16 September 2025

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच


1) महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडणारा जिल्हा?

उत्तर-  सोलापूर


2) महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता?

उत्तर- अहमदनगर


3) जागतिक योग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

उत्तर- 21 जून


4) पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले?

उत्तर- 1761


5) कोणत्या तारखेस घटना समितीने राष्ट्रीय ध्वज स्विकृत केला?

उत्तर- 22 जुलै 1947


6) वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध कोणी लावला?

उत्तर-जेम्स वॅट


7) भारतीय पोलीस प्रशिक्षण अकादमी कोणत्या राज्यात आहे?

उत्तर- तेलंगणा


8) अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर-औरंगाबाद


9) अहिराणी भाषेतील जगप्रसिद्ध कवयित्रि कोण आहेत?

उत्तर- बहिणाबाई चौधरी


10) डेसीबल या एककाने  काय  मोजतात ?

उत्तर- ध्वनीची तीव्रता


11) लोणार हे उल्काजन्य सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर- बुलढाणा


12) तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे हा रोग होतो?

उत्तर- कर्करोग


13) डोळ्याच्या आरोग्यासाठी हे जीवनसत्व महत्त्वाचे आहे?

उत्तर- ए


14) महाराष्ट्रातला पहिला सोने शुद्धीकरण कारखाना या ठिकाणी आहे?

उत्तर- शिरपूर


15) उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणते?

उत्तर- तोरणमाळ


16) सर्वाधिक शहरी लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे?

उत्तर- महाराष्ट्र


17) जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

उत्तर- 8 मार्च


18) डायलीसिस उपचार कोणत्या आजारात करतात?

उत्तर- मूत्रपिंडाचे विकार


19) कोवळ्या सूर्यप्रकाशापासून कोणते जीवनसत्व मिळते?

उत्तर- ड


20) महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली आहे?

 उत्तर-  भ्रंशमूलक उद्रेक


21) अर्ध मॅरेथॉन चे अंतर किती असते?

उत्तर- 21 कि.मी


22) भारताच्या राष्ट्रध्वजाची उंची आणि लांबी यांचे प्रमाण किती आहे?

उत्तर- 2:3


23) अन्नपदार्थाची ऊर्जा कोणत्या परिमाणात मोजली जाते?

 उत्तर- कॅलरीज


24) इन्सुलिन हे प्राण्यांच्या कोणत्या अवयवामध्ये स्रवणारे संप्रेरक आहे? 

 उत्तर- स्वादुपिंड


25) हेलसिंकी हे शहर कोणत्या देशाची राजधानी आहे?

उत्तर- फिनलंड


26) करा किंवा मरा हा मंत्र भारतास कोणी दिला?

 उत्तर- महात्मा गांधी


27) मध्य रेल्वेचे मुख्यालय  कोठे आहे?

 उत्तर- मुंबई


28) भारताचे तिनही दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात?

उत्तर- राष्ट्रपती


29) सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली झालेले चिपको आंदोलन कोणत्या कारणासाठी लढले गेले? 

 उत्तर- वृक्षतोड विरोधी आंदोलन


30) अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक झाली होती?

: उत्तर- डॉक्टर होमी जहांगीर भाभा



31) जयपूर फूट चे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते?

सर): उत्तर- डॉक्टर प्रमोद सेठी


32) भारतातील सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती कोण असतात?

उत्तर- राष्ट्रपती


33) पायराईट हे कशासारखे दिसते म्हणून त्याला फूल्सगोल्ड म्हणून ओळखले जाते?

 उत्तर- सोन्यासारखे


34) इन्डोसल्फान हे  कशाचे उदाहरण आहे?

उत्तर- कीडनाशक


35) रक्ताच्या कर्करोगासाठी कोणती संज्ञा लागू होते?

 उत्तर-  ल्युकेमिया


36) महाराष्ट्रात पंचायत राज पद्धती स्विकारण्यासंबंधी नेमले गेलेली समिती कोणती आहे?

 उत्तर- वसंतराव नाईक समिती


37) गावाच्या पिकाची स्थिती व शेती संबंधी अहवाल कोण तयार करतो?

 तलाठी


38) पंचायतराज ही मूळ संकल्पना कोणाची आहे?

उत्तर-  महात्मा गांधी


39) परम-8000 हा महासंगणक कोणत्या शास्त्रज्ञाने तयार केला?

उत्तर- डॉक्टर विजय भटकर


40) भारतातील कोणत्या उद्योगाला सनराईजक्षेत्र म्हणून ओळखले जाते?

उत्तर- वाहन


41) वि.वा शिरवाडकरांचे टोपण नाव कोणते?

उत्तर- कुसुमाग्रज


42) संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?

 उत्तर- न्यूयॉर्क


43) बुलढाणा जिल्ह्यात किती तालुके आहेत?

उत्तर- 13


44) माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर- रायगड


45) सिद्धटेक हे अष्टविनायक गणपती चे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

 उत्तर- अहमदनगर


46) केवलादेव राष्ट्रीय पक्षी उद्यान कोणत्या राज्यात आहे?

 उत्तर- राजस्थान


47) विशाळगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर- कोल्हापूर


48)  ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे?

उत्तर- ऑस्ट्रेलिया


49) कोटोपेक्सी नामक सक्रिय ज्वालामुखी कोणत्या देशात आहे? 

 उत्तर- इक्वेडोर


50) अनातोलिया चे पठार कोणत्या देशात आहे?

उत्तर- तुर्कस्तान


51) झुलू जमात कोठे आढळते ?

उत्तर- दक्षिण आफ्रिका


52) सुएझ कालवा कोणत्या दोन महासागरांना जोडतो?

 उत्तर- भूमध्य सागर व लाल सागर


53) कृष्णा नदीचे उगमस्थान कोणत्या राज्यात आहे?

 उत्तर- महाराष्ट्र


54) शिवसमुद्रम नदी खोरे विकास योजना कोणत्या नदीशी संबंधित आहे?

उत्तर- कावेरी


55) भारतीय रेल्वेचे दक्षिण-मध्ये झोनचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे?

उत्तर- सिकंदराबाद


56) बुडापेस्ट कोणत्या देशाची राजधानी आहे?

 उत्तर- हंगेरी


57) अजिंठा -वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या वंशाच्या राज्यकर्त्यांच्या काळात निर्माण केले आहे?

उत्तर- राष्ट्रकूट


58) सन  1885 मधील राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?

उत्तर- व्योमेशचंद्र बॅनर्जी


59) 1905 मध्ये लंडन येथे इंडिया होमरूल सोसायटीची स्थापना कोणी केली?

 उत्तर- श्यामजी कृष्णा वर्मा


60) फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली?

 उत्तर- सुभाषचंद्र बोस


61) मराठा आणि केसरी या वृत्तपत्राशी कोण संबंधित आहे?

: उत्तर- लोकमान्य टिळक


62) कोणत्या कायद्यान्वये भारताचा राज्यकारभार ईस्ट इंडिया कंपनीकडून महाराणी (क्राऊन) कडे गेला? 

: उत्तर- भारत सरकार अधिनिय 1858


63) मोर्ले-मिंटो सुधारणा कोणत्या वर्षाच्या कायद्याशी संबंधित आहे?

: उत्तर- 1909


64) पहिल्या गोलमेज परिषदेचे वेळी भारताचे व्हाईसरॉय कोण होते?

: उत्तर- लॉर्ड आयर्विन


65) महात्मा गांधी यांची दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे?

: उत्तर- सविनय कायदेभंग


66) poverty and Un-british Rule in india चे लेखक कोण आहेत?

: उत्तर- दादाभाई नौरोजी


67) पुर्ण स्वराज्य दिवस सर्वप्रथम कोणत्या वेळी साजरा करण्यात आला?

: उत्तर- 26 जानेवारी 1930


68) भारतीय घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?

: उत्तर- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर


69) राज्य पुर्नरचना आयोग 1953 चे अध्यक्ष कोण होते?

: उत्तर- फाजलअली


70) मूलभूत अधिकाराचा समावेश घटनेच्या कोणत्या भागात केला आहे?

: उत्तर- 3


71) भारतीय राज्यघटनेचे कलम 25 कशाशी संबंधित आहे?

: उत्तर- धर्मस्वातंत्र्याचे अधिकार


72) कोणत्या समितीच्या शिफारशीवरून भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला?

: उत्तर- स्वर्णसिंह समिती


73) भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम राष्ट्रपतीचे अध्यादेशाशी संबंधित आहे?  

: उत्तर- कलम 123


74) संसदेच्या लोकलेखा समिती मध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असतात?

: उत्तर- 22


75) केंद्र व राज्य यांच्यातील संबंधाविषयी घटनेच्या कोणत्या प्रकरणात तरतूद आहे?

: उत्तर- 11


76) जागतिक अपंग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

: उत्तर- 3 डिसेंबर


77) हंबनटोटा बंदर कोणत्या देशात आहे?

: उत्तर- श्रीलंका


78) सुजय कशाशी संबंधित आहे?

: उत्तर- ऑफशोअर पेट्रोलिंग  व्हेसल


79) बॉक्साईट या धातुकापासून कोणते खनिज निष्कर्षण केले जाते?

: उत्तर- ॲल्युमिनियम


80) कोणती शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे व त्यातून पित्तरस स्त्रवतो? 

: उत्तर- यकृत


81) आवाजाची तीव्रता मोजण्याचे परिमाण कोणते आहे?

: उत्तर- डेसिबल


82) बाल्कन प्रदेश हा कोणत्या देशाच्या साम्राज्यात मोडणारा प्रदेश होता?

: उत्तर- तुर्कस्तान


83) भारताने कोणत्या साली आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले?

: उत्तर- 1991


84) भारतात कोणत्या प्रकारची लोकशाही आहे?

: उत्तर- अप्रत्यक्ष


85) पंचायत समितीचा कार्यकारी/प्रशासकीय अधिकारी कोण असतो?

: उत्तर- गटविकास अधिकारी


86) क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठे राज्य कोणते?

: उत्तर- राजस्थान


87) अष्टविनायकांपैकी किती गणेश मंदिरे ही पुणे जिल्ह्यात आहेत? 

: उत्तर- 5


88) अहमदनगर-कल्याण मार्गावर कोणता घाट आहे?

: उत्तर- माळशेज


89) पुणे जिल्ह्यातील भाडघर धरण हे कोणत्या नदीवर बांधलेले आहे?

: उत्तर- वेलवंडी


90) भारत सरकारने कोणत्या दिवशी चलनातून 500 व 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता?

: उत्तर- 8 नोव्हेंबर 2016


91) कृषी क्षेत्रातील पीतक्रांती म्हणजे कोणत्या उत्पादनातील वाढ होय.

: उत्तर- तेलबीया


92) निरा- नरसिहापुर हे तीर्थ क्षेत्र पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात येते? 

: उत्तर- इंदापुर


93) बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी कोणी 1916 रोजी डेक्कन रयत असोसिएशन ही संस्था स्थापन केली? 

: उत्तर- छत्रपती शाहू महाराज


94) पाचगणी हे शहर वसविण्यात कोणाचे योगदान आहे?

: उत्तर- जॉन चेसन


95) महाबळेश्वर मधील पॉईंट मध्ये समुद्रसपाटीपासून सर्वात उंचावर कोणता पॉईंट आहे?

: उत्तर- आर्थरसीट


96) साताऱ्याचे अजिंक्यतारा किल्ल्यास सर्वप्रथम मराठ्यांचा राजधानीचा मान कोणी दिला?

: उत्तर- छत्रपती राजाराम राजे ‌


97) थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर हे मूळचे कोणत्या तालुक्यातील होते?

: उत्तर- कराड


98) महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोठे आहे?

: उत्तर- पुणे


99) कोणता दिवस पोलीस शहीद दिन म्हणून ओळखला जातो?

: उत्तर- 21 ऑक्टोंबर


100) कोणत्या योजनेअंतर्गत लैंगिक अत्याचार झालेल्या महिलांना आर्थिक सहाय्य करता येते?

: उत्तर- मनोधैर्य


Q 1) हा भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे? 

उत्तर :- साखर उद्योग 


Q 2) दगडी कोळश्याच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे? 

उत्तर :- चौथा


Q 3) महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीच्या पश्चिम उतार या भागात प्रामुख्याने -------प्रकारचा पाऊस पडतो? 

उत्तर :- प्रतिरोध पर्जन्य 


Q 4) भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था (NIO) कार्यरत आहे? 

उत्तर :- पणजी (गोवा) 


Q 5) मान्सूनपूर्व पडणाऱ्या सरींना महाराष्ट्रात काय ---------म्हणतात?

उत्तर :- आम्रसरी  


Q 6) भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते? 

उत्तर :- झारखंड 


Q 7) जागतिक वारसा स्थळ यादित महाराष्ट्रातील कोणत्या स्थळांचा समावेश होतो? 

उत्तर :- अजिंठा आणि वेरुळ 


 Q 8) अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते? 

उत्तर :- महाराष्ट्र 


Q 9)  देशातील घनकचर्‍यापासून ऊर्जानिर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरु केलेला आहे? 

उत्तर :- पुणे 


Q 10) अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? 

उत्तर :- राजेवाडी


प्रश्न 1 - "इंडियन नॅशनल कॉंग्रेस" चे अल्पसंख्याकांचे प्रतिनिधी कोण होते❓
उत्तर - लॉर्ड डफरिन

प्रश्न 2- स्वातंत्र्याच्या वेळी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष कोण होते❓
उत्तर - आचार्य जे.बी. कृपलानी

प्रश्न 3- प्रथम ब्रिटिश सम्राट भारतात येणार कोण होता❓
 उत्तरः जॉर्ज पाचवा

प्रश्न 4- 'केसरी' वृत्तपत्राचे संपादक कोण होते❓
उत्तर - बाळ गंगाधर टिळक

प्रश्न 5 - कोणत्या व्हाइसरॉयच्या कार्यकाळात 'शिमला परिषद' आयोजित केली गेली होती❓
उत्तर - लॉर्ड वेव्हेल 

प्रश्न 6- ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोठे झाली❓
 उत्तर - लंडन

प्रश्न 7 - महात्मा गांधींनी 'साबरमती आश्रम' कोठे स्थापित केले होते❓
उत्तर - अहमदाबाद

प्रश्न 8 - कोणत्या इतिहासकाराने 1857 च्या उठावाला ‘भारताचा पहिला स्वातंत्र्य संग्राम’ म्हटले आहे❓
 उत्तर - व्ही.डी. सावरकर

प्रश्न 9 - गदर पार्टीची स्थापना कोठे झाली❓
 उत्तर - सॅन फ्रान्सिस्को

प्रश्न 10 - 1857 च्या क्रांतीच्या वेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते❓
 उत्तर - लॉर्ड पामर्स्टन

111) काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?
): उत्तर- आसाम

112) स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना कोणी केली होती?
): उत्तर- बाळ गंगाधर टिळक

113) रक्तदाब कोणत्या साधनाच्या सहाय्याने मोजला जातो?
: उत्तर- स्पीग्मोमॅनोमीटर

114) प्रकाश संश्लेषण क्रियेच्या वेळी कोणता वायू उत्सर्जित केला जातो? 
): उत्तर- ऑक्सिजन

115) मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते आहे?
): उत्तर- दर्पण

116) मीराबाई चाणु कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
): उत्तर- वेटलिफ्टिंग

117) नागालँड या राज्याची राजधानी कोणती आहे?
): उत्तर- कोहिमा

118) दक्षिण पूर्व मध्य रेल्वे या रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे?  
): उत्तर- बिलासपुर

119) माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला?
): उत्तर- 2005

120) अजंठा ,वेरूळ या लेण्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? 
): उत्तर- औरंगाबाद

121) धुपगड -पंचमढी ही शिखरे कोणत्या पर्वतरांगेमध्ये अस्तित्वात आहेत?
): उत्तर- सातपुडा

122) वुलर हे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे?
): उत्तर- जम्मू काश्मीर

123) संयुक्त राष्ट्र संघटनाचे (युनो) मुख्यालय कोठे आहे?
): उत्तर- न्यूयॉर्क

124) ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे स्थापन झाली?
): उत्तर- सुरत

125) चलो जाव चळवळ भारतामध्ये कोणत्या वर्षी झाली?
): उत्तर- 1942

126) महाराष्ट्रात एकूण किती महसूल जिल्हे आहे?
): उत्तर- 36

127) दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
): उत्तर- चित्रपट

128) आर्य समाजाची स्थापना कोणी केली?
): उत्तर- स्वामी दयानंद सरस्वती

129) गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ कोणते आहे?
): उत्तर- लुंबिनी

130) भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे?
): उत्तर- आरबीआय

131) ललिता बाबर ही खेळाडू कोणत्या खेळा बद्दल प्रसिद्ध आहे?
): उत्तर- स्टीपल चेस

132) शहराचा प्रथम नागरिक कोण असतो?
): उत्तर- महापौर

133) विंग्स ऑफ फायर (अग्निपंख) हे आत्मचरित्र कोणाचे आहे?
): उत्तर- डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम

134) मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे?
): उत्तर- औरंगाबाद

135) महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये एकूण किती सदस्य आहेत? 
): उत्तर- 78

136) राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कोठे आहे?
): उत्तर- पुणे

137) महाराष्ट्रात पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरू झाला? 
): उत्तर- प्रवरानगर

138) भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता?
): उत्तर- मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार

139) कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत?
): उत्तर- औरंगाबाद

140) मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
): उत्तर- उत्तराखंड

141) साहित्यिक राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय?
): उत्तर- गोविंदाग्रज

142) राज्यसभेचा सभापती कोण असतो?
): उत्तर- उपराष्ट्रपती

143) घटक राज्याच्या सीमा बदलण्याचा अधिकार कोणाला आहे?
): उत्तर- भारतीय संसद

144) डेक्कन सभेची स्थापना कोणी केली?
): उत्तर- महादेव गोविंद रानडे

145) खेडेगावात जन्म-मृत्यूची नोंद करण्याचे कार्य कोण करतो? 
): उत्तर- ग्रामसेवक

146) भारतामध्ये मतदानाचा हक्क वयाच्या कितव्या वर्षानंतर प्राप्त होतो? 
): उत्तर- 18

147) महाराष्ट्र राज्याच्या पोलिस प्रमुखांना काय म्हणतात?
): उत्तर- पोलीस महासंचालक

148) मनाचे श्लोक कोणी लिहिले?
): उत्तर- संत रामदास

149) महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे? 
): उत्तर- पुणे

150) ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे?
): उत्तर- साहित्य

151) महाराष्ट्राला किती कि‌‌.मी चा समुद्रकिनारा लाभला आहे?
): उत्तर- 720 कि.मी

152) राष्ट्रपती पदाची निवडणूक लढविण्यास पात्र होण्यासाठी उमेदवाराचे किमान वय किती असणे आवश्यक आहे?
): उत्तर- 35

153) महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो?
): उत्तर- नाशिक

154) इस्राइल या देशाला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण?
): उत्तर- नरेंद्र मोदी

155) व्हॅलेंन्टाईन डे कोणत्या दिवशी असतो?
): उत्तर- 14 फेब्रुवारी

156) हत्तीरोग (हत्तीपाय रोग) कोणता डास चावल्याने होतो ?
): उत्तर- क्युलेक्स

157) रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले असता कोणता रोग होतो? 
): उत्तर- ॲनिमिया (पंडुरोग)

158) चिकन गुणिया हा रोग कशापासून होतो?
): उत्तर- विषाणू

159) मानवी आहारातील कोणत्या घटका पासून शरीरास ऊर्जा मिळते? 
): उत्तर- कार्बोहायड्रेट

160) ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो?
): उत्तर- डोळे

161) गाजर या वनस्पतीत कोणते जीवनसत्व विपुल प्रमाणात आढळते?
): उत्तर- अ

162) मूत्रपिंडाचे विकारावर कोणती उपचार पद्धती वापरली जाते?
): उत्तर- डायलीसिस

163) मोसाद ही गुप्तहेर संस्था कोणत्या देशाची आहे?
): उत्तर- इस्राईल

164) कोणत्या रासायनिक पदार्थाला आपण व्यावहारिक भाषेत त्रुटी असे म्हणतो?
): उत्तर- पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट

165) कोणत्या इंग्लिश गव्हर्नर जनरल ने तैनाती पद्धत आमलात आणली?
): उत्तर- लॉर्ड वेलस्ली

166) राज्यसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो?
): उत्तर- कायमचे स्थायी सभागृह

167) कोसबाडच्या टेकडीवरून हे आत्मवृत्त कोणी लिहिलेले आहे? 
): उत्तर- अनुताई वाघ

168) भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो चे मुख्यालय कुठे आहे?
): उत्तर- बंगरुळ

169) राष्ट्रीय महामार्ग 50 (NH -50 ) हा कोणत्या दोन शहरांना जोडतो? 
): उत्तर- पुणे-नाशिक

170) पेनल्टी कॉर्नर ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
): उत्तर- हाॅकी

171) जागतिक आरोग्य संघटना ( WHO ) चे मुख्यालय कोणत्या शहरात आहे?
): उत्तर- जिनिव्हा

172) भारताने अवकाशात सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता? 
): उत्तर- आर्यभट्ट

173) सतीश कुमार शिवलिंगम हा भारतीय खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
): उत्तर- वेटलिफ्टिंग

174) फेसबुकचा संस्थापक कोण आहे?
): उत्तर- मार्क झुकेरबर्ग

175) आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कुठे आहे?
): उत्तर- हेग

176) मालगुडी डेज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
): उत्तर- आर. के. नारायण

177) मुऱ्हा ही कोणत्या जनावराची जात आहे?
): उत्तर- म्हैस

178) पेनिसीलीन या प्रतिजैविकाचा शोध कोणी लावला?
): उत्तर- अलेक्झांडर फ्लेमिंग

179) संतोष करंडक ही क्रीडा स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? 
): उत्तर- फुटबॉल

180) चौसा ही जात कोणत्या पिकाशी संबंधित आहे?
): उत्तर- आंबा

181) भारत व चीन यांच्या दरम्यान च्या सीमारेषेला कोणती लाईन म्हणतात?
): उत्तर- मॅकमोहन लाईन

182) ईराण या देशाची राजधानी कोणती आहे?
): उत्तर- तेहरान

183) भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली?
): उत्तर- 1 एप्रिल 1935

184) नदीवरील जगातील सर्वात मोठे बेट मांजुली हे कोणत्या नदीवर व कोणत्या राज्यात आहे?
): उत्तर- ब्रह्मपुत्रा नदी आसाम राज्य

185) नागार्जुन सागर हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? 
): उत्तर- कृष्णा

186) लंडन हे शहर कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे?
): उत्तर- थेम्स

187) मानवी शरीरामध्ये हाडांशी हाडे जोडणारी उती म्हणजे काय? 
): उत्तर- अस्तीबंध

188) बर्फी चित्रपटाचे दिग्दर्शक कोण? 
): उत्तर- अनुराग बासु

189) रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती?
): उत्तर- हिल्टन यंग कमीशन

190) ॲनाॅलाॅगचे चे डिजिटल व डिजिटलचे ॲनाॅलाॅग  कोणती प्रणाली करते?
): उत्तर- मोडेम

191) तारपा हे वाद्य कशापासून बनविले जाते?
): उत्तर- वाळलेला भोपळा

192) पालघर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी परदेशी मालाची होळी करण्यात आली?
): उत्तर- सातपाटी

193) दाभोळ धबधबा पालघर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?
): उत्तर- जव्हार

194) यंग बंगाल या चळवळीस खालीलपैकी कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती?
): उत्तर- सर हेन्री व्हीवियन

195) पालघर जिल्ह्यात रिलायन्स औष्णिक प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे?
): उत्तर- डहाणू

196) पालघर जिल्हा महाराष्ट्रातील कितवा जिल्हा आहे?
): उत्तर- 36 वा

197) पालघर जिल्ह्यास कोणत्या जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत? 
): उत्तर- ठाणे, नाशिक

198) पोलीस विभागात परिक्षेत्राचे प्रमुखास काय म्हणतात?
): उत्तर- पोलीस उपमहानिरीक्षक

199) महाराष्ट्रात जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस उपविभागाचे प्रमुखास काय म्हणतात?
): उत्तर- उपविभागीय पोलिस अधिकारी

200) बनगरवाडी या कादंबरीचे लेखक कोण?
): उत्तर- व्यंकटेश माडगूळकर


1857 पूर्वीचे उठाव

 1. रामोशांचा उठाव


०१. सासवडच्या सत्तू नाईकच्या नेतृत्वाखाली सर्वप्रथम रामोशी समाज एकत्रित आला. सत्तू नाईक, साताऱ्याचा चित्तूरसिंग नाईक व पुरंदरचा उमाजी नाईक हे रामोशांचे प्रमुख नेते होते. पुण्याच्या आग्नेय भागात रामोशांची जास्त दहशत होती.


०२. सत्तू नाईकच्या नेतृत्वाखाली उमाजी नाईक व त्याचा भाऊ अमृता नाईक यांनी पुण्याजवळ भांबूर्ड्याचा लष्करी खजिना १९२४-२५ साली लुटला. पुण्यातून रामोशांच्या हकालपट्टीसाठी ब्रिटिशांनी जवाहरसिंग रामोशी यास सासवडचा अंमलदार बनविले. पण उमाजी व सत्तू नाईकाने जवाहरसिंग व त्याच्या मुलाच्या मुसक्या आवळल्याने त्याने इंग्रजांची नोकरी सोडून दिली.


०३. सत्तू नाईकनंतर रामोशांचे नेतृत्व उमाजी नाईककडे आले. भूजाजी, येसाजी, कृष्णाजी व अमृता हे उमाजीचे विश्वासू साथीदार होते. उमाजी स्वतःला राजे म्हणवून घेत असे. पुण्यातील पुरंदर तालुक्यातील भिवरी या गावी १७९१ साली उमाजीचा जन्म झाला होता.


०४. ब्रिटीश काळात रामोशांची संख्या १८००० होती. दरम्यानच्या काळात उमाजीने एका यात्रेत तलवारीने कोतवालाचे तुकडे करून पोलिसांत दहशत पसरविली. उमाजीला पकडण्यासाठी ब्रिटिशांनी १८२६ साली पहिला जाहीरनामा काढला. यानुसार उमाजी व त्याचा साथीदार पांडुजी यांना पकडून देणाऱ्यास १०० रु. इनाम जाहीर केले. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.


०५. सरकारने पुन्हा जाहीरनामा काढून इनामाची रक्कम १२०० रु केली. आणि जाहीरनाम्यात असे म्हटले कि, सरकारला मदत नाही केलीत तर बंडवाल्यात सामील झालात असे समजण्यात येईल. यावेळी उमाजीस पकडून देण्याचा विडा उचलणाऱ्या शिवनाक महारास रामोशांनी ठार केले.


०६. त्यावेळी उमाजीचा धाक पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, जेजुरी, सासवड व मराठवाड्याच्या काही भागात होता. यावेळी पुण्याचा कलेक्टर एच.डी. रॉबर्टसन याने वेळोवेळी जाहीरनामा काढून उमाजीला पकडण्याचे ठरविले. कोणीच गद्दारी न केल्यामुळे त्यांच्या हाती काहीच आले नाही.


०७. रॉबर्टसनने दरम्यान कोकणावर वचक बसविण्यासाठी बंडखोरांची माहिती देणाऱ्यासाठी खास बक्षीस जाहीर केले. या काळात उमाजीने ठाणे व रत्नागिरी जिल्ह्यातील लोकांनी ब्रिटीशांकडे महसूल न भरता उमाजींकडे द्यावा असे जाहीर केले. याच्या परिणामस्वरूप भोर संस्थानातील १३ गावांनी उमाजीकडे महसूल भरला.


०८. शेवटी ब्रिटिशांनी उमाजीची बायको, दोन मुले व एक मुलगी यांना अटक केली. त्यामुळे कुटुंबाखातर उमाजी ब्रिटिशांना शरण आला. ब्रिटिशांनी त्याचे सर्व गुन्हे माफ करून त्याला सरकारी नोकरी दिली. पुणे व सातारा जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम उमाजीकडे देण्यात आले. पण पुढे नंतर १३ गावांच्या महसुलावरून उमाजी व ब्रिटीश यांच्यात वाद सुरु झाला.


०९. १८३१ साली ब्रिटिशांनी जाहीरनामा प्रसिद्ध करून उमाजीला पकडण्याची जबाबदारी कॅप्टन अलेक्झांडर व कॅप्टन मैकिन्तोश यांच्याकडे सोपविली.उमाजी, येसाजी, मुंजाजी व कृष्णाजी यांना पकडून देणाऱ्यास ५००० रुपये व २ बिघा जमीन बक्षीस देण्याचे जाहीर केले. त्यापैकी एकट्या उमाजीस पकडून देणाऱ्यास २५०० रुपये व १ बिघा जमीन जाहीर करण्यात आली.


१०. बक्षिसाच्या आमिषाला बळी पडून एकेकाळचे त्याचे जवळचे साथीदार काळू रामोशी व नाना रामोशी यांनी गद्दारी केली. उमाजीचा जुना शत्रू बापूसिंग यानेही त्यांना मदत केली. १५ डिसेंबर १८३१ रोजी कॅप्टन मैकिन्तोशने पुण्याच्या मुळशी तालुक्यातील अवळस येथे उमाजीला अटक केली. ३ फेब्रुवारी १८३२ रोजी उमाजीला फाशी देण्यात आली.


११. उमाजी नाईकनंतर रामोशांनी दौलतराव नाईक याच्या नेतृत्वाखाली लढा सुरु ठेवला. सह्याद्रीच्या खोऱ्यात येसूबाईच्या डोंगरात दौलतराव नाईक व मेजर डैनियल यांच्यात चकमक झाली त्यात नाईक व त्याचे सहकारी मारले गेले. मारताना नाईकांनी फडकेंना विनंती केली कि, रामवंशी (रामोशी) पुढे स्वार्थासाठी दरोडे घालणार नाहीत याची दक्षता घ्या.


१२. त्यानंतर नाशिक व अहमदनगर भागात राघू भांगरे याने ब्रिटिशाविरुद्ध लढा दिला. २० सप्टेंबर १८४४ रोजी राघू भांगरेनी एका पोलिस अधिकाऱ्यासह ७ पोलिसांना ठार केले. ब्रिटिशांना सहाय्य करणाऱ्या पाटलांची नाके त्याने कापली. त्याच्या बंदोबस्तासाठी ब्रिटिशांनी ५००० रुपयाचे बक्षीस जाहीर केले. त्याला पकडण्याची जबादारी पाटील व कुलकर्ण्यावर सोपविली.


2. कोळ्यांचा उठाव


०१. १८२८, १८३९, १८४४ ते १८४८ या दरम्यान महाराष्ट्रात कोळ्यांनी तीन टप्प्यात उठाव केला. रामजी भांगडिया, रघु भांगडिया, बापू भांगडिया, चिमणाजी जाधव व नाना दरबारे यांनी या उठावाचे नेतृत्व केले.


०२. १८२४ साली मुंबई भागात कोळ्यांनी नेटिव्ह इन्फ्रंटीकडून उठाव केला. ब्रिटिशांनी तो उठाव मोडून काढला. म्हणून १८२८ साली मुंबई पोलिसातील कोळी अधिकारी रामजी भांगडिया यांनी नोकरीचा राजीनामा देऊन त्या भागात कोळ्यांचे नेतृव केले. त्यांनी मुंबई भागात दोन वर्षे ब्रिटीशांशी लढा दिला. हा उठाव दडपून टाकण्यासाठी कॅप्टन अलेक्झांडर व कॅप्टन मैकिन्तोश आले व त्यांनी हा उठाव मोडून काढला.


०३. १८३९ साली कोळ्यांनी पुण्यात अचानक उठावास सुरुवात केली. त्यावेळी आता संपूर्ण राज्य कोळ्यांच्या ताब्यात आहे अशी घोषणा दिली. कोळ्यांनी दुसऱ्या बाजीरावास पेशवेपद देऊन मराठी राज्याची पुनर्स्थापना केली.


०४. यावेळी घोडनदी जवळील सरकारी खजिन्याला १५० कोळ्यांनी वेढा घातला. त्यावेळी पुण्याचा आसिस्टंट कलेक्टर रोज याने कोळ्यांच्या बंदोबस्तासाठी पुण्याहून सैन्य मागविले. यावेळी ५४ कोळ्यांवर खटले भरून २८ जणांना कमीअधिक प्रमाणात शिक्षा दिली व दोघांना फाशी देण्यात आली.


०५. १८४४ साली कोळ्यांनी शस्त्रास्त्रे व माणसे जमवून रघु भांगडिया व बापू भांगडिया यांच्या नेतृत्वाखाली पुणे, नाशिक, सातारा. नगर व पुरंदर याभागात परत उठाव केला.


०६. नाणे घाट व माळशेज घाट ताब्यात घेऊन कोळ्यांनी कोकणचा मार्ग अडविला. इंग्रज अधिकारी कॅप्टन जेलने या उठावाचा बंदोबस्त केला. १८४५ मध्ये ब्रिटिशांनी बापू भांगडियाला पकडले. १८५० पर्यंत ब्रिटिशांनी महाराष्ट्रातील कोळ्यांचा कायमचा बंदोबस्त केला.


3. भिल्लांचे उठाव


०१. १८१८ मध्ये ब्रिटिशांनी खानदेश ताब्यात घेतला. भिल्लांची वस्ती विशेषतः याच भागात असल्याने भिल्लांच्या मनात इंग्रजाबद्द्ल द्वेष निर्माण झाला. त्यामुळे त्यांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केला. त्रिंबकजी डेंगळे, भिल्ल नाईक, दसरत व धानजी, हरिया (हिरा), निहाल, सेवाराम सोनार (घिसाडी), भागोजी नाईक, खर्जासिंग, भीमा नाईक, उचेतसिंग पवार यांनी या उठावाचे नेतृत्व केले.


०२. त्रिंबकजी ढेंगळे हा दुसऱ्या बाजीरावचा मित्र व मराठा सरदार होता. दुसऱ्या बाजीरावच्या पराभवानंतर डेंगळेला ठाण्याच्या तुरुंगात ठेवण्यात आले. तेथून तो पळाला व त्याने भिल्लांना इंग्रजांविरुद्ध बंड करण्यास चिथविले. त्याने उठावाची सूत्रे त्याचे पुतणे गोदाजी व महिपा डेंगळे यांच्यावर सोपविली. तत्कालीन कलेक्टर कॅप्टन ब्रिग्जने उठावाचा बंदोबस्त करण्यासाठी भिल्लांचे मुडदे पाडले व डोंगरातील वाटघाटांवर सैन्य ठेऊन त्यांची रसद बंद केली.


०३. पण याउलट मुंबईचा गवर्नर माउंट एल्फिन्सटन याने मात्र भिल्लांना पेन्शन व काम देऊन त्यांचा बंदोबस्त केला.त्यांची वेगळी तुकडी उभारून आडमाळावर त्यांना तैनात केले. नादीरसिंह या भिल्ल डाकुस त्याच्या सहकाऱ्यांच्या मदतीनेच पकडण्यात आले.


०४. नोकऱ्या देऊनही भिल्ल थंड झाले नाहीत. त्यांनी उठाव सुरूच ठेवला. इंग्रजांनी भिल्लांच्या बंदोबस्तासाठी त्यांना माफी देण्याची घोषणा केली. यावेळी भिल्लाचे नेतृत्व सातमाळ्याचा भिल्ल नाईक करत होता. कॅप्टन ब्रिग्ज ने भिल्ल नाईकास पकडून त्याला फाशी दिली यासोबत शेख सादुल्ला यास कठोर शिक्षा केली.


०५. डसरत व धानजी हे लासूरच्या भिल्लांचे प्रमुख होते. त्यांनी १८२० मध्ये विशेषतः सातपुडा प्रदेशात गावे व घरे बेचिराख करण्याचे सत्र चालविले. त्यांच्या टोळीत शेख दुल्ला हा पेंढारी सामील झाला. मेजर मोरीन याने १०० मैलांवरील महत्वाच्या जागा जिंकल्याने दक्षिण भिल्लांच्या प्रमुखाना शरणागती पत्करावी लागली.


०६. १८२२ मध्ये सातमाळ्याचा हरिया व सातपुड्याचा निहाल भिल्ल यांनी भिल्लांच्या उठावाचे नेतृत्व केले. यांच्या काळात अंदाधुंदी, बलात्कार व शोषणास मर्यादा राहिल्या नाहीत. यावेळी कॅप्टन रॉबिन्सन याने भिल्लांना यशस्वीरित्या दडपले.


०७. १८२५ मध्ये सेवाराम सोनारच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केला. यावेळी राजकीय नेत्यांनीसुद्धा याला पाठींबा दिला. सेवारामने साताराच्या राजाच्या नावाने बनावट पत्रे तयार केली व ती राजाच्या आदेशानुसार बागलान तालुक्यातील भिल्लांना वाटली. ही पत्रे भिल्लांनी उठाव करण्यासंदर्भातील होती.


०८. त्यानुसार भिल्लांनी लुटालूट केली. त्यांनी उतारपूरवर हल्ला केला व तेथील लुट मुरली महाल या किल्ल्यात ठेवली. लेफ्टनंट औट्रम याने यातील काही लुट परत मिळविली व सेवाराम व त्याच्या सहकाऱ्यांना पकडले. सेवारामबाबत औट्रम ने मवाळ भूमिका घेतली व भिल्लांच्या जमिनी परत दिल्या.


०९. १८२८ पर्यंत भिल्लांचे उठाव कमी झाले पण संपले नव्हते. पानिपतच्या लढाईत मरण पावलेल्या पवारांचा पणतू उचेतसिंग पवार याने धारच्या पवारांकडून गादी मिळविण्यासाठी भिल्लांना सोबत घेऊन दोन वेळा हल्ला केला होता. दोन्ही वेळेस तो पराभूत झाला.


१०. मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यात भिल्ल लोकांनी कोनारराव याच्या नेतृत्वाखाली इंग्रजांविरुद्ध बंड केले. पण सुसूत्रता नसल्याने इंग्रजांना बंड दडपून टाकणे सोपे ठरले.


११. काजरसिंग नाईक याने १८७५ च्या वेळी खानदेशात ब्रिटीशांविरुद्ध भिल्लाच्या उठावात नेतृत्व केले. तो पूर्वी ब्रिटीशांच्या पोलिस दलात होता. त्याने ब्रिटीशांचा ७ लाखाचा खजिना लुटला. १८५७ च्या अंबापाणी लढाईत भिल्लची ब्रिटीशांशी लढाई झाली. यात स्रियांचाही सहभाग होता.


4. गौंड जमातीतील उठाव


०१. १८१७-१८ च्या काळात नागपूरचे राजे अप्पासाहेब भोसले यांनी गौंड या आदिवासी जमातीच्या प्रमुखांच्या मदतीने इंग्रजांविरुद्ध उठाव केला. बेतूर येथे इंग्रजी फौजेचा त्यांनी पराभव केला. भोसलेंनी रणजीतसिंहासह अनेक हिंदी संस्थानिकांचे मन वळवून इंग्रंजांच्या विरुद्ध उठाव करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही. शेवटी त्यांना इंग्रजांकडून पराभव पत्करावा लागला. १८४० मध्ये भोसलेंचा जोधपुर येथे मृत्यू झाला.


5. हटकरांचा उठाव


०१. मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात हंसाजी नाईक हटकर यांचे छोटेसे राज्य होते. नोव्हाचा किल्ला हंसाजीचा प्रमुख आधार होता. त्यावेळी मराठवाडा हा इंग्रजांचा मांडलिक निजामच्या ताब्यात होता. हंसाजीने १८१९-२० मध्ये निजाम व इंग्रजांच्या विरुद्ध उठाव केला.


०२. मेजर पिटसन, कॅप्टन इव्हान्स डेविड, कॅप्टन मैडोज टेलर यांनी ४००० सैनिकांसह हंसाजीवर हल्ला केला. इंग्रजांनी नोव्हा किल्ल्यावर तोफा डागून तो किल्ला ताब्यात घेतला. तेव्हा हंसाजीने उमरखेड येथून इंग्रजांशी लढा दिला. इंग्रजांनी हंसाजी हटकर याचा पराभव केला व त्याचे राज्य ताब्यात घेतले.


6. धर्माजी प्रतापरावाचा उठाव


०१. बीड येथे धर्माजी प्रतापराव याने १८१८ मध्ये निजामाला विरोध केला. हा उठाव मोडण्यासाठी निजाम सरकारने ११ जुलै १८१८ रोजी नवाब मुर्तुजा यारजंग याला लेफ्टनंट जेम्स सदरलैंड याच्या नेतृत्वाखाली रवाना केले. ३० जुलै १८१८ रोजी सदरलैंडने धर्माजी लपून बसलेल्या दिवे गावातील किल्ल्याला वेढा घातला. त्यामुळे धर्माजी व त्याचा भाऊ कंपनीच्या हाती आले.


7. कोल्हापूरच्या गडकरींचा उठाव


०१. १ ऑक्टोबर १८१२च्या तहाने कोल्हापूर कंपनीचे मांडलिक झाले होते. १८२१ साली गादीवर बसलेले शहाजी बाबासाहेब इंग्रजद्वेष्टे होते. त्यांना राणी जिजाबाईपासून चौथा शिवाजी व राणी दिवणाबाईपासून चिमासाहेब अशी दोन अपत्ये होती.


०२. १८३८ मध्ये राजे शहाजीचा मृत्यू झाला. त्यांची दोन्ही मुले अल्पवयीन असल्याने राण्यांनी राज्यकारभार पाहिला. पण त्यांचे आपापसांत पटत नसल्याने इंग्रजांनी मध्ये हस्तक्षेप केला. इंग्रज सरकारने राज्यकारभार सुधारण्यासाठी दाजीकृष्ण पंडित यास दिवाण नेमले. हे धाकट्या राणीस व त्यांच्या समर्थकांस आवडले नाही.


०३. दाजी पंडितने शेतसारा वसूल करण्यासाठी मामलेदाराची नेमणूक केली. मामलेदार हे गडकरीपेक्षा कनिष्ट असल्याने गडकरींनी त्याकडे शेतसारा भरण्यास नकार दिला. सामानगडावर वसुलीसाठी आलेल्या मामलेदारांच्या माणसांना गाडकऱ्यांनी मारले. त्यामुळे दाजी पंडितने बेळगावहून सैन्य मागविले.


०४. कॅप्टन औट्रमच्या नेतृत्वाखालील १२०० सैनिकांनी सामानगडावर हल्ला केला व गडकऱ्यांचा पराभव केला. ऑक्टोबर १८४४ मध्ये बंडवाल्यांनी प्रतीसरकारची स्थापना केली व दाजी पंडितास पकडून कोल्हापूरचा ताबा घेतला. त्यासोबतच सामानगडही ताब्यात घेतला. पण गडकऱ्यांना पुढे कोल्हापूरहून मदत न मिळाल्यामुळे गडकरी शरण आले


सह्याद्रीतील प्रमुख घाट


✔️ घाट (किलोमीटरमध्ये लांबी) जोडलेली शहरे


▪️आबाघाट (११) रत्‍नागिरी-कोल्हापूर

▪️आबोली-रामघाट (१२) सावंतवाडी– कोल्हापूर

▪️फोंडाघाट (९) कोल्हापूर-गोवा

▪️राम घाट ( ७ km )कोल्हापुर – सावंतवाडी

▪️अबोली घाट ( १२ km )कोल्हापुर – सावंतवाडी

▪️हनुमंते घाट ( १० km )कोल्हापुर – कुडाळ

▪️करूळ घाट ( ८ km )कोल्हापुर – विजयदुर्ग

▪️उत्तर तिवरा घाट()सातारा – रत्नागिरी

▪️कभार्ली घाट()सातारा – रत्नागिरी

▪️हातलोट घाट()सातारा – रत्नागिरी

▪️पार घाट ( १० km )सातारा – रत्नागिरी

▪️कळघरचा घाट()सातारा – रत्नागिरी

▪️पसरणीचा घाट ( ५ km )सातारा – वाई

▪️फिटस् जिराल्डाचा घाट ( ५ km )महाबळेश्वर – अलिबाग

▪️पांचगणी घाट ( ४ km )पोलादपुर – वाई

▪️बोरघाट ( १५ km )पुणे – कुलाबा

▪️खडाळा घाट ( १० km )पुणे – पनवेल

▪️कसुर घाट ( ५ km )पुणे – पनवेल

▪️वरंधा घाट ( ५ Km )पुणे – महाड

▪️रपत्या घाट ( ७ km )पुणे – महाड

▪️भीमाशंकर घाट ( ६ km)पुणे – महाड

▪️कसारा घाट ( ८ km )नाशिक – मुंबई

▪️नाणे घाट ( १२ Km )अहमदनगर – मुंबई

▪️थळ घाट ( ७ Km )नाशिक – मुंबई

▪️माळशेज घाट ( ९ km )नाशिक – मुंबई

▪️सारसा घाट ( km )सिरोंचा – चंद्रपुर

14 September 2025

ऑपरेशन्स

 ⭕️ 1.'ऑपरेशन सिंधू'

भारताने इराणमधील भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी 'ऑपरेशन सिंधू' सुरू केले आहे.

🔹 या ऑपरेशन अंतर्गत, इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणले जात आहे.

🔹 भारतीय हवाई दलाची विमाने भारतीयांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी तैनात करण्यात आली आहेत.


⭕️ महत्त्वाची इतर ऑपरेशन्स

2.ऑपरेशन सिंदूर (2025)

🔹 पाकिस्तानात भारतीय हवाई दलाने केलेला हवाई हल्ला.


3.ऑपरेशन गंगा (2022)

🔹 युक्रेनमधून अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची सुरक्षित सुटका.


4.ऑपरेशन देवी शक्ती (2021)

🔹 अफगाणिस्तानातून भारतीय नागरिक व काही परदेशी नागरिकांची सुटका.


5.ऑपरेशन कावेरी (2023)

🔹 आफ्रिकेतील सुदान मधून भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी राबवलेले अभियान.


📌 विशेष टीप :

भारत सरकारने मागील दशकभरात विविध संघर्षग्रस्त व संकटग्रस्त देशांतून नागरिकांची सुटका करण्यासाठी अशा प्रकारची मानवीय मदत व आपत्कालीन बचाव ऑपरेशन्स मोठ्या प्रमाणात यशस्वीरित्या पार पाडली आहेत.

13 September 2025

महाराष्ट्राची लोकसंख्या - 2011:



♦️👉2011 सालाच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या 11 कोटी 23 लाख 74 हजार 333 (112,374,333) इतकी आहे.


यामध्ये पुरुषांची लोकसंख्या 5 कोटी 82 लाख 43 हजार 056 (58,243,056) तर महिलांची लोकसंख्या 5 कोटी 41 लाख 31 हजार 277 (54,131,277) आहे.


II. लोकसंख्येचा दशकीय वाढ - 2011:


2001 ते 2011 दरम्यान महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या वाढीचा दर 9.20% इतका आहे.


2001 साली राज्याची एकूण लोकसंख्या 9 कोटी 68 लाख 78 हजार 627 होती.


2011 साली ती 11 कोटी 23 लाख 74 हजार 333 इतकी झाली आहे.


III. महाराष्ट्र लोकसंख्या घनता - 2011:


2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या घनता (दर चौरस किलोमीटर) 365 आहे.


राष्ट्रीय सरासरी घनता 382 आहे.


IV. साक्षरतेचा दर:


महाराष्ट्राचा साक्षरतेचा दर 82.34% आहे.


पुरुष साक्षरतेचा दर 89.82%, तर महिलांचा साक्षरतेचा दर 75.48% आहे.


महाराष्ट्रातील प्रमुख घाट



1. थळ (कसारा) घाट - मुंबई-नाशिक


2. बोर घाट - पुणे-मुंबई


3. माळशेज घाट - ठाणे-अहमदनगर


4. दिवे घाट - पुणे-बारामती


5. ऑट्रम घाट/कन्नड घाट - धुळे-औरंगाबाद


6. काज्रत व खंबाटकी घाट - पुणे-सातारा


7. प्रसरणी घाट - वाई-महाबळेश्वर


8. शिरसाट घाट - नाशिक-जव्हार


9. भीमाशंकर घाट - पनवेल-नारायणगाव (मंचरमार्गे)


10. वरंधा घाट - महाड-पुणे


11. कशेडी घाट - महाड-खेड-डापोली


12. चांदनापुरी घाट - नाशिक-पुणे


13. शिरसाट घाट - नाशिक-जव्हार

12 September 2025

विज्ञान 15 प्रश्न

🟤. संतृप्त हायड्रोकार्बन मधील दोन कार्बन अणूंमध्ये............असतो.

A. एकेरी बंध

B. दुहेरी बंध

C. तिहरी बंध ✔️

D. आयनिक बंध


🟣. ..................हा सूर्याच्या सगळ्यात जवळ आणि आपल्या सूर्यामालेतील सगळ्यात लहान ग्रह आहे.

A. शुक्र

B. बुध✔️

C. मंगळ

D. पृथ्वी


🔴. एलपीजी मध्ये .......घटक असतात.

A. मिथेन आणि इथेन

B. मिथेन आणि ब्युटेन

C. ब्युटेन आणि प्रोपेन ✔️

D. हायड्रोजन आणि मिथेन


🔵. MKS पद्धतीत दाबाचे एकक.........असते.

A. न्युटन

B. पासकल ✔️

C. डाइन

D. वॅट


🟡. ..................किरणांना वस्तूमान नसते.

A. अल्फा

B. बीटा

C. गॅमा ✔️

D. क्ष


🔵 दंतक्षय रोखण्यासाठी पुढीलपैकी कोणते खनिजद्रव्य महत्तवाचे ठरते ?

A. सोडियम

B. आयोडिन

C. लोह

D. फ्लोरिन ✔️


🟢. पुढीलपैकी कोणते जीवनसत्तव भाज्यांतून मिळत नाही ?

A. ब जीवनसत्त्व

B. क जीवनसत्त्व

C. ड जीवनसत्त्व ✔️

D. इ जीवनसत्त्व


🟣. आईच्या दुधात पुढीलपैकी कशाचा अभाव असतो ?

A. क जीवनसत्त्व व सोडियम

B. प्रथिने व लोह

C. सोडियम व प्रथिने

D. लोह व क जीवनसत्त्व ✔️


⚫️. जास्ता चोथा असलेले अन्नघटक पुढीलपैकी कोणते ?

A. सफरचंद व तूप

B. काकडी व सफरचंद ✔️

C. अंडी व केळी

D. केळी व दूध


🟡. आतड्यातील जीवानून मुळे पुढीलपैकी कोणते जीवनसत्त्व तयार होते ?

A. ब-1 जीवनसत्त्व

B. ब-4जीवनसत्त्व

C. ड जीवनसत्त्व

D. के जीवनसत्त्व ✔️


🟢. पुढीलपैकी कोणत्या घटकात कर्बोदक आढळत नाहीत ?

A. पालक

B. लोणी

C. चीज

D. मासे ✔️


🔵. अफू मध्ये खालीलपैकी कोणते द्रव्य प्रधान असते ?

A. कॅफिन

B. टॅनिन

C. मॉर्फिन ✔️

D. निकोटीन


🟤 पुढीलपैकी कोणता अन्नघटक ब-12 जीवनसत्त्वाचा प्रमुख स्रोत आहे ?

A. मासा ✔️

B. सफरचंद

C. कलिंगड

D. काजू


⚪️. हुंगण्याचे बधिरकारी साधन म्हणून पुढीलपैकी कोणत्या पदार्थाचा वापर केला जातो ?

A. नायट्रोजन

B. नायट्रोजन पेरॉक्साईड

C. अमोनिया

D. नायट्रस ऑक्साईड ✔️


🟢. वातावरणातील कोणता थर हा दाट असून तो एकून वातावरणाच्या 85 % इतका व्यापलेला आहे ?

A. मिसोस्फियर

B. थर्मोस्फियर

C. ट्रोपोस्फियर ✔️

D. सेट्रॅटोस्फियर



1️⃣खालीलपैकी भरपूर प्रमाणात ‘अ’ जीवनसत्वे देणारा पदार्थ………

1} सफरचंद

2} गाजर✅✅✅

3} केळी

4} संत्र


📖📖📖📖📖📖📖📖📖


2️⃣खालीलपैकी कोणता रोग ‘ड’ जीवनसत्त्वाच्या अभावी?

1} स्कर्व्ही

2} बेरीबेरी

3} मुडदूस✅✅✅

4} राताधळेपण


📖📖📖📖📖📖📖📖📖


3️⃣पथ्वीवरील वातावरणाची उंची सुमारे ……..कि.मी.इतकी आहे.

1} २००

2} ३५०

3} ५००

4} ७५०✅✅✅


📖📖📖📖📖📖📖📖📖


4️⃣जव्हा मनुष्य उपग्रहाद्वारे पृथ्वीभोवती फिरतो,तेव्हा त्याचे वजन……….

1} वाढते

2} कमी होते

3} पूर्वीइतकेच राहते

4} शून्य होते✅✅✅


📖📖📖📖📖📖📖📖📖


5️⃣कार्बनचे जास्तीत जास्त शुद्ध स्वरूप……..

1} दगडी कोळसा

2} कोक

3} चारकोल

4} हिरा✅✅✅


📖📖📖📖📖📖📖📖📖


6️⃣जनावरांना तोंडाचे आणि पायांचे रोग मुख्यतः ………..मुळे होतात.

1} जीवाणू (bacteria)

2} विषाणू (virus)✅✅✅

3} कवक (fungi)

4} बुरशी


📖📖📖📖📖📖📖📖📖


7️⃣लसीकरणाने पुढीलपैकी कोणता विकार नियंत्रित करता येत नाही?

1} देवी

2} मधुमेह✅✅✅

3} पोलिओ

4} डांग्या खोकल


📖📖📖📖📖📖📖📖📖


8️⃣……..या किरणांना वस्तुमान नसते.

1} अल्फा

2} ‘क्ष’

3} ग्यामा✅✅✅

4} बीटा


📖📖📖📖📖📖📖📖📖


9️⃣खालीलपैकी कोणता रोग  'अ’ जीवनसत्त्वाच्या अभावी होतो?

1} रंगाधळेपण

2} स्कर्व्ही

3} बेरीबेरी

4} यापैकी नाही✅✅✅


📖📖📖📖📖📖📖📖📖


🔟हिवतापावरील प्रभावी ऑंषध……..

1} पेनेसिलीन

2} प्रायमाक्वीन✅✅✅

3} सल्फोन

4} टेरामायसीन


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣1️⃣निष्क्रिय वायू हे………..

1} पाण्यामध्ये विरघळतात

2} स्थिर नसतात

3} रासायनिक क्रिया करू न शकणारे✅✅✅

4} रासायनिक क्रियेसाठी जास्त क्रियाशील


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣2️⃣…….हे मानवनिर्मित मूलद्रव्य आहे.

1} प्लुटोनिअम✅✅✅

2} U -२३५

3} थोरीअम

4} रेडीअम


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣3️⃣खालीलपैकी कोणते खत रोपांना समतोल आहार पुरवते?

1} युरिया

2} नायट्रेट

3} अमोनिअम सल्फेट

4} कंपोस्ट✅✅✅


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣4️⃣आतड्यातील जिवाणूमुळे पुढीलपैकी कोणते जीवनसत्त्व तयार होते?

1} ‘ब-१’ जीवनसत्त्व

2} ‘ब-४’ जीवनसत्त्व

3} ‘ड ‘ जीवनसत्त्व

4} ‘के ‘ जीवनसत्त्व✅✅✅


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣5️⃣जी.एस.आर’ हे उपकरण कशाच्या मापनासाठी वापरतात.

1} मेंदूचे स्पंदन

2} हृदयाचे स्पंदन

3} डोळ्यांची क्षमता✅✅✅

4} हाडांची ठिसूळता


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣6️⃣किती तीव्रता असलेल्या ध्वनीच्या सततच्या संपर्कामुळे कायमचा बहिरेपणा येऊ शकतो?

1} १०० डी.बी.च्या वर✅✅✅

2} ११० डी.बी.च्या वर

3} १४० डी.बी.च्या वर

4} १६० डी.बी.च्या वर


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣7️⃣डोळ्याच्या कर्करोगाच्या उपचारासाठी भाभा अणुसंशोधन केंद्राने कोणता प्रकाश स्त्रोत तयार केला?

1} आयोडीन-१२५✅✅✅

2} अल्बम-३०

3} ल्युथिनिअरम-१७७

4} सेसिअम-१३७


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣8️⃣आधुनिक जैवतंत्रज्ञान …………. पातळीवर कार्य करते.

1} अवअणू

2} अणू

3} रेणू✅✅✅

4} पदार्थ


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣9️⃣मानव पालेभाज्यांतील सेल्युलोज पचवू शकत नाही,कारण……….हे विकर त्याच्या जठरात नसते.

1} सेल्युलेज✅✅✅

2} पेप्सीन

3} सेल्युलीन

4} सेल्युपेज


📖📖📖📖📖📖📖📖📖


2️⃣0️⃣इमारतीमधील विजेवर चालणाऱ्या पाळण्यातून वर जाताना व्यक्तीचे वजन…

1} कमी होते✅✅✅

2} वाढते

3} सारखेच राहते

4} शून्य होते


📖📖📖📖📖📖📖📖📖


2️⃣1️⃣पदार्थाच्या एका ग्रॅम-मोलमधील रेणूंची संख्या ……… इतकी असते.

1} M

2} N✅✅✅

3} A

4} XB


📖📖📖📖📖📖📖📖📖


2️⃣2️⃣सौरऊर्जा _ स्वरुपात असते.

1} प्रकाश प्रारणांच्या

2} विद्धुत चुंबकीय प्रारणांच्या✅✅✅

3} अल्फा प्रारणांच्या

4} गामा प्रारणांच्या


📖📖📖📖📖📖📖📖📖


2️⃣3️⃣अहरित वनस्पती ____ असतात.

1} स्वयंपोषी

2}  परपोषी✅✅✅

3} मांसाहारी

4} अभक्ष


📖📖📖📖📖📖📖📖📖


2️⃣4️⃣किण्वन हा _ चा प्रकार आहे.

1} ऑक्सिश्वसन

2} विनॉक्सिश्वसन✅✅✅

3} प्रकाशसंश्लेषण

4} ज्वलन


📖📖📖📖📖📖📖📖📖


2️⃣5️⃣परकाश संश्लेषनात ___ प्रकाशउर्जा ग्रहण केली जाती.

1} हरितद्रव्यामुळे✅✅✅

2} झथोफिलमुळे

3} कॅरोटीनमुळे

4} मग्नेशिंअममुळ


खनिजद्रव्य व त्याचे उपयोग

 शरीरातील प्रक्रियेचे नियंत्रण व संरक्षण करण्याकरिता शरीराला खनिजाची गरज असते.

 आपल्या शरीराची निगा राखण्यामध्ये खालील खनिजे महत्वाचे आहेत.


 खनिज - फॉस्फरस 

 उपयोग - दातांच्या आणि हाडांच्या विकासासाठी.

 अभावी होणारे परिणाम – हायपो-फॉस्फटेमिया - यात रक्तातील फॉस्फरस चे प्रमाण कमी होते. त्यामुळे ऊर्जानिर्मिती वर परिणाम होतो. तसेच हाडे ठिसुळ होतात, चयापचय क्रियेत अडथळे निर्माण होतात अशक्तपणा, स्नायूंचे कुपोषण, रक्तक्षय  इ परिणाम.

 अतिसेवनाने होणारे परिणाम – हायपर-फॉस्फटेमिया - यात रक्तातील फॉस्फरस चे प्रमाण वाढते. त्यामुळे अतिअवटुता तसेच वृक्कनाश होऊ शकतो.

 स्रोत - शेंगा, काजू, बदाम, घेवडा, गाजर, अळंबी, मांस, मासे, ब्रेड, तांदूळ, अंडी, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, तसेच हिरव्या पालेभाज्या.


 खनिज – पोटॅशियम 

 उपयोग – चेतापेशीच्या पोषणाकरिता

 अभावी होणारे परिणाम – हायपो-कॅलेमिया यामुळे रक्तातील पोटॅशियम चे प्रमाण कमी होते, स्नायूंना अशक्तपणा, पॅरालिसिस, चेतापेशीवर परिणाम होतो

 अतिसेवनाने होणारे परिणाम – हायपर-कॅलेमिया - रक्तातील पोटॅशियम चे प्रमाण वाढते. त्यामुळे स्नायूंना अशक्तपणा, नाडीचे ठोके वाढणे, हृदयविकार, अडीसन्सचा रोग इ. परिणाम आढळतात.

 स्त्रोत – सुकी फळे, कडधान्ये, बटाटे, केळी, पपई, तीळ, घेवडा, तृणधान्ये, सोयाबीन, पालक, रताळ, हळद इ.


 खनिज – कॅल्शियम 

 उपयोग – हाडे, दात, रक्त, मज्जातंतू व हृदय यांच्या पोषणाकरिता

 अभावी होणारे परिणाम – हाडे कामकूवत व नरम होतात. कॅल्शियमच्या अभावी ऑस्टीओमॅलेशिया हा विकार होतो.

 स्त्रोत – तीळ व पालेभाज्या


 खनिज – लोह 

 उपयोग – रक्त संवर्धन व हिमोग्लोबिनच्या पोषणाकरिता, ऑक्सीजन व हिमोग्लोबीन याचा संयोग घडवून आणते व प्रतिरोध संस्थेला मदत करते.

 अभावी होणारे परिणाम – लोहाच्या कमतरतेचा परिणाम हिमोग्लोबिनवर होतो. लोहाच्या अभावी रक्तक्षय व पंडूरोग होतो.  

 स्त्रोत – मांस, मासे, अंडी, सी फूड, यकृत, सोयाबीन, सुका मेवा, गूळ-शेंगदाणे, घेवडा, पालक, खजूर, मनुके, तीळ, हळद, हिरव्या पालेभाज्या व मेथीची भाजी


 खनिज – तांबे 

 उपयोग – हिमोग्लोबिनचे संवर्धन करणे
1"
 अभावी होणारे परिणाम – तांब्याच्या आभावी हिमोग्लोबिनची निर्मिती होत नाही.

 स्त्रोत – पालेभाज्या


 खनिज – सल्फर 

 उपयोग – प्रथिनांची निर्मिती करणे अस्थी व नखे यांचे आरोग्य

 अभावी होणारे परिणाम – केस, हाडे कमकूवत होतात


 खनिज – फ्लोरिन 

 उपयोग – दातांचे रक्षण करण्याकरिता,

 अभावी होणारे परिणाम – याच्या अभावी दंतक्षय होतो.


 खनिज – सोडीयम 

 उपयोग – रक्तामधील आम्ल व अल्क यांचा समतोल साधला जातो.

 अभावी होणारे परिणाम – रक्तदाबावर परिणाम होतो.  

स्रोत - मीठ


 खनिज – आयोडीन 

 उपयोग – थायराईड ग्रथीच्या पोषणाकरिता

 अभावी होणारे परिणाम – गलगंड नावाचा आजार होतो.

 स्रोत - आयोडिनयुक्त मीठ


 खनिज - मॅग्नेशियम 

 उपयोग : ATP रेणूच्या निर्मितीमध्येतसेच हाडांच्या विकासासाठी

 अभावी होणारे परिणाम – हायपो-मॅग्नेशिया - यामध्ये अशक्तपणा, स्नायूंना पेटके, हृदयाच्या कार्यात अडथळा, चिडचिड, अतिताण, धनुर्वात इ परिणाम

 स्रोत - सोयाबीन, कोकोआ, शेंगदाणे, पालक, टोमॅटो, घेवडा, अद्रक, लवंग, पालेभाज्या इ.

अतिमहत्त्वाची माहिती


🔑भारतीय अवकाश संशोधन संस्था🔑

(Indian space research organisation ISRO)

स्थापना : 15 ऑगस्ट 1969

इस्रोचे मुख्यालय :  बंग‌ळूरू

श्रीहरीकोटा आंध्र प्रदेश अंतरिक्षित उपग्रह प्रक्षेपित केंद्र

भारताने 1975 मध्ये  सोवियत युनियन च्या मदतीने पहिला "आर्यभट्ट "उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले

भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट आहे प्रक्षेपण 1975 मध्ये करण्यात आला..

थूबा इक्विटोरियल लाँच सेंटर केरळ राज्यामध्ये आहे...

नाग रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र आहे


🔑संरक्षण संशोधन व विकास संस्था (डीआरडीओ)🔑

स्थापना:  1958

उद्देश भारताला संरक्षणाची साधने उपकरणे बनवण्याबाबतीत स्वावलंबी बनवणे.

भारतीय क्षेपणास्त्राचे व ""मिसाईल मॅनचे जनक""  डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना म्हटले जाते.


🔑ONGC 🔑

ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशन

स्थापना 1956

उद्देश:  खनिज तेल व नैसर्गिक वायू याचा शोध घेणे

दिग्गोई खनिज तेल केंद्र आसाम राज्यात आहे.

अंकलेश्वर खनिज तेल केंद्र गुजरात येथे आहे.



🔑कोकण रेल्वे🔑

स्थापना :1998

कोकण रेल्वे महाराष्ट्र ,गोवा ,कर्नाटक, केरळ (चार) राज्यातून प्रवास करते..

कोकण रेल्वे वरील सर्वात मोठा बोगदा (कारबुडे) हा असून लांबी (6.5 किमी) आहे..

कोकण रेल्वे वरील सर्वात उंच पूल (पानवल) हा असून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे .



🔑भारतीय अणुऊर्जा आयोग🔑

स्थापना: 10 डिसेंबर 1948

तत्कालीन भारताचे पंतप्रधान पंडित नेहरू हे होते.

अनुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष डॉक्टर होमी भाभा हे होते

अणुऊर्जा आयोगाने 1956 मध्ये भारतातील पहिली अणुभट्टी ""अप्सरा"" कार्यान्वित केली.

Combine & राज्यसेवा 2024 पूर्व: विज्ञान विषय A to Z strategy

विज्ञान विषयाची तयारी करताना लक्षात घ्यायला हवे की हा सर्वात जास्त input द्यावा लागणारा आणि सर्वात कमी output असणार विषय आहे. Combine पूर्व 23 मधील प्रश्न बघता आयोग या विषयातील काही प्रश्न बरेच अवघड विचारताना दिसतो.बरेच जण घाबरून गेले आणि त्यामुळे पेपर चे पुढील सोप्पे प्रश्न पण चुकले.पेपर च्या त्या एक तासात आपली मानसिकता स्थिर ठेवण प्रचंड गरजेचं आहे.त्यामुळे किती जरी अवघड प्रश्न आले तर घाबरायच कारण नाही, इतके अवघड प्रश्न कोणालाच येत नसतात हे लक्षात घ्या.आता तयारी विषयी बोलुयात.एक Basic तयारी करून average गुण तरी या विषयात आपल्याला मिळवता आले पाहिजे.विज्ञान या विषया वर पूर्व परीक्षेत 15 प्रश्न विचारले जातात.त्यातील काही प्रश्न हे विचित्र परंतु काही प्रश्न हे ठरलेल्या topics वर विचारले जातात.PYQ च analysis केल तर आपल्याला कळेल की शेवटी दिलेल्या topics वर भर दिला तर नक्कीच आपण यात साधारण गुण सहज मिळवू शकतो.


👉ज्यांना खूप कमी वेळात जास्त गुण घ्यायचे असतील तर त्यांनी विज्ञानाचे फक्त स्टेट बोर्ड 6 वी ते 10 वी केले आणि त्याजोडीला PYQ analysis+ PYQ info तोंड पाठ जरी केली तरी पुरेस आहे.संयुक्त पूर्व 23 मध्ये आलेला जर्मन सिल्व्हर चा प्रश्न PYQ होता आणि त्यात 3-4 प्रश्न स्टेट बोर्ड मधून आलेले दिसतात.


👉गट ब मुख्य पेपर-2 आणि गट क मुख्य पेपर-2 मध्ये विचारलेल्या विज्ञानाच्या प्रश्नांचे Analysis ही नक्की करा.संयुक्त पूर्व 23 पेक्षा त्या प्रश्नांची काठिण्य पातळी ही कमी होती.या 2 पेपर मध्ये प्राणी वर्गिकरणावर 4-5 प्रश्न आलेले दिसतात.

✅जीवशास्त्र | Biology:


1.प्राण्याचे वर्गीकरण

2.वनस्पती वर्गीकरण

3. ग्रंथी संप्रेरके आणि विकरे

4. पोषण द्रव्ये

5. रोग लक्षणे आणि चिन्हे (यात जीवाणूजन्य, विषाणूजन्य,कवके,असंसर्ग जन्य यांचा अभ्यास)


✅रसायनशास्त्र | Chemistry 


1. अणू आणि त्याची रचना

2. आवर्तसारणी 

3. मूलद्रव्यांचे वर्गीकरण

4. खनिजे आणि धातुके

5. किरणत्सारीता आणि आण्विक रसायनशास्त्र

6. कार्बनी संयुगे


✅भौतिशास्त्र | Physics 


1.प्रकाश

2.ध्वनी

3.विद्युत धारा

4.ऊर्जा,कार्य व शक्ती

5. गती आणि बल

6. प्रकाश,भिंग,आरसे

7.किरणोत्सारीता 


👉Science चे स्टेट बोर्ड मधील One liner Problems ही चांगले करा.त्यात जे फक्त फॉर्म्युला टाकून एक दोन स्टेप मध्ये सोडवायचे छोटे छोटे problems आहेत बऱ्याचदा तेच आलेले दिसतात.


👉विज्ञान विषय अभ्यासताना मुलभूत संकल्पना समजून घेऊन अभ्यास केला तरच तो विषय समजून गुण येतात.या साठी अभ्यास करताना जी संकल्पना समजली नाही ती youtube वर search करून Video स्वरूपात बघितली तर चांगली लक्षात राहील (उदा.Cell structure).YT वर बऱ्याच channel वर वरील सर्व topics मोफत उपलब्ध आहे. त्याचा अभ्यास करताना नक्कीच फायदा होईल.


🚨सर्वात महत्वाचे........❌

👉बरेच जण मला msg करतात की सर विज्ञानात गुण मिळत नाही,खूप टेन्शन आलंय.जेव्हा त्यांच्याशी बोलणं होत तेव्हा प्रत्यक्षात अस जाणवत की त्यांना मुळात गणितात 8-10 गुण असतात,Polity मध्ये 7-8 गुण असतात. लक्षात घ्या विज्ञान तुमची लीड किती असणारे? हे ठरवणार नाही. ते गणित बुध्दिमत्ता आणि polity ठरवणार आहे.संयुक्त पूर्व 23 मध्ये पूर्व गणित one liner होत.मुलांनी त्यात 18-19 गुण पण घेतले आहेत.

विज्ञानात कमी गुण मिळतात म्हणून आता त्यात PHD च करतो अस ही काही जन ठरवतात.परंतु तस करू नका.त्यात किती जरी अभ्यास केला तरी अमुक अमुक गुण मिळतीलच हे सांगता येत नाही. विज्ञानाचा अभ्यास करण्यापूर्वी स्वतः ला 2 प्रश्न विचारा.

1. मला गणित बुद्धिमातेत किमान 15 पेक्षा जास्त गुण मिळणार आहेत ना? इतका आत्मविश्र्वास आलंय ना?

2. मला Polity मध्ये 12+ गुण मिळणार आहेत ना?


या 2 प्रश्नाची उत्तरे नकारात्मक असतील तर पहिले 2 विषय focus करा. कारण ते predictable आहेत आणि input output ratio ही खूप high आहे.


👉विज्ञानाला घाबरायच काही कारण नाही...

Combine पूर्व 23 ला बरेच जण प्रश्न बघून घाबरून गेले.मुळात त्याच कारण हे आहे की आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळवायची मानसिकता.वर सांगितल्या प्रमाणे कमीत कमी वेळात अभ्यास करून Avg गुण मिळवायचे ध्येय ठरवा.जास्त टेन्शन घेऊ नका.

बाकी गणित,polity,Geo,Eco,His आहेच score करायला.💯


MPSC Combine Syllabus 2025

1) इतिहास – आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास.

2) भूगोल – महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश- रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, इत्यादी.

3) अर्थव्यवस्था –

  • भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीति, इत्यादी.
  • शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण, इत्यादी.

4) चालू घडामोडी – जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील.

5) राज्यशास्त्र

6) सामान्य विज्ञान – भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry), प्राणिशास्त्र (Zoology), वनस्पतीशास्त्र (Botany), आरोग्यशास्त्र (Hygiene).

7) अंकगणित – बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी इत्यादी

8) बुध्दिमापन चाचणी – उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न.

MPSC Group B & Group C Combine Mains Syllabus 2023

MPSC Combine Mains : Paper 1

पेपर क्रमांक – 1 (मराठी, इंग्रजी या विषयामध्ये खालील घटक/ उपघटकांचा समावेश असेल.)

1) मराठी : सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे.

2) इंग्रजी : Common Vocabulary, Sentence structure, Grammar, use of Idioms and phrases & their meaning and comprehension of passage.

MPSC Combine Mains : Paper 2

पेपर क्रमांक – 2 (सामान्य क्षमता चाचणी या विषयामध्ये खालील घटक/ उपघटकांचा समावेश असेल.)

1) सामान्य बुध्दिमापन व आकलन : उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न.

2) चालू घडामोडी : जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील.

3) अंकगणित व सांख्यिकी

4) माहितीचा अधिकार अधिनियम 2005 (as updated) व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015

5) भारतीय संघ राज्यव्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ व विधीमंडळ इत्यादी :

घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे / ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे- शिक्षण, युनीफॉर्म सिव्हील कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रीमंडळ कर्तव्ये, अधिकार व कार्य, राज्य विधीमंडळ विधानसभा, विधानपरिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व कर्तव्ये, विधी समित्या इत्यादी

6) आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास :

सामाजिक व आर्थिक जागृती (१८८५-१९४७), महत्वाच्या व्यक्तींचे कार्य, समाज सुधारकांचे कार्य, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे, शिक्षणाचा परिणाम स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळी

7) भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल :

महाराष्ट्राचा व भारताचा प्राकृतिक (Physical) भूगोल, मुख्य प्राकृतिक (Physiographic) विभाग, हवामान शास्त्र (Climate), पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत व पठार, विविध भुरूपे, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती- वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल, लोकसंख्या, लोकसंख्येचे स्थानांतर (Migration of Population) व त्याचे उगम (Source) आणि इष्टस्थानावरील (Destination) परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न.

पर्यावरण – मानवी विकास व पर्यावरण, पर्यावरणपूरक विकास, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संधारण विशेषतः वनसंधारण, विविध प्रकारची प्रदूषणे व पर्यावरणीय आपत्ती, पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेल्या राज्य / राष्ट्र/ जागतिक पातळीवरील संघटना / संस्था इत्यादी.

8) सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान :

  • अ) भौतिकशास्त्र (Physics)
  • ब) रसायनशास्त्र (Chemistry)
  • क) प्राणीशास्त्र (Zoology)
  • ड) वनस्पतीशास्त्र (Botany)
  • इ) दूर संवेदन, हवाई व ड्रोन छायाचित्रण, भौगोलिक माहिती प्रणाली व त्याचे उपयोजन (Remote Sensing, | Aerial and drone photography, Geographic Information System (GIS) and it’s application etc.)
  • फ) माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान (Information and communication technology.)

9) अर्थव्यवस्था व नियोजन, विकास विषयक अर्थशास्त्र :

समग्रलक्षी अर्थशास्त्र

  • १.१ समग्रलक्षी अर्थशास्त्र
  • १.२ वृद्धी आणि विकास
  • १.३ सार्वजनिक वित्त
  • १.४ आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल

भारतीय अर्थव्यवस्था

  • २.१ भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने व आर्थिक सुधारणा
  • २.२ भारतीय शेती व ग्रामीण विकास
  • २.३ सहकार
  • २.४ मौद्रिक व वित्तीय क्षेत्र
  • २.५ सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था
  • २.६ उद्योग व सेवा क्षेत्र
  • २.७ पायाभूत सुविधा विकास
  • २.८ आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल
  • २.९ महाराष्ट्राची अर्थव्यवस्था

रासायनिक गुणधर्मानुसार अग्निजन्य खडकांचे प्रकार :



🔘आम्लधर्मीय खडक : 

आम्लधर्मीय अग्निजन्य खडकात सिलिकाचे प्रमाण ८० टक्क्य़ांपर्यंत असते. अ‍ॅल्युमिनियम, मॅग्नेशियम व चुना यांचे प्रमाण २० टक्क्य़ांपर्यंत असते. हे खडक वजनाने हलके असून त्यांचा रंग फिकट पिवळा असतो. घट्ट लाव्हारसापासून त्याची निर्मिती होत असल्याने या खडकांची उंची जास्त, पण विस्तार कमी असतो. ग्रॅनाइट हे या प्रकारच्या खडकांचे उत्तम उदाहरण आहे.


🔘अल्कधर्मीय खडक : 

या प्रकारच्या अग्निजन्य खडकात ४०% सिलिका व ४०% मॅग्नेशियमचे प्रमाण असते. आयर्न ऑक्साइड व इतर पदार्थ २०% असतात. या खडकाचा रंग काळा असून त्याची झीज लवकर होते. बेसॉल्ट हे याचे उदाहरण आहे. पातळ लाव्हारसापासून हे खडक तयार होत असल्याने भूपृष्ठावर दूरवर पसरलेले असतात.


🔶अग्निजन्य खडकांचे गुणधर्म :

* अग्निजन्य खडकातील स्फटिक गोलाकार नसतात. निरनिराळ्या आकारांचे स्फटिक अनियमित स्वरूपाचे, एकसंध झालेले असतात.

* हे खडक अवाढव्य असून कठीण असतात. त्यांच्यामध्ये थर आढळत नाहीत, परंतु जोड असतात.

* या खडकांमध्ये छिद्र नसते. त्यात पाणी मुरत नाही.

* अग्निजन्य खडकांमध्ये प्राण्यांचे किंवा वनस्पतींचे अवशेष सापडत नाहीत, परंतु अनेक प्रकारची खनिजे आढळतात.

वनांचे प्रकार


🔸भारतीय वनांचे पुढीलप्रमाणे पाच प्रकारांत वर्गीकरण केले जाते.

1)उष्णप्रदेशीय सदाहरित वने:

--250 से.मी पेक्षा अधिक पावसाच्या भागात सदाहरित वने आढळतात.

◾️प्रमुख वृक्ष:महोगणी,रोजवूड,बिशपवुड,रबर,आंबा,जांभूळ,शिसव, साल,हिरडा,बांबू,वेत.

🔺उपयोग:इमारती,जहाज बांधणी इत्यादीसाठी.



2)उष्ण परदेशीय पानझडी वने:

--'मोसमी वने' या नावेही ओळखली जाणारी हि वने 200 से.मी.पर्यंत पाऊस असणाऱ्या मधप्रदेश,बिहार,ओरिसा,महाराष्ट्र या राज्यात आढळतात.

▪️उष्ण कोरड्या हवेत बाष्पीभवन टाळण्यासाठी हे वृक्ष पाने गाळतात.

◾️प्रमुख वृक्ष:साल,साग,पळस, सिसंम, खैर,अर्जुन,मोह,पिंपळ,अंजन,धावडा,चंदन,किंजल,कुंभी,बांबू.

🔸उपयोग: जहाजबांधणी,रेल्वे डबे,खेळणी इत्यादींसाठी.


3)उष्ण प्रदेशीय काटेरी वने व झुडपे:

--50 ते 75 से.मी.पावसाच्या प्रदेशात कच्छ, सौराष्ट्र,राजस्थान,पंजाब,हरियाणा,आणि महाराष्ट्रातील कमी पावसाच्या प्रदेशात हि वने आढळतात.

◾️प्रमुख वृक्ष: बाभूळ,सालाई, निवडुंग,हिवर, बोर,केतकी,नागफणी,यासारखी काटेरि झुडपे या वनात आढळतात.


4)पर्वतीय वने:

--120से.मी. पेक्षा अधिक पावसाच्या काश्मीर,उत्तराखंड,हिमाचल प्रदेश या राज्यांच्या उंच पर्वतीय भागात हि वने आढळतात.

🔸प्रमुख वृक्ष: पाइन,ओक,चेस्टनट, स्पृस,देवदार,फर, पोपलेर, बर्रच, मॅपल.

🔸उपयोग: लाकूड मऊ व वजनाने हलके असल्याने त्यापासून आग्कड्या, कागदाचा लगदा,कलाकुसरीच्या वस्तू बनविल्या जातात.


5)समुद्रकाठची वने: 

--किनाऱ्यावरील त्रिभुज प्रदेशात हि वने दाटीवाटीने आढळतात.

--पश्चिम बंगालमधील सुंदरबन,ओडिशा,आंध्रप्रदेश,तामिळनाडू,या राज्यांच्या किनारी प्रदेशात हे वृक्ष वाढतात.

🔸उपयोग:

1)बिहार,ओडिशा,मध्य प्रदेश या राज्यातू  लाखेचे उत्पादन होते.

2)लाखेचा उपयोग औषधे,रंग,ग्रोमोफोन रेकॉर्ड ,बांगड्यानिर्मिती अशा अनेक उदोगात केला जातो.

3)बाभळीची साल कातडी कमावण्यासाठी व औषधे बनविण्यासाठी उपयुक्त असते.




          🌷वन्य प्राणी🌷


➡️आसाम,केरळ,कर्नाटकच्या जंगलात हत्ती आढळतात.

➡️कच्छच्या रन: चिंकारा,काळवीट,जंगली गाढव,उंट.

➡️राजस्थानचे वाळवंट: लाल कोल्हा,जंगली मांजर.

➡️राजस्थानच्या मैदानात भारतीय रानकोंबडा, खरुची,गिधाड,गरुड,बहिरी ससाणा,मोर हे पक्षी आढळतात.

➡️पश्चिम बंगाल व आसाममध्ये - एकशिंगी गेंडा.

➡️सौराष्ट्रातील जुनागड गिरच्या रानात: सिंह.

➡️प.बंगालमधील सुंदरबानंत : वाघ हे प्राणी आढळतात.


नसर्गिक साधनसंपत्ती वने, प्राणी, खनिजे, शेती

♍️जग : वनसंपत्ती♍️ 

💠 उष्ण कटिबंधीय वने - यात सदाहरित वने व मॉन्सून वने हे दोन प्रकार पडतात. विषुववृत्तीय सदाहरित वने - या पट्ट्यात भरपूर पाऊस व अधिक तापमान असल्यामुळे या वाणांच्या वाढीस अनुकूल वातावरण आहे. या वनात रबर, महोगनी, सिकोना, या सारखे वृक्ष आढळतात. प्रमुख देश - काँगो, मलेशिया, इंडोनेशिया, ब्राझील.


💠 मान्सून वने - २०० सेमीच्या अधिक पावसाच्या क्षेत्रात ही वने आढळतात. १०० ते २०० सेमी पावसाच्या पाणयात प्रदेशात पानझडी वने आढळतात. या वनात साग, साल, शिसव, खैर, आंबा, जांभूळ, पळस, बाभूळ ही वने आढळतात. प्रमुख देश भारत, म्यानमार, श्रीलंका, थायलंड आहेत.


💠 समतीतोष्ण उष्ण कटिबंधीय पानझडी वने - या वनातील झाडांची पाने हिवाळ्यात झडतात. या वनात ओक, एल्म्स, वोलनट, पॉप्युलर, ओलिव्ह. प्रमुख देश - अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली, रशिया.


💠 सचिपर्णी किंवा तैगा वने - विस्तृत प्रदेशात अणुकुचीदार, तेलगट, व मऊ पानांचे सूचिपर्णी वृक्ष आढळतात. पाईन, स्प्रूस, फर वगैरे. प्रमुख देश रशिया, फिनलँड, अमेरिका, कॅनडा.


♍️जग : पशुसंपत्ती ♍️

💠 समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश - ऊत्तर अमेरिका प्रेअरी प्रदेश, दक्षिण अमेरिका पंपास, आफ्रिका - व्हेल्ड.


💠 उष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश - ब्राझीलचा डोंगराळ भाग, दक्षिण अमेरिकेतील ओरिनोको नदीचे खोरे, आफ्रिकेतील झैरे खोरे.


💠 परमुख मास उत्पादक प्रदेश - अमेरिका, कॅनडा, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया.


💠 परमुख दूध उत्पादक प्रदेश - न्यूझीलंड, डेन्मार्क, हॉलंड, फ्रान्स, जर्मनी, स्वीडन, भारत, अमेरिका,


💠परमुख लोकर उत्पादक देश - चीन, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, रशिया.


💠परमुख रेशीम उत्पादक देश - चीन, भारत


♍️जग : खनिजे व ऊर्जासाधने ♍️

💠 लोह - चीन, रशिया, ब्राझील, अमेरिका, भारत, व इतर देश.


💠मगनीज - रशियन राष्ट्रकुल, गाबाँ, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, भारत, ऑस्ट्रलिया, व इतर देश.


💠 बॉक्सइट - ऑस्ट्रेलिया, गिनी, भारत, जमैका, ब्राझील, व इतर देश.


💠 जस्त - जपान, कॅनडा, चीन, रशिया, जर्मनी, व इतर देश.


💠 तांबे - अमेरिका, चिली, जपान, चीन, रशियन राष्ट्रकुल, जर्मनी


💠 चांदी - मेक्सिको, अमेरिका, पेरू, कॅनडा, रशिया.


💠 सोने - दक्षिण आफ्रिका, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, रशिया, कॅनडा, चीन, पेरू, घाणा, ग्वाटेमाला


💠 कथिल - चीन, ब्राझील, मलेशिया, थायलंड, व इतर देश.


💠निकेल - रशिया, कॅनडा, जपान, नॉर्वे, ऑस्ट्रेलिया.


💠 करोमियम - दक्षिण आफ्रिका, रशिया, भारत, झिम्बॉम्बे, फिनलँड.


💠शिसे - रशिया, अमेरिका, चीन, ऑस्ट्रेलिया, जपान, व इतर देश


💠 गधक - अमेरिका, कॅनडा, रशिया, पोलंड.


💠 खनिज तेल - सौदी अरेबिया, अमेरिका, रशिया, इराण, मेक्सिको, चीन, कुवैत, इराक, व्हेनेझुएला, रूमानिया, इंडोनेशिया, एकवाडोर.


💠 नसर्गिक वायू - रशिया, अमेरिका, कॅनडा, ग्रेट ब्रिटन, नेदरलँड्स.


💠 दगडी कोळसा - चीन, अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया, रशिया, दक्षिण आफ्रिका, व इतर देश.


💠 हिरे - काँगो, नामिबिया, लेसोथो, अंगोला, बोस्टवाना, दक्षिण आफ्रिका, रशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा.


♍️जग : शेती ♍️

💠गहू - चीन, भारत, अमेरिका, फ्रान्स, रशिया, कॅनडा, व इतर देश


💠 तांदूळ - चीन, भारत, इंडोनेशिया, बांग्लादेश, व्हिएतनाम, इतर देश


💠मका - अमेरिका, चीन, ब्राझील, फ्रान्स, मेक्सिको, भारत, इतर देश


💠जवारी - अमेरिका, भारत, नयजीरिया, चीन, मेक्सिको, भारत, सुदान.


💠 बाजरी - भारत, नयजीरिया, चीन, नाइजर, बुर्किना, फासो.


💠 डाळी - भारत, चीन, ब्राझील, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया,


💠सोयाबीन - अमेरिका, ब्राझील, चीन.


💠 भईमूग - चीन, भारत, नयजीरिया, अमेरिका, इंडोनेशिया.


💠खोबरे - फिलिपिन्स, भारत, इंडोनेशिया,


💠 पामतेल - मलेशिया, इंडोनेशिया, व्हिएतनाम, मेक्सिको, व इतर देश.


💠 बटाटे - चीन, रशिया, अमेरिका, पोलंड, युक्रेन, भारत.


💠 सफरचंदे - चीन, अमेरिका, फ्रान्स, टर्की, इराण, भारत,


💠 चहा - भारत, चीन, केनिया, श्रीलंका, इंडोनेशिया,


💠 कॉफी - ब्राझील, युगांडा, कोलंबिया,


💠कशर - स्पेन, भारत, इराण.


💠 कोको बिया - आयव्हरी कोस्ट, घाणा, इंडोनेशिया, ब्राझील, नयजीरिया,


💠 कापूस - अमेरिका, चीन, भारत, पाकिस्तान, उझबेकिस्तान.


💠 ताग - भारत, बांग्लादेश, चीन, थायलंड.


💠 तबाखू - चीन, अमेरिका, भारत, ब्राझील,


💠 रबर - थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, भारत, चीन.


💠 ऊस - भारत, ब्राझील, चीन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया.


💠 फले - नेदरलँड्स, भारत, इझ्रायल, ब्राझील.


11 September 2025

चालू घडामोडी :- 10 सप्टेंबर 2025


◆ बहुपक्षीय लष्करी सराव ZAPAD 2025 रशियातील निझनी येथे आयोजित करण्यात आला होता.

◆ छत्तीसगड सरकारने आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या मदतीने सर्व जिल्हा कारागृहांमधील कैद्यांसाठी योग आणि सुधारणा उपक्रम सुरू केले आहेत.

◆ केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी बेंगळुरू येथे 2025 च्या अंतराळावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले.

◆ 2025 च्या आंतरराष्ट्रीय अंतराळ परिषदेचा विषय "जागतिक प्रगतीसाठी जागेचा वापर: नवोन्मेष, धोरण आणि विकास" आहे.

◆ युनायटेड किंग्डम इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्सिंग ब्रिज (UKIIFB) हा लंडन शहर आणि भारतातील नीती आयोग संस्थेचा संयुक्त उपक्रम आहे.

◆ CAFA (मध्य आशियाई फुटबॉल असोसिएशन) नेशन्स कप 2025 मध्ये भारताने ओमान देशाला हरवून कांस्यपदक जिंकले.

◆ भारतीय लष्कराच्या पश्चिम कमांडकडून 'ऑपरेशन राहत' अंतर्गत पंजाब, हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीरमधील पूरग्रस्त भागात मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.

◆ दरवर्षी 10 सप्टेंबर दिवशी जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन साजरा केला जातो.

◆ जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन 2024 ते 2026 पर्यंतची थीम "आत्महत्येवरील कथन बदलणे" आहे.

◆ इंजिनिअर्स इंडिया लिमिटेडने (EIL) आसाममधील नुमालीगढ येथे भारतातील पहिल्या बांबू-आधारित बायोरिफायनरी प्रकल्पाचे यांत्रिक कार्य यशस्वीरित्या पूर्ण केले आहे.

◆ महाराष्ट्राने सप्टेंबर 2025 मध्ये स्टार्टअप, उद्योजकता आणि नवोन्मेष धोरण सुरू केले आहे.

◆ केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी दुबईतील 28 व्या युनिव्हर्सल पोस्टल काँग्रेसमध्ये UPI-UPU इंटिग्रेशन प्रोजेक्ट लाँच केला.

◆ बिहार सरकारच्या कला, संस्कृती आणि युवा विभागाने मुख्यमंत्री गुरु-शिष्य परंपरा योजना सुरू केली आहे.

◆ केरळमधील पलक्कड येथील अनिवासी भारतीय उद्योगपती युनुस अहमद यांना कॅमल इंटरनॅशनल अवॉर्ड 2025 मिळाला आहे. [ते मिडल ईस्ट डॉटस्पेस कोवर्किंगचे कार्यकारी संचालक आहेत.]

 माहिती संकलन :- Avinash Chumble

10 September 2025

भारतातील प्रमुख नद्यांची खोरी आणि त्यांचे प्रमाण (%)

➤ खाली दिलेल्या नद्यांच्या खोरीचे क्षेत्रफळ भारतीय उपखंडाच्या एकूण भूप्रदेशात किती टक्के आहे, हे स्पष्टपणे दिले आहे:


➤ प्रमुख नद्या व त्यांच्या खोरीचे क्षेत्रफळ (प्रमाण टक्केवारीत):

➊ गंगा – २६.३%

➋ सिंधू – १०% (फक्त भारतातील भाग)

➌ गोदावरी – १०%

➍ कृष्णा – ८%

➎ ब्रह्मपुत्रा – ५.८% (फक्त भारतातील भाग)

➏ महानदी – ४%

➐ नर्मदा – ३.१%

➑ कावेरी – २.५%

➒ तापी – २.१३%

➓ पेन्नार – १.७%

⓫ माही – १.१%

⓬ साबरमती – ०.७%


🔹 टीप: वरील टक्केवारी भारतातील एकूण जलप्रवाही क्षेत्राच्या आधारावर आहे.

चालू घडामोडी


💠 भारताची हायड्रोजनवर चालणारी ट्रेन 🚂

नुकतीच याची यशस्वी चाचणी झाली

♦️ मार्ग – जींद ते सोनीपत (हरियाणा) – 89 किमी

♦️ हायड्रोजन ट्रेन तंत्रज्ञान वापरणारा भारत हा पाचवा देश (जर्मनी, फ्रान्स, स्वीडन, चीन नंतर)

♦️ इंजिन पॉवर – 1200 हॉर्सपॉवर (जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन)

♦️ प्रवासी क्षमता – 2600 प्रवासी, 10 कोच

♦️ वेग – जास्तीत जास्त 110 किमी/तास

♦️ सरकारने 2024-25 पर्यंत 35 हायड्रोजन गाड्या विकसित करण्यासाठी 2800 कोटी रुपये वाटप केले


💠 भुवनेश्वर – पहिले भारतीय शहर : एकात्मिक उष्णता व शीतकरण कृती योजना 🌡️❄️

IHCAP - Integrated Heat and Cooling Action Plan सुरू

♦️ भुवनेश्वर महानगरपालिका (BMC) + iFOREST यांच्या संयुक्त विद्यमाने

♦️ उद्देश – वाढत्या उष्णतेच्या ताणाला आणि शीतकरणाच्या मागणीला तोंड देणे

♦️ सिंगापूर-ETH सेंटर (SEC) चा सहभाग


💠 ISRO चे दुसरे प्रक्षेपण संकुल 🚀

ठिकाण – कुलशेखरपट्टिनम, तुतीकोरिन जिल्हा (तमिळनाडू)

♦️ भारताचे दुसरे प्रक्षेपण केंद्र (पहिले – सतीश धवन स्पेस सेंटर, श्रीहरीकोटा, आंध्रप्रदेश)

♦️ बांधकाम पूर्णता – डिसेंबर 2026

♦️ एकूण जागा – 2300 एकर

♦️ मुख्य वापर – स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल (SSLV)

♦️ पायाभरणी – 28 फेब्रुवारी 2024

♦️ अंदाजे किंमत – ₹950 कोटी


💠 भारतीय पुरुष हॉकी संघाचा एशिया कप विजय 🏑

ठिकाण – राजगीर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, बिहार (29 ऑगस्ट – 7 सप्टेंबर)

♦️ विजेता – भारत (4-1 ने दक्षिण कोरिया वर मात)

♦️ उपविजेता – दक्षिण कोरिया, एकूण संघ – 8

♦️ भारताचा कर्णधार – हरमनप्रीत सिंह

♦️ प्लेयर ऑफ द मॅच – दिलप्रीत सिंग

♦️ भारताने 8 वर्षांनी हा कप जिंकला (मागील विजय: 2003, 2007, 2017, 2025)

♦️ 2026 हॉकी विश्वचषकासाठी थेट प्रवेश मिळवला

♦️ एकूण 39 गोल करून सर्वाधिक गोल करणारा संघ


💠 उपाध्यक्ष निवडणूक  🗳️

भारताचे उपराष्ट्रपती – दुसरे सर्वोच्च घटनात्मक पद, राज्यसभेचे पदसिद्ध सभापती

♦️ निवडणूक – लोकसभा व राज्यसभेतील सर्व सदस्यांकडून, गुप्त मतदान पद्धतीने

♦️ कार्यकाळ – 5 वर्षे

♦️ इतिहासात 4 वेळा बिनविरोध निवड झालेले उपराष्ट्रपती – 

✔️डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (1952, 1957)

✔️मोहम्मद हिदायतुल्ला (1979)

✔️शंकर दयाल शर्मा (1987)


♦️ दोनदा निवडून आलेले उपराष्ट्रपती –

✔️डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

✔️डॉ. हमीद अन्सारी


♦️ महिला उमेदवार (दोघी पराभूत) –

✔️नजमा हेपतुल्ला

✔️मार्गारिट अल्वा


♦️ पहिले उपराष्ट्रपती – डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (1952–1962)

नुकतीच प्रकाशित महत्त्वाची पुस्तके


🔹 The Great Conciliator – संजय चोप्रा


🔹 Leo: The Untold Story of Chennai Super Kings – पी.एस. रमन


🔹 March of Glory – के. अरुमुगम आणि एरोल डी’क्रूझ


🔹 The New Icon: Savarkar and the Facts – अरुण शौरी


🔹 I Am ? – गोपीचंद पी. हिंदुजा


🔹 दियासलाई – कैलाश सत्यार्थी (आत्मचरित्र)


🔹 How India Scaled Mount G-20 – अमिताभ कांत


🔹 India – 5,000 Years of History on the Subcontinent – ऑड्रे ट्रश्के


🔹 Woman! Life! FREEDOM! – चौरा मकारेमी


🔹 India’s Finance Ministers – ए.के. भट्टाचार्य


🔹 The Conscience Network – सुगत श्रीनिवासराजू


🔹 Confessions of a Shakespeare Addict

महत्त्वाच्या नवीन नियुक्ती व नेमणुका 2025


🔷 इग्लंड आणि वेल्समधील सर्वात कमी वयाची सॉलिसिटर ➤ कृशांगी मेश्राम


🔷 बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष ➤ अजय सिंग


🔷 टाटा सन्स संचालक ➤ नोएल एन टाटा


🔷 चलनविषयक धोरण समितीचे पदसिद्ध सदस्य ➤ इंद्रनील भट्टाचार्य


🔷 पंतप्रधान मोदींचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ➤ अनिश दयाल सिंग


🔷 FSSAI चे नवीन CEO ➤ रजित पुन्हाणी


🔷 IMF च्या कार्यकारी संचालक ➤ उर्जित पटेल


🔷 विक्रम साराभाई अंतराळ केंद्र संचालक ➤ डॉ. ए. राजराजन


🔷 BARC (ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल) इंडियाचे नवीन अध्यक्ष ➤ गौरव बॅनर्जी


🔷 क्षमता निर्माण आयोग अध्यक्ष ➤ एस. राधा चौहान


🔷 NCC संचालनालय महाराष्ट्राचे अतिरिक्त महासंचालक ➤ विवेक त्यागी


🔷 दिल्ली पोलीस आयुक्त ➤ सतीश गोलचा

चालू घडामोडी :- 09 सप्टेंबर 2025



◆ 152 मतांनी विजयी होत सी.पी. राधाकृष्णन हे भारताचे 15 वे उपराष्ट्रपती बनले आहेत.

◆ 102 वर्षीय कोकिची अकुझावा हे जपान देशाचे सर्वोच्च आणि प्रतिष्ठित शिखर माउंट फुजी चढणारे सर्वात वयस्कर व्यक्ती ठरले आहेत.

◆ ‘Mother Mary Comes to Me’ हे पुस्तक अरुंधती रॉय यांनी लिहिले आहे.

◆ 2025 च्या यूएस ओपनमध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कार्लोस अल्काराज ने जिंकले आहे. 

◆ दरवर्षी जागतिक फिजिओथेरपी दिन 8 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.

◆ जागतिक फिजिओथेरपी दिन 2025 ची थीम "निरोगी वृद्धत्व" आहे

◆ भूपेंद्र गुप्ता यांची राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा महामंडळ (NHPC) च्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (CMD) पदी नियुक्ती झाली आहे.

◆ भारताने पुरुष हॉकी आशिया कप 2025 चे विजेतेपद जिंकले आहे. [अंतिम सामना बिहारमधील राजगीर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झाला]

◆ 28वी आशियाई टेबल टेनिस टीम चॅम्पियनशिप ही ओडिशा राज्यातील भुवनेश्वर येथे 11 ते 15 ऑक्टोबर 2025 दरम्यान आयोजित केली जाईल.

◆ 82 वा व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 या काळात व्हेनिस, इटली येथे पार पडला. [आयोजक :
ला बिएनाले डी व्हेनेझिया]

◆ 82 व्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील प्रमुख विजेत्यांमध्ये जिम जार्मशच्या 'फादर मदर सिस्टर ब्रदर' या चित्रपटाला गोल्डन लायन (सर्वोच्च पुरस्कार) मिळाला आहे.

◆ अनुपर्णा रॉय यांनी व्हेनिस चित्रपट महोत्सवाच्या Orizzonti विभागात 'सॉन्ग्स ऑफ फॉरगॉटन ट्रीज' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जिंकला आणि त्या या पुरस्काराच्या पहिल्या भारतीय महिला चित्रपट निर्मात्या ठरल्या आहेत. 

◆ उल्लास कार्यक्रमांतर्गत भारतातील चौथे पूर्ण साक्षर राज्य हिमाचल प्रदेश बनले आहे.
━━━━━━༺༻━━━━━━

08 September 2025

यूपीएससी अभ्यासक्रम मराठी मध्ये

 नमस्कार मित्रानो आज आपण या लेखात ( UPSC syllabus ) यूपीएससी अभ्यासक्रम बघणार आहोत. तसेच या लेखात आयएएस पूर्व परीक्षा अभ्यासक्रम, आयएएस मुख्य परीक्षा अभ्यासक्रम तसेच यूपीएससी मुलाखत या सर्व घटकांची माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करू.


यूपीएससी परीक्षा अभ्यासक्रम:

 देशात यूपीएससी द्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये IAS ची परीक्षा हि सर्वोच्य स्थानी मानली जाते. आज आपण या मधील IAS च्या अभ्यासक्रमाबद्दल जाणून घेऊया. सध्याच्या वेळेला आणि भूतकाळाला जोडणारा यूपीएससी अभ्यासक्रमाचा उच्च स्तर म्हणजे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय काठीण्य पातळी असलेला अभ्यासक्रम आहे. Upsc.gov.in वर जाहीर केलेल्या यूपीएससीच्या अधिकृत अधिसूचने मध्ये यूपीएससी अभ्यासक्रमाचा उल्लेख केलेला आहे. यूपीएससी चा अभ्यासक्रम हा IAS च्या तयारीचा मूळ आणि IAS परीक्षेत निवडलेला पहिला घटक आहे. UPSC परीक्षेतील प्रत्येक गोष्ट आपण UPSC च्या अभ्यासक्रमामधून आपण समजून घेऊ शकतो. यूपीएससी चा अभ्यासक्रम समजून घेणे ही आयएएस परीक्षेत यशस्वी होण्याची पहिली पायरी आहे. उमेदवारांना हे समजून घेणे आवश्यक आहे की सध्याची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्ताची घटना ही सामान्य अध्ययन अभ्यासक्रमाच्या मूलभूत विषयांशी निगडीत आहे आणि सध्याच्या घडामोडींच्या सहाय्याने उमेदवार या प्रकरणाची प्रासंगिकता समजून घेऊ शकतात.

IAS प्रिलिम्स आणि IAS मुख्य परीक्षेसाठी दरवर्षी यूपीएससीच्या अधिसूचनेमध्ये आयएएस अभ्यासक्रम अधिसूचित केला जातो.IAS तयारीचा पहिला आवश्यक घटक म्हणजे IAS अभ्यासक्रमाची आपणास स्पष्ट समज असणे आवशक आहे. IAS प्रिलिम्स अभ्यासक्रम आणि IAS मुख्य अभ्यासक्रमाचा स्वतंत्रपणे यूपीएससी अधिसूचनेमध्ये उल्लेख केला आहे. परंतु IAS मुख्य परीक्षा अभ्यासक्रम म्हणजे IAS प्रिलिम्स अभ्यासक्रमाचा विस्तृत विस्तार आहे. उमेदवारने IAS अभ्यासक्रमाची खोली समजून घेणे आवश्यक आहे. यूपीएससी अभ्यासक्रम समजण्यासाठी मागील वर्षाचे प्रश्नपत्रिका टॉर्च म्हणून काम करतात. याशिवाय आयएएस च्या तयारीच्या मार्गावर राहण्यासाठी उमेदवारांना दररोजच्या चालू घडामोडींचा आभ्यास करणे आवश्यक आहे.

IAS टॉपर्स केलेल्या उमेदवारांचे योग्य विश्लेषण आणि IAS च्या मागील प्रश्नपत्रिकां मधून आयएएस तयारीला दिशा प्रदान करते. परीक्षेची खोली समजून घेण्यासाठी आणि त्यांचा अभ्यास नेहमीच आयएएस अभ्यासक्रमाच्या विषयाशी संबंधित ठेवण्यासाठी उमेदवारांना यूपीएससी अभ्यासक्रम अंतर्भूत करणे आवश्यक आहे. यूपीएससी चा अभ्यासक्रम IAS च्या तयारीची मर्यादा ठरवते. यूपीएससी मध्ये IAS अभ्यासक्रम वेगळ्या अस्तित्वात नसतो, ही त्यांची गतिशीलता आहे जी IAS परीक्षा अधिक जटिल बनवते. यूपीएससी परीक्षेत IAS अभ्यासक्रमात नमूद केलेले सर्व विषय IAS बनू पाहणारया परीक्षार्थींना, तसेच सामान्य माणसाला समजून घेण्याची मागणी करतात.


आयएएस अभ्यासक्रम 2022 – पूर्व परीक्षा

पेपरप्रश्न आणि वेळमार्क
सामान्य अध्ययन पेपर – ११०० प्रश्न200
सामान्य अध्ययन पेपर – २ (CSAT – Qualifying only)८० प्रश्न200 ( या मार्कांचा विचार केला जात नाही )
एकूण200




IAS – आयएएस पूर्व परीक्षा अभ्यासक्रम

आयएएस पूर्व परीक्षा अभ्यासक्रम 2022 – सामान्य अध्ययन पेपर १

  • राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्व असणार्‍या सध्याच्या घटना.
  • भारत आणि भारतीय राष्ट्रीय चळवळीचा इतिहास.
  • भारतीय आणि जागतिक भूगोल – भौतिक, सामाजिक, भारत आणि जगाचा आर्थिक भूगोल.
  • भारतीय राज्य व राज्यशास्त्र-राज्यघटना, राजकीय व्यवस्था, पंचायत राज, सार्वजनिक धोरण, मुलभूत हक्कांचे प्रश्न इ.
  • आर्थिक आणि सामाजिक विकास, टिकाऊ विकास, गरीबी, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक क्षेत्रातील पुढाकार इ.
  • पर्यावरणीय विषय, जैव-विविधता आणि हवामान बदल – या विषयावर विषय विशेषतेची आवश्यकता नाही.
  • सामान्य विज्ञान.

प्रीलिम्स परीक्षेसाठी यूपीएससीने आयएएस अभ्यासक्रमातील चालू घडामोडींना अव्वल स्थान दिले आहे हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. आपण असे म्हणू शकतो की आयएएस तयारीच्या दिशेने निर्णय घेण्यामध्ये हा एक घटक महत्वाचा आहे. आयएएसच्या इच्छुकांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्व असलेल्या सद्य घटनांचा विचार करून सर्व विषयांचा अभ्यास केला पाहिजे.

इतर सर्व विषय आयएएसच्या पूर्वपरीक्षा परीक्षेसाठी तितकेच महत्वाचे आहेत, परंतु उमेदवाराने आयएएसच्या तयारीत असंबद्ध विषय सोडण्याची सवय विकसित केली पाहिजे. भारतीय राजकारण हा असा एक विषय आहे जिथे उमेदवार नेत्यांच्या राजकीय विधानांबद्दल वाचण्यात वेळ वाया घालवतात. परंतु ही सवय मर्यादित ठेवण्याची आणि केवळ घटनात्मक कार्या पुरती मर्यादीत ठेवण्याची सूचना देते.


आयएएस प्रिलिम्स अभ्यासक्रम 2022 – सामान्य अध्ययन पेपर -2 (CSAT)

  • आकलन.
  • संवाद कौशल्यासह परस्पर वैयक्तिक कौशल्ये.
  • तार्किक तर्क आणि विश्लेषणात्मक क्षमता.
  • निर्णय घेणे आणि समस्या सोडवणे.
  • सामान्य मानसिक क्षमता.
  • मूलभूत संख्या (संख्या आणि त्यांचे संबंध, परिमाण च्या ऑर्डर इ.) (दहावी ची पातळी), डेटा स्पष्टीकरण (चार्ट, आलेख, सारण्या इ. – (दहावी ची पातळी)

IAS – आयएएस मुख्य परीक्षा अभ्यासक्रम

आयएएस मुख्य परीक्षा ही वर्णनात्मक ( पारंपारिक ) पेपर-आधारित परीक्षा आहे. ज्यात उमेदवारांना प्रश्नांसाठी लांब उत्तरे लिहिण्याची आवश्यकता असते. सामान्य अध्ययनच्या पेपर व्यतिरिक्त, एक निबंध पेपर आहे ज्यामध्ये उमेदवारांना दोन निबंध लिहिणे आवश्यक आहे.

आयएएस मुख्य परीक्षा विषय व त्यांचे गुण खाली दिले आहेत.

पेपरपेपर चे नावमार्क
घटनेच्या आठव्या परिशिष्टात समाविष्ट केलेल्या भाषांमधून उमेदवाराने
निवडलेल्या भारतीय भाषेपैकी एक भाषा. (केवळ पात्रता )
३०० (केवळ पात्रता)
इंग्रजी (केवळ पात्रता)३०० (केवळ पात्रता)
निबंध लेखन२५०
सामान्य अध्ययन पेपर – १२५०
सामान्य अध्ययन पेपर – २२५०
सामान्य अध्ययन पेपर – ३२५०
सामान्य अध्ययन पेपर – ४२५०
पर्यायी – विषय पेपर १२५०
पर्यायी – विषय पेपर २२५०
आयएएस मुख्य (लेखी)१७५०
आयएएस मुलाखत२७५
एकूण२०२५
UPSC syllabus in Marathi PDF

नावाप्रमाणेच आयएएस मुख्य परीक्षा ही उमेदवारांची सुध्दा मुख्य परीक्षा आहे. आयएएस निवड केवळ आयएएस मुख्य (लेखी) आणि आयएएस मुख्य (मुलाखत) मध्ये मिळालेल्या गुणांवर आधारित आहे. यूपीएससी अधिकृत अधिसूचनेमध्ये आयएएस अभ्यासक्रम विषयाची यादी वेळोवेळी प्रदान करते. यूपीएससी अभ्यासक्रम पेपरनिहाय स्वरुपात देण्यात आला आहे आणि उमेदवारांना त्याच पद्धतीने आयएएस परीक्षेची तयारी करणे आवश्यक आहे.

आयएएस अभ्यासक्रम – निबंध पेपर

यूपीएससीच्या अधिसूचनेत आयएएस निबंध पेपर अभ्यासक्रमाचा उल्लेख नाही. अधिकृत अधिसूचनेमध्ये फक्त एक विस्तृत रूपरेषा प्रदान केली गेली आहे. परंतु उमेदवारांकडून मिळालेल्या अपेक्षेचा उल्लेख अधिसूचनेत करण्यात आला आहे. “त्यांच्या कल्पना सुव्यवस्थित पद्धतीने मांडण्यासाठी आणि संक्षिप्तपणे लिहिण्यासाठी त्यांनी निबंधाच्या विषयाशी जूळून जाणे अपेक्षित आहे.

यूपीएससी ने नेहमीच तत्वज्ञान, लोक प्रशासन आणि आंतरराष्ट्रीय परिस्थिती यावर विषय दिला आहे. या निबंधातून उमेदवारांच्या जागतिक दृष्टिकोनाची चाचणी घेतली जाते. उमेदवाराने गुंतलेली समस्या कशी पाहिली आणि त्या समस्येचे निराकरण कसे सुचविले यावर या विषयातील यश अवलंबून असते.

आयएएस अभ्यासक्रम – सामान्य अध्ययन पेपर  


इंडियन हेरिटेज अँड कल्चर, हिस्ट्री अँड भूगोल ऑफ द वर्ल्ड सोसायटी.

  • भारतीय संस्कृती प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत, कला, साहित्य आणि आर्किटेक्चरच्या मुख्य पैलूंचा समावेश.
  • आधुनिक भारतीय इतिहास अठराव्या शतकाच्या मध्य काळा पासून आजपर्यंतच्या महत्त्वपूर्ण घटना, व्यक्तिमत्त्व, आणि मुद्दे.
  • स्वातंत्र्य चळवळ – त्याचे विविध टप्पे आणि देशातील विविध भागातील महत्त्वपूर्ण योगदानकर्ते / योगदान.
  • देशातील स्वातंत्र्योत्तर एकत्रीकरण आणि पुनर्रचना.
  • जगाच्या इतिहासामध्ये औद्योगिक क्रांती, महायुद्धे, राष्ट्रीय सीमांची पुनर्रचना, वसाहतवाद, विस्तारवाद, साम्यवाद, भांडवलशाही, समाजवाद इत्यादी घटनांचा समावेश आहे.
  • भारतीय समाजातील विविध वैशिष्ट्ये आणि विविधता.
  • महिलाची भूमिका आणि महिलांची संघटना, लोकसंख्या आणि संबंधित समस्या, दारिद्र्य आणि विकासात्मक समस्या, शहरीकरण, त्यांच्या समस्या आणि त्यांचे उपाय.
  • भारतीय समाजावर जागतिकीकरणाचे परिणाम.
  • सामाजिक सशक्तीकरण, जातीयवाद, प्रादेशिकता आणि धर्मनिरपेक्षता.
  • जगाच्या भौतिक भूगोलातील ठळक वैशिष्ट्ये.
  • जगभरातील प्रमुख नैसर्गिक संसाधनांचे वितरण (दक्षिण आशिया आणि भारतीय उपखंड यांचा समावेश असलेले ) जगातील विविध भागात (भारतासह) प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय क्षेत्रातील उद्योगांच्या स्थानासाठी जबाबदार घटक.
  • भूकंप, सुनामी, ज्वालामुखीय, चक्रीवादळ इत्यादी, भौगोलिक वैशिष्ट्ये आणि त्यांचे भौगोलिक वैशिष्ट्यांमधील बदल, वनस्पती आणि जीव-जंतु आणि अशा बदलांचा परिणाम यासारख्या महत्त्वपूर्ण भौगोलिक घटना.

सामान्य अध्ययन पेपर – 

शासन, राज्यघटना, राजकारण, सामाजिक न्याय आणि आंतरराष्ट्रीय संबंध.

  • भारतीय राज्यघटना – ऐतिहासिक अधोरेखित, उत्क्रांती, वैशिष्ट्ये, दुरुस्ती, महत्त्वपूर्ण तरतुदी आणि मूलभूत रचना.
  • संघ आणि राज्ये यांची कार्ये आणि जबाबदारया, फेडरल स्ट्रक्चरशी संबंधित मुद्दे आणि आव्हाने, स्थानिक पातळीवरील अधिकार आणि वित्तपुरवठा आणि त्यातील आव्हाने.
  • विवाद निराकरण यंत्रणा यांचे विविध अवयव आणि संस्था यांच्यात शक्तींचे पृथक्करण.
  • लैंगिक संतुलन प्रतिबिंबित करणारे एक कार्यबल असण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे आणि महिला उमेदवारांना प्रोत्साहित केले जाते.
  • भारतीय घटनात्मक योजनेची इतर देशांच्या घटनेशी तुलना.
  • संसद व राज्य विधिमंडळ – रचना, कार्यप्रणाली, व्यवसायाचे आचरण, अधिकार व सुविधा व त्याद्वारे उद्भवणारे प्रश्न.
  • कार्यकारी आणि न्यायपालिकेची रचना, संघटना आणि कार्य-सरकारची मंत्रालये आणि विभाग, दबाव गट आणि औपचारिक / अनौपचारिक संघटना आणि त्यांची लोकसभेमधील भूमिका.
  • लोकप्रतिनिधी कायद्याची ठळक वैशिष्ट्ये.
  • विविध घटनात्मक पदाची कार्ये, अधिकार, कार्ये व जबाबदारया, विविध नेमणुका. वैधानिक, नियामक आणि विविध अर्ध-न्यायिक संस्था.
  • सरकारची धोरणे आणि विविध क्षेत्रातील विकासासाठी हस्तक्षेप आणि त्यांच्या अंमलबजावणीमुळे उद्भवणारे मुद्दे.
  • विकास प्रक्रिया आणि विकास उद्योग – स्वयंसेवी संस्था, बचत गट, विविध गट आणि संघटना, देणगीदार, धर्मादाय संस्था, संस्था आणि इतर भागधारकांची भूमिका.
  • केंद्र व राज्ये यांनी असुरक्षित लोकसंख्ये साठी कल्याणकारी योजना आणि या योजनांची कामगिरी, या असुरक्षित विभागांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या सुधारणेसाठी यंत्रणा, कायदे, संस्था स्थापन केले आहेत.
  • आरोग्य, शिक्षण, मानव संसाधन संबंधित सामाजिक क्षेत्र / सेवांच्या विकास आणि व्यवस्थापनाशी संबंधित मुद्दे.
  • दारिद्र्य आणि उपासमारीशी संबंधित मुद्दे.
  • शासन, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व, ई-गव्हर्नन्स अप्लिकेशन्स, मॉडेल्स, यश, मर्यादा आणि संभाव्यतेचे महत्त्वपूर्ण पैलू. नागरिकांची सनद, पारदर्शकता आणि जबाबदारी आणि संस्थात्मक आणि इतर उपाय.
  • लोकशाहीमध्ये नागरी सेवांची भूमिका.
  • भारत आणि त्याचे शेजारी राष्ट्रांशी संबंध.
  • द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक गटबाजी, आणि भारत किंवा भारताच्या हितावर परिणाम करणारे करार.
  • विकसनशील देशांच्या राजकारणाचा आणि भारताच्या हितावर आधारित राजकारणाचा प्रभाव, भारतीय डायस्पोरा.
  • महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था, आणि त्यांची रचना.

सामान्य अध्ययन पेपर – ३

  • तंत्रज्ञान, आर्थिक विकास, जैवविविधता, पर्यावरण, सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन.
  • भारतीय अर्थव्यवस्था आणि नियोजन, गतिशीलता, संसाधनांचा विकास, विकास आणि रोजगाराशी संबंधित मुद्दे.
  • समावेशक वाढ आणि त्यातून उद्भवणारे मुद्दे.
  • सरकारी बजेट.
  • देशातील विविध भागात मुख्य पीक-पीक पद्धती, विविध प्रकारचे सिंचन आणि सिंचन प्रणाली, साठवण, शेती उत्पादनांचे वाहतूक आणि विपणन मुद्दे व संबंधित अडचणी, शेतकर्‍यांच्या मदतीसाठी ई-तंत्रज्ञान.
  • प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष शेती अनुदान आणि किमान आधारभूत किंमतींशी संबंधित मुद्दे. सार्वजनिक वितरण प्रणाली- उद्दीष्टे, कामकाज, मर्यादा, सुधार, बफर साठा आणि अन्न सुरक्षा, तंत्रज्ञान मोहिम, पशु संगोपन अर्थशास्त्र.
  • भारतातील अन्न प्रक्रिया आणि संबंधित उद्योग- व्याप्ती आणि महत्त्व, स्थान, अपस्ट्रीम आणि डाउनस्ट्रीम आवश्यकता, पुरवठा साखळी व्यवस्थापन.
  • भारतातील जमीन सुधारना.
  • अर्थव्यवस्थेवर उदारीकरणाचे परिणाम, औद्योगिक धोरणात बदल आणि औद्योगिक विकासावर त्यांचे परिणाम.
  • पायाभूत सुविधा: ऊर्जा, बंदरे, रस्ते, विमानतळ, रेल्वे इ.
  • गुंतवणूक मॉडेल.
  • विज्ञान आणि तंत्रज्ञान- घडामोडी आणि त्यांचे अनुप्रयोग आणि दैनंदिन जीवनातील प्रभाव.
  • विज्ञान आणि तंत्रज्ञानातील भारतीयांची उपलब्धि; तंत्रज्ञानाचे स्वदेशीकरण आणि नवीन तंत्रज्ञान विकसित करणे.
  • आयटी, स्पेस, कॉम्प्यूटर्स, रोबोटिक्स, नॅनो-टेक्नॉलॉजी, बायो-टेक्नॉलॉजी आणि बौद्धिक मालमत्ता हक्कांशी संबंधित विषयांमध्ये जागरूकता.
  • संवर्धन, पर्यावरण प्रदूषण आणि र्‍हास, पर्यावरणाचा प्रभाव मूल्यांकन.
  • आपत्ती व आपत्ती व्यवस्थापन
  • विकास आणि अतिरेकी प्रसार यांच्यात दुवा.
  • अंतर्गत सुरक्षेसाठी आव्हाने निर्माण करण्यात बाह्य राज्य आणि राज्य-नसलेल्या इतर घटकांची भूमिका.
  • संप्रेषण नेटवर्कद्वारे अंतर्गत सुरक्षेसाठी आव्हाने, अंतर्गत सुरक्षा आव्हानांमध्ये मीडिया आणि सोशल नेटवर्किंग साइट्सची भूमिका, सायबर सुरक्षाच्या मूलभूत गोष्टी, मनी लॉन्ड्रिंग आणि त्याचे प्रतिबंध.
  • सुरक्षा आव्हाने आणि सीमाभागातील त्यांचे व्यवस्थापन – दहशतवादासह संघटित गुन्ह्यांचा दुवा.
  • विविध सुरक्षा दले आणि एजन्सी आणि त्यांचा आदेश.

सामान्य अध्ययन पेपर – ४

नीतिशास्त्र, अखंडता आणि योग्यता या पेपरमध्ये उमेदवारांची वृत्ती आणि त्यांची अखंडता, सार्वजनिक जीवनातील संभाव्यता आणि त्याच्या समस्येचे निराकरण करण्याच्या दृष्टिकोनातून विविध प्रश्नांशी संबंधित असलेल्या समस्यांविषयी आणि समाजाशी वागताना होणारया संघर्षांबद्दलच्या प्रश्नांचा अभ्यास यात समावेश असेल. त्यासोबत खालील विस्तृत क्षेत्रे कव्हर केली जातील.

  • नीतिशास्त्र आणि मानवी इंटरफेस: मानवतेच्या नीतीमत्तेचे सार, निर्धारक आणि परिणाम, नैतिकतेचे परिमाण, नीतिशास्त्र – खाजगी आणि सार्वजनिक संबंधांमध्ये. मानवी मूल्ये – महान नेते, सुधारक आणि प्रशासकांचे जीवन आणि शिकवण्यांचे धडे, मूल्यमापन करण्यामध्ये कौटुंबिक समाज आणि शैक्षणिक संस्थांची भूमिका.
  • वृत्ती: सामग्री, रचना, कार्य त्याचा प्रभाव आणि विचार आणि वर्तन यांच्याशी संबंध, नैतिक आणि राजकीय दृष्टीकोन, सामाजिक प्रभाव आणि मन वळवणे.
  • नागरी सेवा, सचोटी, निःपक्षपातीपणा आणि वस्तुनिष्ठता, सार्वजनिक सेवेचे समर्पण, दुर्बल घटकांबद्दल सहानुभूती, सहिष्णुता आणि करुणेसाठी योग्यता आणि मूलभूत मूल्ये.
  • भावनिक बुद्धिमत्ता-संकल्पना आणि प्रशासन आणि कारभारामध्ये त्यांची उपयुक्तता आणि अनुप्रयोग.
  • भारत आणि जगातील नैतिक विचारवंतांचे आणि तत्वज्ञांचे योगदान.
  • सार्वजनिक / नागरी सेवेची मूल्ये आणि सार्वजनिक प्रशासनात नीतिशास्त्र. स्थिती आणि समस्या, सरकारी व खाजगी संस्थांमधील नैतिक चिंता व कोंडी, नैतिक मार्गदर्शनाचे स्रोत म्हणून कायदे, नियम, नियम आणि विवेक, जबाबदारी आणि नैतिक कारभार. प्रशासनात नैतिक आणि नैतिक मूल्यांचे बळकटीकरण, आंतरराष्ट्रीय संबंध आणि निधीमधील नैतिक मुद्दे, कॉर्पोरेट गव्हर्नन्स.
  • कारभाराची शक्यता: सार्वजनिक सेवेची संकल्पना, शासन आणि संभाव्यतेचा तात्विक आधार, सरकारमधील माहिती सामायिकरण आणि पारदर्शकता, माहितीचा अधिकार, संहिता.
  • नीतिशास्त्र, आचारसंहिता, नागरिकांची सनद, कार्यसंस्कृती, सेवा वितरणाची गुणवत्ता, सार्वजनिक निधीचा उपयोग, भ्रष्टाचाराची आव्हाने.
  • वरील मुद्द्यांवरील केस स्टडीज.

UPSC मध्ये पर्यायी विषय कोणते असतात?

पर्यायी – विषय पेपर १


आयएएस मुख्य परीक्षेत 25 पर्यायी विषय आहेत आणि त्यातील फक्त एक विषय उमेदवार निवडू शकतो. पर्यायी विषयाला एकून १७५० पैकी ५०० गुण आहेत. हे एकूण ३० % च्या आसपास आहे. म्हणून उमेदवारांना पर्यायी विषयांची काळजीपूर्वक निवड करण्याची सूचना देण्यात आली आहे कारण ते आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकते किंवा तोडू शकते.

खाली आयएएस मुख्य वैकल्पिक विषयांची अधिकृत यादी आहे. उमेदवार पर्यायी विषय म्हणून कोणत्याही एका विषयाची निवड करू शकतात.


शेतीपशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय विज्ञानमानववंशशास्त्र
वनस्पतिशास्त्ररसायनशास्त्रसिव्हिल अभियांत्रिकी
वाणिज्य आणि लेखाअर्थशास्त्रविद्युत अभियांत्रिकी
भूगोलइतिहासभूशास्त्र
कायदाव्यवस्थापनगणित
वैद्यकीय विज्ञानयांत्रिकी अभियांत्रिकीतत्वज्ञान
भौतिकशास्त्रराज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंधमानसशास्त्र
सार्वजनिक प्रशासनसमाजशास्त्रसांख्यिकी
प्राणीशास्त्र




पर्यायी – विषय पेपर 

उमेदवार त्यांच्या वैकल्पिक विषय म्हणून पुढीलपैकी कोणत्याही भाषेचे साहित्य निवडू शकतात.

आसामीबंगालीडोगरी
बोडोहिंदीगुजराती
काश्मिरीकन्नडकोंकणी
मैथिलीमल्याळममणिपुरी
नेपाळीमराठीपंजाबी
संस्कृतओडियासंथाली
तामिळउर्दूतेलगू
सिंधीइंग्रजी

अधिक माहिती साठी या संकेत स्थळाला भेट देऊ शकता . संघ लोक सेवा आयोग

आपणास  हा लेख कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. जर आपणास इतर कोणत्याही विषया बद्दल माहिती हवी असेल तर आपण कमेंट करू शकता. जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी त्या विषयावर लेख उपलब्ध करून देऊ.