Saturday 28 December 2019

नूतन वर्षाच्या प्रारंभीच 8 हजार शिक्षकांच्या नोकऱ्यांवर गदा !

⚡ शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांची सेवा बंद करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.

💁‍♂ प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक दत्तात्रय जगताप यांच्याकडून संबंधित शिक्षकांची सेवा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नवीन वर्षाच्या प्रारंभीच राज्यातील 8 हजार शिक्षकांना नोकरी गमवावी लागेल.

📆 राज्यामध्ये 13 फेब्रुवारी 2013 नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षण परिषदेने निश्चित केलेली टीईटी उत्तीर्णतेची पात्रता 31 मार्चपर्यंत मिळवून देणे आवश्यक होते.

🧐 राज्य शासनाकडून केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाला टीईटी उत्तीर्ण होण्याबाबत अतिरिक्त संधी देण्याची विनंती केली होती. त्यानुसार पात्रता नसलेल्या शिक्षकांना तूर्तास सेवेतून न काढण्याच्या सूचना दिल्या होत्या.

👉 दरम्यान राज्य शासनाची विनंती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने 3 जून 2019 च्या पत्राद्वारे फेटाळली.

📌 टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांवर 24 ऑगस्ट 2018 च्या शासन निर्णयानुसार सेवा बंदच्या कारवाईचे आदेश 25 नोव्हेंबरला दिले होते. त्यानंतर महिनाभराने प्रत्यक्ष कारवाईचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून दिले आहेत.

No comments:

Post a Comment

Latest post

वाचा :- इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये

◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले ◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन ◾️...