09 January 2020

संपुर्ण यादी- यापुर्वीच्या ६२ महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडल्या या ठिकाणी

🤼‍♂ पुणे | ६३वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यावर्षी पुण्यात पार पडणार आहे.

🤼‍♂ पुण्यातील श्री शिवछत्रती क्रीडानगरी, बालेवाडी, पुणे येथे २ ते ७ जानेवारी २०१९ दरम्यान या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

🤼‍♂ नेहमीप्रमाणे माती आणि गादी अशा दोन्ही प्रकारात ही स्पर्धा होणार आहे.

🤼‍♂ ही स्पर्धा तब्बल १४व्यांदा पुणे शहर किंवा जिल्ह्यात होत आहे.

🤼‍♂ १९६१पासून आजपर्यंत ही स्पर्धा दोन वेळा (१९६३ आणि १९९६) रद्द करण्यात आली होती तर ४वेळा ही स्पर्धा अनिर्णित राहिली.

👑 महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची आजपर्यंतची ठिकाणे व विजेते 👑

१९५३- पुणे
१९५५- मुंबई- स्पर्धा रद्द
१९५९- सोलापूर-
१९६०- नागपुर- अनिर्णित
१९६१- औरंगाबाद- दिनकर दहय़ारी
१९६२- धुळे- भगवान मोरे
१९६३- सातारा- स्पर्धा रद्द
१९६४- अमरावती- गणपत खेडकर
१९६५- नाशिक- गणपत खेडकर
१९६६- जळगाव- दिनानाथ सिंह
१९६७- खामगाव, बुलढाणा- चंबा मुतनाळ
१९६८- अहमदनगर- चंबा मुतनाळ
१९६९- लातूर- हरिश्चंद्र बिराजदार
१९७०- पुणे- दादू चौगुले
१९७१- अलिबाग, रायगड- दादू चौगुले
१९७२- कोल्हापूर- लक्ष्मण वडार
१९७३- अकोला- लक्ष्मण वडार
१९७४- ठाणे- युवराज पाटील
१९७५- चंद्रपूर- रघुनाथ पवार
१९७६- अकलूज, सोलापूर- हिरामण बनकर
१९७७- चाळीसगाव, जळगाव- अनिर्णित
१९७८- मुंबई- आप्पासाहेब कदम
१९७९- नाशिक- शिवाजीराव पाचपुते
१९८०- खोपोली, रायगड- इस्माईल शेख
१९८१- नागपुर- बापू लोखंडे
१९८२- बीड- संभाजी पाटील
१९८३- पुणे- सरदार खुशहाल
१९८४- सांगली- नामदेव मोळे
१९८५- पिंपरी चिंचवड, पुणे- विष्णु जोशीलकर
१९८६- सोलापूर- गुलाब बर्डे
१९८७- नागपुर- तानाजी बनकर
१९८८- अहमदनगर- रावसाहेब मगर
१९८९- वर्धा- अनिर्णित
१९९०- कोल्हापूर- अनिर्णित
१९९१- अमरावती- अनिर्णित
१९९२- पुणे- आप्पालाल शेख
१९९३- बालेवाडी, पुणे- उदयराज जाधव
१९९४- अकोला- संजय पाटील
१९९५- नाशिक- शिवाजी केकान
१९९६- स्पर्धा रद्द
१९९७- देवळी, वर्धा- अशोक शिर्के
१९९८- नागपुर- गोरखनाथ सरक
१९९९- पुणे-  धनाजी फडतरे
२०००- खामगाव, बुलढाणा- विनोद चौगुले
२००१- नांदेड- राहुल काळभोर
२००२- जालना- मुन्नालाल शेख
२००३- यवतमाळ- दत्तात्रय गायकवाड
२००४- वाशी- चंद्रहास निमगिरे
२००५- इंदापूर, पुणे- सईद चाउस
२००६- बारामती, पुणे- अमोल बुचडे
२००७- औरंगाबाद- चंद्रहार पाटील
२००८- सांगली- चंद्रहार पाटील
२००९- सांगवी, पुणे- विकी बनकर
२०१०- रोहा, रायगड- समाधान घोडके
२०११- अकलूज, सोलापूर- नरसिंग यादव
२०१२- गोंदिया- नरसिंग यादव
२०१३- भोसरी- नरसिंग यादव
२०१४- अहमदनगर- विजय चौधरी
२०१५- नागपुर- विजय चौधरी
२०१६- वारजे, पुणे- विजय चौधरी
२०१७-भुगाव, पुणे- अभिजीत कटके
२०१८- जालना- बाला रफिक शेख
२०१९- बालेवाडी, पुणे- हर्षवर्धन सदगीर

पहिले भारतीय ICS सत्येंद्रनाथ टागोर

भारतीय नागरी सेवेत निवडून गेलेले पहिले भारतीय म्हणजे सत्येंद्रनाथ टागोर होत. आज त्यांचा स्मृतिदिन त्यानिमित्त जाणून घेऊया त्यांच्याविषयी काही महत्वाच्या गोष्टी...

👍 *प्रथमच भारतीयांची निवड* : 1832 मध्ये मुन्सिफ आणि सदर अमीन यांची पदे भारतीयांसाठी तयार करून या पदावर भारतीयांची नेमणूक करण्यात आली. यापूर्वी ब्रिटीश कालीन राज्यात फक्त ब्रिटिशांची निवड होत होती. मात्र 1833 मध्ये, उप-दंडाधिकारी व उपजिल्हाधिकारी यांच्या पदावरही भारतीयांना निवडण्याची परवानगी देण्यात आली.

● भारतीय सिव्हिल सर्व्हिसची स्थापना भारतीय नागरी सेवा कायदा 1861 अंतर्गत करण्यात आली.
● सत्येंद्रनाथ जून 1863 मध्ये प्रथमच निवडून आले. त्यानंतर ते प्रशिक्षण घेण्यासाठी लंडनला गेले. नोव्हेंबर 1864 मध्ये ते परत आले.
● सत्येंद्रनाथ यांनी 1865 मध्ये सहाय्यक दंडाधिकारी व अहमदाबादचे जिल्हाधिकारी या पदावर काम सुरू केले.
● ते सुमारे 30 वर्षे नागरी सेवेत राहिले. त्या दिवसांमध्ये अधिकाऱ्यांना कर वसूली करण्याचे मुख्य काम होते.
● 1896 मध्ये ते महाराष्ट्रातील सातारा येथे न्यायाधीश म्हणून निवृत्त झाले.
● सत्येंद्रनाथ हे एक प्रसिद्ध लेखक, बहुभाषा जाणकार, गीतकार होते. ते महान कवी रवींद्रनाथ टागोर यांचे मोठे बंधू होते.
● सत्येंद्रनाथ टागोर यांचा जन्म 1 जून 1842 रोजी कोलकाता येथे झाला. तर 9 जानेवारी 1923 ला कोलकाता येथेच त्यांनी जगाचा कायमचा निरोप घेतला.

📚 *सत्येंद्रनाथ यांचे साहित्य* :

• बौद्धधर्म (1901) हा ग्रंथ बंगाली साहित्यात वैशिष्ट्यपूर्ण.
• बोम्बाई चित्र (1888), आत्मचरित्र :आमार बाल्यकथा ओ बोम्बाई प्रवास (1915).
• नाटके : सुशीला, वीरसिंह.
• कालिदास यांच्या मेघदूताचा बंगाली अनुवाद व नवरत्नमाला, स्त्री स्वाधीनता आदी ग्रंथ उल्लेखनीय.

📌 *विशेष* : सत्येंद्रनाथ मराठी भाषेचे उत्तम जाणकार होते, त्यांनी लो. टिळकांच्या गीतारहस्याचा बंगालीत अनुवादही केला.

सत्येंद्रनाथ पुरोगामी विचारांचे असल्याने त्यांच्या पत्नी ज्ञानदानंदिनी देवींना पुढाकार घ्यावयास लावून स्त्रीमुक्ती-आंदोलनास हातभार लावला. ज्ञानदानंदिनी देवींनी कुटुंबातील पडदापद्धती झुगारत रूढीविरुद्ध बंड पुकारले.

राजभवनात व्हाईसरॉयकडून सत्कार होणाऱ्‍या त्या पहिल्या भारतीय महिला होत. त्यावेळी बंगालमध्ये राष्ट्रीय गीत म्हणून गाजलेले ‘मिले राबे भारत संतान’ हे गीत सत्येंद्रनाथांनी लिहिले होते.

महत्त्वाचे प्रश्नसंच

1) ठिबक सिंचन प्रणालीमध्ये वाळूच्या गाळणीची गरज खालील घटक सिंचनाच्या पाण्यातून काढण्यासाठी होते ?
   अ) शेवाळ    ब) पाण्यात विरघळलेले क्षार   
   क) काडी-कचरा    ड) अतिसुक्ष्म मृदा कण
   1) अ आणि ब    2) अ आणि क    3) ब आणि क    4) क आणि ड
उत्तर :- 2

2) गैबीयनच्या संदर्भात कोणत्या बाबी सत्य आहेत ?
   अ) ते हाताळण्यासाठी लवचिक आहेत.    ब) त्यांचे बांधकाम कमी खर्चाचे असते.
   क) अपधावासाठी ते अपाय असतात.    ड) ते सहज फुटू शकतात.
   1) अ आणि ब    2) ब आणि क    3) अ आणि क    4) अ आणि ड
उत्तर :- 1

3) ............................ जमिनीसाठी तुषार सिंचन उपयुक्त आहे.
   1) खार    2) उथळ व उताराच्या 
   3) आम्लधर्मी    4) अल्कधर्मी
उत्तर :- 2

4) ....................... सांडवा पाणी आडवून पाणी साठवण्यासाठी उपयोगात आणता येत नाही.
   1) आघात    2) आघात प्रवेश    3) घसरणी    4) आपत्कालीन
उत्तर :- 3

5) एप्रिल 2002 मध्ये स्विकारलेल्या राष्ट्रीय जल नितीची ही उद्दिष्टये आहेत :
   अ) जल संसाधनांच्या नियोजनासाठी चौकट तयार करणे.    ब) एकात्मिक जल संसाधनांचा विकास.
   क) उत्तरेतील नद्या दक्षिणेतील नद्यांशी जोडणे.      ड) भूजल व्यवस्थापन.
   1) अ आणि ब फक्त बरोबर आहेत      2) क आणि ड फक्त बरोबर आहेत
   3) अ, ब आणि ड फक्त बरोबर आहेत    4) वरील सर्व बरोबर आहेत
उत्तर :- 3

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

1) ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स’चे आयोजन कोठे होणार आहे?
उत्तर : भुवनेश्वर

2) कोणता खेळाडू 21 वर्षांखालील पुरुष एकेरी गटाचा जगातला प्रथम क्रमांकाचा टेबल टेनिसपटू ठरला?
उत्तर : मानव ठक्कर

3) कोणत्या संस्थेनी ‘भारतात साखरेचे सेवन’ या विषयावर पहिला अहवाल प्रसिद्ध केला?
उत्तर : भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद

4) ‘नॅशनल स्टॉक एक्सचेंज नॉलेज हब’चे उद्घाटन कुठे झाले?
उत्तर : नवी दिल्ली

5) 11 वी ‘डिफेन्स एक्सपो इंडिया-2020’ ही प्रदर्शनी कुठे भरणार आहे?
उत्तर : लखनऊ

6) नसीम-अल-बहर हा द्विपक्षीय नौदल सराव कोणत्या दोन देशांदरम्यान सुरु आहे?
उत्तर : भारत आणि ओमान

7) ‘शेतकरी विज्ञान परिषद’ कुठे आयोजित करण्यात आली?
उत्तर : बेंगळुरू

8) 'कृषी व प्रक्रियाकृत खाद्यान्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण' कोणत्या मंत्रालयातील सर्वोच्च मंडळ आहे?
उत्तर : वाणिज्य व उद्योग मंत्रालय

9) गुजरात राज्य सरकारने 9 लक्ष कर्मचार्‍यांना लाभ देण्यासाठी महागाई भत्ता किती टक्क्यांनी वाढवला?
उत्तर : 5 टक्के

10) कोणती कंपनी नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर (NCD) याच्या माध्यमातून 2000 कोटी रुपये उभारणार आहे?
उत्तर : वेदांत लिमिटेड

1) ‘गोल्डन ग्लोब्ज 2020’ चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणी जिंकला?
उत्तर : जोकुईन फिनिक्स

2) कोणते राज्य सरकार ‘सायबर सेफ विमेन’ नावाचा जागृती उपक्रम राबवत आहे?
उत्तर : महाराष्ट्र

3) कोणत्या प्रकल्पासाठी इस्रोने भारतीय खगोलशास्त्र संस्थेसोबत करार केला?
उत्तर : नेत्र

4) मिती समुदाय भारतात प्रामुख्याने कोठे आढळतो?
उत्तर : नागालँड

5) ‘कृष्णपट्टनम बंदर’ कोणत्या राज्यात आहे?
उत्तर : आंध्रप्रदेश

6) अंतराळ क्षेत्रासाठी एक प्रादेशिक शैक्षणिक केंद्र उभारण्यासाठी ISROने कोणत्या संस्थेबरोबर करार केला?
उत्तर : NIT कर्नाटक

7) कोणत्या राज्यात कासवांसाठी नव्याप्रकारचे एक पुनर्वसन केंद्र उभारले जाणार आहे?
उत्तर : बिहार

8) 107 व्या ‘भारतीय विज्ञान परिषद’चे (ISC) उद्घाटन कुठे झाले?
उत्तर : कृषी विज्ञान विद्यापीठ, बेंगळुरू

9) मीराबाई चानू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर : भारोत्तोलन (वेटलिफ्टिंग)

10) राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली?
उत्तर : सुरेश चंद्र शर्मा

07 January 2020

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांच्या हस्ते 28 व्या नवी दिल्ली जागतिक पुस्तक मेळावा 2020 चे उद्घाटन

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल 'निशंक' यांच्या हस्ते 28 व्या नवी दिल्ली जागतिक पुस्तक मेळावा 2020 चे उद्घाटन आज प्रगती मैदान येथे झाले. प्रथितयश गांधीवादी विचारवंत प्रा. गिरीश्वर मिश्रा, नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष गोविंद प्रसाद शर्मा, मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे सचिव मदन मोहन आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना 'निशंक' यांनी या पुस्तक मेळाव्याला पुस्तकांच्या महाकुंभची उपमा दिली. पुस्तक सागराच्या मध्यभागी आपण उभे असून हा मेळावा मनुष्यत्वाला शक्ती देणाऱ्या विचारांनी भारून गेलेला आहे. हा मेळावा म्हणजे असे स्थान आहे जेथे लोक एकमेकांना भेटतात आणि नवीन आचारविचार, कल्पना यांची देवाणघेवाण करतात. तसेच युवा पिढीला नवीन विचारांच्या समीप आणतात, असे विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले. 

यंदाची संकल्पना 'गांधी: लेखकांचे लेखक' याबाबत सांगताना ते म्हणाले की, आपण गांधीजींची 150 वी जयंती साजरी करत असताना जाणवत आहे की, आपल्याला त्यांची खूप गरज आहे; जग आतंकवादासह अन्‍य समस्यांना सामोरे जात आहे. आज जग, देश, समाज आणि प्रत्येक व्यक्तीसाठी गांधी आवश्यक आहेत ते त्यांच्या शांतता व अहिंसेबाबतच्या दूरदृष्टी व तत्वज्ञानामुळे. 

याप्रसंगी केंद्रीय मंत्री 'निशंक' यांनी प्रकाशकांना पुस्तकांचा प्रचार प्रसार करण्यास पुढाकार घेण्याचे आवाहन केले. नवी दिल्ली जागतिक पुस्तक मेळावा आशिया खंडातील निर्विवादित भव्य पुस्तक मेळावा असल्याबद्दल कौतुक करताना 'निशंक' यांनी लवकरच हा जगातील सर्वात भव्य पुस्तक मेळावा असेल, अशी आशा व्यक्त केली.   

डॉ.आंबेडकरांबद्दल हे माहिती असुद्या


१. भारत देशाची *३९५ कलम, ८ परिशिष्ट व २२ भागाची राज्यघटना* लिहून जगातील संसदिय लोकशाहीचे पुनरुज्जीवन केले.

२. राज्यघटनेने सर्वांना *मुलभूत हक्क, अधिकार दिले.*
तसेच *कर्तव्य* सुद्धा नमूद केले.

याबरोबरच *"डायरेक्टीव्ह प्रिन्सिपल"* देवून सरकारच्या जबाबदाऱ्यांची तरतूद केली.

३. राज्यघटने मुळे *सामाजिक व भौगोलिकदृष्ट्या* भिन्न असलेल्या देशाला एक केले .

४. भारताच्या प्रत्येक नागरीकाला *मतदानाचा अधिकार* दिला.

५. प्रौढ *मतदानाचा (२१ वर्षांवरील)* प्रत्येक नागरिकाला अधिकार देवून *जगातील प्रथमच प्रयोग* केला.

६. भारतात प्रथम अर्थशास्त्राचा पाया रचला. *"रिजर्व बँक ऑफ इंडिया"* च्या स्थापनेचा पाया रचला. 

७. संविधान लिहून *स्त्रीयांना शिक्षणाचा अधिकार दिला.*
स्त्रीयांना नोकरी करण्याचा अधिकार दिला.
अन्यथा देशातील महिला आजही *"चूल आणि मुल"* सांभाळत बसल्या असत्या.

८. स्त्रीयांना *पुरुषांच्या बरोबरीने हक्क* मिळवून दिले.
त्यांच्या हक्क व अधिकारासाठी *हिंदू कोड बिल* संसदेत मांडले.

हिंदू कोड बिल मंजूर नाही झाले म्हणून *मंत्रिमंडळातून मंत्रीपदाचा राजीनामा* दिला.

९. नोकरी करणाऱ्या स्त्रियांसाठी *गर्भावस्था काळात ६ महिन्याच्या भरपगारी रजेची तरतूद* केली.

👉🏻(*जगात अशी तरतूद करणारे *भारत हे पहिले राष्ट्र* आहे.*)

१०. स्त्रीयांना (मुलींना) वडीलांच्या *चल-अचल संपत्तीवर मुलांच्या इतकाच (पुरुषांसारखाच) समान अधिकार* मिळवून दिला.

११. पुरुषांना *एकपत्नित्व अधिकार...*
दुसरी पत्नी असेल तर पत्नीला *पतीच्या संपत्तीमध्ये हिस्सा* मागण्याचा अधिकार मिळवून दिला.

१२. *नियोजन आयोगाची स्थापना केली.*

१३. *पंचवार्षिक योजनांची सुरुवात केली.*

१४. भारतात प्रथम *जलनिती तयार केली* व *"नद्या जोडणी प्रकल्प" आखला* पण राजकिय इच्छाशक्तीच्या अभावामुळे त्याची अंमलबजावणी झालेली नाही
आणि
त्यामुळे या देशात काही भागात पूरसदृश परिस्थिती व काही भागात पाण्याअभावी शेतकरी आत्महत्या करत आहेत.

१५. *भाकरा नांगल, दामोदर धरण, सोनाकुड, हिराकूंड धरण प्रकल्पाचे उदगाते...*

१६. ' *कोसी नदीवर धरण बांधा त्यामुळे बिहारमध्ये कधीच पूर येणार नाही’*
हे सुद्धा त्यांनीच सांगितले.

१७. भारतात प्रथम *परिवार नियोजनाचा* नारा दिला.

१८. भारतात *बालमजुरीवर रोख* लावली.

१९. कोलंबीया विद्यापीठात असताना
  *३ वर्षात २९ अभ्यासक्रम (११ इतिहास,*
६ समाजशास्त्र,
५ तत्त्वज्ञान
४ मानववंशशास्त्र,
३ राजकारणाचे)
करणारा *पहिला आणि शेवटचा व्यक्ती...*

२०. मजुरांना *१२ तास* काम करावे लागायचे, त्यासाठी *८ तास ड्युटी* व आठवड्यातून *एक* *सुट्टी* कायदा केला.

२१.  *८* *तासापेक्षा* *जास्त* काम केल्यास, कामाचा मोबदला *(ओवरटाईम)* प्रावधान लागू केले.

२२. *‘खोत बिल’* आणून सावकारी आणि वेठबिगारीचा अंत केला.

२३. भारताला *उच्च-नीच जातीवादातून मुक्त* केले...

नाहीतर चांभाराच्या मुलांनी चांभारकी,
लोहाराने लोहारकी,
सोनाराने सोनारकी, मराठ्याने शेती,
ब्राह्मणाने शिक्षण घ्यावे व पुजारी बनावे...

असे करावे लागे
पण, बाबासाहेबांच्या योगदानाने आज कोणत्याही जातितील मुले डॉक्टर, इंजीनियर, वकील, IAS, IPS, मोठमोठे अधिकारी होवू शकतात...

२४. देशातील ८०% जनतेला जिला आजपर्यंत क्षुद्र, अस्पृश्य म्हणून सर्व अधिकारांपासून हिणवण्यात आले, अत्याचार सहन करावे लागत होते,
त्यांना *समान अधिकार* मिळवून दिले

मानवमुक्तीचा आदर्श रचला...

२५. *रिजर्व बँक ऑफ* इंडियाच्या स्थापनेत *महत्त्वपूर्ण योगदान.*

२६. *संयुक्त महाराष्ट्राच्या* लढ्यात महत्वपूर्ण योगदान...

२७. *“मुंबई हि फक्त महाराष्ट्राचीच आहे आणि ती मिळवून देण्यासाठी मी माझ्या अंतापर्यंत लढेन”* अशी घोषणा केली...

२८. *"मजुरमंत्री"* असतांना *विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती* योजना आणली.

२९. उर्जानिर्मिती व्यवस्थापनासाठी *‘सेन्ट्रल टेक्निकल पावर बोर्ड (CTPB) ची स्थापना* केली.

३०. देशात *प्रथमच पाटबंधारे आणि सिंचन आयोगाची* स्थापना केली.

३१.पाण्याच्या व्यवस्थापना साठी *नैसर्गिक संसाधन* व *कोळसा आयोगाची* स्थापना केली...

३२. शेती, उद्योग~कारखाने यांच्या विकासासाठी *RCC* *(रिकन्स्ट्रक्शन कमिटी कौन्सिलची स्थापना केली)*

३३. बिहार, मध्यप्रदेशाचे विकास व्हावे यासाठी *विभाजन* करावे अशी सूचना मांडली.

आज ४५ वर्षांनंतर छत्तीसगढ आणि झारखंड राज्य निर्माण झाले... 

३४. शिक्षक भारताच्या मणक्याचा कणा आहे त्याला योग्य वेतन द्यावे यासाठी योगदान..

३५. *स्त्रीभ्रूण हत्त्या* *विरोध* , व *गर्भपात* करू नये यासाठी जनजागृती...

३६. देशाला *उपराजधानी* ची गरज आहे हे सांगणारे *प्रथम व्यक्ती...*

३७. देशात कोळसा ऊर्जेपेक्षा सौर *ऊर्जेपासून चालणारे* *जल* *विद्युत प्रकल्प उभे करावेत* हे सांगणारे *प्रथम व्यक्ती* जे अजूनही झालेले नाही...

३८. ‘मी *कायदेमंत्री बनण्यापेक्षा* मी *कृषिमंत्री* होउन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईन व देशात शेतीचा विकास करून शेतकऱ्यांचे राज्य प्रस्थापित करेन’ असे विधान करणारे सुद्धा *बाबासाहेबच* ...

३९. बाळ गंगाधर टिळक यांच्या मुलाने आत्महत्या केली,
त्या वेळेस भविष्यात कोणी आत्महत्या करू नये म्हणून भावपूर्ण लेख लिहून त्याला आदरांजली दिली व कायदा मजबूत केला.

४०. तीन *लष्कर* *प्रमुख* कधीच एकत्र येवून देशविरोधी कृत्य करून नये हे सांगून तशी मांडणी केली.

४१. *एकमात्र भारतीय* ज्यांना ब्रीटीशांकडून *गोलमेज परिषदेला* येण्याचे *विशेष निमंत्रण* दिले जायचे.

४२. *एकमात्र असे व पहिले भारतीय नेता ज्यांनी स्त्रिया, ओबीसी व एसटी प्रवर्गासाठी असलेले बिल पास न झाल्यामुळे मंत्रीपदाचा राजीनामा दिला...*

४३. बाबासाहेब *देशातील पहिले उच्चशिक्षित अर्थशास्त्री* आहेत.

४४. ते एक चांगले वायोलिन वादक, शिल्पकार व *चित्रकार* सुद्धा होते...

४५. त्यांचे एकूण *९ भाषांवर प्रभुत्व* होते. *इंग्रजी, मराठी, हिंदी, गुजराती, पारसी, संस्कृत, जर्मन, फ्रेंच, व पाली.*

४६. त्यांनी *पाली* भाषेवर इतके प्रभुत्व मिळविले कि *पाली व्याकरण व शब्दकोशाची* सुद्धा *निर्मिती* केली...

४७. *त्यांनी संसदेत मांडलेली महत्वाची विधेयके* : ~

👉🏻 *माहार वतन बिल,*

👉🏻 *हिंदु कोड बिल,*
,
*खोत बिल,*

👉🏻 *मंत्र्यांचे वेतन बिल,*

👉🏻 *रोजगार विनिमय सेवा,*

👉🏻 *पेंशन बिल,*

👉🏻 *भविष्य निर्वाह निधी (पी एफ) बिल* इ.

४८. *मराठी* हि *राजभाषा* व्हावी यासाठी *संसदेत मत* मांडले...

४९. *पाण्यासाठी आंदोलन करणारे (* *महाड सत्याग्रह) जगात पहिले व्यक्ती...*

५०. *लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स* मध्ये सर्वात जास्त *पुस्तके वाचणारे पहिले व शेवटचे व्यक्ती.* ...

५१. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून *डी. एस. सी.* पदवी मिळवणारे प्रथम व शेवटचे भारतीय...

५२. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये *आठ वर्षांचा अभ्यासक्रम ३ वर्षात करणारे जगातीन प्रथम व शेवटचे व्यक्ती,* ते सुद्धा भारतीय...

५३. देशात *भविष्य निर्वाह निधी (पी. एफ.) कायदा* आणून कामगारांच्या हक्काचे संरक्षण केले.

५४. देशातील जनतेला *वैयक्तिक आयुर्विमा* घेण्यासाठी *आयुर्विमा* महामंडळाची स्थापना करण्यासाठी कार्य केले..

५५. देशात *इम्प्लॉयमेंट एक्स्चेंजची निर्मिती* केली व सर्व समाजातील बेरोजगारांना नोकरीचे दरवाजे खुले केले...

५६. अन्याय, अत्याचारा विरोधात आवाज उठविण्यासाठी एक कुशल *पत्रकार* म्हणून
*मूकनायक* ,
* *बहिष्कृत भारत,*
*प्रबुद्ध भारत* *

*जनता*
पाक्षिक-साप्ताहिक सुरु केले...

५७. ' *बहिष्कृत हितकारणी सभे'ची स्थापना* करून जातींअंताची चळवळ सुरु केली.

५८. *दुसऱ्या गोलमेज परिषदेत अस्पृष्यांचे प्रतिनिधी* म्हणून उपस्थित राहिले...

५९. अल्पसंख्यांका विरोधात *कॉंग्रेस च्या धोरणाला गोलमेज परिषदेत विरोध.* ..

६०. *बहुजनांसाठी* मो.क. गांधी यांच्याशी वैचारिक संघर्ष करून *पुणे* *करार* केला...

६१. बहुजनांच्या राजकीय, सामाजिक हक्कांसाठी *कॉंग्रेस पक्षाशी संघर्ष* केला...

६२. राज्यघटना बनविण्यापूर्वी,
*१९३४ साली घटनात्मक दुरुस्ती* करता निर्माण करण्यात आलेल्या *पार्लमेंटरी कमिटीचे सन्माननीय सदस्य* ...

६३. हिंदू धर्मातील *चातुर्वर्ण्य* पद्धती, विषमता व अन्याय-अत्याचाराला कंटाळून *१९३५* साली येवला येथे भरलेल्या परिषदेमध्ये
‘ *मी हिंदू म्हणून जरी जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही’* अशी घोषणा केली...

६४. हिंदूंसाठी *काळाराम मंदिर* प्रवेशाचा *सत्याग्रह* केला...

६५. *“UNTOUCHABILIT”*  हा शब्द बाबासाहेबांच्या लिखाणातून *इंग्रजी भाषेत* घेण्यात आला....

६६. भारताचे पहिले *कायदेमंत्री* होण्याचा बहुमान...

६७. *त्यांनी स्थापन केलेल्या संघटना* :

👉🏻 *बहिस्कृत हितकारणी सभा,*

👉🏻 *ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन,*

👉🏻 *दि बॉम्बे म्यूनिसिपल लेबर युनियन* इ.

६८.👉🏻 *पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना* ...

६९. 👉🏻 *सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स आणि इकोनॉमिक्स ची स्थापना.*

७०. *सिद्धार्थ कॉलेज ऑफ लॉ* ची स्थापना...

७१. बुद्ध धम्माच्या प्रचार- प्रसारासाठी *बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया* ची स्थापना केली....

७२. औरंगाबाद येथे *मिलिंद* महाविद्यालयाची स्थापना...

७३. भारताच्या *राष्ट्रीय ध्वजाच्या मध्यभागी ‘अशोक चक्र’ असण्याला संसदेत मान्यता* मिळवून दिली...

७४. भारताला *राष्ट्रीय चिन्ह “अशोक चिन्ह”* मिळवून दिले जे *बुद्ध धम्मचक्र* आहे....

७५. बुद्ध धम्माचे प्रतिक *निळ्या* रंगाला *राष्ट्रीय रंग,* धम्माचे प्रतिक कमळ फुलाला राष्ट्रीय फुल, बोधिवृक्ष (पिंपळ)
राष्ट्रीयवृक्ष राष्ट्रीय प्रतीके मिळवून दिली....

७६. *‘सत्यमेव जयते’* सम्राट अशोक कालीन ब्रीदवाक्य भारताचे ब्रीदवाक्य म्हणून पुनरुज्जीवित केले...

७७. राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष म्हणून त्याच्या सन्मानाच्या निरन्तरतेसाठी कायदा बनविला...

७८. भारत देशाला🇮🇳 *तिरंगा* व त्याच्या *मधोमध अशोकचक्र*☸ अशी अनोखी भेट दिली...

७९. त्यांना मिळालेल्या उपाध्या (सन्मान) : ~

⚜ *भारतरत्न* (भारत सरकार),

⚜ *द ग्रेटेस्ट मँन इन द वर्ल्ड* (कोलंबिया विद्यापीठ),

⚜ *द युनिवर्स मेकर* (ऑक्सफर्ड विद्यापीठ),

⚜ *द ग्रेटेस्ट इंडियन* (CNN IBN व History वृत्त   वाहिनी) इ.
असे बरेच सन्मान मिळाले...

८०. एकमात्र भारतीय ज्यांनी *पुस्तकांसाठी एक घर* बनवले....

८१. विश्वातील एकमात्र व्यक्ती ज्यांच्याकडे *५०,००० पेक्षा जास्त पुस्तके/ ग्रंथ संच* आहेत...

८२. महापुरुष इतिहास घडवतात पण हे असे आहेत कि ज्यांनी ५००० वर्षांचा विषमतावादी, रूढी परम्परांनी वेढलेला इतिहास बदलला...

८३. *पाकिस्तान* मध्ये *एका भारतीयाची जयंती साजरी* होते ती व्यक्ती म्हणजे
👉🏻* *बाबासाहेब* *  ....

८४. बाबासाहेब एक महान *अर्थशास्त्री* ,
*समाजशास्त्री* ,
*विधिज्ञ* ,
*राज्यघटनाकार* ,
*आधुनिक* *भारताचे जनक*
इतिहासाचे गाढे अभ्यासक व स्वतः घडविणारे सुद्धा,
*मानववंशशास्त्र* अभ्यासक,
*पाली* साहित्याचे महान अभ्यासक,
बौद्ध साहित्याचे महान अभ्यासक “ *बोधिसत्व* ”,
महान तत्त्ववेत्ते,
निष्णात राजकारणी, *दीन-दलित-महिला-मजूर यांचे उद्धारक* ,
विज्ञानवादी शोधाचे समर्थक,
संस्कृत व हिंदू तसेच इतर सर्व *प्रचलित धर्मांचे गाढे अभ्यासक*
होते..

वरील सर्व मुद्यांव्यतीरीक्त बरीच मोठी यादी आहे
पण,
वेळेचे व जागेचे भान ठेवून इतकेच लिहित आहे.

वाचल्यानंतर एक मात्र सांगाल कि,
*“आधुनिक भारत देशाचा निर्माता”* (NATION BUILDER) हे एकच...
ते म्हणजे
👉🏻  *बोधिसत्व* *प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर...*
🇮🇳🌷🇮🇳🌷🇮🇳🌷

राज्यातील पहिले जडत्व तपासणी केंद्र "या' शहरात

◾️ शहराला होणारा पाणीपुरवठ्यातील जडत्व तपासणी (हेवी मेटल) केंद्र सोलापुरात उभारले जाण्याची शक्‍यता आहे.

◾️या संदर्भात सोमवारी मुंबईत झालेल्या बैठकीत चर्चा झाली. हे केंद्र सोलापुरात प्रत्यक्षात उभारल्यास तो महाराष्ट्र राज्यातील पहिला पथदर्शी प्रकल्प असणार आहे.

◾️राज्यातील पहिला असेल प्रकल्प 
दूषित पाण्याची समस्या सोडविण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा झाल्यास तो महाराष्ट्रातील पहिला पथदर्शी प्रकल्प असणार आहे.

◾️ यावेळी पाण्याची गुणवत्ता तपासणी आणि सुधारणा याबाबतही चर्चा झाली.

◾️महाराष्ट्रात पिण्याच्या पाण्यातील जडत्व तपासणीचा प्रकल्प नाही.

◾️नागपूर येथे नीरी केंद्र आहे, पण तपासणी दिल्ली येथील कार्यालयात होते.

◾️सोलापुरातील पिण्याच्या पाण्यामुळे अनेक प्रकारचे आजार होतात हे सर्वमान्य झाले आहे.

◾️सातत्याने अनेक वेगवेगळ्या प्रभागात गढूळ पाणी येत असतं. दूषित पाण्यामुळे 21 जणांचा बळी गेल्याच्या घटनाही सोलापुरातच झाल्या आहेत.

◾️नागरिकांना स्वच्छ आणि पुरेसे पाणी देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖