Tuesday 12 April 2022

वहाबी चळवळ / वलीउल्लाह चळवळ


▶️ स्थापना -18व्या शतकात अरेबियात
▶️ संस्थापक - अब्दुल वहाब
▶️ उद्देश - ही एक इस्लामिक शुद्धीकरण चळवळ
इस्लामची खरी व मूळ शिकवण पुनरुज्जीवित करने
▶️ भारतात - भारतातील वहाबी चळवळीचे प्रवर्तक रायबरेलीचे सय्यद अहमद 1820 मध्ये पटना (बिहार) येथे स्थापन

➡️ सय्यद अहमद यांच्यावर अरबचे अब्दुल वहाब आणि संत शाह वलीउल्लाह यांच्या शिकवणीचा प्रभाव होता

▶️ मुख्य मुद्दे - संघटनेचे मुख्य केंद्र - सीताना या ठिकाणी इनायत अलीच्या नेतृत्वाखाली लष्करी सैन्य तयार केले

➡️ मुख्य ध्येय - मूळ इस्लामची पुनर्स्थापना आणि काफिराविरुद्ध जिहाद पुकारने त्यांचा नायनाट करणे

➡️ सुरुवातीला हे पंजाबच्या शीख राज्याविरुद्ध जिहाद सुरू केले

➡️ नंतर ईस्ट इंडिया कंपनीमध्ये पंजाबचा समावेश झाल्यानंतर, त्याचे एकमेव लक्ष्य भारतातील इंग्रजी वर्चस्व बनले

➡️ ही चळवळ 1820 पासून सक्रिय, परंतु 1857 च्या उठावाच्या पार्श्वभूमीवर,त्याचे रूपांतर सशस्त्र प्रतिकार,ब्रिटिशांविरुद्धच्या जिहादमध्ये झाले

➡️ त्यानंतर ब्रिटिशांनी वहाबींना देशद्रोही आणि बंडखोर म्हणून संबोधले आणि वहाबींविरुद्ध व्यापक लष्करी कारवाया केल्या

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...