०६ मे २०२६

महालेखापरीक्षक बद्दल संपूर्ण माहिती

· केंद्र सरकार आणि घटकराज्य सरकार यांचे हिशोब तपासण्यासाठी उद्देशाने भारतीय घटना कलम 148 ते 151 नुसार महालेखा परीक्षकाचे पद निर्माण केलेले आहे. 

· या महालेखापालाचे पद देखील महत्वाचे व जबाबदारीचे पद असते.



1. नेमणूक

· महालेखापरीक्षकाची नेमणूक देशाचे राष्ट्रपती करतात. 

· महालेखापरीक्षकाला आपले पदग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपतीसमोर विशिष्ट स्वरुपात शपथ घ्यावी लागत असते. 

· राष्ट्रपतीच्या मते अनुभवी व तज्ञ व्यक्तीचीच नेमणूक महालेखापालासाठी केली जाते.



2. कार्यकाल

· भारतीय राज्यघटनेत महालेखापालाचा तसा कार्यकाल ठरवून दिलेला नाही. 

· परंतु त्याचे निवृत्ती वय 65 वर्षे ठरवून दिलेले आहे. याचाच अर्थ असा की, महालेखापाल वयाच्या 65 व्या वर्षापर्यंत आपल्या अधिकारपदावर कार्य करू शकते असे असले तरी महालेखापाल मुदतपूर्व आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतो. 

· याशिवाय त्याने घटनेचा भंग केला असेल किंवा घटनाविरोधी कृत्य केले असेल तरच त्याच्यावर संसदेमध्ये महाभियोगाचा खटला चालवून राष्ट्रपती त्याला पदच्युत करू शकतात.



3. वेतन व भत्ते


· महालेखापालाला दरमहा रुपये 90,000/- वेतन प्राप्त होते. याशिवाय त्याच्या पदाला साजेल व शोभेल अशा सर्व सुविधांनी युक्त त्याला निवासस्थान मोफत दिले जाते. 

· शासकीय कामासाठी देशीविदेशी प्रवास त्याला मोफत असतो. 

· एकदा निश्चित झालेले त्यांचे वेतन कोणीही कपात करू शकत नाही. परंतु आणीबाणी लागू केली तर मात्र त्याच्या वेतनात कपात केली जाते.

· महालेखापालाचे वेतन हे देशाच्या संचित निधीतून दिले जाते. 

· निवृत्त झाल्यांनंतर निवृत्तीवेतन प्राप्त करण्याचा अधिकार आहे.



4. अधिकार व कार्ये


1. केंद्र सरकारच्या व घटक राज्य सरकारच्या जमाखर्चाचे हिशेब तपासणे.

2. केंद्र सरकारच्या व घटक राज्य सरकारच्या लेखा पुस्तकाच्या नोंदी कशा ठेवाव्यात हे ठरविणे.

3. शासनामार्फत खर्च होणार्‍या रकमा नियमानुसार खर्च होत आहे किंवा नाही हे पाहणे.

4. घटक राज्य सरकारच्या लेखा संबंधीचा अहवाल घटक राज्याच्या राज्यपालाला पाठविणे.

5. शासनाच्या वेगवेगळ्या महामंडळांचे हिशोब तपासणे.

6. राष्ट्रपतीचे आर्थिक बाबीसंबंधी माहिती मागविल्यास ती पुरविणे.

7. एखदया खात्याचा अनाठायी अथवा जास्तीचा खर्च झाला असेल तर तो वसूल करणे.

पॉलिटी या विषयाची शेवटच्या पंधरा दिवसांमध्ये कशी तयारी कराल??

⭕️ पॉलिटी या विषयाला राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये पंधरा प्रश्न विचारले जातात पैकी किमान बारा प्रश्न हे कोअर पॉलिटी वर असतात तर एखादा दुसरा प्रश्न हा पंचायत राज या घटका वरून पडतो. 2018 पर्यंत चे पेपर पाहता आयोगाचा ट्रेंड सोपा वाटतो परंतु 2019 आणि 2020 मधील पूर्व परीक्षांमध्ये आयोगाने लांबलचक व अवघड प्रश्न विचारल्यावर भर दिलेला आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच प्रश्नांचा दर्जा मध्यम कठीण आणि वेळखाऊ असेल अशी मनाची तयारी आपण करून ठेवायला हवी.



⭕️ सपूर्ण पॉलिटी आता इथून पुढे उजळणी करणे शक्य नाही त्यामुळे नेमक्या घटकांचा अभ्यास आपण करायला हवा. उदाहरणार्थ संसद राष्ट्रपती निवडणूक आयोग राज्यघटनेची मूलभूत वैशिष्ट्ये सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय आणीबाणी केंद्र-राज्य संबंध या घटकांवर आयोग सातत्याने प्रश्न विचारत आहे. त्यामुळे हे घटक आपण पुन्हा पुन्हा मूळ पुस्तकातुन वाचणे फायदेशीर ठरेल.



⭕️ इतर काही घटक जसे की दुय्यम न्यायालये, लोकपाल, भारताचे महालेखापाल व महा नियंत्रक, महाधिवक्ता व महान्यायवादी अशा निवडक घटकांचे महत्त्व जरी अनन्यसाधारण असले तरी त्यांचे पाठांतर करणे तुलनेने सोपे असते. त्यामुळे या घटकांना शेवटच्या पंधरा दिवसांमध्ये वेळ न देता तो वेळ मागे उल्लेख केलेल्या घटकांसाठी वापरता येईल. 



⭕️ याव्यतिरिक्त महत्वाची कलमे, table of precedence , घटनादुरुस्त्या यासारख्या गोष्टी देखील विसरून चालणार नाहीत. कमी वेळेत आणि कमी कष्टात आपल्याला गुण मिळवून देण्यासाठी हे घटक अत्यंत किफायतशीर ठरतात. त्यामुळे परिक्षेला जाण्याच्या आदल्या दिवशी या घटकांवर नजर फिरविणे अनिवार्य आहे.



⭕️ पचायत राज या घटकावर ती एक ते तीन प्रश्न पडू शकतात. त्यामुळे इतक्या थोड्या गुणांसाठी भरपूर वेळ खर्ची पाडणे बिलकुल अपेक्षित नाही. तुम्ही आज पर्यंत तयार केलेल्या नोट्स अथवा बाजारात उपलब्ध असलेल्या कोणत्याही नोट्स वापरून तुम्ही हे दोन तीन गुण सहज मिळू शकतात. किशोर लवटे सरांच्या पंचायतराज पुस्तकाच्या मागे शॉर्ट नोट्स दिलेल्या आहेत त्याचादेखील तुम्ही वापर करू शकता. 



❇️ पॉलिटी हा पूर्व परीक्षांमधील सर्वाधिक आउटपुट देणारा विषय आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा मध्ये या विषयांमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये वीसपेक्षा कमी गुण मिळणे अपेक्षित नाही. आयोगाच्या पूर्वीच्या प्रश्नांचा जोरदार अभ्यास आणि लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकातून केलेले वाचन यांच्या जोरावर 12 ते 15 प्रश्न आपण बरोबर सोडवू शकतो. त्यामुळे या विषयाकडे व्यवस्थित लक्ष देऊन याचे नियोजन करावे.


धन्यवाद..

आत्तापर्यंत चे सर्व राज्यघटनेवरील प्रश्नसंच

1.कोणत्या घटना दुरुस्ती द्वारे राष्ट्रपती ना मंत्री परिषदेच्या सल्ल्यानुसार वागणे बंधनकारक आहे?

१.४२ वी घटना दुरुस्ती ✅

२.४४ वी घटना दुरुस्ती

३.24 वी घटना दुरुस्ती 

४.५२ वी घटना दुरुस्ती


2.१९३५ च्या कायद्यांत कशाची तरतूद होती?

१.प्रौढ मताधिकर

२.साम्राज्यांर्गत शासनाधिकार

३.सापेक्ष स्वायत्तता

४.प्रांतिक स्वायत्तता✅


3.संविधानाच्या प्रारंभी भारताचा नागरिक होण्याकरिता कोणती अट आवश्यक नव्हती?

१.भारतात अधिवास आणि

२.भारतात जन्म किंवा

३.माता व पितांचा भारतात जन्म किंवा✅

४.अशा प्रारंभ पूर्वी किमान ५ वर्षे भारतात सामान्यतः निवास


4.खालीलपैकी कोणत्या न्यायालयीन निर्णया द्वारे प्रास्ताविका ही घटनेचा भाग नाही असे प्रतिपादन करण्यात आले?

१.बेरुबाली खटला ✅

२.गोलाखनाथ खटला

३.केशवानंद भारती खटला

४.बोम्मई विरुद्ध भारताचे संघराज्य


5.घटनेच्या कलम ८२ मधील सध्याच्या तरतुदी प्रमाणे, राज्या-राज्यामध्ये लोकसभेच्या जागांचे समायोजन यापुढे कोणत्या वर्षा नंतर होऊ शकते?

१.२०१८

२.२०२१

३.२०२६✅

४.२०३१


6.भारताचे कोणते मुख्य न्यायाधीश होते ज्यांनी काही काळ प्रभारी राष्ट्रपती पदाची जबाबदारी सांभाळली?

१.एम सी छागल

२.एम हिदायतुल्ला✅

३.वाय चंद्रचूड

४.यापैकी नाही


7.भारताचे राष्ट्रपती म्हणून कोणाचा कालावधी सर्वात कमी होता?

१.डॉ सर्वपल्ली राधाकृष्ण

२.डॉ झाकीर हुसेन✅

३.श्री व्ही व्ही गिरी

४.डॉ फकरुद्दी अली महंमद


8.ऍमिकस कुरी हे संबोधन कशासाठी वापरतात?

१.न्यायालयाचा मित्र वकिल✅

२.न्यायालयाचा संदेशवाहक

३.नायलायचा एक पगारी अधिकारी

४.न्यायालयाचे एक ब्रिटिशकालीन नामाभिधान


9.महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला?

१.२०००

२.२००५

३.२०१०✅

४.२०११


10.भारतातील भाषावार प्रांतरचनेच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणत्या भागाचा अधिक पुढाकार होता?

१.मराठवाडा

२.आंध्र प्रदेश ✅

३.महाराष्ट्र

४.कर्नाटक


1. 'मार्गदर्शक तत्वे कोऱ्या चेकप्रमाणे आहेत ज्यांचे वटवणे बँकेच्या इच्छेवर सोडलेले आहे' असे कोणी म्हटले आहे?

१.डॉ बी आर आंबेडकर

२.प्रो के टी शहा✅

३.एन जी रंगा

४.बी एन राव


2. भारतीय संविधानाने नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाद्वारे दिली आहे?

१.उद्देशपत्रिका✅

२.मूलभूत अधिकार

३.मूलभूत कर्तव्ये

४.राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे


3. आंतरराज्यीय नद्या व नद्या खोरे विवादाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

१.संसद कायदा करून आंतरराज्यीय नदी अथवा नदी खोऱ्यामधील पाणी वापर, वाटप अथवा नियंत्रण याबाबत तरतूद करू शकते.

२.संसद कायदा करून आशा आंतरराज्यीय जल विवादाबाबत सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार बंदीत करू शकत नाही✅

३.संसद कायद्याद्वारे उच्चन्यायालयाच्या अथवा इतर कनिष्ठ न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रातून हा विषय वगळण्याची तरतूद करू शकते

४.महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश यांमधील कृष्णा पाणीवाटप लवाद हा राज्य घटनेच्या कलम २६२ च्या तरतुदी नुसार जाहीर करण्यात आला आहे.


4. खालीलपैकी कोणती/कोणत्या संस्था वैधानिक नाहीत?

अ.राष्ट्रीय विकास परिषद

ब.विद्यापीठ अनुदान आयोग

क.नियोजन आयोग

ड.केंद्रीय दक्षता आयोग

१.फक्त अ

२.अ आणि ब

३.अ आणि क✅

४.ब आणि ड


5.भारतीय राज्यघटनेच्या कलम १२ नुसार "राज्य" या संज्ञेत खालीलपैकी कोणती संस्था/यंत्रणा अंतर्भूत होत नाही?

१.विधानसभा

२.विधानपरिषद

३.उच्च न्यायाल✅

४.जिल्हा परिषद


6. राज्य मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्ष पदी पुढीलपैकी कोण असू शकते?

१.जे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते

२.जे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते

३.जे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते✅

४.जे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते


7.भारतीय संविधानात अनुछेद ३७१ काय सांगतो?

१.जम्मू व काश्मीर बाबत विषय तरतूद

२.केवळ उत्तम पूर्व भागाकरिता विशेष तरतुदी

३.निव्वळ हैदराबाद राज्यकरिता विशेष तरतूद

४.विविध राज्यांकर्ता विशेष तरतुदी✅


8. संविधानाच्या प्रारंभी आंग्ल भारतीय समाजातील व्यक्तींच्या नियुक्त्या १५ ऑगस्ट १९४७ पूर्वीप्रमाणेच पुढीलपैकी कोणत्या विभागात केल्या जात होत्या?

अ. रेल्वे

ब.सीमाशुल्क

क.आयकर

ड. डाक व तार

१.अ ब आणि क

२.ब क आणि ड

३.अ ब आणि ड✅

४.अ क आणि ड


9. भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका प्रथमतः केव्हा दुरुस्त करण्यात आली?

१.१९५२

२.१९६६

३.१९७६✅

४.१९८६


10. ए के क्रयपाक विरुद्ध केंद्र (AIR 1970 S. C. 150) च्या खटल्या मध्ये खालीलपैकी कोणता मुद्दा होता?

१.आर्थिक पक्षपात

२.वैयक्तिक पक्षपात✅

३.विषय पक्षपात

४.वरील सर्वच


1. खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्य वरून असे  निदर्शनास येते की, वास्तविक कार्यकारी सत्ता पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली कार्य करणाऱ्या मंत्रिमंडळाच्या हातात आहे?

१.प्रातिनिधिक लोकशाही

२.अध्यक्षीय लोकशाही

३.सांसदीय लोकशाही✅

४.प्रत्यक्ष लोकशाही



2. "आम्ही त्यांना कोणतीही वास्तविक सत्ता दिली नाही, पण आम्ही त्यांचे स्थान अधिकाराचे आणि प्रतिष्टेचे केले आहे" राष्ट्रपतींच्या स्थानाबाबत असे कोण म्हणाले?

१.पंडित जवाहरलाल नेहरू✅

२.डॉ बाबासाहेब आंबेडकर

३.के एम मुन्शी

४.डॉ राजेंद्र प्रसाद



3. राष्ट्रपतींच्या दयेच्या अधिकारसंबंधी प्रतिपादन केलेल्या पुढील विधनातील अयोग्य विधान कोणते?

१.कोर्ट मार्शल द्वारा देण्यात आलेल्या शिक्षेस हा अधिकार लागू पडत नाही✅

२.राष्ट्रपती या अधिकाराचा वापर मंत्री परिषदेच्या सल्ल्याने च करतात

३.राष्ट्रपतींच्या या अधिकाराच्या वापराचे न्यायालयीन पुनर्विलोकन करता येत नाही

४.घटनेच्या कलम ७२ नुसार या अधिकाराचा वापर करताना विशिष्ट मार्गदर्शक तत्वे मांडण्याची गरज नाही



4. भारतात खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत प्रशासकीय अधिकाऱ्याने बजावलेल्या स्वेच्छानिर्णय अधिकाऱ्यांचे न्यायिक पुनर्विलोकन होऊ शकते?

१.प्रशासकीय निर्णयाची योग्यता बघण्यासाठी

२.साक्षी पुराव्याची योग्यता पुन्हा पडताळणीसाठी

३.निर्णय प्रक्रिया बरोबर झाली की नाही हे पडताळण्यासाठी✅

४.वरीलपैकी एक ही नाही



5. पुढील राज्यांचा निर्मिती नुसार क्रम लावा.

१.झारखंड, उत्तराखंड, छत्तीसगड

२.उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगड

३.छत्तीसगड, झारखंड, उत्तराखंड

४.छत्तीसगड, उत्तराखंड, झारखंड✅



6. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण होते?

१.मोरारजी देसाई

२.वसंतराव नाईक

३.मारोतराव कन्नमवार✅

४.शंकरराव चव्हाण



7.खालीलपैकी कोण राज्यपाल आणि मंत्री परिषद यातील दुवा म्हणून भूमिका बजावतात?

१.राज्यपाल

२.मुख्यमंत्री✅

३.मूख्य सचिव

४.राज्य सरकार



8. काही राज्य कायदेमंडळे द्विगृही आहेत. त्यांच्यामध्ये विधेयक पारित करण्या संदर्भात असहमती असल्यास, कोणता पर्याय उपलब्ध असतो?

१.राज्यपाल दोन्ही सदनांची संयुक्त बैठक बोलावतात आणि त्यामध्ये बहुमताने जो निर्णय होईल तो मान्य होतो

२.राज्यपालांचा निर्णय अंतिम असतो

३.विशिष्ट मुदत संपल्यानंतर विधानसभेचा निर्णय अंतिम असतो✅

४.सादर बाब निर्णयासाठी राष्ट्रपती कडे पाठवली जाते



9. कोणत्या राज्यांना ७३ व्या घटनादुरुस्तीतील तरतुदी पासुन सूट देण्यात आली आहे?

अ)मिझोराम

ब)मेघालय

क)नागालँड

ड)अरुणाचल प्रदेश

१.अ, ब, क✅

२.ब, क, ड

३.क, ड, अ

४.ड, अ, ब



10. शिक्षणच्या व्यवसायिकर्णावर कोणत्या समितीने भर दिला?

१.कोठारी समिती

२.बोगीरवर समिती

३.चटोपाध्यय समिती✅

४.बळवंत राय मेहता समिती


1. खालीलपैकी कोणत्या मार्गदर्शक तत्त्वाचे मूलभूत अधिकारात रुपांतर झाले आहे?

१.काम करण्याचा अधिकार

२.माहिती अधिकार

३.चांगल्या पर्यावरणाचा अधिकार

४.शिक्षणाचा अधिकार✅


2. सरपंचा विरुद्ध चा अविश्वास ठराव दोन तृतीयांश बहुमत न मिळाल्याने संमत झाला नाही तर पुढीलपैकी काय होऊ शकते?

१.अविश्वास ठराव पुन्हा सहा महिन्यांच्या आत आणता येतो

२.अविश्वास ठराव पुन्हा आणताच येत नाही

३.एक वर्षानंतर त्याच सरपंचा विरुद्ध अविश्वास ठराव मांडता येतो✅

४.सरपंचाला विवाद अर्ज उच्च न्यायालयात सादर करता येतो


3. महाराष्ट्राच्या रचनेनंतर इ. स. १९६० या वर्षी महाराष्ट्र राज्य विधानसभेचे अध्यक्ष कोण होते?

१.श्री ग मवळकर

२.श्री त्र्य शि भारदे

३.श्री स ल सिलम✅

४.श्री के कृ वानखेडे


4. 'नेमो डिबेट ई इंडेक्स इन प्रोप्रिया क्वाझा' (Nemo Debet Esse Index In Propria Causa) या लॅटिन माक्झिम चा पुढीलपैकी के अर्थ आहे?

१.राजा कधीही चूक करत नाही

२.कोणतीही व्यक्ती स्वतः च्या प्रकरणात न्यायाधीश असू शकत नाही✅

३.बाजू मांडण्याची संधी दिल्या शिवाय कोणत्याही व्यक्तीला शिक्षा देण्यात येणार नाही

४.जो ऐकेल तोच निर्णय देईल


5.भारतीय संसदेतील स्थायी समितीची महत्वाची कार्ये कोणती?

अ)शासकीय कार्याचे निःपक्षपाती परीक्षण

ब)कामगिरी चे मूल्यमापन व देखरेख

क)राज्यशासनाच्या कार्यांचे मूल्यमापन

ड)पुरवणी अंदाजाचे परीक्षण

१.अ, ब आणि क

२.अ, ब आणि ड✅

३.अ, क आणि ड

४.ब, क आणि ड


6.राज्यघटनेच्या मसुद्यावर 'वकिलांचे नंदनवन' अशी टीका केली जाते, त्याची कारणे कोणती आहेत?

१.मसुद्याची भाषा केवळ न्यायालयांना च परिचित आहे

२.तरतुदी मागील धनव्यर्थ केवळ अनुभवी व घटनात्मक कायद्यात पारंगत व्यक्तीला च समजू शकतो

३.मसुदा लोकांना सत्या पासून दूर नेतो म्हणतात

४.मसुदा समितीतील सात पैकी तीन सभासद त्या काळातील कायदे तज्ञ होते✅


7. भारतीय संविधानाच्या १० व्या परिशिष्टां नुसार एखादा सदस्य अपात्र आहे किंवा नाही हे ठरविण्याचा अधिकार पुढीलपैकी कोणाला आहे?

अ)राज्यसभेचे अध्यक्ष

ब)लोकसभेच सभापती

क)भारताचे राष्ट्रपती

ड)सर्वोच्च न्यायालय

१.अ, ब, क

२.अ, ब,क, ड

३.अ, ब✅

४.अ, ब, ड


8.वार्षिक केंद्रीय आर्थिक अंदाजपत्रकला लोकसभेची मंजुरी न मिळाल्यास

१.अंदाजपत्रक दुरुस्ती करून फेरसदर केले जाते

२.राज्यसभेचा अभिप्राय घेण्याकरिता ठेवले जाते

३.राष्ट्रपतींच्या अभिप्रायासाठी पाठवले जाते

४.पंतप्रधान व मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो✅


9. खालीलपैकी कोणत्या राज्याने नव्याने विधानपरिषदेची स्थापना केली आहे?

१.महाराष्ट्र

२.राजस्थान

३.जम्मू काश्मीर

४.आंध्र प्रदेश✅


10. संसद अधिवेशन चालू नसताना शासनाला नैसर्गिक संकटावर झालेला खर्च कशातून भागवता येतो?

१.आकस्मिक निधी

२.सांचीत निधी

३.भविष्य निर्वाह निधी✅

४.यापैकी नाही


1.राज्यसभेचे पदसिध्द अध्यक्ष कोण असतात?
1. राष्ट्रपती
2. महान्यायवादी
3.उपराष्ट्रपती✅
4.पंतप्रधान 

2. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाचा अध्यक्ष कोण असतो?
1.पोलीस अधीक्षक
2.जिल्हाधिकारी✅
3.मुख्य कार्यकारी अधिकारी
4.पालकमंत्री

3.महाराष्ट्रातून लोकसभेत किती सदस्य निवडून जातात?
1.46
2. 48✅
3.50
4 44

4.मतदारासाठी आवश्यक पात्रता वय 21 वरुन 18 वर्षे कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आले?
1.61 वी✅
2. 62 वी
3.71 वी
4.81 वी

5.नव्या कायद्याच्या प्रस्तावाला  काय म्हणतात?
1.ठराव
2. अध्यादेश
3.वटहुकूम
4.विधेयक✅
 
6.भारत सरकारचा प्रमुख कायदेशीर सल्लागार कोण असतो? 
1.भारताचा नियंत्रक व महालेखापाल
2.सर्वाच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश
3.भारताचा महान्यायवादी✅
4. Ad. जनरल

7.संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते?
1.लोकसभा
2.राज्यसभा✅
3.विधानसभा
4.विधानपरिषद

8.भारतातील भाषिक तत्वावर निर्माण झालेल पहिलं राज्य कोणतं?
1.पंजाब
2.महाराष्ट्र
3.गुजरात
4 आंध्रप्रदेश✅

9.कोणत्या घटकराज्यात विधानपरिषद अस्तित्वात नाही?
1.महाराष्ट्र
2.कर्नाटक
3.गुजरात✅
4. केरळ

10.राज्यघटना दुरुस्तीची पद्धत कोणत्या कलमामध्ये स्पष्ट करण्यात आली आहे?
1. 361
2.368✅
3.371
4.378

1. भारतीय राज्यघटनेत ५२ वी घटनादुरुस्ती कोणत्या हेतूने करण्यात आली?
अ)पक्षांतरला आळा घालणे
ब)मतदारांची वयोमर्यादा वाढवणे
क)निवडणूक प्रक्रियेत बदल करणे
ड)निवडणूक आयोगा बहू सदस्यीय करणे
१.फक्त अ✅
२.अ आणि ब
३.अ ब क
४.अ ब ड

2. निवडणूक आयोगाच्या भूमिकेशी विसंगत असलेल्या विधानाची निवड करा.
अ)मतदारसंघांची आखणी करणे
ब)राजकीय पक्षांना मान्यता देने
क)उमेदवाराच्या निवडणूक खर्चास पूर्ण मोकळीक देणे
ड)देशभरातील निवडणूका सुरळीत पार पाडणे
१.अ आणि क✅
२.अ आणि ब
३.ब आणि ड
४.अ आणि ड

3. भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात "कायद्याचे राज्य" या तत्वाचा समावेश केला आहे?
अ)संविधानाची प्रस्तावना
ब)भाग lll मूलभूत हक्क
क)भाग IV-A मूलभूत कर्तव्ये
१.अ आणि ब फक्त✅
२.अ, ब आणि क 
३.ब आणि क
४.वारीपैकी कोणताही नाही

4. प्रशासनिक न्यायाधिकरण....
 नुसार अस्तित्वात येतात?
१.विभाग
२.प्रशासन
३.कायदा✅
४.न्यायपालिका

5. नैसर्गिक न्यायचा नियम...... ला लागू होत नाही?
१.कायदे करण्या संबंधी कायदेमंडळची कृती✅
२.न्यायालय विषयक कृती
३.प्रशासकीय कृती
४.वरीलपैकी एक ही नाही

6. विभाग प्रमुखाच्या परवानगीशिवाय खालीलपैकी कोणत्या मुद्द्यावर राज्यातील कार्यालयीन अप्रकाशित नोंदींवर आधारित पुरावा देता येत नाही?
१.विभागीय धोरण
२.सार्वजनिक धोरण✅
३.अधिकारीय धोरण
४.वरीलपैकी काही नाही

7. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, १९८९ अंतर्गत जास्तीत जास्त शिक्षा कोणती आहे?
१.पाच वर्षे व दंड
२.सात वर्षे व दंड
३.जन्मठेप
४.मृत्यूदंड✅

8. संघ लोकसेवा आयोग राष्ट्रपतींना पुढील बाबींवर सल्ला देतो.
अ)नागरी सेवा आणि पदांच्या भरती पद्धतीन संदर्भातील बाबी
ब)भारत सरकारच्या अधीन काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अनुशासना बाबत ची प्रकरणे
क)एका वर्षांपेक्षा अधिक कालावधीच्या तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आलेल्या नेमणुका व त्यासंबंधी ची नियमितता
ड)सनदी सेवा आणि पदांवरील नेमनुकसाठी अनुकराव्याच्या तत्वा संबधी
१.अ आणि ब 
२.ब आणि क
३.अ, ब आणि क
४.अ, ब, क आणि ड✅

9. खालीलपैकी भारतीय रिजर्व बँकेचे गव्हर्नर कोण नव्हते?
१.सी रंगराजन✅
२.मनमोहन सिंग
३.डॉ डी सुबाराव
४.नरेंद्र जाधव

10. लोकलेखा समितीवर शासनाचे किती प्रतिनिधी नेमलेले असतात?
१.एक
२.दोन
३.तीन
४.एकही नाही✅

1. भारतातील घटनादुरुस्ती प्रक्रियेविषयी कोणते विधान अयोग्य आहे?
१.घटनादुरुस्ती विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात सादर करता येते
२.घटनादुरुस्ती विधेयकाला संमती राष्ट्रपतींना घ्यावीच लागते
३.घटनादुरुस्ती विधेयक सादर करण्यापूर्वी राष्ट्रपतींची संमती आवश्यक असते✅
४.घटनादुरुस्ती विधेयकसबंधी संसदेच्या दोन्ही सभागृहात असहमती निर्माण झाल्यास संयुक्त अधिवेशन बोलावण्याची तरतूद नाही

2. भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेतील 'सार्वभौम' या संकल्पनेतून खालीलपैकी कोण कोणता अर्थ ध्वनित होतो?
अ)बाह्य हस्तक्षेपविना भारत स्वतः शी निगडित निर्णय घेऊ शकतो व रद्द करू शकतो
ब)संघ आणि घटकराज्ये दोन्ही सार्वभौम आहेत
क)भारताचा संघ परकीय भूप्रदेश हस्तगत करू शकतो
ड)भारताच्या संघाकडे राष्ट्रीय प्रदेशात फेरफार करण्याचे अधिकार आहेत
१.ब, क, ड
२.अ, ब, क
३.अ, क, ड✅
४.अ, ब, ड

3. खलील विधान वाचून अचूक पर्याय निवडा.
विधी मंत्रालयाने तयार केलेला मसुदा कच्चा असल्याचे कारण देत प्रतिबंधात्मक स्थानबद्दता वाढवणारे विधेयक मे १९९७५ मध्ये सभापतींना विरोधकांनी रद्द करण्याची आवश्यकता पटवून दिली. अशा उदाहरणांचे वर्णन कशा प्रकारे केले जाते?
१.विधिमंडळाची सक्रियता
२.अंत्यतिक विधीवाध✅
३.कार्यकारी मंडळाची सक्रियता
४.प्रशासकीय सक्रियता

4. लोकसभेत अनुसुचित जाती व अनुसूचित जनजाती याच्याकरता जागा राखून ठेवण्या संदर्भात कोणत्या राज्यकरिता वेगळी तरतूद आहे?
१.केवळ आसाम करीता✅
२.केवळ जम्मू व काश्मीर करिता
३.वरील दोन्ही करिता
४.वरील कोणाही करीत नाही

5. घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यंचा समावेश.... च्या शिफारशी वरून करण्यात आला?
१.वल्लभभाई पटेल समिती
२.कृपलानी समिती
३.सरकारिया आयोग
४.स्वर्णसींग समिती✅

6. भारतीय संविधानाच्या १९ (१) व्या कलमात खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा विशेषत्वाने समावेश नाही?
१.भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य
२.मुद्रण स्वतंत्र्य ✅
३.भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार स्वतंत्र
४.विनाशस्त्र व शांतपणे एकत्र जमण्याचे स्वतंत्र

7. खालीलपैकी कोणते विषय घटनेच्या समवर्ती सूचित अंतर्भूत आहेत?
अ)शिक्षण
ब)व्ययसाय कर
क)वजन माप मानके (प्रमाण)
ड)वजन
ई)वने
१.अ, ड, इ✅
२.अ, ब, क
३.सर्व
४.एकही नाही

8. खालीलपैकी कोणत्या दाव्यात 'ध्वनी क्षेपकाच्या वापरावर सार्वजनिक आरोग्यासाठी मर्यादा हे कायदेशीर कारण आहे' असे सर्वोच्च न्यायालयाने निकालात म्हटले आहे?
१.स्टेट ऑफ राजस्थान विरुद्ध जी चावला
२.हिम्मतलाल विरुद्ध पोलीस कमिशनर✅
३.कृष्ण गोपाळ विरुद्ध स्टेट ऑफ एम पी
४.धनलाल विरुद्ध आय जी पोलीस बिहार


9. संसदेच्या कामकाजाच्या भाषेबाबत कोणते विधान खरे आहे?
अ)संसदेचे कामकाज हिंदीतून चालवण्यात येते
ब)संसदेचे कामकाज हिंदीतून किंवा इंग्रजीतून चालवण्यात येते
क)संविधानाच्या प्रारंभी संसदेचे कामकाज हिंदीतून किंवा इंग्रजीतून चालवता येत होते
ड)सभापती/अध्यक्ष त्यांच्या अनुज्ञेने सदस्य आपल्या मातृभाषेत भाषण करू शकतो
१.अ, क
२.ब, ड
३.फक्त ब
४.फक्त अ✅

10. खलील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे?
अ)आतापावेतो नियमित राष्ट्रपती म्हणून डॉ झाकीर हुसेन यांचा कार्यकाल सर्वात कमी राहिला
ब)डॉ झाकीर हुसेन व श्री फकरुद्दीन हेच दोघे केवळ त्यांचा राष्ट्रपती म्हणून त्यांचा कार्यकाल पूर्ण करू शकले नाहीत
१.फक्त अ
२.फक्त ब✅
३.दोन्ही नाही
४.दोन्हीही

1.विधानसभेचा सदस्य होण्यासाठी वयाची किती वर्षे पूर्ण लागतात?
1. 30 वर्षे
2. 21 वर्षे
3. 25 वर्षे✅
4. 18 वर्षे

2.कोणाच्या शिफारशिशिवाय धनविधेयक विधानसभेत मांडता येत नाही?
1. मुख्यमंत्री
2. राज्यपाल✅
3. राष्ट्रपती
4. यापैकी नाही

3. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात?
1. पंतप्रधान व मुख्यमंत्री
2. राज्यपाल✅
3. राष्ट्रपती
4. मुख्य न्यायमूर्ती

4.जिल्ह्यातील महसूल प्रशाशनाचे प्रमुख कोण असतात?
1. तहसीलदार
2. जिल्हाधिकारी✅
3. आयुक्त
4. उपजिल्हाधिकारी
  

5. महाराष्ट्रात पंचायतराज व्यवस्था कधी पासून अमलात आणली?
1. १ मे १९६०
2. १ मे १९६१
3.  १ मे १९६२✅
4.  १ मे १९६४

6. 4G Wi= Fi   (वाय - फाय) सेवा देणारी देशातील पहिली नगरपरिषद कोणती? 
1. अकलूज
2. इस्लामपूर✅
3. मिरज
4. सांगली

7. भारतात महिलांसाठी .......... जागा राखीव आहेत 
1. लोकसभा
2. पंचायतराज संस्था
3. राज्य विधिमंडले
4. यापैकी nahi✅

8. ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी सदस्यांची संख्या किती? 
1.पाच
2. सात✅
3. नऊ
4. अकरा

9. तलाठ्याच्या कार्यालयास काय म्हणतात?
1. चावडी
2. पार
3.दफ्तर
4. सजा✅

10. कोतवालाची नेमणूक खालीलपैकी कोण करतो?
1. तहसीलदार✅
2. उपविभागीय अधिकारी
3. जिल्हाधिकारी
4. विभागीय अधिकारी

1.भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्ट चारमध्ये कशाचा समावेश आहे?
1. राज्यसभेत राज्याचे व केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व ✅
2. राष्ट्रपती , पंतप्रधान वगैरे यांचे वेतन व भत्ते
3. राष्ट्रपती , मंत्री, न्यायाधीश वगैरे यांनी घ्यायवायच्या शपथा
4. यापैकी नाही

2.विधेयक वित्त विधेयक आहे का नाही असा प्रश्न उदभवल्यास अंतिम निर्णय कोणाचा असतो?
1. राष्ट्रपती
2. उपराष्ट्रपती
3. लोकसभेचे सभापाती✅
4. पंतप्रधान

3. भारतीय घटनेच्या अनुच्छेद 312 अनुसार भारतात किती अखिल भारतीय सेवा गठीत करण्यात आल्या आहेत?
1. चौदा
2. दोन
3. तीन✅
4. सोळा

4. भारतीय संविधानाच्या १९(१) व्या कलमात खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा विशेषत्वाने समावेश नाही?
1. भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य
2. मुद्रण स्वातंत्र्य
3. भरताचया राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार स्वातंत्र्यं 
4. विनाशस्त्र व शांततेने सर्वत्र मुक्तपणे संचार स्वातंत्र्य✅

5.राज्यघटनेने खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य जर्मनीच्या वायमर राज्यघटने कडून स्वीकारले आहे?
1.केंद्रसत्ता प्रबळ असलेल्या संघराज्याची संकल्पना
2.राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत
3.प्रजासत्ताक आणि न्यायाची संकल्पना
4.राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकारा संबंधित तरतुदी✅

6. भारत हे गणराज्य आहे याचा अर्थ..
अ)येथे लोकशाही आहे
ब)राष्ट्रपती लोकांनी अप्रत्यक्षपणे निवडून दिलेला असतो
क)येथे संसदीय पद्धती आहे
ड)पंतप्रधान व त्याचे मंत्रिमंडळ लोकांनी निवडून दिलेले असते
1.अ फक्त
2.अ व ब
3.ब फक्त✅
4.क व ड 

7. भारतीय राज्यघटनेच्या कलम......मधील तरतुदीनुसार, मानवी वाहतूक आणि भिक्षेगीरी किंवा या सारखी कोणतीही सक्तीची मजुरी हे मूलभूत हक्कांचे उल्लंघन आहे व शिक्षेस पत्र असेल.
1.२१
2.२२
३.२३✅
4.२४

8. राष्ट्रपती निवडणूक २०१७ बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
1.विधानसभा सदस्यांच्या मताचे मूल्य हे त्याच्या राज्याच्या लोकसंख्येवर अवलंबून असते
2.संसद सदस्यांच्या मताचे मूल्य हे सर्वांच्या सारखेच असते
3.उत्तम प्रदेश विधानसभा सदस्यांच्या प्रत्येक मताचे मूल्य सर्वाधिक होते
4.गोवा विधानसभा सदस्यांच्या प्रत्येक मताचे मूल्य सर्वात कमी होते✅

9.भारताच्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधानपरिषद अस्तित्वात आहे?
अ)बिहार
ब)कर्नाटक
क)तेलंगणा
ड)मध्यप्रदेश
1.अ, ब, क✅
2.अ, ब, ड
3.ब, क, ड
4.अ, क, ड

10. राज्य निर्मितीचा क्रम चढत्या श्रेणीने लावा.
अ)हरियाणा
ब)मेघालय
क)तेलंगणा
ड)झारखंड
इ)गुजरात
1.इ, अ, ब, ड, क✅
2.अ, इ, ब, ड, क
3.ब, अ, इ, ड, क
4.इ, ब, अ, ड, क


1. भारतीय राज्यघटनेत नागरिकांची खालीलपैकी कोणती मूलभूत कर्तव्ये नेमून दिली आहेत?
अ)सामाजिक अन्यायापासून दुरबल घटकांचे संरक्षण करणे
ब)व्यक्तिगत आणि सामूहिक अशा प्रत्तेक क्षेत्रात उच्चतम पातळी गाठणे
क)सार्वजनिक निवडणुकांमध्ये मतदान करणे
ड)शास्त्रीय वृत्ती विकसित करणे
1.अ, ब
2.क, ड
3.अ, ब, क
4.ब, ड✅

2. भारतीय राज्यघटनेच्या सारनाम्या बाबत खालील विधाने विचारात घ्या.
अ)सर्वनामा हा घटनेचा अविभाज्य अंग आहे
ब)सारनाम्यातील तरतुदी या न्यायालयाद्वारे अमलात आणता येतात
क)सारनामा हा विधिमंडळाच्या अधिकाराचे स्रोत म्हणून कार्य करू शकतो
1.अ✅
2.क
3.ब, क
4.अ, ब, क

3. अनुच्छेद 12 नुसार 'राज्य' मध्ये याचा समावेश होतो.
अ)भारताचे शासन व संसद
ब)प्रत्येक राज्याचे शासन व विधिमंडळा
क)सर्व स्थानिक संस्था(नगरपालिका, जिल्हा बोर्ड)
ड)भारतीय शासनाच्या नियंत्रणाखालील संस्था
1.अ, ब, ड
2.अ, ब, क
3.अ, ब
4. वरील सर्व✅

4. खालीलपैकी कोणत्या बाबींच्या आधारावर उत्प्रेशन रीट याचिका दाखल करता येत नाही.
1.जेथे अधिकारक्षेत्र वापरण्यात चूक/गफलत झाली असेल
2.जेथे कायद्याची चूक/गल्लत झाली असेल
3.जेथे प्रथमदर्शनी तथ्यांची चूक/गल्लत झाली असेल✅
4.जेथे नैसर्गिक न्यायत्वाचा भंग झाला असेल

5. 'शुन्य प्रहर' बाबत खलील विधाने विचारात घ्या.
अ)प्रश्नोत्तराच्या तासानंतर तो असतो
ब)त्याचा उल्लेख कामकाज पद्धतीच्या नियमांमध्ये आहे
क)सांसदीय कार्यप्रणालीतील भारतातील हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे
ड)कोणतीही पूर्वसूचना न देता लोकहिताचा कोणताही मुद्दा शून्य प्रहरात उपस्थित करण्यास सदस्य स्वतंत्र असतात
1.अ, ब, क
2.अ, क, ड✅
3.ब, क, ड
4.अ, ब, ड

6. खालीलपैकी कोणते केंद्रीय कार्यकारणी विभागाचे अंग आहेत?
अ)राष्ट्रपती
ब)मंत्रिमंडळ
क)महन्यायवादी
ड)भारताचा नियंत्रक व महालेखपरिक्षक
1.अ, ब, ड
2.ब, क, ड
3.अ, ब, क✅
4.अ, क, ड

7. खालीलपैकी कोणत्या मान्यवरास पद्ग्रहन करण्यापूर्वी भारतीय राज्यघटनेचे रक्षण करण्याची शपथ घ्यावी लागते?
अ)राष्ट्रपती
ब)उपराष्ट्रपती
क)पंतप्रधान
ड)लोकसभा सभापती
1.अ फक्त✅
2.अ, ब
3.अ, ब, क
4.अ, ब, क, ड

8. भारताचे स्वतंत्र आणि अखंडता टिकून ठेवण्यासाठी घटनाकारांनी भारतीय संघराज्यात.
अ)केंद्राला अधिक अधिकार दिले आहेत
ब)घटकराज्याना अधिक अधिकार दिले आहेत
क)राष्ट्रपतींना अधिक अधिकार दिले आहेत
ड)मुख्यमंत्र्यांना अधिक अधिकार दिले आहेत
1.अ फक्त✅
2.ब फक्त
3.ब, क
4.क, ड

9. सर्वोच्च न्यायालयाचे स्वातंत्र्य खलील मुद्द्याद्वारे अधोरेखित होते.
अ)अवमान झाल्यास दंड देण्याचा अधिकार
ब)न्यायालयाच्या कर्मचारी, वर्गाची भरती व नियुक्ती
क)कार्यकाळाची सुरक्षितता
ड)न्यायाधीशांची नियुक्ती व पदच्युती संबंधि संविधानिक तरतुदी
1.अ, ब, क
2.ब, क, ड
3.अ, ब, ड
4.वरील सर्व✅

10. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या तरतुदी न्यायालयाच्या स्वतंत्रेशी संबंधित आहे?
अ)न्यायधीशाची नियुक्ती व पदच्युती
ब)कार्यकाळाची सुरक्षा
क)वेतन व सेवा शर्ती
ड)न्यायालयास अवमानाबाबत शिक्षा देण्याचा अधिकार 
1.अ, ब, क
2.अ, ब, ड
3.ब, क, ड
4.वरील सर्व✅

१) कोणत्या खटल्यान्वये सर्वोच्च न्यायालयाने कलम ३६८ नुसार घटनेच्या मूलभूत गाभ्याला धक्का न लावता घटनेच्या कोणत्याही भागात दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेला असल्याचे मान्य केले?
१) केशवानंद भारती ✅  
२) गोलकनाथ   
 ३) सज्जन सिंग   
 ४) शंकरी प्रसाद

२) भारतीय नागरिकाचे कोणते मूलभूत कर्तव्य नाही?
१) देशाचे संरक्षण करणे  
२) नियमित कर भरणे  ✅ 
 ३) सहा ते १४ वर्षा दरम्यानचे अपत्य किंवा पाल्य यांस शिक्षणाच्या संधी देणे  
 ४) वरील एकही पर्याय योग्य नाही.

३) कोणत्या खटल्याचा परिणाम म्हणून संसदेने २४ वी घटना दुरुस्ती कायदा संमत केला?
१) गोलकनाथ खटला  
२) मिनर्व्हा मिल्स खटला
३) केशवानंद भारती खटला ✅
४) शकरी प्रसाद खटला

४) नागरिकांना भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र __ लाभावी यासाठी राज्य प्रयत्नशील राहील.
१) सुखशांती 
२) एकरुप नागरी संहिता  ✅ 
३) एकरुप ज्ञान संहिता    
४) विविध भाषा संहिता

५) "भारताची ____, एकता व _ उन्नत ठेवणे व त्यांचे संरक्षण करणे" हे भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे.
१) अस्मिता, एकात्मिकता
२) सार्वभौमता, एकात्मता 
३) सुरक्षा, एकात्मता ✅
४) सार्वभौमता, विविधता

६) भारतीय नागरिकत्व रद्द करण्यासंबंधातील खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही?
१) फसवणूक करून, खोटी माहिती दर्शवून किंवा वस्तुस्थिती लपवून नागरिकत्व मिळवले असेल.
२) कृतीतून वा भाषणातून राज्य घटनेशी बेइमानी किंवा द्रोह केला असेल.
३) भारताशी शत्रुत्व किंवा युध्द करण्याऱ्या राष्ट्राला मदत केली असेल.
४) भारताबाहेर सलग पाच वर्षे वास्तव्य केल्यास.✅

७) "राज्य हे देशाच्या पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील राहील" हे मार्गदर्शक तत्त्व कोणत्या घटनादुरुस्तीन्वये भारतीय संविधानात समाविष्ट करण्यात आले आहे?
१) ६९   
२) ४२  ✅ 
३) ४४  
४) ४८ 

८) भारताच्या संविधानाची तत्त्वे / सिद्धांत निर्धारित करण्यासाठी १९ मे १९२८ रोजी मुंबईमध्ये संपन्न सर्वपक्षीय अधिवेशनात कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली?
१) सचिदानंद सिन्हा 
२) डॉ. राजेंद्र प्रसाद 
३) प. मोतीलाल नेहरू✅ 
४) प. जवाहरलाल नेहरू

९) ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापारविषयक मक्तेदारी कोणत्या कायद्यान्वये संपुष्टात आली?
१) १७९३ चा सनदी कायदा 
२) १८१३ चा सनदी कायदा    ✅
३) १७७३ चा नियमनाचा कायदा 
४) १८५८ चा भारताच्या सुशासनाचा कायदा

१०) भारताच्या संविधानात नमूद केलेली मूलभूत कर्तव्ये किती आहेत?
१) ११✅    
२) १२        
३) १०     
४) 1


१) कोणत्या खटल्यान्वये सर्वोच्च न्यायालयाने कलम ३६८ नुसार घटनेच्या मूलभूत गाभ्याला धक्का न लावता घटनेच्या कोणत्याही भागात दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेला असल्याचे मान्य केले?
१) केशवानंद भारती ✅  
२) गोलकनाथ    
३) सज्जन सिंग    
४) शंकरी प्रसाद

२) भारतीय नागरिकाचे कोणते मूलभूत कर्तव्य नाही?
१) देशाचे संरक्षण करणे    
२) नियमित कर भरणे  ✅  
३) सहा ते १४ वर्षा दरम्यानचे अपत्य किंवा पाल्य यांस शिक्षणाच्या संधी देणे   
४) वरील एकही पर्याय योग्य नाही.

३) कोणत्या खटल्याचा परिणाम म्हणून संसदेने २४ वी घटना दुरुस्ती कायदा संमत केला?
१) गोलकनाथ खटला  
२) मिनर्व्हा मिल्स खटला  
३) केशवानंद भारती खटला ✅ 
४) शकरी प्रसाद खटला

४) नागरिकांना भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र __ लाभावी यासाठी राज्य प्रयत्नशील राहील.
१) सुखशांती   
२) एकरुप नागरी संहिता  ✅ 
३) एकरुप ज्ञान संहिता    
४) विविध भाषा संहिता

५) "भारताची ____, एकता व _ उन्नत ठेवणे व त्यांचे संरक्षण करणे" हे भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे.
१) अस्मिता, एकात्मिकता 
२) सार्वभौमता, एकात्मता 
३) सुरक्षा, एकात्मता ✅
४) सार्वभौमता, विविधता

६) भारतीय नागरिकत्व रद्द करण्यासंबंधातील खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही?
१) फसवणूक करून, खोटी माहिती दर्शवून किंवा वस्तुस्थिती लपवून नागरिकत्व मिळवले असेल.
२) कृतीतून वा भाषणातून राज्य घटनेशी बेइमानी किंवा द्रोह केला असेल.
३) भारताशी शत्रुत्व किंवा युध्द करण्याऱ्या राष्ट्राला मदत केली असेल.
४) भारताबाहेर सलग पाच वर्षे वास्तव्य केल्यास.✅

७) "राज्य हे देशाच्या पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील राहील" हे मार्गदर्शक तत्त्व कोणत्या घटनादुरुस्तीन्वये भारतीय संविधानात समाविष्ट करण्यात आले आहे?
१) ६९     
२) ४२  ✅   
३) ४४     
४) ४८ 

८) भारताच्या संविधानाची तत्त्वे / सिद्धांत निर्धारित करण्यासाठी १९ मे १९२८ रोजी मुंबईमध्ये संपन्न सर्वपक्षीय अधिवेशनात कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली?
१) सचिदानंद सिन्हा    
२) डॉ. राजेंद्र प्रसाद   
३) प. मोतीलाल नेहरू✅   
४) प. जवाहरलाल नेहरू

९) ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापारविषयक मक्तेदारी कोणत्या कायद्यान्वये संपुष्टात आली?
१) १७९३ चा सनदी कायदा    
२) १८१३ चा सनदी कायदा    ✅
३) १७७३ चा नियमनाचा कायदा    
४) १८५८ चा भारताच्या सुशासनाचा कायदा

१०) भारताच्या संविधानात नमूद केलेली मूलभूत कर्तव्ये किती आहेत?
१) ११✅    
२) १२        
३) १०     
४) 1


१) खालीलपैकी कोणती समिती निवडणुका सुधारनांशी संबंधित नाही ?
अ) संथानाम समिती ✅
ब) वांछू व गोस्वामी समिती 
क) तारकुंडे समिती 
ड) गोपालकृष्णन समिती 


२) राष्टीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?
अ) पाच वर्षे✅
ब) सहा वर्षे 
क) तीन वर्षे
ड) दोन वर्षे

३) राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी कुणाची नियुक्ती होते ?
अ) उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश
ब) सर्वोच्य न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश
क) उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश
ड) सर्वोच्य न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश✅


४) आचारसंहिता तयार करण्याचे काम कोण करते ?
अ) केंद्र सरकार
ब) राज्य सरकार
क) जिल्हाधिकारी
ड) निवडणूक आयोग✅


५) कलम १६९ नुसार विधानपरिषदेची निर्मिती करण्याचा अधिकार कुणाला असतो ?
अ) केंद्र
ब) राज्य✅
क) दोन्ही
ड) यापैकी नाही

6) भारतात वृत्तपत्र स्वतंत्र चा हक्क कोणी दिला आहे?
१.प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया
२.भारतीय राज्यघटना✅
३.माहिती व प्रसारण मंत्रालय
४.प्रेस कोन्सिल ऑफ इंडिया

7) विधानपरिषदेची सदस्य संख्या विधानपरिषडेच्या सदरस्य संख्येच्या किती पट असते?
१.२/३
२.१/४
३.१/३✅
४.३/४

8.खालीलपैकी नियोजन आयोगाचा अध्यक्ष कोण असतो?
१. नियोजन मंत्री
२.वित्तमंत्री
३.पंतप्रधान✅
४.राष्ट्रपती

9. केंद्र राज्य आर्थिक संसाधनांची विभागणी करणेबाबत शिफारस कोण करते?
१.राष्ट्रीय विकास परिषद
२.आंतरराज्य परिषद
३.नियोजन आयोग
४.वित्त आयोग✅

10. संस्थानांच्या विलीनीकरणाबाबत सर्वात महत्वाची भूमिका कोणी बजावली?
१.जवाहरलाल नेहरू
२.सरदार पटेल✅
३.महात्मा गांधी
४.मोतीलाल नेहरू


1.संविधानाच्या कुठल्या कलमांतर्गत लोकसभा आणि राज्य विधान सभा निवडणुका प्रौढ मताधिकाराने होणे नमूद केले गेले आहे?

१.322
२.324
३.326✅
४.329


2. SC-ST करिता विशेष तरतुदी संदर्भात असणाऱ्या यादीत कोणत्या जातीला समाविष्ट करायचे हा अंतिम अधिकार कोणाचा आहे?
१. संसद✅
२.राज्याचे राज्यपाल
३.राष्ट्रपती
४. सर्वोच्च न्यायालय


3.खालील विधानांचा विचार करा.
अ. लोकशाही समाजवादी प्रणालीमध्ये सार्वजनिक क्षेत्र व खाजगी क्षेत्र यांचे सहअस्तित्व असते.
ब. भारतीय समाजवाद हा मार्क्सवाद व गांधीवाद यांचा मिलाफ आहे.
क. भारतीय समाजवाद मार्क्सवादी समाजवादाकडे अधिक झुकलेला दिसतो.
ड. 1991 च्या 'उखाजा' धोरणामुळे भारताची समाजवादी ओळख कमी झाली आहे.

वरील विधानांतून योग्य विधाने ओळखा.
१.अ,ब,क,ड
२.अ,ब,ड✅
३.अ,क,ड
४.ब,क,ड

4.भारतीय राज्यघटना सरनाम्यातील सामाजिक , आर्थिक व राजकीय न्यायाचे आदर्श नमूद केले आहेत. 

या तिन्ही प्रकारांचे मूळ स्रोत कोणते?
१.फ्रेंच राज्यक्रांती 1789
२.रशियन राज्यक्रांती 1917✅
३.जर्मनी (वायमर संविधान)
४.जपान संविधान

5. आंतरराष्ट्रीय न्यायालयात नियुक्त झालेले प्रथम भारतीय न्यायाधीश कोण होते?

१.डॉ नागेन्द्र सिंह✅
२.जी. वी. माळवणकर
३.जगदीश चंद्र बसु
४.आर. के. नारायण

6. नागरिकत्व मिळवणे व गमावणे याबाबत आणि नागरिकत्वासंबंधी इतर कोणत्याही विषयाबाबत तरतुदी करण्याचा संसदेचा अधिकार राज्यघटनेच्या कितव्या कलमात नमूद केलेला आहे?
१.कलम 11✅
२.कलम 10
३.कलम 9
४.कलम 8

7. परदेशस्थित भारतीय नागरिक कार्डधारक(OCI) व्यक्तीस भारतीय नागरिकत्व प्राप्तीसाठी अर्ज नोंदणीपूर्वी किती दिवस भारतीय वास्तव्य आवश्यक आहे?
१.12 महिने
२.3 वर्ष
३.5 वर्ष✅
४.7 वर्ष

8. भारतात प्रशासकीय न्यायाधिकरण स्थापन करण्याचा अधिकार कोणाला दिला आहे?
१.राष्ट्रपती
२.पंतप्रधान
३.सर्वोच्च न्यायालय
४.संसद✅

9. मूलभूत हक्क अंमलबजावणीसाठी कायदे करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला आहेत?
१.केंद्रीय मंत्रिमंडळ
२.संसद✅
३.राज्य विधिमंडळ
४.संसद आणि राज्य विधिमंडळ

10. खालील विधानांचा विचार करा.

अ. कलम 19 अन्वये प्रदान करण्यात आलेले हक्क राज्यांच्या कारवाईपासून संरक्षित आहेत.
ब. कलम 19 अन्वये प्रदान करण्यात आलेले हक्क खासगी व्यक्तीपासून संरक्षित नाहीत.
क. कलम 19 मधील हक्क भारतीय नागरिक व कम्पनी भागधारकांना लागू आहेत.
ड. कलम 19 मधील हक्क परकीय नागरिक किंवा निगम/कम्पनी यांना लागू नाहीत.
पर्याय
१.अ,ब,क,ड✅
२.अ,ब,क
३.ब,क,ड
४.अ,ब,ड


1. भारतीय राज्यघटनेच्या ----- कलमानुसार स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे?

१.19 ते 22✅
२.31 ते 35
३.22 ते 24
४.31 ते 51

2. राज्यसभेचे सभापती आपला राजीनामा ----- यांच्याकडे सादर करतात.

१.राष्ट्रपती✅
२.उपराष्ट्रपती
३.पंतप्रधान
४.राज्यपाल

3. सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायधिशांची नेमणूक ----- करतात?

१.राष्ट्रपती
२ राज्यपाल
३.पंतप्रधान
४.सरन्यायाधिशांच्या सल्ल्याने राष्ट्रपती✅


4. ----- रोजी पंडित नेहरूंची घटनेची उद्देशपत्रिका/प्रस्तावना लिहिली?

१.11 डिसेंबर 1946✅
२.29 ऑगस्ट 1947
३.10 जानेवारी 1947
४.9 डिसेंबर 1946


5. भारतीय राज्यघटेनेच्या ----- परीशिष्टात विविध शपथ व नमुने दिलेले आहेत.

१.परिशिष्ट-1
२.परिशिष्ट-2
३.परिशिष्ट-3✅
४.परिशिष्ट-4

6. सध्या समावर्ती सूचीमध्ये ----- विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे.

१.47✅
२.48
३.52
४.यापैकी नाही


7. भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?

१.डॉ. आंबेडकर
२.डॉ. राजेंद्रप्रसाद✅
३.पंडित नेहरू
४.लॉर्ड माऊंटबॅटन


8. घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?

१.डॉ. राजेंद्रप्रसाद
२.डॉ. आंबेडकर✅
३.महात्मा गांधी
४.पंडित नेहरू


9. खालीलपैकी संसदेचे स्थायी सभागृह कोणते?

१.लोकसभा
२.विधानसभा
३.राज्यसभा✅
४.विधानपरिषद

10. लोकसभापतीची निवड कोण करतो/करते?

१. लोकसभा सदस्य✅
२.मंत्रीमंडळ
३. राज्यसभा सदस्य
४. राष्ट्रपती

1. भारतासाठी संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम कोणी मांडली?
१. महात्मा गांधी
२. मानवेंद्र नाथ रॉय✅
३. डॉ बाबासाहेब आंबेडकर
४. जवाहरलाल नेहरू

2. संविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्ष पदी कोणाची निवड केली होती?
१. डॉ राजेंद्र प्रसाद
२. एच सी मुखर्जी
३. डॉ सच्चीदानंद सिन्हा✅
४. पं मोतीलाल नेहरू

3. मूलभूत उप हक्क समिती चे अध्यक्ष कोण होते?
१. एच सी मुखर्जी
२. के एम मुन्शी 
३. वल्लभभाई पटेल
४. जे बी कृपलानी✅

4. कलम नं.....मध्ये भारताचे वर्णन 'राज्यांचा संघ' असे करण्यात आले आहे.
१. कलम न 1✅
२. कलम न 2
३. कलम न 3
४. कलम न 4

5. 'एकेरी नागरिकत्व' ची पद्धत भारताने कोणत्या घटने कडुन स्वीकारली आहे?
१. यु एस ए 
२. जपान
३.जर्मनी
४. ब्रिटिश✅

6. संविधान सभेचे उपअध्यक्ष म्हणून कोणाची निवड केली?
१. बी एन राव
२. जवाहरलाल नेहरू
३. के एम मुन्शी
४. एच सी मुखर्जी✅

7..... रोजी संविधान सभेने भारताचा राष्ट्रध्वज स्वीकृत केला.
१. २२ जुलै १९४७✅
२. १७ नोव्हेंबर १९४७
३. २४ जानेवारी १९५०
४. ४ नोव्हेंबर१९४८

8. 'उद्देश पत्रिका' ही कोणी मंडली होती?
१. डॉ बाबासाहेब आंबेडकर
२. पं मोतीलाल नेहरू
३. डॉ राजेंद्र प्रसाद
४. जवाहरलाल नेहरू✅

9. घटनेचा आमल.....पासून सुरू झाला.
१. २६/०१/१९५०✅
२. २६/११/१९४९
३. २६/०८/१९४७
४. ०४/११/१९४८

10. मसुदा समिती मध्ये खालीलपैकी कोण नव्हते?
१. डॉ के एम मुन्शी
२. एन गोपालस्वामी अय्यंगार
३. अल्लादि कृष्णस्वामी अय्यर
४. बी एन राव✅


1. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात समान नागरी कायद्याची तरतूद आहे?
१. ४४✅
२. ४८
३. ४६
४. ५०

2. घटनाकारांच्या मते भारतीय राज्यघटनेची गुरुकिल्ली म्हणजे.... हे होय.
१. घटनेचा मसुदा
२. मूलभूत अधिकार 
३. घटनेचा सरनामा ✅
४. मार्गदर्शक तत्त्वे

3. ११० वे घटनादुरुस्ती विधेयक कशाबाबत आहे?
१. संसद विधिमंडळात महिलांना 33 टक्के आरक्षण ✅
२. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण
३. लोकपाल 
४. लोकायुक्त

4. विधान परिषद सदस्यांशी संबंधित योग्य बाब खालीलपैकी कोणती?
१. विधान परिषदेतील काही सदस्य विधानसभा सदस्यांनी निवडलेले असतात✅
२. विधानपरिषदेतील प्रत्येक सभासद दर दोन वर्षांनी निवृत्त होतो 
३. विधान परिषदेतील काही सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती मार्फत होते
४. विधान परिषद सदस्यांचा कार्यकाल पाच वर्षांचा असतो

5. राष्ट्रीय सुरक्षा समितीचा प्रमुख कोण असतो?
१. गृहमंत्री
२. पंतप्रधान✅
३. राष्ट्रपती
४. उपराष्ट्रपती

5. भारतीय संसद महाराष्ट्र राज्य  विधिमंडळ यांची सभागृहे आणि त्यातील सदस्य संख्या यांच्या जोडीला योग्य पर्याय कोणता?
१. महाराष्ट्र विधानसभा - 278
२. महाराष्ट्र विधानपरिषद- 88
३. लोकसभा - 543
४.राज्यसभा - 250✅

6. खालीलपैकी घटनेत नमूद असलेले मूलभूत कर्तव्य ओळखा.
१. वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे✅
२. हुंडा पद्धती बंद करणे
३. निरक्षरता दूर करणे 
४.राष्ट्रीय नेत्यांचे मन राखणे

7. भारतीय घटनेचा सरनामा हा राज्यघटनेचा एक भाग आहे अशा स्वरूपाचा निर्णय.. ....या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे?
१. गोलकनाथ विरुद्ध पंजाब
२. मिनर्वा मिल्स लिमिटेड विरुद्ध भारत सरकार 
३.केशवानंद भारती विरुद्ध भारत सरकार ✅
४. विद्यावती विरुद्ध राजस्थान सरकार

8. राज्य घटनेच्या कोणत्या कलमानुसार बालकामगार ठेवण्यासाठी बंदी करण्यात आली आहे?
१. कलम 21 
२. कलम 23 
३. कलम 24 ✅
४. कलम 28

9. कोणत्या कलमानुसार संसद घटना दुरुस्ती करू शकते?
१. कलम 350
२. कलम 368✅
३. कलम 370 
४. कलम 360

10. खालील पैकी कोणत्या राज्याने नव्याने विधान परिषदेची स्थापना केली आहे?
१. महाराष्ट्र 
२. राजस्थान 
३. जम्मू कश्मीर 
४. आंध्र प्रदेश✅

1. ओबीसींना खासगी संस्थांमध्ये आरक्षण कोणत्या घटना दुरुस्तीने देण्यात आले?
१. 92 वी घटनादुरुस्ती 
२. 93 वी घटनादुरुस्ती✅
३. 94 घटनादुरुस्ती 
४. 95 वी घटनादुरुस्ती

2. महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री भूषवलेल्या मुख्यमंत्री कोण?
१. सुधाकरराव नाईक 
२. शरद पवार 
३. वसंतराव नाईक ✅
४. विलासराव देशमुख

3. महाभारतातील ग्रामव्यवस्थेचा ग्रामप्रमुख कोणत्या नावाने ओळखले जात असे?
१. ग्रामीणी
२. गावण्डा 
३. ग्रामीक ✅
४. ग्राममुकुटा 

4. रॉयल विकेंद्रीकरण आयोगाचे अध्यक्ष कोण होते?
१. लॉर्ड मेयो 
२. लॉर्ड रिपन 
३. हॉब हाऊस ✅
४. लोर्ड कॉर्नवॉलीस

5. ग्रामीण विकासाच्या विविध कार्यक्रमांना दिला जाणारा निधी कोणामार्फत करण्याची शिफारस बलवंतराय मेहता समितीने केली?
१. पंचायत समिती ✅
२. जिल्हा परिषद 
३. तहसीलदार 
४. जिल्हाधिकारी

6. जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष नसावा अशी शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केली?
१. बोंगीरवार 
२.पी बी पाटील 
३. काटजू 
४. वसंतराव नाईक✅

7. सरपंचाचे ऐकून जागेपैकी किती टक्के जागा स्त्रियांसाठी राखीव असल्याची शिफारस बीबी पाटील समितीची होती?
१. 33%
२. २७%
३. २५%✅
४. ५०% 

8. ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार आढळल्यास त्या संबंधीचा ठराव ग्रामसभा कोणाकडे पाठविते?
१. पंचायत समिती
२. राज्य शासन
३. जिल्हा परिषदेची स्थायी समिती ✅
४. मुख्य कार्यकारी अधिकारी

9. सार्वजनिक निवडणुकांनंतर होणाऱ्या वित्तीय वर्षातील पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो?
१. तहसीलदार
२. गटविकास अधिकारी
३. उपजिल्हाधिकारी 
४. सरपंच✅

10. सरपंच अनुपस्थित असल्यास ग्राम सभेची बैठक बोलावण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे?
१. ग्रामसेवक
२. उपसरपंच✅
३. तहसीलदार 
४.जिल्हाधिकारी

1. भारत हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे कारण...
१. भारत हा समाजवादी देश आहे 
२. भरतात असंख्य धर्म आहेत
३. भारतात सर्व धर्माच्या नागरिकांना समान वागणूक आहे✅
४. भारतात धर्माला महत्त्व दिले जात नाही

2. राज्याच्या मार्गदर्शक तत्त्वात खालीलपैकी कशाचा समावेश होतो?
१. सामान्य व मोफत कायदेशीर मदत 
२. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा पालन 
३. ऐतिहासिक वस्तूंचे जतन
४. समान नागरी कायदा 
अ. फक्त ४
ब. १, २, ३
क. २, ३, ४
ड. १, २, ३, ४✅

3. जनमत हा कोणत्या प्रकारच्या  शासन व्यवस्थेचा अविभाज्य घटक आहे?
१. अप्रत्यक्ष लोकशाही 
२. नियंत्रित लोकशाही 
३. आनियंत्रित लोकशाही
४. प्रत्यक्ष लोकशाही✅

4. राष्ट्रध्वजातील अशोकचक्रा मध्ये किती आले आहेत?
१. 22 
२. 23 
३. 21 
४. 24✅

5. 'समाजवादी' आणि
 'धर्मनिरपेक्ष' हे दोन शब्द कोणत्या घटना दुरुस्तीने घटनेच्या प्रास्ताविकात समाविष्ट करण्यात आले?
१. 41व्या 
२. 42 व्या✅
३.44 व्या
४. 46 व्या

6. घटना समितीची निर्मिती कोणत्या योजनेच्या आधारे झाली?
१. सिमला परिषद 
२. कॅबिनेट मिशन ✅
३. क्रिप्स योजना 
४. ऑगस्ट प्रस्ताव

7. भारत हे गणराज्य आहे कारण..
१. देशाचा प्रमुख जनतेने निवडून दिला आहे ✅
२. भारत लोकशाही राष्ट्र आहे
३. अंतिम सत्ता लोकांच्या हाती आहे 
४. भारत राजेशाहीचा विरोध करतो

8. स्वातंत्र्य समता बंधुता या सरनाम यातील घोषणे मागच्या प्रेरणा कोणत्या आहेत?
१. रशियन राज्यक्रांती 
२. आयरिश राज्यक्रांती
३. अमेरिकेची राज्यक्रांती
४. फ्रान्सची राज्यक्रांती✅

9. घटनेच्या सरनाम्यातुन  खालील पैकी काय दिसून येते?
१. साध्य करावयाचे आदर्श
२. शासन व्यवस्था 
३. सत्तेचा स्त्रोत
अ. फक्त १
ब. फक्त २
क. १, २
ड. १, २, ३✅

10. घटनेच्या कोणत्या भागात घटनाकारांची भूमिका दिसून येते?
१. राज्यघटनेचा सरनामा✅
२.मार्गदर्शक तत्त्वे 
३. मूलभूत कर्तव्य
4. आणीबाणीच्या तरतुदी

२६ एप्रिल २०२६

भारतीय संविधानाच्या अनुसूच्यां आणि त्यांचे विषय

⭐️पहिली अनुसूची...

   विषय - राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची यादी


⭐️ दुसरी अनुसूची...

   विषय -  वेतन पदाधिकाऱ्यांचे तरतूद


⭐️ तिसरी अनुसूची...

   विषय - शपथ किंवा प्रतिज्ञेचे प्रकार


⭐️ चौथी अनुसूची...

   विषय - राज्य परिषदेत जागांचे वाटप


⭐️पाचवी अनुसूची...

   विषय - अनुसूचित क्षेत्रे आणि अनुसूचित जमातींचे प्रशासन


⭐️ सहावी अनुसूची...

   विषय - आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिजोरम राज्यांतील जमातींच्या क्षेत्रांचे प्रशासन     


⭐️ सातवी अनुसूची...

   विषय - संघ सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची


⭐️सातवी अनुसूचीचे विषय ⭐️


⚡️राज्य सूची : 61 (मूळतः 66) 

पोलीस, तुरुंग, शेती, सिंचन, जन आरोग्य इत्यादी


⚡️समवर्ती सूची : 52 (मूळतः 47)

जलमार्ग, शिक्षण, वन, कारखाना, विवाह - घटस्फोट, वीज, आर्थिक नियोजन इत्यादी


⚡️ संघ सूची   : 100 (मूळतः 97) 

रक्षा, परराष्ट्र, डाक, तार, दूरध्वनी, रेल्वे, चलन बँकिंग इत्यादी


⭐️आठवी अनुसूची...

   विषय - मान्यताप्राप्त 22 भाषांची यादी


⭐️नववी अनुसूची...

   विषय - काही कायदे आणि नियमांची मान्यता


⭐️ दहावी अनुसूची...

   विषय - पक्षबदलाच्या आधारावर अयोग्यता


⭐️अकरावी अनुसूची...

   विषय - पंचायतांच्या शक्ती, अधिकार आणि जबाबदाऱ्या


⭐️ बाराावी अनुसूची...

   विषय - नगरपालिकांच्या शक्ती, अधिकार आणि जबाबदारी


चालू घडामोडी प्रश्नसंच

 1. प्रश्न: नुकतेच कोणत्या राज्यात ‘जागतिक बाघ दिन’ (Global Tiger Day) उत्साहात साजरा करण्यात आला?

उत्तर: महाराष्ट्र



2. प्रश्न: 2025 मध्ये कोणत्या देशात ‘ब्रिक्स’ परिषद होणार आहे?

उत्तर: रशिया



3. प्रश्न: अलीकडेच कोणत्या भारतीय खेळाडूने 100 मीटर शर्यतीत सुवर्ण पदक पटकावले?

उत्तर: जेस्विन ऑल्ड्रिन



4. प्रश्न: ‘ISRO’ ने नुकतेच कोणते उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केले?

उत्तर: RISAT-2BR2



5. प्रश्न: 'जल जीवन मिशन' योजनेंतर्गत केंद्र सरकारचे उद्दिष्ट काय आहे?

उत्तर: 2026 पर्यंत प्रत्येक घरात नळाने पाणी



6. प्रश्न: 2025 साली "राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार" कोणत्या दिवशी जाहीर होणार आहेत?

उत्तर: 5 सप्टेंबर



7. प्रश्न: ‘आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस’ कधी साजरा केला जातो?

उत्तर: 30 जुलै



8. प्रश्न: ‘हिमालयीन चेतना अभियान’ कोणत्या संस्थेच्या माध्यमातून सुरू करण्यात आले?

उत्तर: पर्यावरण मंत्रालय



9. प्रश्न: FIFA U-17 महिला विश्वचषक 2025 कोणत्या देशात होणार आहे?

उत्तर: कोलंबिया



10. प्रश्न: नुकतेच कोणता बँक मर्जर पूर्ण झाला आहे?

उत्तर: इंडियन बँक आणि IDBI बँक



11. प्रश्न: भारताच्या नवीन पर्यटन ब्रँड चे नाव काय ठेवण्यात आले आहे?

उत्तर: Incredible India 2.0



12. प्रश्न: 'गगनयान' मिशन कोणत्या वर्षी पूर्ण होण्याची शक्यता आहे?

उत्तर: 2025



13. प्रश्न: 2025 मधील 'स्मार्ट सिटी' योजनेत महाराष्ट्रातील किती शहरांचा समावेश आहे?

उत्तर: 10



14. प्रश्न: महाराष्ट्रातील नवीन मुख्यमंत्री कोण आहेत?

उत्तर: एकनाथ शिंदे



15. प्रश्न: 'हॅकथॉन 5.0' कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाद्वारे आयोजित केला जात आहे?

उत्तर: शिक्षण मंत्रालय



16. प्रश्न: 2025 मध्ये कोणत्या भारतीय वैज्ञानिकाला ‘गणितात नोबेल’ (Fields Medal) मिळाले?

उत्तर: मनोज शर्मा



17. प्रश्न: 2025 मध्ये भारतीय रेल्वेने कोणती नवीन सेमी-हायस्पीड ट्रेन सुरू केली?

उत्तर: वंदे भारत एक्सप्रेस – वाराणसी ते पटना



18. प्रश्न: 'एक देश एक निवडणूक' प्रस्ताव कोणी मांडला आहे?

उत्तर: भारत सरकार



19. प्रश्न: नुकतीच कोणती योजना महिलांसाठी खास सुरू करण्यात आली?

उत्तर: ‘लक्ष्मी सुरक्षा योजना’



20. प्रश्न: चंद्रयान-3 ने कोणत्या दिवशी यशस्वीपणे चंद्रावर लँडिंग केले होते?

उत्तर: 23 ऑगस्ट 2023


1). अलीकडेच ओरिसाच्या 'गजपती' शासकांशी संबंधित मध्ययुगीन तेलगू शिलालेख कोठे सापडला आहे?

➠ आंध्र प्रदेश 


💯 स्पष्टीकरण: ओरिसाच्या गजपती राजांशी संबंधित असलेला एक ऐतिहासिक मध्ययुगीन तेलगू शिलालेख आंध्र प्रदेशात सापडला आहे. 


💯आंध्र प्रदेश हे फळे आणि केळीच्या उत्पादनात भारतात आघाडीवर आहे.

2) बँकॉक येथे आयोजित 'वर्ल्ड बॉक्सिंग फ्यूचर्स कप'मध्ये चंद्रिका पुजारी यांनी कोणते पदक जिंकले?

➠ सुवर्ण पदक (Gold Medal)


💯स्पष्टीकरण: चंद्रिका पुजारी यांनी बँकॉक येथे झालेल्या जागतिक बॉक्सिंग फ्युचर्स कपमध्ये चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे.


3) 'भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ' (SEBI) चे पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

➠ के. व्यंकट रमणामूर्ती 

💯स्पष्टीकरण: के. व्यंकट रमणामूर्ती यांची सेबी (SEBI) च्या पूर्णवेळ सदस्यपदी नियुक्ती झाली आहे.


4) स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने कोणत्या आयआयटीच्या (IIT) मदतीने 'साथी' (SATHI) ॲप विकसित केले आहे ?

➠ आयआयटी कानपूर


💯स्पष्टीकरण: शिक्षण मंत्रालयाने आयआयटी कानपूरच्या सहकार्याने 'साथी' पोर्टल/ॲप विकसित केले आहे, जेणेकरून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग आणि साहित्य मिळू शकेल.


5) 'इंडियन वेल्स २०२६' (Indian Wells 2026) टेनिस स्पर्धेचे महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले ?

➠ आर्यना साबालेका 


💯स्पष्टीकरण: आर्यना साबालेंका हिने महिला गटात विजेतेपद पटकावले, तर पुरुष गटात जेनिक सिनर याने विजेतेपद पटकावले आहे.

6) कोणत्या राज्याने आपल्या पहिल्या 'साउंडिंग रॉकेट'चे (Sounding Rocket) यशस्वी प्रक्षेपण केले आहे?

➠ गुजरात 


💯स्पष्टीकरण: गुजरात राज्याने आपल्या पहिल्या साउंडिंग रॉकेटची यशस्वी चाचणी केली आहे. गुजरातमध्ये 'गिर नॅशनल पार्क' असून ते आशियाई सिंहासाठी प्रसिद्ध आहे. तसेच, गुजरात हे नवीकरणीय ऊर्जा (Renewable Energy) क्षेत्रात १६.५% हिश्श्यासह भारताचे पॉवरहाऊस बनले आहे.



7)'ज्ञानपीठ सन्मान २०२५' (Jnanpith Award 2025) देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले आहे ?

➠ आर. वैरामुथू 

💯 स्पष्टीकरण: आर. वैरामुथू यांना २०२५ चा प्रतिष्ठित ज्ञानपीठ सन्मान मिळाला आहे. या व्यतिरिक्त चिरंजीवी यांना 'एनटीआर नॅशनल फिल्म अवॉर्ड' आणि अमोल पालेकर यांना 'मेटा लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड २०२६' देण्यात आला आहे. 


8) 'मतुआ धर्म मेळा' (Matua Dharma Mela) कोणत्या राज्यात आयोजित केला जात आहे ?

➠ पश्चिम बंगाल 


💯 स्पष्टीकरण: पश्चिम बंगालच्या 'उत्तर २४ परगणा' जिल्ह्यात हा वार्षिक उत्सव आयोजित केला जातो. पश्चिम बंगाल हे भारतातील तांदळाचे सर्वात मोठे उत्पादक राज्य आहे.


9) कासवाची 'ड्रॉविड वजानिया' (Drovid Vajania) ही नवीन प्रजाती कोणत्या राज्यात शोधली गेली आहे ?

➠ केरळ 


💯 स्पष्टीकरण: केरळमध्ये कासवाची ही नवीन प्रजाती सापडली आहे. केरळला 'नारळाची भूमी' म्हटले जाते, मात्र उत्पादनात कर्नाटक पुढे आहे. केरळ हे रबर आणि काळी मिरी उत्पादनात भारतात पहिल्या क्रमांकावर आहे. 


10)  'चीनी ग्रँड प्रिक्स' (Chinese Grand Prix) २०२६ चे विजेतेपद कोणी जिंकले ?

➠ किमी अँटोनेली 


💯 स्पष्टीकरण: किमी अँटोनेली यांनी नुकतेच पार पडलेले चीनी ग्रँड प्रिक्स जेतेपद आपल्या नावावर केले आहे.


💯 प्रकल्प: प्रोजेक्ट टायगर १९७३ मध्ये, प्रोजेक्ट एलिफंट १९९२ मध्ये आणि प्रोजेक्ट चिता २०२२ मध्ये सुरू झाले.


💯 आंध्र प्रदेशात 'प्रोजेक्ट हनुमान' सुरू करण्यात आला असून, अमरावतीमध्ये भारताचे पहिले 'क्वांटम आणि AI विद्यापीठ' स्थापन झाले आहे.


⭐️) मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदी कोणाची बिनविरोध निवड करण्यात आली आहे?


 शरद पवार


⭐️) नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?


 वीर विक्रम यादव


⭐️) चंद्राचे परिभ्रमण करणारे पहिले कृष्णवर्णीय अंतराळवीर कोण बनले आहेत?


 व्हिक्टर ग्लोव्हर


⭐️) एप्रिल 2026 च्या फिडे (FIDE) रँकिंगनुसार पहिल्या क्रमांकाची महिला बुद्धिबळपटू कोण बनली आहे जी भारतीय वंशाची आहे?


 बोधना शिवानंदन


⭐️) एशियन स्क्वॅश फेडरेशन (ASF) द्वारे 'मेन्स प्लेयर ऑफ द इयर 2025' या पुरस्काराने कोणत्या भारतीय खेळाडूला सन्मानित करण्यात आले?


 अभय सिंग


⭐️) प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीत कोणते राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आहे?


 महाराष्ट्र


⭐️) 'ऊर्जा सांख्यिकी भारत 2026' आकडेवारीनुसार भारतातील एकूण स्थापित नवीकरणीय ऊर्जा क्षमतेमध्ये कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे?


 गुजरात


⭐️) भारतातील पहिले 'पोर्ट ऑफ रिफ्यूज' कोणत्या कंपनीने विकसित केले आहे?


अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड


⭐️) पहिल्या खेलो इंडिया वनवासी स्पर्धेत कोणत्या राज्याने सर्वाधिक 23 पदके जिंकून पहिला क्रमांक पटकावला?


 कर्नाटक


⭐️) नागोया प्रोटोकॉल अंतर्गत आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त अनुपालन प्रमाणपत्र जारी करण्यात कोणता देश जगात पहिल्या क्रमांकावर आहे?


 भारत



२०२६ क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग

⭐️२०२६ च्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये ५४ भारतीय विद्यापीठांना स्थान देण्यात आले आहे, जे आतापर्यंतचे सर्वोच्च क्रमांक आहे.


⭐️ आयआयटी दिल्ली ही भारतातील सर्वोच्च क्रमांकाची संस्था आहे, ज्याने १२३ वे स्थान मिळवले आहे.


⭐️ एनटीयू सिंगापूर १२ व्या क्रमांकावर आहे आणि एकूणच जागतिक स्तरावर, मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) या यादीत अव्वल आहे.


⭐️ सर्वोच्च भारतीय संस्था ⭐️

➤ आयआयटी दिल्ली: १२३ वे (सर्वोत्तम कामगिरी)

➤ आयआयटी मुंबई: १२९ वे

➤ आयआयटी मद्रास: १८० वे

➤ आयआयटी खरगपूर: २१५ वे

➤ आयआयएससी बंगळुरू: २१९ वे


⭐️ जागतिक क्रमवारी ⭐️


➤ मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी): पहिले स्थान

➤ इम्पीरियल कॉलेज लंडन: दुसरे स्थान

➤ स्टॅनफोर्ड विद्यापीठ: तिसरे स्थान

➤ ऑक्सफर्ड विद्यापीठ: चौथे स्थान

➤ एनटीयू सिंगापूर: १२ वे स्थान


⚡️भारताबद्दल महत्त्वाची माहिती ⚡️


⭐️ ५४ भारतीय विद्यापीठांचा समावेश करण्यात आला आहे, ही एक ऐतिहासिक कामगिरी आहे.


⭐️ आयआयटी दिल्लीचे रँकिंग १२३ व्या स्थानावर पोहोचले आहे.


⭐️ जागतिक स्तरावर 'नोकरी निर्माण करणाऱ्या' टॉप १०० मध्ये एकूण ५ भारतीय संस्थांना स्थान देण्यात आले आहे.


⭐️ चंदीगड विद्यापीठ जागतिक स्तरावर ५७५ व्या आणि भारतात १६ व्या स्थानावर आहे.

चालू घडामोडी

 १. नेक्स्ट जनरेशन ऑफशोर पेट्रोल व्हेसल (NGOPV) कार्यक्रमांतर्गत कार्यान्वित झालेल्या पहिल्या स्वदेशी युद्धनौकेचे नाव काय आहे? – आयएनएस शाची


२. उत्तर भारतातील पहिला काचेचा पूल कोठे बांधला जाईल? – रोपर


३. कोणत्या देशाच्या अंतराळ संस्थेने चंद्रावर आर्टेमिस II ही मानवी मोहीम प्रक्षेपित केली? – अमेरिका


४. एप्रिल २०२६ मध्ये माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? – चंचल कुमार


५. उचराल न्याम-ओसर यांची नुकतीच कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे? – मंगोलिया


६. भारताच्या पहिल्या मानवी गगनयान मोहिमेतील अंतराळवीरांनी 'मिशन मित्र' कोठून प्रक्षेपित केले? – लडाख


७. ॲक्सेस नाऊच्या इंटरनेट शटडाउन रिपोर्ट २०२५ मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? – दुसरा


८. यूएस मेजर लीग क्रिकेटमध्ये सामील होणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे? – रविचंद्रन अश्विन


९. यामाहा म्युझिक इंडियाचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? – ए. आर. रहमान


१०. भारतातील पहिला स्वदेशी कोळशापासून अमोनियम नायट्रेट बनवणारा प्रकल्प कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आला? – ओडिशा


महाराष्ट्र भूगोल – Advanced / Deep Facts

🗺️ Location & Boundaries (Tricky) 🧭


महाराष्ट्राची सर्वात लांब सीमा → मध्यप्रदेशसोबत 🤝

सर्वात लहान सीमा → गोवा 📏

कर्कवृत्त (Tropic of Cancer) महाराष्ट्रातून जात नाही 🚫☀️


🏔️ Physiography (Deep Points) ⛰️


सह्याद्री पर्वतरांग ही block mountain प्रकारात मोडते 🏞️

सह्याद्रीची पश्चिम बाजू तीव्र (steep), पूर्व बाजू सौम्य (gentle slope) 📉📈

दख्खन पठार हे volcanic origin (Deccan Trap) आहे 🌋

Deccan Trap → basalt rock layers (step-like structure) 🪨



🌊 Rivers (Most Important Trap Area) 🏞️


Godavari River उगम → त्र्यंबकेश्वर (नाशिक) 🙏

गोदावरीची सर्वात मोठी उपनदी → प्राणहिता 🌊

Krishna River उगम → महाबळेश्वर 🏔️

कृष्णेची उपनदी → कोयना, पंचगंगा, भीमा 💧

Bhima River उगम → भीमाशंकर 🕉️

Tapi River उगम → सतपुडा (मध्यप्रदेश) 🌄

तापी नदी खोरे → Rift valley (भंग रेषा खोरे) 🕳️

👉 हा खूप विचारला जाणारा प्रश्न आहे ❓


🌧️ Climate (Analytical) 🌦️


ओरोग्राफिक पाऊस → सह्याद्रीमुळे कोकणात जास्त पाऊस 🌧️🏔️

सह्याद्रीच्या पाठीमागे → Rain Shadow Region (Marathwada, Vidarbha parts) ☀️

Loo वारे → विदर्भ भागात उन्हाळ्यात 🌬️🔥



🌱 Soil (Deep) 🟤


काळी माती → regur soil (lava weathering) 🌋🟤

काळी मातीची वैशिष्ट्ये →

पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त 💧

उन्हाळ्यात cracks (भेगा पडतात) 🦎

लेटराइट माती → high rainfall leaching process 🌧️🟠



🌾 Agriculture (Advanced) 🚜


कापूस → black soil + moderate rainfall 🌫️

तांदूळ → high rainfall (Konkan) 🌾

ज्वारी → dry farming (rain shadow) 🌾

ऊस → irrigation dependent crop 🍬💦



🌳 Forest & Wildlife 🐅


महाराष्ट्रात Tropical Deciduous Forest प्रमुख 🌳

Tadoba National Park → सर्वात जुना व प्रसिद्ध tiger reserve 🐅

Melghat Tiger Reserve → सातपुडा भागात 🏞️



⛏️ Minerals & Industry (Exam Trap) 🏭


चंद्रपूर → कोळसा + thermal power ⚡️

गडचिरोली → iron ore 🧱

भुसावळ → thermal power station 🔌

कोयना → largest hydroelectric project in Maharashtra 🌊⚡️


🌊 Coast & Ports (Important) ⚓️


महाराष्ट्र किनारपट्टी → approx. 720 km 📏

Mumbai Port → natural harbor ⛴️

JNPT Port → India’s largest container port 🚢


🔥 Super Important One-Liners (Revision) 📝


Deccan Trap = volcanic origin 🌋

Tapi basin = Rift valley 🕳️

Rain shadow → Marathwada ☀️

Highest rainfall → Konkan 🌧️

Black soil = Cotton 🌫️

Longest river → Godavari 🏞️

२३ एप्रिल २०२६

भारतातील विविध क्रांती (Agricultural Revolutions)


🚀 १. हरित क्रांती
📅 वर्ष: १९६६-६७
🌾 संदर्भ: अन्नधान्य पिके (गहू, तांदूळ)
👤 जनक: डॉ. एम. एस. स्वामीनाथन

⚪ २. धवल क्रांती
📅 वर्ष: १९७०-९६
🥛 संदर्भ: दुग्ध उत्पादन
👤 जनक: डॉ. वर्गीस कुरियन

🟡 ३. पीत क्रांती
📅 वर्ष: १९८६-९०
🌻 संदर्भ: तेलबिया उत्पादन
👤 जनक: सॅम पित्रोदा

🔵 ४. नील क्रांती
📅 वर्ष: १९७३-२००२
🐟 संदर्भ: मत्स्य उत्पादन
👤 जनक: डॉ. अरुण कृष्णन

🍎 ५. सुवर्ण क्रांती
📅 वर्ष: १९९१-२००३
🍯 संदर्भ: फलोत्पादन, मध, सफरचंद
👤 जनक: डॉ. निरपंख तुताज

🧶 ६. सोनेरी तंतू क्रांती
📅 वर्ष: १९९०
📜 संदर्भ: ताग उत्पादन

🥔 ७. गोल क्रांती
📅 वर्ष: १९६५-२००५
🥔 संदर्भ: बटाटा उत्पादन

⬛ ८. काळी क्रांती
⛽ संदर्भ: पेट्रोलियम उत्पादन

🔘 ९. करडी क्रांती
📅 वर्ष: १९६०-७०
🚜 संदर्भ: खत उत्पादन, लोकर उत्पादन

🥚 १०. चंदेरी क्रांती
📅 वर्ष: २०००
🐣 संदर्भ: अंडी उत्पादन, पोल्ट्री
👤 जनक: इंदिरा गांधी

🔴 ११. लाल क्रांती
📅 वर्ष: १९८०
🍅 संदर्भ: मांस व टोमॅटो उत्पादन
👤 जनक: विशाल तिवारी

🟤 १२. तपकिरी क्रांती
💼 संदर्भ: कोको, चामडे उत्पादन
👤 जनक: हिरालाल चौधरी

🌸 १३. गुलाबी क्रांती
📅 वर्ष: १९७०
🦐 संदर्भ: झिंगे, औषधे, कांदा उत्पादन
👤 जनक: दुर्गेश पटेल

🧵 १४. चंदेरी तंतू क्रांती
📅 वर्ष: २०००
☁️ संदर्भ: कापूस उत्पादन

💪 १५. प्रथिने क्रांती
📅 वर्ष: २०१४-२०
🚜 संदर्भ: कृषी (उच्च उत्पादन)
👤 जनक: नरेंद्र मोदी

🌿 १६. सदाहरित क्रांती
📅 वर्ष: २०१७-२०२२
🌾 संदर्भ: संपूर्ण कृषी क्षेत्र
👤 जनक: डॉ. एम. एस. स्वामीनाथन


65 वी घटनादुरुस्ती – 1990

⭐️65 वी घटनादुरुस्ती – 1990⭐️
⭐️उद्देश : OBC साठी स्वतंत्र आयोग तयार करणे

⭐️ मुख्य तरतुदी
राष्ट्रीय मागासवर्ग आयोग (NCBC) स्थापन केला.
➤ OBC मागासवर्गीयांच्या तक्रारी, शिफारसी, सर्वेक्षण, प्रतिनिधित्व यांचा अभ्यास.
➤ सरकारला धोरणात्मक सल्ला देण्याचे अधिकार.
➤ आयोगाला अर्ध-न्यायिक (quasi-judicial) स्वरूप.

⭐️महत्त्व
➤ प्रथमच OBC प्रश्नांसाठी औपचारिक आयोग तयार झाला.

⭐️89 वी घटनादुरुस्ती – 2003
🔶 उद्देश : SC/ST एकत्रित आयोग विभाजित करून दोन स्वतंत्र आयोग तयार करणे

⭐️मुख्य तरतुदी
➤ आधी एकच आयोग — SC/ST National Commission होता.
➤ ही दुरुस्ती करून दोन स्वतंत्र आयोग तयार केले:
राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग (NCSC)
राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग (NCST)
➤ ST प्रश्न स्वतंत्रपणे हाताळण्याची क्षमता वाढली.

⭐️अनुच्छेद
अनुच्छेद 338 – NCSC
अनुच्छेद 338A – NCST

⭐️महत्त्व
➤ SC आणि ST समुदायांच्या समस्यांना स्वतंत्र, लक्षवेधी संस्थात्मक प्रतिसाद.

⭐️102 वी घटनादुरुस्ती – 2018
⚡️उद्देश : OBC साठी असलेला NCBC आयोग पूर्ण घटनात्मक बनवणे

⭐️मुख्य तरतुदी
NCBC ला संविधानिक दर्जा मिळाला.
➤ संविधानात नवीन अनुच्छेद 338B घातला.
➤ NCBC आता SC/ST आयोगांप्रमाणेच अधिकारप्राप्त संस्था.
राष्ट्रीय OBC यादी तयार करण्याचा अधिकार केंद्र सरकारकडे गेला.
➤ आयोगाला तपास, चौकशी, शिफारसी या बाबतीत स्पष्ट अधिकार.

⭐️ महत्त्व
➤ OBC प्रश्नांना सर्वोच्च मान्यता; आयोग स्थायी, शक्तीशाली बनला.
✔ एकदम थोडक्यात सारांश
65 वी (1990) – OBC साठी NCBC स्थापन.
89 वी (2003) – SC/ST एकत्र आयोग विभाजित → NCSC आणि NCST निर्माण.
102 वी (2018) – OBC NCBC आयोगाला पूर्ण संविधानिक दर्जा + अनुच्छेद 338B.


चालू घडामोडी - एप्रिल 2026



१. ICC महिला T20 विश्वचषक २०२६ कोठे आयोजित केला जाईल ? 
– इंग्लंड आणि वेल्स

२. भारताच्या सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन प्लांटसाठी पहिल्या आर्थिक क्षेत्राला (SEZ) कोणत्या ठिकाणी मंजुरी देण्यात आली आहे ? 
– धोलेरा

३. भारतीय नौदलाच्या द्विवार्षिक कमांडर्स कॉन्फरन्स २०२६ ची पहिली आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली ? 
– नवी दिल्ली

४. सायप्रसमध्ये आयोजित विमेन्स कॅंडिडेट टूर्नामेंट २०२६ चे विजेतेपद कोणी जिंकले आहे ? 
– आर. वैशाली

५. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या राज्यात श्री गुरु भैरवैक्य मंदिराचे उद्घाटन करण्यात आले ? 
– कर्नाटक

६. अणू ऊर्जा आयोगाचे (AEC) अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? 
– अजित कुमार मोहंती

७. इस्माईल उमर गुएलेह यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे ? 
– जिबूती

८. आशियातील सर्वात उंच (एलिव्हेटेड) वन्यजीव कॉरिडॉरचे उद्घाटन कोणत्या देशात करण्यात आले ? 
– भारत

९. प्रतिभावान खेळाडूंच्या DNA मॅपिंगसाठी कोणत्या राज्यात 'स्पोर्ट्स जेनोमिक्स प्रोग्राम' सुरू करण्यात आला ? 
– गुजरात

१०. १७ एप्रिल २०२६ रोजी भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची कितवी पुण्यतिथी साजरी करण्यात आली ? 
– ५१ वी

चालू घडामोडी प्रश्नसंच व स्पष्टीकरण

1). अलीकडेच ओरिसाच्या 'गजपती' शासकांशी संबंधित मध्ययुगीन तेलगू शिलालेख कोठे सापडला आहे?
➠ आंध्र प्रदेश 

💯 स्पष्टीकरण: ओरिसाच्या गजपती राजांशी संबंधित असलेला एक ऐतिहासिक मध्ययुगीन तेलगू शिलालेख आंध्र प्रदेशात सापडला आहे. 

💯आंध्र प्रदेश हे फळे आणि केळीच्या उत्पादनात भारतात आघाडीवर आहे.
2) बँकॉक येथे आयोजित 'वर्ल्ड बॉक्सिंग फ्यूचर्स कप'मध्ये चंद्रिका पुजारी यांनी कोणते पदक जिंकले?
➠ सुवर्ण पदक (Gold Medal)

💯स्पष्टीकरण: चंद्रिका पुजारी यांनी बँकॉक येथे झालेल्या जागतिक बॉक्सिंग फ्युचर्स कपमध्ये चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे.

3) 'भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ' (SEBI) चे पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ के. व्यंकट रमणामूर्ती 
💯स्पष्टीकरण: के. व्यंकट रमणामूर्ती यांची सेबी (SEBI) च्या पूर्णवेळ सदस्यपदी नियुक्ती झाली आहे.

4) स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने कोणत्या आयआयटीच्या (IIT) मदतीने 'साथी' (SATHI) ॲप विकसित केले आहे ?
➠ आयआयटी कानपूर

💯स्पष्टीकरण: शिक्षण मंत्रालयाने आयआयटी कानपूरच्या सहकार्याने 'साथी' पोर्टल/ॲप विकसित केले आहे, जेणेकरून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग आणि साहित्य मिळू शकेल.

5) 'इंडियन वेल्स २०२६' (Indian Wells 2026) टेनिस स्पर्धेचे महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले ?
➠ आर्यना साबालेका 

💯स्पष्टीकरण: आर्यना साबालेंका हिने महिला गटात विजेतेपद पटकावले, तर पुरुष गटात जेनिक सिनर याने विजेतेपद पटकावले आहे.
6) कोणत्या राज्याने आपल्या पहिल्या 'साउंडिंग रॉकेट'चे (Sounding Rocket) यशस्वी प्रक्षेपण केले आहे?
➠ गुजरात 

💯स्पष्टीकरण: गुजरात राज्याने आपल्या पहिल्या साउंडिंग रॉकेटची यशस्वी चाचणी केली आहे. गुजरातमध्ये 'गिर नॅशनल पार्क' असून ते आशियाई सिंहासाठी प्रसिद्ध आहे. तसेच, गुजरात हे नवीकरणीय ऊर्जा (Renewable Energy) क्षेत्रात १६.५% हिश्श्यासह भारताचे पॉवरहाऊस बनले आहे.

7)'ज्ञानपीठ सन्मान २०२५' (Jnanpith Award 2025) देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले आहे ?
➠ आर. वैरामुथू 
💯 स्पष्टीकरण: आर. वैरामुथू यांना २०२५ चा प्रतिष्ठित ज्ञानपीठ सन्मान मिळाला आहे. या व्यतिरिक्त चिरंजीवी यांना 'एनटीआर नॅशनल फिल्म अवॉर्ड' आणि अमोल पालेकर यांना 'मेटा लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड २०२६' देण्यात आला आहे. 

8) 'मतुआ धर्म मेळा' (Matua Dharma Mela) कोणत्या राज्यात आयोजित केला जात आहे ?
➠ पश्चिम बंगाल 

💯 स्पष्टीकरण: पश्चिम बंगालच्या 'उत्तर २४ परगणा' जिल्ह्यात हा वार्षिक उत्सव आयोजित केला जातो. पश्चिम बंगाल हे भारतातील तांदळाचे सर्वात मोठे उत्पादक राज्य आहे.

9) कासवाची 'ड्रॉविड वजानिया' (Drovid Vajania) ही नवीन प्रजाती कोणत्या राज्यात शोधली गेली आहे ?
➠ केरळ 

💯 स्पष्टीकरण: केरळमध्ये कासवाची ही नवीन प्रजाती सापडली आहे. केरळला 'नारळाची भूमी' म्हटले जाते, मात्र उत्पादनात कर्नाटक पुढे आहे. केरळ हे रबर आणि काळी मिरी उत्पादनात भारतात पहिल्या क्रमांकावर आहे. 

10)  'चीनी ग्रँड प्रिक्स' (Chinese Grand Prix) २०२६ चे विजेतेपद कोणी जिंकले ?
➠ किमी अँटोनेली 

💯 स्पष्टीकरण: किमी अँटोनेली यांनी नुकतेच पार पडलेले चीनी ग्रँड प्रिक्स जेतेपद आपल्या नावावर केले आहे.

💯 प्रकल्प: प्रोजेक्ट टायगर १९७३ मध्ये, प्रोजेक्ट एलिफंट १९९२ मध्ये आणि प्रोजेक्ट चिता २०२२ मध्ये सुरू झाले.

💯 आंध्र प्रदेशात 'प्रोजेक्ट हनुमान' सुरू करण्यात आला असून, अमरावतीमध्ये भारताचे पहिले 'क्वांटम आणि AI विद्यापीठ' स्थापन झाले आहे.

     

१९ एप्रिल २०२६

चालू घडामोडी - एप्रिल 2026



१. ICC महिला T20 विश्वचषक २०२६ कोठे आयोजित केला जाईल ? 
– इंग्लंड आणि वेल्स

२. भारताच्या सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन प्लांटसाठी पहिल्या आर्थिक क्षेत्राला (SEZ) कोणत्या ठिकाणी मंजुरी देण्यात आली आहे ? 
– धोलेरा

३. भारतीय नौदलाच्या द्विवार्षिक कमांडर्स कॉन्फरन्स २०२६ ची पहिली आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली ? 
– नवी दिल्ली

४. सायप्रसमध्ये आयोजित विमेन्स कॅंडिडेट टूर्नामेंट २०२६ चे विजेतेपद कोणी जिंकले आहे ? 
– आर. वैशाली

५. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या राज्यात श्री गुरु भैरवैक्य मंदिराचे उद्घाटन करण्यात आले ? 
– कर्नाटक

६. अणू ऊर्जा आयोगाचे (AEC) अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? 
– अजित कुमार मोहंती

७. इस्माईल उमर गुएलेह यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे ? 
– जिबूती

८. आशियातील सर्वात उंच (एलिव्हेटेड) वन्यजीव कॉरिडॉरचे उद्घाटन कोणत्या देशात करण्यात आले ? 
– भारत

९. प्रतिभावान खेळाडूंच्या DNA मॅपिंगसाठी कोणत्या राज्यात 'स्पोर्ट्स जेनोमिक्स प्रोग्राम' सुरू करण्यात आला ? 
– गुजरात

१०. १७ एप्रिल २०२६ रोजी भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची कितवी पुण्यतिथी साजरी करण्यात आली ? 
– ५१ वी

१२ एप्रिल २०२६

कंबाईन Pre,Mains साठी या तारखा पाठच पाहिजे

✅👉 भारतीय इतिहास  ☑️

👉 फॉरवर्ड ब्लाक स्थापना 
→ 1 मे 1939

👉 कांग्रेस सोशलिस्ट पार्टी स्थापना 
→ मे 1934 

👉 तृतीय गोलमेज परिषद 
→ 17 नोव्हेंबर 1932

👉 पुणे करार 
→ सप्टेंबर 1932

👉 द्वितीय गोलमेज परिषद
→ 7 सप्टेंबर 1931

👉 गांधी-इरविन करार 
→ 8 मार्च 1931

👉 प्रथम गोलमेज परिषद
→ 12 नवंबर 1930

👉 सविनय कायदेभंग 
→ 6 एप्रिल 1930

👉 मीठाचा सत्याग्रह
→12 मार्च 1930 से 5 एप्रिल 1930

👉 स्वाधीनता दिवस की घोषणा
→ 2 जनवरी 1930 

👉 लाहौर पड्यंत्र केस
→ 8 अप्रैल 1929

👉 बारदौली सत्याग्रह
→ अक्टूबर 1928

👉 नेहरू रिपोर्ट
→ अगस्त 1928 

👉 साइमन कमीशनचे भारतात आगमन
→ 3 फेब्रुवारी 1928

👉 साइमन कमीशन ची निवड 
→ 8 नोव्हेंबर 1927

👉 हिंदुस्तान रिपब्लिकन एसोसिएशन
→ ऑक्टोबर 1924 

👉 स्वराज्य पार्टी ची स्थापना
→ 1 जानेवारी 1923 

👉 चौरी-चौरा कांड
→ 5 फेब्रुवारी 1922

👉 असहयोग आंदोलन ची सुरुवात 
→ 1 अगस्त 1920 

👉 कांग्रेस चे नागपुर अधिवेशन
→ डिसेंबर 1920 

👉 हंटर कमिशन चा रिपोर्ट प्रकाशित
→ 18 मे 1920

👉 खिलाफत आंदोलन
→ 1919

👉 जालियांवाला बाग हत्याकांड
→ 13 एप्रिल 1919

👉 रौलेट एक्ट
→ 19 मार्च 1919

👉 मांटेग्यू घोषणा
→ 20 ऑगस्ट 1917

👉 लखनऊ करार 
→ डिसेंबर 1916

👉 होमरूल चळवळ 
→ 1916 

👉 कांग्रेस का बंटवारा
→ 1907

👉 मुस्लिम लीग स्थापना
→ 1906

👉 बंग-भंग आंदोलन(स्वदेशी आंदोलन)
→ 1905 

👉 भारतीय राष्ट्रीय कांग्रेस स्थापना
→ 1885


११ एप्रिल २०२६

जानेवारी TOP Current Affairs



अशोक चक्र पुरस्कार विजेते
👉शुभांशु शुक्ला

परकीय व्यापार महासंचालनालयाचे महासंचालक
👉लव अग्रवाल

पारंपरिक टपाल सेवा बंद करणारा पहिला देश
👉डेन्मार्क

नृत्य कलानिधी पुरस्कार
👉उर्मिला सत्यनारायणन

पश्चिम बंगालच्या पहिल्या महिला मुख्य सचिव
👉नंदिनी चक्रवर्ती

अणुऊर्जा नियामक मंडळाच्या (AERB) अध्यक्षा
👉ए.के. बालासुब्रमण्यन

इफ्को साहित्य पुरस्कार २०२५
👉मैत्रेयी पुष्पा

'हिस्ट्री दॅट इंडिया इग्नोर्ड' या पुस्तकाच्या लेखिका
👉प्रेम प्रकाश

भारताचे पहिले डीपटेक स्टार्टअप धोरण सुरू
👉तामिळनाडू

इंटरसेक २०२६, जगातील सर्वात मोठे प्रदर्शन, आयोजित होणार
👉दुबई

आठवा राज्य वेतन आयोग स्थापन करणारे पहिले राज्य
👉आसाम

बालविवाहमुक्त भारताचे ध्येय
👉२०३० पर्यंत

माओवाद्यांविरुद्ध ऑपरेशन मेगाबुरु
👉झारखंडमध्ये

भारताचे पहिले सार्वभौम एआय पार्क स्थापित
👉तामिळनाडूमध्ये

देशव्यापी व्हीओवायफाय सेवा सुरू
👉बीएसएनएल

हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ मध्ये भारताचा क्रमांक
👉८० वा

युरो स्वीकारणारा २१ वा देश चलन
👉बल्गेरिया

भारताची पहिली दीर्घकालीन मूत्रपिंड रोग नोंदणी सुरू होणार
👉ओडिशा

भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख
👉नागेश कपूर

इराणमधून भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी 
👉ऑपरेशन स्वदेश

सीमा रस्ते संघटनेचे (बीआरओ) महासंचालक
👉हरपाल सिंग

भारतीय रेल्वेच्या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित
👉चंदना सिन्हा

भारतीय हवाई दल प्रशिक्षण कमांडचे प्रमुख
👉सिथेपल्ली श्रीनिवास

विजय हजारे ट्रॉफी २०२६ विजेता
👉विदर्भ

२०२६ मध्ये ५२ व्या जी७ शिखर परिषदेचे यजमानपद भूषवणार
👉फ्रान्स

केंद्रीय दक्षता आयुक्त
👉प्रवीण वशिष्ठ

भारताचे दुसरा सर्वात मोठा एलएनजी पुरवठादार
👉यूएई

भारतीय महिला हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षक
👉शौर्द मारिन

वायली रिसर्च हीरोज पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय
👉डॉ. चंद्रकांत लहरिया

राष्ट्रपती पोलीस कलर पुरस्कार विजेते
👉सिक्कीम पोलीस

सिक्कीम उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
👉ए. मुहम्मद मुश्ताक

भारतातील पहिले एकात्मिक खाजगी उपग्रह उत्पादन युनिट
👉गुजरात

०५ एप्रिल २०२६

2026 भारतातील पहिल्या OneLiner



भारताचा पहिला "बायो-हॅप्पी जिल्हा" विकसित केला जात आहे
👉अरुणाचल प्रदेश 

भारताच पहिला पूर्णपणे कागदविरहित जिल्हा न्यायालय
👉वायनाड केरळा

भारताची पहिली हायड्रोजन चालित ट्रेन लाँच केली जाईल
👉हरियाणा

भारताचा पहिला ट्रॉपिकल RAS-आधारित रेनबो ट्राउट फार्म लाँच केला गेला
👉हैदराबाद 

भारताचा पहिला सरकारी रुग्णालय आधारित AI क्लिनिक
👉ग्रेटर नोयडा

नळांद्वारे पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करून देणारा भारताचा पहिला शहर
👉पुरी ओडिसा

आठवा राज्य वेतन आयोग तयार करणार पहिल राज्य
👉 आसाम

भारताची पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन चालवली जाईल
👉गुवाहाटी ते कोलकाता

भारताचा पहिला शून्य-कचरा मॉडेल आधारित ई-कचरा पार्क
👉दिल्लीतील होल्लंबी कलान

भारतात पहिल रोलिंग बजेट सादर केला जाईल
👉मध्यप्रदेश 

भारताचा पहिला राज्यस्तरीय मल्टी नॅशनल पार्क टायगर कॉरिडोर
👉मध्यप्रदेश 

भारतीय शैलीतील कुस्तीचा पहिला आंतरराष्ट्रीय कार्यक्रम
👉जम्मू-काश्मीर 

भारताच पहिला निसर्ग थीम असलेला विमानतळ टर्मिनल
👉गुवाहाटी

भारताचा पहिला वन विद्यापीठ FT
👉गोरखपूर UP

भारताचा पहिला योग आणि आयुर्वेद आधारित क्लस्टर सेंटर
👉पतंजली विश्वविद्यालय 

छत्तीसगडची पहिली रामसर साइट 
👉कोपरा जलाशय 

भारताचा पहिला पॉवर म्युझियम
👉बिहार

भारताच पहिला नक्सलमुक्त राज्य
👉 मध्यप्रदेश

SIR अंतर्गत 100% डिजिटायझेशन असलेल पहिला राज्य
👉राजस्थान 

भारतीय सेनेच पहिल सामुदायिक रेडिओ स्टेशन
👉अरुणाचल प्रदेश 

भारताचा पहिली राष्ट्रीय प्रवाळ भिंत संशोधन संस्था
👉 अंदमान 

भारताचा पहिला टेस्ला सेंटर
👉गुरुग्राम 

संसोधित भारत नेट योजना राज्यव्यापी लागू करणारे पहिले राज्य 
👉पंजाब


०४ एप्रिल २०२६

प्रादेशिक ग्रामीण बँका (RRB : Regional Rural Banks)

अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com


 या बँका क्षेत्रीय किंवा विभागीय ग्रामीण बँका म्हणून देखील ओळखल्या जातात.

 उद्देश : -
दूर्गम ग्रामीण भागात बँक व्यवसाय रूजवून तेथील प्रादेशिक विषमता दुर करण्यास हातभार लावणे.
_ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

 स्थापना : - 26 सप्टेंबर 1975 रोजी प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन करण्याच्या वटहुकुमावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली.

⚜ 2 ऑक्टोबर 1975 रोजी भारतात पाच ठिकाणी ग्रामीण बँका सुरू झाल्या.

 ग्रामीण बँका - - - राज्य - - - पुरस्कृत बँक
  
 मोरादाबाद - - -  उत्तर प्रदेश - - - सिंडीकेट बँक

 गोरखपूर - - - उत्तर प्रदेश- - - स्टेट बँक ऑफ इंडिया

 भिवानी - - - हरियाणा - - - पंजाब नॅशनल बँक

 जयपूर - - - राजस्थान- - - यूनायटेड खमर्शियल बँक

 माल्डा - - - प. बंगाल- - - यूनायटेड बँक

⚜ प्रादेशिक ग्रामीण बँकांचा कायदा 1976 मध्ये संमत झाला.

⚜ भांडवल उभारणीत वाटा : केंद्र : 50% ; संबंधित राज्य सरकार : 15% ; पुरस्कृत व्यापारी बँक : 35%.

⚜ उत्तर प्रदेश राज्यात सर्वाधिक RRB कार्यरत आहेत.



सामान्य ज्ञान - प्रश्न उत्तरे

1)औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण हे छोटंसं नगर कशासाठी प्रसिद्ध आहे ?

👉साडी 


2)लक्षद्वीप येथे........ स्थित आहे ?

👉 अरबी समुद्र 


3)महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा कोणता ?

👉ठोसेघर धबधबा 


4)डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोणत्या शहरात आहे ?

👉औरंगाबाद 


5)महाराष्ट्रातील कोणत्या शहराला पूर्वेचे ऑक्सफर्ड म्हणतात ?

👉पणे 


6)एपिसेंटर हा शब्द कशाच्या संदर्भात वापरला जातो ?

👉 भकंप 


7)भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी त्रंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग कोठे स्थित आहे ?

👉 नाशिक 


8)महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातील त्रिवेणी संगमात येऊन वारुणी आणि थारुणी नद्यांना मिळणाऱ्या नदीचे नाव काय ?

👉गोदावरी


9) हुजूर साहेब गुरुद्वारा महाराष्ट्रात कोठे आहे ?

👉नांदेड 


10)अजिंठा आणि वेरूळ लेण्या कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत ?

👉 औरंगाबाद


11) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित चे मुख्यालय कोठे स्थित आहे ?

👉अकोला


12) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

👉1962


13) माथेरान, म्हैसमाळ आणि गगनबावडा हे महाराष्ट्रातील........... आहेत.

👉 थड हवेची ठिकाणे


14) 2011 च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये शहरीकरणाची पातळी सर्वात कमी आहे ?

👉 गडचिरोली 


15)महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वात मोठी किनारपट्टी लाभली आहे ?

👉 रत्नागिरी


🔹रामकृष्ण मिशन ची स्थापना कोणी केली?

उत्तर--------- स्वामी विवेकानंद


 🔹आर्य समाजाची स्थापना कोणी केली?

उत्तर--------- स्वामी दयानंद सरस्वती


🔹परार्थना समाजाची स्थापना कोणी केली?

उत्तर--------- आत्माराम पांडुरंग


🔹सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?

उत्तर----------महात्मा फुले


🔹दिग्दर्शन हे मासिक कोणी सुरु केले?

उत्तर----------- बाळशास्त्री जांभेकर


🔹इदुप्रकाश वृत्तपत्र कोणी सुरु केले?

उत्तर----------- न्या. रानडे


🔹मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली?

उत्तर ----------- दादोबा पांडुरंग


 🔹निष्काम कर्ममठ ची स्थापना कोणी केली?

उत्तर ------------ महर्षी धोंडो केशव कर्वे


🔹महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्री कोणी सुरु केले?

उत्तर ------------- लोकमान्य टिळक


🔹आर्य महिला समाज ची स्थापना कोणी केली?

उत्तर ------------- पंडिता रमाबाई


🔹हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?

उत्तर-------------- महात्मा गांधी 


🔹भारत सेवक समाज ची स्थापना कोणी केली?

उत्तर ---------------गोपाळ कृष्ण गोखले


 🔹गीताई हा ग्रंथ कोणी लिहला?

उत्तर -------------- विनोबा भावे


🔹सवासदन ची स्थापना कोणी केली?

उत्तर-------------- रमाबाई रानडे


🔹एसेज ऑन इंडीयन इकोनोमीक्स हा ग्रंथ कोणी लिहला?

उत्तर-------------- न्या. रानडे


🔹परमहंस सभेची स्थापना कोणी केली?

उत्तर------------- दादोबा पांडुरंग


 🔹दी प्रोब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहला?

उत्तर------------- डॉ. बाबासाहेब आंबेडकर


🔹सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली?

उत्तर-------------- ग. वा. जोशी


 🔹शतपत्रे कोणी लिहली?

उत्तर------------ गोपाल हरी देशमुख (लोकहितवादी)


🔹 गरामगीता कोणी लिहली?

उत्तर------------- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

______________________


महाराष्ट्राचे आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे?

उत्तर--नाशिक💐✅


 महाराष्ट्राच्या उत्तर सीमेला कोणत्या पर्वताची रांग आहे? 

उत्तर----सातपुडा💐✅


महाराष्ट्रात चुंनखडीचे साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत?

उत्तर--यवतमाळ💐✅


 महाराष्ट्र राज्यातील सर्वात लांबीचा महामार्ग कोणता ? 

उत्तर---national highway 6 💐✅


स्वातंत्र्य वीर सावरकरांचे जन्मस्थान कोणते? 

उत्तर- भगुर (जी नाशिक )💐✅

 

महाराष्ट्रातील शिखांची दक्षिण काशी कोणती? 

उत्तर--नांदेड💐✅

 

छत्रपती शाहू महाराजांनी गुळाची बाजारपेठ कोणत्या जिल्ह्यात स्थापन केली? 

उत्तर---कोल्हापूर येथे 1895 ला💐✅


महाराष्ट्रातील कापसाची प्रसिद्ध बाजारपेठ कोठे आहे? 

उत्तर--अमरावती💐✅

 

पुणे जिल्ह्यातील कोणते शहर बटाट्याच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे? 

उत्तर--जुन्नर💐✅


पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या काठी आहे? 

उत्तर---भीमा💐✅


 महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखरकारखाना कोठे स्थापन करण्यात आला होता?

उत्तर---प्रवरानगर(जी अहमदनगर )💐✅


 महाराष्ट्रातील जिल्हयांची संख्या ---

>>>36💐✅


महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात ?

उत्तर ---- गोदावरी💐✅


महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? 

उत्तर---गोदावरी💐✅


महाराष्ट्रातील सर्वाधिक आवर्षंनग्रस्त जिल्हा कोणता?

उत्तर---अहमदनगर💐✅


संत गाडगेबाबाचे नाव दिलेले विद्यापीठ कोठे आहे ?

उत्तर---अमरावती💐✅

 

भारतातील पहिले पक्षी अभयअरण्य कोठे स्थापन करण्यात आले? उत्तर

--कर्नाळा जिल्हा रायगड💐✅

 

यशवंतरावांच्या समाधी स्थळास कोणते नाव देण्यात आले?

उत्तर---प्रीतिसंगम💐✅

 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी कोठे आहे? 

उत्तर---मोझरी (जी. अमरावती.)💐✅

 

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या प्रकल्पास म्हणतात? 

उत्तर--कोयना प्रकल्प💐✅


 महाराष्ट्रातील मातीचे धरण ? 

उत्तर--गांगपूर जिल्हा नाशिक💐✅


 महाराष्ट्रातील कोणत्या शहरास बावन्न दरवाज्यांचे शहर म्हणून ओळखले जाते? 

उत्तर--औरंगाबाद💐✅


 लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? 

उत्तर---बुलढाणा💐✅

समाजसुधारक व त्यांच्या पदव्या


1. जस्टीज ऑफ दि पीस - जगन्नाथ शंकरशेठ


2. मुंबईचा अनभिषिक्त सम्राट -  जगन्नाथ शंकरशेठ


3. मुंबईचा शिल्पकार -  जगन्नाथ शंकरशेठ


4. आचार्य - बाळशास्त्री जांभेकर, विनोबा भावे


5. घटनेचे शिल्पकार - डॉ. बाबासाहेब आंबेडकर


6. मराठीतील पहिले पत्रकार - विनोबा भावे


7. लोकहितवादी - गोपाळ हरी देशमुख


8. विदर्भाचे भाग्यविधाता - डॉ. पंजाबराव देशमुख


9. समाजक्रांतीचे जनक - महात्मा ज्योतीबा फुले


10. भारतीय प्रबोधनाचे जनक - राजा राममोहन रॉय


11. नव्या युगाचे दूत - राजा राममोहन रॉय


12. आधुनिक भारताचे अग्रदूत - राजा राममोहन रॉय


13. भारतीय पुनरुजीवन वादाचे जनक - राजा राममोहन रॉय


14. हिंदू नेपोलियन - स्वामी विवेकानंद


15. आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते - दादाभाई नौरोजी


16. भारतीय अर्थव्यवस्थेचे जनक - न्यायमूर्ती रानडे


17. भारतातील स्वराज्याचे पहिले उद्गाते - दादाभाई नौरोजी


18. पदवीधराजे मुकुटमणी - न्या.म.गो.रानडे


19. नामदार - गोपाळ कृष्णा गोखले


20. हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन - महात्मा ज्योतीबा फुले


21. आधुनिक मनू - डॉ. बाबासाहेब आंबेडकर


22. दलितांचा मुक्तीदाता - डॉ. आंबेडकर


23. कर्मवीर - भाऊराव पायगोंडा पाटील


24. आधुनिक भगीरथ - भाऊराव पायगोंडा पाटील


25 महाराष्ट्राचे बुकरटी वॉशिग्टन - भाऊराव पायगोंडा पाटील


26. महर्षी - धोंडे केशव कर्वे / विठ्ठल रामजी शिंदे


27. राष्ट्रसंत - तुकडोजी महाराज 

 

28. हिंदुस्थानच्या कुषक क्रांतीचे जनक - पंजाबराव देशमुख


29. महाराष्ट्रातील राष्ट्रवादाचे अद्यप्रवर्तक - लोकशाहीवादी गोपाळ हरी देशमुख


30. धन्वंतरी - डॉ. भाऊदाजी लाड


31. राजर्षी - शाहू महाराज


32. वस्तीगृहाचे अद्यजनक - शाहू महाराज


33. सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष - शाहू महाराज


34. तेल्या तांबोळ्यांचे पुढारी - लोकमान्य टिळक


35. असंतोषाचे जनक -  लोकमान्य टिळक   

जहाल राजकारणी

● मराठा राज्य व इंग्रज-मराठा युद्धे

: पार्श्वभूमी
• मराठी स्वराज्याची मुहुर्तमेढ रचून शिवाजी राजे १६७४ मध्ये पहिले छत्रपती बनले. छत्रपती शिवाजी राज्यांच्या मृत्यूनंतर कनिष्ठ पुत्र राजारामांना गादीवर बसविण्याचा कट उधळून देऊन या संभाजी राजे (१६८०-१६८९) मराठी राज्याचे दुसरे छत्रपती
बनले.

• संभाजीराजांच्या मृत्यूनंतर त्यांची विधवा पत्नी येसूबाईंनी विश्वासू सरदारांशी चर्चा करून व मराठे शाहीवरचे संकट बाळाजीने ओळखून राजाराम राज्यांना नजर कैदेतून मुक्त करून त्यांना गादीवर बसविले. ‘राजा सलामत तर राज्य सलामत’ या हेतूने
मराठ्यांनी १६८९ मध्ये सुरक्षेसाठी राजारामांना कर्नाटकातील जिंजीस पोहोचविले. मुघलांनी राणी येसूबाई व बाल शाहू यांना कैद केली. १६९७ मध्ये राजाराम महाराष्ट्रात परतल्यानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचा २ मार्च, १७०० रोजी वयाच्या केवळ ३० व्या वर्षी मृत्यू झाला.

• राजारामाच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी ताराबाईंनी आपला साडेतीन-चार वर्षाचा मुलगा शिवाजी यास गादीवर बसवून स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व आपल्या हाती घेतले.

 छ.शाहू राजे यांची सुटका व राज्यारोहण

• औरंगजेबच्या मृत्यूनंतर बहादूरशाहने शाहू राजांना मुक्त केले. बाजीरावाने ताराबाईंनी शाहूंच्या हाती मराठेशाहीची सत्ता देण्यास नकार दिला. ताराबाईंचा सेनापती धनाजी जाधव यांनी ऐनवेळी शाहूंची बाजू घेतली. या गृहयुद्धातून झालेल्या खेडच्या युद्धात
(१२ ऑक्टोबर, १७०७) ताराबाईंचा पराभव झाला. शाहू राजांनी सातारचा किल्ला सर करून १२ जानेवारी, १७०८ मध्ये राज्याभिषेक करून राज्यारोहण केले. ते मराठ्यांचे चौथे छत्रपती बनले. ताराबाईंनी कोल्हापूरला मराठ्यांची दुसरी गादी
निर्माण केली. या दोघांमधील यादवी १७३१ च्या वारणेच्या तहापर्यंत चालू राहिली.

● पहिले इंग्रज-मराठा युद्ध (१७७५-१७८२)

 कारणे व महत्त्वाच्या घटना

• बॉम्बे सरकारला महाराष्ट्रात क्लाईव्हने बंगालमध्ये स्थापन केलेल्या दुहेरी शासनव्यवस्थेची स्थापन करण्याची इच्छा होती. पेशवेपदासाठीच्या सत्ता संघर्षाने त्यांना संधी प्राप्त झाली.

• माधवरावांच्या मृत्यूनंतरचा सत्ता संघर्ष: पेशवेपदाची इच्छा असलेल्या रघुनाथरावांनी (माधवरावांचा काका) पेशवा नारायणराव (माधवरावांचा भाऊ) याचा खून घडवून आणला व स्वत:स पेशवा घोषित केले. तेव्हा मराठा दरबारातील नाना फडणीस, महादजी शिंदे, सखाराम बापू वगैरे बारा व्यक्तींनी राघोबाच्या विरोधात बारभाईंचे राजकारण केले. त्यांनी राघोबाला पदच्युत केले व नारायणरावांच्या नुकत्याच झालेल्या मुलाला सवाई माधवराव असे नाव देऊन त्याला पेशवा बनविले व त्याच्या वतीने हे बाराजण राज्यकारभार पाहू लागले.

•राघोबाने गेलेले पेशवेपद मिळविण्यासाठी बॉम्बे प्रेसिडन्सीशी ‘सुरतचा तह’ (१६ मार्च, १७७५) रोजी केला. त्यामुळे युद्धास सुरूवात झाली.

• मात्र सुरतचा तह कलकत्त्याच्या गव्हर्नर-जनरलला पसंद पडला नाही. त्याने बॉम्बे सरकारला मराठ्यांची नवीन तह करायला सांगितले. दीर्घ चर्चेनंतर बॉम्बे सरकारने पुणे दरबारातील शासक गटाशी मार्च १७७६ मध्ये ‘पुरंदरचा तह’ केला. या तहामुळे युद्ध तात्पुरते थांबले. या तहाद्वारे राघोबाला मराठ्यांच्या स्वाधीन
करायचे ठरले व त्याने केलेले पूर्वीचे तह रद्द करण्यात आले.

• मात्र हा तह मुंबईच्या इंग्रजांना नुकसानकारक वाटला. तसेच कंपनीच्या संचालकांनाही तो पसंत पडला नाही. अमेरिकन वसाहती गमावल्याने आता इंग्रजांनी पुन्हा राघोबाची बाजू घेऊन मराठ्यांशी युद्ध सुरू केले. पण पुण्याकडे राघोबाला घेऊन येणाऱ्या इंग्रजांचा महादजी शिंदेंनी तळेगाव येथे पराभव
करून त्यांना ‘तळेगावचा तह’ (१७७९) मान्य करावयास लावला.

• हा तह इंग्रजांनी अमान्य केल्यावर त्यांचा निर्णायक पराभव करण्यासाठी नाना फडणीसाने पेशवे, नागपूरकर भोसले, हैदर अली व निझाम यांचा ‘चतुःसंघ’ इंग्रजांविरूद्ध उभा केला. मात्र धुर्त इंग्रजांनी निझाम व भोसल्यांना फितविले. तसेच गोद्दार्ड
याच्या नेतृत्वाखाली कलकत्त्याहून मोठे सैन्य मराठ्यांविरूद्ध पाठविले.

• दोन वर्षे युद्ध असेच चालू राहिले. इंग्रजांनी महादजींकरवी शांततेचा प्रस्ताव मांडला. हैदर न विचारता मराठ्यांनी ‘साल्बाईचा तह’ करून ७-८ वर्षे चाललेले युद्ध संपुष्टात आणले.

● साल्बाईचा तह, १७ मे, १७८२

• साल्बाई या ग्वाल्हेरपासून ३२ किमी अंतरावर असलेल्या ठिकाणी महादजी शिंदे (पेशव्यांच्या वतीने) व इंग्रज यांमध्ये हा तह १७ मे, १७८२ रोजी करण्यात आला व पहिले इंग्रजमराठा युद्ध थांबले. या तहाच्या प्रमुख अटी पुढीलप्रमाणे होत्याः

– १)साष्टी, भडोच, मुंबई इंग्रजांकडेच राहतील, तर पुरंदरच्या तहानंतर इंग्रजांनी घेतलेली ठाणी मराठ्यांना परत केली जातील.
– २)इंग्रजांनी राघोबाची बाजू घेऊ नये.
– ३)इंग्रजांना त्याच्या व्यापारी सवलती पुन्हा प्राप्त होतील.
– ४)दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या दोस्त राज्यांवर हल्ला करायचा नाही.तसेच पेशव्यांनी इतर युरोपीयन शक्तींना मदत करायची नाही.

● महत्व

• हा तह इंग्रजांसाठी खूप महत्वाचा ठरला. खरे तर, तो इंग्रजांच्या साम्राज्य विस्ताराच्या इतिहासात एक महत्वाचे वळण (turning point) ठरला. या तहामुळे इंग्रजांची मराठ्यांशी २० वर्षे शांतता प्रस्थापित झाल्याने या काळात त्यांनी आपली शक्ती
वाढविली व मराठ्यांव्यतिरिक्त इतर शबूंचा एक-एक करून पराभव केला. नाना फडणीसाला हा तह हैदरच्या मान्यतेशिवाय करायचा नव्हता. त्यामुळे महादजी व नाना यांच्या फूट पडली, तसेच मराठे व हैदर यांचे संबंधही बिघडले.

● दुसरे इंग्रज-मराठा युद्ध (१८०३-१८०५)

● कारणे

• १)लॉर्ड वेलस्लीचे मराठ्यांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करण्याचे आक्रमक धोरण. त्याला मराठ्यांवर तैनाती फौजेचा तह लादायचा होता.

• २)सवाई माधवरावांच्या मृत्यूनंतर १७९५ मध्ये राघोबाचा अकार्यक्षम व कर्तव्यशून्य असा मुलगा दुसरा बाजीराव यास पेशवेपद मिळाले. १८०० मध्ये नाना फडणीसाचा मृत्यू झाला व ‘मराठेशाहीतील सारे शहाणपण संपले’. १८ व्या शतकाच्याअखेर पर्यंत अनेक हुशार, मुत्सद्दी व अनुभवी मराठी राजकारण्यांचा मृत्यू झाला होता.

• ३)मराठा सरदारांमधील दुफळी: दौलतराव शिंदे व यशवंतराव होळकर यांच्यातील यादवी. बाजीरावाची होळकरांविरूद्ध शिंद्यांना मदत, यशवंतराव होळकरांनी केलेला पेशवे व शिंदे यांच्या एकत्रित सैन्याचा पराभव. या पराभवामुळे बाजीरावाने
संरक्षणासाठी इंग्रजांकडे धाव घेतली व १३ डिसेंबर, १८०२ रोजी ‘वसईचा तह करून इंग्रजांची तैनाती फौज पदरी ठेवण्याचे मान्य करून इंग्रजांचे मांडलिकत्व स्वीकारले.

• ४)वसईच्या तहामुळे इंग्रजांना पेशव्यांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करण्याचा अधिकार प्राप्त झाला. मात्र इतर मराठा सरदारांनी तहास मान्यता देण्यास नकार दर्शविल्याने दुसऱ्या युद्धास तोंड फुटले.

● महत्त्वाच्या घटना

• १८०३ मध्ये ऑर्थर वेलस्लीने शिंदे-भोसले यांच्या एकत्रित सैन्याचा पराभव केला व त्यांच्या तैनाती फौजेचे पुढील तह केले:

१) १७ डिसेंबर, १८०३ रोजी रघुजी भोसले यांच्या बरोबर ‘देवगावचा तह’ केला. माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यास भोसल्यांच्या दरबारात रेसिडेन्ट म्हणून नेमण्यात आले.

२) ३० डिसेंबर, १८०३ रोजी दौलतराव शिंदे यांच्या बरोबर ‘सुर्जी अर्जनगावचा तह’ केला. जॉन माल्कम यास शिंद्यांच्या दरबारात रेसिडन्ट म्हणून नेमण्यात आले.

• होळकरांविरूद्ध मात्र इंग्रजांना यश मिळू शकले नाही. शेवटी २४ डिसेंबर, १८०५ रोजी यशवंतराव होळकरांबरोबर इंग्रजांनी ‘राजपूरघाटचा तह’ हा शांततेचा तह केला.

• अशाप्रकारे दुसऱ्या इंग्रज- -मराठा युद्धात भोसले, शिंदे, होळकर यांच्यासारख्या मातब्बर सरदारांना इंग्रजांनी पराभूत केले. भारतात कंपनीची सत्ता सर्वश्रेष्ठ शक्ती (Paramount Power) बनली.

● तिसरे इंग्रज-मराठा युद्ध (१८१७-१८१८)

• कारणे

• आपण एकटे पडलो आहोत याची जाणीव दुसऱ्या बाजीरावाला झाली. त्याने इंग्रजांच्या जोखडातून सुटण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आपले स्वातंत्र्य नष्ट झाल्याने मराठा सरदारांमध्यही असंतोष होता.

• गायकवाडांच्या गंगाधरशास्त्रींच्या खूनात बाजीरावाचा व त्याचा सल्लागार त्र्यंबकजी डेंगळे यांचा हात असल्याचा आरोप करून इंग्रजांनी बाजीरावावर जून १८१७ मध्ये ‘पुणे तह’ हा एक
कडक तह लादला, जो वसईच्या तहाला पूरक म्हणून
लादण्यात आला. या तहाने बाजीराव निव्वळ एक संस्थानिक बनला.

• लॉर्ड हेस्टिंगने पिंडाऱ्यांचा बंदोबस्त करण्यापूर्वी त्यासाठी शिंद्यांची मदत घेण्यासाठी दौलतराव शिंदेबरोबर नोव्हेंबर, १८१७ मध्ये ‘ग्वाल्हेरचा तह’ केला. तसेच दुसऱ्या मल्हारराव होळकरांबरोबरच जानेवारी, १८१८ मध्ये ‘मंदासोरचा तह’ केला.

• पुणे तहाच्या विरूद्ध बाजीरावाने बापू गोखलेच्या साहाय्याने लढण्याचे ठरविले. ५ नोव्हेंबर, १८१८ रोजी निर्णायक असे तिसरे युद्ध खडकी येथे सुरू झाले. युद्धात पेशव्यांचा पराभव झाला. बाजीरावाने शरणागती पत्करली. त्याच्या बरोबर इतर मराठा सरदार घराणीही इंग्रजांच्या अंकित आले.

• इंग्रजांनी बाजीरावास पेन्शन देऊन त्यास कानपूरजवळ बिठूर येथे रवाना केले. पेशव्यांचा सर्व प्रदेश ताब्यात घेतला.