Wednesday 13 October 2021

आयपीएल गाजवलेल्या ‘त्या’ तिघांसाठी टीम इंडियाची दारं होणार खुली.

आयपीएल २०२१च्या अंतिम फेरीनंतर दोन दिवसांनी टी-२० विश्वचषक स्पर्धा सुरू होईल. या स्पर्धेत विराट कोहली शेवटचे भारतीय टी-२० संघाचे नेतृत्व करेल. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने आतापर्यंत आयसीसीची एकही ट्रॉफी जिंकलेली नाही.

अशा परिस्थितीत, विराटसह, बीसीसीआयची देखील इच्छा आहे, की त्याने कर्णधार म्हणून आपली आंतरराष्ट्रीय टी-२० कारकीर्द विश्वचषक ट्रॉफीसह संपवावी. यासाठी बीसीसीआय आयपीएल २०२१ मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या काही स्टार खेळाडूंना टीम इंडियासोबत जोडू शकते. या खेळाडूंमुळे संघाच्या प्रशिक्षण आणि कंडीशनिंग सत्रांमध्ये संघाला मदत होऊ शकते.

क्रिकबझच्या अहवालानुसार, निवड समितीने आरसीबीचा गोलंदाज हर्षल पटेल, केकेआरचा फलंदाज व्यंकटेश अय्यर आणि गोलंदाज शिवम मावी, या सर्व खेळाडूंची निवड केली आहे. त्यांच्यामुळे टीम इंडियाच्या प्रशिक्षणामध्ये आवश्यक मदत देईल. यापैकी किमान दोन खेळाडूंना दुबईमध्ये राहण्यास सांगितले जाऊ शकते, जिथे सध्या भारतीय खेळाडू क्वारंटाइन आहेत.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...