Thursday 21 April 2022

श्री. पी. व्ही. नरसिंह राव

श्री. पी. व्ही. नरसिंह राव

June 21, 1991- May 16, 1996 | Congress (I)
श्री. पी. व्ही. नरसिंह राव

पी. रंगराव यांचे सुपूत्र असलेले पी.व्ही.नरसिंह राव यांचा जन्म 28 जून 1921 रोजी करीमनगर येथे झाला. उस्मानिया विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि नागपूर विद्यापीठात त्यांनी शिक्षण घेतले. श्री. पी.व्ही. नरसिंह राव यांना तीन मुलगे आणि पाच मुली आहेत.
शेतकरी आणि वकील असूनही त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि काही महत्त्वाची मंत्रिपदे भूषवली. आंध्र प्रदेश सरकारमध्ये त्यांनी 1962-64 या काळात कायदा आणि माहिती मंत्री, 1964-67 या काळात कायदा आणि धर्मादाय मंत्री, 1967 मध्ये आरोग्य आणि वैद्यकीय मंत्री 1968-71 या काळात शिक्षण मंत्री म्हणून काम पाहिले. 1971-73 या काळात ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. 1975-76 दरम्यान ते अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस होते. 1968-74 या काळात आंध्र प्रदेशच्या तेलगु अकादमीचे ते अध्यक्ष होते. 1972 पासून ते दक्षिण भारत हिंदी प्रचार सभाचे उपाध्यक्ष होते. 1957-77 या काळात ते आंध्र प्रदेश विधानसभेचे सदस्य तर 1977-84 दरम्यान लोकसभेचे सदस्य होते. डिसेंबर 1984 मध्ये ते रामटेकमधून आठव्या लोकसभेवर निवडून गेले. 1978-79 मध्ये सार्वजनिक लेखा समितीचे अध्यक्ष म्हणून ते लंडन विद्यापीठाच्या आशियाई आणि आफ्रिकी अभ्यास विभागाने आयोजित केलेल्या दक्षिण आशियावरील परिषदेला उपस्थित होते. राव यांनी भारतीय विद्या भवनाच्या आंध्र केंद्राचे अध्यक्षपदही भूषवले.

14 जानेवारी 1980 ते 18 जुलै 1984 दरम्यान परराष्ट्र व्यवहार मंत्री, 19 जुलै 1984 ते 31 डिसेंबर 1984 दरम्यान गृहमंत्री, 31 डिसेंबर 1984 ते 25 सप्टेंबर 1985 दरम्यान संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. 25 सप्टेंबर 1985 मध्ये त्यांनी मनुष्यबळ विकास मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला. राव यांना संगीत, चित्रपट, नाटक आदी विविध क्षेत्रात स्वारस्य होते. भारतीय तत्त्वज्ञान आणि संस्कृती, काल्पनिक आणि राजकीय लेखन, विविध भाषा शिकणे, तेलगु आणि हिंदी भाषेत कविता करणे आणि एकूणच साहित्याबाबत त्यांना विशेष रुची होती. प्रकाशन क्षेत्रातही त्यांनी अतुलनीय कामगिरी केली. ज्ञानपीठने प्रकाशित केलेल्या विश्वनाथ सत्यनारायण यांच्या प्रसिध्द “वेयि पडगलु” या तेलगू कादंबरीचा “सहस्त्रफन” हा हिंदी अनुवाद तसेच केंद्रीय साहित्य अकादमीने प्रकाशित केलेल्या “पण लक्षात कोण घेतो” या हरि नारायण आपटे यांच्या प्रसिध्द कादंबरीचे “अबला जीवितम्” हा तेलगू अनुवाद त्यांनी यशस्वीपणे प्रकाशित केला. मराठीतील अनेक उत्तम साहित्याचा त्यांनी तेलगू भाषेत तसंच तेलगू साहित्याचा हिंदी भाषेत अनुवाद केला. याशिवाय टोपण नावाने त्यांनी विविध मासिकांमध्ये अनेक लेख प्रकाशित केले. त्यांनी अमेरिका आणि पश्चिम जर्मनीच्या विद्यापीठांमध्ये राजकीय घडामोडींवर व्याख्यान दिले आहे. परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांनी इंग्लंड, पश्चिम जर्मनी, स्वित्झर्लंड, इटली आणि इजिप्त या देशांचा दौरा केला.

परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी क्षेत्रात आपला अनुभव पणाला लावला. जानेवारी 1980 मध्ये नवी दिल्लीत पार पडलेल्या संयुक्त राष्ट्र औद्योगिक विकास संघटनेच्या तिसऱ्या परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. तसेच मार्च 1980 मध्ये न्यूयॉर्क येथे झालेल्या जी-77 बैठकीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले.
1982 आणि 1983 ही दोन वर्षे भारतासाठी आणि परराष्ट्र धोरणासाठी महत्त्वाची ठरली. आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर सातव्या परिषदेचे आयोजन करण्याची जबाबदारी अलिप्त राष्ट्रांनी भारताला सोपवली. अलिप्त राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचे अध्यक्षपद नरसिंह राव यांनी भूषवले.
पॅलेस्तानी मुक्ती संघटना बरखास्त करण्यासाठी पश्चिम आशियातील देशांना भेटी दिलेल्या विशेष अलिप्त चळवळीचे नेतृत्व राव यांनी केले.
परराष्ट्र व्य वहार मंत्री म्हणून नरसिंह राव यांनी अमेरिका, पाकिस्तान, बांग्लादेश, इराण, व्हिएतनाम, टांझानिया, गयाना आदींच्या संयुक्त आयोगांचे अध्यक्षपद भूषवले.
19 जुलै 1984 मध्ये त्यांनी गृहमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. 5 नोव्हेंबर 1984 रोजी त्यांना नियोजन मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला. 31 डिसेंबर 1984 ते 25 सप्टेंबर 1985 दरम्यान त्यांची संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली.

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...