Sunday 31 December 2023

राज्यसेवा प्रश्नसंच

Ques. आगराच्या जामा मस्जिदिचे निर्माण कोणी केले आहे? 

A. अकबर ने

B. शाहजांह ने

C. जहाँआरा ने ✅

D. जहांगीर ने


 Ques. कोणत्या शिख गुरुने फारसी भाषेत जफरनामा लिहला आहे? 

A. यापैकी कोणीच नाही

B. गुरू नानक

C. गुरू अंगद देव 

D. गुरु गोविंद सिंह✅



 Ques. गुरु नानक चा जीवन परिचय कोणत्या शिख गुरु ने लिहला आहे? 

A. गुरू तेग बहादुर सिंह ने

B. गुरू अंगद देव ने

C. गुरु अर्जुन देव ने ✅

D. गुरू गोविंद सिंह ने


 Ques. औरंगजेब च्या शाशन काळात बंगाल चा नवाब कोण होता? 

A. मुर्शीद कुली खाँ   ✅

B. मंसुर अली खान

C. मीर कासीम

D. अलवर्दी खान


१) भारतीय राज्यघटनेत नमुद मुलभूत कर्तव्यामध्ये नमुद आशय अंतर्भूत असला तरी खालील विधानांमधील काही शब्द विशेषत्वाने नमुद नाहीत ते जादाचे नमुद केले आहेत अशी खालीलपैकी कोणती विधाने आहेत ?

अ) राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत व देशातील कायद्याचा आदर करणे.

ब) स्त्रियांच्या व बालकांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणा-या प्रथांचा त्याग करणे

क) सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचे रक्षण करणे.

ड) आठव्या वर्गापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करणे.

   1) अ, क 

   2) ब    

   3) ड   

   4) सर्व 


उत्तर :- 4


२) मार्गदर्शक तत्त्वे शासनाकडून केलेल्या अपेक्षा आहेत. तर मुलभूत कर्तव्ये .................... च्या अपेक्षा आहेत.

1) मंत्रीमंडळ    

2) जनता      

3) प्रतिनिधी    

4) सर्वोच्च न्यायालय


उत्तर :- 2


३) योग्य क्रम निवडा.

अ) भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणे

ब) सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण करणे

क) नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे

ड) संविधानाचा सन्मान करणे


1) अ, ड, क, ब    

2) ड, अ, क, ब    

3) ड, ब, अ, क    

4) ड, अ, ब, क



उत्तर :- 2


४) खालीलपैकी भारतीय नागरिकाचे कोणते मुलभूत कर्तव्य नाही  ?


1) देशाचे संरक्षण करणे                

2) नियमित कर भरणे 

3) सहा ते 14 वर्षा दरम्यानचे अपत्य किंवा पाल्य यास शिक्षणाच्या संधी देणे

4) एकही नाही


उत्तर :- 2


५) राज्यघटनेत मुलभूत कर्तव्यांचा केलेला समावेश लोकशाहीच्या यशासाठी कसा लाभदायक आहे ?

अ) जेव्हा राज्यघटना सामाजिक व आर्थिक परिवर्तनाचे उद्दिष्ट बाळगते तेव्हा नागरिकांनी किमान शिस्त पाळली पाहिजे.

ब) राज्याच्या आणि व्यक्तींच्या कल्याणासाठी नागरिकांनी कर्तव्ये मान्य केली पाहिजेत.

क) ही कर्तव्ये मुलभूत हक्कांना पूरक आहेत.

ड) समावेशनामुळे सुसंस्कृत समाजातील नागरिकामध्ये नागरी जाणीव विकसित होईल.

 वरील विधानांपैकी कोणते बरोबर आहे / आहेत ?


1) अ      

2) ब, क     

3) अ, ब, क

 4) सर्व


उत्तर :- 4



६) कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला ?

1) 45 वी घटना दुरुस्ती      

2) 46 वी घटना दुरुस्ती

3) 42 वी घटना दुरुस्ती      

4) 44 वी घटना दुरुस्ती


उत्तर :- 3


७) भारतीय राज्यघटनेचे कलम ‘51अ’ कशा संबंधी आहे ?

1) मूलभूत कर्तव्ये    

2) मूलभूत हक्क    

3) मार्गदर्शक तत्त्वे    

4) राष्ट्रपती


उत्तर :- 1


८) घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश ........................ च्या शिफारशीवरून करण्यात आला.

1) वल्लभभाई पटेल समिती  

2) कृपलानी समिती  

3) सरकारिया आयोग  

4) स्वर्ण सिंग समिती


उत्तर :- 4


९) भारतीय राज्यघटनेतील व्यक्तीच्या मूलभूत कर्तव्याची तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली आहे ?

1) फ्रान्स      

2) यु.एस.ए.    

3) यु.एस.एस.आर    

4) यु.के.


उत्तर :- 3


१०) मूलभूत कर्तव्यांच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा.

अ) मूलभूत कर्तव्ये नागरिकांना शिक्षित करण्याची भूमिका बजावतात.

ब) हक्क कर्तव्यांसोबत निगडित असलेच पाहिजेत.

क) कर्तव्ये स्वत:हून लागू होत नाहीत.

ड) अशा प्रकारची कर्तव्ये साधारणत: पाश्चात्य उदारवादी देशांच्या राज्यघटनेत आढळतात.

         वरीलपैकी कोणते विधान / विधाने चुकीची आहेत ?


1) अ, क      

2) ब, ड      

3) ब, क, ड    

4) ड


उत्तर :- 4


१) इन्टरनॅशनल युनियन फॉर द काँझर्वेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेस तर्फे सादर झालेल्या वर्ल्ड काँझर्वेशन स्ट्रॅटेजीत 

     ब्रंटलँडच्या अहवालात सन 1980 मध्ये चिरंतन विकास ही संज्ञा सर्वप्रथम वापरली गेली त्या अहवालाचे शीर्षक काय होते ?

 

   1) आपले उत्तम भवितव्य   

   2) आपले अंधारलेले भवितव्य

   3) आपले सामुदायिक भवितव्य   

   4) आपले असाधारण भवितव्य


उत्तर :- 3


२) आंतरराष्ट्रीय विकास संस्था ............................... करते.

   अ) ग्रामीण पायाभूत सुविधासाठी वित्तपुरवठा 

   ब) ठिबक सिंचनासाठी वित्तपुरवठा

   क) बाजारपेठ सुविधांसाठी वित्तपुरवठा    

   ड) निर्यातीकरिता वित्तपुरवठा


  1) अ, क   

  2) अ, ब आणि क     

  3) अ, ड    

  4) ब 


उत्तर :- 1


३) BPO सेवा या ....................... सेवांच्या उपघटक आहेत.


   1) व्यापारी    

    2) संगणक उत्पादन    

   3) माहिती व तंत्रज्ञान संबंधित  

   4) संशोधन व अभियांत्रिकी


उत्तर :- 3


४) आर्थिक विकास आणि पर्यावरण यांमधील संबंध दर्शविणा-या प्रमेयाचे नाव काय ?

   1) पर्यावरणीय फिलिप्स वक्र गृहितक 

   2) पर्यावरणीय मार्शल वक्र गृहितक

   3) पर्यावरणीय पिगू वक्र गृहितक     

   4) पर्यावरणीय कुझनेट्स वक्र गृहितक


उत्तर :- 4


५) स्त्री सक्षमीकरण म्हणजे काय ?

   1) स्त्रियांची सामाजिक – आर्थिक स्थिती सुधारणे.   

   2) स्त्रियांच्या साक्षरतेचे प्रमाण सुधारणे.

   3) स्त्रियांना रोजगारसंधी पुरविणे. 

   4) स्त्रियांचा आर्थिक सहभाग वाढविणे.


उत्तर :- 1


६) निरंतर विकास ही संकल्पना प्रथम कुठे मांडण्यात आली ?

   1) वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रेटेजी   

   2) रियो वसुंधरा परिषद

   3) क्वेटो परिषद   

   4) वरीलपैकी  नाही


उत्तर :- 1


७) 2000 साली स्वीकारलेल्या सहस्त्रक विकास उद्दिष्टांमध्ये याचा समावेश आहे :

   अ) दारिद्रय आणि उपासमारीचे निर्मूलन.    

   ब) प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण.

   क) सर्वांना विनामूल्य आणि सुरक्षित पेयजल.  

  ड) पर्यावरण निरंतता


   1) अ फक्त  

  2) अ, ब, ड   

  3) क फक्त  

  4) वरील सर्व


उत्तर :- 2


८) चलन संख्यामान सिध्दांतातील समीकरण :

     MV = PT ........................... म्हणून संबोधले जाते.


   1) रॉबर्टचे समीकरण  

  2) मार्शलचे समीकरण

  3) केनेसियनचे समीकरण    

  4) फिशरचे समीकरण


उत्तर :- 3


९) प्राथमिक सहकारी पतसंस्थांना खालील बाबींची पूर्तता करणे आवश्यक असते :

   अ) त्या त्या खेडयातील रहिवासी असणारे किमान दहा किंवा त्यापेक्षा अधिक सदस्य आवश्यक असतात.

   ब) या पतसंस्थांचे खेळते भांडवल हे सदस्यांकडून आकारलेले शुल्क किंवा ठेवींच्या स्वरूपात असावे.

   क) या पतसंस्था शेतक-यांना सवलतीच्या दरात कर्ज देतात.    

   ड) या पतसंस्था फक्त लहान शेतक-यांना कर्ज देतात.


   1) अ, ड    

  2) ब, क व ड  

  3) अ, ब व क   

  4) वरील सर्व


उत्तर :- 1


१०) भारताच्या बी.पी.ओ. सेवांचे दोन मुख्य ग्राहक ............................. आहेत.

अ) अमेरिका   ब) जपान      क) जर्मनी    ड) पश्चिम युरोप

   1) अ आणि ड  

  2) अ आणि क    

   3) ब आणि ड  

  4) क आणि ड


उत्तर :- 3


१) खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळते ?

   1) एका विशिष्ट धर्माच्या उत्तेजनासाठी : अनुच्छेद – 26 कर देण्याचे स्वातंत्र्य

   2) धार्मिक व्यवहारांच्या व्यवस्थापनाचे : अनुच्छेद – 27 स्वातंत्र्य

   3) ठराविक शैक्षणिक संस्थामध्ये धार्मिक : अनुच्छेद – 28 शिक्षण किंवा धार्मिक उपासनांना उपस्थित राहण्याचे स्वातंत्र्य

   4) शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा : अनुच्छेद – 29 आणि त्याचे प्रशासन करण्याचा अल्पसंख्याकांचा हक्क


उत्तर :- 3


२) ‘कायद्यापुढील समानता’ (Equality before Law) हा नियम अनिर्बंध नाही. त्याबाबतीत घटनात्मक आणि अन्य अपवाद 

     आहेत. खालीलपैकी कोणते अनुच्छेद 14 ला अपवाद आहेत ?

   अ) भारताचे राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना काही विशेष हक्क आहेत.

   ब) संसद सदस्य आणि राज्याच्या विधीमंडळाचे सदस्य यांच्याविरुध्द त्यांनी संसदेत अथवा राज्य विधीमंडळात केलेल्या भाषणाबद्दल कोणत्याही न्यायालयात खटला चालविता येत नाही.

   क) परदेशी दूत आणि राजनीतीज्ञ यांना फौजदारी दाव्याबाबत विशेष हक्क नाहीत तर केवळ दिवाणी दाव्याबाबत आहेत.

   ड) अनुच्छेद 31 – C हा अनुच्छेद 14 ला अपवाद आहे.

   1) अ, ब आणि क   

   2) ब, क आणि ड   

   3) अ, ब, क आणि ड 

   4) अ, ब आणि ड


उत्तर :- 4


१९८३) भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश करण्यात आला आहे ?

   1) तिस-या भागात   

   2) पहिल्या भागात  

   3) चौथ्या भागात   

   4) दुस-या भागात

उत्तर :- 3


१९८४) भारत सरकार अधिनियम, 1935 मधील ‘सूचनापत्राचा’ समावेश 1950 च्या भारतीय संविधानात कसा केला आहे ?

   1) मूलभूत हक्क    

  2) मार्गदर्शक तत्त्वे  

  3) मूलभूत कर्तव्ये   

  4) केंद्र सूची

उत्तर  :- 2


५) भारतीय राज्यघटनेच्या IV थ्या विभागात 42 व्या घटनादुरुस्तीनुसार खालीलपैकी कोणती उपकलमे समाविष्ट करण्यात आली?

   अ) कलम 39 – समान न्याय आणि मोफत कायदेविषयक सहाय्य

   ब) कलम 43 – उद्योगांच्या व्यवस्थापनात कामगारांना सहभाग

   क) कलम 48 – पर्यावरणात सुधारणा आणि जंगले व वन्यजीव यांचे संरक्षण

 1) फक्त अ    

2) फक्त ब आणि क   

3) फक्त अ आणि क    

4) वरील सर्व


उत्तर :- ४



६) पुढील दोन पैकी कोणते विधान बरोबर आहे ?

   अ) भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 23 मध्ये “प्रदूषण मुक्त, स्वच्छ पर्यावरणाची” हक्क अंतर्भूत आहे.

   ब) जर असे पर्यावरण धोक्यात आले तर नागरिकांना संविधानाच्या कलम 34 खाली ते दूर करण्यास्तव हक्क असेल.

   1) अ  

    2) ब   

   3) दोन्ही    

  4) एकही नाही


उत्तर :- 4


७) भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारावरील मर्यादा आहेत :

   अ) देशाची सुरक्षा  

   ब) न्यायालयांचा अवमान

   क) बदनामी     

   ड) भारताचे सार्वभौमत्व व एकात्मता


   1) फक्त अ, ब, क  

   2) फक्त अ, क, ड 

   3) फक्त अ, ब, ड 

   4) वरील सर्व


उत्तर :- 4


८) कोणत्या घटनादुरुस्तीनुसार अनु. जाती / जमाती आणि इतर मागास वर्गासाठी खाजगी विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत 

1) 92 व्या   

2) 93 व्या    

3) 94 व्या  

4) 95 व्या


उत्तर :- 2


९) स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारामध्ये सहकारी संस्था स्थापन करण्याच्या अधिकाराचा समावेश ................. व्या घटनादुरुस्तीने  करण्यात आला.

   1) 97   

   2) 96    

  3) 95     

  4) 94

उत्तर :- 1


१०) खालील विधाने विचारात घ्या :

   अ) ‘राज्य हे सहा वर्षापासून ते चौदा वर्षापर्यंतच्या मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देईल’ हा त्यांचा मूलभूत हक्क आहे.

 ब) ‘जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्याने आपल्या आपल्यास अथवा पाल्यास त्याच्या सहाव्या वर्षापासून ते चौदाव्या  वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे’ हे त्याचे मूलभूत कर्तव्य आहे.

   क) ‘राज्य हे बालकांचे  वय सहा वर्षाचे होईपर्यंत त्यांचे संगोपन करण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी तरतूद करील’ हे मार्गदर्शक तत्त्व आहे.

          वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे ?


   1) अ आणि ब    

  2) ब आणि क   

  3) अ आणि क  

  4) वरील सर्व


उत्तर :- 4



१) केंद्राकडून राज्यांना होणारे वाढते साधनसामग्री हस्तांतर ........................... दर्शवते.


   अ) राज्य व केंद्र यामध्ये वाढते एकत्रीकरण   

   ब) राज्याचे केंद्रावर असहाय्य अवलंबन

   क) राज्यांनी महसुल उभारणीत केलेले दुर्लक्ष

   1) अ, ब आणि क 

   2) अ आणि ब    

   3) ब आणि क   

   4) फक्त क


उत्तर :- 2


२) राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक या शिखर संस्थेची स्थापना खालील कारणामुळे करण्यात आली :

   1) कृषी पुनर्रचीत पतपुरवठा विकास मंडळाचा (ARDC) पतपुरवठयातील सहभाग कार्यक्षम नव्हता.

   2) राष्ट्रीय सहकारी विकास मंडळास (NRDC) निर्धारित उद्देश साध्य करता आले नाहीत.

   3) कृषी पतपुरवठा विभाग(ACD)   वाढीवर मागणीनुसार पुरवठा करण्यास असमर्थ होता.

   4) वरीलपैकी नाही.    

उत्तर :- 1


३) देशाच्या आर्थिक बाबींवर नियंत्रण ठेवण्याचे काम कायदेमंडळाच्या कोणत्याही समितीला करावे लागते ?


   अ) लोकलेखा समिती     

   ब) अंदाज समिती    

   क) सार्वजनिक उद्योग समिती    

   ड) वरील सर्व

   वरीलपैकी कोणते पर्याय बरोबर आहे ?

   1) फक्त अ   

  2) अ आणि ब फक्त  

  3) ब आणि क फक्त   

  4) ड फक्त


उत्तर :- 4


४) मानव विकास निर्देशकांचे (HDI) मूलभूत तीन घटक पुढीलपैकी कोणते  ?

   1) जन्माच्या वेळचे अपेक्षित आयुर्मान प्रौढ साक्षरता दर – स्थूलशिक्षण प्रवेश दर आणि दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पादन

   2) आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरणातील खर्च

   3)दारिद्रय रेषेखालील लोकसंख्या, दारिद्रय रेषेवरील लोकसंख्या आणि निवासाची व्यवस्था.

   4) सरासरी आयुर्मान, प्रौढ साक्षरता दर आणि राष्ट्रीय उत्पन्न

उत्तर :- 1


५) उच्च शक्ती पैसा म्हणजे काय ?

   अ) मध्यवर्ती बँकेकडील बँकाचा राखीव निधी    

   ब) बँकांची सर्व कर्जे आणि उचल

   क) बँकांनी धारण केलेला पैसा        

   ड) लोकांच्या हातातील पैसा आणि मध्यवर्ती बँकेकडील राखीव निधी, बँकाकडील अतिरीक्त राखीव निधी. 


   1) अ आणि ब  

  2) ब फक्त   

  3) क आणि ड    

  4) ड फक्त


उत्तर :- 4


६) सहकारी क्षेत्राचे प्रमुख उद्दिष्ट कोणते ?

   1) उद्योगांना वित्तीय मदत पुरविणे.     

   2) आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांच्या कल्याणाचे महत्तीकरण करणे.

   3) शेतीला पतपुरवठा करणे.   

   4) ग्राहकांचे हितसंबंध जोपासणे.


उत्तर :- 2


७) खालीलपैकी कोणते सार्कचे उद्दिष्ट नाही ?

   1) दक्षिण पूर्व आशियातील लोकांच्या कल्याणाला प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या राहणीमानाच्या गुणवत्तेत वाढ करणे.

   2) प्रदेशातील आर्थिक व सामाजिक वृध्दी आणि सांस्कृतिक विकासाला गती देणे.

   3) दक्षिण आशियातील देशांच्या एकत्रित स्वावलंबनास प्रोत्साहन देणे व आणखी मजबूत बनविणे.

   4) एकमेकांचा परस्पर विश्वास, समज आणि अधिमूल्यनात भर घालणे.


उत्तर :- 1


२०८८) जननी सुरक्षा योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे ?

   1) प्रसुतीकाळातील मृत्यू आणि नवजात बालकांचे मृत्यू रोखणे.    

   2) जन्मदर कमी करणे.

   3) मातांची काळजी घेणे.         

   4) नवजात बालकांचे मृत्यूदर रोखणे.


उत्तर :- 1


९) 1980 च्या राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट काय होते ?

   1) ग्रामीण युवकांना स्वयम रोजगारासाठी बीज भांडवलाचा पुरवठा करणे.

   2) ग्रामीण युवकांना स्वयम रोजगारासाठी प्रशिक्षणाच्या सुविधा पुरविणे.

   3) ग्रामीण भागातील गरीब लोकांना रोजगाराच्या संधी पुरविणे.

   4) सुशिक्षित बेरोजगारांना तांत्रिक मदत करणे.


उत्तर :- 3


१०) 2011 च्या जनगणनेतील आकडेवारीवरून साक्ष्ररतेच्या प्रमाणानुसार पुढील जिल्ह्यांचा क्रम लावा.

   अ) नागपूर  

   ब) मुंबई शहर    

  क) मुंबई उपनगर   

  ड) अकोला


  1) अ, ब, ड, क    

 2) क, अ, ब, ड   

 3) ब, क, ड, अ   

 4) ब, क, अ, ड


उत्तर :- 2


🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿


No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...