Saturday 29 February 2020

“RAISE 2020”: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विषयावरची भारताची पहिली परिषद

🔰नवी दिल्लीत 11 एप्रिल आणि 12 एप्रिल 2020 रोजी ‘सामाजिक सशक्तीकरणासाठी जबाबदार AI’ (RAISE - Responsible AI for Social Empowerment) विषयक एक राष्ट्रीय परिषद आयोजित करण्याचा भारत सरकारने निर्णय घेतला आहे. ही कृत्रिम बुद्धिमत्तेवर बोलली जाणारी पहिलीच परिषद आहे.

🔰हा कार्यक्रम भारत सरकारचे इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आयोजित करणार आहे.

🔰कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या वापराविषयी नागरिक आणि उद्योगांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात शिक्षण, स्मार्ट दळणवळण, कृषी, आरोग्य सेवा आणि इतर क्षेत्रात गुंतलेल्या उद्योगांमध्ये सामाजिक सशक्तीकरण आणि परिवर्तनाच्या दृष्टीने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरावर विचारांची देवाणघेवाण केली जाणार आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

वाचा :- इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये

◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले ◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन ◾️...