिती उपलब्ध होती. तथापि पठारावर इतिहासपूर्व काळापासून मानवी वस्ती आहे, याबद्दल पुष्कळ पुरावा मिळतो.

या पठाराच्या सीमेबाबत एकमत नाही. संकुचित अर्थाने उत्तरेकडे सातमाळा टेकड्या व दक्षिणेकडे कृष्णा नदी यांच्यामधील मराठी भाषा बोलली जाणाऱ्या (महाराष्ट्र) प्रदेशासच दख्खन पठार म्हणतात; तर व्यापक अर्थाने नर्मदा किंवा विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडील संपूर्ण भारतीय द्वीपकल्पास दख्खन पठार म्हणतात.


हे पठार भारत वआफ्रिका खंड यांना जोडणाऱ्या प्राचीन ‘गोंडवन भूमी’ चा अवशेषात्मक भाग असावा. या पठाराच्या उत्तरेस सातपुडा पर्वंत असून त्यात १,६७६ मी. उंचीच्या डोंगररांगा आहेत. या रांगांत उगम पावणाऱ्या तापी, नर्मदा या नद्या अरबी समुद्रास मिळतात.


तसेच पूर्वेस व पश्चिमेस अनुक्रमे पूर्व घाट व पश्चिम घाट (सह्याद्री) असून हे घाट पठाराच्या दक्षिण टोकाला येऊन मिळतात. पठाराची सरासरी उंची सु. ६१० मी. असून पठाराचा उतार पूर्वेकडे कमी कमी होत गेला आहे. कृष्णा, गोदावरी आणि कावेरी या पठारावरील प्रमुख नद्या असून त्या पश्चिम घाटात उगम पूर्वेकडे बंगालच्या उपसागरास मिळतात.


पठारावरील हवामान कोरडे असून किनाऱ्यावर उष्ण–दमट तर काही ठिकाणी रूक्ष असते. उन्हाळ्यात तपमान २०° ते ३२° से. च्या दरम्यान असते, तर हिवाळ्यात १०° ते २४° से. पर्यंत असते. नैर्ऋत्य व ईशान्य या दोन्ही मोसमी वाऱ्यांपासून पठारावर पाऊस पडतो.


जास्तीत जास्त पर्जन्यमान पश्चिम घाटावर असून पूर्वेकडे पावसाचे प्रमाण कमी कमी होत जाते. पठार अतिशय टणक, मजबूत आणि स्फटिकमय ग्रॅनाइटी व बेसाल्ट खडकांनी बनले आहे. त्यावरील लाव्हारसाच्या थरांपासून बनलेली मृदा सुपीक आहे.


पठाराचा बराचसा भाग सपाट असून त्यात मधून मधून सपाट माथ्याचे उंचवटे व गोलाकार टेकड्या दिसतात. भूवैज्ञानिक दृष्ट्या हा प्रदेश स्थिर स्वरूपाचा मानला जातो. पठारावर खनिज संपत्ती विपुल असून तीत सोने, दगडी कोळसा, मँगॅनीज व लोखंड यांची धातुके तसेच बॉक्साइट, मोनॅझाइट वाळू इ. खनिजे प्रमुख आहेत.


आतरराज्यीय जलविवाद न्यायाधिकरणे

💥 (Combine focus)


▪️कष्णा ( 1969) :- महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश


▪️गोदावरी (1969):-  महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रधेश, ओरीसा


▪️नर्मदा (1969) :- राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र


▪️रावी व बियास ( 1986) :- पंजाब, हरियाणा, राजस्थान


▪️कावेरी (1990) :- कर्नाटक, केरळ, तामीळनाडू, पाँडेचरी


▪️कष्णा - 2 (2004 ) :- महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश


▪️वसंधरा (2010) :- ओडीसा, आंध्रप्रदेश


▪️महादयी (2010):- गोवा, कर्नाटक, माहाराष्ट्र.


▪️महानदी (6 ऑगस्ट 2018 ) :- ओडीसा, छत्तीसगड.