१२ ऑगस्ट २०२५

MPSC STUDENT महत्वाचे प्रश्नसंच

1) खालीलपैकी गतीविषयक पहिले समीकरण कोणते ?

1) v² = u² + at         2) v = u + at    

3) v = ut + ½at²      4) v = u + v/t

उत्तर :- 2


2) खालीलपैकी कोणते धातू आहेत ?

   अ) ॲल्युमिनीअम,  सोने      ब) लोखंड, तांबे

   क) चांदी, तांबे        ड) आयोडीन, सिलिकॉन

   1) अ, ब           2) ब, क    

   3) अ, ब, क      4) अ, ब, क, ड

उत्तर :- 3

1) खालीलपैकी कोणत्या शहरात देशातील प्रथम राष्ट्रीय डॉल्फीन संशोधन केंद्र उघडण्यात येणार आहे.

   1) मुंबई    2) चेन्नई    

   3) पटना      4) बेंगळूरू

उत्तर :- 3


2) योग्य जोडया निवडा. (राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार)

   अ) 2018    --  विराट कोहली, मीराबाई चानू

   ब) 2017    --  सरदार सिंग, देवेंद्र झांझरिया

   क) 2016    --  पी.व्ही. सिंधु, साक्षी मलिक, दिपा कर्माकर, जितू रॉय

   ड) 2015    --  सानिया मिर्झा

  1) अ, क, ड    2) अ, ब, क, ड  

  3) अ, ब, ड    4) अ, ब, क

उत्तर :- 2


3) खालीलपैकी कोणता दिवस हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो.

   1) 15 सप्टेंबर    2) 15 ऑक्टोबर    3) 14 ऑगस्ट    4) 24 डिसेंबर

उत्तर :- 2


4) तृतीयपंथीय लोकांकरीता मैदानी स्पर्धा आयोजित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते.

   अ) तामिळनाडू    ब) केरळ      क) गुजरात    ड) महाराष्ट्र

  1) ड      2) क     

  3) ब      4) अ

उत्तर :- 3


5) थेट जनतेकडून सरपंचाची निवड करण्याचा निर्णय घेणारे महाराष्ट्र देशातील कितवे राज्य आहे.

   1) पहिले    2) दुसरे  

   3) तिसरे      4) चौथे

उत्तर :- 3


3) खालील विधानांचा विचार करा.

   अ) पेशीचा आकार मुख्यत्वे तिच्या कार्याशी निगडीत असतो.

   ब) सूक्ष्मजीवांना गिळंकृत करण्यासाठी पांढ-या रक्तपेशी स्वत:चा आकार बदलू शकतात.

   क) एका टोकाकडून दुस-या टोकाकडे आवेगाने वहन करण्यासाठी चेतापेशींची लांबी जास्त असते.

   ड) केशिकांमधून सुलभ वहन होण्यासाठी मानवी लोहीत रक्तपेशींचा आकार व्दिबर्हिर्वक्री गोलाकार असतो.

   1) अ, ब, क    2) अ, क, ड 

   3) अ, ब, ड      4) वरील सर्व बरोबर

उत्तर :- 1


4) v² = u² + 2as हे गतीविषयक कितवे समीकरण आहे ?

   1) चौथे         2) पहिले    

   3) तिसरे        4) दुसरे

उत्तर :- 3


5) खालीलपैकी कोणते मूलद्रव्य धातू तसेच अधातूंचे गुणधर्म दर्शविते.

   1) आर्सेनिक, अँटीमनी 

   2) सेलिनिअम, सिलिकॉन

   3) जर्मेनिअम    

  4) वरील सर्व

उत्तर :- 4



1) कँडेला (Candela) हे खालीलपैकी कशाचे एकक आहे.

   1) ल्युमिनस इंटेनसिटी (Luminous Intensity)

    2) चुंबकीय विकर्षरेषा

   3) चुंबकीय क्षेत्र       

   4) विद्युत प्रभार

उत्तर :- 1


2) ॲल्युमिनीअम, लोखंड, जस्त या धातूंची थंड / उष्ण पाण्याबरोबर अभिक्रिया होत नाही मात्र

   1) वाफेशी अभिक्रिया होऊन ऑक्साईड तयार होते.     

   2) ऑक्सिजन वायू मुक्त होतो.

   3) 2 Al + 3 H2O   Al2O3 + H2 ही अभिक्रिया होणार    

   4) वरील सर्व

उत्तर :- 4


3) खालील विधानांचा विचार करा.

   अ) लाल रक्तपेशी या भ्रूणामध्ये यकृतात किंवा प्लिहामध्ये तयार होतात.

   ब) लाल रक्तपेशी प्रौढ माणसांत अस्थिमज्जेत तयार होतात.

   क) पांढ-या पेशी या अस्थिमज्जा तसेच प्लिहामध्ये तयार होतात.

   ड) वरील सर्व विधाने बरोबर आहे.

1) अ, क  2) ड   3) ब, क 4) फक्त अ  

उत्तर :- 2


4) खालीलपैकी कोणते मूलभूत एकक MKS, CGS आणि FPS या तिन्ही पध्दतीत सामाईक आहे.

   1) मीटर  2) सेकंद   3) ग्रॅम  4) फूट

उत्तर :- 2


5) असे कोणते धातू मूलद्रव्ये आहेत ज्यांची पाणी व वाफ सोबत रासायनिक अभिक्रिया होत नाही.

 1) सोने  2) चांदी    

3) तांबे      4) वरील सर्व

उत्तर 4


📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌



1) 2018 चा मिस वर्ल्ड चा किताब कोणी जिंकला.

   1) वेनेसा पोन्स डी लिऑन     

   2) निकालेन पिशाना

   3) मानुषी छिल्लर      

   4) मानसी मल्होत्रा

उत्तर :- 1


2) पूर्णपणे भारतीय बनावटीची इंजिनविरहीत ............. ही देशातील सर्वात वेगाने धावणारी ट्रेन ठरली आहे.

   1) ट्रेन 18    2) ट्रेन 20    

   3) ट्रेन 21    4) ट्रेन 25

उत्तर :- 1


3) खालील माहितीचा विचार करा.

   अ) राजीव महर्षी यांची भारताच्या नियंत्रक व महालेखापालपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली.

   ब) राजीव महर्षी हे भारताचे 13 वे नियंत्रक व महालेखापाल आहे.

   क) भारताचे पहिले नियंत्रक व महालेखापाल व्ही. नरहरी राव होते.

   ड) भारताचे संविधानाच्या कलम 148 नुसार नियंत्रक व महालेखापालाची रचना करण्यात आलेली आहे.

  1) अ, ब, क बिनचूक      

  2) अ, क, ड बिनचूक

  3) अ, ब, ड बिनचूक      

  4) अ, ब, क, ड बिनचूक

उत्तर :- 4


4) RBI ने जाहीर केलेल्या अहवालानुसार खालीलपैकी कोणत्या देशांकडून भारताला सर्वाधिक (Remittances) प्राप्त होतो.1) UAE       2) USA      

3) कतार      4) कुवेत

उत्तर :- 1


5) खालील माहितीचा विचार करा.

अ) मायकेल ॲन्डाटजे यांना जुलै 2018 मध्ये The English Patient या पुस्तकासाठी गोल्ड मॅन बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ब) मॅन बुकर पुरस्काराच्या 50 व्या वर्धापनदिनानिमित्त खास गोल्ड मॅन बुकर पुरस्काराचे वितरण करण्यात आले होते.

क) मॅन बुकर पुरस्काराची सुरुवात 1969 पासून झाली.

1) अ सत्य         2) अ, ब सत्य    

3) अ, क सत्य    4) अ, ब, क सत्य

उत्तर :- 4




📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌



1) कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात विकास प्रकल्पाची साधनसामुग्री संरक्षण क्षेत्राकडे वळविणे भाग पडले ?

1) पहिली पंचवार्षिक योजना      

2) दुसरी पंचवार्षिक योजना

3) तिसरी पंचवार्षिक योजना      

4) पाचवी पंचवार्षिक योजना

उत्तर :- 3


2) भारतातील प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये ............... या उद्दिष्टावर भर दिला होता.

1) सहकार व स्वातंत्र्य      

2) विकास व तंत्रज्ञान

3) आत्मनिर्भरता व स्वावलंबन    

4) बेरोजगारी

उत्तर :- 3


3) पायाभूत व जड उद्योगावर भरीव खर्च व सार्वजनिक क्षेत्र वाढीवर जोर कुठपर्यंत चालू होता ?

   1) तिसरी योजना      2) पाचवी योजना

   3) आठवी योजना      4) दहावी योजना

उत्तर :- 3


4) दहाव्या पंचवार्षिक योजनेतील उद्देशिय स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचे उद्दिष्टे  खालीलपैकी कोणते होते ?

   1) 9.00%       2) 8.00%   

   3) 10.00%    4) 07.00%

उत्तर :- 2


5) भारताच्या दहाव्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणते लक्ष्य निश्चित केले नव्हते?

अ) दारिद्रयात घट      

ब) सहकारास प्रोत्साहन

क) वृद्धीदर आणि रोजगारात वाढ    

ड) प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकण

   1) अ फक्त          2) ब फक्त   

    3) क आणि ड    4) ड आणि अ

उत्तर :- 2


1) जोडया लावा.

   अ) मूलभूत अधिकार      i) जर्मनीचे वायमर संविधान

   ब) निती निर्देशक तत्वे      ii) कॅनडाचे संविधान

   क) केंद्र सरकारला उर्वरित अधकार    iii) आयरिश संविधान

   ड) आणीबाणी        iv) अमेरिकेचे संविधान

             अ  ब  क  ड

         1)  iv  i  iii  ii

         2)  iv  iii  i  ii

         3)  iv  iii  ii  i

         4)  I  iii  iv  ii

उत्तर :- 3


2) भारतीय संविधानाची वैशिष्टये आणि त्यांच्या स्त्रोतांच्या योग्य जोडया लावा.

   अ) एकेरी नागरिकत्व    i) ब्रिटीश राज्यघटना

   ब) मूलभूत हक्क      ii) फ्रान्स राज्यघटना

   क) स्वातंत्र्य, समता, बंधुता  iii) कॅनेडियन राज्यघटना

   ड) उर्वरित अधिकार    iv) अमेरिकेची राज्यघटना

             अ  ब  क  ड

         1)  iv  iii  i  ii

         2)  i  iv  ii  iii

         3)  iii  i  iv  ii

         4)  i  iii  iv  ii

उत्तर :- 2


3) राजकुमारी अमृत कौर ह्या कोणत्या मतदार संघातून संविधान सभेवर निवडून आल्या होत्या ?

   1) बिहार    2) केंद्रीय प्रांत    3) बाँम्बे      4) पंजाब

उत्तर :- 2


4) सर्वोच्च न्यायालयाने काही वैशिष्टयांना संविधानाची पायाभूत वैशिष्टये म्हणून मान्यता दिली आहे. पुढीलपैकी कोणत्या 

     वैशिष्टयांचा त्यात समावेश होतो ते सांगा .

   अ) समतेचे तत्व      ब) स्वातंत्र्याचे तत्व    क) संघराज्य    ड) समाजवादी संरचना

   इ) न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार    फ) धर्मनिरपेक्षता

   1) अ, ब, क, ड, इ, फ    2) अ, क, इ, फ      3) अ, ब, क, ड, फ    4) अ, ब, क, इ, फ

उत्तर :- 2


5) खालील विधानांचा विचार करा.

   अ) डॉ. बी.आर. आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते.

   ब) श्री. एच.जे. खांडेकर हे या समितीचे सदस्य होते.

   1) ब बरोबर आहे    2) अ बरोबर आहे      3) दोन्ही बरोबर आहेत  4) दोन्ही चूक आहेत

उत्तर :- 2


1) एखाद्या  नळीचा अंतर्गत व्यास मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते मापक वापरतात ?

1) मायक्रोमीटर    2) व्हर्निअर कॅलीपर  3) नॅनोमीटर        4) वरीलपैकी नाही

उत्तर :- 2


2) खालीलपैकी कोणत्या धातूची विरल HCl सोबत अभिक्रिया होत नाही.

   1) लोखंड    2) जस्त   

   3) तांबे      4) वरील सर्व

उत्तर :- 3


3) खालीलपैकी कोणता घटक रक्त गोठण्याच्या क्रियेत भाग घेतो.

   अ) कॅल्शिअम    ब) व्हिटॅमीन    क) रक्तपट्टीका     ड) फायब्रीनोजीन    इ) प्रोथ्रॉम्बीन

   1) अ, ड, इ    2) फक्त ड, इ    

   3) क, ड, इ    4) वरील सर्व

उत्तर :- 4


4) खालीलपैकी संपूर्ण अदिश राशींचा समूह कोणता ?

  1) वस्तुमान, घनता, कार्य, उष्णता  

  2) चाल, संवेग, बल, त्वरण

  3) लांबी, वेग, विस्थापन, चाल      

  4) संवेग, तापमान, उष्णता, ऊर्जा

उत्तर :- 1


5) आम्लारीची धातूंवर अभिक्रिया झाली असता कोणता वायू बाहेर पडतो ?

   1) CO2    2) O2      

   3) H2      4) यापैकी नाही

उत्तर :- 3


1) UNHRC चे पूर्ण रूप काय ?

   अ) United Nations Human Right Counsil

   ब) United Nations Higher Refugeas Counsil

   क) United Nations Human Right Commision

   ड) United Nations Human Right Court

  1) अ      2) ब      3) क      4) ड

उत्तर :- 1


2) खालीलपैकी अभिनेत्री लालन सारंग बाबत काय खरे आहे.

   अ) लालन सारंग यांचे 9 नोव्हेंबर 2018 रोजी वयाच्या 69 व्या वर्षी निधन झाले.

   ब) रंगभूमीवरील बंडखोर अभिनेत्री म्हणून त्या ओळखल्या जायच्या.

   क) विजय तेंडूलकर यांच्या सखाराम बाईंडर या नाटकात त्यांनी साकारलेली चंपाची भूमिका वादळी ठरली होती.

   ड) त्यांनी 87 व्या मराठी नाटयसंमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते.

  1) अ, ब, क    2) अ, क, ड   

  3) अ, ब, ड    4) अ, ब, क, ड

उत्तर :- 4


3) खालीलपैकी कोणत्या शहरात देशातील पहिले क्रिप्टोकरन्सी ATM सुरू करण्यात आले आहे.

   1) मुंबई        2) दिल्ली  

   3) बेंगळूरू    4) नागपूर

उत्तर :- 3


4) ‘नालसा’ (NALSA) च्या कार्यकारी अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली.

1) न्या. मदन लोकूर  2) तुषार मेहता    3) रवी शर्मा             4) यापैकी नाही

उत्तर :- 1


5) खालीलपैकी कोणाची मालदीवच्या अध्यक्षपदी निवड झाली.

   1) इब्राहीम महंमद सोलीह        

   2) अब्दुल्ला यामीन

   3) महंमद नाशीद      

   4) यापैकी नाही

उत्तर :- 1


1) 12 व्या पंचवार्षिक योजनेमध्ये पायाभूत क्षेत्रामधील अंदाजे गुंतवणूक किती आहे ?

   1) 11 व्या पंचवार्षिक योजनेमध्ये केलेल्या गुंतवणुकीच्या दुप्पट

   2) 11 व्या पंचवार्षिक योजनेमध्ये केलेल्या गुंतवणुकीच्या 120%

   3) 11 व्या पंचवार्षिक योजनेमध्ये केलेल्या गुंतवणुकीच्या 150%

   4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 1


2) काही पंचवार्षिक योजनांकरिता विकासाच्या उद्दिष्टांची टक्केवारी व प्रत्यक्षात आत्मसात विकासाची टक्केवारी पुढे दिली आहे. 

    यातील कोणते विधान चुकीचे आहे ?

           उद्दिष्ट    प्रत्यक्षात

1) प्रथम योजना (1951 – 56)  2.1    3.6

2) चौथी योजना (1969 – 74)  5.7    2.05 

3) आठवी योजना (1992 – 97)  5.6    6.68

4) दहावी योजना (2002 – 2007)  8.0    9.7

उत्तर :- 4


3) खालीलपैकी कोणती जोडी चूक आहे ?

   1) पहिली पंचवार्षिक योजना = (1951 – 56)

   2) तिसरी पंचवार्षिक योजना = (1966 – 71)

   3) सहावी पंचवार्षिक योजना = (1980 – 85)

   4) दहावी पंचवार्षिक योजना = ( 2002 – 2007)

उत्तर :- 2


4) 12 व्या पंचवार्षिक योजनेमध्ये (2012 – 17) , नियोजन आयोगाने पायाभूत विकासासाठी अंदाजे रु. 45 लक्ष कोटींची 

    गुंतवणुकीची तरतूद केली आहे. या गुंतवणुकीपैकी खाजगी गुंतवणुकीची वाटा किती आहे ?

   1) कमीत कमी 50%      2) 60%    

   3) कमीत कमी 45%      4) 75%

उत्तर :- 1


5) खालीलपैकी कोणती अकराव्या पंचवार्षिक योजनेची उद्दिष्ट समजता येतील  ?

   अ) संपूर्ण देशाकरिता सकलदेशीय उत्पादन (GDP) 9% पर्यंत नेणे.

   ब) दुर्बल घटकांकरिता अन्न व पौष्टिक आहाराची व्यवस्था करणे.

   क) सकल देशी उत्पादन (GDP) 8% पर्यंत  नेणे.

   ड) दरडोई सकल देशी उत्पादनात (GDP) वार्षिक वृद्धी 7.6% व्हावी.

   1) अ, ब, क      2) अ, ड     

   3) ब, क           4) अ, ब, क, ड

उत्तर :- 2



1) योग्य जोडया लावा.

                     गती      उदाहरण

         1) स्थानांतरणीय    अ) यात्रेतील फिरणारा पाळणा

         2) परिवलन      ब) पृथ्वीवरील दिवस – रात्र

         3) नियतकालिक    क) चालणारी व्यक्ती

         4) यादृच्छिक    ड) उडणारे फुलपाखरू

        इ) सायकलचा ब्रेक

    1) 1-क, 2-अ, 3-ब, 4-ड  

    2) 1-क, 2-ब, 3-अ, 4-ड

    3) 1-अ, 2-ब, 3-क, 4-ड  

    4) 1-क, 2-ब, 3-ड, 4-अ

उत्तर :- 1


2) योग्य पर्याय निवडा.

            धातू/अधातू      उपयोग

           

            1) पारा        अ) लोखंड, कार्बन, निकेल, क्रोमिअम यांचे संमिश्र

           2) ग्रॅफाइट        ब) लोखंड, कार्बन, यांचे संमिश्र

           3) सल्फर        क) पेन्सिलीतील शिसे

           4) पोलाद        ड) औषधे

           5) स्टेनलेस स्टील      इ) तापमापी

   1) 1-इ, 2-क, 3-ड, 4-ब, 5-अ    

   2) 1-इ, 2-क, 3-ड, 4-अ, 5-ब

   3) 1-इ, 2-क, 3-अ, 4-ड, 5-ब     

   4) 1-इ, 2-क, 3-अ, 4-ब, 5-ड

उत्तर :- 1


3) खालील कोणत्या संघात खुली रक्ताभिसरण संस्था आढळते.

   अ) संघ मोलुस्का    ब) संघ आर्थोपोडा    क) दोन्ही बरोबर    ड) दोन्ही चूक

   1) अ        2) ब      3) क      4) ड

उत्तर :- 3


4) अ) वेगबदलाच्या दराला त्वरण असे म्हणतात.

    ब) हवेचा कुठलाही विरोध नसताना उंचीवरून खाली सोडलेल्या वस्तूचे त्वरण एकसमान त्वरण असे म्हणतात.

    क) ऋण त्वरणाला ‘मंदन’ असेही म्हणतात.

          वरीलपैकी सत्य विधान/ विधाने कोणती ?

   1) फक्त अ      2) फक्त ब   

   3) फक्त क      4) अ, ब, क

उत्तर :- 4


5) मध्यम अभिक्रियाशील धातूंचे निष्कर्षणबाबत योग्य विधान/विधाने ओळखा.

   अ) लोखंड, जस्त, तांबे हे मध्यम अभिक्रियाशील धातू आहेत.

   ब) हे सल्फाईड किंवा कार्बोनेटच्या रूपात आढळतात.

   क) कार्बोनेट मर्यादित हवेमध्ये तीव्रपणे तापवून त्यांचे ऑक्साईडमध्ये रूपांतर कॅल्सिनेशन पध्दतीव्दारे केले जाते.

   1) अ, ब बरोबर , क चूक   

   2) अ, ब, क बरोबर 

   3) अ, क बरोबर, ब चूक 

   4) सर्व अयोग्य

उत्तर :- 2



1) योग्य जोडया निवडा.

   अ) धवलक्रांतीचे जनक      --  वर्गीस कुरीयन

   ब) जागतिक हरितक्रांतीचे जनक    --  नॉर्मन बोरलाँग

   क) भारतीय हरितक्रांतीचे जनक    --  डॉ. स्वामीनाथन

   ड) महाराष्ट्राच्या हरितक्रांतीचे जनक  --  वसंतराव नाईक

  1) अ, क, ड    2) अ, ब, ड  

  3) अ, ब, क    4) अ, ब, क, ड

उत्तर :- 4


2) ज्यू  समुदायाला धार्मिक अल्पसंख्याक दर्जा देणारे गुजरात हे कितवे राज्य आहे.

   1) पहिले    2) दुसरे    

   3) तिसरे      4) चौथ्ये

उत्तर :- 3


3) सह्योग HOP TAC – 2018 हा भारताचा कोणत्या देशाबरोबरचा संयुक्त युध्दाभ्यास आहे.

   1) व्हिएतनाम    2) ऑस्ट्रेलिया 

   3) अमेरिका       4) यापैकी नाही

उत्तर :- 1


4) खालील माहितीचा विचार करा.

   अ) केनियाची राजधानी नैरोबी येथे पहिल्या शाश्वत निल अर्थव्यवस्था परिषद नोव्हेंबर 2018 मध्ये पार पडली.

   ब) या परिषदेचे यजमान पद केनियाने भूषविले.

   क) या परिषदेची संकल्पना निला अर्थव्यवस्था आणि शाश्वत विकासासाठी 2030 अजेंडा अशी होती.

  1) अ, क योग्य    

  2) अ, ब योग्य  

  3) अ योग्य   

  4) अ, ब, क योग्य

उत्तर :- 4


5) खालीलपैकी बिनचूक जोडया निवडा. ( 90 वे ऑस्कर पुरस्कार)

   अ) सर्वोत्कृष्ट चित्रपट  -  द शेप ऑफ वाटर

   ब) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक  -  त्रिआमो डेलटोरो

   क) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री  -  फ्रान्सिस मॅकडोरमंड

   ड) सर्वोत्कृष्ट अभिनेता  -  गॅरी ओल्ड मॅन

  1) अ, ब, क    2) अ, ब, क, ड   

  3) अ, ब, ड    4) अ, क, ड

उत्तर :- 2



1) दहाव्या पंचवार्षिक योजनेत कोणते क्षेत्र ‘गाभा क्षेत्र’ मानण्यात आले ?

   अ) औद्योगिक क्षेत्र    

    ब) शिक्षण क्षेत्र

   क) पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा   

   ड) कृषी क्षेत्र

         दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.

   1) अ फक्त    2) अ आणि क 

   3) ब फक्त    4) ड  फक्त

उत्तर :- 4


2) नियोजन आयोगाच्या मतानुसार नवव्या पंचवार्षिक योजनेमध्ये खालीलपैकी कोणत्या एका विशिष्ट मुद्द्यावर लक्ष केंद्रित केले  

     गेले ?

   1) सामाजिक न्याय आणि समतेसह विकास     

   2) सामाजिक न्याय आणि न्यायबुद्धीसह विकास

   3) सामाजिक न्याय आणि रोजगारासहीत विकास  

  4) सामाजिक न्याय आणि आर्थिक समानतेसह विकास

उत्तर :- 2


3) खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

   अ) अकराव्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट ‘जलद आणि सर्वसमावेशी वृद्धी’ होते.

   ब) अकराव्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट ‘अधिक आणि संतुलित वृद्धी’ होते.

   1) फक्त अ बरोबर   

   2) फक्त ब बरोबर  

   3) दोन्ही बरोबर  

   4) दोन्ही चूक

उत्तर  :- 1


4) 12 व्या योजनेच्या संदर्भात पुढील कोणती विधाने बरोबर आहेत ?

   अ) योजनेचा कालावधी : 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2017

   ब) नियोजनाचे दोन मसुदे, 9 टक्के विकास दर आणि 9.5 टक्के विकास दर विचारात घेऊन ठरविले आहेत.

   क) औद्योगिक विकासाचा दर 9.6 टक्के आणि 10.9 टक्के.

   ड) शेती उत्पादन वाढीचा दर 5.0 टक्के आणि 5.5 टक्के.

   1) फक्त अ आणि ब  

   2) फक्त क आणि ड  

   3) वरील सर्व   

   4) फक्त अ, ब, क

उत्तर :- 4


5) पुढील विधानांपैकी कोणते अयोग्य आहे ?

     पहिल्या दहा पंचवार्षिक योजना काळात ठरविलेल्या उद्दिष्टांच्या संदर्भात भारताची अर्थव्यवस्थेची स्थूल आंतरदेशीय उत्पादन 

      स्वरूपात विकासाची कामगिरी कशी राहीली ?

   अ) तिस-या पंचवार्षिक योजनेत सगळयात कमी

   ब) दहाव्या पंचवार्षिक योजनेत सगळयात अधिक

   1) केवळ अ अयोग्य     

   2) केवळ ब अयोग्य    

   3) अ व ब दोन्ही अयोग्य नाहीत  

   4) अ व ब दोन्ही अयोग्य आहेत

उत्तर :- 4



1) प्लाझ्मा पदार्थाच्या संशोधनासाठी भारत सरकारने ‘राष्ट्रीय प्लाझ्मा संशोधन केंद्र’ कोठे उभारले आहे ?

   1) चेन्नई      2) अहमदाबाद  

   3) मुंबई      4) बेंगळुरू

उत्तर :- 2



2) अधातूचे भौतिक गुणधर्म विचारात घ्या आणि त्यापैकी कोणता गुणधर्म असा आहे ज्याला हिरा अपवाद आहे.

   अ) चकाकी नसते      ब) विजेचे वहन करत नाहीत

   क) कठीणपणा नसतो      ड) ठिसूळपणा असतो

    1) फक्त क    2) क आणि अ

    3) अ, ब, ड    4) यापैकी नाही

उत्तर :- 3



3) गाईच्या शेणावर उगवलेल्या कवकाला काय म्हणतात ?

   अ) सेक्सिकॉल्स    ब) टेरिकॉल्स    क) कार्टिकॉल्स    ड) क्रोप्रोफिलस

   1) अ      2) ब      3) क      4) ड

उत्तर :- 4



4) विधाने वाचा, योग्य पर्याय निवडा.

   अ) बोस-आईनस्टाईन कंडनसेट ही पदार्थाची पाचवी अवस्था आहे.

   ब) सत्येंद्रनाथ बोस यांच्या स्मरणार्थ ‘बोस’ आणि ‘अल्बर्ट आईनस्टाईन’ यांचे आईनस्टाईन संज्ञा देण्यात आलेल्या आहेत.

   क) या अवस्थेच्या शोधाबाबत एरिक कार्नेल, यु.काटर्ले आणि कार्ल वेमेन या अमेरिकी शास्त्रज्ञांना 2001 चे नोबेल पारितोषिक 

        देण्यात आले.

        वरीलपैकी सत्य नसलेले विधान/विधाने कोणती ?

   1) अ, क    2) ब, क   

   3) फक्त क    4) एकही नाही

उत्तर :- 4


5) धातूंची ऑक्सिजनशी अभिक्रिया होऊन ऑक्साईड तयार होतात. मात्र खालीलपैकी असा कोणता धातू आहे. ज्याची 

     ऑक्सिजनसोबत अभिक्रया होत नाही.

   अ) सोने    ब) सोडिअम    क) सिल्वर    ड) मॅग्नेशिअम

   1) फक्त अ, क    2) फक्त ब  

   3) फक्त क         4) यापैकी नाही

उत्तर :-1

📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌


1) मानव विकास निर्देशांक 2018 नुसार प्रथम पाच देशांचा बिनचूक क्रम निवडा.

   अ) नॉर्वे, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड, जर्मनी

   ब) नॉर्वे, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, आयर्लंड

   क) नॉर्वे, स्वित्झर्लंड, आयर्लंड, जर्मनी, ऑस्ट्रेलिया

   ड) नॉर्वे, स्वित्झर्लंड, जर्मनी, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया

  1) क      2) ब      3) अ      4) ड

उत्तर :- 3


2) खालील माहितीचा विचार करा.

   अ) सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळयाचे (स्टॅच्यु ऑफ युनिटी) 31 ऑक्टोबर 2018 रोजी लोकार्पण करण्यात आले.

   ब) स्टॅच्यु ऑफ युनिटी हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे.

   क) स्टॅच्यु ऑफ युनिटी या पुतळयाची उंची 182 मीटर आहे.

   ड) सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जाते.

  1) अ, ब, क बिनचूक       

  2) अ, क, ड बिनचूक

  3) अ, ब, क, ड बिनचूक        

  4) अ, ब, ड बिनचूक

उत्तर :- 3


3) खालील माहितीचा विचार करा.

   अ) 18 ऑगस्ट 2018 रोजी पाकिस्तानचे 22 वे पंतप्रधान म्हणून इम्रान खानने शपथ घेतली.

   ब) इम्रान खान हे पाकिस्तान  तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) या पक्षाचे प्रमुख  आहे.

   क) जुलै 2018 मध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणूकीत इम्रान खानच्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ या पक्षाने 116 जागा 

       जिंकल्या.

   ड) पाकिस्तानच्या संसदेला “मजलिस-ए-शुरा” असे म्हणतात.

  1) अ, ब, क, ड योग्य       

  2) अ, क, ड योग्य

  3) अ, ब,  ड यो ग्य      

  4) अ, ब, क योग्य

उत्तर :- 1


4) खालील माहितीचा विचार करा.

   अ) प्रख्यात शास्त्रज्ञ आणि भारतातील डीएनए तंत्रज्ञानाचे जनक लालजी सिंह यांचे डिसेंबर 2017 मध्ये निधन झाले.

   ब) लालजी सिंह यांनी बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम पाहिले होते.

   क) भारत सरकारने लालजी सिंह यांना पद्मश्री पुरस्कार देवून त्यांचा गौरव केला होता.

  1) अ सत्य        2) अ, क सत्य   

  3) अ, ब सत्य    4) अ, ब, क सत्य

उत्तर :- 4


5) खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासाठी  2018 नोबेल पुरस्कार दिला गेला नाही.

   अ) भौतिकशास्त्र    ब) शांतता    क) अर्थशास्त्र    ड) साहित्य

  1) अ, ड    2) ड      3) ब      4) क, ड

उत्तर :-2


📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌


1) समतोल प्रादेशिक वाढीसाठी, दहाव्या पंचवार्षिक योजनेतील नवीन उपक्रम म्हणजे :

   1) “राष्ट्रीय समान उन्नती योजने” ची स्थापना

   2) स्वर्णजयंती स्वरोजगार योजनेअंतर्गत साधनसामग्रींचे हस्तांतर

   3) गरीब राज्यांसाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन

   4) विशेष विभाग उन्नती कार्यक्रम

उत्तर :- 1




2) खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

   1) औद्योगिकीकरणामुळे भारतात वृद्धीची क्षमता निर्माण झाली.

   2) भारतात जागतिकीकरणानंतर औद्योगिक उत्पादन वाढले.

   3) दहाव्या पंचवार्षिक योजनाकाळात (2002-2007) औद्योगिक उत्पादनाचा वृद्धीदर जास्त होता.

   4) जागतिकीकरणानंतर भारतीय मोठया उद्योगधंद्यांचा विस्तार झाला.

उत्तर :- 3


3) अ) दहाव्या योजनेदरम्यान सरकारच्या भूमिकेची नव्याने व्याख्या केली गेली.

    ब) परंतु अकराव्या योजनेत समानता आणि सामाजिक न्याय याच्या खात्रीची गरज यावर भर देण्यात आला, दहाव्या योजनेत 

         नाही. 

   1) अ फक्त बरोबर आहे   

   2) ब फक्त बरोबर आहे    

   3)अ आणि ब दोन्ही बरोबर आहे  

  4) अ आणि ब दोन्ही चूक आहेत.

उत्तर :- 1


4) जलद औद्योगिक विकासासाठी आवश्यक औद्योगिकरण साध्य करण्याकरिता अवजड उद्योगांमधील गुंतवणूकीवर भर 

    देण्याविषयीची रणनीती म्हणजे :

   1) गांधी प्रतिमान   

   2) नव – गांधी प्रतिमान

   3) महालनोबिस प्रतिमान    

   4) मार्क्स प्रतिमान

उत्तर :- 3


5) दहाव्या पंचवार्षिक योजनेच्या तुलनेत अकराव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत कृषि क्षेत्राचा सकल उत्पन्न दर कुठपासून कुठपर्यंत वाढला ? 

अ) 2.0% ते 4.0  %  

ब) 3.7% ते 4.5%    

क) 5.7% ते 8%   

ड) वरीलपैकी कुठलाही नाही  

   1) ‍क      2) ड      3) अ      4) ब

उत्तर :-3



📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌


1) खालीलपैकी कोणते अभयारण्य गव्याकरता प्रसिद्ध आहे ?

    1) सागेश्वर – सांगली  

    2) मेळघाट – अमरावती    

    3) राधानगरी – कोल्हापूर  

    4) तानसा – ठाणे

उत्तर :- 3


2) महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठय प्रमाणात जंगले व प्राणी आहेत ?  

   1) विदर्भ      2) मराठवाडा 

   3) कोकण    4) वरील सर्व

उत्तर :- 1


3) महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण ................... आहे.

   1) 21%       2) 25%  

    3) 27%      4) 10%

उत्तर :- 1


4) जोडया लावा.

              वन उत्पादने      विभाग

         अ) तेंदूची पाने      i) चंद्रपूर

         ब) खैर कात        ii) नागपूर, गोंदिया

         क) रोशा गवत      iii) डहाणू

         ड) बांबू गवत       iv) गडचिरोली, अमरावती

                अ  ब  क  ड

           1)  ii  iii  iv  i

           2)  i  ii  iii  iv

           3)  iii  iv  i  ii

           4)  iv  iii  ii  i

उत्तर :- 1


5) कोणत्या झाडाचे लाकूड आगपेटयांचा काडया बनविण्यास वापरले जाते ?

   1) सागवान    2) साल  

   3) पॉपलर     4) निलगिरी

उत्तर :- 3



📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌


1) कोणत्या राजकीय पक्षाचे सभेत केवळ एक उमेदवार निवडून आले होते ?

   अ) कृषक प्रजा पक्ष 

    ब) शेडयूलड् कास्टस् फेडरेशन

   क) कम्युनिस्ट पक्ष    

   ड) अपक्ष

1) फक्त अ, क, ड    2) फक्त ब, क, ड          3) फक्त अ, ब, ड       4) फक्त अ, ब, क

उत्तर :- 4

2) खालील विधाने विचारात घ्या :

   अ) भारतीय संविधान समितीची पहिली बैठक 9 ते 23 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्ली येथे पार पडली.

   ब) सरदार हुकूम सिंग, के.टी. शाह, महावीर त्यागी हे भारतीय घटना समितीतील बिगर काँग्रेस पक्षाचे सदस्य होते.

   क) संविधान सभेच्या पहिल्या बैठकीस मुस्लीम लीगचे सर्व सदस्य हजर होते.

         वरीलपैकी कोणते / ती विधान  / ने बरोबर आहे / त ?

   1) अ आणि ब      2) ब आणि क 

   3) अ आणि क     4) अ, ब आणि क

उत्तर :- 1


3) सर्वोच्च न्यायालयाने काही  वैशिष्टयांना संविधानाची पायाभूत वैशिष्टये म्हणून मान्यता दिलेली आहे. पुढीलपैकी कोणत्या 

    वैशिष्टयांचा त्यात समावेश होतो ते सांगा ?

   अ) समतेचे तत्व      ब) न्यायालयीन पुनर्विलोकन  

   क) संघराज्य      ड) सार्वभौमत्व

   1) अ, ब, क, ड    

   2) ब, क, ड 

   3) अ, ब, क   

   4) अ, ड, क

उत्तर :- 1


4) भारताच्या संघराज्यात्मक पध्दतीबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

   1) राज्यघटनेत ‘संघराज्य’ हा शब्दप्रयोग कोठेही केलेला नाही.

   2) संघराज्यातून फुटून बाहेर पडण्याचा अधिकार राज्यांना नाही.

   3) अखिल भारतीय सेवा संघराज्य तत्वाचा भंग करतात.

   4) राज्यपालाच्या नेमणूकीची पध्दत भारताने अमेरिकन पध्दती प्रमाणे स्वीकारली आहे.

उत्तर :- 4


5) भारतात खालीलपैकी कोणत्या तरतुदी या संघराज्य पध्दतीच्या विरोधी आहेत ?

   अ) राज्ये अविनाशी नाहीत.   

    ब) आणीबाणी तरतूदी

   क) अखिल भारतीय सेवा   

   ड) राज्यघटनेचे सर्वश्रेष्ठत्व    

   इ) राष्ट्रपतीव्दारे राज्यांचा विधेयकावर नकाराधिकार

   1) अ, ब, क, ड    2) ब, क, ड, इ 

   3) अ, ब, क, इ     4) ब, क, इ

उत्तर :- 3



1) लार्ज हायड्रॉन कोलॉइडर (LHC) हा जगदविख्यात प्रयोग खालीलपैकी कोणत्या दोन देशांच्या सीमेवर पार पडला ?

   1) फ्रान्स आणि स्वित्झर्लंड  

   2) रुमानिया आणि तुर्की

   3) स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रीया 

   4) फ्रान्स आणि इटली

उत्तर :- 1


2) खालील काही रासायनिक समीकरण दिले आहेत. त्यापैकी अयोग्य समीकरण ओळखा.

   1) 2 Zn + O2           2 ZnO   

   2) 4 Al + O2         4 AlO3

   3) K2O + H2O                 2 KOH        4) Na2O + H2O                  2 NaoH

उत्तर :- 2


3) योग्य पर्याय निवडा.

   अ) ग्लोब्युलीन    -  शरीरात प्रतिद्रव्ये तयार करतात.

   ब) अलब्युलीन    -  शरीरातील पाण्याचा समतोल राखणे.

   क) प्रोथ्राँबीन    -  रक्त गोठयाच्या प्रक्रियेत मदत करणे.

   ड) फ्राब्रेनोगेन    -  सुज आल्यानंतर तिथे स्त्रवणारे रसायन.

   1) अ, ब, क    2) अ, ब, ड  

   3) ब, क, ड    4) अ, ब

उत्तर :- 1


4) 10¼  Fermi म्हणजेच ......

   1) 1 मीटर               2) 100 मायक्रॉन 

   3) 1 अँगस्ट्रॉम युनिट  4) 1 मि. मी.

उत्तर :- 3


5) ‘उभयधर्मी ऑक्साइड’ म्हणजे –

   1) जे धातू ऑक्साईड आम्ल व आम्लारी दोन्हीसोबत अभिक्रिया करतात.

   2) या अभिक्रियांतून क्षार आणि पाणी तयार होते.

   3) Al2O3 हा धातू ऑक्साईड आम्ल व आम्लारी दोन्हीसोबत अभिक्रिया करू शकतो.

   4) वरील सर्व

उत्तर :- 4


📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌


1) इस्त्रोचे पहिले ‘अवकाश तंत्रज्ञान उबवण’ केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले.

   1) सिक्कीम    2) त्रिपूरा   

   3) कर्नाटक     4) यापैकी नाही

उत्तर :- 2


2) देशातील हरवलेल्या मुलांना शोधून काढण्यासाठी नुकतेच कोणते ॲप सुरू केले आहे.

   1) निर्यात मित्र    2) रियुनाइट  

   3) प्राप्ती            4) सुखद

उत्तर :- 2


3) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वतीने पहिल्या वित्तीय अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली.

   अ) सूधा मूर्ती    ब) सुधा बालकृष्णन  क) सुधा कोहली    ड) सुधा चतुर्वेदी

  1) ब      2) अ      3) ड      4) क

उत्तर :- 1


4) द्रोणाचार्य पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार या दोन्ही पुरस्कारांची सुरुवात केव्हा झाली.

   1) 1985, 2002    2) 1988, 2004        3) 1988, 2006    4) 1992, 1961

उत्तर :- 1


5) व्यास सन्मान या पुरस्काराची सुरुवात केव्हा पासून झाली.

   1) 1991    2) 1981 

   3) 1993      4) 1982

उत्तर :- 1


📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌


1) पुढील दोन विधानांपैकी कोणते खरे आहे ?

   अ) शेतमालाच्या किंमती प्रथम पंचवार्षिक योजना काळात प्रत्यक्षात उतरल्या.

   ब) तदनंतर शेतमालाच्या किंमती निरंतर वाढतच गेल्या केवळ 1971-72 वर्ष सोडून

   1) केवळ अ           2) केवळ ब 

   3) कोणतेही नाही    4) दोन्हीही

उत्तर :- 1


2) किमान जीवनमान पुरविण्यासाठी भारतीयांचा भौतिक आणि सांस्कृतिक दर्जा सुधारणे हे .......... शी संबंधित आहे.

   1) नेहरू – गांधी प्रतिमान   

   2) नव – गांधी प्रतिमान

   3) नव – गांधी प्रतिमान     

   4) मार्क्स प्रतिमान

उत्तर :- 2


3) बाराव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत ‘उपभोग गरीबी’ चे शिरगणती गुणोत्तर किती टक्क्याने कमी करण्याचे उद्दिष्ट आहे  ?

   अ) 8      ब) 10      क) 12      ड) 6

   1) ड      2) अ      3) ब      4) क

उत्तर :- 3


4) भारताच्या पहिल्या दोन पंचवार्षिक योजनांमध्ये वाटपाचा सर्वात जास्त हिस्सा या एका क्षेत्राला मिळाला .

   1) कृषी व संबंधित सहायक क्षेत्र   

   2) वीज

   3) सिंचन        

   4) वाहतूक आणि दळणवळण

उत्तर :- 4


5) सर्व पंचवार्षिक योजनांमध्ये कृषी विकासाच्या व्यूह रचनेत ............... समाविष्ट होते.

   अ) कृषी विस्तार सेवा        ब) अनुकूल व्यापार शर्ती

   क) सिंचन विस्तार        ड) संस्थात्मक कर्ज

   1) अ, क        2) अ, क आणि ड  

   3) अ, ब, ड    4) ब, क, ड

उत्तर :- 2


1) खालीलपैकी कोणते एकक ऊर्जेचे एकक नाही ?

   1) न्यूटन             2) न्यूटन/ सेकंद  

  3) न्यूटन/ मिनट    4) यापैकी  नाही

उत्तर :- 4



2) कॅल्शिअम हा धातू पाण्यावर तरंगतो कारण,

   1) कॅल्शिअमची पाण्याबरोबर अभिक्रिया होत असताना तीव्रता कमी असते.

   2) बाहेर पडलेली उष्णता ही हायड्रोजन वायूला पेट घेण्यास पुरेशी नसते.

   3) हायड्रोजनचे बुडबुडे पृष्ठभागावर तयार झाल्यामुळे

   4) वरील सर्व

उत्तर :- 4




3) योग्य पर्याय निवडा.

   अ) झुरळाचे हदय हे तीन कप्प्यांचे असते.   

 ब) बेडकाचे हदय हे तीन कप्प्यांचे असते.

   क) मासे यांचे हदय हे दोन कप्प्यांचे असते. 

   ड) सापाचे हदय हे दोन कप्प्यांचे असते.

   1) अ, ब, क, ड    2) ब, क   

   3) ब, क, ड         4) फक्त अ, ब, क

उत्तर :- 2




4) खालीलपैकी संपूर्ण सदिश राशींचा समूह कोणता ?

   1) बल, संवेग, त्वरण, वेग  

    2) चाल, वस्तुमान, लांबी, घनता    

   3) संवेग, तापमान, कार्य, बल  

  4) कार्य, ऊर्जा, उष्णता, विस्थापन

उत्तर :- 1





5) धातूची विरल HCl आम्लासोबत अभिक्रिया झाली तर धातूचे .............. तयार होतात व H2 मुक्त होतो आणि धातूंची सल्फुरिक 

    आम्ल सोबत अभिक्रिया होऊन ............... तयार होतात.

     वरील दोन्ही रिक्त जागा भरा.

   1) क्षार, क्लोराइड्स    2) क्लोराइड्स, क्षार   

 3) क्षार, पाणी    4) क्लोराइड्स, सल्फेट

उत्तर :- 4


📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌


1) जगातील सर्वांत लांब सागरी पुल कोणत्या देशांत बांधण्यात आला आहे.

   1) जर्मनी    2) जपान  

    3) चीन      4) फ्रान्स

उत्तर :- 3



2) राष्ट्रीय जैवइंधन धोरणाची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य कोणते.

   1) गुजरात    2) तामिळनाडू 

   3) महाराष्ट्र    4) राजस्थान

उत्तर :- 4



3) गायीला राष्ट्रमाता घोषीत करणारे भारतातील पहिले राज्य कोणते.

   1) उत्तराखंड    2) उत्तरप्रदेश  

   3) मध्यप्रदेश    4) महाराष्ट्र

उत्तर :- 1




4) जागतिक शांतता निर्देशांक 2018 नुसार प्रथम स्थानी कोणता देश आहे.

   1) आइसलँड    2) न्युझीलँड 

   3) ऑस्ट्रीया      4) डेन्मार्क

उत्तर :- 1




5) 21 वी राष्ट्रकूल स्पर्धा नुकतीच कोठे पार पडली ?

   अ) ऑस्ट्रेलिया    ब) स्वीडन    क) इंग्लंड    ड) स्कॉटलँड 

  1) ब      2) अ      3) क      4) ड

उत्तर :-. 2


📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌


1) अकराव्या पंचवार्षिक योजना आराखडयाचे शीर्षक ............... हे होते.

   1) जलद आणि आर्थिक वृद्धीच्या दिशेने        2) जलद आणि अधिक सर्वसमावेशक वृद्धीकडे

   3) जलद, अधिक सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाकडे   

 4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 2



2) आपल्या पहिल्या तीन पंचवार्षिक योजनांचे सुरुवातीपासूनचे सर्वात महत्त्वाचे आर्थिक उद्दिष्ट म्हणजे

   1) समाजवादी समाज रचना निर्माण करणे  

  2) आर्थिक विषमता कमी करणे

   3) विभागीय समतोल    

    4) औद्योगिकरण

उत्तर :- 1



3) 12 वी पंचवार्षिक योजना तयार करीत असताना हे नियोजन आयोगाचे अध्यक्ष होते.

   1) डॉ.  मोन्टेक सिंग अहलुवालिया      2) डॉ. मनमोहन सिंग

   3) डॉ. अरविंद सुब्रमणियम   

   4) डॉ. रघुराम राजन

उत्तर :- 2


4) ही बाराव्या पंचवार्षिक योजनेंची (2012-2017) मुख्य लक्ष्ये आहेत –

   अ) वास्तव स्थूल देशांतर्गत उत्पादन वृध्दी दर 8 टक्के राखणे.

   ब) अर्भक मृत्युदर 25 प्रति 1000 पर्यंत खाली प्रमाणे.

   क) पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठीची गुंतवणुक स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या 9 टक्के पर्यंत वाढविणे.

   1) अ फक्त बरोबर आहे    

   2) ब फक्त बरोबर आहे    

   3) अ व ब फक्त बरोबर आहे     

   4) वरील सर्व बरोबर आहेत

उत्तर :- 4


5) आर्थिक बाबी संदर्भातील कॅबिनेट समितीने ............ काळात कृषी विस्तार आणि  तंत्रज्ञानवर राष्ट्रीय मिशन अंमलबजावणीस 

     मान्यता दिली आहे.

   1) 9 वी पंचवार्षिक योजनेच्या  

   2) 10 वी पंचवार्षिक योजनेच्या

   3) 11 वी पंचवार्षिक योजनेच्या   

   4) 12 वी पंचवार्षिक योजनेच्या

उत्तर :- 4


📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌


1) विषुववृत्तीय सदाहरित जंगलासंबधी खालीलपैकी कोणते वैशिष्टय बरोबर आहे ?

   अ) अत्यंत दाट आहेत.        ब) वार्षिक पानगळ आहे.    

   क) लाकूड टणक आणि टिकाऊ आहे.    ड) एकाच प्रकारच्या वृक्षांची नसतात.

   1) फक्त अ    2) फक्त अ, क आणि ड    3) फक्त क    4) फक्त ब आणि क

उत्तर :- 2


2) पुढील कोणते / ती विधान / ने योग्य आहे / त ?

   अ) मोहगनी उष्ण कटिबंधीय पानझडी जंगलात आढळतात.

   ब) सुंद्री किनारवर्ती जंगलात आढळतात.

   1) केवळ अ योग्य  2) केवळ ब योग्य      3) अ व ब दोन्ही योग्य  4) अ व ब दोन्ही अयोग्य

उत्तर :- 2


3) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

   अ) महाराष्ट्रात उष्ण कटिबंधीय दमट पानझडी अरण्ये व उष्ण कटिबंधीय काटेरी खुरटी अरण्ये जवळपास सारख्याच क्षेत्रात

        आहेत.

   ब) वरील दोन्ही एकत्रितपणे परंतु उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी अरण्यांच्या एक तृतीयांशही क्षेत्रात नाहीत.

   1) अ    

   2) ब     

   3) दोन्ही 

   4) एकही नाही

उत्तर :- 1


4) उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी अरण्यात खालीलपैकी कोणती झाडे आढळतात ?

   अ) सागवान    ब) सिसम      क) अंजन    ड) तिवर

   इ) हिरडा

   1) अ, क, ड, इ    2) क, ड, इ   

   3) अ, ब, क         4) अ, ब, क, इ

उत्तर :- 3


5) जोडया लावा.

  वन्य प्राणी अभयारण्य      प्रशासकीय विभाग

  अ) फन्साड        i) अमरावती

  ब) नांदूर – मधमेश्वर      ii) कोकण

     क) किनवट        iii) औरंगाबाद

  ड) मेळघाट        iv) नाशिक

         अ  ब  क  ड

    1)  ii  iv  iii  i

    2)  ii  iv  i  iii

    3)  iv  ii  iii  i

    4)  i  iii  iii  iv

उत्तर :- 1


1) कोणत्या समित्यांमध्ये डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केले ?

   अ) मूलभूत अधिकार समिती    ब) अल्पसंख्यांक उपसमिती    

   क) सल्लागार समिती      ड) राज्ये समिती

   1) फक्त अ, ब, क    2) फक्त ब, क, ड    3) फक्त अ, ब, ड    4) फक्त अ, क, ड

उत्तर :- 1


2) भारतीय संघराज्य व्यवस्थेला ‘वाटाघाटीचे संघराज्य’ असे कोणी संबोधले आहे ?

   1) के. सी. व्हिअर  

  2) आयव्हर जेनिंग्ज

  3) ग्रॅनव्हिल ऑस्टिन 

  4) मॉरिस जोन्स

उत्तर :- 4


3) ‘भारत हे संघराज्य आहे’ यास खालीलपैकी कोणते तत्व आधार देत नाही ?

   1) एक राज्यघटना  

    2) व्दिगृही कायदेमंडळ  

   3) राज्यघटनेची सर्वोच्चता  

  4) न्यायालयीन पुनर्विलोकन

उत्तर :- 1


4) भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे ?

   1) स्वातंत्र्य      2) समता  

    3) न्याय      4) बंधुभाव

उत्तर :- 3


5) भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रीकेमध्ये ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवादी’ या शब्दांचा समावेश 1976 च्या ............. 

    घटनादुरुस्तीनुसार करण्यात आला.

   1) 44 वी      2) 41 वी   

   3) 42 वी      4) 46 वी

उत्तर :- 3



1) जेव्हा वस्तूमधील सर्व कणांचे विस्थापन एखाद्या स्थिर बिंदूभोवती अथवा त्या वस्तूच्या अक्षाभोवती वर्तुळाकार कक्षेत होते, 

     तेव्हा त्या गतीला कोणत्या प्रकारात समाविष्ट कराल ?

   1) एकरेषीय गती  2) परिवलन गती

 3) यादृच्छिक गती  4) नियतकालिक गती

उत्तर :- 2


2) ॲल्युमिनिअम निष्कर्षणाबाबत खालीलपैकी अयोग्य पर्याय ओळखा.

1) बॉक्साइटचे ॲल्युमिनीअममध्ये रूपांतर      

2)‍ शुध्द ॲल्युमिनीअमचे विद्युत अपघटनी क्षपण

3) स्टीलच्या टाकीमध्ये विद्युत अपघटन केले जाते    

4) ॲल्युमिनीअम हा ॲनोड वर जमा होतो

उत्तर :- 4


3) खालील रक्तपट्टीका, रक्तबिंबीकाबाबत काय खरे आहेत.

   अ) यांचा आकार व्दबहिर्वक्र असते.        ब) या रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत करतात.

   क) या अस्थिमज्जा मध्येच तयार होतात.      ड) या रक्तपेशी सर्व प्राण्यांत आढळतात.

   1) अ, ब, ड    2) अ, ब, क  

   3) ब, क, ड    4) फक्त ब, क

उत्तर :- 2


4) गटात न बसणारा पर्याय निवडा.

   1) लंबकाची गती    

   2) शिवणयंत्राची सुई  

   3) उडणा-या पक्ष्यांचे पंख    

   4) उडते फुलपाखरू

उत्तर :- 4


5) ॲल्युमिनीअम हा मुक्त अवस्थेत आढळत नाही आणि  ॲल्युमिनीअमचा मुख्य धातुके बॉक्साइट आहे, तर बॉक्साइटमध्ये 

     साधारणत: किती टक्के Al2O3 असते.

   1) 20 – 50%    2) 30 – 40%  

   3) 30 – 70%    4) 50 – 70%

उत्तर :- 3



📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌



1) खालील माहितीचा विचार करा.

   अ) 21 वी राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धा नुकतीच ऑस्ट्रेलिया येथे पार पडली.

   ब) 20 व्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धा 2014 स्कॉटलँड येथे पार पडल्या होत्या.

   क) 22 व्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये इंग्लंड येथे होणार आहे.

  1) अ, ब सत्य    2) अ, क सत्य  

  3) अ सत्य        4) सर्व सत्य

उत्तर :- 4



2) खालीलपैकी कोणते शहर आपले स्वत:चे ब्रँड आणि बोधचिन्ह असलेले भारतातले पहिले शहर ठरले आहे.

   1) मुंबई      2) जयपूर 

   3) दिल्ली    4) बेंगळूरू

उत्तर :- 4


3) आशियाई क्रीडा स्पर्धा 2018 पदतालिकांनुसार प्रथम पाच देशांचा योग्य क्रम निवडा.

   अ) चीन, जपान, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया, उझबेकिस्तान

   ब) चीन, जपान, दक्षिण कोरिया, उझबेकिस्तान, इंडोनेशिया

   क) चीन, जपान, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, उझबेकिस्तान

   ड) चीन, जपान, इंडोनेशिया, उझबेकिस्तान, दक्षिण कोरिया

  1) अ      2) ब      3) क      4) ड

उत्तर :- 1


4) 2018 चा राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला.

   1) रघुनाथ माशेलकर  2) पुष्पा भावे    3) रणजित देसाई    4) राम लक्ष्मण

उत्तर :- 2


5) महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने कौटुंबिक अत्याचार, कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण यासारख्या अन्यायाला बळी पडणा-या 

    महिल्यांच्या मदतीकरिता कोणत्या नावाची हेल्पलाईन सुरु केली.

   1) सुहिता         2) वनिता 

   3) हेल्प वुमन    4) यापैकी नाही

उत्तर :- 1


📌📌



1) अकराव्या पंचवार्षिक योजनेमध्ये कृषी आणि संलग्न क्षेत्रामध्ये सरासरी 4 टक्के अभिवृद्धीच्या उद्देशाने “राष्ट्रीय कृषी विकास 

     योजना” 2007-08 वर्षामध्ये सुरू करण्यात आली.

   अ) या योजनेत कोणत्याही विशिष्ट भागाचा विकास अपेक्षित नाही.

   ब) केशरी मोहीम या योजनेत अंतर्भूत नाही.

   1) केवळ अ योग्य    2) केवळ ब योग्य    3) दोन्ही योग्य    4) एकही योग्य नाही

उत्तर :- 4


2) जोडया जुळवा.

  योजना        उद्दिष्टये

         अ) पहिली पंचवार्षिक योजना    i) जलद औद्योगीकरण

         ब) दुसरी पंचवार्षिक योजना    ii) जीवनमानाचा दर्जा उंचावणे

         क) पाचवी पंचवार्षिक योजना    iii) शेतीला प्राधान्य

         ड) दहावी पंचवार्षिक योजना    iv) गरीबी हटाव

               अ  ब  क  ड

           1)  ii  i  iii  iv

           2)  iii  i  iv  ii

           3)  ii  iv  i  iii

           4) iii  iv  i  ii

उत्तर :- 2


3) सामाजिक, आर्थिक व लिंग सबलीकरण ही स्त्रियांच्या सबलीकरणाची त्रिसूत्री योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेत 

     स्वीकारण्यात आली ?

   1) आठवी योजना      2) नववी योजना

   3) दहावी योजना       4) अकरावी योजना

उत्तर :- 3


4) महाराष्ट्र राज्याचा दहाव्या पंचवार्षिक योजनेतील स्थूल उत्पादनातील सरासरी चक्रवाढ वृध्दी दर किती होता ?

   1) 8.3 टक्के      2) 8.6 टक्के  

   3) 8.7 टक्के      4) 8.2 टक्के

उत्तर :- 1


5) पंचवार्षिक नियोजनात ग्रामीण विकासावर विशेष भर देण्यात आला. एका पंचवार्षिक योजनेत एकूण गुंतवणूकीपैकी 43 टक्के 

     गुंतवणूक एकात्मिक ग्रामीण विकासाकरिता उपलब्ध करून देण्यात आली. कोणत्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत ग्रामीण 

      विकासावर विशेष भर देण्यात आला ?

   1) दुसरी पंचवार्षिक योजना  

   2) पाचवी पंचवार्षिक योजना

   3) सहावी पंचवार्षिक योजना   

   4) अकरावी पंचवार्षिक योजना

उत्तर :- 3



1) महाराष्ट्रातील मोसमी वनातील वृक्षाची पाने उन्हाळयात गळून पडतात कारण

1) उन्हाळयात पाऊस पडत नाही.      

2) उन्हाळयात तापमान जास्त असते.

3) उन्हाळयात हवामान विषम असते.    4) बाष्पीभवन कमी करण्यास्तव

उत्तर :- 4


2) महाराष्ट्रातील एकूण जंगल क्षेत्रापैकी .........% क्षेत्र राखीव, .........% क्षेत्र संरक्षित व ..........% क्षेत्र अवगीकृत जंगलाखाली 

    आहे.

   1) 5, 11, 84    2) 11, 5, 84  

   3) 84, 11, 5    4) 85, 5, 10

उत्तर :- 3


3) खालील विधाने पहा.

   अ) उष्णकटिबंधीय सदाहरित वने सह्याद्रीच्या पश्चिमेकडील उतारावर आढळतात.

   ब) उष्णकटिबंधीय सदाहरित वनातील वृक्षांची पाने रुंद असतात.

   क) पळस, शिसम, खैर इ. वृक्ष प्रामुख्याने उष्णकटिबंधीय सदाहरित वनात आढळतात.

1) फक्त अ विधान बरोबर आहे.    

2) फक्त ब विधान बरोबर आहे.

3) फक्त क विधान बरोबर नाही.    

4) विधान अ, ब आणि क बरोबर नाहीत.

उत्तर :- 3


4) जोडया जुळवा.

                 अभयारण्य      जिल्हा

         अ) नरनाळा        i) यवतमाळ

         ब) टिपेश्वर        ii) उस्मानाबाद

         क) अनेर        iii) अकोला

         ड) येडशी रामलींग घाट    iv) नंदूरबार

                अ  ब  क  ड

           1)  iii  i  iv  ii

           2)  ii  i  iii  iv

           3)  iv  ii  i  iii

           4)  i  iii  iv  ii

उत्तर :- 1


5) खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे ?

   1) लातूर            2) मुंबई उपनगर  

   3) उस्मानाबाद    4) जालना

उत्तर :- 1



1) गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट – 1935 मधील खालील तरतूदी विचारात घ्या :

   अ) या कायद्याने केवळ मुस्लिमांसाठीच नव्हे तर शीख, भारतीय ख्रिश्चन आणि अँग्लो-इंडियन यांच्यासाठीही स्वतंत्र प्रतिनिधित्व

         प्रदान केले.

   ब) शेषाधिकार हे केंद्र शासनाकडे सोपविले होते.

   क) या कायद्याने विधिमंडळाला जबाबदार असलेला ना कोणी सल्लागार अथवा ना कोणती मंत्री परिषद नियुक्त केली गेली.

1) विधाने अ, ब बरोबर आहेत      

2) विधाने ब, क बरोबर आहेत

3) विधाने अ, क बरोबर आहेत      

4) विधाने अ, ब, क बरोबर आहेत

उत्तर :- 3


2) 1947 च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याने संविधान सभेच्या स्थानामध्ये बदल झाला. या कायद्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते 

    विधान बरोबर नाही ?

   1) सभा पूर्णत: सार्वभौम संस्था बनली.2) सभा एक विधिमंडळात्मक संस्थाही झाली.

   3) सभेची एकूण संख्या पूर्वीच्या 1946 मधील नियोजित संख्येपेक्षा वाढली.

   4) मुस्लिम लीग सभासदांनी भारतासाठी असलेल्या संविधान सभेतून माघार घेतली.

उत्तर :- 3


3) संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते.

   1) डॉ. बी. आर. आंबेडकर 

   2) जे. बी. कृपलानी

   3) सरदार वल्लभभाई पटेल  

   4) जवाहरलाल नेहरू

उत्तर :- 3


4) घटना समितीने भारतीय राज्यघटनेत उद्देशपत्रिका ही कल्पना कोणत्या देशाकडून उचलली.

   1) आयर्लंड       2) यु. के.    

   3) यु. एस्. ए.    4) ऑस्ट्रेलिया

उत्तर :- 3


5) 42 व्या घटनादुरुस्तीनंतर भारताचे केलेले वर्णन असे :

1) सार्वभौम समाजवादी प्रजासत्ताक गणराज्य    

2) सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य

3) सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्य        4) प्रजासत्ताक गणराज्य

उत्तर :- 2



1) भारतात राष्ट्रीय उत्पन्ना विषयीचे अंदाज ................ कडून सादर केले जातात.
   1) नियोजन मंडळ    2) भारतीय रिझर्व्ह बँक    
   3) वित्त मंत्रालय      4) केंद्रीय सांख्यिकी संघटन 
उत्तर :- 4

2) भारतीय अर्थव्यवस्थेत 2008 – 09 या वर्षात सेवा क्षेत्राचा वृद्धी दर काय होता ?
   1) 8.9%      2) 7.1%   
   3) 7.9%      4) 9.8%
उत्तर :- 4

3) भारतीय अर्थव्यवस्थेत सध्या कोणते क्षेत्र जलद वाढीचे क्षेत्र आहे ?
   1) प्राथमिक    2) व्दितीय  
  3) सेवा           4) बाहय
उत्तर :- 3

4) खालीलपैकी योग्य तो पर्याय निवडून रिक्त जागा भरा.
      राष्ट्रीय उत्पन्न वाढले की करांपासून मिळणारे उत्पन्न आपोआप वाढते, तर त्यास ............. म्हणतात.
   1) अंतर्गत परिवर्तनियता  
    2) अंतर्गत करव्यवस्था
   3) अंतर्गत मूल्यवृध्दि  
    4) अंतर्गत विकास
उत्तर :- 1
5) सर्व शिक्षा अभियान यांच्याकडून राबविले जाते.
   1) केंद्र शासन फक्त      
   2) राज्य शासन फक्त
   3) केंद्र आणि राज्य शासन दोन्हीही        4) वरीलपैकी नाही
उत्तर :-3

📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌

1) जोडया जुळवा.
                       अ      ब
         अ) सिंधुदुर्ग             1) पेट्रोलियम/ खनिज तेल
         ब) मुंबई             2) औषधी खनिजयुक्त पाणी
         क) गडचिरोली           3) मँगनीज
         ड) ठाणे             4) चुनखडी
   1) अ-4, ब-2, क-1, ड-3  
    2) अ-3, ब-1, क-4, ड-2
   3) अ-3, ब-2, क-4, ड-1  
    4) अ-2, ब-1, क-3, ड-4
उत्तर :- 2

2) तारापूर अणूविद्युत केंद्र ............. जिल्ह्यात आहे.
   1) रायगड    2) ठाणे    
   3) नाशिक    4) पुणे 
उत्तर :- 2

3) हापूस आंब्याची झाडे ................ जिल्ह्यात आढळतात.
   1) सिंधुदुर्ग    2) रत्नागिरी 
   3) रायगड    4) वरील सर्व जिल्ह्यात
उत्तर :- 4

4) महाराष्ट्रात प्रामुख्याने ...........ऊर्जेचा वापर केला जातो.
   1) औष्णिक    2) अणु   
    3) पवन        4) नैसर्गिक
उत्तर :- 1

5) संकल्पित जैतापूर अणू-ऊर्जा प्रकल्पाचे स्थान .............. या जिल्ह्यात आहे.
   1) रत्नागिरी    2) सिंधुदुर्ग  
   3) कोल्हापूर    4) सोलापूर
उत्तर :- 1

📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌

1) भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत शेवटी समाविष्ट केलेले शब्द कोणते ?
   अ) समाजवादी    आ) धर्मनिरपेक्ष    इ) सार्वभौम    ई) लोकशाही    उ) गणराज्य
   ऊ) न्याय    ए) स्वातंत्र्य    ऐ) समानता    ओ) बंधुता    औ) एकात्मता

   1) अ,  ब, औ    2) क, ड, ऊ  
   3) उ, ए, ऐ        4) अ, ड, ओ
उत्तर :- 1

2) भारताच्या राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेवर ............ प्रभाव दिसतो.
   अ) कॅनडाची राज्यघटना   
   ब) जपानची राज्यघटना
   क) इंग्लंडची राज्यघटना  
   ड) अमेरिकेची राज्यघटना
   1) अ व क    2) क व ड  
   3) फक्त ड    4) फक्त ब
उत्तर :- 3

3) भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका प्रथमत: केव्हा दुरुस्त करण्यात आली ?
   1) 1952      2) 1966   
   3) 1976      4) 1986
उत्तर :- 3

4) उद्देशपत्रिकेत बहाल केलेल्या ‘स्वातंत्र्यांचा’ बरोबर क्रम आहे.
   1) अभिव्यक्ती, विचार, श्रध्दा, विश्वास, उपासना
   2) विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा, उपासना
   3) अभिव्यक्ती, विचार, विश्वास, उपासना, श्रध्दा
   4) विचार, अभिव्यक्ती, उपासना, विश्वास, श्रध्दा
उत्तर :- 2

5) 1976 च्या 42 व्या घटना दुरुस्तीने प्रस्ताविकेत कोणत्या नवीन शब्दांचा समावेश केला आहे ?
   अ) सार्वभौम आणि समाजवादी     
    ब) समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष
   क) श्रध्दा, उपासना आणि व्यक्तीची प्रतिष्ठा   
   ड) एकता आणि एकात्मता
        वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?
   1) फक्त ब         2) ब आणि क 
   3) क आणि ड    4) ब आणि ड  
उत्तर :- 1

पोलीस भरती प्रश्नसंच

 उद्याच्यार्यामध्ये खालीलपैकी कोणते ऍसिड असते?                  

💚 बयुटिरिक 

💜 लक्टरीक

❤️ फोर्मिक  

💛 सायट्रिक ☑️



 उत्तम उत्पादन देणारी कोंबडी कोणती?          

💚 - कादारनाथ

💜 - हेल आयलंड रेड

❤️ - ब्रम्हा

💛 - लेगहॉर्न ☑️


 महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या महत्वाचे वने खालीलपैकी कोणती?                      

💚 - गवताळ कुरणे

💜 - सदाहरित वृक्षांची वने ☑️

❤️ - पानझडी वृक्षांची वने

💛 - उंच वृक्षांची वने


 

  इलियड व ओडिसी या महाकाव्याची रचना .... यांनी केली?                           

💚 - होमर ☑️

💜 - सेक्रेटिस

❤️ - पिंडार

💛 - सॉफिकलीस



*90) आधुनिक आवर्त सारणी मध्ये तांबे चा अनुक्रमांक किती आहे?*           

💚 - *26 ☑️*

💜 - 59

❤️ - 49

💛 - 29



91)  न्यूट्रॉन चा शोध कोणी लावला ?                        

💚 - जेम्स चॅडविक ☑️

💜 - न्यूटन

❤️ - रुदरफोर्ड

💛 - जे जे थॉमसन



 महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात .... मृदा विकसित झाली आहे ?                

💚 - काळी ☑️

💜 - करडी

❤️ - वालुकामय

💛 - लाल



  सजदा व पाबोस प्रथा कोणत्या सुलतानाने सुरु केली?                             

💚 - बल्बन ☑️

💜 - राजिया सुलतान

❤️ - अल्लाउद्दीन खिलजी

💛 - यापैकी नाही



NTPC ची स्थापना केव्हा झाली?                       

💚 - 1973

💜 - 1975 ☑️

❤️ - 1982

💛 - 1966



पृथ्वी सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावर असते त्या अवस्तेला काय म्हणतात?                 

💚 - उपसूर्य

💜 - अपसूर्य ☑️

❤️ - भ्रमणसूर्य

💛 - बहिर्यसूर्य



 ..... जीवनसत्व याला सायनोकोबालमीन पण म्हणतात.?                         

💚 - बी12 ☑️

💜 - बी 8

❤️ - बी3

💛 - बी7



 बहिर्वक्र भिंगाच्या साहाय्याने कोणता दृष्टिदोष दूर केला जातो?        

💚 - दुरदृष्टीता ☑️

💜 - लंबदृष्टीता

❤️ - निकटदृष्टीता

💛 - यापैकी नाही



 बालकवी कोणाला म्हणतात?                              

💚 - त्र्यम्बक बापूजी ठोंबरे ☑️

💜 - गोविंद करंदीकर

❤️ - प्रल्हाद केशव अत्रे

💛 - यापैकी नाही



 झाशीची राजा जेव्हा दत्तक पुत्र घेतला होता त्याचे नाव काय?                        

💚 - सयाजीराव

💜 - दामोदर ☑️

❤️ - यशवंतराव

💛 - धोंडोपंत



 उस्मानाबाद हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे?                                            

💚 - वैतरणा

💜 - कुंबी

❤️ - तेरणा ☑️

💛 - भोगावती



सेस्मोग्राफ  हे कोणत्या ओरकाराचे उपकरण आहे?                              

💚 - क्षारमापक

💜 - वक्रातामापाक

❤️ - भूकंपनोद मापक ☑️

💛 - यापैकी नाही



सलवा जुडूम हे काय आहे?                          

💚 - नक्षलवादी संघटना 

💜 - राजनैतिक पक्ष

❤️ - NGO

💛 - नक्षलवाद विरोधी संघटना ☑️



मिशी भादारने या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा?                                      

💚 - मिशी काढून टाकणे

💜 - मिशी कातरने

❤️ - मिशी वाढविणे

💛 - बेअब्रू करणे ☑️



ध्वनी तरंगाचे प्रसारण कशातून होत नाही?                          

💚 - स्थायु

💜 - द्रव

❤️ - वायू

💛 - *निर्वात जागा ☑️*



 चित्रनगर हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोणत्या जिल्यात आहे?                         

💚 - सोलापूर

💜 - पुणे

❤️ - कोल्हापूर ☑️

💛 - मुंबई

यावर प्रश्न अपेक्षित आहे..


📊अनावृत्तबीजी वनस्पती (Gymnosperms)

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

📌अनावृत्तबीजी गटातील वनस्पती बहुदा सदाहरित, बहुवार्षिक व काष्ठमय असतात. 

📌या वनस्पतींच्या खोडांना फांदया नसतात. 


➡️पानांचा मुकुट तयार झालेला असतो. 

📌या वनस्पतींची नर व मादी फुले एकाच झाडाच्या वेगवेगळ्या बीजाणूपत्रांवर येतात. 

📌यांच्या बियांवर नैसर्गिक आच्छादन नसते, म्हणजेच यांना फळे येत नाहीत, म्हणूनच यांना अनावृत्तबीजी म्हणतात. Gymnosperms म्हणजे Gymnos - न झाकलेले/अनावृत्त, Sperm - बीज.


✅उदा. सायकस, पिसिया (ख्रिसमस ट्री), थुजा (मोरपंखी), पायनस (देवदार) इत्यादी.



☄️☄️आवृत्तबीजी वनस्पती (Angiosperms)☄️☄️

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

💸या वनस्पतींना येणारी फुले हे त्यांचे प्रजननाचे अवयव आहेत. 

💸फुलांचे रूपांतर फळांत होते व फळांच्या आत बिया तयार होतात. 

💸या बियांवर आवरण असते. 

💸Angiosperms = Angios - Cover म्हणजे आवरण, sperm - बी. 

💸ज्यांच्या बियांचे सहजपणे दोन भाग सुटे होतात, त्यांना द्विबीजपत्री वनस्पती म्हणतात.

💸तर ज्यांच्या बियांचे दोन भाग होत नाहीत, त्यांना एकबीजपत्री वनस्पती असे म्हणतात.


➡️उदा...

📌द्विबीजपत्री - घेवडा, शेंगदाणा, चिंच, आंबा 

📌एकबीजपत्री - गहू, मका, ज्वारी


महाराष्ट्राचा भूगोल

✳️पराकृतिक विभाग

१. कोकण किनारपट्टीचा सखल प्रदेश

२. सह्याद्री व त्याच्या पुर्वेकडील रांगा

३. महाराष्ट्राचे पठार

४. उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगा


✳️महाराष्ट्रातील जलप्रणाली

🅾️पश्चिम वाहिनी नद्या

१. तापी-पूर्णा नदी प्रणाली

२. कोकणातील नद्या - उल्हास, सावित्री, तेरेखोल इ.


🅾️पर्व वाहिनी नद्या

१. प्राणहिता नदी प्रणाली

२. गोदावरी नदी प्रणाली

३. कृष्णा नदी प्रणाली

४. भीमा नदी प्रणाली


🅾️हवामान

महाराष्ट्रातील हवामान मोसमी वाऱ्यांच्या टापूत येत असल्याने महाराष्ट्राचे सर्वसामान्य हवामान मोसमी प्रकारचे आहे. परंतु संपूर्ण वर्षाच्या हवामानाच्या स्थितीचा विचार करता राज्यात वर्षभर हवामानाची स्थिती सारखी नसते. महाराष्ट्रात काही काळ हवामान उष्ण, कधी काळ पावसाळी तर कधी काळ थंड असते. शिवाय वर्षभरात मोसमी वाऱ्यांच्या स्थितीत फरक पडतो. मोसमी वाऱ्यांच्या स्थितीचा विचार करता महाराष्ट्रातील हवामानाचे दोन(२) भाग पडतात. 

(१) नैऋत्य मोसमी हवामान

(२) ईशान्य मोसमी हवामान


✳️महाराष्ट्राच्या हवामानावर परिणाम करणारे घटक

१. भौगोलिक स्थान

२. अक्षवृत्तीय विस्तार

३. मोसमी वारे

४. सागरी सान्निध्य

५. प्राकृतिक रचना


✳️मदा

१. भरड उथळ मृदा (डोंगरमाथ्यावरील)

२. मध्यम काळी मृदा (सपाटीवरील)

३. खोल काळी मृदा

४. तांबूस तपकिरी डोंगरउतारावरील मृदा

५. समुद्रकिना-यावरील रेताड मृदा

६. पिवळसर तपकिरी मृदा

७. जम्भी व जांभ्यासारखी मृदा

८. समुद्रकिना-यावरील खारट जमीन


✳️वनस्पती

महाराष्ट्रात वनस्पतीचे प्रमाण विदर्भ, कोकण व सह्याद्री डोंगररांगात जंगले आढळून येतात. मराठवाड्यात हे प्रमाण खूपच कमी आहे.


🅾️महाराष्ट्रात वनस्पतीचे प्रमुख प्रकार:

१. उष्ण कटिबंधीय सदाहरित वनस्पती

२. उष्ण कटिबंधीय निम-सदाहरित वनस्पती

३. उप-उष्ण कटिबंधीय सदाहरित वनस्पती

४. आर्द्र-पानझडी वनस्पती

५. शुष्क पानझडी वनस्पती

६. रूक्ष काटेरी वनस्पती

७. खाजण वनस्पती

पोलीस भरती IMP महत्वाचे प्रश्न

1) भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली ? 

👉 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 


2) राष्ट्रीय विषाणू शास्त्र संस्था कोठे आहे ?

👉पुणे


3) छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थान शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे ?

👉 जुन्नर

 

4) महाबळेश्वर हे थंड व्हायचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

👉सातारा


5) स्वातंत्रतोर भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्णन असे केले जाते ?

👉 मिश्र अर्थव्यवस्था


6) सर्वसाधारण परिस्थितीत लोकसभेचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो ?

👉पाच

 

7) मायक्रोसॉफ्ट कंपनीची सिओ CEO कोण आहेत?

👉 सत्या नाडेल

 

8) भारतात मुख्यत्व जून ते सप्टेंबर या काळात पडणारा पाऊस कोणत्या प्रकारच्या वाऱ्यामुळे पडतो ?

👉 मोसमी वारे


9) कोणता रक्तगट सर्वदाता युनिव्हर्सल डोनर म्हणून ओळखला जातो ?

👉 ओ (O)


10) छत्रपती शिवाजी महाराजांनी........ हा सागरी किल्ला बांधला नाही ?

👉 जंजिरा

 

11) महाराष्ट्रातील पहिले फळाचे गाव कोणते ?

👉 धुमाळवाडी  (सातारा) 


12) कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रजागृती कार्य करणाऱ्या....यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो ?

👉 तुकडोजी महाराज


13) महाराष्ट्रातील होमरूल चळवळीचे प्रणेते कोण आहे ? 

👉 लोकमान्य टिळक

 

14) महाराष्ट्रातील विधानसभा सदस्य किती आहेत ?

👉288


15) देशातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी महाराष्ट्रात कोठे आहे ?

👉 इचलकरंजी


16) महाराष्ट्रात हत्तीरोग संशोधन केंद्र कुठे आहे ?

👉 वर्धा 


17) कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे ?

👉 कार्बन डाय-ऑक्साइड

 

18) महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोणास ओळखले जाते ?

👉 महात्मा फुले


19) भारतीय घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?

👉 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 


20) ....... यांना आपण श्यामची आई या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचे व पत्री या काव्यसंग्रहाचे कर्ते म्हणून ओळखतो ?

👉 साने गुरुजी

 

21) महाराष्ट्रातील पंचायतराज पद्धती..... स्तरिय आहे ?

👉तीन

 

22) कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो ? 

👉 जस्त (zinc)


23) भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ? 

👉पुणे


24) डॉक्टर प्रकाश आबीटकर यांच्याकडे कोणत्या खात्याचे पद आहे ?

👉 सार्वजनिक आरोग्य

विज्ञान मैत्री प्रश्नमंजुषा स्पर्धा

 🎈परश्न क.१) ब्लॕट्टर हर्बेनियम ही संस्था कोठे स्थित आहे ?

१) मुंबई✅

२) डेहराडून

३) कोलकाता

४) अलाहाबाद


*🎈परश्न क्र. २) झुरळ या प्राण्याच्या हृदयाला किती कप्पे असतात ?*

१) १०

२) १३✅

३) १६

४) ६


🎈परश्न क्र.३) १ ग्रॅम प्रथिनांपासून किती कॕलरी उर्जा मिळते ?

१) ४✅

२) ६

३) ९

४) २


🎈परश्न क्र.४) हिऱ्याचा अपवर्तणांक ........ एवढा असतो.

१) १.४२

२) २.४२✅

३) ३.९६

४) ४.०८


🎈परश्न क्र.५) एक वस्तू पंचकोनाकृती मार्गाने गतिमान असेल तर तिला एक फेरी पूर्ण करण्यास ....... वेळा दिशा बदलावी लागते.

१) ४

२)६

३) ५✅

४) १०


*🎈परश्न क्र.६) थंड प्रदेशातील जलचर प्राणी व वनस्पती पाण्याच्या ..... मुळे सुरक्षित राहतात .

१) दवबिंदू

२) विशिष्ट उष्माधारकता

३) असंगत आचरण✅

४) बाष्पीभवन

 

🎈परश्न क्र.७) जर आपण कोणत्याही माध्यमाचे तापमान वाढवले तर ध्वनीचा वेग .......

१) कमी होतो.

२) वाढतो.✅

३) अर्धा होतो

४) दुप्पट होतो


🎈परश्न क्र.८) तांबे व पितळाच्या भांड्यांना कल्हई करण्यासाठी कोणता धातू वापरतात ?

१) कथिल✅

२) कार्बन

३) क्रोमियम

४) जस्त


🎈परश्न क्र ९) वनस्पती तेलापासुन वनस्पती तूप बनविताना उत्प्रेक म्हणून काय वापरतात ?*

१) आयोडीन

२) झायमेज

३) नीकेल✅

४) पेप्सिन


🎈१०)कोबाल्ट-60 या किरणोत्सारी समस्थानिकाचा उपयोग कशासाठी करतात ?

१)कर्करोग

२) कृषी क्षेत्र

३) अन्न परीक्षण✅

४)ट्यूमर

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

1) जम्मू काश्मीरच्या विधानपरिषदेचे सभासद किती आहेत

      ❤️२१

      💚२४

      💙२८

      💜३६✅✅



2)उच्च न्यायालयाचे सर्वाधिक न्यायाधीश असणारे न्यायालय कोणते?

     ❤️मबई

      💚मद्रास

      💙कलकत्ता

      💜अलाहाबाद✅✅


3)महाराष्ट्रात एका आर्थिक वर्षात ग्रामपंचायतीच्या किती बैठका घेतल्या जातात?

      ❤️४

      💚८

      💙१२✅✅

      💜६



4)भारत हे सार्वभौम राज्य केव्हापासून निर्माण झाले?

      ❤️१५ ऑगस्ट १९४७

      💚२६ जानेवारी १९४७

      💙२६  ऑगस्ट १९५०

      💜२६ जानेवारी १९५०✅✅


5)इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार   हे...... या वृत्तपत्राचे ध्येय होते.

      ❤️मराठा

      💚बहिष्कार भारत

      💙परभाकर

      💜सधारक✅✅



6)कोल्हापूरच्या बर्वे प्रकरणात लोकमान्य टिळक व आगरकर यांना किती दिवस कारावासाची शिक्षा झाली?

      ❤️१०२

      💚१०१✅✅

      💙१००

      💜११०



7)त्रिपुरा येथील राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते?

      ❤️नताजी सुभाषचंद्र बोस✅✅

      💚जवाहरलाल नेहरु

      💙मोतीलाल नेहरु

      💜मौलाना आझाद



8)बार्डोली येथील किसान चळवळी  चे नेतृत्व कोणी केले?

      ❤️महात्मा गांधी

      💚वल्लभभाई पटेल✅✅

      💙पडीत नेहरु

      💜महंमद अली जीना



9)सशस्त्र उठाव करणारा आद्य क्रांतीकारक कोण?

      ❤️विनायक दामोदर सावरकर

      💚वासुदेव बळवंत फडके✅✅

      💙अनंत कान्हेरे

      💜राजगुरु



10)प्लेग आयुक्त   रॅण्ड  याचा पुणे येथे कोणी खुन केला?

      ❤️भट विष्णु महादेव

      💚राजगुरु शिवराम हरी

      💙चाफेकर बंधू✅✅

      💜कान्हेरे अनंत लक्ष्मण


11) इंपीरियल कॅडेट कोअर कोणी स्थापन केले?

      ❤️वॉरन हेस्टिग्ज

      🖤लॉर्ड  कर्झन✅✅

      💚लॉर्ड डलहौसी

      💜लॉर्ड  रिपन



12) जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाले?

      ❤️बगालच्या फाळणीनंतर

      💛इलर्बट विधेयकानंतर

      💚रौलेक्ट कायद्यानंतर✅✅

      💜मिंटो मोर्ले सुधारणा



13) जातीय निवाडा  कोणी जाहीर केला?

      💜रमसे मॅकडोनाल्ड✅✅

      💚डॉ. आंबेडकर

      💛लॉर्ड आयर्विन

      ❤️महात्मा गांधी



14) मराठी सत्तेचा उत्कर्ष  हा ऐतिहासिक प्रबंध कोणी लिहिला?

      ❤️डी.के.कर्वे

      💛बी.जी.टिळक

      💚जी.के.गोखले

      💜एम.जी.रानडे✅✅



15) सर्वात प्रथम पोस्टाची तिकिटे कोणत्या देशांत वापरात आली होती?

      ❤️गरेट ब्रिटन✅✅

      💛अमेरिका

      💚रशिया

      💜भारत



16) बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणते साप्ताहिक सुरु केले?

      ❤️बॉम्बे समाचार

      💛दर्पण

      💚मकनायक✅✅

      💜हरिजन



17)सत्यार्थ प्रकाश  हा ग्रंथ यांनी लिहिला?

      ❤️राजा राममोहन रॉय

      💛लोकमान्य टिळक

      💚सवामी दयानंद सरस्वती✅✅

      💜गोपाळ गणेश आगरकर



18) कोणते वृत्तपत्र लो. टिळकांनी इंग्रजीमधून प्रसिध्द केले?

      ❤️कसरी

      💛मराठा✅✅

      💚इडियन ओपिनियन

      💜तरुण भारत



19) सुधाकर  साप्ताहिकाची सुरुवात कोणी केली?

      ❤️वही.एस्. आपटे

      💛गोपाळ गणेश आगरकर✅✅

      💚एम्. बी. नामजोशी

      💜दत्तोपंत भागवत



20) राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे  असे कोणत्या वृत्तपत्रात प्रसिध्द झाले होते?

      ❤️सधाकर✅✅

      💛दर्पण

      💚कसरी

      💜यगांतर



 .......हा रूपेरी रंगाचा धातू विक्षोभक पद्धतीने पाण्याशी संयोग पावतो .

1) calcium 

2) magnesium

3) जस्त

४)सोडियम✅


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

पचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीची निवड कीती कार्यकाळासाठि होते.

1) दिड वर्षे 

2) अडिच वर्षे✅

3) पाच वर्षे

4) एक वर्षे


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

आवर्तसारणीच्या मध्यातील 3 ते 12 गणातील संकरामक मूलद्रव्यांच्या बाह्यतम .....कक्षा अपूर्ण असतात.

1) एक

2) दोन✅

3) तीन

4) चार


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

सिलिकॉन या मूलद्रव्यांचे वर्णन खालीलपैकी कोणत्या शब्दांत  समरपक पणे करता येईल.

1) वाहक

2) रोधक

3) अर्धवाहक✅

4) या पैकी नाही


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

घड्याळातील लंबकाची गती हे गतीच्या कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे.

1) स्थानांतरणीय

2) परिवलन

3) कंपन.✅

4)या पैकी नाही


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

हअरचे उपकरण कशासाठी वापरता येवू शकते.

1) द्रवाचे तापमान मोजने

2) द्रवाची घनता मोजने✅

3) द्रवाचे वजन मोजने

4) द्रवातील विद्राव्य पदार्थ वेगळे करण्यासाठी


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

परायोगिक तत्त्वावर भारतात दूरदर्शनची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?

1) 1951

2) 1955

3) 1959✅

4) 1965


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

वास्तव प्रतिमा नेहमी ..........असते.

1) सुलटि

2) कशीही

3) मोठी 

4) यापैकी नाही✅


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

वस्तू लंबरूप दिशेने फेकल्यास तिच्या दिशा वेगाची दिशा.......

1) बदलते

2) भरकटते

3) बदलत नाही मात्र वेगाचे परिणाम कमी होत जाते.✅

4) निश्चित सांगता येनार नाही


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

एक वातावरण दाबास पाण्याचे वाफेत रूंपातर झाल्यावर वाफेचे आकारमान हे पाण्याच्या आकारमानापेक्षा सुमारे ......पट असते .

1) 117 पट

2) 1100 पट

3) 1670 पट✅

4) 5000 पट


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹.

खालीलपैकी कोणता रंग हा सात रंगाचे मिक्षण मानल्या गेलेल्या पाढंऱ्या रंगाचा घटक होऊ शकत नाही.

1) निळा 

2) काळा✅

3) निळ्या 

4) पिवळ्या




गनपावडर चा उल्लेख कोणाच्या साहित्यात सर्वप्रथम आढळला.

राँजर बेकन


MPSC, पोलीस भरती,आर्मी भरती उपयुक्त

 ................ हा उत्तर अमेरिक आणि दक्षिण अमेरिक यांना जोडणारा महामार्ग आहे.

⚪️ टरान्स कॅनेडियन हायवे

⚫️ गरँड ट्रंक महामार्ग  

🔴 पन अमेरिकन महामार्ग  ✔️

🔵 सटुअर्ट महामार्ग


भारतात कोणत्या साली भोपाळ दुर्घटना झाली?

⚪️१९८०

⚫️१९१५

🔴१९४७

🔵१९८४✔️


रक्तागोठाण्यासाठी कोणत्या जीवनास्सात्वाचा उपयोग होतो?

⚪️ क✔️

⚫️ अ 

🔴 ड

🔵 ब



तांबे व जस्त यांच्या मिश्रीणातून कोणता धातू तयार होतो?

⚪️ टिन

⚫️ पितळ✔️

🔴 शिसे

🔵 पारा



डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द धर्माचा स्वीकार केव्हा केला?

⚪️ जलै १९५१

⚫️ म १९५३

🔴 म १९५५

🔵 ऑक्टोबर १९५६✔️


५०० मिली /१०० × ४ = किती टन ?

⚪️ ०.००२२

⚫️ ०.२२

🔴 २.२०

🔵 ०.०२२✔️


लॉर्ड कर्झनला औरंगजेबाची उपमा कुणी दिली?

⚪️ सरेंद्रनाथ बॅनर्जी

⚫️ दादाभाई नवरोजी 

🔴 फिरोशहा मेहता 

🔵 गोपाळ कृष्ण गोखले✔️



भारतीय राज्यघटनेच्या ................ कलमानुसार स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेत आहे?

⚪️१९ ते २२✔️

⚫️३१ ते ३५

🔴२२ ते २४

🔵३१ ते ५१


कोणत्या घटना दुरुतीनुसार संविधानामध्ये मुलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला?

⚪️३२ साव्या

⚫️३९ साव्या

🔴४२ साव्या✔️

🔵४४ साव्या


स्वातंत्र्याच्या कोणत्या शहराची प्रथमच नियोजनबध्द रचना करण्यात आली?

⚪️चदीगड  ✔️

⚫️नवी दिल्ली

🔴नवी मुंबई

🔵अमृतस


खाली दिलेल्या राशींपैकी अदिश राशी .................... आहे 

⚪️ विस्थापन 

⚫️ चाल☑️

🔴 गती

🔵 तवरण 


वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते?

⚪️ ऑक्सिजन

⚫️ हड्रोजन

🔴 कार्बन डायऑक्साईड☑️

🔵 नायट्रोजन



न्यूटनचा दुसरा नियमफ ----------- चे मापन देतो?

⚪️सवेग☑️

⚫️बल

🔴तवरण

🔵घडण


कोणत्या किरणांचा मारा करून फुलांची व फळांची उत्पादकता वाढवितात?

⚪️अल्फा

⚫️बिटा

🔴गमा☑️

🔵कष-किरण


रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारा घटक कोणता?

⚪️मलॅनिन

⚫️इन्शुलिन☑️

🔴यकृत

🔵कल्शियाम


 मायका चा वापर कोणत्या कारणांसाठी करतात?

⚪️रग तयार करणे

⚫️विद्युत रोधक म्हणून☑️

🔴विद्युत सुवाहक म्हणून 

🔵वरील सर्व कारणांसाठी 


धान्यसाठा टिकविण्यासाठी कोणते औषध वापरतात?

⚪️सोडियम क्लोरेट☑️

⚫️मायका

🔴मोरचुद

🔵कॉपर टिन


बहिर्वक्र आरशाने तयार होणारी प्रतिमा नेहमीच वस्तूपेक्षा आकाराने .................. असते.

⚪️मोठी

⚫️लहान☑️

🔴दप्पट

🔵तिप्पट


वस्तूवर कार्यरत असलेले बल दुप्पट केले, तर तिचे त्वरण ........................

⚪️तितकेच राहते

⚫️निमपट होत

🔴चौपट होते

🔵दप्पट होते ☑️


ध्वनीचे प्रसारण ..................... मधून होत नाही .

⚪️सथायू ☑️

⚫️दरव

🔴वायू

🔵निर्वात प्रदेश 


न्यायमूर्ती रानडे यांनी भारतीय राजकाणात ---------- राजकारणाचा पाया घातला असे म्हटले जाते.
⚪️राष्ट्रवादी 
⚫️समाजवादी 
🔴अर्थवादी
🔵सनदशीर✅

वसईचा तह कोणात झाला?
⚪️टीपू सुलतान - इंग्रज
⚫️दसरा बाजीराव पेशवे - इंग्रज✅
🔴रघुनाथ पेशवे - इंग्रज
🔵पशवे - पोर्तुगीज


खालीलपैकी कोणत्या चळवळीमध्ये गांधीजींचा सहभाग नव्हता?
⚪️ बार्डोली सत्याग्रह ✅
⚫️चफारण्य सत्याग्रह 
🔴काळ्या कायाघाचा निषेध 
🔵खडा सत्यांग्रह 

बाबू गेनूने कोणत्या ठिकाणी आत्मबलीदान दिले?
⚪️नदुरबार 
⚫️मबई✅
🔴पणे
🔵सातारा

सामाजिक विषमता दूर करण्यासाठी केरळमध्ये श्री. नाराण धर्मपालन योगम या संस्थेची स्थापना कोणी केली?
⚪️नारायण स्वामी 
⚫️नारायण गुरु✅
🔴दयानंद सरस्वती
🔵राधाकृष्णन 

दासबोध हा ग्रंथ कोणत्या संताचा आहे?
⚪️रामदास✅
⚫️चांगदेव
🔴सत तुकाराम
🔵सत सावता माळी


गोवा मुक्ती आंदोलनाचे नेते कोण होते?
⚪️सरदार वल्लभभाई पटेल
⚫️अरुणा असफअली 
🔴राम मनोहर लोहिया ✅
🔵नानासाहेब गोरे

मिठाच्या सत्याग्रहात प्रसिध्दीस आलेले शिरोडा हे गाव महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
⚪️मबई
⚫️रत्नागिरी 
🔴सिंधुदुर्ग ✅
🔵ठाणे

कॉग्रेसचे १९३६ चे पहिले ग्रामीण भागातील अधिवेशन कुठे भरले?
⚪️फजपूर✅
⚫️आवडी
🔴मद्रास
🔵रामनगर

संत तुकारामांचा जन्म कोठे झाला?
⚪️दहू✅
⚫️आळंदी
🔴जांब
🔵पठण


राज्यसेवा परीक्षा-प्रश्न सराव

1) पदार्थाच्या नुकत्याच सापडलेल्या सहाव्या अवस्थेचे नाव काय आहे ?

 1) बोस – आईनस्टाईन कंडनसेट             2) फर्मआयोनिक कंडनसेट

3) एरिक – कॅटरले कंडनसेट      

4) कार्नेल टर्मस् कंडनसेट

उत्तर :- 1


2) धातूंचे क्षरण थांबविण्यासाठी खालील पध्दतींपैकी अयोग्य पध्दत कोणती ?

   अ) गॅल्व्हॉनायझिंग – लोखंड/स्टील यांवर जस्ताचा थर लावणे.

   ब) टायनिंग – कथिलचा थर लावणे (कलई करणे)

   क) ॲनोडायझिंग – विद्युत अपघटनाव्दारे तांबे किंवा ॲल्युमिनीअमवर ऑक्साईडचा पातळ थर लावणे.


   1) फक्त अ   

   2) फक्त ब 

   3) फक्त क    

   4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 2


3) खालीलपैकी कोणते क्षार हे डी.एन.ए. मध्ये असतात.

   अ) एडीनीन – A  ब) गुआनीन – G    क) थायमिन – T    ड) साइटोसीन – C


   1) अ, ब    

   2) अ, ब, क  

   3) ब, क, ड   

   4) अ, ब, क, ड

उत्तर :- 2


4) वस्तुमान आणि आकारमान यांचे गुणोत्तर म्हणजे कोणती भौतिक राशी होय ?

   1) चाल   

   2) घनता 

   3) जडत्व   

   4) त्वरण

उत्तर :- 4



5) खालीलपैकी कोणता मूलद्रव्य पहिल्या महायुध्दात हत्यार म्हणून वापरण्यात आला होता.

   1) मिथेन    2) क्लोरीन    3) फ्लोरीन    4) आयोडीन

उत्तर :- 1


6) अ) ज्या भौतिक राशी व्यक्त करताना परिमाण आणि दिशा दोघांची आवश्यकता असते त्या राशींना आदिश राशी असे म्हणतात.

     ब) ज्या भौतिक राशी व्यक्त करताना फक्त दिशेची आवश्यकता असते त्या भौतिक राशींना सदिश राशी असे म्हणतात.

          वरीलपैकी सत्य विधान / विधाने कोणते ?

   1) फक्त अ   

   2) फक्त ब    

   3) अ, ब दोन्ही    

   4) एकही नाही

उत्तर :- 4


7) धातूबद्दल खालील विधानांचा विचार करा.

   अ) धातू मूलद्रव्य इलेक्ट्रॉन देऊन धन आयन प्राप्त करतात.

   ब) धातू मूलद्रव्य इलेक्ट्रॉन घेऊन ऋण आयन प्राप्त करतात.

   क) आधुनिक आवर्तसारणीत धातू मूलद्रव्य डाव्या बाजूला व मध्यभागी आहेत.

   ड) टेक्नेशिअम हा सर्वांत पहिला कृत्रिम मूलद्रव्य आहे.


   1) अ, क, ड बरोबर 

   2) अ, क बरोबर    

   3) ब, क बरोबर  

   4) अ, ब, क, ड बरोबर

उत्तर :- 1


8) खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.

   अ) हिपॅरीन  - रक्त शरीरात गोठू नये म्हणून असणारे रसायन आहे.

   ब) हिस्टामाइन  - सूल आल्यानंतर तिथे स्त्रवणारे रसायन आहे.


   1) अ योग्य    

   2) ब योग्य   

   3) दोन्ही योग्य    

   4) दोन्ही अयोग्य

उत्तर :- 3


9) खालील विधाने वाचा, योग्य पर्याय निवडा.

   अ) एक किलोग्रॅम म्हणजे पॅरीस येथील आंतरराष्ट्रीय मोजमाप कार्यालयातील 90% प्लॅटीनम, 10% इरिडीयम या मिश्रधातूचा 39

        मि.मी. उंची व व्यास असणा-या ठोकळयाचे वजन होय.

   ब) एक किलोग्रॅम म्हणजे 4° c तापमानात सामान्य वायूदाबाला 1 लिटर पाण्याचे वजन होय.


   1) अ, ब दोन्ही  

   2) फक्त अ   

   3) फक्त ब 

   4) एकही नाही

उत्तर :- 1


10) खालील विधानांचा विचार करा.

   अ) चांदीपेक्षा सोन्याची तन्यता जास्त आहे.    

  ब) चांदीपासून 8,000 फूट लांबीचा तार काढता येतो.

   क) चांदीनंतर तांबे दुसरा आणि सोने तिसरा विजेचा सर्वोत्तम वाहक आहे.

   ड) चांदी हा मानवासाठी विषारी नाही आणि आपण जेवण डेकोरंटमध्ये चांदीचा वापर करू शकतो.


   1) ब, क, ड बरोबर अ चूक    

   2) अ, ब, क, ड बरोबर

   3) अ, ब, ड बरोबर      

   4) वरीलपैकी नाही

उत्तर :- 1

धातूंची संमिश्रे व त्यातील घटक


● पितळ - तांबे+जस्त


● ब्रांझ - तांबे+कथिल


● अल्युमिनीअम ब्रांझ - तांबे+ ॲल्युमिनीअम


● जर्मन सिल्व्हर - तांबे+जस्त+निकेल


● गनमेटल - तांबे+जस्त+कथिल


● ड्युरॅल्युमिनीअम - तांबे+ ॲल्युमिनीअम+मॅग्नेशियम


● मॅग्नेलियम - मॅग्नेशियम+ ॲल्युमिनीअम


● स्टेनलेस स्टील - क्रोमियम+लोखंड+कार्बन


● नायक्रोम -लोह+निकेल+क्रोमियम+मॅगेनीज


०५ ऑगस्ट २०२५

चालू घडामोडी :- 04 ऑगस्ट 2025


◆ ब्राझीलने कोपा अमेरिका फेमिनिना महिला फुटबॉल स्पर्धेच्या नवव्या आवृत्तीमध्ये कोलंबियाचा पराभव करून विजेतेपद जिंकले.


◆ कोपा अमेरिका फेमेनिना महिला फुटबॉल स्पर्धा दर चार वर्षांनी आयोजित केली जाते. [ही स्पर्धा दक्षिण अमेरिकन फुटबॉल फेडरेशन (CONMEBOL) द्वारे आयोजित केली जाते.]


◆ सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे नांदणी जैन मठातील माधुरी उर्फ महादेवी हत्तीणीला गुजरातमधील वनतारामध्ये पाठवण्यात आले आहे.


◆ गुजरातमधील वनतारा प्राणी संवर्धन केंद्र अनंत अंबानी चालवतात.


◆ आशिया रग्बी अंडर-20 (Sevens) चॅम्पियनशिप 2025 चे यजमानपद भारतातील बिहार राज्याला मिळाले आहे.


◆ बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजगीर येथे होणाऱ्या आशिया रग्बी अंडर 20 (सेव्हन्स) चॅम्पियनशिपच्या शुभंकराचे अनावरण केले.


◆ केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री यांनी 'मातृ वन' उपक्रम सुरू केला आहे.


◆ हिमाचल प्रदेश सरकारने 'हिम बस प्लस' योजना सुरू केली आहे.


◆ लांब प्रवासादरम्यान ट्रक चालकांना मदत करण्यासाठी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने 'अपना घर' उपक्रम सुरू केला आहे.


◆ ओडिशा राज्य सरकारने लँडरेस प्रजातींच्या संवर्धनासाठी श्री अन्न अभियान (SAA) अंतर्गत मानक कार्यप्रणाली (SOP) सुरू केली आहे.


◆ वस्त्रोद्योग मंत्रालयाने नवी दिल्लीतील राष्ट्रीय हस्तकला संग्रहालय आणि हस्तकला अकादमी येथे "नो युवर विव्हज कॅम्पेन 2025" सुरू केले.


◆ तेलंगणा पोलिसांनी 'ऑपरेशन मुस्कान-इलेव्हन' राष्ट्रीय मोहिमेअंतर्गत 7,600 हून अधिक मुलांची सुटका केली.


◆ अरुणाचल प्रदेश राज्यात अर्ध-पाळीव गोवंशीय प्रजाती असलेल्या मिथुन (बॉस फ्रंटालिस) ची सर्वाधिक संख्या आढळते.


 4 ऑगस्ट - चालू घडामोडी ♦️


1) सशस्त्र सीमा बल (SSB) चे 26 वे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

✅ संजय सिंघल 


2) 1 ऑगस्ट 2025 पासून विक्रम साराभाई अंतराळ केंद्र (VSSC) चे नवीन संचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

✅ डॉ. ए. राजराजन 


3) भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

✅ खालिद जमील 


4) AI इम्पॅक्ट समिट 2026 कोणत्या देशात आयोजित केले जाणार आहे ?

✅ भारत 


5) 17 वा पुरुष आशिया क्रिकेट कप 2025 कोणत्या देशात आयोजित केला आहे ?

✅ UAE 


6) AI आधारित रस्ता सुरक्षा प्रकल्प करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे ?

✅ उत्तर प्रदेश 


7) भारतीय सैन्याने दिव्य- दृष्टी हा सराव कोणत्या राज्यात आयोजित केला आहे ?

✅ सिक्कीम 


8) Policing and Trends in India हे कोणी लिहिले आहे ?

✅ दिनेशकुमार गुप्ता 


9) अलिकडेच जगातील सर्वात मोठा  8.8 तीव्रतेचा भूकंप कोणत्या देशात झाला आहे ?

✅ रशिया 


10) जागतिक फुफ्फुसांचा कर्करोग दिन कधी साजरा केला जातो ? 

✅ 1 ऑगस्ट

━━━━━━━━━━━

०३ ऑगस्ट २०२५

भारतातील मृदेचे प्रकार


📌 १. लॅटेराइट माती

➤ क्षेत्र: २.४ लाख चौ.कि.मी.

➤ प्रमुख भाग: पूर्व व पश्चिम घाट, राजमहाल टेकड्या, नागपूर पठार, मेघालय

➤ वैशिष्ट्ये:

▸ उच्च तापमान आणि जोरदार पावसामुळे तयार होते

▸ सिलिका आणि चुना वाहून जातात; लोह व ॲल्युमिनियम हायड्रॉक्साइड शिल्लक राहतात

▸ नायट्रोजन, फॉस्फरस, कॅल्शियम व सेंद्रिय पदार्थ कमी

▸ भात, चहा, कॉफी, रबर, सुपारीसाठी योग्य


📌 २. तांबडी किंवा पिवळी माती

➤ क्षेत्र: ३.५ लाख चौ.कि.मी.

➤ प्रमुख भाग: ओडिशा, छत्तीसगड, गंगेच्या दक्षिण भागात

➤ वैशिष्ट्ये:

▸ अग्निजन्य आणि रूपांतरित खडकांमधून निर्माण

▸ लोह ऑक्साईडमुळे लाल रंग, ओलसर स्थितीत पिवळी

▸ पीएच: 6.6 ते 8.0

▸ जलधारण क्षमता कमी

▸ गहू, भात, डाळी, तंबाखू यासाठी योग्य


📌 ३. काळी माती (काळी कापूस माती)

➤ क्षेत्र: ४.४६ लाख चौ.कि.मी. (१४.२%)

➤ प्रमुख भाग: महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, दख्खन पठार

➤ वैशिष्ट्ये:

▸ बेसॉल्ट खडकांमधून तयार

▸ टिटॅनियम फेराइटमुळे काळा रंग

▸ जलधारण क्षमता अत्यधिक, भेगा पडतात

▸ स्वयंनांगरणी माती (cracking → aeration)

▸ कापूस, ऊस, सोयाबीन, ज्वारी यासाठी योग्य


📌 ४. वाळवंटी/शुष्क माती

➤ क्षेत्र: १.४२ लाख चौ.कि.मी. (४.३२%)

➤ प्रमुख भाग: पश्चिम राजस्थान, हरियाणा, दक्षिण पंजाब, पश्चिम गुजरात

➤ वैशिष्ट्ये:

▸ वाळूमय, सच्छिद्र

▸ नायट्रोजन, लोह, फॉस्फरस कमी

▸ वनस्पती कमी, सेंद्रिय घटक न्यून

▸ योग्य सिंचनाने गहू, ज्वारी, बार्लीसारखी पिके


📌 ५. खारवट व अल्कधर्मी माती

➤ क्षेत्र: पश्चिम उत्तर प्रदेश, गंगा-यमुना खोऱ्याचा भाग, पंजाब, हरियाणा

➤ वैशिष्ट्ये:

▸ अपुरा जलनिःस्सारण, कमी पावसामुळे तयार

▸ ‘रेह’, ‘उसर’, ‘कल्लर’ अशी नावे

▸ सोडियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम लवण अधिक

▸ नायट्रोजन व कॅल्शियम कमी

▸ शेतीसाठी अयोग्य, पुनर्सुधार आवश्यक


📌 ६. दलदली/पिटमय माती

➤ क्षेत्र: २.४ लाख चौ.कि.मी.

➤ प्रमुख भाग: सुंदरबन, अलेप्पी, उत्तर बिहार, अलिबाग, तमिळनाडू

➤ वैशिष्ट्ये:

▸ जास्त पावसामुळे व आर्द्रतेमुळे तयार

▸ आम्लीय व सेंद्रिय घटक समृद्ध

▸ सेंद्रिय पदार्थांची साठवणूक अधिक

▸ भात, ऊस, नारळ लागवडीस उपयुक्त


📌 ७. वन व पर्वतीय माती

➤ क्षेत्र: २.८५ लाख चौ.कि.मी. (८.६८%)

➤ प्रमुख भाग: हिमालय व इतर डोंगराळ भाग

➤ वैशिष्ट्ये:

▸ अपरिपक्व व अल्प विकसित

▸ ह्युमस अधिक

▸ फॉस्फरस, चुन्याचे प्रमाण कमी

▸ जंगलांचे पीक व चहा, सफरचंद लागवडीस योग्य


📌 ८. गाळाची माती

➤ क्षेत्र: १५ लाख चौ.कि.मी. (४०%)

➤ प्रमुख भाग: गंगेचे मैदान, नर्मदा-तापी खोरे, किनारी प्रदेश

➤ वैशिष्ट्ये:

▸ नद्या व सागरी गाळातून निर्माण

▸ सुपीकता खूप जास्त

▸ पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस भरपूर

▸ ‘भाबर’ आणि ‘तराई’ स्वरूपात उपलब्ध

▸ विविध प्रकारची पिके (गहू, भात, ऊस, भाजीपाला)

चालू घडामोडी संबंधित महत्वाच्या योजना व उपक्रमांची यादी:

1.स्वास्थ्य साथी आरोग्य विमा योजना

➤ राज्य: पश्चिम बंगाल

➤ उद्दिष्ट: सर्व नागरिकांना आरोग्य विमा संरक्षण


2.ऑपरेशन नया सवेरा

➤ राज्य: बिहार

➤ उद्दिष्ट: मानवी तस्करी रोखण्यासाठी बिहार पोलिसांची मोहीम


3.स्वयंशक्ती सहकार योजना आणि नंदिनी सहकार योजना

➤ अंमलबजावणी संस्था: राष्ट्रीय सहकारी विकास निगम (NCDC)

➤ उद्दिष्ट: महिलांसाठी सहकाराच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण


4.सब्बेटिकल रजा योजना

➤ राज्य: सिक्कीम

➤ उद्दिष्ट: सरकारी कर्मचाऱ्यांना विश्रांती व वैयक्तिक प्रकल्पांसाठी दीर्घकालीन रजा


5.हरमिला आर्मा मॉडेल

➤ राज्य: आसाम

➤ आंतरराष्ट्रीय स्वीकार: कंबोडिया देशाने जैवविविधता संवर्धनासाठी स्वीकारलेले मॉडेल


6.भारतातील पहिले हिंदी माध्यमातील MBBS कॉलेज

➤ राज्य: मध्य प्रदेश

➤ उद्दिष्ट: वैद्यकीय शिक्षणाचे स्थानिक भाषेत माध्यम


7.मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान

➤ राज्य: महाराष्ट्र

➤ उद्दिष्ट: ग्रामपंचायतींच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी


बृहद सम्यक दर्शन संग्रहालय व स्मारक स्तूप

➤ स्थान: वैशाली, बिहार

➤ उद्दिष्ट: भगवान बुद्धांच्या सम्यक दर्शन तत्त्वज्ञानावर आधारित सांस्कृतिक व धार्मिक केंद्र

‘निसार’ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण


✔️ ▸ ‘निसार’ (NISAR – NASA-ISRO Synthetic Aperture Radar) हा भारताच्या इस्रो आणि अमेरिकेच्या नासाने संयुक्तपणे विकसित केलेला उपग्रह आहे.

✔️ ▸ पृथ्वीच्या पृष्ठभागावर होणाऱ्या बदलांचे अत्यंत अचूक निरीक्षण करण्यासाठी याचा वापर होणार आहे.

✔️ ▸ श्रीहरिकोटा येथून GSLV-Mk II (GSLV-F12) या रॉकेटद्वारे याचे यशस्वी प्रक्षेपण झाले.

✔️ ▸ उपग्रहाची एकूण वजनक्षमता – २,८०० किलोग्रॅम असून, यामध्ये दोन प्रकारचे सिंथेटिक ऍपर्चर रडार वापरण्यात आले आहेत.


② इस्रो आणि नासाचे योगदान

✔️ ▸ इस्रो: एल-बँड रडार रचना, डेटा हँडलिंग अ‍न्ड हाई-स्पीड डाऊनलिंक यंत्रणा, उपग्रह बस (satellite bus), उर्जा प्रणाली आणि प्रक्षेपणाचे नियोजन व अंमलबजावणी.

✔️ ▸ नासा: एल-बँड रडार यंत्रणा, हाय स्पीड डाऊनलिंक यंत्रणा, सोलिड स्टेट रेकॉर्डर, जीपीएस रिसिव्हर, बूम स्ट्रक्चर, रिफ्लेक्टर असे विविध तांत्रिक घटक तयार केले.


③ ‘निसार’ मिशनची उद्दिष्टे व उपयोगिता

✔️ ▸ पृथ्वीवरील भू-परिवर्तनांचे निरीक्षण (उदा. हिमवर्षाव, भूकंप, ज्वालामुखी, जमीन सरकणे).

✔️ ▸ हिमनद्या, ध्रुवीय बर्फाचे वितळणे, वनक्षेत्राचा ऱ्हास याचे दीर्घकालीन मापन.

✔️ ▸ शेती व वनसंवर्धनाच्या धोरणात्मक अभ्यासासाठी उपयुक्त.

✔️ ▸ हवामान बदल व पर्यावरणीय धोके ओळखण्यासाठी डेटा मिळवणे.

✔️ ▸ आपत्ती व्यवस्थापनात उपयोग होणारी माहिती देणे (भूकंप, पूर, वादळ इ.)


④ उपग्रहाची वैशिष्ट्ये

✔️ ▸ उपग्रह दोन बँड वापरतो – एल-बँड (NASA) व एस-बँड (ISRO).

✔️ ▸ रडार सिस्टमद्वारे दिवस-रात्र आणि कोणत्याही हवामानात पृथ्वीचा अभ्यास शक्य.

✔️ ▸ एकाच जागेच्या सतत निरीक्षणासाठी उपयुक्त.

✔️ ▸ प्रत्येक १२ दिवसांनी एकाच ठिकाणचे स्कॅनिंग.

✔️ ▸ ५ वर्षांचे नियोजित कार्यकाल.


⑤ अ‍प्लिकेशन्स व जागतिक महत्त्व

✔️ ▸ कृषी उत्पादकता आणि जमिनीची धारणशक्ती यावर निगराणी ठेवता येणार.

✔️ ▸ ध्रुवीय बर्फ वितळण्याच्या गतीचा मागोवा घेऊन जागतिक तापमानवाढीचा अभ्यास.

✔️ ▸ भूकंप प्रवण भागांतील ताणतणाव आणि हालचालींचा अभ्यास.

✔️ ▸ अंटार्क्टिक आणि आर्क्टिक भागातील बर्फाचे हालचाल निरीक्षण.

✔️ ▸ जागतिक हवामान मॉडेल्ससाठी अत्यंत उपयुक्त डेटा.


⑥ इतर महत्त्वाची माहिती

✔️ ▸ ‘निसार’ हा पृथ्वी निरीक्षण करणारा सर्वांत अचूक उपग्रह मानला जात आहे.

✔️ ▸ ISRO-NASA सहकार्याचे हे सर्वात मोठे प्रकल्पांपैकी एक आहे.

✔️ ▸ ‘निसार’चे पूर्ण नाव: NASA-ISRO Synthetic Aperture Radar.

✔️ ▸ ISRO च्या PSLV, GSLV आणि SSLV नंतर अमेरिकन सहकार्याने साकारलेली महत्त्वाची मोहीम.

✔️ ▸ यापूर्वी सुद्धा ISRO ने Oceansat, RISAT, Cartosat अशा अनेक रडार इमेजिंग उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केले आहेत.


⑦ भविष्यातील परिणाम आणि दिशा

✔️ ▸ हवामान, शेती, नैसर्गिक आपत्ती, जंगलांची वाढ किंवा ऱ्हास, खनिज संशोधन यामध्ये क्रांतिकारी बदल घडवण्याची क्षमता.

✔️ ▸ सुसंगत डेटा प्रणालीमुळे विविध देशांमध्ये वैज्ञानिक सहकार्याचे नवीन दालन खुले होणार.

✔️ ▸ भारतासाठी जागतिक हवामान अभ्यास आणि डेटा नेटवर्कमध्ये नेतृत्व मिळवण्याची मोठी संधी.

राष्ट्रीय महिला आयोग (National Commission for Women – NCW)

① स्थापना व कायदेशीर अधिष्ठान

➤ स्थापना: जानेवारी 1992

➤ अधिष्ठान: राष्ट्रीय महिला आयोग कायदा, 1990


② उद्दिष्ट व कार्यक्षेत्र

➤ महिलांसाठी घटनात्मक व कायदेशीर तरतुदींचे पुनरावलोकन करणे

➤ महिलांवरील अन्यायाविरुद्ध गाऱ्हाणी स्वीकारणे व निवारण करणे

➤ महिलांवर परिणाम करणाऱ्या बाबींवर शासनास सल्ला देणे

➤ उपाययोजनात्मक कायदेशीर साधनांची शिफारस करणे


③ रचना

➤ 1 अध्यक्ष

➤ 5 सदस्य

➤ 1 सचिव

➤ सर्वांची नियुक्ती केंद्र शासन करते


④ महत्त्वाच्या व्यक्ती

➤ प्रथम अध्यक्ष: जयंती पटनाईक

➤ सध्याच्या अध्यक्ष: रेखा शर्मा (2021 पासून)


⑤ इतर भूमिका

➤ महिला कल्याणासाठी धोरणात्मक सूचना देणे

➤ महिला धोरणांची अंमलबजावणी तपासणे

➤ महिलांवरील अत्याचार प्रकरणांमध्ये सुमोटो (suo moto) कार्यवाही करणे


✅️ ➤ राष्ट्रीय महिला आयोग हे एक वैधानिक स्वायत्त संस्था असून महिलांच्या हक्कांचे संरक्षण व प्रबोधन यासाठी एक महत्त्वाचा यंत्रणा आहे.

चालू घडामोडी :- 02 ऑगस्ट 2025


◆ सिक्किम हे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सब्बॅटिकल रजा योजना सुरू करणारे भारतातील पहिले राज्य आहे.


◆ छत्तीसगडच्या बस्तर ऑलिंपिकला राष्ट्रीय स्तरावर 'खेलो इंडिया ट्रायबल गेम्स' असे नाव देण्यात आले आहे.


◆ वर्ल्ड वाईड वेब (WWW) चा शोध आणि त्याच्या परिणामाचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी 01 ऑगस्ट रोजी वर्ल्ड वाईड वेब दिन साजरा केला जातो. 


◆ वर्ल्ड वाईड वेब दिन 2025 ची थीम "भविष्याचे सशक्तीकरण: समावेशक, सुरक्षित आणि मुक्त वेब तयार करणे" आहे.


◆ वर्ल्ड वाइड वेब दिन 2024 ची थीम "Web: A Global Force for Good" अशी होती.


◆ अवस्थ साथी ही पश्चिम बंगाल राज्य सरकारने सुरू केलेली आरोग्य विमा योजना आहे.


◆ प्रधान मंत्री किसान संपदा योजना (PMKSY) अन्न प्रक्रिया उद्योग केंद्रीय मंत्रालयाच्या अंतर्गत लागू केली जाते.


◆ राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने (NCDC) महिला-नेतृत्वाखालील सहकारी संस्थांसाठी स्वयंशक्ती सहकार योजना आणि नंदिनी सहकार या दोन प्रमुख योजना सुरू केल्या आहेत.


◆ भारतीय नौदलाला सुपूर्द करण्यात आलेल्या निलगिरी वर्गाच्या तिसऱ्या जहाजाचे (प्रोजेक्ट 17A) नाव हिमगिरी आहे.


◆ न्याय बंधू (Pro Bono Legal Service) ही "न्याय विभाग" या सरकारी विभागाचा उपक्रम आहे.


◆ बेंगळुरूस्थित अंतराळ कंपनी प्रोटोप्लॅनेटने लडाखच्या त्सो कार प्रदेशात HOPE स्टेशन लाँच केले. [ISRO च्या सहकार्याने विकसित]


◆ मानवी तस्करी रोखण्यासाठी 2025 मध्ये बिहार पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेचे नाव "ऑपरेशन नया सवेरा" आहे.


◆ वस्तू आणि सेवा कर (GST) अंतर्गत फेसलेस अ‍डज्युडिकेशन लागू करणारे भारतातील पहिले राज्य केरळ बनले आहे.


◆ प्रधानमंत्री राष्ट्रीय डायलिसिस कार्यक्रम (PMNDP) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सुरू करण्यात आला.


◆ पॅरा रेजिमेंटचे लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंग यांची आर्मी स्टाफचे उपप्रमुख (VCOAS) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


चालू घडामोडी (Current Affairs in Marathi)

1. प्रश्न: नुकतेच कोणत्या राज्यात ‘जागतिक बाघ दिन’ (Global Tiger Day) उत्साहात साजरा करण्यात आला?

उत्तर: महाराष्ट्र



2. प्रश्न: 2025 मध्ये कोणत्या देशात ‘ब्रिक्स’ परिषद होणार आहे?

उत्तर: रशिया



3. प्रश्न: अलीकडेच कोणत्या भारतीय खेळाडूने 100 मीटर शर्यतीत सुवर्ण पदक पटकावले?

उत्तर: जेस्विन ऑल्ड्रिन



4. प्रश्न: ‘ISRO’ ने नुकतेच कोणते उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केले?

उत्तर: RISAT-2BR2



5. प्रश्न: 'जल जीवन मिशन' योजनेंतर्गत केंद्र सरकारचे उद्दिष्ट काय आहे?

उत्तर: 2026 पर्यंत प्रत्येक घरात नळाने पाणी



6. प्रश्न: 2025 साली "राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार" कोणत्या दिवशी जाहीर होणार आहेत?

उत्तर: 5 सप्टेंबर



7. प्रश्न: ‘आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस’ कधी साजरा केला जातो?

उत्तर: 30 जुलै



8. प्रश्न: ‘हिमालयीन चेतना अभियान’ कोणत्या संस्थेच्या माध्यमातून सुरू करण्यात आले?

उत्तर: पर्यावरण मंत्रालय



9. प्रश्न: FIFA U-17 महिला विश्वचषक 2025 कोणत्या देशात होणार आहे?

उत्तर: कोलंबिया



10. प्रश्न: नुकतेच कोणता बँक मर्जर पूर्ण झाला आहे?

उत्तर: इंडियन बँक आणि IDBI बँक



11. प्रश्न: भारताच्या नवीन पर्यटन ब्रँड चे नाव काय ठेवण्यात आले आहे?

उत्तर: Incredible India 2.0



12. प्रश्न: 'गगनयान' मिशन कोणत्या वर्षी पूर्ण होण्याची शक्यता आहे?

उत्तर: 2025



13. प्रश्न: 2025 मधील 'स्मार्ट सिटी' योजनेत महाराष्ट्रातील किती शहरांचा समावेश आहे?

उत्तर: 10



14. प्रश्न: महाराष्ट्रातील नवीन मुख्यमंत्री कोण आहेत?

उत्तर: एकनाथ शिंदे



15. प्रश्न: 'हॅकथॉन 5.0' कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाद्वारे आयोजित केला जात आहे?

उत्तर: शिक्षण मंत्रालय



16. प्रश्न: 2025 मध्ये कोणत्या भारतीय वैज्ञानिकाला ‘गणितात नोबेल’ (Fields Medal) मिळाले?

उत्तर: मनोज शर्मा



17. प्रश्न: 2025 मध्ये भारतीय रेल्वेने कोणती नवीन सेमी-हायस्पीड ट्रेन सुरू केली?

उत्तर: वंदे भारत एक्सप्रेस – वाराणसी ते पटना



18. प्रश्न: 'एक देश एक निवडणूक' प्रस्ताव कोणी मांडला आहे?

उत्तर: भारत सरकार



19. प्रश्न: नुकतीच कोणती योजना महिलांसाठी खास सुरू करण्यात आली?

उत्तर: ‘लक्ष्मी सुरक्षा योजना’



20. प्रश्न: चंद्रयान-3 ने कोणत्या दिवशी यशस्वीपणे चंद्रावर लँडिंग केले होते?

उत्तर: 23 ऑगस्ट 2023


७१ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा विजेत्यांची पूर्ण यादी

▪️सर्वोत्कृष्ट डॉक्यूमेंट्री- गॉड वल्चर अँड ह्युमन

▪️सर्वोत्कृष्ट कल्चर फिल्म- टाइमलेस तमिळनाडू

▪️सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा- श्यामची आई

▪️सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमा- कथल

▪️सर्वोत्कृष्ट अॅक्शन सिनेमा- हनूमान

▪️सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफी- वैभवी मर्चंट (रॉकी और रानी की प्रेम कहाणी)

▪️सर्वोत्कृष्ट म्यूझिक दिग्दर्शक- हर्षवर्धन रामेश्वर (अॅनिमल सिनेमा)

▪️सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाइन- अॅनिमल

▪️सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर- प्रसन्नता मोहपात्रा (द केरला स्टोरी)

▪️सर्वोत्कृष्ट प्लेबॅक सिंगर फिमेल- शिल्पा राव

▪️सर्वोत्कृष्ट मराठी बालकलाकार- कबीर कंढरे (जिप्सी), त्रिशा ठोसर श्रीनिवास पोकले आणि भार्गव 

▪️सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- राणी मुखर्जी (‘मिसेज चटर्जी वर्सेस नॉर्वे’)

▪️सर्वोत्कृष्ट अभिनेता- शाहरुख खान, जवान आणि विक्रांत मेसी, 12th फेल

▪️सर्वोत्कृष्ट लहान मुलांचा सिनेमा- नाळ २

▪️सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म- 12th फेल

2 ऑगस्ट - चालू घडामोडी ♦️

1) 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2025 मध्ये 'सर्वोत्कृष्ट अभिनेता' पुरस्कार कोणाला मिळाला ?

✅  शाहरुख खान आणि विक्रांत मेसी


2) 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2025 मध्ये 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री' चा पुरस्कार कोणाला मिळाला ?

✅ राणी मुखर्जी


3) 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2025 मध्ये 'सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार' कोणत्या चित्रपटास मिळाला ?

✅ श्यामची आई


4) 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2025 मध्ये 'सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट पुरस्कार' कोणत्या चित्रपटास मिळाला ?

✅ कथल


5) 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2025 मध्ये 'सर्वोत्कृष्ट डॉक्यूमेंट्री पुरस्कार' कशाला मिळाला ?

✅  गॉड वल्चर अँड ह्युमन


6) सहाव्या राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

✅ डॉ नितिन करीर 


7) सहाव्या राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष माजी अध्यक्ष कोण होते ज्यांचे अलीकडेच निधन झाले आहे ?

✅ मुकेश खुल्लर


8) सध्या चर्चेत असलेले 'वनतारा-स्टार ऑफ द फॉरेस्ट' कोणत्या ठिकाणी आहे ?

✅  गुजरात 


9) उंची वाढविण्याच्या वादावरून सध्या चर्चेत असलेले 'अलमट्टी धरण' कोणत्या नदीवर आहे ?

✅ कृष्ण नदी 


10) महाराष्ट्रात कोणता दिवस 'शाश्वत कृषी दिन' म्हणून साजरा केला जाणार आहे ?

✅ 7 ऑगस्ट


1) महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना पदावरून हटवून त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

✅ दत्तात्रय भरणे


2) महाराष्ट्र राज्याचे नवीन क्रीडा आणि अल्पसंख्यांक मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

✅  माणिकराव कोकाटे


3) 2025 हे वर्ष महाराष्ट्रातील कोणत्या संताची सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (७५०) जयंती वर्ष आहे ?

✅ श्री संत ज्ञानेश्वर महाराज


4) प्राचीन हस्तलिखितांचे डिजिटलायझेशन करण्यासाठी भारत सरकारने कोणते मिशन सुरू केले आहे ?

✅  ज्ञान भारतम मिशन


5) भारत-सिंगापूर संयुक्त लष्करी सराव "बोल्ड कुरुक्षेत्र 2025" 27 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान कोठे आयोजित करण्यात आला आहे ?

✅ जोधपुर, राजस्थान


6) नुकतेच कोणत्या देशाने भारतावर रशियन संरक्षण आणि ऊर्जा वस्तू खरेदी केल्याबद्दल भारतीय आयातीवर २५% कर आणि दंड आकारण्याची घोषणा केली ?

✅ अमेरीका


7) कोणता देश तिबेटमधील यारलुंग झांगबो नदीवर 60,000 मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प बांधत आहे ?

✅ चीन


8) जुलै 2025 मध्ये भारताने कोणत्या हायड्रोजन विकासासाठी देशाशी सामंजस्य करार (एमओयू) केला ?

✅ जर्मनी


9) 2025 मध्ये मानव-हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी कोणते भारतीय ॲप लाँच करण्यात आले ?

✅ "हात्तीअप"


10) दरवर्षी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती कधी साजरा केली जाते ?

✅ 1 ऑगस्ट



1) रेमोना एवेट परेरा या युवतीने किती तास सलग भरतनाट्यम नृत्य करत गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड्स मध्ये नोंद केली आहे ?

✅ 170 तास

 

2) इस्रो आणि नासाचा पहिला संयुक्त उपग्रह NISAR कधी प्रक्षेपित करण्यात आला ?

✅ 30 जुलै 2025


3) नुकतेच भारताच्या कोणत्या संस्थेने "प्रलय" बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे ?

✅  डीआरडीओ


4) गावरी (गणगौर) सण राजस्थानमध्ये प्रामुख्याने कोणत्या समुदायाद्वारे साजरा केला जातो ?

✅ राजपूत आणि भील


5) कोणत्या राज्यात "बुद्ध सम्यक दर्शन मंदिर व स्तूप" चे अनावरण करण्यात आले आहे ?

✅ बिहार

 

6) झारखंड राज्य सरकारने अटल मोहल्ला क्लीनिक चे नाव बदलुन काय केले आहे ?

✅ मदर टेरेसा एडवांस हेल्थ क्लीनिक


7) मध्य प्रदेशातील कोणत्या शहरात भारतातील पहिल्या हिंदी माध्यमातील MBBS कॉलेजची स्थापना झाली आहे ?

✅ जबलपूर


8) जगातील सर्वोत्तम पर्यटन स्थळांमध्ये कोणते शहर पहिल्या क्रमांकावर आहे ?

✅ लंडन


9) जगातील सर्वोत्तम पर्यटन स्थळांमध्ये भारताचे कोणते शहर पाचव्या क्रमांकावर आहे ?

✅ जयपूर

 

10) पाच वर्षाच्या अंतरानंतर भारताने कोणत्या देशातील नागरिकांना पर्यटक व्हिजा देणे पुन्हा सुरू केले आहे ?

✅ चीन

३१ जुलै २०२५

31 जुलै 2025 चालू घडामोडी


1) रेमोना एवेट परेरा या युवतीने किती तास सलग भरतनाट्यम नृत्य करत गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड्स मध्ये नोंद केली आहे ?

✅ 170 तास

 

2) इस्रो आणि नासाचा पहिला संयुक्त उपग्रह NISAR कधी प्रक्षेपित करण्यात आला ?

✅ 30 जुलै 2025


3) नुकतेच भारताच्या कोणत्या संस्थेने "प्रलय" बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे ?

✅  डीआरडीओ


4) गावरी (गणगौर) सण राजस्थानमध्ये प्रामुख्याने कोणत्या समुदायाद्वारे साजरा केला जातो ?

✅ राजपूत आणि भील


5) कोणत्या राज्यात "बुद्ध सम्यक दर्शन मंदिर व स्तूप" चे अनावरण करण्यात आले आहे ?

✅ बिहार

 

6) झारखंड राज्य सरकारने अटल मोहल्ला क्लीनिक चे नाव बदलुन काय केले आहे ?

✅ मदर टेरेसा एडवांस हेल्थ क्लीनिक


7) मध्य प्रदेशातील कोणत्या शहरात भारतातील पहिल्या हिंदी माध्यमातील MBBS कॉलेजची स्थापना झाली आहे ?

✅ जबलपूर


8) जगातील सर्वोत्तम पर्यटन स्थळांमध्ये कोणते शहर पहिल्या क्रमांकावर आहे ?

✅ लंडन


9) जगातील सर्वोत्तम पर्यटन स्थळांमध्ये भारताचे कोणते शहर पाचव्या क्रमांकावर आहे ?

✅ जयपूर

 

10) पाच वर्षाच्या अंतरानंतर भारताने कोणत्या देशातील नागरिकांना पर्यटक व्हिजा देणे पुन्हा सुरू केले आहे ?

✅ चीन

स्वराज्याची मागणी – कालानुक्रमानुसार माहिती

👉1876🙏 स्वामी दयानंद सरस्वती🔹 "स्वराज्य" शब्दाचा प्रथम उल्लेख


👉1905🎤 गोपाळ कृष्ण गोखले – काँग्रेस, बनारस अधिवेशन🔹 वसाहती स्वराज्याची पहिली मागणी


👉1906📢 दादाभाई नवरोजी – काँग्रेस, कलकत्ता अधिवेशन🔹 स्वराज्याची स्पष्ट मागणी


👉1915🗨️ लोकमान्य टिळक – मुंबई अधिवेशन🔹 साम्राज्यांतर्गत स्वराज्याची मागणी


👉1920✋ महात्मा गांधी🔹 पूर्ण स्वराज्याची कल्पना मांडली


👉1921🕌 हसरत मोहानी – अहमदाबाद अधिवेशन🔹 पहिल्यांदा "पूर्ण स्वराज्य" शब्द वापरला


👉1923🏛️ स्वराज्य पार्टीची स्थापना (मोतीलाल नेहरू, देशबंधू दास)🔹 वसाहती स्वराज्याची मागणी


👉1928📄 नेहरू अहवाल (Nehru Report)🔹 वसाहती स्वराज्याची स्पष्ट शिफारस


👉1929🏴 लाहोर अधिवेशन – पंडित नेहरू🔹 पूर्ण स्वराज्याचा ठराव मंजूर

📅 26 जानेवारी स्वातंत्र्य दिन म्हणून ठरवला


👉1940📝 ऑगस्ट ऑफर – लॉर्ड लिंलिथगो🔹 इंग्रजांनी वसाहती स्वराज्य देण्याचा प्रस्ताव


👉1942🚫 क्रिप्स मिशन🔹 पूर्ण स्वराज्य नाकारले → भारत छोडो आंदोलन सुरू 

चालू घडामोडी :- 30 जुलै 2025

◆ हरितक्रांतीचे प्रणेते भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांचा जन्मदिवस (7 ऑगस्ट) राज्य शासन आता 'शाश्वत शेती दिन' म्हणून साजरा करणार आहे.


◆ DRDO ने “प्रलय” बैलेस्तिक मिसाईल चे परीक्षण ओडिशा येथून केले आहे.


◆ बिहारमध्ये, वैशाली जिल्ह्यातील वैशालीगड येथे नव्याने बांधलेल्या "बुद्ध सम्यक दर्शन संग्रहालय आणि स्मारक स्तूपाचे" उद्घाटन मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते करण्यात आले आहे.


◆ नरेंद्र मोदी यांनी “ज्ञान भारतम मिशन” चा शुभारंभ केला आहे.


◆ मध्यप्रदेश राज्यात भारतातील पहिले हिंदी माध्यमातील "MBBS कॉलेज" सुरू होणार आहे.


◆ झारखंड राज्य सरकारने “अटल मोहल्ला क्लिनिक” चे नाव बदलून “मदर टेरेसा एडवांस हेल्थ क्लिनिक” असे केले आहे.


◆ भारतीय सैन्याने अरुणाचल प्रदेशमध्ये "ड्रोन प्रहार" नावाचा ड्रोन तंत्रज्ञानाचा सराव केला आहे. 


◆ कर्नाटक राज्याची “रेमोना एवेट परेरा” ने भरतनाट्यम मध्ये “गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स” बनवला आहे.


◆ महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यात “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.


◆ 'उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना' अंतर्गत महाराष्ट्रात बचत गटांच्या उत्पादनांसाठी 10 जिल्ह्यात “उमेद MALL” (जिल्हा विक्री केंद्र) उभारण्यास मंजुरी देण्यात आली.


◆ जागतिक व्याघ्र संरक्षण दिन 2025 ची थीम "स्वदेशी लोक आणि स्थानिक समुदायांना केंद्रस्थानी ठेवून वाघांचे भविष्य सुरक्षित करणे" ही थीम आहे.


◆ जागतिक व्याघ्र संरक्षण दिन (29 जुलै) 2024 ची थीम 'कृतीसाठी आवाहन' (Call for Action) होती.

३० जुलै २०२५

पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना 2025




• प्रारंभ – 16 जुलै 2025

• कालावधी – 2025 ते 2026


• योजनेचा उद्देश –

उत्पादकता वाढवणे

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे

प्रत्येकी शेतकरीस अंदाजे ₹24,000 उत्पन्न

शेतकऱ्यांना – देशातील कमी उत्पादन करणारे 100 जिल्हे

अन्नबळजावणी – योजना राबवली जाणार

हरित क्रांतीप्रमाणे – देशात हिरवळ वाढवून अन्नसुरक्षा सुनिश्चित करणे

सेंद्रिय व नैसर्गिक खतांचा वापर प्रोत्साहन

शाश्वत शेतीस प्रोत्साहन


• केंद्र, राज्य आणि राष्ट्रीय सहकार संघटनांमार्फत योजना अंमलबजावणी केली जाईल


शेतीसंबंधी राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय दिन

• 10 फेब्रुवारी – जागतिक दलहन दिन

• 15 मार्च – आंतरराष्ट्रीय कृषी यांत्रिकी दिवस

• 21 मार्च – जागतिक वनीकरण दिन

• 22 मार्च – जागतिक जल दिन

• 5 जून – जागतिक पर्यावरण दिन

• 1 जुलै – डॉकटर दिवस (महासत्ता)

• 3 जुलै – आंतरराष्ट्रीय प्लास्टिक बॅग मुक्ती दिन

• 16 ऑक्टोबर – जागतिक अन्न दिवस

• 5 डिसेंबर – जागतिक मृदा दिन

• 23 डिसेंबर – कृषी दिन

• 26 नोव्हेंबर – राष्ट्रीय दूध दिन

• 2 ऑक्टोबर – जैविक शेती दिवस

• 12 जानेवारी – राष्ट्रीय युवा दिन

• 15 ऑक्टोबर – महिला शेतकरी दिन

oneliner

◾️आंध्रप्रदेश : ई-कॅबिनेटचा वापर करणारे भारतातील पहिले राज्य

◾️गुजरात : ऑनलाईन मतदान राबविणारे पहिले राज्य 

◾️मेघालय : जन-धन योजनेची 100% अंमलबजावणी करणारे पहिले राज्य 

◾️तेलंगणा : पदवीपर्यंत लैंगिक शिक्षण सक्तीचे करणारे पहिले राज्य 

◾️दिल्ली :भारतातील पहिली फूड बैंक सुरू करणारे राज्य 

◾️राज्यस्थान : होमिओपॅथिक विद्यापीठ सुरू करणारे पहिले राज्य

◾️महाराष्ट्र : स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांना 33% आरक्षण देणारे पाहिले राज्य 

◾️महाराष्ट्र : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना सुरू करणारे पाहिले राज्य

◾️महाराष्ट्र : महिला आरक्षण देणारे : भारतातील पाहिले राज्य

◾️दिल्ली: देशातील पहिले केरोसीनमुक्त शहर 

◾️केरळ:  हे सर्वांना इंटरनेटचा मूलभूत हक्क देणारे पहिले राज्य बनले आहे

◾️राज्यस्थान :आरोग्य हक्क कायदा’ लागू करणारे राजस्थान हे देशातील पहिले 

◾️उत्तराखंड :पूर्व-प्राथमिक स्तरावर "नवीन शैक्षणिक धोरण" लागू करणारे पाहिले राज्य

◾️कर्नाटक : ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर (GCC) धोरण आणणारे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.

◾️उत्तराखंड : विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकीत मुलींसाठी 50% जागा राखीव ठेवणारे  पहिले राज्य

◾️उत्तराखंड : जगातील पहिला सकल पर्यावरण उत्पादन निर्देशांक 

◾️राज्यस्थान : रस्ता सुरक्षा कृती योजना स्वीकारणारे पहिले राज्य ठरणार आहे

◾️केरळ : जैवविविधतेची नोंद करणारे पहिले राज्य ठरले आहे

◾️बिहार : ट्रैफिक चे ऑडिट करणारे पाहिले राज्य

◾️बिहार : इथेनॉल प्रोत्साहन धोरण लागू करणारे देशातील पाहिले राज्य

SDG शाश्वत विकास ध्येये


🔴 SDG शाश्वत विकास ध्येये म्हणजे काय ? 

👉 SDG (Sustainable Development Goals) म्हणजे शाश्वत विकास ध्येये ही एकूण 17 आंतरराष्ट्रीय उद्दिष्टांची मालिका आहे.

🎯🎯शाश्वत प्रगती साध्य करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी 2015 साली 17 ध्येये (Goal) आणि 169 (लक्ष्ये) Target निश्चित केली आहेत.✔️✔️

📣📣 सप्टेंबर 2015 मध्ये न्यूयॉर्क येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास शिखर परिषदेत 17 SDG सह 2030 पर्यंत चा शाश्वत विकास अजेंडा स्वीकारण्यात आला.⭐️


1) दारिद्र्य निर्मूलन (No Poverty)


2) उपासमार संपवणे (Zero Hunger)


3) आरोग्य आणि कल्याण (Good Health and Well-being)


4) दर्जेदार शिक्षण (Quality Education)


5) लिंग समानता (Gender Equality)


6) स्वच्छ पाणी आणि स्वच्छता (Clean Water and Sanitation)


7) स्वस्त आणि स्वच्छ ऊर्जा (Affordable and Clean Energy)


8) चांगले काम आणि आर्थिक वाढ (Decent Work and Economic Growth)


9) उद्योग, नवकल्पना आणि पायाभूत सुविधा (Industry, Innovation and Infrastructure)


10) विषमता कमी करणे (Reduced Inequalities)


11) शाश्वत शहरे आणि समुदाय (Sustainable Cities and Communities)


12) जबाबदार वापर आणि उत्पादन (Responsible Consumption and Production)


13) हवामान बदलावरील कृती (Climate Action)


14) पाण्याखालील जीवन (Life Below Water)


15) जमिनीवरील जीवन (Life on Land)


16) शांतता, न्याय आणि सक्षम संस्था  (Peace, Justice and Strong Institutions)


17) ध्येयांसाठी जागतिक भागीदारी (Partnerships for the Goals)



🔴 IMP आहे पाठ करून घ्या 🔴

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस


👩‍💻भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबई मध्ये झाली.

पहिले अधिवेशन गोकुलदास तेजपाल संस्कृत कॉलेजमध्ये पार पडले. 🎯

पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष व्योमेश चंद्र बॅनर्जी होते.✅

अधिवेशनात तब्बल 72 प्रतिनिधींनी भाग घेतला होता.✅


🔴1) काँग्रेस पहिले अधिवेशन

👉 व्योमेशचंद्र बॅनर्जी ⭐️

👉 1885⭐️

👉 बॉम्बे (मुंबई) ⭐️


🔴2) काँग्रेस दुसरे अधिवेशन

👉 दादाभाई नौरोजी 

👉 1886

👉 कोलकाता 


🔴3) काँग्रेस तिसरे अधिवेशन

👉 सैयद बदरुद्दीन तैय्यबजी

👉 1887

👉 मद्रास (चेन्नई)


⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️


🔴काँग्रेस अधिवेशन 1907

👉 1907 मधील काँग्रेस अधिवेशन सूरत येथे झाले.🔥

👉 अध्यक्ष रासबिहारी घोष होते✔️

👉अधिवेशनात काँग्रेसमध्ये मवाळ (Moderates) आणि जहाल (Extremists) या दोन गटांमध्ये उघडपणे फूट पडली, यालाच "सूरत फूट" (Surat Split) म्हणतात.⭐️


🔴काँग्रेस अधिवेशन 1916

👉 1916 मधील काँग्रेस अधिवेशन लखनऊ येथे झाले.🔥

👉 अध्यक्ष अंबिका चरण मजुमदार 

👉 या अधिवेशनात काँग्रेसमधील मवाळ (Moderates) आणि जहाल (Extremists) गट पुन्हा एकत्र आले. ⭐️

👉 याच अधिवेशनात काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात ऐतिहासिक लखनऊ करार झाला.


🔴काँग्रेस अधिवेशन 1924

👉 1924 मधील काँग्रेस अधिवेशन बेळगाव येथे झाले.🔥

👉 या 39 व्या अधिवेशनाचे अध्यक्ष महात्मा गांधी होते. गांधीजींनी काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद फक्त एकदाच स्वीकारले होते.✔️✔️


🔴काँग्रेस अधिवेशन 1936

👉 हे 1936 चे अधिवेशन महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील फैजपूर या गावात झाले.

👉  हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन होते ⭐️⭐️

👉 अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू

भारतातील महत्त्वाचे बंदर (IMP Port)

🔴1) कांडला बंदर (Kandla Port)

👉  2017 मध्ये नावात बदल होऊन दीनदयाल बंदर नाव देण्यात आले.✔️

👉  गुजरात राज्यात (कच्छ जिल्हा)


🔴2) मुंबई बंदर ( Mumbai Port) 

👉 मुंबई (महाराष्ट्र )


🔴3) JNPT (न्हावा शेवा)

👉  जवाहरलाल नेहरू बंदर (न्हावा शेवा)

👉 नवी मुंबई शहर (रायगड जिल्हा) ⭐️

👉 King Port of Arabian sea ✔️

👉 भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर 🔥


🔴4) वाढवण बंदर (Vadhavan Port)

👉 महाराष्ट्रात नवीन होणारे बंदर

👉 पालघर जिल्हा⭐️


🔴5) मुरगाव बंदर ( Mormugao Port)

👉 गोवा राज्यात


🔴6) न्यू मंगलोर बंदर (New Mangalore port)

👉 कर्नाटक राज्यात 


🔴7) कोची बंदर (Kochi Port)

👉 केरळ राज्यात

👉 Queen Port Of Arabian sea ✔️


🔴8) तुतीकोरिन बंदर (Tuticorin Port)

👉  2011-12 नाव बदलून V.O. चिदंबरनार पोर्ट करण्यात आले.✔️

👉 तामिळनाडू राज्यात 


🔴9) चेन्नई बंदर (Chennai Port)

👉 तामिळनाडू राज्यात 

👉 भारतातील दुसरे सर्वात मोठे कंटेनर बंदर आहे.✔️


🔴10) इन्नोर बंदर (Ennore Port)

👉 2014 मध्ये नावात बदल करून कामराजा बंदर करण्यात आले.✔️

👉 तामिळनाडू राज्यात 

👉 Kamarajar Port First major port in India registered as a company✔️


🔴11) विशाखापट्टणम बंदर (Visakhapatnam Port)

👉 यालाच Vizag Port म्हणतात

👉 आंध्र प्रदेश राज्यात 


🔴12) पारादिप बंदर (Paradip Port)

👉 ओडिसा राज्यात 

👉 महानदी आणि बंगालच्या उपसागराच्या संगमावर 


🔴13) कोलकाता बंदर (Kolkata Port)

👉 2020 मध्ये नावात बदल करून शामा प्रसाद मुखर्जी बंदर करण्यात आले 

👉 पश्चिम बंगाल राज्यात 

👉 या बंदरात दोन डॉक सिस्टम आहेत एक Kolkata Dock system दुसरे Haldia Dock complex 

👉 हुगळी नदीवर हे बंदर आहे.

👉 Only Riverine Major Port in India 


🔴14) पोर्ट ब्लेअर बंदर (Port Blair Port)

👉 अंदमान मधील एक बंदर 


🔴15 ) विंझिजम बंदर (Vizhinjam Port)

👉 केरळ राज्यात 

👉भारताचे पहिले खोल पाण्याचे ट्रान्सशिपमेंट बंदर आहे ( Deep-Water Transshipment Port) ⭐️


🔴16) मुंद्रा बंदर (Mundra Port)

👉  गुजरात राज्यात

👉 भारतातील सर्वात मोठे खाजगी बंदर 


३० जुलै २०२५ वन लाइनर करंट अफेयर्स


१. जागतिक मानव तस्करी प्रतिबंधक दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? 

🎖️ ३० जुलै 


२. भारतातील पहिली पिराटुला वुल्फ स्पायडर, पिराटुला एक्यूमिनाटा कोणत्या राज्यात सापडली आहे? 

🎖️ पश्चिम बंगाल 


३. भारताचा पहिला हायड्रोजन-ऑक्सिजन प्रोपल्शन इंजिन यशस्वीपणे कोणत्या राज्यात चाचणीसाठी वापरला गेला? 

🎖️कर्नाटक 


४. रेमोना परेरा कोणत्या शास्त्रीय नृत्याशी संबंधित आहेत ज्यांनी अलीकडे सातत्याने १७० तास नृत्य करून जागतिक विक्रम केला आहे? 

🎖️ भरतनाट्यम 


५. गजैप नावाचा जगातील सर्वात शक्तिशाली गैर-परमाणु बम कोणत्या देशाने सादर केला आहे? 

🎖️ तुर्की 


६. भारतातील पहिला हिंदी माध्यम एमबीबीएस कॉलेज कोणत्या शहरात उभारला जाणार आहे? 

🎖️ जबलपूर 


७. अलीकडे मास्टरकार्डने पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्यासोबत सहकार्य केले आहे? 

🎖️आंध्र प्रदेश 


८. हेपेटायटिस जागरूकता सप्ताह २६ जुलैपासून कधीपर्यंत साजरा केला जाईल? 

🎖️१ ऑगस्ट 


९. जर्मनीमध्ये आयोजित २०२५ विश्व विद्यापीठ खेळांमध्ये भारताने कोणती स्थान मिळवली आहे? 

🎖️ २० वा (१२ पदके - २ सुवर्ण, ५ रजत आणि ५ कांस्य)


१०. प्रा. लता पांडे आणि डॉ. रामानंद यांनी संपादित “छात्रों का सतत कल्याण: उच्च शिक्षा में एक सामूहिक उत्तरदायित्व” या पुस्तकाचे विमोचन कोणाने केले आहे? 

🎖️पुष्कर सिंह धामी


११. प्राचीन पांडुलिपी डिजिटल करण्यासाठी 'ज्ञान भारतम मिशन' कोणत्या नेत्याने सुरू केले? 

🎖️ नरेंद्र मोदी 


१२. २९ वी आशियाई युवा टेबल टेनिस चॅम्पियनशिपमध्ये अंडर-१५ बालिका एकल विजेतेपद कोणत्या खेळाडूने जिंकले आहे? 

🎖️दिव्यांशी भौमिक 


१३. अलीकडे बाघ घनतेच्या बाबतीत जागतिक स्तरावर तिसरे स्थान कोणत्या ठिकाणी आहे? 

🎖️ काजीरंगा टायगर रिझर्व्ह 


कलम 14

भारतीय संविधानाचा कलम 14 (Article 14) हा समानतेच्या हक्कांशी (Right to Equality) संबंधित आहे. हा कलम भारतातील सर्व नागरिकांना कायद्याच्या दृष्टीने समानता आणि कायद्याच्या समान संरक्षणाची हमी देतो.


कलम 14 चे महत्त्वाचे मुद्दे:


समानतेचा अधिकार: भारतातील कोणत्याही व्यक्तीला (नागरिक असो वा परदेशी) कायद्याच्या आधी समान वागणूक दिली जाईल. कोणत्याही व्यक्तीला लिंग, जात, धर्म, वंश, जन्मस्थान इत्यादी आधारावर भेदभाव केला जाणार नाही.


कायद्याचे समान संरक्षण: देशातील प्रत्येक व्यक्तीस कायद्याचे समान संरक्षण मिळेल. याचा अर्थ असा की, जेव्हा एखादी व्यक्ती समान परिस्थितीत असेल, तेव्हा तिला समान कायद्याचे संरक्षण मिळायला हवे.


समानता आणि तर्कसंगत वर्गीकरण: 

जरी कलम 14 सर्वांसाठी समानतेचा अधिकार देतो, तरीही तर्कसंगत वर्गीकरण (Reasonable Classification) अनुमत आहे. म्हणजे, काही विशिष्ट परिस्थितींमध्ये वेगवेगळ्या गटांसाठी भिन्न कायदे असू शकतात, पण ते तर्कसंगत आणि न्याय्य असले पाहिजेत.

यासाठी दोन अटी पूर्ण कराव्या लागतात: 

समूहामध्ये समरसता असावी – म्हणजे, गटामध्ये असलेल्या लोकांमध्ये समान वैशिष्ट्ये असावी.

वर्गीकरणाचा उद्देश न्याय्य आणि तार्किक असावा – म्हणजे, त्यामागे वैध आणि न्याय्य कारण असावे.


कलम 14 अंतर्गत महत्त्वाचे न्यायालयीन निर्णय:


State of West Bengal v. Anwar Ali Sarkar (1952) – यात सांगितले गेले की, कोणत्याही कायद्याने किंवा धोरणाने अवैध भेदभाव निर्माण होऊ नये.


E.P. Royappa v. State of Tamil Nadu (1974) – यात सांगितले गेले की, समानता म्हणजे केवळ भेदभावाचा अभाव नव्हे, तर याद्वारे स्वेच्छाचारी निर्णयांना आळा बसला पाहिजे.


Maneka Gandhi v. Union of India (1978) – या प्रकरणात कलम 14 चे अधिक विस्तृत अर्थ लावण्यात आले आणि याला कलम 19 आणि कलम 21 सोबत वाचले पाहिजे, असे स्पष्ट करण्यात आले.


कलम 14 चा अपवाद:


कलम 14 सर्वसामान्य नियम सांगतो, परंतु काही विशिष्ट परिस्थितींमध्ये काही अपवाद देखील आहेत:


President आणि Governors यांना काही घटनात्मक विशेषाधिकार आहेत.


संसद आणि विधिमंडळ सदस्यांना विशिष्ट अधिकार आणि विशेष संरक्षण दिले जाते.


आरक्षण धोरणांमध्ये (SC, ST, OBC साठी) समानतेचा तत्त्व लवचिक पद्धतीने वापरला जातो.


निष्कर्ष:

कलम 14 हा भारतीय लोकशाहीचा एक आधारस्तंभ आहे. तो प्रत्येक व्यक्तीस कायद्याच्या आधी समानता देतो, पण त्याच वेळी तर्कसंगत वर्गीकरणाची संकल्पना देखील मान्य करतो, जेणेकरून सामाजिक न्याय व वास्तववादी व्यवस्थापन शक्य होईल.

भारतीय संविधानाचे प्रमुख उगमस्थाने

#Polity 


🔹 🇬🇧 ब्रिटन (UK Constitution)

संसदीय लोकशाही

कायद्याच्या अधीनता (Rule of Law)

मंत्रीपरिषद प्रणाली

एकेरी नागरिकत्व


🔹 🇺🇸 अमेरिका (U.S. Constitution)

मुलभूत हक्क

स्वतंत्र न्यायपालिका

राष्ट्रपती पद्धत

न्यायिक पुनरावलोकन

उपराष्ट्रपती पद


🔹 🇮🇪 आयर्लंड

राज्य धोरणात्मक तत्वे (DPSP)

राष्ट्रपतींची निवड पद्धत

राज्यसभा नामनिर्देशन


🔹 🇨🇦 कॅनडा

केंद्र-राज्य अधिकार वाटप

मजबूत केंद्र

अवशिष्ट अधिकार


🔹 🇦🇺 ऑस्ट्रेलिया

समवर्ती सूची

व्यापार स्वातंत्र्य

संसद सदस्यांची संयुक्त बैठक


🔹 🇩🇪 जर्मनी (Weimar Republic)

आणीबाणीतील मूलभूत हक्क निलंबन


🔹 🇷🇺 रशिया (पूर्व सोव्हिएत युनियन)

मूलभूत कर्तव्ये


🔹 🇫🇷 फ्रान्स

स्वातंत्र्य, समता, बंधुता


📌 हे मुद्दे लक्षात ठेवले तर कोणताही प्रश्न चुकणार नाही!

🔔 अभ्यास करत राहा, यश तुमचं निश्चित आहे!

गोदावरी नदी

🔷 उगम:

▪️ त्र्यंबकेश्वर, नाशिक जिल्हा (महाराष्ट्र)


🔷 लांबी:

▪️ एकूण – सुमारे 1,465 कि.मी.

▪️ महाराष्ट्रात – सुमारे 730 कि.मी.


🔷 क्षेत्रफळ (MH):

▪️ सुमारे 3 लाख चौ. कि.मी.

▪️ त्यापैकी सुमारे 48% क्षेत्र महाराष्ट्रात

---

🟠 मुख्य संगम:

▪️ गोदावरी व प्रभा, इंद्रावती, मंजीरा, प्राणहिता नद्यांचा संगम

▪️ शेवटी आंध्र प्रदेशमधून बंगालच्या उपसागरात मिळते

---

⚫️ गोदावरी खोऱ्यातील जिल्हे:

▪️ नाशिक, अहमदनगर, बीड, हिंगोली, परभणी, नांदेड

▪️ मराठवाडा आणि विदर्भातील महत्त्वाचे सिंचन व जलसंधारण स्रोत

---

🔵 गोदावरी नदीच्या उपनद्या:

🟤 उजव्या उपनद्या:

▪️ पैनगंगा, वैनगंगा, प्राणहिता

⚫️ डाव्या उपनद्या:

▪️ दारणा, मंजीरा, इंद्रावती, पूर्णा

मुख्य नद्या व त्यांचे उगमस्थाने

🔹 1. गोदावरी

📍 उगम: ब्रम्हगिरी पर्वत (नाशिक)

📏 लांबी: 668 कि.मी.

➡️ उपनद्या:

• उत्तरकडील – कादवा, शिवना, खान, दुधना, दक्षिण पुणी, प्राणहिता, इंद्रावती

• दक्षिणेकडील – दारण, प्रवर, मुंढा, बोरी, सिंधफणा, बिंदुसरा, कुंडलिका, मांजरा

---


🔹 2. भीमा

📍 उगम: भीमाशंकर (पुणे)

📏 लांबी: 451 कि.मी.

➡️ उपनद्या:

• उत्तरकडील – वेळ, कन्हडी, घोड, सीना, पुण्णगावती, भोगावती

• दक्षिणेकडील – भामा, इंद्रायणी, पवना, मुकाई, मुठा, नीरा, माण

---


🔹 3. कृष्णा

📍 उगम: महाबळेश्वर

📏 लांबी: 282 कि.मी.

➡️ उपनद्या:

• उत्तरकडील – येरेळा, नंदळा, अग्नी

• दक्षिणेकडील – कोयना, वेण्णा, वारणा, पंचगंगा, दुधगंगा, वेदगंगा

---


🔹 4. वर्धा

📍 उगम: मुलताई, मध्यप्रदेश

📏 लांबी: 455 कि.मी.

➡️ उपनद्या:

• उत्तरकडील – कारण, वेणा, जाम, बोर, ईरई, वेनगंगा

• दक्षिणेकडील – माऊ, पेंचगंगा, वेल्गला, निरगुडा

---


🔹 5. वैनगंगा

📍 उगम: शिवनी, मध्यप्रदेश

📏 लांबी: 295 कि.मी.

➡️ उपनद्या:

• उत्तरकडील – वाघ, चुलबंद, गाढवी, दीना

• दक्षिणेकडील – कन्हान, मुल, सुर, पेंच, नाग

---


🔹 6. पैनगंगा

📍 उगम: अर्जिता डोंगर

📏 लांबी: 495 कि.मी.

➡️ उपनद्या:

• उत्तरकडील – सूद, अर्णवा, विदर्भ, वाचाडी, अरुणावती

• दक्षिणेकडील – कयाश

---


🔹 7. नर्मदा

📍 उगम: अमरकंटक, मध्यप्रदेश

📏 लांबी: 54 कि.मी.

➡️ उपनद्या:

• उत्तरकडील – अरुणावती, गोमती, वाकी, मोर, गुड्डी, अमेर

• दक्षिणेकडील – गिरणा, बोरी, वाघूर, अंजन, पुणी, शिवार

---


🔹 8. तापी

📍 उगम: मुलताई, बैतुल जिल्हा

📏 लांबी: 228 कि.मी.

➡️ उपनद्या:

• उत्तरकडील – कुर, हो, आगर

• दक्षिणेकडील – गिरणा, अंबी, सुडसी, शिवार

---


📌 तयारी सुरू ठेवा! 

दुर्गाबाई देशमुख

• प्रख्यात नेते टी. प्रकाश यांच्या बरोबर त्यांनी मीठाच्या सत्याग्रहात भाग


• 25  मे 1930 रोजी दुर्गाबाई यांना अटक करण्यात आली आणि एका वर्षाची शिक्षा झाली. बाहेर येताच दुर्गाबाईंनी आंदोलनात भाग घेतल्याबद्दल पुन्हा त्यांना अटक केली गेली आणि 3 वर्षांची तुरुंगवास


• "चिंतामण अँड आय" हे त्यांचे आत्मचरित्र 


• आंध्र महिला सभा (1937), विश्वविद्यालय महिला संघ, नारी निकेतन या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी महिलांचे विकासासाठी प्रयत्न केले.


• महिला शिक्षणाच्या राष्ट्रीय समितीच्या त्या पहिल्या अध्यक्ष होत्या. आंध्र प्रदेशातील गावांमध्ये शिक्षणाचा प्रसार केल्याबद्दल त्यांना नेहरू साक्षरता पुरस्कार दिला.


• सुकाणू समितीमधील एकमेव महिला सदस्या


• 1953 मध्ये दुर्गाबाई यांनी मध्यवर्ती समाज कल्याण मंडळाची स्थापना केली आणि अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली


• 1958 साली यांच्या अध्यक्षतेखाली स्त्री शिक्षण विषयक राष्ट्रीय आयोग स्थापन करण्यात आला.


• संविधान सभेततील 15 महिलांपैकी त्या एक

मद्रास प्रांतातून निवड

केशवराव मारुतीराव जेधे

 जन्म -21 एप्रिल 1896 (पुणे)


• "शिवाजी आमचा राणा आणि मराठी आमचा बाणा" या ध्येयाने वाटचाल करणारा सत्यशोधक म्हणून केशवरावांची ओळख 


• शिवाजी महाराजांच्या मर्जीतील कान्होजी जेधे हे केशवरावांचे पूर्वज होते. केशवरावांच्या वडिलांचा पुण्यात भांड्याचा कारखाना होता.


• 1928 मुंबई इलाखा शेतकरी परिषदेचे सचिव होते. (पुणे)

• 1929 - सातारा जिल्हा मराठा परिषदेचे अध्यक्ष 


• पुणे येथे ब्राह्मणेत्तरांनी स्थापन केलेल्या "छत्रपती शिवाजी मेळ्यासाठी" 1923-30 पर्यंत पद्यरचना केली. गाणी गायली.


• 1925 मध्ये सत्यशोधक दिनकरराव जवळकरांच्या "देशाचे दुश्मन" पुस्तिकेला लिहिलेल्या प्रस्तावनासाठी न्या.फ्लेमिंग यांनी सहा महिन्याची शिक्षा सुनावली. पुढे न्या.लॉरेन्स यांच्या कोर्टात निर्दोष सुटका


• काही दिवस श्री शिवस्मारक हे पत्र चालवले. महाड व पुणे येथील पर्वती मंदिर सत्याग्रहात सहभागी 


• 1925 रोजी पुणे नगरपालिकेचे सदस्य असताना बुधवार पेठेत महात्मा फुलेंचा पुतळा उभारावा असा ठराव मांडला परंतु सनातन्यांनी बहुमताच्या जोरावर नगराध्यक्ष ल. ज.आपटे यांनी जोरावर तो फेटाळून लावला.  केशवराव जेधे, वायाळ, सणस, विठ्ठलराव झेंडे यांनी सभात्याग केला.


• गांधीजींच्या प्रभावाखाली आलेल्या केशवरावांनी पुढे काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.


सिंधू संस्कृतीतील प्रमुख ठिकाणे मॅप




📍 1. हडप्पा (Pakistan)

 🔹 नदी : रावी 🌊

 🔹 उत्खनन करणारे : दयाराम साहनी 🕵️

 🔹 ई.स. : 1921 📅


📍 2. मोहनजोदाडो (Pakistan)

 🔹 नदी : सिन्धू 🌊

 🔹 उत्खनन करणारे : राखालदास बनर्जी 🕵️

 🔹 ई.स. : 1922 📅


📍 3. कालीबंगन (Rajasthan)

 🔹 नदी : घग्गर 🌊

 🔹 उत्खनन करणारे : बी. बी. लाल & बी. के. थापर 🕵️‍♂️

 🔹 ई.स. : 1953 📅


📍 4. चहुंदडो (Pakistan)

 🔹 नदी : सिन्धू 🌊

 🔹 उत्खनन करणारे : गोपाल मजूमदार 🔍

 🔹 ई.स. : 1931 📅


📍 5. लोथल (Gujarat)

 🔹 नदी : भोगावा 🌊

 🔹 उत्खनन करणारे : रंगनाथ राव 🏺

 🔹 ई.स. : 1955-62 📅


📍 6. रोपर (Punjab)

 🔹 नदी : सतलज 🌊

 🔹 उत्खनन करणारे : यज्ञदत्त शर्मा 🔎


📚 ही ठिकाणे सिंधू संस्कृतीच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देतात! 🏺✨


आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन 29 जुलै


2024 थीम - कृतीचे आवाहन


◾️2010 पासून व्याघ्र दिन साजरा केला जातो

◾️2010 साली सेंट पीटर्सबर्ग, रशिया समितीमध्ये  29 जुलै तारखेचा निर्णय घेतला

◾️TX2 असे ध्येय ठेवले होते - वाघांची संख्या दुप्पट करणे

◾️वैज्ञानिक नाव - पँथेरा टायग्रीस

◾️प्रत्येक 4 वर्षाला व्याघ्र गणना केली जाते

◾️जगाच्या 70% वाघ एकट्या भारतात आहेत

◾️टायगर स्टेट - मध्यप्रदेश ला म्हणतात

◾️संपूर्ण देशभरात 2022 व्याघ्रगणनेनुसार देशात 3167 वाघांची नोंद झाली (2023 -3882 झाली)


वाघांना वाचवण्यासाठी सरकारचे प्रयत्न

1969 - सर्व प्रकारच्या जनावरांच्या कातडी निर्यातीवर बंदी

1972 - वन्यजीव संवर्धन कायदा

1973 - प्रोजेक्ट टायगर सुरू

2010 - जागतिक व्याघ्र दिन सुरवात

2023 - International Big Cat Alliance


महाराष्ट्रातील 6 व्याघ्र प्रकल्प 

🐅 नवेगाव-नागझिरा (गोंदिया)

🐅 बोर - (वर्धा)

🐅 सह्याद्री - (सांगली,सातारा ,कोल्हापूर)

🐅 मेळघाट - (अमरावती)

🐅 पेंच व्याघ्र प्रकल्प -(नागपुर)

🐅 ताडोबा-अंधारी - (चंद्रपूर)


‼️ काही महत्वाचे

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प आहे


मेळघाट व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे


बोर व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प


काकोरी ट्रेन ॲक्शन



> उत्तर प्रदेश सरकारने काकोरी ट्रेन लुटीच्या  ऐतिहासिक घटनेचे नामांतर काकोरी ट्रेन अॅक्शन असे झाले आहे.


> भारतीय स्वातंत्र्य चळवळीदरम्यान 9 ऑगस्ट 1925 रोजी लखनऊजवळील काकोरी गावानजीक उत्तर रेल्वे मार्गावर क्रांतिकारकांनी हा रेल्वे दरोडा टाकला होता.


> काकोरी दरोड्यात सहभागी झालेले स्वातंत्र्यसैनिक राम प्रसाद बिस्मिल, अशफाकुल्ला खान, राजेंद्र लाहिरी आणि ठाकूर रोशन सिंह यांना 19 डिसेंबर 1927 रोजी फाशी देण्यात आली.


> हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन (HRA) द्वारे या दरोड्याचे नियोजन करण्यात आले होते.


> हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन (HRA):


----- राम प्रसाद बिस्मिल यांनी 1923 मध्ये या पक्षाची स्थापना केली.


------ 1922 मध्ये चौरी चौरा घटनेमुळे महात्मा गांधींनी असहकार आंदोलन बंद केले. हे पक्षाच्या स्थापनेमागील मुख्य कारण ठरले होते.


------- पक्षाचे इतर प्रमुख सदस्यः ----

सचिंद्रनाथ सन्याल आणि जोगेशचंद्र चॅटर्जी (जे अनुशीलन समितीचे सदस्यही होते)


----- लाला हर दयाल यांच्या आशीर्वादाने बिस्मिल यांनी 1923 मध्ये अलाहाबाद येथे पक्षाची घटना लिहिली.


----- सन्याल यांनी 'क्रांतिकारी' नावाचा पक्षाचा जाहीरनामा लिहिला होता.


----- ब्रिटिश राजवट उलथून टाकत 'फेडरल रिपब्लिक ऑफ द युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया' साध्य करण्याचा प्रयत्न असल्याचे जाहीरनाम्यात म्हटले होते.


---- यामध्ये सार्वत्रिक मताधिकाराची  मागणी करण्यात आली होती.


----- 1924- 1925 मध्ये, अनेक तरुण पक्षात सामील झाले, त्यामध्ये भगतसिंग, सुखदेव आणि चंद्रशेखर आझाद ही प्रमुख नावे होती.



150 वर्ष पूर्ण होत आहे

नोंद असू द्या.....❤️❤️🙏🙏

पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर




 पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे कार्य


●●  त्यांचे बंगाली भाषेतील लिखाण तसेच बंगाली लिपीमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या. त्यांनी संस्कृत भाषेत मोठी विद्वत्ता प्राप्त केल्यामुळे त्यांना 'विद्यासागर'  उपाधी मिळाली. त्यांनी बंगालमध्ये अनेक विद्यालये स्थापन केली. रात्री पाठशाळा स्थापन केल्या. 


●● पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी विधवा पुनर्विवाहाचा आग्रह धरला.


●● पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी हिंदू धर्मातील विधवांना दिली जाणारी वागणूक, विधवांची होणारी हेळसांड, अपमान, अन्याय याला वाचा फोडण्याचे काम विद्यासागर त्यांनी केले.


●● पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी विधवा पुनर्विवाहावरील बंदी हटवण्याची मोहीम सुरू केली.


●● पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी धर्मशास्त्रात विधवा पुनर्विवाहाला मान्यता आहे हे सिध्द केले. 1851 मध्ये पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर कलकत्ता येथे संस्कृत कॉलेजचे प्राचार्य म्हणून सेवा बजावली.

 

( हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, धर्म शास्त्र यामध्ये विधवा पुनर्विवाह मान्यता आहे हे पटवून कोणी दिले)  जस सती बद्दल combine पूर्व प्रश्न होता तसा प्रश येऊ शकतो...)



●●  पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी विधवा पुनर्विवाहाच्या समर्थनार्थ 'पराशरसंहिता' या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर करून त्याच्या प्रती इंग्रज अधिकाऱ्यांना दिल्या.


●● 1856 मध्ये पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या प्रयत्नामुळे कलकत्ता येथे भारतातील पहिला विधवा विवाह घडून आला.


●● पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी 1855 मध्ये विधवा पुनर्विवाह कायदा संमत करण्याची विनंती 'ग्रांट' यांना केली. त्यामुळेच गव्हर्नर लॉर्ड डलहौसीच्या कालखंडात 1856 मध्ये विधवा पुनर्विवाह कायदा संमत झाला.


●●  'लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण' या वृत्तीचे पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर नव्हते तर ते कर्ते सुधारक होते.


●● त्यांनी जवळजवळ 35 विधवा पुनर्विवाह घडवून आणले व स्वतःच्या मुलाचा एका विधवेशी विवाह लावून दिला.


●●  पंडित ईश्वरचंद्र विद्यासागरने विधवा, कुमारिका, प्रौढ विधवा स्त्रिया यांच्या अन्यायाला वाचा फोडली.


●● पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी भारतीय महिलांच्या बंध विमोचनातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न केले.


1857 च्या उठावाच्या बद्दल मते.....




(  सगळे वाक्य आयोगाचे प्रश्न आहेत )


●● बेंजामिन डिझरायली------राष्ट्रीय उत्थान


●● स्टॅन्ले वॉलपर्ट-------ही घटना लष्करी बंडापेक्षा काही अधिक होती परंतू प्रथम स्वातंत्र्ययुध्दापेक्षा बरीच कमी होती.


●● गो.स. सरदेसाई----सत्तावन सालचा क्षोभ


●● डॉ. सेन------धार्मिक संघर्षाचे रुप घेऊन सुरु झालेला उठाव पुढे स्वातंत्र्यसंग्राम बनला.


●● टी.आर. होल्म-----संस्कृत आणि टोळीवाद असा संघर्ष म्हणजे १८५७ चा उठाव असा त्यांचा दृष्टीकोन होता.


●● एन.आर.फाटक----१८५७ ची घटना स्वातंत्र्ययुध्द नव्हते  ( शिपायांची भाऊगर्दी )


●● वि.दा. सावरकर----स्वातंत्र्ययुध्द





संविधान सभेतील सुकाणू समितीबद्दल थोडक्यात माहिती

संविधान सभेतील सुकाणू समितीचे काम अत्यंत महत्त्वाचे होते. सुकाणू समितीला इंग्रजीत "Steering Committee" असे म्हणतात. या समितीची प्रमुख भूमिका संविधान सभेचे काम सुरळीत, नियोजित आणि योग्य प्रकारे पार पाडणे ही होती.


सुकाणू समितीचे मुख्य काम:

1. सभेचे अजेंडा ठरवणे:

प्रत्येक बैठकीचे अजेंडा (कार्यक्रम) ठरवणे, कोणते मुद्दे कधी चर्चेस घ्यायचे, याचे नियोजन करणे.


2. वेळापत्रक ठरवणे:

संविधान निर्मिती प्रक्रियेचा कालावधी ठरवणे व विविध समित्यांचे काम वेळेत पूर्ण होईल याची जबाबदारी घेणे.


3. सभेची दिशा निश्चित करणे:

विविध समित्यांकडून येणारे अहवाल, मसुदे, शिफारसी योग्य वेळी सभेपुढे मांडणे आणि चर्चेसाठी पुढे नेणे.


4. संविधान मसुदा तयार होईपर्यंत समन्वय साधणे:

इतर समित्यांमध्ये समन्वय ठेवणे आणि कामाच्या प्रगतीवर लक्ष ठेवणे.


5. कार्यप्रणाली निश्चित करणे:

संविधान सभेची कार्यपद्धती, नियम, चर्चेचे स्वरूप, मतदान इत्यादी बाबी ठरवण्यास मदत करणे.


सुकाणू समितीचे अध्यक्ष कोण होते?

डॉ. राजेंद्र प्रसाद हे सुकाणू समितीचे अध्यक्ष होते. ते संविधान सभेचेही अध्यक्ष होते.

स्वतंत्र भारताचे प्रथम नेता / मंत्री


💘 प्रथम राष्ट्रपती - राजेंद्र प्रसाद


⚡️ प्रथम उपराष्ट्रपती - सर्वपल्ली राधाकृष्णन


💘 प्रथम प्रधानमंत्री - जवाहरलाल नेहरू


⚡️ प्रथम उपप्रधानमंत्री - वल्लभ भाई पटेल


💘 प्रथम गृहमंत्री - वल्लभ भाई पटेल


⚡️ प्रथम कृषी मंत्री - राजेंद्र प्रसाद


💘 प्रथम कायदा मंत्री - भीमराव आंबेडकर


⚡️ प्रथम रेल्वे मंत्री - आसफ अली


💘 प्रथम अर्थ मंत्री - लिआकत अली


⚡️ प्रथम शिक्षण मंत्री- अबुल कलाम आझाद


💘 प्रथम संरक्षण मंत्री - बलदेव सिंह


⚡️ प्रथम आरोग्य मंत्री - गजान्तर आली


💘 प्रथम दूरसंचार मंत्री - अब्दुल नस्तर


⚡️ प्रथम श्रम मंत्री - जगजीवन राम

➖➖➖➖➖➖➖➖➖

क्रमाने आहेत लक्षात ठेवा.

• ऑगस्ट घोषणा - 1940


• क्रिप्स योजना - 1942


• राजाजी योजना - जुलै 1944


• गांधी-जिन्हा बोलणी 9 ते 27 सप्टेंबर 1944


• देसाई-लियाकत अली योजना 1945


• वेव्हेल योजना 14 जून 1945


• सिमला परिषद - 25 जून ते 14 जुलै 1945


• कॅबिनेट (त्रिमंत्री) मिशन - 16 मे 1946


• ऍटलीघोषणा - 20 फेब्रुवारी 1947


• माउंटबॅटन योजना 3 जून 1947


• भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 18 जुलै 1947