२१ मार्च २०२४

अर्थव्यवस्था या विषयाची तयारी कशी करावी?

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



 #Combine #Prelims साठी भारतीय अर्थव्यवस्थेचे साधारणतः 12 उपघटकांचा अभ्यास करावे लागतात. त्यातील साधारणतः 6 घटकांचा आज आपण आढावा घेऊ.         


❇️ 1.मूलभूत संकल्पना -

यामध्ये अर्थव्यवस्था म्हणजे काय? विकसित,विकासनशील, अविकसित अर्थव्यवस्था म्हणजे काय?इ. संकल्पना clear करून घ्या.कोळंबे सरांच्या पुस्तकामध्ये छान दिल्या आहेत.


प्रश्न - शक्यतो येत नाही. पण या Topic च्या Concepts clear असल्याशिवाय पुढील अर्थव्यवस्था पण समजत नाही.


❇️ 2. राष्ट्रीय उत्पन्न - खूपच conceptual Topic आहे. यातील प्रत्येक concept जोपर्यत व्यवस्थित समजत नाही तोपर्यत खूप अवघड वाटतो. पण एकदा लक्षात आल की मग यासारखा सोपा घटक नाही. कोळंबे सरांच्या पुस्तकात छान cover केलाय.


प्रश्न - Gdp vs Gnp,

        Ndp vs Nnp,

       Gross vs Net

       Value Addition etc. संकल्पनावरती प्रश्न विचारला जातं असतो. अणखी Gdp चे base years चांगले करून ठेवा आणि या base years च्याच Gdp, Poverty, unempolyment etc साठी figure करत चला.


❇️ 3.आर्थिक नियोजन व पंचवार्षिक योजना - आर्थिक नियोजनाची पार्शवभूमी, भारतातील पंचवार्षिक योजना त्याचा कालावधी, वृद्धीची उद्दिष्ट्ये, प्रतिमान, Model, योजनेची काही ठळक वैशिष्ट्ये चांगली करून ठेवा.


प्रश्न - योजनेचा कालावधी, पंचवर्षिक योजना राबवत असताना राबविलेल्या महत्वाच्या योजना या बाबी चांगल्या करून ठेवा. हा Topic देसले सरांच्या पुस्तकातून चांगला cover होतो.


❇️ 4.दारिद्र्य व बेरोजगारी - Concepts आणि Facts याच मिश्रण असलेला घटक. दारिद्र्यचे प्रकार, Recall Periods,दारिद्र्य मोजमापच्या समित्या त्यांच्या शिफारशी यांचा अभ्यास करावा लागेल.दारिद्र्याच्या figures तोंडपाठ करा. हमखास प्रश्न येतोच.

बेरोजगारी मध्ये त्याच्या व्याख्या म्हणजे श्रम शक्ती कार्य शक्ती बेरोजगारीचा दर या व्यवस्थित करून ठेवा. बेरोजगारी मोजण्याच्या पद्धती पण चांगल्या करायला हव्यात. हा टॉपिक  कोळंबे सर आणि दिसले सरांच्या पुस्तकातून चांगला करा 


प्रश्न - साधारणता दारिद्र्याचे प्रकार, बेरोजगारीचे प्रकार, बेरोजगारीच्या व्याख्या, दारिद्र्य मापनाच्या समित्या  इ. घटकांवरती नियमित प्रश्न विचारले गेले आहेत.


❇️ 5. लोकसंख्या - यामध्ये लोकसंख्येच्या संख्यात्मक व गुणात्मक बाबींचा फॅक्च्युअल डाटा तोंडपाठ करून टाका. उदाहरणार्थ. लिंग गुणोत्तर,साक्षरता, लोकसंख्या वृद्धि, लोकसंख्या घनता इ. अलीकडे आयोग लोकसंख्येच्या धोरणांवरतीदेखील प्रश्न विचारत आहे. त्यामुळे 1976 आणि 20 00 लोकसंख्या धोरण चांगलं करून ठेवा.

 देसले सर भाग 2 मधून हा टॉपिक चांगला कव्हर होतो.


❇️ 6. Rbi व बँकिंग - यामध्ये आरबीआयची पार्श्वभूमी, कार्य, त्यामध्ये देखील संख्यात्मक व गुणात्मक साधने आणि एकंदरीत भारतीय वित्तव्यवस्थेमध्ये आरबीआयची असलेली भूमिका या घटकांचा बारकाईने अभ्यास करावा. यासाठी कोळंबे सरांचे पुस्तक वाचले तरी चालेल.


प्रश्न - आरबीआयची पार्श्वभूमी आरबीआयचे विविध कायदे उदा 1934 act, 1949 बँकिंग रेगुलशन act यावरती प्रश्न विचारले जातात. ते चांगले करा. Rbi ची संख्यात्मक साधने जसं की CRR, SLR, Repo Rate, Reverse Rapo Rate, Open Market Operations (Omos) etc चांगले करा.


 अशा पद्धतीने वरील सहा घटकांची आपण तयारी केली तर Combine Exam मध्ये आपल्याला या घटकांमध्ये नक्कीच चांगले मार्क्स मिळतील.



पण राहीलेले 6 उपघटक Cover करूयात.


❇️ 1. सार्वजनिक वित्त व कररचना -


 यामध्ये सार्वजनिक वित्ताची व्याप्ती, अर्थसंकल्प, FRBM कायदा, अर्थशंकल्पची रचना (महसूली व भांडवली )सार्वजनिक कर्ज, तुटीचे प्रकार, करांचे प्रकार, प्रत्येकाचा वाटा, करसुधारणेसाठी नेमलेल्या समित्या अणि वित्त आयोग विशेषतः 15 वा वित्त आयोग हे घटक चांगले करा.


प्रश्न - साधारणता 3-4 प्रश्न या उपघटका वरती विचारले जातात. दिवसेंदिवस प्रश्नांची depth वाढत असल्यामुळे आपल्याला deep level ला जाऊन Study करावा लागेल. Combine 20 मधील कर्जावरील प्रश्न तसेच Frbm प्रश्नावरून आपण भविष्यात प्रश्न किचकट येणार आहेत हे सांगू शकतो. यासाठी अगोदर कोळंबे सर अनि नंतर देसले सरांचे पुस्तक चांगले करून ठेवा.


❇️ 2.परकीय व्यापार व व्यवहारतोल -


 यामध्ये साधारणता आयात - निर्यात आकडेवारी, वस्तुगट, देशांचा क्रम, Fdi ची काही आकडेवारी, व्यवहारतोलाच्या Basic concepts चांगल्या करून ठेवा.आयात निर्यात धोरणनावर एक नजर टाकून घ्या.


प्रश्न - यावरती आयात - निर्यात वस्तूंचा क्रम, देशांचा क्रम यावरती प्रश्न विचारला जातोय. Combine 20 मध्ये अभियांत्रिकी वास्तुवर प्रश्न आला होता. यामध्ये logic असं होत की अभियांत्रिकी वस्तू हा अनेक वस्तूंचा समूह आहे किंवा group आहे. बाकीचे single वस्तू होत्या so answer अभियांत्रिकी वस्तू आल.


❇️ 3. कृषी उद्योग सेवा -


 यामध्ये 1950,1991,2011,2020 या वर्षांमध्ये कृषी, उद्योग अणि सेवा या तिन्ही क्षेत्राचा असलेला Gdp तील वाटा अणि रोजगारातील वाटा करून ठेवावा लागेल. हे chart स्वरूपात आपण लक्षात ठेवू शकतो. शक्य झाल्यास कृषी, उद्योग या घटकांच्या Basic scheme करून ठेवा.


प्रश्न - आकडेवारीवर थेट प्रश्न विचारला जातोय Gdp च्या base year चे आकडे चांगले करून ठेवा. उदा.1950,1990-91,199-2000,2004-05,2011-13,2017-18.


❇️ 4. शासकीय योजना, धोरणे, चालू घडामोडी -


 साधारणतः 2-3 प्रश्न या घटकावरती विचारले जातात.2014 पासून योजनांचा अभ्यास बारकाईने करा. 2014 पूर्वीच्या महत्त्वाच्या योजनांची पीडीएफ आपल्या ग्रुप वरती शेअर केली आहे ते एकदा पाहून घ्या. त्यामध्ये दिलेल्या योजना चांगल्या करून ठेवा.


प्रश्न - समाजातील दुर्बल घटक विशेषता महिला,बालक, वृद्ध, सामाजिक समावेशन अशा अनेक योजनांवर आयोग  जाणीवपूर्वक प्रश्न विचारतो. देसले सर भाग 2 मधून या योजना चांगले करून ठेवा


❇️ 5. LPG ( Liberalization, Privatization, Globalization )


 हा थोडा Conceptual घटक आहे. यासाठी तुम्हाला भारतीय नियोजनाचा एकंदरीत प्रवास माहित असायला हवा.1991 च्या आर्थिक संकटास कारणीभूत घटक अणि त्यावर मात करण्यासाठी भारताने कोणत्या उपाययोजना केल्या याचा सविस्तर आढावा घ्यावा लागेल. त्यामध्ये मग उदारीकरण, खाजगीकरण  आणि जागतिकीकरण या गोष्टी संकल्पना सहित समजून घ्याव्या लागतील.


प्रश्न -साधारणता एक प्रश्न या घटकावर विचारला जातो. या घटकासाठी PYQ चांगले करून ठेवा म्हणजे नवीन प्रश्न सोडवताना अडचण येणार नाही. यासाठी कोळंबे सरांचे पुस्तक ठीक राहील.


❇️ 6. किमती चलनवाढ व पैसा -


 या घटकावर ती आत्तापर्यंत एकच प्रश्न विचारला असून तो 2017 साली पैसा या घटकावर विचारण्यात आला होता. त्यानंतर या घटकावर ती प्रश्न विचारण्यात आला नाही. तरीही किमती व चलन वाढ हे घटक कोळंबे सरांच्या पुस्तकातून पैसा हा घटक देसले सरांच्या पुस्तकातून वाचून ठेवा.


 अशा पद्धतीने तुम्ही कम्बाईन पूर्व साठी अर्थव्यवस्था या विषयाची परिपूर्ण तयारी करू शकता.




महाराष्ट्र नदिप्रणाली आणि पर्वतरांगा

💐 महाराष्ट्र मध्ये बरेच लहानमोठ्या पर्वतरांगा🏔🏔 आहेत .


💐तया पुर्व- पश्चिम  पसरलेल्या पर्वतरांगाच्यामुळे वेगवेगळ्या नद्यांची खोरी विभगली गेली आहेत.


💐 सह्याद्री पर्वतरांग 🏔 ह 

उत्तरं - दक्षिण अशी पसरली आहे जी रांग नद्यांची पठारावरील नद्या आणि कोकणातील नद्या असे विभाजन करते


💐 सातमाळा-अजिंठा🏔, हरिश्चंद्र-बालाघाट🏔, शंभूमहादेव🏔 या डोंगररांगा सह्याद्रीच्या उपरांगा आहेत


‼️पठारावरील नद्या आणि पर्वतरांगा🏔🏔 च विभाजण‼️


💐पश्चिम वाहिनी नर्मदा नदी उत्तरेकडे विंध्य व दक्षिणेकडे सातपुडा रागा मधून वहाते


💐 सातपुड्याच्या दक्षिणेस तापी नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते.सातपुडा आणि सातमाळा-अजिंठा यांच्या मधून.


💐 पर्ववाहिनी गोदावरी नदी, उत्तरेकडील सातमाळा-अजिंठा व दक्षिणेकडील हरिश्चंद्र-बालाघाट डोंगररांग यांच्या मधून वहाते.


💐 हरिश्चंद्र-बालाघाट व महादेव डोंगर रांगा दरम्यान, भीमा नदी पश्चिमेकडून पूर्वेकडे वहाते.


💐महादेव डोंगरांगेच्या दक्षिण कडून कृष्णा नदी वहाते.


भूगोल प्रश्न व उत्तरे


Q-1) हा भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे? 

उत्तर :- साखर उद्योग 


Q-2) दगडी कोळश्याच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे? 

उत्तर :- चौथा


Q-3) महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीच्या पश्चिम उतार या भागात प्रामुख्याने -------प्रकारचा पाऊस पडतो? 

उत्तर :- प्रतिरोध पर्जन्य 


Q-4) भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था (NIO) कार्यरत आहे? 

उत्तर :- पणजी (गोवा) 


Q-5) मान्सूनपूर्व पडणाऱ्या सरींना महाराष्ट्रात काय ---------म्हणतात?

उत्तर :- आम्रसरी 


Q-6) अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? 

उत्तर :- राजेवाडी 


Q-7) जागतिक वारसा स्थळ यादित महाराष्ट्रातील कोणत्या स्थळांचा समावेश होतो? 

उत्तर :- अजिंठा आणि वेरुळ 


 Q-8) अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते? 

उत्तर :- महाराष्ट्र 


Q-9)  देशातील घनकचर्‍यापासून ऊर्जानिर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरु केलेला आहे? 

उत्तर :- पुणे 


Q:-10) भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते? 

उत्तर :- झारखंड

अजिंठा (लेणी)



इतिहास

◾️पराचीन भारतात धर्मशाळा, लेणी क्वचित मंदिरेसुद्धा मुख्यत्वे व्यापारी मार्गांवर विश्रांतीसाठी उभारण्यात येत असत. त्यांचा उद्देश वाटसरूंना सुरक्षित आश्रय स्थान मिळावे असा असे.

◾️ तयांना राजाश्रय, धर्माश्रय व लोकाश्रय असे. अजिंठा गावाजवळची लेण्यांची निर्मितीही याच उद्देशातून सुरू झाली असावी.

◾️परातत्त्वशास्त्रीय पुराव्यानुसार ही लेणी दोन वेगवेगळ्या कालखंडात निर्माण केली गेली. ९, १०, १२, १३ व १५-अ ही लेणी हीनयान कालखंडात कोरली गेली असावीत.

◾️हा कालखंड साधारणतः इ.स.पूर्वीच्या दुसर्‍या शतकाच्या सुमारास सुरू झाला. या सगळ्या लेण्यांतून बुद्धाचे दर्शन स्तूप-रूपांत होते. ही सोडून १ ते २९ क्रमांकांची लेणी साधारणतः ८००-९०० वर्षांनंतर (इ.स.च्या सहाव्या व सातव्या शतकाच्या आसपास) महायान कालखंडात निर्माण केली गेलेली असावीत.

◾️ या लेण्यांतून बुद्धाचे सर्वसामान्य लोकांस परिचित असे रूप दिसून येते. महायान लेणी वाकाटक राजांचा राजवटीत निर्मिली गेली, त्यामुळे त्यांस बऱ्याचदा वाकाटक लेणी असेही संबोधले जाते.

◾️वाकाटक साम्राज्याच्या ऱ्हासानंतर यांचे निर्माण अचानक थांबले व ही लेणी योजित भव्यतेपासून वंचितच राहिली.

🟢 रचना

◾️अजिंठा येथे एकूण २९ लेणी आहेत. ही सर्व लेणी वाघुर नदीच्या आसपास विखुरलेली आहेत.

◾️लणी नदीच्या पात्रापासून १५-३० मीटर (४०-१०० फूट) उंचीवर कातळात आहेत.

◾️हीनयान कालखंडातील लेण्यांपैकी ९ व १० क्रमांकाची लेणी ही चैत्यगृह आहेत व १२, १३, आणि १५-अ क्रमांकाचे लेणे विहार आहे.

◾️महायान कालखंडातील लेण्यांपैकी १९, २६ व २९ क्रमांकाची लेणी चैत्यगृहे असून १, २, ३, ५, ६, ७, ८, ११, १४, १५, १६, १७, १८, २०, २१, २२, २३, २४, २५, २७ व २८ क्रमांकाची लेणी विहार आहेत.

◾️विहार साधारणपणे चौरस आकाराचे असून त्यांची लांबी-रुंदी १७ मीटर (५२ फूट) पर्यंत आहे.

◾️ह विहार मुख्यत्वे भिक्षूंना राहण्यासाठी होते तर चैत्यगृह हे पारंपरिकरीत्या पूजाअर्चेसाठी वापरण्यात येत. कालांतराने विहारांतही मूर्तींची स्थापना झाली.

◾️बऱ्याच विहारांना सोपा व आंगण करण्यात आले व तेथे दगडात कलाकुसर व चित्रे काढण्यात आली.

◾️अजिंठा लेणी ही जागतिक वारसा स्थान म्हणून युनेस्कोने १९८३ साली घोषित केलेली लेणी आहेत.

◾️या लेण्यांचा शोध ब्रिटिश भारताच्या मद्रास इलाख्यातील ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथ हा वाघाच्या शिकारीसाठी गेल्याने २८ एप्रिल, इ.स. १८१९ रोजी लागला.

◾️समिथने येथील दहाव्या क्रमांकाच्या लेणीतील एका खांबावर आपले नाव आणि तारीख कोरून ठेवल्याचे आजही अंधुकपणे दिसून येते.

लक्षात ठेवा

🔸१) १ ऑक्टोबर, १९५३ रोजी अस्तित्वात आलेले ..... हे भाषिक तत्त्वावरील भारतातील पहिले राज्य होय,

 - आंध्र राज्य


🔹२) २ जून, २०१४ रोजी आंध्र प्रदेश राज्याचे विभाजन करण्यात येऊन तेलंगाणा हे भारतातील २९ वे राज्य निर्माण झाले. तेलंगाणा प्रदेशाचा समावेश असलेले मूळ आंध्र प्रदेश राज्य केव्हा आकारास आले होते ?

- १ नोव्हेंबर, १९५६


🔸३) .... हा घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख असून त्याच्या नावाने राज्याचे कार्यकारी आदेश काढले जातात.

- राज्यपाल


🔹४) राज्यपाल त्याचे कार्यकारी अधिकार थेट किंवा दुय्यम अधिकाऱ्यांद्वारा वापरू शकतो, असे कलम १५४ मध्ये म्हटले आहे. दुय्यम अधिकारी या संज्ञेत कोणाचा समावेश होतो ? 

- सर्व मंत्री व मुख्यमंत्री


🔸५) घटक राज्याच्या राज्यपालास राजीनामा द्यावयाचा असल्यास त्याने तो .... कडे सादर करावा लागतो.

- राष्ट्रपती


(०१)  राज्य स्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?

उत्तर- मुख्यमंत्री.


(०२)  लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे ?

उत्तर- अरबी समुद्र.


(०३)  पारो विमानतळ कोणत्या देशात आहे ?

उत्तर- भूतान.


(०४) कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर- रायगड.


(०५)  रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोंठे सुरू झाली ?

उत्तर- महाराष्ट्र.


(०६)  अग्नीपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?

उत्तर- ए. पी. जे. अब्दुल कलाम.


(०७)  रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली ?

उत्तर- स्वामी विवेकानंद.


(०८)  जागतिक हास्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १० जानेवारी.


(०९)  रोमेश पठानिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- हाॅकी.


(१०)  भारतातील प्रथम महिला भारतरत्न कोण आहे ?

उत्तर- इंदीरा गांधी.

 

(११)  आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- डाॅ. नरेंद्र जाधव.


(१२)  भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वांत लहान राज्य कोणते ?

उत्तर- सिक्किम.


(१३)  जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो ?

उत्तर- २० फेब्रुवारी.


(१४)  अतनू दास हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- तिरंदाजी.


(१५)  भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण आहे ?

उत्तर- सरोजनी नायडू.


(१६)  चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- जयंत नारळीकर.


(१७)  महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर- सातारा.


(१८)  जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- २३ मार्च.


(१९)  नरेश कुमार हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- टेनिस.


(२०)  भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहे ?

उत्तर- मीरा कुमार.


(२१)  उचल्या हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- लक्ष्मण गायकवाड.


(२२)  'जन-गण-मन' हे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे ?

उत्तर- रविंद्रनाथ टागोर.


(२३)  जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- ७ एप्रिल.


(२४)  ओमप्रकाश दहिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- कुस्ती.


(२५)  भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला कोण आहे ?

उत्तर- आरती शहा.


(२६)  उपरा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- लक्ष्मण माने.


(२७)  भारताचे राष्ट्रपतीपद भूषविणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण ?

उत्तर- प्रतिभा पाटील.


(२८)  जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १७ मे.


(२९)  दीप्ती शर्मा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- क्रिकेट.


(३०)  भारतातील प्रथम महिला राजदूत कोण आहे ?

उत्तर- विजयालक्ष्मी.


(३१)  मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- अच्च्युत गोडबोले.


(३२)  कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वांत जास्त तेल असते ?

उत्तर- मका.


(३३)  जागतिक रक्तदान दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १४ जून.


(३४)  अदिती अशोक हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- गोल्फ.


(३५)  भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण आहे ?

उत्तर- कल्पना चावला.


(३६)  समिधा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- साधना आमटे.


(३७)  भारतातील सर्वांत मोठे प्राणीसंग्रहालय कोठे आहे ?

उत्तर- कोलकाता.


(३८)  जागतिक व्याघ्रदिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- २९ जुलै.


(३९)  मनू भाकर हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- नेमबाजी.


(४०)  दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती कोण आहे ?

उत्तर- रझिया सुलताना.


(४१)  नाशिक शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

उत्तर- गोदावरी.


(४२)  शिवसिंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- बाॅक्सिंग.


(४३)  भारतातील सर्वांत लांब नदी कोणती आहे ?

उत्तर- गंगा.


(४४)  राष्ट्रीय सांख्यिकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?

उत्तर- प्रा. सुरेश तेंडुलकर.


(४५)  जागतिक वनमहोत्सव दिवस कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १ आॅगस्ट.


(४६)  सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

उत्तर- कृष्णा.


(४७)  चिराग चंद्रशेखर शेट्टी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- बॅडमिंटन.


(४८)  भारतातील सर्वांत लांब लेणी कोणती आहे ?

उत्तर- अजिंठा.


(४९)  काक्रापारा अणुविद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे ?

उत्तर- गुजरात.


(५०)  जागतिक ओझोन दिवस कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १६



कोकणातील नद्या व त्यावरील खाडी ,गोदावरीच्या उपनद्या ....... उगमस्थान, जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती


कोकणातील नद्या व त्यावरील खाडी

✍️ नदी  - खाडी

✍️ वैतरणा - दातीवर

✍️ उल्हास  - वसई

✍️ पाताळगंगा -  धरमतर

✍️ कुंडलिका  - रोह्याची खाडी

✍️ सावित्री  - बाणकोट

✍️ वशिष्ठी - दाभोळ

✍️ शास्त्री - जयगड

✍️ शुक - विजयदुर्ग

✍️ गड - कलावली

✍️ कर्ली - कर्ली

✍️ तेरेखोल - तेरेखोल



☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘
गोदावरीच्या उपनद्या ....... उगमस्थान

✍️ पूर्ण - अजिंठा डोंगरात

✍️ मांजरा - पाटोदा पठारावर, बीड

✍️ पैनगंगा - मराठवाड्यात अजिंठा टेकड्यात

✍️ वर्धा - एमपी -बैतूल

✍️वैनगंगा - मध्यप्रदेश मैकल

✍️ इंद्रावती - ओरिसा (दंडकारण्यात)

_________________


जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

गोरा या कांदबरीचे लेखक कोण आहे ?
रविंद्रनाथ टागोर.

हैद्राबाद हे शहर कोणत्या नदी तीरावर वसलेले आहे ?
मुशी.

धनराज पिल्ले हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
  हॉकी.

चॉंदबीबीची राजधानी कोठे होती ?
अहमदनगर.

राजमाता जिजाऊ यांचा जन्म कुठे झाला ?
सिंदखेडराजा.

वाचा :- महाराष्ट्राची प्राकृतिक रचना



✅ *महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचे तीन विभाग*

 1. कोकण किनारपट्टी

 2. सह्याद्रि पर्वत / पश्चिम घाट

 3. महाराष्ट्र पठार / दख्खन पठारी


✅ *कोकण किनारपट्टी :-*

1. स्थान: महराष्ट्र अरबी समुद्र व सह्याद्रि पर्वत यांच्या दरम्यान दक्षिणोत्तर लांब पट्टयास 'कोकण' म्हणतात.

2. विस्तार: उत्तरेस - दमानगंगा  नदीपासून दक्षिणेस - तेरेखोल खाडीपर्यंत. कोकण किनारपट्टी 'रिया' प्रकारची आहे.

3. लांबी:  दक्षिणोत्तर = 720 किमी,  रुंदी = सरासरी 30 ते 60 किमी. उत्तर भागात ही रुंदी 90 ते 95 किमी. तर दक्षिण भागात ही रुंदी 40 ते 45 किमी. 

4. क्षेत्रफळ: 30,394 चौ.किमी.


✅ *सह्याद्रि पर्वत / पश्चिम घाट :-*

1. स्थान: दख्खनच्या पठाराचा पश्चिमेकडील न खचलेला भाग म्हणजेच सह्याद्रि होय.

2. यामुळे सह्याद्रि पश्चिमेकडून अत्यंत उंच व सरल भिंतीसारखा दिसतो.

3. पठाराकडून मात्र अत्यंत मंद उताराचा दिसतो.सह्याद्रि पर्वत हा प्राचीन असून या पर्वताची बर्‍याच ठिकाणी झीज झाल्याने कमी - अधिक उंचीची ठिकाणे तयार झाली आहेत. उदा. शिखरे, घाट, डोंगर, उंचीवरील सपाट प्रदेश इ.


✅ *महाराष्ट्र पठार / दख्खन पठार / देश :-*

1. स्थान: महाराष्ट्र राज्यांपैकी एकूण क्षेत्रफळापैकी 90% क्षेत्र महाराष्ट्र पठाराणे व्यापले आहे.

2. लांबी-रुंदी:  पूर्व- पश्चिम - 750km. उत्तर- दक्षिण - 700km.

3. ऊंची:  450 मीटर- या पठाराची ऊंची पश्चिमेस (600 मी) जास्त व पूर्वेस (300 मी) कमी आहे.

4. महाराष्ट्र पठार डोंगर रांगा व नद्या खोर्‍यांनी व्यापले आहे.

खाडी

🟢 नदी जेथे समुद्राला जाऊन मिळते, तेथील पाण्याच्या साठ्याला खाडी असे म्हणतात.

🟢 भरतीचे पाणी नदीच्या मुखामध्ये जिथपर्यंत येते त्या भागास “खाडी”असे म्हणतात. कोकणचा किनारा अनेक खाड्यांनी बनलेला आहे.

▪️कधीकधी किनाऱ्याचा सखल भूभाग खचून किंवा समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्यानेसुद्धा समुद्री खाडी तयार होते.

▪️खाडी जर बऱ्यापैकी मोठी असेल तर तिला आखात म्हणतात.

▪️बंगालचा उपसागर हा देखील एका अखाताचाच प्रकार आहे.

▪️महाराष्ट्राच्या पश्चिम समुद्रकिनाऱ्याला अशा अनेक खाड्या आहेत. तिथली बहुतेक बंदरे खाडीच्या आश्रयाने बनली आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🛑 खाड्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडील क्रम खालीलप्रमाणे आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१) डहाणूची खाडी, जि. ठाणे

२) दातीवऱ्याची खाडी, जि. ठाणे

३) वसईची खाडी, जि. ठाणे

४) धरमतरची खाडी, जि. रायगड

५) रोह्याची खाडी, जि. रायगड

६) राजापुरीची खाडी, जि. रत्नागिरी

७) बाणकोटची खाडी, जि. रत्नागिरी

८) दाभोळची खाडी, जि. रत्नागिरी

९) जयगड, जि. रत्नागिरी

१०)विजयदुर्ग, जि. सिंधुदूर्ग

११)तेरेखोलची खाडी, सिंधुदूर्ग

रक्ताविषयी काही मजेशीर माहिती


_रक्ताविषयी तुम्हाला माहीत नसलेल्या काही गोष्टी नक्की वाचा_


🔸जगातील पहिली रक्त पेढी १९३७ रोजी बनवण्यात आली होती.


🔸आपल्या शरीरातील रक्ताचा ७० टक्के भाग लाल रक्तपेशींच्या आतमध्ये असलेल्या हिमोग्लोबिनमध्ये असतो. ४ टक्के भाग मांसपेशींच्या प्रोटीन मायोग्लोबीन मध्ये, २५ टक्के भाग यकृत, बोन मॅरो, प्लीहा, मूत्रपिंडामध्ये असते आणि उरलेले १ टक्का रक्त प्लाजमाच्या तरल अंश व कोशिकांच्या एंजाइम्समध्ये असते.


🔸१ मिली रक्तामध्ये १०,००० पांढऱ्या रक्तपेशी आणि २,५०,००० प्लेटलेट्स असतात.


🔸आपल्या नसांमध्ये ४०० किलोमीटर प्रतितास या वेगाने रक्ताभिसरण होते.


🔸रक्त कोशिकांना संपूर्ण शरीरात फिरण्यास ३० सेकंद लागतात. या रक्त कोशिका २० सेकंदामध्ये १२००० किमी अंतर पार करू शकतात.


🔸जर आपल्या शरीराने रक्ताला बाहेर पंप केले, तर हे रक्त ३० मीटरपर्यंत उडू शकते.


🔸मनुष्याचे रक्त फक्त ४ प्रकारचे (O, A, B, AB) असते. पण गाईंमध्ये जवळपास ८००, कुत्र्यांमध्ये १३ आणि मांजरांमध्ये ११ प्रकारचे रक्त पाहण्यास मिळते.


🔸नकत्याच जन्मलेल्या बालकामध्ये फक्त १ कप (२५० एमएल) रक्त असते आणि तरुण माणसामध्ये जवळपास ५ लिटर रक्त असू शकते, म्हणजेच शरीराच्या एकूण वजनाच्या ७ टक्के रक्त असते.


🔸आतापर्यंत कृत्रिम रक्त बनवले गेले नाही आहे.



🔸लाल रक्त पेशी ह्या ऑक्सिजनला घेऊन जात असतात आणि कार्बनडायऑक्साईड संपवतात.


🔸पांढऱ्या रक्त पेशी ह्या शरीराला बॅक्टेरीया आणि वायरस यांच्यापासून वाचवतात.


🔸पलाजमा हे शरीरात प्रोटीन तयार करते आणि रक्ताला गोठण्यापासून वाचवते.


🔸पलेटलेट्स हे रक्ताला गोठ्ण्यास मदत करते, यांच्यामुळेच जखम झाल्यानंतर काही वेळ रक्त आल्यानंतर रक्त येण्याचे बंद होते.


🔸गर्भवती स्त्रिया आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रिया रक्तदान करू शकत नाहीत.


🔸शारीरिकदृष्ट्या एकाच वेळी लघवी करणे आणि रक्तदान करणे शक्य नाही.


🔸जम्स हॅरीसन नावाच्या व्यक्तीने गेल्या ६० वर्षांमध्ये १००० वेळा रक्तदान केले आहे आणि २० लाख लोकांचे प्राण त्याने वाचवले आहेत.


🔸परत्येक दिवशी जगात ४०००० युनिट रक्ताची गरज असते. ३ पैकी १ व्यक्तीला आपल्या जीवनात कधी न कधी रक्ताची आवश्यकता नक्कीच पडते.


🔸सवीडनमध्ये जेव्हा कोणी रक्तदान करते, तेव्हा त्याला “Thank You” असा मॅसेज केला जातो आणि असाच मॅसेज जेव्हा त्याचे रक्त एखाद्याच्या कमी येते, तेव्हा देखील केला जातो.


🔸जपानमध्ये लोक रक्त गटावरूनच माणसाच्या व्यक्तित्वाचा अंदाज लावतात.


🔸बराझील देशात बोरोरो नावाचा आदिवासी समूह आहे, आश्चर्याची बाब म्हणजे या समूहातील सर्व लोकांचा एकच ” O “ रक्तगट आहे.


🔸जवळपास सर्वांमध्ये लाल रंगाचे रक्त पाहण्यास मिळते, पण कोळी आणि गोगलगायमध्ये हलक्या निळ्या रंगाचे रक्त पाहण्यास मिळते.


🔸आपल्या शरीरामध्ये जवळपास ०.२ मिलिग्रॅम एवढे सोने असते आणि याचे सर्वात जास्त प्रमाण रक्तात आढळून येते. ४०००० लोकांच्या रक्तामधून जवळपास ८ ग्रॅम सोन काढले जाऊ शकते.


🔸फक्त मादा मच्छरच माणसांचे रक्त शोषून घेते, नर मच्छर हे शाकाहारी असतात आणि ते फक्त गोड द्रव पदार्थ पितात. मादा मच्छर या आपल्या वजनाच्या तीनपट जास्त रक्त पिऊ शकतात.


🔸तम्हाला वाटत असेल कि, मच्छर फक्त थोडच रक्त पितात, पण तुम्हाला सांगू इच्छितो की, १२ लाख मच्छर तुमचे पूर्ण रक्त पिऊ शकतात. मच्छर “ O ” रक्तगटाचे रक्त पिणे पसंत करतात.

क्रियाशील फ्लोरीन


◆ ज्ञात मूलद्रव्यात फ्लोरीन मूलद्रव्य सर्वात क्रियाशील असून सेंद्रिय, असेंद्रिय, कार्बन, धातू, काच व सिरॅमिक अशा बहुतेक सर्व प्रकारच्या पदार्थावर प्रक्रिया करतो. 


◆ हायड्रोजन आणि फ्लोरीनचे हायड्रोफ्लोरीक आम्ल हे संयुग काचसुद्धा विरघळवते.


◆ फ्लोरीनच्या विषारी गुणामुळे व त्याच्या हाताळणीत होण्याऱ्या जखमांमुळे फ्लोरीनचे रसायनशास्त्र उलगडण्याची प्रगती अतिशय संथ गतीने झाली. 


◆ दुसऱ्या महायुद्धापर्यंत फ्लोरीनचे उत्पादन व्यावसायिक स्तरावर होत नव्हते. जसे रसायनशास्त्रात संशोधन होत गेले तसे काही वर्षांनी फ्लोरीन, क्लोरीन आणि कार्बन यांच्या क्लोरोफ्लुरो कार्बन या संयुगाचा शोध लागला. 


◆ या संयुगाचा वापर वातानुकूलित यंत्रे व रेफ्रिजरेटरमध्ये शीतक म्हणून केला जायचा. जवळपास साठ वर्षे क्लोरोफ्लुरो कार्बन अजिबात धोकादायक नाही अशी खात्री होती.


◆ पण क्लोरोफ्लुरो कार्बनमुळे पृथ्वीभोवती असणारा ओझोन वायूचा थर नष्ट व्हायला सुरुवात झाली.


◆ १९८७ मध्ये झालेल्या ‘मॉट्रिअल करारानुसार’ ओझोन वायूचा थर नष्ट करणाऱ्या क्लोरोफ्लुरो कार्बनसारख्या रसायनांचे उत्पादन आणि वापर थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


◆ सध्या त्याच्याऐवजी हायड्रोफ्लुरो कार्बन वापरण्यात येतो. पर्यावरण संरक्षणासाठी घेतलेल्या या निर्णयाचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. कारण ओझोनच्या आवरणात सुधारणा होत असल्याचे दिसते. 


◆ फ्लोराईडयुक्त टुथपेस्ट वापराव्यात अशा जाहिराती आपण बघतो. क्षार आणि खनिजांच्या स्वरूपात आढळणारा फ्लोराईड हा फ्लोरीनचा आयन. 


◆ दातांच्या व हाडांच्या मजबुतीसाठी फ्लोराईड आवश्यक असल्याने पिण्याच्या पाण्यात सोडियम फ्लोराईड मिसळले जाते.


◆ फ्लोराईड वापरताना त्याचे प्रमाण मात्र योग्य असावे लागते. उच्च तापमानाला टिकणारे प्लास्टिक तयार करण्यासाठी फ्लोराईड मिसळले जाते. 


◆ सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारे आणि गृहिणींचे लाडके उत्पादन म्हणजे टेफ्लॉन. 


◆ पदार्थ न चिकटणाऱ्या, न जळणाऱ्या या टेफ्लॉनच्या निर्मितीसाठी कार्बन आणि फ्लोरीनचे मजबूत बंध असलेल्या फ्लोरोबहुवारीकाचा उपयोग केला जातो. 


◆ ऊष्णता वाहून नेणे, विद्युतरोधक, पाणी न शोषणारा, घर्षण कमी करणारा, न गंजणारा या फ्लोरोबहुवारीकाच्या विविध गुणधर्मामुळे औद्योगिक क्षेत्रात याचा वापर केला जातो. 


◆ विद्युत वाहक तारांच्या बाह्य़ लेपनासाठी, विमानांच्या आणि वाहनांच्या भागांना लेपन करण्यासाठी फ्लोरोबहुवारीकाचा वापर केला जातो. 


◆ आण्विक ऊर्जा केंद्रासाठी लागणाऱ्या इंधनातील युरेनियम २३८ पासून युरेनियम २३५ वेगळा करण्यासाठी युरेनियम हेक्झाफ्लोराईड हे फ्लोरीनचे संयुग वापरतात.

धातू आणि अधातूंचे भौतिक गुणधर्म

(Physical Properties Of Metals & Non – Metals) :

▪️धातु

1) भौतिक अवस्था:
सामान्य तापमानाला धातु स्थायूरूप अवस्थेत आढळतात.
(अपवाद – पारा व गॅलियम)
उदा. ॲल्युमिनियम, लोह, तांबे, जस्त इ.

2) चकाकी (Lustre):
काही धातूंना चकाकी असते धातूंचा पृष्ठभाग गाजल्यानंतर घासल्यानंतर त्यावरून प्रकाशाचे परावर्तन होते धातू सहसा रुपेरी किंवा करड्या रंगाचे असतात ( अपवाद – सोने, तांबे.

उदा. प्लॅटिनम, सोने, चांदी इ.

3) द्रावणीयता (Solubility):
धातू द्रावकात सहसा विरघळत नाहीत.

4) काठिण्यता (Hardness):
बहुतेक धातू कठीण असतात.
(अपवाद – सोडिअम, पोटॅशिअम)

उदा. तांबे, लोह, ॲल्युमिनियम इ.

5) उष्णतामान (Conduction Of Heat):
धातु उष्णतेचे सुवाहक असतात. कारण धातूंमधील कणांची रचना खूप दाट असते.

उदा. चांदी, तांबे, ॲल्युमिनियम इ. (अपवाद – शिसे).


6) विद्युत वहन (Conduction Of Electricity):
धातु विजेचे सुवाहक असतात कारण धातूमध्ये मुक्त इलेक्ट्रॉन असतात. (अपवाद – शिसे)

उदा. चांदी, सोने, तांबे, ॲल्युमिनियम इ.

7) तन्यता (Ductility):
धातूंपासून तारा तयार करण्याच्या गुणधर्माला तन्यता असे म्हणतात.

उदा: सोने, चांदी, प्लॅटिनम, तांबे, टंगस्टन इत्यादी
एक ग्राम सोन्यापासून दोन किलोमीटर लांबीची तार बनते.


8) वर्धनीयता (Malleability):
धातूंपासून पत्रा तयार करण्याच्या गुणधर्माला वर्धनीयता असे म्हणतात.

उदा. सोने, चांदी, ॲल्युमिनियम इत्यादी

9) नादमयता (Sonorous):
कठीण पृष्ठभागावर आघात झाल्यामुळे कंपनातून ध्वनी निर्माण करण्याच्या गुणधर्माला नादमयता असे म्हणतात.

धातू नादमय असतात.
उदा. तांबे, लोह इ.

10) द्रवणांक आणि उत्कलनांक:
धातूंचा द्रवणांक आणि उत्कलनांक उच्च असतो.
(अपवाद – गॅलिअम, सोडिअम, पारा, पोटॅशियम)

11) घनता (Density):
धातूंची घनता उच्च असते.

(अपवाद – सोडिअम, पोटॅशिअम).


अधातू

1) भौतिक अवस्था:

सामान्य तापमानाला अधातू वायू स्थायू तसेच द्रवरूप अवस्थेत आढळतात उदा स्थायू कार्बन सल्फर phosphorus द्रव ब्रोमीन वायु ऑक्सिजन हायड्रोजन नायट्रोजन क्लोरीन फ्लोरीन .

2) चकाकी ( Lustre)
अधातूंना चकाकी नसते. काही अधातू रंगहीन तर काही अधातूंना वेगवेगळे रंग असतात.

(अपवाद – हिरा स्वरूपातील कार्बन)

3) द्रावणीयता (Solubility)
अधातू कोणत्याही द्रावकात विरघळू शकतात. तसेच त्या द्रावकाचे बाष्पीभवन करून विरघळलेला अधातू पुन्हा प्राप्त करता येतो.

4) काठिण्यता (Hardness):
अधातू ठिसूळ/मृदू असतात.

अपवाद: हिरा स्वरूपातील कार्बन

5) उष्णता वहन (Conduction Of Heat):
अधातू उष्णतेचे दुर्वाहक असतात.

6) विद्युत वहन (Conduction Of Electricity)
अधातू विजेचे दुर्वाहक असतात.
अपवाद – ग्रॅफाइट स्वरूपातील कार्बन, गॅस कार्बन

7) तन्यता ( Ductility):
अधातू पासून तारा तयार करता येत नाहीत.

8) वर्धनियता (Malleability):
अधातूंपासून पत्रा तयार करता येत नाही.

9) नादमयता (Sonorous):
अधातू अनादमय असतात.

10) द्रवणांक आणि उत्कलनांक
अधातूंचा द्रवणांक आणि उत्कलनांक कमी असतो.

अपवाद – कार्बन : द्रवणांक 3550¢ आणि उत्कलनांक 3825¢.

11) घनता (Density):
अधातूंची घनता कमी असते.

(अपवाद – हिरा स्वरूपातील कार्बन)

धातू आणि अधातूंचे रासायनिक गुणधर्म.

विज्ञान प्रश्नसंच

 1. पेशींच्या प्रकाराची संख्या किती?

1) ३६९ 

 2) ५४७

 3) ६३९ ✅✅✅

 4) ९१२


2. धान्यासाठा टिकविण्यासाठी कोणते औषध वापरतात?

 1) सोडियम क्लोरेट ✅✅✅

 2) मायका

 3) मोरचुद

 4) कॉपर टिन

3. जर एखादी वस्तू एकसमान वेगाने जात असेल, तर


 1) त्या वस्तूची चाल सारखी राहते व दिशा बदलते . 

 2) त्या वस्तूची चाल व दिशा बदलतात .

 3) त्या वस्तूची चाल व दिशा सारखी राहते .

 4) त्या वस्तूची चाल बदलते,पण दिशा तीच राहते.✅✅✅


4. रक्तपेशी किती प्रकारच्या असतात?

1) तीन  ✅✅✅

 2) दोन

 3) चार

 4) सहा


5. मोडआलेल्या धान्यास आणि आंबविलेल्या अन्नपदार्थात खालीलपैकी कोणते जीवनसत्व विपूल प्रमाणात तयार होते?

1)  अ 

 2) ब ✅✅✅

 3) ड

 4) ई


6. खालीलपैकी कोणते गतीज ऊर्जेचे उदाहरण आहे?

1)  सायकल 

 2) रेल्वे

 3) जहाज

 4) वरिल सर्व ✅✅✅


7. २३५२ डेसि मीटर = किती हेक्टोमीटर?

1)  २३.५२                                                                                                                                       2) २३५.२

 3) २३०.५२

 4) २.३५२ ✅✅✅


8. त्वरण म्हणजे ................... मधील बदलाचा दर होय .

1) वेग ✅✅✅

 2) अंतर

 3) चाल

 4) विस्थापन 


9. होकायंत्रात .............. चुंबक वापरतात . - Not Attempted

1)  निकेल 

 2) रबर

 3) रबर

 4) सूची✅✅✅


10. हॅड्रोजन आणि ----------- या वायूच्या संयोगामुळे पाणी तयार होते?

1)  ऑक्सीजन ✅✅✅

 2) नायट्रोजन

 3) कार्बनडाय ऑक्साईड

 4) हेलियम.

रक्तवाहिन्या (Blood Vessels):



 आपल्या शरीरात रक्ताचे अभिसरण करतात. आपल्या शरीरातील रक्तवाहिन्यांची लांबी सुमारे 97 हजार किमी असते. रक्तवाहिन्यांचे तीन मुख्य प्रकार पडतात.

१) धमन्या (Arteries)
२) शिरा (Veins)
३) केशिका (Capillaries).

१) धमन्या (Arteries) : 

हृदयाकडून ऑक्सिजनयुक्त रक्ताचे वहन करतात. अपवाद – फुफ्फुसधमनी (Pulmonary Artery)भित्तिका जाड असून कमी लवचिक असतात.
शरीरात खोलवर स्थित असतात व झडपा नसतात.रक्तदाब खूप जास्त म्हणजेच 100 mm Hg एवढा असतो.
महाधमनी – धमन्या – धमनिका

२) शिरा (Veins) :

उतींकडून कार्बन डायॉकसाईड युक्त रक्ताचे वहन हृदयाकडे करतात.
अपवाद – फुफ्फुसशिरा (Pulmonary Veins)
भित्तिका पातळ असून जास्त लवचिक असतात.शरीरात त्वचेखाली स्थित असतात व झडपा असतात.रक्तदाब खूप कमी म्हणजेच 2 mm Hg एवढा असतो.महाशिरा -शिरा – शिरिका.

३) केशिका (Capillaries) :

धमनिका आणि शिरिका यांच्या पेशीतील जाळ्याला केशिका असे म्हणतात.
केशिका अत्यंत बारीक, एकस्तरीय असून भित्तिका पातळ असतात.
केशिकांमुळे पेशींमध्ये पोषद्रव्ये, ऑक्सिजन,कार्बन डायॉकसाईड, विकरे, संप्रेरके तसेच टाकाऊ पदार्थांची देवाण – घेवाण घडून येते.

२० मार्च २०२४

Environment पर्यावरण    IMP for MPSC Prelims


Green climate fund ची स्थापना ____ मध्ये झाली आहे.
Ans:- 2010

ओझोन छिद्र सर्वप्रथम ____  मध्ये आढळले आहे.
Ans:- 1985

जगातील जैवविविधतेचे संवेदनशील क्षेत्र ____ कोणते आहे.
Ans:-पश्चिम घाटमाथा

भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य _ आहे.
Ans:- हिमाचल प्रदेश

प्लास्टिक पुनर्वापर उत्पादन वापर कायदा _ मध्ये करण्यात आला.
Ans:- 1991

भारतात कोणत्या प्रजातींची संख्या सर्वात जास्त आहे? 
Ans:- कीटक

पर्यावरण संरक्षण कायदा____ _ मध्ये संमत करण्यात आला.
Ans:- 1986

पर्यावरण स्नेही खुनट्टी योजना __ वर्षी सुरु करण्यात आली
Ans:- 1991

जैव औषधी कचऱ्या संबंधित कायदा___ वर्षी संमत करण्यात आला.
Ans :- 1998

नगरपालिका घनकचरा नियोजन कायदा_ वर्षी संमत करण्यात आला.
Ans :- 2000

1987 मध्ये ब्रुडला आयोगाच्या शीर्षक_ होते.
Ans:- Our Common Future

जागतिक वसुंधरा परिषद __वर्षी भरविण्यात आली.
Ans :- 1992

पहिली मानवी पर्यावरण परिषद___वर्षी भरविण्यात आली.
Ans:- 1972

Green Economy ही संकल्पना__ वर्षी शाश्वत विकास परिषदेत स्वीकारण्यात आली.
Ans:- जून 2012

चालू घडामोडी :- 19 मार्च 2024


◆ राज्यपाल रमेशबैस यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार व रंगभूमीचे अभ्यासक गिरीजा शंकर लिखित 'रंग मंच' या पुस्तकाचे राजभवन, मुंबई येथे प्रकाशन करण्यात आले.

◆ लाडा मार्टिन मार्बानियांग यांची बेळगावच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ रेक्जेनेस द्वीपकल्पात ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर दक्षिण आइसलँडमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.

◆ आइसलँडमध्ये एकुण 33 सक्रिय ज्वालामुखी प्रणाली आहेत, जी युरोपमधील सर्वाधिक संख्या आहे.

◆ जगातील सर्वात सक्रिय ज्वालामुखी माउंट एटना (3,350 मीटर) आहे, जो आफ्रिकन आणि यूरेशियन भूपट्टादरम्यान स्थित आहे.

◆ डॉ. प्रमोद सावंत हे भाजपचे मुख्यमंत्रिपदाची सलग पाच वर्षे पूर्ण करणारे पहिले मुख्यमंत्री ठरणार आहेत.

◆ 'आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन' दरवर्षी 19 मार्च रोजी साजरा केला जातो.[Note :- 15 मार्च जागतिक ग्राहक हक्क दिन]

◆ 19 मार्च 2010 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला.

◆ DHL कनेक्टेडनेस इंडेक्समध्ये भारताला '62 वे' स्थान मिळाले आहे.

◆ व्लादिमीर पुतिन हे 5व्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत.

◆ प्रसिद्ध कन्नड संगीतकार 'टीएम कृष्णा' यांना प्रतिष्ठेच्या 'संगीत कलानिधी पुरस्कार'ने सन्मानित करण्यात आले आहे.

◆ तमिलिसाई सुंदरराजन यांनी तेलंगणाच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला आहे.

◆ जयदीप हंसराज यांची ‘वन कोटक’ चे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ प्रख्यात आदिवासी नेते आणि बौद्ध भिक्षू लामा लोबझांग यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले.

◆ भारतातील पहिला तेल पाम प्रक्रिया प्रकल्प अरुणाचल प्रदेशमध्ये सुरू झाला आहे.

◆ केंद्रीय मंत्री 'अनुराग सिंह ठाकूर' यांनी PB-SHABD आणि अपडेटेड न्यूज ऑन एअर मोबाईल ॲप लाँच केले आहे.

◆ अमेरिकेतील प्रसिद्ध पियानोवादक 'बायरन जेनिस' यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले.

◆ तामिळनाडू राज्य सरकारने ‘पीएम श्री योजना’ लागू करण्यास सहमती दर्शवली आहे.

◆ भारतीय सैन्य दल सेशेल्सला संयुक्त लष्करी सराव ‘एक्सरसाइज लिमिट-2024’ मध्ये सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहे.

◆ WPL 2024 स्पर्धेत दीप्ती शर्मा(यूपी वॉरियर्सने) ही खेळाडू मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेयर ठरली आहे.

◆ WPL 2024 स्पर्धेत सोफी मोलिनक्स(RCB - ऑस्ट्रेलिया) या महिला खेळाडू ला सामनावीर पुरस्कार मिळाला आहे.

◆ काश्मीरच्या पर्यटन विभागांतर्गत श्रीनगरमध्ये पहिला  'फॉर्म्युला-4' कार रेस शो, फॉर्म्युला-4 आणि इंडियन रेसिंग लोग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला आहे.

◆ केंद्राकडून जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट असोसिएशनला बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित करण्यात आली आहे.

◆ व्लादिमीर पुतीन यांची रशिया या देशाच्या राष्ट्राध्यक्ष पदी निवड झाली आहे.

◆ व्लादिमीर पुतीन यांची रशियाच्या अध्यक्ष पदी पाचव्यांदा निवड झाली आहे.

◆ रशियाच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत व्लादिमीर पुतीन यांना 88 टक्के मते मिळाली आहेत.

◆ रशियाच्या अध्यक्ष पदाचा कार्यकाळ सहा वर्षाचा असतो.

◆ प्रत्येक जिल्हा रुग्णालयात ज्येष्ठांसाठी स्वतंत्र वॉर्ड बनवणारे राजस्थान हे राज्य देशातील पहिले राज्य ठरले आहे.

◆ राजस्थान राज्यात प्रत्येक जिल्हा रुग्णालयात ज्येष्ठांसाठी स्वतंत्र वॉर्ड तयार केले आहेत. त्यांना 'रामाश्रय' या नावाने ओळखले जाणार आहे.

◆ गुजरात राज्यातील खवडा येथे 'अदानी उद्योग समूह' जगातील सर्वात मोठे रिन्युएबल पार्क बनवत आहे.

◆ भारत आणि अमेरिका यांच्यात 18 ते 31 मार्च दरम्यान 'टायगर विजय' युद्ध सरावाचे आयोजन करण्यात आले आहे.

◆ भारत हा अमेरिकेला स्मार्ट फोन निर्यात करणारा तिसरा सर्वात मोठा देश बनला आहे.

◆ तेलंगणा राज्याच्या राज्यपाल तमिळसाई सौंदरराजन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

◆ भारत ही वाहन उद्योगासाठी जगातील तिसरी सर्वात मोठी बाजार पेठ आहे.

१९ मार्च २०२४

शक्तिपीठ महामार्ग...






◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्या

◾️जिल्हे:  वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यातून जाणार आहे.

◾️6 पदरी चा महामार्ग

✅ सुरवात  : पवनार, वर्धा जिल्हा , महाराष्ट्र

✅ शेवट : पत्रादेवी , उत्तर गोवा जिल्हा , गोवा

━━━━━━༺༻━━━━━━
 समृद्धी महामार्ग....

◾️मुंबई - नागपूर द्रुतगती मार्ग म्हणून ओळखला जातो

◾️जिल्हे :  हा मार्ग 10 जिल्ह्यांमधील नागपूर-वर्धा-अमरावती-वाशिम-बुलढाणा-जालना-औरंगाबाद-नाशिक-अहमदनगर-ठाणे 392 गावांमधून जातो

◾️अधिकृत नाव : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग

◾️6 पदरी महामार्ग

✅ सुरवात  : आमणे गाव, ठाणे जिल्हा

✅ शेवट : शिवमडका गाव, नागपूर जिल्हा
━━━━━━༺༻━━━━━━

चालू घडामोडी

Q1. पंतप्रधान मोदींनी भारतातील पहिल्या अंडरवॉटर मेट्रोचे उद्घाटन कोणत्या राज्यात केले
Ans: पश्चिम बंगाल

Q2. संसद खेळ महाकुंभ ३.० चे आयोजन कोणत्या शहरात केले जात आहे?
Ans: हमीरपूर

Q3. भारतातील पहिल्या लघु LNG युनिटचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले?
Ans: मध्य प्रदेश

Q4. एनएलसी इंडिया ग्रीन एनर्जी लिमिटेडने सौर ऊर्जा प्रकल्पासाठी कोणाशी करार केला आहे?
Ans: यापैकी नाही

Q5. कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच राज्यातील हरित हायड्रोजन धोरण मंजूर केले?
Ans: उत्तर प्रदेश

Q6. अलीकडे कोणत्या राज्यात विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजना सुरू करण्यात आली आहे?
Ans: झारखंड

Q7. कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने अलीकडेच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे?
Ans: शाहबाज नदीम

Q8. नुकतीच निवृत्ती जाहीर करणारा बी साई प्रणीत कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Ans: बॅडमिंटन

पोलीस भरती चालू घडामोडी

©1. 9 - 10 सप्टेंबर 2023 रोजी 18 वी G20 शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती?
:- नवी दिल्ली, भारत

©2. 2023 आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिप कोठे आयोजित करण्यात आली होती?
:- प्योंगचांग, दक्षिण कोरिया

©3. बहुराष्ट्रीय त्रिसेवा सराव 'एक्सरसाइज ब्राइट स्टार 23' कोठे आयोजित करण्यात आला?
: इजिप्त

©4. भारतीय हवाई दलाचा त्रिशूल सराव कोठे होत आहे?
: उत्तर भारत

©5. नुकतीच वानुआतुचे पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
:- सातो कोलमन

©6. 'इंडिया ड्रोन शक्ती 2023' कुठे होणार आहे?
:- गाझियाबाद (आयएएफच्या हिंडन एअरबेसवर)

©7. नुकतीच सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोणी जिंकली?
:- थरमन षण्मुगरत्नम

©8. भारताच्या अध्यक्षतेखाली 18 वी G20 शिखर परिषद 2023 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती?
:- नवी दिल्ली

©9. भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नवी दिल्ली G20 शिखर परिषदेत G20 चे 21वे स्थायी सदस्य म्हणून कोणाचा समावेश करण्यात आला?
: आफ्रिकन युनियन

©10. आफ्रिकन युनियनमध्ये सामील झाल्यानंतर G20 गटात किती सदस्य आहेत?
: 21

©11. 2024 मध्ये कोणता देश G20 शिखर परिषद आयोजित करेल?
: ब्राझील

©12 भारतातील पहिला स्वदेशी विकसित अणु प्रकल्प कोठे स्थापित करण्यात आला आहे?
: गुजरात

©13. भारताने कोणत्या देशासोबत रिन्यूएबल एनर्जी टेक्नॉलॉजी ॲक्शन प्लॅटफॉर्म (RETAP) लाँच केले?
:- अमेरिका

©14. नवी दिल्ली येथे G20 शिखर परिषदेदरम्यान ग्लोबल बायोफ्यूल्स अलायन्स (GBA) कोणी सुरू केले?
:- नरेंद्र मोदी

©15. प्रयागराज पोलिसांनी सुरू केलेल्या 'सवेरा योजना' कार्यक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे?
:- ज्येष्ठ नागरिकांसाठी आपत्कालीन सेवा प्रदान करणे.

रंध्रीय प्राणीसंघ (Phylum-Porifera)






📌हे सर्वांत साध्या प्रकारची शरीररचना असलेले प्राणी असून त्यांना 'स्पंज' म्हणतात. 


➡️त्यांच्या शरीरावर असंख्य छिद्रे असतात. त्या छिद्रांना 'ऑस्टीया' आणि 'ऑस्कुला' म्हणतात.


📌हे जलवासी प्राणी असून त्यांतील बहुतेक समुद्रात तर काही गोड्या पाण्यात आढळतात.


➡️बहुतेक सर्व प्राण्यांचे शरीर असममित असते


📌 या प्राण्यांच्या शरीरामध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशा कॉलर पेशी असतात. त्यांच्या मदतीने हे प्राणी शरीरामध्ये पाण्याला प्रवाहित करतात.


➡️हे प्राणी आधात्रीशी संलग्न असल्याने त्यांच्यात प्रचलन होत नाही. म्हणून त्यांना 'स्थानबद्ध प्राणी' (Sedentary animals) म्हणतात.


📌ह्यांच्या स्पंजासारख्या शरीरास कंटिकांचा/शुकिकांचा (Spicules) किंवा स्पाँजिनच्या तंतूचा आधार असतो. कंटिका कॅल्शियम कार्बोनेट किंवा सिलीकाच्या बनलेल्या असतात.


➡️ह्यांच्या शरीरात घेतल्या गेलेल्या पाण्यातील लहान सजीव व पोषकद्रव्यांचे ते भक्षण करतात. 'ऑस्टीया' नावाच्या छिद्रांद्वारे पाणी शरीरात घेतले जाते आणि 'ऑस्क्युला' नावाच्या छिद्रांद्वारे बाहेर सोडले जाते.


📌त्यांचे प्रजनन मुकुलायन (Budding) या अलैंगिक पद्धतीने किंवा /आणि लैंगिक पद्धतीने होते. याचबरोबर त्यांना मोठ्या प्रमाणात पुनरुद्भवन (Regeneration) क्षमता असते


➡️उदा : सायकॉन, यूस्पाँजिया (आंघोळीचा स्पंज), हायालोनिमा, युप्लेक्टेल्ला इ.

श्राव्य, अवश्राव्य व श्रव्यातीत ध्वनी

🎙मानवी कानाची ध्वनी ऐकण्याची मर्यादा 20 Hz ते 20000 Hz आहे म्हणजेच या वारंवारिते मधील ध्वनी मानवी कान ऐकू शकतो म्हणून या ध्वनीला श्राव्य (Audible) ध्वनी म्हणतात. 


📊मानवी कान 20 Hz पेक्षा कमी व 20000 Hz (20 kHz) पेक्षा जास्त वारंवारितेचा ध्वनी ऐकू शकत नाही. 


🎙20 Hz पेक्षा कमी वारंवारितेच्या ध्वनीस अवश्राव्य ध्वनी (Infrasound) म्हणतात. 


🎙दोलकाच्या कंपनाने निर्माण झालेला ध्वनी, भूकंप होण्यापूर्वी पृथ्वीच्या पृष्ठभागाची कंपने होऊन निर्माण झालेला ध्वनी हा 20 Hz पेक्षा कमी वारंवारितेचा म्हणजेच अवश्राव्य ध्वनी (Infrasound) आहे. 


🎙20000 Hz पेक्षा अधिक वारंवारितेच्या ध्वनीला श्रव्यातीत ध्वनी (Ultrasound) असे म्हणतात.


🎙कुत्रा, उंदीर, वटवाघूळ, डॉल्फिन असे प्राणी त्यांना असणाऱ्या विशेष क्षमतेमुळे श्रव्यातीत असलेले ध्वनी ऐकू शकतात. 


🎙या क्षमतेमुळे त्यांना काही आवाजाची चाहूल लागते, जी आपल्याला लागू शकत नाही. 


🎙पाच वर्षाखालील लहान मुले, काही प्राणी व किटक 25000 Hz पर्यंतचा ध्वनी ऐकू शकतात. 


🎙डॉल्फिन्स, वटवाघूळे, उंदीर वगैरे प्राणी श्रव्यातीत ध्वनी निर्माणही करू शकतात.


जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती


०१) महाराष्ट्रातील नेहरू स्टेडियम कोठे आहे ?

- पुणे.


०२) अँल्युमिनियम हा धातू कोणत्या खनिजापासून तयार केला जातो ?

- बाॅक्साईट.


०३) डाॅ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोठे आहे ?

- अकोला.


०४) कुलाबा जिल्ह्याचे नामकरण रायगड असे कोणी केले ?

- बॅरिस्टर अंतुले.


०५) तानसा धरण कोणत्या नदीवर आहे ?

- तानसा नदी.(ठाणे)


०१) प्रवरा नदीवर कोणते धरण बांधण्यात आले आहे ?

- भंडारदरा(विल्सन धरण). 


०२) पांडवांच्या वडिलांचे नाव काय होते ?

- पंडू राजा.


०३) राधानगरी हे प्रसिद्ध अभयारण्य महाराष्ट्रात कोठे आहे ?

- कोल्हापूर.


०४) बाल शिवाजीने वयाच्या कितव्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला ?

- सोळाव्या वर्षी.


०५) महाराष्ट्रात पहिले मातीचे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले ?

- गोदावरी.


०१) पंढरपूर मधील पवित्र नदीचे नाव कोणते ?

- चंद्रभागा.


०२) महाराष्ट्रात "श्रीमंत मंदिर "कोणास म्हटले आहे ?

- शिर्डी साईबाबा मंदिर.


०३) क्षेत्रफळानुसार महाराष्ट्र राज्याचा देशात कितवा क्रमांक आहे ?

- तिसरा.


०४) महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेस कोणते राज्य आहे ?

- मध्य प्रदेश.


०५) महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा कोणता ?

- भंडारा.


०१) महाराष्ट्रातील पहिले अणुविद्युत केंद्र कोठे आहे ?

- तारापूर.


०२) क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता ?

- मुंबई शहर.


०३) छावा या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक कोण ?

- शिवाजी सावंत.


०४) महाराष्ट्र राज्याचे एकूण प्राकृतिक विभाग किती व कोणते ?

- तीन,१) सह्याद्री किंवा पश्चिम घाट २) सातपुडा रांगा महाराष्ट्र पठार (दख्खन पठार) ३) कोकण किनारपट्टी.


०५) महाराष्ट्र राज्याचे एकूण प्रशासकीय विभाग किती व कोणते ?

- सहा,कोकण,छत्रपती संभाजीनगर

(औरंगाबाद),पुणे,नाशिक,नागपूर व अमरावती.


०१) स्वराज्याची पहिली राजधानी कोणती ?

- राजगड.


०२) सह्याद्री पर्वत कोणत्या राज्यात आहे ?

- महाराष्ट्र.


०३) ग्रामसभेचे अध्यक्ष पद कोण भूषविते ?

- सरपंच.


०४) ग्रामपंचायतीचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

- पाच वर्ष.


०५) ग्रामपंचायत व शासन यामधील दुवा कोणती व्यक्ती असते ?

- ग्रामसेवक.


०१) श्रध्दानंद छात्रालयाची स्थापना कोणी केली ?

- डॉ.पंजाबराव देशमुख.


०२) महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे ?

- नाशिक.


०३) सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ?

- महात्मा ज्योतिबा फुले.


०४) नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ?

-डॉ. बाबासाहेब आंबेडकर.


०५) भारताच्या पूर्वेला कोणता उपसागर आहे ?

- बंगालचा उपसागर.


०१) भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे ?

- जन-गण-मन.


०२) भारतातील सर्वात उंच मिनार कोणता आहे ?

- कुतुब मिनार.


०३) भारतातील सर्वात मोठे (क्षेत्रफळाच्या दृस्टीने) राज्य कोणते आहे ?

- राज्यस्थान.


०४) न संपणारे ऊर्जा स्त्रोत कोणते आहे ?

- सौरऊर्जा.


०५) भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे ?

- गंगा नदी.


०१) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?

- श्रीमती प्रतिभाताई पाटील.


०२) नासिक जिल्ह्यात विपश्यना ध्यान केंद्र कुठे आहे ?

- इगतपुरी.


०३) भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली ?

- डॉ.पंजाबराव देशमुख.


०४) नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा किती वर्षांनी भरतो ?

- दर बारा वर्षानी.


०५) नाशिक जिल्ह्यातील पक्षी अभयारण्य कोठे आहे ?

- नांदूर मधमेश्वर.



चालू घडामोडी :- 18 मार्च 2024



◆ दिव्यांग तिरंदाज व अर्जुन पुरस्कार मिळवणारी शीतल देवी यांची भारतीय निवडणुक आयोगाची राष्ट्रीय दिव्यांग आदर्श व्यक्तिमत्व म्हणून निवड केली.


◆ 'रॉयल चॅलेंजर्स बंगलोर'ने महिला प्रीमियर लीगच्या (WPL) दुसऱ्या सत्राचे विजेतेपद पटकावले आहे.


◆ भारतातील पहिले 'आयुर्वेदिक कॅफे' नवी दिल्लीत सुरू झाले.


◆ भारतीय सैन्य दल सेशेल्सला संयुक्त लष्करी सराव ‘एक्सरसाइज लिमिट-2024’ मध्ये सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहे.


◆ केंद्रीय आदिवासी व्यवहार आणि कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा यांनी E-NAM (National Agriculture Market) मोबाईल ॲप लाँच केले आहे.


◆ हैदराबादमध्ये नुकताच ‘वर्ल्ड स्पिरिच्युअली फेस्टिव्हल’ आयोजित करण्यात आला आहे.


◆ केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी PB-SHABD आणि अपडेटेड न्यूज ऑन एअर मोबाईल ॲप लाँच केले आहे.


◆ प्रसार भारती च्या अध्यक्ष पदी "नवनीत कुमार सहगल" यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


◆ देशातील बंगळुरू या ठिकाणी 75 शेफनी एकत्रितपणे जगातील सर्वात लांब डोसा तयार केला असून त्याची नोंद गिनिज बुकमध्ये झाली आहे.


◆ केंद्रिय पेट्रोलियम मंत्री हरदिप सिंग पूरी यांनी 'इथेनॉल-100' या इंधनाचा प्रारंभ केला आहे.


◆ लोकसभा निवडणुकीत आचार संहिता भंगाच्या तक्रारी तसेच गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्रिय निवडणुक आयोगाने "C vigil" हे ॲप विकसित केले आहे. 


◆ प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो PIB च्या मुख्य महासंचालकपदी 'शेफाली सरन' यांची निवड झाली आहे.


◆ लमीतीए-2024 हा संयुक्त युद्धसराव सेशेल्स या देशात होत आहे.


◆ सेशेल्स या देशात लमीतीए हा युद्ध सराव 2001 वर्षा पासून होत आहे.


◆ अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या अध्यक्षपदी नितीन सारंग यांची निवड झाली आहे.


◆ WPL 2024 क्रिकेट स्पर्धेचा विजेतेपद रॉयल चॅलेंजर्स बंगलुरू या संघाने पटकावले आहे.


◆ महीला आयपीएल 2024 चे उप विजेतेपद "दिल्ली कॅपिटल" या संघाने पटकावले आहे.


◆ महीला आयपीएल 2024 स्पर्धेमध्ये एलिस पेरी ही खेळाडू ऑरेंज कॅप ची वेजेती ठरली आहे.


◆ WPL 2024 स्पर्धेत श्रेयंका पाटील ही खेळाडू पर्पल कॅप ची विजेती ठरली आहे.


◆ WPL 2024 क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता.


◆ भारतात केरळ या राज्यात "Lyame Disease" चा पहिला रुग्ण आढळला आहे.


◆ राज्यपाल रमेशबैस यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार व रंगभूमीचे अभ्यासक गिरीजा शंकर लिखित 'रंग मंच' या पुस्तकाचे राजभवन, मुंबई येथे प्रकाशन करण्यात आले.

महाराष्ट्राचा भूगोल


दख्खनवरील पठारे
------------------------------------------------------------
-----------------------
अ.क्र. पठार. जिल्हा.
------------------------------------------------------------
-----------------------
१) अहमदनगर पठार. अहमदनगर.
२) सासवड पठार. पुणे.
३) औंध पठार. सातारा.
४) पाचगणी पठार (टेबललँड) सातारा.
५) खानापूर पठार. सांगली.
६) मालेगांव पठार. नाशिक.
७) बुलढाणा पठार. बुलढाणा.
८) तोरणमाळ पठार. नंदुरबार.
------------------------------------------------------------
-----------------------
दख्खन पठारावरील अन्य डोंगर (टेकड्या)
------------------------------------------------------------
-----------------------
अ. क्र. डोंगर. जिल्हा.
------------------------------------------------------------
-----------------------
०१) अस्तंभा डोंगर. नंदुरबार.
०२) गाळणा डोंगर. धुळे-नंदुरबार.
०३) अजिंठा डोंगर. औरंगाबाद.
०४) वेरुळ डोंगर. औरंगाबाद.
०५) हिंगोली डोंगर. हिंगोली.
०६) मुदखेड डोंगर. नांदेड.
०७) गरमसूर डोंगर. नागपुर.
०८) दरकेसा टेकड्या गोंदिया.
०९) चिरोली डोंगर. गडचिरोली.
१०) भामरागड. गडचिरोली.
११) सुरजागड. गडचिरोली.
------------------------------------------------------------
-----------------------
महाराष्ट्रातील महत्त्वाची शिखरे.
------------------------------------------------------------
-----------------------
अ. क्र. शिखर. उंची जिल्हा
------------------------------------------------------------
-----------------------
०१) कळसुबाई. १६४६. अहमदनगर.
०२) साल्हेर. १५६७. नाशिक.
०३) महाबळेश्वर. १४३८. सातारा.
०४) हरिश्चंद्रगड. १४२४. अहमदनगर.
०५) सप्तश्रुंगी. १४१६. नाशिक.
०६) तोरणा. १४०४. पुणे.
०७) अस्तंभा. १३२५. नंदुरबार.
०८) त्र्यंबकेश्वर. १३०४. नाशिक.
०९) तौला. १२३१. नाशिक.
१०) वैराट. ११७७. अमरावती.
११) चिखलदरा. १११५. अमरावती.
१२) हनुमान. १०६३. धुळे.
------------------------------------------------------------
-----------------------
महाराष्ट्रातील प्रमुख घाट.
------------------------------------------------------------
-----------------------
अ. क्र. घाट. मार्ग
------------------------------------------------------------
-----------------------
०१) थळ (कसारा) घाट. मुंबई-नाशिक.
०२) बोरघाट. पुणे-मुंबई.
०३) खंबाटकी घाट. पुणे-सातारा.
०४) दिवा घाट. पुणे-बारामती.
०५) कुंभार्ली घाट. कराड-चिपळुण.
०६) आंबा घाट. कोल्हापुर-रत्नागिरी.
०७) आंबोली घाट. सावंतवाडी-बेळगांव.
०८) फोंडा घाट. कोल्हापुर-पणजी.
------------------------------------------------------------
-----------------------
महाराष्ट्र : राष्ट्रीय उद्याने.
------------------------------------------------------------
----------------------------
अ.क्र. उद्याने जिल्हा क्षेत्रफळ.
------------------------------------------------------------
----------------------------
०१) ताडोबा चंद्रपुर. ११६.५५०
०२) संजय गांधी. ठाणे-मुंबई उपनगर. ८६.९८५
०३) नवेगांव. भंडारा १३३.८८०
०४) पेंच नागपुर. २५९.७१०
(जवाहरलाल नेहरु).
०५) गुगामल. अमरावती. ३६१.६८०
०६) चांदोली. सातारा, सांगली, ३१७.६७०
कोल्हापुर, रत्नागिरी
------------------------------------------------------------
--------------------------
महाराष्ट्र : व्याघ्र प्रकल्प.
------------------------------------------------------------
--------------------------------
अ.क्र. व्याघ्र प्रकल्प. जिल्हा क्षेत्रफळ
(चौकिमी)
------------------------------------------------------------
--------------------------------
०१) मेळघाट व्याघ्र प्रकल्प. अमरावती २७६९
०२) ताडोबा अंधारी चंद्रपुर. १७२८
०३) सह्याद्री (चांदोली). सातारा, रत्नागिरी
११६६
कोल्हापुर, रत्नागिरी
०४) पेंच (नेहरु)क्षेत्रफळ नागपुर. ७४१
०५) नागझिरा गोंदिया
------------------------------------------------------------
---------------------------------
महाराष्ट्र : थंड हवेची ठिकाणे
------------------------------------------------------------
-----------------------
अ.क्र. जिल्हा ठिकाण
------------------------------------------------------------
-----------------------
०१) सातारा महाबळेश्वर, पाचगणी.
०२) रायगड. माथेरान.
०३) बीड. चिंचोली.
०४) औरंगाबाद. म्हैसमाळ.
०५) पुणे लोणावळा, खंडाळा, भीमाशंकर,
तोरणा
०६) अमरावती चिखलदरा.
०७) नागपुर. रामटेक.
०८) जळगांव. पाल.
०९) रत्नागिरी दापोली, माचाळ.
१०) ठाणे जवाई, सुर्यमाळ.
११) नाशिक. सप्तश्रुंगी.
१२) नंदुरबार. तोरणमाळ.
१३) अहमदनगर. भंडारदरा.
१४) कोल्हापुर. पन्हाळा, विशालगड.
१५) अकोला नर्नाळा.
१६) सिंधुदुर्ग. अंबोली.




महाराष्ट्र : गरम पाण्याचे झरे.
------------------------------------------------------------
-----------------------
अ.क्र. जिल्हा झरे
------------------------------------------------------------
-----------------------
०१) जळगांव. चांगदेव, अडावेद, उपनदेव.
०२) रायगड. साव, उन्हेर.
०३) अमरावती सालबरडी.
०४) नांदेड. उनकेश्वर.
०५) यवतमाळ. कापेश्वर.
०६) ठाणे वज्रेश्वरी, अकलोली, सतीवली.
०७) रत्नागिरी उन्हर्वे, अरवली, फनसवने,
राजापौर उन्हाळे, तूरळ, गोळवली.
महाराष्ट्र : लेण्या
------------------------------------------------------------
-----------------------
अ.क्र जिल्हे लेण्या
------------------------------------------------------------
-----------------------
०१) औरंगाबाद. अजिंठा & वेरुळ, म्हैसमाळ व
गलवाडा.
०२) नाशिक. पांडव, भिलवाडा, मुंगी-तुंगी,
चांदवड,
चांभार, अंकाई-टंकाई लेण्या.
०३) पुणे कार्ले, बेडसा, भादे, लेण्याद्री, चावंड,
जीवधन.
०४) नांदेड. माहूर & शिऊर.
०५) लातूर. खरोसा (औसा)
०६) जालना भोकरदन.
०७) जळगांव. घटोत्कच लेणी.
०८) कोल्हापुर. हिद्रापूर.
०९) ठाणे सोपारा, अंबरनाथ, अशरगड, लोणाड.
१०) सिंधुदुर्ग. आचरा.
११) सातारा लोणारवाई.
१२) उस्मानाबाद. धाराशिव.
१३) अकोला पातूर.
१४) चंद्रपुर. भद्रावती.
१५) बीड. अंबाजोगाई.
१६) मुंबई उपनगर. महाकाली, जोगेश्वरी, मंडपेश्वर,
कान्हेरी(मुंबई ठाणे सिमेवर).
१७) रायगड. धारापूरी (एलीफंटा अरोरा.)
गांधारफणी, चामले, कोंडगांव, कोल,
कोंडाणे, कुडा, पाले, खडसावळे.
------------------------------------------------------------
-----------------------
महाराष्ट्र : अष्टविनायक
------------------------------------------------------------
-----------------------
अ.क्र. अष्टविनायक. स्थान
------------------------------------------------------------
-----------------------
०१) महागणपती रांजणगांव (पुणे)
०२) चिंतामणी थेऊर. (पुणे)
०३) मोरेश्वर. मोरगांव. (पुणे)
०४) विघ्नहर. ओझर. (पुणे)
०५) गिरिजात्मक. लेण्याद्री (पुणे)
०६) बल्लाळेश्वर. पाली (रायगड)
०७) वरद विनायक. महाड. (रायगड)
०८) सिध्दी विनायक. सिध्दटेक (अहमदनगर)
------------------------------------------------------------
-----------------------
महाराष्ट्र : औष्णिक विद्युत प्रकल्प
------------------------------------------------------------
-----------------------
अ.क्र. प्रकल्प. ठिकाण.
------------------------------------------------------------
-----------------------
०१) कोराडी, खापरखेडा नागपुर.
०२) दुर्गापूर. बल्लारपूर (चंद्रपुर)
०३) डहाणू, चोला ठाणे.
०४) एकलहरे नाशिक.
०५) बीड. परळी वैजनाथ.
०६) फेकरी भुसावळ.
०७) पारस. अकोला.
०८) ऊरण. रायगड.
------------------------------------------------------------
-----------------------
महाराष्ट्र : अभयारण्ये.
------------------------------------------------------------
-----------------------
कोकण प्रशासकीय विभागातील अभयारण्ये
०१) कर्नाळा, फनसाड रायगड.
०२) तुंगारेश्वर, तानसा ठाणे.
०३) मालवण. सिंधुदुर्ग.
------------------------------------------------------------
-----------------------
पुणे प्रशासकीय विभागातील अभयारण्ये
०१) भिमाशंकर अभयारण्य. पुणे व ठाणे.
०२) कोयना अभयारण्य. सातारा.
०३) सागरेश्वर अभयारण्य. सांगली.
०४) राधानगरी अभयारण्य. कोल्हापुर.
०५) मयुरेश्वर सूपे अभयारण्य. पुणे
------------------------------------------------------------
-----------------------
नाशिक प्रशासकीय विभागातील अभयारण्ये
०१) रेहेकुरी अभयारण्य. अहमदनगर.
०२) माळढोक पक्षी अभयारण्य. सोलापुर &
अहमदनगर.
०३) कळसुबाई व हरिश्चंद्र अभयारण्य. अहमदनगर.
०४) यावल अभयारण्य. जळगांव.
०५) अनेर धरण अभयारण्य. नंदुरबार.
------------------------------------------------------------
-----------------------
औरंगाबाद प्रशासकीय विभागातील
अभयारण्ये.
०१) जायकवाडी पक्षी अभयारण्य. औरंगाबाद
व नगर.
०२) नायगांव मयुर अभयारण्य बीड.
०३) येडशी रामलिंग घाट अभयारण्य.
उस्मानाबाद.
०४) गवताळा औटरम घाट अभयारण्य. औरंगाबाद
व जळगांव.
------------------------------------------------------------
-----------------------
अमरावती प्रशासकीय विभागातील अभयारण्ये
०१) ढाळकोळकाज/मेळघाट, वाणअभयारण्य.
अमरावती.
०२) काटेपूर्णा अभयारण्य. वाशिम.
०३) पैनगंगा अभयारण्य. नांदेड व यवतमाळ.
०४) अंबाबर्वा, ज्ञानगंगा, लोणार अभयारण्य
बुलढाणा.
०५) नर्नाळा अभयारण्य. अकोला.
०६) टिपेश्वर अभयारण्य. यवतमाळ.
नागपुर प्रशासकीय विभागातील अभयारण्ये
०१) नागनागझिरा गोंदिया
०२) बोर. वर्घा व नागपुर
०३) अंधारी चंद्रपुर
०४) चपराळा, भांबरागड. गडचिरोली....

महाराष्ट्रातील पर्वत शिखरे


🎯 महाराष्ट्र पठार निर्मिती ही   🌋जवालामुखीच्या  उद्रेकामुळे झालीआहे


🎯 गरम पाण्याचे झरे हे ज्वालामुखी उद्रेकाचे पुरावे देतात


🎯यातूनच सहयाद्री पर्वतरांग तयार झाली जी प्रमुख पश्चिम वाहिनी आणि पुर्व वहिनी नद्यांची जलविभाजक बनली.


🎯महाराष्ट्र मध्ये सह्याद्री ची उंची ही उत्तरे कडून दक्षिणेकडे कमी कामी होत जाते


🎯महाराष्ट्रातील प्रमुख पर्वत शिखरे


  ☘️  कळसुबाई 1,646 मी अहमदनगर


  ☘️  साल्हेर 1,567 मी नाशिक


  ☘️  महाबळेश्वर  1,438 मी सातारा


  ☘️ हरिश्चंद्रगड 1,424 मी अहमदनगर

  

  ☘️ सप्तश्रृंगी 1,416 मी नंदुरबार


  ☘️  तोरणा 1,404 मी पुणे 


  Trick 

🏆 कसा मी हसतो अत्रे तिला विचारतो🏆


  🌸 क  = कळसुबाई

  🌸 सा  = साल्हेर

  🌸 मी  = महाबळेश्वर

  🌸 हा   = हरिश्चंद्रगड

  🌸 स   =सप्तश्रृंगी

  🌸 तो   = तोरणा

  🌸 अ  =  अस्तंभा

  🌸  तर  =  त्र्यंबकेश्वर

  🌸 तिला =  तौला

  🌸 वि    = विराट

  🌸 चा    = चिखलदरा

वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे

भारतात नोट बंदी केव्हा झाली?

उत्तर : 8 नोव्हेंबर 2016

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

पुलवामा हल्ला केव्हा झाला?

उत्तर : 14 फेब्रुवारी 2019

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

जम्मू काश्मीर मध्ये 370 हे कलम केव्हा हटवले?

उत्तर : 5-8-2019

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

राम मंदिरचा निर्णय केव्हा झाला?

उत्तर : 9 नोव्हेंबर 2019

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

जगातील सर्वात पहिला कोरोणा रुग्ण कोठे आढळला?

उत्तर : 17 नोव्हेंबर 2019 मध्ये चीन येथे

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

नोकरी हमी योजना (job guarantee scheme) सुरु करणारे पहिले राज्य कोणते?

उत्तर : केरळ

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

पहिला ऑनलाइन कचरा विनिमय कार्यक्रम (first online waste exchange programme) कोठे सुरू करण्यात आला होता?

उत्तर :आंध्रप्रदेश

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

हायपरलूपमधून प्रवास करणारा पहिला भारतीय कोण आहे?

उत्तर : तनय मांजरेकर

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

पहिले स्पायडर म्युझियम कोठे आहे?

उत्तर : मेळघाट व्याघ्र प्रकल्प

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ग्राम वर्गणीतून संपूर्ण गावाला रोग प्रतिबंधक होमिओपॅथी अर्सेनिक अल्बम ३० हे औषध वितरणाचा निर्णय घेणारी राज्यातील पहिली ग्रामपंचायत कोणती?

उत्तर : सिंदखेड (जि.बुलडाणा)

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

एनआरसी, सीएएविरोधात ठराव मांडणारी देशातली पहिली ग्रामपंचायत कोणती?

उत्तर : इसळक (जि. अहमदनगर)

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

मिड डे मिल रेशन पुरवणारे पहिले राज्य कोणते? उत्तर : मध्यप्रदेश

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

प्रत्येक जिल्हयात व्हेंटिलेटरसह बेड सुविधा देणारे पहिले राज्य कोणते?

उत्तर :उत्तर प्रदेश

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

आफ्रिकन स्वाईन फ्ल्यूची भारतातील पहिली केस कोठे आढळली होती?

उत्तर : आसाम

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

एफआयआर आपके द्वार ही अभिनव योजना सुरु करणारे पहिले राज्य कोणते?

उत्तर :मध्य प्रदेश

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

भारतात पहिला कोरोना रुग्ण कोठे आढळला होता?

उत्तर : 30 जानेवारी 2020 लाख केरळ येथे.

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

भारतात सर्वात पहिल्यांदा जनता कर्फ्यू केव्हा लावला होता?

उत्तर : 22 मार्च 2020

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

भारत चीन वाद केव्हा झाला?

उत्तर : 17 जून 2020

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

राम मंदिर चे पूजन केव्हा झाले होते?

उत्तर : पाच ऑगस्ट 2020.

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

महात्मा गांधी यांना बापू ही उपाधी कोणी दिली?

उत्तर : सरोजिनी नायडू

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️


सायमन कमिशन (1927-28)



- अध्यक्ष :-जॉन सायमन 

- सदस्य: Clement Attlee, Harry Levy-Lawson, Edward Cadogan, Vernon Hartshorn, George Lane-Fox, Donald Howard


- 8 नोव्हेंबर 1927 इंग्लंड येथे स्थापना

- 8 फेब 1928 मुंबईत दाखल, 7 सदस्य सर्व इंग्रज

- भारतात दोनदा आले: फेब्रुवारी 1928, ऑक्टोंबर 1928

- अहवाल सादर मे 1930

- शिफारस :- गोलमेज परिषद


नेहरु रिपोर्ट 1928

- सायमन कमिशनला विरोध केल्यामुळे

- भारतमंत्री लॉर्ड बर्केनहेड ने आव्हान दिले की तुम्ही संविेधानासाठी प्रयत्न करा

- सचिव् जवाहर लाल नेहरु, अन्य 9 सदस्य होते पैकी एक सुभाष चन्द्र बोस 

- समिति ने रिपोर्ट 28-30 अगस्त, 1928 सादर केला

- पहिल्या दोन बैठका M A अन्सारींच्या अध्यक्षतेखाली झाल्या

- तिसरी बैठक मोतीलाल नेहरुंच्या अध्यक्षतेखाली झाली

- 29 राजनीतिक संगठनांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले

- यात प्रथम वसाहतीअंतर्गत स्वराज्य मागितले व 

- नेहरु व सुभाषचंद्र बोस यांनी संपूर्ण स्वातंत्र मागितले