Tuesday 7 January 2020

डॉ.आंबेडकरांबद्दल हे माहिती असुद्या


१. भारत देशाची *३९५ कलम, ८ परिशिष्ट व २२ भागाची राज्यघटना* लिहून जगातील संसदिय लोकशाहीचे पुनरुज्जीवन केले.

२. राज्यघटनेने सर्वांना *मुलभूत हक्क, अधिकार दिले.*
तसेच *कर्तव्य* सुद्धा नमूद केले.

याबरोबरच *"डायरेक्टीव्ह प्रिन्सिपल"* देवून सरकारच्या जबाबदाऱ्यांची तरतूद केली.

३. राज्यघटने मुळे *सामाजिक व भौगोलिकदृष्ट्या* भिन्न असलेल्या देशाला एक केले .

४. भारताच्या प्रत्येक नागरीकाला *मतदानाचा अधिकार* दिला.

५. प्रौढ *मतदानाचा (२१ वर्षांवरील)* प्रत्येक नागरिकाला अधिकार देवून *जगातील प्रथमच प्रयोग* केला.

६. भारतात प्रथम अर्थशास्त्राचा पाया रचला. *"रिजर्व बँक ऑफ इंडिया"* च्या स्थापनेचा पाया रचला. 

७. संविधान लिहून *स्त्रीयांना शिक्षणाचा अधिकार दिला.*
स्त्रीयांना नोकरी करण्याचा अधिकार दिला.
अन्यथा देशातील महिला आजही *"चूल आणि मुल"* सांभाळत बसल्या असत्या.

८. स्त्रीयांना *पुरुषांच्या बरोबरीने हक्क* मिळवून दिले.
त्यांच्या हक्क व अधिकारासाठी *हिंदू कोड बिल* संसदेत मांडले.

हिंदू कोड बिल मंजूर नाही झाले म्हणून *मंत्रिमंडळातून मंत्रीपदाचा राजीनामा* दिला.

९. नोकरी करणाऱ्या स्त्रियांसाठी *गर्भावस्था काळात ६ महिन्याच्या भरपगारी रजेची तरतूद* केली.

👉🏻(*जगात अशी तरतूद करणारे *भारत हे पहिले राष्ट्र* आहे.*)

१०. स्त्रीयांना (मुलींना) वडीलांच्या *चल-अचल संपत्तीवर मुलांच्या इतकाच (पुरुषांसारखाच) समान अधिकार* मिळवून दिला.

११. पुरुषांना *एकपत्नित्व अधिकार...*
दुसरी पत्नी असेल तर पत्नीला *पतीच्या संपत्तीमध्ये हिस्सा* मागण्याचा अधिकार मिळवून दिला.

१२. *नियोजन आयोगाची स्थापना केली.*

१३. *पंचवार्षिक योजनांची सुरुवात केली.*

१४. भारतात प्रथम *जलनिती तयार केली* व *"नद्या जोडणी प्रकल्प" आखला* पण राजकिय इच्छाशक्तीच्या अभावामुळे त्याची अंमलबजावणी झालेली नाही
आणि
त्यामुळे या देशात काही भागात पूरसदृश परिस्थिती व काही भागात पाण्याअभावी शेतकरी आत्महत्या करत आहेत.

१५. *भाकरा नांगल, दामोदर धरण, सोनाकुड, हिराकूंड धरण प्रकल्पाचे उदगाते...*

१६. ' *कोसी नदीवर धरण बांधा त्यामुळे बिहारमध्ये कधीच पूर येणार नाही’*
हे सुद्धा त्यांनीच सांगितले.

१७. भारतात प्रथम *परिवार नियोजनाचा* नारा दिला.

१८. भारतात *बालमजुरीवर रोख* लावली.

१९. कोलंबीया विद्यापीठात असताना
  *३ वर्षात २९ अभ्यासक्रम (११ इतिहास,*
६ समाजशास्त्र,
५ तत्त्वज्ञान
४ मानववंशशास्त्र,
३ राजकारणाचे)
करणारा *पहिला आणि शेवटचा व्यक्ती...*

२०. मजुरांना *१२ तास* काम करावे लागायचे, त्यासाठी *८ तास ड्युटी* व आठवड्यातून *एक* *सुट्टी* कायदा केला.

२१.  *८* *तासापेक्षा* *जास्त* काम केल्यास, कामाचा मोबदला *(ओवरटाईम)* प्रावधान लागू केले.

२२. *‘खोत बिल’* आणून सावकारी आणि वेठबिगारीचा अंत केला.

२३. भारताला *उच्च-नीच जातीवादातून मुक्त* केले...

नाहीतर चांभाराच्या मुलांनी चांभारकी,
लोहाराने लोहारकी,
सोनाराने सोनारकी, मराठ्याने शेती,
ब्राह्मणाने शिक्षण घ्यावे व पुजारी बनावे...

असे करावे लागे
पण, बाबासाहेबांच्या योगदानाने आज कोणत्याही जातितील मुले डॉक्टर, इंजीनियर, वकील, IAS, IPS, मोठमोठे अधिकारी होवू शकतात...

२४. देशातील ८०% जनतेला जिला आजपर्यंत क्षुद्र, अस्पृश्य म्हणून सर्व अधिकारांपासून हिणवण्यात आले, अत्याचार सहन करावे लागत होते,
त्यांना *समान अधिकार* मिळवून दिले

मानवमुक्तीचा आदर्श रचला...

२५. *रिजर्व बँक ऑफ* इंडियाच्या स्थापनेत *महत्त्वपूर्ण योगदान.*

२६. *संयुक्त महाराष्ट्राच्या* लढ्यात महत्वपूर्ण योगदान...

२७. *“मुंबई हि फक्त महाराष्ट्राचीच आहे आणि ती मिळवून देण्यासाठी मी माझ्या अंतापर्यंत लढेन”* अशी घोषणा केली...

२८. *"मजुरमंत्री"* असतांना *विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती* योजना आणली.

२९. उर्जानिर्मिती व्यवस्थापनासाठी *‘सेन्ट्रल टेक्निकल पावर बोर्ड (CTPB) ची स्थापना* केली.

३०. देशात *प्रथमच पाटबंधारे आणि सिंचन आयोगाची* स्थापना केली.

३१.पाण्याच्या व्यवस्थापना साठी *नैसर्गिक संसाधन* व *कोळसा आयोगाची* स्थापना केली...

३२. शेती, उद्योग~कारखाने यांच्या विकासासाठी *RCC* *(रिकन्स्ट्रक्शन कमिटी कौन्सिलची स्थापना केली)*

३३. बिहार, मध्यप्रदेशाचे विकास व्हावे यासाठी *विभाजन* करावे अशी सूचना मांडली.

आज ४५ वर्षांनंतर छत्तीसगढ आणि झारखंड राज्य निर्माण झाले... 

३४. शिक्षक भारताच्या मणक्याचा कणा आहे त्याला योग्य वेतन द्यावे यासाठी योगदान..

३५. *स्त्रीभ्रूण हत्त्या* *विरोध* , व *गर्भपात* करू नये यासाठी जनजागृती...

३६. देशाला *उपराजधानी* ची गरज आहे हे सांगणारे *प्रथम व्यक्ती...*

३७. देशात कोळसा ऊर्जेपेक्षा सौर *ऊर्जेपासून चालणारे* *जल* *विद्युत प्रकल्प उभे करावेत* हे सांगणारे *प्रथम व्यक्ती* जे अजूनही झालेले नाही...

३८. ‘मी *कायदेमंत्री बनण्यापेक्षा* मी *कृषिमंत्री* होउन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईन व देशात शेतीचा विकास करून शेतकऱ्यांचे राज्य प्रस्थापित करेन’ असे विधान करणारे सुद्धा *बाबासाहेबच* ...

३९. बाळ गंगाधर टिळक यांच्या मुलाने आत्महत्या केली,
त्या वेळेस भविष्यात कोणी आत्महत्या करू नये म्हणून भावपूर्ण लेख लिहून त्याला आदरांजली दिली व कायदा मजबूत केला.

४०. तीन *लष्कर* *प्रमुख* कधीच एकत्र येवून देशविरोधी कृत्य करून नये हे सांगून तशी मांडणी केली.

४१. *एकमात्र भारतीय* ज्यांना ब्रीटीशांकडून *गोलमेज परिषदेला* येण्याचे *विशेष निमंत्रण* दिले जायचे.

४२. *एकमात्र असे व पहिले भारतीय नेता ज्यांनी स्त्रिया, ओबीसी व एसटी प्रवर्गासाठी असलेले बिल पास न झाल्यामुळे मंत्रीपदाचा राजीनामा दिला...*

४३. बाबासाहेब *देशातील पहिले उच्चशिक्षित अर्थशास्त्री* आहेत.

४४. ते एक चांगले वायोलिन वादक, शिल्पकार व *चित्रकार* सुद्धा होते...

४५. त्यांचे एकूण *९ भाषांवर प्रभुत्व* होते. *इंग्रजी, मराठी, हिंदी, गुजराती, पारसी, संस्कृत, जर्मन, फ्रेंच, व पाली.*

४६. त्यांनी *पाली* भाषेवर इतके प्रभुत्व मिळविले कि *पाली व्याकरण व शब्दकोशाची* सुद्धा *निर्मिती* केली...

४७. *त्यांनी संसदेत मांडलेली महत्वाची विधेयके* : ~

👉🏻 *माहार वतन बिल,*

👉🏻 *हिंदु कोड बिल,*
,
*खोत बिल,*

👉🏻 *मंत्र्यांचे वेतन बिल,*

👉🏻 *रोजगार विनिमय सेवा,*

👉🏻 *पेंशन बिल,*

👉🏻 *भविष्य निर्वाह निधी (पी एफ) बिल* इ.

४८. *मराठी* हि *राजभाषा* व्हावी यासाठी *संसदेत मत* मांडले...

४९. *पाण्यासाठी आंदोलन करणारे (* *महाड सत्याग्रह) जगात पहिले व्यक्ती...*

५०. *लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स* मध्ये सर्वात जास्त *पुस्तके वाचणारे पहिले व शेवटचे व्यक्ती.* ...

५१. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून *डी. एस. सी.* पदवी मिळवणारे प्रथम व शेवटचे भारतीय...

५२. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये *आठ वर्षांचा अभ्यासक्रम ३ वर्षात करणारे जगातीन प्रथम व शेवटचे व्यक्ती,* ते सुद्धा भारतीय...

५३. देशात *भविष्य निर्वाह निधी (पी. एफ.) कायदा* आणून कामगारांच्या हक्काचे संरक्षण केले.

५४. देशातील जनतेला *वैयक्तिक आयुर्विमा* घेण्यासाठी *आयुर्विमा* महामंडळाची स्थापना करण्यासाठी कार्य केले..

५५. देशात *इम्प्लॉयमेंट एक्स्चेंजची निर्मिती* केली व सर्व समाजातील बेरोजगारांना नोकरीचे दरवाजे खुले केले...

५६. अन्याय, अत्याचारा विरोधात आवाज उठविण्यासाठी एक कुशल *पत्रकार* म्हणून
*मूकनायक* ,
* *बहिष्कृत भारत,*
*प्रबुद्ध भारत* *

*जनता*
पाक्षिक-साप्ताहिक सुरु केले...

५७. ' *बहिष्कृत हितकारणी सभे'ची स्थापना* करून जातींअंताची चळवळ सुरु केली.

५८. *दुसऱ्या गोलमेज परिषदेत अस्पृष्यांचे प्रतिनिधी* म्हणून उपस्थित राहिले...

५९. अल्पसंख्यांका विरोधात *कॉंग्रेस च्या धोरणाला गोलमेज परिषदेत विरोध.* ..

६०. *बहुजनांसाठी* मो.क. गांधी यांच्याशी वैचारिक संघर्ष करून *पुणे* *करार* केला...

६१. बहुजनांच्या राजकीय, सामाजिक हक्कांसाठी *कॉंग्रेस पक्षाशी संघर्ष* केला...

६२. राज्यघटना बनविण्यापूर्वी,
*१९३४ साली घटनात्मक दुरुस्ती* करता निर्माण करण्यात आलेल्या *पार्लमेंटरी कमिटीचे सन्माननीय सदस्य* ...

६३. हिंदू धर्मातील *चातुर्वर्ण्य* पद्धती, विषमता व अन्याय-अत्याचाराला कंटाळून *१९३५* साली येवला येथे भरलेल्या परिषदेमध्ये
‘ *मी हिंदू म्हणून जरी जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही’* अशी घोषणा केली...

६४. हिंदूंसाठी *काळाराम मंदिर* प्रवेशाचा *सत्याग्रह* केला...

६५. *“UNTOUCHABILIT”*  हा शब्द बाबासाहेबांच्या लिखाणातून *इंग्रजी भाषेत* घेण्यात आला....

६६. भारताचे पहिले *कायदेमंत्री* होण्याचा बहुमान...

६७. *त्यांनी स्थापन केलेल्या संघटना* :

👉🏻 *बहिस्कृत हितकारणी सभा,*

👉🏻 *ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन,*

👉🏻 *दि बॉम्बे म्यूनिसिपल लेबर युनियन* इ.

६८.👉🏻 *पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना* ...

६९. 👉🏻 *सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स आणि इकोनॉमिक्स ची स्थापना.*

७०. *सिद्धार्थ कॉलेज ऑफ लॉ* ची स्थापना...

७१. बुद्ध धम्माच्या प्रचार- प्रसारासाठी *बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया* ची स्थापना केली....

७२. औरंगाबाद येथे *मिलिंद* महाविद्यालयाची स्थापना...

७३. भारताच्या *राष्ट्रीय ध्वजाच्या मध्यभागी ‘अशोक चक्र’ असण्याला संसदेत मान्यता* मिळवून दिली...

७४. भारताला *राष्ट्रीय चिन्ह “अशोक चिन्ह”* मिळवून दिले जे *बुद्ध धम्मचक्र* आहे....

७५. बुद्ध धम्माचे प्रतिक *निळ्या* रंगाला *राष्ट्रीय रंग,* धम्माचे प्रतिक कमळ फुलाला राष्ट्रीय फुल, बोधिवृक्ष (पिंपळ)
राष्ट्रीयवृक्ष राष्ट्रीय प्रतीके मिळवून दिली....

७६. *‘सत्यमेव जयते’* सम्राट अशोक कालीन ब्रीदवाक्य भारताचे ब्रीदवाक्य म्हणून पुनरुज्जीवित केले...

७७. राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष म्हणून त्याच्या सन्मानाच्या निरन्तरतेसाठी कायदा बनविला...

७८. भारत देशाला🇮🇳 *तिरंगा* व त्याच्या *मधोमध अशोकचक्र*☸ अशी अनोखी भेट दिली...

७९. त्यांना मिळालेल्या उपाध्या (सन्मान) : ~

⚜ *भारतरत्न* (भारत सरकार),

⚜ *द ग्रेटेस्ट मँन इन द वर्ल्ड* (कोलंबिया विद्यापीठ),

⚜ *द युनिवर्स मेकर* (ऑक्सफर्ड विद्यापीठ),

⚜ *द ग्रेटेस्ट इंडियन* (CNN IBN व History वृत्त   वाहिनी) इ.
असे बरेच सन्मान मिळाले...

८०. एकमात्र भारतीय ज्यांनी *पुस्तकांसाठी एक घर* बनवले....

८१. विश्वातील एकमात्र व्यक्ती ज्यांच्याकडे *५०,००० पेक्षा जास्त पुस्तके/ ग्रंथ संच* आहेत...

८२. महापुरुष इतिहास घडवतात पण हे असे आहेत कि ज्यांनी ५००० वर्षांचा विषमतावादी, रूढी परम्परांनी वेढलेला इतिहास बदलला...

८३. *पाकिस्तान* मध्ये *एका भारतीयाची जयंती साजरी* होते ती व्यक्ती म्हणजे
👉🏻* *बाबासाहेब* *  ....

८४. बाबासाहेब एक महान *अर्थशास्त्री* ,
*समाजशास्त्री* ,
*विधिज्ञ* ,
*राज्यघटनाकार* ,
*आधुनिक* *भारताचे जनक*
इतिहासाचे गाढे अभ्यासक व स्वतः घडविणारे सुद्धा,
*मानववंशशास्त्र* अभ्यासक,
*पाली* साहित्याचे महान अभ्यासक,
बौद्ध साहित्याचे महान अभ्यासक “ *बोधिसत्व* ”,
महान तत्त्ववेत्ते,
निष्णात राजकारणी, *दीन-दलित-महिला-मजूर यांचे उद्धारक* ,
विज्ञानवादी शोधाचे समर्थक,
संस्कृत व हिंदू तसेच इतर सर्व *प्रचलित धर्मांचे गाढे अभ्यासक*
होते..

वरील सर्व मुद्यांव्यतीरीक्त बरीच मोठी यादी आहे
पण,
वेळेचे व जागेचे भान ठेवून इतकेच लिहित आहे.

वाचल्यानंतर एक मात्र सांगाल कि,
*“आधुनिक भारत देशाचा निर्माता”* (NATION BUILDER) हे एकच...
ते म्हणजे
👉🏻  *बोधिसत्व* *प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर...*
🇮🇳🌷🇮🇳🌷🇮🇳🌷

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 18 एप्रिल 2024

🔖 प्रश्न.1) मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कोणाला जाहीर झा...