२६ ऑगस्ट २०२६

१८५७ चा उठाव, वृत्तपत्रे, टपाल व रेल्वे

👉सातारा उठाव: रंगो बापूजी गुप्ते (छत्रपतींचे वकील) यांनी रामूशी, कोळी व मांग यांना एकत्र करून साताऱ्यात उठाव घडवला.


👉खानदेश उठाव: भिल्लांचे नेतृत्व काजसिंग (कजारसिंग) यांनी केले. सरकारी खजिना लुटला. अंबापाणी लढाईत भिल्ल महिलांचा सहभाग होता.

👉कोल्हापूर उठाव: ६ डिसेंबर १८५७ रोजी झाला, याचे नेतृत्व चिमासाहेब यांनी केले.

👉पेठ नाशिक उठाव: नेतृत्व राजा भगवंतराव निळकंठराव यांनी केले, इंग्रजांनी त्यांना नंतर फाशी दिली.

👉मुधोळ उठाव: बेरड जमातीचा इंग्रजांच्या निःशस्त्रीकरण कायद्याविरुद्ध उठाव.

👉कोल्हापूर: रामजी शिरसाट (लष्करी छावणी बंड).

👉नरगुंद: बाबासाहेब भावे.

👉सावंतवाडी: फोंड सावंत, अण्णाजी फडणवीस.

👉दर्पण वृत्तपत्र : (६ जानेवारी १८३२ व १८४० बंद):
🔹६ जानेवारी = 'पत्रकार दिन'.
🔹बाळशास्त्री जांभेकर. हे द्विभाषिक होते (डावीकडे इंग्रजी आणि उजवीकडे मराठी स्तंभ).
🔹दिग्दर्शन (१८४०): बाळशास्त्री जांभेकर (पहिले मराठी मासिक)

👉प्रभाकर वृत्तपत्र: भाऊ महाजन (गोविंद कुंटे). यात लोकहितवादींची १०८ शतपत्रे प्रसिद्ध झाली.

👉ज्ञानोदय वृत्तपत्र (१८४२): ख्रिश्चन मिशनरी. १८४२ मध्ये आशियाचा नकाशा छापला. १८५३ मध्ये रेल्वे सुरू झाल्यावर तिचा उल्लेख 'चाकांचा मसोबा' असा केला.

👉केसरी (मराठी): पहिले संपादक - गो. ग. आगरकर.
👉मराठा (इंग्रजी): पहिले संपादक - लो. टिळक.

👉सुधारक वृत्तपत्र (१८८८): गो. ग. आगरकर. इंग्रजी संपादन ना. गोखले आणि मराठी संपादन स्वतः आगरकर करत होते.

👉भाऊ महाजन (गोविंद कुंटे): 🔹'प्रभाकर' (लोकहितवादींची १०८ शतपत्रे प्रसिद्ध, फ्रेंच राज्यक्रांतीचे समर्थन);
🔹'धूमकेतू' व 'ज्ञानदर्शन'

👉बाबा पदमनजी: 'अरुणोदय' (१८६६), ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतरचे अनुभव, समाजसुधारणा.

👉डॉ. बाबासाहेब आंबेडकर: 'मूकनायक' (१९२० - शाहू महाराजांची मदत, संत तुकारामांचे अभंग); 'बहिष्कृत भारत' (१९२७ - संत ज्ञानेश्वरांच्या ओव्या).

👉कृष्णराव भालेकर: 'दीनबंधू' (१८७७ - सत्यशोधक समाजाचे पहिले मुखपत्र, कामगार-शेतकऱ्यांचे पहिले वृत्तपत्र).

👉 'इंदुप्रकाश' (विष्णुशास्त्री पंडित - विधवा विवाहाला पाठिंबा).

👉 'ज्ञानप्रकाश' (कृष्णाजी रानडे - पुण्याचे पहिले दैनिक);

👉नेटिव्ह ओपिनियन' (विश्वनाथ मांडलिक - इंग्रजी वृत्तपत्र).

✅रेल्वे सुरुवात: १६ एप्रिल १८५३ रोजी दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांनी बोरीबंदर ते ठाणे (३४ किमी) दरम्यान पहिली रेल्वे धावली. यात ४०० प्रवासी होते आणि हा लॉर्ड डलहौसीचा काळ होता.

✅रेल्वे कंपनी: ग्रेट इंडियन पेनिनसुला (GIP) कंपनीने हा रेल्वे मार्ग लष्करी व व्यापारी हेतूने तयार केला होता.

✅पहिली तार (Telegraph) सेवा: कलकत्ता ते आग्रा (लॉर्ड डलहौसी).

✅१७९९ चा सेन्सॉरशिप ॲक्ट (लॉर्ड वेलस्ली): वृत्तपत्रांवर पहिल्यांदा सेन्सॉरशिप (पूर्व-तपासणी) लादली.
संपादक, मुद्रक (Printer) आणि मालकाचे नाव वृत्तपत्रावर छापणे बंधनकारक केले.

👉१८२३ चा परवाना नियम/लायसन्सिंग रेग्युलेशन (जॉन्सन):
🔹विनापरवाना वृत्तपत्र सुरू केल्यास ४०० रुपये दंड किंवा तुरुंगवासाची तरतूद.
🔹या कायद्यामुळे राजा राममोहन रॉय यांचे 'मिरात-उल-अखबार' हे वृत्तपत्र बंद पडले होते.(PYQ)

👉१८३५ का मेटकाफ ॲक्ट (लॉर्ड मेटकाफ):
🔹१८२३ चे जाचक नियम रद्द केले आणि वृत्तपत्रांना स्वातंत्र्य दिले.
🔹लॉर्ड मेटकाफ यांना 'भारतीय वृत्तपत्रांचा मुक्तीदाता' (Liberator of Indian Press) म्हटले जाते.(PYQ)

👉१८७८ चा व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट / देशी वृत्तपत्र कायदा (लॉर्ड लिटन):
🔹मुख्य उद्देश: केवळ देशी (भारतीय) भाषांमधील वृत्तपत्रांची गळचेपी करणे (इंग्रजी वृत्तपत्रांना हा कायदा लागू नव्हता).
🔹याला 'गॅगिंग ॲक्ट' (तोंड दाबणारा कायदा) असेही म्हणतात.
🔹या कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी 'अमृता बाजार पत्रिका' हे रातोरात बंगालीतून इंग्रजी वृत्तपत्र बनले.(PYQ)
🔹सोमप्रकाश: या कायद्यांतर्गत कारवाई झालेले पहिले वृत्तपत्र
🔹लॉर्ड रिपन यांनी १८८२ मध्ये हा जाचक कायदा रद्द केला.(PYQ)


👉१९०८ न्यूजपेपर ॲक्ट (लॉर्ड मिंटो):
🔹क्रांतिकारक विचार दडपण्यासाठी; सरकारविरोधी मजकुरावर थेट छापखाना (Press) जप्ती;
🔹'केसरी' व 'काळ' वर कारवाया.

१८५७ उठाव: केंद्र, नेतृत्व आणि दडपणारा अधिकारी ( PYQ Facts)

👉दिल्ली: बहादूरशहा जफर व वख्त खान (लष्करी नेतृत्व) - दडपणारे अधिकारी: जॉन निकोल्सन व हडसन.


👉कानपूर: नानासाहेब पेशवे व तात्या टोपे (सेनापती) - दडपणारा अधिकारी: कॅम्पबेल.

👉लखनौ (अवध): बेगम हजरत महल (व मुलगा बिरजिस काद्र) - दडपणारा अधिकारी: कॅम्पबेल.

👉झाशी / ग्वाल्हेर: राणी लक्ष्मीबाई व तात्या टोपे - दडपणारा अधिकारी: कॅप्टन ह्यू रोज (लक्ष्मीबाईंना 'उठावातील एकमेव मर्द' म्हटले).

👉बिहार (जगदीशपूर): कुंवर सिंग (८० वर्षांचे जमींदार/बिहारचे सिंह) व अमर सिंग - दडपणारे अधिकारी: विल्यम टेलर व व्हिन्सेंट आयर.

👉इलाहाबाद व बनारस: लियाकत अली - दडपणारा अधिकारी: कर्नल नील .

👉बरेली (रुहेलखंड): खान बहादूर खान - दडपणारा अधिकारी: कॅम्पबेल.

👉फैझाबाद: मौलवी अहमदउल्ला (इंग्रजांचे ५०,००० चे बक्षीस) - दडपणारा अधिकारी: कॅम्पबेल / जगन्नाथ सिंग (फितूर राजा).

🟣इतर महत्त्वाचे थेट वन-लायनर फॅक्ट्स

🔹तात्या टोपे: मूळ नाव रामचंद्र पांडुरंग येवलकर, गनिमी काव्याने लढले, मित्र मानसिंग च्या फितुरीमुळे शिवपुरी येथे फाशी.

📌नियोजित विरुद्ध प्रत्यक्ष तारीख:
नियोजित तारीख ३१ मे १८५७ - प्रत्यक्ष सुरुवात १० मे १८५७ (मेरठ छावणी).
🔹प्रतीके व गव्हर्नर: उठावाचे प्रतीक लाल कमळ आणि चपाती;
🔹उठावाच्या वेळचा गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग.

आर्थिक नियोजनाची पार्श्वभूमी (स्वातंत्र्यपूर्व काळ)

👉१९३४: सर मो. विश्वेश्वरय्या -
🔹'Planned Economy for India' पुस्तक
🔹नियोजनाचा १ ला आराखडा, १० वर्षांत उत्पन्न दुप्पट करणे.

👉१९३८: राष्ट्रीय नियोजन समिती (NPC) - हरिपूरा अधिवेशन,
🔹घोषणा: सुभाषचंद्र बोस,
🔹अध्यक्ष: जवाहरलाल नेहरू,
🔹सचिव: के. टी. शहा.

👉१९४४: मुंबई योजना - ८ प्रमुख उद्योगपती
🔹१५ वर्षांची योजना, जड उद्योगांवर भर.

👉१९४४: गांधीवादी योजना - श्रीमन नारायण अग्रवाल
🔹कुटीर उद्योग व शेतीचे विकेंद्रीकरण.

👉१९४५: जनता योजना - एम. एन. रॉय
🔹१० वर्षांची योजना, ग्राहक वस्तू व शेतीचे राष्ट्रीयीकरण.

👉१९५०: सर्वोदय योजना -
🔹जयप्रकाश नारायण (गांधीजी व विनोबा भावेंच्या विचारांवर आधारित).

♦️ संस्थात्मक पार्श्वभूमी

👉नियोजन मंडळ: १५ मार्च १९५० (के. सी. नियोगी समिती शिफारस).
🔹गैर-घटनात्मक व गैर-वैधानिक संस्था.
🔹अध्यक्ष: पंतप्रधान.

👉राष्ट्रीय विकास परिषद (NDC): ६ ऑगस्ट १९५२.
🔹मुख्य कार्य: पंचवार्षिक योजनांच्या आराखड्याला अंतिम मंजुरी देणे.

👉नीती आयोग (NITI): १ जानेवारी २०१५ (नियोजन मंडळाच्या जागी).
🔹तत्त्वज्ञान: सहकारात्मक संघराज्य (Cooperative Federalism) आणि 'बॉटम-अप' दृष्टिकोन.

 

पंचवार्षिक योजना (PYQ BASED FACTS)

👉१ ली योजना (१९५१-५६):

🔹हॅरॉड-डोमार प्रतिमान
🔹भर: शेती (यशस्वी योजना )
🔹उपाध्यक्ष: गुलझारीलाल नंदा
🔹कार्यक्रम: समुदाय विकास कार्यक्रम (२ ऑक्टो १९५२).

👉२ री योजना (१९५६-६१):
🔹महालनोबिस प्रतिमान
🔹भर: जड उद्योग
🔹पोलाद प्रकल्प: भिलाई, रुरकेला, दुर्गापूर
🔹खादी व ग्रामोद्योग आयोग (१९५६).

👉३ री योजना (१९६१-६६):
🔹चक्रवर्ती व महालनोबिस प्रतिमान
📌 सर्वात अपयशी योजना (युद्ध व दुष्काळामुळे)
🔹 कृषी किंमत आयोग (१९६५).

👉योजना सुटी (१९६६-६९):
☘️हरित क्रांतीची सुरुवात (१९६६-६७),
🔹रुपयाचे अवमूल्यन (१९६६).

👉४ थी योजना (१९६९-७४):
🔹अशोक रुद्र व अलोन मॅन प्रतिमान
🔹 भर: स्थैर्यासाठी वाढ
🔹१४ बँकांचे राष्ट्रीयीकरण (१९६९)
🔹 MRTP कायदा (१९६९).

👉५ वी योजना (१९७४-७९):
🔹डी. पी. धर प्रतिमान
🔹घोषणा: 'गरिबी हटाव' (यापूर्वी १९७१ च्या निवडणुका दरम्यान देखील घोषणा दिली होती)
📌जनता सरकारने १ वर्ष आधी बंद केली .
🔹२० कलमी कार्यक्रम (१९७५)
🔹RRB स्थापना (१९७५)
🔹उपाध्यक्ष: पी. एन. हक्सर.

👉सरकती योजना (Rolling Plan):
🔹१९७८-८० (जनता सरकार).

👉६ वी योजना (१९८०-८५):
🔹भर: दारिद्र्य निर्मूलन व रोजगार
🔹६ बँकांचे राष्ट्रीयीकरण (१९८०)
🔹 NABARD स्थापना (१९८२)
🔹IRDP (१९८०).

👉७ वी योजना (१९८५-९०):
🔹ब्रह्मानंद व वकील प्रतिमान
🔹घोषणा: 'अन्न, काम आणि उत्पादकता'
🔹 जवाहर रोजगार योजना (१९८९)
🔹सेबी स्थापना (१९८८).

👉८ वी योजना (१९९२-९७):
🔹जॉन मिलर प्रतिमान
🔹मानवी संसाधन विकास
⭐️सर्वात यशस्वी योजना (६.८%)
🔹माध्यान्ह भोजन (१९९५)
🔹उपाध्यक्ष: प्रणव मुखर्जी.

👉९ वी योजना (१९९७-२००२):
🔹स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना (१९९९)
🔹 अंत्योदय अन्न योजना (२०००).

👉१० वी योजना (२००२-०७):
🔹पहिल्यांदा राज्यानिहाय लक्ष्य निश्चिती
🔹नरेगा कायदा (२००५).

👉११ वी योजना (२००७-१२):
🔹जलद व अधिक समावेशक वृद्धी
🔹शिक्षण हक्क कायदा (२००९)
🔹उपाध्यक्ष: माँटेक सिंग अहलुवालिया.

👉१२ वी योजना (२०१२-१७):
🔹जलद, अधिक समावेशक आणि शाश्वत वृद्धी'.

📌खर्च कल:
🔹 १ ल्या योजनेत सर्वाधिक खर्च 'शेती'वर.
🔹६ व्या योजनेपासून पुढे सर्वाधिक खर्च 'ऊर्जा' आणि 'सामाजिक सेवां'वर.

ब्राह्मणेतर चळवळ ( Prediction)

👉 कोल्हापूर संस्थान व शाहू महाराज

🔹२६ जुलै १९०२: कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीयांसाठी ५०% आरक्षणाची अधिसूचना जारी.
🔹११ जानेवारी १९११: कोल्हापुरात सत्यशोधक समाजाच्या शाखेची स्थापना. अध्यक्ष: भास्करराव जाधव, कार्यवाह: अण्णासाहेब लठ्ठे.
🔹शिवाजी वैदिक शाळा: मराठा पुरोहित (ब्राह्मणेतर वेदोक्त विधींसाठी) तयार करण्यासाठी शाहू महाराजांनी सुरू केलेली संस्था.

👉संस्थात्मक व राजकीय घडामोडी (Key Words)
🔹डेक्कन रयत असोसिएशन (१९१६, निपाणी): अण्णासाहेब लठ्ठे, वालचंद कोठारी, सीताराम बोबडे. (उद्देश: मॉन्टेग्यु कमिशनसमोर ब्राह्मणेतरांच्या राजकीय मागण्या मांडणे).

👉 १९१९ चा कायदा (मॉन्टेग्यु-चेम्सफर्ड): मुंबई प्रांताच्या कायदेमंडळात ब्राह्मणेतरांसाठी ७ जागा राखीव मंजूर.

👉ब्राह्मणेतर पक्ष (१९२०): अधिकृत स्थापना. प्रमुख नेते: वालचंद कोठारी, भास्करराव जाधव, जेधे-जवळकर.

👉भास्करराव जाधव: १९२४ मध्ये मुंबई प्रांताच्या कायदेमंडळात शिक्षण व आरोग्य मंत्री (ब्राह्मणेतर पक्षाचे प्रतिनिधी).

👉जेधे-जवळकर पर्व (१९२० चे दशक): चळवळीला जहाल रूप. पुणे नगरपालिकेत 'टिळक स्मारका'ला अधिकृत विरोध.

👉वृत्तपत्रे, ग्रंथ आणि कोर्ट खटले (थेट जोड्या लावा/विधान तपासा)

🔹 'देशाचे शत्रू' (१९२५): दिनकरराव जवळकर यांनी लिहिलेले पुस्तक. (टिळक व चिपळूणकरांच्या 'निबंधमाला'वर कडक टीका).

🔹पुणे कोर्ट खटला: 'देशाचे शत्रू' पुस्तकाविरुद्ध जेधे-जवळकरांवर अब्रुनुकसानीचा खटला. वकील: डॉ. बाबासाहेब आंबेडकर (त्यांनी जेधे-जवळकरांना निर्दोष सोडवले).

🔹दिनकरराव जवळकर यांचे इतर साहित्य: 'क्रांतीचे रणशिंग' (ग्रंथ), 'मजूर' (पत्रिका).

👉 चळवळीची वृत्तपत्रे व संपादक/संस्थापक:

🔹'विजयी मराठा': श्रीपतराव शिंदे (१९१९, पुणे - जहाल मुखपत्र).

🔹'जागृती': भगवंतराव पाळेकर (१९१७, बडोदा).

🔹'कैवारी' व 'तेज': दिनकरराव जवळकर (संपादक).

🔹 'हंटर': खंडोराव बागल (कोल्हापूर).

🔹 'प्रगती आणि जिनविजय': तात्यासाहेब हरी कोठारी.

👉चळवळीचे काँग्रेसीकरण
🔹१९३० ते १९३८: केशवराव जेधे आणि दिनकरराव जवळकर यांच्या नेतृत्वाखाली ब्राह्मणेतर कार्यकर्त्यांचे राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीनीकरण केले.

शेतकरी चळवळी (Prediction)

👉 नील उठाव (१८५९-६०)

🔹 नील उठाव नेतृत्व: दिगंबर बिस्वास आणि विष्णू बिस्वास (नदिया जिल्हा, बंगाल).
🔹नील दर्पण नाटक: दीनबंधू मित्र (शेतकऱ्यांच्या शोषणाचे चित्रण).
हिंदू पेट्रियटचे संपादक हरिश्चंद्र मुखर्जी यांनी या उठावाला वर्तमानपत्रातून मोठे समर्थन दिले.

👉पाबना शेतकरी बंड (१८७३):
🔹(बंगाल).
🔹नेतृत्व: ईशानचंद्र रॉय आणि शंभू पाल.
🔹घोषणा: 'आम्हाला केवळ महाराणीचे रयत व्हायचे आहे'.

👉 दख्खनचे दंगे (१८७५)
🔹तात्कालिक कारण: शिरूर (पुणे) येथील काळूराम मारवाडी या सावकाराने शेतकरी बाबा साहेब निमकर यांच्या घराची जप्ती आणली.
🔹उठावाची सुरुवात: मे १८७५, सुपे (पुणे). दंग्यांचा प्रसार पुणे आणि अहमदनगर या दोन मुख्य जिल्ह्यांत झाला.
🔹दंग्यांचे स्वरूप: मारवाडी आणि गुजराती सावकारांचे गहाणखत व दस्तऐवज (कर्जबाजारीपणाचे पुरावे) जाळणे.
🔹 Deccan Riots Commission: दंग्यांच्या चौकशीसाठी ब्रिटिश सरकारने नियुक्त केला.
🔹डेक्कन ॲग्रीकल्चरिस्ट्स रिलीफ ऍक्ट: १८७९ मध्ये मंजूर (सावकारांकडून शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्यास प्रतिबंध करण्यासाठी).

♦️उत्तर भारतातील शेतकरी चळवळी (१९२०-१९३० चा दशक)

👉उत्तर प्रदेश किसान सभा (१९१८): गौरीशंकर मिश्रा, इंद्रनारायण द्विवेदी आणि मदन मोहन मालवीय यांनी स्थापना केली.

👉अवध किसान सभा (१७ ऑक्टोबर १९२०): बाबा रामचंद्र (मूळचे महाराष्ट्र-ग्वाल्हेरचे, खरे नाव रामचंद्र श्रीधर परांजपे). प्रतापगढ येथे स्थापना.

👉 एका चळवळ (१९२१-२२): मदारी पाशी आणि सहरेव (उत्तर प्रदेश). मुख्य कारण: ठरलेल्या खेड्यांच्या भाड्यापेक्षा ५०% जास्त बेकायदेशीर कर वसुली करणे.

👉तेभागा चळवळ (१९४६-४७): बंगाल. मुख्य मागणी: एकूण उत्पादनाचा २/३ (तेभागा) हिस्सा कुळांना मिळावा आणि जमीनदारांना फक्त १/३ हिस्सा मिळावा. नेतृत्व: कंपाराम सिंह आणि भवन सिंह.

👉बारडोली सत्याग्रह (१९२८)
🔹 मुख्य कारण: मुंबई सरकारने बारडोली तालुक्यात जमीन महसुलात २२% वाढ केली होती.
🔹नेतृत्व: वल्लभभाई पटेल (महात्मा गांधींच्या सल्ल्याने नेतृत्व स्वीकारले).
🔹सरदार पदवी: सत्याग्रह यशस्वी झाल्यानंतर बारडोलीच्या महिलांच्या वतीने भक्तीबा यांनी वल्लभभाईंना 'सरदार' ही पदवी दिली.

👉मॅक्सवेल-ब्रूमफिल्ड समिती: या सत्याग्रहाच्या दबावामुळे सरकारने चौकशी समिती नेमली. या समितीने महसूल वाढ २२% वरून ६.०३% पर्यंत कमी केली.

👉पहिली महाराष्ट्र प्रांतिक किसान परिषद (१९३६): जळगाव जिल्ह्यातील टिटवे येथे भरली. अध्यक्ष: कमलादेवी चट्टोपाध्याय.

👉वारली शेतकरी उठाव (१९४५-१९४७)
🔹क्षेत्र: ठाणे जिल्हा
🔹नेतृत्व: शामराव परुळेकर आणि गोदावरी परुळेकर (महाराष्ट्र प्रांतिक किसान सभा).
🔹मुख्य कारण: वेठबिगारी,कुळांची होणारी बेकायदेशीर हकालपट्टी.
🔹गोदावरी परुळेकर यांचे पुस्तक: 'जेव्हा माणूस जागा होतो' (या पुस्तकात या संपूर्ण शेतकरी लढ्याचे ऐतिहासिक वर्णन आहे)

👉बिहार प्रांतिक किसान सभा (१९२९): स्वामी सहजानंद सरस्वती यांनी स्थापना केली.

👉अखिल भारतीय किसान सभा: स्थापना ११ एप्रिल १९३६ (लखनौ). अध्यक्ष: स्वामी सहजानंद सरस्वती, सचिव: प्रा. एन. जी. रंगा.

👉फैजपूर काँग्रेस अधिवेशन (डिसेंबर १९३६): जळगाव (महाराष्ट्र). अध्यक्ष: जवाहरलाल नेहरू.
🔹काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन. येथेच अखिल भारतीय किसान सभेचे दुसरे अधिवेशन भरले आणि काँग्रेसने आपला पहिला अधिकृत 'कृषी कार्यक्रम' मंजूर केला.

👉'किसान' जाहीरनामा: १९३६ च्या इंदूर अधिवेशनात प्रा. एन. जी. रंगा यांनी शेतकऱ्यांचा जाहीरनामा तयार केला.

कामगार चळवळ (Prediction)

🌿सुरुवातीचे प्रयत्न


👉१८७५: सोराबजी शापूरजी बंगाली — बालकामगार शोषणाविरुद्ध पहिला आवाज (मुंबई).
१८७७: नागपूर एम्प्रेस मिल — भारतातील कामगारांचा पहिला तात्पुरता संप.

👉नारायण मेघाजी लोखंडे (भारतातील कामगार चळवळीचे जनक):
🔹१८९०: बॉम्बे मिलहँड्स असोसिएशन (पहिली कामगार संघटना).
🔹१८८०: दीनबंधू वृत्तपत्र मुंबईतून चालवले (कामगारांचे पहिले मुखपत्र).
🔹१० जून १८९०: रविवारी पगारी सुट्टी मंजूर करून घेतली.
🔹१८९३: ब्रिटिश शासनाकडून 'रावबहादूर' पदवी.

फॅक्टरी कायदे

👉१ ला फॅक्टरी ऍक्ट (१८८१):
🔹लॉर्ड रिपन
🔹७ वर्षांखालील मुलांना कामावर बंदी, ७ ते १२ वर्षांच्या मुलांना ९ तास काम.

👉२ रा फॅक्टरी ऍक्ट (१९११):
🔹लॉर्ड लॅन्सडाऊन
🔹शिफारस: लेथब्रिज कमिशन
🔹९ वर्षांखालील मुलांना कामावर बंदी, महिलांसाठी ११ तास काम, रविवारी पगारी सुट्टी.

👉३ रा फॅक्टरी ऍक्ट (१९११): लॉर्ड हार्डींज
🔹पुरुषांसाठी कामाचे तास १२ निश्चित.

📌 महत्त्वाच्या संघटना व नेते (१९१८-१९३६)
👉मद्रास लेबर युनियन (१९१८): बी. पी. वाडिया — पहिली नोंदणीकृत ट्रेड युनियन.

👉अहमदाबाद टेक्स्टाईल लेबर असोसिएशन (१९२०): महात्मा गांधी व अनुसूया साराभाई (मजूर महाजन संघ) — विश्वस्त पद्धत

👉ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (AITUC - आयटक):
🔹स्थापना: ३१ ऑक्टोबर १९२० (मुंबई).
🔹पहिले अध्यक्ष: लाला लजपतराय उपाध्यक्ष: जोसेफ बॅप्टिस्टा
🔹सचिव: दिवाण चमनलाल.

👉सोशल सर्व्हिस लीग (१९११): ना. म. जोशी (मुंबई).

👉ट्रेड युनियन ऍक्ट (१९२६): कामगार संघटनांना कायदेशीर मान्यता देणारा कायदा.

👉 स्वतंत्र मजूर पक्ष : १९३६ — डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

⚒️कम्युनिस्ट प्रभाव

👉गिरणी कामगार युनियन (१९२८): एस. ए. डांगे (लाल बावटा).

👉कामगार वृत्तपत्रे:
🔹'क्रान्ती' (मराठी) आणि 'द सोशॅलिस्ट' (इंग्रजी) — एस. ए. डांगे.

🔹कम्युनिस्टांशी संबंधित खटले: कानपूर कट खटला (१९२४) व मेरठ कट खटला (१९२९).

👉आयटक (AITUC) मधील फूट व वर्ष:
🔹१९२९ (नागपूर अधिवेशन): अध्यक्ष जवाहरलाल नेहरू.
🔹ना. म. जोशी बाहेर पडले, त्यांनी 'इंडियन ट्रेड युनियन फेडरेशन' (ITUF) स्थापन केली.

👉१९३१ (कलकत्ता अधिवेशन): कम्युनिस्टांनी वेगळे होऊन 'रेड ट्रेड युनियन काँग्रेस' (RTUC) स्थापन केली.

पैसा आणि चलन व्यवस्था

👉पैशाचे प्रकार आणि उत्क्रांती:


🔷 वस्तू पैसा: सुरुवातीच्या काळात वस्तूच्या बदल्यात वस्तू .

🔷 धातू पैसा : सोने, चांदी, तांबे यांची नाणी. गाडगीळ समितीनुसार यात अंतर्गत मूल्य असते.

🔷 कागदी पैसा : प्रतिनिधी, परिवर्तनीय आणि आताचा अपरिवर्तनीय कागदी पैसा.

🔷 पत पैसा : चेक (धनादेश), डिमांड ड्राफ्ट, जे कायद्याने स्वीकारणे बंधनकारक नसते.

🔷 प्लॅस्टिक मनी: क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड.

🔷 डिजिटल मनी:- क्रिप्टो ETC ( BLOCK CHAIN आधारित)

👉 महत्त्वाचे संकल्पनात्मक मुद्दे (PYQ):

🔹 विधीग्राह्य पैसा (Legal Tender): कायद्यानुसार स्वीकारणे बंधनकारक असलेला पैसा.

🔹 मर्यादित विधीग्राह्य: ५० पैशांची नाणी (एका वेळी कमाल २५ रुपयांपर्यंतच देता येतात).

🔹अमर्यादित विधीग्राह्य: ₹१०, ₹२०, ₹५०, ₹१००, ₹५०० च्या नोटा.

🔷 आदेश पैसा (Fiat Money): देशाच्या केंद्र सरकारच्या किंवा आरबीआयच्या आदेशाने जारी केलेला सर्व पैसा (यात अंतर्गत मूल्य नसून केवळ विश्वास असतो).

👉 जे. एम. केन्स :
🔷केन्स यांच्या मते लोक स्वतःकडे रोख पैसा ३ मुख्य कारणांसाठी बाळगतात:

१. व्यवहार हेतू : दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी.

२. सावधानता हेतू : भविष्यातील आणीबाणी किंवा आजारपणासाठी.

३. सट्टा हेतू (Speculative Motive): भविष्यात नफा कमवण्यासाठी / शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी.
🔷 पुस्तक: 'The General Theory of Employment, Interest and Money
🔹या पुस्तकाने आधुनिक समष्टी अर्थशास्त्राचा - Macroeconomics पाया रचला.
🔷 केन्सप्रणीत विचार: १९२९ च्या जागतिक महामंदीनंतर केन्स यांनी मांडले की, मंदीतून बाहेर पडण्यासाठी सरकारने स्वतः बाजारात पैसा ओतून सार्वजनिक खर्च वाढवला पाहिजे.

👉भारतातील चलनाची छपाई आणि नाणी निर्मिती:

🔷 नोटांची छपाई :
🔹 ₹२ आणि त्यावरील सर्व नोटांवर आरबीआय गव्हर्नरची स्वाक्षरी असते.
🔹आरबीआय कायदा १९३४ च्या कलम २२ नुसार आरबीआयला नोटा काढण्याचा एकाधिकार आहे.

🔷 ₹१ ची नोट आणि सर्व नाणी:
🔹केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाद्वारे जारी केली जातात.
🔹₹१ च्या नोटेवर 'वित्त सचिव' यांची स्वाक्षरी असते (PYQ).

🔷 किमान राखीव प्रणाली (Minimum Reserve System - 1957):
🔹आरबीआयला नवीन नोटा छापण्यासाठी एकूण ₹२०५ कोटींचे राखीव मूल्य ठेवावे लागते.
🔹 यामध्ये किमान ₹११५ कोटींचे सोने आणि ₹९० कोटींची परकीय चलन/रोखे असणे बंधनकारक आहे (PYQ).

👉 नोटा छपाई कारखाने (Mints & Presses):
🔷 नाणी टांकसाळी (Mints): मुंबई, कोलकाता, हैदराबाद आणि नोएडा (४ ठिकाणी).
🔷 नोटा छपाई प्रेस: नाशिक (महाराष्ट्र), देवास (मध्य प्रदेश), म्हैसूर (कर्नाटक) आणि साळबोनी (पश्चिम बंगाल).

👉 नोटांचा कागद आणि शाई कारखाने:
🔷 Security Paper Mill (SPM): होशंगाबाद (मध्य प्रदेश) — येथे चलनी नोटा आणि स्टँपसाठी लागणारा विशेष सुरक्षेचा कागद बनवला जातो (PYQ).
🔷 Bank Note Paper Mill (BNPM): म्हैसूर (कर्नाटक) — आरबीआय आणि केंद्र सरकारचा संयुक्त उपक्रम.
🔷 सुरक्षा शाई कारखाना (Ink): देवास (मध्य प्रदेश) — नोटांवर वापरली जाणारी विशेष शाई (Intaglio Ink) येथे बनते.

✅चलन पुरवठ्याची मापे:

🔹देशातील पैशाचा साठा (M-Money stock) मोजण्यासाठी एम. सी. घोष (1977) आणि डॉ. वाय. व्ही. रेड्डी (1998) यांच्या शिफारसींनुसार खालील संकल्पना वापरल्या जातात👇

👉 M0 (पायाभूत पैसा / उच्च क्षमतेचा पैसा - Reserve Money):
🔷 लोकांजवळील चलनी नोटा व नाणी + आरबीआयकडील बँकांच्या ठेवी + आरबीआयकडील इतर ठेवी. (हा पतनिर्मितीचा पाया असतो).

👉 M1 (संकुचित पैसा - Narrow Money):
🔷 लोकांजवळील चलनी नोटा व नाणी + बँकांमधील मागणी ठेवी (Demand Deposits - जसे की चालू आणि बचत ठेवी) + आरबीआयकडील इतर ठेवी.

👉 M2:
🔷 M1 + बँकांमधील १ वर्षापर्यंतच्या मुदत ठेवी + बँकांनी विकलेल्या चालू ठेवींचे पैसे.
(१९७७ च्या घोष गटानुसार यात 'पोस्ट ऑफिस बचत ठेवी' होत्या, परंतु १९९८ च्या रेड्डी गटानुसार आंतरराष्ट्रीय पद्धतीशी सुसंगत बदल करण्यात आले आहेत).

👉 M3 (व्यापक पैसा / विस्तृत पैसा - Broad Money) — ( PYQ):
🔷 M1 + बँकांमधील १ वर्षावरील मुदत ठेवी (Time/Term Deposits) + बँकांची मागणी ठेव व मुदत कर्जे.
🔷 नोंद: देशातील एकूण चलन पुरवठा आणि बँकांची पतनिर्मिती क्षमता मोजण्यासाठी मुख्यत्वे M3 चाच वापर केला जातो.

♦️रुपयाचे अवमूल्यन (DEVALUATION OF RUPEE)

🔷 अवमूल्यन म्हणजे काय ?:
🌱जेव्हा एखादे देश आपल्या चलनाचे मूल्य परकीय चलनाच्या तुलनेत स्वतःहून कमी करते.
🔹हा निर्णय सरकार/मध्यवर्ती बँक घेते.

पद्म पुरस्कार : थोडक्यात परीक्षाभिमुख माहिती

📌ऐतिहासिक पार्श्वभूमी व फॅक्ट्स


🔹 स्थापना: १९५४ (१९७७ ते १९८० आणि १९९३ ते १९९७ या काळात तात्पुरते स्थगित).
🔹 नोडल मंत्रालय: केंद्रीय गृह मंत्रालय.
🔹 घोषणा: दरवर्षी २५ जानेवारी (प्रजासत्ताक दिनाची पूर्वसंध्या).
👉 नियम व तरतुदी:
🔹 कमाल मर्यादा: एका वर्षात जास्तीत जास्त १२० पुरस्कार (मरणोत्तर आणि परदेशी व्यक्ती वगळून).
🔹 नागरी सेवा नियम: सरकारी कर्मचारी (PSU वगळून) पदावर कार्यरत असताना या पुरस्कारांसाठी पात्र नसतात.
🔹 मानधन व पदवी: पुरस्कारासोबत कोणतीही रोख रक्कम दिली जात नाही. राज्यघटनेच्या अनुच्छेद १८(१) नुसार हा पुरस्कार नावासोबत पदवी म्हणून वापरण्यास सक्त मनाई आहे.

📌पद्म पुरस्कार २०२६: मुख्य आकडेवारी
🔹 एकूण पुरस्कार: १३१
🔹 पद्मविभूषण: ०५
🔹 पद्मभूषण: १३
🔹 पद्मश्री: ११३
🔹 महिला विजेत्या: १९
🔹 मरणोत्तर विजेते: १६

📌 पद्मविभूषण २०२६ (एकूण ५ विजेते)
१. श्री धर्मेंद्र सिंह देओल (मरणोत्तर)
🔹 कला (चित्रपट) | महाराष्ट्र

२. श्री के. टी. थॉमस
🔹 सार्वजनिक व्यवहार (माजी SC न्यायाधीश) | केरळ

३. सुश्री एन. राजम
🔹कला (व्हायोलिन वादक) | उत्तर प्रदेश

४. श्री पी. नारायणन
🔹साहित्य आणि शिक्षण | केरळ

५. श्री V. S. अच्युतानंदन (मरणोत्तर)
🔹 सार्वजनिक व्यवहार (माजी मुख्यमंत्री) | केरळ

📌 महाराष्ट्र: सर्व १५ विजेते

👉 पद्मविभूषण (०१)
🔹 श्री धर्मेंद्र सिंह देओल (मरणोत्तर) | कला (चित्रपट)

👉 पद्मभूषण (०३)
🔹 सुश्री अलका याज्ञिक | कला (पार्श्वगायन)

🔹 श्री उदय कोटक | व्यापार व उद्योग (कोटक महिंद्रा बँक)

🔹 श्री पीयूष पांडे (मरणोत्तर) | कला (जाहिरात क्षेत्र)

👉 पद्मश्री (११)
🔹 श्री रोहित शर्मा | क्रीडा (क्रिकेट)

🔹 डॉ. आर्मिडा फर्नांडिस | वैद्यकीय (सायन हॉस्पिटल - पहिली ह्युमन मिल्क बँक)

🔹 श्री रघुवीर तुकाराम खेडकर | कला (तमाशा लोककला - अहमदनगर)

🔹 श्री श्रीरंग देवाबा लाड | कृषी (कापूस - दादा लाड तंत्रज्ञान - परभणी)

🔹 श्री अशोक खाडे | व्यापार आणि उद्योग (दास ऑफशॉअर - DICCI)

🔹 श्री सत्यनारायण नुवाल | व्यापार आणि उद्योग (सौर ऊर्जा व संरक्षण दारूगोळा - नागपूर)

🔹 श्री जनार्दन बापुराव बोथे | सामाजिक कार्य (जलसंधारण व ग्रामीण विकास)

🔹 प्रा. जुझर वासी | विज्ञान आणि अभियांत्रिकी (सेमीकंडक्टर संशोधन - IIT)

🔹 श्री भिकल्या लाडक्या धिंदा | कला (वारली लोककला - पालघर)

🔹 श्री सतीश शाह (मरणोत्तर) | कला (चित्रपट व अभिनय)

🔹 श्री माधवराव रंगनाथन | कला (संगीत आणि नाट्य)

📌 राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचे पद्मभूषण विजेते

🔹 श्री मम्मुटी | कला (चित्रपट) | केरळ

🔹✅ श्री भगतसिंग कोश्यारी | सार्वजनिक व्यवहार (माजी राज्यपाल) | उत्तराखंड

🔹 श्री शिबू सोरेन (मरणोत्तर) | सार्वजनिक व्यवहार (माजी मुख्यमंत्री) | झारखंड

🔹 श्री विजय अमृतराज | क्रीडा (टेनिस) | अमेरिका (NRI)

🔹 डॉ. नोरी दत्तात्रेयुडू | वैद्यकीय (कर्करोग तज्ज्ञ) | अमेरिका (NRI )


👉तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी पुरस्कार वितरण सोहळ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला पुन्हा मंजुरी देण्याबाबत स्वतंत्र निवेदन दिले.

भारतातील आर्थिक सुधारणा (LPG धोरण १९९१)

👉 आर्थिक सुधारणांची पार्श्वभूमी व संकट कालखंड:


🔷 मुख्य कारणे: परकीय चलनाचा साठा कमालीचा घटला
🔹फक्त १.१ अब्ज डॉलर्स - २ आठवडे पुरेल इतकाच
🔹 राजकोषीय तूट ८.४% वर.

🔷 तात्कालिक कारण: गल्फ युद्धामुळे (आखाती युद्ध) खनिज तेलाच्या किमतीत प्रचंड वाढ.

🔷 सोने गहाण व्यवहार: IMF आणि जागतिक बँकेकडून ७ अब्ज डॉलर्स कर्जासाठी सोने गहाण (४७ टन सोने 'बँक ऑफ इंग्लंड' कडे + २० टन सोने 'युनियन बँक ऑफ स्वित्झर्लंड' कडे).

👉 नवीन आर्थिक धोरणाची घोषणा:

🔷 अधिकृत तारीख: २४ जुलै १९९१ (तत्कालीन पंतप्रधान: पी. व्ही. नरसिंह राव, अर्थमंत्री: डॉ. मनमोहन सिंग).

🔷 प्रतिमान नाव: 'राव-मनमोहन मॉडेल'.

🔷 मुख्य उद्दिष्ट: लायसन्स राज (परवाना राज) संपवणे व अर्थव्यवस्थेचे उदारीकरण करणे.

👉 उदारीकरण (Liberalization) व परवाना सद्यस्थिती:

🔷 औद्योगिक परवाना मुक्ती: सुरुवातीला १८ उद्योग सोडून सर्व उद्योगांचे परवाने रद्द.

🔷 परवाना सक्तीचे सध्याचे ५ उद्योग: १) इलेक्ट्रॉनिक एरोस्पेस व संरक्षण साहित्य
२) औद्योगिक स्फोटके
३) घातक रसायने
४) तंबाखू, सिगारेट व सिगार
५) अल्कोहोलयुक्त पेये (दारू).

🔷 परकीय गुंतवणूक: विशिष्ट उद्योगांमध्ये ५१% पर्यंत थेट परकीय गुंतवणुकीला (FDI) स्वयंचलित मंजुरी.

🔷 एमआरटीपी (MRTP 1969) कायदा: रद्द करून 'स्पर्धा कायदा २००२' संमत
🔹पूर्ण अंमलबजावणी: २००९ पासून, कंपन्यांच्या मालमत्तेची मर्यादा संपुष्टात.

👉 खाजगीकरण (Privatization) व सार्वजनिक क्षेत्र सुधारणा:

🔷 निर्गुंतवणूक :
🔹सुधारणांसाठी रंगराजन समिती(१९९३).
🔹जी. व्ही. रामकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली पहिला निर्गुंतवणूक आयोग (१९९६).

🔷 सरकारी क्षेत्राचे संकोचन: सार्वजनिक क्षेत्रासाठी राखीव उद्योगांची संख्या १७ वरून थेट ८ वर आणली.

🔷 सार्वजनिक क्षेत्रासाठी राखीव सध्याचे २ उद्योग:
१) अणुऊर्जा (Atomic Energy)
२) रेल्वे ऑपरेशन्स (रेल्वे वाहतूक).

🔷 स्वायत्तता योजना:
सरकारी कंपन्यांना वित्तीय स्वायत्ततेसाठी १९९७ मध्ये 'नवरत्न' आणि 'मिनीरत्न' दर्जा देण्यास सुरुवात (महारत्न दर्जा: २०१० पासून).

👉 जागतिकीकरण (Globalization) व परकीय चलन सुधारणा:

🔷 रुपयाचे अवमूल्यन (१९९१):
जुलै १९९१ मध्ये दोन टप्प्यांत (१ जुलै आणि ३ जुलै) एकूण १८.५% ते २०% अवमूल्यन.

🔷 रुपयाची परिवर्तनीयता: मार्च १९९३ मध्ये व्यापार खात्यावर आणि ऑगस्ट १९९४ मध्ये चालू खात्यावर पूर्णपणे परिवर्तनीय (कलम ८ नुसार).

🔷 सीमाशुल्क कपात: आयात कर कमाल ३००% वरून टप्प्याटप्प्याने कमी केला.

🔷 फेरा ऐवजी फेमा: विदेशी चलन नियमन कायदा (FERA 1973) बदलून विदेशी चलन व्यवस्थापन कायदा (FEMA 1999) आणला (लागू: १ जून २००० पासून).

👉 वित्तीय, बँकिंग व कर सुधारणा समित्या:

🔷 नरसिंहम समिती १ (१९९१): एसएलआर (SLR) ३८.५% वरून २५% वर
🔹 सीआरआर (CRR) १५% वरून १०% पर्यंत कमी करण्याची शिफारस.


🔷 नरसिंहम समिती २ (१९९८):
बँकिंग क्षेत्रात भांडवल पर्याप्तता प्रमाण (CAR) ९% करणे व बुडीत कर्जांसाठी मालमत्ता पुनर्रचना कंपन्या (ARC) स्थापन करण्याची शिफारस.

🔷 राजा चेलय्या समिती (१९९१-९३): आयकराचे कमाल दर ३०% आणि कंपनी कराचे दर ४०% पर्यंत कमी करण्याची शिफारस.

🔷 सेवा कर (Service Tax) सुरुवात: राजा चेलय्या समितीच्या शिफारशीनुसार १९९४-९५ मध्ये पहिल्यांदा फक्त ३ सेवांवर (टेलीफोन, विमा, स्टॉक ब्रोकर) ५% दराने लागू.

✅ कंबाइन पूर्व परीक्षेत आर्थिक सुधारणा व १९९१ च्या धोरणावर दरवर्षी १ ते २ प्रश्न निश्चित विचारले जातात.

असहकार चळवळ (१९२०-१९२२)

 पार्श्वभूमी व ठराव:


🔷 विशेष अधिवेशन: सप्टेंबर १९२०, कलकत्ता (अध्यक्ष: लाला लजपत राय) – असहकाराचा प्रस्ताव मांडला.

🔷 वार्षिक अधिवेशन: डिसेंबर १९२०, नागपूर (अध्यक्ष: सी. विजयराघवाचारीआर) –
🔹असहकाराच्या कराराला अंतिम मंजुरी. (हा ठराव चित्तरंजन दास यांनी मांडला).

👉 महाराष्ट्रातील विशेष योगदान:

🔷 टिळक स्वराज्य फंड: चळवळीसाठी १ कोटी रुपये गोळा करण्याचे उद्दिष्ट होते.

🔹 महाराष्ट्रातून या फंडासाठी मोठा निधी गोळा झाला.

🔷 परकीय कापडाची होळी: मुंबईत परकीय कापडाची मोठी होळी करण्यात आली.

🔷 दारूबंदी आंदोलन: पुणे आणि मुंबईत दारूच्या दुकानांसमोर मोठ्या प्रमाणात मोर्चे व निदर्शने झाली.

🔷 विद्यापीठ स्थापना: राष्ट्रीय शिक्षणाचा भाग म्हणून पुण्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठ (१९२१) ची स्थापना झाली.

👉 महत्त्वाच्या घटना व शेवट:

🔷 मुळशी सत्याग्रह (१९२१): सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली टाटा कंपनीच्या धरणाविरुद्ध महाराष्ट्रात समांतर शेतकरी आंदोलन सुरू झाले.

🔷 प्रिन्स ऑफ वेल्सचे आगमन: नोव्हेंबर १९२१ मध्ये मुंबईत आगमन झाल्यावर प्रचंड हरताळ पाळण्यात आला.
🔹 यामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात दंगल व हिंसाचार झाला.

🔷 चौरी-चौरा घटना: ५ फेब्रुवारी १९२२ (उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्हा) – २२ पोलिसांना जिवंत जाळले.

🔷 चळवळ मागे: १२ फेब्रुवारी १९२२ रोजी बारडोली येथील बैठकीत गांधीजींनी चळवळ स्थगित केली.

🔴 सविनय कायदेभंग चळवळ (१९३०-१९३४)

👉 प्रारंभ (दांडी यात्रा):
🔷 कालावधी: १२ मार्च १९३० ते ५ एप्रिल १९३० (एकूण २४ दिवस, २४१ मैल अंतर).
🔷 सहभागी: गांधीजींसोबत ७८ अनुयायी होते.
🔹 यात महाराष्ट्रातून अवंतिकाबाई गोखले आणि इतर प्रमुख नेत्यांचा समावेश होता.
🔷 कायदा मोडला: ६ एप्रिल १९३० रोजी दांडी येथे मीठाचा कायदा मोडला.

👉 महाराष्ट्रातील प्रमुख केंद्र आणि सत्याग्रह :

🔷 १) वडाळा सत्याग्रह (मुंबई):
🔹 १६ एप्रिल १९३० पासून सुरुवात. १६ मे आणि १ जून रोजीचे मोर्चे सर्वात मोठे होते.
🔹 नेतृत्व: अवंतिकाबाई गोखले, कमलादेवी चट्टोपाध्याय, के. एफ. नरिमन.

🔷 २) शिरोडा सत्याग्रह (रत्नागिरी/सिंधुदुर्ग):
🔹 १२ मे १९३० रोजी मीठाचा पाडाव केला.
🔹 नेतृत्व: डॉ. आठल्ये, अप्पासाहेब पटवर्धन, अच्युतराव पटवर्धन.

🔷 ३) धारासणा सत्याग्रह (गुजरात - महाराष्ट्राशी जोडलेला):
🔹 नेतृत्व: सरोजिनी नायडू, इमाम साहेब आणि मणिलाल गांधी.
🔹 महाराष्ट्रातून कॅप्टन लक्ष्मीपती आणि कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता. अमेरिकन पत्रकार वेब मिलर याने येथील अमानुष लाठीहल्ल्याचे वर्णन केले.

🔷 ४) सोलापूरचा उठाव (मार्शल लॉ):
🔹 गांधीजींच्या अटकेनंतर (५ मे) सोलापूरमध्ये गिरणी कामगारांचा प्रचंड उद्रेक झाला. ९ ते १६ मे दरम्यान सोलापूरवर जनतेचे नियंत्रण होते.

🔹 ४ हुतात्मे (फाशी):
मल्लप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन, आणि श्रीकिसन सारडा.

🔷 ५) महाराष्ट्रातील जंगल सत्याग्रह (मीठ उपलब्ध नसलेल्या भागात):

🔹 पुसद (यवतमाळ): १० जुलै १९३०
नेतृत्व: लोकनायक बापूजी अणे (आरक्षित जंगलातील गवत कापून कायदा मोडला).

🔹 बिळाशी (सांगली): १८ जुलै १९३० – येथे तिरंगा फडकवण्यासाठी मोठा संघर्ष झाला (राजू आणि नाना या बालकांचे योगदान).

🔹 चिरनेर (रायगड): २५ सप्टेंबर १९३० – येथे पोलिसांच्या गोळीबारात अनेक जण हुतात्मे झाले (उदा. नागू सयाजी जाधव).

🔹 इतर प्रमुख केंद्र: संगमनेर व अकोले (अहमदनगर), कळवण (नाशिक).

👉 चळवळीचा शेवट:
🔷 गांधी-आयर्विन करार: ५ मार्च १९३१ (या करारानुसार पहिली चळवळ स्थगित करून गांधीजी दुसऱ्या गोलमेज परिषदेला गेले).

🔷 दुसरा टप्पा: परिषद अपयशी ठरल्याने जानेवारी १९३२ मध्ये चळवळ पुन्हा सुरू झाली, पण ती कमजोर पडली आणि मे १९३४ मध्ये पूर्णपणे मागे घेण्यात आली.

✅वर असहकार चळवळ व सविनय कायदेभंग चळवळ याविषयी महाराष्ट्र तसेच भारतातील ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी होत्या त्या टाकल्या आहेत याबाहेर प्रश्न जाण्याची शक्यता खूपच कमी आहे..
✅इतकं केलं तरी तुम्हाला नक्की मार्क्स पडतील..

व्यापारतोल (BOT) व व्यवहारतोल (BOP)

 🔷 व्यापारतोल (BOT)

🔸 फक्त दृश्य (वस्तू) आयात-निर्यातीचा समावेश.
🔸 भारताचा व्यापारतोल ऐतिहासिकदृष्ट्या नेहमी तुटीचा असतो.

​🔷 व्यवहारतोल (BOP)
🔸 दृश्य + अदृश्य (सेवा, रेमिटन्सेस) अशा सर्व आर्थिक व्यवहारांचा समावेश.
🔸 देशाचा उर्वरित जगासोबतचा एकूण वार्षिक आर्थिक हिशोब.
🔸 लेखांकन दृष्टिकोनातून हा नेहमी संतुलित असतो.

​🔷 चालू खाते (Current Account)
🔸 वस्तू व्यापार (नेहमी तुटीचा).
🔸 सेवा व्यापार (सॉफ्टवेअर, पर्यटन - नेहमी आधिक्याचा).
🔸 एकतर्फी हस्तांतरण (Remittances/भेटवस्तू).
🔸 भारतात एकूण चालू खात्यावर नेहमी चालू खाते तूट (CAD) आढळते.

​🔷 भांडवली खाते (Capital Account)
🔸 परकीय गुंतवणूक (FDI, FPI).
🔸 परकीय कर्ज (ECB).
🔸 बँकिंग भांडवल.
🔸 भारतात हे खाते सहसा आधिक्यात असते, जे चालू खात्याची तूट भरून काढते.

​🔷 रुपया परिवर्तनीयता (Convertibility)
🔸 चालू खात्यावर रुपया पूर्ण परिवर्तनीय (१००%) आहे (ऑगस्ट १९९४ पासून).
🔸 भांडवली खात्यावर रुपया अजूनही अंशतः परिवर्तनीय आहे.

​🔷 परीक्षाभिमुख महत्वपूर्ण समित्या
🔸 तारापोर समिती १ (१९९७): भांडवली खात्यावरील रुपया परिवर्तनीयतेसाठी.
🔸 तारापोर समिती २ (२००६): भांडवली खात्यावरील रुपया परिवर्तनीयतेचे पुढील टप्पे ठरवण्यासाठी.
🔸 सी. रंगराजन समिती (१९९३): व्यवहारतोल व्यवस्थापन आणि परकीय चलन साठ्यासाठी.

​🔷 परकीय चलन साठा (Forex Reserve) घटक
🔸 १. परकीय चलन मालमत्ता (FCA - याचा वाटा सर्वाधिक असतो).
🔸 २. सोने (Gold).
🔸 ३. विशेष उचल अधिकार (SDR).
🔸 ४. आयएमएफ (IMF) मधील राखीव साठा.

​🔷 चालू घडामोडी व अद्ययावत डेटा

🔸 परकीय चलन साठा (मे २०२६)
🔻 एकूण साठा: आरबीआयच्या आकडेवारीनुसार ६८८.८९ अब्ज डॉलर.
🔻 जागतिक क्रमांक: भारत सध्या जगात ४ थ्या स्थानावर आहे.
🔻 अव्वल देश: १ ला: चीन, २ रा: जपान, ३ रा: स्विट्झर्लंड.

​🔸 चालू खाते तूट (आर्थिक वर्ष २०२५-२६)
🔻 एकूण प्रमाण: आरबीआयच्या अहवालानुसार भारताची चालू खाते तूट (CAD) एकूण जीडीपीच्या १.३% आहे.

​🔸 रेमिटन्सेस (जागतिक बँक अहवाल २०२४-२०२५)
🔻 जागतिक क्रमांक: परदेशातून मायदेशात पैसे पाठवण्यात भारत जगात १ ल्या क्रमांकावर कायम आहे.
🔻 मुख्य स्रोत: भारताला सर्वाधिक रेमिटन्सेस युएई (UAE) कडून प्राप्त होतात.

​🔸 रुपया घसरण नियंत्रण (मे २०२६)
🔻 नीचांक: डॉलरच्या तुलनेत रुपयाने ९६.९६ चा नीचांक गाठला.
🔻 आरबीआय उपाययोजना: रुपया स्थिर ठेवण्यासाठी आरबीआय थेट स्पॉट मार्केटमध्ये डॉलर्सची विक्री करत आहे.

परकीय व्यापार व व्यापार धोरण

🔷 प्रमुख भागीदार व वस्तू (आर्थिक वर्ष २०२४-२५)

🔸 निर्यात देश: १. अमेरिका, २. युएई, ३. नेदरलँड्स.
🔸 आयात देश: १. चीन, २. अमेरिका, ३. युएई.
🔸 निर्यात वस्तू: Petroleum उत्पादने, अभियांत्रिकी वस्तू, औषधे.
🔸 आयात वस्तू: कच्चे तेल, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कोळसा, सोने.

🔷 परकीय व्यापार धोरण (FTP) इतिहास व बदल

🔸 EXIM धोरण (१९९२-९७): आर्थिक सुधारणांनंतरचे पहिले ५ वर्षांचे धोरण;
आयातीचे उदारीकरण व परवाने कमी केले.

🔸 FTP (२००४-०९): EXIM चे नाव बदलून फॉरेन ट्रेड पॉलिसी (FTP) केले.
'विशेष कृषी उपज योजना' सुरू.

🔸 FTP (२०१५-२०): MEIS (वस्तू निर्यात) व SEIS (सेवा निर्यात) योजना सुरू.
(कोविडमुळे मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ).

🔸 नवीन FTP (२०२३ पासून लागू): १ एप्रिल २०२३ पासून लागू. विशेष म्हणजे हे कालबद्ध नाही.

🔸 FTP २०२३ लक्ष्य: २०३० पर्यंत भारताची एकूण निर्यात २ ट्रिलियन डॉलर
(१ ट्रिलियन वस्तू + १ ट्रिलियन सेवा) करणे.

🔸 मुख्य सुधारणा: रुपयामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार व्यवहारांना मंजुरी.
📌'टाउन्स ऑफ एक्सपोर्ट एक्सलन्स' (TEE) मध्ये नवीन ४ शहरे (फरीदाबाद, मिर्षापूर, मुरादाबाद, वाराणसी) समाविष्ट करून एकूण संख्या ३९ झाली.

🔸 नवीन योजना: MEIS ऐवजी RoDTEP (उत्पादनांवरील शुल्क व करांची सूट) योजना लागू.

🔷 चालू घडामोडी व अद्ययावत डेटा

🔸 जागतिक व्यापारातील वाटा (डब्ल्यूटीओ अहवाल २०२५)
🔻 वस्तू निर्यात: जागतिक वस्तू निर्यातीत भारताचा वाटा २.२% आहे.
🔻 सेवा निर्यात: जागतिक सेवा निर्यातीत भारताचा वाटा ४.६% आहे.

🔸 रुपया व्यापार करार (२०२५-२०२६)
🔻 नवीन विस्तार: रशिया आणि युएई नंतर आता आणखी ५ मित्र देशांसोबत रुपयामध्ये व्यापाराला मंजुरी दिली आहे.
🔻 बँक खाती: या व्यवहारांसाठी विशेष 'व्होस्ट्रो खाती' सुरू करण्यात आली आहेत.

गोलमेज परिषद व संबंधित घटना

🔷 पहिली गोलमेज परिषद (नोव्हेंबर १९३०)

🔸 मुख्य वैशिष्ट्य: काँग्रेसचा पूर्ण बहिष्कार.
🔸 अध्यक्ष: ब्रिटीश पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड.
🔸 अस्पृश्यांचे प्रतिनिधित्व: डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

🔸 इतर प्रमुख प्रतिनिधी:
🔻 मुस्लिम लीग: बॅ. जिन्ना, आगाखान.
🔻 उदारमतवादी: तेजबहादूर सप्रू, चिंतातमणी.
🔻 संस्थानिक: सयाजीराव गायकवाड (बडोदा), मिर्झा इस्माईल (मैसूर), जयसिंग राजे (अलवार).

🔷 गांधी-इर्विन करार (५ मार्च १९३१)
🔸 मुख्य परिणाम: सविनय कायदेभंग आंदोलन तात्पुरते स्थगित.
🔸 काँग्रेस सहमती: दुसऱ्या परिषदेत सहभागी होण्यास मंजुरी.

🔷 दुसरी गोलमेज परिषद (सप्टेंबर १९३१)
🔸 काँग्रेस प्रतिनिधित्व: महात्मा गांधी उपस्थित (एस. एस. राजपुताना जहाजाने प्रवास).
🔸 इतर क्षेत्रांचे स्वतंत्र प्रतिनिधी:
🔻 महिला: सरोजिनी नायडू, बेगम जहाँआरा शाहनवाज.
🔻 राष्ट्रवादी पक्ष: मदनमोहन मालवीय.
🔻 उद्योग क्षेत्र: घनश्यामदास बिर्ला.

🔸 निकाल: स्वतंत्र मतदारसंघाच्या मुद्द्यावरून मतभेद झाल्याने गांधीजी अपयशी ठरून परतले.
🔸 गांधीजींचे वक्तव्य: "मी रिकाम्या हाताने परतलो असलो, तरी माझ्या देशाचा ध्वज खाली पडू दिला नाही."

🔷 जातीय निवाडा (१६ ऑगस्ट १९३२)
🔸 घोषणा: ब्रिटीश पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड यांच्याकडून अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ जाहीर.
🔸 गांधीजींची प्रतिक्रिया: या निवाड्याविरोधात २० सप्टेंबर १९३२ रोजी येरवडा जेलमध्ये आमरण उपोषण सुरू.

🔷 पुणे करार (२४ सप्टेंबर १९३२)
🔸 ठिकाण व व्यक्ती: गांधीजी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात येरवडा जेलमध्ये.
🔸 मुख्य मध्यस्थ: मदनमोहन मालवीय, सी. राजगोपालाचारी, डॉ. राजेंद्र प्रसाद, बॅ. मुकुंदराव जयकर.
🔸 स्वाक्षऱ्या: गांधीजींच्या वतीने मदनमोहन मालवीय यांनी तर दलित वर्गाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केली.
🔸 जागांमधील बदल: स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव जागा पद्धत मान्य.
🔻 प्रांतीय कायदेमंडळ: जागा ७१ वरून १४८ करण्यात आल्या.
🔻 मध्यवर्ती कायदेमंडळ: दलित वर्गासाठी १८% जागा राखीव.

🔷 तिसरी गोलमेज परिषद (नोव्हेंबर १९३२)
🔸 बहिष्कार: काँग्रेस आणि ब्रिटनच्या 'लेबर पार्टी'चा (मजूर पक्ष) पूर्ण बहिष्कार.
🔸 विशेष नोंद: तिन्ही परिषदांना उपस्थित असणारे प्रमुख नेते - डॉ. बी. आर. आंबेडकर आणि तेज बहादूर सप्रू.
🔸 परिषदेच्या विचारमंथनातून मार्च १९३३ मध्ये 'श्वेतपत्रिका' प्रसिद्ध, ज्याच्या आधारावर पुढे '१९३५ चा भारत सरकार कायदा' तयार झाला.

चलेजाव आंदोलन / छोडो भारत आंदोलन (१९४२)

🔷 ठराव व मंजुरी


🔸 वर्धा बैठक (१४ जुलै १९४२): 'भारत छोडो' चा मूळ मसुदा मांडला.

🔸 मुंबई अधिवेशन (७ ऑगस्ट १९४२): गवालिया टँक मैदानावर ठराव मंजूर.

🔻 अध्यक्ष: मौलाना अबुल कलाम आझाद.

🔻 मांडणारे / अनुमोदक: जवाहरलाल नेहरू / वल्लभभाई पटेल.



🔷 आंदोलन सुरुवात व घोषणा

🔸 ८ ऑगस्ट १९४२: गांधीजींचा "करेंगे या मरेंगे" (Do or Die) ऐतिहासिक नारा.

🔸 ९ ऑगस्ट १९४२: ब्रिटीशांचे 'ऑपरेशन झिरो अवर';
सर्व प्रमुख नेत्यांना अटक.

🔻 गांधीजी: आगाखान पैलेस (पुणे)
नेहरू: अहमदनगर किल्ला.



🔷 भूमिगत चळवळ

🔸 प्रमुख नेते: डॉ. राममनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धन, जयप्रकाश नारायण.

🔸 आझाद रेडिओ (मुंबई): उषा मेहता यांनी चालवले; लोहियांचे नियमित भाषण.

🔻 तंत्रज्ञ: विठ्ठलभाई झवेरी आणि नरिमन प्रिंटर.



🔷 प्रतिसरकार (महाराष्ट्र विशेष - सातारा)

🔸 स्थापना: क्रांतीसिंह नाना पाटील यांचे 'पत्री सरकार' (१९४३-४६).

🔸 कार्यपद्धती: ग्रामीण भागात कायदा राखण्यासाठी 'न्यायदान मंडळे' (लोकन्यायालय).

🔸 समाजसुधारणा: गावोगावी दारूबंदी, हुंडाबंदी आणि कमी खर्चाचे 'गांधी विवाह'.



🔷 आंदोलनातील प्रमुख सेना व दले

🔸 तुफान सेना (सातारा): जी. डी. बापू लाड व नाना पाटील; ब्रिटीश रेल्वे व खजिना लुटणे मुख्य कार्य.

🔸 विद्युत वाहिनी (बंगाल): सतीशचंद्र सामंत; तामलुक प्रतिसरकारचे अधिकृत सशस्त्र दल.

🔸 आझाद दस्ता (नेपाळ): जयप्रकाश नारायण; जंगलातून गनिमी काव्याने ब्रिटीश दळणवळण विस्कळीत केले.

🔸 वानर व मांजर सेना: लहान मुले (वानर) व मुलींचे (मांजर) दल; भूमिगत नेत्यांना संदेश व अन्न पुरवणे.

🔸 राष्ट्र सेवा दल (महाराष्ट्र): साने गुरुजी व एस. एम. जोशी; तरुणांना आंदोलनासाठी संघटित केले.



🔷 इतर भागातील प्रतिसरकारे

🔸 १. बलिया (उत्तर प्रदेश): चित्तू पांडे (देशातील पहिले प्रतिसरकार - १ आठवडा).

🔸 २. तामलुक (बंगाल): 'जातीय सरकार' (चक्रीवादळात मदत व समांतर प्रशासन).

🔸 ३. ताल्चेर (ओडिशा): देशातील सर्वात दीर्घकाळ चाललेले प्रतिसरकार.

वैयक्तिक सत्याग्रह (१९४०)

🔷 पार्श्वभूमी


🔸 मुख्य कारण: ब्रिटीश सरकारच्या 'ऑगस्ट ऑफर'ला विरोध करणे.

🔸 मुख्य उद्देश: महायुद्धात भारतीयांची सक्तीची संमती नाही हे दर्शवणे.

🔸 अधिकृत सुरुवात: १५ ऑक्टोबर १९४०.


🔷 प्रमुख सत्याग्रही (क्रमानुसार)

🔸 १. पहिले सत्याग्रही: आचार्य विनोबा भावे.

🔻 ठिकाण: पावनार आश्रम (वर्धा) येथून १७ ऑक्टोबर १९४० ला सुरुवात.

🔻 परिणाम: युद्धविरोधी भाषणामुळे ३ महिन्यांची अटक.

🔸 २. दुसरे सत्याग्रही: पंडित जवाहरलाल नेहरू.

🔻 परिणाम: ब्रिटीश सरकारकडून ४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा.

🔸 ३. तिसरे सत्याग्रही: ब्रह्मदत्त (आश्रमातील संन्यासी).


🔸 ४. चौथे सत्याग्रही: मौलाना अबुल कलाम आझाद.


🔷 आंदोलनाचे स्वरूप व रणनीती

🔸 सत्याग्रह पद्धत: सामूहिक ऐवजी केवळ गांधीजींनी निवडलेले व्यक्तीच वैयक्तिक पातळीवर आंदोलन करणार.

🔸 ब्रिटीश कारवाई: आंदोलन दाबण्यासाठी वृत्तपत्रांवर 'सेन्सॉरशिप' (बातम्यांवर बंदी) लागू.

🔸 दुसरा टप्पा (१९४१): 'सलोखा सत्याग्रह' सुरू करून हजारो कार्यकर्त्यांनी सामूहिक अटक करून घेतली.

🔸 महाराष्ट्र विशेष योगदान:


🔻 बॉम्बे प्रांत सत्याग्रहींच्या संख्येत देशात अग्रस्थानी.

🔻 महाराष्ट्रातून ३,५०० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची अटक.

🔸 अधिकृत घोषणा: "युद्धात ब्रिटीशांना पैशाची किंवा माणसांची मदत करू नका."

🔸 पर्यायी नाव: सत्याग्रही दिल्लीकडे कूच करत असल्याने 'दिल्ली चलो आंदोलन' म्हणूनही प्रसिद्ध.

🔸 समाप्ती: डिसेंबर १९४१ मध्ये जपानच्या युद्धप्रवेशामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीमुळे गांधीजींनी आंदोलन मागे घेतले.

सामाजिक व धार्मिक सुधारणा


🔸 राजा राममोहन रॉय (ब्रह्म समाज - १८२८):
🔹 १८२९: सती बंदी कायदा (लॉर्ड बेंटिकच्या मदतीने).
🔹 १८३३: मृत्यू (ब्रिस्टल, इंग्लंड).
🔹 'भारतीय प्रबोधनाचे जनक' व 'आधुनिक भारताचे निर्माते'.

🔸 महात्मा जोतीराव फुले (सत्यशोधक समाज - २४ सप्टेंबर १८७३):
🔹 १८७३: 'गुलामगिरी' ग्रंथ प्रकाशित.
🔹 १८८०: 'दीनबंधू' वृत्तपत्रास पाठिंबा.
🔹 मुख्य उद्दिष्ट: शोषितांचे शिक्षण व त्यांना हक्क मिळवून देणे.

🔸 डॉ. बाबासाहेब आंबेडकर:
🔹 १९२४: 'बहिष्कृत हितकारिणी सभा' स्थापना.
🔹 १९२७: महाडचा सत्याग्रह (चवदार तळे).
🔹 १९३६: 'स्वतंत्र मजूर पक्षा'ची स्थापना.

🔸 महत्त्वाच्या संस्था व व्यक्ती:
👉 प्रार्थना समाज (१८६७): डॉ. आत्माराम पांडुरंग, न्यायमूर्ती रानडे (विधवा पुनर्विवाह व शिक्षणावर भर).
👉 आर्य समाज (१८७५): स्वामी दयानंद सरस्वती ('वेदांकडे परत चला' हा नारा).
👉 रामकृष्ण मिशन (१८९७): स्वामी विवेकानंद (मानवसेवा हीच ईश्वरसेवा).
👉 थियोसोफिकल सोसायटी: ॲनी बेझंट (भारताच्या सांस्कृतिक पुनरुत्थानासाठी कार्य).

🔸 महाराष्ट्रातील समाजसुधारक:
🔹 गोपाळ गणेश आगरकर: 'केसरी'चे पहिले संपादक, 'सुधारक' साप्ताहिक (सामाजिक सुधारणेस प्राधान्य).
🔹 महर्षी धोंडो केशव कर्वे: १८९९ मध्ये 'विधवा विवाहोत्तेजक मंडळी', १९१६ मध्ये 'पहिले महिला विद्यापीठ'.
🔹 महारषी विठ्ठल रामजी शिंदे: १९०६ मध्ये 'डिप्रेस्ड क्लासेस मिशन'ची स्थापना.

महात्मा जोतीराव फुले व सत्यशोधक समाज व संबंधित व्यक्ती..


🔸 महात्मा जोतीराव फुले:

🔹 जन्म: ११ एप्रिल १८२७, पुणे.

🔹 १८४८: भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा (पुणे).

🔹 १८६३: बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापना.

🔹 १८७३: 'सत्यशोधक समाज' स्थापना (उद्दिष्ट: शूद्रातिशूद्रांना हक्क मिळवून देणे).

🔹 १८७३: 'गुलामगिरी' ग्रंथ प्रकाशित.

🔹 १८८८: 'महात्मा' पदवी (रावबहादूर वडेकरांच्या हस्ते).

🔸 सावित्रीबाई फुले:

🔹 भारताच्या पहिल्या स्त्री शिक्षिका.

🔹 १८५२: 'मुलिनाठी' (मुलींची पहिली शाळा) - वेताळ पेठेत.

🔹 काव्यफुले, बावनकशी सुबोध रत्नाकर हे साहित्य.

🔹 विधवा केशवपनाची पद्धत बंद पाडण्यासाठी नाभिकांचा संप घडवून आणला.

🔸 नारायण मेघाजी लोखंडे (कामगार चळवळीचे जनक):

🔹 १८८०: 'दीनबंधू' वृत्तपत्राचे संपादक.

🔹 १८९०: 'बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन' (पहिली कामगार संघटना) स्थापना.

🔹 कामगारांना रविवारी सुटी मिळवून देण्यात महत्त्वाचे योगदान.

🔹 १८९५: 'राव बहादूर' पदवी.

🔸 कृष्णराव भालेकर:

🔹 सत्यशोधक समाजाचे निष्ठावान कार्यकर्ते.

🔹 १८७७: 'दीनबंधू' साप्ताहिकाची सुरुवात केली (सत्यशोधक समाजाचे मुखपत्र).

🔹 शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी 'दीनबंधू सार्वजनिक सभा' स्थापन केली.

🔹 महात्मा फुलेंच्या विचारांचा प्रसार ग्रामीण भागात करण्यात मोठा वाटा.

प्रकाश (Light)



🔶 प्रकाशाचे स्वरूप व गुणधर्म

🔹 प्रकाशाचे स्वरूप: प्रकाश हा विद्युत चुंबकीय तरंग (Electromagnetic Wave) आहे.

 🔸 निर्वातामध्ये प्रकाशाचा वेग सर्वाधिक असतो (3 x 10^8 m/sec).

 🔸 प्रकाशाचे संक्रमण नेहमी सरळ रेषेत होते.

🔶 परावर्तन (Reflection of Light)

🔹 नियम:
 🔸 आपाती किरण, परावर्तित किरण आणि स्तंभिका एकाच प्रतलात असतात.
 🔸 आपाती कोन (i) = परावर्तन कोन (r).
  🔹 आरशांचे प्रकार व उपयोग:

 🔸 समतल आरसा: प्रतिमा आभासी, सुलट आणि वस्तूच्या आकाराची असते.

 🔸 बहिर्वक्र आरसा: प्रतिमा नेहमी लहान, सुलट आणि आभासी.
   ▫️ उपयोग: वाहनांचे साइड मिरर, रस्ते वळणावरील आरसे.

 🔸 अंतर्वक्र आरसा: प्रतिमा वास्तव आणि उलटी (फोकसच्या बाहेर असताना).
   ▫️ उपयोग: दाढीचा आरसा, डॉक्टरांचे हेड मिरर, सोलर कुकर, टॉर्च, हेडलाईट्स.

🔶 अपवर्तन (Refraction of Light)

🔹 नियम: प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना त्याचे विचलन होते.

🔹 परिणाम:
 🔸 पाण्यात अंशतः बुडवलेली पेन्सिल वाकडी दिसणे.
 🔸 स्विमिंग पूलचा तळ वर आल्यासारखा वाटणे.
 🔸 ताऱ्यांचे लुकलुकणे (वातावरणीय अपवर्तन).

 🔸 सूर्यास्त व सूर्योदयाच्या वेळी सूर्य क्षितिजावर दिसणे.

🔶 मानवी डोळा आणि डिजिटल कॅमेरा: तुलना

🔹 कार्यपद्धती: मानवी डोळा आणि डिजिटल कॅमेरा यांची रचना बऱ्याच अंशी सारखी असते.

🔸 बाहुली (Pupil) = कॅमेरा अपर्चर (Aperture): प्रकाशाची तीव्रता नियंत्रित करतात.

 🔸 डोळ्यातील भिंग (Lens) = कॅमेरा लेन्स: वस्तूवर प्रकाश केंद्रित करतात.

🔸 दृष्टीपटल (Retina) = कॅमेरा सेन्सर (Sensor/Film): प्रतिमा तयार करतात.

🔸 डोळ्याचे स्नायू = कॅमेरा फोकसिंग मेकॅनिझम: प्रतिमा स्पष्ट करण्यासाठी ॲडजस्ट होतात.

🔶 दृष्टीदोष व भिंगांचा वापर

🔹 निकटदृष्टिता (Myopia):
 
🔸 दोष: जवळचे स्पष्ट दिसते, पण लांबचे स्पष्ट दिसत नाही.
 
🔸 निराकरण: 'अंतर्वक्र' (Concave) भिंगाचा वापर.

   🔹 दूरदृष्टिता (Hypermetropia):

🔸 दोष: लांबचे स्पष्ट दिसते, पण जवळचे स्पष्ट दिसत नाही.

🔸 निराकरण: 'बहिर्वक्र' (Convex)
 भिंगाचा वापर.

   🔹 इतर दोष:

🔸 जरादूरदृष्टीता : द्विनाभी (Bifocal) भिंगाचा वापर.

🔸 दृष्टीवैषम्य (Astigmatism): नलाकार (Cylindrical) भिंगाचा वापर.

🔶 प्रकाश विकिरण (Scattering) व अपस्करण (Dispersion)

🔹 विकिरण (Scattering):

🔸 आकाशाचा निळा रंग: रेले विकिरण (Rayleigh Scattering).

🔸 सूर्यास्त/सूर्योदयी सूर्य लाल दिसणे (कमी लांबीचे तरंग विखरून जातात).

   🔹 अपस्करण (Dispersion):
 
🔸 पांढरा प्रकाश सात रंगांत विभागणे.
 
🔸 ता-ना-पि-हि-पा-जा-पा (VIBGYOR):
  
▫️ सर्वाधिक विचलन: जांभळा (Violet) रंग.
   
▫️ सर्वात कमी विचलन: तांबडा (Red) रंग.

🔶 पूर्ण आंतरिक परावर्तन (Total Internal Reflection)

🔹 अटी: प्रकाश घन माध्यमातून विरळ माध्यमात जाताना, आपाती कोन हा क्रांतिक कोनापेक्षा जास्त असावा.

🔹 उदाहरणे

 🔸 मृगजळ 

 🔸 हिऱ्याचे चमकणे.

  🔸 ऑप्टिकल फायबर (Optical Fiber) मध्ये माहितीचे वहन.

🔶 महत्त्वाच्या संकल्पना 
 
🔸 प्रकाशाचे अस्तित्व: प्रकाश हा फोटॉन्स (Photons) चा बनलेला असतो.
 
🔸 प्रकाश वर्ष (Light Year): अंतराचे एकक (9.46 x 10^15 मीटर).
 
🔸 रंग ओळखणे: वस्तूचा रंग ती वस्तू कोणत्या रंगाच्या लहरींचे परावर्तन करते यावर ठरतो.
 
🔸 शुभ्र प्रकाश: काचेच्या लॅन्समधून जाताना प्रकाशाचा वेग कमी होतो.
 
🔸 माध्यमाचा अपवर्तनांक: (Refractive Index) - माध्यमात प्रकाशाचा वेग कमी होण्याचे प्रमाण.
 
🔸 भिंगांचे सामर्थ्य: भिंगांचे सामर्थ्य हे डायऑप्टर (Dioptre) मध्ये मोजले जाते.

♦️ भारतीय शास्त्रज्ञ आणि प्रकाश (Light)

🔶 सर सी. व्ही. रामन (Sir C. V. Raman):

🔹 रामन परिणाम :

🔸 शोध: १९२८ मध्ये त्यांनी प्रकाशाच्या विकिरणाबाबत (Scattering of Light) एक क्रांतिक शोध लावला, ज्याला 'रामन इफेक्ट' म्हणतात.

🔸 सिद्धांत: जेव्हा प्रकाशाचा किरण एखाद्या पारदर्शक माध्यमातून प्रवास करतो, तेव्हा त्यातील रेणूंमुळे प्रकाशाच्या स्वरूपात बदल होतो आणि त्याचे विकिरण होते.

🔸 महत्त्व: या शोधामुळे रेणूंच्या रचनेचा अभ्यास करणे सोपे झाले.

🔸 पुरस्कार: १९३० मध्ये त्यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला. हा सन्मान मिळवणारे ते पहिले आशियाई आणि भारतीय शास्त्रज्ञ होते.

🔸 राष्ट्रीय विज्ञान दिन: त्यांच्या या महान शोधाच्या स्मरणार्थ दरवर्षी २८ फेब्रुवारी हा दिवस भारतात 'राष्ट्रीय विज्ञान दिन' म्हणून साजरा केला जातो.

२१ ऑगस्ट २०२६

ऑगस्ट 2026 चालू घडामोडी



01) कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच सर्पदंशाला 'अधिसूचित रोग' म्हणून घोषित केले आहे ? 
– महाराष्ट्र

02) अलीकडेच इराकसाठी भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे ? 
– अजय ए. कुमार

03) वयाच्या 93 व्या वर्षी निधन झालेले बिल रासमुसेन कोणत्या क्षेत्रातील होते ? 
– क्रीडा

04) केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी कोणत्या आजाराला राष्ट्रीय प्राधान्य दिले जाईल अशी घोषणा केली ? 
– मधुमेह

05) जगातील सर्वात तरुण चार्टर्ड अकाउंटंट कोण बनले आहेत ? 
– लक्ष्मणन मेय्यप्पन

06) भारताचे कोणते राष्ट्रपती, डॉ. शंकर दयाल शर्मा, 19 ऑगस्ट 2026 रोजी आपली 108 वी जयंती साजरी करतील ?
– नववे

07) ताम्रभरणी नदी कोणत्या राज्याची आहे, जिला मद्रास उच्च न्यायालयाने कायदेशीर व्यक्तीचा दर्जा दिला आहे ? 
– तामिळनाडू

08) रवींद्र जडेजा कसोटी क्रिकेटमध्ये 4,000 पेक्षा जास्त धावा आणि 350 पेक्षा जास्त बळी घेणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे ? 
– दुसरे

09) कोणत्या देशाने डॉ. जल रतनजी पटेल आणि डॉ. जल धायभोकु यांना आपला सर्वोच्च नागरी सन्मान, 'निशान-ए-इम्तियाज' प्रदान करण्याची घोषणा केली आहे ? 
– पाकिस्तान

10) मुंबईत आयोजित आशियाई ज्युनियर ब्लिट्झ बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2026 कोणी जिंकली ? 
– विग्नेश वर्मुला आणि सरन्या देवी

11) दूरदर्शनच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे ? 
– रीना सोनोवाल कौल