Thursday 23 December 2021

पहिले कर्नाटक युद्ध (१७४६-१७४८)

◆ युद्धाचे कारणः

√ युरोपात इंग्लंड व फ्रान्स यांच्यादरम्यान ऑस्ट्रीयन वारसा हक्क युद्ध' (Austrian War of Succession) सुरू झाल्यामुळे भारतातही इंग्रज व फ्रेंच यांच्यात युद्ध सुरू झाले.

◆महत्त्वाच्या घटना:

√ १७४५ मध्ये ब्रिटिश नौदलाने फ्रेंचाची जहाजे ताब्यात घेतली.

√ त्यामुळे फ्रेंच गर्व्हनर डुप्ले याने १७४६ मध्ये इंग्रजांचे मद्रास जिंकून घेतले.

√ इंग्रजांनी कर्नाटकच्या नवाबाकडे फ्रेंचांविरूद्ध मद्रास मुक्त करण्यासाठी मदतीची मागणी केली.

√ कर्नाटकचा नवाब अन्वरूद्दीन याने फ्रेंचांना दिलेला आदेश न मानल्यामुळे १७४८ मध्ये अन्वरूद्दीनचे सैन्य व फ्रेंच यांमध्ये प्रसिद्ध सेंट थोमची लढाई' (Battle of St.Thome) झाली.

√ या लढाईचे वैशिष्ट्य म्हणजे के पॅराडाईस याच्या नेतृत्वाखालील फ्रेंच सैन्यात केवळ ९३० सैनिक होते, तर महफूज खान याच्या नेतृत्वाखालील नवाबाच्या सैन्यात १०,००० सैनिक होते. तरीही फ्रेंचांनी नवाबाच्या सैन्याचा दारूण पराभव केला.

√ युरोपात ऑस्ट्रीयन वारसाहक्क युद्ध संपताच भारतातील युद्धही थांबले.

√ 'अॅक्स ला शापेल तहा द्वारे (Treaty of Aix-La-Chapelle) फ्रेंचांनी इंग्रजांना मद्रास परत केले.

√ मात्र युद्धात फ्रेंचांचे वर्चस्व सिद्ध झाले.

अश्या प्रकारची महत्वाची माहिती नियमित मिळविण्यासाठी जॉईन करा टेलिग्राम

★★★★★★★★★★★★★★★★★★★★

No comments:

Post a Comment

Latest post

हिमालयातील 8000 मी.उंचीपेक्षा जास्त उंची असणारी शिखरे..

-----------------======---------------------- शिखर               उंची(मी)             स्थान ---------------------------------------------...