Friday 11 October 2019

भारत सीमेलगत सौर व पवन प्रकल्प उभारणार

सन 2022 पर्यंत 175 गीगावॉट स्वच्छ ऊर्जा साध्य करण्याचे भारताचे लक्ष्य आहे. त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून पाकिस्तानलगत आंतरराष्ट्रीय सीमेजवळ सौर आणि पवन प्रकल्प उभारण्याची भारताची योजना आहे.

ठळक बाबी

🎯हा प्रकल्प गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात सीमेजवळ 30 किलोमीटर लांबी आणि 20 किमी रूंदीच्या भुखंडावर उभारला जाणार आहे.

🎯प्रस्तावित प्रकल्पांमधून प्रत्येकी 2 हजार मेगावॅट ऊर्जेची निर्मिती होणार.

🎯प्रकल्प वस्ती नसलेल्या निर्जन जागेवर बांधण्यात येत आहे.

🎯सीमेवर राहणार्‍या लोकांच्या गरजा भागविण्याच्या उद्देशाने सीमेजवळच्या वाळवंटी प्रदेशात तेथे निर्माण झालेल्या ऊर्जेचा वापर केला जाऊ शकतो.

सध्या भारत 82,580 मेगावॅट सौर ऊर्जेचे उत्पादन घेत आहे, जे देशाच्या एकूण ऊर्जेच्या 23% आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...