Ads

31 December 2019

मार्च महिन्यापर्यंत कोल्हापूर आणि नांदेडमध्ये सुरु होणार DNA लॅब

👉पुढच्या वर्षीपासून सायबर गुन्हे व हत्या, लैंगिक अत्याचार व पितृत्व तपासणी, सारख्या प्रकरणांमध्ये न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा आपला अहवाल लवकर देऊ शकतील. त्यामुळे पोलिसांच्या तपासाला गती मिळेल, गुन्ह्यांची उकल लवकर होईल व कोर्ट सुद्धा गतीने न्यायदान करू शकेल.

👉आता महाराष्ट्रात असलेल्या आठ न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा पैकी फक्त दोन ठिकाणी, म्हणजे कोल्हापूर व नांदेड येथे डीएनए प्रयोगशाळा नाहीये. परंतु येत्या वर्षात साधारणपणे मार्च महिन्यापर्यंत, या दोन्ही ठिकाणी हे विभाग सुरू करण्यात येतील.

👉राज्यात दरवर्षी साधारणपणे सोळा हजार प्रकरणे डीएनए तपासणीसाठी पाठवण्यात येतात. यात बलात्कार, लैंगिक अत्याचार, पितृत्व परीक्षा, हत्या अशा गुन्ह्यांचा समावेश होतो. काळजीची बाब म्हणजे यात साधारणपणे चार हजारांच्यावर प्रकरणे ही लहान मुलं, बालके व अल्पवयीन यांच्यासोबत घडलेल्या गुन्ह्यांच्या संबंधी असतात.

👉गृहखात्यातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळांमध्ये साधारणपणे ३२०० च्या आसपास अहवाल प्रलंबित आहेत. याचे कारण असे की साधारणपणे एक अधिकारी महिन्याला पंचवीस ते तीस प्रकरणच निकाली काढू शकतो. या कामाचे स्वरूप साधारणपणे असेच आहे.

👉राज्य शासनाने या वर्षी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे २६  कोटी खर्च करून कोल्हापूर व नांदेड येथे डीएनए तपासणी प्रयोगशाळा स्थापन करण्यात येतील. त्याच बरोबर, इतर सहा ठिकाणी नवीन मशीन स्थापन करून त्यांचा वापर फक्त प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शअल ऑफेंसेस ॲक्ट म्हणजे पॉक्सोशी निगडीत गुन्ह्यांच्या तपासणीसाठी करण्यात येईल. या साठी केंद्रशासनाने रुपये५३.७० कोटीचा निधी राज्य शासनाला मंजूर केला आहे. ही व्यवस्था येत्या वर्षी सुरू करण्यात येईल.

👉सध्या फक्त मुंबई, पुणे, व नागपूर इथल्या प्रयोगशाळांमध्ये सायबर गुन्हे संबंधित विषयाची तपासणी केली जाते. पण संचालनालयाचा मानस हा इतरही सर्व ठिकाणी सायबर फॉरेन्सिक विभाग सुरू करण्याबाबत आहे. त्याचबरोबर ठाण्याच्या मिनी फॉरेन्सिक सायन्स लॅब मध्ये सुद्धा हा विभाग सुरू करण्यात येईल कारण नोंदवल्या जाणारे एकूण गुन्ह्यांमध्ये ठाणे व पालघर जिल्हा यांचा आकडा मोठा आहे.

👉हा विभाग संगणकाशी संबंधित गुन्हे, जसे हॅकिंग, मेलवरून धमक्या देणे, क्रेडिट कार्ड संबंधी गुन्हे, डेटा ची चोरी, फसवणूक व छायाचित्रातील बदल या अशा गुन्ह्यांचा तपास करतो. महाराष्ट्रात दरवर्षी न्याय सहाय्यक प्रयोगशाळेकडे साधारणपणे ७ हजार सायबर गुन्हे तपासणीसाठी येतात.

👉या सर्व प्रयोगशाळांमध्ये दहा विभाग आहेत. या सर्व विभागांमध्ये दरवर्षी साधारणपणे सव्वादोन ते अडीच लाख प्रकरण तपासणीसाठी पाठवण्यात येतात.

चालू घडामोडी प्रश्नसंच

1)कोण 2019 साली गुगल सर्च इंजिनवर भारतातले सर्वाधिक शोधले जाणारे उद्योगपती आहेत?
(A) रतन टाटा.   √
(B) अजीम प्रेमजी
(C) आनंद महिंद्रा
(D) गौतम अदानी

2)______ या देशाचा ‘लॉन्ग मार्च-5’ प्रक्षेपक विंचिंग अंतराळ केंद्रावरून यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आला.
(A) उत्तर कोरिया
(B) जापान
(C) चीन.   √
(D) सिंगापूर

3)_____ यांच्यावतीने ‘कवींची राष्ट्रीय परिषद 2020’ आयोजित केली गेली.
(A) दूरदर्शन
(B) ऑल इंडिया रेडियो.   √
(C) द पोयट्री सोसायटी
(D) साहित्य अकादमी

4)सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने गठित केलेल्या ‘आर्थिक सांख्यिकी’ विषयक स्थायी समितीचे अध्यक्ष कोण असणार आहे?
(A) अरविंद पानगरिया
(B) बिबेक डेब्रोय
(C) प्रणब सेन.  √
(D) रजनीश कुमार

5)_____ राज्यातल्या प्रसिद्ध ‘मांडू’ महोत्सवाचा शुभारंभ झाला.
(A) मध्यप्रदेश.  √
(B) छत्तीसगड
(C) ओडिशा
(D) आंध्रप्रदेश

6)भारतीय रिझर्व्ह बँकेनी सर्व मोठ्या सहकारी बँकांना _ रुपयांपेक्षा जास्त बुडीत रकमेची नोंद करण्याचे निर्देश दिले.
(A) 10 कोटी
(B) 6 कोटी
(C) 5 कोटी.  √
(D) 2 कोटी

7)संयुक्त राष्ट्रसंघाने सायबर गुन्हेगारीच्या संदर्भात एका नवीन आंतरराष्ट्रीय कराराचा  मसुदा तयार करण्यास मंजूरी दिली. सायबर गुन्हेगारीच्या संदर्भात खाली दिलेल्यापैकी कोणता पहिला जागतिक करार झालेला आहे?
(A) बुडापेस्ट करारनामा.   √
(B) पालेर्मो करारनामा
(C) मॉस्को करारनामा
(D) रोम करारनामा

8)संयुक्त राष्ट्रसंघाच्या अर्थसंकल्पात प्रथमच 3.07 अब्ज डॉलरच्या निधीसह _ यासाठी निधी समाविष्ट केला गेला आहे.
(A) युद्ध परिस्थितीतल्या गुन्ह्यांचा तपास.   √
(B) ज्ञान निर्मिती मोहीम
(C) मानवतावादी मदत
(D) शांती मोहीम

9)‘अरोमा मिशन’ अंतर्गत गेरॅनियम या औषधी वनस्पतीचे पीक घेण्यास चालना देण्यासाठी कोणत्या संस्थेनी नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे?
(A) CSIR-केंद्रीय औषधी व सुगंधी वनस्पती संस्था.   √
(B) CSIR-केंद्रीय औषधी संशोधन संस्था
(C) भारतीय एकात्मिक औषधी संस्था
(D) तेजपूर विद्यापीठ

10)अर्थमंत्री निर्मला सीतारमण ह्यांनी बँकांना संलग्न असलेल्या मालमत्तांचा ऑनलाईन लिलाव करण्यासाठी _ व्यासपीठाचे उद्घाटन केले.
(A) eBक्रय.   √
(B) ईबँक
(C) ईबॅकरे
(D) ईबीड

आंध्रप्रदेश राज्याचे ‘दहशतवाद-रोधी दल’ ......या नावाने ओळखले जाते.
:- ऑक्टोपस.

पाकिस्तान या देशाचे नवनियुक्त सरन्यायाधीश कोण आहेत?
:- गुलजार अहमद. 

QRSAM क्षेपणास्त्राची चाचणी _ या संस्थेनी घेतली.
 :- संरक्षण संशोधन व विकास  संस्था (DRDO)

आसामच्या मंत्रिमंडळाने अशी घोषणा केली आहे की ‘आसामी’ भाषेला राज्य भाषा बनवतील. त्याच्या संदर्भात भारतीय राज्य घटनेतल्या कोणत्या कलमात सुधारणा केली जाणार?
:- कलम 345.

_____ वर्षांपेक्षा जास्तच्या कालावधीनंतर क्युबा या देशाच्या पंतप्रधानपदी मॅन्युएल मरेरो क्रूझ यांची नेमणूक करण्यात आली.
  :- 40. 

कोणती संस्था ‘शाश्वत विकास ध्येये (SDG) भारत निर्देशांक आणि डॅशबोर्ड 2019–20’ याच्या द्वितीय आवृत्तीचे अनावरण करणार आहे?
:- NITI आयोग.

मोठ्या राज्यांच्या गटात कोणते राज्य ‘सुशासन निर्देशांक’मध्ये अव्वल ठरले?
:- तामिळनाडू.

कोणत्या वर्षी ‘भारतनेट’ प्रकल्प राबविण्यास सुरूवात झाली?
:- वर्ष 2011.

26 डिसेंबर या दिवशी कोणत्या व्यक्तीची 120 वी जयंती साजरी केली गेली?
:- शहीद उधम सिंग.

पाकिस्तान या देशाने कोणत्या देशातून ‘पोलिओ मार्कर’ आयात करण्याचा निर्णय घेतला?
:- भारत.

ऐश्वर्य तोमर आणि रुद्रांक्ष पाटील यांना सुवर्ण

🔰 गतविजेत्या दिव्यांश सिंग पनवारला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

🔴लक्ष्य चषक नेमबाजी स्पर्धा

🔰 मध्य प्रदेशच्या १८ वर्षीय ऐश्वर्य प्रताप सिंग तोमरने आर. आर. लक्ष्य चषक अखिल भारतीय निमंत्रितांच्या एअर रायफल नेमबाजी स्पर्धेतील १० मीटर वरिष्ठ गटाचे रविवारी सुवर्णपदक पटकावले.

🔰 वर्षांच्या पूर्वार्धात ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात ऑलिम्पिक पात्रता स्थान निश्चित करण्याची किमया साधणारा ऐश्वर्य पहिल्या १० फैरींमध्ये राजस्थानच्या १६ वर्षीय यश वर्धनपेक्षा पिछाडीवर होता; परंतु १०.७, १०.८ आणि १०.९ असे सातत्याने गुण मिळवणाऱ्या ऐश्वर्यने एकूण २५२.३ गुणांसह विजेतेपदावर नाव कोरले.

🔰 यशने २५०.७ गुणांसह रौप्यपदक पटकावले, तर हृदय हझारिकाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. गतविजेत्या दिव्यांश सिंग पनवारला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

🔰 कनिष्ठ गटात ठाण्याच्या रुद्रांक्ष पाटीलने २४९.९ गुणांसह सुवर्णपदक जिंकले, तर पवन अंधारेला (२४९.१ गुण) रौप्यपदक मिळाले. सौरव लगडने कांस्यपदक पटकावले.

🔴 निकाल

🔰 वरिष्ठ गट : १. ऐश्वर्य तोमर (मध्य प्रदेश), यश वर्धन (राजस्थान), ३. हृदय हझारिका (लक्ष्य, नवे पनवेल)

🔰कनिष्ठ : १. रुद्रांक्ष पाटील (ठाणे), २. पवन अंधारे (लक्ष्य, वाशी), ३. सौरव लगड (लक्ष्य, नवे पनवेल)

आयआयटी टेकफेस्टमध्ये ‘आईन्स्टाईन’ रोबो

📌 मुंबई आयआयटीच्या 3 जानेवारीपासून सुरू होत असलेल्या टेकफेस्टमध्ये यावेळी हाँगकाँगमधून येणाऱ्या आईन्स्टाईन रोबो आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहे.

📌 हॅन्सन रोबोटिक्स यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून या रोबोची निर्मिती केली आहे.

📌 तर त्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या समोर उभ्या असणाया व्यक्तीच्या चेहयावरील भावनांना ओळखून समोरील व्यक्तीची भावना तो ओळखू शकतो. व्यक्ती आनंदी, दु:खी, संतप्त, घाबरलेली, गोंधळलेली आहे हे रोबो सांगेल. एवढेच नव्हे तर व्यक्ती स्त्री आहे की पुरुष, त्याचे वय किती याची माहितीही तो देईल.

📌 तसेच या रोबोला 10 लाखांपेक्षा जास्त चेहऱ्यांवरील भावभावना ओळखण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

📌 मुंबई आयआयटीचे टेकफेस्ट यंदा 3 ते 5 जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या टेकफेस्टमध्ये 5 जानेवारी रोजी टेकवेडे आईनस्टाईनला भेटू शकतील.

📌 टेकफेस्टमध्ये येणायांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी तो सज्ज झाला आहे. आईन्स्टाईनप्रमाणे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर हा रोबो देईल, असा दावा आयोजकांनी केला आहे.

📌 याआधी ह्युमनॉइड सोफिया नावाचा रोबो टेकफेस्टमध्ये सहभागी झाला होता.

📌 तेव्हा सोफियाने ‘नमस्ते इंडिया’ म्हणून मुलाखतीदरम्यान सर्वांचे स्वागत केले होते. सोफियापेक्षा हा रोबो अधिक विकसित आहे. कारण तो केवळ बोलणारच नाही तर भावभावना ओळखून त्याबाबत उपस्थितांशी संवाद साधेल, त्यांना यासंदर्भातील अधिक माहिती देईल, असे आयोजकांनी सांगितले.

📌आईन्स्टाईन व्यक्तीकडे बघून त्या व्यक्तीच्या मनात काय चालले आहे, त्याच्या भावना ओळखू शकतो. जसे की त्याच्या समोर उभी असलेली व्यक्ती आनंदात आहे की दु:खात हे रोबो ओळखू शकेल. एखाद्या व्यक्तीच्या मनात भीती असेल तर तीदेखील तो अचूक ओळखेल, असे आयोजकांनी सांगितले. सोबतच त्या व्यक्तीचे लिंग, वय अशा बयाच गोष्टी हा रोबो सांगणार आहे. तसे प्रशिक्षणच आईन्स्टाईनला देण्यात आले आहे.

📌 विशेष म्हणजे आईन्स्टाईन हा हाँगकाँगचा रोबो असून तो भारतात पहिल्यांदाच येणार आहे.

सायबर गुन्हे रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय संधीचा मसुदा तयार करण्यासाठी  संयुक्त राष्ट्रसंघाची मान्यता

- सायबर गुन्हे रोखण्याच्या उद्देशाने एक आंतरराष्ट्रीय संधी करण्यासाठी त्याचा मसुदा तयार करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेनी त्यासंबंधी एक ठराव मंजूर केला आहे.

- हा ठराव रशियाने मांडला. आता सर्व जगाचे प्रतिनिधित्व करणारी एक तज्ञ समिती स्थापन केली जाणार आहे. ही समिती सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी देशांमध्ये माहिती आणि संपर्क तंत्रज्ञानाच्या आदानप्रदानात मदत व्हावी यासाठी पाळावयाच्या शिष्टाचारांचे विस्तृत वर्णन करणार.

- युरोपीय संघ (EU), अमेरिका आणि इतर देशांच्या आक्षेपांवरून संयुक्त राष्ट्रसंघाकडे यासंदर्भात वारंवार मागणी होत आली आहे.

▪️संयुक्त राष्ट्रसंघाची महासभा (UNGA)

- आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ (UN) या आंतरसरकारी संघटनेची स्थापना करण्यात आली.

- दुसर्‍या महायुद्धानंतर दिनांक 24 ऑक्टोबर 1945 रोजी या संघटनेची स्थापना करण्यात आली. UNचे मुख्यालय मॅनहॅटन (न्यूयॉर्क शहर, अमेरिका) येथे आहे. 

- सध्या या संघटनेचे जगभरात 193 सदस्य देश आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाची महासभा (UNGA) हे संयुक्त राष्ट्रसंघामधल्या सहा प्रमुख अंगांपैकी एक आहे, ज्यामध्ये सर्व सदस्य राष्ट्रांना समान प्रतिनिधित्वाचा हक्क दिला गेला आहे.
------------------------------------------------

लष्करप्रमुख बिपीन रावत हे भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेंस स्टाफ 【CDS】

🎆 लष्करप्रमुख बिपीन रावत हे भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेंस स्टाफ (सीडीएस) होणार आहेत. केंद्र सरकारने रविवारीच सीडीएस पोस्टसाठी वयोमर्यादा वाढवली होती.

🎆 सीडीएसचे पद हे तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांपेक्षावरील हुद्याचे असणार आहे.

🎆 जनरल बिपीन रावत हे ३१ डिसेंबर रोजी लष्करप्रमुखांच्या पदावरून निवृत्त होणार आहेत.

🎆 संरक्षण मंत्रालयाने लष्करी सेवा व नियम कायद्यात सुधारणा केल्या आहेत.

🎆 संरक्षण मंत्रालयाने २८ डिसेंबर रोजी काढलेल्या अधिसूचनेत सीडीएस प्रमुख ६५ वर्षांपर्यंत सेवेत राहू शकतात असे नमूद केले आहे.

🎆 केंद्र सरकारला आवश्यकता वाटल्यास सीडीएस प्रमुखांना मुदतवाढ देण्यात येऊ शकते.

🎆 सध्याच्या नियमांनुसार, तिन्ही दलांचे प्रमुख वय ६२ वर्ष अथवा तीन वर्षांपर्यंत कार्यरत राहू शकतात.

🎆 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने २४ डिसेंबर रोजी सीडीएस पद आणि त्यांचे कर्तव्य व नियमांना मंजुरी दिली होती.

🎆 सीडीएस पद सोडल्यानंतर संबंधित व्यक्तिला कोणतेही पद स्विकारता येणार नाहीत.

🌀 सीडीएस म्हणजे काय?

🎆 भूदल, हवाई दल आणि नौदल या तिन्ही सैन्य दलाचे सीडीएस प्रमुख सल्लागार असणार आहेत.

🎆 भारतासमोर असणाऱ्या संरक्षणविषयक आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी तिन्ही सैन्य दलात ताळमेळ वाढवण्याची जबाबदारी चीफ ऑफ डिफेंस स्टाफची(सीडीएस) असणार आहे.

30 December 2019

शॉपिंगसाठी RBI ने आणला ‘पीपीआय’चा नवा पर्याय

🎆 डिजिटल पेमेंटसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) आता आणखी एक नवा पर्याय आणला आहे.

🎆 त्यानुसार, प्रिपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट (पीपीआय) ही नवी डिजिटल पेमेंट सिस्टिम लॉन्च करण्यात आली. याद्वारे ग्राहकांना खरेदी करणे सोपे होणार आहे.

🎆 भारतात सध्या पैशांचे व्यवहार करण्यासाठी डिजिटल पेमेंटचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये युपीआय, नेटबँकिंग, डेबिट-क्रेडिट कार्ड, एआयपीएस, मोबाईल वॉलेट, मोबाईल बँकिंग आणि पीओएस मशीन आदींचा समावेश आहे.

🎆 त्यानंतर आता आरबीआयने प्रिपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट (पीपीआय) हा नवा पर्याय आणला आहे.

🎆 तर पीपीआयचे विस्तारीत रुप प्रिपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट असे आहे.

🎆 हे एक प्रिपेड अकाऊंट असणार आहे.

🎆 हे अकाऊंट दर महिन्याला तुम्ही रिचार्ज करु शकता. यासाठी 10 हजार रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

🎆 एकदा हे अकाऊंट रिचार्ज झाले की त्याचा वापर तुम्ही रोजच्या गरजेच्या वस्तू किंवा सेवा खरेदी करण्यासाठी करु शकता. या अकाऊंटचे सर्वांत महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुम्हाला फंड ट्रान्सफरची सुविधा मिळणार नाही.

🎆 यातील पैसे केवळ वस्तू आणि सेवा खरेदीसाठीच वापरता येणार आहेत. हे पेमेंट इन्स्ट्रुमेंट बँकेकडूनकिंवा सध्या अस्तित्वात असलेल्या नॉन बँकिंग पीपीआय प्लेअर्सकडून तयार करुन मिळू शकते.

🎆 तसेच या कंपन्या ग्राहकांची माहिती व्हेरिफाय करुन त्यांना पीपीआय अकाऊंट सुरु करुन देऊ शकतात. यासाठी मोबाईल क्रमांक आणि ओटीपी, त्याचबरोबर केवायसीसाठी लागणारे कोणतेही एक ओळखपत्र आवश्यक असणार आहे.

🎆 या पीपीआयमध्ये केवळ नोंदणीकृत मोबाईल क्रमांक जोडलेल्या बँक अकाऊंटमार्फतच रक्कम जमा करता येणार आहे.

🎆 हे अकाऊंट रिचार्ज करण्यासाठी आरबीआयने वर्षाला 1 लाख 20 हजार रुपयांची मर्यादा निश्चित केली आहे. म्हणजेच महिन्याला केवळ १०,००० रुपयांपर्यंतच रक्कम ग्राहकाला या अकाऊंटमध्ये ठेवता येणार आहेत.

Current Affairs - 30/12/2019

1)कोण 2019 साली गुगल सर्च इंजिनवर भारतातले सर्वाधिक शोधले जाणारे उद्योगपती आहेत?
(A) रतन टाटा.   √
(B) अजीम प्रेमजी
(C) आनंद महिंद्रा
(D) गौतम अदानी

2)______ या देशाचा ‘लॉन्ग मार्च-5’ प्रक्षेपक विंचिंग अंतराळ केंद्रावरून यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आला.
(A) उत्तर कोरिया
(B) जापान
(C) चीन.   √
(D) सिंगापूर

3)_____ यांच्यावतीने ‘कवींची राष्ट्रीय परिषद 2020’ आयोजित केली गेली.
(A) दूरदर्शन
(B) ऑल इंडिया रेडियो.   √
(C) द पोयट्री सोसायटी
(D) साहित्य अकादमी

4)सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने गठित केलेल्या ‘आर्थिक सांख्यिकी’ विषयक स्थायी समितीचे अध्यक्ष कोण असणार आहे?
(A) अरविंद पानगरिया
(B) बिबेक डेब्रोय
(C) प्रणब सेन.  √
(D) रजनीश कुमार

5)_____ राज्यातल्या प्रसिद्ध ‘मांडू’ महोत्सवाचा शुभारंभ झाला.
(A) मध्यप्रदेश.  √
(B) छत्तीसगड
(C) ओडिशा
(D) आंध्रप्रदेश

6)भारतीय रिझर्व्ह बँकेनी सर्व मोठ्या सहकारी बँकांना _ रुपयांपेक्षा जास्त बुडीत रकमेची नोंद करण्याचे निर्देश दिले.
(A) 10 कोटी
(B) 6 कोटी
(C) 5 कोटी.  √
(D) 2 कोटी

7)संयुक्त राष्ट्रसंघाने सायबर गुन्हेगारीच्या संदर्भात एका नवीन आंतरराष्ट्रीय कराराचा  मसुदा तयार करण्यास मंजूरी दिली. सायबर गुन्हेगारीच्या संदर्भात खाली दिलेल्यापैकी कोणता पहिला जागतिक करार झालेला आहे?
(A) बुडापेस्ट करारनामा.   √
(B) पालेर्मो करारनामा
(C) मॉस्को करारनामा
(D) रोम करारनामा

8)संयुक्त राष्ट्रसंघाच्या अर्थसंकल्पात प्रथमच 3.07 अब्ज डॉलरच्या निधीसह _ यासाठी निधी समाविष्ट केला गेला आहे.
(A) युद्ध परिस्थितीतल्या गुन्ह्यांचा तपास.   √
(B) ज्ञान निर्मिती मोहीम
(C) मानवतावादी मदत
(D) शांती मोहीम

9)‘अरोमा मिशन’ अंतर्गत गेरॅनियम या औषधी वनस्पतीचे पीक घेण्यास चालना देण्यासाठी कोणत्या संस्थेनी नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे?
(A) CSIR-केंद्रीय औषधी व सुगंधी वनस्पती संस्था.   √
(B) CSIR-केंद्रीय औषधी संशोधन संस्था
(C) भारतीय एकात्मिक औषधी संस्था
(D) तेजपूर विद्यापीठ

Mpsc Student:
10)अर्थमंत्री निर्मला सीतारमण ह्यांनी बँकांना संलग्न असलेल्या मालमत्तांचा ऑनलाईन लिलाव करण्यासाठी _ व्यासपीठाचे उद्घाटन केले.
(A) eBक्रय.   √
(B) ईबँक
(C) ईबॅकरे
(D) ईबीड

विषय : चालू घडामोडी प्रश्नावली स्पष्टीकरण

प्र.१) कोणता देश भारतात पर्यावरणपूरक शहरी वाहतूक तयार करण्यासाठी आगामी पाच वर्षांमध्ये एक अब्ज युरो एवढ्या रकमेची गुंतवणूक करणार आहे?
अ) इस्राईल      ब) स्वीडन      क) जर्मनी ✅     ड) फ्रान्स

स्पष्टीकरण : जर्मनी देश भारतात पर्यावरणपूरक शहरी वाहतूक तयार करण्यासाठी आगामी पाच वर्षांमध्ये एक अब्ज युरो एवढ्या रकमेची गुंतवणूक करणार आहे.
 
प्र.२) चित्रपट क्षेत्रातल्या कोणत्या व्यक्तीला ‘IFFI 2019’ या कार्यक्रमाचा ‘आयकॉन ऑफ द गोल्डन जुबली’ पुरस्कार देण्याचे जाहीर झाले?
अ) अमिताभ बच्चन     ब) कमल हसन
क) राज बब्बर              ड) रजनीकांत ✅

स्पष्टीकरण : चित्रपट क्षेत्रातल्या रजनीकांत व्यक्तीला ‘IFFI 2019’ या कार्यक्रमाचा ‘आयकॉन ऑफ द गोल्डन जुबली’ पुरस्कार देण्याचे जाहीर झाले.

प्र.३) पवन कपूर यांची .....................मधील नवे भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
अ) सौदी अरेबिया     ब) संयुक्त अरब ✅ अमिराती    क) कुवेत    ड) बहरीन
 
स्पष्टीकरण : पवन कपूर यांची संयुक्त अरब मधील नवे भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

प्र.४) .....................या दिवशी जागतिक व्हेगन दिन पाळतात.
अ) १ ऑक्टोबर         ब) १५ ऑक्टोबर   क) १ नोव्हेंबर ✅    ड) १५ नोव्हेंबर
 
स्पष्टीकरण :  १ नोव्हेंबर या दिवशी जागतिक व्हेगन दिन पाळतात.

प्र.५) .....................मध्ये ‘डिझाइन फेस्टा’ नावाचा कलात्मक कार्यक्रम आयोजित केला गेला.
अ) पॅरिस     ब) टोकियो ✅     क) बीजिंग     ड) रोम

स्पष्टीकरण : टोकियो मध्ये ‘डिझाइन फेस्टा’ नावाचा कलात्मक कार्यक्रम आयोजित केला गेला.

प्र.६) हळद पिवळ्या रंगाची असते हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे?
अ) साम्यानुमान                     ब) केवलगणनात्मक विगमन ✅
क) अभ्युपगमात्मक निगमन    ड) सर्व योग्य

स्पष्टीकरण : हळद पिवळ्या रंगाची असते हे खालीलपैकी केवलगणनात्मक विगमन उदाहरण आहे.

प्र.७) मेंदूतील गाठी व कंठस्थ ग्रंथीतील बिघाड ओळखण्यासाठी कशाचा वापर केला जातो?
अ) कोबाल्ट ६०    ब) सोडिअम २४   क) आयोडीन १३१✅    ड) वरील सर्व

स्पष्टीकरण : मेंदूतील गाठी व कंठस्थ ग्रंथीतील बिघाड ओळखण्यासाठी आयोडीन १३१ वापर केला जातो.

प्र.८) नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘स्कूल एज्युकेशन क्वालिटी इंडेक्स' संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या,

I. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने निर्देशांक प्रसिद्ध केला आहे.

II. या यादीत केरळ आणि बिहार अनुक्रमे प्रथम व तळाशी आहेत.

III. शालेय शिक्षणाच्या क्षेत्रात कोणत्याही केंद्रशासित प्रदेशाचे मूल्यांकन केले गेले नाही.

वरती दिलेले कोणते विधान अचूक आहे?

अ) केवळ I
ब) एकही नाही✅✅✅
क) I आणि II
ड) II आणि III

स्पष्टीकरण : दोन्ही विधाने चूक आहेत.

प्र.९) ____________ याच्यावतीने देशभरात 15 दिवस चालणारा “अॅप्रेंटिसशिप पखवाडा’ नावाचा कार्यक्रम राबविण्यास सुरू करण्यात आला आहे.

अ) कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय
✅✅✅
ब) कामगार व रोजगार मंत्रालय
क) सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय
ड) मनुष्यबळ विकास मंत्रालय

स्पष्टीकरण :  कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय याच्यावतीने देशभरात 15 दिवस चालणारा “अॅप्रेंटिसशिप पखवाडा’ नावाचा कार्यक्रम राबविण्यास सुरू करण्यात आला आहे.

प्र.१०) _____ याला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्यावतीने नवी दिल्लीत ‘आरोग्य मंथन’ नावाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

अ) आयुषमान भारत✅
ब) स्वच्छ भारत
क) राष्ट्रीय पोषण मिशन
ड) मिशन इंद्रधनुष

स्पष्टीकरण :  आयुषमान भारत याला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्यावतीने नवी दिल्लीत ‘आरोग्य मंथन’ नावाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

देशातील सव्वालाख गावांत मार्चपर्यंत मोफत वाय-फाय..

भारत नेटशी जोडलेल्या देशभरातील सव्वा लाख गावांत मार्च 2020 पर्यंत मोफत वाय-फाय सेवा उपलब्ध करून दिली जाईल, अशी घोषणा केंद्रीय माहिती तंत्रज्ञान व दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी हरियाणातील रेवाडी येथे केली.

तर येत्या चार वर्षांत देशभरातील 6 लाख गावांपैकी 15 टक्के गावांचे रुपांतर डिजिटल गावांत केले जाईल, असे सांगत त्यांनी बुधवारी रेवाडीस्थित गुरुवारा गाव डिजिटल गाव म्हणून घोषित केले.

देशभरातील 1.3 लाख ग्राम पंचायती भारत नेट प्रकल्पाशी जोडली गेली आहेत. अडीच लाख ग्रामपंचायती भारत नेट आॅप्टिकल फायबरशी जोडण्याचे उद्दिष्ट आहे.

इंटरनेट सेवा लोकप्रिय करण्यासाठी भारतनेटशी जोडल्या गेलेल्या सर्व गावांना मार्च 2020 पर्यंत मोफत वाय-फाय सुविधा दिली जाईल. सध्या 48 हजार गांवात वाय-फाय सुविधा आहे.

अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी रेवाडी गावाचे रुपांतर डिजिटल गावांत झाल्याने आनंद होत आहे. यामुळे गावकऱ्यांना शहर, तालुक्याला न जात गावातच एक क्लिकवर सरकारी योजना व सेवा उपलब्ध होईल.

या गावांतील प्रत्येक घर वाय-फाय सुविधा उपलब्ध असेल. एक लाख गावांचे रुपांतर डिजिटल गावांत करण्याच्या  घोषणेनंतर भिवाडी नजीक अल्वरस्थित करींदा गावात व्हीएनएल कंपनीने डिजिटल गावांचे प्रारुप तयार केले होते. तत्कालीन दूरसंचार सचिवांनीही हा एक चांगला उपक्रम असल्याचे म्हटले होते.

महानायक अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान

🅾चित्रपट सृष्टीतील अमूल्य योगदानासाठी महानायक अमिताभ बच्चन यांना भारतीय सिनेजगतातील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अमिताभ बच्चन यांना गौरविण्यात आलं. या कार्यक्रमाला त्यांची पत्नी खासदार जया बच्चन आणि मुलगा अभिषेकही उपस्थित होता.

🅾चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान असलेला दादासाहेब फाळके पुरस्कार यंदा महानायक अमिताभ बच्चन यांना जाहीर झाला होता. केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या पुरस्काराची घोषणा केली होती. पण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याला प्रकृती बरी नसल्यानं ते उपस्थित राहू शकले नाही.

🅾त्यामुळे हा पुरस्कार आज (२९ डिसेंबर) प्रदान करणार असल्याचं केंद्र सरकारनं जाहीर केलं होतं. रविवारी सायंकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन अमिताभ बच्चन यांना सन्मानित करण्यात आलं