स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
26 January 2021
25 January 2021
Internet Speed मध्ये जगात अव्वल ठरला ‘हा’ मुस्लिम बहुल देश, तर भारताची रँकिंग मात्र घसरली
मोबाइल इंटरनेट स्पीड आणि फिक्स्ड ब्रॉडबँड स्पीडच्या बाबतीत भारताच्या रँकिंगमध्ये एका स्थानाची घसरण झालीये. मोबाइल इंटरनेट स्पीडमध्ये भारत 129 व्या स्थानावर आहे, तर फिक्स्ड ब्रॉडबँड स्पीडमध्ये भारताचा 65 क्रमांक आहे. तर, मुस्लिम बहुल देश कतारने मोबाइल इंटरनेट स्पीडमध्ये दोन स्थानांची झेप घेतलीये. त्यामुळे साउथ कोरिया आणि संयुक्त अरब अमिरातला मागे टाकून कतार जगातील सर्वात जास्त मोबाइल इंटरनेट स्पीड असलेला देश ठरलाय. तर, थायलंड फिक्स्ड ब्रॉडबँड स्पीडमध्ये जगात अव्वल ठरलाय.
▪️भारतातला सरासरी मोबाइल इंटरनेट स्पीड :-
स्पीड टेस्ड ग्लोबल इंडेक्स Ookla च्या रिपोर्टनुसार, भारताच्या मोबाइल इंटरनेट डाउनलोड स्पीडमध्ये गेल्या नोव्हेंबर महिन्याच्या 13.51Mbps स्पीडच्या तुलनेत डिसेंबर महिन्यात 4.4 टक्के घट झाली आणि 12.91Mbps इतका भारताचा स्पीड नोंदवण्यात आला. तर याच महिन्यात भारताच्या सरासरी अपलोड स्पीड मात्र 1.4 टक्क्यांनी वाढलाय. यामुळे अपलोड स्पीड 4.90Mbps वरुन वाढून 4.97Mbps झाला आहे.
177.52Mbps स्पीडसह कतार अव्वल :-
कतारमध्ये मोबाइल डाउनलोडिंग स्पीड सर्वाधिक 178.01Mbps नोंदवण्यात आला. कतारनंतर 177.52Mbps स्पीडसह UAE चा नंबर लागतो. या लिस्टमध्ये साउथ कोरिया तिसऱ्या, चीन चौथ्या आणि ऑस्ट्रेलिया पाचव्या क्रमांकावर आहे.
▪️फिक्स्ड ब्रॉडबँड स्पीडमध्ये भारताचा 65 वा क्रमांक :-
तर, फिक्स्ड ब्रॉडबँड स्पीडमध्ये भारताचा सरासरी डाउनलोडिंग स्पीड 53.90Mbps नोंदवण्यात आला. या क्रमवारीत भारताचा 65 वा नंबर लागतो. डिसेंबर महिन्यातील भारताचा फिक्स्ड ब्रॉडबँड अपलोड स्पीड 50.75Mbps होता, तर नोव्हेंबरमध्ये 52.02Mbps इतका होता. थायलंड फिक्स्ड ब्रॉडबँड स्पीडच्या बाबतीत अव्वल ठरला. थायलंडचा सरासरी डाउनलोडिंग स्पीड 308.35Mbps होता. थायलंडनंतर अनुक्रमे सिंगापूर आणि हाँगकाँगचा क्रमांक आहे. तर, रोमानिया चौथ्या आणि स्विझर्लंड पाचव्या स्थानी आहे. जगाचा विचार केल्यास जागतिक सरासरी फिक्स्ड ब्रॉडबँड स्पीड डिसेंबर महिन्यात 96.43Mbps होता, तर नोव्हेंबरमध्ये 91.96Mbps इतका होता. तर, अपलोडिंग ब्रॉडबँड स्पीड 49.44mbps वरुन 53.31Mbps झाला.
बायडेन यांचा ‘हा’ निर्णय लाखो भारतीयांचं स्वप्न करणार पूर्ण
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची धुरा संभाळल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये जो बायडेन यांनी भारतीयांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. बायडेन यांनी अमेरिकेच्या इमीग्रेशन पॉलिसीमध्ये (स्थलांतर धोरणांमध्ये) मोठे बदल करण्यास सुरुवात केलीय.
बायडेन यांनी अमेरिकन काँग्रेससमोर बोलताना एक नवीन कायदा तयार करण्यासंदर्भात भाष्य केलं आहे. या कायद्यामुळे एक कोटी १० लाख अप्रवासी नागरिकांना म्हणजेच कायमस्वरुपी अमेरिकेमध्ये स्थायिक होण्यासाठी गेलेल्या भारतीयांना स्थानिक म्हणून दर्जा मिळण्याबरोबरच अमेरिकेचे नागरिकत्व मिळण्याच्या मार्गातील अनेक अडथळे दूर होणार आहेत.
यात लाखो भारतीयांचाही समावेश आहे. माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे अमेरिकेतील कोट्यावधी अप्रवासी नागरिकांवर देश सोडून जाण्याची टांगती तलवार होती. मात्र अध्यक्ष पदी विराजमान झाल्यानंतर बायडेन यांनी ट्रम्प यांचे अनेक निर्णय रद्द केले असून त्यामध्ये या स्थलांतर धोरणांमधील बदलांचाही समावेश आहे. बायडेन प्रशासनाच्या या निर्णयामुळे अमेरिकेत स्थायिक होण्याचं अनेकांचं स्वप्न पूर्ण होणार आहे.
बायडेन यांनी जारी केलेल्या नवीन आदेशामुळे कायदेशीर कागदपत्र नसतानाही अमेरिकेत वास्तव्य करत असणाऱ्यांना फायदा होणार आहे. अमेरिकेमध्ये अशा लोकांची संख्या एक कोटी १० लाख इतकी आहे. त्यापैकी पाच लाख नागरिक हे मूळचे भारतीय आहेत. बायडेन यांनी पहिल्याच दिवशी घेतलेला हा निर्णय ट्रम्प यांच्या धोरणांच्या अगदी उलट आहे.
नवीन शैक्षणिक धोरण २०२०ला मंजूरी
NEW EDUCATION POLICY 2020
⭕️कद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचं
नामकरण आता
*"शिक्षण मंत्रालय"* असं होणार...
जाणून घेऊया :
*नवीन शिक्षण धोरण २०२०* यांना मंत्रिमंडळाने हिरवा झेंडा दाखवला आहे.
३४ वर्षांनंतर शिक्षण धोरण बदलले आहे. नवीन शिक्षण धोरणाची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत :
— तीन ते १४ वर्ष वयोगटाचे विद्यार्थी शिक्षण हक्क कायद्याच्या कक्षेत आले आहेत. यापूर्वी हा वयोगट ६ ते १४ वर्षे होता...
— *५ वर्षे मूलभूत Fundamental :*
१. नर्सरी @ ४ वर्षे
२. जूनियर केजी @ ५ वर्षे
३. एसआर केजी @ ६ वर्षे
४. इयत्ता पहिली @ ७ वर्षे
५. इयत्ता दुसरी @ ८ वर्षे
— *३ वर्षांची प्रारंभिक शाळा Preparatory :*
६. इयत्ता तिसरी @ ९ वर्षे
७. इयत्ता चौथी @ १० वर्ष
८. इयत्ता पाचवी @ ११ वर्षे
— *३ वर्षांची माध्यमिक शाळा Middle :*
९. इयत्ता सहावी @ १२ वर्षे
१०. इयत्ता सातवी @ १३ वर्ष
११. इयत्ता आठवी @ १४ वर्षे
*४ वर्ष माध्यमिक शाळा Secondary :*
१२. इयत्ता नववी @१५ वर्षे
१३. इयत्ता दहावीची @ १६ वर्षे
१४. एफ.वाय.जे.सी. @ 17 वर्षे
१५. एस.वाय.जे.सी. @ १८ वर्षे
*ठळक वैशिष्ट्ये :*
— बोर्ड फक्त १२ वीच्या वर्गाला असेल.
महाविद्यालयीन पदवी ४ वर्षांची.
*दहावी मंडळ रद्द. SSC*
*एमफिल MPhil देखील बंद असेल.*
— *आता पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना केवळ मातृभाषा, स्थानिक भाषा आणि राष्ट्रीय भाषा शिकविली जाईल. उर्वरित विषय जरी तो इंग्रजी असला तरी एक विषय म्हणून शिकविला जाईल...*
— *बोर्ड परीक्षांचे महत्त्व कमी...*
आता *बोर्ड परीक्षा फक्त १२वी मध्ये द्यावी लागेल.* तर यापूर्वी दहावीची बोर्ड परीक्षा देणे बंधनकारक होते, ते आता होणार नाही.
— ९वी ते १२वीच्या सत्र परीक्षा असतील Semester Exam.
*शालेय शिक्षण ५ + ३ + ३ + ४ सूत्रांच्या (वरील सारणी पहा) अंतर्गत शिकवले जाईल...*
— महाविद्यालयीन पदवी ३ व ४ वर्षांची असेल. म्हणजेच,
*पदवीच्या पहिल्या वर्षात तुम्हाला प्रमाणपत्र मिळेल,*
*दुसर्या वर्षी पदविका असेल*, तर
*तृतीय वर्षात डिग्री मिळेल.*
— जे संशोधनासाठी उच्च शिक्षण घेऊ इच्छितात त्या विद्यार्थ्यांसाठी चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम तर जे विद्यार्थी पदवीनंतर नोकरी करू इच्छितात त्यांच्यासाठी तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम असेल...
— विद्यार्थ्यांना यापुढे एमफिल MPhil करावे लागणार नाही. म्हणजेच, *रिसर्च करणाऱ्यांसाठी पदवी अधिक एक वर्षांचा मास्टर्स अभ्यासक्रम अशी चार वर्षांची पदवी* असेल. यानंतर ते थेट *पीएचडी PHD* करू शकतील.
— दरम्यान विद्यार्थी इतर कोर्स करू शकतील. *उच्च शिक्षणामध्ये Higher Education* २०३५ पर्यंत एकूण सकल पट नोंदणी Gross Enrolment Ratio २०३५ पर्यंत ५०% पोहोचवण्याचं उद्दिष्ट...
दुसरीकडे नवीन शिक्षण धोरणांतर्गत जर एखाद्या विद्यार्थ्याला कोर्सच्या मध्यभागी दुसरा कोर्स करायचा असेल तर तो मर्यादित काळासाठी पहिल्या कोर्समधून ब्रेक घेऊन दुसरा कोर्स करू शकतो...
— उच्च शिक्षणातही Higher Education अनेक सुधारणा केल्या आहेत. सुधारणांमध्ये
*श्रेणीबद्ध शैक्षणिक Graded Academic,* *प्रशासकीय Administrative* आणि
*आर्थिक स्वायत्तता Financial Autonomy*
समाविष्ट आहे...
त्याशिवाय ई-कोर्सेस प्रादेशिक भाषांमध्येही सुरू केले जातील.
आभासी Vertual लॅब विकसित केल्या जातील.
राष्ट्रीय शैक्षणिक वैज्ञानिक मंच (NETF) सुरू होईल. देशात ४५ हजार महाविद्यालये असल्याचे स्पष्ट आहे...
*सर्व सरकारी Government,*
*खासगी Private* आणि
*मान्यताप्राप्त संस्थांसाठी*
*Deemed University*
समान नियम असतील...
— मल्टीडिसिप्लिनरी अभ्यासक्रम: एकाच वेळी वेगवेगळे विषय एकत्रितपणे शिकता येणार आहेत. यात मेजर आणि मायनर असे विषयांचे विभाजन असेल. आर्थिक किंवा अन्य कारणांमुळे होणारे ड्रॉपआऊट यामुळे कमी होतील. शिवाय ज्यांना एखादा विषय आवडीचा असेल तो विषय त्यांना शिकता येईल...
— बहुभाषिक शिक्षण - मुलांना शिकवताना एकाच भाषेच्या माध्यमातून अध्यापन न करता विविध प्रादेशिक भाषांचा वापर करता येणार...
— लॉ आणि मेडिकल शिक्षण वगळता उच्च शिक्षण एका छताखाली येणार...
— शिक्षणातील गुंतवणूक जीडीपीच्या ६% करणार, सध्या हे प्रमाण ४.४३% आहे...
— विद्यार्थ्यांचे प्रगती पुस्तक बदलणार. शिक्षकांसोबतच विद्यार्थीदेखील स्वत:चे मूल्यांकन करणार...
— सर्व महाविद्यालयांसाठी एकच सामायिक प्रवेश परीक्षा. एनटीए ही परीक्षा घेणार. मात्र ही परीक्षा ऐच्छिक असेल...
अंतनिर्मित (intrusive/plutonic) अग्निजन्य खडकांचे प्रकार
१) डाईक (dyke)
-भूगर्भातील तप्त लाव्हारस भूकवचामध्ये असलेल्या उभ्या भेगांमध्ये साचतो व तो थंड होऊन लांबवत खडकांची निर्मिती होते त्यास डाईक असे म्हणतात
-उदाहरणार्थ इंग्लंडच्या उत्तर भागात क्लिवलँड डाईक ज्याची उंची सुमारे दीडशे मीटर आहे
२) सिल (sill )व शीट
-जलजन्य किंवा रूपांतरित खडकांच्या आडव्या भेगेत लावारस येऊन साचतो व कालांतराने थंड होऊन खडकाची निर्मिती होते ते त्यास सील असे म्हणतात
-याच पातळ किंवा कमी जाडीच्या खडकास शीट असे म्हणतात
३) लॅकोलिथ(lacolith)
-भूगर्भातील तप्त लावारस भूपृष्ठाकडे येण्याचा प्रयत्न करतो तेव्हा काही ठिकाणी खडक घुमटासारखे वर उचलले जातात आणि निर्माण होणाऱ्या पोकळीमध्ये हे लाव्हारसाचे निक्षेपण होते हे आणि त्यापासून घुमटाकार खडक तयार होतात त्यास लकोलिथ असे म्हणतात
-याची निर्मिती ती जलजन्य खडकांमध्ये होते
-संयुक्त संस्थानातील उटाह राज्यातील लासाल पर्वत आणि हेनरी पर्वत ही प्रमुख उदाहरणे आहेत
४) लोपोलीथ
-जेव्हा लाव्हारस खोलगट किंवा उथळ भागात साचतो आणि कालांतराने थंड होऊन बशीच्या(saucer shaped) आकारासारखा आकार निर्माण होतो त्यास लोपोलिथ असे म्हणतात
५) फेकोलिथ(phacolith)
-भूगर्भातील खडकांना जेव्हा घडीचा आकार प्राप्त होतो तेव्हा अशा खडकांमध्ये अपनती आणि अभिनती असतात . तेथे लाव्हारसाचे निक्षेपण होऊन वलयाकार भूआकार निर्माण होतो त्यास फेकोलीथ असे म्हणतात
६) बेथोलिथ (batholith)
-पृथ्वीच्या भूगर्भामध्ये तप्त लावारस वर येण्याचा प्रयत्न करतो , तेव्हा भूकवचामधील विस्तीर्ण व खोलगट पोकळीमध्ये लाव्हारसाचे निक्षेपण होते, येथे तयार होणाऱ्या विस्तीर्ण खडकाला batholith असे म्हणतात
खासगी कंपन्यांमार्फत सरकारची नोकरभरती
🌀राज्य सरकारमधील विविध विभागांच्या नवीन नोकरभरतीसाठी 'महापोर्टल'मध्ये अनेक त्रुटी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर राज्य सरकार चार नव्या कंपन्यांच्या माध्यमातून नोकरभरतीची प्रक्रिया सुरू करणार आहे,
🌀राज्य सरकारमधील विविध विभागांच्या नवीन नोकरभरतीसाठी 'महापोर्टल'मध्ये अनेक त्रुटी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर राज्य सरकार चार नव्या कंपन्यांच्या माध्यमातून नोकरभरतीची प्रक्रिया सुरू करणार आहे, असे संकेत गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी दिले आहेत.
🌀राज्यातील रखडलेल्या नोकरभरतीला अखेर सुरुवात करण्याचा महाविकास आघाडीचा मानस असून पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील साडेआठ हजार आणि पोलिस दलातील पाच हजार २९७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.
🌀तथापि राज्य सरकार 'महापोर्टल'ऐवजी चार नव्या कंपन्यांच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया करणार आहे. महापोर्टलअंतर्गत येणाऱ्या परीक्षा पद्धतीत बदल करून सुधारित परीक्षा पद्धतीनुसार सर्व्हिस प्रोव्हायडरची निवड करण्याची प्रक्रिया आणि जबाबदारी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ, मुंबई महाआयटीकडे देण्यात आली होती. या कामासाठी मे. अॅपटेक लिमिटेड, मे. जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रा. लिमिटेड, मे. जिंजर वेब्ज प्रा. लि., मे. मेटा-आय टेक्नॉलॉजी प्रा. लिमिटेड या चार कंपन्यांना राज्यातील आगामी मंत्रालयीन प्रशासकीय विभाग, त्याच्या अधिपत्याखालील सरकारी विभाग, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेबाहेरील गट ब आणि गट कच्या परीक्षा पद्धती राबवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.याबाबतची पुढील कार्यवाही लवकरच सुरू होणार आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी, अशी माहिती राज्यमंत्री सतेज पाटील यांनी ट्वीट करून दिली आहे.
'महापोर्टल'च्या माध्यमातून होणाऱ्या नोकरभरतीला अनेकांनी विरोध केला होता.
🌀तयामुळे राज्य सरकारने महापोर्टल रद्द करून राज्य सरकारने चार कंपन्यांची निवड केली आहे. या कंपन्या आता नवीन नोकरभरती प्रक्रिया करणार आहेत. निवडण्यात आलेल्या चार कंपन्यांद्वारे येथून पुढे पदभरती प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने घेतील.
🌀राज्यातील या भरतीप्रक्रियेअंतर्गत पहिल्या टप्प्यात पोलिस दलात ५२९७ पदे आणि आरोग्य विभागात ८५०० अशी एकूण १३ हजार ८०० पदांची भरती अपेक्षित आहे. राज्यातील मराठा समाजाला शैक्षणिक प्रवेश आणि नोकरभरती यातील आरक्षणाचा प्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. यामुळे नवीन नोकरभरतीची प्रक्रिया काही काळ पुढे ढकलावी, अशी मागणी काही मराठा संघटनांकडून होत आहे.
मोठी बातमी! पंतप्रधान मोदी, सर्व मुख्यमंत्री, MP, MLA सर्वांनाच दिली जाणार करोना लस; अशी आहे योजना
🌈दशामध्ये करोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. सरकारने पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबरच पहिल्या फळीतील करोना योद्ध्यांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला असून त्याच्या अंमलबजावणीला १६ जानेवारीपासून सुरुवात करण्यात आलीय. मात्र आता दुसऱ्या टप्प्यामध्ये राजकीय नेत्यांना करोनाची लस देण्यात येणार आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, सर्व खासदार, आमदार यांच्याबरोबरच इतर आजार असणाऱ्या राजकीय नेत्यांचे लसीकरण केलं जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
🌈विशेष म्हणजे अनेक दिग्गज नेते हे ८० वर्षांहून अधिक वयाचे आहेत. ८० हून अधिक वय असणाऱ्या नेत्यांमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, एचडी देवगौडा यांच्याबरोबरच भाजपाचे नेते लालकृष्ण अडवाणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाही समावेश आहे.
🌈सरकारने करोना लसीकरणाची मोहीम टप्प्याटप्प्यांमध्ये राबवली जाणार असल्याचं आधीच स्पष्ट केलं आहे. करोना लसीकरणाचा दुसरा टप्पा एप्रिल महिन्यामध्ये सुरु होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये ५० वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या मंत्र्यांबरोबर नेत्यांना करोनाची लस देण्यात येणार आहे. यात अगदी पंतप्रधानांपासून सर्व मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे.
🌈सध्याची आकडेवारी पाहिली तर लोकसभेमधील तीनशेहून अधिक नेते ५० पेक्षा जास्त वर्षांचे आहेत. तर राज्यसभेमधील २०० हून अधिक खासदार हे वयाची पन्नाशी ओलांडलेले आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये भारत सरकार तीन कोटी वैद्यकीय कर्मचारी आणि पहिल्या फळीतील करोना योद्ध्यांना करोनाची लस देणार असून दुसरा टप्पा मार्चच्या शेवटी किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरु होईल, असं हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
अग्निदुर्घटनेनंतर सीरमने आज तीन देशांना पाठवला ‘कोव्हिशिल्ड’ लसीचा साठा
🌸पण्यातील सीरम इन्स्टिट्यूटची एक इमारत गुरुवारी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. इमारतीचे बांधकाम सुरु होते. या आगीमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. सुदैवाने या आगीमुळे ‘कोव्हिशिल्ड’ लस निर्मितीच्या उत्पादनावर कुठलाही परिणाम झालेला नाही. सध्या सर्वांचेच लक्ष या जीवरक्षक लसीकडे लागले आहे.
🌸दशात शनिवारपासूनच लसीकरणाला सुरुवात झालीय. आतापर्यंत लाखो लोकांना या लसीचे डोस देण्यात आले आहेत. पुण्यातील या अग्नि दुर्घटनेनंतर आज सीरम इन्स्टिट्यूटने म्यानमार, सेशेल्स आणि मॉरिशेस या देशांना ‘कोव्हिशिल्ड’ लसीचा साठा पाठवून दिला.
🌸अदर पूनावाला काय म्हणाले - सर्व सरकारी संस्था आणि लोकांना मी हे निश्चितपणे सांगू शकतो की कोव्हिशिल्डच्या निर्मितीला कोणताही फटका बसलेला नाही. कोव्हिशिल्डची निर्मिती अनेक इमारतींमध्ये केली जाते. सीरम इन्स्टिट्यूटमध्ये अशी एखादी घटना घडलीच तर लस सुरक्षित रहावी म्हणून मी मुद्दाम अशाप्रकारची रचना करुन ठेवली आहे, अशी माहिती अदर पूनावाला यांनी ट्विटरवरुन दिली आहे. याच ट्विटमध्ये त्यांनी पुणे पोलीस आणि अग्निशमन दलाचे आभार मानले आहेत.
🌸मतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाखांची मदत - पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांच्या कुटुंबीयांना सीरम इन्स्टिट्यूटकडून आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे. मृतांपैकी दोन जण पुण्यातील असून अन्य दोन जण उत्तर प्रदेश व एकजण बिहारमधील आहे. हे सर्वजण कंत्राटी मजूर असल्याची माहिती समोर आली आहे.
नीति आयोगाने दुसरा इंडिया इनोव्हेशन अहवाल २०२० प्रसिद्ध केला
🔝 २०२० इंडिया इनोव्हेशन अहवालात मोठ्या राज्यात कर्नाटकने सलग दुसऱ्या वर्षी अव्वल क्रमांक पटकावला
🔰 ०१) कर्नाटक : ४२.५० गुण
🔰 ०२) महाराष्ट्र : ३८.०३ गुण
🔰 ०३) तमिळनाडू : ३७.९१ गुण
🔰 ०४) तेलंगणा : ३३.२३ गुण
🔰 ०५) केरळ : ३०.५८ गुण
🔰 ०६) हरयाणा : २५.८१ गुण
🔰 ०७) आंध्रप्रदेश : २४.९१ गुण
🔰 ०८) गुजरात : २३.६३ गुण
🔰 ०९) उत्तर प्रदेश : २२.८५ गुण
🔰 १०) पंजाब : २२.५४ गुण
🔰 ११) पश्चिम बंगाल : २१.६९ गुण
🔰 १२) राजस्थान : २०.८३ गुण
🔰 १३) मध्य प्रदेश : २०.८३ गुण
🔰 १४) ओडिशा : १८.९४ गुण
🔰 १५) झारखंड : १७.१२ गुण
🔰 १६) छत्तीसगड : १५.७७ गुण
🔰 १७) बिहार : १४.४८ गुण .
👎 २०२० इंडिया इनोव्हेशन अहवालात मोठ्या राज्यात बिहार १४.४८ गुणासह शेवटच्या क्रमांकावर आहे .
भारताचा शेजारील देशांना मदतीचा हात; भूटान, मालदिवला पाठवली करोनाची लस
उत्कृष्ट नियोजनाद्वारे करोनाच्या संकटावर जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारतानं नियंत्रण मिळवलं आहे. या आजारावरील लस निर्मिती प्रक्रियेतही भारत आघाडीवर राहिला आहे. त्यामुळे अवघं जग भारताकडं आशेने पाहत आहे. जागतिक स्तरावरील आपली जबाबदारी ओळखून भारतही कौतुकास्पद पावलं टाकत आहे. नुकताचं भारतानं भूटान आणि मालदीव या आपल्या सख्या शेजारी देशांना भेट स्वरुपात करोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा केला आहे.
एएनआयच्या माहितीनुसार, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन भूटानची राजधानी थिंफूकडे सीरम इन्स्टिट्यूटने बनवलेल्या कोविशिल्ड लसीचे १.५ लाख डोस पाठवण्यात आले आहेत. तसेच मालदीवची राजधानी माले येथे मुंबईतून कोविशिल्डचे १ लाख डोस पाठवण्यात येणार आहेत.
भारत हा जगातील लस निर्मिती उद्योगातील एक प्रमुख देश म्हणून ओळखला जातो. आजवर भारतानं जगातील अनेक देशांना विविध आजारांवरील औषधे तसेच लसींचा पुरवठा केला आहे. करोनाच्या या संकट काळात सध्या भारतात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहिम सुरु आहे.
दरम्यान, भारतातील कंपन्यांना जगातील
अनेक देशांनी लस पुरवठ्यासाठी आगाऊ नोंदणी केली आहे. दरम्यान, भूटान आणि मालदीव या शेजारील देशांना भारतानं भेट स्वरुपात लस पाठवली आहे.
भारत सरकारकडून सीरमच्या 'कोविशिल्ड' आणि भारत बायोटेकच्या 'कोव्हॅक्सिन' या दोन लसींना आपत्ककालिन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे
दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; ठाकरे सरकारची मोठी घोषणा
🌷राज्य शिक्षण मंडळाच्या बारावी आणि दहावीच्या परीक्षांची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी केली आहे. १२ वीची परीक्षा २३ एप्रिल ते २९ मे २०२१ दरम्यान घेण्यात येणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे दहावीची परीक्षा ही २९ एप्रिल ते ३१ मे दरम्यान घेण्यात येणार असल्याचेही गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.
🌷राज्य शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा १५ एप्रिलनंतर तर दहावीची परीक्षा ३ मेनंतर घेण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याचे संकेत गायकवाड यांनी यापूर्वीच दिले होते. बारावीच्या परीक्षांचा निकाल हा जुलै महिना संपण्याआधी लावण्याचा मंडळाचा प्रयत्न असून दहावीचे निकाल ऑगस्ट महिना संपण्याआधी लावले जातील असंही वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.
🌷दरवर्षी साधारण फेब्रुवारी, मार्चमध्ये दहावी आणि बारावीची परीक्षा सुरू होते. मात्र यंदा करोनामुळे कोलमडलेले शैक्षणिक वर्ष सुरळीत करण्याचे प्रयत्न शिक्षण विभागातर्फे सुरू आहेत. ऑनलाइन वर्गावर भिस्त ठेवून आता परीक्षांची तयारी विभागाने सुरू केली आहे.
🌷कद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षांच्या तारखा नुकत्याच जाहीर केल्या. त्यानंतर आता राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या परीक्षा कधी होणार याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता होती. गायकवाड यांनी परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २९ मे २०२१ दरम्यान तर दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते ३१ मे दरम्यान घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२१ विजेते
👤 अमेय एल : आंध्रप्रदेश : कला
👤 वयोम आहुजा : उत्तरप्रदेश : कला
👤 हरुदय आर के : केरळ : कला
👤 अनुराग रामोला : उत्तराखंड : कला
👤 तनुज समादार : आसाम : कला
👤 वनिश केईशम : मणिपूर : कला
👤 सौहारद्य डे : पश्चिम बंगाल : कला
👤 जयोती कुमारी : बिहार : साहस
👤 कवर दिव्यांश : उत्तरप्रदेश : साहस
👤 कामेश्वर वाघमारे : महाराष्ट्र : साहस
👤 राकेश के : कर्नाटक : इनोव्हेशन
👤 शरीनभ अग्रवाल : महाराष्ट्र : इनोव्हेशन
👤 वीर कश्यप : कर्नाटक : इनोव्हेशन
👤 नम्या जोशी : पंजाब : इनोव्हेशन
👤 अर्चित पाटील : महाराष्ट्र : इनोव्हेशन
👤 आयुष रंजन : सिक्कीम : इनोव्हेशन
👤 सी हेमेश : तेलंगणा : इनोव्हेशन
👤 चिराग भंसाली : उत्तरप्रदेश : इनोव्हेशन
👤 हरमनज्योत सिंह : जम्मु व कश्मीर : इनोव्हेशन
👤 मो. शादाब : उत्तरप्रदेश : विद्वान
👤 आनंद : राजस्थान : विद्वान
👤 ए एस प्रधान : ओडिशा : विद्वान
👤 अनुज जैन : मध्यप्रदेश : विद्वान
👤 सोनित सिसोलेकर : महाराष्ट्र : विद्वान
👤 परसिद्धी सिंह : तमिळनाडू : सामाजिक काम
👤 सविता कुमारी : झारखंड : खेळ
👤 अर्शिया दास : त्रिपुरा : खेळ
👤 पलक शर्मा : मध्यप्रदेश : खेळ
👤 मो. रफी : उत्तरप्रदेश : खेळ
👤 काम्या कार्तिकेयन : महाराष्ट्र : खेळ
👤 खशी पटेल : गुजरात : खेळ
👤 मत्र हरखानी : गुजरात : खेळ .
पून्हा एकदा नोटबंदी? आरबीआयकडून ‘या’ नोटा चलनातून बाद करण्याच्या हालचाली सुरु.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) १००, १० आणि ५ रुपयांच्या जुन्या सीरिजच्या नोटा चलनातून बाद होण्याची शक्यता आहे. आरबीआयचे सहाय्यक महाव्यवस्थापक बी महेश यांनी ही माहिती दिली आहे. मार्च किंवा एप्रिलपर्यंत आरबीआय १००, १० आणि ५ रुपयांच्या जुन्या सीरिजच्या नोटा चलनातून बाद करण्याचा विचार करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. फ्री प्रेस जर्नलने यासंबंधी वृत्त दिलं आहे.
जिल्हास्तरीय सुरक्षा समिती आणि जिल्हास्तरीय चलन व्यवस्थापन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. आरबीआयकडून बँकांना नोटा परत घेण्याची मोहीम आखण्यास सांगण्यात आलं आहे. यामुळे बँकेत जमा झालेल्या १००, १० आणि ५ रुपयांच्या जुन्या सीरिजच्या नोटा पुन्हा चलनात येणार नाही यासाठी बँकांनी तयारी केली आहे.
यावेळी बी महेश यांनी १० रुपयांच्या नाण्याला अद्यापही व्यापारी तसंच उद्योजकांकडून स्वीकारलं गेलं नसल्यावरुन नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, "१० रुपयांचं नाणं आणून १५ वर्ष झाल्यानंतरही व्यापारी आणि उद्योजकांनी त्याचा स्वीकार न करणं बँका आणि आरबीआयसाठी मोठी समस्या झाली आहे. १० रुपयांची नाणी बँकांसाठी मोठं ओझं झालं आहे".
यावेळी त्यांनी नाण्याच्या वैधतेसंबंधी अफवा पसरत असून लोकांना याबद्दल जागरुक करण्याची गरज बोलून दाखवली. लोकांनी १० रुपयांचं नाणं जास्तीत जास्त वापरावं यासाठी बँकांनी मार्ग शोधण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. २०१९ मध्ये आरबीआयने १०० रुपयांची नवी जांभळ्या रंगातील नोट आणली होती. बी महेश यांनी १०० च्या नव्या नोटा चलनातून बाद होणार नाहीत असं स्पष्ट केलं आहे
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर यांची निवड
🔸यदा नाशिकला होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान कथालेखक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड करण्यात आली आहे.
🔸दीड दशकांनंतर यंदा नाशिकला होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान कथालेखक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड करण्यात आली आहे. साहित्य संमेलनाच्या आतापर्यंतच्या ९३ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका विज्ञान कथा लेखक आणि संशोधकाची संमेलनाध्यक्ष पदी निवड झाल्याने नाशिकचे संमेलन सर्वार्थाने वेगळे ठरणार आहे.
विज्ञानकथा पुस्तके
वामन परत न आला
अंतराळातील भस्मासुर
कृष्णमेघ (अनुवाद, मूळ लेखक:फ्रेड हॉयल Fred Hoyle)
प्रेषित
व्हायरस
अभयारण्य
यक्षांची देणगी
टाइम मशीनची किमया
याला जीवन ऐसे नाव
इतर पुस्तके
आकाशाशी जडले नाते
विज्ञानाची गरुडझेप
गणितातील गमतीजमती
विश्वाची रचना
विज्ञानाचे रचयिते
नभात हसरे तारे
आदिवासी कल्याण मंत्रालयाचे ‘श्रमशक्ती’ व्यासपीठ
▪️कद्रीय आदिवासी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा यांच्या हस्ते गोव्याच्या पणजी येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात "श्रमशक्ती" नामक एका राष्ट्रीय स्थलांतरण समर्थन व्यासपीठाचे उद्घाटन करण्यात आले.
🛑ठळक बाबी...
▪️सकेतस्थळ आधारित या व्यासपीठावर स्थलांतर करणाऱ्या कामगारांच्या विषयीची राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील माहिती उपलब्ध असणार.
▪️आकडेवारीतले अंतर दूर करण्यासाठी तसेच रोजगार आणि उत्पन्न निर्मितीच्या शोधात असलेल्या स्थलांतरित कामगारांना सक्षम बनविण्यात व्यासपीठाची मदत होणार आहे.
▪️रोजगाराच्या स्थलांतरणाची प्रक्रिया सुरक्षित आणि उत्पादनक्षम असावी याची खात्री करण्यासाठी केंद्रीय सरकारने स्थलांतरित कामगारांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाची "श्रमसाथी" नामक एक मार्गदर्शन पुस्तिका देखील तयार केली आहे.
▪️गोव्यामध्ये विविध राज्यांतून गोव्यात येणाऱ्या स्थलांतरितांच्या मदतीसाठी गोव्यात एक समर्पित ‘स्थलांतर कक्ष’ देखील उघडण्यात आले आहे. परप्रांतीय कामगारांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी असे केंद्र उघडणारे गोवा हे भारतातले पहिले गंतव्यस्थान बनले आहे.
सवादुपिंड आणि त्याची कार्ये
👉सवादुपिंड ओटीपोटावर स्थित एक अवयव आहे.
👉आपण खात असलेल्या अन्नाचे शरीरातील पेशींच्या इंधनात रुपांतर करण्यात ही महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
👉 सवादुपिंडात दोन मुख्य कार्ये असतात: एक एक्सोक्राइन फंक्शन जे पचन करण्यास मदत करते आणि रक्तातील साखर नियंत्रित करते अंतःस्रावी कार्य.
👉👉सवादुपिंडाचे स्थान👉👉
👉सवादुपिंड पोटच्या मागे डाव्या ओटीपोटात स्थित आहे.
👉 ह लहान आतडे, यकृत आणि प्लीहासह इतर अवयवांनी वेढलेले आहे
👉. हे स्पंजदार आहे, सुमारे सहा ते दहा इंच लांबीचे आणि उदर ओलांडून आडवे वाढलेले सपाट नाशपाती किंवा माशासारखे आकार आहे.
👉सवादुपिंडाचा प्रमुख म्हटलेला रुंद भाग ओटीपोटाच्या मध्यभागी स्थित असतो.
👉सवादुपिंडाचा मुख्य भाग अशा जंक्शनवर स्थित असतो जेथे पोट लहान आतड्याच्या पहिल्या भागाला मिळते.
👉 यथूनच पोट आतड्यांमधील अंशतः पचलेले अन्न रिक्त करते आणि स्वादुपिंड पाचन एंझाइम्स या सामग्रीमध्ये सोडतात.
👉सवादुपिंडाच्या मध्यवर्ती भागास मान किंवा शरीर म्हणतात.
👉पातळ शेवटला शेपटी म्हणतात आणि डाव्या बाजूला वाढवते.
👉सवादुपिंडाभोवतालच्या अनेक मोठ्या रक्तवाहिन्या, उच्च मेन्स्टेरिक धमनी, उच्च मेन्स्ट्रिक व्हेन, पोर्टल व्हेन आणि सेलिआक अक्सिस, स्वादुपिंड आणि इतर उदर अवयवांना रक्तपुरवठा करतात.
👉सभोवतालच्या जहाज आणि अवयवांसह स्वादुपिंड
👉बहुतेक सर्व स्वादुपिंडात (95%) एक्सोक्राइन टिशू असते जे पचन करण्यासाठी स्वादुपिंड एंझाइम तयार करते.
👉 उर्वरित ऊतकांमध्ये अंतःस्रावी पेशी असतात ज्याला लॅंगेरहॅन्सचे आयलेट्स म्हणतात. पेशींचे हे समूह द्राक्षेसारखे दिसतात आणि रक्तातील साखर नियंत्रित करणारे आणि स्वादुपिंडाच्या स्रावांचे नियमन करणारे हार्मोन्स तयार करतात.
22 January 2021
पाबना शेतकरी विद्रोह 1873-76
★ 1850/1859 च्या कायद्याने शेतकर्यांंना संरक्षण दिले मात्र कंपनी सरकारने अन्याय करण्यास सुरुवात केली
★ 1873 च्या दरम्यान या अन्यायाविरुद्ध "युसूफ सराय" च्या शेतकर्यांनी "क्रुषक संघ" स्थापन केला
🔸परमुख नेता:- ईशान चन्द्र राय, शंभुपाल
★ कालांतराने हा विद्रोह ढाका, त्रिपूरा, बेकरगंज, फरिदपूर, बोगरा, मेमनसिंह येथे झाले
★ दरम्यान पबनाच्या नागरिकांनी घोषणा केली, " आम्ही फक्त महाराणीची जनता होऊ इच्छितो"
★ समर्थन:- बंकिमचन्द्र चट्टोपाध्याय, आर.सी. दत्त, सुरेन्द्रनाथ बनर्जी, आनंद मोहन बोस, द्वारका नाथ गांगुली यांनी पुढील काळात समर्थन केले
महाराष्ट्रातील विद्युत प्रकल्प आणि जिल्हे
महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्प
▪️ तर्भ-मुंबई, खापरखेडा : नागपूर.
▪️बल्लारपूर : चंद्रपूर.
▪️ चोला : ठाणे.
▪️ परळी बैजनाथ : बीड.
▪️ पारस : अकोला.
▪️ एकलहरे : नाशिक.
▪️ फकरी : जळगाव.
महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प
▪️ खोपोली : रायगड.
▪️ भिरा अवजल प्रवाह : रायगड.
▪️ कोयना : सातारा.
▪️ तिल्लारी : कोल्हापूर.
▪️ पच : नागपूर.
▪️ जायकवाडी . औरंगाबाद.
महाराष्ट्रातील अणुविद्युत प्रकल्प
▪️ तारापुर : ठाणे.
▪️ जतापुर : रत्नागिरी.
▪️ उमरेड : नागपूर.
महाराष्ट्रातील पवनविद्युत प्रकल्प
▪️ जमसांडे : सिंधुदुर्ग.
▪️ चाळकेवाडी : सातारा.
▪️ ठोसेघर : सातारा.
▪️ वनकुसवडे : सातारा.
▪️ बरह्मनवेल : धुळे.
▪️ शाहजापूर : अहमदनगर.
Current affairs 2020
वन संशोधन संस्था कोठे आहे?
(अ) लखनऊ
(ब) नवी दिल्ली
(क) देहरादून ✔️✔️
(ड) भोपाळ
:केंद्रीय भूकंपीय वेधशाळा कोठे आहे?
(अ) पुणे
(ब) सिलीगुडी
(क) कोडाईकनाल ✔️✔️
(ड) शिलाँग
शुष्क प्रादेशिक वनीकरण संशोधन संस्था आहे?
(अ) आसाम
(ब) महाराष्ट्र
(क) जोधपूर ✔️✔️
(ड) जैसलमेर
राष्ट्रीय संग्रहालय कोठे आहे?
(अ) नवी दिल्ली
(ब) मदुरै
(क) मुंबई
(ड) कोलकाता✔️✔️
कमी तापमानात औष्णिक पृथक्करण करण्याच्या तत्त्वावर आधारित, दररोज एक लाख लिटर गोड्या पाण्याचे उत्पादन करणार्या प्रथम डिझलिनेशन प्लांटची सुरूवात कोठे झाली?
(अ) कवारत्ती✔️✔️
(ब) पोर्ट ब्लेअर
(क) मंगलोर
(ड) वलसाड
वाणिज्य विभागांतर्गत खालीलपैकी कोणते सर्वात जुने बोर्ड आहे?
(अ) रबर बोर्ड
(ब) चहा बोर्ड
(क) कॉफी बोर्ड ✔️✔️
(ड) तंबाखू बोर्ड
भारतातील उच्च शिक्षणाच्या प्रगतीसाठी 'UGC' ची स्थापना कधी करण्यात आली?
(अ) 1953 ✔️✔️
(ब) 1954
(क) 1951
(ड) 1967
● कोणती लेणी महाराष्ट्र राज्यातल्या उस्मानाबाद शहरापासून 7 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या 7 लेण्यांचा समूह आहे.
: धाराशिव लेणी
● तमिळनाडूमध्ये साजरा होणार्या कोणत्या सणाच्या कालावधीत जल्लीकट्टू हा पारंपरिक खेळ खेळण्याची प्रथा सहस्रो वर्षांपासून चालू आहे.
: पोंगल
● विजेरी मोटार वाहन निर्मिती करणाऱ्या ‘टेस्ला’ कंपनीचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे?
: कॅलिफोर्निया
● ‘सेमेरू ज्वालामुखी’ कोणत्या देशात आहे?
*उत्तर* : इंडोनेशिया
● बसवाकल्याण येथे ‘न्यू अनुभवा मंतपा’ कोणत्या कवीच्या स्मृतीत उभारले जात आहे?
: बसवेश्वरा उर्फ बसवा
● ‘नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन’ नामक संकेतस्थळ-आधारित व्यासपीठ कोणत्या संस्थेने तयार केले?
: नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन-इंडिया
● ‘हरिके आर्द्रभूमी’ हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
: पंजाब
● ‘फुरफुरा’ तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात आहे?
: पश्चिम बंगाल
राष्ट्र आणि राज्य या भिन्न संकल्पना :-
🏅राज्यराष्ट्र आणि सांस्कृतिक राष्ट्र या संकल्पनांच्या दृष्टीने या पुस्तकात भारताच्या स्वातंत्र्योत्तर पन्नास वर्षांचा आढावा घेतला आहे.
🏅 तयामुळे राज्य, राष्ट्र, राज्यराष्ट्र व सांस्कृतिक राष्ट्र या संकल्पनांचा नेमका अर्थ काय आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. राज्य आणि राष्ट्र या दोन शब्दांच्या अर्थांमध्ये अनेकवेळा गल्लत होते.
🏅 पाश्चिमात्य विचारवंतांनी या विषयावर बरीच चर्चा करूनही बहुतांश वेळा या शब्दांना समान अर्थाने मानले गेले.
🏅राज्य म्हणजे असे प्रदेश किंवा देश ज्यांच्यावर एक शासनव्यवस्था आहे. वेगवेगळे देश, वसाहती किंवा प्रदेशांमध्ये एक समान शासनव्यवस्था असेल तर ते सर्व मिळून एक राज्य बनेल.
🏅जथील लोक काही समान ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक वैशिष्ट्यांनी एकत्र आलेले असतात व त्यांच्यामध्ये एक बांधिलकीची भावना असते. त्यास राष्ट्र म्हणतात.
🏅जव्हा आपण पाश्चिमात्य राष्ट्रे (Western Nations), किंवा आफ्रिकन राष्ट्रे (African Nations) म्हणतो, तेव्हा ते राष्ट्र नसून राज्य असते.
🏅सयुक्त राष्ट्रे (United Nations) ही संघटना राष्ट्रांची नाही तर ‘राष्ट्रराज्यांची' (Nation States) संघटना आहे.
इराण सहीत इतर सहा राष्ट्रांनी UNGA मधला मतदानाचा हक्क गमावला.
☑️इराण सहीत इतर सहा राष्ट्रांनी त्यांच्या जबाबदाऱ्यांची काळजी न घेतल्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघ महासभेतला (UNGA) त्यांचा मतदानाचा हक्क गमावला आहे.
☑️इतर सह देशांमध्ये नायजर, दक्षिण सुदान, झिम्बाब्वे, कांगो ब्राझाव्हिल, मध्य आफ्रिला प्रजासत्ताक आणि लिबिया यांचा समावेश आहे. या देशांना दोन वर्षाची अतिरिक्त मुदत दिली गेली आहे.
☑️सयुक्त राष्ट्रसंघ (UN) संहिता यामधील ‘कलम 19’ अन्वये सदस्याला मतदानाचा हक्क असू शकत नाही जर त्याने संयुक्त राष्ट्रसंघाला करावयाच्या त्याच्या आर्थिक वचनबद्धतेची पूर्तता केली नसणार.
🔳सयुक्त राष्ट्रसंघ (UN) विषयी....
☑️आतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ (UN) या आंतरसरकारी संघटनेची स्थापना दुसर्या महायुद्धानंतर 24 ऑक्टोबर 1945 रोजी करण्यात आली. त्याचे मुख्यालय मॅनहॅटन (न्यूयॉर्क शहर, अमेरिका) येथे आहे.
☑️1945 साली UN सनद (UNO च्या स्थापनेचे दस्तऐवज) प्रभावी येऊन दिनांक 24 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्रसंघ (UN) अस्तित्वात आले. त्याला संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेचे (UNSC) पाच कायमस्वरूपी सदस्य - चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिका - आणि इतर सदस्यांनी मान्यता दिली. आज संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदस्य राष्ट्रांची संख्या 193 एवढी आहे.
☑️सघटनेच्या उद्दिष्टांमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखणे, मानवी हक्कांना प्रोत्साहन देणे, सामाजिक आणि आर्थिक विकासाचे वृद्धीकरण, पर्यावरणाचे संरक्षण आणि दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, आणि सशस्त्र संघर्ष अश्या घटनांमध्ये मानवतावादी मदत प्रदान करणे या बाबींचा समावेश आहे.
☑️सयुक्त राष्ट्रसंघ महासभा (UNGA) हे संयुक्त राष्ट्रसंघामधील सहा प्रमुख अंगांपैकी एक आहे, ज्यामध्ये सर्व सदस्य राष्ट्रांना समान प्रतिनिधित्व बहाल केले गेले आहे आणि संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्य धोरणात्मक, धोरणनिर्धारक आणि प्रतिनिधींचे अंग आहे.
☑️UN च्या सनदने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेला (UNSC) आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी सामूहिक कृती करण्याची जबाबदारी सोपवलेली आहे आणि अधिकार दिला आहे.
☑️सयुक्त राष्ट्रसंघाच्या 5 अधिकृत भाषा आहेत, त्या म्हणजे - अरबी, चीनी, इंग्रजी, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश.
☑️सयुक्त राष्ट्रसंघाचे सर्वात प्रमुख अधिकारी पद‘सरचिटणीस’ (Secretary‑General) हे असून वर्तमानात हे पद पोर्तुगालचे अँटोनियो गुटेरेस यांच्याकडे आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाचे सहा प्रमुख स्तंभ पुढीलप्रमाणे आहेत -
◾️UN महासभा (General Assembly)
◾️UN सुरक्षा परिषद (Security Council)
◾️UN आर्थिक आणि सामाजिक परिषद (Economic and Social Council ECOSOC)
◾️UN सचिवालय
◾️UN आंतरराष्ट्रीय न्यायालय (International Court of Justice) आणि
◾️UN विश्वस्त परिषद (United Nations Trusteeship Council) (1994 सालापासून निष्क्रिय आहे).
🟥सयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रणालीमध्ये समाविष्ट असलेल्या संस्था पुढीलप्रमाणे आहेत -
◾️जागतिक बँक समूह
जागतिक आरोग्य संघटना (WHO)
जागतिक अन्न कार्यक्रम (World Food Program)
◾️सयुक्त राष्ट्रसंघ शिक्षण, वैज्ञानिक आणि सांस्कृतीक संघटना (United Nations Educational, Scientific and Cultural Organization –UNESCO)
◾️सयुक्त राष्ट्रसंघ बाल कोष (United Nations Children's Fund –UNICEF)
पर्यावरण जागरूकता-महत्वपूर्ण प्रश्नोत्तरे
(Environment Awareness- Important questions)
१) भोपाळ येथील युनियन कार्बाईड कारखान्यातून------ वायूची गळती झाली होती
अ) क्लोरीन
ब) कार्बन मोनॉक्साईड
क) मिथाईल आयसोसायनेट √
ड) नायट्रोजन ऑक्साईड
२) नर्मदा नदीवरील सरदार सरोवर प्रकल्प -----------राज्यात आहे .
अ) महाराष्ट्र
ब) आंध्र प्रदेश
क) कर्नाटक
ड) गुजरात √
३) हवेत नायट्रोजनचे प्रमाण -------आहे.
अ) 20•99%
ब) 78•03% √
क) 0•94%
ड) 0•03℅
४) मानवाच्या शरीरामध्ये----- चे प्रमाण अधिक असते.
अ) ऑक्सिजन
ब) नायट्रोजन
क) हायड्रोजन √
क) कार्बन
५) नवेगाव राष्ट्रीय उद्यान------- ठिकाणी आहे .
अ) नागपूर
ब) चंद्रपूर
क)भंडारा √
ड) कोल्हापूर
६). भारतामध्ये-------- ही नैसर्गिक आपत्ती अधिक येते .
अ ) चक्रीवादळ
ब) भूकंप
क) पूर √
ड) वनवा
७) जागतिक वन दिन केव्हा साजरा केला जातो?
अ) 16 सप्टेंबर
ब) 22 एप्रिल
क) 21 मार्च √
ड) 7 एप्रिल
८) भारतामध्ये ऊर्जेच्या आवश्यकतेसाठी जीवाष्म इंधन नंतर योगदान देणारा महत्त्वपूर्ण स्त्रोत कोणता ?
अ) सौर ऊर्जा √
ब) आण्विक उर्जा
क) जल विद्युत ऊर्जा
ड) पवन ऊर्जा
९)----- हा वन्य प्राणी विसाव्या शतकाच्या मध्यात भारतातून नामशेष झाला.
अ) गंगेतील डॉल्फिन
ब) महाकाय पांडा
क) दोन शिंगी भारतीय गेंडा √
ड) चित्ता
१०) जैविक कचऱ्यापासून होणारी गांडूळ खताची निर्मिती प्रामुख्याने यांच्यामुळे होते-
अ) कवके
ब) कीटक
क) कृमी √
ड) बॅक्टेरिया
नीति आयोगाने दुसरा इंडिया इनोव्हेशन अहवाल २०२० प्रसिद्ध केला
🔝 २०२० इंडिया इनोव्हेशन अहवालात मोठ्या राज्यात कर्नाटकने सलग दुसऱ्या वर्षी अव्वल क्रमांक पटकावला
०१) कर्नाटक : ४२.५० गुण
०२) महाराष्ट्र : ३८.०३ गुण
०३) तमिळनाडू : ३७.९१ गुण
०४) तेलंगणा : ३३.२३ गुण
०५) केरळ : ३०.५८ गुण
०६) हरयाणा : २५.८१ गुण
०७) आंध्रप्रदेश : २४.९१ गुण
०८) गुजरात : २३.६३ गुण
०९) उत्तर प्रदेश : २२.८५ गुण
१०) पंजाब : २२.५४ गुण
११) पश्चिम बंगाल : २१.६९ गुण
१२) राजस्थान : २०.८३ गुण
१३) मध्य प्रदेश : २०.८३ गुण
१४) ओडिशा : १८.९४ गुण
१५) झारखंड : १७.१२ गुण
१६) छत्तीसगड : १५.७७ गुण
१७) बिहार : १४.४८ गुण .
▪️२०२० इंडिया इनोव्हेशन अहवालात मोठ्या राज्यात बिहार १४.४८ गुणासह शेवटच्या क्रमांकावर आहे .
बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताच पंतप्रधान मोदींनी केलं ट्विट; म्हणाले.
🎲जो बायडेन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची बुधवारी सूत्रं स्वीकारली. अमेरिकेत झालेल्या सत्तांतराचं देशभरातून स्वागत करण्यात आलं. विविध देशांच्या प्रमुखांनी बायडेन यांचं अभिनंदन केलं. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बायडेन यांनी शपथ घेतल्यानंतर ट्विट करत त्यांचं अभिनंदन केलं.
🎲बायडेन यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी ट्विट केलं. बायडेन यांचं अभिनंदन करतानाच मोदी म्हणाले,”भारत-अमेरिकेतील संबंध समान मूल्यांवर आधारित आहे. आपल्याकडे भरीव असा बहुअंगी द्विपक्षीय अजेंडा आहे. जो आर्थिक गुंतवणुकीबरोबरच उत्साही लोकांसोबतचे संबंध वृद्धिंगत करत आहे. भारत-अमेरिकेतील भागीदारी नव्या उंचीवर नेण्यासाठी बायडेन यांच्यासोबत काम करण्यास कटिबद्ध आहे,” असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.
🎲“अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारल्याबद्दल मी जो बायडेन यांचं अभिनंदन करतो. भारत-अमेरिका यांच्यातील राजनैतिक संबंध अधिक मजबूत करण्यासाठी मी बायडेन यांच्यासोबत काम करण्याची प्रतीक्षा करत आहे. अमेरिकेचं यशस्वी नेतृत्व करण्यासाठी माझ्या शुभेच्छा कारण, आपल्याला जागतिक शांतता आणि सुरक्षा पुढे नेण्यासाठी समान आव्हानांचा सामना करावा लागत आहे,” असंही मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
केंद्राचे एक पाऊल मागे.
🌇वया कृषी कायद्यांविरोधात जवळपास दोन महिन्यांपासून दिल्लीच्या वेशींवर ठाण मांडलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे केंद्र सरकारने अखेर एक पाऊल मागे घेतले. याबाबत स्वतंत्र समिती नेमून तोडगा निघेपर्यंत तिन्ही कायद्यांना दीड वर्षांसाठी स्थगिती देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने बुधवारी शेतकरी संघटनांसमोर ठेवला. तसे प्रतिज्ञापत्रही सर्वोच्च न्यायालयात सादर करण्याची तयारी केंद्राने दर्शवली. या प्रस्तावावर गांभीर्याने विचार करणार असल्याचे शेतकरी नेत्यांनी सांगितले.
🌇कद्र सरकार आणि आंदोलक शेतकरी संघटना यांच्यात बुधवारी विज्ञान भवन येथे झालेली दहावी बैठकही तोडग्याविना संपली. मात्र, केंद्राच्या नव्या प्रस्तावावर शुक्रवारी २२ जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता पुन्हा बैठक होणार आहे. ‘शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या समितीचा प्रस्ताव मान्य केला तर दीड वर्षांसाठी कायद्यांना स्थगिती दिली जाऊ शकते’, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी बैठकीनंतर पत्रकारांना दिली.
🌇दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या आंदोलनाला ५६ दिवस झाले असून, केंद्राने पहिल्यांदाच कृषी कायद्यांना स्थगिती देण्याची तयारी शेतकऱ्यांच्या बैठकीत दर्शवली. ‘शेतकरी नेत्यांशी सकारात्मक आणि योग्य दिशेने चर्चा झाली असून, शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत कदाचित तोडगा निघू शकेल’, असा आशावादही तोमर यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र : पंचायत राज आणि महत्वाचे प्रश्न
1. कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ?
*उत्तर* : स्थानिक स्वराज्य संस्था
2. राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती?
*उत्तर* : 2 ऑक्टोबर 1953
3. बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली?
*उत्तर* : 16 जानेवारी 1957
4. बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती?
*उत्तर* : वसंतराव नाईक समिती
5. वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती?
*उत्तर* : 27 जून 1960
6. वसंतराव नाईक त्याकाळी कोणत्या पदावर कार्यरत होते?
*उत्तर* : महसूल मंत्री
7. वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या?
*उत्तर* : 226
8. वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती. त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली?
*उत्तर* : जिल्हा परिषद
9. पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत?
*उत्तर* : तीन (ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद)
10. महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला?
*उत्तर* : 1 मे 1962
21 January 2021
चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे
प्रश्न१२१) कोणत्या शहरात विजेरी मोटार वाहन निर्मिती करणाऱ्या ‘टेस्ला’ कंपनीचे मुख्यालय आहे?
उत्तर :- कॅलिफोर्निया
प्रश्न१२२) कोणत्या देशात ‘सेमेरू ज्वालामुखी’ आहे?
उत्तर :- इंडोनेशिया
प्रश्न१२३) कोणत्या कवीच्या स्मृतीत बसवाकल्याण येथे ‘न्यू अनुभवा मंतपा’ उभारले जात आहे?
उत्तर :- बसवेश्वरा
प्रश्न१२४) जल्लीकट्टू हा खेळ कोणत्या राज्यात खेळण्यात येतो ?
उत्तर :- तामिळनाडू
प्रश्न१२५) कोणत्या संस्थेने ‘नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन’ नामक संकेतस्थळ-आधारित व्यासपीठ तयार केले? Topper9 चालू घडामोडी
उत्तर :- नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन-इंडिया
प्रश्न१२६) कोणत्या राज्यात ‘हरिके आर्द्रभूमी’ हे ठिकाण आहे?
उत्तर :- पंजाब
प्रश्न१२७) कोणत्या राज्यात ‘फुरफुरा’ तीर्थक्षेत्र आहे?
उत्तर :- पश्चिम बंगाल
प्रश्न१२८) 'नागी-नक्ती पक्षी अभयारण्य’ येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रथम राज्यस्तरीय पक्षी उत्सवाचे नाव काय आहे?
उत्तर :- कलरव
प्रश्न१२९) कोणत्या साली आफ्रिका खंडात ‘ग्रेट ग्रीन वॉल’ नामक उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली?
उत्तर :- २००७
प्रश्न१३०) कोणत्या व्यक्तीला मध्यम व दीर्घ अंतर शर्यतीसाठी भारतीय धावपटूंच्या संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली?
उत्तर :- निकोलाई स्नेसारेव
भारतीय महिला हॉकी संघाची अर्जेटिनाशी बरोबरी.
🧿शर्मिला देवी आणि दीप ग्रेस इक्का यांनी केलेल्या प्रत्येकी एक गोलमुळे भारतीय महिला हॉकी संघाने अर्जेटिनाच्या कनिष्ठ संघाविरुद्धची लढत २-२ अशी बरोबरीत सोडवली.
🧿अर्जेटिना दौऱ्यातील पहिल्याच सामन्यात दोन्ही संघांनी तोडीस तोड खेळ केला. भारताची युवा आघाडीवीर शर्मिला हिने २२व्या मिनिटाला खाते खोलल्यानंतर पावला सान्तामारिना हिने २८व्या मिनिटाला अर्जेटिनाला बरोबरी साधून दिली. त्यानंतर तीन मिनिटांनी दीप ग्रेस हिने भारताला पुन्हा आघाडीवर आणले. पण ब्रिसा ब्रगसेर हिने ४८व्या मिनिटाला अर्जेटिनासाठी दुसरा गोल करत हा सामना बरोबरीत राखला.
🧿करोनामुळे वर्षभरानंतर मैदानात उतरून चांगली कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक शोएर्ड मरिन यांनी कौतुक केले आहे. ते म्हणाले, ‘‘बऱ्याच कालावधीनंतर आम्ही पहिला सामना खेळलो. सर्वानाच प्रतिस्पध्र्याशी दोन हात करण्याचा सराव व्हावा म्हणून आम्ही २३ खेळाडूंना मैदानावर उतरवले.’’
मुलींना वसतिगृहासाठी मिळणार १० हजार रुपयांपर्यंत अनुदान
💥जिल्हा परिषद क्षेत्रात महिला व बालकल्याण समित्यांमार्फत जिल्हा परिषद उत्पन्नातून राबविल्या जाणाऱ्या योजनेंतर्गत आता तालुकास्तरावर शिकणाऱ्या मुलींसाठी वसतिगृहासाठी सात हजार रुपये व जिल्ह्याच्या ठिकाणी राहण्यासाठी दहा हजार रुपये एक रकमी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.
💥याशिवाय मुलींना स्वसंरक्षणासाठी व त्यांच्या शारीरिक विकासाठी प्रशिक्षण या योजनेमध्ये जुडो कराटे, योगा व जीवन कौशल्य प्रशिक्षण यासाठी आता प्रति प्रशिक्षणार्थी ६०० रुपयांऐवजी १ हजार रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे. इयत्ता सातवी ते बारावी पास मुलीना संगणकाबाबतचे ज्ञान, कौशल्य प्राप्त करून घेण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनेचा लाभ दारिद्र्य रेषेखालील कुटुंब, तसेच ज्या कुटुंबाचे उत्पन्न ५० हजार रुपये असलेल्या कुटुंबातील मुलींना देण्यात येत होता. आता कुटुंबाची उत्पन्नाची मर्यादा १ लाख २० हजार रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहितीही मंत्री मुश्रीफ यांनी दिली.
💥तसेच, महिला व बालकल्याण विकासाशी संबंधित विविध कार्यक्रम राबविण्यासाठी सर्व जिल्हा परिषदांमध्ये महिला व बालकल्याण समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे. महिला व मुलींना सर्व क्षेत्रात सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषद क्षेत्रात या समित्यांमार्फत जिल्हा परिषद उत्पन्नाचे १० टक्के निधीतून विविध योजना राबविण्यात येतात. या योजनेअंतर्गत काही नवीन बाबी तसेच काही बाबींची दर्जान्नत्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही मुश्रीफ यांनी सांगितले आहे.
राज्यात आठवड्यातील चार दिवस कोरोना लसीकरण.
🧬राज्यात मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी होणाऱ्या कोरोना लसीकरणाच्या तयारीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आढावा घेतला. आठवड्यातील चार दिवस राज्यातील २८५ केंद्रांवर लसीकरण होणार असून ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबवून आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
🧬‘वर्षा’ येथील समिती कक्षातून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधत लसीकरणाच्या तयारीचा आढावा घेतला. शनिवारी राज्यात लसीकरण मोहीम यशस्वीरीत्या राबविल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी यंत्रणेचे कौतुक केले.
🧬बठकीस मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने आदी उपस्थित होते.
🧬लसीकरणाच्या नोंदणीसाठी असलेल्या कोविन ॲपबद्दल मुख्यमंत्र्यांनी यावेळी माहिती घेतली. या ॲपची कार्यपद्धती अधिक गतिमान होण्याकरिता काही जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना केल्या. त्या केंद्र शासनाला पाठविण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
‘या’ दोन देशांपासून भारताने सावध रहावे; जाता जाता ट्रम्प प्रशासनाचा मैत्रीपूर्ण सल्ला
🔶अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाळ लवकरच संपुष्टात येणार आहे. अवघ्या काही तासांनंतर अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार आहे. यापूर्वी मावळते राष्ट्राध्यक्ष म्हणून ट्रम्प यांनी दिलेल्या भाषणामध्ये अमेरिकेतील जनतेला संबोधित केलं.
🔶यामध्ये त्यांनी ६ जानेवारी रोजी अमेरिकेच्या राजधानीमध्ये कॅपिटॉल हिल येथे झालेल्या हिंसेबद्दल दु:ख व्यक्त केलं. तसेच ट्रम्प सरकारने चीनलाही इशारा दिला. याचवेळी ट्रम्प प्रशासनाने मित्रदेश असणाऱ्या भारताला दोन देशांपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
🔶टरम्प सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री म्हणून काम करणाऱ्या माइक पोम्पिओ यांनी भारतासाठी एक खास ट्विट केलं आहे. यामध्ये पोम्पिओ यांनी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जायर बोल्सोनारो आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांचे आभार मानले आहे.
🔶“ब्रिक्स लक्षात आहे का?,” असा प्रश्न विचारत या ट्विटला पोम्पिओ यांनी सुरुवात केलीय. ब्रिक्स ही ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश असणारी आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषद आहे. या ट्विटमध्ये पोम्पिओ यांनी ‘बी’ आणि ‘आय’च्या लोकांना ‘सी’ आणि ‘आर’पासून धोका आहे असं म्हटलं आहे. म्हणजेच ब्राझील आणि इंडिया म्हणजेच भारतीय नागरिकांना चीन आणि रशियापासून धोका असल्याचं पोम्पिओ म्हणाले आहेत. ट्र्म्प प्रशासनाच्या काळात भारत आणि अमेरिकेच्या संबंध कायमच मैत्रीपूर्ण राहिले. अनेकदा ट्रम्प आणि मोदी यांनी एकमेकांचे भरभरुन कौतुक केल्याचंही पहायला मिळाल.
इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2020’ याची द्वितीय आवृत्ती नीती आयोगाकडून प्रकाशित
🎍नीती आयोगाने 20 जानेवारी 2021 रोजी एका आभासी कार्यक्रमात ‘इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2020’ याची द्वितीय आवृत्ती प्रकाशित केली.
🌹मानांकन यादीनुसार निष्कर्ष
🎍कर्नाटकने मोठ्या राज्यांच्या गटात पहिले स्थान कायम राखले. महाराष्ट्र एका स्थानाने वर आला आणि द्वितीय क्रमांकावर आहे, तर तामिळनाडू तिसर्या क्रमांकावर आहे.
🎍ईशान्य आणि डोंगराळ राज्यांच्या गटात, हिमाचल प्रदेश प्रथम क्रमांकावर असून त्याच्यापाठोपाठ उत्तराखंड व मणीपूर या राज्यांचा क्रमांक लागतो.
🎍कद्रशासित प्रदेश व छोट्या राज्यांच्या गटात, दिल्ली प्रथम क्रमांकावर आहे, तर चंदीगडने द्वितीय क्रमांक कायम राखला आहे.
🌼निर्देशांकाविषयी
🎍हा निर्देशांक देशाला नावीन्यपूर्ण अर्थव्यवस्थेत परिवर्तित करण्याप्रति सरकारची वचनबद्धता दर्शवते.
🎍‘इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2020’ नाविन्यपूर्ण संशोधनाला हातभार लावण्याच्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या कामगिरीच्या आधारे त्यांची क्रमवारी ठरवते आणि त्यांची ताकद व त्रुटी अधोरेखित करुन अभिनवता धोरण सुधारण्यासाठी त्यांना सक्षम बनवते.
🎍कामगिरीची प्रभावीपणे तुलना करण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 17 ‘प्रमुख राज्ये’, 10 ‘ईशान्य आणि पर्वतीय राज्ये’ आणि 9 ‘शहर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश’ अश्या गटांमध्ये विभागले आहे.
🎍राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना परिणाम आणि प्रशासन या दोन व्यापक श्रेणींच्या आधारे मानांकन देण्यात आले आहे. एकूणच, निर्देशांकाच्या चौकटीत 36 निर्देशकांचा समावेश आहे.
🎍निर्देशांक कल स्वीकारून देश, राज्य आणि जिल्हा पातळीवर नवसंशोधनाला प्रेरक विविध घटकांचे तपशीलवार विश्लेषण प्रदान करतो. ही विश्लेषणे राष्ट्रीय आणि उप-राष्ट्रीय स्तरावर नवसंशोधनाचे उत्प्रेरक आणि प्रतिबंधकांना ओळखण्यात धोरणकर्त्यांना मदत करतील, अशी अपेक्षा आहे.
दरवर्षी 23 जानेवारी या दिवशी भारतात “पराक्रम दिन” साजरा करण्यात येणार
\
🍄भारत सरकारने येत्या 23 जानेवारी 2021 पासून नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे 125 वे जयंती वर्ष राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुयोग्य पद्धतीने साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे.
🍄नताजींनी देशासाठी नि:स्वार्थ भावनेने केलेल्या सेवेचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या स्मरणार्थ भारत सरकारने त्यांची जयंती अर्थात 23 जानेवारी हा दिवस “पराक्रम दिन” म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
🍄दशातल्या नागरिकांना आणि विशेषत: तरुणांना संकट काळात नेताजींप्रमाणे धैर्याने वागण्याची प्रेरणा मिळावी आणि त्यांच्यामध्ये देशप्रेमाची भावना जागृत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
🍁इतर ठळक बाबी
🍄नताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त संपूर्ण वर्षभर साजऱ्या होणाऱ्या कार्यक्रमांची औपचारिक सुरुवात 23 जानेवारी 2021 रोजी होणार आहे. कोलकता येथे आयोजित केलेल्या उत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी असणार आहेत.
🍄पतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली येत्या 23 जानेवारी 2021 रोजी कोलकाता येथील व्हिक्टोरिया मेमोरियल येथे या स्मरणोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. याप्रसंगी एका सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबर, नेताजींच्या जीवन आणि कार्यावर आधारित कायमस्वरुपी प्रदर्शन व प्रोजेक्शन मॅपिंग प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.
नेताजी यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त एक विशेष नाणे आणि टपाल तिकीट यांचे विमोचन केले जाणार आहे.
🍄ओडीशाच्या कटक येथे नेताजींच्या जन्मस्थळी देखील संस्कृती मंत्रालय एक कार्यक्रम आयोजित करणार आहे.
🍁नताजी सुभाषचंद्र बोस (23 जानेवारी 1897 – 18 ऑगस्ट 1945 ?)
🍄सभाषचंद्र बोस भारतीय स्वातंत्र्य चळवळीतले एक श्रेष्ठ क्रांतिकारक नेते आणि आझाद हिंद सेनेचे सरसेनापती होते. ‘नेताजी’ ही त्यांना लोकांनी दिलेली उपाधी आहे. त्यांचा जन्म कटकला (ओडीशा) येथे झाला.
🍄1927 साली ते सक्रिय राजकारणात पडले. ते बंगाल प्रांतिक काँग्रेस परिषदेचे अध्यक्ष झाले. त्यांनी यूथ लीग स्थापन करून तरुणांना संघटित केले. काँग्रेसचे सरचिटणीस म्हणूनही जवाहरलाल नेहरूंबरोबर त्यांची नियुक्ती झाली. त्यांनी मिळून 1928 साली इंडिया इंडिपेंडन्स युथ लीगची स्थापना केली.
🍄21 ऑक्टोबर 1943 रोजी सिंगापूर येथे आझाद हिंद सरकारची स्थापना करण्यात आली. सुभाषबाबू स्वतः राष्टप्रमुख, पंतप्रधान, संरक्षण मंत्री व सरसेनापती झाले. या शासनाला जपान, जर्मनी, इटली, ब्रह्मदेश आदी अकरा राष्ट्रांनी मान्यता दिली. या सरकारने इंग्लंड-अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारून स्वतःची तिकिटे व नोटाही काढल्या. जपानने अंदमान, निकोबार व जित बेटांचा ताबा या सरकारकडे सोपविला. ब्रह्मदेशामधून आझाद हिंद सेना भारताच्या दिशेने पुढे गेल्या.
🍄सायगावहून 17 ऑगस्ट 1945 रोजी त्यांनी प्रयाण केले. मार्गावर 18 ऑगस्ट रोजी तैपे (तैवान) येथील विमानतळावर विमानास अपघात होऊन त्यांचे निधन झाले, असे समजण्यात येते.
20 January 2021
'पट्टचित्र' ही ओडिशाची सर्वात जुनी कला रघुराजपूरात जपली जात आहे
🔶ओडिशाची सर्वात जुन्या कलाप्रकारांपैकी एक असलेली 'पट्टचित्र' ही चित्रकला रघुराजपूरा या खेड्यात जपण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. या प्रयत्नांमुळे, रघुराजपूरा भारतातले पहिले वारसा गाव ठरते.
🔴'पट्टचित्र' कलेविषयी
🔶‘पट्टचित्र’ ही चित्रकला शैली ओडिशाच्या सर्वात जुन्या आणि लोकप्रिय कला प्रकारांपैकी एक आहे.
🔶‘पट्ट’ हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ ‘तैलचित्र तयार करण्यासाठी चित्रकार वापरतात ते कापड’ (कॅनव्हास) असा होतो.
🔶कापडावर चित्र तयार करण्यासाठी अनेक रंगांचा वापर केला जातो, ज्यात सामान्यत: पांढरा, लाल, पिवळा आणि काळा ही रंग असतात.
🔶चित्र काढण्यापूर्वी कापड एका प्रक्रियेमधून जाते, त्यासाठी पारंपारिक प्रक्रियेचा अवलंब केला जातो. प्रथम, चुन्याची बारीक भुकटी आणि चिंचेच्या बियापासून बनवलेला गोंद यांचा लेप कापडावर लावून चित्रासाठी पृष्ठभुमी तयार केली जाते. चित्राची सीमा प्रथम पूर्ण करण्याची परंपरा आहे. त्यानंतर कलाकार हलका लाल आणि पिवळा रंग वापरुन थेट ब्रशने एक खडबडीत रेखाकृती तयार करण्यास सुरवात करतो.
आदर्शगाव संकल्प व प्रकल्प
✍️“लोकसहभागातून ग्रामविकास व लोक कार्यक्रमांत शासनाचा सहभाग” या संकल्पनेवर आधारित असलेली आदर्शगाव संकल्प व प्रकल्प योजना कार्यक्रम हा एक गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आदर्शवत उपक्रम आहे.
ही योजना ऑगस्ट क्रांती दिनाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सन 1992 पासून कृषि विभागामार्फत सुरु करण्यात आलेली आहे.
🌸योजनेचा उद्देश👇👇
✍️गाभा व बिगरगाभा क्षेत्राचा विकास आणि चराईबंदी, कुऱ्हाडबंदी, नसबंदी, नशाबंदी, निर्मलग्राम, (लोटाबंदी) बोअरवेल बंदी व श्रमदान या सप्तसुत्रीचे पालन गावाने व ग्रामसभेने निवडलेल्या स्वंयसेवी संस्थेच्या माध्यमातून करणे हा योजनेचा उददेश आहे.
🌸गाव निवडीचे निकष👇👇
✍️गावाच्या एकूण क्षेत्रापैकी सर्व प्रकारे मिळून 30 टक्कयांहून अधिक सिंचन क्षेत्र नसावे. गावाची लोकसंख्या 4,000 च्या आत असावी. गावाचे महसुली क्षेत्र 1,500 हेक्टरपर्यंत असावे. गट ग्रामपंचायतीअंतर्गत स्वतंत्र वाडी/ वस्तीस सहभागी होता येते. ग्रामविकास निधी उभारुन तो चालविण्यासाठी ग्रामस्थांची तयारी असणे आवश्यक आहे. सप्तसुत्रीचे पालन करण्याची ग्रामस्थांची तयारी हवी. विविध ग्राम अभियानांत ( उदा.संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता, निर्मलग्राम, तंटामुक्ती आदी.) पुरस्कार प्राप्त गावे.
🌸सस्था निवडीचे निकष👇👇
✍️गावातील संस्थेला प्रथम प्राधान्य देण्यात यावे. गावात संस्था नसेल, तर त्या तालुक्यातील 25 किलोमीटरच्या आतील गावातील जवळच्या संस्थेला प्राधान्य देण्यात यावे. ही संस्था शक्यतो जिल्हयातील असावी. या संस्थेची नोंदणी धर्मादाय आयुक्तांकडे केलेली असावी. संस्थेची वार्षिक उलाढाल रु. 3 लाखांपेक्षा कमी असू नये. संस्थेचा तीन वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल सादर करणे आवश्यक. संस्था फॅमिली ट्रस्ट नसावी. तसेच घटना सादर करणे आवश्यक.
🌸लाभार्थी निवड प्रक्रिया👇👇
✍️योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय तसेच जिल्हा, तालुका व ग्रामस्तरीय समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. राज्यस्तरीय समितीचे अध्यक्ष मा.मंत्री, जलसंधारण असून सदस्य सचिव संचालक (मृद संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन ) हे आहेत. राज्यस्तरीय कार्यकारी समितीचे अध्यक्ष तथा कार्यध्यक्ष श्री. पोपटराव पवार असून, सदस्य सचिव संचालक मृद संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन हे आहेत. जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी असून, सदस्य सचिव म्हणून जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी हे आहेत. तालुका स्तरीय समितीचे अध्यक्ष गटविकास अधिकारी असून, सदस्य सचिव तालुका कृषि अधिकारी आहेत. ग्रामस्तरीय समितीचे अध्यक्ष ग्रामसभेने निवडलेली व्यक्ती असते व त्याचे सदस्य सचिव कृषि सहायक आहेत.
✍️वर नमूद केलेल्या संस्थेच्या तपशिलासह ग्रामसभेने शिफारस केलेल्या गावांची निकषांनुसार छाननी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हे अध्यक्ष असलेल्या जिल्हा समितीमार्फत करण्यात येईल. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी हे या समितीचे सदस्य सचिव आहेत. जिल्हा समिती छाननीनंतर सहभागी होणाऱ्या प्रत्येक गावाचा वस्तुनिष्ठ अहवाल शिफारशीसह राज्यस्तरीय कार्यकारी समितीला सादर करेल.
✍️ही समिती संबंधीत गावांची प्रत्यक्ष तपासणी करुन गावे व प्रकल्प कार्यान्वयीन संस्थेची प्राथमिक निवड करेल. योजनेमध्ये गावाची प्राथमिक निवड झाल्यावर पहिले सहा महिने पूर्वतयारी कालावधी राहील. या कालावधीत गावाने काही कामे पूर्ण करायची आहेत.
मृद संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाचे काम गाभा क्षेत्र विकासाचे काम म्हणून संबोधण्यात येते. यात मृद संधारण, सामाजिक वनीकरण,वन खाते, भूजल सर्वेक्षण व लघुपाटबंधारे या विभागांच्या कामांचा समावेश आहे.
🌸अर्थसाहाय्य व समाविष्ट जिल्हे👇👇
निवड होणाऱ्या गावांसाठी पाणलोट विकास कामे, सामूहिक संघटन, प्रशिक्षण, प्रशासकीय खर्च इ. अनुज्ञेय बाबींसाठी केंद्र शासनाच्या समाईक मार्गदर्शक सूचना 2008 नुसार हेक्टरी रु. 12 हजार प्रमाणे निधी मंजूर करण्यात येईल.
WTC : ऑस्ट्रेलियाला खाली खेचत भारत अव्वल स्थानावर
🔶World Test Championship : ब्रिस्बेन कसोटी सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा तीन गड्यांनी पराभव करत बॉर्डर गावसकर कसोटी मालिका २-१ नं खिशात घातली आहे. या ऐतिहासिक विजयासह भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. कसोटी मालिकाते पराभव स्विकारावा लागल्यानंतर गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाची घसरण झाली आहे.
🔶बरिस्बेन कसोटी सामन्यानंतर आयसीसीनं कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचं गुण आणि क्रमवारी जारी केली आहे. त्यानुसार भारतीय संघ अव्वल स्थानावर पोहचला आहे. तर पहिल्या क्रमांकावर असणारा ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या स्थानावर घसरला आहे.
🔶 आतापर्यंत भारतीय संघानं पाच कसोटी मालिकेत ९ विजय आणि तीन पराभव स्वीकारलं आहेत. तर एक सामना अनिर्णित राखला आहे. त्यामळे भारतीय संघाच्या नावावर ४३० गुण असून विजयाची टक्केवारी ७१.७ इतकी आहे.
🔶दसऱ्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंड संघानेही पाच कसोटी मालिका खेळल्या आहेत. न्यूझीलंडला सात सामन्यात विजय तर चार सामन्यात पराभव स्वीकारावा लागाल आहे.
🔶 नयूझीलंडच्या विजयाची टक्केवारी ७० इतकी आहे. तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या ऑस्ट्रेलियानं ८ सामन्यात विजय तर ४ सामन्यात पराभव स्विकारावा लागाला आहे. ऑस्ट्रेलियाची विजयाची टक्केवारी ६९ इतकी आहे.
🔶जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारत, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये या तीन संघामध्ये पहिल्या दोन संघामध्ये स्थान मिळवण्याची टक्कर आहे.
भारतीय कुशल कामगारांना जपानमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जपान सरकार सोबत करार
🔶भारतीय कुशल कामगारांना जपानमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारचा जपान सरकार सोबत सहकार करार झाला आहे.
🔶कराराच्या अंतर्गत कामगारांच्या संबंधित यंत्रणेच्या योग्य संचालनासाठी भागीदारीकरिता एक मूलभूत कार्यचौकट तयार केली जात आहे.हा करार भारतामधून जपानमध्ये कुशल कामगारांच्या चळवळीला चालना देण्यास मदत करणार आहे.
🔶कराराच्या अंतर्गत आवश्यक कौशल्य व जपानी भाषेची पात्रता चाचणी यांची पूर्तता करणारे कुशल कामगार कंत्राटी आधारावर जपानमध्ये रोजगारासाठी पात्र ठरणार. जपान अश्या कामगारांना ‘विशिष्ट कुशल कामगार’ हा दर्जा प्रदान करणार.
🔶कराराच्या अंतर्गत एकूण 14 उद्योग क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यात परिचर्या सेवा, इमारतीची साफसफाई, सामग्री प्रक्रिया, औद्योगिक यंत्रनिर्मिती, विद्युत व इलेक्ट्रॉनिक, माहिती तंत्रज्ञान, बांधकाम, जहाज बांधणी व जहाज-संबंधित उद्योग, वाहन देखरेख, विमानचालन, लॉजिंग, कृषी, मत्स्यपालन, अन्न व पेय पदार्थांची निर्मिती आणि अन्नपदार्थ सेवा उद्योग समाविष्ट आहेत.
🔶जपान हा पूर्व आशियामधला एक द्वीप-देश आहे. जपानच्या पश्चिमेला जपानचा समुद्र, चीन, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया व रशिया, उत्तरेला ओखोत्स्कचा समुद्र व दक्षिणेला पूर्व चीन समुद्र व तैवान आहेत. टोकिओ हे देशाचे राजधानी शहर आहे आणि जपानी येन हे राष्ट्रीय चलन आहे.
🔶आशिया खंडाच्या पूर्व किनाऱ्यालगत, तैवान बेट आणि कूरील बेटे यांच्या दरम्यान लहानमोठ्या बेटाच्या तीन चंद्रकोरी मालिका तयार झाल्या आहेत.
🔶यांनाच पुष्कळ वेळा ‘तोरण बेटे’ म्हणून संबोधण्यात येते. या तोरण बेटांत चार मोठ्या व इतर 3400 बेटांचा समावेश होतो. ही सर्व बेटे मिळूनच जपान देश झाला आहे. जपानच्या अतिपूर्वेकडील स्थानामुळे जपानला “उगवत्या सूर्याचा देश” असे संबोधण्यात येते.
19 January 2021
मोर्य ते यादव
मौर्य साम्राज्याचा काळ
महाराष्ट्राचा कोकण विभाग हा प्राचीन काळांत मौर्य साम्राज्याच्या (इ.स.पू. ३२१-१८४) हिस्सा होता. या काळात महाराष्ट्राने भरभराटीचा व्यापार आणि बौद्धधर्माचा विकास पाहिला. पण मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासाबरोबर महाराष्ट्रावरील मौर्य सत्ता संपुष्टात आली, आणि या प्रदेशावर निरनिराळ्या घराण्यांची सत्ता प्रस्थापित होऊ लागली.
सातवाहन साम्राज्याचा काळ
सातवाहन हे महाराष्ट्राचे पहिले ज्ञात राजघराणे होय. त्यांचा काळ इ.स.पू. साधारणतः २२० ते इ.स. २२५ पर्यंतचा मानला जातो. अर्थात या कालखंडाबाबत मतभेद आहेत. प्रतिष्ठान अथवा पैठण ही त्यांची राजधानी आणि सिम्मुक सातवाहन हा या घराण्याचा मूळ पुरुष. महाराष्ट्राच्या राजकीय. सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने सातवाहनांचा कालखंड हा अतिशय महत्त्वाचा गणला जातो. सातव्या शतकातील हाल राजाने महाराष्ट्री प्राकृत भाषेत संकलित केलेले गाथासप्तशती हे काव्य ही सातवाहनांची साहित्याला मोठी देणगी. हिंदूंचा शालिवाहन शक सातवाहनांनीच सुरू केला.
वाकाटकांचा काळ
वाकाटक (इ.स. २५० ते ५२५) राजांनी विदर्भ आपल्या वर्चस्वाखाली आणला होता. वाकाटक काळात राजाश्रयामुळे महाराष्ट्राची साहित्य, कला आणि धर्म या क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती झाली. अजिंठ्याची १६, १७, १९ या क्रमांकांची लेणी ही वाकाटक काळातील आहेत. भित्ति-चित्रांची कला या काळात अतिशय विकसित झाली होती.
कलाचुरींचा काळ
वाकाटकांनंतर कलचुरी राजघराण्याने इसवी सनाच्या सहाव्या शतकात महाराष्ट्राच्या काही भागांवर राज्य केले. महिष्मती ही त्यांची राजधानी होती.
बदामी चालुक्य आणि कल्याणी चालुक्यांचा काळ
वाकाटकांचे महत्त्वाचे राजघराणे म्हणजे चालुक्यांचे. महाराष्ट्राचा भूप्रदेश त्यांच्याकडे इ.स. ५५० ते ७६० आणि इ.स. ९७३ ते ११८० या दोन कालखंडांत होता. जयसिंह हा या घराण्याचा संस्थापक आणि बदामी ही त्याची राजधानी. त्रैमहाराष्ट्रिकाचा स्वामी आणि या घराण्याचा सर्वश्रेष्ठ राजा दुसरा पुलकेशी याने नाशिक येथे आपले महत्त्वाचे ठाणे केले होते. चालुक्य राजे हिंदू धर्माचे अभिमानी होते त्यांनी मंदिरे बांधण्याच्या कामी मौलिक कामगिरी केली होती.
वाकाटक, चालुक्य व राष्ट्रकूटांचा काळ
वाकाटकांच्या(इस.२५०-५२५) राज्यात विदर्भ समाविष्ट झाला. या कालखंडात कला, धर्म व तंत्रज्ञानात प्रगती होत गेली. सहाव्या शतकात बदामीच्या चालुक्यांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता आली. दंतिदुर्ग या राष्ट्रकूट राजाने इ.स. ७५३ च्या सुमारास चालुक्यांचा पराभव केला आणि गुलबर्गा जिल्ह्यातील मान्यखेत (मालखेड) आपली राजधानी बनविली. कल्याणी शाखेच्या तैलप चालुक्याने इ.स. ९७३ च्या सुमारास राष्ट्कूटांची सत्ता संपुष्टात आणून चालुक्यांची राजवट दुसऱ्यांदा प्रस्थापित केली. वेरूळ येथील जगप्रसिद्ध कैलास लेणे हे पहिला कृष्ण या राष्ट्रकूट राजाने बांधले.
यादवांचा काळ
महाराष्ट्राच्या काही भागावर कल्याणीच्या चालुक्यांची सत्ता इ.स.११८९ पर्यंत टिकली. यादवांनी त्यांचा पराभव केला व इ.स. १३१०पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. गोव्याचे कदंब, कोकण आणि कोल्हापूर येथील शिलाहार राजे हे चालुक्य आणि राष्ट्रकूट यांचे मांडलिक म्हणून राज्य करीत होते. यादवांनी त्यांची सत्ता संपुष्टात आणली. यादवांनी महाराष्ट्राचा बराचसा भाग आपल्या आधिपत्याखाली आणला होता. यादव राजांनी धार्मिक सहिष्णुतेचे धोरण अवलंबिले होते. त्यांनी मराठी भाषेला राजाश्रय दिला आणि तिला राजभाषेचा दर्जा प्राप्त करून दिला. भक्तिसंप्रदायाचे उद्गाते आणि महाराष्ट्राचे सर्वश्रेष्ठ संतकवी ज्ञानेश्वर महाराज हे याच यादव काळात उदयास आले. नवव्या शतकात नाशिक जिल्ह्यांतील चांदोर या ठिकाणी यादवांची पहिली राजधानी होती. इ.स. ११८७ च्या सुमारास भिल्लम राजाने ती देवगिरी येथे आणली.
ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात झालेले विविध उठाव :
👉1.संन्याशाचा उठाव
1765-1800
बंगाल
शंकराचार्यांचे अनुयायी व गिरी संप्रदायाचे लोक
👉2.चुआरांचा उठाव
1768
बंगाल-मिजापूर जिल्हा
जगन्नाथ घाला
👉3.हो जमातीचे बंड
1820
छोटा नागपूर व सिंग
भूम
👉4.जमिनदारांचा उठाव
1803
ओडिशा
जगबंधु
👉5.खोंडांचा उठाव
1836
पर्वतीय प्रदेश
दोरा बिसाई
👉6.संथाळांचा उठाव
1855
कान्हू व सिंधू
👉7.खासींचा उठाव
1824आसाम
निरत सिंग
👉8.कुंकिंचा उठाव
1826
मणिपूर
👉9.दक्षिण भारतातील उठाव
👉10.पाळेगारांचा उठाव
1790
मद्रास
👉11.म्हैसूरमधील शेतकर्यांचा उठाव
1830
म्हैसूर
👉12.विजयनगरचा उठाव
1765
विजयनगर
👉13.गोरखपूरच्या जमिनदारांचा उठाव
1870
गोरखपूर
👉14.रोहिलखंडातील उठाव
1801
रोहिलखंड
👉15.रामोश्यांचा उठाव
1826
महाराष्ट्र
उमाजी नाईक व बापू त्र्यंबकजी सावंत
👉16.भिल्ल व कोळ्यांचा उठाव
1824
👉17.केतूरच्या देसाईचा उठाव
1824
केतूर
👉18.फोंडा सावंतचा उठाव
1838
👉19.लखनऊ उठाव
👉21.भिल्लाचा उठाव
1825
खानदेश
👉21.दख्खनचे दंगे
1875
पुणे,सातारा,महाराष्ट्र
शेतकरी
---------------------------------------
रशिया
🎯रशियाचा इतिहास🎯
🔵रशिया हा युरेशिया खंडाच्या उत्तर भागातील एक देश आहे . रशिया हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश आहे.
🔴पर्वेकडील स्लेव्स आणि फिंनो-युग्रिक लोक यांनी रशियाच्या इतिहास्ची सुरुवात केली .
🔵रशियाची राजधानी *मॉस्को* आहे . तिकडे अधिक्रत लोक रशियन भाषा म्हणतात .
🔴जन १२, १९९० तारिखला रशिया स्वातंत्र घोषित झाला पण मान्यता त्यांना डिसेंबर २६, १९९१ ला मिळाली .
*🎯रशियन साम्राज्य-🎯*
🔵रशियन साम्राज्य ही जगातील एक भूतपूर्व महासत्ता आहे. रशियातील *झारशाही* नंतर १७२१ साली रशियन साम्राज्याची स्थापना झाली व १९१७ सालच्या रशियन क्रांती दरम्यान त्याचा पाडाव झाला.
🔴रशियन साम्राज्याच्या अस्तानंतर सोविएट संघाचा उदय झाला.१७२१ साली, पीटर द ग्रेट अधिपत्याखाली रशियन साम्राज्य उदयास आले.
*🔵पीटरने*एप्रिल २७, इ.स. १६८२ पासून मृत्यूपर्यंत राज्य केले. इ.स. १६९६पर्यंत पीटरचा सावत्रभाऊ इव्हान पाचवा व पीटर असे दोघांनी एकत्र राज्य सांभाळले.
🔴पीटरने रशियाचे साम्राज्य युरोप व आशियामध्ये सर्वदूर फैलावले व रशियाला जगातील महासत्तेचा दर्जा दिला.
🔵या कारणास्तव त्याचा उल्लेख रशियात व इतरत्र पीटर द ग्रेट (प्योत्र वेलिकी, महान पीटर) असा करतात.
🔴इ.स. १६८२ ते १७२५ या काळात पीटर रशियावर राज्य करत होता. त्याने उत्तरेकडच्या एका युद्धात स्वीडिश साम्राज्याचा पराभव केला . व स्वीडनकडील प्रदेश स्वतःच्या ताब्यात घेतले.
🔵ह प्रदेश बाल्टिक समुद्राला लागून असल्याने रशियाला समुद्रातून व्यापार करणे शक्य झाले.
🔴 बाल्टिक समुद्राला लागूनच पीटर द ग्रेटने *सेंट पीटर्सबर्ग* ही राजधानी उभारली.
🔵 एलिझाबेथ ही पीटर द ग्रेट ची मुलगी होती . पीटरनंतर गादीवर *एलिझाबेथ* बसली . तिच्या कारकीर्दीत रशियाने ७ वर्षीय युद्धात भाग घेतला, व पूर्व प्रशिया जिंकुन घेतले.
🔵कथेरिन दुसरी किंवा *"महान कॅथेरिन"* हिने रशियावर इ.स. १७६२-९६ या कालावधीत राज्य केले. हिचा कालखंड रशियाच्या प्रबोधनाचा कालखंड म्हणून ओळखला जातो.
🔴१९१४ चा विश्व युद्ध मध्ये पण रशीयन्स्नी बरेच देशांना मजा चाखावला होता .१९२२ आणि १९९१ सदीच्या मध्यात रशियाचा इतिहासला लोक ' *सोविएट युनिअन 'चा इतिहास* असे म्हणत होते .
*🎯सोव्हियेत रशिया-🎯*
सोव्हियेत संघ हा एक भूतपूर्व देश आहे. सोव्हियेत संघाची स्थापना ३० डिसेंबर १९२२ रोजी झाली व २६ डिसेंबर १९९१ रोजी त्याचे १५ देशांमध्ये विघटन झाले.
🔵सोव्हियेत संघ हा जगातील सर्वात विशाल देश होता.
🔴सोवियेत संघातल्या लहान मोठ्या सर्व नद्या धरून त्यांची एकूण संख्या एक लाखाच्यावर होती.
🔵जगातील सर्वात मोठ्या ९ नद्यांपैकी *ओब, येनिसी, लेना व अमूर* या ४ मोठ्या नद्या सोवियेत संघात होत्या.
*🔴आर्क्टिक* समुद्राचा सुमारे ४,००० मैलांचा समुद्र किनारा सोवियेत संघाला लाभला होता. वर्षातील बहुतेक वेळ हा समुद्र बर्फाच्छादित राहत असल्याने नौकानयनास तो फारसा उपयोगी नव्हता.
🔵समारे एक लाख पन्नास हजार चौरस मैल क्षेत्रफळ असलेला व चारही बाजुने भूमीने वेढलेला *कास्पियन* समुद्राला तर जगातील सर्वात मोठे सरोवर म्हणता येईल.
🔴सबेरियातील *बैकाल सरोवर* जगातील सर्वात खोल सरोवर ठरते. विशाल आणि विस्तृत पर्वतरांगाही सोवियेत संघाला लाभल्या होत्या.सोव्हियेत संघामध्ये एकूण १५ संघीय गणराज्ये होती.
🔵१९९१ साली सोव्हियेत संघाचे विघटन झाल्यानंतर ह्या १५ गणराज्यांचे रुपांतर १५ स्वतंत्र देशांमध्ये झाले.
आजाद हिंद सेनेची स्थापना
👑 भारताच्या स्वातंत्र्यचळवळीतील एक सर्वाधिक लोकप्रिय नेते सुभाषचंद्र बोस होत. १९३८ व १९३९ साली राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली.
👑 दसरे महायुध्द सुरू झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय चळवळ प्रखर करण्याचा आणि परकीयांची (म्हणजेच ब्रिटनच्या शत्रूराष्ट्रांची) मदत घेऊन स्वातंत्र्य प्राप्त करण्यात यावे, असा विचार मांडला.
👑 फसिस्ट राष्ट्रांना अन्य ज्येष्ठ नेत्यांचा प्रखर विरोध असल्याने, सुभाषचंद्र बोस यांचे त्यांच्याशी मतभेद झाले. त्याची परिणती म्हणजे नेताजींनी दिलेला राष्ट्रीय काॅंग्रेसचा राजीनामा आणि फॉरर्वड ब्लॉक या पक्षाची केलेली स्थापना.
👑 बरिटिशांविरूध्द उठाव करण्याच्या त्यांच्या प्रचारामुळे सरकारने त्यांना नजरकैदेत ठेवले, नजरकैदेतून शिताफिने निसटून ते प्रथम जर्मनीला आणि नंतर जपानला गेले.
👑 जयेष्ठ स्वातंत्र्यसेनानी रासबिहारी बोस यांनी १९४२ साली जपानच्या सहकार्याने आझाद हिंद सेने ची स्थापना केली.
👑 जपानमधील रासबिहारी बोस यांनी सिंगापूर, मलाया, ब्रम्हदेश येथील हिंदी लोकांचा हिंद स्वातंत्र्य संघ स्थापन केला. हिंदी सैन्यात राष्ट्रप्रेम निर्माण केले रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेंनेची स्थापना केली
👑 नताजींनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व करावे, अशी रासबिहारी बोस यांनी विनंती केल्याने त्यांनी त्यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारले.
👑 नताजींनी १९४३ आझाद हिंद सरकार ची स्थापना केली. आणि अमेरिका व इंग्लडविरूध्द युदध घोषित केले.
👑 आझाद हिंद सेनेने भारताला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. १८ ऑगस्ट १९४५ रोजी नेताजींचा अपघाती मृत्यू झाला व या सशस्त्र संघर्षाच्या पर्वाची समाप्ती झाली.
👑 आझाद हिंद सेनेच्या अधिकारी व सैनिकांवर राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात डांबन्यात आले.
____________________________________
महाराष्ट्राचा इतिहास
⭕️ मौर्य ते यादव ⭕️
(इ.स.पू. २२० ते इ.स. १३१०)
👉 मौर्य साम्राज्याचा काळ
महाराष्ट्राचा कोकण विभाग हा प्राचीन काळांत मौर्य साम्राज्याच्या (इ.स.पू. ३२१-१८४) हिस्सा होता. या काळात महाराष्ट्राने भरभराटीचा व्यापार आणि बौद्धधर्माचा विकास पाहिला. पण मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासाबरोबर महाराष्ट्रावरील मौर्य सत्ता संपुष्टात आली, आणि या प्रदेशावर निरनिराळ्या घराण्यांची सत्ता प्रस्थापित होऊ लागली.
👉 सातवाहन साम्राज्याचा काळ
सातवाहन हे महाराष्ट्राचे पहिले ज्ञात राजघराणे होय. त्यांचा काळ इ.स.पू. साधारणतः २२० ते इ.स. २२५ पर्यंतचा मानला जातो. अर्थात या कालखंडाबाबत मतभेद आहेत. प्रतिष्ठान अथवा पैठण ही त्यांची राजधानी आणि सिम्मुक सातवाहन हा या घराण्याचा मूळ पुरुष. महाराष्ट्राच्या राजकीय. सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने सातवाहनांचा कालखंड हा अतिशय महत्त्वाचा गणला जातो. सातव्या शतकातील हाल राजाने महाराष्ट्री प्राकृत भाषेत संकलित केलेले गाथासप्तशती हे काव्य ही सातवाहनांची साहित्याला मोठी देणगी. हिंदूंचा शालिवाहन शक सातवाहनांनीच सुरू केला.
👉 वाकाटकांचा काळ
वाकाटक (इ.स. २५० ते ५२५) राजांनी विदर्भ आपल्या वर्चस्वाखाली आणला होता. वाकाटक काळात राजाश्रयामुळे महाराष्ट्राची साहित्य, कला आणि धर्म या क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती झाली. अजिंठ्याची १६, १७, १९ या क्रमांकांची लेणी ही वाकाटक काळातील आहेत. भित्ति-चित्रांची कला या काळात अतिशय विकसित झाली होती.
👉 कलाचुरींचा काळ
वाकाटकांनंतर कलचुरी राजघराण्याने इसवी सनाच्या सहाव्या शतकात महाराष्ट्राच्या काही भागांवर राज्य केले. महिष्मती ही त्यांची राजधानी होती.
*👉 बदामी चालुक्य आणि कल्याणी चालुक्यांचा काळ
टकांचे महत्त्वाचे राजघराणे म्हणजे चालुक्यांचे. महाराष्ट्राचा भूप्रदेश त्यांच्याकडे इ.स. ५५० ते ७६० आणि इ.स. ९७३ ते ११८० या दोन कालखंडांत होता. जयसिंह हा या घराण्याचा संस्थापक आणि बदामी ही त्याची राजधानी. त्रैमहाराष्ट्रिकाचा स्वामी आणि या घराण्याचा सर्वश्रेष्ठ राजा दुसरा पुलकेशी याने नाशिक येथे आपले महत्त्वाचे ठाणे केले होते. चालुक्य राजे हिंदू धर्माचे अभिमानी होते त्यांनी मंदिरे बांधण्याच्या कामी मौलिक कामगिरी केली होती.
👉 वाकाटक, चालुक्य व राष्ट्रकूटांचा काळ
वाकाटकांच्या(इस.२५०-५२५) राज्यात विदर्भ समाविष्ट झाला. या कालखंडात कला, धर्म व तंत्रज्ञानात प्रगती होत गेली. सहाव्या शतकात बदामीच्या चालुक्यांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता आली. दंतिदुर्ग या राष्ट्रकूट राजाने इ.स. ७५३ च्या सुमारास चालुक्यांचा पराभव केला आणि गुलबर्गा जिल्ह्यातील मान्यखेत (मालखेड) आपली राजधानी बनविली. कल्याणी शाखेच्या तैलप चालुक्याने इ.स. ९७३ च्या सुमारास राष्ट्कूटांची सत्ता संपुष्टात आणून चालुक्यांची राजवट दुसऱ्यांदा प्रस्थापित केली. वेरूळ येथील जगप्रसिद्ध कैलास लेणे हे पहिला कृष्ण या राष्ट्रकूट राजाने बांधले.
👉 यादवांचा काळ
महाराष्ट्राच्या काही भागावर कल्याणीच्या चालुक्यांची सत्ता इ.स.११८९ पर्यंत टिकली. यादवांनी त्यांचा पराभव केला व इ.स. १३१०पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. गोव्याचे कदंब, कोकण आणि कोल्हापूर येथील शिलाहार राजे हे चालुक्य आणि राष्ट्रकूट यांचे मांडलिक म्हणून राज्य करीत होते. यादवांनी त्यांची सत्ता संपुष्टात आणली. यादवांनी महाराष्ट्राचा बराचसा भाग आपल्या आधिपत्याखाली आणला होता. यादव राजांनी धार्मिक सहिष्णुतेचे धोरण अवलंबिले होते. त्यांनी मराठी भाषेला राजाश्रय दिला आणि तिला राजभाषेचा दर्जा प्राप्त करून दिला. भक्तिसंप्रदायाचे उद्गाते आणि महाराष्ट्राचे सर्वश्रेष्ठ संतकवी ज्ञानेश्वर महाराज हे याच यादव काळात उदयास आले. नवव्या शतकात नाशिक जिल्ह्यांतील चांदोर या ठिकाणी यादवांची पहिली राजधानी होती. इ.स. ११८७ च्या सुमारास भिल्लम राजाने ती देवगिरी येथे आणली.
प्राचीन भारत इतिहास:
* वेद काल
०१. गुत्समद, विश्वमित्र, वामदेव, भारद्वाज, अत्री आणि वशिष्ट या ऋषींनी सुक्त अथवा मंत्रांची रचना केली आहे. लोपामुद्रा, घोष, शची आणि पौलोमी या प्रमुख ऋष्निया आहेत.
०२. आयुर्वेद हा ऋग्वेदाचा, धनुर्वेद हा यजुर्वेदाचा, गंधर्ववेद हा सामवेदाचा, शिल्पवेद हा अथर्ववेदाचा उपवेद आहे. सामवेद कौथुम, रणायानीय आणि जैमिनीय तीन शाखांमध्ये विभागलेला आहे.
०३. आचार्य अश्वनी कुमार, धन्वंतरी, बाणभट्ट, सुश्रुत, माधव, जीवन व लोलींबराज हे आयुर्वेदाचे रचनाकार आहेत.
०४. ऐतरेय व कौशित्की हे ऋग्वेदाचे दोन ब्राह्मण आहेत. तैत्तरीय हा कृष्ण यजुर्वेदाचा तर शतपथ हा शुक्ल यजुर्वेदाचा ब्राह्मण आहे. तांडव, पंचविश, सद्विश, छांदोग्य हे सामवेदाचे ब्राह्मण आहेत.
०५. आरण्यकामध्ये आत्मा. मृत्यू, जीवन यांचे वर्णन केलेले आहे. ऐतरेय व कौशित्की हे ऋग्वेदाचे दोन आरण्यक आहेत. ऐतरेय आरण्यकाचे रचनाकार महिदास ऐतरेय आहेत. तैत्तरीय हा कृष्ण यजुर्वेदाचा आरण्यक आहे. सामवेद आणि अथर्ववेदाला आरण्यक नाही.
०६. ईश, केन, कठ, प्रश्न, मुंडक, मांडुक्य, तैत्तरीय, ऐतरेय, छान्दोक्य, वृहदारण्यक, श्वेताश्वतर, कौशित्की, महानारायण इत्यादी प्रमुख उपनिषद आहेत.
* ऋग्वैदिक काळ
०७. ऋगवैदिककाळात गळ्यात 'निष्क', कानात 'कर्णशोभन' आणि कपाळावर 'कुंभ' नावाची आभूषणे परिधान केली जात.
०८. ऋगवैदिककाळात गाय, म्हैस, शेळ्या, घोडा, हत्ती आणि उंट या प्राण्यांचे आर्यांद्वारे पालन केले जात असे.
०९. ऋगवैदिककाळात भीषज चिकित्सेचे कार्य करीत असे.
१०. ऋगवैदिककाळात आर्य सूर्याची उपासना करीत असे. सूर्याला सविता मित्र, पूषण तसेच विष्णूचा अवतार मानले जात असे. सूर्याला देवतेचे नेत्र असे संबोधले जात असे.
११. ऋगवैदिककाळात अग्नीला देवतेचे मुख असे म्हटले जात असे. अग्नीला आर्यांचे पुरोहित असे मानले गेले आहे. आर्यांचा विचार होता कि यज्ञातील आहुती अग्नी देवतेपर्यंत पोहोचवीत असे. त्या काळात वरून देवतेला आकाश देवतेच्या रुपात पुजिले जात असे.
१२. ऋगवैदात उषा, सीता, पृथ्वी, अरण्यांनी, रात्री यांची आराधना देवीच्या रुपात केली गेली आहे. कृषी संबंधित देवी म्हणून सीतेचा उल्लेख गोमील गृह्य सूत्र तसेच परस्पर गृह्य सूत्रांमध्ये झाला आहे.
१३. ऋगवैदिककाळात व्यापाऱ्यांना 'पणि' म्हटले जात असे. हे लोक आर्यांच्या पाळीव पशूंची चोरी करत असत. 'पणि' लोकांपेक्षा जास्त हेटाळनी 'दस्यू' लोकांची होत असे. 'दस्यू' काळ्या रंगाचे, यज्ञ विरोधी व शिश्नदेवाचे पूजक होते.
१४. ऋगवैदिककाळात गाय ही अर्थव्यवस्थेचा कणा होती.
१५. ऋगवैदिककाळात गायीला 'अधन्या', युद्धाला 'गलिन्टी', पाहुण्यांना 'मोहन' आणि पुत्रीला 'दुहीन्ति' असे संबोधले जात असे.
१६. ऋगवैदात 'वशिष्ठ' यांना उर्वशीचा मानसपुत्र तसेच वरुणाच्या वीर्यातून एका मातीच्या घागरीतून जन्मलेला म्हटले जाते. अगस्त्य यांना सुद्धा मातीच्या घागरीतून जन्मलेला असे म्हटले जाते.
१७. बल्बुभ तसेच तरुक्ष द्वास हे सरदार होते. पुरोहितांना दानधर्म करून आर्य समाजात त्यांनी उच्च स्थान प्राप्त केले होते.
१८. ऋग्वेदात इंद्राचा सर्वात जास्त वेळेस उल्लेख केला आहे. त्याच्या खालोखाल वरुणाचा उल्लेख केलेला आहे. प्रजापतीचा उल्लेख आदी पुरुष म्हणून केलेला आहे. देवता हे त्याचेच वंशज होते.
१९. ऋग्वेदात राजाचा उल्लेख 'गोप्ता जनस्य' असा आहे. ऋग्वेदात भूमी अधिकाऱ्याला 'व्राजपति', सैन्य अधिकाऱ्याला 'ग्रामणी' आणि कुटुंबाच्या प्रमुखाला 'कुलूप' असे संबोधले जात असे.
२०. 'सोम' हा वनस्पतींचा देवता होता. सोम हे एक मादक पेयसुद्धा होते. ज्याच्या बनविण्याचा विधी ऋग्वेदात सांगितला आहे.
* उत्तर वैदिककाळ
२१. उत्तर वैदिक कालीन साहित्य इसवी सन पूर्व ११०० ते ६०० या काळात रचलेले आहे. या काळात मातीचे चित्रित भांडी व लोखंडाच्या औजारांचा वापर केला जात असे. पूर्व वैदिक काळातील मुख्य धान्य बार्ली होते पण उत्तर वैदिक काळात मुख्य धान्य उत्पादन भात व गहू होते.
२२. उत्तर वैदिक काळात राजांनी राजसूय यज्ञ, अश्वमेध यज्ञ व वाजपेय यज्ञ करायला सुरुवात केली.
२३. उत्तर वैदिक काळात गोत्र परंपरा तसेच गोत्राच्या बाहेर लग्न करण्याची परंपरा सुरु झाली.
२४. उत्तर वैदिक काळाच्या साहित्यात तीन आश्रमांचा उल्लेख मिळतो. ब्रह्मचर्य, गृहस्थ व वानप्रस्थ. सन्यास आश्रमाचा स्पष्टपणे उल्लेख आढळत नाही.
२५. उत्तर वैदिक काळात 'सोम' वनस्पती मिळेनासे झाल्याने. दुसऱ्या पेयांचा प्रयोग करण्यास सुरुवात झाली.
२६. उत्तर वैदिक काळात सोने व चांदीचा उपयोग आभूषणे व भांडी बनविण्यासाठी केला जात असे. तर इतर धातूंचा वापर इतर उपकरणे बनविण्यासाठी केला जात असे.
२७. उत्तर वैदिक काळात व्यापाऱ्यांनी आपआपले गट तयार केले होते. आर्यांच्याद्वारे समुद्रव्यापार सुद्धा केला जात असे. व्यापारासाठी निष्क, शतमान आणि कृष्णाल या मुद्रांचा वापर केला जात असे.
२८. उत्तर वैदिक काळात ऋग्वैदिक काळाच्या तुलनेत धर्म
भारतात आल्यानंतर गांधीजींनी सुरू केलेल्या चळवळी....
▪️ चंपारण्य सत्याग्रह (सन 1917) :-
🔗 चपारण्य (बिहार) भागातील निळीच्या मळ्यात काम करणार्या गरीब शेतकर्यांवर यूरोपियन मळेवाल्याव्दारे होणारा अन्याय दूर करण्याकरिता गांधीजींनी चंपारण्य चळवळ सुरू केली..
▪️ साराबंधी चळवळ (सन 1918) :-
🔗 1918 गुजरातमधील खेडा जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडून मोठ्या प्रमाणात दुष्काळामुळे पिके बुडाली असतांना ब्रिटिश अधिकारी शेतकर्याकडून जबरदस्तीने शेतसारा वसूल
करीत असत..
🔗 गांधीजींनी शासनाच्या या कृती विरुद्ध खेडा येथे साराबंदी चळवळ सुरू केली..
🔗 शासनाने गांधीजींच्या चळवळीची दखल घेऊन दुष्काळग्रस्त भागात जमीन महसूल वसुलीला स्ग्थगिती देण्याचा निर्णय घेतला..
🔗 हा गांधीजीचा दूसरा विजय होता..
▪️रौलॅक्ट अॅक्ट किंवा काळा कायदा सत्याग्रह (सन 1919) :-
🔗 भारतातील राष्ट्रीय आंदोलन व क्रांतिकारी चळवळीला प्रतिबंध घालण्याकरिता ब्रिटिश शासनाने सर सिडने रौलेट यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या शिफारसीवरून अनार्काकल अँड रिव्हॉल्युशनरी क्राईम अॅक्ट पास केला..
🔗 या कायद्यातील तरतुदीनुसार कोणत्याही व्यक्तिला विना चौकशी अटक करण्याचा व त्याच्यावर तात्काळ खटला चालविण्याचा अधिकार शासनाला प्राप्त झाला होता..
🔗 या रौलॅक्ट कायद्याबद्दल निषेध करण्याकरिता 6 एप्रिल 1919 हा दिवस संपूर्ण भारतभर बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला..
🔗 हा काँग्रेसमार्फत पाळण्यात आलेला पहिला अखिल भारतीय
बंद होय..
🔗 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसरमधील जालियनवाला बागेत रौलेट कायद्याच्या निषेधार्थ सभा बोलाविण्यात आली..
🔗 या सभेवर जनरल डायर नावाच्या अधिकार्याने नीरपराध लोकांवर गोळीबार केला.
पंतप्रधान मोदी यांना जी ७ परिषदेसाठी निमंत्रण.
🔰या वर्षांच्या मध्यात ब्रिटनच्या किनारी भागातील कॉर्नवॉल येथे होणाऱ्या जी ७ राष्ट्रांच्या परिषदेसाठी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी त्यांचे भारतीय समपदस्थ नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिले आहे. ही उच्चस्तरीय परिषद ११ ते १३ जून या कालावधीत ब्रिटनच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
🔰या बहुपक्षीय परिषदेतील पाहुणे देश म्हणून गेल्या वर्षी दक्षिण कोरिया व ऑस्ट्रेलिया यांच्यासोबतच भारताची निवड करण्यात आली, त्या वेळी जॉन्सन यांनी मोदी यांना दूरध्वनीवरून परिषदेत सहभागाचे निमंत्रण दिले होते. त्याची औपचारिक घोषणा रविवारी करण्यात आली.
🔰या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात जॉन्सन हे प्रमुख पाहुणे होते, मात्र करोनाच्या संकटामुळे त्यांची ही भेट रद्द करण्यात आली. त्यानंतर जी ७ परिषदेपूर्वी भारताला भेट देण्याचा मनोदय जॉन्सन यांनी व्यक्त केला. ‘ग्रुप ऑफ सेव्हन’ किंवा जी ७ राष्ट्रांच्या गटात ब्रिटन, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान व अमेरिका यांचा समावेश आहे. जगातील सर्वाधिक प्रभावशाली व खुल्या समाजांना घनिष्ट चर्चेसाठी एकत्र आणणारे खुले व्यासपीठ असे त्याचे वर्णन करण्यात येते. या वर्षीच्या चर्चेत करोनाच्या महासाथीचा विषय प्रामुख्याने असण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशन
1) 1885- मुंबई - व्योमेश्चंद्र बॅनर्जी- या अधिवेशनात 72 प्रतिनिधी उपस्थित होते.
2)1886 -कलकत्ता -दादाभाई नौरोजी -पहिले पारसी अध्यक्ष
3)1887 -मद्रास -बद्रुदीन तैय्यबजी -पहिले मुस्लीम अध्यक्ष
4)1888 -अलाहाबाद - जॉर्ज यूल -पहिले ब्रिटीश अध्यक्ष
5)1889- मुंबई- सर विल्यम वेडनबर्ग - दुसरे ब्रिटीश अध्यक्ष
7) 1891 - नागपूर - पी आनंद चार्लू
11) 1895 -पुणे -सुरेंद्रनाथ बॅनर्जी - ICS परीक्षा भारतात घेतली.
12) 1896 -कलकत्ता- महमद रहिमतुल्ला सयानी -वंदे मातरम टागोरांनी गायले.
16) 1900 - लाहोर - एन.जी. चंदावरकर - पहिले मराठी अध्यक्ष
22) 1906 -कलकत्ता -दादाभाई नौरोजी स्वराज्य शब्दाचा स्विकार तसेच चतुसुत्रीचा स्विकार केला.
23) 1907 -सुरत -रासबिहारी घोष - मवाळ व जहाल यांच्यात पहिली फुट
26) 1911 - कलकत्ता बिशण नारायण धर - जण-गण-मन टागोरांनी गायले.
31) 1916 - लखनौ - अंबिका चरण मुजूमदार ऐक्य -करार/लखनौ करार
32) 1917 - कलकत्ता -अॅनी बेझंट पहिल्या महिला अध्यक्ष
35) 1920 - नागपूर - सी विजय राघवाचार्य- काँग्रेसच्या घटनेत बदल
39) 1924- बेळगाव -महात्मा गांधी एकदाच अध्यक्ष
40) 1925 -कानपूर -सरोजिनी नायडू - पहिली भारतीय महिला अध्यक्षा
43) 1926 - कलकत्ता -मोतीलाल नेहरू - वसाहतीची मागणी, पहिले युवक अधिवेशन
44) 1929 -लाहोर -जवाहरलाल नेहरू - पूर्ण स्वराज्याची मागणी
50) 1936 - फैजपूर - जवाहलाल नेहरू - ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन
51) 1938 -हरिपूरा -सुभाषचंद्र बोस - पटट्भी सितारामय्याचा पराभव
52) 1939 -त्रिपुरा - सुभाषचंद्र बोस/ राजेंद्र प्रसाद मवाळ व जहाल यांच्यात दुसरी फुट
53) 1940 - रामगड -अब्दुल कलाम आझाद - सर्वात जास्त काळ व सर्वात तरूण अध्यक्ष
61) 1955 - आवडी -यू.एन.ढेबर समाजवादाचा ठराव मांडला
--------------------------------------------
भारत में बैंकों का स्थापना वर्ष
👉 बक आॅफ हिन्दुस्तान =1770 में
👉इलाहाबाद बैंक =1865 में
👉 अवध काॅमर्शिल बैंक = 1881 में
👉 पजाब नेशनल बैंक =1894 में
👉 कनरा बैंक =1906 में
👉 बक आॅफ इंडिया = 1906 में
👉 काॅरपोरेशन बैंक = 1906 में
👉 इडियन बैंक =1907 में
👉 पजाब एंड सिंधी बैंक = 1908 में
👉 बक आॅफ बड़ौदा= 1908 में
👉 सट्रल बैंक आॅफ इंडिया =1911 में
👉 यनियन बैंक आॅफ इंडिया =1919 में
👉 इम्पीरियल बैंक =1921में
👉 आध्रा बैंक = 1923 में👉 सिंडीकेट बैंक = 1925 में
👉 विजया बैंक =1931 में
👉 रिजर्व बैंक आॅफ इंडिया =1935में
👉 बक आॅफ महाराष्ट्र =1935में
👉 इडियन ओवरसीज बैंक =1937 में
👉 दना बैंक =1938 में
👉 ओरिएंटल बैंक आॅफ काॅमर्स =1943में
👉 यको बैंक =1943 में
👉 यनाइटेड बैंक आॅफ इंडिया = 1950 में
👉 सटेट बैंक आॅफ इंडिया =1955 में
👉 ICICI बैंक = 1994 में
👉 HDFC बैंक = 1994 में
👉 IDBI बैंक =1964 में
👉 एक्सिस बैंक = 2007 में
चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे
प्रश्न१०१) कोणत्या व्यक्तीला मध्यम व दीर्घ अंतर शर्यतीसाठी भारतीय धावपटूंच्या संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली?
उत्तर :- निकोलाई स्नेसारेव
प्रश्न१०२) कोणती व्यक्ती वर्तमानात भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) आहे?
उत्तर :- अजित डोवाल
प्रश्न१०३) कोणत्या देशात लेणीमध्ये चित्रित केलेले जगातले सर्वात प्राचीन ज्ञात भित्तिचित्र शोधले गेले?
उत्तर :- इंडोनेशिया
प्रश्न१०४) कोणत्या अंतराळ संस्थेने ‘पार्कर’ नामक सौरयान तयार केले आहे?
उत्तर :- नासा
प्रश्न१०५) कोणत्या मंत्रालयाला ‘स्कॉच चॅलेंजर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
उत्तर :- आदिवासी विकास मंत्रालय
प्रश्न१०६) कोणत्या व्यक्तीने सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन (SCBA) याच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला?
उत्तर :- दुष्यंत दवे
प्रश्न१०७) कोणत्या सॉफ्टवेअर कंपनीने आर्थिक समावेशाला प्रोत्साहन देण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेसोबत करार केला?
उत्तर :- फायनॅनष्यल सॉफ्टवेअर अँड सिस्टीम्स
प्रश्न१०८) कोणत्या व्यक्तीची इंटेल कंपनीचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक झाली?
उत्तर :- पॅट जेलसिंगर
प्रश्न१०९) भारतीय संविधानातल्या कोणत्या कलमान्वये ‘सुओ मोतू’च्या अधिकाराची तरतूद आहे?
उत्तर :- कलम 32 आणि कलम 226
प्रश्न११०) कोणत्या देशात ‘सुलावेसी बेट’ आहे?
उत्तर :- इंडोनेशिया
चालू घडामोडी
१. शांघाई सहयोग संघटन (SCO) - २०२० चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे ?
A) किर्गिजस्तान
B) रशिया
C) चीन
D) भारत
Correct Answer D
भारत
२. शांघाई सहयोग संघटन मध्ये भारताने पूर्ण सदस्यत्व कधी स्वीकारले ?
A) ९ जून २०१६
B) ९ जून २०१९
C) ९ जून २०१७
D) ९ जून २०१८
Correct Answer C
९ जून २०१७
३.सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस हा म्हणून __साजरा केला जातो?
A) भारतीय प्रवासी दिन
B) राष्ट्रीय एकता दिन
C) राष्ट्रीय युवा दिन
D) राष्ट्रीय शांतता दिन
Correct Answer B
राष्ट्रीय एकता दिन
४. " DPD" चे संक्षिप्त रुप काय आहे ?
A) डायरेक्ट पोर्ट डिलीव्हरी
B) डूअर पोर्ट डिलीव्हरी
C) डायरेक्ट पार्सल डिलीव्हरी
D) डायरेक्ट पार्टी डिलीव्हरी
Correct Answer A
डायरेक्ट पोर्ट डिलीव्हरी
५. अमेरिकेच्या "स्टॅच्यू ऑफ लिबर्टी" ची उंची ९३ मीटर आहे तर, भारतातील स्टैच्यू ऑफ़ यूनिटी ची उंची किती मीटर आहे ?
A) १७२
B) १९८
C) १९०
D) १८२
Correct Answer D
१८२
६. १९६२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाला सुवर्णपदक जिंकून देणारे महान फुटबॉल पटू यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय टपाल विभागाने तिकीट जारी केले?
A) चुनी गोस्वामी
B) गोशतो पॉल
C) तालिमेरेन आओ
D) वरीलपैकी सर्व
Correct Answer A
चुनी गोस्वामी
७. 'आयसीसी ' युवा (१९ वर्षाखालील ) विश्व चषक क्रिकेट-२०२० स्पर्धा कोठे होणार आहे ?
A) इंग्लंड
B) द. आफ्रिका
C) ऑस्ट्रेलिया
D) वेस्ट इंडिज
Correct Answer B
द. आफ्रिका
८. " रायसीना डायलॉग " हा दोन दिवसीय कार्यक्रम कोठे आयोजित करण्यात आला?
A) मध्य प्रदेश
B) दिल्ली
C) हरियाणा
D) मुंबई
Correct Answer B
दिल्ली
९. शांघाई सहयोग संघटनेच्या आठ आश्चर्यमध्ये भारतातील कोणत्या स्थळांचा समावेश करण्यात आला?
A) सुवर्ण मंदिर
B) नालंदा विद्यापीठ
C) ताज महाल
D) स्टैच्यू ऑफ़ यूनिटी
Correct Answer D
स्टैच्यू ऑफ़ यूनिटी
१०. शांघाई सहयोग संघटन चे मुख्यालय कोठे आहे ?
A) इस्लामाबाद (पाकिस्तान)
B) मास्कोव (रशिया)
C) बीजिंग (चीन)
D) दिल्ली (भारत)
Correct Answer C
बीजिंग (चीन)
कोणत्या देशाने चंद्रावरचे खड्यांचे नमुने गोळा करण्यासाठी पहिले यान यशस्वीरित्या प्रक्षेपित केले?
(अ) जपान
(ब) भारत
(क) रशिया
(ड) चीन✔️✔️
पुढीलपैकी कोणत्या भारतीय खेळाडूला आयसीसी प्लेअर ऑफ द दशक पुरस्कारासाठी नामित केले गेले आहे?
(अ) विराट कोहली✔️✔️
(ब) रोहित शर्मा
(क) एम.एस धोनी
(ड) युवराज सिंग
नुकतेच निवारा चक्रीवादळाने - 25 नोव्हेंबर रोजी कोणत्या राज्यात / केंद्र शासित प्रदेशात किनाऱ्यावर कहर निर्माण करू शकते?
(अ) केरळ, लक्षद्वीप
(ब) पश्चिम बंगाल, अंदमान आणि निकोबार बेटे
(क) तामिळनाडू, पुडुचेरी✔️✔️
(ड) पुडुचेरी, ओडिशा
कोणत्या अभिनेत्याला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून आंतरराष्ट्रीय एम्मी पुरस्कार 2020 जिंकले आहे?
(अ) बिली बॅरेट✔️✔️
(ब) गिडो कॅप्रिनो
(क) अर्जुन माथुर
(ड) यापैकी नाही
महिलांवरील हिंसाचार निर्मूलनाचा आंतरराष्ट्रीय दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो?
(अ) 18 नोव्हेंबर
(ब) 23 नोव्हेंबर
(क) 24 नोव्हेंबर
(ड) 25 नोव्हेंबर✔️✔️
28 फेब्रुवारी 1909 रोजी, ___________ येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला?
(अ) न्यूयॉर्क✔️✔️
(ब) बर्मिंगहॅम
(क) सिडनी
(ड) जिनिव्हा
____________हे वर्ष युनोने जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले?
(अ) वर्ष 1970
(ब) वर्षे 1975✔️✔️
(क) वर्षे 1980
(ड) वर्षे 1985
8 मार्च हा जागतिक महिला-दिन' म्हणून स्वीकारावा असा ठराव __ यांनी मांडला, तो पास झाला?
(अ) इंदिरा गांधी
(ब) फ़्लोरेन्स नाइटिंगेल
(क) क्लारा झेटकिन✔️✔️
(ड) क्लारा बार्टन
:ला-लीगा फुटबॉल-2020 स्पर्धेत कोणाला जेतेपद मिळले?
(अ) रेयाल माद्रिद
(ब) बार्सिलोना ✔️✔️
(क) रिअल बेटीस
(ड) सेल्टा व्हिगो
यंदाच्या हंगामात प्रभावी ठरू न शकलेल्या बार्सिलोनाने ला-लीगा फुटबॉल-2020 स्पर्धेत या विजयासह कितवे स्थान मिळवले आहे.
(अ) सातवे✔️✔️
(ब) आठवे
(क) नववे
(ड) दहावे
मानव शरीर से जुडें जरुरी तथ्य
Que : लाल रक्त कण [Red Blood Cells] का निर्माण होता है ??
Ans - अस्थिमज्जा में
Que : लाल रक्त कण का जीवन काल ?
Ans - 120 दिन
Que : श्वेत रक्त कण [White Blood Cell] का जीवन काल ?
Ans - 1 से 4 दिन
Que : श्वेत रक्त कण [White Blood Cell] को कहा जाता है ?
Ans - ल्यूकोसाइट Leukocytes
Que : लाल रक्त कण [Red Blood Cells] को कहा जाता है ?
एरिथ्रोसाइट Erythrocytes
Que : शरीर का ताप नियंत्रक होता है ?
Ans - हाइपोथैलमस ग्रंथि Hypothalamus Gland
Que : मनुष्य [Human] की सर्वदाता रक्त समूह (Universal Donor) ?
Ans - O
Que : मनुष्य की सर्वग्राही रक्त समूह (Universal Receptor) ?
Ans - AB
Que : रक्तचाप [Blood Pressure] मापने की यंत्र को कहा जाता है ?
Ans - स्फिग्मोमैनोमीटर Sphygmomanometer
Que : ‘ब्लड बैंक [Blood Bank] ‘ कहलाता है ?
Ans - प्लीहा (Spleen)
Que : भोजन का पाचन प्रारंभ होता है ?
Ans - मुख से
Que : पचे हुए भोजन का अवशोषण होता है ?
छोटी आँत Small Intestine में
Que : पित (Bile) स्त्रावित होता है ?
Ans - यकृत Liver द्वारा
Que : विटामिन ‘ए‘ [Vitamin 'A'] संचित होता है ?
Ans - यकृत में
Que : शरीर की सबसे बड़ी ग्रंथि [Largest Gland] ?
Ans - यकृत (लीवर)
Que : सबसे छोटी ग्रंथि [Small Gland] (मास्टर ग्रंथि) ?
Ans - पिट्यूटरी
Que : मनुष्य में पसलियाँ [Ribs] की संख्या होती है ?
Ans - 12 जोड़ी
Que : शरीर में हड्डियों [Bones] की कुल संख्या है ?
Ans - 206
Que : शरीर में मांसपेशियों [Muscles] की कुल संख्या ?
Ans - 639
Que : लार [Saliva] में पाया जाने वाला एन्जाइम [Enzyme] होता है ?
Ans - टायलिन Taylin
Que : लिंग निर्धारण कहां से होता है ?
Ans - पुरूष क्रोमोसोम Men Chromosomes पर
Que : मनुष्य का हृदय [Human Heart] होता है ?
Ans - चार कोष्ठीय
Que : शरीर में गुणसूत्रों (Chromosomes) की संख्या पाई जाती है ?
Ans - 46
Que : शरीर का सबसे बड़ा अंग [Largest Organ] ?
Ans - त्वचा
Que : शरीर की सबसे बड़ी कोशिका ?
Ans - तंत्रिका तंत्र
Que : शरीर में अमीनों अम्ल [Amino Acids] की संख्या ?
Ans - 22
Que : शरीर में प्रतिदिन मूत्र [Urine] बनता है ?
Ans - 1.5 लीटर
Que : मूत्र दुर्गंध देता है, क्योंकि ?
Ans - यूरिया Urea के कारण
Que : मानव मूत्र (अम्लीय) का PH मान है ?
Ans - 6
Que : शरीर का सामान्य तापमान होता है ?
Ans - 98.6 डिग्री फेरेनहाइट 'या' 37 डिग्री सेल्सियस 'या' 310 केल्विन
Que : मानव शरीर में टीबिया [Tibia] नामक हड्डी पायी जाती है ?
Ans - पैरों में
Que : दाँतों और हड्डियों की संरचना के लिये आवश्यक तत्व है ?
Ans - कैल्सियम एवं फाॅस्फोरस
Que : रूधिर को थक्का जमने [Blood Clot] में सहायक होता है ?
Ans - प्लेटलेट्स Platelets
Que : मस्तिष्क तथा सिर के अध्ययन से संबंधित है ?
Ans - फ्रेनोलाॅजी Phrenology
Que : श्वसन के दौरान सर्वाधिक मात्रा में ली गई गैस होती है ?
Ans - नाइट्रोजन
Que : जीवित जीवाश्म [Abundant Gas] कौन होता है ?
Ans - साइकस
Que : मीनीमाता रोग किसके कारण होता है ?
Ans - जल में मरकरी के प्रदूषण से
Que : मानव त्वचा [Human Skin] का अध्ययन करने वाली विज्ञान क्या कहलाती है ?
Ans - डर्मेटोलाॅजी Dermatologist
Que : कीड़ों के अध्ययन करने वाली विज्ञान को कहा जाता है ?
Ans - एण्टोमोलाॅजी Entomology
Que : पित्त [Bile] किस अंग के द्वारा पैदा किया जाता है ?
Ans - यकृत Liver
Que : मानव शरीर में रूधिर बैंक [Blood Bank] का कार्य कौन करता है ?
Ans - तिल्ली Spleen
Que : शरीर में हीमोग्लोबिन [Hemoglobin] का कार्य होता है ?
Ans - आॅक्सीजन का परिवहन
Que : हीमोग्लोबिन [Hemoglobin] में क्या होता है ?
Ans - लोहा
Que : मानव शरीर में खून किसके उपस्थित के कारण नहीं जमता है ?
Ans - हिपेरिन Hiperin
Que : रूधिर के प्लाज्मा में किसके द्वारा एण्टीबाॅडी निर्मित होती है ?
Ans - लिम्फोसाइट Lymphocytes
Que : लाल रक्त कणिकाओं [RBC] का श्मसान कहा जाता है ?
Ans - प्लीहा को
Que : क्रेब्स चक्र [Krebs Cycle] में किसका संश्लेषण होता है ?
Ans - पाइरूविक अम्ल Pyruvic Acid
Que : मानव शरीर में यूरिया का निर्माण कहाँ होता है ?
Ans - यकृत
Que : रक्त की अशुद्धियाँ किस अंग में जाकर छनती है ?
Ans - वृक्कों में
Que : श्वसन की क्रिया कहाँ सम्पन्न होती है ?
Ans - माइट्रोकाॅण्ड्रिया Mitochondria
राष्ट्रीय पहचान के प्रतीक प्रतीक व चिन्ह का नाम
❇️ भारत का राष्ट्रीय ध्वज :- तिरंगा
❇️ भारत का राष्ट्रीय गान :- जन-गन-मन
❇️ भारत का राष्ट्रीय गीत :- वन्दे मातरम्
❇️ भारत का राष्ट्रीय चिन्ह :- अशोक स्तम्भ
❇️ भारत का राष्ट्रीय पंचांग :- शक संवत
❇️ भारत का राष्ट्रीय वाक्य :- सत्यमेव जयते
❇️ भारत की राष्ट्रीयता :- भारतीयता
❇️ भारत की राष्ट्र भाषा :- हिंदी
❇️ भारत की राष्ट्रीय लिपि :- देव नागरी
❇️ भारत का राष्ट्रीय ध्वज गीत :- हिंद देश का प्यारा झंडा
❇️ भारत का राष्ट्रीय नारा :- श्रमेव जयते
❇️ भारत के राष्ट्र पिता :- महात्मा गाँधी
❇️ भारत की राष्ट्रीय विदेश नीति :- गुट निरपेक्ष
❇️ भारत का राष्ट्रीय पुरस्कार :- भारत रत्न
❇️ भारत का राष्ट्रीय सूचना पत्र :- श्वेत पत्र
❇️ भारत का राष्ट्रीय वृक्ष :- बरगद
❇️ भारत की राष्ट्रीय मुद्रा :- रूपया
❇️ भारत की राष्ट्रीय नदी :- गंगा
❇️ भारत का राष्ट्रीय पक्षी :- मोर
❇️ भारत का राष्ट्रीय पशु :- बाघ
❇️ भारत का राष्ट्रीय फूल :- कमल
❇️ भारत का राष्ट्रीय फल :- आम
❇️ भारत की राष्ट्रीय योजना :- पञ्च वर्षीय योजना
❇️ भारत का राष्ट्रीय खेल :- हॉकी
❇️ भारत की राष्ट्रीय मिठाई :- जलेबी
❇️ भारत के राष्ट्रीय पर्व :- 26 जनवरी (गणतंत्र दिवस), 15 अगस्त (स्वतंत्रता दिवस), 2 अक्तूबर (गाँधी जयंती)
❇️ भारत का राष्ट्रीय पकवान :- खिचड़ी
बायडेन प्रशासनात भारतीय वंशाच्या २० व्यक्ती.
अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष जो बायडेन यांचा शपथविधी २० जानेवारीला होत असून त्यांच्या प्रशासनात किमान २० भारतीय अमेरिकी व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. त्यात १३ महिला आहेत. एकूण १७ जण महत्त्वाच्या पदांवर नेमले गेले आहेत.
कमला हॅरिस या प्रथमच देशाच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. हॅरीस (वय ५६) या पहिल्या भारतीय वंशाच्या तसेच आफ्रिकन अमेरिकन उपाध्यक्ष आहेत. इतर प्रमुख व्यक्तींमध्ये व्हाइट हाऊस कार्यालयातील अर्थसंकल्प संचालक नीरा टंडन, अमेरिकेचे महाशल्यचिकित्सक डॉ. विवेक मूर्ती, न्याय खात्यातील सहायक महाधिवक्ता वनीता गुप्ता, नागरी सुरक्षा व मानवी हक्क खात्यातील उझरा झेया यांचा समावेश आहे.
माला अडिगा यांची प्रथम महिला डॉ. जिल बायडेन यांच्या सचिवपदी नेमणूक करण्यात आली आहे. गरिमा वर्मा यांची जिल यांच्या डिजिटल संचालक म्हणून नेमणूक केली आहे, तर सब्रिना सिंह यांना उप प्रसिद्धी सचिव नेमण्यात आले आहे. पहिल्यांदाच भारतीय अमेरिकी व्यक्तींपैकी काश्मिरी आयशा शहा यांची व्हाइट हाऊसमध्ये नेमणूक झाली आहे, तर समीरा फाझिली यांना राष्ट्रीय अर्थ मंडळात उपसंचालक पद मिळाले आहे.
भारत राममूर्ती यांनाही उपसंचालकपद मिळाले आहे. गौतम राघवन यांची अध्यक्षीय कोर्यालयात उपसंचालकपदी नियुक्ती झाली आहे. विनय रेड्डी, वेदांत पटेल, तरुण छाब्रिया, सुमोना गुहा, शांथी कलाथिल, सोनिया अग्रवाल विदुर शर्मा,नेहा गुप्ता, रीमा शहा यांच्याही नेमणुका झाल्या आहेत.