२५ ऑक्टोबर २०२५

बेटी बचाओ बेटी पढाओ योजना (BBBP)

१. सुरुवात

➤ २२ जानेवारी २०१५ रोजी पानिपत, हरियाणा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरुवात.


२. लक्ष्यगट

➤ नुकतीच लग्न झालेली व तरुण जोडपी

➤ गर्भवती व स्तनदा माता

➤ आई-वडील


३. उद्दिष्टे

➤ पक्षपाती लिंग निवडीचे उच्चाटन करणे

➤ मुलींचे अस्तित्व व संरक्षण सुनिश्चित करणे

➤ मुलींच्या शिक्षणात आणि सर्व क्षेत्रांत सहभाग सुनिश्चित करणे


४. प्रमुख बाबी

➤ महिला आणि बालविकास मंत्रालय, आरोग्य मंत्रालय व शिक्षण मंत्रालय यांच्या संयुक्त प्रयत्नाने राबवली जाते

➤ जागरूकता मोहीम, मीडिया कॅम्पेन, शालेय व सामाजिक हस्तक्षेप यावर भर



💰 सुकन्या समृद्धी योजना (SSY)


१. सुरुवात

➤ २२ जानेवारी २०१५ रोजी पानिपत, हरियाणा येथूनच सुरू


२. लक्ष्यगट

➤ १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुली


३. उद्दिष्टे

➤ मुलींचा जन्मदर वाढवणे

➤ मुलींच्या जगण्याचे प्रमाण (Survival Rate) सुधारणे

➤ शिक्षणासाठी व भविष्याकरिता बचत करण्याची सवय लावणे


४. महत्वाचे मुद्दे

➤ पोस्ट ऑफिस किंवा मान्यताप्राप्त बँकेत खाते उघडता येते

➤ एका कुटुंबातील दोन मुलींसाठी खाते उघडण्याची मुभा

➤ खाते उघडण्याची वयमर्यादा – मुलगी १० वर्षांपेक्षा कमी वयाची असावी

➤ खाते मॅच्युरिटी – २१ वर्षे किंवा मुलीचे लग्न (किमान १८ व्या वर्षी)

➤ आयकर कलम ८०C अंतर्गत करसवलत


📝 टीप: दोन्ही योजनांचा उद्देश स्त्रीभ्रूणहत्या थांबवून मुलींना शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक सुरक्षितता देणे आहे.

आर्थिक विकास आणि वृद्धी (व्याख्या)


🔹️ मायर व बाल्डविन - "आर्थिक विकास ही अशी प्रक्रिया आहे, ज्याअंतर्गत देशाच्या वास्तविक दरडोई उत्पन्नात दीर्घकालीन वाढ घडून येते."


🔹️ किंडल बर्जर - "अधिक उत्पादन व ते ज्यामुळे शक्य होते त्या तांत्रिक व संस्थात्मक स्थळातील बदल म्हणजे आर्थिक विकास होय."


🔹️ ए. मॅडिसन - "श्रीमंत राष्ट्रांच्या उत्पन्न स्तरातील वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी, तर गरीब राष्ट्रांच्या उत्पन्न स्तरातील वाढ म्हणजे आर्थिक विकास होय."


🔹️ उर्सुला हिक्स - "विकसित देशांतील आर्थिक प्रगतीस वृद्धी तर अविकसित देशांतील आर्थिक प्रगतीस विकास म्हणता येईल."


🔹️ शुम्पिटर - "आर्थिक विकास हा अर्थव्यवस्थेच्या स्थितीक अवस्थेतील उत्स्फूर्त बदल असून, विकासाची प्रक्रिया खंडित किंवा तुटक असू शकते. या उलट अर्थव्यवस्थेमध्ये दीर्घकाळात संथपणे व सातत्याने होत जाणारा बदल म्हणजे वृद्धी होय."


🔹️ जे. के. मेहता - "आर्थिक वृद्धीच्या प्रक्रियेतील बदल संख्यात्मक (Quantitative) तर आर्थिक विकासाच्या प्रक्रियेतील बदल गुणात्मक (Qualitative) स्वरूपाचे असतात."


🔹️ प्रो. बने - "विकसनशील देशात अर्थव्यवस्थेचा विविध घटकात वाढ करून ती टिकविण्यासाठी काही प्रमाणात मार्गदर्शन व नियमांची गरज असते याला आर्थिक विकास म्हणतात, तर विकसित अर्थव्यवस्थेमध्ये विकासाची प्रक्रिया स्वयंसूर्ते नसते त्यामुळे त्या प्रगतीला आर्थिक वृद्धी म्हणता येते."

सायमन कमिशन, नेहरू अहवाल व लाहोर अधिवेशन🔸️ (PYQ POINTS)


🔹 इंग्रजांची भूमिका व नेहरू अहवाल

➤ इंग्रजांनी नेहरू रिपोर्टकडे पूर्णतः दुर्लक्ष केले कारण मुस्लीम लीगने त्याला विरोध केला.

➤ मुस्लीम लीगने नेहरू रिपोर्टपेक्षा जिन्नांच्या चौदा कलमी कार्यक्रमाला प्राधान्य दिले.

➤ काँग्रेसने सरकारला एका वर्षात नेहरू रिपोर्ट स्वीकारण्याची मुदत दिली होती.


🔹 सायमन कमिशनची स्थापना (1927)

➤ माँटेग्यू–चेम्सफोर्ड कायद्याने (1919) केलेल्या सुधारणांचे मूल्यमापन करण्यासाठी कमिशन नेमले गेले.

➤ काँग्रेसला प्रतिनिधित्व न दिल्याने काँग्रेसने कमिशनचा तीव्र निषेध केला.

➤ कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नसल्याने भारतीयांनी त्याचा बहिष्कार केला.

➤ सायमन विरोधी आंदोलन हे युवकांचे पहिले संघटित व क्रांतिकारी आंदोलन ठरले.

➤ जवाहरलाल नेहरू व सुभाषचंद्र बोस यांनी युवकांना संघटित करून नेतृत्वात पुढे झेप घेतली.


🔹 सायमन कमिशन नेमण्याची कारणे (1927)

➤ 1919 चा माँटेग्यू-चेम्सफोर्ड कायदा निकामी ठरला होता.

➤ ब्रिटनमध्ये मजूर पक्ष सत्तेवर आल्यास भारतासाठी अधिक उदार धोरण आखेल, अशी इंग्रजांना भीती होती.

➤ स्वराज्य पक्षाचा वाढता प्रभाव रोखणे इंग्रजांना आवश्यक वाटले.


🔹 सायमन कमिशनच्या शिफारशी

➤ प्रांतिक स्वायत्ततेचा स्वीकार, कायदे मंडळात प्रतिनिधींची व मतदारांची संख्या वाढवावी.

➤ १० ते १६% लोकसंख्येला मताधिकार देण्याची शिफारस.

➤ केंद्रात द्विदश शासन पद्धती लागू करू नये अशी सूचना.

➤ प्रांतातील द्विदश शासन पद्धती रद्द करावी असे सुचविण्यात आले.


🔹 लाहोर अधिवेशन (1929) व पुढील घडामोडी

➤ लाहोर अधिवेशनात काँग्रेसने ‘पूर्ण स्वराज्य’ ही मागणी केली.

➤ या मागणीनंतर गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला, ज्याने स्वातंत्र्य आंदोलनाला नवे वळण दिले.

कलम २६२ – आंतरराज्यीय नदी पाणी तंटे निवारण(PYQ POINTS)


🔹️ अनुच्छेद २६२ अन्वये कायद्याद्वारे आंतरराज्यीय नदीच्या पाण्यासंबंधी वादाच्या निवारणाकरिता तरतूद करण्याचा अधिकार संसदेला आहे.


🔹️ भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद २६२ (२) हे संसदेला कायद्याद्वारे आंतरराज्यीय नदीच्या पाणी तंट्याबाबत सर्वोच्च न्यायालय अथवा अन्य न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रांस अटकाव करण्याची तरतूद करण्याचा अधिकार देते.


🔹️ पाणी विवाद अधिनियम, १९५६ अन्वये आंतरराज्यीय नदीच्या पाण्यासंबंधी वादाच्या निवारणाकरिता न्यायाधिकरण (Tribunal) स्थापन करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे.


🔹️ नदीच्या पाण्याशी निगडित आंतरराज्यीय तंट्याचा निवाडा व्हावा यासाठी योग्य ती तरतूद करण्याचा सांविधानिक अधिकार संसदेला आहे.


🔹️ संसदेला कायद्याद्वारे आंतरराज्यीय नदीच्या पाण्याचा वापर, वाटप किंवा त्यावरील नियंत्रण याबाबतीत कोणत्याही तंट्याच्या निर्णयाकरिता तरतूद करता येईल.


🔹️ अशा कोणत्याही तंट्याच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाला किंवा अन्य कोणत्याही न्यायालयाला अधिकारिता वापरता येणार नाही अशी तरतूद संसदेला कायद्याद्वारे करता येते.


🔹️ पाणी-तंटा अधिनियमानुसार केंद्र शासनाला अशा कोणत्याही तंट्याच्या निवारणाकरिता लवाद (Tribunal) स्थापण्याचा अधिकार आहे.


🔹️ महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेशमधील कृष्णा पाणीवाटप लवाद (Krishna Water Disputes Tribunal) हा राज्यघटनेच्या कलम २६२ च्या तरतुदीनुसार जाहीर करण्यात आला आहे.


🔹️ महादायी जल विवाद न्यायाधिकरण (२०१०) मध्ये खालील राज्यांचा समावेश आहे: गोवा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र.


🔹️ महानदी जल विवाद न्यायालयची स्थापना मार्च २०१८ मध्ये करण्यात आली आहे.


🔹️ १६ फेब्रुवारी २०१८ रोजी कावेरी पाणी तंट्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या अपीलीय अधिकार क्षेत्राला विस्तार झाला आहे. (अनुच्छेद १३६ चे पुनर्रष्टीकरणारे)

राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची साधने


1) स्थूल देशांतर्गत उत्पाद (GDP) :- देशाच्या सीमेअंतर्गत उत्पादित झालेल्या "अंतिम वस्तू आणि सेवांच्या बाजारभावाची बेरीज" म्हणजे GDP होय. 


🛑GDP - अंतर्गत शक्ती दर्शवते.


2)स्थूल राष्ट्रीय उत्पाद(GNP) :- "देशाच्या नागरिकांनी जगात कोठेही राहून उत्पादित केलेल्या अंतिम वस्तू आणि सेवांच्या बाजारभावाची बेरीज" म्हणजे GNP होय. 


उदा :- अजय - अतुल यांनी अफ्रिकेत जाऊन तिथे स्टेज शो केला तर त्यांना तिथे मिळालेले पैसे GNP मध्ये मोजले जातील‌. ते GDP मध्ये मोजले जाणार नाहीत.(हा M(आयात) झाला.)


उदा :- जाॅन सीना त्याच्या देशातून भारतात आला आणि स्टेज शो केला त्याने भारतातात मिळवलेले पैसे जाताना त्याच्या देशात घेऊन गेला तर ते वजा करावे लागतील (हा X (निर्यात)‌झाला)


📍गेलेला पैसा वजा (-)करता आणि आलेला पैसा समाविष्ट (+)करता तेंव्हा आपल्याला GNP मिळतो.


🔰 निर्यात(X) - जास्त असेल तर GNP जास्त असणार आहे.


उदा - GDP 1000 रू + निर्यात 400 + आयात 300 = 1100 GNP

म्हणजेच GDP 1000 रू. तर GNP 1100 रू.


💠आयात(M) - जास्त असेल तर GDP जास्त असणार आहे आणि GNP कमी असणार आहे.

उदा - GDP 1000 रु + निर्यात 400 - आयात 600 = 800 GNP

म्हणजेच GDP 1000 रू. तर GNP 800 रू.


🔶स्थूल राष्ट्रीय उत्पाद (GNP) = GDP + X(निर्यात ) - M(आयात ) पाठच करा (PYQ)


⭕️घसारा (डेप्रिसिएशन) - एखादी भांडवली वस्तू आहे ती जर एका आर्थिक वर्षात घसरत असेल (तिची झीज होत असेल )तर तिची घसरण पैशाच्या स्वरूपात मोजली जाते. त्याला घसारा म्हणतात. 


🔰 निव्वळ देशांतर्गत उत्पाद (NDP):-

घसारा वजा करून जे उत्पन्न मिळते त्याला म्हणतात नेट डोमेस्टिक प्रोडक्ट (NDP)


✅NDP = GDP - घसारा 


⭕️ निव्वळ राष्ट्रीय उत्पाद(NNP):-

घसारा जर GNP मधून वजा केला तर NNP मिळतो.


✅NNP = GNP - घसारा


🟡 राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे सर्वात सुयोग्य साधन/मापन NNP हे आहे. 

म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी भारतात NNP चा वापर केला जातो.


💠 राष्ट्रीय उत्पन्न टाॅपिकवरती वरील महत्त्वाच्या संकल्पनांवरती राज्यसेवा पूर्व तसेच संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षांमध्ये खूप वेळा प्रश्न आलेले आहेत.(PYQ) 

पाठच करा.

मिष्टी योजना (MISTHI Yojana)



1️⃣ सामान्य माहिती

➤ MISTHI = Mangrove Initiative for Shoreline Habitats & Tangible Incomes 

➤ सुरुवात – ५ जून २०२३ (2023-24 अर्थसंकल्पात घोषणा)

➤ योजनेचा कालावधी – 2023 ते 2028

➤ संबंधित मंत्रालय – पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय

➤ सरकारची भूमिका – स्थानिक समुदायांना खारफुटी लागवड उपक्रमांसाठी आर्थिक मदत

➤ दोन वर्षांतील प्रगती – 19,020 हेक्टर क्षेत्र व्यापून गुजरातमध्ये खारफुटी वनीकरणात राष्ट्रीय आघाडी


2️⃣ उद्दिष्टे 🎯

➤ निकृष्ट झालेली खारफुटी परिसंस्था पुनरुज्जीवित करणे

➤ खारफुटीचे आच्छादन वाढवणे

➤ हवामान बदल आणि समुद्री धूप यांच्या विरोधात किनारी लवचिकता (coastal resilience) मजबूत करणे

➤ किनारी समुदायांसाठी

  ✅️ ➤ पर्यावरणीय पर्यटन

  ✅️ ➤ शाश्वत उपजीविकेला प्रोत्साहन

➤ COP27 (इजिप्त, 2022) मध्ये सुरू झालेल्या

  ✅️ ➤ Mangrove Alliance for Climate (MAC) ला पाठिंबा


3️⃣ कार्याची व्याप्ती 📍

➤ 9 किनारी राज्ये आणि 4 केंद्रशासित प्रदेशांतील

  ✅️ ➤ 540 चौरस किमी क्षेत्रफळामध्ये खारफुटी विस्ताराचा समावेश


4️⃣ संबंधित मुद्दे 📊

➤ देशातील एकूण खारफुटीचे आच्छादन – 4,991.68 चौ. किमी

➤ देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राशी प्रमाण – 1.5%

➤ सर्वाधिक खारफुटी वने –

  ✅️ ➤ पश्चिम बंगाल – 2,114 चौ. किमी (42.30%)

➤ महाराष्ट्रातील खारफुटी वने –

  ✅️ ➤ 324 चौ. किमी (6.50%)

काही महत्वाचे ऑपरेशन्स :-



✔️ ऑपरेशन अलर्ट - राजस्थान सीमेवर सीमा सुरक्षा दलाने (BSF) ने सुरू केलेले सुरक्षा अभियान 


✔️ऑपरेशन ब्रह्मा - २०२५ म्यानमार भूकंप दरम्यान म्यानमारला आपत्ती मदत पुरवण्यासाठी 


✔️ऑपरेशन कलानेमी - उत्तराखंड सरकार ने सुरू केलेले, "बनावट बाबा" किंवा बनावट आध्यात्मिक नेत्यांवर कारवाईसाठी 


✔️ऑपरेशन इंद्रावती - हैतीमधून  डोमिनिकन रिपब्लिकला आपल्या नागरिकांना  बाहेर काढण्यासाठी 


✔️ऑपरेशन ऑलिव्हिया - ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांचे संरक्षण करण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाने सुरू केले.


✔️ऑपरेशन स्पायडरवेब - युक्रेनच्या सुरक्षा सेवेने (SBU) रशियन हवाई तळांना लक्ष केलेला ड्रोन हल्ला.


✔️ऑपरेशन रायझिंग लायन - इस्रायलने इराणवर केलेला सर्वात धाडसी हल्ला.


✔️ऑपरेशन 'ट्रू प्रॉमिस ३' - इस्रायलच्या "ऑपरेशन रायझिंग लायन" चा बदला घेण्यासाठी इराणने सुरू केलेले.


✔️ऑपरेशन सिंधू - इराणमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढले 


✔️ऑपरेशन मिडनाईट हॅमर - इराणच्या अणु सुविधांवर अमेरिकेच्या नेतृत्वाखालील लष्करी हल्ला.

काही महत्त्वाचे नियम



1.न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम -

एखाद्या वस्तूवर कोणतेही असंतुलित बल क्रिया करीत नसेल तर ती वस्तू अचल अवस्थेत असल्यास अचल अवस्थेतच राहील अथवा सरळ रेषेत एकसमान गतीत असल्यास ती सतत त्या रेषेत एकसमान गतीत राहील.


2.न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम -

संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो व संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते.


3.न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम -

कोणत्याही एका वस्तूवर बलाची क्रिया होत असताना बल निर्माण करणाऱ्या (दुसऱ्या) वस्तूवर विरुद्ध दिशेने तेवढ्याच परिमाणचे बल प्रतिक्रिया करीत असते.

किंवा

क्रिया बल व प्रतिक्रिया बल यांची परिमाणे समान असतात; परंतु त्यांच्या दिशा परस्परांविरोधी असतात.


4.ऊर्जा अक्षय्यतेचा नियम -

ऊर्जेची निर्मिती किंवा तिचा नाश होऊ शकत नाही. एका प्रकारच्या ऊर्जेचे दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेत रूपांतर करता येते, तथापि विश्वामधील एकूण ऊर्जा सदैव अक्षय्य राहते.


5.तरणणाचा नियम -

तरणणाऱ्या वस्तूचे वजन तिच्या द्रव्यास भागाने विस्थापित केलेल्या द्रव्याच्या वजनाएवढे असते.


6.ओहमचा नियम -

जर वाहकाची भौतिक अवस्था कायम राहात असेल तर वाहकाच्या दोन टोकांमधील विभवांतर (V) व वाहकातून जाणारी विद्युत्धारा (I) यांचे गुणोत्तर स्थिर राहते.

महत्त्वाच्या नवीन नियुक्त्या – २०२५


1️⃣ रोमन कॅथोलिक चर्च (पोप)

 – चाना रॉबर्ट फ्रान्सिस प्रेव्होस्ट (पहिला अमेरिकन) → पोप लिओ XIV म्हणून नियुक्त


2️⃣ लोक लेखा समिती (PAC)

 – अध्यक्ष: के.सी. वेणुगोपाल


3️⃣ UPSC (युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन)

 – अध्यक्ष: डॉ. अजय कुमार


4️⃣ NALSA (राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरण)

 – कार्यकारी अध्यक्ष: न्यायमूर्ती सूर्यकांत


5️⃣ BRICS चेंबर ऑफ कॉमर्स & इंडस्ट्री

 – अध्यक्ष: हरवंश चावला


6️⃣ भारताचा सर्वोच्च न्यायालय

 – ५२ वा CJI: न्यायमूर्ती बी.आर. गावई (भूषण रामकृष्ण गावई)


7️⃣ इंटेलिजन्स ब्युरो (IB)

 – संचालक: तपन कुमार डेका (कार्यकाळ १ वर्षाने वाढवला)


8️⃣ इंडियन फर्टिलायझर असोसिएशन (IFA)

 – अध्यक्ष: शैलेश सी. मेहता


9️⃣ पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार मंडळ

 – अध्यक्ष: एस. महेंद्र देव


🔟 आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्था (IIAS)

 – अध्यक्ष: व्ही. श्रीनिवास (२०२५–२८)


1️⃣1️⃣ पंतप्रधानांचे संग्रहालय आणि ग्रंथालय

 – संचालक: अश्विनी लोहनि


1️⃣2️⃣ राष्ट्रपतींचे पहिले महिला ADC

-- यशस्वी सोलंकी


1️⃣3️⃣ वर्ल्ड अँटी-डोपिंग एजन्सी (WADA)

 – अध्यक्ष: विटोल्ड बान्का | मुख्यालय: मॉन्ट्रियल, कॅनडा


1️⃣4️⃣ संयुक्त राष्ट्र महासभा (UNGA)

 – ८० वा सत्र अध्यक्ष: अन्नालेना बॅरबॉक (जर्मनी) → फिलेमोन यांग (कॅमेरून) यांची जागा घेतली


1️⃣5️⃣ वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन (UNWTO)

 – पहिली महिला सचिव-जनरल: शेखा नासेर अल नोवाइस (UAE)


1️⃣6️⃣ भारतीय उद्योग परिसंघ (CII)

 – अध्यक्ष: राजीव मेमानी


1️⃣7️⃣ आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स (IBCA)

 – अध्यक्ष: भूपेंद्र यादव (पर्यावरण मंत्री) | सचिव-जनरल: एस.पी. यादव

जगातील प्रसिद्ध नद्या



🔹️ जगातील सर्वात लांब नदी कोणती? — नाईल (Nile)


🔹️ प्रवाहाच्या प्रमाणानुसार जगातील सर्वात मोठी नदी कोणती? — अ‍मेझॉन (Amazon)


🔹️ सिंधूनंतर पाकिस्तानातील सर्वात लांब नदी कोणती? — सतलज (Sutlej)


🔹️ युरोपातील सर्वात लांब नदी कोणती? — व्होल्गा (Volga)


🔹️ उत्तर अमेरिकेतील दुसरी सर्वात लांब नदी कोणती? — मिसुरी (Missouri)


🔹️ यलो समुद्र कोणत्या दोन देशांदरम्यान आहे? — चीन आणि कोरिया


🔹️ ब्लू नदी कोणत्या देशात आहे? — अमेरिका (U.S.)


🔹️ माया नदी कोणत्या देशात आहे? — रशिया


🔹️ कोणती नदी विषुववृत्त दोनदा ओलांडते? — काँगो (Congo)


🔹️ स्कीना नदी कोणत्या खंडातून वाहते? — उत्तर अमेरिका


🔹️ डार्लिंग नदी कोणत्या देशात आहे? — ऑस्ट्रेलिया


🔹️ रेड नदी कोणत्या देशात आहे? — अमेरिका (USA)


🔹️ ऑक्सस नदी कोणत्या दोन देशांदरम्यान वाहते? — अफगाणिस्तान आणि ताजिकिस्तान


🔹️ यांगत्से कियांग नदी कोणत्या देशात आहे? — चीन


🔹️ आशियातील सर्वात मोठी नदी कोणती? — यांगत्से कियांग (Yangtze Kiang)


🔹️ आफ्रिकेतील सर्वात मोठी नदी कोणती? — नाईल (Nile)


🔹️ थेम्स ही कोणत्या देशातील प्रसिद्ध नदी आहे? — युनायटेड किंगडम (UK)


🔹️ ऑरेंज ही कोणत्या देशातील नदी आहे? — दक्षिण आफ्रिका (South Africa)


🔹️ पाकिस्तानातील सर्वात लांब नदी कोणती? — सिंधू नदी (River Sindh)


🔹️ कोणत्या नदीला “Father of Waters” असे म्हणतात? — सिंधू नदी (Indus)

महत्त्वाचे लष्करी सराव (Military Exercises )



१) द्विपक्षीय लष्करी सराव (Bilateral Exercises)


🔹 Vinbax 2024 – भारत व व्हिएतनाम


🔹 वज्र प्रहार 2024 (Vajra Prahar) – भारत व अमेरिका


🔹 गरुड शक्ती 2024 (Garuda Shakti) – भारत व इंडोनेशिया


🔹 नसीम-अल-बहर (Naseem Al Bahr) – भारत व ओमान


🔹 IN-GN MPX – भारत व जर्मनी


🔹 SIMBEX 2024 – भारत व सिंगापूर


🔹 कॅरियर स्ट्राइक सराव (Carrier Strike) – भारत व इटली


🔹 काझिंद 2024 (Kazind) – भारत व कझाकिस्ता


🔹 अल नजाह-5 (Al Najah) – भारत व ओमान


🔹 ईस्टर्न ब्रिज (Eastern Bridge) – भारत व ओमान


🔹 युद्ध अभ्यास (Yudh Abhyas) – भारत व अमेरिका


🔹 वरूण 2024 (Varuna) – भारत व फ्रान्स


🔹 उदार शक्ती (Udar Shakti) – भारत व मलेशिय


🔹 नोमॅडिक एलिफंट (Nomadic Elephant) – भारत व मंगोलिया


🔹 JIMEX 2024 – भारत व जपान


🔹 मैत्री 2024 (Maitree) – भारत व थायलंड


🔹 MPX – भारत व स्पेन


🔹 होपेक्स सराव (Hopex) – भारत व इजिप्त


🔹 तर्कश (Tarkash) – भारत व अमेरिका


🔹 शक्ती (Shakti) – भारत व फ्रान्स


🔹 दस्तलिक (Dustlik) – भारत व उझबेकिस्तान


🔹 टायगर ट्रायम्फ (Tiger Triumph) – भारत व अमेरिका


🔹 LAMITIYE 2024 – भारत व सेशल्स


🔹 डेजर्ट सायक्लोन 2024 (Desert Cyclone) – भारत व UAE (संयुक्त अरब अमिरात)


🔹 सहयोग-कैझिन (Sahyog-Kaijin) – भारत व जपान


२) बहुपक्षीय लष्करी सराव (Multilateral Exercises)

🔹 IBSAMAR – भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका

२४ ऑक्टोबर २०२५

चालू घडामोडी :- 23 ऑक्टोबर 2025


◆ ऑलम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक जिंकवून देणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा ला भारतीय सैन्याकडून लेफ्टिनेंट कर्नल हे पद देण्यात आले आहे.

◆ भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमात मोलाचे योगदान देणारे वैज्ञानिक डॉ. एकनाथ वसंत चिटणीस यांचे निधन झाले आहे. 

◆ रोहित शर्मा ऑस्ट्रेलियन भूमीवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1000 धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज बनला आहे.

◆ आंतरराष्ट्रीय हिम बिबट्या दिन दरवर्षी 23 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो.

◆ आंतरराष्ट्रीय हिम बिबट्या दिन 2024 ची थीम "भविष्यातील पिढ्यांसाठी हिम बिबट्याच्या अधिवासांचे रक्षण करणे" ही होती.

◆ सरकारने उच्च उत्पादन देणाऱ्या, लांब-स्टेपल कापसाच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी 'कापूस उत्पादकता अभियान' सुरू केले आहे. 

◆ मासाको नोझावा यांना जपानच्या 2025 च्या 'पर्सन ऑफ कल्चरल मेरिट' पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे. 

◆ जागतिक वन संसाधन मूल्यांकन (GFRA) 2025 च्या अहवालानुसार, एकूण वनक्षेत्राच्या बाबतीत भारताचा क्रमांक जागतिक स्तरावर नववा आहे.

◆ आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ (IUCN) चा 90 वा सदस्य देश म्हणून तुवालू सरकार अधिकृतपणे सामील झाले आहे.

◆ मोरक्कोने अर्जेंटिनाविरुद्ध विजय मिळवून चिली येथे झालेला फिफा अंडर-20 विश्वचषक 2025 जिंकला आहे.

◆ युनायटेड स्टेट्स ग्रँड प्रिक्स 2025 मध्ये मॅक्स व्हर्स्टापेनने लँडो नॉरिस आणि चार्ल्स लेक्लेर्क यांच्यावर विजय मिळवला.

◆ भारत आणि युनायटेड किंग्डमने रामानुजन ज्युनियर रिसर्चर्स प्रोग्राम सुरू केला आहे. 

◆ JAIMEX 2025 हे भारत आणि जपान यांच्यातील एक सागरी सराव आहे, ज्यात भारतीय नौदलाचे युद्धपोत INS सह्याद्री सहभागी झाले आहे.

२३ ऑक्टोबर २०२५

चालू घडामोडी :- 21 & 22 ऑक्टोबर 2025


◆ गोवा येथे 31 ऑक्टोबर ते 17 नोव्हेंबर 2025 दरम्यान FIDE Chess World Cup 2025 होणार आहे. 

◆ मलेशियातील सुलतान ऑफ जोहोर कप 2025 मध्ये हॉकीमध्ये भारताने रौप्य पदक जिंकले आहे.

◆ छत्तीसगड राज्य सरकारने काळवीटांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पुनर्स्थापित करण्यासाठी पाच वर्षांचा (2021-2026) पुनरुत्पादन कार्यक्रम सुरू केला आहे.

◆ भारतामध्ये दरवर्षी 21 ऑक्टोबर हा दिवस पोलिस स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो.

◆ 125 व्या इंडियन फुटबॉल असोसिएशन (IFA) शिल्ड 2025 "मोहन बागान सुपर जायंट" फुटबॉल संघाने जिंकली.

◆ महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) चिनी फटाक्यांची बेकायदेशीर तस्करी रोखण्यासाठी 'ऑपरेशन फायर ट्रेल' राबवले आहे.

◆ Graded Response Action Plan (GRAP) हा दिल्ली-NCR मधील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी तयार केलेला आराखडा आहे.

◆ जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिन (WOD) दरवर्षी 20 ऑक्टोबर रोजी ऑस्टिओपोरोसिसविषयी जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो.

◆ जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिन (WOD) 2025 ची थीम "हे अस्वीकार्य आहे!" (It's unacceptable!) ही आहे.

◆ जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिन (WOD) 2024 ची थीम "नाजूक हाडांना नाही म्हणा" (Say No to Fragile Bones) ही होती.

◆ मशीनद्वारे गटार स्वच्छता करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 'मॅनहोल ते मशीन होल' ही योजना सुरू केली आहे.

◆ Wildlife Institute of India (WII) ने "Status of Elephants in India" हा अहवाल प्रसिद्ध केला.

◆ चौथी दक्षिण आशियाई (SAAF) अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025, 24 ते 26 ऑक्टोबर दरम्यान झारखंडमधील रांची येथील बिरसा मुंडा फुटबॉल स्टेडियममध्ये आयोजित केली जाईल.

२२ ऑक्टोबर २०२५

राज्य पुनर्रचना संदर्भातील आयोग व समित्या



1️⃣ एस. के. धार आयोग (S.K. Dhar Commission)

🔸️ स्थापना: 1948

🔸️ अहवाल: 1948

🔸️ अध्यक्ष: एस. के. धार

🔸️ स्थापनेचे माध्यम: संविधान सभेचे अध्यक्ष

🔸️ शिफारस:

 ✔️ राज्य पुनर्रचनेसाठी प्रशासकीय सोय हा प्रमुख निकष असावा

 ✔️ भाषा व संस्कृतीवर आधारित पुनर्रचना नाकारली

 ✔️ मात्र आंध्र प्रदेशची निर्मिती भाषिक आधारावर करता येईल असे मत व्यक्त


2️⃣ जे. व्ही. पी. समिती (J.V.P. Committee)

🔸️ स्थापना: 1948

🔸️ अहवाल: 1949

🔸️ सदस्य: जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, पट्टाभी सीतारामय्या

🔸️ स्थापनेचे माध्यम: काँग्रेस पक्ष

🔸️ शिफारस:

 ✔️ भाषिक तत्त्वास विरोध केला

 ✔️ भाषेच्या आधारावर राज्य निर्मितीबाबत अनुकूलता दाखवली नाही


3️⃣ राज्य पुनर्रचना आयोग (State Reorganization Commission / Fazal Ali Commission)

🔸️ स्थापना: 1953

🔸️ अहवाल: 1955

🔸️ अध्यक्ष व सदस्य:

 ✔️ फाजल अली (अध्यक्ष)

 ✔️ के. एम. पण्णीकर

 ✔️ हृदयनाथ कुंझरू


🔸️ स्थापनेचे माध्यम: केंद्र सरकार

🔸️ शिफारस:

 ✔️ भाषिक आधारावर राज्य पुनर्रचनेस समर्थन

 ✔️ ‘एक राज्य - एक भाषा’ या तत्त्वाचा अस्वीकार

 ✔️ राज्य निर्मिती करताना प्रशासकीय कार्यक्षमता व सामाजिक एकोपा यालाही महत्त्व देण्याचे सुचवले

आंतरराज्यीय परिषद (कलम 263) PYQ POINTS



♦️स्थापना व रचना

🔹️ कलम 263 नुसार, राज्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी राष्ट्रपती आंतरराज्य परिषद नियुक्त करू शकतात.

🔹️ आंतर-राज्य परिषद 28 मे, 1990 रोजी स्थापन झाली.

🔹️ परिषदेची पुनर्रचना 11 नोव्हेंबर, 1999 रोजी करण्यात आली.


♦️अध्यक्ष व सदस्य

🔹️ पंतप्रधान हे आंतर-राज्य परिषदेचे अध्यक्ष असतात.

🔹️ सर्व राज्यांचे मुख्यमंत्री हे परिषदेचे सदस्य असतात.


♦️बैठका व कार्यपद्धती

🔹️ आंतर-राज्य परिषदेच्या बैठका पडद्याआड (गुप्तरित्या) घेतल्या जातात.

🔹️ परिषदेत विचारार्थ येणारे मुद्दे सहमतिने सोडवले जातात.


♦️कार्यक्षेत्र

🔹️ राज्या-राज्यांतील तंटे – उद्भवलेल्या तंट्यांबाबत चौकशी करणे व सल्ला देणे.

🔹️ समाईक हितसंबंधांचे विषय –

    • राज्यांपैकी सर्व, काही किंवा संघराज्य व एक/अधिक राज्ये यांच्या सामाईक हिताशी संबंधित विषयांवर अन्वेषण व चर्चा करणे.

🔹️ धोरण समन्वय व शिफारशी –

    • अशा कोणत्याही विषयावर शिफारशी करणे.

    • विशेषतः धोरणे व कारवाई यांचा अधिक चांगला समन्वय साधण्यासाठी शिफारशी करणे.

नवीन मार्गदर्शक तत्त्वे

 💎 नवीन मार्गदर्शक तत्त्वे (Directive Principles of State Policy – DPSP) घटनादुरुस्त्यांद्वारे जोडलेली


🔹 1976 – 42 वी घटनादुरुस्ती

1.मुलांच्या निरोगी विकासाच्या संधी सुरक्षित करणे (अनुच्छेद 39)


2.समान न्यायाचा प्रचार करणे व गरिबांना मोफत कायदेशीर मदत देणे (अनुच्छेद 39A)


3.उद्योगांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग सुरक्षित करणे (अनुच्छेद 43A)


4.पर्यावरणाचे संरक्षण व सुधारणा, तसेच जंगले व वन्यजीवांचे रक्षण करणे (अनुच्छेद 48A)


🔹 1978 – 44 वी घटनादुरुस्ती

➤ राज्याने उत्पन्न, स्थिती, सुविधा व संधी यांतील असमानता कमी करणे आवश्यक (अनुच्छेद 38)


🔹 2002 – 86 वी घटनादुरुस्ती

➤ अनुच्छेद 45 मध्ये बदल: सहा वर्षापर्यंतच्या सर्व मुलांचे संगोपन व शिक्षण राज्याने करणे.

➤ कलम 21A अंतर्गत प्राथमिक शिक्षण हा मूलभूत अधिकार घोषित.


🔹 2011 – 97 वी घटनादुरुस्ती

➤ सहकारी संस्थांशी संबंधित नवीन तत्त्व (अनुच्छेद 43B) —

✅️ ➤ सहकारी संस्थांची निर्मिती प्रोत्साहित करणे

✅️ ➤ त्यांचे स्वायत्त कामकाज व लोकशाही नियंत्रण सुनिश्चित करणे

✅️ ➤ व्यावसायिक व्यवस्थापनाला चालना देणे

अखिल भारतीय किसान सभा



🔹️स्थापना व मुख्य माहिती

➤ स्थापना: 11 एप्रिल 1936

➤ ठिकाण: लखनौ

➤ संस्थापक सचिव: प्रा. एन. जी. रंगा

➤ अध्यक्ष: स्वामी सहजानंद सरस्वती

➤ पहिले अधिवेशन: लखनौ

➤ मुखपत्र: इंदुलाल याज्ञिक यांच्या नेतृत्वाखाली


🔹️सदस्य आणि प्रमुख नेते

➤ सोहनसिंग जोशी

➤ इंदुलाल याज्ञिक

➤ जयप्रकाश नारायण

➤ मोहनलाल गौतम

➤ कमल सरकार

➤ सुनील प्रामाणिक नंबूरीपाद

➤ करीनंद शर्मा

➤ यमुना करजी

➤ यदुदुंन (जादुनंदन) शर्मा

➤ राहुल सांकृत्यायन

➤ पी. सुंदरैय्या

➤ राम मनोहर लोहिया

➤ आचार्य नरेंद्र देव

➤ बंकिम मुखर्जी

➤ मुझफ्फर अहमद

➤ ए. के. गोपालन

➤ बिनय कृष्ण चौधरी

➤ हरिकिशन सिंग सुरजीत

➤ एस. रामचंद्रन पिल्ले

➤ आमरा राम


🔹️महत्त्वाचे कार्य आणि कार्यपद्धती

➤ सभेने शेतकऱ्यांच्या हक्कांचा जाहीरनामा राष्ट्रीय सभेला सादर केला

➤ 11 एप्रिल 1936 रोजी काँग्रेसची पहिली अध्यक्ष म्हणून स्वामी सहजानंद सरस्वती यांची निवड


🔹️पूर्वसंधी आणि प्रदेशीय स्थापना

➤ 1928: 'आंध्र किसान संघ – संस्थापक: एन. जी. रंगा

➤ ओरिसा: 'उत्कल प्रांतीय किसान सभा' – संस्थापक: मालती चौधरी

बारडोली सत्याग्रह (1928-29)



🔹️मूलभूत माहिती

➤ वर्ष: 1928-29

➤ ठिकाण: बारडोली

➤ नेतृत्व: सरदार वल्लभभाई पटेल


🔹️कारणे आणि सुरूवात

➤ 1926 मध्ये स्थानिक सरकारने 30% कर वाढीची घोषणा केली

➤ शेतकऱ्यांनी या वाढीचा विरोध केला

➤ सरकारने बारडोली चौकशी आयोग नेमला, ज्याने कर वाढ चुकीची असल्याचे सांगितले


🔹️पटेलांचे नेतृत्व आणि कार्यपद्धती

➤ पटेलांनी महिलांचा सहभाग वाढवला

➤ महिलांना "सरदार" पदवी दिली

➤ लढा देण्यासाठी 13 छावण्या उभारल्या

➤ आंदोलनात सामाजिक बहिष्काराचा वापर करून विरोधकांवर दबाव टाकला

➤ सत्याग्रह पत्रिका सुरू केली


🔹️समर्थन आणि राष्ट्रीय प्रतिसाद

➤ लालजी नारंजी आणि के एम मुन्शी यांनी समर्थनार्थ विधान परिषदेचा राजीनामा दिला

➤ मुंबई रेल्वेने संप पुकारला

➤ 2 ऑगस्ट 1928: गांधीजी बारडोलीत दाखल, पटेलांना अटक होऊ नये म्हणून


🔹️चौकशी आयोगाचे निर्णय आणि यश

➤ चौकशी आयोग स्थापन: ब्लुमफिल्ड व मक्सवेल

➤ आयोगाने कर वाढ चुकीची असल्याचे सांगितले

➤ कर वाढ 30% ऐवजी 6.3% करण्यात आली

➤ सत्याग्रह यशस्वी ठरला ✅

मुळशी सत्याग्रह



🔹️स्थान व कालावधी

➤ ठिकाण: पुणे जिल्ह्यातील मुळशी परिसर

➤ कालावधी: 1920 – 1921


🔹️नेतृत्व

➤ या सत्याग्रहाचे नेतृत्व सेनापती बापट यांनी केले.


🔹️कारण

➤ टाटा वीज कंपनीने वीज निर्मितीसाठी धरण बांधण्याची योजना आखली होती.

➤ या योजनेमुळे सुमारे 54 गावे धरणाखाली जाणार होती.

➤ शेतकऱ्यांची जमीन बुडणार असल्याने त्यांनी विरोध सुरू केला.


🔹️घटना व पार्श्वभूमी

➤ शेतकऱ्यांनी जमिनींच्या अन्यायकारक संपादनाविरोधात आंदोलन केले.

➤ सेनापती बापट यांनी या संघर्षाचे नेतृत्व करत जनजागृती केली.

➤ हे आंदोलन औपनिवेशिक शासन व भांडवलदारांच्या संयोगाविरोधातील ग्रामीण असंतोषाचे प्रतीक ठरले.


🔹️परिणाम व व्यापक प्रभाव

➤ मुळशी सत्याग्रहामुळे जमिनींचे हक्क, विकास प्रकल्पांतील पुनर्वसन, आणि शेतकऱ्यांच्या हितांचे प्रश्न राष्ट्रीय पातळीवर चर्चिले गेले.

➤ पुढील काळात (1926-27) बंगाल, उत्तर प्रदेश, पंजाब व आंध्र प्रदेशात किसान सभा व इतर शेतकरी संघटना स्थापन होण्यास प्रोत्साहन मिळाले.

भारतातील क्रांतिकारी चळवळी: महत्त्वाचे टप्पे (१८७९ – १९१९)



1.🚩 बंगालमधील क्रांतिकारी चळवळ

➤ प्रारंभ (१९०२)

  ➡️ छोट्या क्रांतिकारी गटांची स्थापना — मिदनापूर व कलकत्ता येथील अनुशीलन समिती (प्रमथनाथ मित्र, पुलिन बिहारी दास, बारिंद्रकुमार घोष).

➤ प्रचाराची साधने

  ➡️ १९०६ पासून युगांतर हे क्रांतिकारी साप्ताहिक सुरू झाले.

  ➡️ १९०५–०६ पर्यंत संध्या व युगांतर यांसारख्या वृत्तपत्रांनी क्रांतिकारी दहशतवादाचा पुरस्कार केला.

➤ महत्त्वाच्या घटना

  ➡️ १९०७ — पूर्व बंगालच्या माजी लेफ्टनंट गव्हर्नरवर हल्ल्याचा प्रयत्न.

  ➡️ १९०८ — प्रफुल्ल चाकी व खुदीराम बोस यांनी मुझफ्फरपूरचे मॅजिस्ट्रेट किंग्जफोर्ड यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. खुदीराम बोस यांना फाशी, प्रफुल्ल चाकी यांनी आत्महत्या केली.

  ➡️ १९०८ — अलिपूर बॉम्ब कट प्रकरण : अरविंद घोष, बारिंद्र घोष व इतरांवर खटला.

  ➡️ १९०८ — बऱ्हा डकैती : ढाका अनुशीलनने सरकारी खजिना लुटण्याचा प्रयत्न.

  ➡️ १९१२ — दिल्ली कट : रासबिहारी बोस व सचिन सन्याल यांनी व्हाईसरॉय हार्डिंग यांच्या मिरवणुकीवर बॉम्ब फेकला.

  ➡️ पहिले महायुद्ध (१९१४–१९१८) : जतीन दास व युगांतर गट जर्मन कटात सामील — जर्मनीच्या मदतीने सशस्त्र क्रांतीचा प्रयत्न (अयशस्वी).


2.🦁 महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळ

➤ आद्य क्रांतिकारक

  ➡️ १८७९ — वासुदेव बळवंत फडके यांनी रामोशी शेतकरी व गरीब लोकांना एकत्र करून ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र बंड पुकारले. (भारताचा आद्य सशस्त्र क्रांतिकारी उठाव).

➤ जनजागृती

  ➡️ १८९० चे दशक — लोकमान्य टिळक यांनी शिवाजी व गणपती उत्सवांद्वारे तरुणांमध्ये जहाल विचार व देशभक्ती निर्माण केली.

  ➡️ केसरी व मराठा या नियतकालिकांद्वारे ब्रिटिशविरोधी विचारांचा प्रसार.

➤ चाफेकर बंधू

  ➡️ १८९७ — प्लेग कमिशनर रँड व ले. आयर्स्ट यांची पुण्यात चाफेकर बंधूंनी (दामोदर, बाळकृष्ण, वासुदेव) हत्या केली. (भारताच्या राजकीय हत्येचे पहिले मोठे क्रांतिकारी कृत्य).

➤ सावरकर आणि अभिनव भारत

  ➡️ १८९९ — विनायक व गणेश सावरकर यांनी मित्र मेळा या गुप्त संस्थेची स्थापना.

  ➡️ १९०४ — मित्र मेळा → अभिनव भारत संघटनेत रूपांतर.

  ➡️ १९०९ — नाशिक कट खटला : अनंत कान्हेरे यांनी जिल्हाधिकारी जॅक्सन यांची हत्या केली.


3.⚔️ पंजाबमधील क्रांतिकारी चळवळ

➤ नेतृत्व आणि प्रचार

  ➡️ लाला लजपत राय, सरदार अजित सिंग, आगा हैदर सय्यद हैदर रझा, भाई परमानंद, लालाचंद ‘फलक’, सुफी अंबाप्रसाद इ. नेत्यांनी ब्रिटिशांविरुद्ध चळवळ चालवली.

  ➡️ सरदार अजित सिंग यांनी भारत माता सोसायटी ची स्थापना केली.

  ➡️ लाला लजपत राय यांचे पंजाबी व अजित सिंग यांचे भारत माता वृत्तपत्रे क्रांतिकारक विचारांचे प्रसारक.

➤ महत्त्वाची घटना

  ➡️ गदर चळवळ (१९१३) : लाला हरदयाल यांनी अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे स्थापना केली. उद्देश — ब्रिटिश राजवट उलथविण्यासाठी जगभरातील भारतीयांना एकत्र आणणे.

  ➡️ पहिल्या महायुद्धादरम्यान पंजाबातील क्रांतिकारकांचा क्रांतीचा प्रयत्न.

  ➡️ रासबिहारी बोस यांनी उत्तर भारतातील अनेक क्रांतिकारी कारवायांत पडद्यामागून नेतृत्व केले.

नागरी (Urban) क्षेत्र – 2011 जनगणना आधारित माहिती


1️⃣ नागरी क्षेत्राची व्याख्या (Census Definition)

➤ जनगणनेनुसार दोन प्रकारची शहरे नागरी क्षेत्रात समाविष्ट केली जातात:

 अ) वैधानिक शहरे (Statutory Towns)

  ⮞ जिथे महानगरपालिका, नगरपालिका, कटक मंडळे अस्तित्वात आहेत.

  ⮞ किंवा जी शहरे शहर क्षेत्र समितीने सूचीकृत केली आहेत.

 ब) जनगणना शहरे (Census Towns)

  ⮞ लोकसंख्या किमान 5000 असणे आवश्यक.

  ⮞ पुरुषांपैकी किमान 75% कामगार गैरकृषी व्यवसायात असावेत.

  ⮞ लोकसंख्या घनता (density) प्रती चौ.कि.मी. 400 पेक्षा जास्त असावी.


2️⃣ भारताची नागरी लोकसंख्या (2011)

➤ नागरी लोकसंख्या = 37,71,06,125

➤ भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 31.14% ही नागरी आहे.


3️⃣ वर्ग-1 शहरे (Class I Towns)

➤ परिभाषा : ज्या शहरी भागाची लोकसंख्या 1 लाखापेक्षा जास्त आहे.

 ◉ 2001 मध्ये – वर्ग-1 शहरे = 394

 ◉ 2011 मध्ये – वर्ग-1 शहरे = 468


4️⃣ दशलक्षी शहरे (Million Plus Cities)

➤ परिभाषा : लोकसंख्या 10 लाखांपेक्षा जास्त

 ◉ 2001 मध्ये – अशी शहरे = 35

 ◉ 2011 मध्ये – अशी शहरे = 53 (468 वर्ग-1 शहरांपैकी)


📝 टीप: दशलक्षी शहरे म्हणजे मेगा सिटीज नव्हेत. मेगा सिटीज = 1 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या (उदा. मुंबई, दिल्ली, कोलकाता).

स्वातंत्र्य चळवळीचे महत्त्वाचे टप्पे (1929–1932)



🔹 लाहोर काँग्रेस अधिवेशन (डिसेंबर 1929)

  ➤ काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्य हे आपले ध्येय म्हणून स्वीकारले.

  ➤ सविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतला.

  ➤ 26 जानेवारी 1930 हा दिवस पहिला स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय.


🔹 दांडी मार्च (12 मार्च–6 एप्रिल 1930)

  ➤ गांधीजींच्या नेतृत्वाखाली मिठाच्या सत्याग्रहाचा प्रसार तमिळनाडू, मलबार, आंध्र, आसाम, बंगालपर्यंत.


🔹 अतिरिक्त विरोध मार्गांसह चळवळीचा प्रसार

  ➤ वायव्य सरहद्द प्रांतात खुदाई खिदमतगार सक्रिय.

  ➤ शोलापूरमध्ये विणकर कामगार सक्रिय.

  ➤ धारसाना येथे मिठाचा सत्याग्रह.

  ➤ बिहारमध्ये चौकीदारी कर नाही मोहीम.

  ➤ बंगालमध्ये चौकीदारी विरोधी आणि युनियन-बोर्ड विरोधी कर मोहीम.

  ➤ गुजरातमध्ये कर नाही मोहीम.

  ➤ महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रांतात वनांचे कायदेभंग.

  ➤ आसाममध्ये 'कनिंघम परिपत्रका' विरोधात आंदोलन.

  ➤ उत्तर प्रदेशात शेतसारा नाही मोहीम.

  ➤ महिला, विद्यार्थी, मुस्लिम गट, व्यापारी, लहान व्यापारी, आदिवासी, कामगार आणि शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग.


🔹 गांधी–आयर्विन करार (मार्च 1931)

  ➤ काँग्रेसने दुसऱ्या गोलमेज परिषदेत उपस्थित राहण्यास आणि सविनय कायदेभंग मागे घेण्यास सहमती दर्शविली.


🔹 कराची काँग्रेस अधिवेशन (मार्च 1931)

  ➤ गांधी–आयर्विन दिल्ली कराराला मान्यता दिली.

  ➤ आर्थिक कार्यक्रम आणि मूलभूत अधिकारांवर ठराव मंजूर.


🔹 गोलमेज परिषद (The Round Table Conference)

  ➤ ब्रिटनमधील दुसऱ्या गोलमेज परिषदेत अल्पसंख्याकांसाठी सुरक्षिततेसाठी मतभेद झाले.

  ➤ डिसेंबर 1931–एप्रिल 1934: सविनय कायदेभंग चळवळीचा दुसरा टप्पा.


🔹 जातीय निवाडा (Communal Award, 1932) आणि पुणे करार (Poona Pact)

  ➤ दलित वर्गाला स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले.

  ➤ राष्ट्रीय एकात्मतेसाठी धोका असल्याची राष्ट्रवाद्यांची भावना.

  ➤ गांधींनी आमरण उपोषण सुरू केले → पुणे करार.

  ➤ पुणे करारामुळे दलित वर्गासाठी स्वतंत्र मतदारसंघ रद्द; जागा वाढवून आरक्षित ठेवण्यात आल्या.


🔹 पुणे कराराचा दलित वर्गावरील परिणाम

  ➤ संयुक्त मतदारसंघ व दलित वर्गावरील परिणाम.

  ➤ गांधी व आंबेडकर यांच्या विचारांतील फरक व साम्य.

समुद्रतळ प्रसार सिद्धांत (Sea Floor Spreading Theory) : हेरी हेस🔸️



समुद्रतळाच्या अभ्यासातून पुढील काही बाबी उघडकीस आल्या :

🔹 समुद्रतळाच्या मध्यभागी Mid Oceanic Ridge जवळ सतत ज्वालामुखिचा उद्रेक होत असतो. त्यामुळे त्या भागात खूप मोठ्या प्रमाणात लाव्हा बाहेर फेकला जातो.


🔹 या मध्य महासागरी कटकाचे (Mid Oceanic Ridge) च्या दोन्ही बाजूस समान अंतरावर असलेल्या खडकांचे वय, रासायनिक घटक व चुंबकीय गुणधर्म सारखे असते. या भागापासून जसे जसे दूर जावे तसतसे खडकांचे वय वाढत जाते.


🔹 समुद्रतळावरील खडक हे खंडाच्या खडकांपेक्षा खूप कमी वयाचे आहेत.


🔹 समुद्रतळावर जमा झालेल्या गाळाची जाडी फार कमी आहे. शास्त्रज्ञांना असे अपेक्षित होते की जर समुद्र खंडाएवढे वयाचे असतील तर गाळाचे वय सुद्धा सारखेच असावे. परंतु कोणत्याच ठिकाणी समुद्रतळातील गाळाचे वय 200 दशलक्ष वर्षांपेक्षा अधिक नाही.


🔹 खोल गर्ता (Deep Trenches) मध्ये भूकंप नाभी (Earthquake focus) हे खोल असतात. तर मध्यसागरी कटकात (Mid Oceanic Ridge) भूकंपनाभी उथळ (Shallow) आहे.


👉 या पुराव्यांचा अभ्यास करून शास्त्रज्ञ हेरी हेस यांनी 1961 मध्ये समुद्रतळ प्रसार (Sea Floor Spreading) सिद्धांत मांडले. त्यांनी सांगितले की Mid Oceanic Ridge जवळ सातत्याने ज्वालामुखी उद्रेक होऊन नवीन लाव्हारस बाहेर पडतो व समुद्रतळ तुटून एकमेकापासून दूर जाऊ लागतात. त्यामुळे समुद्रतळाचा प्रसार होतो.


परंतु यामुळे एका समुद्राचा आकार वाढून दुसऱ्या समुद्राचा आकार कमी होत नाही, तर जो समुद्रतळ ज्वालामुखिमुळे दूर ढकलला जातो, तो भाग समुद्री गर्ते मध्ये बुडून नाहीसा होतो.

मानवी भूगोलासंबंधी महत्त्वाचे ग्रंथ व लेखक



① बर्नहार्डस वारेनियस (जर्मन)

➤ ग्रंथ: जिओग्राफिया जनरलीस


② चार्ल्स डार्विन (इंग्रजी)

➤ ग्रंथ: ओरिजिन ऑफ स्पेसीस (1859)

➤ सिद्धांत: थिअरी ऑफ इव्होल्यूशन


③ हेन्री थॉमस बकल (इंग्रजी इतिहासकार)

➤ ग्रंथ: हिस्ट्री ऑफ सिव्हिलायझेशन इन इंग्लंड


④ कार्ल रिटर

➤ ग्रंथ: युरोपा (1863)


⑤ 'अर्डकुंड' (Erdkunde)

➤ लेखक: कार्ल रिटर

➤ अर्थ: भूगोल

➤ वैशिष्ट्य: २०,००० पानांचा व १९ खंडांचा ग्रंथ

➤ प्रकाशन: 1817 मध्ये लिहिण्यात आला


⑥ कॉसमॉस (Kosmos)

➤ लेखक: अलेक्झांडर हम्बोल्ट

➤ पद: बर्लिन विद्यापीठातील भूगोलाचे प्राध्यापक

➤ वैशिष्ट्य: लेक्चर्सचा संग्रह

➤ मान्यता: 'भूगोलाचा पहिला संदर्भग्रंथ'


⑦ ॲन्थ्रोपोजिओग्राफी (Anthropogeographie)

➤ लेखक: फ्रेडरिक रॅट्झेल

➤ वैशिष्ट्य: मानव भूगोलविषयक मूलभूत ग्रंथ


⑧ जिओग्राफिया ह्युमेना (Géographie Humaine)

➤ लेखक: जीन ब्रुन्स (Jean Brunhes)

➤ वैशिष्ट्य: फ्रेंच भाषेतील मानवी भूगोलावर आधारित प्रसिद्ध ग्रंथ

महत्वाचे कंप (Sound & Vibration – Key Points) 🎵


🔹️ ध्वनीची निर्मिती वस्तूच्या कंपनामुळे होते. प्रत्येक ध्वनीचे मूळ कुठल्या तरी कंप पावणाऱ्या वस्तूमध्ये असते.


🔹️ ध्वनीचे प्रसारण अनुतरंगाच्या रूपात (Longitudinal Waves) होते.


🔹️ ध्वनीच्या प्रसारणासाठी स्थायू, द्रव किंवा वायू माध्यमाची आवश्यकता असते.


🔹️ ध्वनीचा वेग स्थायू माध्यमात द्रव व वायू माध्यमापेक्षा जास्त असतो.


🔹️ जर १/१० सेकंदाच्या आत दोन ध्वनी आपल्या कानावर पडले, तर त्यांचे स्वतंत्र ज्ञान होत नाही.


🔹️ ध्वनीच्या हवेतील वेगावर तापमान, आर्द्रता व वारा परिणाम करतात.


🔹️ हवेचे तापमान १°C ने वाढविल्यास, ध्वनीचा वेग ०.६ m/s ने वाढतो.


🔹️ दमट हवेत ध्वनीचा वेग कोरड्या हवेपेक्षा जास्त असतो.


🔹️ ध्वनीचा परिणामी वेग = ध्वनीचा वेग + वाऱ्याच्या वेगाची सदिश बेरीज.


🔹️ चंद्रावर माध्यम नसल्यामुळे ध्वनी ऐकू येत नाही.


🔹️ ध्वनीचा वेग प्रकाशापेक्षा कमी असल्यामुळे वीज चमकल्यानंतर ढगांचा गडगडाट थोड्या वेळाने ऐकू येतो.


🔹️ प्रत्यक्ष ध्वनी ऐकल्यानंतर १/१० सेकंदाने प्रतिध्वनी आला, तरच तो स्वतंत्रपणे ऐकला जातो.


🔹️ प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी परावर्तक पृष्ठभागाचे अंतर ≥ 17 m असले पाहिजे.


🔹️ वटवाघूळ अंधारात उडण्यासाठी प्रतिध्वनी तत्वाचा उपयोग करते.


🔹️ SONAR (Sound Navigation and Ranging) तत्त्वाने पाण्याची खोली मोजता येते.


🔹️ ध्वनीचा द्रव माध्यमातील वेग > वायू माध्यमातील वेग.


🔹️ निर्वातात ध्वनीचे प्रसारण होत नाही.


🔹️ ०°C तापमानास, हवेतील ध्वनीचा वेग ३३२ m/s असतो.


🔹️ ध्वनीचे परावर्तन प्रकाशाप्रमाणे होते, पण त्यासाठी विस्तृत परावर्तक पृष्ठभाग आवश्यक असतो.


🔹️ ध्वनी एखाद्या पृष्ठभागावरून परावर्तित होऊन पुन्हा ऐकू येतो.

महत्वाचे समाजसुधारक व राष्ट्रीय चळवळीशी संबंधित प्रश्नोत्तरं

१) आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक — महात्मा ज्योतिराव फुले


२) इ.स. १९०२ मध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये मागासवर्गासाठी ५०% आरक्षणाचा निर्णय घेणारे संस्थानिक — राजर्षी शाहू महाराज (कोल्हापूर)


३) जे. एस. मिल व स्पेन्सर यांच्या विचारांनी प्रभावित समाजसुधारक — गोपाळ गणेश आगरकर


४) पुणे व नगर जिल्ह्यातील इ.स. 1875 मधील ‘दख्खन उठाव’ कोणाच्या विरोधात होता — सावकारांच्या विरोधात


५) असहकार ठराव कोणत्या अधिवेशनात मंजूर झाला — नागपूर अधिवेशन, इ.स. १९२०


६) ‘चले जाव’ ठराव कोणत्या दिवशी पारित झाला — ८ ऑगस्ट १९४२


७) गांधीजींचे आत्मचरित्र ‘माझे सत्याचे प्रयोग’ मूळतः कोणत्या भाषेत लिहिले आहे — गुजराती


८) ‘दीनबंधू’ वृत्तपत्र व बॉम्बे मिल असोसिएशनची स्थापना कोणी केली — नारायण मेघाजी लोखंडे


९) ‘हिंदू लेडी’ या नावाने लेखन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ती — डॉ. रखमाबाई राऊत


१०) सत्यशोधक समाजाची स्थापना — इ.स. १८७३, महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली

बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक (Multidimensional Poverty Index - MPI)

 

विकसन संस्था

➤ MPI हा ऑक्सफर्ड पोवर्टी अँड ह्यूमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह (OPHI) या संस्थेने विकसित केला.


प्रकाशन व मोजमाप

➤ 2010 पासून UNDP (United Nations Development Programme) ने OPHI च्या सहकार्याने MPI मोजणे व प्रकाशित करणे सुरू केले.


MPI मोजण्यामागील उद्देश

➤ दारिद्र्य केवळ उत्पन्नावर मोजले जाऊ नये, तर जीवनातील विविध मूलभूत पैलूंचा विचार केला जावा.

➤ शिक्षण, आरोग्य व जीवनमान या तीन प्रमुख परिमाणांवर आधारित मापन.


मुख्य परिमाणे (Dimensions)

✅️ शिक्षण (Education)

➤ कुटुंबातील प्रौढ शिक्षणाचा स्तर

➤ मुलांचे शालेय उपस्थितीचे प्रमाण

✅️ आरोग्य (Health)

➤ बालमृत्यू दर

➤ पोषण स्थिती

✅️ जीवनमान (Living Standards)

➤ स्वच्छ स्वयंपाक इंधनाची उपलब्धता

➤ स्वच्छ पाणी व स्वच्छतागृह

➤ वीजपुरवठा

➤ घरातील रहिवासी स्थिती

➤ मालमत्तेची उपलब्धता


मोजण्याची पद्धत

➤ एखाद्या व्यक्ती/कुटुंबाला बहुआयामी गरीब मानले जाते, जर ते किमान 33% निर्देशकांमध्ये वंचित असतील.

महाधिवक्ता (कलम १६५) 🧑‍⚖️( ALL PYQ POINTS)

🔹️ राज्यपालांनी त्यांना संदर्भात केलेल्या अशा कायदेशीर बाबींवर ते राज्य सरकारला सल्ला देतात.

🔹️ राज्यपालांनी नेमून दिलेली कायदेशीर वैशिष्ट्ये असलेली इतर कर्तव्ये ते पार पाडतात.

🔹️ संविधान किंवा इतर कोणत्याही कायद्याने दिलेले कार्य ते पार पाडतात.

🔹️ राज्य शासनाला कायदेविषयक सल्ला देतात.

🔹️ राज्य विधिमंडळाच्या कामकाजात भाग घेतात.

🔹️ उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश नियुक्तीसाठी आवश्यक ती अर्हता त्यांच्याकडे असते.

🔹️ उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांप्रमाणे त्यांची नियुक्ती केली जाऊ शकते.

🔹️ ते राज्याचे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात.

🔹️ राज्याच्या महाधिवक्ताची नियुक्ती राज्यपालांकडून केली जाते.

🔹️ ते आपल्या पदाचा राजीनामा संबंधित राज्याच्या राज्यपालांकडे सादर करतात.

🔹️ त्यांना विधिमंडळ सदस्यांप्रमाणे विशेषाधिकार व संरक्षण मिळते.

🔹️ ते राज्य सरकारचे पूर्ण वेळ वकील नसतात.

🔹️ कार्यालयाबाबत राज्यघटनेत कोणतेही स्पष्ट तरतूद नाही.

🔹️ ते राज्याचे प्रथम कायदा अधिकारी (First Law Officer) असतात.

🔹️ ते राज्य शासनाचे सर्वोच्च कायदेविषयक सल्लागार असतात.

🔹️ जर दुसरा पक्ष राज्य नसेल तर त्यांना खाजगी वकिली करण्याचा अधिकार असतो.


🔸️ नियुक्ती व पात्रता 📝

🔹️ नियुक्ती राज्यपालांकडून केली जाते.

🔹️ उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी जी अर्हता आवश्यक असते ती त्यांच्याकडे असणे बंधनकारक आहे.

🔹️ त्यांनी न्यायिक पदावर किमान १० वर्षे काम केलेले असावे.

🔹️ उच्च न्यायालयात किमान १० वर्षे वकिली केलेली असावी.


🔸️ संविधानातील संबंधित अनुच्छेद 📜

🔹️ अनुच्छेद १६५ ➤ राज्याच्या महाधिवक्त्यांचे अधिकार, विशेषाधिकार व कायदेशीर संरक्षण यासंदर्भात आहे.

🔹️ अनुच्छेद १७७ ➤ राज्य विधिमंडळाची सभागृहे व समित्या यामधील महाधिवक्त्यांच्या अधिकारांशी संबंधित आहे.

प्रश्न इतिहास - सिंधू संस्कृती

 १) 1921 साली सिंधू संस्कृतीचे पहिले स्थळ ‘हडप्पा’ कोणी शोधले, ज्यामुळे या संस्कृतीला ‘हडप्पा संस्कृती’ असे नाव दिले गेले?

➡️ दयाराम साहनी


 २) मोहेन्जोदारो हे सिंधू संस्कृतीचे आणखी एक महत्त्वाचे स्थळ आहे. ‘मोहेन्जोदारो’ या शब्दाचा अर्थ काय?

➡️ मृतांचे टेकाड (Mound of the dead)


 ३) मोहेन्जोदारो येथे उत्खननाचे कार्य 1922 साली राखलदास बॅनर्जी यांच्या देखरेखीखाली सुरू झाले. हे ठिकाण सध्या कुठे आहे?

➡️ लरकाना जिल्हा, सिंध प्रांत, पाकिस्तान


 ४) 1924 साली भारतीय पुरातत्त्व विभागाचे महासंचालक यांनी अधिकृतपणे सिंधू संस्कृती (कांस्ययुगीन संस्कृती) शोधल्याची घोषणा केली. त्या वेळी महासंचालक कोण होते?

➡️ सर जॉन मार्शल


 ५) हडप्पा संस्कृतीच्या कोणत्या स्थळी जे. एफ. मॅके यांनी 1927 ते 1931 या काळात आणि जी. ए. एफ. डेल्स यांनी 1963 साली उत्खननाचे कार्य केले?

➡️ मोहेन्जोदारो


 ६) आतापर्यंत सिंधू संस्कृतीची सुमारे 1500 स्थळे सापडली आहेत. यापैकी फक्त सातच स्थळे शहरे मानली गेली आहेत. ती सात शहरे कोणती?

➡️ हडप्पा, मोहेन्जोदारो, चन्हूदरो, लोथल, कालीबंगन, सुत्कागेंडोर आणि सुरकोटडा


 ७) मोहेन्जोदारोला “मृतांचे टेकाड” म्हटले जाते. राजस्थानातील कोणते स्थळाचा अर्थ “काळ्या बांगड्या” असा आहे?

➡️ कालीबंगन


 ८) सिंधू संस्कृतीच्या विस्तारामुळे हडप्पा आणि मोहेन्जोदारोला “विशाल साम्राज्याची जुळे राजधानी” असे कोणी संबोधले आहे?

➡️ स्टुअर्ट पिगॉट


 ९) मोहेन्जोदारोचे लोक कोणत्या वंशाशी संबंधित मानले जातात?

➡️ भूमध्यसागरीय वंश (Mediterranean race)


 १०) पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील मॉन्टगोमेरी जिल्ह्यातील हडप्पा हे कोणत्या नदीच्या डाव्या तीरावर वसले आहे?

➡️ रावी नदी


 ११) 1826 साली चार्ल्स मेसन यांनी हडप्पा टेकडीविषयी प्रथम माहिती दिली. तिच्या पूर्वेकडील टेकडीला “City Mound” म्हणतात. पश्चिमेकडील टेकडीला काय म्हणतात?

➡️ किल्ला टेकाड (Fort Mound)


 १२) हडप्पामध्ये सर्वसाधारण वस्तीच्या दक्षिणेकडे ‘Cemetery R-37’ नावाचा स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीत सापडलेला शवपेटी कोणत्या लाकडाची होती?

➡️ देवदार (Cedar)


 १३) हडप्पामध्ये धान्यागार किल्ल्याबाहेर सापडले आहे, तर मोहेन्जोदारोमध्ये ते किल्ल्याच्या आत आहे. कोणत्या स्थळावर दोन रांगांमध्ये सहा अशा 12 कक्षांचे धान्यागार सापडले?

➡️ हडप्पा


 १४) सिंधू संस्कृतीतील लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता होता?

➡️ शेती


 १५) सिंधू संस्कृतीतील लोक कोणत्या पिकाच्या उत्पादनात निपुण होते?

➡️ कापूस


 १६) सिंधू संस्कृतीतील लोक कोणत्या प्रकारची लिपी वापरत होते?

➡️ चित्रलिपी (Pictograph)


 १७) सिंधू लिपीचे वाचन (deciphering) करण्याचा प्रयत्न कोणी केला?

➡️ डॉ. अस्को पर्पोला, एस. आर. राव, आय. महादेवन इत्यादी


 १८) हडप्पा संस्कृतीत कोणत्या प्रकारचे शासन होते?

➡️ धार्मिक शासन (Theocracy government)


 १९) हडप्पा संस्कृतीतील साधने आणि शस्त्रे मुख्यतः कोणत्या धातूंनी बनवलेली होती?

➡️ तांबे, कथील (टिन) आणि कांस्य (ब्रॉन्झ)

१९ ऑक्टोबर २०२५

चालू घडामोडी :- 18 ऑक्टोबर 2025


◆ भारताचा आक्रमक सलामीवीर अभिषेक शर्मा याची सप्टेंबर महिन्यासाठी 'ICC प्लेयर ऑफ द मंथ' म्हणून निवड करण्यात आली आहे.

◆ सप्टेंबर 2025 साठी ICC महिला प्लेअर ऑफ द मंथ हा पुरस्कार स्मृती मानधनाला मिळाला आहे.

◆ भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील 5वा 'समुद्र शक्ती 2025' नौदल सराव 14 ते 17 ऑक्टोबर 2025 या काळात विशाखापट्टणम येथे पार पडला.

◆ ए.आर. रहमान यांनी Google Cloud च्या सहकार्याने "Secret Mountain" - जगातील पहिला AI-आधारित Metahuman band लाँच केला.

◆ कर्नल मायकेल रँड्रियनरिना यांना मादागास्करचे संक्रमणकालीन अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

◆ भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) योजनेनुसार, 'गगनयान'चे पहिले मानवी उड्डाण 2024 मध्ये होणार आहे.

◆ खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सची पाचवी आवृत्ती राजस्थान राज्यात होणार आहे. 

◆ 30 व्या वरिष्ठ महिला राष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत मणिपूरने विजेतेपद पटकावले आणि पश्चिम बंगालला अंतिम सामन्यात हरवले. 

◆ कोचीचे पॅरा-ॲथलीट जोबी मॅथ्यू (भारत) यांनी कैरो येथे वर्ल्ड पॅरा पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले.

◆ भारतीय वन्यजीव संरक्षण तज्ञ विवेक मेनन यांची आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ (IUCN) च्या प्रजाती जगण्याच्या आयोगाचे (SSC) अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.

◆ जसप्रीत बुमराह हा क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये (टेस्ट, वनडे आणि टी20) किमान 50 सामने खेळणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज बनला आहे.

◆ जागतिक अमूर्त सांस्कृतिक वारसा दिन (IDICH) दरवर्षी 17 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो.

◆ जागतिक अमूर्त सांस्कृतिक वारसा दिन 2025 ची थीम "आपत्ती आणि संघर्षांमुळे धोक्यात असलेला वारसा: तयारी आणि शिक्षण" ही आहे.

१८ ऑक्टोबर २०२५

चालू घडामोडी :- 17 ऑक्टोबर 2025



◆ वर्ल्ड डायरेक्टरी ऑफ मॉडर्न मिलिटरी एअरक्राफ्ट (WDMMA) नुसार, भारतीय हवाई दल चीनला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात शक्तिशाली हवाई दल बनले आहे. 

◆ हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री मधुमती ऊर्फ हुतोक्सी रिपोर्टर यांचे (वय 87) निधन झाले.

◆ गोंदिया जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री म्हणून इंद्रनील नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड (HSL) ला 14 ऑक्टोबर 2025 रोजी भारत सरकारने 'मिनी रत्न' दर्जा दिला आहे.

◆ भारताची संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर (UNHRC) 2026-2028 या तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी बिनविरोध निवड झाली आहे.

◆ भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातील नौदल द्विपक्षीय सराव (IN-RoKN) ची पहिली आवृत्ती दक्षिण कोरियातील बुसान नौदल तळावर आयोजित करण्यात आली होती.

◆ जागतिक आरोग्य संघटनेची 16वी वार्षिक बैठक - हर्बल मेडिसिनसाठी आंतरराष्ट्रीय नियामक सहकार्य (WHO-IRCH) ही इंडोनेशियातील जकार्ता येथे आयोजित करण्यात आली होती.

◆ पंतप्रधान विकास योजनेंतर्गत (PMJDV), अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने वारसा आणि अभिजात भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध विद्यापीठांमध्ये उत्कृष्टतेची केंद्रे स्थापन केली आहेत.

◆ भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) भूतान, नेपाळ आणि श्रीलंका या देशांमधील व्यक्ती आणि बँकांना भारतीय रुपयांमध्ये कर्ज देण्यास परवानगी दिली आहे.

◆ उत्तर प्रदेश सरकारने प्रत्येक विभागीय मुख्यालयात दिव्यांग पुनर्वसन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

◆ मेघालय सरकारने शिलाँगला 'भारताची फुटबॉल राजधानी' म्हणून स्थापित करण्यासाठी नॉर्थईस्ट युनायटेड एफसी (NEUFC) या फुटबॉल क्लबसोबत तीन वर्षांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे.

◆ जागतिक भूक निर्देशांक 2025 मध्ये भारत 123 देशांपैकी 102 व्या क्रमांकावर आहे.

◆ दरवर्षी आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मूलन दिन 17 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो.

१७ ऑक्टोबर २०२५

TCS_IBPS वर आधारित प्रश्नसंच


1) महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडणारा जिल्हा?
उत्तर-  सोलापूर

2) महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता?
उत्तर- अहमदनगर

3) जागतिक योग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर- 21 जून

4) पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले?
उत्तर- 1761

5) कोणत्या तारखेस घटना समितीने राष्ट्रीय ध्वज स्विकृत केला?
उत्तर- 22 जुलै 1947

6) वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध कोणी लावला?
उत्तर-जेम्स वॅट

7) भारतीय पोलीस प्रशिक्षण अकादमी कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- तेलंगणा

8) अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर-औरंगाबाद

9) अहिराणी भाषेतील जगप्रसिद्ध कवयित्रि कोण आहेत?
उत्तर- बहिणाबाई चौधरी

10) डेसीबल या एककाने  काय  मोजतात ?
उत्तर- ध्वनीची तीव्रता

11) लोणार हे उल्काजन्य सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर- बुलढाणा

12) तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे हा रोग होतो?
उत्तर- कर्करोग

13) डोळ्याच्या आरोग्यासाठी हे जीवनसत्व महत्त्वाचे आहे?
उत्तर- ए

14) महाराष्ट्रातला पहिला सोने शुद्धीकरण कारखाना या ठिकाणी आहे?
उत्तर- शिरपूर

15,) उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणते?
उत्तर- तोरणमाळ

16) सर्वाधिक शहरी लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- महाराष्ट्र

17) जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर- 8 मार्च

18) डायलीसिस उपचार कोणत्या आजारात करतात?
उत्तर- मूत्रपिंडाचे विकार

19) कोवळ्या सूर्यप्रकाशापासून कोणते जीवनसत्व मिळते?
उत्तर- ड

20) महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली आहे?
उत्तर-  भ्रंशमूलक उद्रेक

21) अर्ध मॅरेथॉन चे अंतर किती असते?
उत्तर- 21 कि.मी

22) भारताच्या राष्ट्रध्वजाची उंची आणि लांबी यांचे प्रमाण किती आहे?
उत्तर- 2:3

23) अन्नपदार्थाची ऊर्जा कोणत्या परिमाणात मोजली जाते?
उत्तर- कॅलरीज

24) इन्सुलिन हे प्राण्यांच्या कोणत्या अवयवामध्ये स्रवणारे संप्रेरक आहे?
उत्तर- स्वादुपिंड

25) हेलसिंकी हे शहर कोणत्या देशाची राजधानी आहे?
उत्तर- फिनलंड

26) करा किंवा मरा हा मंत्र भारतास कोणी दिला?
उत्तर- महात्मा गांधी

27) मध्य रेल्वेचे मुख्यालय  कोठे आहे?
उत्तर- मुंबई

28) भारताचे तिनही दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात?
उत्तर- राष्ट्रपती

29) सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली झालेले चिपको आंदोलन कोणत्या कारणासाठी लढले गेले?
उत्तर- वृक्षतोड विरोधी आंदोलन

30) अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक झाली होती?
उत्तर- डॉक्टर होमी जहांगीर भाभा

31) जयपूर फूट चे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते?
उत्तर- डॉक्टर प्रमोद सेठी

32) भारतातील सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती कोण असतात?
उत्तर- राष्ट्रपती

33) पायराईट हे कशासारखे दिसते म्हणून त्याला फूल्सगोल्ड म्हणून ओळखले जाते?
उत्तर- सोन्यासारखे

34) इन्डोसल्फान हे  कशाचे उदाहरण आहे?
उत्तर- कीडनाशक

35) रक्ताच्या कर्करोगासाठी कोणती संज्ञा लागू होते?
उत्तर-  ल्युकेमिया

36) महाराष्ट्रात पंचायत राज पद्धती स्विकारण्यासंबंधी नेमले गेलेली समिती कोणती आहे?
उत्तर- वसंतराव नाईक समिती

37) गावाच्या पिकाची स्थिती व शेती संबंधी अहवाल कोण तयार करतो?
उत्तर- तलाठी

38) पंचायतराज ही मूळ संकल्पना कोणाची आहे?
उत्तर-  महात्मा गांधी

39) परम-8000 हा महासंगणक कोणत्या शास्त्रज्ञाने तयार केला?
उत्तर- डॉक्टर विजय भटकर

40) भारतातील कोणत्या उद्योगाला सनराईजक्षेत्र म्हणून ओळखले जाते?
उत्तर- वाहन

41) वि.वा शिरवाडकरांचे टोपण नाव कोणते?
उत्तर- कुसुमाग्रज

42) संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर- न्यूयॉर्क

43) बुलढाणा जिल्ह्यात किती तालुके आहेत?
उत्तर- 13

44) माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर- रायगड

45) सिद्धटेक हे अष्टविनायक गणपती चे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर- अहमदनगर

46) केवलादेव राष्ट्रीय पक्षी उद्यान कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- राजस्थान

47) विशाळगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर- कोल्हापूर

48)  ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर- ऑस्ट्रेलिया

49) कोटोपेक्सी नामक सक्रिय ज्वालामुखी कोणत्या देशात आहे?
उत्तर- इक्वेडोर

50) अनातोलिया चे पठार कोणत्या देशात आहे?
उत्तर- तुर्कस्तान

51) झुलू जमात कोठे आढळते ?
उत्तर- दक्षिण आफ्रिका

52) सुएझ कालवा कोणत्या दोन महासागरांना जोडतो?
उत्तर- भूमध्य सागर व लाल सागर

53) कृष्णा नदीचे उगमस्थान कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- महाराष्ट्र

54) शिवसमुद्रम नदी खोरे विकास योजना कोणत्या नदीशी संबंधित आहे?
(मार्गदर्शक दशरथे सर): उत्तर- कावेरी

55) भारतीय रेल्वेचे दक्षिण-मध्ये झोनचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे?
उत्तर- सिकंदराबाद

56) बुडापेस्ट कोणत्या देशाची राजधानी आहे?
उत्तर- हंगेरी

57) अजिंठा -वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या वंशाच्या राज्यकर्त्यांच्या काळात निर्माण केले आहे?
उत्तर- राष्ट्रकूट

58) सन  1885 मधील राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
उत्तर- व्योमेशचंद्र बॅनर्जी

59) 1905 मध्ये लंडन येथे इंडिया होमरूल सोसायटीची स्थापना कोणी केली?
उत्तर- श्यामजी कृष्णा वर्मा

60) फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली?
उत्तर- सुभाषचंद्र बोस

61) मराठा आणि केसरी या वृत्तपत्राशी कोण संबंधित आहे?
उत्तर- लोकमान्य टिळक

62) कोणत्या कायद्यान्वये भारताचा राज्यकारभार ईस्ट इंडिया कंपनीकडून महाराणी (क्राऊन) कडे गेला?
उत्तर- भारत सरकार अधिनिय 1858

63) मोर्ले-मिंटो सुधारणा कोणत्या वर्षाच्या कायद्याशी संबंधित आहे?
उत्तर- 1909

64) पहिल्या गोलमेज परिषदेचे वेळी भारताचे व्हाईसरॉय कोण होते?
उत्तर- लॉर्ड आयर्विन

65) महात्मा गांधी यांची दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे?
उत्तर- सविनय कायदेभंग

66) poverty and Un-british Rule in india चे लेखक कोण आहेत?
उत्तर- दादाभाई नौरोजी

67) पुर्ण स्वराज्य दिवस सर्वप्रथम कोणत्या वेळी साजरा करण्यात आला?
उत्तर- 26 जानेवारी 1930

68) भारतीय घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?
उत्तर- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

69) राज्य पुर्नरचना आयोग 1953 चे अध्यक्ष कोण होते
उत्तर- फाजलअली

70) मूलभूत अधिकाराचा समावेश घटनेच्या कोणत्या भागात केला आहे?
उत्तर- 3

71) भारतीय राज्यघटनेचे कलम 25 कशाशी संबंधित आहे?
उत्तर- धर्मस्वातंत्र्याचे अधिकार

72) कोणत्या समितीच्या शिफारशीवरून भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला?
उत्तर- स्वर्णसिंह समिती

73) भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम राष्ट्रपतीचे अध्यादेशाशी संबंधित आहे? 
उत्तर- कलम 123

74) संसदेच्या लोकलेखा समिती मध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असतात?
उत्तर- 22

75) केंद्र व राज्य यांच्यातील संबंधाविषयी घटनेच्या कोणत्या प्रकरणात तरतूद आहे?
उत्तर- 11

76) जागतिक अपंग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर- 3 डिसेंबर

77) हंबनटोटा बंदर कोणत्या देशात आहे?
उत्तर- श्रीलंका

78) सुजय कशाशी संबंधित आहे?
उत्तर- ऑफशोअर पेट्रोलिंग  व्हेसल

79) बॉक्साईट या धातुकापासून कोणते खनिज निष्कर्षण केले जाते?
उत्तर- ॲल्युमिनियम

80) कोणती शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे व त्यातून पित्तरस स्त्रवतो?
उत्तर- यकृत

81) आवाजाची तीव्रता मोजण्याचे परिमाण कोणते आहे?
उत्तर- डेसिबल

82) बाल्कन प्रदेश हा कोणत्या देशाच्या साम्राज्यात मोडणारा प्रदेश होता?
उत्तर- तुर्कस्तान

83) भारताने कोणत्या साली आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले?
उत्तर- 1991

84) भारतात कोणत्या प्रकारची लोकशाही आहे?
उत्तर- अप्रत्यक्ष

85) पंचायत समितीचा कार्यकारी/प्रशासकीय अधिकारी कोण असतो?
उत्तर- गटविकास अधिकारी

86) क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठे राज्य कोणते?
उत्तर- राजस्थान

87) अष्टविनायकांपैकी किती गणेश मंदिरे ही पुणे जिल्ह्यात आहेत?
उत्तर- 5

88) अहमदनगर-कल्याण मार्गावर कोणता घाट आहे?
उत्तर- माळशेज

89) पुणे जिल्ह्यातील भाडघर धरण हे कोणत्या नदीवर बांधलेले आहे?
उत्तर- वेलवंडी

90) भारत सरकारने कोणत्या दिवशी चलनातून 500 व 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता?
उत्तर- 8 नोव्हेंबर 2016

91) कृषी क्षेत्रातील पीतक्रांती म्हणजे कोणत्या उत्पादनातील वाढ होय.
उत्तर- तेलबीया

92) निरा- नरसिहापुर हे तीर्थ क्षेत्र पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात येते?
उत्तर- इंदापुर

93) बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी कोणी 1916 रोजी डेक्कन रयत असोसिएशन ही संस्था स्थापन केली?
उत्तर- छत्रपती शाहू महाराज

94) पाचगणी हे शहर वसविण्यात कोणाचे योगदान आहे?
उत्तर- जॉन चेसन

95) महाबळेश्वर मधील पॉईंट मध्ये समुद्रसपाटीपासून सर्वात उंचावर कोणता पॉईंट आहे?
उत्तर- आर्थरसीट

96) साताऱ्याचे अजिंक्यतारा किल्ल्यास सर्वप्रथम मराठ्यांचा राजधानीचा मान कोणी दिला?
उत्तर- छत्रपती राजाराम राजे ‌

97) थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर हे मूळचे कोणत्या तालुक्यातील होते?
उत्तर- कराड

98) महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोठे आहे?
उत्तर- पुणे

99) कोणता दिवस पोलीस शहीद दिन म्हणून ओळखला जातो?
उत्तर- 21 ऑक्टोंबर

100) कोणत्या योजनेअंतर्गत लैंगिक अत्याचार झालेल्या महिलांना आर्थिक सहाय्य करता येते?
उत्तर- मनोधैर्य

101) 31 ऑक्टोंबर ते 6 नोव्हेंबर हा राष्ट्रीय एकता सप्ताह कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा होतो?
उत्तर- सरदार पटेल

102) पेशवेकाळात मामलेदाराच्या कचेरीत कोण अधिकारी असे?
उत्तर- मुजुमदार

103) कोणत्या वर्षी सातारा जिल्ह्याचे दक्षिण सातारा व उत्तर सातारा जिल्ह्या असे  दोन भाग पाडण्यात आले?
उत्तर- 1949

104) ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचे सातारा जिल्ह्यातील मुळगाव कोणते?
उत्तर- कण्हेरखेड

105) वाई शहराच्या जडणघडणीवर कोणत्या सरदार घराण्याचा प्रभाव आहे?
उत्तर- रास्ते

106) खाशाबा जाधव यांना कोणत्या ऑलंपिकमध्ये पहिले ब्राॅन्झ मिळाले?
उत्तर- हेलसिंकी

107) कोणत्या शाहिराने गर्जा महाराष्ट्र हे गीत लिहिले आहे?
उत्तर- कृष्णराव साबळे

108) सातारा जिल्ह्याच्या मुख्य पोलीस कार्यालयासाठी स्वातंत्र इमारत कोणत्या वर्षी बांधण्यात आली?
उत्तर- 1913

109) कोणता जिल्हा महाराष्ट्रात प्रथमच स्मार्ट पोलीस जिल्हा म्हणून जाहीर झाला?
उत्तर- सातारा

110) MACOCA मकोका हा कायदा कशाविरुद्ध वापरला जातो?
उत्तर- संघटित गुन्हेगारी

111) काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?
उत्तर- आसाम

112) स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना कोणी केली होती?
उत्तर- बाळ गंगाधर टिळक

113) रक्तदाब कोणत्या साधनाच्या सहाय्याने मोजला जातो?
उत्तर- स्पीग्मोमॅनोमीटर

114) प्रकाश संश्लेषण क्रियेच्या वेळी कोणता वायू उत्सर्जित केला जातो?
उत्तर- ऑक्सिजन

115) मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते आहे?
उत्तर- दर्पण

116) मीराबाई चाणु कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर- वेटलिफ्टिंग

117) नागालँड या राज्याची राजधानी कोणती आहे?
उत्तर- कोहिमा

118) दक्षिण पूर्व मध्य रेल्वे या रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे? 
उत्तर- बिलासपुर

119) माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला?
उत्तर- 2005

120) अजंठा ,वेरूळ या लेण्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत?
उत्तर- औरंगाबाद

121) धुपगड -पंचमढी ही शिखरे कोणत्या पर्वतरांगेमध्ये अस्तित्वात आहेत?
उत्तर- सातपुडा

122) वुलर हे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- जम्मू काश्मीर

123) संयुक्त राष्ट्र संघटनाचे (युनो) मुख्यालय कोठे आहे?
उत्तर- न्यूयॉर्क

124) ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे स्थापन झाली?
उत्तर- सुरत

125) चलो जाव चळवळ भारतामध्ये कोणत्या वर्षी झाली?
उत्तर- 1942

126) महाराष्ट्रात एकूण किती महसूल जिल्हे आहे?
: उत्तर- 36

127) दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
उत्तर- चित्रपट

128) आर्य समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर- स्वामी दयानंद सरस्वती

129) गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ कोणते आहे?
उत्तर- लुंबिनी

130) भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे?
उत्तर- आरबीआय

131) ललिता बाबर ही खेळाडू कोणत्या खेळा बद्दल प्रसिद्ध आहे?
उत्तर- स्टीपल चेस

132) शहराचा प्रथम नागरिक कोण असतो?
उत्तर- महापौर

133) विंग्स ऑफ फायर (अग्निपंख) हे आत्मचरित्र कोणाचे आहे?

उत्तर- डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम

134) मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे?
उत्तर- औरंगाबाद

135) महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये एकूण किती सदस्य आहेत?
उत्तर- 78

136) राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कोठे आहे?
उत्तर- पुणे

137) महाराष्ट्रात पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरू झाला?
उत्तर- प्रवरानगर

138) भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता?
उत्तर- मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार

139) कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत?
उत्तर- औरंगाबाद

140) मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- उत्तराखंड

141) साहित्यिक राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय?
उत्तर- गोविंदाग्रज

142) राज्यसभेचा सभापती कोण असतो?
उत्तर- उपराष्ट्रपती

143) घटक राज्याच्या सीमा बदलण्याचा अधिकार कोणाला आहे?
उत्तर- भारतीय संसद

144) डेक्कन सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर- महादेव गोविंद रानडे

145) खेडेगावात जन्म-मृत्यूची नोंद करण्याचे कार्य कोण करतो?
उत्तर- ग्रामसेवक

146) भारतामध्ये मतदानाचा हक्क वयाच्या कितव्या वर्षानंतर प्राप्त होतो?
उत्तर- 18

147) महाराष्ट्र राज्याच्या पोलिस प्रमुखांना काय म्हणतात?
उत्तर- पोलीस महासंचालक

148) मनाचे श्लोक कोणी लिहिले?
उत्तर- संत रामदास

149) महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर- पुणे

150) ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे?
उत्तर- साहित्य

151) महाराष्ट्राला किती कि‌‌.मी चा समुद्रकिनारा लाभला आहे?
उत्तर- 720 कि.मी

152) राष्ट्रपती पदाची निवडणूक लढविण्यास पात्र होण्यासाठी उमेदवाराचे किमान वय किती असणे आवश्यक आहे?
उत्तर- 35

153) महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो?
उत्तर- नाशिक

154) इस्राइल या देशाला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण?
उत्तर- नरेंद्र मोदी

155) व्हॅलेंन्टाईन डे कोणत्या दिवशी असतो?
उत्तर- 14 फेब्रुवारी

156) हत्तीरोग (हत्तीपाय रोग) कोणता डास चावल्याने होतो ?
उत्तर- क्युलेक्स

157) रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले असता कोणता रोग होतो?
उत्तर- ॲनिमिया (पंडुरोग)

158) चिकन गुणिया हा रोग कशापासून होतो?
उत्तर- विषाणू

159) मानवी आहारातील कोणत्या घटका पासून शरीरास ऊर्जा मिळते?
उत्तर- कार्बोहायड्रेट

160) ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो?
उत्तर- डोळे

161) गाजर या वनस्पतीत कोणते जीवनसत्व विपुल प्रमाणात आढळते?
उत्तर- अ

162) मूत्रपिंडाचे विकारावर कोणती उपचार पद्धती वापरली जाते?
उत्तर- डायलीसिस

163) मोसाद ही गुप्तहेर संस्था कोणत्या देशाची आहे?
उत्तर- इस्राईल

164) कोणत्या रासायनिक पदार्थाला आपण व्यावहारिक भाषेत त्रुटी असे म्हणतो?
उत्तर- पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट

165) कोणत्या इंग्लिश गव्हर्नर जनरल ने तैनाती पद्धत आमलात आणली?
उत्तर- लॉर्ड वेलस्ली

166) राज्यसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो?
उत्तर- कायमचे स्थायी सभागृह

167) कोसबाडच्या टेकडीवरून हे आत्मवृत्त कोणी लिहिलेले आहे?
उत्तर- अनुताई वाघ

168) भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो चे मुख्यालय कुठे आहे?
उत्तर- बंगरुळ

169) राष्ट्रीय महामार्ग 50 (NH -50 ) हा कोणत्या दोन शहरांना जोडतो?
उत्तर- पुणे-नाशिक

170) पेनल्टी कॉर्नर ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर- हाॅकी

171) जागतिक आरोग्य संघटना ( WHO ) चे मुख्यालय कोणत्या शहरात आहे?
उत्तर- जिनिव्हा

172) भारताने अवकाशात सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता?
उत्तर- आर्यभट्ट

173) सतीश कुमार शिवलिंगम हा भारतीय खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर- वेटलिफ्टिंग

174) फेसबुकचा संस्थापक कोण आहे?
उत्तर- मार्क झुकेरबर्ग

175) आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कुठे आहे?
उत्तर- हेग

176) मालगुडी डेज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर- आर. के. नारायण

177) मुऱ्हा ही कोणत्या जनावराची जात आहे?
उत्तर- म्हैस

178) पेनिसीलीन या प्रतिजैविकाचा शोध कोणी लावला?
उत्तर- अलेक्झांडर फ्लेमिंग

179) संतोष करंडक ही क्रीडा स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर- फुटबॉल

180) चौसा ही जात कोणत्या पिकाशी संबंधित आहे?
उत्तर- आंबा

181) भारत व चीन यांच्या दरम्यान च्या सीमारेषेला कोणती लाईन म्हणतात?
उत्तर- मॅकमोहन लाईन

182) ईराण या देशाची राजधानी कोणती आहे?
उत्तर- तेहरान

183) भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली?
उत्तर- 1 एप्रिल 1935

184) नदीवरील जगातील सर्वात मोठे बेट मांजुली हे कोणत्या नदीवर व कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- ब्रह्मपुत्रा नदी आसाम राज्य

185) नागार्जुन सागर हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे?
उत्तर- कृष्णा

186) लंडन हे शहर कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे?
उत्तर- थेम्स

187) मानवी शरीरामध्ये हाडांशी हाडे जोडणारी उती म्हणजे काय?
उत्तर- अस्तीबंध

188) बर्फी चित्रपटाचे दिग्दर्शक कोण?
उत्तर- अनुराग बासु

189) रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती?
उत्तर- हिल्टन यंग कमीशन

190) ॲनाॅलाॅगचे चे डिजिटल व डिजिटलचे ॲनाॅलाॅग  कोणती प्रणाली करते?
उत्तर- मोडेम

191) तारपा हे वाद्य कशापासून बनविले जाते?
उत्तर- वाळलेला भोपळा

192) पालघर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी परदेशी मालाची होळी करण्यात आली?
उत्तर- सातपाटी

193) दाभोळ धबधबा पालघर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?
उत्तर- जव्हार

194) यंग बंगाल या चळवळीस खालीलपैकी कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती?
उत्तर- सर हेन्री व्हीवियन

195) पालघर जिल्ह्यात रिलायन्स औष्णिक प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे?
उत्तर- डहाणू

196) पालघर जिल्हा महाराष्ट्रातील कितवा जिल्हा आहे?
उत्तर- 36 वा

197) पालघर जिल्ह्यास कोणत्या जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत?
उत्तर- ठाणे, नाशिक

198) पोलीस विभागात परिक्षेत्राचे प्रमुखास काय म्हणतात?
उत्तर- पोलीस उपमहानिरीक्षक

199) महाराष्ट्रात जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस उपविभागाचे प्रमुखास काय म्हणतात?
उत्तर- उपविभागीय पोलिस अधिकारी

200) बनगरवाडी या कादंबरीचे लेखक कोण?
उत्तर- व्यंकटेश माडगूळकर

201) संत तुकाराम महाराजांचे संपूर्ण नाव काय होते?
उत्तर- तुकाराम बोल्होबा आंबिले (मोरे)

202) सातवाहन घराण्याचा संस्थापक कोण?
उत्तर- सिमुक

203) चतुर्वर्ग चिंतामणी हा ग्रंथ कोणी लिहिला?
उत्तर- हेमाद्री

204) प्रभाकर हे साप्ताहिक कोणी सुरू केले?
उत्तर- भाऊ महाजन

205) कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला?
- प्लासी

महाराष्ट्रातील वनांचे प्रकार

 

📌उष्ण कटिबंधीय सदाहरित अरण्ये:-


-250 ते 300 सें.मी. पेक्षा जास्त पावसाच्या प्रदेशात ही अरण्ये प्रामुख्याने आढळतात.

-सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर, पश्चिम उतारावर आणि विशेषत: दक्षिण कोकणात अशाप्रकारची जंगले आढळतात. 

-रानआंबा ,जांभूळ हे मोठे वृक्ष, रानकेळी, कारवी, नेचे इत्यादी झुडपे आणि वेत यांची ही बरीच गर्दी या जंगलांमध्ये आढळते. 

-या जंगलातील लाकूड कठीण असल्याने आथिर्कदृष्टया तितकेसे महत्त्व नाही.



📌उष्ण कटिबंधीय अर्धसदाहरित अरण्ये:-


-150 ते 200 सें.मी. पाउस असलेल्या प्रदेशात या प्रकारची जंगले आढळतात. -उष्णकटिबंधीयसदाहरित अरण्ये व पानझडी वृक्षांची अरण्ये यांमधील जोडभागात ही अरण्येआहेत. 

-ही तुटक स्वरूपात सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर पायथ्याकडील भागात व खंडाळयासारख्या ठिकाणी घाटमाथ्याकडील भागात आढळतात.

-या प्रकारच्या अरण्यात सदाहरित व पानझडी या दोन्ही प्रकारचे वृक्ष आढळतात. 

-किंडाळ, शेवरी, आइन, हेदू, कदंब व काही प्रमाणावर बांबू या जंगलामध्ये प्रामुख्याने आहेत. यातील काही जाती आथिर्कदृष्टया महत्त्वाच्या आहेत.



📌पानझडी वृक्षांची अरण्य:-


-पश्चिम घाटाच्या पूर्वेस 100 ते 150 सें.मी. पावसाच्या प्रदेशात ही जंगले आढळतात. 

-कोरडया हवेच्या काळात बाष्पाचे प्रमाण टिकविण्यासाठी या प्रकारची झाडे आपली पाने गाळतात. 

-या प्रकारच्या अरण्यांचे पावसाच्या प्रमाणानुसार आर्द्रपानझडी अरण्ये व शुष्क व पानझडी अरण्ये असे दोन प्रकार पडतात. 

-गोंदिया, चंद्रपूर व भंडाराजिल्हे, सह्याद्री पूर्व उतार, महादेव,हरिश्चंद्र व सातमाळरांगा, धुळे जिल्ह्यातील सातपुडा पर्वतभाग आणि ठाणे जिल्ह्याचा डोंगराळ प्रदेश या भागात ही जंगले आहेत.

-साग, आईन, हिरडा, कुसुम, शेवरी, आवळा, शिरीष, पळस, खैर, शिसव, अंजन इत्यादी जातीचे वृक्ष या जंगलांमध्ये दिसतात. आथिर्कदृष्टया या जंगलांना फार महत्त्व आहे.



📌उष्ण कटिबंधीय काटेरी खुरटया वनस्पतीची अरण्ये:-


-पठारी प्रदेशातील 80 सें.मी. पेक्षा कमी पावसाच्या प्रदेशात वनस्पती अगदी विरळआहेत. 

-या भागातील कमी व नापीक जमीन ही अशा प्रकारच्या वनस्पती उगण्याचे कारण आाहे. 

-नगर, पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यांच्या पूर्व भागात सोलापूर, मराठवाडा व पश्चिम विदर्भात अशा प्रकारच्या वनस्पती आढळतात. 

 -बाभूळ, बोर, खैर, निंब हेवृक्ष आणि तरवड, टाकळा, निवडुंग इत्यादी झुडपे व अनेक प्रकारची गवते त्या भागात मात्र पानझडी जातीचे वृक्ष आढळतात.



📌मग्रॅुव्ह प्रकारची अरण्ये:-


-किनारपट्टीलगत समुद्रकाठच्या दलदलीच्या प्रदेशात व खाऱ्याजमिनीत 'मॅंग्रुव्ह'(खारफुटी) प्रकारची जंगले आढळतात. 

-यामध्ये चिपी, मारांडी झुडपे व तिस वृक्ष इत्यादी फक्त खाऱ्या जमिनीत वाढणाऱ्या जातीच आढळतात.



📌जगलाखाली असलेल्या एकूण प्रदेशापैकी 80 पेक्षा अक्षिक जास्त प्रदेश वनखात्याच्या ताब्यात आहे. 

यातील जवळजवळ 65 ते 70 जंगले राखीव व सुरक्षित आहेत. 


-महाराष्ट्रातील जंगले चंद्रपूर, भंडारा,गोंदिया, अमरावती, यवतमाळ, धुळे, नंदुरबार, नाशिक, ठाणे,दक्षिण रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात केंद्रीत झाली आहेत. विदर्भात सर्वात कमी म्हणजे 4.5 जमीन जंगलाखाली आहे.


📌सदाहरित वने:-


-महाराष्ट्रात हा प्रकार फारच तुरळक आढळतो. साधारणत: 1,200 ते 1,400 मी.उंचीवरील विपुल पर्जन्यमानाच्या प्रदेशात जेथे स्थानिक भू-भागाला संरक्षण आहे अशा दुर्गम पठारी अथवा दऱ्याखोऱ्यातून सदाकाळ हिरवीगार असलेली वने आढळतात. 

-या भागात पर्जन्यमान 360 ते 600 सेंमी. असते, या प्रकारची वने महाबळेश्वर, खंडाळा, माथेरान,भीमाशंकर, अंबोली अशा ठिकाणी आढळतात. 

-पठारावर जरी वृक्षांची उंची कमी असली तरी दऱ्याखोऱ्यातून हेच वृक्ष भरपूर उंच झालेले दिसतात. 

-या वनांत खालील सदाहरित वृक्ष मुख्यत्वेकरुन आढळतात. जांभूळ, पिशा, पारजांब, हिरडा, अंजर, आंबगा, लालदेवदार, वगैरे, झुडपांमध्ये फांगडा, रामेठा, बामणी, दिंडा, सुरंगी, फापटी वगैरे आढळतात. 

-विकसित झालेल्या उंच वृक्षांच्या जंगलात ओंबळ गारबी, पळसवेल, वाटोळी,वगैरे अजस्त्र वेली आढळतात.



📌निमसदापर्णी वने :-


-सदाहरीत वनांच्या खालच्या बाजूस जेथे पर्जन्यमान 200 ते 360 सेंमी. आहे आणि उष्णतामान थोडेसे जास्त असलेल्या कोकणचा प्रदेश, घाटमाथ्याच्या नजिकचा प्रदेश येथे साधारणत: हिरवीगार राहणारी अरण्ये असतात. 

-या जंगलात उंच वृक्ष नेहमी पानझडी असतात. मात्र मध्यम आकाराच्या वृक्षांच्या जातींमध्ये सदाहरित वृक्षांचा भरणा अधिक असतो. 

-उंच वृक्षांमध्ये किंजळ, नाणा, ऐन, बेहडा, सावर, हिन्हई, जांबत वगैरे तर मध्यम झाडोरा आढळतो. 

-सदाहरित वनांप्रमाणेच आर्थिकदृष्टया हया वनांपासून फारसे उत्पन्न मिळत नाही. परंतु सहयाद्रीच्या उतारांवरील जमिनीची धूप थांबविण्याच्यादृष्टीने या वनांचे महत्व फार आहे.


आर्द्र पानझडी वने :---


--घाटमाथ्यावरुन खाली उतरल्यानंतर सदापर्णी वनांच्या खालील बाजूस डोंगरउतारावर, काही वेळा सपाटीवर सुध्दा या प्रकारची वने आढळतात.

-पर्जन्यमान 150 ते 200सेंमी निचऱ्याची जमीन, उष्णतामान यांमुळे सागवान वृक्ष असलेली पानझडी वृक्षांची जंगले या भागात आढळतात. 

-जमिनीच्या मगदुराप्रमाणे झाडोऱ्याची उंची 30 - 35 मी.पर्यंत असू शकते

-व्यापारी दृष्टया अशा वनांचे महत्व फार आहे. 

-वनव्यवस्थापनाच्या दृष्टीने अशा किंमती वनांची खास देखभाल केली जाते. 

-उंच वृक्षांमध्ये सागवान व त्याच्याबरोबरच शिसम, सावर, बीजा, हळदू कळंब, ऐन बोंडारा, शिरीष, अर्जुन सादडा,धावडा इ. उपयुक्त वृक्ष सापडतात.

-सागवान इमारती लाकडाचे इतर जातीच्या इमारतीमालांपेक्षा कित्येक पटीनी जास्त उत्पन्न असल्याने वनव्यवस्थापनामध्ये त्याच्याकडे जास्त लक्ष पुरविले जाते, अशा वनात नेहमी पाणी असणाऱ्या ओढयांच्या काठी साधारणत: बाबूंची बेटे आढळतात.



📌शष्क पानझडी वृक्षवने :---


-या प्रकारच्या वनराजीत पानझडी वृक्षांचे प्रमाण सर्वात जास्त असते.

-उन्हाळयामध्ये तर अशा वनामध्ये सर्वच वृक्षांचे पर्णहीन खराटे दृष्टीस पडतात.

-अशा रानात सागवान वृक्षही आढळतात. असाणा, तिवस,सावर, चारोळी, आवळा, बेहडा, शेंदरी, चेरा, पळस, बारतोंडी, धामण,टेंबुर्णी वगैरे वृक्ष सापडतात. बाकीच्या झाडोऱ्यात बोर, बाभूळ, कुडा, आपटा,तांबरट वगैरे मध्यम आकारांचे वृक्ष अथवा झुडपे आढळतात. 

-इमारती लाकडाच्या दृष्टीने या प्रकारच्या वनांना कमी महत्व असले, तरी भरपूर जळाळु लाकडाचा पुरवठा करणारी जंगले म्हणून ही राने उपयुक्त मानली जातात. 


📌खाडीकाठची खाजण वने :--


-कोकण प्रदेशातील काही खाडयांच्या आसपास पाणथळ अथवा गाळ असलेल्या भूभागात खाजण किंवा खारपुरीची जंगले आढळतात. 

-भरतीच्या वेळी जमीन खाऱ्यापाण्याखाली असते अशा रानातील वृक्षांची उंची 4 ते 6 मी. असते. 

-पाणथळ जमिनीमुळे वृक्षांच्या आसपास जमिनीतून बाहेर आलेली श्वसन मुळे दिसतात. 

-अशा वनराजीपासून जळाऊ लाकूड चांगले मिळते. या भागात वाढणाऱ्या वनस्पतींपासून टॅनीन मिळत असल्याने कातडी कमावणे, मासेमारीची जाळी धुणे यांकरिता त्यांचा उपयोग केला जातो.  


पोलीस भरती प्रश्नसंच

 ♻️♻️महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय विभागात विभागणी झाली आहे.

1) ६

२) ४

३) ५

४) ९

उत्तर :१


♻️♻️खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आढळते?

१) लोणावळा २) चिखलदरा ३) महाबळेश्वर ४) माथेरान

उत्तर : २



♻️♻️ खालीलपैकी कुठल्या जिल्हयाचा चांदोली राष्ट्रीय उदयानामध्ये समावेश होत नाही ?

१) सांगली २) सातारा

३) रायगड ४) रत्नागिरी

उत्तर : ३


महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्हगात अजिंग वेरुळ लेणी आहेत ?

१) पुणे

२) अहमदनगर

3) औरंगावाद

४) लातूर

उतर : ३


पश्चिम महाराष्ट्रातील.. .जिल्ह्यामध्ये बॉक्शाईटचे शाठे आढळतात.

1) नाशिक

2) पुणे

3) कोल्हापूर

4) सोतापूर

उतर:3



देवरूख-कोल्हापूर महामार्ग हा......याततून जातो.

1) गगनबावडा

2) कुंडी

3) कोळंबा

4) वरंध

उतर: 2


महाराष्ट्रातील सर्वात कमी वनाखाली क्षेत्र.------. या विभागाचे आहे.

1) विदर्भ

2) कोकण

3) मराठवाडा✅✅

4) नाशिक


महाराष्ट्रातीत सर्वात जास्त लांबीची नदी कोणती?

1) भीमा

2) गोदावरी

3) क्रष्णा

4) वर्धा

उतर: २



भाषेचे एकूण किती प्रकार आहेत.(S.R.PF-7 दौंड 2018)

1) 04

2) 03

3) 02✅✅

4) 05


भाषा म्हणजे काय?

1) बोलणे

2) विचार व्यक्त करण्याचे साधन✅✅

3) लिहिणे

4) संभाषणाची कला


पुढीलपैकी कोणता वर्ण मराठीत अर्धस्वर नाही?(S.R.P.F-11 सोलापूर 2018)

1) य्

2) र्

3) अ✅✅

4) व्


विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन...... होय.(नाशिक ग्रा. - 2018)

1) हातवारे

2) लिपी

3) भाषा✅✅

4) संवाद


खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा

१) असहकार चळबळ-१९२४✅✅

२) सविनय कारदेभंग - १९३०

३) स्वराज्य पक्षाची स्थापना - १९२३

४) चलेजाब चळवळ -१९४२



गोपाळ हरी देशमुखांनी 'लोकहितवादी' या नावाने या साप्ताहिकातून लिखाण केले ?

१) दर्पण

२) सुधाकर

३) दिनमित्र

४) प्रभाकर✅✅


वर्ष 2016चा नोबेल पुरस्कार खालीलपैंकी

कोणाला मिळालेला नाही?

1) बॉब डीलन

2) बेंट होमस्ट्राम

3) जॉन बारडींग ✅✅

4) योशिमोरी ओसुरी


उपरा हे आत्मचरित्र कोणी लिहिले ?

1) नामदेव ढसाळ

2) लक्ष्मण माने ✅✅

3) केशव मेश्राम

4 ) नरेंद्र जाध


मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक कोण ?

1) शिवाजीराव भोसले

2) रणजित देसाई

3) विश्वास पाटिल

4)शिवाजी सावंत✅✅


खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा

१) असहकार चळबळ-१९२४✅✅

२) सविनय कारदेभंग - १९३०

३) स्वराज्य पक्षाची स्थापना - १९२३

४) चलेजाब चळवळ -१९४२


वर्ष 2016चा नोबेल पुरस्कार खालीलपैंकी

कोणाला मिळालेला नाही?

1) बॉब डीलन

2) बेंट होमस्ट्राम

3) जॉन बारडींग ✅✅

4) योशिमोरी ओसुरी


71 व्या प्रजासत्ताक कार्यक्रमाचे अतिथी हे .... देशाचे

प्रमुख राष्ट्राध्यक्ष होते.

1. अमेरिका

2. फ्रान्स

3. ब्राझील✅✅

4. ऑस्ट्रेलिया


♻️♻️ भारतात आधुनिक शिक्षणाचा पाया पुढीलपैकी कोणी घातला ?

1) इच

2) इंग्रज✅✅

3) पोर्तुगीज

4) फ्रेंच


♻️♻️ जगात सर्वात पहिले बजेट कोणत्या देशाने मांडले ?

1) अमेरिका

2) इंग्लंड✅✅

3) फ्रांन्स

4) रशिया


♻️♻️दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री

1) सुषमा स्वराज✅✅

2) सुचेता कृपलानी

3) शिला दिक्षीत

4) मिरा कुमार


♻️♻️1936 चे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन......येथे झाले .

1) बेळगाव

2) फैजपूर✅✅

3) वर्धा

4) नागपूर


♻️♻️माजुली हे बेट कोणत्या राज्यात आहे ?


1) आसाम✅✅

2) अरूणालच प्रदेश

3) मध्यप्रदेश

4) उत्तराखंड


♻️♻️सियाल या शिलावरणाच्या उपथरात काय असते ?

1) सिलीका व अॅल्युमिनिअम✅✅

2) सिलिका व मॅग्नेशियम

3) सिलीका व फेरस

4) फेरस व निकेल


♻️♻️भारतात कर्कवृत्त....राज्यातून जाते.

1) पाच

2) सात

3) सहा

4) आठ✅✅


♻️♻️जिल्ह्यातील खजिना व स्टॅप यावर कोणाचे नियंत्रण असते ?

1) विभागीय आयुक्त

2) महालेखापाल

3) वित्त लेखा अधिकारी

4) जिल्हाधिकारी✅✅


♻️♻️19 जुलै 1969 रोजी किती बकेचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले ?

1) 11

2) 14✅✅

3) 9

4) 8


सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कुणी केली?

1) केशवचंद्र सेन

2) स्वामी दयानंद

3) अॅनी बेझंट✅✅

4)स्वामी विवेकानंद


मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली?

1) अलिगड

2)ढाका✅✅

3) इस्लामाबाद

4)अलाहाबाद


सायमन कमिशनची स्थापना कशाकरिता करण्यात आली होती?

1) माँटेग्यू-चेम्सफोर्ड कायद्याने केलेल्या सुधारणांचे मूल्यमापन करण्यासाठी.✅✅✅

2) पुणे कराराच्या प्रभावाचे मूल्यमापन

करण्यासाठी.

3) मो्ले-मिंटो कायद्याने केलेल्या

सुधारणांचे मूल्यमापन करण्यासाठी.

4) वरीलपैकी कशासाठीही नाही.


महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी 1918 मध्ये सारा बंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली?

1) पुणे

2)गोरखपुर

3) खेडा✅✅

4)सोलापुर

mpsc प्रश्नसंच

बॉक्साईट हे काय आहे?

      🔴धातू✅✅✅✅

      ⚫️अधातू

      🔵ऊर्जा

      ⚪️खनिज



जिप्सम कोणत्या खडकात सापडते?

      🔴अग्निजन्य

      ⚫️सतरित

      🔵रपांतरित✅✅✅✅

      ⚪️पढीलपैकी सर्व



 सागरी मीठ उत्पादनात कोणते राज्य अग्रेसर आहे?

      🔴महाराष्ट्र

      ⚫️कर्नाटक

      🔵गजरात✅✅✅✅

      ⚪️प.बंगाल




ओखा बंदर कोणत्या राज्यात आहे.

      🔴महाराष्ट्र

      ⚫️सौराष्ट्र

      🔵गोवा

      ⚪️गजरात✅✅✅



नैसर्गिक रेशमाच्या उत्पादनात कोणत्या देशानंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो.

      🔴जपान

      ⚫️चीन✅✅✅

      🔵इग्लंड

      ⚪️रशिया



कोणते पिक भारतातील बहुसंय लोकांचे प्रमुख अन्न आहे.

      🔴तांदूळ✅✅✅

      ⚫️गहू

      🔵मासे

      ⚪️मांस



शेेळयांना कोणते हवामान चांगले मानवते.

      🔴उष्ण व कोरडे✅✅✅

      ⚫️थड

      🔵उष्ण व दमट

      ⚪️पढीलपैकी कोणतेच नाही



पुरूषांच्या तुलनेने सर्वात कमी स्त्रियांचे प्रमाण असणारे राज्य कोणते?

      🔴हरियाना✅✅✅

      ⚫️राजस्थान

      🔵बिहार

      ⚪️आसाम




महाराष्ट्राच्या उत्तर सीमेलगतची पर्वतरांग कोणती आहे?

      🔴विध्यं

      ⚫️सातपुडा✅✅✅

      🔵अरवली

      ⚪️अजंठा



कुटु्ब नियोजन कार्यक्रमाची सुरूवात आशियातील पहिला देश कोणता आहे?

      🔴भतान

      ⚫️पाकिस्तान

      🔵चीन

      ⚪️भारत✅✅✅



 बोंड अळी  ही कीड कोणत्या पिकावर पडते?

      🔴कापूस✅✅✅

      ⚫️भईमूग

      🔵दराक्ष

      ⚪️सर्यफुल



 सगळयात छोटा दिवस कोणता?

      🔴२५ डिसेंबर

      ⚫️२२ डिसेंबर✅✅✅

      🔵१५ जून

      ⚪️२२ जून



 समान पर्जन्यमान असणार्‍या स्थळांना जोडणार्‍या रेषेस काय म्हणतात?

      🔴आयसोबार

      ⚫️आयसोहाईट✅✅✅

      🔵कोन्टूर

      ⚪️आयसोव्हेल



महाराष्ट्राची प्रमुख पश्चिम वाहिनी नदी कोणती?

      🔴गोदावरी

      ⚫️तापी✅✅✅

      🔵कष्णा

      ⚪️वनगंगा



पुढीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत  चिखलदरा  थंड हवेचे ठिकाण आहे?

      🔴अरवली

      ⚫️सातपुडा✅✅

      🔵विंध्य

      ⚪️सह्याद्री


 ब्लूटूथ कोठे अस्तित्वात आहे?  (ASST MAINS २०११)

🔴नोकिया 

⚫️सोनी

🔵एल जी 

⚪️इरीक्सन✅✅✅


 'Gnutella' हे कोणत्या नेटवर्क स्ट्रॅटेजी मध्ये वापरतात? (STI 2011)

🔴टर्मिनल 

⚫️पियर टू पियर✅✅✅✅

🔵कलायंट/सर्व्हर

⚪️एन आय सी


समांतर तारांचा समूह जो दोन किंवा जास्त संगणक संबंधित उपकरणांना जोडतो त्याला म्हणतात. (राज्यसेवा मुख्य २०१६)

🔴जाळे

⚫️बस✅✅✅

🔵हद्दीतील

⚪️गठोडे



माहिती अधिकार अधिनियमाची एकुण _कलमे आहे (ASST 2011)

🔴२९

⚫️३०

🔵३१✅✅✅

⚪️३२


माहिती अधिकार अधिनियम खाली अर्ज केलेल्या तारखेपासुन मागील __वर्षापुर्वीची माहिती देण्यात येईल (Asst 2011) 

🔴३५

⚫️३०

🔵२५

⚪️२०✅✅✅


 _हे केंद्रीय माहिती आयोगाचे पहीले मुख्य माहिती आयुक्त होते.(PSI 2013)

🔴शरी रंगनाथ मिश्रा

⚫️शरी वजाहत हबीबुल्ला✅✅✅

🔵शरी सत्यानंद मिश्रा

⚪️शरी शैलेश गांधी



 भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत माहिती मिळवण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे (PSI 2015)

🔴19(1)अ✅✅✅

⚫️19(१)ब

🔵१९(१)क

⚪️१९(१)ड



राज्य माहिती आयुक्तांची नियुक्ती _करतात.(Asst 2015)

🔴राष्ट्रपती

⚫️पतप्रधान

🔵राज्यपाल✅✅✅

⚪️मख्यमंत्री



माहितीचा अधिकार आॅनलाईन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे ?(STI2015)

🔴गजरात

⚫️पश्चिम बंगाल

🔵आध्रप्रदेश

⚪️यापैकी नाही✅✅✅



 माहितीचा अधिकार कायदा सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या देशात अस्तित्वात आला?(Asst 2012)

🔴इग्लंड

⚫️चायना

🔵सवीडन✅✅✅

⚪️फरान्स


 स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पुढीलपैकी कोणते पुस्तक  लिहलेली आहे?

      🔴सरस्वती

      ⚫️कमला✅✅✅✅

      🔵रनरागीनी

      ⚪️भारतमाता



 छत्रपती शाहू महाराजांचे राज्य कोणत्या प्रकारचे होते?

      🔴लोक कल्याणकारी✅✅✅

      ⚫️लोकशाहीवादी

      🔵हकूमशाही

      ⚪️साम्यवादी



१९१६ साली महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली?

      🔴महर्षि धों. के. कर्वे✅✅✅

      ⚫️पजाबराव देशमुख

      🔵कर्मवीर पाटील

      ⚪️नया. म.गो. रानडे



गो.ग. आगरकरांचा जन्म कोठे झाला?

      🔴टभू✅✅✅

      ⚫️कोल्हापूर

      🔵सोलापूर

      ⚪️पणे



 मुंबई येथे  सिध्दार्थ कॉलेज  कुणी सुरू केले?

      🔴महर्षि कर्वे

      ⚫️महात्मा फुले

      🔵लोकमान्य टिळक

      ⚪️डॉ. बी. आर. आंबेडकर✅✅✅



 लखनौ करारावर  कोणी स्वाक्षर्‍या केल्या?

      🔴गोखले व जिना

      ⚫️टिळक व जिना✅✅✅

      🔵टिळक व शौकत अली

      ⚪️गांधीजी व अ‍ॅनी बेझंट



 महात्मा फुले यांचे मूळ आडनाव काय होते?

      🔴फलेकर

      ⚫️कटगुणकर

      🔵माळी

      ⚪️गोर्‍हे✅✅✅


 १९ व्या शतकातील हिंदूस्थानातील आद्य सुधारक कोण?

      🔴राजा राममोहन रॉय✅✅✅

      ⚫️गोपाळ हरि देशमुख

      🔵महात्मा फुले

      ⚪️बाळशास्त्री जांभेकर


कोणी जॅक्सन याचा वध केला.

      🔴अनंत कान्हेरे✅✅✅

      ⚫️दामोदर चाफेकर

      🔵वासुदेव फडके

      ⚪️बारीद्रं कुमार घोष


औरंगजेबाच्या कोणत्या सरदाराने जिंजीला वेढा घातला?

      🔴शाहिस्तेखान

      ⚫️झल्फीकारखान✅✅✅

      🔵अफझलखान

      ⚪️जयसिंग


दक्षिणी पठाराने महाराष्ट्र राज्याचा किती भाग व्यापला आहे?  (STI मुख्य २०१२)

🔴८६✅✅✅✅

⚫️८१

🔵५३

⚪️३५



 महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशी झाली आहे? (PSI २०१२)

🔴भरूप्रक्षोप

⚫️सचयन

🔵भकंप 

⚪️भरुंशमूलक उद्रेक ✅✅✅


 पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये _चे स्थान आहे (Asst 2011)

🔴महाड

⚫️वाई✅✅✅

🔵महाबळेश्वर 

⚪️नाशिक 


कोकणचे हवामान __ आहे (STIमुख्य २०११)

🔴कोरडे 

⚫️विषम

🔵सम✅✅✅✅

⚪️थड 


 खालीलपैकी गोदावरीची कोणती उपनदी नाही?  (STI2011)

🔴इद्रावती

⚫️परवरा

🔵दधना

⚪️इद्रायणी ✅✅✅


महाराष्ट्रात सर्वात कमी वनक्षेत्र _या विभागात आहे  (STIमुख्य २०११)

🔴विदर्भ 

⚫️कोकण

🔵मराठवाडा✅✅✅✅

⚪️नाशिक 


महाराष्ट्रात येथे खनिज तेल आढळते (STIमुख्य २०११)

🔴अकलेश्वर

⚫️बॉम्बे हाय ✅✅✅✅

🔵दिग्बोई

⚪️विशाखापट्टणम 


 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खनिजससंपत्ति विपुल आहे (PSI२०१२)

🔴पणे 

⚫️चद्रपूर ✅✅✅

🔵बीड

⚪️सोलापूर


खालीलपैकी कोणती संज्ञा गाळाच्या जमिनीची संबंधित नाही (ASS 2012)

🔴खादर

⚫️भाबर 

🔵रगुर✅✅✅

⚪️भांगर 



 महाराष्ट्राच्या पूर्व-पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार __आहे (PSI २०१२)

🔴कमी आहे ✅✅✅

⚫️जास्त आहे 

🔵वगळा आहे 

⚪️तवढाच आहे 


 एका माणसाचे विद्यापीठ  कोणास म्हटले जाते?
      🔴म. गांधी

      ⚫️कर्मवीर भाऊराव पाटील

      🔵महर्षी धो.के. कर्वे

      ⚪️सत गाडगेबाबा✅✅✅



 भारतीय राज्यघटनेत मोफत व अनिवार्य शिक्षण किती वयापर्यतच्या मुलांना निर्धारित केले आहे?
      🔴९

      ⚫️५

      🔵१२

      ⚪️१४✅✅✅

    

 गोकूळ ग्राम योजना   कोणत्या राज्यात आहे?
      🔴महाराष्ट्र

      ⚫️गजरात✅✅✅

      🔵मध्यप्रदेश

      ⚪️कर्नाटक


 पुुढीलपैकी कोणत्या देशात फुलांना जास्त मागणी असते?
      🔴शरीलंका

      ⚫️फिलिपाईन्स

      🔵नदरलॅंड✅✅✅

      ⚪️मयानमार



 खालीलपैकी कोणते शहर दोन राष्ट्रीय महामार्गांनी जोडले गेले आहे?
      🔴अहमदनगर

      ⚫️अकोला

      🔵धळे✅✅✅

      ⚪️अमरावती



 पिसाचा झुलता मनोरा  खालीलपैकी कोणत्या देशात आहे?
      🔴इराण

      ⚫️इराक

      🔵इटली✅✅✅

      ⚪️गरीस



आंतरराष्ट्रीय अन्नधान्य संघटनेचे कार्यालय कोठे आहे?
      🔴रोम✅✅✅✅

      ⚫️जिनिव्हा

      🔵नयूर्यॉक

      ⚪️वॉशिंग्टन



 या मराठी संताची पंजाबमध्ये देवळे आहेत?
      🔴एकनाथ

      ⚫️जञानेश्वर 

      🔵तकाराम

      ⚪️नामदेव✅✅✅



कोणती युवती क्रांतीकारी युवती होती?
      🔴सरोजिनी नायडू

      ⚫️परितीलता वडेदार✅✅✅

      🔵इदिरा गांधी

      ⚪️राणी लक्ष्मीबाई


खालीलपैकी कोण मसुदा समितीचे सदस्य नव्हते?
      🔴क. एम्. मुन्शी

      ⚫️गोपालस्वामी अय्यंगार

      🔵बी. एन.राव

      ⚪️पडित एम् एम् मालवीय✅✅


महाराष्ट्रातील हवामान

महाराष्ट्रातील हवामान विशिष्टपूर्ण आहे. याचे कारण त्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे. महाराष्ट्रात मान्सून वाऱ्यामुळे पाऊस मिळतो.


महाराष्ट्राच्या हवामानाचे स्वरूप -


कोकण -

कोकणचे हवामान उष्ण, दमट, सम, प्रकारचे आहे. कोकणची सखल किनारपट्टी अरबी समुद्रास अगदी जवळ असल्याने वर्षभर वर्षभर तो प्रदेश फार उष्नही व फार थंडही नसतो.


सह्यान्द्री -

समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जावे तसतशी हवा थंड होते. म्हणून सह्यान्द्रीच्या घाटमाथ्यावर उन्हाळ्यत देखील तेथील हवामान थंड असते. हिवाळ्यात मात्र कडाक्याची थंडी असते. म्हणून या भागातील हवामान थंड व आद्र असते.


महाराष्ट्र पठार -

महाराष्ट्राच्या पठारावर उष्ण,विषम,व कोरडे आहे. या भागात मार्च ते मे या काळात बरीच उष्णता असते. म्हणजेच उन्ह्याळातील व हिवाळ्यातील तापमानातच बरीच तफावत असल्याने पठारावरील हवामान हे विषम आहे.


महाराष्ट्रातील ऋतू -

महाराष्ट्रात साधारणपणे उन्हाळा-मार्च ते मे, पावसाळा -जून ते सप्टेम्बर, हिवाळा - ऑक्टोबर ते फेब्रूअरी, हे तीन मुख्य ऋतू आहेत.


उन्हाळा -

२१ मार्चनंतर उत्तर गोलार्धात सूर्यकिरणे लंबरूप पडण्यास प्रारंभ होतो तसेच दिनमानाच्या कालही वाढते.

महाराष्ट्राचे भौगोलिक स्थान सुमारे १६' ते २२' दरम्यान असल्याने या काळात तापमानात वाढत जाते. कोकण किनार पट्टीत अरबी समुद्राच्या सानिध्यामुळे खरे व मतलई वारे यांचा फायदा मिळतो. तर दख्खनचे पठार हे सह्यन्द्री पर्वतामुळे

अरबी समुद्रापासून अलग झालेले असते. यामुळे कोकण व पठार यावरील बरीच तफावत आहे.


कोकणामध्ये दैनिक कमाल तापमान कक्षा ३०' ते ३३' सें च्या दरम्यान असते. मराठवाड्यात ३० ते ३५ सें तापमान असते. तर विदर्भामध्ये ४२ ते ४३ सें च्या आसपास असते.


हवेचा दाब व वारे -

उन्हाळ्यात असे तापमान वाढत गेल्यास साहजिकच हवेचा दाब कमी कमी होत जातो. आणि कोकण किनारपट्टीत समभार रेषा समांतर होत जातात. एप्रिल मे महिन्यात जसजसा उन्हाळा कडक होत जातो तसतसा समभार रेषा जवळजवळ येऊ लागतात आणि वायुभार उतार तीव्र होत जातो. अरबी समुद्रावरील जास्त दाबाच्या प्रदेशाकडून वारे वाहू लागतात. आणि वायुभर उतार तीव्र होत जातो. अरबी समूद्रवरील जास्त दाबाच्या प्रदेशाकडून वारे वाहू लागतात व किनारपट्टीवर दुपारच्या कडक उन्हानंतर आरोह प्रकारचा पाऊस पडतो. तर मराठवाडा आणि विदर्भात उन्हाळ्याच्या शेवटच्या कालखंडात धुळीची वादळे निर्माण होतात.


पर्जन्य -

हिवाळ्यामध्ये वायव्य भारतात तयार झालेल्या जास्त दाबाचा पट्टा सूर्य कर्कवृत्ताकडे असल्याने हळूहळू दक्षिणेकडे सरकतो. एप्रिल महिन्यात हा जास्त दाबाचा पट्टा भारताच्या दक्षिण भागात असतो. व त्याचा बराचसा प्रदेश सागरावारही असतो. वायव्य भारतात दाबाचा प्रदेश असतो. परंतु तो अजूनही कमजोरच असतो. दाबाच्या प्रदेशाकडून

जास्त दाबाच्या प्रदेशाकडून लागतात. ते एप्रिल व मी महिन्यात महाराष्ट्रच्याही भागावरून वाहत जाऊन पाऊस देतात. यावेळेस आंब्याचा बहर असतो. म्हणून या पावसाला आंबेसरी

असे म्हणतात.


महाराष्ट्र मान्सूनची संकल्पना -


सर्वसाधारणपणे मान्सूनचे आगमन हि अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. उन्हाळ्यात भूभाग

व जलभाग तापणे हे मान्सून चे तंत्र आहे. हे भारतीय उपखंडाचे वैशिष्ट्य आहे. सर्वसामान्यपणे महाराष्ट्रात जो पाऊस पडतो. त्यापैकी सुमारे ८५% पाऊस नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून मिळते. पावसाळ्यात चार महिन्याच्या कालावधीत कोकण आणि सह्यन्द्री पर्वतरांगेत भरपूर पाऊस पडतो. त्यामानाने मध्य महाराष्ट्रात कमी पाऊस पडतो. महाराष्ट्राच्या पूर्व भागात अजून पावसाचे प्रमाण वाढत जाते. त्याचे कारण विदर्भ हा प्रदेश बंगालच्या उपसागरावरील मान्सून वाऱ्याच्या शाखेत येतो त्या भागात आगस्ट आणि सप्टेंबर या दरम्यान पाऊस पडतो.

कोकणात २५० ते ३०० सें मी पाऊस पडतो. घाठ्माठ्यावरील आंबोली येथे सर्वात जास्त

म्हणजे ७०७ से मी पूस कोसळतो. तर महाबळेश्वरला ५९४ एवढा पाऊस पडतो. माथेरानच्या पठारावर पावसाचे प्रमाण ४९३ से मी आहे. सह्यांद्रीच्या पूर्वेकडे म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या भागाकडे ५० ते ६० सें मी पाऊस पडतो. तसेच हा प्रदेश अनिश्चित स्वरूपाचे आहे. म्हणून या भागाला अवर्षणग्रस्त प्रदेश म्हटले जाते.

मराठवाड्यात ६० ते ८० सें मी एवढे पर्जन्य आहे. विदर्भात पावसाचे प्रमाण वाढत जाते. विदर्भात पश्चिमेकडून पूर्वेस पावसाचे प्रमाण वाढत जाते. पश्चिम विदर्भात ७५ ते ९० सें मी पाऊस पडतो. तर पूर्व विदर्भात ९० ते १५० से मी इतका पाऊस पडतो. विदर्भातील गाविलगडच्या डोंगरात पावसाचे प्रमाण वाढत जाते. तेथील थंड हवेच्या चिखलदरा या ठिकाणी १५० सें मी एवढा पाऊस पडतो.


ऑक्टोंबर संक्रमणाचा महिना -

या महिन्यात प्रखर सूर्यप्रकाश असतो. आणि हवेमध्ये बाष्पाचे प्रमाण भरपूर असल्याने उकाडा अनुभवास येतो.


हिवाळा -

मान्सून संपल्यावर वाऱ्याचा काळ संपल्यावर नोवेंबरपासून खऱ्या अर्थाने हिवाळा चालू होतो. हिवाळ्यात सरासरी मासिक तापमानाचा विचार केला तर असे आढळते कि बऱ्याचशा रेषा पश्चिम पूर्व दिशेने असून त्या एकमेकास समांतर आहेत. हिवाळ्यामध्ये काही ठिकाणी पाऊस पडतो.


महाराष्ट्रात हिवाळ्यात संपूर्ण खानदेश, नाशिक जिल्हा, बराचसा अहमदनगर पुण्यातील जुन्नर घोडेगाव,राजगुरुनगर, शिरूर,पुणे,हवेली, तालुके. विदर्भात अमरावती जिल्ह्याच्या धारणी,चिखलदरा, तसेच वरुड नागपूर भंडारा, चंद्रपूर या भागात किमान तापमान १० सें ते १२.५ सें एवढे असते. महाराष्ट्राच्या उर्वरित भागात म्हणजे दक्षिण महाराष्ट्र बऱ्याच प्रमाणात मराठवाडा व पश्चिम विदर्भ व पूर्व विदर्भात नागपूर जिल्ह्याचा दक्षिण भाग वर्धा, गोंदिया, भंडारा,चंद्रपूरच्या उत्तर भागात किमान तापमान १२.५ व १५ सें दरम्यान आहे.


महाराष्ट्रातील वार्षिक पर्जन्याचे वितरण -


जास्त पर्जन्याचा प्रदेश - महाराष्ट्रातील कोकण आणि सह्यान्द्री डोंगरावर आणि डोंगराच्या पायथाचा प्रदेश या भागात ३०० ते ६०० इतका पाऊस पडतो. मध्यम पर्जन्याचा प्रदेश- सह्यान्द्रीच्या भागात, तर नाशिक,पुणे,सातारा,सांगली, या जिल्ह्याचा पश्चिम भाग गोंदिया, गडचिरोली, या भागात ३०० ते २०० से मी पाऊस पडतो. मध्यम ते कमी पर्जन्याचा प्रदेश - चन्द्रपूर, यवतमाळ,वर्धा, या भागात मध्यम पर्जन्य पडते. तर मराठवाड्यातील सर्व जिल्हे आणि सोलापूर, अहमदनगर, सांगली, सातारा, पुणे या जिल्ह्याचा भागात तसेच पश्चिम विदर्भातील सर्व जिल्हे या भागात कमी पर्जन्य होते.