Monday 3 October 2022

महात्मा गांधी यांची 152 व्या जयंती

देशाच्या स्वातंत्र्यकालीन इतिहासातील महानक्रांतिकारक, शांतता व अहिंसेचे पुजारक महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1969 साली गुजरात मधील पोरबंदर या शहरात झाला होता.

महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते परंतु, लोक प्रेमाने त्यांना बापू म्हणत असतं.

आईचे नाव : पुतळाबाई

पत्नीचे नाव : कस्तुरबा गाधी

मुंबईत उच्च शिक्षण घेतल्यानंतर इंग्लंडमध्ये बॅरिस्टर ही पदवी मिळवून गांधीजी 1891 मध्ये भारतात परतले.

भारतात गांधीजी प्रथम राजकोट व नंतर मुंबईत वकिली करू लागले.

निधन : 30 जानेवारी 1948, दिल्ली.

  महात्मा गांधीजींवर प्रभाव टाकणारे ग्रंथ :
Unto This Last : जॉन रस्कीन,
Leaves of Grass : वॉल्ट हिटमन,
Waldel : हेरन्री डेव्हिड थोर

रवींद्रनाथ टागोर यांनी बापूना सर्वप्रथम “महात्मा” ही उपाधी धारण केली होती.

  सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधी यांना “राष्ट्रपिता” म्हणून पहिल्यांदा संबोधले होते.

आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन

जगाला सत्याग्रहाबरोबरच अहिंसेचे तत्वज्ञान शिकवणा-या महात्मा गांधी यांचा जन्मदिवस (२ ऑक्टोबर) जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो.

महात्मा गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ साली गुजरात मधील पोरबंदर शहरात झाला. गांधीजीच्या वडिलांचे नाव करमचंद तर आइचे नाव पुतळाबाई होते.

गांधीजीचे कार्य

अहिंसेच्या तत्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधीजीनी सर्वप्रथम दक्षिण अफ्रिकेत तेथील भारतीयांना त्यांचे नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला.

त्यानंतर १९१५ मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी चंपारण मधील शेतक-यांना जुलमी कर आणि जमीनदार यांच्याविरोधात एकत्र करुन लढा दिला. त्यानंतर गांधीजीनी केलेल्या दांडी यात्रा, भारत छोडो चळवळ अशा सत्य आणि अहिंसा या तत्वांवर आधारित आंदोलनांनी ब्रिटिश सरकारचे धाबे दणाणले. गांधीजीनी सत्य आणि अहिंसा या तत्वांचा नुसताच पुरस्कार केला नाही तर ते स्वतः ती तत्वं जगले.

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...