Tuesday 8 October 2019

सरकार उभारणार 1 हजार 400 किलोमीटरची ‘ग्रीन वॉल’ ऑफ इंडिया

☘ केंद्र सरकारने देशातील पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि हरित क्षेत्र वाढवण्यासाठी 1 हजार 400 किलोमीटर लांबीची ‘ग्रीन वॉल’ तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

☘आफ्रिकेत सेनेगल पासून जिबूतीपर्यंत तयार करण्यात आलेल्या हरित पट्ट्याच्या धर्तीवर

☘ गुजरातपासून दिल्ली-हरियाणाच्या सीमेपर्यंत ‘ग्रीन वॉल ऑफ इंडिया’ उभारण्यात येणार आहे.

☘ ही ग्रीन वॉल लांबीला 1 हजार 400 किलोमीटर तर रूंदीला 5 किलोमीटर इतकी असणार आहे.

☘वातावरणातील बदलांशी सामना करण्यासाठी आफ्रिकेत अशी भिंत उभारण्यात आली आहे.

☘याला ‘ग्रेट ग्रीन वॉल ऑफ सहारा’ असंही म्हटलं जातं.

☘सध्या हा प्रकल्प सुरूवातीच्या टप्प्यात आहे. जर हा प्रकल्प पूर्ण झाला तर भविष्यकाळात वाढत्या प्रदुषणाला रोखण्यासाठी याकडे एक उदाहरण म्हणून पाहता येऊ शकते.

☘थार वाळवंटातून ही भिंत विकसित केली जाणार आहे.

☘याव्यतिरिक्त
  📌गुजरात,
  📌राजस्थान,
  📌 हरियाणा ते दिल्लीपर्यंत
परसलेल्या अरावली डोंगरावरील कमी होणाऱ्या हरित पट्ट्याच्या संकटावरही मात करता येऊ शकते.

☘ग्रीन वॉल ऑफ इंडियामुळे पश्चिम भारत आणि पाकिस्तानातील वाळवंटातून दिल्लीपर्यंत येणारी धूळही रोखण्यात मदत मिळणार आहे.

☘ भारतातील कमी होणारा हरित पट्टा आणि वाढतं वाळवंट रोखण्यासाठी ही कल्पना संयुक्त राष्ट्रांच्या कॉन्फरन्समधून मिळाली आहे.

☘आफ्रिकेतील ग्रेट ग्रीन वॉलवर एका दशकापूर्वी काम सुरू करण्यात आलं होतं. परंतु अनेक देशांचा सहभाग आणि त्यांच्या निरनिराळ्या कार्यप्रणालींमुळे अद्यापही ते पूर्ण होऊ शकले नाही.

☘भारत सरकार आपली ही कल्पना 2030 पर्यंत पूर्ण करण्याच्या दृष्टीने सध्या काम करत आहे. या अंतर्गत 26 दशलक्ष हेक्टर जमिन प्रदूषणमुक्त करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 18 एप्रिल 2024

🔖 प्रश्न.1) मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कोणाला जाहीर झा...