Wednesday 23 August 2023

राज्यसेवा, PSI-STI-ASO मुख्य परीक्षा प्रश्नसंच


1) कलम 3 संदर्भात खालीलपैकी कोणते विधान अप्रस्तुत ठरते ?

   अ) कलम 3 नुसार संसद एक राज्यातून भूप्रदेश अलग करून नवे राज्य निर्माण करू शकते.

   ब) संसद राज्यांच्या सीमा व नाव बदलू शकते.

   क) नवीन राज्य निर्माण करण्याबाबतचे विधेयक केवळ राष्ट्रपतींच्या पूर्वशिफारशीनेच संसदेत सादर करता येते.

   ड) अशा प्रकारच्या विधेयकासंदर्भात राज्य विधीमंडळाचा सल्ला स्वीकारणे बंधनकारक आहे.

        वरीलपैकी कोणता / ते पर्याय चूकीचा / चे आहे / आहेत ?

   1) अ   

   2) ब   

   3) क    

  4) ड


उत्तर :- 4


2) भारतात राज्य निर्मितीच्या अनुषंगाने खालीलपैकी कोणत्या तरतुदी घटनेत अंतर्भुत नाहीत ?

   अ) दोन किंवा अधिक राज्ये एकत्रित करून नव्या राज्याची निर्मिती करता येते.

   ब) कोणत्याही राज्याचे नाव अथवा सीमा बदलण्याकरीता संबंधीत राज्य विधी मंडळाची स्पष्ट सहमती आवश्यक असते.

   क) कोणतेही राज्य, केंद्रशासित प्रदेश म्हणून रुपांतरीत करता येईल.

   ड) संबंधीत राज्य शासनाचे मत मागवून केंद्र शासन, नवीन राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करू शकते.


1) क, ड  

2) ब, क, ड    

3) अ, ड    

4) ब, ड


उत्तर :- 2


3) ‘नागपूर करार’ बाबत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे ?

   1) विधिमंडळाचे किमान एक अधिवेशन नागपूर येथे घ्यावे.

   2) मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नागपूर येथे असावे.

   3) सरकारी नोक-यात लोकसंख्येच्या प्रमाणात भरती करावी.

   4) मराठवाडयातील काँग्रेस नेत्यांचा ‘नागपूर करारास’ विरोध होता.


उत्तर :- 4


4) राज्यांची पुनर्रचना किंवा संघ – राज्य संबंधाबाबत कोणती समिती आणि आयोग संबंधित आहे  ?

अ) जे.व्हि.पी. समिती      

ब) दार आयोग    

क) राज गोपालाचारी समिती   

ड) सरकारिया आयोग


1) फक्त अ, ब, क   

2) फक्त अ, ब, ड    

3) फक्त अ, क, ड    

4) फक्त ब, क, ड


उत्तर :- 2


5) व्दैभाषिक मुंबई राज्याची निर्मिती .............. या दिवशी झाली.

 1) 1 मे 1960     

 2) 1 नोव्हेंबर 1956   

 3) 1 मे 1966   

 4) 1 जून 1975 


उत्तर :- 2



2006) सध्या भारतीय संघराज्यात किती घटकराज्ये व केंद्रशासित प्रदेश आहेत ?

1) 28 व 7 

2) 26 व 9    

3) 27 व 8 

4) 29 व 6


उत्तर :- 1


7) 17 जून 1948 ला घोषित करण्यात आलेल्या ‘भाषावार प्रांतरचना आयोगाचे’ अध्यक्ष कोण होते ?

1) न्या. एस.के. दार 

2) एस.के. पाटील    

3) ब्रिजलाल बियाणी 

 4) काकासाहेब गाडगीळ


उत्तर :- 1


8) कोणत्याही संघराज्य क्षेत्राचे क्षेत्र वाढविण्याबाबतचे विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडता येत जर त्यास  ?

   1) राष्ट्रपतींनी शिफारस केलेली असली व संबंधित संघ राज्य क्षेत्राच्या अभिप्रायासह

   2) राष्ट्रपतींनी शिफारस केलेली असली व संबंधित संघ राज्य क्षेत्राच्या अभिप्रायाशिवाय

   3) राष्ट्रपतींच्या शिफारशीशिवाय परंतु संबंधित संघराज्य क्षेत्राच्या अभिप्रायासह

   4) राष्ट्रपतींच्या शिफारशीशिवाय व संबंधित संघ राज्य क्षेत्राच्या अभिप्रायाशिवाय


उत्तर :- 2


9) घटक राज्यांची पुनर्रचना किंवा त्यांच्या सीमा बदलण्याबाबतच्या खालील विधानांपैकी कोणते विधान चूक आहे ?

   1) संसदेला तो अधिकार दिला आहे.

   2) संसद साध्याबहुमताने तसा कायदा करू शकते.

   3) विधेयकाची शिफारस करण्यापूर्वी राष्ट्रपतींनी संबंधित विधीमंडळांची मते ‘आजमावली’ आहेत.

   4) सीमा बदलण्यासाठी संबंधित घटकराज्यांची संमती आवश्यक आहे.


उत्तर :- 4




१) राष्ट्रीय विकास मंडळाने भारत सरकारने धान्य व्यापारात पदार्पण करावे अशी शिफारस कधी केली ?

 1) 1951

 2) 1958     

 3) 1977     

 4) 1985

उत्तर :- 2


२) महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद ............................ रोजी अस्तित्वात आली असून पुणे येथे मुख्यालय आहे.

   1) 1974 

   2) 1984 

     3) 1994  

    4) 1986


उत्तर :- 2


३) आधुनिक काळात प्रमंडळ शेती पध्दती कोणत्या देशात दिसून येते ?

1) रशिया  

2) चीन      

3) अमेरिका

4) इस्त्रायल

उत्तर :- 3


४) भारतीय शेती संशोधन मंडळ खालील विषयांसाठी उपक्रम आयोजित करते.

 अ) फलोत्पादन   

 ब) शेती वित्त   

 क) शेती बाजारपेठा 

 ड) पशु विज्ञान

   वरीलपैकी कोणता / ते पर्याय योग्य आहे / त ?


1) अ व ब  

2) ब व क    

3) क व ड   

4) अ व ड


उत्तर :- 4


५) योग्य पर्याय निवडा :

     भारतातील पीक पध्दतीवर परिणाम करणारे घटक :

 अ) पिकांची फेररचना 

 ब) किंमती व उत्पन्न महत्तम करणे    

क) शेतीचा आकार

 ड) जोखीम स्वीकारणारा विमा

  इ) आदानाची उपलब्धता   

 फ) भूधारणा पध्दती


   1) अ, ब व क 

   2) ड व इ    

  3) वरील सर्व चूक  

  4) वरील सर्व बरोबर


उत्तर :- 4


६) खालील विधाने विचारात घ्या :

   अ) 1985 मध्ये भारत सरकारने सर्व समावेशक पीक विमा योजना सुरू केली.

   ब) 1999 मध्ये खरीप पिकांसाठी राष्ट्रीय कृषी पिक विमा योजना सुरू केली.

         वरीलपैकी कोणते / ती विधान / ने योग्य आहे / त ?

   1) फक्त ब

    2) अ व ब  

  3) फक्त अ  

  4) यापैकी नाही


उत्तर :- 3


७) खालील विधाने विचारात घ्या :

   अ) राष्ट्रीय कृषी विकास योजना सन 2007 – 2008 मध्ये सुरू करण्यात आली.

   ब) किसान क्रेडिट कार्ड योजनेची अंमलबजावणी ऑगस्ट, 1998 पासून करण्यात येत आहे.

   क) राष्ट्रीय कृषी विमा योजना भारतातील 16 राज्यात अंमलात आणली.

  वरीलपैकी कोणते / ती विधान / ने योग्य आहे / त ?


1) फक्त अ  

2) फक्त क    

3) अ व ब   

4) सर्व बरोबर


उत्तर :- 3


८) केंद्रशासन पुरस्कृत ‘गुणवत्ताधारक व शुध्द दूध उत्पादनासाठी सशक्त पायाभूत सुविधा योजना” ऑक्टोबर 2003 मध्ये कार्यान्वीत  झाली. या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे / आहेत ?

   अ) देशातील जिल्हा पातळीवरील आजारी दुग्ध सहकारी संघांचे पुनरुज्जीवन करणे.

   ब) देशातील ग्रामपातळीवरील कच्चा दुग्ध उत्पादनाच्या गुणवत्तेत सुधारणा घडवून आणणे.


1) केवळ अ  

2) केवळ ब    

3) दोन्ही     

4) एकही नाही


उत्तर :- 2


९) भारतामध्ये पुढीलपैकी कोणत्या क्रांतीमुळे अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्णता तसेच जादा उत्पादन झाले ?

  1)पीत क्रांती

  2) श्वेत क्रांती  

  3) हरित क्रांती  

  4) नील क्रांती


उत्तर :- 3


१०) सिंचनाला खालील  योजनेत सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले ?

1) प्रथम पंचवार्षिक योजना  

2) व्दितीय पंचवार्षिक योजना

3) तृतीय पंचवार्षिक योजना   

4) वरील सर्व पर्याय


उत्तर :- 1



१) खालीलपैकी कोणते / कोणती विधान / ने बरोबर आहे / आहेत ?

   अ) अनिवासी भारतीय नागरिक निवडणुकीत मतदानाला पात्र असतील.

   ब) अशी व्यक्ती भारतातील कोणत्याही मतदारसंघात नाव नोंदवू शकतो.

   क) मतदार म्हणून नाव नोंदवण्याकरता अशा व्यक्तीने अशा व्यक्तीने भारतीय दूतावासात अर्ज केला पाहिजे.

 1) सर्व विधाने   

 2) कोणतेही नाही 

 3) फक्त अ  

 4) अ आणि ब


उत्तर :- 3



२) भारतीय नागरिकत्व रद्द करण्यासंबंधातील खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही ?

   1) फसवणूक करून, खोटी माहिती दर्शवून किंवा वस्तुस्थिती लपवून नागरिकत्व मिळवले असेल.

   2) कृतीतून वा भाषणातून राज्य घटनेशी बेइमानी किंवा द्रोह केला असेल.

   3) भारताशी शत्रुत्व किंवा युध्द करणा-या राष्ट्राला मदत केली असेल.

   4) भारताबाहेर सलग पाच वर्षे वास्तव्य केल्यास


उत्तर :- 4


३) खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

   अ) एखाद्या व्यक्तीचा जन्म भारतात 26 जानेवारी 1950 रोजी किंवा त्यानंतर परंतु 1 जुलै 1987 पूर्वी झालेला असेल तर ती  व्यक्ती भारतीय नागरिक असते.

   ब) एखाद्या व्यक्तीचा जन्म भारतात 1 जुलै 1987 रोजी किंवा त्यानंतर झाला असेल आणि जर तिच्या जन्माच्या वेळी तिच्या  आईवडिलांपैकी कोणीही एक भारताचे नागरिक असतील तर ती व्यक्ती भारतीय नागरिक असेल.

   क) जेव्हा एखादी व्यक्ती तिच्या भारतीय नागरिकत्वाचा त्याग करते तेव्हा त्या व्यक्तीच्या प्रत्येक अज्ञान मूलाचे भारतीय    नागरिकत्व देखील संपुष्टात येते.


   1) अ   

   2) ब   

   3) क   

   4) वरीलपैकी एकही नाही


उत्तर :- 4


४) भारतीय नागरिकांच्या ............ अधिकारांचा समावेश घटनेच्या विभाग 3 कलम 14 ते 18 मध्ये केला आहे.

   1) समतेचा   

   2) स्वातंत्र्याचा 

   3) धर्माचा   

   4) चौथ्या


उत्तर :- 1


५) 44 व्या घटनादुरुस्तीने मूलभूत अधिकारांच्या यादीतून कोणता  काढून टाकण्यात आला ?

   1) समानतेचा अधिकार   

   2) संपत्तीचा अधिकार

   3) स्वातंत्र्याचा अधिकार   

   4) शैक्षणीक अधिकार


उत्तर :- 2


६) खालीलपैकी कोणत्या तरतूदीव्दारे न्यायालयीन हस्तक्षेपाच्या माध्यमातून मूलभूत अधिकारांच्या संरक्षणाची हमी मिळते ?

   1) अनुच्छेद 32 

   2) अनुच्छेद 25 

   3) अनुच्छेद 14 

   4) अनुच्छेद 30


उत्तर :- 1


७) खालीलपैकी कोणते विधान चूक   आहे ?

   1) अनुच्छेद 29 च्या शिर्षकात अल्पसंख्याक शब्द आहे.

   2) अनुच्छेद 29 च्या बहुसंख्यासाठीही लागू आहेत.

   3) अल्पसंख्याकाचा निकष धर्म आणि भाषा आहे.

   4) सर्व विधाने खरी आहेत.


उत्तर :- 4


८) खालीलपैकी कोणता हक्क “सविधांनिक” आहे परंतु मूलभूत हक्क नाही ?

   1) अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क

   2) मालमत्तेविषयक हक्क

   3) संपूर्ण भारतात मुक्त संचार करण्याचा हक्क

   4) धर्म स्वातंत्र्याचा हक्क


उत्तर :- २


९) भारतीय राज्यघटनेचे कलम 16 कशाशी संबंधित आहे ?

   1) राज्यकारभाराची मार्गदर्शक तत्वे व मूलभूत कर्तव्ये

   2) मूलभूत कर्तव्ये व अधिकार

   3) नववा परिशिष्ट व सातवा परिशिष्ट

   4) मूलभूत अधिकार


उत्तर :- 4


1०) भारतीय राज्य घटनेच्या कलम 12 नुसार “राज्य” या संज्ञेत खालीलपैकी कोणती संस्था / यंत्रणा अंतर्भूत होत नाही ?

1) विधानसभा   

2) विधान परिषद  

3) उच्च न्यायालय    

4) जिल्हा परिषद


उत्तर :- 3


१) भारतीय संविधानाच्या 19 (1) व्या कलमात खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा विशेषत्वाने समावेश नाही ?

1) भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य  

2) मुद्रण स्वातंत्र्य

3) बिनाशस्त्र व शांततेने  एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य  

4) भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार स्वातंत्र्य

उत्तर :- 2


२०३२) घटनेच्या 19 (1) (अ) व्या कलमामध्ये मान्य केलेल्या नागरिकांच्या खालील कारणांमुळे वाजवी बंधने येऊ शकतात.

   अ) देशाचे सार्वभौमत्व   

   ब) देशाची एकता    

   क) प्रांताची सुरक्षितता 

   ड) सर्वसाधारण जनतेच्या हितासाठी


  1) अ, क   

  2) ब, ड 

  3) अ, ब    

  4) ड

उत्तर :- 3


२०३३) खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाच्या मुलभूत हक्कात नाही  ?

   1) समतेचा हक्क      

   2) स्वातंत्र्याचा हक्क  

   3) धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क    

   4) मालमत्तेचा हक्क

 

उत्तर :- 4


४) सहा ते 14 वर्षे वय गटातील मुलांना मोफत व अनिवार्य शिक्षणाचा अधिकार संविधानांत संशोधन करून भाग III मध्ये एक अनुच्छेद समाविष्ट करुन प्रदान केला आहे. कितवे संशोधन व कोणता अनुच्छेद ? एक जोडी निवडा.  

    1) 86 वे संशोधन – अनुच्छेद 19 (फ)     2) 93 वे संशोधन – अनुच्छेद 21 (अ)

   3) 86 वे संशोधन – अनुच्छेद 21 (अ)    4) 93 वे संशोधन – अनुच्छेद 19 (फ


उत्तर :- 3


५) ‘बंदीप्रत्यक्षीकरण’ आज्ञेबाबतच्या विधानांचा विचार करा:

   अ) मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी अशी आज्ञा काढली जाते.

   ब) अशी आज्ञा काढण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांना दिला आहे.

   क) व्यक्तीला न्यायालयापुढे हजर करुन बंदी करण्याचा कारणाचे समर्थन करण्याची आज्ञा न्यायालय बंदी करणा-या  अधिका-याला देऊ शकते.

   ड) न्यायालयाने फौजदारी गुन्ह्याबद्दल तुरुंगवास दिलेल्या व्यक्तीची सुटका मिळविण्यासाठी देखील अशी आज्ञा काढता येते.


         वरील ‍विधानांपैकी कोणते बरोबर आहे / आहेत ?

   1) केवळ अ   

  2) केवळ ब आणि क   

  3) केवळ अ आणि क   

  4) केवळ अ, ब आणि क


उत्तर :- 4 


२१४१) नॅशनल इन्स्टीटयूट ऑफ न्युट्रीशन या संस्थेच्या शिफारशी नुसार भारतामधील दरडोई प्रति वर्ष अंडी आणि पोल्ट्री मांसाचा उपभोग किती असला पाहिजे  ?

1) 180 अंडी आणि 11 किलो पोल्ट्री मांस  

2) 90 अंडी आणि 10 किलो पोल्ट्री मांस

3) 365 अंडी आणि 12 किलो पोल्ट्री मांस    

4) 180 अंडी आणि 12 किलो  मांस


उत्तर :- 1


२) मध्यान्ह भोजन कार्यक्रमाअंतर्गत प्राथमिक स्तरावर शिजवलेल्या अन्नाव्दारे किती प्रमाणात उष्मांक व प्रथिने पुरविण्यात येतात ?

   1) 350 कॅलरी व 12 ग्रॅम प्रथिन  

   2) 450 कॅलरी व 12 ग्रॅम प्रथिन

   3) 700 कॅलरी व 20 ग्रॅम प्रथिन   

   4) 450 कॅलरी व 20 ग्रॅम प्रथिन


उत्तर :- 2


३) HDI आणि GDI मुल्यांच्या बाबतीत, पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे  ?

   1) HDI आणि GDI च्या मूल्यांमध्ये जेवढा जास्त फरक असेल तेवढी जास्त लैंगिक विषमता असणार

   2) HDI आणि GDI च्या मूल्यांमधील फरक आणि लैंगिक विषमता असणार

   3) HDI आणि GDI च्या मूल्यांची तुलना होऊ शकत नाही.

   4) वरीलपैकी कोणतेही नाही


उत्तर :- 1


४) संयुक्त राष्ट्र संघटनेच्या (यू.एन.ओ) “सहस्त्रकातील विकासाचे उद्दिष्ट” या अंतर्गत कोणत्या वर्षापर्यंत भूकेचा प्रभाव निम्म्यावर आणण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.

   1) वर्ष 2050   

   2) वर्ष 2030  

   3) वर्ष 2020   

   4) वर्ष 2015

 

उत्तर :- 4


५) UNDP च्या 2013 च्या अहवालात प्रसिध्द झालेल्या मानव विकास निर्देशांकानुसार पुढील देशांची उतरत्या क्रमाने मांडणी करा.

   अ) दक्षिण कोरिया

   ब) जपान   

   क) अमेरिका  

   ड) नॉर्वे


1) अ, ब, क, ड   

2) क, ड, ब, अ    

3) ब, अ, क, ड    

4) ड, क, ब, अ

 

उत्तर :- 4 


🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...