👉सातारा उठाव: रंगो बापूजी गुप्ते (छत्रपतींचे वकील) यांनी रामूशी, कोळी व मांग यांना एकत्र करून साताऱ्यात उठाव घडवला.
👉खानदेश उठाव: भिल्लांचे नेतृत्व काजसिंग (कजारसिंग) यांनी केले. सरकारी खजिना लुटला. अंबापाणी लढाईत भिल्ल महिलांचा सहभाग होता.
👉कोल्हापूर उठाव: ६ डिसेंबर १८५७ रोजी झाला, याचे नेतृत्व चिमासाहेब यांनी केले.
👉पेठ नाशिक उठाव: नेतृत्व राजा भगवंतराव निळकंठराव यांनी केले, इंग्रजांनी त्यांना नंतर फाशी दिली.
👉मुधोळ उठाव: बेरड जमातीचा इंग्रजांच्या निःशस्त्रीकरण कायद्याविरुद्ध उठाव.
👉कोल्हापूर: रामजी शिरसाट (लष्करी छावणी बंड).
👉नरगुंद: बाबासाहेब भावे.
👉सावंतवाडी: फोंड सावंत, अण्णाजी फडणवीस.
👉दर्पण वृत्तपत्र : (६ जानेवारी १८३२ व १८४० बंद):
🔹६ जानेवारी = 'पत्रकार दिन'.
🔹बाळशास्त्री जांभेकर. हे द्विभाषिक होते (डावीकडे इंग्रजी आणि उजवीकडे मराठी स्तंभ).
🔹दिग्दर्शन (१८४०): बाळशास्त्री जांभेकर (पहिले मराठी मासिक)
👉प्रभाकर वृत्तपत्र: भाऊ महाजन (गोविंद कुंटे). यात लोकहितवादींची १०८ शतपत्रे प्रसिद्ध झाली.
👉ज्ञानोदय वृत्तपत्र (१८४२): ख्रिश्चन मिशनरी. १८४२ मध्ये आशियाचा नकाशा छापला. १८५३ मध्ये रेल्वे सुरू झाल्यावर तिचा उल्लेख 'चाकांचा मसोबा' असा केला.
👉केसरी (मराठी): पहिले संपादक - गो. ग. आगरकर.
👉मराठा (इंग्रजी): पहिले संपादक - लो. टिळक.
👉सुधारक वृत्तपत्र (१८८८): गो. ग. आगरकर. इंग्रजी संपादन ना. गोखले आणि मराठी संपादन स्वतः आगरकर करत होते.
👉भाऊ महाजन (गोविंद कुंटे): 🔹'प्रभाकर' (लोकहितवादींची १०८ शतपत्रे प्रसिद्ध, फ्रेंच राज्यक्रांतीचे समर्थन);
🔹'धूमकेतू' व 'ज्ञानदर्शन'
👉बाबा पदमनजी: 'अरुणोदय' (१८६६), ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतरचे अनुभव, समाजसुधारणा.
👉डॉ. बाबासाहेब आंबेडकर: 'मूकनायक' (१९२० - शाहू महाराजांची मदत, संत तुकारामांचे अभंग); 'बहिष्कृत भारत' (१९२७ - संत ज्ञानेश्वरांच्या ओव्या).
👉कृष्णराव भालेकर: 'दीनबंधू' (१८७७ - सत्यशोधक समाजाचे पहिले मुखपत्र, कामगार-शेतकऱ्यांचे पहिले वृत्तपत्र).
👉 'इंदुप्रकाश' (विष्णुशास्त्री पंडित - विधवा विवाहाला पाठिंबा).
👉 'ज्ञानप्रकाश' (कृष्णाजी रानडे - पुण्याचे पहिले दैनिक);
👉नेटिव्ह ओपिनियन' (विश्वनाथ मांडलिक - इंग्रजी वृत्तपत्र).
✅रेल्वे सुरुवात: १६ एप्रिल १८५३ रोजी दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांनी बोरीबंदर ते ठाणे (३४ किमी) दरम्यान पहिली रेल्वे धावली. यात ४०० प्रवासी होते आणि हा लॉर्ड डलहौसीचा काळ होता.
✅रेल्वे कंपनी: ग्रेट इंडियन पेनिनसुला (GIP) कंपनीने हा रेल्वे मार्ग लष्करी व व्यापारी हेतूने तयार केला होता.
✅पहिली तार (Telegraph) सेवा: कलकत्ता ते आग्रा (लॉर्ड डलहौसी).
✅१७९९ चा सेन्सॉरशिप ॲक्ट (लॉर्ड वेलस्ली): वृत्तपत्रांवर पहिल्यांदा सेन्सॉरशिप (पूर्व-तपासणी) लादली.
संपादक, मुद्रक (Printer) आणि मालकाचे नाव वृत्तपत्रावर छापणे बंधनकारक केले.
👉१८२३ चा परवाना नियम/लायसन्सिंग रेग्युलेशन (जॉन्सन):
🔹विनापरवाना वृत्तपत्र सुरू केल्यास ४०० रुपये दंड किंवा तुरुंगवासाची तरतूद.
🔹या कायद्यामुळे राजा राममोहन रॉय यांचे 'मिरात-उल-अखबार' हे वृत्तपत्र बंद पडले होते.(PYQ)
👉१८३५ का मेटकाफ ॲक्ट (लॉर्ड मेटकाफ):
🔹१८२३ चे जाचक नियम रद्द केले आणि वृत्तपत्रांना स्वातंत्र्य दिले.
🔹लॉर्ड मेटकाफ यांना 'भारतीय वृत्तपत्रांचा मुक्तीदाता' (Liberator of Indian Press) म्हटले जाते.(PYQ)
👉१८७८ चा व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट / देशी वृत्तपत्र कायदा (लॉर्ड लिटन):
🔹मुख्य उद्देश: केवळ देशी (भारतीय) भाषांमधील वृत्तपत्रांची गळचेपी करणे (इंग्रजी वृत्तपत्रांना हा कायदा लागू नव्हता).
🔹याला 'गॅगिंग ॲक्ट' (तोंड दाबणारा कायदा) असेही म्हणतात.
🔹या कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी 'अमृता बाजार पत्रिका' हे रातोरात बंगालीतून इंग्रजी वृत्तपत्र बनले.(PYQ)
🔹सोमप्रकाश: या कायद्यांतर्गत कारवाई झालेले पहिले वृत्तपत्र
🔹लॉर्ड रिपन यांनी १८८२ मध्ये हा जाचक कायदा रद्द केला.(PYQ)
👉१९०८ न्यूजपेपर ॲक्ट (लॉर्ड मिंटो):
🔹क्रांतिकारक विचार दडपण्यासाठी; सरकारविरोधी मजकुरावर थेट छापखाना (Press) जप्ती;
🔹'केसरी' व 'काळ' वर कारवाया.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा