Sunday 31 May 2020

राजा राममोहन रॉय

★ जन्म
२२ मे १७७२
राधानगर, बंगाल प्रांत, ब्रिटिश भारत

★ मृत्यू २७ सप्टेंबर १८३३ (६३ वर्ष)
इंग्लंड, ब्रिस्टॉल

★मृत्यूचे कारण :-मेंदूज्वर

★ पर्शियन लिपीत व अरेबिक भाषेत त्यांनी 'वेदान्त' ग्रंथ नावाचे पहिले पुस्तक लिहिले.

★ १८१५ मध्ये कलकत्ता येथे परतल्यावर त्यांनी 'वेदान्त' ग्रंथाचे बंगाली भाषेत भाषांतर केले.

★ मुगल सम्राटचे राजदूत म्हणून ते इंग्लंडला गेले होते.

★ मुगल सम्राट दुसरा अकबर याने राममोहन राॅय यांना राजा ही उपाधी बहाल केली.  

★ त्यांनी सर्वप्रथम "ब्रह्मपत्रिका"नावाचे वृत्तपत्र सुरू केले

★ समाजाला नवी दिशा देण्यासाठी त्यांनी २० ऑगस्ट १८२८ साली ब्राम्हो समाजाची स्थापना केली. 

★ त्यांनी ४ डिसेंबर १८२१ रोजी संवाद कौमुदी हे बंगाली भाषेतील तर

★ १२ एप्रिल १८२२ रोजी "मिरात_उल_ अखबार" हे पर्शियन वृतपत्र सुरू केले.

★ त्यांनी १८२८ साली प्रेसिडेन्सी कॉलेज सुरू केले.

★ लॉर्ड विल्यम बेंटिक या भारताच्या गव्हर्नर जनरलच्या साहाय्याने ४ डिसेंबर १८२९ मध्ये भारतातील सतीची प्रथा कायद्याने बंद करवली.

★ याकामी जगन्नाथ शंकर शेठ यांची साथ मिळाली

★ भारतीय पत्रकारितेचे अर्ध्वयु' म्हणूनही इतिहासात त्यांची नोंद आहे. 

★ १९३३ साली मेदुचा ताप या आजारपणामुळे राजा राममोहन रॉय यांचे निधन झाले.

No comments:

Post a Comment

Latest post

सहकार

   11th सहकार  :- Click Here 12th सहकार  :- Click Here