२६ ऑगस्ट २०२६

चलेजाव आंदोलन / छोडो भारत आंदोलन (१९४२)

🔷 ठराव व मंजुरी


🔸 वर्धा बैठक (१४ जुलै १९४२): 'भारत छोडो' चा मूळ मसुदा मांडला.

🔸 मुंबई अधिवेशन (७ ऑगस्ट १९४२): गवालिया टँक मैदानावर ठराव मंजूर.

🔻 अध्यक्ष: मौलाना अबुल कलाम आझाद.

🔻 मांडणारे / अनुमोदक: जवाहरलाल नेहरू / वल्लभभाई पटेल.



🔷 आंदोलन सुरुवात व घोषणा

🔸 ८ ऑगस्ट १९४२: गांधीजींचा "करेंगे या मरेंगे" (Do or Die) ऐतिहासिक नारा.

🔸 ९ ऑगस्ट १९४२: ब्रिटीशांचे 'ऑपरेशन झिरो अवर';
सर्व प्रमुख नेत्यांना अटक.

🔻 गांधीजी: आगाखान पैलेस (पुणे)
नेहरू: अहमदनगर किल्ला.



🔷 भूमिगत चळवळ

🔸 प्रमुख नेते: डॉ. राममनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धन, जयप्रकाश नारायण.

🔸 आझाद रेडिओ (मुंबई): उषा मेहता यांनी चालवले; लोहियांचे नियमित भाषण.

🔻 तंत्रज्ञ: विठ्ठलभाई झवेरी आणि नरिमन प्रिंटर.



🔷 प्रतिसरकार (महाराष्ट्र विशेष - सातारा)

🔸 स्थापना: क्रांतीसिंह नाना पाटील यांचे 'पत्री सरकार' (१९४३-४६).

🔸 कार्यपद्धती: ग्रामीण भागात कायदा राखण्यासाठी 'न्यायदान मंडळे' (लोकन्यायालय).

🔸 समाजसुधारणा: गावोगावी दारूबंदी, हुंडाबंदी आणि कमी खर्चाचे 'गांधी विवाह'.



🔷 आंदोलनातील प्रमुख सेना व दले

🔸 तुफान सेना (सातारा): जी. डी. बापू लाड व नाना पाटील; ब्रिटीश रेल्वे व खजिना लुटणे मुख्य कार्य.

🔸 विद्युत वाहिनी (बंगाल): सतीशचंद्र सामंत; तामलुक प्रतिसरकारचे अधिकृत सशस्त्र दल.

🔸 आझाद दस्ता (नेपाळ): जयप्रकाश नारायण; जंगलातून गनिमी काव्याने ब्रिटीश दळणवळण विस्कळीत केले.

🔸 वानर व मांजर सेना: लहान मुले (वानर) व मुलींचे (मांजर) दल; भूमिगत नेत्यांना संदेश व अन्न पुरवणे.

🔸 राष्ट्र सेवा दल (महाराष्ट्र): साने गुरुजी व एस. एम. जोशी; तरुणांना आंदोलनासाठी संघटित केले.



🔷 इतर भागातील प्रतिसरकारे

🔸 १. बलिया (उत्तर प्रदेश): चित्तू पांडे (देशातील पहिले प्रतिसरकार - १ आठवडा).

🔸 २. तामलुक (बंगाल): 'जातीय सरकार' (चक्रीवादळात मदत व समांतर प्रशासन).

🔸 ३. ताल्चेर (ओडिशा): देशातील सर्वात दीर्घकाळ चाललेले प्रतिसरकार.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा