स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
06 October 2020
महिला आयोगाच्या अध्यक्षांची अद्यापही नियुक्ती नाही
🔰अमरावती : हाथरस बलात्कार प्रकरणावरून देशभरात संतापाची लाट उसळली असताना महाराष्ट्रातील महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. अध्यक्षांच्या नियुक्तीसंदर्भात मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांना आतापर्यंत आठ ते दहा पत्रे दिली. मात्र अद्यापही अध्यक्षाची नेमणूक झाली नसल्याची खंत राज्याच्या महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी आपल्याच सरकारबाबत व्यक्त केली आहे. लवकरच सर्व मंत्री एकत्र बसून महिला आयोगाच्या अध्यक्षाची नियुक्ती करतील, असा आशावाददेखील त्यांनी व्यक्त केला.
🔰एका वृत्तवाहिनीशी बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या, करोना संकटाच्या काळातही घरगुती हिंसाचार, कार्यालयस्थळी लैंगिक छळ, महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशा स्थितीत महिला आयोगाची भूमिका महत्त्वाची आहे. अध्यक्षांच्या नियुक्तीसंदर्भात मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री आणि नेत्यांना मी पत्रे लिहिली, पण अजून महिला आयोगाच्या अध्यक्ष नियुक्तीचा मुहूर्त राज्यातील महाविकास आघाडी सरकारला सापडलेला नाही.
🔰भाजप सरकारमध्ये विजया रहाटकर या राज्यांच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या, मात्र त्यांनी ४ फेब्रुवारीला अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे गेल्या आठ महिन्यांपासून राज्यातील महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त आहे. परंतु अध्यक्ष नेमण्यासाठी सर्व जण एकत्र येऊन लवकरच निर्णय घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अर्मेनिया-अझरबैजान युद्ध
🔰अर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यातला दशकांपासून सुरू असलेला सीमावाद 27 सप्टेंबर 2020 रोजी पुन्हा एकदा उफाळून आला. दोनही देश वादग्रस्त नागोर्नो-काराबाखच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा समोरासमोर आले आहेत.
🔴नागोर्नो-काराबाख प्रदेश
🔰नागोर्नो-काराबाख हा 4,000 किलोमीटरवर पसरलेला डोंगराळ प्रदेश आहे. तिथे अर्मेनियातले ख्रिश्चन आणि मुस्लीम तुर्क राहतात. सोव्हियत संघादरम्यान ते अझरबैजानमधले एक स्वायत्त क्षेत्र होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्या परिसराला अझरबैजानचा भाग समजले जाते. परंतु, तिथे बहुतांश अर्मेनियाचे नागरिक राहतात.
🔰1980च्या दशकाच्या शेवटापासून ते 1990च्या दशकापर्यंत चाललेल्या युद्धात 30 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि 10 लक्षाहून अधिक लोकांचे स्थलांतर झाले. त्यादरम्यान फुटीरवादी गटांनी नागोर्नो-काराबाखच्या काही भागांवर ताबा मिळवला होता. परंतु, 1994 सालामधल्या युद्ध विरामानंतरही तिथे सातत्याने संघर्ष चालू आहेत.
🔴पार्श्वभूमी
🔰अर्मेनिया आणि अझरबैजान ही आशिया खंडातली शेजारी-शेजारी राष्ट्रे आहेत. दोन्ही देश एकेकाळी सोवियत संघाचे भाग होते. दोन्ही देश यूरोपच्या अगदी जवळ आहेत.
🔰दोन्ही देश सोवियत संघाचे भाग होते. 1980च्या दशकात जेव्हा सोवियत संघाचे पतन झाले, तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये वाद सुरु झाला. नागोर्नो-काराबाख या भागावरुन उभय देशांमध्ये वाद आहे. हा भाग अर्मेनिया आणि अझरबैजानच्या सीमेवर आहे. 1991 साली दोन्ही देशांमध्ये युद्धाची स्थिती निर्माण झाली होती. तीन वर्षांच्या संघर्षानंतर रशियाने हस्तक्षेप केल्याने 1994 साली युद्धविराम देण्यात आला होता.
🔰आतरराष्ट्रीय कायद्यानुसार हा भाग अजरबैजानचा आहे, परंतु त्यावर अर्मेनियातल्या टोळ्यांचा ताबा आहे. त्यामुळे आर्मेनियन सैन्याने हा भाग आपल्या ताब्यात ठेवला आहे. या भागात नेहमीच तणावाची स्थिती राहिली आहे.
🔰अर्मेनिया हा पश्चिम आशिया आणि युरोपच्या काकेशस क्षेत्रात वसलेला एक पर्वतीय देश आहे. देशाची राजधानी येरेवन हे शहर आहे आणि द्राम हे राष्ट्रीय चलन आहे.
🔰अझरबैजान हा आशिया आणि युरोपमधला एक देश आहे, ज्यास कॅस्परियन समुद्र आणि काकेशस पर्वत सीमारेषा आहे. बाकू ही अझरबैजानची राजधानी आहे आणि अझरबैजानी मनात हे राष्ट्रीय चलन आहे.
चीनमधील ‘या’ विषाणूचाही भारतात मोठ्या प्रमाणात होऊ शकतो संसर्ग; ICMR च्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केली भीती.
🔰दिवसोंदिवस देशामध्ये करोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यातच आता इंडियन काऊन्सील ऑफ मेडीकल रिसर्चच्या (आयसीएमआर) संशोधकांना आणखीन एका विषाणूचा शोध लागला आहे. या विषाणूचे नाव कॅट क्यू व्हायरस (सीक्यूव्ही) असं आहे. या विषाणूचाही देशात मोठ्या प्रमाणात संसर्ग होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे.
🔰अॅन्थ्रोपॉड प्रकारच्या या विषाणूचा डुक्कर तसेच डासांच्या माध्यमातून संसर्ग होतो. यापूर्वी चीन आणि व्हिएतनाममध्ये हा विषाणू मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे.
🔰या नवीन संशोधनासंदर्भातील वृत्त लाइव्ह मींटने दिलं आहे.पुण्यातील नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, आयसीएमआरच्या संशोधकांना ८८३ नमुन्यांपैकी दोन नमुन्यांमध्ये सीक्यूव्हीच्या अॅण्टीबॉडीज आढळून आल्या आहेत. आणखीन संशोधन केलं असता या दोन्ही रुग्णांना यापूर्वी कधी ना कधी सीक्यूव्हीचा संसर्ग झाल्याचे दिसून आलं आहे. हे दोन्ही रुग्ण कर्नाटकमधील आहे.
🔰२०१४ आणि २०१७ च्या कालावधीमध्ये त्यांच्या शरीरामध्ये अॅण्टी-सीक्यूव्ही आयजीजी अॅण्टीबॉडीज आढळून आल्या.
लाइव्ह मींटने आयसीएमच्या शास्त्रज्ञांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार या रुग्णांना डुक्कर किंवा जंगलातील पक्षांच्या माध्यमातून या विषाणूचा संसर्ग झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
🔰मानवामध्ये आढळून आलेल्या अॅण्टी-सीक्यूव्ही आयजीजी अॅण्टीबॉडीज आणि डासांमध्ये आढललेल्या सीक्यूव्ही विषाणूंमुळे या विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका असल्याचा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. यामुळेच आता संशोधकांनी सीक्यूव्हीची चाचणी करण्यासाठी मॉलिक्युलर आणि सेरोलॉजिकल पद्धतीवर काम करण्यास सुरुवात केली आहे.
🔰या विषाणूंचा संसर्ग ज्या डासांच्या माध्यमांमधून होतो त्यांचीही चाचणी करण्यास संशोधकांनी सुरुवात केली आहे. या विषाणूचा भारतामधील डासांवर कसा परिणाम होतो यावर सध्या संशोधन सुरु आहे. डासांच्या माध्यमातून या विषाणूंचा संसर्ग होतो.
🔰तयाचप्रमाणे पक्षांमधूनही या विषाणूचा संसर्ग होतो असंही सांगितलं जात असलं तरी त्याचा ठोस पुरावा अध्याप उपलब्ध नाहीत. पाळलेल्या डुक्करांमध्येही हा विषाणू आढळून आल्याचा प्रकार चीनमध्ये समोर आला आहे.
बोंगोसागर”: भारतीय नौदल आणि बांगलादेश नौदल यांची संयुक्त सागरी कवायत.
🔰भारतीय नौदल आणि बांगलादेश नौदल यांनी “बोंगोसागर” नामक संयुक्त सागरी कवायत आयोजित केली. 3 ऑक्टोबर 2020 पासून तीन दिवस हा युद्धसराव चालणार आहे. यंदा या कवायतीचे हे दुसरे वर्ष आहे.
🌺ठळक बाबी...
🔰दोन्ही देशांच्या नौदलांची ही संयुक्त कवायत बंगालच्या उपसागरात आयोजित करण्यात आली.
🔰दरम्यान दोन्ही देश संयुक्तपणे गस्त घालून परस्परांच्या सागरी सीमेचे रक्षण करणे तसेच गस्त घालताना सतत एकमेकांशी समन्वय ठेवणे या मोहिमा पार पाडणार.
🔰भारताकडून कवायतीसाठी INS किल्टन ही पाणबुडीविरोधी युद्धनौका आणि INS खुकरी ही अचूक क्षेपणास्त्र हल्ले करणारी युद्धनौका सहभागी झाली.
🔰भारताच्या ‘सागर’ (Security And Growth for All in the Region - SAGAR) नामक दृष्टीकोनाच्या पार्श्वभूमीवर शेजारी देशांसोबत समन्वय राखण्यासाठी, एकमेकांना सहकार्य करण्यासाठी 'बोंगोसागर' कवायत केली जात.
🔴बांगला देश विषयी...
🔰बांगलादेश हा दक्षिण आशियातला गंगा आणि ब्रह्मपुत्रा यांच्या त्रिभुज प्रदेशातला एक प्रजासत्ताक देश आहे. ढाका ही देशाची राजधानी आहे आणि बांगलादेशी टाका हे राष्ट्रीय चलन आहे.
🔰भारतीय उपखंडाच्या ईशान्य भागातल्या या राष्ट्राचा उदय 1971 साली झाला. तत्पूर्वी हा देश पूर्व पाकिस्तान या नावाने पाकिस्तानचाच एक प्रांत होता. पाकिस्तानच्या इतर प्रांतांपासून तो 1750 किलोमीटरच्या भारतीय प्रदेशाने अलग केलेला होता. बांगला देशाच्या पश्चिमेस व वायव्येस भारतातले पश्चिम बंगाल, उत्तरेस आसाम व मेघालय, पूर्वेस आसाम व त्रिपुरा आणि मिझोरम ही राज्ये आहे.
भारतीय संविधानातील संसदेविषयीची कलमे आणि तरतुदी
♦️सविधानाच्या भाग 5 मधील प्रकरण 2
📌1)संसद - कलम 79-88.
📌2)राज्यसभा - कलम 80.
📌3)लोकसभा - कलम 81.
📌4)संसदेचे अधिकार
-कलम 89-98.
📌5)कामकाज चालवणे
- कलम 99-100.
📌6)सदस्यांची अपात्रता
- कलम 101-104.
📌7)संसद सदस्यांचे अधिकार, विशेषाधिकार
- कलम 105-106.
📌8) वैधानिक कार्यपद्धत.
- कलम 107-111
📌9) वित्तीय बाबींमधील कार्यपद्धती
- कलम 112-117
📌10) सर्वसाधारण कार्यपद्धत
- कलम 118-122.
काही महत्त्वाचे चालु घडामोडी प्रश्न
1). ‘अर्थशॉट पारितोषिक’ कोणत्या विषयाशी संबंधित आहे?
. हवामानातले बदल
2. धोरणात्मक महत्त्व असलेला ‘राबंग पूल’ कोणत्या राज्यात आहे?
. अरुणाचल प्रदेश
3. NITI आयोगाच्या ‘शाश्वत विकास ध्येये निर्देशांक’ यामध्ये कोणते राज्य अग्रस्थानी आहे?
. केरळ
4. दुसरी ‘तेजस’ रेलगाडी कोणत्या शहरांच्या दरम्यान धावणार आहे?
. अहमदाबाद आणि मुंबई
5. ‘इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट 2019’ अहवालानुसार, खारफुटीच्या जंगलात किती वाढ झाली आहे?
. 54 चौरस किलोमीटर
6. ‘इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट’ अहवालानुसार कोणत्या राज्याने वनक्षेत्रात सर्वाधिक वाढ दर्शविलेली आहे?
. कर्नाटक
7. नवे ‘सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर’ नावाचे डिजिटल व्यासपीठ कशासाठी आहे?
. हरवलेला मोबाईल फोन
8. ‘बायोमेट्रिक’-क्षम सेंट्रलाइज्ड अॅक्सेस कंट्रोल सिस्टम’ (CACS) याचे अनावरण कोणत्या मंत्रालयाने केले?
. नागरी उड्डयन मंत्रालय
9. कोणत्या व्यक्तीला ‘दादासाहेब फाळके पुरस्कार 2019’ मिळाला?
. अमिताभ बच्चन
10. तृतीयलिंगी समुदायासाठी भारतातले पहिले विद्यापीठ कुठे उभारले जाणार आहे?
. उत्तरप्रदेश
11. 2019 साली गुगल सर्च इंजिनवर भारतातले सर्वाधिक शोधले जाणारे उद्योगपती कोण?
. रतन टाटा
12. ‘भारतीय आर्थिक संघ’ (IEA) याच्या 102 व्या वार्षिक परिषदेचे उद्घाटन कुणाच्या हस्ते झाले?
. उपराष्ट्रपती वेंकैया नायडू
13. ओडिशा राज्याच्या कोणत्या जिल्ह्यात नवीन LPG बॉटलिंग प्लांट उभारण्यात आला?
. बालांगीर
14. ‘डिफएक्सपो 2020’ या प्रदर्शनीसाठी एका अॅप्लिकेशनचे अनावरण कोणत्या मंत्रालयाकडून झाले?
. संरक्षण मंत्रालय
https://t.me/Dhay_amcheadhikari
15. UIDAI संस्थेनी केलेल्या घोषणेनुसार, किती लोकांकडे आधार पत्र आहे?
. 125 कोटी
16. कोणत्या राज्यात ‘डबल स्टॅक ट्रेन’ची पहिली चाचणी घेण्यात आली?
. हरयाणा
17. डिसेंबर 2019 मध्ये निधन झालेले विकास सबनीस हे कोण होते?
. राजकीय व्यंगचित्रकार
18. फानफोन चक्रीवादळ कोणत्या देशाला धडकले?
. फिलीपिन्स
19. कोणत्या देशाने त्यांचे पहिले हायपरसोनिक आण्विक क्षेपणास्त्र तैनात केले?
. रशिया
20. प्रथम ‘मंडू महोत्सव’ कुठे आयोजित करण्यात आले?
. मध्यप्रदेश
21. ‘विस्डेन’संस्थेच्या ‘दशकातले पाच क्रिकेटपटू’ च्या यादीत कोणत्या भारतीय खेळाडूला स्थान मिळाले आहे?
. विराट कोहली
22. पाकिस्तान या देशाने कोणत्या देशातून ‘पोलिओ मार्कर’ आयात करण्याचा निर्णय घेतला?
. भारत
23. 26 डिसेंबर या दिवशी कोणत्या व्यक्तीची 120 वी जयंती साजरी केली गेली?
. शहीद उधम सिंग
24. कोणत्या वर्षी ‘भारतनेट’ प्रकल्प राबविण्यास सुरूवात झाली?
. वर्ष 2011
25. मोठ्या राज्यांच्या गटात कोणते राज्य ‘सुशासन निर्देशांक’मध्ये अव्वल ठरले?
. तामिळनाडू
26. क्युबा देशाचे पंतप्रधान कोण आहेत?
. मॅन्युएल मरेरो क्रूझ
27. QRSAM क्षेपणास्त्राची चाचणी कोणत्या संस्थेनी घेतली आहे?
. संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO)
28. पाकिस्तान या देशाचे नवनियुक्त सरन्यायाधीश कोण आहेत?
. गुलजार अहमद
29. आंध्रप्रदेश राज्याचे ‘दहशतवाद-रोधी दल’ कोणत्या नावाने ओळखले जाते?
. ऑक्टोपस
30. ICCच्या ताज्या 2019 कसोटी मानांकन यादीत कोणता खेळाडू अग्रस्थानी आहे?
. विराट कोहली
कुंदा नदी
◾️निलगिरीत उगम पावणारी तमिळनाडू राज्यातील नदी. लांबी सु. ११९ किमी. ऊटकमंडच्या आग्नेयीस सु. २४ किमी. वर देवबेट्टा, कौलिनबेट्टा, करायकुडी, पोर्थिमुंड इ. शिखरांच्या १,७०० मी. पेक्षा अधिक उंचीच्या पर्वतप्रदेशात उगम पावणाऱ्या अॅवलांच व एमेरल्ड या प्रवाहांनी मिळून कुंदा नदी झालेली आहे. तिच्या व दक्षिणेकडील अपर भवानीच्या
. 🎇 कुंदा नदीप्रकल्प 🎇
◾️खोऱ्यादरम्यान निलगिरी पठाराच्या नैर्ऋत्येस कुंदा पर्वतरांग आहे. तिच्यात अॅवलांच, बेअरहिल, माकुर्ती ही २,५०० मी. हून अधिक उंचीची शिखरे असून, त्या भागात नैर्ऋत्य व ईशान्य मान्सूनचा पाऊस दरवर्षी सु. ४०० सेंमी. पडतो. ते पाणी भवानीला आणि कुंदेला मिळते. सिल्लाहल्ला, कनारहल्ला, पेंगुबहल्ला इ. उपनद्यांचे पाणी घेऊन कुंदा अपर भवानीला मिळते. या दोन्ही नद्या मग भवानी या नावाने कावेरीला मिळतात. निलगिरीच्या उभ्या उतारांवरून कुंदा वेगाने खाली येते. मंडनायूजवळ तिला सु. ६६ मी. उंचीचा एक धबधबा आहे. कुंदेच्या परिसरातील वनश्री अत्यंत नयनरम्य आहे.
05 October 2020
राज्यघटनेतील भाग (Parts)
भाग पहिला – संघ आणि त्याचे राज्यक्षेत्र
भाग दूसरा – नागरिकत्व
भाग तिसरा – मूलभूत हक्क
भाग चौथा – मार्गदर्शक तत्वे
भाग चार ‘अ’ – मूलभूत कर्तव्ये
भाग पाचवा – संघ
भाग सहावा – राज्य
भाग सातवा – रद्द
भाग आठवा – केंद्र शासित प्रदेश
भाग नववा – पंचायत
भाग नऊ ‘अ’ – महापालिका
भाग नऊ ‘ब’ – सहकारी संस्था
भाग दहावा – अनुसूचीत आणि आदिवशी क्षेत्र
भाग अकरावा – संघ-राज्य संबंध
भाग बारावा – वित्त, मालमत्ता, करार आणि सुट्स
भाग तेरावा – भारताच्या राज्याक्षेत्रातील व्यापार आणि वाणिज्य.
भाग चौदावा – संघ आणि राज्यांतर्गत सेवा
भाग चौदा ‘अ’ – न्यायाधिकरणे
भाग पंधरावा – निवडणुका
भाग सोळावा – विशिष्ट वर्गांशी संबंधित विशेष तरतुदी
भाग सतरावा – भाषा
भाग आठरावा – आणीबाणी तरतुदी
भाग एकोणीसवा – संकीर्ण
भाग विसावा – घटनादुरूस्ती तरतुदी
भाग एकविसावा – तात्पुरती, संक्रमणकालीन आणि विशेष तरतुदी
भाग बाविसावा – संक्षिप्त शीर्षक, प्रारंभाची तारीख, हिंदीमधील अधिपत्र आणि मजकूर.
चालू घडामोडी चे 10 प्रश्न व उत्तरे
Q1) आंतरराष्ट्रीय कसोटी क्रमवारीत भारताच्या कोणत्या खेळाडूने प्रथम स्थान मिळवले आहे?
---- विराट कोहली
Q2) पैठण (औरंगाबाद) येथे कोणत्या व्यक्तीच्या नावाने संतपीठ तयार होणार आहे?
----- संत एकनाथ
Q3) प्रधानमंत्री मातृ वंदना योजना योजना संपूर्ण देशात कोणत्या मंत्रालयाने लागू केली आहे?
------ महिला व बालविकास मंत्रालय
Q4) हरिशश्चंद्र बर्नवाल यांच्या पुस्तकाचे नाव काय?
---- "लोर्ड्स ऑफ रेकॉड्स
Q5) शाश्वत विकास निर्देशांक नुसार भारतातील प्रथम क्रमांकावर कोणते राज्य आहे?
------ केरळ
Q6) भारतीय स्टेट बँक ने नुकतीच कोणती नवीन योजना सुरू केली?
------ नवीन वर्षात 'ओटीपी' आधारित एटीएम व्यवहार
Q7) जॉर्ज वॉशिंग्टन काव्र्हर पुरस्कार 2020 कोणत्या भारतीय व्यक्तीला देण्यात आला आहे?
--------- डॉ प्रमोद चौधरी
Q8) भारत आणि म्यानमार हे दोन्ही देश दहशतवाद विरोधी कोणते ऑपरेशन राबवत आहे?
------ ऑपरेशन सनराईज-2
Q9) भारत सरकारने जारी केलेल्या आरोग्य व निरोगीकरण च्या संचालनामध्ये राज्याच्या ताज्या नामांकन मध्ये प्रथम क्रमांकावर कोणते राज्य आहे?
------ पंजाब
Q10) नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिसने शिक्षणसंदर्भात रिपोट जारी केला असून या मध्ये साक्षरतेमध्ये महाराष्ट्र चा क्रमांक कितवा आहे?
------ पाचवा
Q1) ‘न्यू स्टार्ट’ हा अमेरिका आणि _ या देशांच्या दरम्यान झालेला एक करार आहे.
---------- रशिया
Q2) “मेडिकानेस” ही संज्ञा कश्यासंदर्भात आहे?
----------- उष्णकटिबंधीय चक्रीवादळ
Q3) 'काकातीया राजवंश’ची जागा कोणत्या कुळाने घेतली?
-------- पाश्चात्य चालुक्य
Q4) कोणत्या राज्यात भारतातले दुसरे रॉकेट लॉंच पोर्ट तयार केले जाणार आहे?
----------- तामिळनाडू
Q5) कोणत्या शहारातल्या संस्थेला ‘भारतीय माहिती तंत्रज्ञान कायदे (दुरुस्ती) विधेयक-2020’ मार्फत राष्ट्रीय महत्त्व असलेली संस्था म्हणून घोषित करण्यात आले नाही?
---------- बोधागया
Q6) “न्यूट्रिनो” हे काय आहे?
-------- अणु कण
Q7) कोणत्या दिवशी “जागतिक गेंडा दिन” साजरा केला जातो?
------- 22 सप्टेंबर
Q8) कोणत्या संस्थेनी ‘अभ्यास’ नामक हाय-स्पीड एक्सपेंडेबल एरियल टार्गेट (HEAT) वाहन तयार केले?
--------- एरोनॉटिकल डेव्हलपमेंट ईस्टॅब्लिशमेंट
Q9) 2024 साली चंद्रावर पहिली महिला उतरविण्यासाठी NASA संस्थेनी आखलेल्या मोहिमेचे नाव काय आहे?
-------- आर्टेमिस
Q10) “क्वीन्स कौंसेल” याचा अर्थ काय होतो?
-------- वकील
Q-1) हा भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे?
उत्तर :- साखर उद्योग
Q-2) दगडी कोळश्याच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे?
उत्तर :- चौथा
Q-3) महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीच्या पश्चिम उतार या भागात प्रामुख्याने -------प्रकारचा पाऊस पडतो?
उत्तर :- प्रतिरोध पर्जन्य
Q-4) भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था (NIO) कार्यरत आहे?
उत्तर :- पणजी (गोवा)
Q-5) मान्सूनपूर्व पडणाऱ्या सरींना महाराष्ट्रात काय ---------म्हणतात?
उत्तर :- आम्रसरी
Q-6) अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते?
उत्तर :- राजेवाडी
Q-7) जागतिक वारसा स्थळ यादित महाराष्ट्रातील कोणत्या स्थळांचा समावेश होतो?
उत्तर :- अजिंठा आणि वेरुळ
Q-8) अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते?
उत्तर :- महाराष्ट्र
Q-9) देशातील घनकचर्यापासून ऊर्जानिर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरु केलेला आहे?
उत्तर :- पुणे
Q:-10) भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते?
उत्तर :- झारखंड
घटना आणि देशातील पहिले राज्य
● प्लास्टिक बंदी लागू करणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश
● माहितीचा अधिकार लाग करणारे पहिले राज्य : तामिळनाडू
● सेवेचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य : राजस्थान
● पंचायत राजची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य : राजस्थान
● संस्कृतला राजकीय भाषेचा दर्जा देणारे पहिले राज्य : उत्तराखंड
● मूल्यवर्धित करप्रणाली लागू करणारे पहिले राज्य : हरियाणा
● भाषेच्या आधारावर गठित झालेले पहिले राज्य : आंध्रप्रदेश
● जागतिक बँकेला कार्बन क्रेडिट विकणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश
● संपूर्ण साक्षर असलेले पहिले राज्य : केरळ
● देशात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले पहिले राज्य : पंजाब
● मतांची जनगणना करणारे पहिले राज्य : कर्नाटक
● विशेष व्याघ्र दल गठित करणारे पहिले राज्य : कर्नाटक
● भूमी सेना गठित करणारे पहिले राज्य : उत्तरप्रदेश
● मध्यान्ह भोजन योजनेला सुरुवात करणारे पहिले राज्य : तामिळनाडू
● महिला बँकेची स्थापना करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र (मुंबई)
● रोजगार हमी योजना सरू करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र
● राष्ट्रीय रोजगार हमी योजना (एनआरईजीए) लागू करणारे पहिले राज्य : आंध्रप्रदेश (2 फेब्रुवारी, 2006, बंदला पल्ली येथून)
● अन्न सुरक्षा कार्यक्रम लागू करणारे पहिले राज्य : छत्तीसगड
● मानव विकास अहवाल जाहीर करणारे पहिले राज्य : मध्यप्रदेश
काकोरी कट (Kakori conspiracy)
◾️9 ऑगस्ट 1925
◾️लखनौ ते सहारनपूर दरम्यान काकोरी
◾️सहभाग:- चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, मन्मथनाथ गुप्ता, अशफाक उल्लाखान, राजेंद्रनाथ लाहिडी, रोशनलाल इत्यादी क्रांतिकारक अग्रणी होते. (एकून 10 जणांचा समावेश)
◾️बरिटिशांच्याविरुद्ध सशस्त्र लढा देण्याच्या हेतूने काकोरी (उत्तर प्रदेश) येथे घडवून आणलेला प्रसिद्ध क्रांतिकारी कट.
◾️सरकारी पोस्ट कार्यालयांमध्ये जमा झालेला पैसा रेल्वे मार्गाने जाणार असल्याची माहिती क्रांतिकारकांना मिळाली
◾️लखनौ ते सहारनपूर मार्गावर लखनौपासून आठ मैल अंतरावर असलेल्या काकोरी या गावाजवळ सशस्त्र क्रांतिकारकांनी रेल्वे थांबवून त्यातील खजिना लुटावा अशी योजना आखली.
◾️ 9 ऑगस्ट 1925 रोजी क्रांतिकारक सरकारी खजिना घेऊन जाणाऱ्या रेल्वेच्या डब्यात जाऊन बसले. रेल्वे आडवळणी अशा काकोरी स्थानकाजवळ येताच त्यांनी साखळी ओढून रेल्वे थांबविली
◾️रामप्रसाद बिस्मिल यांनी चैन खेचुन रेल्वे थांबवली
◾️कवळ दहा ते पंधरा मिनिटांमध्ये ही नियोजित लूट यशस्वी केली. या घटनेलाच ‘काकोरी कट’ असे म्हणतात.
◾️या कटात जवळपास 8000 रुपये लुटले
◾️काकोरी खटल्याचे कामकाज एप्रिल १९२७ पर्यंत चालले.
◾️यामधील रामप्रसाद बिस्मिल, अशफाक उल्लाखान, रोशनलाल व राजेंद्रनाथ लाहिडी यांना फाशी दिली
◾️कारस्थानांमध्ये सहभागी असलेले चंद्रशेखर आझाद ब्रिटिशांना गुंगारा देऊन भूमिगत राहिले.
◾️सशस्त्र क्रांती करण्याच्या उद्देशाने चंद्रशेखर आझाद यांनी ‘हिंदुस्थान रिपब्लिकन असोशिएशनʼ या जुन्या संस्थेचे ‘हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोशिएशनʼ असे नामकरण करून क्रांतिकार्य चालू ठेवले.
माहीती संकलन:- सचिन गुळीग
हवामानदृष्ट्या स्मार्ट शहर मूल्यांकन आराखडा (CSCAF 2.0).
केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते 11 सप्टेंबर 2020 रोजी “हवामानदृष्ट्या स्मार्ट शहर मूल्यांकन आराखडा 2.0 (क्लायमेट स्मार्ट सिटीज अॅसेसमेंट फ्रेमवर्क –CSCAF 2.0) तसेच ‘स्ट्रीट फॉर पीपल’ आव्हान अश्या दोन उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले.
✔️ CSCAF 2.0 विषयी ठळक बाबी...
मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेला ‘स्मार्ट शहर अभियान’ CSCAF 2.0 कार्यक्रम राबवित आहे.
CSCAFचा उद्देश - हवामान बदलाचा सामना करण्यासाठी एक निश्चित आणि ठोस आराखडा तयार करणे तसेच त्याचे नियोजन आणि अंमलबजावणीची योजना आखणे, त्यासाठीच्या गुंतवणुकीचा अंदाज घेणे.
या आराखड्यात 28 निदर्शकांसह पाच मुख्य क्षेत्रे आहेत - ऊर्जा आणि हरित इमारती; नगरनियोजन, हरितक्षेत्र आणि जैवविविधता; दळणवळण आणि हवेची गुणवत्ता; जलव्यवस्थापन; आणि घनकचरा व्यवस्थापन.या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय नगरविकास संस्थेनेही CSCAFच्या अंमलबजावणीला मंजुरी दिली आहे.
‘स्ट्रीट फॉर पीपल’ आव्हान शहरी रस्ते चालण्यास सुलभ करण्यासाठी आणि पादचाऱ्यांसाठी अधिक सुरक्षित करण्यासाठी उपाययोजना करण्याविषयीचे आव्हान आहे. याचा उद्देश आपल्या शहराला जलद, अभिनव आणि कमी खर्चात होणारी व्यवस्था विकसित करण्यासाठी प्रेरणा देणे आहे.
चालू घडामोडी प्रश्नसंच
1. आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक (AIIB) याचे मुख्यालय कुठे आहे?
(A) बिजींग, चीन✅
(B) जिनेव्हा, स्वित्झर्लंड
(C) शांघाय, चीन
(D) टोकियो, जापान
2. जुलै 2019 मध्ये हुसेन मुहम्मद इरशाद यांचा मृत्यू झाला. ते ____ या देशाचे माजी राष्ट्रपती होते.
(A) अफगाणिस्तान
(B) इराक
(C) बांग्लादेश✅
(D) सौदी अरब
3. कोणत्या खेळाडूने विक्रमी सहाव्यांदा ब्रिटिश ग्रँड प्रिक्स ही शर्यत जिंकली?
(A) वल्टरी बोटास
(B) सेबेस्टियन व्हेटेल
(C) मॅक्स वर्स्टपेन
(D) लेविस हॅमिल्टन ✅
4. लॅटीशा चॅन आणि इवान डोडिग यांनी 2019 विम्बल्डन स्पर्धेच्या मिश्र गटाचे विजेतेपद जिंकले. चॅन हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे?
(A) चीन
(B) जापान
(C) तैवान ✅
(D) क्रोएशिया
5. कुसुम योजनेचा उद्देश काय आहे ?
(A) सौर ऊर्जा प्रकल्प स्थापन करण्यास प्रोत्साहन देणे ✅
(B) वस्त्र उद्योग क्षेत्रातील क्षमता वाढवणे
(C) शालेय पोषण स्तराची सुधारणा
(D) स्वच्छ इंधन पुरवठा करणे
6. मेक्सिको देशाचा सर्वोच्च पुरस्कार Mexican Order of Aztec Eagle देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले?
(A) रतन टाटा
(B) डॉ. रघुपती सिंघानीया ✅
(C) पृथ्वीराज सिंह ओबरॉय
(D) आनंद महिंद्रा
7. भारतातील पहिले ऊर्जा सल्लागार केंद्र कोठे स्थापन करण्यात आले आहे ?
(A) आयआयटी मद्रास
(B) आयआयटी मुंबई
(C) आयआयटी कानपूर ✅
(D) आयआयएम अहमदाबाद
8. जुलै 2019 मध्ये मरण पावलेल्या दलित पँथर या सामाजिक संघटनेच्या सहसंस्थापकाचे नाव काय होते?
(A) नामदेव ढसाळ
(B) जे. व्ही. पवार
(C) अरुण कांबळे
(D) राजा ढाले ✅
9. 15 जुलै रोजी नियमांचे पालन न केल्याप्रकरणी भारतीय रिझर्व्ह बँकेनी कोणत्या बँकेला 7 कोटी रुपयांचा दंड ठोठावला?
(A) बँक ऑफ महाराष्ट्र
(B) पंजाब नॅशनल बँक
(C) भारतीय स्टेट बँक ✅
(D) कॅनरा बँक
10. 2020 साली रायफल / पिस्तूल / शॉटगन या प्रकारांसाठी आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रिडा महासंघ (ISSF) विश्वचषक कुठे खेळवला जाणार आहे?
(A) नवी दिल्ली ✅
(B) महाराष्ट्र
(C) पश्चिम बंगाल
(D) गोवा
11. कोणत्या व्यक्तीची सिंगापूर इंटरनॅशनल कमर्शियल कोर्ट (SICC) याचे आंतरराष्ट्रीय न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली गेली आहे?
(A) दिपक मिश्रा
(B) ए. के. सिक्री ✅
(C) मदन लोकुर
(D) टी. एस. ठाकुर
12. भारतातल्या महिलांना डिजिटल कृतींचा अवलंब करण्यास आणि डिजिटल साक्षरतेला प्रोत्साहन देण्यासाठी GSMAच्या ‘कनेक्टेड विमेन’ या उपक्रमासोबत ____ ने भागीदारी केली.
(A) BSNL
(B) एअरटेल
(C) रिलायन्स जियो ✅
(D) व्होडाफोन
13. जुलै 2019 मध्ये मरण पावलेल्या आसामी साहित्यकाराचे नाव काय होते?
(A) इंदिरा गोस्वामी
(B) माहीम बोरा
(C) पुरोबी बोर्मूदेय ✅
(D) यापैकी नाही
14. कोणत्या व्यक्तीची हिमाचल प्रदेश राज्याचे नवे राज्यपाल म्हणून नेमणूक केली गेली?
(A) आचार्य देवव्रत
(B) कलराज मिश्रा ✅
(C) केशरी नाथ त्रिपाठी
(D) कल्याण सिंग
महानगरपालिका
ज्या मोठ्या शहराची लोकसंख्या तीन लाखांहून अधिक असते तेथील नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थेचे रूपांतर यथावकाश महानगरपालिका या वरच्या दर्जाच्या संस्थेत केले जाते.
महानगरपालिकेला इंग्रजीत म्युनिसिपल कॉर्पोरेशन, मध्य प्रदेश राज्यात नगर पालिका निगम आणि अन्य हिदी भाषक राज्यांत नगर निगम म्हणतात. महानगरपालिका या लांबलचक शब्दाऐवजी मराठीत या संस्थेचा उल्लेख महापालिका या सुटसुटीत नावाने होतो. इ.स. २०१६पर्यंत, महाराष्ट्रातील खालील शहरांत महानगरपालिका अस्तित्वात आल्या आहेत :-
🔰 महाराष्ट्रातील २७ महानगरपालिका 🔰
▪️--अकोला महानगरपालिका
▪️--अमरावती महानगरपालिका
▪️--अहमदनगर महानगरपालिका
▪️--उल्हासनगर महानगरपालिका
▪️--औरंगाबाद महानगरपालिका
▪️--कल्याण-डोंबिवली महानगरपालिका
▪️--कोल्हापूर महानगरपालिका
▪️--चंद्रपूर महानगरपालिका
▪️--जळगाव महानगरपालिका
▪️--ठाणे महानगरपालिका
▪️--धुळे महानगरपालिका
▪️--नवी मुंबई महानगरपालिका
▪️--नागपूर महानगरपालिका
▪️--नांदेड-वाघला महानगरपालिका
▪️--नाशिक महानगरपालिका
▪️--पनवेल महानगरपालिका
▪️--परभणी महानगरपालिका
▪️--पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
▪️--पुणे महानगरपालिका
▪️--भिवंडी-निजामपूर महानगरपालिका
▪️--मालेगाव महानगरपालिका
▪️--मीरा-भायंदर महानगरपालिका
▪️--बृहन्मुंबई महानगरपालिका
▪️--लातूर महानगरपालिका
▪️--वसई-विरार महानगरपालिका
▪️--सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका
▪️--सोलापूर महानगरपालिका
कोरोना रूग्ण बरे होण्याच्या जागतिक क्रमवारीत भारत अव्वल:-
📚कोविड-19 महामारीविरुद्ध भारत अतिशय सक्षमतेने लढा देत आहे. कोरोना रूग्ण बरे होण्याच्या जागतिक क्रमवारीमध्ये भारत अव्वल स्थानी असून, हे स्थान देशाने कायम राखले आहे.
📚रग्ण बरे होण्याच्या आकड्याने आज 54 लाखांचा टप्पा (54,27,706) ओलांडला आहे. बरे झालेल्या रूग्णांचे जागतिक पातळीवरचे प्रमाण 21 टक्के आहे, तर त्या एकूण रूग्णांमध्ये भारताचे हे प्रमाण 18.6 टक्के आहे.
📚इतर अनेक देशांच्या तुलनेत भारताचा कोविड मृत्यूदर कमी असून भारताने जागतिक क्रमवारीत आपले स्थान कायम राखले आहे.
📚जागतिक स्तरावर कोविड मृत्यूदर 2.97 टक्के आहे तर भारताची तुलनात्मक आकडेवारी 1.56 टक्के आहे.
📚जगामध्ये सर्वात कमी मृत्यूदर असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे. भारतामध्ये दर दशलक्ष लोकसंख्येमागे 73 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. तर जगामध्ये सरासरी दर दशलक्ष लोकसंख्येमागे 130 जणांचा मृत्यू होत असल्याची नोंद आहे.
📚भारतामध्ये मोठया संख्येने कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असून गेल्या 24 तासांमध्ये 75,628 कोरोना रूग्ण बरे झाले आहेत.
एका दिवसात जास्त संख्येने रूग्ण बरे होत असल्यामुळे राष्ट्रीय स्तरावरचे रूग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. सध्या हा दर 83.84 टक्के आहे.
📚गल्या चोवीस तासांमध्ये बरे झालेल्या कोरोनारूग्णांपैकी 74.36 टक्के रूग्ण 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातले आहेत. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त रूग्ण असून त्या खालोखाल आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यांमधल्या रूग्णांचा समावेश आहे.
📚10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये जवळपास 77 टक्के सक्रिय रूग्ण आहेत. यामध्ये सर्वात जास्त रूग्ण म्हणजे 2.6 लाख रूग्ण महाराष्ट्रात आहेत.
देशामध्ये आज सक्रिय रूग्णांचे प्रमाण 14.60 टक्के आहे.
📚सलग 12 व्या दिवशी भारतामध्ये सक्रिय रूग्णांची संख्या 10 लाखांपेक्षा कमी आहे. देशात आज सक्रिय रूग्णांची संख्या 9,44,996 आहे.
📚गल्या 24 तासांमध्ये देशात 79,476 नव्या रूग्णांची नोंद झाली.
नव्या रूग्णांपैकी 78.2 टक्के रूग्ण 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातले आहेत.
📚महाराष्ट्रामध्ये जवळपास 16,000 नवीन रूग्णांची नोंद झाली. मात्र हे प्रमाण आधीपेक्षा कमी आहे. नवीन रूग्णनोंदीमध्ये केरळ दुस-या स्थानावर असून या राज्यात 9,258 नवीन रूग्ण आढळले. तर तिस-या क्रमांकावर असलेल्या कर्नाटकमध्ये नवीन 8000 कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे.
📚24 तासांमध्ये 1,069 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
गेल्या 24 तासांत मृत्यू पावलेल्यांमध्ये 84.1 टक्के 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातले रूग्ण आहेत.
📚कालचा महाराष्ट्राचा मृत्यूदर 39.66 टक्के आहे. महाराष्ट्रात काल 424 जणांचा मृत्यू झाला, त्याखालोखाल कर्नाटकमध्ये 125 जणांना प्राण गमवावे लागले.
अतिउंचावरील सर्वाधिक लांबीचा बोगदा!
- रोहतंग, हिमाचल प्रदेश मध्ये पंतप्रधान मोदी यांनी ज्या अटल बोगद्याचे उद्घाटन केले, तो समुद्रसपाटीपासून १० हजार फूट उंचीवरचा महामार्गावरील जगातील सर्वात लांब बोगदा आहे.
- मनाली ते लेह हे अंतर त्यामुळे ४६ कि.मी.ने कमी होणार असून प्रवासाचा कालावधी चार ते पाच तासांनी कमी होणार आहे.
- हा बोगदा ९.०२ कि.मी.चा असून तो मनाली ते लाहौल-स्पिती या भागांना जोडतो. आता सर्व हवामानात ही वाहतूक सुरू राहील, एरवी सहा महिने हिमवृष्टीमुळे या भागाचा संपर्क इतर देशापासून तुटत होता.
- पीर पांजाल पर्वतराजीत ३ हजार मीटर म्हणजे १० हजार फूट उंचीवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने त्याची बांधणी केली आहे. दक्षिण पोर्टल मनालीपासून २५ कि.मी अंतरावर व ३०६० मीटर उंचीवर आहे. उत्तर पोर्टल हे लाहौल खोऱ्यात सिसू येथील तेलिंग खेडय़ाजवळ ३०७१ मीटर उंचीवर आहे.
- घोडय़ाच्या नालेसारखा त्यातील मार्गिकांचा आकार असून या प्रकल्पाला ३३०० कोटी रुपये खर्च आला आहे.
- अटलजींच्या मित्राचे स्वप्न पूर्ण
थोलांग, हिमाचल प्रदेश : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे मित्र अर्जुन गोपाल यांनी हिमाचल प्रदेशातील रोहतांग खिंडीतून बोगदा बांधल्यास सोयीचे होईल, अशी सूचना काही वर्षांपूर्वी केली होती.
- गोपाल यांचे पुत्र अमर सिंह (वय ७५) यांनी सांगितले, की आमचे वडील १९९८ मध्ये दिल्लीत वाजपेयी यांना भेटले होते. त्या वेळी त्यांनी रोहतांग खिंडीतून बोगदा केल्यास लाहौल-स्पिती जिल्ह्य़ातील लोकांची सोय होईल अशी कल्पना मांडली.
- त्यानंतर माझे वडील २००८ मध्ये निवर्तले, आता त्यांचे हे स्वप्न पूर्ण झाले असून त्यामुळे माझ्या आनंदाला पारावार उरलेला नाही.
जागतिक डिजिटल स्पर्धात्मक निर्देशांक 2019.
🅾️जारी करणारी संस्था - IMD इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट
🅾️निर्देशांक आवृत्ती - 3 री , 2017 साली सुरुवात
🧩निकष -
1. तंत्रज्ञान विषयक सजगता
2. तंत्रज्ञानविषयक स्पर्धात्मकता
3. तंत्रज्ञानविषयक क्षमता
🧩जगातील प्रथम 5 देश...
1. अमेरिका
2. सिंगापूर
3. स्वीडन
4. डेन्मार्क
5. स्वित्झर्लंड
🧩भारताचा निर्देशांकात क्रमांक...
🅾️ 2018 मध्ये 48 व्या स्थानी
🅾️ 2019 मध्ये 44 व्या स्थानी
(4 स्थानांची प्रगती)
🅾️भारताचा शेजारी चीन - 30 व्या स्थानी (2018 मध्ये 22 व्या स्थानी)
बौद्धिक संपदा निर्देशांक: भारत ४० व्या स्थानी .
🅾️भारत बौद्धिक संपदा निर्देशांकात ४० व्या स्थानी आहे. ५३ अर्थव्यवस्थांमध्ये ४० व्या क्रमांकावर आहे. जागतिक नाविन्य धोरण केंद्र (Global Innovation Policy Centre – GIPC), यूएस चेंबर ऑफ कॉमर्सने याबाबतची निर्देशांक जारी केली.
🅾️GIPC नुसार भारत सर्वात आव्हानात्मक परंतु आश्वासक बाजार, अंमलबजावणी आणि पेटंट पात्रता यांमध्ये मुख्यत्वे अडथळे निर्माण.
🅾️यावर्षी निर्देशांकात भारताची १६.२२ गुणांची नोंद.
🅾️मागील वर्षाच्या अहवालाच्या तुलनेत भारताच्या गुणांमध्ये ७% वाढ.
🅾️सापेक्ष कामगिरीच्या आधारे भारत ४ स्थानांनी मागे.
🅾️भारत गत क्रमवारी आणि आकडेवारी
🅾️२०१९: ३६ व्या क्रमांकावर
🅾️२०१८: ४४ व्या क्रमांकावर
🅾️२०१९ मध्ये कोणत्याही देशासाठी सर्वाधिक कमाई
🧩जग क्रमवारी....
1.अमेरिका
2.यूके
3.स्वीडन
4.फ्रान्स
5.जर्मनी
6.आयर्लंड
🅾️भारतीय पेटंट कायदा, २००५
कायद्यामध्ये बऱ्याच सुधारणा
हेच बौद्धिक संपत्तीच्या क्षेत्रात होणारी विकासाची गती मंदावण्याचे मुख्य कारण मानतात.
🅾️कायद्याच्या प्रमुख दुरुस्तीत कलम(डी) समाविष्ट.
🅾️ततीय पक्षाला परवाना बंधनकारक
विशेषत: सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी नाविन्यपूर्ण औषध बनविण्याचा परवाना देणे अनिवार्य.
महिला, शांतता आणि सुरक्षा निर्देशांक 2019
🅾️22 ऑक्टोंबर २०१९ रोजी जॉर्जटाउन इंस्टीट्यूट फॉर वुमेन, पीस अंड सिक्योरिटी ने द पीस रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ ओस्लो यांच्या सहकार्याने महिला, शांतता आणि सुरक्षा निर्देशांक प्रसिद्ध केला.
🅾️ या निर्देशांकात १६७ देशांचा समावेश केला आहे
🅾️ हा निर्देशांक खालील तीन घटकावर आधारीत आहे.
१.समावेश - आर्थिक, सामाजिक आणि राजकीय.
२. न्याय - औपचारिक कायदा आणि अनौपचारिक भेदभाव
३.सुरक्षा - वैयक्तिक समुदाय आणि सामाजिक स्तर
🅾️ या निर्देशांकात नॉर्वेने प्रथम स्थान मिळविले. त्यानंतर स्वित्झर्लंड दुसर्यान, फिनलँड आणि डेन्मार्क संयुक्तपणे तिसर्या स्थानावर आहे.
🅾️या निर्देशांकातील सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या देशांमध्ये येमेन (१६७) अफगाणिस्तान (१६६) आणि सिरिया (१६५) असा क्रम लागतो.
🅾️ या निर्देशांकात गिनिया आणि मोरोक्कोसह भारत संयुक्तपणे १३३ व्या क्रमांकावर आहे.
🅾️भारताच्या शेजार्यांामध्ये नेपाळ ८४, चीन ७६, भूतान १११,बांगलादेश १२२ आणि पाकिस्तानचा १४४ वा क्रमांक लागतो.
04 October 2020
दाजीपूर अभयारण्य
दाजीपूर एक छोटस, इवलस नाव परंतु या दाजीपूरात रम्य, दाट कीर्द झाङी, वृक्ष-वल्ली, शेकडो नमुन्याचे प्राणी आणि पक्षी पाहिले कि, या आरण्यात नित्य व्यवहारातील सर्व औपचारीक दैनंदिन व्यवहार विसरून निसर्गाच्या कुशीत लपलेला एका छोट्या मुलासारखी माया मिळते.हे या गावाचे वैशिष्ट.
कोल्हापूर नगरीच्या राधानगरी तालुक्यातील हे रम्य गाव. अगदी २ ते ३शे. लोकवस्तीचे हे स्थान कोल्हापूर सावंतवाडीच्या हमरस्त्यावर एकाकी झालेल हे गांव गेल्या कांही दिवसापासुन पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. गेल्या कित्येक वर्षात गवारेडा हा हुम दांडग्या परंतु वैशिष्ट्यपुर्ण जनावरासाठी या अरण्याची महाराष्ट्रात ख्याती आहे.
या अरण्यात गव्यांचा कळपच्या कळप आढळतो त्याचबरोबर हरिण,सांबर,चितळ यांचे कळप ही दिसतील,कधी कधी लाल मातीत बिबळ्या वाघाचे चाललेले ठसे दिसतील.
जंगलात साळींदर,अस्वले,साप,नाग यांची ही रेलचेल सुरूच असते.महाराष्ट्र राज्याच्या जंगल खात्याने याक़डे खास लक्ष देऊन या अभयारण्याची चांगली जोपासना केली आहे.त्याबरोबर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने दाजीपुरचे पर्यटन विकास केंद्र म्हणुन लक्ष केंद्रीत केले आहे.येथील युवक गृहाचे जंगल निवास म्हणुन रूपांतर केले आहे.पर्यटकांसाठी तंबु निवास सुविधा केली आहे.भोजन उपहार गृहे याचीही स्वंतंत्र व्यवस्था आहे.
राज्य परिवहन मंडळाच्या थेट गाड्या कोल्हापूर ते दाजीपूर येथे पर्यंत जातात.तर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने ही स्वंतंत्र खास गाड्यांची व्यवस्था केली आहे.
राधानगरी जलाशयाचा नैसर्गिक उपयोग करून अद्यावत असे विश्रामगृह उभारण्याचे काम सुरू केले आहे. या परिसरात सिंधुदुर्ग जिल्हा गगनगिरी महाराज मठ याचा भाग असुन ३७२ स्क्वेअर मिटरचा हा परिसर पर्यटकांचे खास आकर्षण ठरला आहे.
नाशिक प्रशासकीय विभागाबद्दल संपूर्ण माहिती
1. नाशिक जिल्हा
जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - नाशिक
क्षेत्रफळ - 15,530 चौ.कि.मी.
लोकसंख्या - 61,09,052 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
तालुके - 15 - नसहिक, बागलाण (सटाणा), मालेगांव, सुरगणा, पेठ, कळवण, दिंडोरी, चांदवड, नांदगांव, निफाड, येवले, इगतपुरी, सिन्नर, त्रंबकेश्वर, देवळा.
सीमा - उत्तरेस घुळे जिल्हा, पूर्वेस जळगांव जिल्हा, पश्चिमेस ठाणे जिल्हा, दक्षिणेस अहमदनगर जिल्हा असून आग्नेयेस औरंगाबाद जिल्हा, ईशान्येस धुळे जिल्हा, वायव्येस गुजरात राज्यातील डांग व सूरत हे दोन जिल्हे.
जिल्हा विशेष -
हा जिल्हा महाराष्ट्रातील पाच व गुजरातमधील दोन जिल्हयांनी वेढला आहे. निफाड व लासलगाव परिसर कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध. द्राक्षांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. देशातील पहिले मातीचे धरण नाशिक जिल्हातील गंगापूर येथे गोदावरी नदीवर बांधण्यात आले आहे.
नाशिक शहर हे तापी व गोदावरी या नधांच्या खोर्यात वसलेल्या दख्खन पठाराचा भू-भाग आहे. गोदावरी काठी वसलेले हे शहर एक तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. येथे दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो.
प्रमुख स्थळे
नाशिक - येथेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह 2 मार्च 1930 ला केला. नाशिक (ओझर) येथे मिग विमानाचा कारखाना व सिक्युरिटी प्रेस आहे.
महाराष्ट्र राज्य पोलिस अकॅडमी ही संस्था नाशिक येथे आहे.
त्र्यंबकेश्वर - बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक गणले जाणारे त्र्यंबकेश्वर हे स्थळ नाशिक जिल्ह्यातच आहे.
मालेगाव - पेशव्याचे सरदार नारोशंकर यांनी बांधलेला भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहे.
येवले - तात्या टोपे यांचे जन्मगाव आहे. डॉ. आंबेडकरांनी येथेच आपला धर्मांतराचा निर्णय जाहीर केला होता.
सापुतरा - निसर्गरम्य स्थळ व थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे.
भगूर - स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान.
नांदूर - मध्यमेश्वर - भरतपुर नावाचे अभयारण्य येथेच आहे.
भोजापूर - खडकात कोरलेले खंडोबाचे मंदिर.
देवळाली - सैन्याचे प्रशिक्षण केंद्र, थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध.
गंगापूर - गोवर्धन म्हणून सातवाहन शिलालेखात उल्लेखलेले हे ठिकाण.
सप्तश्रुंगी - साडेतीन पीठापैकी एक पीठ. मोठ्या संख्येने येथे लोक दर्शनाले येतात.
सिन्नर - यादव साम्राज्याची सुरुवातीची राजधानी व 9 व्या शतकातील व 12 व्या शतकातील मंदिरासाठी प्रसिद्ध.
दिंडोरी - शिवाजी व मोगल यांच्यात झालेल्या युद्धासाठी प्रसिद्ध.
निलगिरीपासून कागदनिर्मिती - इगतपुरी (नाशिक)
महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (MERI)- नाशिक
महाराष्ट्र राज्य पोलीस अकादमी - नाशिक
चलनी नोटा, पोस्ट कार्ड व तिकिटे छापण्याचा कारखाना - नाशिक
नाशिक प्रशासकीय विभागास उत्तर महाराष्ट्र म्हंटले जाते.
नाशिक जिल्ह्यात सातमाळा म्हणून ओळखल्या जाणार्या डोंगररांगांनाच औरंगाबाद जिल्ह्यात अजिंठ्याच्या डोंगररांगा असे म्हटले जाते.
नाशिक जिल्ह्यात वाहणार्या सर्व नधा नाशिक जिल्ह्यातच उगम पावतात. एकही नदी दुसर्या जिल्ह्यातून प्रवेश नाही. हे आगळे वैशिष्ट्य आहे.
भारातातील पहिले मातीचे धरण गोदावरी नदीवर नाशिक जिल्ह्यात गंगापूर येथे बांधण्यात आले आहे.
2. धुळे जिल्हा
जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - धुळे
क्षेत्रफळ - 8,063 चौ.कि.मी.
लोकसंख्या - 20,48,781 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
तालुके - 4 - शिंदखेड, साक्री, धुळे, शिरपूर.
सीमा - उत्तरेस नंदुरबार जिल्हा व मध्य प्रदेशचा मेवाड जिल्हा, पूर्वेस जळगाव जिल्हा, पश्चिमेस नंदुरबार जिल्हा व गुजरात राज्य, दक्षिणेस नाशिक जिल्हा आहे.
जिल्हा विशेष -
पूर्वी जळगाव आणि धुळे मिळून खानदेश हा एक जिल्हा होता. या जिल्ह्याचे मुख्यालय धुळे येथे होते. पुढे 1961 ला पश्चिम खानदेशाला धुळे जिल्हा असे नाव देण्यात आले.
प्रमुख स्थळे
धुळे - नकाणे तलाव व डेडरगाव तलाव ही सहलीची केंद्रे आहेत.
शिरपूर - धुळे जिल्ह्यातील शेतीमालाची मोठी बाजारपेठ. शिरपूरमधील बालाजी मंदिर प्रेक्षणीय आहे.
दोंडाईचे - मिरचीच्या व्यापारासाठी दोंडाईचे विशेष महत्वाचे आहे. येथे स्टार्चचा कारखाना आहे.
3. नंदुरबार जिल्हा
जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - नंदुरबार
क्षेत्रफळ - 5,034 चौ.कि.मी.
लोकसंख्या - 16,46,171 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
तालुके - 6 - नंदुरबार, अक्कलकुवा, तळोदे, नवापुर, शहादे, धडगांव (अक्राणी).
सीमा - उत्तरेस गुजरात व मध्य प्रदेश, पूर्वेस धुळे जिल्हा व मध्य प्रदेश, पश्चिमेस गुजरात राज्य, दक्षिणेस धुळे जिल्हा आहे.
जिल्हा विशेष -
धुळे जिल्ह्याचे विभाजन करून 1 जुलै 1998 ला नंदुरबार या नव्या जिल्ह्याची निर्मिती झाली. या जिल्ह्यात आदिवासीचे प्रमाण जास्त असल्यामुळे या जिल्ह्यास आदिवासी जिल्हा म्हणून ओळखतात.
सातपुडा पर्वतरांगामुळे हा जिल्हा गुजरात व मध्यप्रदेशापासून वेगळा झाला.
या जिल्ह्यात भिल ही आदिवासी जमात केंद्रीय झाली आहे. एकूण लोकसंख्येशी असलेले आदिवासींचे प्रमाण लक्षात घेता नंदुरबार जिल्ह्याचा आदिवासींच्या संदर्भात राज्यात प्रथम क्रमांक लागतो.
प्रमुख स्थळे
नंदुरबार - येथे 1942 च्या स्वातंत्र्य आंदोलनात छातीवर गोळ्या झेलणार्या बालक्रांतिकारक शिरीषकुमारचे स्मारक आहे.
प्रकाशे - येथील केदारेश्वर व संगमेश्वर मंदिरे प्रसिद्ध आहेत. यालाच दक्षिण काशी म्हणतात.
धडगाव - हे अक्राणी तालुक्याचे मुख्य ठिकाण असून तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे.
तोरणमाळ - प्राचीन मांडू घराण्याची राजधानी. निसर्गरम्य ठिकाण.
भारतामध्ये पहिल्यांदाच फेब्रुवारी 2006 मध्ये नंदुरबार जिल्ह्यातील नवापुर तालुक्यात बर्ड फ्ल्यू या विषाणूजन्य (एच-5, एन-1) आजाराची कोंबड्यांना लागण झाली.
नंदुरबार जिल्ह्याच्या निर्मिती आधी धुळे जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जात होता. परंतु आता आदिवासींची 60 टक्के लोकसंख्या असलेला नंदुरबार जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो.
तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण नंदुरबार जिल्ह्यात आहे.
महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणजे नंदुरबार होय.
धुळे जिल्ह्याचे विभाजन करून नंदुरबार हा जिल्हा अस्तित्वात आला आहे.
महाराष्ट्रातील सोने शुद्धीकरण कारखाना शिरपूर (धुळे)
4. जळगाव जिल्हा
जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - जळगाव
क्षेत्रफळ - 11,765 चौ.कि.मी
लोकसंख्या - 42,24,442 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
तालुके - 15 - चोपडा, यावल, अमळनेर, एरंडोल, रावेर, पाचोरा, जळगांव, भुसावळ, मुक्ताईनगर (एदलाबाद), पारोळा, भडगांव, जामनेर, चाळीसगांव, धरणगांव, बोदवड.
सीमा - उत्तरेस मध्य प्रदेश, पूर्वेस बुलढाणा जिल्हा व मध्य प्रदेश, पश्चिमेस धुळे जिल्हा, दक्षिणेस औरंगाबाद जिल्हा असून नैऋत्येस नाशिक जिल्हा आहे.
जिल्हा विशेष -
पूर्वी खानदेश नावाने ओळखल्या जाणार्या प्रदेशाचे पूर्व खानदेश व पश्चिम खानदेश असे दोन भाग करण्यात आले होते. त्यापैकी पूर्व खानदेश भागाला आज जळगाव जिल्हा म्हणून संबोधले जाते. जळगावला केळीचे कोठार, अजिंठ्याचे प्रवेश व्दार म्हणून ओळखले जाते.
प्रमुख स्थळे -
जळगांव - या शहरास अजिंठ्याचे प्रवेशव्दार म्हणून ओळखले जाते.
अंमळनेर - साने गुरुजींनी येथे शिक्षणप्रसार व समाजसेवेचे कार्य केले आहे.
भुसावळ - महत्वाचे रेल्वे जंक्शन आणि जवळच पोकरी येथे औष्णिक विधुत केंद्र आहे.
चाळीसगांव - प्राचीन भारतीय गणिती भास्कराचार्य यांनी आपला लीलावती हा ग्रंथ याच गावी लिहिला असे म्हटले जाते.
जामनेर - येथे वनस्पती तुपाचा व खताचा कारखाना आहे.
चांगदेव - येथे तापी व पूर्णा या दोन नधांचा संगम आहे.
पाल - सातपुडा पर्वतरांगेतील थंड हवेचे ठिकाण व वंनोध्यान पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले आहे.
कोथमी हे धार्मिक स्थळ जळगाव जिल्ह्यात आहे.
उत्तर महाराष्ट्र विधापीठ जळगाव येथे आहे.
पोकरी दीपनगर औष्णिक वीज केंद्र जळगाव या जिल्हयात आहे.
महाराष्ट्रातील केळीच्या बागा जळगाव जिल्ह्यात आहेत.
पाटणादेवी वंनोधान जळगाव जिल्हयात आहे.
जळगाव जिल्ह्यामध्ये केली संशोधन केंद्र यावल येथे आहे.
यावल अभयारण्य जळगाव जिल्ह्यात आहे.
चांगदेवगाव हे धार्मिक स्थळ जळगाव जिल्ह्यात आहे.
5. अहमदनगर जिल्हा
जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - अहमदनगर
क्षेत्रफळ - 17,048 चौ.कि.मी.
लोकसंख्या - 45,43,083 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
तालुके - 14 - कोपरगाव, आकोले, संगमनेर, श्रीगोंदे, श्रीरामपूर, राहुरी, अहमदनगर, शेवगाव, पारनेर, नेवासे, पाथर्डी, कर्जत, जामखेड (महाल), राहता.
सीमा - उत्तरेस नाशिक व औरंगाबाद जिल्हा, पूर्वेस बीड व उस्मानाबाद जिल्हा, पश्चिमेस पुणे व ठाणे जिल्हा, दक्षिणेस सोलापूर जिल्हा आहे.
जिल्हा विशेष -
अहमदनगर हे शहर सन 1418 मध्ये मलिक अहंमद यांनी बसविले. मलिक हमदच्या नावावरून ते अहमदनगर म्हणून ओळखले जावू लागले. हे निजामशाही राजधानीचे शहर म्हणून ओळखतात.
शहराच्या चारही बाजूंनी खंदक असलेला भुईकोटा किल्ला इतिहासात प्रसिद्ध आहे. याच किल्ल्यात कैदेत असताना पंडित नेहरू यांनी'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' हा ग्रंथ लिहिला.
साखर कारखान्यांचा जिल्हा, खर्डे येथील भुईकोट किल्ला मराठ्यांच्या शेवटच्या विजयाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध. जामखेड तालुक्यातील चोंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म.
या जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे मोसंबी फळाचे संशोधन केंद्र आहे.
प्रमुख स्थळे
अहमदनगर - शहरातील भुईकोट किल्ला व चांदबिबीचा महाल ही ऐतिहासीक स्थळे प्रसिद्ध आहेत. येथे लष्कराचा वाहन संशोधन व विकास विभाग आहे. सैन्याचे रणगाडा प्रशिक्षण केंद्र येथे आहे.
अकोले - येथील अगस्तिऋषींचा आश्रम प्रसिद्ध आहे.
प्रवरानगर - देशातील पहिला सहकारी साखर कारखाना येथेच उभा राहिला.
नेवासे - येथेच संत ज्ञांनेश्वरांनी 'ज्ञानेश्वरी' सांगितली.
राहुरी - महात्मा फुले कृषी विधापीठ याच ठिकाणी आहे.
शनि-शिंगणापुर - शनि-शिंगणापुर हे नेवासे तालुक्यात आहे. येथील शनिमंदिर प्रसिद्ध आहे. या गावातील कोणत्याही घराला दरवाजे-कडया नाहीत हे आगळे-वगळे वैशिष्ट्य होय.
राळेगण सिद्धी - थोर समाजसेवक अण्णा हजारे यांच्या परिश्रमातून या खेड्याचा कायापलट झाला. संपूर्ण व्यसनमुक्त असलेले हे गाव सामाजिक वनीकरण, कुटुंब कल्याण व शिक्षणक्षेत्रात आघाडीवर आहे.
शिर्डी - साईभक्ताचे श्रद्धास्थान
सिद्धटेक - येथील गणपतीस श्रीसिद्धीविनायक म्हणून संबोधले जाते.
भंडारदारा - अकोले तालुक्यात प्रवारा नदीवर 'भंडारदरा' हे धरण बांधण्यात आले आहे. निसर्गरम्य परिसरामुळे हे थंड हवेचे ठिकाण पर्यटकांचे आकर्षणस्थळ बनले आहे.
महाराष्ट्र जिल्हे निर्मिती
1⃣1 मे 1981 : रत्नागिरीपासून – सिंधुदुर्ग (27 वा जिल्हा)
औरंगाबादपासून – जालना (28 वा जिल्हा)
2⃣16 ऑगस्ट 1982 : उस्मानाबादपासून– लातूर (29 वा जिल्हा)
3⃣26 ऑगस्ट 1982 : चंद्रपूरपासून – गडचिरोली (30 वा जिल्हा)
4⃣1990 :मुंबईपासून – मुंबई उपनगर (31 वा जिल्हा)
5⃣1 जुलै 1998 : धुळेपासून – नंदुरबार (32 वा जिल्हा)
अकोल्यापासून – वाशिम (33 वा जिल्हा)
6⃣1 मे 1999 : परभणीपासून – हिंगोली (34 वा जिल्हा)
भंडार्यापासून – गोंदिया (35 वा जिल्हा)
7⃣1ऑगस्ट 2014 : ठाण्यापासुन -पालघर (36वा जिल्ह्या)
कसे चालतात ‘राधानगरी’चे स्वयंचलित दरवाजे?
देशातील एकमेव स्वयंचलित दरवाजे राधानगरी धरणाला आहेत. स्थापत्य शास्त्राचा अद्भूत नमुना म्हणून ओळखले जाणारे सात स्वयंचलित दरवाजे तब्बल चौसष्ट वर्षांनंतरही धरणातील पाण्याचा सुरक्षितपणे विसर्ग करत आहेत. कोणत्याही यांत्रिक ऊर्जेशिवाय हे दरवाजे चालतात कसे? याबाबत उत्सुकता ताणली असून या दरवाजांमुळे जुनं ते सोनं ही म्हण खरी ठरली आहे. जल विसर्गाबरोबर कमालीचे सौंदर्यही या दरवाजांमुळे धरणाला प्राप्त झाले आहे.
राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीने साकारलेले राधानगरी धरण स्थापत्य शास्त्राचा अद्भूत नमुनाच आहे. जगप्रसिद्ध स्थापत्य शास्त्रज्ञ डॉ. एम. विश्वेश्वरय्या यांनी या धरणाचा स्थापत्य आराखडा तयार केला आहे. हे दरवाजे देशात एकमेव आहेत. त्यामुळे तो ऐतिहासिक ठेवा आहे. प्रत्येकी 14.48 बाय 1.48 मीटर्स आकाराच्या या सात दरवाजातून प्रतिसेकंद दहा हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होतो. या दरवाजांसाठी कोणत्याही प्रकारची यांत्रिक ऊर्जा वापरली जात नाही. या प्रत्येक दरवाजाच्या आतील बाजूला प्रत्येकी 35 टन वजनाचे सिमेंट काँक्रीटचे ब्लॉक्स बसवले आहेत. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर अतिरिक्त होणार्या पाण्याच्या दाब लोखंडी दरवाजावर पडताच ब्लॉक्स वर उचलले जातात व स्वयंचलित दरवाजातून पाणी बाहेर फेकले जाते. या ब्लॉक्सवरील दाब 35 टनापेक्षा खाली आला असता ब्लॉक खाली बसतात. त्यामुळे पाण्याचा विसर्ग थांबतो. धरणात क्षमतेपेक्षा जादा होणार्या पाण्याचा विसर्ग या सात दरवाजातून होत असल्याने ‘धरणाचा राखणदार’ म्हणूनच हे दरवाजे ओळखले जात.
1952 साली धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाल्यानंतर या दरवाजांची रचना केली आहे. म्हणजे या दरवाजांना चौसष्ट वर्षे पूर्ण झाली आहेत. आज चौसष्ट वर्षानंतरही हे दरवाजे पूर्णक्षमतेने कार्यरत आहेत. त्यासाठी वापरलेले लोखंडी साहित्य उच्चत्तम दर्जाचे असल्यामुळेच हे दरवाजे आजही सक्षम आहेत. या दरवाजांचा देखभाल दुरुस्तीचा खर्चही नाममात्र आहे. दरवर्षी केवळ ग्रिसिंग ओव्हर ऑईलिंग केले जाते. एखादेवेळी सिमेंट काँक्रीटच्या ब्लॉकची झीज झाली तर त्याची डागडुजी केली जाते. मध्यंतरी हे दरवाजे काढून त्याजागी वक्राकार दरवाजे बसवण्याचा प्रस्ताव आला होता. मात्र, शाहूप्रेमी जनतेने हा ऐतिहासिक ठेवा काढल्यास तीव्र विरोध केल्याने हा प्रस्ताव बारगळला आहे. हे दरवाजे कायम ठेवून धरणाच्या उत्तरेकडील टेकडीजवळ नवीन वक्राकार दरवाजे बसवण्याचा प्रस्ताव विचाराधिन आहे. सात स्वयंचलित दरवाजातून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग होऊन धरणाच्या मुख्य भिंतीवरील पाण्याचा दाब कमी होतो. त्यामुळे धरण सुरक्षित राहते. धरणाचा हा राखणदार चौसष्ट वर्षांनंतरही सुस्थितीत आहे. त्यामुळे जुनं ते सोनं ही म्हण या दरवाजांना चपखलपणे लागू होते.
गाल्फ प्रवाह
काय आहे गल्फा प्रवाह
📌उत्तर अटलांटिक महासागरातील जगप्रसिद्ध उबदार सागरी प्रवाह. १४९२ मध्ये कोलंबसच्या व १५१३ मध्ये पॉन्से द लेऑन या स्पॅनिश नाविकाच्या लक्षात तो आला होता. तो मेक्सिकोच्या आखातातून येतो, या समजुतीमुळे बेंजामिन फ्रँक्लिनने त्याला गल्फ स्ट्रीम हे नाव दिले.*
📌परंतु फ्लॉरिडाच्या सामुद्रधुनीपासून न्यू फाउंडलंडच्या आग्नेयीकडील ग्रँड बँक्सपर्यंत त्याची खास वैशिष्ट्ये दिसून येत असल्यामुळे, एवढ्या भागातच त्याचे हे नाव योग्य आहे. फ्लॉरिडा सामुद्रधुनीपासून नॉर्वेजियन समुद्रापर्यंतच्या प्रवाहास हे नाव अजूनही दिले जाते.
दक्षिण अमेरिकेच्या सेंट रॉक भूशिराजवळ दक्षिण विषुववृत्तीय प्रवाहाच्या दोन शाखा होतात.
📌तयांपैकी उत्तरेकडील शाखा दक्षिण व मध्य अमेरिकेच्या किनाऱ्याकिनाऱ्याने कॅरिबियन समुद्रात आल्यावर तिला उत्तर विषुववृत्तीय प्रवाहाची वेस्ट इंडीजच्या दक्षिणेकडील शाखा मिळते. मग तो प्रवाह मेक्सिकोच्या आखातात जाऊन तेथून फ्लॉरिडाच्या सामुद्रधुनीतून बाहेर पडतो.
📌तयाला उत्तर विषुववृत्तीय प्रवाहाची अँटिलीस प्रवाह ही शाखा मिळते व मग खरा गल्फ प्रवाह सुरू होतो. येथे त्याचे तापमान २०० से. ते २४०से.; रुंदी सु.१०० किमी.; खोली. सु. ८०० मी.; वेग ताशी ६·५ किमी.; क्षारता उच्च व रंग गर्द निळा असून तो दर सेकंदास २·६ कोटी घ. मी. पाणी वाहून नेतो
पृथ्वीच्या परिवलनामुळे मिळणाऱ्या कोरिऑलिस प्रेरणेमुळे तो उजवीकडे वळू लागतो
📌अमेरिकेच्या आग्नेय किनाऱ्याला समांतर मार्गाने हॅटरस भूशिरापर्यंत गेल्यावर तो अधिक रूंद व संथ होतो, त्यात लहान लहान भोवरे दिसतात, खोली ४ ते ५ हजार मी. होते व तो सेंकदाला ८·२ कोटी घ.मी.पाणी वाहून नेतो. ग्रँड बँक्सकडे गेल्यावर त्याला लॅब्रॅडॉर हा थंड प्रवाह मिळतो. त्याचे काही फाटे गल्फ प्रवाह व किनारा यांच्या दरम्यान शिरतात आणि गल्फ प्रवाह कोरिऑलिस प्रेरणेमुळे किनार्यापासून दूर गेल्यामुळे तळाचे थंड पाणी वर येते. यामुळे किनारा व गल्फ प्रवाह यांच्यामध्ये थंड पाण्याची एक भिंतच उभी राहते.
📌गल्फ प्रवाहाच्या उजवीकडे न दक्षिणेस सारगॅसो समुद्राचे पाणीही उच्च क्षारतेचे व उबदार असते.
गल्फ प्रवाहात व उत्तर अटलांटिक प्रवाहचक्राच्या मध्यभागीच्या सारगॅसो समुद्रात सारगॅसो या विशिष्ट सागरी वनस्पतीची चकंदळे तरंगत असतात.
*📌गल्फ प्रवाहाच्या उजव्या बाजूच्या पाण्याची पातळी डावीकडील पातळीपेक्षा सु. ८० सेंमी. उंच असते. ग्रँड बँक्सजवळ उष्ण प्रवाहावरील आर्द्र हवा, थंड प्रवाहावरील थंड हवेत मिसळून बाष्पांचे सांद्रीभवन होते व दाट धुके पडते.*
📌 त तेथील मासेमारी नौकांस धोक्याचे असते. सु. ४०० उ. अक्षांश व ५०० प. रेखांश येथे गल्फ प्रवाह कोरिऑलिस प्रेरणेमुळे ईशान्येकडे जाऊन पश्चिमी वाऱ्यांमुळे वाहणाऱ्याउत्तर अटलांटिक प्रवाहात मिसळून जातो.
पुढे हा प्रवाह यूरोपच्या पश्चिम किनार्यापर्यंत गेल्यावर त्याच्या दोन शाखा होतात.
📌 दक्षिणेकडील शाखा आयबेरियन द्विपकल्प, वायव्य आफ्रिका यांच्याजवळून थंड कानेरी प्रवाह म्हणून उत्तर विषुववृत्तीय प्रवाहाला मिळते.
उत्तरेकडील शाखा ब्रिटिश बेटे व नॉर्वे यांच्या किनाऱ्यांजवळून जाऊन पुढे आर्क्टिक महासागरात नाहीशी होते. तिचे तपमान अझोर्सच्या उत्तरेस १५·५० से. होते.
📌या प्रवाहामुळे कॅनडाचे हॅलिफॅक्स, रशियाचे मुरमान्स्क व ब्रिटिश बेटे आणि नॉर्वे यांची बंदरे हिवाळ्यात न गोठता खुली राहतात. गल्फ प्रवाहामुळे पश्चिम व वायव्य युरोपचे हवामान अधिक उबदार होते, असे समजले जाते.
📌तथापि हा परिणाम प्रवाहापेक्षा त्याने वेढलेल्या उबदार जलसंचयाचा आहे असे आता दिसून आले आहे; किंबहूना प्रवाह जेव्हा अधिक पाणी वाहून नेत असतो, तेव्हा यूरोपात तपमान थोडे कमीच होते असे आढळले आहे.
अमेरिकेहून यूरोपकडे जाणाऱ्या नौकांस गल्फ प्रवाहाचा फायदा मिळून वेळ व जळण यांची बचत होते. परंतु उलट बाजूने येणाऱ्या नौका मात्र हा प्रवाह टाळतात.
📌गल्फ प्रवाह, त्याच्या समुद्रपृष्ठावरील व खोल पाण्यातील लहानमोठ्या शाखा, खालून वाहणारा प्रतिप्रवाह, सागरतळावरील निक्षेपांवर होणारा परिणाम इत्यादींचे संशोधन आधुनिक पद्धतींनी चालूच आहे.
भारतातील महत्वाची सरोवरे
१) वूलर सरोवर = जम्मू - काश्मीर = भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर
२) दाल सरोवर = जम्मू - काश्मीर = श्रीनगर शहर या सरोवराच्या काठावर वसलेले आहे.
३) चिल्का सरोवर = ओडिशा = भारतातील सर्वात मोठे खा-या पाण्याचे सरोवर
४) लोणार सरोवर = महाराष्ट्र = उल्कापातामुळे निर्माण झालेले जगातील एकमेव सरोवर
५) हुसेनसागर सरोवर = आंध्रप्रदेश = गौतम बुद्धाचा सर्वात मोठा पुतळा हुसेनसागर येथे आहे.
६) सांबर सरोवर = राजस्थान = भारतातील सर्वाधिक खा-या पाण्याचे सरोवर
महाराष्ट्रातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग
🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.३.
🚍 मबई 〰️ आग्रा.
🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.४.
🚍 मबई 〰️ चन्नई.
🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ब.
🚍 नहावासेवा 〰️ पळस्पे.
🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.६.
🚍 धळे 〰️ कोलकत्ता.
🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.७.
🚍 वाराणसी 〰️ कन्याकुमारी.
🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.८.
🚍 मबई 〰️ दिल्ली .
🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.९.
🚍 पणे 〰️ विजयवाडा.
🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.१३.
🚍 सोलापूर 〰️चित्रदुर्ग.
🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.१६.
🚍 निझामाबाद〰️ जगदाळपूर.
🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.१७.
🚍 पणवेल 〰️ मगळूर.
🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.५०.
🚍 पणे 〰️ नाशिक .
भारतीय रेल्वे विभाग :
*विभाग - केंद्र - स्थापना*
1) मध्य विभाग - मुंबई - सन 1951
2) पश्चिम विभाग - मुंबई - सन 1951
3) उत्तर विभाग - दिल्ली - सन 1952
4) दक्षिण विभाग - चेन्नई - सन 1951
5) पूर्व विभाग - कलकत्ता - सन 1955
6) दक्षिण पूर्व विभाग - कलकत्ता - सन 1955
7) दक्षिण-मध्य - सिकंदराबाद - सन 1966
8) उत्तर पूर्व विभाग - गोरखपूर - सन 1952
9) सरहद्द रेल्वे - गोहाटी - सन 1958
10) पूर्व किनारपट्टीय विभाग - भुवनेश्वर - सन 1996
11) उत्तर मध्य विभाग - अलाहाबाद - सन 1996
12) पूर्व मध्य विभाग - हाजीपूर - सन 1996
13) उत्तर पश्चिम विभाग - जयपूर - सन 1996
14) पश्चिम मध्य विभाग - जबलपूर - सन 1996
15) दक्षिण पश्चिम विभाग - बंगलोर - सन 1996
16) दक्षिण-पूर्व-मध्य विभाग - बिलासपुर - सन 1998
17) कलकत्ता मेट्रो - कलकत्ता - सन 2010
समानार्थी शब्द
एकता - ऐक्य, एकी, एकजूट, एकमेळ
ऐश्वर्य - सता, संपत्ती, वैभव, सामर्थ्य
ओज - तेज, पाणी, बळ
ओढ - कल, ताण, आकर्षण
ओवळा - अपवित्र, अमंगल, अशुद्ध
ओळख - माहिती, जामीन, परिचय
कच्छ - कासव, कूर्म, कमट, कच्छप
कळकळ - चिंता, काळजी, फिकीर,
आस्था
श्रीकृष्ण - वासुदेव, कन्हैया, केशव,
माधव
कपाळ - ललाट, भाल, निढळ
कमळ - पदम, अंबुज, पंकज, सरोज, नीरज
कृपण - चिकू, कंजूष, खंक, हिमटा, अनुदार
काक - कावळा, वायस, एकाक्ष
किरण - रश्मी, कर, अंशू
काळोख - तिमिर, अंधार, तम
कलंक - बट्टा, दोष, डाग, काळिमा
करुणा - दया, माया, कणव, कृपा कसब - कौशल्य, प्राविण्य, नैपुण्य, खुबी
कर्तबगार - कार्यक्षम, दक्ष, कुशल, निपुण
कुरूप - विद्रूप, बेढब, विरूप
कोमल - मृदु, हळवा, मऊ, नाजुक
खग - शकुंत, पक्षी, व्दिज, अंडज,
पाखरू
खजिना - द्रव्य, कोष, भांडार, तिजोरी
खच - गर्दी, दाटी, रास खट्याळ - खोडकर, व्दाड,
03 October 2020
डली का डोज
1.भारतीय रिजर्व बैंक (RBI) ने पीएमसी बैंक पर प्रतिबंध कितने दिनों के लिए बढ़ा दिया है?
a. 6 माह✔️
b. 10 माह
c. 11 माह
d. 8 माह
2.अंतरराष्ट्रीय योग दिवस निम्न में से किस दिन मनाया जाता है?
a. 10 जून
b. 15 मार्च
c. 21 जून ✔️
d. 12 अप्रैल
3.रणजी क्रिकेट में सबसे ज्यादा विकेट लेने वाले किस स्पिनर का हाल ही में निधन हो गया?
a. राजिंदर गोयल✔️
b. बिशन सिंह बेदी
c. अनिल कुंबले
d. चेतन शर्मा
4.पूर्व आरबीआई गवर्नर उर्जित पटेल को हाल ही में किसका चेयरमैन नियुक्त किया गया है?
a. NCAER
b. NIPFP✔️
c. ICRIER
d. ADB
5.हाल ही में उत्तराखंड के किस प्रसिद्ध लोकगायक और संगीतकार का 94 वर्ष की उम्र में निधन हो गया है?
a. जीत सिंह नेगी✔️
b. अमित नेगी
c. नरेन्द्र दत्त नेगी
d. प्रकाश नेगी
6.भारत और किस देश की सरकार ने भारत में कोरोना संकट से निपटने और कमजोर वर्ग के लोगों की सहायता और स्वास्थ्य सेवाओं को बढ़ाने हेतु 200 लाख यूरो का करार किया है?
a. नेपाल
b. चीन
c. पाकिस्तान
d. फ्रांस✔️
7.विश्व शरणार्थी दिवस निम्न में से किस दिन मनाया जाता है?
a. 20 जून✔️
b. 10 मार्च
c. 12 अप्रैल
d. 15 जून
8.किस राज्य के सहारनपुर में 50 लाख साल पुराना स्टेगोडॉन प्रजाति के हाथी का जीवाश्म मिला है?
a. बिहार
b. उत्तर प्रदेश✔️
c. झारखंड
d. पंजाब
9.हाल ही में दक्षिण एशिया में आर्थिक कूटनीतिक संबंधों के चलते चीन द्वारा किस देश से चीन में निर्यात होने वाले सामान पर 97 प्रतिशत टैरिफ छूट देने की घोषणा की गई है?
a. भारत
b. अमेरिका
c. नेपाल
d. बांग्लादेश✔️
10.कोरोना वायरस (COVID-19) के मद्देनज़र वर्ष 2021 में आयोजित होने वाले 93वें अकादमी पुरस्कारों अथवा ऑस्कर (Oscars) को कितने माह के लिये स्थगित कर दिया गया है?
a. सात माह
b. दस माह
c. दो माह✔️
d. आठ माह
डली ला डोज
1.वार्षिक विश्व प्रतिस्पर्धात्मकता सूचकांक (डब्ल्यूसीआई) रैंकिंग में भारत को निम्न में से कौन सा स्थान प्राप्त हुआ है?
a. 53
b. 25
c. 43✔️
d. 33
2.संयुक्त राष्ट्र व्यापार और विकास सम्मेलन (यूएनसीटीएडी) की वर्ल्ड इन्वेस्टमेंट रिपोर्ट 2020 के मुताबिक वर्ष 2019 में FDI को लुभाने के मामले में भारत निम्न में से किस स्थान पर रहा?
a. नौवें✔️
b. चौथे
c. पांचवें
d. सातवें
3.विश्व मरुस्थलीकरण और सूखा रोकथाम दिवस निम्न में से किस दिन मनाया जाता है?
a. 10 जनवरी
b. 15 मार्च
c. 20 अप्रैल
d. 17 जून✔️
4.फीफा के द्वारा जून के लिए जारी फुटबॉल वर्ल्ड रैंकिंग में निम्न में किस फुटबॉल टीम को प्रथम स्थान प्राप्त हुआ है?
a. बेल्जियम ✔️
b. भारत
c. ब्राजील
d. ऑस्ट्रेलिया
5.हाल ही में किसने वेस्ट प्वाइंट की प्रतिष्ठित अमेरिकी सैन्य अकादमी से स्नातक की उपाधि पाने वाली पहली सिख महिला बनकर इतिहास रच दिया है?
a. प्रत्युषा नारंग
b. अनमोल नारंग✔️
c. हरसुख कौर
d. हरदीपा सिंह
6.उत्तर प्रदेश सरकार ने सेना और अर्धसैनिक बलों के शहीद की पत्नी एवं आश्रितों को दी जा रही 25 लाख रुपये की अनुग्रह राशि को बढ़ाकर कितने लाख रुपये किये जाने का निर्णय लिया है?
a. 40 लाख रुपये
b. 30 लाख रुपये
c. 50 लाख रुपये✔️
d. 35 लाख रुपये
7.वार्षिक विश्व प्रतिस्पर्धात्मकता सूचकांक (डब्ल्यूसीआई) रैंकिंग में निम्न में से किस देश को शीर्ष स्थान प्राप्त हुआ है?
a. डेनमार्क
b. चीन
c. रूस
d. सिंगापुर✔️
8.भारत ने नेपाल से जारी तनाव के बावजूद यहां किस मंदिर परिसर में 2.33 करोड़ रुपये की लागत से स्वच्छता केंद्र के निर्माण की प्रतिबद्धता जताई है?
a. पशुपतिनाथ मंदिर✔️
b. मुक्तिनाथ मंदिर
c. बुदानिकंथा मंदिर
d. दक्षिणकाली मंदिर
9.विश्व परिवार प्रेषण दिवस (International Day of Family Remittances) निम्न में से किस दिन मनाया जाता है?
a. 15 मार्च
b. 10 जनवरी
c. 16 जून ✔️
d. 12 अप्रैल
10.मानव संसाधन विकास मंत्रालय (एमएचआरडी) और खेल मंत्रालय ने भारत में कितने स्वदेशी खेलों को बढ़ावा देने वाली विशेष फिल्मों की एक श्रृंखला बनाने हेतु हाथ मिलाया है?
a. 20
b. 15
c. 10✔️
d. 18
मराठी व्याकरण झाले सोपे - स्पर्धा परीक्षा स्पेशल
मराठी व्याकरण आपला मित्र होऊ शकतो का ? तुम्ही असा विचार कधी केला आहे का ? आणि समजा मराठी व्याकरणाशी आपली मैत्री झाली तर...? परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क्स मिळवण्या पासून आपणास कोणीच थांबवू नाही शकणार.
हा लेख लिहण्या मागील हेतू हाच आहे की, खरच आपली मराठी व्याकरणाशी मैत्री होऊ शकते का ? आणि मैत्री होऊ शकते तर ती आपण कशा प्रकारे करू शकतो.
स्मार्ट प्रकारे अभ्यास :- मराठी व्याकरणाशी मैत्री करायची असेल तर सर्वात सुरवातीस मराठी विषयाची तुलना आपल्या दैनंदिन जीवनाशी करावी लागेल. आपण जर मराठी विषयातील घटकांची सांगड आपल्या दैनंदिन जीवनातील घटकांशी घातली तर ते अभ्यासातील घटक आपल्याला पाठ करण्याची किंवा लक्षत ठेवण्याची गरज लागणार नाही. ते सर्व घटक आपल्या कायमस्वरूपी लक्षात राहतील व अभ्यास पण एकदम मजेशीर स्वरूपात होऊन जाईल. जो अभ्यास तुम्हाला कंटाळवाणा वाटतो, तोच अभ्यास तुम्ही हसत खेळत कराल. मी माझ्या शॉर्टकट मराठी व्याकरण पुस्तकात सर्व आशा सर्व गोष्टी एकदम मजेशीर स्वरूपात लिहल्या आहेत, जेणे करून तुमचे हसत खेळत मराठी व्याकरण तोंडपाठ होईल.
चला तर मग, आपण पाहू की, मराठी घटकांची सांगड दैनंदिन जीवनातील घटकांशी कशी घातली जाऊ शकते.
● वाक्य :-** अर्थ पूर्ण शब्दांच्या समूहाला वाक्य म्हणतात.
★ ट्रिक्स :- असे समजा की वाक्य म्हणजे आपले कुटुंब आहे. जसे विविध शब्द एकत्र आले की वाक्य बनते, तसेच विविध माणसे एकत्र आले की कुटुंब बनते.
मराठीत पुढीलप्रमाणे शब्दांच्या आठ जाती आहेत, त्या जातींची तुलना आपण विविध व्यक्ती नुसार करूया -
1. नाम ( Noun ) :- प्रत्येक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणवणाऱ्या वस्तुंना किंवा त्यांच्या गुणधर्माला नाम असे म्हणतात.
★ ट्रिक्स :- असे समजा की, नाम म्हणजे मुलगा. मुलगा जन्माला म्हणजे त्याचे काही तरी नाव ठेवावं लागते, त्यालाच नाम म्हणतात.
2. सर्वनाम ( Pronoun ) :- नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात.
★ ट्रिक्स :- असे समजा की, सर्वनाम म्हणजे आत्या. नामाबद्दल वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम, तसेच आत्या मुला बद्दल नाव ठेवत असते.
3. विशेषण ( Adjective ) :- नामाबद्दल विशेष माहिती सांगणार्याय शब्दास विशेषण असे म्हणतात.
★ ट्रिक्स :- असे समजा की, विशेषण म्हणजे आई. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास विशेषण म्हणतात, तसेच आई मुलाबद्दल विशेष माहिती सांगत असते.
4. क्रियापद ( Verb ) :- वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात.
★ ट्रिक्स :- असे समजा की, क्रियापद म्हणजे मुलगी. जसे क्रियापदा शिवाय वाक्य पूर्ण होत नाही, तसेच मुली शिवाय कुटुंब पूर्ण दिसत नाही.
5. क्रियाविशेषण अव्यय ( Adverb ) :- जे शब्द क्रियापदा बद्दल विशेष माहिती सांगतात, परंतु कर्त्याच्या लिंग, वचन व पुरुषानुसार बदलत नाहीत त्यांना क्रियाविशेषण अव्यय म्हणतात.
★ ट्रिक्स :- असे समजा की, क्रियाविशेषण म्हणजे वडील. जसे क्रियाविशेषण क्रियापदा बद्दल विशेष माहिती सांगते, तसेच वडील ( क्रियाविशेषण ) मुली ( क्रियापद ) बद्दल विशेष माहिती सांगत असतात.
6. उभयान्वयी अव्यय ( Conjunction ) :- दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्ये यांना जोडणाऱ्या शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
★ ट्रिक्स :- असे समजा की, उभयान्वयी अव्यय म्हणजे आजोबा. जसे उभयान्वयी अव्यय दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडण्याचे काम करते, तसेच आजोबा देखील कुटुंबातील माणसांना किंवा दोन कुटुंबांना जोडण्याचे काम करत असतात.
7. शब्दयोगी अव्यय ( Prepositions ) :- काही शब्द नामांना किंवा सर्वनामाना जोडून येतात व त्या वाक्यातील दुसया एखाद्या शब्दाशी संबंध दाखवतात अशा शब्दांना शब्दयोगी अव्यय म्हणतात.
★ ट्रिक्स :- असे समजा की, शब्दयोगी अव्यय म्हणजे मामा. जसे शब्दयोगी अव्यय म्हणजे नामांना किंवा सर्वनामांना जडून येणारे शब्द, तसेच मामा हे देखील मुलगा ( भाचा ) व आत्या ( बायको ) यांच्याशी जुडलेला असतो.
8. केवलप्रयोगी अव्यय ( Exclamatory Words ) :- मानवी मनातील भावना अचानक व्यक्त करण्यासाठी वापरला जाणारा शब्द म्हणजे केवल प्रयोगी अव्यय.
★ ट्रिक्स :- असे समजा की, केवलप्रयोगी अव्यय म्हणजे मामाची मुलगी. भावना अचानक व्यक्त करण्यासाठी वापरला जाणारा शब्द म्हणजे केवल प्रयोगी अव्यय, अशाच प्रकारे मामाच्या मुलीला पाहताच भावना अचानक व्यक्त होतात.
" वाह....! किती छान ही मामाची मुलगी."
नागरी सहकारी बँकांचे नवे पर्व
» बँकिंग नियमन दुरुस्ती विधेयक 2020 नुकतेच संसदेच्या दोन्ही सभागृहाने संमत केले
» सध्या रिझर्व बँके बरोबरच राज्यांच्या सहकार खात्याचे किंवा बहुराज्यीय सहकारी बँकावर केंद्रीय सहकार खात्याचे असे दुहेरी नियंत्रण नागरी सहकारी बँका वर आहे नवीन दुरुस्तीनुसार सहकारी बँकांचे पूर्णपणे नियमन रिझर्व बँकेकडे असेल
» या विधेयकामुळे रिझर्व बँकेला अडचणीत आलेल्या बँकांवर ूर्णपणे नियंत्रण करणे शक्य होणार आहे व त्यामुळे ठेवीदारांच्या हिताचे रक्षण होणार आहे.
» सुमारे 20 वर्षांपूर्वी म्हणजे दोन हजार साल च्या दरम्यान भारतातील एकूण बँकिंग क्षेत्रातील सहकारी बँकिंगचा वाटा हा सात ते आठ टक्क्यांच्या आसपास होता, गुजरात मधील माधवपुरा सहकारी बँकेच्या घोटाळ्यानंतर नवीन सहकारी बँका निघूच शकल्या नाहीत, सहकारी बँकिंगचा वाटा आज तीन टक्क्यांच्या आसपास झाला आहे, सध्या देशाला छोट्या आणि स्थानिक सहकारी बँकांची मोठी आवश्यकता आहे
» रिझर्व बँकेने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार सहकारी बँकांचे मार्च 2019 ची स्थिती पाहता देशातील एकूण पंधराशे 44 सहकारी बँकांचा एकूण व्यवसायात सुमारे दहा लाख कोटींच्या घरात आहे
» 1544 सहकारी बँकांच्या पैकी महाराष्ट्र गुजरात कर्नाटक आणि तामिळनाडू या चार राज्यात सर्वाधिक म्हणजे 1107 सहकारी बँक आहेत तर उर्वरित राज्यात 437 नागरी बँका आहेत
» सहकारी बँकांना ऑडिट करण्यासाठी ऑडिटरची नेमणूक रिझर्व बँकेने नेमलेल्या पॅनल मधूनच करावी लागेल
» सहकार हा विषय संविधानातील राज्य सूचित आहे हे तर बँकिंग हा केंद्र सूचित आहे त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने सहकारी बँकांना वसुलीसाठी परिणामकारक असणारा सर्फेसी कायदा लागू झाला आहे
एअर इंडिया वन विमान भारतात होणार लँड
🔰‘एअर इंडिया वन’च्या दोन व्हीव्हीआयपी विमानांपैकी पहिले विमान आज भारतात दाखल होणार आहे.
🔰ह विमान खास राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यासाठी असणार आहे.
🔰दशातील VVIP साठी खास ‘द स्पेशल एक्स्ट्रा सेक्शन फ्लाइट’ आज दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल होईल, असे सरकारमधील सूत्रांनी एएनआयला सांगितले.
🔰या VVIP एअर इंडिया वनची डिलिव्हरी स्वीकारण्यासाठी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला एअर इंडियाचे वरिष्ठ अधिकारी, सुरक्षा अधिकारी आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी अमेरिकेला रवाना झाले होते.
🔰विमान उड्डाणवस्थेत असताना ऑडिओ आणि व्हिडीओच्या माध्यमातून संपर्क साधण्याची सुविधा यामध्ये आहेत.
🔰B777 या विमानाची सलग 17 तास उड्डाण करण्याची क्षमता असेल
न्यायाधीश निवडीचा अधिकार विद्यमान अध्यक्षांनाच.
🔰अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पहिल्याच वादविवाद चर्चेत विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले.
🔰‘सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश निवडण्याचा मला अधिकार आहे’, असा दावा ट्रम्प यांनी केला, तर डेमोक्रॅटिक उमेदवार बायडेन यानी न्यायाधीशांची निवड निवडणुकीनंतर नवीन अध्यक्षांनी करणे अपेक्षित होते असे सांगितले. कोविड१९ साथीची हाताळणी, प्राप्तिकराचा प्रश्न या मुद्दय़ांवर दोन्ही नेत्यांत खडाजंगी झाली.
🔰ओहिओतील क्लिव्हलँड येथे वादविवाद चांगलाच रंगला. ट्रम्प यांना सर्वोच्च न्यायालयात अॅमी कॉनी बॅरेट यांची नेमणूक केल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी सांगितले की, आम्ही निवडणूक जिंकली आहे, मी अध्यक्ष असल्याने मला न्यायाधीश नेमणुकीचा अधिकार आहे.
🔰बायडेन यांनी ट्रम्प यांच्या मताशी असहमती दर्शवत सांगितले की, अमेरिकी लोकांना सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश निवडण्याचा अधिकार आहे. जेव्हा ते अमेरिकेतील सिनेटर्ससाठी मतदान करतात व अमेरिकी अध्यक्ष निवडतात तेव्हा त्यातून हेच स्पष्ट होते.
🔰निवडणूक प्रक्रियेच्या मध्यावर असताना ट्रम्प यांनी न्यायाधीशांची निवड केल्याने लोकांचा तो अधिकार डावलला गेला आहे. त्यामुळे न्यायाधीश नेमणुकीला आमचा विरोध आहे. मतदानाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. हजारो लोकांचे मतदान झाले आहे. त्यामुळे पुढील अध्यक्ष निवडून येण्याची वाट बघायला हवी होती.
स्वदेशी ‘बूस्टर’ अंतर्भूत असलेल्या ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी.
🔰जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या सुपरसॉनिक ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राची 30 सप्टेंबर 2020 रोजी ओडिशाच्या बालासोर येथून यशस्वी चाचणी घेण्यात आली. स्वदेशी ‘बूस्टर’ आणि एअरफ्रेम सेक्शन असणारे ब्रह्मोस क्षेपणास्त्र इतर अनेक स्वदेशी उप-यंत्रणांनी युक्त आहे.
🔰बरह्मोस लँड-अटॅक क्रूझ क्षेपणास्त्राचा (LACM) कमाल वेग मॅक 2.8 होता.
🔴बरह्मोस क्षेपणास्त्र...
🔰‘ब्रह्मोस’ हे भारताचे संपूर्णताः स्वदेशी सुपरसॉनिक लक्ष्यभेदी क्षेपणास्त्र आहे.
🔰बरह्मोस जवळपास 300 किलोचे विस्फोटक आता जवळपास 300 किलोमीटर दूर वाहून नेण्यास सक्षम आहे.
ब्रह्मोसच्या नावावर सर्वाधिक गतिमान सुपरसोनिक क्षेपणास्त्राचा जागतिक विक्रम आहे. याची गती ताशी सुमारे 3400 किलोमीटरपेक्षा अधिक आहे.
ब्रह्मोस कॉरपोरेशनचे 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्र भारत आणि रशिया संबंधातून विकसित करण्यात आले आहे.
🔰 ‘ब्रह्मोस कॉरपोरेशन’ भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि रशियाची NPOमशीनोस्त्रोयेनिशिया यांचा एक संयुक्त उपक्रम (JV) आहे. ब्रह्मोस (BrahMos) हे नाव भारताची ब्रह्मपुत्र आणि रशियाची मस्कवा नदीवरून ठेवण्यात आले आहे.
🔰भारतीय सेवेत ब्रह्मोस 2006 सालापासून आहे. हे एयर लॉंच्ड क्रुज क्षेपणास्त्र (ALCM) जल-थल-वायू अश्या तीनही परिस्थितीत भारतीय सेवेत आहे.ब्रह्मोस हे पहिले भारतीय क्षेपणास्त्र आहे, ज्याचा कार्यकाळ 10 ते 15 वर्षांपर्यंत वाढविण्यात आला आहे.
राज्य मानवी हक्क आयोगाची रचना.
🅾️राज्य सरकार, राज्य आयोगाकडे सोपविण्यात आलेल्या अधिकार व कर्तव्ये पार पाडण्यासाठी राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना करील.
🅾️ राज्य मानवी हक्क आयोगामध्ये-
🅾️ अध्यक्ष - उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश
🅾️ एक सदस्य - उच्च न्यायालयाचा विद्यमान किंवा माजी न्यायाधीश किंवा किमान 7 वर्षे अनुभव असलेला जिल्हा न्यायाधीश
🅾️ एक-दोन सदस्य - मानवी हक्कांसंबंधी ज्ञान किंवा प्रत्यक्ष अनुभव असलेल्या व्यक्ति
🅾️ सचिव हा आयोगाचा मुख्य कार्यकारी अधिकारी असेल.
🅾️ राज्य आयोगाचे मुख्यालय राज्यशासन विनिर्दिष्ट करेल अशा ठिकाणी असेल.
🅾️राज्य आयोगाच्या अध्यक्षांची व सदस्यांच्या नेमणुका:
🅾️अध्यक्षांची नेमणूक राज्यपाल पुढील समितीच्या शिफारशिनुसार करतील.
🧩समितीची रचना -
🅾️मख्यमंत्री - सभाध्यक्ष
🅾️विधान मंडळाचा अध्यक्ष - सदस्य
🅾️तया राज्याच्या गृहविकासाचा प्रभारी मंत्री -
विधानसभेतील विरोधी पक्षनेता - सदस्य
🅾️जया राज्यात विधानपरिषद असेल त्या ठिकाणी त्याचा सभापती व विरोधी पक्षनेता - सदस्य
🅾️राज्य आयोगाच्या सभाध्यक्षांची किंवा सदस्यांची नोंदणी आणि त्यांना पदावरून दूर करणे:
🅾️राज्य आयोगाचा अध्यक्ष किंवा सदस्य राज्यपालांना उद्देशून त्याच्या पदाचा राजीनामा देवू शकेल.
🅾️तसेच अध्यक्ष किंवा सदस्यास पुढील कारणावरून पदावरून दूर करता येईल .
🅾️अभिनिर्णीत नादार असेल; किंवा -
🅾️तयाने लाभाचे पद धारण केले आहे ; किंवा
🅾️ मानसिक किंवा शारीरिक अस्वास्थ्य ; किंवा
🅾️राष्ट्रपतींच्या मते नैतिक अध : पतनाचा अंतर्भाव आहे अशा अपराधासाठी दोषी ठरविलेली व्यक्ती.
🧩राज्य आयोगाच्या अध्यक्षाचा आणि सदस्याचा पदावधी:
🅾️अध्यक्षांचा कार्यकाल - 5 वर्षे किंवा वयाची 70 वर्षे पूर्ण होईपर्यंत.
🅾️ पनर्नियुक्ति होवू शकते.
जागतिक आरोग्य संघटना [World Health Organization]
स्थापना: 7 एप्रिल 1948 (7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो)
मुख्यालय: जीनिव्हा (स्वित्झर्लंड)
Director General: Dr. Tedros Adhanom (Ethiopia)
Deputy Director General: Soumya Swaminathan, Jane Ellison & Peter Salama
सदस्य देश: भारतासह 194
ध्येय: आंतरराष्ट्रीय आरोग्य यंत्रणेत समन्वय
साधने
घोषवाक्य: Working for better health, for
everyone
प्रकाशने: World Health Report, World Health Survey
आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना
- केंद्र सरकारच्या या आरोग्य योजनेने नुकताच १ कोटी उपचाराचा टप्पा गाठला आहे.
- मेघालय स्थित पूजा थापा या १ कोटी व्या लाभार्थी ठरल्या. त्यांनी या योजनेंतर्गत शिलॉंग रुग्णालयात उपचार घेतला.
- या निमित्त केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी आरोग्य धारा या वेबिनार शृंखलेमधल्या पहिल्या वेबिनारचे २१ मे रोजी उद्घाटन केले.
● योजनेबद्दल
- सुरुवात: २३ सप्टेंबर २०१८ (रांची, झारखंड)
- शिफारस : राष्ट्रीय आरोग्य धोरण २०१७
- अंमलबजावणी करणारी यंत्रणा : राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण
- लाभार्थी निवड: सामाजिक-आर्थिक जात गणना २०११ नुसार
- जगातील सर्वात मोठा शासकीय अनुदानीत आरोग्य सेवा कार्यक्रम
- प्रमुख घटक : १) आरोग्य आणि कल्याण केंद्र (HWC), २) प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY)
● TimeLine
- १५ ऑगस्ट २०१८-योजनेची घोषणा
- २३ सप्टेंबर २०१८-योजनेची सुरुवात
- ११ डिसेंबर २०१८-५ लाख लाभार्थी
- २ जानेवारी २०१९ - राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाची स्थापना (योजनेला १०० दिवस पूर्ण)
- १४ ऑक्टोबर २०१९-५० लाख लाभार्थी
- ४ एप्रिल २०२० : योजने अंतर्गत कोविड १९ची मोफत तपासणी व इलाज
● योजनेंतर्गत मिळणारे लाभ:
- रुग्णालयांमध्ये दुय्यम आणि तृतीयक आरोग्य उपचारासाठी प्रति कुटुंबासाठी दर वर्षी ५ लाखांपर्यंत निधी
- रुग्णालयात दाखल होण्याच्या ३ दिवस आधी आणि १५ दिवसानंतर विनामूल्य आरोग्य उपचार आणि औषधे
- कौटुंबिक आकार, वय किंवा लिंग यावर कोणतीही मर्यादा नाही.
02 October 2020
15 वा वित्त आयोग
अध्यक्ष:एन के सिंग, = सचिव: अरविंद मेहता
स्थापना:नोव्हेंबर 2017 =अहवाल : नोव्हेंबर 19
» मुख्य शिफारस - राज्यांचा वाटा 42% वरून 41 % करावा
» करातील वाट्यानुसार राज्ये
१. उत्तरप्रदेश - 17.9%
२. बिहार 10%
३. मध्यप्रदेश 7.9
४. पश्चिम बंगाल 7.5
५. महाराष्ट्र - 6.1( 5.5 वरून 6.1) (0.6 ची वाढ झाली )
» सर्वात शेवटचे राज्य - सिक्कीम - 0.388
» करातील वाटा ठरवण्यासाठी खालील आधार ठरवण्यात आले
१. लोकसंख्या : 15%
२. क्षेत्रफळ : 15%
३. वने आणि पर्यावरण : 10%
४. उत्पन्न तफावत : 45 %
५. लोकसंख्या कामगिरी : 12.5%
६. कर प्रयत्न : 2.5 %
जगातील सर्वात उंच 10 शिखर
(1)माउंट एव्हरेस्ट (नेपाळ) - 8848 मीटर उंच.
(2)माउंट के 2 (पाकव्याप्त काश्मीर) - 8611 मीटर उंच.
(3)कांचनगंगा (भारत ) - 8586 मीटर उंच.
(4)ल्होत्से (नेपाळ) - 8516 मीटर उंच.
(5)मकालू (नेपाळ) - 8463 मीटर उंच
(6)चो ओयू (नेपाळ) - 8201 मीटर उंच.
(7)धौलागिरी (नेपाळ) - 8167 मीटर उंच.
(8)मानसलू (पश्चिम नेपाळ) - 8163 मीटर उंच
(9)नंगा पर्वत (पाकव्याप्त काश्मीर) - 8125 मीटर उंच.
(10)अन्नपूर्णा (उत्तरमध्य नेपाळ) - 8091 मीटर उंच.
(11)गशेरब्रु( हिमालय) - 8068 मीटर उंच.
(12)ब्रॉड पिक (बाल्टिस्तान) - 8051 मीटर उंच.
(13)गशेरब्रूम - 2 - (हिमालय) 8035 मीटर उंच
(14)शिशापंग्मा (तिबेट) - 8027 मीटर उंच.
जगातील 8 हजाराहून उंच अशी 14 हिमशिखरे आहेत ही सर्व शिखरे सर करणारे आज जगात केवळ 27 गिर्यारोहक आहेत.
भारताचे माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन
● जन्म - 3 जानेवारी 1938
● मृत्यू - 27 सप्टेंबर 2020
● वय - 82 वर्ष
● भूषवलेली पदे
1. केंद्रीय वित्त मंत्री - 1996 व 2002 ते 2004
2. केंद्रीय संरक्षण मंत्री - 2001
3. परराष्ट्रमंत्री - 1998 ते 2002
◆ भारतीय जनता पार्टीचे संस्थापक सदस्य
◆ भारतीय लष्करातील माजी अधिकारी (मेजर)
◆ भाजपतर्फे 4 वेळा लोकसभा खासदार ( 1990, 1991, 1996, 2009 )
◆ भाजपतर्फे 5 वेळा राज्यसभा खासदार (1980, 1986, 1998, 1999, 2004)
◆2012 साली उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार (पराभूत)
महाराष्ट्रात सुटी सिगारेट किंवा बिडी विकायला बंदी
डली एक डोज
1.इंटैक के मुताबिक ओडिशा की महानदी में कितने वर्ष पुराना 60 फ़ीट का डूबा हुआ मंदिर मिला है?
a. 500 साल✔️
b. 800 साल
c. 900 साल
d. 100 साल
2.हाल ही में देश के किस सबसे उम्रदराज क्रिकेटर का 100 साल की उम्र में निधन हो गया?
a. बिशन सिंह बेदी
b. वसंत रायजी✔️
c. भागवत चंद्रशेखर
d. गुंडप्पा विश्वनाथ
3.विश्व रक्तदान दिवस निम्न में से किस दिन मनाया जाता है?
a. 20 जून
b. 25 फ़रवरी
c. 10 मार्च
d. 14 जून✔️
4.पदमश्री अवार्ड से सम्मानित निम्न में से किस उर्दू शायर का 93 साल की उम्र में निधन हो गया है?
a. एएम जुत्शी गुलज़ार✔️
b. जावेद अख़्तर
c. मुहम्मद इक़बाल
d. मज़हर इमाम
5.भारतीय रिजर्व बैंक (आरबीआई) ने कानपुर स्थित किस बैंक की कमजोर वित्तीय स्थिति के कारण उसके ऊपर छह महीने के लिये नये ऋण देने और जमा स्वीकार करने से रोक दिया है?
a. पीपुल्स को-ऑपरेटिव बैंक✔️
b. देना बैंक
c. पीएमसी बैंक
d. यूको बैंक
6.हाल ही में नासा ने पहली बार किस महिला को स्पेस फ्लाइट प्रोग्राम का प्रमुख नियुक्त किया है?
a. रितु करढाल
b. नंदिनी हरिनाथ
c. कैथी ल्यूडर्स✔️
d. मौमिता दत्ता
7.बॉलीवुड के किस चर्चित अभिनेता ने हाल ही में अपने घर पर खुदकुशी कर ली?
a. सुशांत सिंह राजपूत✔️
b. मनोज बाजपेयी
c. नवाजुद्दीन सिद्दीकी
d. अभय देयोल
8.अंतरराष्ट्रीय अल्बिनिज्म जागरूकता दिवस (International Albinism Awareness Day) निम्न में से किस दिन मनाया जाता है?
a. 22 जनवरी
b. 15 मार्च
c. 13 जून✔️
d. 10 मई
9.विश्व फुटबॉल की नियामक संस्था-फीफा (FIFA) की तरफ से जून के लिए जारी वर्ल्ड रैंकिंग में भारतीय पुरुष फुटबॉल टीम कितने स्थान पर कायम हैं?
a. 105
b. 85
c. 120
d. 108✔️
10.भारत निम्न में से किस देश में कोविड-19 महामारी से निपटने के विभिन्न पहलुओं से संबंधित चार पेशेवर पाठ्यक्रम शुरू करेगा?
a. जापान
b. बांग्लादेश✔️
c. पाकिस्तान
d. नेपाल
1.हाल ही में किस राज्य सरकार ने एथलीट हिमा दास का नाम खेल रत्न के लिए खेल मंत्रालय को भेजा है?
a. असम✔️
b. बिहार
c. केरल
d. कर्नाटक
2.चुनाव आयोग ने बिहार विधान परिषद् की रिक्त हो रही कितने सीटों पर 06 जुलाई 2020 को चुनाव कराने की घोषणा की है?
a. 10
b. 2
c. 9✔️
d. 5
3.नेशनल एंटी डोपिंग एजेंसी (नाडा) ने अपने रहने के स्थान की जानकारी न देने के कारण निम्न में से कितने भारतीय क्रिकेटरों को नोटिस जारी किया है?
a. सात
b. आठ
c. तीन
d. पांच✔️
4.हाल ही में केंद्र सरकार ने किस नाम से हेल्थकेयर सप्लाई चेन पोर्टल लॉन्च किया है?
a. आरोग्यपथ✔️
b. हमसेतु
c. हमसफर
d. संजीवनी
5.फिलीपींस में भारत के अगले राजदूत निम्न में से किसे नियुक्त किया गया?
a. शंभू एस कुमारन✔️
b. राहुल सचदेवा
c. मोहित अग्रवाल
d. रोहित कुमार
6.निम्न में से किस शहर के रेलवे स्टेशन ने रोबोट कैप्टन अर्जुन लॉन्च किया है?
a. दिल्ली रेलवे स्टेशन
b. पुणे रेलवे स्टेशन✔️
c. पटना रेलवे स्टेशन
d. कानपुर रेलवे स्टेशन
7.निम्न में से किस देश के क्रिकेट टीम के दिग्गज बल्लेबाड मैट पूरे (Matt Poore) का हाल ही में 90 साल के उम्र में निधन हो गया?
a. इंग्लैंड
b. न्यूजीलैंड✔️
c. ऑस्ट्रेलिया
d. बांग्लादेश
8.किस आईआईटी संस्थान के शोधकर्ताओं ने सार्वजनिक स्थानों पर सामाजिक दूरियों की निगरानी हेतु एक आर्टिफिशियल इंटेलिजेंस आधारित साइबर-फिजिकल प्रणाली विकसित की है?
a. आईआईटी दिल्ली
b. आईआईटी कानपुर
c. आईआईटी खड़गपुर✔️
d. आईआईटी हैदराबाद
9.विश्व बुजुर्ग दुर्व्यसवहार रोकथाम जागरूकता दिवस (World Elder Abuse Awareness Day) निम्न में से किस दिन मनाया जाता है?
a. 15 मार्च
b. 10 अप्रैल
c. 25 मई
d. 15 जून✔️
10.भारतीय रिजर्व बैंक (RBI) द्वारा बैंकों के पूर्णकालिक निदेशकों और मुख्य कार्यकारी अधिकारियों के लिए प्रस्तावित ऊपरी आयु सीमा क्या है?
a. 80 वर्ष
b. 75 वर्ष
c. 60 वर्ष
d. 70 वर्ष✔️
केंद्रीय पर्यावरण मंत्री भारतातल्या व्याघ्र गणनेचा नवीन गिनीज विक्रम लोकांना समर्पित करणार.
🔰29 जुलै 2020 रोजी आयोजित जागतिक व्याघ्र दिनाच्या पूर्वसंध्येला, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर भारतातल्या व्याघ्र गणनेनी केलेला नवीन गिनीज विक्रम भारतीय नागरिकांना समर्पित करणार आहेत.
🔰भारतात दर चार वर्षांनी होणाऱ्या ‘राष्ट्रीय व्याघ्र गणना 2018’ याच्या अहवालानुसार कॅमेराद्वारे केलेल्या जगातल्या सर्वात मोठ्या वन्यजीव सर्वेक्षणात भारतातल्या व्याघ्र गणनेनी नवीन गिनीज विश्व विक्रम स्थापित केला आहे. सन 2018-19 मध्ये केलेले सर्वेक्षण हे संसाधन आणि माहिती या दोन्ही गोष्टी संग्रहीत करण्याच्या दृष्टीने आजपर्यंतचे सर्वात व्यापक सर्वेक्षण होते.
🔴ठळक बाबी...
🔰नव्या गणनेनुसार, देशात सुमारे 2967 वाघ आहेत. वर्तमानात, जागतिक संख्येच्या सुमारे 70 टक्के वाघ भारतात आहेत.
🔰वगवेगळ्या 141 क्षेत्रात 26,838 ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले होते आणि त्याद्वारे 121,337 चौरस किलोमीटर (46,848 चौरस मैल) क्षेत्रफळाचे प्रभावी सर्वेक्षण करण्यात आले. या सापळा रुपी कॅमेऱ्यांनी वन्यजीवांची 34,858,623 छायाचित्रे हस्तगत केली. त्यात 76,651 वाघ आणि 51,777 बिबट्या होते; बाकीचे इतर स्थानिक प्राणी होते.
वाघांची संख्या दुप्पट करण्याचा संकल्प निर्धारित वेळेच्या चार वर्ष आधीच भारताने पूर्ण केला आहे.
पार्श्वभूमी
🔰चार वर्षातून एकदा होणारी राष्ट्रीय व्याघ्र गणना ही राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाद्वारे भारतीय वन्यजीव संस्थेच्या तांत्रिक सहकार्यातून राबविण्यात येत असून राज्य वनविभाग व हितधारक त्याची अंमलबजावणी करीत आहेत. नऊ व्याघ्र क्षेत्रांवर सुरु करण्यात आलेला ‘प्रोजेक्ट टायगर’ सारखा प्रजाती विशेष कार्यक्रम आता 50 व्याघ्र क्षेत्रांवर सुरु आहे.
🔰वाघांचा वावर असणाऱ्या देशातल्या सरकारच्या प्रमुखांनी सेंट पीटर्सबर्ग, रशिया येथे जागतिक पातळीवर वाघांची संख्या 2022 सालापर्यंत दुप्पट करण्याचा निर्धार सेंट पीटर्सबर्ग घोषणापत्रावर स्वाक्षऱ्या करुन केला आहे. याच बैठकीत 29 जुलै हा दिवस जगभर जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला, जेणेकरुन व्याघ्र संवर्धनाविषयी जागृती निर्माण होण्यास मदत मिळणार.
भारतीय संशोधन केंद्र
1. दक्षिण गंगोत्री
- Indian Antarctic Programme चा भाग म्हणून अंटार्क्टिकावरती स्थापन केलेले भारताचे पहिले संशोधन केंद्र
- स्थापना: 26 जानेवारी 1984
- बंद: 25 फेब्रुवारी 1990
2. मैत्री
- वरील कार्यक्रमातंर्गत अंटार्क्टिकावरती स्थापन केलेले भारताचे दुसरे आणि कायमचे संशोधन केंद्र
- स्थापना: जानेवारी 1989
3. भारती
- अंटार्क्टिकावरील भारताचे तिसरे संशोधन केंद्र
- या केंद्राच्या स्थापनेनंतर दक्षिण गंगोत्री हे केंद्र पुरवठा केंद्र म्हणून वापरले जाते.
- स्थापना: 18 मार्च 2012
4. IndARC
- भारताचे पहिले पाण्यातील निरीक्षण केंद्र
- हे केंद्र आर्क्टिक भागात आहे.
01 October 2020
चालू घडामोडी प्रश्नसंच
कोणत्या व्यक्तीची केंद्रीय दक्षता आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) शरद कुमार
(B) नितूर श्रीनिवास राव
(C) के. व्ही. चौधरी
(D) संजय कोठारी✅✅
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🟢 कोणत्या संकल्पनेखाली 2020 साली जागतिक लसीकरण आठवडा पाळला गेला?
(A) व्हॅक्सिन वर्क फॉर ऑल✅✅
(B) क्लोज द इम्यूनायझेशन गॅप
(C) प्रोटेक्टेड टुगेदर
(D) आर यू अप-टू-डेट?
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🟢 2020 साली जागतिक मलेरिया दिनाची संकल्पना काय आहे?
(A) झीरो मलेरिया स्टार्ट्स विथ मी✅✅
(B) रेडी टू बीट मलेरिया
(C) एंड मलेरिया फॉर गुड
(D) लेट्स क्लोज द गॅप
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🟢 भारत सरकारने सहा महिन्यांसाठी कोणत्या उद्योग क्षेत्राला सार्वजनिक उपयुक्तता सेवा म्हणून घोषित केले?
(A) तेल उद्योग
(B) बँकिंग✅✅
(C) रेल्वे
(D) जलवाहतुक
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🟢 कोणत्या निमलष्करी संस्थेनी 'ई-कार्यालय' अॅप तयार केले?
(A) केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF)
(B) सीमा सुरक्षा दल (BSF)
(C) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF)✅✅
(D) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस (ITBP)
डली का डोज
1.हाल ही में किस राज्य सरकार ने कोरोना के कारण शनिवार,रविवार एवं सार्वजनिक छुट्टी वाले दिन लोगों के घर से निकलने पर प्रतिबन्ध लगा दिया है?
a. बिहार
b. पंजाब✔️
c. कर्नाटक
d. गुजरात
2.विश्व बाल श्रम निषेध दिवस निम्न में से किस दिन मनाया जाता है?
a. 15 मार्च
b. 20 अप्रैल
c. 12 जून✔️
d. 30 जुलाई
3.किस राज्य सरकार ने अगले छह महीनों में दस लाख रोजगार उपलब्ध कराने की कार्य योजना तैयार की है?
a. गुजरात
b. उत्तर प्रदेश✔️
c. बिहार
d. झारखंड
4.महिंद्रा फाइनेंस के साथ निम्न में से किसने वाहन ऋण उपलब्ध कराने का समझौता किया है?
a. मारुती सुजुकी✔️
b. टाटा मोटर्स
c. बजाज ऑटो लिमिटेड
d. होंडा मोटर कंपनी
5.हाल ही में किस राज्य के मंत्रिमंडल ने गौ-वध निरोधक (संशोधन) अध्यादेश, 2020 को मंज़ूरी दे दी है?
a. बिहार
b. कर्नाटक
c. उत्तर प्रदेश✔️
d. पंजाब
6.विश्व प्रत्यायन दिवस (World Accreditation Day) निम्न में से किस दिन मनाया जाता है?
a. 15 मार्च
b. 10 अप्रैल
c. 9 जून✔️
d. 12 जुलाई
7.हाल ही में किस देश ने कच्चे तेल (Crude Oil) के निर्यात के लिये कीमतों में कम-से-कम बीते दो दशकों में सर्वाधिक वृद्धि की है?
a. इराक
b. ईरान
c. रूस
d. सऊदी अरब✔️
8.हाल ही में किस भारतीयों को ‘नासा विशिष्ट लोक सेवा पदक’ से सम्मानित किया गया है?
a. मोहित अग्रवाल
b. रंजीत कुमार✔️
c. राहुल सचदेवा
d. अनमोल कुमार
9.हाल ही में किस संस्थान ने कोविड-19 के लिए एक कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित परीक्षण किट विकसित की है?
a. आईआईटी हैदराबाद✔️
b. आईआईटी दिल्ली
c. आईआईटी कानपुर
d. आईआईटी खड़गपुर
10.उत्तराखंड के निम्न में से किस जिले में राज्य का सबसे बड़ा जैव विविधता पार्क खोला गया है?
a. हल्द्वानी✔️
b. चमोली
c. टिहरी गढ़वाल
d. रुद्रप्रयाग
डली का डोज
1.रेटिंग एजेंसी फिच के मुताबिक वित्त वर्ष 2021-2022 में भारत की जीडीपी ग्रोथ कितनी रहने का अनुमान लगाया है?
a. 9.5 प्रतिशत✔️
b. 6.5 प्रतिशत
c. 7.2 प्रतिशत
d. 3.2 प्रतिशत
2.गुजरात के गिर के जंगलो में पाए जाने वाले एशियाई शेरों की संख्या 2015 के मुकाबले बढ़कर कितनी हो गयी है?
a. 720
b. 625
c. 674✔️
d. 900
3.किस राज्य सरकार ने हाल ही में कक्षा पांच तक के बच्चों के लिए ऑनलाइन क्लास पर प्रतिबंध लगा दिया है?
a. कर्नाटक✔️
b. दिल्ली
c. तमिलनाडु
d. उत्तर प्रदेश
4.अंतरराष्ट्रीय भारोत्तोलन महासंघ (आईडब्ल्यूएफ) ने किस भारतीय वेटलिफ्टर पर लगाए गए डोपिंग के आरोपों को वापस ले लिया है?
a. मीराबाई चानू
b. पूनम यादव
c. संजीता चानू✔️
d. राखी हल्दर
5.केंद्र सरकार ने प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना के अंतर्गत 'पर ड्रॉप मोर क्रॉप' (हर बूंद से ज्यादा उपज) के मद में चालू वित्त वर्ष में राज्यों के लिए कितने करोड़ रुपये का आवंटन किया है?
a. 4,000 करोड़ रुपये✔️
b. 3,000 करोड़ रुपये
c. 2,000 करोड़ रुपये
d. 1,000 करोड़ रुपये
6.विश्व बैंक ने पश्चिम बंगाल सरकार को राज्य में COVID स्थिति और विकासात्मक कार्यों से निपटने के लिए कितने करोड़ रुपये का ऋण दिया है?
a. 2,950 करोड़ रुपये
b. 3,950 करोड़ रुपये
c. 1,950 करोड़ रुपये✔️
d. 1,050 करोड़ रुपये
7.हाल ही में किस देश ने कोरोना संक्रमित लोगों के इलाज के लिए प्लाज्मा की ऑनलाइन उपलब्धता शुरू की है?
a. बांग्लादेश✔️
b. नेपाल
c. चीन
d. पाकिस्तान
8.मर्सर (Mercer) के ‘2020 कॉस्ट ऑफ लिविंग सर्वे’ के अनुसार प्रवासियों के लिए भारत का सबसे महंगा शहर निम्न में से कौन है?
a. मुंबई✔️
b. दिल्ली
c. जयपुर
d. लखनऊ
9.किस देश के मानवरहित सबमर्सिबल ने हाल ही में महासागर के नीचे विश्व के सबसे गहरे बिंदु तक गोता लगाने का कीर्तिमान बनाया है?
a. नेपाल
b. चीन✔️
c. पाकिस्तान
d. बांग्लादेश
10.किस राज्य सरकार ने प्रवासी श्रमिकों के लिए रोजगार खोजने हेतु ‘रोज़गार सेतु’ पोर्टल लॉन्च किया है?
a. बिहार
b. पंजाब
c. कर्नाटक
d. मध्य प्रदेश✔️
चालू घडामोडी
● राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (NABARD)च्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक झाली?
*उत्तर* : गोविंदा राजुलू चिंतला
● दरवर्षी राष्ट्रीय दहशतवादविरोधी दिन कधी साजरा केला जातो?
*उत्तर* : 21 मे
● शेतकऱ्यांसाठी ‘मी अन्नपूर्णा’ नावाने एक उपक्रम कोणते राज्य सरकार राबवत आहे?
*उत्तर* : महाराष्ट्र
● स्थलांतरितांच्या मदतीसाठी ‘तत्पर’ योजना कोणत्या राज्यातल्या जिल्हा प्रशासनाने लागू केली आहे?
*उत्तर* : हरियाणा
● राष्ट्रीय स्थावर मालमत्ता विकास परिषदेचे (NAREDCO) महासंचालक पदावर कोणाची नेमणूक करण्यात आली?
*उत्तर* : राजेश गोयल
● नव्या ‘स्टार्ट अप निधी’ची घोषणा कोणत्या राज्याने केली?
*उत्तर* : उत्तरप्रदेश
● आंतरराष्ट्रीय चहा दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो?
*उत्तर* : 21 मे
● ‘सेंटर ऑफ एक्सलन्स इन स्पोर्ट्स सायन्स’ याची स्थापना करण्यासाठी कोणत्या विद्यापीठाची निवड झाली?
*उत्तर* : राजीव गांधी विद्यापीठ
● नुकत्याच झालेल्या जागतिक मधमाशी दिनाची संकल्पना (2020) काय होती?
*उत्तर* : बी एंगेज्ड
● ‘चॅलेंज कोविड-19 कॉम्पटिशन (C3)’ची घोषणा कोणत्या संस्थेनी केली?
*उत्तर* : नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन
● गृहनिर्माण व शहरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या कचरा मुक्त शहरांच्या स्टार रेटिंग उपक्रमात कोणत्या शहराला 5 स्टार रेटिंग प्राप्त झाले नाही?
*उत्तर* : बंगळुरू
● यंदा (2020) ‘आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन’ची संकल्पना काय?
*उत्तर* : म्यूजियम्स फॉर इक्वलिटी: डायव्हरसिटी अॅण्ड इनक्लूजन
● ‘H.A.C.K.’ या नावाने सायबर सुरक्षा-विशिष्ट अॅस्सेलिरेटर केंद्र कोणत्या राज्याने उघडले?
*उत्तर* : कर्नाटक
● सामाजिक अंतर राखण्यात मदत होण्यासाठी ‘आयफिल-यू’ ब्रेसलेट कोणत्या देशाच्या संशोधकांनी विकसित केले?
*उत्तर* : इटली
● इस्राईल देशाचे पंतप्रधान म्हणून कोणाला निवडण्यात आले आहे?
*उत्तर* : बेंजामिन नेतन्याहू
● प्रथम आभासी जागतिक आरोग्य परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले?
*उत्तर* : डॉ. हर्ष वर्धन
● ट्विटर कंपनीच्या संचालक मंडळाच्या अध्यक्ष पदावर कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
*उत्तर* : पॅट्रिक पिचेट
● वंदे भारत मिशन अंतर्गत परत आलेल्या नागरिकांच्या कौशल्य मापनाचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारने चालविलेल्या उपक्रमाचे नाव काय?
*उत्तर* : स्वदेस
● ‘राष्ट्रीय खते मर्यादित’ याचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नेमणूक झाली?
*उत्तर* : व्ही. एन. दत्त
● 2020-21 या आर्थिक वर्षासाठी भारतीय उद्योग संघाच्या (CII) अध्यक्ष पदावर उदय कोटक कोणाची निवड झाली?
*उत्तर* : उदय कोटक
● पूर्ण देशी बनावटीचा यांत्रिक व्हेंटिलेटर कोणत्या संस्थेतल्या संशोधकांनी विकसित केला आहे?
*उत्तर* : केंद्रीय यांत्रिकी अभियांत्रिकी संशोधन संस्था (CSIR-CMERI)
● ‘अमेरी आईस शेल्फ’ हे ठिकाण कुठे आहे?
*उत्तर* : अंटार्क्टिका
● पर्यावरण क्षेत्रातल्या सहकार्याबाबत भारत कोणत्या देशासोबत सामंजस्य करार करणार आहे?
*उत्तर* : भुटान
● ‘भारतीय औषधपद्धती आणि होमिओपॅथी औषधसूची आयोग’ची कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत पुनःस्थापना केली जाणार आहे?
*उत्तर* : आयुष मंत्रालय