०३ ऑक्टोबर २०२४

भारतीय राज्यघटनेची प्रमुख व महत्त्वाची वैशिष्ट्ये – भारतीय राज्यघटनेतील तरतुदींचे महत्त्वाचे स्त्रोत पुढीलप्रमाणे…

भारतीय राज्यघटनेची प्रमुख व महत्त्वाची वैशिष्ट्ये –
महत्वाचे मुद्दे
भारतीय राज्यघटनेची प्रमुख व महत्त्वाची वैशिष्ट्ये –
भारतीय राज्यघटनेतील तरतुदींचे महत्त्वाचे स्त्रोत ....

१) लिखित घटना

भारतीय राज्यघटनेचे स्वरूप लिखित आहे. लिखित घटना एका निश्चित वेळी तयार केली जाते व एका निश्चित तारखेपासून अधिनियमात व अमलात येते.

भारतीय राज्यघटनेचे स्वरूप लिखित आहे मात्र ब्रिटनची राज्यघटना अलिखित स्वरुपाची आहे.

सध्या भारताच्या घटनेत २५ भाग ४६१ कलमे आणि १२ अनुसूची आहेत. अमेरिकेच्या राज्यघटनेची तुलना करावयाचे झाल्यास अमेरिकेच्या घटनेत केवळ ७ कलमे आहेत.

भारतीय घटना विस्तृत का?

भारतीय घटनेमध्ये जगातील विविध देशांच्या घटनांचा अभ्यास करून चांगल्या वैशिष्ट्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये केला असल्यामुळे घटना विस्तृत झाली आहे.

देशाच्या प्रशासनाचे तपशीलवार विवेचन भारतीय राज्यघटनेमध्ये आहे.

केंद्र व राज्याची सामायिक एकच घटना असल्यामुळे घटनेचा विस्तार वाढला आहे.

कलम ३७० कलम ३७१ ते कलम ३७१ (J) मध्ये राज्यांची संबंधित विशेष तरतुदी देण्यात आल्या आहेत.
भारतीय संघराज्य व्यवस्था बळकट करण्यासाठी केंद्र-राज्य संबंध तपशीलवार देण्यात आले आहेत.
मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्त्वे मूलभूत कर्तव्य यांचे विस्तृत स्पष्टीकरण घटनेमध्ये भर घालते.
इतर देशांच्या घटनांचा अभ्यास व त्या या देशातील महत्त्वाच्या कलमांचा अंतर्भाव यामुळे भारतीय राज्यघटनेचा आकार वाढला आहे.

२) राज्यघटनेचे विविध स्त्रोत rajyaghatanechi vaishishte

सुमारे ६० देशांच्या घटनांचा विचार करून त्यातील महत्त्वाच्या तरतुदींचा समावेश भारतीय घटनेमध्ये करण्यात आलेला आहे.

भारत सरकार कायदा १९३५ नुसार भारतीय राज्यघटनेचा संरचनात्मक आराखडा मांडण्यात आलेला आहे या कायद्यातील सुमारे २५० तरतुदी स्वीकारण्यात आल्या आहेत.

घटनेचा तात्विक भाग म्हणजे मूलभूत हक्क हे अमेरिकेच्या घटनेवरून स्वीकारण्यात आले आहेत तर मार्गदर्शक तत्वे आयरिश घटनेवरून घेण्यात आले आहेत.

घटनेच्या राजकीय भागाचा विचार करता ब्रिटनच्या घटनेवर आधारलेली संसदीय शासन व्यवस्था भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेली आहे.

कॅनडा जर्मनी फ्रान्स जपान दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया रशिया इत्यादी देशांच्या घटनेचा प्रभाव भारतीय राज्यघटने वरती दिसून येतो. याच कारणामुळे भारतीय राज्यघटनेला उसनी घटना(Borrowed Constitution), ठीगळांचे कार्य(patchwork), पश्चिमेचे अनुकरण(slavish imitation of the west), अशा टीका केल्या जातात. मात्र यामध्ये भारतीय परिस्थितीला अनुसरून त्यामध्ये बदल करण्यात आलेले आहे म्हणून हे सुंदर ठिकाणांचे कार्य आहे असे संबोधले जाते.

भारतीय राज्यघटनेतील तरतुदींचे महत्त्वाचे स्त्रोत पुढीलप्रमाणे…

भारत सरकार कायदा १९३५ – भारत सरकारच्या १९३५ च्या कायद्यानुसार संघराज्य व्यवस्था, न्यायव्यवस्था, लोकसेवा आयोग, आणीबाणीच्या तरतुदी, राज्यपालाचे पद, प्रशासकीय तपशील इत्यादी भाग स्वीकारण्यात आलेला आहे. भारतीय राज्यघटना ही मूलतः भारत सरकार कायदा १९३५ वर आधारित आहे. rajyaghatanechi vaishishte
ब्रिटिश घटना – संसदीय शासन व्यवस्था, कॅबिनेट, द्विगृही संसद, फर्स्ट पास्ट पोस्ट सिस्टीम, कायदा करण्याची पद्धत, कायद्याचे राज्य, एकच नागरिकत्व आणि विशेषाधिकार हे ब्रिटिश घटनेवरून स्वीकारण्यात आले आहेत.

अमेरिकेची घटना – मूलभूत हक्क, उपराष्ट्रपती, न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य, न्यायिक पुनर्विलोकन, राष्ट्रपती वरील महाभियोग, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची पदावरून दूर करण्याची पद्धत याबाबी अमेरिकेच्या घटनेवरून स्वीकारण्यात आलेल्या आहेत.

कॅनडा ची घटना – प्रभावी केंद्र असलेले संघराज्य शेषाधिकार, राज्यपालाची नेमणूक, सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकारक्षेत्र या बाबी कॅनडाच्या घटनेवरून स्वीकारण्यात आलेल्या आहेत.
आयरिश घटना – मार्गदर्शक तत्त्वे, राष्ट्रपतींची निवडणूक, राज्यसभेतील सदस्यांचे नामनिर्देशन या बाबी आयरिश घटनेवरून स्वीकारण्यात आलेल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाची घटना – समवर्ती सूची, संयुक्त बैठक, व्यापार व वाणिज्य चे स्वातंत्र्य या बाबी ऑस्ट्रेलियाच्या घटनेचा अभ्यास करून स्वीकारण्यात आलेल्या आहेत.
जपानची घटना – कायद्याने प्रस्थापित पद्धत
सोवियत रशिया ची घटना – मूलभूत कर्तव्य, प्रस्ताविकातील सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाचा आदर्श

वेईमर घटना (जर्मनी) – आणीबाणीच्या कालावधीतील तरतुदी व मूलभूत हक्कांमध्ये होणारा बदल
दक्षिण आफ्रिका – घटना दुरुस्ती ची पद्धत, राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक
फ्रान्सची घटना – गणराज्य, प्रास्ताविकेल स्वातंत्र्य, समता, बंधुता या गोष्टी फ्रान्सच्या घटनेवरून घेण्यात आलेल्या आहेत.

३) संघराज्य व्यवस्था (rajyaghatanechi vaishishte) – भारतीय घटनेने संघराज्य व्यवस्था स्वीकारलेली आहे संघराज्य व्यवस्थेची वैशिष्ट्ये आपल्या घटनेमध्ये आढळतात. केंद्र व घटक राज्य सरकारांचे अस्तित्व, अधिकारांची विभागणी, घटनेची स्वच्छता घटनेची ताठरता स्वतंत्र न्याय व्यवस्था द्विगृही कायदे मंडळ इत्यादी.

घटनेमध्ये गैर संघात्मक किंवा एकात्मक वैशिष्ट्ये ही आढळतात. त्यामध्ये प्रभावी केंद्रशासन एकच घटना एकेरी नागरिकत्व घटनेची लवचिकता एकात्मिक न्यायव्यवस्था अखिल भारतीय सेवा.

म्हणूनच भारतीय राज्यघटनेचे वर्णन अर्ध-संघराज्यीय (k.c. व्हेअर), वाटाघाटीचे संघराज्य (मॉरीस जोन्स) सहकारी संघराज्य (ऑस्टिन), केंद्रीकरण्याची प्रवृत्ती असलेले संघराज्य (इवोर जिनिंग)

४) संसदीय शासन पध्दती (rajyaghatanechi vaishishte)

भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार ब्रिटनच्या घटनेवरून केलेला आहे. अध्यक्षीय शासन व्यवस्थेत कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ पूर्णपणे विभक्त असतात मात्र संसदीय शासन व्यवस्थेमध्ये यांच्यामध्ये समन्वय व सहकार्य असते.

संसदीय शासन व्यवस्थेमध्ये मंत्रिमंडळाचे निवड कायदे मंडळाच्या सदस्याकडून केली जाते व मंत्रिमंडळ म्हणजेच कार्यकारी मंडळ हे कायदेमंडळाला जबाबदार असते. राष्ट्रप्रमुख हे नामधारी कार्यकारी प्रमुख असतात तर शासन प्रमुख हे वास्तव कार्यकारी प्रमुख असतात.

भारतीय संसदीय शासन व्यवस्थेची वैशिष्ट्ये
राष्ट्रपती नामधारी प्रमुख पंतप्रधान वास्तव प्रमुख
मंत्री कायदेमंडळाच्या सदस्य असणे.

मंत्रिमंडळाची कायदेमंडळा प्रति जबाबदारी
कनिष्ठ सभागृह चे विसर्जन
बहुमताचे सरकार
या वैशिष्ट्यामुळे संसदीय शासन व्यवस्थेला जबाबदार शासन व्यवस्था किंवा कॅबिनेट शासन व्यवस्था असेही म्हणतात. या व्यवस्थेमध्ये पंतप्रधानांची भूमिका महत्त्वाचे असल्याने पंतप्रधान शासनव्यवस्था असेही म्हटले जाते.

भारतीय संसदीय शासन व्यवस्था व ब्रिटिश संसदीय शासन व्यवस्थेमध्ये मूलभूत फरक आहे ब्रिटिश पार्लमेंट प्रमाणे भारतीय संसद सार्वभौम संस्थां नाही.

भारतीय राज्यसंस्था ही एक गणराज्य आहे व ब्रिटिश राज्यसंस्था ही राजेशाही आहे.

५) ताठर व लवचिक (rajyaghatanechi vaishishte)

भारताची राज्यघटना अति ताठर ही नाही व अति लवचिकही नाही यामुळे ताठरता व लवचिकता याचे एकत्रीकरण भारतीय राज्यघटनेमध्ये दिसून येते. ताठर घटनेची घटना दुरुस्ती पद्धत कठीण असते उलट लवचिक घटनेची घटना दुरुस्ती सोपी असते.

भारतीय राज्यघटनेच्या कलम 368 मध्ये घटना दुरुस्ती ची पद्धती देण्यात आली आहे.

घटनेच्या काही तरतुदींमध्ये बदल करण्यासाठी संसदेच्या विशेष बहुमताची आवश्यकता असते.

घटनेतील संघराज्याची वैशिष्ट्ये यामध्ये बदल करण्यासाठी वरीलप्रमाणे विशेष बहुमता बरोबरच निम्म्या राज्यांचे समर्थन आवश्यक असते.

या पद्धतीने घटना दुरुस्ती करणे अवघड असल्याने घटना ताठर मानली जाते. मात्र घटनेच्या काही तरतुदी मध्ये केवळ साध्या बहुमताने बदल करता येतो याबाबतीत घटना लवचिक आहेत.

६) संसदीय सार्वभौमत्व व न्यायिक सर्वोच्चता याचे संतुलन (rajyaghatanechi vaishishte) – भारतीय राज्यघटनेत कायदे मंडळ व न्याय मंडळ यांच्यामध्ये अधिकाराबाबत योग्य संतुलन राखण्यात आले आहे. संसदेला कायदा व घटना दुरुस्ती करण्याचे अधिकार आहेत आणि संसदेने केलेले कायदे घटनादुरुस्त्या घटनात्मक आहेत किंवा नाहीत हे ठरवण्याचा अधिकार न्यायालयांना आहे. यात न्यायालयांना सर्वोच्चता आहे. म्हणजेच भारतीय संसद पूर्णपणे सार्वभौम नाही आणि सर्वोच्च न्यायालय सुद्धा सर्वोच्च नाही तर दोघांच्या अधिकारांमध्ये संतुलन निर्माण करण्यात आलेले आहे. केशवानंद भारती खटला 1973 नुसार असे संतुलन निर्धारित करण्यात आले.

७) स्वतंत्र व एकात्मिक न्यायव्यवस्था – (rajyaghatanechi vaishishte)

भारताच्या घटनेने कायदेमंडळ कार्यकारी मंडळ यांच्याबाबतीत संघराज्य व्यवस्था निर्माण केलेली आहे मात्र न्याय व्यवस्था एकात्मिक ठेवण्यात आली आहे. एकात्मिक न्यायव्यवस्थेत सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालय अशी क्रमबद्ध शृंखला आहे. भारताच्या घटनेने सर्वोच्च न्यायालयाला संघराज्य न्यायालय, अपीलाचे न्यायालय, मूलभूत हक्काचा हमीदाता, घटनेचा संरक्षक बनवले आहे.

८) मूलभूत हक्क –

लोकशाहीमध्ये नागरिकांना समान हक्क प्राप्त होतात. नागरी जीवनासाठी हे मूलभूत हक्क असतात.भारताच्या घटनेने असे हक्क उपलब्ध करून दिले आहेत. मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ट असल्याने ते प्राप्त करून घेता येतात. हे हक्क नागरिकांना शासन संस्थे विरुद्ध उपलब्ध आहेत. मूलभूत हक्क मुळे देशात राजकीय लोकशाहीच्या संकल्पनेची पूर्तता करण्याचे कार्य करतात. असे मूलभूत हक्क व मर्यादित नसून त्यावर बंधने आहेत.

९) राज्यधोरणाची मार्गदर्शक तत्त्वे (rajyaghatanechi vaishishte) –

मार्गदर्शक तत्वे भारतीय घटनेचे एक वैशिष्ट्य आहे.ही तत्वे कल्याणकारी राज्याची निर्मिती करून लोकांना सामाजिक व आर्थिक न्याय मिळवून देण्यासाठी समाविष्ट करण्यात आलेली आहेत. मार्गदर्शक तत्वे न्यायप्रविष्ट नाहीत मात्र देशाच्या प्रशासनात सरकारला मार्गदर्शक आहेत. घटनेच्या प्रारंभा नंतर मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्वे यापैकी वरचढ कोण असा प्रश्न निर्माण झाला. यावेळी मिनर्वा मिल खटला १९८० मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निवाडा दिला की भारतीय घटनेतील मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्वे संतुलनाच्या आधार शिलेवर आधारलेली आहेत.

१०) मूलभूत कर्तव्य – (rajyaghatanechi vaishishte)

स्वर्ण सिंह समितीच्या शिफारशीनुसार ४२ वी घटनादुरुस्ती १९७६ मध्ये मूलभूत कर्तव्य कलम ५१ अ मध्ये अंतर्भूत करण्यात आली. यात दहा मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट करण्यात आली. २००२ मध्ये ८६ व्या घटनादुरुस्तीने अकरावे कर्तव्य अंतर्भूत करण्यात आले.

११) आणीबाणी विषयक तरतुदी (rajyaghatanechi vaishishte)-

घटनाकर्त्यांनी कारभार चालवणे अवघड असण्याच्या स्थितीची कल्पना करून आणीबाणीची तरतूद केली. अशा कारभाराच्या स्थितीमध्ये देशाची राजकीय लोकशाही व्यवस्था व घटना यांचे संरक्षण करता यावे यासाठी आणीबाणीच्या तरतुदी दिलेल्या आहेत.

घटनेमध्ये तीन प्रकारच्या आणीबाणीची तरतूद आहे

३५२ कलमानुसार राष्ट्रीय आणीबाणी युद्ध, परकीय आक्रमण किंवा सशस्त्र उठाव या कारणावरून पुकारले जाते.
३५६ कलमा अंतर्गत घटक राज्यातील आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट स्पष्ट करण्यात आलेली आहे.
३६० कलमानुसार भारताच्या वित्तीय स्थैर्य किंवा पत धोका निर्माण झाल्यास अशी आणीबाणी पुकारता येते.
१२) एकेरी नागरिकत्व –

संघराज्य शासन व्यवस्थेत दुहेरी नागरिकत्व दिले जाते. त्यामुळे नागरिकांना राज्य सरकारचे व केंद्र सरकारचे असे दोन प्रकारचे हक्क प्राप्त होतात.भारतीय जनतेला मात्र भारतीय घटनेने एकच नागरिकत्व बहाल केलेले आहे. देशातील प्रादेशिक भिन्नता कमी करून नागरिकांमध्ये राष्ट्रवादाची एकच भावना वाढीस लावणे हा उद्देश एकेरी नागरिकत्व मागे आहे.

१३) सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धत –

भारतीय लोकशाही एक व्यक्ती एक मत या तत्वावर चालते. कलम ३२६ मध्ये सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या व्यवस्थेची तरतूद आहे. भारतीय घटनेत सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या पद्धती द्वारे राजकीय समानता प्रस्थापित करते.

१४) धर्मनिरपेक्ष राज्य (rajyaghatanechi vaishishte) –

भारतीय राज्यघटनेने धर्मनिरपेक्ष राज्याची निर्मिती केली आहे. प्रस्ताविका व्यतिरिक्त कोठेही धर्मनिरपेक्ष शब्द आढळत नाही. मात्र घटनेतील विविध तरतुदी वरून धर्मनिरपेक्षता दिसून येते.भारतात सकारात्मक धर्मनिरपेक्षता स्वीकारण्यात आलेली आहे. यामध्ये राज्य कोणत्याही धर्माचा पुरस्कार करणार नाही मात्र सर्व धर्मांना समान वागणूक दिली जाते.

महादेव गोविंद रानडे :



जन्म - 18 जानेवारी 1842, निफाड (नाशिक).

मृत्यू - 16 जानेवारी 1901.

रानडे यांना हिन्दी अर्थशास्त्राचे जनक म्हणून संबोधले जात .

तसेच त्यांना पदवीधरांचे मुकुटमणी असेही म्हटले जात असे .

रानडे हे अक्कलकोटी राज्याचे कारभारी होते.

1886 - भारत सरकार अर्थसमितीचे सदस्य वित्तीय समितीवर नियुक्त होणारे पहिले भारतीय.

रानडे हे गोपाल कृष्ण गोखले यांचे गुरु होते .

त्यांना महाराष्ट्राच्या प्रबोधनाचे जनक म्हटले जात .

समाजसुधारकांसाठी सर्वांगीण प्रतिमान मांडणारे प्रज्ञावंत.

रानडे हे आर्थिक राष्ट्रवादी होते .

1887 - सामाजिक परिषद.

1890 - औद्योगिक परिषद.

त्यांना मराठी पत्रकारीतेचे जनक असेही म्हटले जात असे.

संस्थात्मिक योगदान :


1865 - विधवा विवाहोत्तेजक मंडळी (विष्णु पंडित) सहाय्य.

1867 - मुंबई येथे प्रार्थना समाज स्थापनेत सहभाग.

1870 - सार्वजनिक सभा स्थापनेत सहभाग.

उद्दीष्ट - थंड गोला घेवून पडलेल्या समाजात विचार, संघटना व कृतीची सांगड घालण्यासाठी व्यासपीठ उभे केले.

वकृत्वोत्तेजक सभा - पुणे.

नगर वचन मंदिर - पुणे.

1875 वसंत व्याख्यान - माला (पुणे).

1882 - हुजूरपागा शाळा (पुणे).

31 ऑक्टोबर 1896 डेक्कन सभा.

1896 - हिंदू विडोज होम.

इन्फेक्शन डेसिजेस हॉस्पिटल स्थापन केले .

मराठी ग्रंथोत्तेजक मंडळी, नाशिक.

पुना मार्कटाईल बँक, रशीम गिरणी, लवाद कोर्ट, पुणे रंगशाला यांच्या स्थापनेत सहभाग.

1889 - Industrial As Sociation Of Western India स्थापन.

रानडे यांनी केलेले लेखन :


इंदु प्रकाश (मासिक).

एकेश्र्वरनिष्ठांची कैफियत.

1874 - जबाबदार राज्यपद्धतीची मागणी करणारा अर्ज.

1888 - ऐजेस ऑन इंडियन इकॉनॉमिक्स.

मराठी सत्तेचा उदय.

मराठी पत्रकारितेचा पाया घातला.

निबंध - प्रजावृद्धीचे दुष्परिणाम, मराठा सत्याग्रहातील नाणी व चलन.

'तरुण शिकलेल्या लोकांची कर्तव्य' हा निबंध ज्ञानप्रसारक नियतकालिकात गाजला.

वैशिष्ट्ये :

ग. व. जोशी यांच्या सामाजिक व आर्थिक विचारांचा प्रभाव.

भारतात प्रागतिक सनदशीर राजकारणाचा पाया घातला.

1873 - 11 वर्ष वयाच्या मुलीसोबत पुनर्विवाह.

पंचहौद मिशन प्रकरणी प्रायश्र्चित घेतले.

संमतीवय विधेयकास पाठिंबा.

इंडियन नॅशनल कॉग्रेसला पाठिंबा.

दारिद्र्यनिर्मूलनासाठी औद्योगीकरणाचा उपाय सुचवले.

'महाष्ट्राला पेशवाईनंतर आलेली प्रेतकळा उडवून सचेतन करण्याची काळजी आमरण वाहिनी.' टिळकांचे मत.

भारतीय क्रांतिकारी संघटना.



🅾️वयायाम मंडळ
– चाफेकर बंधू  ( १८९६ )

🅾️अनुशीलन समिती
– ज्ञानेंद्रनाथ बोस ( १९०१ ) मिदनापुर

🅾️अभिनव भारत( पुणे )
– वि .दा .सावरकर  ( १९०२ )

🅾️इडिया हाऊस
– श्यामजी कृष्णा वर्मा ( १९०४ )

🅾️सवदेश बांधव समिती
– अश्विनीकुमार दत्त ( १९०५ )

🅾️अभिनव भारत( लंडन)
– वि. दा. सावरकर ( १९०६ )

🅾️इडियन इंडिपेंडस लिग
– तारकानाथ दत्त ,अमेरिका, १९०७

🅾️अनुशीलन समिती
– विरेंद्रकुमार घोष - भूपेंद्र दत्त
                  १९०७ ( ढाका )

🅾️भारत माता सोसायटी
– अजितसिंह आंबाप्रसाद (१९०७ )

🅾️गदर पार्टी
– लाला हरदयाळ ( १९१३ )

🅾️इडियन इंडिपेंडस लिग
– लाला हरदयाळ - विरेंद्र चट्टोपाध्याय ( १९१४ ) ( बर्लिन )

🅾️इडियन इंडिपेंडस लिग
– राज महेंद्र प्रताप ( १९१५ ) काबूल

🅾️हिन्दुस्थान रिपब्लिकन असोशिएशन
– सचिंद्रनाथ संन्याल ( १९२४ )

🅾️नौजवान सभा
– भगतसिंग ( १९२६ ) (लाहोर)

🅾️हिन्दुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोशियशन
– चंद्रशेखर आझाद (१९२८)

🅾️इडियन इंडिपेंडन्स लिग( *टोकियो* )
– रासबिहारी बोस (१९४२)

🅾️आझाद हिंद सेना
– रासबिहारी बोस (१९४२) टोकियो

घटना समिती राज्यनिहाय सदस्य

भारतीय प्रांत सदस्य:-229

मद्रास:-49   मुंबई:-21

बंगाल:-19   संयुक्त प्रांत:-55

पूर्व पंजाब:-12  बिहार:36

मध्य प्रांत:-17   आसाम:-8

ओरिसा:-9


⭕️दिल्ली अजमेर मारवाड प्रत्येकी 1 सदस्य होते


घटना समिती

सांप्रदायिक प्रतिनिधित्व

⚛हिंदू:-163   ⚛मुस्लिम:-80

⚛SC:-31      ⚛ST:-6

⚛भारतीय ख्रिशन:-6

⚛शीख:-4     ⚛पारशी:-3

⚛अँग्लो इंडियन:-3

एकूण 296 सदस्य आहेत

I N D I A N  R U L E R S             (Delhi sultanat)

1.👉गुलाम वंश
1=1193 मुहम्मद गौरी
2=1206 कुतुबुद्दीन ऐबक
३=१२१० अराम शाह
४=१२११ इल्तुतमिश
५=१२३६ रुकनुद्दीन फिरोज शाह
६=१२३६ रझिया सुलतान
७=१२४० मुइझुद्दीन बहराम शाह
8=1242 अल्लाउद्दीन मसूद शाह
9=1246 नसिरुद्दीन महमूद 
10=1266 ग्यासुद्दीन बलबन
11=1286 काई खुशरो
१२=१२८७ मुइज्जुद्दीन कैकुबाद
13=1290 शमुद्दीन कैमूर
👉**1290 गुलाम वंशाचा अंत झाला
(राज्यकाळ - अंदाजे 97 वर्षे)**

2.👉 खिलजी घराणे
1=1290 जलालुद्दीन फिरोज खिलजी
२=१२९६
अल्लाउद्दीन खिलजी
४=१३१६ सहाबुद्दीन उमर शाह
५=१३१६ कुतुबुद्दीन मुबारक शाह
६=१३२० नसिरुद्दीन खुसरो शाह
7=1320 खिलजी वंशाचा अंत झाला
👉(राज्यकाळ - अंदाजे 30 वर्षे)

3.👉 तुघलक वंश
१=१३२० घियासुद्दीन तुघलक पहिला
२=१३२५ मुहम्मद बिन तुघलक दुसरा  
३=१३५१ फिरोजशाह तुघलक
४=१३८८ गियासुद्दीन तुघलक दुसरा
५=१३८९ अबू बकर शाह
६=१३८९ मुहम्मद तुघलक तिसरा
७=१३९४ सिकंदर शाह पहिला
८=१३९४ नसिरुद्दीन शाह दुसरा
९=१३९५ नसरत शाह
10=1399 नसिरुद्दीन मेहमेद शाह पुन्हा सत्तेवर आले.
11=1413 दोलतशाह
1414 तुघलक वंशाचा अंत झाला
👉(राज्यकाळ - अंदाजे 94 वर्षे)

4.👉सय्यद घराणे
1=1414 खिजर खान
२=१४२१ मुइज्जुद्दीन मुबारक शाह दुसरा
३=१४३४ मुहम्मद शाह चौथा
४=१४४५ अल्लाउद्दीन आलम शाह
1451 मध्ये सईद वंशाचा अंत झाला
👉(राज्यकाळ - अंदाजे 37 वर्षे)

5.👉 लोदी घराणे
1=1451 बहलोल लोदी
२=१४८९ सिकंदर लोदी दुसरा
३=१५१७ इब्राहिम लोदी
1526 मध्ये लोदी वंशाचा अंत झाला
👉(राज्यकाळ - अंदाजे 75 वर्षे)
🙏💥🔥💥🔥💥🔥💥🔥💥🔥💥🙏

२६ सप्टेंबर २०२४

BMC परीक्षेविषयी माहिती


1) मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया ही वास्तू कोणत्या बंदरावर उभारण्यात आलेली आहे ? 👉अपोलो बंदर


2) गेट वे ऑफ इंडियाची उंची किती आहे?👉 26 मी. (85 फूट)


3) गेट ऑफ इंडिया चे उद्घाटन कधी करण्यात आले? 👉 04 डिसेंबर 1924


4) गेट वे ऑफ इंडिया वरील शिलालेखात रोमन अंकात काय लिहिलेलं आहे ? 👉 MCMXI म्हणजे रोमन अंकात 1911


5) गेट वे ऑफ इंडियाचे वास्तुकार कोण आहेत? 👉जॉर्ज विटेट 


6) गेट वे ऑफ इंडिया कुणाच्या भेटीचे स्मारक म्हणून निर्माण करण्यात आले आहे ?👉 राजा पाचवा जॉर्ज व राणी मेरी (2) डिसेंबर 1911)


7) मुंबईतील कोणत्या वास्तूला भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते?👉 गेट वे ऑफ इंडिया


8) प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय कोणत्या कधी व कोणत्या ठिकाणी उभारण्यात आले ? 👉 11 नोव्हेंबर 1905 मध्ये मुंबई येथे.


9) प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालयाचे नवीन नाव काय आहे?👉 छ. शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय


10) मुंबईतील राजाबाई क्लॉक टॉवर (घंटाघर) हे इंग्लंड मधील कोणत्या वास्तूच्या धर्तीवर उभारण्यात आले आहे? 👉इंग्लंड मधील लंडन शहरातील बिग बेन.


11) राजाबाई टॉवर उभारण्यासाठी त्याच्या आई राजाबाई याच्या स्मुर्तीप्रित्यर्थ कुणी २ लाख

रु देणगी दिली होती?👉 प्रेमचंद रायचंद


12) मुंबई शेअर बाजाराची स्थापना कधी झाली? 👉9 जुलै 1875


 13) मुंबई शेअर बाजाराचे संस्थापक म्हणून कुणाला ओळखले जाते ?👉 प्रेमचंद रायचंद


 14) बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ची इमारत मुंबई मध्ये कोणत्या ठिकाणी आहे ? 👉 दलाल स्ट्रीट.


बृहन्मुंबई  जिल्हा विशेष


• ✅मुंबईमधील वांद्रे वरळी यास जोडणाऱ्या सागरी सेतुला कोणाचे नाव दिले आहे?=   राजीव गांधी


✅क्षेत्रफळाचा विचार करता महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता = मुंबई शहर


✅• सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले महारष्ट्रातील जिल्हा कोणता  - मुंबई शहर


✅न्हावाशेवा येथील अत्याधुनिक बंदराप्त खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आले आहे?=   जवाहरलाल नेहरू


✅भारतातील पहिले दूरदर्शन केव्हा सुरू झाले? = 1959


✅प्रीन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय कोठे आहे? - मुंबई


✅राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन

कोठे झाले? - मुंबई


✅'महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे - मुंबई


✅महाराष्ट्रात पहिली कापड गिरणी कोणत्या ठिकाणी सुरू झाली - मुंबई


✅भारतातील पहिली कापड गिरणी कोणी सुरू केली == कावसजी दावर


✅ फिशरी सव्र्व्हे ऑफ इंडिया या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे -= मुंबई


✅• केंद्रीय मत्स्यशिक्षण संस्था महाराष्ट्रात कोठे आहे  =  मुंबई


✅• माहिती तंत्रज्ञान हार्डवेअर पार्क कोठे विकसित होत आहे -  = द्रोणागिरी, नवी मुंबई

आणीबाणी



1. आणीबाणीचे प्रकार

   - कलम 352: राष्ट्रीय आणीबाणी (युद्ध, बाह्य आक्रमण, सशस्त्र बंड).

   - कलम 356: राष्ट्रपती राजवट (राज्य शासन).

   - कलम 360: आर्थिक आणीबाणी (आजपर्यंत लागू नाही).


2. घोषणेसाठी आधार

   - भारताची सुरक्षा: 

   - 42 वी घटनादुरुस्ती: विशिष्ट भागात आणीबाणी.

   - 44 वी घटनादुरुस्ती: "आंतरर्गत गोंधळ" चे "सशस्त्र बंड" मध्ये बदल; मंत्रिमंडळाच्या लेखी शिफारशीची आवश्यकता.


3. न्यायालयीन पुनरावलोकन

   - 38 वी घटनादुरुस्ती: राष्ट्रीय आणीबाणी पुनरावलोकनापासून मुक्त.

   - 44 वी घटनादुरुस्ती: तरतूद हटविली.

   - मिनर्वा मिल्स प्रकरण (1980): आणीबाणीची घोषणा न्यायालयात आव्हान दिली जाऊ शकते.


4. मंजुरी प्रक्रिया

   - संसद मंजुरी: एका महिन्याच्या आत (पूर्वी दोन महिने होते).

   - लोकसभा विसर्जन असल्यास: नवीन लोकसभेच्या पहिल्या बैठक पासून 30 दिवस टिकेल, राज्यसभेची मंजुरी आवश्यक.

   - वाढ: दर सहा महिन्यांनी संसदेच्या मंजुरीने अनिश्चित काळासाठी वाढवता येते.


5. मंजुरीसाठी बहुमत

   - एकूण सदस्य: बहुमत आवश्यक.

   - उपस्थित आणि मतदान करणारे: दोन-तृतीयांश बहुमत.


6. राष्ट्रीय आणीबाणीचे रद्दीकरण

   - राष्ट्रपतींचे रद्दीकरण: कधीही शक्य.

   - लोकसभा ठराव: सतत चालू ठेवण्याचे नकार.

   - लेखी सूचना: एक-दशांश सदस्यांनी सूचना द्यावी; 14 दिवसांत विशेष बैठक बोलवावी.

   - साधे बहुमत: नकारासाठी.


7. राष्ट्रीय आणीबाणीचे परिणाम

   - केंद्र-राज्य संबंध: कार्यकारी, विधायी, आर्थिक बदल.

   - आयुष्य वाढ: लोकसभा आणि राज्य विधानमंडळांचे कार्यकाळ वाढविला जाऊ शकतो.

   - मूलभूत अधिकार:

     - कलम 19: स्वयंचलित निलंबन (कलम 358).

     - कलम 32: राष्ट्रपतींच्या परवानगीने निलंबन (कलम 359).


8. ऐतिहासिक उदाहरणे

   - 1962, 1971, 1975: राष्ट्रीय आणीबाणी घोषित.

केंद्रीय दक्षता आयोग (Central Vigilance Commission)



🔻भारतातील एक सर्वोच्च सरकारी संस्था जी देशाच्या सार्वजनिक प्रशासनात अखंडता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्त्व वाढवण्यासाठी जबाबदार आहे.

🔻स्थापनाः 1964 - संथानम समितीच्या शिफारशींनुसार.

🔻2003 मध्ये वैधानिक दर्जा 

🔻रचनाः राष्ट्रपतींद्वारे नियुक्त एक केंद्रीय दक्षता आयुक्त (अध्यक्ष) आणि कमाल दोन दक्षता आयुक्त (सदस्य) +2

🔻CVC कोणत्याही मंत्रालय/विभागाद्वारे नियंत्रित नाही. 

CVC एक स्वतंत्र संस्था आहे जी केवळ संसदेला जबाबदार आहे..

🔻लाचलुचपत प्रतिबंधक कायदा, 1988 अंतर्गत काही विशिष्ट श्रेणीतील लोकसेवकांनी केलेल्या गुन्ह्यांची  'चौकशी करण्याचा अधिकार आहे.

🔻CVC ला भ्रष्टाचार किंवा पदाच्या गैरवापराच्या तक्रारी प्राप्त होतात आणि तिच्यातर्फे योग्य कारवाईची शिफारस केली जाते.

🔻CVC ही तपास यंत्रणा नाही. सीव्हीसी एकतर सीबीआय किंवा सरकारी कार्यालयातील मुख्य दक्षता अधिकाऱ्यांमार्फत (सीव्हीओ) तपास करते.

🔻पहिले CVC: एन. एस. राव)

🔴सध्याचे CVC: पी. के. श्रीवास्तव

राज्य पुनर्रचना आयोग -1953


सदस्य - 

1) फझल अली ( अध्यक्ष)

2) के एम पन्नीकर

3) हच. कुंझरू 


➡️अहवाल - 30 सप्टेंबर 1955 सादर 


➡️या राज्य पुनर्रचना कायद्यानुसार 14 राज्ये व 6 केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती झाली.


✅आयोगाच्या शिफारशी


1. यात मुख्यतः भाषावार पुनर्रचनेला पाठिंबा. त्या आधारावर 16 राज्ये व 3 केंद्रशासित प्रदेश निर्माण करावे.


2. उत्तर भारत-बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थान असे चार भाग करावे.


3. थोडे बदल करून पूर्वेकडील राज्ये आहे तशीच राहू दिली. बिहार आणि आसाम मधून 'ट्रायबल' राज्ये बनवावीत, ही मागणी आयोगाने फेटाळून लावली.


4. मुंबई व पंजाब यांच्या विभाजनाला आयोगाचा विरोध, गुजरात व महाराष्ट्र मिळून मुंबईचे द्विभाषिक राज्य निर्माण करावे.


5. एकभाषी राज्यातील अल्पसंख्याकांवर अन्याय होऊ नये म्हणून प्रत्येकाला मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण द्यावे.


6. राष्ट्रऐक्यासाठी अखिल भारतीय सेवांमध्ये निम्मे (अर्धे) उमेदवार राज्याबाहेरील असावेत. त्यांच्या केंद्रातून प्रांतात व प्रांतातून केंद्रात बदल्या व्हाव्यात.


7. उच्च न्यायालयातील 1/3 न्यायाधीश राज्याबाहेरील असावेत.

विरोधी पक्षनेता (LoP) - मुख्य मुद्दे


🔺 लोकसभा (LS) आणि राज्यसभा (RS) मधील स्थान

- १९७७ च्या संसदेत विरोधी पक्षनेते वेतन आणि भत्ते कायद्याने स्थापन.

- गृहात किमान १०% खासदार आवश्यक.

- १९५४ च्या कायद्यानुसार वेतन आणि भत्ते मिळण्याचा हक्क.


🔺 सदनातील अधिकार

- क्रमाने ७ व्या स्थानावर, केंद्रीय मंत्रीमंडळाच्या मंत्र्यांसह.

- विधीमंडळ प्रमुखांच्या डाव्या बाजूला प्रथम ओळीत बसण्याचा हक्क.

- राष्ट्रपतींच्या दोन्ही सभागृहांना संबोधनाच्या वेळी प्रथम ओळीत आसन.

- विरोधी पक्षाचे आवाज, सावली पंतप्रधान म्हणून कार्य.


🔺 इतर भूमिका आणि जबाबदाऱ्या

- विरोधी पक्षाचे प्रतिनिधित्व महत्त्वाच्या नियुक्ती समित्यांमध्ये:

  - CBI चे संचालक

  - केंद्रीय सतर्कता आयुक्त (CVC)

  - मुख्य माहिती आयुक्त (CIC)

  - राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे (NHRC) अध्यक्ष आणि सदस्य

  - लोकपाल

- सार्वजनिक खाते, सार्वजनिक उपक्रम, अंदाज आणि संयुक्त संसदीय समित्यांमध्ये सदस्य.



विरोधी पक्षनेते पद मागील दोन कार्यकाळात रिक्त होते.

18 वी लोकसभा निवडणूक आणि महाराष्ट्र


✔️18 व्या लोकसभेसाठी महाराष्ट्रात एकूण 5 टप्प्यात मतदान संपन्न झाले.


✔️ महाराष्ट्रात एकूण 48 लोकसभा मतदारसंघात निवडणूक पार पडली.


✔️ महाराष्ट्रात सर्वाधिक मतदान 63.71% हे पहिल्या टप्प्यात झाले 


✔️ दुसऱ्या टप्प्यात 62.71% मतदान झाले.


✔️ तिसऱ्या टप्प्यात 63.55% मतदान झाले 


✔️ चौथ्या टप्प्यात 59.64% मतदान झाले.


✔️ महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यात सर्वात कमी म्हणजे 54.33% मतदान झाले 


✔️ पाचवा टप्प्यात मुंबई सह 13 लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले.


▶️ राज्यातील सर्वाधिक मतदान झालेले 10 मतदारसंघ :-


1 ) गडचिरोली-चिमूर - 71.88

2 ) कोल्हापूर - 71.59

3 ) हातकणंगले - 71.11

4 ) नंदूरबार -  70.68

5 ) बीड - 70.92

6 ) जालना - 69.14

7 ) चंद्रपूर - 67.55

8 ) भंडारा गोंदिया  - 67.04

9 ) अहमदनगर - 66.16

10 ) वर्धा - 64.85

पूर्व परीक्षेच्या गुणांचे गणित


📌 मागील पूर्व परीक्षांचा cut- off पाहिल्यास आपल्याला हे लक्षात येईल की पूर्व परीक्षेत 125+ मार्क्स आल्यास second key आली तरी आपण पूर्व परीक्षा नक्की पास होऊ हा विश्वास राहतो. त्यामुळे  कोणत्याही  शंकेविना  मुख्य परीक्षेकडे मोर्चा वळवता येतो. 

 

📌 त्यासाठी पूर्व परीक्षेत 125+ गुण मिळतील हा उद्देश ठेवून अभ्यास त्या दृष्टीने करावा . 125 गुण मिळविण्यासाठी तुम्ही पूर्ण प्रश्न  सोडवत आहात असे गृहीत धरल्यास तुमचे 70 प्रश्न बरोबर येणे अपेक्षित आहे.


📌  या प्रमाणे विषयाच्या काठिण्य पातळी नुसार प्रत्येक विषयात किती किती गुण मिळणे अपेक्षित आहे ते आपण पाहू

    

विषय.          एकूण प्रश्न.      पैकी ✅ अपेक्षित


राज्यशास्त्र             15.                   13

 

भूगोल.                 15.                    12


अर्थशास्त्र.             15.                    12


पर्यावरण.              5.                      3


विज्ञान.                 20.                    12


चालू घडामोडी.       15.                    9


इतिहास                15.                     9.   

          

             एकूण.    100.                   70

               

📌 प्रत्येक विषयाला किमान वरीलप्रमाणे प्रश्न बरोबर येणे अपेक्षित आहे. तुमच्या विषयावरील प्रभुत्वानुसार हे प्रमाण तुम्ही बदलू शकता.  जसे तुम्हाला विज्ञान जर कठीण जात असेल तर ती कसर चालू घडामोडी मध्ये भरून काढू शकता.


📌 सुरवातीच्या तीन विषयात ( राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल) सर्वांना गुण मिळविणे तुलनेने सोपे असते. तर या विषयाचा व्यवस्थित अभ्यास करणे अपेक्षित आहे.


📌 चालू घडामोडींचा अभ्यास दररोज केल्यास शेवटी त्याचा load येत नाही. Analytical विषय जसे की विज्ञान, अर्थशास्त्र, पर्यावरण , भौतिक भूगोल यांचा अभ्यास सुरवातीच्या टप्प्यात करावा. व ज्या विषयात  फॅक्ट्स जास्त आहेत (राज्यशास्त्र, अर्थशास्त्रातील आकडेवारी,इतिहास) ते विषय परीक्षा जवळ आली की हाताळावे म्हणजे short term memory मध्ये फॅक्टस लक्षात राहतात.

 

📌 अशाप्रकारे स्वतःला आधी analize करून अभ्यासाचे नियोजन केल्यास कमी श्रमात परिणामकारक अभ्यास करता येऊ शकतो.

सोळा महाजनपदाची प्राचीन आणि आधुनिक नावे


🔸काशी ➾ बनारस

🔹कोसल ➾ लखनौ

🔸मल्ल ➾ गोरखपुर

🔹वत्स ➾ अलाहाबाद

🔸चेदी ➾ कानपूर

🔹कुरू ➾ दिल्ली

🔸पांचाल ➾ रोहिलखंड

🔹गांधार ➾ पेशावर

🔸कंबोज ➾ गांधारजवळ

🔹मत्स्य ➾ जयपुर

🔸शूरसेन ➾ मथुरा

🔹अश्मक ➾ औरंगाबाद-महाराष्ट्र

🔸अवंती➾ उज्जैन

🔹अंग ➾  पूर्व-बिहार

🔸मगध ➾ दक्षिण बिहार

🔹वृज्जी ➾ उत्तर बिहार।

Poverty Measurements

✅वी. एम. दांडेकर आणि एन. रथ (1971 पद्धत)✅

- कॅलरी आवश्यकता: 

  - ग्रामीण आणि शहरी भाग: 2,250 कॅलरी प्रति व्यक्ती प्रतिदिन

- संपूर्ण गरीबीचे पद्धत: 

-

  - कॅलरी आधारित गरीबी मोजण्याची सुरुवात



✅  वाय के अलघ समिती (1979 पद्धत)✅

- समायोजित किंमत स्तर: 

  - महागाईसाठी किंमत स्तर समायोजित करणे.

- कॅलरी आवश्यकता:

  - ग्रामीण भाग: 2,400 कॅलरी प्रति व्यक्ती प्रतिदिन

  - शहरी भाग: 2,100 कॅलरी प्रति व्यक्ती प्रतिदिन



✅लकडावाला समिती (1993 पद्धत) [URP]✅

- मासिक किमान खर्च (2004-2005): 

  - ग्रामीण भाग: ₹356.30 प्रति व्यक्ती

  - शहरी भाग: ₹538.60 प्रति व्यक्ती

- कॅलरी आवश्यकता:

  - ग्रामीण भाग: 2,400 कॅलरी प्रति व्यक्ती प्रतिदिन

  - शहरी भाग: 2,100 कॅलरी प्रति व्यक्ती प्रतिदिन


2004-2005

- संपूर्ण गरीबी: 27.5%



✅तेंडुलकर समिती (2009 पद्धत) [MRP]✅

- मासिक किमान खर्च (2004-2005):

  - ग्रामीण भाग: ₹446.68 प्रति व्यक्ती

  - शहरी भाग: ₹578.80 प्रति व्यक्ती

- मासिक किमान खर्च (2011-2012):

  - ग्रामीण भाग: ₹816 प्रति व्यक्ती

  - शहरी भाग: ₹1,000 प्रति व्यक्ती

  - 

- कॅलरी आवश्यकता: 

  - कॅलरी आधारित पद्धतीपासून दूर जाऊन एक विस्तृत उपभोग आधारित पद्धत

2004-2005


- संपूर्ण गरीबी: 37.2%

2011-2012

- संपूर्ण गरीबी: 21.9%



✅रंगराजन समिती (2014 पद्धत) [MMRP]✅

- मासिक किमान खर्च (2009-2010):

  - ग्रामीण भाग: ₹972 प्रति व्यक्ती

  - शहरी भाग: ₹1,407 प्रति व्यक्ती

- मासिक किमान खर्च (2011-2012):

  - ग्रामीण भाग: ₹972 प्रति व्यक्ती

  - शहरी भाग: ₹1,407 प्रति व्यक्ती

- कॅलरी आवश्यकता:

  - कॅलरीसह एक विस्तृत वस्तू आणि सेवांच्या पद्धतीचा वापर


2009-2010 (सुधारित अंदाज)

- संपूर्ण गरीबी: 38.2%

2011-2012

- संपूर्ण गरीबी: 29.5%


सौजन्य - कोळंबे सर/ देसले सर

२१ सप्टेंबर २०२४

समोर परीक्षेची तारीख ही नाही;अभ्यास ही होत नाही..

अजून ही combine 24 चे वेळापत्रक आलेले नाही.त्यामुळे बरेच जण वेळापत्रक येईपर्यंत मुख्यचा अभ्यास करावा का? अभ्यास होत नाहीये इ. बद्दल विचारत आहेत.त्यासाठी माझे वैयक्तिक मत देत आहे.

पुर्व परिक्षेबद्दल जरी आणखी काहीही अधिकृत घोषणा नसली तरी मला अस वाटत की पूर्वचाच
अभ्यास सुरू राहू द्या.लक्षात घ्या,आता मुख्य चा पेपर-2 हा पूर्वच्या पेपर सारखा आहे.त्यामुळे तुम्ही जो अभ्यास करताय तो मुख्य परीक्षेसाठी करताय अस समजून चला.
आता पूर्व चा इतका जबरदस्त अभ्यास करा की पूर्व मध्ये 65+ पडणार आणि प्रथम उत्तरतालिका आली की लगेच मुख्यच्या अभ्यासाला लागायचं.
लक्षात घ्या,जर पूर्व मध्ये परत काठावर गुण मिळाले तर त्या इतकी दोलायमान परिस्थिती नसते.सारखं वाटतं,होईल की नाही,प्रत्येक क्लासेस चे दररोज कट ऑफ बघा,मग अश्यात एक दिवस अभ्यास होतो,तर एक दिवस होणार नाही.. काय होईल...होईल की नाही..सारखं तेच ते मनात घोळत असत.सोडता ही येत नाही आणि करायची इच्छा ही होत नाही. जरी पूर्व उत्तीर्ण झालोच तरी निकाल ऐन परीक्षेच्या तोंडावर लागलेला असतो म्हणून अभ्यास ही नीट झालेला नसतो,त्यामुळे अंतिमतः निराशाच पदरी येते. या उलट ज्यांना 60+ गुण असतील त्यांचा एक ही दिवस वाया जात नाही.त्यांना कोणता कट ऑफ prediction, दुसरी उत्तरतालिकेने माझे गुण कमी झाले मग???? हे असलं काहीच बघायचं टेन्शन नसत.त्यामुळे जास्त अभ्यास होतो.
मला माहित आहे तुमच्या पैकी बरेच जन थोड थंड पडले असतील,ते साहजिक आहे.कारण समोर निश्चित तारीख (Dead End) नसल्यामुळे अभ्यास हा हवा तितका होतच नाही. परीक्षा पुढे जात आहे ती एक संधी समजा.पूर्व चा चांगला अभ्यास करा म्हणजे मुख्य च्या पेपर -2 ची आताच तयारी होईल आणि पूर्व झाली की पूर्ण वेळ मराठी इंग्रजी ला देता येईल आणि यावेळी खात्रीने निकाल येईल.
बरेच जण अमुक अमुक तास अभ्यास झाला नाही तर निराश होऊन जाता.मग अश्यात आपसूकच इतरां सोबत बरोबरी होते,तो किती तास अभ्यास करतो, माझं इतक्या कमी अभ्यासात होईल की नाही... वगैरे वगैरे...!?
लक्षात घ्या..एखाद्या दिवशी एकदम चांगला अभ्यास होतो,एखाद्या दिवस कमी होतो,एखाद्या दिवशी अजिबात होत नाही, अश्या वेळी हिरमसून न जाता अभ्यास करत राहायचा.सर्वांचा असा वेळ जात असतो, शेवटी आपण सर्वच homo sapiens कुळातील आहोत,यंत्र मानव नाहीत की दररोज अमुक अमुक तास काम होईलच.
शेवटी तुम्ही दररोज,जीव लावून,जितकं होतील तितके सर्वोत्तम मनातून प्रयत्न करताय ना...? ते महत्वाचं आहे...एक गोष्ट कायम लक्षात घ्या की बदलत्या परिस्थिती नुसार आपल्याला बदलता आला पाहिजे.म्हणजे काय तर आता परीक्षेची तारीख समोर नसताना आपण पूर्वी सारखा अभ्यास होणार नाही हे पहिले मान्य केला पाहिजे.
Its absolutely OK Not to be OK.
आपण सर्व सारखेच आहोत.आता जो राज्यात पहिला येणार आहे 2024 मध्ये त्याचा पण इतक्या जोश मध्ये अभ्यास होत नसणार,कारण तो सुद्धा एक माणूस आहे. तर सांगायचा उद्देश हाच की मान्य करा की माझा 10-12 तास अभ्यास होणार नाही.हरकत नाही.मी पण कोरोना च्या काळात तयारी करताना हे मान्य केलेलं.मग मी सकाळी लवकर उठून अभ्यास करून घ्यायचो दुपार पर्यंत..4/6/8 तास अभ्यास व्हायचा आणि मग उरलेला वेळ Group Discussion साठी द्यायचो.तुम्ही ही तस करू शकता.ज्यांचा होत नाहीये त्यांच्यासाठी खालील बदल करून बघा,जमतंय का..

1.नवीन काही तरी वाचा.उदा. PYQ prelims explanation च पुस्तक घेऊन ते संपवून टाका.
2. जे राज्यसेवा करताय ते हा वेळ Maths करा थोड्यावेळ आणि जे Combine करत आहेत ते PYQ expln book मधून पर्यावरण,प्राचीन मध्ययुगीन करू शकता.(दोन्ही पूर्व देणार असाल तरच)
3. चालू घडामोडी संपवून टाका.
4.दुसरा जो विषय राहिला आहे तो करायला घ्या.नवीन पुस्तक घ्या,ते चाळा.
5.जास्तीत जास्त Group discussion करा.
यावेळी तुम्ही तुमचं सर्वोत्तम दिल तर गुलाल 100% पक्का आहे. फक्त स्वतः वर विश्वास ठेवा.आता पर्यंत झाला तो झाला time pass.. आता राहिलेल्या दिवसांसाठी Lions Attitude ने fight द्या.🦁🔥
कधी कमी अभ्यास होईल,कधी जास्त,परंतु अभ्यास होणं गरजेचं,त्याहून महत्त्वाचं प्रयत्न करण गरजेचं आहे.एक होता कार्व्हर पुस्तकात मार्टिन लुथर किंग यांची ओळख झाली होती.नंतर कालांतराने त्यांच्या विषयी एका मासिकात आणखी वाचण्यात आले.
त्यांचे बरेच वाक्य गाजलेले आहेत.त्यापैकी माझ्या सर्वात आवडत्या वाक्याने शेवट करतो..

यदि आप उड़ नहीं सकते हो, तो दौडो  
यदि दोड़ नहीं सकते हो, तो चलो।
यदि चल भी नहीं सकते हो, तो रेंगो
लेकिन हमेशा आगे बढ़ते रहो...🔥

विजयी भव✨

१७ सप्टेंबर २०२४

जगाच्या भुगोलाबद्दल थोडी माहिती

➡️ जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा सातवा क्रमांक लागतो.


➡️ भारताने जगाच्या एकूण क्षेत्रापैकी 2.42 टक्के क्षेत्र व्यापलेले आहे.

➡️ भारताचे स्थान आशिया खंडात दक्षिणेस आहे, दक्षिण आशिया खंडात भारत हा देश उत्तर गोलार्धात येतो.

➡️ क्षेत्रफळ व लोकसंख्येच्या बाबतीत व्हॅटिकन सिटी हा देश जगात सर्वात लहान आहे.

➡️ इंदिरा पॉइंट हा भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे.

➡️ पाल्कची सामुद्रधुनी व मन्नारचे आखात यामुळे श्रीलंका हे बेट भारतीय भूमीपासून वेगळे झाले आहे.

➡️ जगात सर्वात जास्त भूकंप आणि जपान या देशांमध्ये होतात, तर भारतामध्ये सर्वात जास्त भूकंप आसाम राज्यात होतात.

➡️ भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी अंदमान बेटें वरील बॅरन बेट येथे आहे.

➡️ भारताची दक्षिण उत्तर लांबी 3214 किलो मीटर एवढी आहे तर पूर्व पश्चिम लांबी 2933 किलो मीटर एवढी आहे.



➡️ भारतातील 8 राज्यांतून कर्कवृत्त जाते ⬅️

    क्लुप्ती - मित्र माझा राघू छाप

   मि - मिझोराम
   त्र - त्रिपुरा
   म - मध्य प्रदेश
  झा - झारखंड
   रा - राजस्थान
   गु - गुजरात
  छा - छत्तीसगड
  प - पश्चिम बंगाल.

___________________________

राज्यपाल


   राज्यपाल च्या भारतातील राज्यांमध्ये की राज्य पातळीवर समान अधिकार आणि कार्ये आहेत भारताचे राष्ट्रपती केंद्रीय स्तरावर. राज्यपाल अस्तित्वात राज्यांमध्ये लेफ्टनंट राज्यपाल किंवा प्रशासक अस्तित्वात असताना केंद्रशासित प्रदेश समावेश दिल्ली राष्ट्रीय राजधानी प्रदेश . राज्यपाल हे नाममात्र प्रमुख म्हणून काम करतात तर खरी सत्ता राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची आणि त्यांच्या / तिच्या मंत्र्यांच्या परिषदेची असते. केंद्रशासित प्रदेशांमध्ये वास्तविक सत्ता लेफ्टनंट गव्हर्नर किंवा प्रशासकाची असते, दिल्ली, पुडुचेरी आणि जम्मू-काश्मीर वगळता मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या मंत्रिमंडळात तो / ती सत्ता सामायिक करतो.


🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


राज्यपाल


    भारतात केंद्रशासित प्रदेशाचा प्रभारी लेफ्टनंट गव्हर्नर असतो. तथापि, हा पद फक्त अंदमान आणि निकोबार बेटे , लडाख , जम्मू-काश्मीर , दिल्ली आणि पुडुचेरी या केंद्रशासित प्रदेशात अस्तित्त्वात आहे (इतर प्रदेशात प्रशासक नेमलेला आहे, जो सामान्यत: आयएएस अधिकारी किंवा कोर्टाचा सेवानिवृत्त न्यायाधीश असतो). तथापि, पंजाबच्या राज्यपालपदी प्रशासक म्हणून काम करते चंदीगड . लेफ्टनंट गव्हर्नर प्राधान्यक्रमात एखाद्या राज्याच्या राज्यपालपदाइतके पद मानत नसले तरी.


गव्हर्नर आणि लेफ्टनंट गव्हर्नर यांची नेमणूक पाच वर्षांच्या मुदतीसाठी अध्यक्ष करतात.



🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿


🌿 पात्रता  🌿


लेख 157 आणि कलम 158 च्या भारतीय संविधानाच्या राज्यपाल पदासाठी पात्रता आवश्यकता निर्देशीत करा. ते खालीलप्रमाणे आहेतः


राज्यपालांनी हे करायला हवेः


[भारताचे नागरिक] व्हा.


कमीतकमी 35 वर्षे वयाचे असावेत.


संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे किंवा राज्य विधिमंडळाच्या सभासदाचे सदस्य होऊ नका .


नफ्याचे कोणतेही पद घेऊ नका.


🌿🍁🌿🍁🌿🍁🌿🍁🌿🍁🌿


शक्ती आणि कार्ये


राज्यपालांचे मुख्य कार्य म्हणजे राज्य घटनेच्या कारभारामध्ये भारतीय राज्यघटनेच्या कलम १9 under अन्वये त्यांच्या शपथविधीमध्ये समाविष्ट असलेल्या घटनेचे आणि कायद्याचे जतन करणे, संरक्षण करणे आणि त्यांचे संरक्षण करणे हे आहे . राज्यातील कार्यकारी आणि विधायी घटकांवरील त्याच्या सर्व क्रिया, शिफारसी आणि पर्यवेक्षण अधिकार (कलम 167 सी, अनुच्छेद 200, कलम 213, अनुच्छेद 355 इ.) संविधानाच्या तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी वापरल्या जातील. या संदर्भात, राज्यपालाकडे अनेक प्रकारची शक्ती आहेत:


प्रशासनाशी संबंधित कार्यकारी अधिकार , नेमणुका आणि काढण्याबाबत.


विधिमंडळ आणि राज्य विधानमंडळाशी संबंधित वैधानिक अधिकार , म्हणजे राज्य विधानसभा (विधानसभा) किंवा राज्य विधान परिषद (विधान परिषद),


स्वेच्छाधीन अधिकार राज्यपाल ठरवण्याचा अधिकार त्यानुसार चालते जाऊ


🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿


कार्यकारी अधिकार


राज्यघटना राज्यपाल मध्ये याबाबतचे अंतिम अधिकार मा सर्व राज्य सरकारच्या कार्यकारी शक्ती. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांची नेमणूक केली , ज्यांना राज्य विधानसभेत बहुमताचा पाठिंबा आहे. राज्यपाल मंत्री परिषदेच्या इतर सदस्यांची नेमणूक करतात आणि मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार त्यांना विभागणी वाटप करतात.


राज्यपालांच्या इच्छेनुसार मंत्रीपरिषद सत्तेत राहते, परंतु खर्‍या अर्थाने विधानसभेत बहुमत मिळवण्याच्या आनंदाचा अर्थ होतो. जोपर्यंत राज्य विधानसभेतील बहुमत सरकारला पाठिंबा देत नाही तोपर्यंत मंत्रीमंडळ बरखास्त करता येणार नाही.


राज्यपाल एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांची नेमणूक करतात . तसेच she डव्होकेट जनरल आणि राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूकही करतात. त्याशिवाय राज्य निवडणूक आयुक्तांची नेमणूकही राज्यपालांमार्फत केली जाते (राष्ट्रपतींनी काढून टाकली असती तरी). अध्यक्ष न्यायाधीश नियुक्ती राज्यपाल consults उच्च न्यायालये आणि राज्यपाल जिल्हा न्यायालयात न्यायाधीश म्हणून नेमणूक करते. सर्व प्रशासन त्याच्या किंवा तिच्या नावावर चालविले जाते, त्याला किंवा तिच्यातही भारतीय राज्यघटनेनुसार इयत्ता एक आणि वर्ग चौथीच्या कार्यकाळात कर्मचारी नियुक्त करण्याचे सामर्थ्य आहे.


राज्यपालांचे राज्यपाल हे त्यांच्या कार्यकाळातील बहुतेक विद्यापीठांचे कुलपती आहेत . कुलपती कार्यालयाची प्रतिष्ठा आणि निःपक्षपातीपणा यामुळे राज्यपालांना विद्यापीठांच्या स्वायत्ततेचे रक्षण आणि त्यांना अयोग्य राजकीय हस्तक्षेपापासून वाचविण्याच्या बाबतीत अनन्य स्थान दिले जाते. विद्यापीठाचे कुलपती म्हणून राज्यपाल हे सिनेटचे अध्यक्ष म्हणूनही काम करतात. राज्यपालांना विद्यापीठाच्या व त्या संलग्न महाविद्यालयांच्या प्रत्येक घटकाची प्रत्यक्ष तपासणी करण्याचे अधिकार आहेत, चौकशीच्या निकालावर योग्य ती कारवाई करावी लागेल. कुलपती भेटी शोध समिती नियुक्ती कुलगुरू. राज्यपालांनी सिनेटच्या शिफारशीनुसार पदांच्या वॉरंटची आणि डिग्री मागे घेण्यास किंवा भिन्नतेस मान्यता देण्यास मान्यता दिली. राज्यपाल सिनेटने मंजूर केलेले कायदे मंजूर किंवा नाकारले व संबंधित समित्यांच्या शिफारसीच्या आधारे विद्यापीठाच्या शिक्षकांची नेमणूक केली.


🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿


वैधानिक अधिकार


राज्य प्रमुख राज्य विधानसभेच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन बोलावतात व त्यांची पूर्तता करतात. राज्यपाल राज्य विधानसभेचे विघटन करू शकतात. हे अधिकार औपचारिक असतात आणि राज्यपालांनी हे अधिकार वापरताना मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिपरिषदेच्या सल्ल्यानुसार कार्य केले पाहिजे.


राज्यपालांनी विधानसभेच्या निवडणुकीनंतर आणि दरवर्षी पहिल्या अधिवेशनाच्या सुरूवातीला राज्य विधानसभेचे उद्घाटन (समर्पित करण्यासाठी) केले. या प्रसंगी राज्यपालांच्या संबोधनात राज्य सरकारच्या नवीन धोरणांची रूपरेषा असते. राज्य विधानसभेने हे विधेयक मंजूर केले, हे राज्यपालांच्या मान्यतेनंतरच कायदा होऊ शकते. राज्यपालांनी राज्य विधीमंडळाला हे पैसे विधेयक नसल्यास पुन्हा विचारासाठी विधेयक परत देऊ शकतात . तथापि, राज्य विधिमंडळाने ती पुन्हा राज्यपालांकडे दुसर्‍यांदा पाठविल्यास राज्यपालांनी त्यास मान्यता देणे आवश्यक आहे. राष्ट्रपतींकडे काही विधेयके राखून ठेवण्याचे अधिकार राज्यपालाकडे असतात.


जेव्हा राज्य विधिमंडळ अधिवेशनात नसते आणि राज्यपाल कायदा असणे आवश्यक मानतात, तर राज्यपाल अध्यादेश काढू शकतात. हे अध्यादेश पुढील अधिवेशनात राज्य विधिमंडळात सादर केले जातात. पूर्वीच्या मंजुरीशिवाय राज्य विधिमंडळ पुन्हा तयार होण्याच्या तारखेपासून ते सहा आठवड्यांपेक्षा जास्त काळ वैध राहतील. 


कलम १ 192 under अन्वये राज्य विधानसभेच्या सभासदाला अपात्र ठरविण्यास राज्यपाल यांना अधिकार देण्यात आला आहे जेव्हा निवडणूक आयोगाने शिफारस केली आहे की आमदार यापुढे अनुच्छेद १ 1 १ च्या तरतुदींचे पालन करीत नाहीत.


अनुच्छेद 165 आणि 165 Per नुसार राज्यपाल महाधिवक्ता यांना राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात उपस्थित राहण्यास सांगू शकतात आणि काही बेकायदेशीर कामकाज करण्यास कळवू शकतात.


🌿🍁🌿🍁🌿🍁🌿🍁🌿🍁🌿

आर्थिक शक्ती


राज्यपाल अर्थसंकल्प असलेल्या वार्षिक वित्तीय निवेदनास राज्य विधिमंडळासमोर ठेवतात. त्यांच्या अनुशंगाने वगळता अनुदानाची कोणतीही मागणी केली जाणार नाही. कोणत्याही अप्रत्याशित खर्चाची पूर्तता करण्यासाठी ते राज्याच्या आकस्मिक निधीतून प्रगती करू शकतात. शिवाय, तो राज्य वित्त आयोग स्थापन करतो.



🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

महत्त्वाचे प्रश्नसंच


1. भारतीय संविधानाने भारताचे वर्णन —– केले आहे.

संघराज्य

विधानमंडळ

राज्यांचा संघ

विधान परिषद

उत्तर : राज्यांचा संघ


2. कोलकाता उच्चन्यायालयाचे अधिकार क्षेत्र —— या संघराज्य क्षेत्रात विस्थारित केलेले आहे.

दिल्ली

अंदमान-निकोबार बेटे

पौंडेचेरी

दीव व दमण

उत्तर : अंदमान-निकोबार बेटे


3. ग्रामपंचायतीचा पंचांची निवडणूक —– पद्धतीने होते.

प्रत्यक्ष मतदान

अप्रत्यक्ष मतदान

प्रौढ मतदान

प्रौढ पुरुष मतदान

उत्तर : प्रौढ मतदान


4. गोगलगाय —– या संघात मोडते.

मोलुस्का

आर्थोपोडा

इकायनोडमार्ट

नेमॅटोडा

उत्तर : मोलुस्का


5. संतृप्त हायड्रोनकार्बनमधील दोन कार्बन अणूंमध्ये —– असतो.

एकेरी बंध

दुहेरी बंध

तिहेरी बंध

यापैकी एकही नाही

उत्तर : एकेरी बंध


6. —– हा सूर्याच्या सगळ्यात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात लहान ग्रह आहे.

शुक्र

बुध

मंगळ

पृथ्वी

उत्तर : बुध


7. ‘स्पीड पोस्ट’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

मुल्क राज आनंद

शोभा डे

अरुंधती राय

खुशवंत सिंग

उत्तर : शोभा डे


8. नियोजित आलेवाडी बंदर —— जिल्ह्यात आहे.

सिंधुदुर्ग

ठाणे

रत्नागिरी

रायगड

उत्तर : ठाणे


9. —– शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणतात.

मुंबई

बंगलोर

कानपूर

हैदराबाद

उत्तर : बंगलोर


10. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत स्त्रियांसाठी किती जागा राखीव असतात?

01

02

03

यापैकी एकही नाही

उत्तर : यापैकी एकही नाही


11. भारतातील संसदीय व्यवस्थेचा —— हा केंद्रबिंदु आहे.

मुख्यमंत्री

महाधीवक्ता

पंतप्रधान

महान्यायवादी

उत्तर : पंतप्रधान



 

12. 10 kg वस्तुमान असलेला पदार्थ जमिनीपासून 10 मी. उंच नेला. त्याठिकाणी गुरुत्वीय त्वरण 9.8 असेल, तर त्या पदार्थाला प्राप्त झालेली स्थितिज ऊर्जा किती?

9800 J

980 J

98 J

9.8 J 

उत्तर : 980 J


13. ‘संवाद कौमुदी’ हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?

राजा राममोहन रॉय

केशव चंद्र सेन

देवेंद्रनाथ टागोर

ईश्वरचंद्र विद्यासागर

उत्तर : राजा राममोहन रॉय


14. ‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ हा ग्रंथ कोणी लिहिला?

डॉ. बी.आर. आंबेडकर

वि.रा. शिंदे

महात्मा जोतिबा फुले

भास्करराव जाधव

उत्तर : वि.रा. शिंदे


15. खालीलपैकी कोणत्या खेळाशी कविता राऊत हे नाव जोडले आहे?

अॅथलेटिक्स

कुस्ती

क्रिकेट

स्विमींग

उत्तर : अॅथलेटिक्स


16. कोणत्या प्राण्याला ‘राष्ट्रीय वारसा’ हा दर्जा भारत सरकारने बहाल केला?

हत्ती

वाघ

सिंह

हरिण

उत्तर : हत्ती


17. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराने वयाची —— वर्षे पूर्ण केलेली असावीत.

21

25

30

35

उत्तर : 35


18. महाराष्ट्र राज्यात पंचायत राज्य पद्धती —– साली सुरू झाली.

1 मे 1960

1 मे 1961

1 मे 1962

1 मे 1965

उत्तर : 1 मे 1962


19. सध्या महाराष्ट्राचा विधानसभेत —– सभासद संख्या आहे.

78

238

250

288

उत्तर : 288


20. खालीलपैकी कोणता वायू हवेपेक्षा हलका आहे?

CO२

H२S

SO२

NH३

उत्तर : NH३

सह्याद्रि



पश्र्चिम घाट, सह्य पर्वत. 

भारतीय व्दिपकल्पाच्या पश्चिम भागातील एक पर्वतश्रेणी. दख्खनच्या पठाराच्या पश्र्चिम कडेवर उत्तर-दक्षिण पसरलेल्या या पर्वतश्रेणीमुळे अरबी समुद्र किनाऱ्यावरील किनारपट्टीचे मैदान दख्खनच्या पठारापासून अलग झाले आहे.

उत्तरेस तापी नदीपासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत अरबी समुद्राला समांतर अशी ही श्रेणी पसरली  आहे. सह्याद्रीची उत्तर-दक्षिण लांबी सु. १,६०० किमी. असून सस. पासून सरासरी उंची सु. १,२०० मी. आहे. पर्वताचा पश्र्चिम उतार तीव्र तर पूर्वेकडे पठारी भागाकडील उतार तुलनेने मंद आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ व तमिळनाडू या राज्यांतील सु. ६०,००० चौ. किमी. क्षेत्र सह्याद्रीच्या श्रेण्यांनी व्यापले आहे. पर्वताचा सर्वाधिक विस्तार कर्नाटक राज्यात आहे.


▪️भवैज्ञानिक इतिहास


सह्याद्री हा खऱ्या अर्थाने पर्वत नसून ती दख्खनच्या पठाराची विभंग कडा आहे. त्यामुळे सह्याद्रीपेक्षा पश्र्चिम घाट हीच संज्ञा अधिक उचित ठरते. याला सह्य पर्वत असेही म्हणतात. महाराष्ट्रात मात्र सह्याद्री हेच नाव प्रचलित आहे. सु. १५० द.ल. वर्षांपूर्वी गोंडवनभूमी या महाखंडाचे विभाजन झाले. त्यावेळी दख्खनच्या पठाराचेही विभाजन झाले असावे. त्यामुळे आजच्या पश्र्चिम किनारपट्टीला समांतर अशी विभंगरेषा निर्माण झाली असावी. या विभंगरेषेच्या पश्चिमेकडील भाग खाली खचल्यामुळे पठाराच्या पश्र्चिम कडेला उंची प्राप्त झाली असावी. भारतीय व्दिपकल्प पठाराची ही पश्र्चिम कडा म्हणजेच पश्र्चिम घाट होय.


ही क्रिया अचानक घडली नसून मंद गतीने घडली असावी. मिआमी विदयापीठातील भूभौतिकीविज्ञ बॅरन व हॅरिसन यांच्या सिद्धांतानुसार सु. १०० ते ८० द.ल. वर्षांपूर्वीच्या दरम्यान मादागास्करपासून विभंगून भारताचा पश्र्चिम किनारा अस्तित्वात आला असावा. या पश्र्चिम किनाऱ्याचे विभंजन होऊन पश्चिम घाट ह्या १,००० मी. उंचीच्या उभ्या कडयाची आकस्मिक निर्मिती झाली असावी. सुमारे ६५ द.ल. वर्षांपूर्वी प्रचंड प्रमाणात भेगी प्रकारचे ज्वालामुखी उद्रेक होऊन दक्षिण ट्रॅप (डेक्कन ट्रॅप) ची निर्मिती झाली असावी. लाव्हारसापासून निर्माण झालेल्या बेसाल्ट खडकाचे विस्तृत व जाड थर असलेल्या या प्रदेशाने मध्य भारताचा फार मोठा भाग व्यापला आहे.


अशा ज्वालामुखी उद्रेकामुळे झालेल्या संचयनातून पश्र्चिम घाट प्रदेशाची ही भूरचना बनलेली आहे. पश्र्चिम घाटातील अशा बेसाल्ट खडकाच्या खालील खडकांचे थर सु. २०० द.ल. वर्षांपूर्वीचे जुने असावेत. पश्र्चिम घाटाचा उत्तरेकडील गोव्यापर्यंतचा भाग प्रामुख्याने बेसाल्ट खडकांपासून तर त्याच्या दक्षिणेकडील विभाग गॅनाइट व पट्टिताश्म खडकांपासून बनलेला आहे. भूकवचात बेसाल्ट खडकाचे थर साधारण ३ किमी. खोलीपर्यंत आढळतात. चर्नोकाइट, खोंडेलाइट, लेप्टिनाइट, रूपांतरित पट्टिताश्म, स्फटिकमय चुनखडक, लोहखनिज, डोलेराइट व अ‍ॅनॉर्थाइट हे खडकही या भागात आढळतात. दक्षिणेकडील टेकडयांमध्ये अवशिष्ट जांभा खडक व बॉक्साइट खनिज आढळते.


▪️भविशेष


सह्याद्रीचे उत्तर सह्याद्री व दक्षिण सह्याद्री असे दोन भाग पडतात. उत्तरेस तापी नदीपासून दक्षिणेस निलगिरी पर्वत पुंजापर्यंतची श्रेणी उत्तर सह्याद्री व तेथून प्रामुख्याने पालघाट खिंडीपासूनची (खंड) दक्षिणेकडील पर्वतश्रेणी दक्षिण सह्याद्री म्हणून ओळखली जाते. पालघाट खिंडीमुळे सह्यादीची सलगता खंडित झाली आहे. उत्तर सह्याद्रीचा बराचसा भाग महाराष्ट्र राज्यात येतो. महाराष्ट्रातील या पर्वतश्रेणीमुळे कोकण व देश (पश्र्चिम महाराष्ट्र) हे दोन स्वाभाविक विभाग अलग झाले आहेत.


पर्वताचा पश्चिम उतार तीव्र असून तेथे लाव्हा खडकाच्या थरांचे काळे व उघडे कडे सर्वत्र दिसतात. पश्चिम उतारावर नदयांनी खोल दऱ्या निर्माण केल्या आहेत. याच उताराच्या पायथ्यालगत कोकणची किनारपट्टी आहे. पूर्वेकडील उतार मात्र बराच मंद असून तो पूर्वेकडील पठारात विलीन झालेला दिसतो. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून पूर्व किंवा आग्नेय दिशेकडे अनेक फाटे गेलेले आहेत. उत्तरेकडून दक्षिणेकडे अनुक्रमे सातमाळा-अजिंठा, हरिश्चंद्रगड-बालाघाट व महादेव डोंगररांगा हे प्रमुख फाटे आहेत. पठारावरील नदयांचे हे दुय्यम जलविभाजक आहेत. महाराष्ट्रातील सह्याद्रीची उंची सामान्यपणे ९१५ ते १,२२० मी. असून उत्तरेकडे ती अधिक तर दक्षिणेकडे कमी आढळते.

सह्याद्रीत काही ठिकाणी सपाट माथ्याचे, पठारासारखे भाग आढळतात, त्यांना घाटमाथा असे म्हणतात. येथपासून कोकण व देश यांना जोडणारे अनेक घाट सुरू होत असल्याने त्यांना ‘ घाटमाथा ’ असे संबोधले जात असावे. थळ घाट, अणेमाळशेज, बोर घाट, वरंधा, आंबेनळी (पार), कुंभार्ली, आंबा, फोंडा, बावडा, आंबोली इ. घाटांना देश व कोकण यांदरम्यानच्या वाहतूक व दळणवळणाच्या दृष्टीने पूर्वीपासून विशेष महत्त्व आहे. सह्याद्री पर्वतश्रेणी बरीचशी सलग असली, तरी तिच्यात अधूनमधून अशा खिंडी व घाट आहेत.


सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर भीमाशंकर, माथेरान, महाबळेश्वर, पाचगणी यांसारखी गिरिस्थाने वसली आहेत. कळसूबाई (१,६४६ मी.) हे महाराष्ट्रातील तसेच उत्तर सह्याद्रीतील सर्वोच्च शिखर आहे. त्याशिवाय साल्हेर (१,५६७ मी.), हरिश्चंद्रगड (१,४२४ मी.), सप्तशृंगी (१,४१६ मी.), त्र्यंबकेश्वर (१,३०४ मी.) ही इतर महत्त्वाची उंच ठिकाणे आहेत. सह्याद्री व त्याच्या वेगवेगळ्या डोंगररांगांच्या माथ्यावर ऐतिहासिकदृष्टया अत्यंत महत्त्वाचे ठरलेले शिवनेरी, राजगड, रायगड, प्रतापगड, विशाळगड यांसारखे अनेक डोंगरी किल्ले आहेत. महाराष्ट्र व कर्नाटक यांदरम्यान गोवा खंड आहे. वाघेरी (१,०८५ मी.), सोंसोगड (१,१८६ मी.), मोरलेगड (१,०५४ मी.) ही गोव्यातील प्रमुख शिखरे आहेत.


सह्याद्रीच्या १६° उत्तर अक्षांश ते निलगिरी पर्वतापर्यंतच्या पर्वतीय प्रदेशाचा समावेश मध्य सह्याद्रीमध्ये करता येतो. यातील बराचसा भाग कर्नाटक राज्यात आहे. सह्याद्रीचा हा भाग अरबी समुद्राच्या अगदी जवळ आहे. हा प्रदेश ओबडधोबड स्वरूपाचा असून घनदाट अरण्यांचा आहे. कर्नाटकातील सह्याद्रीची सरासरी उंची सु. ६०० ते १,००० मी. आहे. याचा पश्चिम उतार खडया चढणीचा व तुटलेल्या कडयांचा असून पूर्वेकडे गेलेले त्याचे फाटे म्हणजे अवशिष्ट पर्वताच्या रांगा आहेत.

म्हैसूरच्या आग्नेयीस बिलीगिरीरंजन श्रेणी असून ती शेवररॉय ( सेर्व्हरायन ) श्रेणीला मिळते. सह्याद्रीच्या येथील प्रमुख श्रेणीस काही स्थानिक नावे प्रचलित आहेत. पुष्पगिरी (१,७१४ मी.), ब्रह्मगिरी, व्हावूल माला (२,३३९मी.) ही येथील महत्त्वाची शिखरे आहेत. उंची व निसर्गसौंदर्य यांसाठी बाबा बुढण डोंगर (१,९२३ मी.), मल्लिआनिगिरी, कुद्रेमुख (१,८९४ मी.) प्रसिद्ध आहेत. नंदी व केमेनगुडी ही गिरीस्थाने आहेत. देवीमने, अगुंबे, शिराडी, चारमाडी इ. घाटमार्गांनी पठारी भाग किनारपट्टीशी जोडला गेला आहे. शरावती नदीवरील गिरसप्पा ( जोग ) धबधबा सह्याद्रीच्या याच भागात आहे.


तमिळनाडूच्या पश्चिम सीमेवर निलगिरी पर्वताचा अत्यंत जटिल असा प्रदेश आहे. निलगिरी पर्वतात उत्तर सह्याद्री, दक्षिण सह्याद्री व पूर्वघाट एकत्र येतात. या पर्वताची उंची २,००० मी.पेक्षा जास्त आहे. यातच दोडाबेट्टा (२,६३७ मी.) हे निलगिरीतील सर्वोच्च शिखर तर माकूर्ती (२,५५४ मी.) हे दुसरे प्रमुख शिखर आहे. ऊटकमंड हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण निलगिरी पर्वतातच आहे. निलगिरीच्या बहुतेक सर्व सीमा नैसर्गिक रीत्या भंग झालेल्या कडयांच्या आहेत.


पालघाट खिंडीमुळे पश्चिम घाटाची सलगता भंग पावली आहे. पालघाट खिंडीची रूंदी २४ किमी. व सस.पासून उंची ३०० मी. असून ही दोन समांतर विभंगांमधील खचदरी असावी. पालघाट खिंडीच्या दक्षिणेकडील सह्याद्रीचे पूर्व व पश्चिम हे दोन्ही उतार तीव्र व ओबडधोबड बनले आहेत. अन्नमलई ही दक्षिण सह्याद्रीतील प्रमुख पर्वतश्रेणी असून त्या श्रेणीतच अनाईमुडी (२,६९५ मी.) हे दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर आहे.

अनाईमुडी या शृंगबिंदूपासून उत्तरेस अन्नमलई ( उंची १,८०० ते २,००० मी.), ईशान्येस पलनी (९०० ते १,२०० मी.) व दक्षिणेस कार्डमम्‌ (एलाचल) अशा तिन्ही दिशांना तीन डोंगररांगा-टेकडया गेलेल्या आहेत. कोडईकानल (२,१३५ मी.) हे प्रसिद्ध गिरिस्थान पलनी टेकडयांमध्ये आहे.


चेंबरा (२,१०० मी.), बांसुरा (२,०७३ मी.), वेल्लरीमाला (२,२०० मी.) व अगस्त्यमलई (१,८६८ मी.), महेंद्रगिरी ही केरळमधील प्रमुख शिखरे व मुन्नार, पानेमुडी, वेनाड ही थंड हवेची ठिकाणे आहेत. केरळ व तमिळनाडू यांदरम्यानच्या वाहतुकीच्या दृष्टीने शेनकोटा खिंड विशेष महत्त्वाची असून या खिंडीच्या दक्षिणेस असलेल्या महेंद्रगिरीने (१,६५४ मी.) दक्षिण सह्याद्रीचा शेवट झालेला आहे.


पश्र्चिम घाट व अरबी समुद्र यांदरम्यान अरूंद असे किनारपट्टीचे मैदान आहे. उत्तरेकडील प्रामुख्याने महाराष्ट्रातील किनारपट्टीला कोकण तर साधारणत: गोव्याच्या दक्षिणेकडील किनारपट्टीस मलबारचा किनारा असे म्हटले जाते. पश्र्चिम घाटाच्या पूर्वेकडील पायथ्यालगतच्या प्रदेशाला महाराष्ट्रात ‘ देश ’ तर कर्नाटकातील या प्रदेशास ‘ मलनाड ’ असे संबोधले जाते.


▪️नदया


भारतातील प्रमुख तीन जलविभाजकांपैकी पश्र्चिम घाट हा एक असून बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या पूर्ववाहिनी व अरबी समुद्राला मिळणाऱ्या पश्चिम वाहिनी नदयांचा तो प्रमुख जलविभाजक आहे. तापी व नर्मदा या नदयांचा अपवाद वगळता भारतीय व्दिपकल्पावरून वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या बहुतेक सर्वच प्रमुख पूर्ववाहिनी नदया सह्याद्रीच्या घाटमाथा प्रदेशात उगम पावतात. ही उगमस्थाने अरबी समुद्र किनाऱ्यापासून केवळ ५० ते ८० किमी.वर आहेत.


सह्याद्रीत उगम पावणाऱ्या पूर्ववाहिनी नदयांमध्ये गोदावरी, भीमा, कृष्णा, कावेरी या प्रमुख नदया आहेत. याशिवाय इतर असंख्य पूर्ववाहिनी नदया सह्याद्रीच्या रांगांमध्ये तसेच त्यांच्या फाटयांमध्ये उगम पावून मुख्य नदयांना जाऊन मिळतात. सह्याद्रीचे पूर्वेकडे गेलेले फाटे दुय्यम जलविभाजक आहेत. महाराष्ट्र राज्यातून वाहणाऱ्या पांझरा, गिरणा, कादवा, दारणा, प्रवरा,मुळा, घोडनदी, नीरा, कोयना, वारणा, पंचगंगा इ. उपनदयांचा उगमही सह्याद्रीतच होतो.


कर्नाटक राज्यातून वाहणाऱ्या घटप्रभा, मलप्रभा, तुंगभद्रा या कृष्णेच्या प्रमुख उपनदयांचा उगम सह्याद्रीमध्येच आहे. घटप्रभेवरील गोकाकजवळील धबधबा सौंदर्य आणि विदयुत् निर्मितीकरिता प्रसिद्ध आहे. कावेरी नदीचा उगम कर्नाटक राज्यात पश्चिम घाटातील ब्रह्मगिरी टेकडयांमध्ये तळकावेरी येथे झालेला आहे. शिम्शा, हेमवती, कब्बनी, भवानी या उपनदया सह्याद्रीत उगम पावतात.


तमिळनाडू राज्यातून पूर्वेकडे वाहणाऱ्या वैगई, चित्तार व तामपर्णी या नदयांचे उगमही पश्र्चिम घाटातच आहेत.


पश्र्चिम घाटात उगम पावणाऱ्या आणि पश्चिम किनारपट्टीवरून थोडेच अंतर वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळणाऱ्या असंख्य पश्चिम वाहिनी नदया आहेत. पश्चिम वाहिनी नदया संख्येने बऱ्याच असल्या तरी प्रत्येकीचे खोरे तीव्र उताराचे पण मर्यादित आहे. पश्चिम किनारपट्टी अरूंद असल्याने येथील नदया लांबीने खूपच कमी आहेत. महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवरून वाहणाऱ्या दमणगंगा, सूर्या, वैतरणा, तानसा, उल्हास, कुंडलिका, काळ, सावित्री, वाशिष्ठी, शास्त्री, तेरेखोल या प्रमुख नदया आहेत. गोव्यातील यापोरा, मांडवी, जुवारी, कर्नाटकातील काळी, गंगावळी, शरावती, बेडती, ताद्री व नेत्रावती तर केरळमधील बेपोर, पोन्नानी, चलाकुडी, पेरियार, कल्लदा या मुख्य पश्र्चिम वाहिनी नदया आहेत. यांपैकी पेरियार ही सर्वांत लांब (२२४ किमी.) नदी आहे.


सह्याद्रीची प्रपाती भूरचना असल्यामुळे तीव्र उतारावरून वेगाने वाहताना अनेक नदया कडयांवरून खाली कोसळत असतात. त्यामुळे त्यांच्या मार्गात अनेक प्रेक्षणीय धबधबे निर्माण झाले आहेत. उदा., कर्नाटकात शरावती नदीवरील जगप्रसिद्ध गिरसप्पा ( जोग ) धबधबा ( उंची २५३ मी.) आणि कावेरी नदीवरील प्रसिद्ध शिवसमुद्रम् धबधबा (९७ मी.). तीव्र उतारावरून वेगाने वाहणाऱ्या नदयांमुळे पश्र्चिम घाटात जलविद्युत् निर्मिती प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने अनेक आदर्श ठिकाणे आढळतात. संपूर्ण घाट परिसरात सु. ५० मोठी धरणे बांधण्यात आली आहेत. महाराष्ट्रात खोपोली येथे १९०० मध्ये बांधलेले धरण हे पश्चिम घाटातील सर्वांत आधीचे धरण आहे. जलविदयुत् निर्मितीच्या दृष्टीने महाराष्ट्रातील कोयना, कर्नाटकातील तुंगभद्रा, लिंगनमक्की, केरळमधील पेरांबीकुलम् ही धरणे विशेष महत्त्वाची आहेत. गिरसप्पा व शिवसमुद्रम् हे धबधबेही त्यादृष्टीने महत्त्वाचे आहेत.


▪️हवामान


समुद्रसपाटीपासूनची उंची व समुद्रकिनाऱ्यापासूनचे अंतर यांनुसार पश्र्चिम घाटातील हवामानात तफावत आढळते. सामान्यपणे या भागातील हवामान आर्द्र व उष्णकटिबंधीय असून किनाऱ्याजवळ ते सौम्य स्वरूपाचे आढळते. उत्तरेकडील भागात १,५०० मी. उंचीपेक्षा अधिक तर दक्षिण भागात २,००० मी.पेक्षा अधिक उंचीच्या प्रदेशातील हवामान समशीतोष्ण कटिबंधीय प्रकारचे असते. आल्हाददायक हवामानामुळे सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर अनेक थंड हवेची ठिकाणे निर्माण झाली आहेत. दक्षिण भागातील वार्षिक सरासरी तापमान २०° से. तर उत्तर भागात २४° से.च्या दरम्यान असते. हिवाळ्यात काही ठिकाणी तापमान गोठणबिंदूपर्यंत खाली जाते.


बाष्पयुक्त नैऋर्त्य मोसमी वाऱ्यांच्या मार्गात पश्र्चिम घाट येत असल्यामुळे त्या संपूर्ण प्रदेशात विशेषत: घाटमाथा आणि पश्र्चिम उतारावर प्रतिरोध प्रकारचा भरपूर पाऊस पडतो. या भागात घनदाट वने असल्यामुळे सांद्रीभवनास अनुकूल परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे पावसाचे प्रमाण अधिक आहे. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ३०० ते ४०० सेंमी. असून काही ठिकाणी ते ९०० सेंमी.पर्यंत आहे. महाराष्ट्रात घाटमाथ्यावर असलेल्या महाबळेश्वर येथे वार्षिक सरासरी पर्जन्यमान सु. ६२५ सेंमी. आहे. पश्र्चिम घाटाच्या पूर्वेकडील उतार मात्र पर्जन्य छायेच्या प्रदेशात येत असल्याने तेथे पर्जन्यमान कमी कमी होत गेलेले आहे. दक्षिणेकडील पश्चिम घाट प्रदेशात पावसाळा दीर्घकाळ असतो.


▪️वने


पश्र्चिम घाट प्रदेशातील पर्जन्याच्या वितरणातील भिन्नतेनुसार विभिन्न प्रकारच्या वनस्पती आढळतात. २०० सेंमी.पेक्षा अधिक पर्जन्यमान असलेल्या पश्र्चिम घाटाच्या पश्र्चिम बाजूवर उष्णकटिबंधीय आर्द्र सदाहरित किंवा वर्षारण्ये, १५० ते २०० सेंमी. पर्जन्यमान असणाऱ्या पश्चिम घाटाच्या पश्र्चिम बाजूस प्रामुख्याने आर्द्र, सदाहरित अरण्यांच्या पश्र्चिमेस उष्णकटिबंधीय निम-सदाहरित वने, १०० ते १५० सेंमी. पर्जन्यमान असणाऱ्या पूर्व उतारावर सदाहरित अरण्यांच्या पूर्वेस उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने, तर पूर्वेकडील पायथ्यालगतच्या ७५ ते १२५ सेंमी. पर्जन्यमान असणाऱ्या प्रदेशात उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वने आढळतात.


सस.पासून  सु. ९०० ते १,८०० मी. उंचीच्या घाट प्रदेशात प्रामुख्याने महाबळेश्वर, निलगिरी व पलनी टेकडयांच्या परिसरात उपोष्ण कटिबंधीय रूंदपर्णी वने असून १,८०० मी.पेक्षा अधिक उंचीच्या प्रदेशात, प्रामुख्याने तमिळनाडू व केरळमधील पर्वतीय प्रदेशात, आर्द्र समशीतोष्ण कटिबंधीय वने आढळतात. केरळमधील सदाहरित वने व राष्ट्रीय उद्याने, केरळ व तमिळनाडूमधील वायनाड व मदुमलाई राष्ट्रीय उद्याने, हे पश्र्चिम घाटातील संरक्षित जंगलमय प्रदेश आहेत. पश्चिम घाटाचा संरक्षित ‘ वर्ल्ड हेरिटेज साइट ’मध्ये समावेश करावा अशी मागणी भारत सरकारने २००६ मध्ये ‘युनेस्को मॅब ’कडे केली आहे. अशा स्थळांमध्ये पुढीलप्रमाणे सात प्रमुख विभागांचा व त्यांतील वेगवेगळ्या उपविभागांचा समावेश असेल :


(१) अगस्त्यमलई विभाग : यात पुढील पाच उपविभागांचा समावेश असेल : तमिळनाडूमधील अगस्त्यमलई जीवावरणीय राखीव प्रदेश ( क्षेत्र ९०० चौ. किमी.); कालकाड मुदननुराई व्याघ राखीव प्रदेश (८०६ चौ. किमी.); केरळमधील नेय्यर, पेप्परा व शेंदूर्णे वन्यजीव अभयारण्य; त्यालगतचे आचेनकोइल, थेनमाला, कोन्नी, पुनालूर, तिरूअनंतपुरम् विभाग आणि अगस्त्य वनम् विशेष विभाग.


(२) पेरियार विभाग : यामध्ये सहा उपविभागांचा समावेश असेल : केरळमधील पेरियार राष्ट्रीय उद्यान व निसर्ग राखीव प्रदेश (७७७ चौ. किमी.), रन्नी, कोन्नी व आचनकोइल अरण्य विभाग. पूर्वेकडील पर्जन्यछायेच्या प्रदेशातील प्रामुख्याने शुष्क अरण्यमय प्रदेशातील श्रीविल्लिपुत्तूर वन्यजीव अभयारण्य आणि तिरूनेलवेली अरण्य विभागातील राखीव जंगलांचा प्रदेश.


(३) अन्नमलई विभाग : यात सात उपविभागांचा अंतर्भाव असेल : तमिळनाडूमधील चिन्नर वन्यजीव अभयारण्य, एर्नाकुलम् राष्ट्रीय उद्यान (९० चौ. किमी.), विस्तीर्ण अशा इंदिरा गांधी वन्यजीव अभयारण्य प्रदेशात (९५८ चौ. किमी.) समाविष्ट असणारी इंदिरा गांधी गास हिल्स व करिअन शोला राष्ट्रीय उद्याने, पलनी हिल्स राष्ट्रीय उद्यान (७३७ चौ. किमी.), केरळमधील पेरांबीकुलम् वन्यजीव अभयारण्य (२८५ चौ. किमी.).


(४) निलगिरी विभाग : हा विभाग सु. ६,००० चौ. किमी.पेक्षाही अधिक क्षेत्रात विस्तारला आहे. यात सहा उपविभाग समाविष्ट असतील : केरळमधील निलगिरी जीवावरणीय राखीव प्रदेश आणि करिम्पुझा राष्ट्रीय उद्यान (२३० चौ. किमी.), सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान (९० चौ. किमी.), वायनाड वन्यजीव अभयारण्य (३४४ चौ. किमी.), तमिळनाडूमधील बंदीपूर (८७४ चौ. किमी.), माकूर्ती (७८ चौ. किमी.) व मदुमलाई (३२१ चौ. किमी.) ही राष्ट्रीय उद्याने व न्यू अमरम्बलम् राखीव जंगल. हा विभाग अतिशय जटिल, सुरक्षित व जगातील एक वैशिष्टयपूर्ण अरण्यमय प्रदेश आहे. आशियाई हत्ती, वाघ, गवा व इतर अनेक दुर्मिळ प्राण्यांचे हे आश्रयस्थान आहे.


(५) तळकावेरी विभाग : यात सहा उपविभाग आहेत. कर्नाटकातील बह्मगिरी (१८१ चौ. किमी.), पुष्पगिरी (९३ चौ. किमी.) व तळकावेरी (१०५ चौ. किमी.) ही वन्यजीव अभयारण्ये, राजीव गांधी  राष्ट्रीय उद्यान ( नागरहोळे ३२१ चौ. किमी.) आणि केरळमधील अलाराम राखीव जंगल.


(६) कुद्रेमुख विभाग : यामध्ये कर्नाटकातील पाच उपविभाग येतात. कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यान(६०० चौ. किमी.), सोमेश्र्वर वन्यजीव अभयारण्य व सभोवतालची सोमेश्वर, अगुंबे व बाळहळ्ळी राखीव जंगले.


(७) सह्याद्री विभाग : यात महाराष्ट्रातील चार उपविभाग येतात. आन्शीप (३४० चौ. किमी.) व चांदोली (३१८ चौ. किमी.) ही राष्ट्रीय उद्याने. कोयना व राधानगरी ही वन्यजीव अभयारण्ये.


सह्याद्री हा जैवविविधतेचा एक खजिना आहे. तेथील सु. २,००० जातींच्या वनस्पतींचा औषधांसाठी वापर केला जातो. ‘बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी ’ने केलेल्या एका अभ्यासानुसार महाराष्ट्र राज्यातील सह्याद्री प्रदेशात देवदेवतांच्या नावाने श्रद्धेने संरक्षित केलेल्या वनविभागांत १,६०० पेक्षा जास्त ‘देवराया ’ आहेत. सह्याद्रीमध्ये अनेक राष्ट्रीय उद्याने, वन्यप्राणी, अभयारण्ये, राखीव व संरक्षित वने निर्माण करणे शक्य झाले आहे. येथील पर्यटनाची अनेक ठिकाणे आर्थिक क्षेत्रे असल्याने पश्र्चिम घाट विकसित होत आहे.


सह्याद्रीमुळे पश्चिम किनारपट्टीवर पर्जन्यवृष्टी होते. त्यामुळे नदयांच्या खोऱ्यांत जलविद्युत्‌निर्मिती प्रकल्पांची निर्मिती सुलभ झाली आहे. येथील जंगलांतून लाकूड व इतर अनेक वनोत्पादने तसेच दक्षिण सह्याद्रीतून चहा, कॉफी, रबर, मसाल्याचे पदार्थ इ. उत्पादने मिळतात. वाहतूक व व्यापाराच्या दृष्टीने पश्र्चिम घाटातील खिंडी व घाट महत्त्वाचे ठरले आहेत. अनेक कवींनी व लेखकांनी सह्याद्रीचे सौंदर्य वर्णिले आहे.


वायनाड अरण्याचा प्रदेश म्हणजे उत्तरेकडील व दक्षिणेकडील घाट प्रदेशाचा संक्रमण भाग आहे. दक्षिणेकडील भाग आर्द्र असल्याने तेथे वनस्पतींच्या असंख्य जाती आढळतात. केरळमध्ये या प्रदेशात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने तेथे दाट अरण्ये आहेत. ‘ सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान ’ हा भारतातील अतिशय महत्त्वाचा, विषुववृत्तीय सदाहरित अरण्यांचा प्रदेश आहे. वृक्षतोडीमुळे उघडया पडलेल्या प्रदेशात गवताळ प्रदेशांची निर्मिती झालेली दिसते. मुख्यत: कर्नाटकातील पश्र्चिम घाट प्रदेश व निलगिरी पर्वतीय प्रदेशात असे विस्तृत गवताळ प्रदेश आहेत.

पूर्वी पश्र्चिम घाट प्रदेशात घनदाट अरण्ये होती. जंगलात राहणाऱ्या आदिवासी जमातींना उदरनिर्वाहासाठी पुरेशा प्रमाणात फळे, कंदमुळे इ. सहज उपलब्ध होत असत. प्रदेशाच्या दुर्गमतेमुळे सखल भागातील लोकांना अशा अरण्यमय भागात येऊन शेती करणे किंवा वसाहती स्थापन करणे शक्य नव्हते. त्यामुळे जंगले सुरक्षित होती. परंतु ब्रिटिशांचे आगमन झाल्यानंतर प्रामुख्याने मळ्यांच्या लागवडीसाठी व त्यानंतर इतर कारणांसाठी मोठया प्रमाणावर जंगलतोड केली गेली.


▪️जवविविधता


पारिस्थितीकीयदृष्टया पश्र्चिम घाटाला विशेष महत्त्व आहे. जैवविविधतेच्या दृष्टीने हा संपूर्ण परिसर अतिशय समृद्ध आहे. अनेक जातींचे प्राणी, पक्षी व असंख्य प्रकारच्या वनस्पती येथे आढळतात. जगातील समृद्ध जैवविविधता असलेल्या प्रदेशात पश्चिम घाटाचा आठवा क्रमांक लागतो. पारिस्थितीकी वैज्ञानिक नॉर्मन मेअर्स यांच्या प्रयत्नांमुळे १९८८ मध्ये पश्र्चिम घाट परिसर पारिस्थितीकीयदृष्टया अतिसंवेदनशील प्रदेश म्हणून घोषित करण्यात आला.


भारताच्या क्षेत्रफळाच्या केवळ ५% भूमी या प्रदेशाने व्यापली असली तरी भारतातील उच्च दर्जाच्या २७% वनस्पती ( सु. ४,००० ते १५,००० जाती ) येथे आढळतात. त्यांपैकी १,८०० जातींच्या वनस्पती केवळ याच प्रदेशात पाहावयास मिळतात. त्यामुळे या वनस्पती म्हणजे या प्रदेशाची वैशिष्टये बनली आहेत. सुमारे पाच हजारांवर फुलझाडांच्या जाती पश्र्चिम घाट परिसरात असून त्यांपैकी सु. १,६०० फुलझाडांचे प्रकार जगात कोठेही आढळत नाहीत.


पश्र्चिम घाटातील पर्वतश्रेण्या म्हणजे असंख्य वन्य प्राण्यांची महत्त्वाची आश्रयस्थाने आहेत. या संपूर्ण परिसरात किमान १३९ सस्तन प्राण्यांच्या जाती, १७९ जल - स्थलचर ( उभयचर ) वर्गातील प्राण्यांच्या जाती व ५०८ पक्ष्यांच्या जाती आढळतात. त्यांपैकी सस्तन प्राण्यांच्या ७, उभयचर प्राण्यांच्या ८४ व पक्ष्यांच्या १६ जाती जगात अन्य कोठेही आढळत नाहीत. जगाच्या अन्य भागांतून नामशेष किंवा दुर्मिळ झालेल्या किमान ३२५ प्राण्यांच्या जाती येथे आढळतात. येथील मोठया ठिपक्यांचे जंगली कस्तुरी मांजर नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. येथे माकडांची संख्याही प्रचंड आहे. मोठया शेपटीच्या माकडांची संख्या सायलेंट व्हॅली व कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यानांत सर्वाधिक आहे. विविध जातींच्या गोगलगाई, सरपटणारे प्राणी, वटवाघुळे, फुलपाखरे यांची संख्या प्रचंड आहे. एकटया केरळमधील पश्चिम घाट परिसरात सु. ६,००० जातींचे कीटक आहेत. फुलपाखरांचे ३३४ प्रकार येथे आढळतात. येथील प्रवाहांमधून विविधरंगी मासे पाहावयास मिळतात.


निलगिरी पर्वतीय प्रदेशात हत्ती, गवा, हरिण, चित्ता, अस्वल, सांबर, रानडुक्कर, वाघ इ. पाणी आढळतात. त्यांच्यासाठी मदुमलाई येथे अभयारण्य राखून ठेवलेले आहे. निलगिरी पर्वतात हत्तींची संख्या सर्वाधिक आहे; तसेच बह्मगिरी व पुष्पगिरी वन्यप्राणी अभयारण्ये, बनेरघट्टा राष्ट्रीय उद्यान व अन्नेकल राखीव जंगलात हत्तींची संख्या पुष्कळ आहे.


कर्नाटकातील पश्चिम घाट प्रदेशात सु. सहा हजारांवर हत्ती व देशातील १०% दुर्मिळ जातींचे वाघ आहेत ( सन २००४). देशातील सुंदरबन व्यतिरिक्त वाघांची संख्या अधिक असणारा पश्चिम घाटातील सलग अरण्यांचा प्रदेश कर्नाटक, तमिळनाडू व केरळमध्ये पसरला आहे. पश्चिम घाटात गवे मोठया प्रमाणात आढळतात. कर्नाटकातील बंदीपूर राष्ट्रीय अभयारण्य व नागरहोळे या दोन प्रदेशांत सु. पाच हजारांवर गवे आहेत. महाराष्ट्रात दाजीपूर अभयारण्य गव्यांसाठी प्रसिद्ध आहे. निलगिरी लंगूर मोठया संख्येने कोडगू जंगलात आढळतात. भारतीय मंटजॅक हरणे भद्रा वन्यप्राणी अभयारण्यात तसेच चिकमगळूरच्या राखीव व्याघ प्रकल्प प्रदेशात मोठया संख्येने आहेत.


ब्राझीलमधील रिओ दे जानेरो येथे झालेल्या ‘ जागतिक वसुंधरा ’ परिषदेमध्ये (१९९२) पश्र्चिम घाटाची गणना जगातील अठरा अतिसंवेदनशील ( हॉटस्पॉट ) अशा पर्यावरणीय क्षेत्रांमध्ये करण्यात आली आहे. भारत सरकारने येथील जैवविविधतेचे जतन व संवर्धन करण्यासाठी अनेक उपाययोजना केलेल्या आहेत. त्यादृष्टीने दोन जीवावरणीय राखीव प्रदेश, १३ राष्ट्रीय उद्याने, अनेक वन्यप्राणी अभयारण्ये व राखीव जंगलांची घोषणा केली आहे.


सोडवा :- महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे

प्र.१ हवामान बदल कमी करण्यासाठी सक्रिय भूमिका बजावण्याच्या उद्देशाने राज्याच्या पर्यावरण मंत्रालयाचे नाव बदलून 'पर्यावरण व हवामान बदल मंत्रालय' ठेवण्याच्या प्रस्तावाला कोणत्या राज्याने नुकतेच मान्यता दिली?


1.महाराष्ट्र ✔️

2.उत्तर प्रदेश

3.गुजरात

4.मध्य प्रदेश


 प्र.२ हवामान, पाऊस, पूर यावर वास्तविक-वेळ माहिती आणि सतर्कतेसाठी कोणत्या राज्याने मेघासंदेश अॅप व वरुणमित्र वेब पोर्टल सुरू केले?


१.मध्य प्रदेश

२.कर्नाटक ✔️

३.ओडिशा  ‌‌

४. पश्चिम बंगाल



 प्र३. संरक्षण मंत्रालयाने "मेक इन इंडिया" उपक्रमाला चालना देण्यासाठी स्थानिक पुरवठादारांकडून किती वस्तू खरेदी करण्यास मान्यता दिली?


१.12

२.16 

३.26 ✔️

४. 22




प्र.४ नेव्हीमध्ये महिला अधिकार्‍यांना सेवानिवृत्तीसाठी किती महिन्यांत कायमस्वरूपी कमिशन देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत?


१.8 महिने

२.3 महिने ✔️

३.6 महिने

४.12 महिने



 प्र.५ ड्रायव्हिंग लायसन्स अॅपला नाव द्या, जे सरकारने नुकतेच सादर केले आहे?


१.जी-यात्रा

२.सारथी ✔️

३.स्पॉटिफाई

४.मी-परिवाहन


 प्र.६ जपानच्या मदतीने पूर्ण केलेला पैठण (जयकवाडी) जलविद्युत प्रकल्प नदीवर आहे ?


१. गंगा

२. कावेरी

३.नर्मदा

४.गोदावरी ✔️



प्र.७  रेडक्लिफ लाइन ही एक सीमा आहे ?


१.भारत आणि पाकिस्तान ✔️

२.भारत आणि चीन

३.भारत आणि म्यानमार

४.भारत आणि अफगाणिस्तान



 प्र.८. त्रिपिताक ही पवित्र पुस्तके आहेत ?


१.बौद्ध ✔️

२.हिंदू

३.जैन

४.वरीलपैकी नहीं



 प्र.९ तुलसीदास, रामचरितमानस यांचे लेखक खालील पैकी कोणत्या शासकाचे समकालीन होते?


१.अकबर ✔️

२.हुमायूं

३.शाहजहां

४. शेरशाह सुरी




 प्र. १० हसणारा गॅस म्हणजे काय?


१. नायट्रस ऑक्साईड ✔️

२.कार्बन मोनॉक्साईड

३.सल्फर डाय ऑक्साईड ४.हायड्रोजन पेरोक्साइड






 प्र.११ सिनेमाच्या विकासातल्या सेवांसाठी सर्वोच्च पुरस्कार कोणाच्या नावावर दिला जातो?


१.राज कपूर

२.दादा साहेब ✔️

३.मीना कुमारी

४.अमिताभ बच्चन



स्पष्टीकरण:- 1969 या वर्षीपासून या पुरस्काराला सुरुवात झाली आहे. पहिलं पुरस्कार देवकी राणी यांना देण्यात आले आहे



 प्र.१२जगातील पहिला बायनरी अंक संगणक कोणी बनविला: झेड 1 ...?


१.कोनराड झुसे ✔️

२.केन थॉम्पसन

३.लन ट्यूरिंग

४.जॉर्ज बुले




 प्र.१३ खालीलपैकी कोणती जागा चिकनकारी कार्यासाठी प्रसिद्ध आहे, जी भरतकामाची पारंपारिक कला आहे?


१.लखनौ ✔️

२.हैदराबाद

३.जयपूर

४.म्हैसूर




 प्र.१४ पुढीलपैकी कोणता इंग्रजी चित्रपट हिंदीमध्ये डब केला गेला?


१.अलादीन ✔️

२.युनिव्हर्सल सोल्जर

३.वेग

४.लोह माणूस 


1) कोणी ग्रामीण जाट लोकांना एक सैनिक शक्तीच्या रुपात संगठित केले? 

A. चूरामन (चूड़ामणि) ✅

B. गोकुलसिंह

C. राजाराम

D. बदनसिंह

🔴सिनसिनीचे जमिनदार व भरतपूर राज्याचे पहिले राजा (1695 ते 1721) मुगलांबरोबर लढाई



2) कोणत्या जाट राजाला जाट लोकांचा अफलातून एवं आदरणीय व विद्वान व्यक्ति बोलले जाते? 

A. जवाहरसिंह

B. सूरजमल ✅

C. नंंदराम

D. गोकुल सिंह


🔴जाटों का प्लेटों कार्यकाल 1755 ते 1763

1761 च्या युद्धातील जखमी मराठा सैनिकांना मदत केली 

1763 मध्ये नजीबउदौलाने सुरजमलची हत्या केली


3) ‘लौहगढ़’ नवाचा किल्ला कोणी बनविला? 

A. सूरजमल

B. अली बहादुर

C. बंदा बहादुर ✅

D. बदनसिंह


🔴गरु गोविंदसिंग यांची राजधानी होती

लक्ष्मणदेव/माधो/बंदा बहादुर

खालसा राज्य स्थापना



4) कोणत्या मुग़ल राजाच्या आदेशावरून बंदा बहादुर ची हत्या करण्यात आली? 

A. वजीर खां

B. फर्रुखसियर ✅

C. बहादुरशाह पहिला

D. यापैकी कोणी नाही


🔴बादशाह फ़ार्रुख़शियरने 1716 मध्ये हत्या केली.


5) ठगांवर दडपशाही कोणी आणली ? 

A. कर्नल स्लीमेन ✅

B. लॉर्ड एल्गिन

C. सर जॉन लॉरेंस

D. लॉर्ड मियो


🔴१८३५ मधे कुविख्यात ठग राजा सईद आमीर अली उर्फ़ "फिरंगिया"ला जेरबंद केले.


मसूरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?


१.उत्तराखंड 🏆

२.जम्मू काश्मीर

३.सिक्किम 

४.उत्तर प्रदेश



२.भारताच्या मुख्य भूमीस खालीलपैकी काय म्हणतात?



१.बेट 

२.त्रिभुजप्रदेश 

३.द्वीपकल्प 🏆

४.मैदानी प्रदेश




3. केदारनाथ कोणत्या राज्यात आहे?


१. उत्तर प्रदेश 

२. हिमाचल प्रदेश 

३. उत्तराखंड 🏆

४. जम्मू-काश्मीर




४. राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाळ किती वर्ष असतो?


१. ०२ वर्ष

२. ०४ वर्ष

३. ०५ वर्ष

४. ०६ वर्ष🏆



५) भारताची पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता संस्था येथे स्थापित केली गेली ?


१. पुणे 

२. हैदराबाद 

३. चेन्नई

४. मुंबई🏆




६) मार्च 2019 मध्ये खालील पैकी कोणत्या माझी आरबीआय गव्हर्नर ला यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला?



१.  मनमोहनसिंग

२.  रघुराम राजन🏆

३.  विमल जलान 

४.  उर्जित पटेल




७) चांद्रयान-१ हे भारताचे पहिले मिशन टु मुन...... रोजी यशस्वीपणे पाठवण्यात आले?



 १. जानेवारी - २००७

२. ऑक्टोबर- २००८🏆

 ३. सप्टेंबर-  २०११

४. ऑक्टोबर -२०१२



८) ऑक्टोबर 2018 मध्ये वर रुबान नावाचे अत्यंत तीव्र चक्रीवादळ निर्माण झाले ?


१. अरबी समुद्र 🏆

२. बंगालचा उपसागर

 ३. पॅसिफिक महासागर

४.  हिंदी महासागर



९) लोरियस स्पोर्ट मॅन ऑफ द इयर 2019 पुरस्कार कोणी जिंकला? 


१. नोवाक जोकोविक🏆

२.  रॉजर फेडरर 

३. राफेल नदाल

 ४.टायगर वूड्स



१०) मुलभूत कर्तव्य संदर्भात तरतुदी भारतीय घटनेच्या कोणत्या भागात करण्यात आली आहे?


१. भाग -२

२. भाग -३

३. भाग -४

४. भाग -४अ🏆




११) 'सत्यार्थ प्रकाश' या ग्रंथांची रचना..... यांनी केली?


१. स्वामी दयानंद सरस्वती🏆

 २. स्वामी विवेकानंद 

३. राजाराम मोहन राय  

४. स्वामी परमहंस




१२) आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो?

१. क्षय

२.  डायरिया 

३. ॲनिमिया🏆

४. बेरीबेरी



१३) बंगालच्या फाळणीस जबाबदार असणारा गव्हर्नर जनरल कोण होता?


१.  लॉर्ड मिंटो 

२. लॉर्ड कर्झन🏆

३. लॉर्ड रिपन 

४. लॉर्ड डलहौसी



१४) मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध ........ यांनी आवाज उठविला?


१. महात्मा फुले

२. सावित्रीबाई फुले

३. लोकमान्य टिळक 

४.वि.रा. शिंदे 🏆

 


१५)दिल्ली ही भारताची राजधानी केव्हापासून झाली?


👍 12 डिसेंबर 1911