स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
१३ जुलै २०१८
Solar car
०१ जानेवारी १९७०
घटनेतील मूलभूत हक्क
♦️KEY POINTS TO REMEMBER
कलम 14 - समानता
कलम 15 - भेदभाव
कलम 16 - समान संधी
कलम 17 - अस्पृश्यता
कलम 18 - किताब
कलम 19 - स्वातंत्र्य
कलम 20 - अपराध दोषसिद्धी
कलम 21 - जीवित व्यक्तिगत
कलम 21A - शिक्षण
कलम 22 - अटक स्थानबद्धता
कलम 23 - वेठबिगारी मनाई
कमल 24 - बालकामगार मनाई
कलम 25 - धार्मिक आचरण
कलम 26 - धार्मिक संघटन
कलम 27 - धार्मिक कर
कलम 28 - धार्मिक शिक्षण
कलम 29 - अल्पसंख्याक हित संवर्धन
कलम 30 - अल्पसंख्याक शिक्षण
कलम 31 - रद्द (संपत्तीचा हक्क)
कलम 32 - घटनात्मक उपाययोजना
कलम 33 - सेनेच्या हक्कात बदल
कलम 34 - लष्करी कायदा
कलम 35 - संसदेला अधिकार
मराठी व्याकरण झाले सोपे - स्पर्धा परीक्षा स्पेशल
मराठी व्याकरण आपला मित्र होऊ शकतो का ? तुम्ही असा विचार कधी केला आहे का ? आणि समजा मराठी व्याकरणाशी आपली मैत्री झाली तर...? परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क्स मिळवण्या पासून आपणास कोणीच थांबवू नाही शकणार.
हा लेख लिहण्या मागील हेतू हाच आहे की, खरच आपली मराठी व्याकरणाशी मैत्री होऊ शकते का ? आणि मैत्री होऊ शकते तर ती आपण कशा प्रकारे करू शकतो.
स्मार्ट प्रकारे अभ्यास :- मराठी व्याकरणाशी मैत्री करायची असेल तर सर्वात सुरवातीस मराठी विषयाची तुलना आपल्या दैनंदिन जीवनाशी करावी लागेल. आपण जर मराठी विषयातील घटकांची सांगड आपल्या दैनंदिन जीवनातील घटकांशी घातली तर ते अभ्यासातील घटक आपल्याला पाठ करण्याची किंवा लक्षत ठेवण्याची गरज लागणार नाही. ते सर्व घटक आपल्या कायमस्वरूपी लक्षात राहतील व अभ्यास पण एकदम मजेशीर स्वरूपात होऊन जाईल. जो अभ्यास तुम्हाला कंटाळवाणा वाटतो, तोच अभ्यास तुम्ही हसत खेळत कराल. मी माझ्या शॉर्टकट मराठी व्याकरण पुस्तकात सर्व आशा सर्व गोष्टी एकदम मजेशीर स्वरूपात लिहल्या आहेत, जेणे करून तुमचे हसत खेळत मराठी व्याकरण तोंडपाठ होईल.
चला तर मग, आपण पाहू की, मराठी घटकांची सांगड दैनंदिन जीवनातील घटकांशी कशी घातली जाऊ शकते.
● वाक्य :-** अर्थ पूर्ण शब्दांच्या समूहाला वाक्य म्हणतात.
★ ट्रिक्स :- असे समजा की वाक्य म्हणजे आपले कुटुंब आहे. जसे विविध शब्द एकत्र आले की वाक्य बनते, तसेच विविध माणसे एकत्र आले की कुटुंब बनते.
मराठीत पुढीलप्रमाणे शब्दांच्या आठ जाती आहेत, त्या जातींची तुलना आपण विविध व्यक्ती नुसार करूया -
1. नाम ( Noun ) :- प्रत्येक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणवणाऱ्या वस्तुंना किंवा त्यांच्या गुणधर्माला नाम असे म्हणतात.
★ ट्रिक्स :- असे समजा की, नाम म्हणजे मुलगा. मुलगा जन्माला म्हणजे त्याचे काही तरी नाव ठेवावं लागते, त्यालाच नाम म्हणतात.
2. सर्वनाम ( Pronoun ) :- नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात.
★ ट्रिक्स :- असे समजा की, सर्वनाम म्हणजे आत्या. नामाबद्दल वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम, तसेच आत्या मुला बद्दल नाव ठेवत असते.
3. विशेषण ( Adjective ) :- नामाबद्दल विशेष माहिती सांगणार्याय शब्दास विशेषण असे म्हणतात.
★ ट्रिक्स :- असे समजा की, विशेषण म्हणजे आई. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास विशेषण म्हणतात, तसेच आई मुलाबद्दल विशेष माहिती सांगत असते.
4. क्रियापद ( Verb ) :- वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात.
★ ट्रिक्स :- असे समजा की, क्रियापद म्हणजे मुलगी. जसे क्रियापदा शिवाय वाक्य पूर्ण होत नाही, तसेच मुली शिवाय कुटुंब पूर्ण दिसत नाही.
5. क्रियाविशेषण अव्यय ( Adverb ) :- जे शब्द क्रियापदा बद्दल विशेष माहिती सांगतात, परंतु कर्त्याच्या लिंग, वचन व पुरुषानुसार बदलत नाहीत त्यांना क्रियाविशेषण अव्यय म्हणतात.
★ ट्रिक्स :- असे समजा की, क्रियाविशेषण म्हणजे वडील. जसे क्रियाविशेषण क्रियापदा बद्दल विशेष माहिती सांगते, तसेच वडील ( क्रियाविशेषण ) मुली ( क्रियापद ) बद्दल विशेष माहिती सांगत असतात.
6. उभयान्वयी अव्यय ( Conjunction ) :- दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्ये यांना जोडणाऱ्या शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
★ ट्रिक्स :- असे समजा की, उभयान्वयी अव्यय म्हणजे आजोबा. जसे उभयान्वयी अव्यय दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडण्याचे काम करते, तसेच आजोबा देखील कुटुंबातील माणसांना किंवा दोन कुटुंबांना जोडण्याचे काम करत असतात.
7. शब्दयोगी अव्यय ( Prepositions ) :- काही शब्द नामांना किंवा सर्वनामाना जोडून येतात व त्या वाक्यातील दुसया एखाद्या शब्दाशी संबंध दाखवतात अशा शब्दांना शब्दयोगी अव्यय म्हणतात.
★ ट्रिक्स :- असे समजा की, शब्दयोगी अव्यय म्हणजे मामा. जसे शब्दयोगी अव्यय म्हणजे नामांना किंवा सर्वनामांना जडून येणारे शब्द, तसेच मामा हे देखील मुलगा ( भाचा ) व आत्या ( बायको ) यांच्याशी जुडलेला असतो.
8. केवलप्रयोगी अव्यय ( Exclamatory Words ) :- मानवी मनातील भावना अचानक व्यक्त करण्यासाठी वापरला जाणारा शब्द म्हणजे केवल प्रयोगी अव्यय.
★ ट्रिक्स :- असे समजा की, केवलप्रयोगी अव्यय म्हणजे मामाची मुलगी. भावना अचानक व्यक्त करण्यासाठी वापरला जाणारा शब्द म्हणजे केवल प्रयोगी अव्यय, अशाच प्रकारे मामाच्या मुलीला पाहताच भावना अचानक व्यक्त होतात.
" वाह....! किती छान ही मामाची मुलगी."
समाजसेवक बाबा आमटे.
कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी आपले आयुष्य समर्पित करणारे समाजसेवक बाबा आमटे यांचा आज जन्मदिवस.
🗣मिळालेले पुरस्कार👌👌👌
- पद्मश्री पुरस्कार : (1971)
- रमण मॅगसेसे पुरस्कार : (1985)
- पद्म विभूषण : (1986)
- मानव अधिकार क्षेत्रात अतुल्य योगदानासाठी संयुक्त राष्ट्राचा पुरस्कार : (1988)
- गांधी शांती पुरस्कार : (1999)
- राष्ट्रीय भूषण : (1978)
- जमनालाल बजाज अवार्ड : (1979)
- एन.डी. दीवान अवाॅर्ड : (1980)
- रामशास्त्री अवार्ड : (1993) ( रामशासत्री प्रभुणे संस्था महाराष्ट्र )
- इंदिरा गांधी मेमोरियल अवार्ड : (1985)
- टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी
- राजा राममोहन राॅय अवार्ड : (1986) दिल्ली सरकार
- फ्रांसीस मश्चियो प्लॅटिनम ज्युबिली अवार्ड : (1987)
- जी.डी. बिरला इंटरनॅशनल अवार्ड : (1987)
- आदिवासी सेवक अवार्ड : (1991) भारत सरकार
- मानव सेवा अवार्ड : (1997) यंग मॅन गांधीयन असोसिएशन राजकोट, गुजरात.
- सारथी अवाॅर्ड : (1997) नागपुर
- टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी
- महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट अवार्ड : (1997) नागपुर
- कुमार गंधर्व पुरस्कार : (1998)
- सावित्रीबाई फुले अवाॅर्ड : (1998) भारत सरकार
- फेडरेशन ऑफ इंडियन चेम्बर ऑफ काॅमर्स अॅण्ड इंडस्ट्रिी अवार्ड : (1988)
- आदिवासी सेवक पुरस्कार महाराष्ट्र सरकार : (1998)
- महाराष्ट्र भुषण अवार्ड : (2004) महाराष्ट्र सरकार
सन्मानीत पदव्या
- डी.लिट : टाटा इंस्टीटयुट ऑफ सोशल सायन्स मुंबई , भारत 1999
- डी.लिट : 1980 नागपुर युनिव्हर्सिटी नागपुर , भारत
- डी लिट : 1985-86 पुणे युनिव्हर्सिटी महाराष्ट्र
- देसिकोत्तमा : 1988 सन्माननीय डाॅक्टरेट, विश्वभारती युनिव्हर्सिटी, शांतीनिकेतन पश्चिम बंगाल
महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्न संच
अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com
1] वाक्यप्रकार ओळखा. - सूर्य मावळला परंतु अंधार पसरला नाही .
उत्तर = संयुक्त वाक्य
2]'मी' देशाची पंतप्रधान झाले तर !' या वाक्याचा प्रकार ओळखा.
उत्तर = उद्गारार्थी
3] लता मंगेशकरांची जुनी गाणी मंत्रमुग्ध करतात - या वाक्यातील ध्वन्यार्थ ओळखा.
उत्तर = मनावर जादू होणे
4] वाक्याच्या क्रियापदाच्या रुपावरुन खालीलपैकी कोणता वाक्याचा प्रकार होत नाही ?
उत्तर = संयुक्तार्थी
5] नियमित व्यायाम केला तर शरीर निरोगी राहतो ? या वाक्याचा प्रकार ओळखा.
उत्तर = मिश्र
6] काय ही गर्दी ! विधानार्थी वाक्य करा.
उत्तर = गर्दी खूप आहे.
7] खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
वाक्य - 'देवा, सर्वांना सुखी ठेव'
उत्तर = आज्ञार्थ
8] ज्या क्रियापदावरून फक्त काळाचा बोध होतो तर अशा क्रियापदाला कोणते क्रियापद म्हणतात ?
उत्तर = स्वार्थ
9] 'ऊ-आख्यात' वरून क्रियापदाचा कोणता अर्थ ओळखतात ?
उत्तर = आज्ञार्थ
10] ..................ही मांसाहारी वनस्पती आहे.
उत्तर = घटपर्णी
11] मधमाश्यांच्या वसाहतीत................. मधमाशी सर्वात मोठी असते.
उत्तर = राणी
12] गुणसूत्रे ही DNA आणि ................यांनी बनलेली असतात.
उत्तर = प्रथिने
13] स्त्रियांमध्ये ................. तर पुरुषांमध्ये .... असते.
उत्तर = डिंवग्रंथी , वर्षण
14] आपल्याला माहिती असलेल्या पेशींमध्ये .............. अंडे ही सर्वात मोठी पेशी आहे.
उत्तर =शहामृगाचे
15] ...............स्नायू गोलाकार व गुळगुळीत असतात,
उत्तर =अनैच्छिक
16] शरीरातील हाडे.................... एकमेकांना जोडलेली असतात.
उत्तर = अस्थिबंधनाने
17] .................... या जनकपेशींच्या हुबेहूब प्रतिकृती असतात.
उत्तर = कन्यापेशी
18] माणसाच्या पेशींमध्ये............... गुणसूत्रे असतात.
उत्तर = 46
19] लहान आतड्याची लांबी ............. मीटर असते.
उत्तर = सहा
20] सिता 10 वस्तु 15 रू. ला खरेदी करून 12 वस्तु 20 रू ला विकते तर तिला किती रूपये नफा किंवा तोटा होईल.
उत्तर = 11.11%
21] 12 पुस्तके विकल्यानंतर 2 पुस्तकांच्या खरेदीकिंमतीमुवढा नफा होतो. तर शेकडा किती?
उत्तर = 20%
22 ]एका वस्तूची विक्री किंमत ही खरेदी किंमतीच्या निम्मे आहे. तर शेकडा नफा किंवा तोटा किती होईल?
उत्तर = 50%
23]दुकानदाराने पुस्तकाच्या 1000 प्रति 9999 रुपयांना विकल्पानंतर 899 रु. नफा होतो तर, प्रत्येक पुस्तकाची खरेदी किंमत किती?
उत्तर = 9.10 रुपये.
24]40 टक्के नफा घेऊन 40 पुस्तके विकल्यास 40 रूपये फायदा होतो तर खरेदीची किंमत किती?
उत्तर = 100
25] एका वस्तूची किंमत 20 टक्क्यांनी वाढली असता विक्री 20 टक्के कमी होते, तर त्या विक्रेत्यास फायदा की तोटा झाला?
उत्तर = 4 टक्के तोटा
26] 5 रु. ला 2 पेन प्रमाणे 50 रु. ला किती पेन येतील?
उत्तर = 20
27] एक घोडा 9 टक्के तोटा सहन करून 455 रु. विकला तर मूळ किंमत किती?
उत्तर = 500
28] खरेदी रु. 2000, विक्री रु. 2400 आहे, तर शेकडा नफा किती?
उत्तर = 20%
29] एका व्यापाऱ्याने वस्तूची किंमत 20 टक्क्याने वाढविली व नंतर 10 टक्के सूट दिली, तर किती टक्के त्यात नफा झाला ?
उत्तर = 8%
30] 'दीनबंधु' हे साप्ताहिक कोणी सुरू केले?
उत्तर = कृष्णराव भालेकर
31] खालील पैकी कोणता ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिला नाही ?
उत्तर =शिवभारत
32] महाराष्ट्रात दलित पँथर ची स्थापना किती साली झाली
उत्तर = मे १९७२
33]हैद्राबाद संस्थानातील रझाकार संघटनेचा प्रमुख कोण होता ?
उत्तर =कासीम रझवी
34]खालील पैकी कोणता समाज सुधारक अल्पजीवी ठरला ?
उत्तर = विष्णुबुवा ब्रह्मचारी
35]भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिला ?
उत्तर = वि रा शिंदे
36] अहमदनगरची स्थपणा अहमद निझामशहा याने मध्ये केली
उत्तर = 1490
37]स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव काय ?
उत्तर = व्यंकटेश भगवानराव खेडगीकर
38] श्री गुरु गोविंदसिंघजी यांचा जन्म कोठे झाला ?
उत्तर = पाटणा
39] दक्षिण भारतावर सर्वप्रथम कोणत्या राजाने आक्रमण केले ?
उत्तर = अलाउद्दीन खिलजी
40]रेशीम उत्पादनात भारतात _राज्य अग्रेसर आहे .
उत्तर = बिहार
41] अंबाबरवा अभयारण्य समुद्रसपाटीपासून _फूट उंचीवर आहे
उत्तर = 2300
42]गेंडा या प्राण्यासाठी प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान काझीरंगा राज्यात आहे
उत्तर = आसाम
43]गडचिरोली जिल्ह्यात एकूण तालुके किती आहेत ?
उत्तर = 12
44]लाख शेती सुरु करण्यासाठी कोणती झाडे उपयुक्त आहेत ?
उत्तर - १ व २
45]मोडकसागर हे धरण कोणत्या जिल्यात आहे ?
उत्तर - ठाणे
46]महाराष्ट्रात______________ नदी ला सर्वात जास्त उपखोरी आहेत
उत्तर - गोदावरी
महत्वपूर्ण वनलायनर
✏️मानवी शरीरातील सर्वात मोठा स्नायू कोणता ? 👉 Gluteus Maximus ( मांडीमध्ये )
✏️ मानवी हृदयाचे वजन सामान्यता किती असते ? 👉 360 ग्रॅम
✏️ पक्ष्यांचे हृदय किती ( Chamber ) चेंबर मध्ये विभागलेले असते ? 👉 4 चेंबर
✏️ वनस्पती आणि प्राणी यांना जोडणारा दुवा म्हणून कशाचा उल्लेख कराल ? 👉 युग्लिना
✏️ चिंच आणि द्राक्ष मध्ये कोणते आम्ल असते ? 👉 टॉर्टरिक आम्ल
✏️ अन्न पचवण्यासाठी _ आम्लाचा उपयोग होतो ? 👉 हायड्रोक्लोरिक आम्ल ( HCL )
✏️ ' बेकिंग पावडर ' तयार करण्यासाठी कोणते आम्ल वापरले जाते ? 👉 टोर्टरिक आम्ल
✏️ ' तडीत वाहक ' बनवण्यासाठी कशाचा वापर करतात ? 👉 तांबे
✏️ ' तडीत वाहकाचा ' शोध कोणी लावला ? 👉 बेंजामिन फ्रँकलिन
✏️ विद्युत परिपथातील रोध कमी करण्यासाठी कोणती जोडणी वापरतात ? 👉 समांतर जोडणी
✏️ विद्युत परिपथातील रोध वाढविण्यासाठी कोणती जोडणी वापरतात ? 👉 एकसर जोडणी
✏️ लिटमस कागद किंवा त्याचे द्रावण हे लायकेन या वनस्पती पासून मिळवले जाते ही वनस्पती कोणत्या विभागात मोडते ? 👉 थॅलोफायटा
✏️ पुढीलपैकी काय गडद रंगाच्या बाटलीत व सूर्यप्रकाशापासून दूर साठवतात ? 👉 पोटॅशियम फेरोसायनाईट
✏️ वीजयुक्त तार आणि तटस्थ तार यांच्यातील विभवांतर हे किती असते ? 👉 220 ते 250 व्होल्ट
✏️ ' दंत वैद्याचे आरसे ' बनवण्यासाठी कोणता आरसा वापरला जातो ? 👉 अंतर्वक्र आरसा
✏️ ' दाढीचे आरसे ' बनवण्यासाठी कोणता आरसा वापरला जातो ? 👉 अंतर्वक्र आरसा
✏️ ' अन्ननलिकेचा ' सर्वात लांब भाग कोणता ? 👉 लहान आतडे
👮महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कोणती ? ⇒ महाराष्ट्र एक्सप्रेस
👮महाराष्ट्रातील सर्वात जास्त साखरकारखाने असणारा जिल्हा कोणता ? ⇒ अहमदनगर
🙏महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती ? ⇒ गोदावरी
🙏 महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूडपेठ कोणती ? ⇒ बल्लारपूर
🙏 महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा (माती) कोणती ? ⇒ रेगूर मृदा
🙏 महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता ? ⇒ मुंबई उपनगर
🙏 महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता ? ⇒ गडचिरोली
🙏 महाराष्ट्रातील पहिली स्त्री मुख्याध्यापिका कोण? ⇒ सावित्रीबाई फुले
🙏 महाराष्ट्रातील सर्वात पहिला साक्षर जिल्हा ⇒ सिंधुदुर्ग
🙏महाराष्ट्रातील स्त्रियांचे सर्वात जास्त प्रमाण असणारा जिल्हा कोणता ? ⇒ रत्नागिरी
🙏सर्वाधिक वनांचे प्रमाण असणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता ? ⇒ गडचिरोली
🙏भारताचे प्रवेशद्वार कोणत्या शहरास म्हणतात ? ⇒ मुंबई
🙏 भारताची आर्थिक राजधानी कोणती ? ⇒ मुंबई
🙏 सात बेटांचे शहर कोणते ? ⇒ मुंबई
🙏 महाराष्ट्रातील साखरकारखान्यांचा जिल्हा कोणता ? ⇒ अहमदनगर
🙏 महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा कोणता ? ⇒ कोल्हापूर
🙏 महाराष्ट्रातील कुस्तीगीरांचा जिल्हा कोणता ? ⇒ कोल्हापूर
🙏 महाराष्ट्रातील जंगलांचा जिल्हा कोणता ? ⇒ गडचिरोली
🙏 अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार कोणत्या शहरास म्हणतात ? ⇒ जळगाव
🙏 महाराष्ट्रातील संत्र्याचा जिल्हा कोणता ? ⇒ नागपूर
🙏 महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा कोणता ? ⇒ नांदेड
🙏मुंबईचा परसबाग कोणत्या शहरास म्हणतात ⇒ नाशिक
🙏आपल्या देशाचे नाव काय आहे ? ⇒ भारत
आयटक
◾️भारतातील सर्वांत जुनी कामगार संघटना आयटक
(ऑल इंडिया ट्रेड य़ुनियन कॉंग्रेस)ची
◾️ सथापना 31 ऑक्टोंबर 1920 साली झाली.
◾️बरिटनच्या ट्रेड युनियन काँग्रेसच्या धर्तीवर स्थापन झालेल्या आयटकने ती उणीव भरून काढली
◾️पंजाबमधील नेते लाला लजपतराय हे आयटक चे पहिले अध्यक्ष होते.
◾️ही संघटना कामगारांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यात महत्त्वाचे योगदान देणार होती.
◾️ चित्तरंजन दास हे आईटक चे तिसरे आणि चवथे अध्यक्ष होते.
◾️आयटकचे प्रधान कार्यालय नवी दिल्ली येथे आहे.
◾️आयटक ट्रेड युनियन रेकॉर्ड नावाचे पाक्षिक प्रसिद्ध करते.
◾️1930 मध्ये संबंध बिघडले
◾️1947 नंतर ह्या संघटनेत साम्यवाद्यांखेरीज दुसरे कोणीही उरले नाही
◾️दशातील मध्यवर्ती कामगार संघटनांमध्ये इंटकनंतर आयटकचा दुसरा क्रमांक लागतो.
◾️महत्वाच्या व्यक्ति:- लाला लजपतराय, पं नेहरु, सुभाषचंद्र बोस, एस एम जोशी, टिळक, एन एम राय, चित्तरंजन दास, सरोजिनी नायडू इ.
वहाबी आंदोलन
🔹वहाबी चे प्रवर्तक रायबरेली चे 'सैय्यद अहमद' होते
🔸वहाबी 1828 ई. ते 1888 पर्यंत
🔹आन्दोलनाचे मुख्य केन्द्र पटना शहर होते
🔸पटना चे विलायत अली व इनायत अली या आन्दोलन चे प्रमुख नायक होते
🔹ह आन्दोलन मूलता मुस्लिम सुधारवादी आन्दोलन होते
🔸ज उत्तर पश्चिम, पूर्वी भारत तथा मध्य भारतात होते
📚 सय्यद अहमद ची इच्छा 📚
🔹सय्यद अहमद इस्लाम धर्मातील परिवर्तने तथा सुधारणांच्या विरुद्ध होते
🔸तयांची इच्छा हजरत मोहम्मद कालीन इस्लाम धर्माला पुन:स्थापित करण्याची होती
🔹सय्यद अहमद पंजाब चे सिक्ख आणि बंगाल चे अंग्रेजांना विरोध केला
🔸अनुयायांना शस्त्र धारण व प्रशिक्षित करुन स्वयं सैनिकी वेशभूषा धारण केली,
🔹तयांनी पेशावर वर 1830 ई. मध्ये काही काळासाठी अधिकार ठेवला
🔸अापल्या नावाचे सिक्के भी चालवले
📚 फाँसी ची शिक्षा 📚
🔸1857 मध्ये आन्दोलनाचे नेतृत्व पीर अली ने केले
🔹कमिश्नर टेलबू ने एलिफिन्सटन सिनेमा समोर एका झाडाला लटकवून फाँसी दिली
🔸तयांच्याबरोबर ग़ुलाम अब्बास, जुम्मन, उंधु, हाजीमान, रमजान, पीर बख्श, वहीद अली, ग़ुलाम अली, मुहम्मद अख्तर, असगर अली, नन्दलाल एवं छोटू यादव यांना फाँसी वर दिली
एमपीएससी-महाराष्ट्राचा इतिहास
बऱ्याचशा स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य अध्ययन या विषयामध्ये आपल्या शालेय विषयातले इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्रसारखे बऱ्याच विद्यार्थ्यांना कंटाळवाणे वाटणारे विषय असतात, पण हेच विषय आपल्या पुढच्या अभ्यासाचा आणि आयुष्याचा पाया आहे. त्यात प्रामुख्याने १८८५ ते १९४७ पर्यंत महाराष्ट्रात घडलेल्या घडामोडींचा समावेश होतो. यात खालील घटकांचा समावेश होतो. मुख्यत्वे 'महाराष्ट्राच्या इतिहासा'चा प्रभाव जाणवतो.
० महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा
० महाराष्ट्रातील आर्थिक सुधारणा
० राजकीय पुढाऱ्यांचे कार्य/ समाजसुधारकांचे कार्य
० वर्तमानपत्रे व शैक्षणिक संस्थांचे कार्य
० महाराष्ट्रातील चळवळी
या सर्व घटकांचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत.
१९ व्या शतकात सामाजिक जागृतीची सुरुवात महाराष्ट्र व बंगालमध्ये मोठय़ा प्रमाणावर झाली. त्यात प्रामुख्याने प्रार्थनासमाज (न्या. रानडे), आर्य समाज (स्वामी दयानंद सरस्वती) व सत्यशोधक समाजाची (महात्मा फुले) स्थापना महाराष्ट्रात झाली. नंतरच्या काळात थिऑसॉफिकल सोसायटी (डॉ. अॅनी बेझंट), रामकृष्ण मिशन (स्वामी विवेकानंद)च्या माध्यमातून महाराष्ट्रातील उपेक्षित, कष्टकरी व दलित समाजासाठी विशेष कार्य केले. स्वातंत्र्य चळवळीसोबतच बहुजन समाजाचा विकास व्हावा म्हणून विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली.
ब्रिटिश काळात मुंबई हे कापूस व्यापाराचे प्रमुख केंद्र होते. १८८० साली नारायणराव लोखंडे यांनी कामगारांसाठी मिल हॅण्ड असोसिएशन सोसायटीची स्थापना केली. १९०५ साली लॉर्ड कर्झनने उद्योगधंदे, व्यापार व तांत्रिक शिक्षणाच्या सोयी केल्या. १९२० मध्ये टाटांचा जलविद्युत प्रकल्प खोपोली येथे सुरू झाला.
महाराष्ट्रातील पहिली कागद गिरणी 'डेक्कन पेपर मिल' १८८७ मध्ये सुरू झाली. २३ डिसेंबर १९४० रोजी वालचंद हिराचंद या महाराष्ट्रीय उद्योजकाने 'हिंदुस्थान एअरक्राफ्ट' ही विमान कंपनी स्थापन केली. थोडक्यात, स्वातंत्र्यपूर्व काळात महाराष्ट्र सामाजिक व आर्थिक सुधारणेत देशात आघाडीवर होता. या घटकांवर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमध्ये या सुधारणांना कारणीभूत असणाऱ्या संघटना, त्यांची स्थापना, संघटनेशी संबंधित नेते याबाबत प्रश्न विचारले जाऊ शकतात.
स्वातंत्र्यलढय़ात सहभागी असलेले महाराष्ट्रातील राजकीय पुढारी व समाजसुधारक यांच्या नेतृत्वावर आधारित प्रश्न विचारले जातात. जसे- 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?' या आशयाचा 'केसरी'तून लेख लिहिणारे लोकमान्य टिळक, महात्मा गांधींचे राजकीय गुरू गोपाळकृष्ण गोखले, न्या. महादेव गोविंद रानडे, 'मुंबईचा सिंह' म्हणून ओळखले जाणारे फिरोजशहा मेहता, भारताचे पितामह म्हणून ओळखले जाणारे दादाभाई नौरोजी, 'भूदान चळवळी'चे नेते विनोबा भावे, मातृभूमीसाठी जन्मठेपेची शिक्षा भोगणारे स्वा. सावरकर यांसारख्या नेत्यांनी स्थापन केलेल्या संघटना, त्यांनी लिहिलेली पुस्तके, त्यांनी सुरू केलेल्या चळवळी, त्यांचे जन्मवर्ष, जन्मठिकाण याबाबत प्रश्न विचारले जातात.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीत राष्ट्रवादाची भावना निर्माण करणाऱ्या घटकांपैकी महत्त्वाचे घटक म्हणजे देशाच्या वेगवेगळ्या भागांत सुरू झालेली वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मासिके व समाजसुधारकांनी सुरू केलेल्या विविध शैक्षणिक चळवळी. बाळशास्त्री जांभेकरांनी मराठीतून पहिले वृत्तपत्र 'दर्पण' सुरू केले.
लोकहितवादींनी 'शतपत्रे', 'प्रभाकर' मासिकातून प्रसिद्ध करून राष्ट्रवादाला चालना दिली. टिळक-आगरकरांनी 'केसरी', 'मराठा' व 'सुधारका'तून राजकीय स्वातंत्र्याचा व समतेचा पुरस्कार केला. गांधीजींनी 'यंग इंडिया' साप्ताहिकातून इंग्रजांविरुद्ध लढा सुरू केला.
या राष्ट्रवादी चळवळीसोबत १८४८ साली महात्मा फुलेंनी पुण्यात पहिली मुलींची शाळा काढली. १८८० व १८८१ साली आगरकरांनी अनुक्रमे न्यू इंग्लिश स्कूल व फग्र्युसन कॉलेजची स्थापना केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, शाहू महाराज, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी शैक्षणिक संस्था काढून मोठय़ा प्रमाणावर वैचारिक क्रांती घडवून आणली. या सर्वावर अनेक प्रश्न विचारले जातात.
यात प्रामुख्याने महात्मा फुलेंनी सुरू केलेली सत्यशोधक समाजाची स्थापना, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना एकत्र आणून त्यांच्या हक्काबाबत जागृतीचे केलेले कार्य, त्यांनी स्थापन केलेली 'इंडिपेंडंट लेबर पार्टी', महाड येथे केलेला 'चवदार तळ्याचा सत्याग्रह', आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी केलेल्या क्रांतिकारी चळवळी, १८५७ च्या उठावातील तात्या टोपे, नानासाहेब पेशवेंसारखे क्रांतिकारी नेते, १९१३ साली लाला हरदयाल यांनी केलेली 'गदर पार्टी'ची स्थापना, स्वा. सावरकरांनी स्थापन केलेली 'अभिनव भारत संघटना', चापेकर बंधूंचे कार्य, राष्ट्रीय क्रांतिकारक चळवळीतील विविध संघटना, क्रांतिकारकांनी लिहिलेली पुस्तके, आत्मचरित्रे त्यांनी
आखलेले काकोरी कट, चितगाव कटासारख्या घटना, फासावर गेलेले क्रांतिवीर यांसारख्या अनेक घटनांवर प्रश्न विचारले जातात.
भारतातील विविध कामगार संघटना, त्यांचे नेते, 'मिरज खटला', आयटक व इंटकसारख्या संघटनांची स्थापना, शेतकरी चळवळी, दुष्काळी काळात सारा वसुलीबाबत इंग्रजांनी अवलंबलेले सक्तीचे धोरण, त्यातून १८७५ मध्ये डेक्कनचे दंगे झाले.
सेनापती बापट यांनी 'मुळशी सत्याग्रह' सुरू केला. आदिवासींच्या उठावाचे नेतृत्व उमाजी नाईक यांनी केले, भिल्ल, कोळी, सावंत यांनी इंग्रजांविरुद्ध महाराष्ट्रात उठाव केला. त्याचे क्षेत्र व कार्य याबाबत प्रश्न विचारले जातात.
यासाठी आपणास जयसिंगराव पवारलिखित 'भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास' हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे, याशिवाय पाचवी ते बारावीची इतिहासाची क्रमिक पुस्तके, महात्मा गांधी 'माझे सत्याचे प्रयोग', स्टडी सर्कलची विविध पुस्तके यांचा आपणास सदरच्या स्पर्धा परीक्षांसाठी मोठय़ा प्रमाणावर उपयोग होऊ शकतो.
रावबहाद्दुर नारायण मेघाजी लोखंडे
(जन्म: इ.स. १८४८; मृत्यू : ९ फेब्रुवारी, इ.स. १८९७)
🌱ह एक भारतीय कामगार पुढारी होते.
नारायण मेघाजींचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील सासवडजवळचे कन्हेरसर.
🌱माळी शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या लोखंडे यांनी गरीब परिस्थितीतून माध्यमिक शिक्षण पुरे केले.
सुरुवातीस रेल्वे खात्यात कारकून म्हणून व पुढे पोस्ट खात्यात काही काळ नोकरी केल्यावर, लोखंडे यांना मुंबईच्या मांडवी भागात एका कापड गिरणीत भांडारपालाची नोकरी मिळाली.
तेथे त्यांना दहशतीच्या वातावरणात, दिवसातून १३-१४ तास काम करीत असलेले गिरणी कामगार आढळले; त्यांना आठवडयाची सुटीही मिळत नसे; परिणामी लोखंडे यांनी नोकरी सोडून स्वतःस कामगार चळवळीस वाहून घेण्याचे ठरविले.
त्याकरिता ते कामगार वस्तीतच राहू लागले. त्यांनी बाँबे मिल हँड्स असोसिएशन ही गिरणी कामगार संघटना २३ सप्टेंबर १८८४ रोजी स्थापली.
ही कामगार संघटना भारतातील संघटित कामगार चळवळीची सुरुवात मानली जाते.
🌱 इ.स.च्या १९व्या शतकात प्रथमच सुरू झालेल्या भारतातील कामगार चळवळीचे जनक म्हणून नारायण मेघाजी लोखंडे ओळखले जातात.
🌱लोखंडे हे महात्मा फुल्यांनी स्थापलेल्या सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेचे अध्यक्षही होते.
तसेच सत्यशोधक चळवळीतली त्यांची कामगिरीही महत्त्वपूर्ण मानली जाते.
🌱लोखंडे यांच्या पत्नीचे नाव गोपिकाबाई व मुलाचे नाव गोपीनाथ असे होते.
🍀🍀पत्रकारिता 🍀🍀
इ.स. १८८० मध्ये पुण्यात बंद पडलेले दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचे पहिले मुखपत्र लोखंडे यांनी मुंबईत सुरू केले.
🌱 ह नियतकालिक शेतकरी-कामकरी वर्गाची बाजू हिरिरीने मांडे; त्यांच्या हालअपेष्टांना, दुःखाला वाचा फोडून सरकाचे व जनतेचे लक्ष वेधून घेत असे.
लोखंडे यांनी गुराखी या नावाचे एक दैनिकही काढले होते.
🌱सक्तीचे शिक्षण, दारूबंदी, मागासलेल्यांना नोकरीत प्रवेश, विद्यार्थ्यांना सवलती, शेतकऱ्यांना जंगलच्या कायद्यामुळे होणारा त्रास, विधवांच्या केशवपनास बंदी वगैरे अनेक प्रश्नांना लोखंडे यांनी दीनबंधूमधून वाचा फोडली.
रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची दुर्दशा झाली असल्याचा पहिला आवाज दीनबंधूने उठविला.
🍀परस्कार आणि सन्मान 🍀
लॉर्ड लॅन्सडाऊन च्या काळात मुंबईत १८९३ मध्ये झालेल्या हिंदू-मुसलमानांच्या दंगलीत शांतता प्रस्थापित करण्याचे काम नारायण मेघाजी लोखंडे यांनी केले.
या कामगिरीबद्दल इंग्रज सरकारने त्यांना ‘रावबहादूर’ ही पदवी बहाल केली.
ब्रिटिश सरकारने लोखंडे यांनी कामगारांसाठी केलेल्या कामगिरीची दखल देऊन त्यांना ‘जे.पी.’ (जस्टिस ऑफ पीस) हा किताब देऊन त्यांचा गौरव केला.
🍀पलेगने मृत्यू 🍀
मुंबईत इ.स. १८९६ मध्ये प्लेगची मोठी साथ उसळली. या साथीत अनेक लोक मृत्युमुखी पडले. याही वेळी पुढाकार घेऊन लोखंडे यांनी सरकारी मदतीने प्लेगग्रस्तांसाठी एक ‘मराठा इस्पितळ’ काढले; परंतु दुर्देवाने लोखंडे यांनाच प्लेगने पछाडले व त्यातच त्यांचा अंत झाला.
सर्व परीक्षा महत्वाचे 50 प्रश्न आणि उत्तरे
1) सफरचंदात कोणते आम्ल आढळते?
उत्तर:- malic ऍसिड✅
२) चिंचेमध्ये कोणते आम्ल आढळते?
उत्तर:- टार्टारिक आम्ल✅
3) दूध आणि दह्यामध्ये कोणते ऍसिड आढळते?
उत्तर:- लैक्टिक ऍसिड✅
4) व्हिनेगरमध्ये कोणते ऍसिड आढळते?
उत्तर:- ऍसिटिक ऍसिड✅
5) लाल मुंगीच्या नांगीमध्ये कोणते आम्ल असते?
उत्तर :-फॉर्मिक आम्ल✅
6) लिंबू आणि आंबट पदार्थांमध्ये कोणते ऍसिड आढळते?
उत्तर:- सायट्रिक आम्ल✅
7) टोमॅटोच्या बियांमध्ये कोणते आम्ल आढळते?
उत्तर :-ऑक्सॅलिक ऍसिड✅
8) किडनी स्टोनला काय म्हणतात?
उत्तर:- कॅल्शियम ऑक्सलेट✅
9) प्रथिनांच्या पचनासाठी कोणते आम्ल उपयुक्त आहे?
उत्तर :- हायड्रोक्लोरिक आम्ल✅
10) सायलेंट व्हॅली कुठे आहे?
उत्तर:- केरळ✅
11) इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- गुरुग्राम (हरियाणा)
12) विक्रम साराभाई अंतराळ केंद्र कोठे आहे?
उत्तर :- तिरुवनंतपुरम
13) सतीश धवन अंतराळ केंद्र कोठे आहे?
उत्तर:- श्री हरिकोटा✅
14) भारतीय कृषी संशोधन केंद्र कोठे आहे?
उत्तर:- नवी दिल्ली✅
15) केंद्रीय भात संशोधन संस्था कोठे आहे?
उत्तर:- कटक (ओडिशा)✅
16) हॉकी विश्वचषक 2023 कोणत्या देशात आयोजित केला जाईल?
उत्तर :- भारत✅
17) हॉकीचा जादूगार कोणाला म्हणतात?
उत्तर:- मेजर ध्यानचंद✅
18) क्योटो प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे?
उत्तर:- हरितगृह वायू✅
19) मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कोणाशी संबंधित आहे?
उत्तर:- ओझोन थर संरक्षण✅
20) रामसर अधिवेशन कोणाशी संबंधित आहे?
उत्तर :-आर्द्र प्रदेशांचे संवर्धन✅
21) स्कॉटहोम परिषद कधी झाली?
उत्तर:- 1912 मध्ये✅
22) जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- वॉशिंग्टन डी. सी✅
23) आशियाई विकास बँकेचे (ADB) मुख्यालय कोठे आहे?
उत्तर :- मनिला✅
24) संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर :- नैरोबी, केनिया✅
25) जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- जिनिव्हा.✅
26) UNESCO चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- पॅरिस✅
27) ऍम्नेस्टी इंटरनॅशनलचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- लंडन✅
28) ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम प्रोड्युसिंग कंट्रीज (OPEC) चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- व्हिएन्ना✅
29) ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (OECD) चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- पॅरिस✅
30) आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे (ILO) मुख्यालय कोठे आहे?
उत्तर :- जिनिव्हा✅
31) कोणत्या अंतराळ संस्थेने फाल्कन 9 रॉकेट प्रक्षेपित केले?
उत्तर:- space-x✅
32) होप मिशन कोणत्या देशाने सुरू केले आहे?
उत्तर:- संयुक्त अरब अमिराती (UAE)✅
33) भारताने 2017 मध्ये कोणत्या वाहनाने 104 उपग्रह प्रक्षेपित केले?
उत्तर:- PSLV C37✅
34) शिपकिला पास कोठे आहे?
उत्तर:- हिमाचल प्रदेश✅
35) सतलज नदी कोणत्या खिंडीतून भारतात प्रवेश करते?
उत्तर :-शिपकिला पास✅
36) नथुला पास कोणत्या राज्यात आहे?
उत्तर :- सिक्किम✅
37) बोमडिला पास कोणत्या राज्यात आहे?
उत्तर :- अरुणाचल प्रदेश✅
38) तुजू पास कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- मणिपूर✅
39) व्याघ्र राज्य काय म्हणतात?
उत्तर:- मध्य प्रदेश✅
40) सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प कोठे आहे?
उत्तर:- ओडिशा✅
41) नागरहोल व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- कर्नाटक✅
42) पलामू व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- झारखंड✅
43) ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- महाराष्ट्र✅
44) खजुराहो मंदिर कोणी बांधले?
उत्तर :-चंदेला शासक (छत्तर, मध्य प्रदेश)✅
45) खजुराहोची मंदिरे कोणत्या शैलीत बांधली गेली आहेत?
उत्तर:- पंचायत शैली✅
46) हुमायूनची कबर कोणत्या शैलीत बांधलेली आहे?
उत्तर:- चारबाग शैली✅
47) पूर्वेकडील ताजमहाल म्हणून काय ओळखले जाते?
उत्तर:- हुमायूनची कबर✅
48) बृहदीश्वर मंदिर कोणत्या शैलीत बांधले आहे?
उत्तर:- द्रविड शैली✅
49) बृहदेश्वर मंदिर कोणत्या राज्यकर्त्यांनी बांधले?
उत्तर:- चोल शासक✅
५०) बृहदीश्वर मंदिर कोठे आहे?
उत्तर:- तंजोर.✅
भारतीय राज्यघटनेतील महत्त्वाची कलमे 1 ते 51पर्यंत
भारतीय राज्यघटनेतील महत्त्वाची कलमे Important Constitutional Articles
संविधानात्मक महत्वाची कलमे Important Articles
लोकशाही प्रशासन असणाऱ्या राष्ट्रांमध्ये लोकांच्या हाती सत्ता एकवटलेली असते. लोकशाही प्रशासनामध्ये लोक महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात.
अशा लोकांना आपले हक्क व अधिकार माहित असणे गरजेचे असते. आणि असे हक्क-अधिकार लोकशाही राष्ट्राच्या संविधाना कडून मिळत असतात. संविधानामध्ये हे अधिकार स्पष्ट करणारी महत्त्वाची कलमे असतात.
भारतीय संघराज्याने सुद्धा लोकशाही प्रशासन व्यवस्था स्वीकारलेली आहे. म्हणून आपल्या देशात लोकांना खूप महत्त्वाचे स्थान आहे.
भारतीय संघराज्यातील प्रत्येक नागरिक महत्त्वाचा आहे.
अशा प्रत्येक नागरिकाला संविधानाने दिलेले हक्क आणि अधिकार विषयक संविधानात्मक महत्वाची कलमे या ठिकाणी पाहणार आहोत.
कलम 1 – संघराज्य या राज्यांचा संघ असेल असे म्हटले आहे
कलम 2 – मध्ये भारतीय संघात योग्य वाटतील त्या अटी आणि शर्ती वर नवीन राज्यांना समाविष्ट करणे हा अधिकार कलम 2 ने संसदेला दिला
कलम 3 – मध्ये नवीन राज्याची निर्मिती व विद्यमान राज्याच्या क्षेत्रात सिमात किंवा नावात बदल
कलम 4 – परिशिष्ट 1 व परिशिष्ट 4 ची दुरुस्ती आणि पूरक अनुषंगिक आणि त्यातून उत्पन्न होणाऱ्या त्यासंबंधी कलम 2 व कलम 3 अंतर्गत करण्यात आलेले कायदे
राज्यघटनेतील भाग दोन मध्ये कलम 5 ते कलम 11 पर्यंतच्या तरतुदी नागरिकत्वाशी संबंधित आहेत.
कलम 5 – राज्य घटनेच्या प्रारंभीचे नागरिकत्व
कलम 6 – पाकिस्तान मधून भारतात स्थलांतरित झालेल्या विवाहित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क
कलम 7 – पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क
कलम 8 – मूळ भारतीय असणाऱ्या पण भारताबाहेर राहणाऱ्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क
कलम 9 – परकीय देशाचे नागरिकत्व स्वेच्छेने संपादन करणाऱ्या व्यक्ती भारताच्या नागरिक नसणे
कलम 10 – नागरिकत्वाचे हक्क चालू राहणे
कलम 11 – कायद्याद्वारे संसद नागरिकत्वाच्या याचे नियमन करेल.
भारतीय राज्यघटनेच्या भाग-3 मधील तरतुदी मूलभूत हक्काचे संबंधित असून अमेरिकेच्या घटनेवरून या स्वीकारण्यात आलेल्या आहेत. कलम 12 ते 35 या कलमांचा समावेश मूलभूत हक्कांमध्ये होतो.
*समानतेचा हक्क कलम 14 ते 18
*स्वातंत्र्याचा हक्क कलम 19 ते 22
*शोषणाविरुद्धचा हक्क कलम 23 ते 24
*धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क कलम 25 ते 28
*सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क कलम 29 30
*घटनात्मक उपाययोजनेचा हक्क कलम 32
कलम 31 – (निरसित)
कलम 33 – सैन्य दलासाठी मूलभूत फक्त संसदेला अधिकार
कलम 34 – लष्करी कायदा लागू मूलभूत हक्कावर मर्यादा
कलम 35 – मूलभूत कशासाठी तरतुदी लागू करण्याचा कायदा
भारतीय राज्यघटनेच्या भाग-4 मध्ये राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे देण्यात आलेली आहेत. ही मार्गदर्शक तत्त्वे कलम 36 ते 51 पर्यंत आहेत.
कलम 36 – राज्याची व्याख्या
कलम 37 – निर्देशक तत्वाचे उपयोजन
कलम 38 – लोककल्याणाच्या संवर्धनासाठी राज्याने समाजव्यवस्था प्रस्थापित करणे
कलम 39 – राज्याने अनुसरा वयाच्या धोरणाची विवक्षित तत्वे
कलम 39 a – समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य
कलम 40 – ग्रामपंचायतीचे संघटन
कलम 41 – कामाचा शिक्षणाचा आणि युवक शेत बाबतीत लोक सहाय्याचा यांची तरतुदी
कलम 42 – कामाच्या ठिकाणी न्याय व मानवीय परिस्थिती आणि प्रसुती विषयक सहाय्य याची तरतूद
कलम 43 – कामगारांना निर्वाह वेतन इत्यादी
कलम 43 A – औद्योगिक व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग
कलम 43 B – सहकार संस्थांचे प्रवर्तन
कलम 44 -नागरिकांसाठी समान नागरी संहिता
कलम 45 – 6 वर्षाखालील बालकांची प्रारंभिक बाल्य अवस्थेतील देखभाल व शिक्षणाची तरतूद
कलम 46 – अनुसूचित जाती जमाती आणि इतर दुर्बल घटकांचे शैक्षणिक आणि आर्थिक हित संवर्धन
कलम 47 – पोषणाचा व जीवनमानाचा स्तर उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्यांचे कर्तव्य
कलम 48 – कृषी आणि पशुसंवर्धन यांची सुसूत्र व्यवस्था करणे
कलम 48 A – पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे आणि वने व जीवसृष्टी यांचे रक्षण करणे
कलम 49 – राष्ट्रीय दृष्ट्या महत्त्वाची स्मारके ठिकाने वास्तू यांचे संरक्षण
कलम 50 – कार्यकारी यंत्रणेने पासून न्याय यंत्रणेची फारकत
कलम 51 – आंतरराष्ट्रिय शांतता आणि सुरक्षा यांचे संवर्धन.
जमीन महसूल धोरण
रयतवारी
०१. १६ ऑगस्ट १७६५ मध्ये अलाहाबादच्या तहानुसार सम्राट शहाआलमने बंगाल, बिहार,ओरिसाचे दिवाणीचे (कर, वसूल, करणे) अधिकार कंपनीला दिले. बंगालच्या नबाबने फेब्रुवारी १७६५ मध्ये निजामतीचे (लष्करी, फौजदारी, न्यायनिवाडा) अधिकार कंपनीकडे दिले. परंतु राज्यकारभारची व सुव्यवस्थेची जबाबदारी बंगालच्या नबाबकडेच राहिली. त्यामुळे कंपनीच्या हाती निजामती आणि दिवाणीचे अधिकार केंद्रित झाले.
०२. पंरतू प्रत्यक्षात संपूर्ण राजकीय सत्ता कंपनीने स्वत:कडे घेतली नाही. कारण ब्रिटिश संसदेचे कंपनीवरील नियंत्रण व हस्तक्षेपाची त्यासोबतच अंतर्गत बाहय शत्रु यांची कंपनीला भीती वाटत होती. भारतात राज्य कारभार करण्यासाठी भारतीय शासनपध्दतीची माहिती असणारा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग नव्हता. बंगालवर कंपनीने पूर्ण अधिकार बसवला असता तर एतद्देशीय सत्ताधीशानी कंपनीशी संघर्ष सुरु केला असता व बंगाल इंग्रजांना पचू दिला नसता.
०३. म्हणून लॉर्ड क्लाईव्हने दुहेरी राज्यव्यवस्था सुरु केली कंपनीने दिवाणी करवसुली वन्यायदान अधिकार नबाबाकडे ठेवला व्यापार सैन्य, परराष्ट्र, व्यवहार आणि खजिना इ. महत्वाची कार्ये कंपनीने स्वत:कडे ठेवली अशा प्रकारे नबाब आणि कंपनी यांच्यात सत्ता विभागली गेली म्हणूनच तिला दुहेरी राज्यव्यस्था असे म्हणतात. या कार्यासाठी बंगालच्या नबाबला ५३ लाख रुपयांची पेन्शन देण्यात आली. १७६५-१७७२ या काळात बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात होती.
०४. परंतु या दुहेरी राज्यव्यव्यस्थेत राज्याची सत्ता व जबाबदारी यांची फारकत करण्यात आली होती. ही गंभीर चूक होती. राज्यात दुष्काळ पडला तरी सामान्य जनतेचा विचार न करता कंपनी निर्दयीपणे जमीन महसूल गोळा करीत असे व प्रचंड संपत्ती मिळवीत असे. त्यामुळे कोटी माणसे अन्नान्न करुन तडफडून मेली. बंगालमध्ये स्मशानकळा पसरली.
०५. या व्यवस्थेमुळे गोंधळ व भ्रष्टाचार निर्माण झाल्याने १७७२ मध्ये वॉरन हेस्टिंग्जने बंद केली. शेवटी इंग्रज सरकारने कंपनीच्या कारभाराची चौकशी करुन तिच्यावर नियंत्रण प्रस्थपित करणारा रेग्युलेंटिग अॅक्ट पास केला. (१७७३)
०६. वॉरेन हेस्टीन्ग्जने सरकारच्या मालकीची सर्व जमीन असते, या भूमिकेतून जमीन महसूल व्यवस्था पद्धतीत बदल करून महसूल रकमेचा लिलाव करण्याची पद्धत लागू केली. रोबर्ट क्लाइव्ह महसूल रकमेचा वार्षिक लिलाव करीत असे. वॉरेन हेस्टीन्ग्जने हा लिलाव पंचवार्षिक केला. परंतु त्याने पुन्हा वरशील लिलाव पद्धती आणली.
कायमधारा पद्धती
०१. लॉर्ड कॉर्नवॉलिस गव्हर्नर जनरल असताना १७९३ मध्ये ही पद्धत सुरू झाली. मुख्यतः कायमधारा पद्धती बिहार, बंगाल, ओरिसा या भागांत तर कालांतराने मद्रास व वाराणसी येथे सुरु केली. या पद्धतीत सारा वसुलीचा अधिकार जमिनदारांना देण्यात आला व ते जमिनीचे मालक बनले म्हणून हिला जमीनदारी पद्धती असे नाव पडले. १७९३ मध्ये कॉर्नवालीसने हि व्यवस्था कायमस्वरूपी किंवा किमान १० वर्षांसाठी लागू केली म्हणून या पद्धतीला कायमधारा पद्धत असे नाव पडले. मात्र सर्वत्र हीच पद्धत लागू न करता अन्य प्रांतात ‘महालवारी’ व ‘रयतवारी’ पद्धत लागू केली गेली.
०२. तात्पुरता सारा पद्धतीत त्या प्रदेशात उत्पन्न होणाऱ्या प्रमुख पिकांचे दर एकरी उत्पादन, शेतमालाच्या किंमती, जमिनीची खंडाने द्यावयाची व विक्रीची किंमत, तसेच उत्पादनाचा सरासरी खर्च या गोष्टी लक्षात घेऊन १५ ते ४० वर्षांसाठी आकारणी केली जावी, अशी तरतूद होती. तात्पुरता सारा पद्धतीनुसार जमीनदार, मालगुजार वगैरे मध्यस्थांबरोबर करार करण्यात येत असत.
०३. मात्र कायमधारा पद्धतीत प्रत्येक शेतकऱ्यावरील सारा परंपरेनुसार कायम करण्यात आला. कायमधारा पद्धतीत शेतसाऱ्याच्या १०/११ भाग सरकारकडे जमा करायचा व १/११ भाग जमीनदाराने घ्यावयाचा, असे निश्चित करण्यात आले होते. बंगाल मध्ये सरकारची महसुलाची रक्कम पूर्ण न भरल्यास किवा निश्चित वेळेस न भरल्यास जमीनदाराचा महसूल जमा करण्याचा अधिकार रद्द केला जाईल.
०४. कायमधारा पद्धतीला जागीरदारी,मालगुजारी,बिस्वेदारी म्हणून ओळखले जाते. ही पद्धत लागू करण्यासाठी लॉर्ड कोर्नवालीसने जॉन शोअर याच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. जॉन शोअरच्या अहवालात ‘जमीनदार हेच जमिनीचे मालक’ असल्याचे आणि त्यांना परंपरागत अधिकार असल्याचे नमूद करण्यात आले.
०५. या पद्धतीत शासन-जमीनदार-शेतकरी या ३ वर्गांचा समावेश होता मात्र शासन व प्रजेचा सबंध येत नव्हता. या पद्धतीमुळे कंपनीला मिळणारा शेतसारा निश्चित झाला. जॉन शोअरने हि पद्धत प्रथम १० वर्षासाठी सुचवली होती परंतु कॉर्नवालीसने ती कायमस्वरूपी केली.
०६. या पद्धतीत गेल्या काही वर्षातील शेतजमिनीच्या उत्पन्नाची सरासरी काढून दरवर्षी त्या जमिनीमागे किती सारा निश्चित करता येईल याचा विचार करून वर्षाकाठी साऱ्याची निश्चित रक्कम ठरवली गेली.१० वर्षाच्या कराराने जमीनदारांना जमीन महसूल वसुलीसाठी देण्यात आली. जमिनदारांनी सरासरीप्रमाणे जास्तीत जास्त सारा निश्चित करून ठराविक सारा सरकारला देणे असे ठरविण्यात आले.
०७. कायमधारा पद्धतीमध्ये जमिनीची मालकी जमीनदाराकडे देण्यात आली. जमीनदार जमीन विकू शकत असे,गहाण ठेवू शकत असे, दान करू शकत असे. निश्चित काळात शेतसारा जमीनदाराकडे जमा करणे शेतकऱ्यांसाठी सक्तीचे होते अथवा शेतकऱ्यांना आपल्या जमिनी गहाण टाकाव्या लागत असे. जमीनदारास भूमिविषयक सर्व अधिकार वंशपरंपरेने प्राप्त झाले. जमीनदारांकडून ठराविक महसूल वेळेवर न आल्यास सरकार त्याची जमीन काढून घेऊ शकत असे.
०८. कायमधारा पद्धतीचे अनेक फायदे झाले. कंपनी सरकारचे उत्पन्न निश्चित झाले. या उत्पनाचा शेतीच्या कमी-जास्त उत्पन्नाशी सबंध न्हवता. जमिनदारांना आपल्या जमिनीतून अधिक उत्पन्न काढण्यास प्रोत्साहन मिळाले कारण उत्पन्न वाढले असले तरी सारा जास्त भरण्याची गरज नव्हती.
०९. या व्यवस्थेमुळे जमीनदार वर्ग समृद्ध बनला. कालांतराने हाच वर्ग इंग्रजी राजवटीचा समर्थक म्हणून पुढे आला. या पद्धतीमुळे कंपनीचा महसूल व्यवस्थेत गुंतलेला वर्ग या कार्यातून मुक्त झाला व या वर्गास इतर कार्यात गुंतविणे कंपनीला शक्य झाले.
१०. कायमधारा पद्धतीचे अनेक तोटेसुद्धा दिसून आले. या व्यवस्थेचा सर्वात जास्त मोठा फटका बंगालमधील शेतकऱ्यांना बसला व ते निर्धन व भूमिहीन झाले. जमिनीवरची गावाची मालकी संपुष्टात येउन जमीनदारच मालक बनले. जमीनदार शेतकऱ्यांचे शोषण करू लागले व सारा जबरदस्तीने गोळा करू लागले. ज्या जमिनीसाठी महसुल भरायचा होता तिचीच विक्रीची वेळ शेतकऱ्यावर आली. जमीनदार चैनी व विलासी झाले. अशांचा एक अनुपस्थित जमीनदार नावाचा वर्ग निर्माण झाला.
११. ग्रामजीवन विस्कळीत झाले. कृषीव्यवस्थेचे स्थैर्य नष्ट झाले. नव्या जमीनदार वर्गाचा उदय झाला. जमिनीचा मालक असेलेला शेतकरी मजूर अथवा कुळ म्हणून काम करू लागला. जमीनदार लोक आपल्या हस्तक अथवा दलालामार्फत करांची वसुली करू लागले त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास होऊ लागला.
१२. सावकाराकडून शोषण होऊ लागले. या व्यवस्थेत फक्त महसुली उत्पन्नावर डोळा होता,जनतेच्या हिताचा विचार थोडाही नव्हता. महसुलाच्या बाबतीत सरकारची मागणी निश्चित असे परंतु जमीनदार शेतकऱ्याकडून जो महसुल गोळा करीत तो जास्त असे किवा परिवर्तनशील असे.
१३. बंगाल-बिहारचे दिवाणी हक्क प्राप्त झाल्यामुळे जमीन महसूल ठरवून तो वसूल करण्याचे काम कंपनी कडे आले. १७७२ मध्ये पाच वर्षाकरिता कायमसारा ठरवण्यात येउन त्यानुसार वसुली करण्यात आली. १७७७ मध्ये तर सारावसुली वार्षिक बोलीवर लिलावाने देण्यास सुरुवात झाली. दरवर्षीचा वसुलीचा दर वाढत जाई. १७८१ साली कलकत्ता रेवेन्यु कमिटीने २६ लाख रुपये अधिक सारा गोळा करण्याचे उद्दिष्ट गाठले.
रयतवारी पद्धती
०१. थॉमस मनरो व कॅप्टन रीड यांनी ही पद्धती १८२२ मध्ये मद्रास, मुंबई, पूर्व बंगाल, आसामचा काही भाग व कुर्ग या प्रांतात लागू केली.
०२. या पद्धतीनुसार शेतकऱ्यांना जमिनीची मालकी व भोगवट्याचे अधिकार देण्यात आले.त्यांनी जमीन महसूल थेट सरकारकडे जमा करावा असे ठरविण्यात आले. यामुळे सरकार व रयत यांच्यात थेट संबंध प्रस्थापित झाला.
०३. या पद्धतीत प्रत्यक्ष जमीन कसणाऱ्याच्या कुवतीनुसार महसूल आकारणी ठरविण्यात आली. जमिनीची मोजणी आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पादनाचा अंदाज करण्यात आला. जमिनीच्या उत्पादनाच्या ५५ टक्के महसुलाची सरकारची मागणी कायम करण्यात आली.
०४. प्रत्यक्षात रयतवारी पद्धत शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारी पद्धत ठरली. कारण सरकारने मुळात महसूल खूपच जास्त ठरविला होता. या पद्धतीत शेतकरी मालक झाला तरी त्याची परिस्थिती सुधारली नाही.
महालवारी पद्धती
०१. जमीनदारी व रयतवारी पद्धतीच्या अपयशामुळे ही तिसरी पद्धत लागू केली गेली. यानुसार एक महाल अथवा एक विभाग यातील जमीनमालकांना त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नासाठी सरकारच्या महसुलाकरिता संयुक्तपणे व व्यक्तिशः जबाबदार धरले जात असे. ही पद्धत आग्रा, अवध आणि उत्तर प्रदेशातील नंतरच्या काळात ब्रिटीश राज्यास जोडल्या गेलेल्या प्रदेशांसाठी लागू करण्यात आली.
०२. जर महाल मोठा असेल तर त्यातील काही निवडक मालकांवर महालातील महसूल वसुलीची जबाबदारी सोपविण्यात येत असे. प्रत्यक्षात एखाद्या गावातील समस्त गावकऱ्यांशी संयुक्तपणे व व्यक्तिशः ही महालवारी पद्धत लागू करण्यात आली. लॉर्ड विल्यम बेंटिकने ही पद्धत लागू केली.
०३. या पद्धतीनुसार जमिनीची मालकी व भोगवटा एकाच मालकाकडे असे व त्यानेच ती जमीन कसावयाची होती. सर्व शेतकरी जमीन मालकांनी संयुक्तपणे महसूल सरकारकडे जमा करावयाचा होता. गावप्रमुखाकरवी किंवा इतर मध्यस्थाकरवी सर्व महसूल सरकारी खजिन्यात जमा केला जात असे.
ब्रिटीश राजवटीचे आर्थिक दुष्परिणाम
०१. १७ व्या शतकात मुगल काळात भारत जगात सर्वात जास्त औद्योगिक उत्पादन करणारा देश होता.
०२. १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्रज काळात भारतातील लोकांना कच्च्या मालांपासून पक्का माल तयार करण्याची बंदी करण्यात आली.
०३. ब्रिटिशांनी आपल्या सत्तेच्या जोरावर, प्रसंगी शास्त्राचा धाक दाखवून स्थानिक लोकांना उद्योग धंदे करू न देता, ब्रिटीश व्यापारास प्रोत्साहन दिले. त्यामुळे त्याकाळी जगातील सर्वात श्रीमंत देश असलेला भारत जगातील सर्वात दरिद्री देश इंग्रजांनी बनविला.
०४. स्थानिक व्यापारावर ब्रिटिशांनी प्रतिबंधात्मक कायदे केले. बंगालमधील जे कुशल विणकर आपल्या बोटांनी उत्तम प्रकारचे तलम रेशमी कापड तयार करीत त्यांची बोटे तोडून टाकण्यापर्यंत इंग्रजांची मजल गेली. कंपनीने भारतात येणाऱ्या ब्रिटीश मालावर अडीच टक्के आयात कर ठेवला. त्यामुळे भारतातील उद्योगधंदे बसले व ब्रिटीश माल कमालीचा स्वस्त झाला.
०५. इंग्लंडमधील औद्योगिक क्रांतीमुळे एक नवा श्रीमंत भांडवलदार वर्ग निर्माण झाला. हा वर्ग १८१३ साली कंपनीची व्यापारी मक्तेदारी मोडून टाकण्यात यशस्वी झाला. भारत सरकारला ‘मुक्त व्यापार धोरण’ स्वीकारावे लागले. त्यामुळे ब्रिटीश माल भारतात मुक्तपणे येऊ लागला. १८१३ साली ब्रिटीश सुती कापडाची आयात १ लाख १० हजार पौंडाची होती, ती १८५६ साली ६ कोटी ३० लाखांची झाली.
०६. ब्रिटिशांनी भारताची मोठ्या प्रमाणावर आर्थिक पिळवणूक केली. या संपत्तीच्या लुटीचे विश्लेषण करण्यासाठी दादाभाई नौरोजींनी इस्ट इंडिया असोसिएशनच्या लंडन येथील बैठकीत २ मे १८६७ रोजी आपला ‘England’s Debt to India’ हा निबंध सादर केला. त्या वेळी ‘Drain of Wealth’ हा शब्दप्रयोग उपयोगात आणला.
०७. न्या. रानडे यांनीही असाच ‘संपत्तीच्या अपहरणाचा सिद्धांत’ मांडला. दादाभाई नौरोजी यांनी Poverty And Un-British Rule in India (1867), The Wants and means of India (1870), The Commerce of India (1871) या लेखांत ब्रिटीशांच्या संपत्तीच्या अपहरणाच्या सिद्धांताचे तपशीलवार विवेचन केले आहे. संपत्तीच्या अपहरणाचा सिद्धांत भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसने १८९६ साली कलकत्ता अधिवेशनात अधिकृतपाने स्वीकारला.
०८. ब्रिटिशांनी भारतीय औद्योगीकरणास बंदी घातली. परंतु भारताला फार काळ किंवा कायमपणे औद्योगिकरणापासून दूर ठेवणे इंग्रजांनाही शक्य नव्हते. त्यानुसार भारतात प्रथम नीळ, चहा, व कॉफी यांची औद्योगिक पातळीवर लागवड सुरु झाली.
०९. भारतात रेल्वेमार्गाची बांधणी झाल्यानंतर १९ व्या शतकाच्या मध्यास आधुनिक यंत्रसामग्री रेल्वे वाहतुकीद्वारे देशाच्या अंतर्भागात प्रस्थापित करणे शक्य झाले. त्यामुळे सुती कापडगिरण्या, ज्यूट, कोळसा इत्यादी उद्योग सुरु झाले. १९ व्या शतकाच्या अखेरीस भारताचे थोडे औद्योगीकरण आणि आधुनिकीकरण झाले.
१०. ब्रिटीश जमीन महसूल व्यवस्थेमुळे गावातील समाजातील आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक एकोपा नष्ट झाला. जमीनदार वर्ग सर्व गावचा मालक झाला. गावातील बलुतेदार, कारागीर व मजूर यांचे परंपरेने चालत आलेले आर्थिक व सामाजिक अधिकार नष्ट झाले.
महाराष्ट्र- जिल्हे व त्यांची प्रसिद्धि.
१)मुंबई--------भारताचे प्रवेशद्वार, भारताचे प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर,भारताची राजधानी
२)रत्नागिरी---देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा
३)सोलापूर----ज्वारीचे कोठार,सोलापुरी चादरी
४)कोल्हापुर--कुस्तीगिरांचा जिल्हा गुळाचा जिल्हा
५)रायगड-----तांदळाचे कोठार व डोंगरी किल्ले असलेला जिल्हा
६)सातारा----कुंतल देश व शुरांचा जिल्हा
७)बिड------जुन्या मराठी कविंचा जिल्हा, मिठगरांचा जिल्हा, देवळादेवळा जिल्हा, ऊस कामगारांचा जिल्हा
८)परभणी---ज्वारीचे कोठार
९)उस्मानाबाद--श्री.भवानी मातेचा जिल्हा
१०)औरंगाबाद--वेरुळ-अजिंठा लेण्यांचा जिल्हा, मराठवाडयाची राजधानी
११)नांदेड--संस्कृत कवींचा जिल्हा
१२)अमरावती--देवी रुख्मिणी व दमयंतीचा जिल्हा
१३)बुलढाणा--महाराष्ट्राची कापसाची बाजारपेठ
१४)नागपुर----संत्र्यांचा जिल्हा
१५)भंडारा-----तलावांचा जिल्हा
१६)गडचिरोली--जंगलांचा जिल्हा
१७)चंद्रपुर----गौंड राजांचा जिल्हा
१८)धुळे----सोलर सिटीचा जिल्हा
१९)नंदुरबार-आदिवासी बहुल जिल्हा
२०)यवतमाळ- पांढरे सोने-कापसाचा जिल्हा
२१)जळगाव--कापसाचे शेत, केळीच्या बागा,अजिंठा लेण्यांचे प्रवेशद्वार
२२)अहमदनगर-साखर कारखाने असलेला जिल्हा
२३)नाशिक---मुंबईची परसबाग, द्राक्षांचा जिल्हा,मुंबईचा गवळीवाडा
२४) सांगली - हळदीचा जिल्हा ,कलावंतांचा जिल्हा
राष्ट्रीय कॉंग्रेसच्या स्थापनेपूर्वीच्या संस्था
.
* जमीनदारांची संघटना
१८३७ मध्ये बंगालमधील काही जमीनदारांनी एकत्र येऊन 'लॅंड होल्डर्स असोसिएशन' या नावाची संस्था स्थापन केली. राजकीय हक्क मिळविणे व त्याद्वारे आपल्या अडचणी दुर करुन घेणे ही या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट होते. त्यासाठी या जमीनदारांनी सनदशीर मार्गाचा अवलंब केला. ज्या इंग्रजांना भारतीयांबदल सहानुभूती वाटत होती. त्यांचीही मदत या कामासाठी घेण्यात आली होती. तसेच इंग्लंडमधील ब्रिटिश इंडिया सोयायटीशीही सहकार्य करण्यात आले.
* "इंडियन असोसिएशन ऑफ बंगाल' १८५१ मध्ये डॉ. राजेंद्रलाल मित्र, रामगोपाल घोष इत्यादिकांनी स्थापली. तिचे कार्य काही काळ चालून ती बंद पडली. तिचे पुनरुज्जीवन इंडियन असोसिएशन ऑफ बेंगॉल प्रेसिडेन्सी या नावाने १८७६ साली सुरेंद्रनाथ बॅनर्जींच्या नेतृत्वाखाली कलकत्ता येथे झाले.
* ब्रिटिश इंडियन असोसिएशन
०१. या संस्थेची स्थापना १८५१ मध्ये झाली. यासाठी लॅंड ओनर्स असोसिएशन या नव्या संस्थेची स्थापना झाली. या संस्थेचे सुरुवातीचे सदस्य फक्त जमीनदार असले तरी नंतर यात व्यापारी उद्योगपती डॉक्टर, वकील, वृत्तपत्रकार यांचाही समावेश या संघटनेत झाला. या संघटनेचा दृष्टिकोन राष्ट्रीय स्वरुपाचा होता. बंगालमधील इतर संस्थांची तिचे चांगले संबंध होते. मद्रासमध्येही या संघटनेची शाखा काढण्यात आली होती.
* ईस्ट इंंडिया असोसिएशन
१८६५ साली लंडनमध्ये दादाभाई नौरोजी आणि उमेशचंद्र बॅनर्जी यांनी 'लंडन इंडियन सोसायटी'ची स्थापना केली. एक वर्षानंतर या सोसायटीचे रुपांतर 'ईस्ट इंडिया असोसिएशन' मध्ये झाले. ही संस्था लवकरच ब्रिटिशांमध्ये लोकप्रिय झाली. या संस्थेत सेवानिवृत्त इंग्रज अधिकारी होते. मुबई, मद्रास, कलकत्ता येथे या संघटनेच्या शाखा स्थापन झाल्या. त्या १८८४ पर्यत जोमाने कार्य करीत होत्या. पुढे ब्रिटिशांची सहानूभूती कमी झाली आणि या संस्थेचा प्रभाव हळूहळू कमी कमी होत गेली.
* पुणे सार्वजनिक सभा
०१. न्यायमूर्ती रानडे यांचे उजवे हात म्हणून ओळखले जाणारे गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांनी पुण्यात १८७० साली सार्वजनिक सभेची स्थापना केली. १८७१ मध्ये न्या. रानडे यांनी या संस्थेला राष्ट्रीय स्वरूप प्राप्त करून दिले. लॉर्ड लिटन या व्हाईसरॉयने १८७७ च्या जानेवारीत दिल्लीला एक मोठा दरबार भरवून इंग्लंडंच्या राणीला भारताची साम्राज्ञी अशी पदवी अर्पण केली.
०२. या प्रसंगी सार्वजनिक सभेने सम्राज्ञीला एक मानपत्र समर्पण केले. मानपत्रात हिंदी जनतेचे हक्क आणि हिंदी राष्ट्राच्या अंतकरणातील राजकीय आकांक्षा स्पष्टपणे नमुद केल्या होत्या. तसेच या निमित्ताने जमलेल्या सर्व प्रांतातील लोकप्रतिनिधीपूढे व राजेराजवाडयांपुढे अखिल भारतीय ऐक्याची, हिंदी पार्लमेंटची कल्पना आणि निरनिराळया प्रांतांतून आलेल्या राजकीय कार्यकर्त्याना राष्ट्रीय सभेची कल्पना सुचविली.
* मद्रास महाजन सभा
मद्रासमध्ये १८८४ साली हिंदू या वृत्तपत्राचे संपादक जी सुब्रम्हण्य अय्यर यांनी माहजन सभा नावाची संस्था केली होती. स्थानिक संस्थांच्या जानेवारी १८८५ मध्ये झालेल्या अधिवेशात कायदेमंडळाचा विस्तार करण्याची त्यात भारतीयांना प्रतिनिधीत्व देण्याची न्यायपालिका व राजस्वकार्य स्वतंत्र असण्याची मागणी करण्यात आली होती.
* इंडियन असोसिएशन
०१. २६ जुलै १८७५ रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 'इंडियन असोसिएशन' नावाची संस्था स्थापन केली. मध्यम वर्गातील लोकांच्या विचारांचे प्रतिनिधीत्व करणे आणि सार्वजनिक कार्यात भाग घेणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश होता व त्यासाठी ही संस्था कार्य करीत होती. या संस्थेच्या वतीने डिसेंबर १८८३ मध्ये कलकत्यास इंडियन नॅशनल कॉन्फरन्स चे पहिले अधिवेशन बोलविण्यात आले.
०२. या अधिवेशात सनदी परीक्षा उच्च शिक्षण, कायदेमंडळातील प्रतिनिधित्च इ. प्रश्नांवर चर्चा झाली. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी विविध प्रांतांचे दौरे काढून जाहीर व्याख्यानांमधून सरकारी धोरणावर टीका केली. त्यामुळे ठिकठिकाणी नवीन संस्था निघू लागल्या.
* इंडियन नॅशनल युनियन
१८८४ च्या शेवटी 'इंडियन नॅशनल युनियनची' स्थापना हयूम यांनी केली. भारताचे संघटन करणे. नैतिक सामाजिक व राजकीय दृष्टिने भारताचा विकास साधणे. सरकार व जनता यांच्यात प्रेमाचे संबंध प्रस्थापित करणे इ. या संघटनेची उदिष्टे होती. त्यातूनच राष्ट्रीय सभेचा उदय झाला.
* २६ ऑगस्ट १८५२ रोजी बॉम्बे असोसिएशनची जगन्नाथ शंकरशेठ, डॉ. भाऊ दाजी इत्यादिकांनी स्थापना केली. तिचे कार्य काही वर्षांनी बंद पडले. तिचे पुनरुज्जीवन बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनमध्ये ३१ जून १८८५ साली झाले. या स्थानिक प्रयत्नांना अखिल भारतव्यापी रूप १८८५ साली आले.
* भारतातील कामगार चळवळ
०१. १८५० ते १९०० हा भारतातील कामगार वर्गाच्या उदयाचा कालखंड आहे . या काळात ब्रिटीशांनी भारतात औद्योगिकीकरणास प्राधान्य दिले नाही. त्यामुळे भारतात औद्योगिक
तुम्हाला हे माहीत आहे का
● लोकसभा
- 17 वी लोकसभा निवडणूक नुकतीच संपन्न झाली.
- 4 जून 2014 (पहिले अधिवेशन) ते 3 जून 2019 हा 16 व्या लोकसभेचा कालावधी होता.
● सदस्य
- अधिकतम सदस्य संख्या 552 आहे. यामध्ये 530 सदस्य राज्याचे, 20 सदस्य केंद्रशासित प्रदेशाचे तर 2 सदस्य ऑंग्लो इंडियन (राष्ट्रपती नियुक्त) नेतृत्व करतात. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.
- 2019 मध्ये ऑंग्लो इंडियनच्या लोकसभेतील नियुक्ती रद्द करण्यात आली आहे.
- सध्या सदस्य संख्या 545 आहे, यामध्ये 543 सदस्य राज्य आणि केंद्र शासित प्रदेशाचे नेतृत्व करतात तर दोन सदस्य राष्ट्रपती नियुक्त आहेत.
- सर्वात शेवटी 1971 च्या जनगणनेनुसार 1977 मध्ये लोकसभेची सदस्य संख्या वाढवण्यात आली होती. आता 2026 नंतर ही संख्या वाढवण्यात येईल.
● संसद भवन
- राजधानी दिल्लीच्या मध्यवर्ती ठिकाणी 6 एकर परीसरात ही ऐतिहासिक वास्तू उभी आहे.
- 244 खांब आणि तीन मजल्यांची ही इमारत लोकशाहीचं प्रतिक आहे.
- लवकरच नवी संसद बांधली जाणार आहे.
● सेंट्रल हाॅल
- संसद भवनातील महत्त्वाची जागा.
- संसदेच्या दोन्ही गृहातील संयुक्त बैठकीला राष्ट्रपती येथेच संबोधित करतात.
- संविधान सभेच्या बैठका याच हाॅलमध्ये पार पडल्या होत्या. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.
- स्वातंत्र्यानंतर गव्हर्नर जनरलने भारताची सत्ता पंतप्रधानांकडे येथेच सोपवली होती.
- स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांचे पहिले भाषण "Tryst with Destiny" येथेच झाले होते.
- नव्याने निवडूण आलेल्या लोकसभा सदस्यांना शपथ घेण्याअगोदर आणि घेतल्यानंतर जवळपास 40 प्रकारचे अर्ज सादर करावे लागतात.
- संसद कार्यप्रणालीची माहिती देणारे साहित्य आणि एक पेन ड्राईव्ह प्रथमच यावेळी सदस्यांना देण्यात आला आहे. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.
- स्नेहलता श्रीवास्तव (लोकसभा महासचिव)
- सुमित्रा महाजन (16 वी लोकसभा सभापती)
- ओम बिर्ला (17 वी लोकसभा सभापती)
विभागीय परिषद (MPSC PYQ POINTS)
▪️विभागीय परिषदा या संविधानात्मक संस्था आहेत.
▪️भारतात एकूण सात विभागीय परिषदा देशातील प्रत्येक विभागासाठी निर्माण करण्यात आल्या आहेत.
▪️प्रत्येक मुख्यमंत्री हा आळीपाळीने विभागीय परिषदेचा उपाध्यक्ष म्हणून कार्य करतो.
▪️दोन किंवा अधिक विभागीय परिषदांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान केंद्रीय गृहमंत्री भूषवितो.
🔸️ विभागीय परिषदांची उद्दिष्ट्ये / कार्ये
➤ राज्यवाद, प्रादेशिकवाद, भाषावाद आणि संकुचितवादी तीव्र वृत्ती यांना आळा घालणे.
➤ देशात भावनिक ऐक्य साध्य करणे.
➤ केंद्रीय गृहमंत्री विभागीय परिषदेचे अध्यक्ष असतात.
🔸️ उत्तर-पूर्व परिषद
➤ १९७१ मधील भारताच्या उत्तर-पूर्व विभागाच्या पुनर्रचनेच्या अनुषंगाने तिची निर्मिती करण्यात आली.
➤ ८ ऑगस्ट १९७२ रोजी तिची निर्मिती करण्यात आली.
➤ २००२ मध्ये परिषदेत सिक्कीमचा समावेश करण्यात आला.
संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न
आधुनिक भारताचे जनक विषयी माहिती
📒 आधुनिक भारताचे जनक
- राजा राममोहन रॉय
📕 आधुनिक भारताचे शिल्पकार
- पंडित जवाहरलाल नेहरू.
📗 भारतीय अर्थशास्त्राचे जनक
- दादाभाई नौरोजी.
📒 भारतीय राष्ट्रवादाचे जनक
- सुरेंद्रनाथ चटर्जी
📕 भारतीय असंतोषाचे जनक
- लोकमान्य टिळक
📗 भारताच्या एकीकरणाचे थोर शिल्पकार
– सरदार वल्लभभाई पटेल.
📒 मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक
- आचार्य बाळशास्त्री जांभेकर.
📕 भारतीय चित्रपटस्रष्टीचे जनक
- दादासाहेब फाळके.
📗 भारताच्या अनुविज्ञानाचे जनक
- डॉ.होमी भाभा.
📒 आधुनिक मराठी कादंबरीचे जनक
- ह.ना.आपटे.
📕 आधुनिक मराठी कवितेचे जनक
- केशवसुत.
📗 सथानिक स्वराज्य संस्थेचे जनक
- लॉर्ड रिपन.
📒 भारताच्या हरितक्रांतीचे जनक
- डॉ.एम.एस.स्वामिनाथन.
📕 भारताच्या धवलक्रांतीचे जनक
- डॉ.व्हार्गीस कुरियन.
📗 भारतीय भूदान चळवळीचे जनक
- आचार्य विनोबा भावे.
📒 भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार
- विक्रम साराभाई.
📕 भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक
- सॅम पित्रोदा.
विधानसभेबद्दल संपूर्ण माहिती
घटना कलम क्र. 170 मध्ये प्रत्येक घटकराज्यासाठी एक विधानसभा असेल अशी तरतूद करण्यात आली आहे. विधानसभा हे कनिष्ठ परंतू अधिकाराच्या बाबतीत श्रेष्ठ सभागृह समजले जाते तर विधानपरिषद हे वरिष्ठ सभागृह असून अधिकाराच्या बाबतीत
विधानसभेची रचना :
170 व्या कलमात सांगितल्याप्रमाणे विधानसभेत 60 व जास्तीत जास्त 500 सभासद असतात.
राखीव जागा :
घटना कलम क्र. 332 मध्ये सांगितल्याप्रमाणे अनुसूचीत जाती जमातीसाठी महाराष्ट्रामध्ये राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचीत जातींसाठी 29 तर अनुसूचीत जमातीसाठी 25 राखीव जागा आहेत.
निवडणूक :
प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने सदस्यांची निवड केली जाते.
उमेदवारांची पात्रता :
1. तो भारताचा नागरिक असावा.
2. त्याच्या वयाची 25 वर्ष पूर्ण झालेली असावी.
3. संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात.
सदस्यांचा कार्यकाल : सदस्यांचा कार्यकाल पाच वर्ष इतका असतो.
गणसंख्या : 1/10
अधिवेशन :
दोन अधिवेशनामध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे.
सभापती व उपसभापती :
विधानसभेत निवडून आलेल्या सदस्यांकडून एका सदस्याची सभापती तर दुसर्या एका सदस्याची उपसभापती म्हणून निवड केली जाते.
सभापतीचे कार्य आणि अधिकार :
1. विधानसभेत मांडण्यात येणार्या प्रस्तावाला संमती देणे.
2. विधानसभेत शांतता व सुव्यवस्था राखणे.
3. सभागृहात एखाद्या विषयावर समान मते पडल्यास आपले निर्णायक मत देणे.
4. जनविधेयक आहे की नाही ते ठरविणे.
जनरल माहिती :
1. धनविधेयक प्रथम विधानसभेत मांडतात.
2. धनविधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार सभापतीला आहे.
3. धनविधेयकाला विधानपरिषदेने 14 दिवसाच्या आत मान्यता द्यावी लागते. काहीच न कळवल्यास तीला ते मान्य आहे असे समजले जाते.
4. मुख्यमंत्री हा मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो.
5. घटकराज्यांचे मंत्रीमंडल संयुक्तरित्या विधानसभेला जबाबदार असते.
6. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा होय.
7. मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीचे अध्यक्षपद मुख्यमंत्री भूषवितो.
8. स्वातंत्र्य भारताचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे होते.
मुस्लिम लीग’ ची स्थापना
मुस्लिम लीग’ ची स्थापना.
ठिकाण :- ढाका
संस्थापक अध्यक्ष :- सलीम उल्ला
मुख्यालय :- लखनऊ
उद्देश :- ब्रिटिश साम्राज्याप्रती मुस्लिमांमध्ये सहानुभूती निर्माण करुन मुस्लिम गटास काँग्रेसपासून दूर ठेवणे.
मुस्लिम लीगची स्थापना ‘All Indian Mohammadan Educational Conference’ च्या 20 व्या वार्षिक सभेच्या शेवटच्या दिवशी करण्यात आली.
ही सभा ढाका येथे 27 ते 30 डिसेंबर 1906 दरम्यान घेण्यात आली होती.
पुढच्या वर्षीच मोहम्मद अली गोहर यांनी कराची येथे मुस्लिम लीगची घटना (ग्रीन बुक) लिहिली.
मुस्लिम लीगचे अध्यक्ष ---------------
1907 अहमजी पीरभॉय
1908-1912 आगाखान
1912-1918 सर मुहम्मद अली
1919-1930 मुहम्मद अली जिना
1931 सर मुहम्मद शफी
1931-1932 सर मुहम्मद झफररुल्ला खान
1932-1933 मिया अब्दुल अझीझ
1933-1934 हफिज हिदायत हुसेन
1934-1947 महम्मद अली जिना.
❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣
पृथ्वीवरील अक्षांश व रेखांश बद्दल माहिती
पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे स्थान निश्चिती करण्याकरिता अक्षांश व रेखांश यांचा आधार घेतला जातो.
उत्तर व दक्षिण ध्रुव – पृथ्वीच्या आसाची दोन टोके म्हणजेच उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव होय. पृथ्वीचे जे टोक ध्रुव तार्याकडे आहे. त्याला उत्तर ध्रुव म्हणतात व खालच्या टोकाला असे दक्षिणध्रुव म्हणतात.
उत्तर व दक्षिण गोलार्ध – पृथ्वीच्या आसाला काटकोनात छेद दिल्यास पृथ्वीचे दोन भाग तयार होतात. या दोन भागापैकी उत्तर ध्रुवाकडील भागास उत्तर गोलार्ध व दक्षिण ध्रुवाकडील भागास दक्षिण गोलार्ध असे म्हणतात.
विषवृत्त – उत्तर व दक्षिण गोलार्ध जोडणार्या मध्यवर्ती काल्पनिक रेषेला विषुववृत्त असे म्हणतात विषुववृत्त हे पृथ्वीवरील सर्वात मोठे वर्तुळ होय. विषवृत्तालाच पृथ्वीचा परीघ असेसुद्धा म्हणतात.
अक्षांश – उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत विषववृत्ताला समांतर दर एका अंशावर काढलेल्या काल्पनिक वर्तुळाकार रेषांना अक्षवृत्ते म्हणतात. उत्तर गोलार्धातील रेषांना उत्तर अक्षांश व दक्षिण गोलार्धातील रेषांना दक्षिण अक्षांश असे म्हणतात. अक्षवृत्ताचे विषुववृत्तावरील स्थान 0° अक्षवृत्त मानले जाते, तर दक्षिण ध्रुवावरील स्थान 90° दक्षिण अक्षांश व उत्तर ध्रुवावरील स्थान 90° उत्तर अक्षांश असे मानले जाते.
रेखांश – उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत विषुववृत्ताला काटकोनात छेदून जाणार्या व एक अंश अंतरावर काढण्यात आलेल्या काल्पनिक अर्धवर्तुळाकार रेषेला रेखावृत्त म्हणतात. मूळ रेखावृत्त (0° रेखावृत्त) इंग्लंड जवळील ग्रीनवीच या बेटावरुन गेलेले आहे. मूळ रेखावृत्तापासून पूर्वेस व पश्चिमेस दर एक अंश अंतरावर याप्रमाणे 180° पश्चिम आणि 180° पूर्व अशी एकूण 360 रेखावृत्ते मानली गेलेली आहेत. ग्रीनवीचच्या पूर्वेकडील रेखावृत्तांना पूर्व रेखावृत्त व पश्चिमेकडील रेखावृत्तांना पश्चिम रेखावृत्त असे म्हणतात. विषुववृत्तावर दोन रेखावृत्तामधील अंतर 111 किलोमीटर असून ध्रुवाकडे जातांना हे अंतर कमी कमी होत जाते व ध्रुवावर शून्य होते. कारण सर्व रेखावृत्ते दोन्ही ध्रुवावर एकत्र येतात.
स्थाननिश्चिती – पृथ्वीवरील अक्षवृत्ते व रेखावृत्ते या दोहोंच्याही सहाय्याने पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे स्थान निश्चित करता येते.
जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com
०१) विजेच्या दिव्यामध्ये कोणता वायू असतो ?
- अरगॉन.
०२) आंध्र प्रदेशचे विभाजन करून नवीन तयार केलेले राज्य कोणते ?
- तेलंगणा.
०३) 'एरंडाचे गुऱ्हाळ' या पुस्तकाचे लेखक कोण ?
- चिं.वि.जोशी.
०४) क्रिकेट खेळणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ?
- रणजीतसिंह.
०५) रक्ताच्या कर्करोगास काय म्हणतात ?
- ल्युकेमिया.
०१) ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर कोणता महोत्सव साजरा करतात ?
- अमृत महोत्सव.
०२) सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात उंच पर्वतशिखर कोणते?
- अस्तंभा.
०३) राजेवाडी हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे ?
- अंजीर.
०४) जगप्रसिद्ध ताजमहल ही वास्तू कोणी बांधली ?
- शहाजहान.
०५) जगातील सर्वात मोठा महासागर कोणता ?
- पॅसिफिक महासागर.(प्रशांत महासागर)
०१) शरीरास सर्वात जास्त गरज असणारे मूलद्रव्य कोणते ?
- कॅल्शियम.
०२) मासे कोणत्या इंद्रियाद्वारे श्वसन करतात ?
- कल्ले.
०३) 'मेरा भारत महान' ही घोषणा कोणी दिली ?
- राजीव गांधी.
०४) कोणता रंग उष्णता जास्त आकर्षित करतो ?
- काळा.
०५) दिवसा वनस्पती कोणता वायू सोडतात ?
- ऑक्सिजन.
०१) 'कर्नाळा' हे पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
- रायगड.
०२) शिवाजी महाराजांच्या हेर खात्याचे प्रमुख कोण होते ?
- बहिर्जी नाईक.
०३) भारताचा सर्वोच्च लष्करी पुरस्कार कोणता ?
- परमवीर चक्र.
०४) भारताने सर्वप्रथम कोणता उपग्रह प्रक्षेपित केला होता ?
- आर्यभट्ट.
०५) पी.व्ही. सिंधू ही कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहे ?
- बॅडमिंटन.
०१) पृथ्वीचा केंद्र भाग कोणत्या नावाने ओळखला जातो ?
- सियाल.
०२) महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कुठे पडतो ?
- आंबोली.
०३) महाराष्ट्रात सर्वात जास्त जंगल असणारा जिल्हा कोणता ?
- गडचिरोली.
०४) ग्रीस या देशाची राजधानी कोणती ?
- अथेन्स.
०५) कोणत्या किरणांचा मारा करून फुलांची व फळांची उत्पादकता वाढवतात ?
- गॅमा.
०१) संगणक (काॅम्प्युटर) चा शोध कोणी लावला ?
- चार्ल्स बॅबेज.
०२) संविधानाचा मसुदा कोणी तयार केला ?
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर.
०३) लोकसभा सदस्यांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो ?
- ५ वर्ष.
०४) भारतात वनाखालील सर्वाधिक भूभाग कोणत्या राज्यात आहे ?
- मध्य प्रदेश.
०५) ऑलिंपिक ध्वज सर्वप्रथम कोणत्या वर्षी फडकविण्यात आला ?
- १९२०.(बेल्जियम)
०१) 'खेड्याकडे चला' अशी हाक कोणी दिली ?
- महात्मा गांधी.
०२) भूदान चळवळ कोणी सुरू केली ?
- विनोबा भावे.
०३) मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण होता ?
- चंद्रगुप्त मौर्य.
०४) प्रसिद्ध लाल किल्ला कोठे आहे ?
- दिल्ली.
०५) शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकासाठी काशीवरून कोणाला बोलावले होते ?
- गागाभट्ट.
०१) ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली होती ?
- १६०० साली.
॰२) भारताची राष्ट्रीय लिपी कोणती आहे ?
- देवनागरी.
०३) पहिली ऑलिंपिक स्पर्धा केव्हा भरली होती ?
- १८९६.(ग्रीस)
०४) विधानसभेच्या सदस्याला काय म्हणतात ?
- आमदार.
०५) भारतात सर्वप्रथम सूर्योदय व सूर्यास्त कोणत्या राज्यात होतो ?
- अरुणाचल प्रदेश.
०१) 'द वॉल'असे कोणत्या क्रिकेटपटूस म्हटले जाते ?
- राहुल द्रविड.
०२) आधुनिक मराठी कवितेचे जनक कोणास म्हणतात ?
- केशवसुत.
०३) आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे मुख्यालय कोठे आहे ?
- लोझान.(स्वित्झर्लंड)
०४) राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?
- ६ वर्ष.
०५) भारतात १८५३ साली सुरू झालेल्या रेल्वेचे पहिले प्रवाशी कोण होते ?
- नाना शंकरशेठ.
०१) मोरारजी देसाई यांचे समाधी स्थळाचे नाव काय आहे ?
- अभयघाट.( दिल्ली )
०२) नवीन ५०० रू.चे नोटेवर कशाचे चित्र आहे ?
- लाल किल्ला.( दिल्ली )
०३) युरोपचे क्रिडांगण कोणत्या देशास म्हणतात ?
- स्वित्झर्लंड.
०४) भारतातील सर्वांत मोठे चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे ?
- ओरिसा.
०५) बेटी बचाओ,बेटी पढाओ योजनेची सुरूवात केव्हा झाली ?
- २२ जानेवारी २०१५
०१) भारतात दर किती वर्षांनी जनगणना करण्यात येते ?
- दहा वर्षांनी.
०२) भुईमुगाच्या उत्पादनात अग्रेसर राज्य कोनते आहे ?
- गुजरात.
०३) तिहार जेल कोणत्या शहरात आहे ?
- दिल्ली.
०४) देशात कापसाच्या उत्पादनात अग्रेसर असणारी दोन राज्ये कोणती ?
- गुजरात व महाराष्ट्र.
०५) भारतीय पठाराच्या कोणत्या भागास खनिज संपत्तीचे भांडार असे म्हणतात ?
- छोटा नागपूर.
०१) MCS चे संक्षिप्त रूप काय आहे ?
- मास्टर ऑफ कॉम्प्यूटर सायन्स.
०२) त्र्यंबकेश्वर येथून कोणती नदी वाहत जाते ?
- गोदावरी.
०३) PSLV-C6 हे कशाशी संबधित आहे ?
- प्रक्षेपण यान.
०४) शेतीला पूरक ठरणारा महत्त्वाचा व्यवसाय कोणता ?
- दुग्ध व्यवसाय.
०५) रिकी पाँटिंग हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
- क्रिकेट.
०१) चिपळून शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?
- वशिष्ठ.
०२) सुयश नारायण जाधव हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
- पॅराजलतरण.
०३) स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरमध्ये कोणता वायू भरला जातो ?
- ब्युटेन.
०४) राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन कधी साजरा करण्यात येतो ?
- ११ मे.
०५) कोणत्या देशात सर्वांधिक लोह खनिज साठे आहेत ?
- रशिया
०१) कोणते नाटक बघितल्यानंतर प्रभावित होऊन गांधीजींनी सत्याचा मार्ग अवलंबला ?
- राजा हरिश्चंद्र.
०२) सर्वाधिक नोबेल पारितोषिक मिळविणारा देश कोणता ?
- अमेरिका.
०३) एका वेळेस दोन्ही दिशेला पाहू शकणारा प्राणी कोणता ?
- सरडा.
०४) कठीण पाणी मृदू करण्यासाठी कशाचा वापर करतात ?
- सोडियम कार्बोनेट.
०५) ग्रामसभेत कुणाकुणाचा समावेश होतो ?
- गावातील सर्व प्रौढ मतदारांचा.
०१) दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे ?
- जम्मू काश्मीर.
०२) 'शिका, संघटित व्हा, संघर्ष करा' ही घोषणा कोणी दिली ?
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर.
०३) रक्तगट कोणी शोधून काढले ?
- कार्ल लँडस्टेनर.
०४) भारतीय असंतोषाचे जनक असे कोणास म्हटले जाते ?
- लोकमान्य टिळक.
०५) पोलिओची लस कोणी शोधून काढली ?
- जोनास साल्क.
०१) आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी कोणती ?
- धारावी.(मुंबई)
०२) भारतात सहारा हे विमानतळ कोठे आहे ?
- मुंबई.
०३) महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे होत असते ?
- नागपूर.
०४) राज्याचा प्रमुख कोण असतो ?
- राज्यपाल.
०५) जगातील सर्वात उंच पुतळा कोणाचा आहे ?
- सरदार वल्लभभाई पटेल.(गुजरात )
०१) अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नीचे नाव काय ?
- मिशेल ओबामा.
०२) मराठी वर्णमालेत आलेले नवीन स्वरादी कोणते आहे ?
- ऍ आणि ऑ.
०३) गीतांजली या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे ?
- रवींद्रनाथ टागोर.
०४) भारत देशाचे माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती काय म्हणून साजरी केली जाते ?
- शिक्षक दिन.(५ सप्टेंबर)
०५) उत्क्रांती वादाचा सिद्धांत कोणी मांडला ?
- चार्ल्स डार्विन.(इंग्लैड)
०१) इंदिरा गांधी यांचे समाधी स्थळाचे नाव काय आहे ?
- शक्तीस्थळ.( दिल्ली )
०२) नवीन ५० रू.चे नोटेवर कशाचे चित्र आहे ?
- हम्पी रथ.(कर्नाटक)
०३) काळे खंड कोणत्या देशास म्हणतात ?
- आफ्रिका.
०४) भारतातील सर्वांत मोठा घुमट कोणता ?
- गोल घुमट.(विजापूर)
०५) मिशन इंद्रधनुष्य योजनेची सुरूवात केव्हा झाली ?
- २५ डिसेंबर २०१४.
०१) भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले ?
- १५ ऑगस्ट १९४७.
०२) 'आद्य क्रांतिकारक' म्हणून कोणाला ओळखले जाते ?
- वासुदेव बळवंत फडके.
०३) संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केव्हा करण्यात आली ?
- १९२९.
०४) माळढोक पक्षी अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यात आहे ?
- सोलापूर.
०५) अण्णा हजारे यांचे मूळ गाव कोणते आहे ?
- राळेगणसिद्धी.(अहमदनगर)
०१) महाबळेश्वरचे कोणते फळ प्रसिद्ध आहे ?
- स्ट्रॉबेरी.
०२) 'कथकली' हा कोणत्या राज्याचा नृत्यप्रकार आहे ?
- केरळ.
०३) गौतम बुद्धाचा जन्म कोठे झाला ?
- लुंबिनी.(नेपाळ)
०४) घोड्याच्या निवार्याला काय म्हणतात ?
- तबेला.
०५) जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण कोणते ?
- मौसिनराम.
०१) भारतातील संपूर्ण साक्षर असलेले पहिले राज्य कोणते आहे ?
- केरळ.
०२) 'चला जाणूया नदीला' या अभियानाची सुरुवात केव्हा करण्यात आली ?
- १५ ऑक्टोबर २०२२.
०३) भारतीय रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे ?
- नवी दिल्ली.
०४) असहकार चळवळ कोणी सुरू केली ?
- महात्मा गांधी.
०५) भारतात सर्वात जास्त ग्रामपंचायती कोणत्या राज्यात आहेत ?
- उत्तरप्रदेश.
०१) नुकतेच महाराष्ट्राचे राज्यपाल झालेल्या व्यक्तीचे नाव काय ?
- रमेश बैस.
०२) रोजगार हमी योजना सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे ?
- महाराष्ट्र.
०३) ग्रामसभेची कार्यकारी समिति कोणती आहे ?
- ग्रामपंचायत.
०४) भारत छोडो आंदोलनाचा ठराव कोणी मांडला ?
- महात्मा गांधी.
०५) महाराष्ट्रातील सर्व सरकारी कार्यालय केव्हापासून पेपरलेस होणार आहेत ?
- १ एप्रिल २०२३.
०१) भारताचा पहिला नागरिक म्हणून कोणाला ओळखले जाते ?
- भारताचे राष्ट्रपती.
०२) वनस्पती कोणत्या प्रकारचे वायू शोषून घेतात ?
- कार्बन डायऑक्साइड.
०३) चंद्रावर चालणाऱ्या पहिल्या माणसाचे नाव काय ?
- नील आर्मस्ट्रॉंग.
०४) जगातील सर्वात घनदाट जंगलाचे नाव सांगा ?
- अॅमेझॉन रेन फॉरेस्ट.
०५) जगाचे छप्पर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणाचे नाव काय ?
- तिबेट.
०१) महात्मा गांधी यांचे समाधी स्थळाचे नाव काय आहे ?
- राजघाट.( दिल्ली )
०२) नवीन १०० रु.चे नोटेवर कशाचे चित्र आहे ?
- राणी की वाव.( गुजरात )
०३) कांगारूचा देश कोणत्या देशास म्हणतात ?
- ऑस्ट्रेलिया.
०४) भारतातील सर्वांत मोठे वाळवंट कोणते ?
- थर वाळवंट.( राजस्थान )
०५) स्वच्छ भारत मिशन योजनेची सुरूवात केव्हा झाली ?
- २ ऑक्टोबर २०१४
०१) शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा कधी केली ?
- १६४६.
०२) राष्ट्रपतीपद भूषवणारी पहिली महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण होती ?
- प्रतिभाताई पाटील.
०३) महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते ?
- गंगापूर.(नाशिक)
०४) ग्रामसेवकाची नेमणूक कोण करतो ?
- मुख्य कार्यकारी अधिकारी.(CEO)
०५) भारतात डमडम हे विमानतळ कोठे आहे ?
- कोलकाता
०१) जगातील सर्वात लांब भिंत कोणती ?
- चीनची भिंत.(२४१५ किमी)
०२) कोणताही हिंदी चित्रपट कोणत्या दिवशी प्रदर्शित होतो ?
- शुक्रवारी.
०३) ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो ?
- ग्रामसेवक.
०४) गावात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे कार्य कोण करतो ?
- पोलीस पाटील.
०५) स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री कोण होते ?
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर.
०१) फेसबुकचा शोध कोणी लावला ?
- मार्क झुकेरबर्ग.
०२) महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र कोणते ?
- मुंबई.(१९७२)
०३) सासवडचे कोणते फळ प्रसिद्ध आहे ?
- सीताफळ.
०४) मीनाबंकम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?
- चेन्नई.
०५) आधुनिक भारताचे शिल्पकार असे कोणास म्हटले जाते ?
- पंडित जवाहरलाल नेहरू.
०१) जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या
महिला खेळाडूंच्या फोर्ब्सच्या वार्षिक यादीतील टॉप - २५ मध्ये स्थान मिळविणारी एकमेव भारतीय खेळाडू कोण ?
- पी.व्ही.सिंधू.
०२) भारत सरकारने भूकंपग्रस्त देशात बचाव आणि मदतकार्य करण्यासाठी कशाची घोषणा केली ?
- ऑपरेशन दोस्त.
०३) राजस्थानच्या वाळवंटाला कोणत्या नावाने ओळखले जाते ?
- मरुस्थळ.
०४) डेसिबल या एककाने काय मोजतात ?
- ध्वनीची तीव्रता.
०५) आशियातील सर्वात मोठे हवामान केंद्र कोठे उभारण्यात आले आहे ?
- भोपाळ.
०१) इंदिरा गांधी यांचे समाधी स्थळाचे नाव काय आहे ?
- शक्तीस्थळ.( दिल्ली )
०२) नवीन ५० रू.चे नोटेवर कशाचे चित्र आहे ?
- हम्पी रथ.( कर्नाटक )
०३) काळे खंड कोणत्या देशास म्हणतात ?
- आफ्रिका.
०४) भारतातील सर्वांत मोठा घुमट कोणता ?
- गोल घुमट.(विजापूर)
०५) मिशन इंद्रधनुष्य योजनेची सुरूवात केव्हा झाली ?
- २५ डिसेंबर २०१४.
०१) ग्रामगीता या साहित्यकृतिचे रचयिते कोण आहे ?
- तुकडोजी महाराज.
०२) भारतातील सर्वात प्रथम I.C.S. अधिकारी व्यक्ती कोण होते ?
- सत्येन्द्रनाथ टागोर.
०३) भारत देशातील सर्वोच्य शौर्य पुरस्कार कोणता ?
- परमवीर चक्र.
०४) जगातील सर्वात लांबच लांब कविता कोणती ?
- महाभारत काव्य.
०५) स्वच्छ पाण्यात सूर्यकिरण किती खोल जातात ?
- १५०० फुट खोल.
०१) भारताच्या विमान वाहतुकीचे नाव काय आहे ?
- इंडियन एअरलाइन्स.
०२) भारतात चारमिनार कोठे आहे ?
- हैद्राबाद.
०३) गुजरात या राज्याची राजधानी कोणती आहे ?
- गांधीनगर.
०४) इंडिया गेट कोठे आहे ?
- दिल्ली.
०५) एका बिंदूतून किती रेषा काढता येतात ?
- अनंत.
०१) थर्मामीटरचा शोध कोणी लावला ?
- गॅलिलिओ गॅलिली.
०२) प्लॅस्टिकचा शोध कोणी लावला ?
- अलेक्झांडर पार्क्स.
०३) भारतातील सर्वात लहान पक्षी कोणता ?
- फुलटोचा.
०४) महाराष्ट्राचा RTO कोड काय आहे ?
- MH.
०५) महाराष्ट्रात चैत्यभूमी कोठे आहे ?
- दादर.(मुंबई)
०१) महाराष्ट्रातील पहिला व देशातील दुसरा माळढोक पक्ष्यासाठी प्रजनन केंद्र कोठे सुरू करण्यात येणार आहे ?
- नानज अभयारण्य,सोलापूर.
०२) २०२३ च्या महिला टी - २० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे ?
- दक्षिण आफ्रिका.
०३) 'पांढरे सोने' असे कोणत्या खनिजाला म्हटले जाते ?
- लिथियम.
०४) गुलाम वंशाचे संस्थापक कोण होते ?
- कुतुबुद्दीन ऐबक.
०५) वाघा रेल्वे स्टेशन कोणत्या देशात आहे ?
- पाकिस्तान.
०१) निष्काम कर्ममठ ची स्थापना कोणी केली ?
- महर्षि धोंडो केशव कर्वे.
०२) जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?
- जीनिव्हा.
०३) मराठा लाइट इंफेंट्रीचे आदर्श वाक्य काय आहे ?
- ड्यूटी,ऑनर,करेज.
०४) मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक कोणाला म्हणतात ?
- आचार्य बाळशास्त्री जांभेकर.
०५) चाचा नेहरू हे संबोधन कोणाला लावले जाते ?
- पंडित जवाहरलाल नेहरू.
०१) न्यूयार्क हे शहर कोणत्या देशातील आहे ?
- अमेरिका.
०२) दूध नासने किंवा दही बनने ही कोणती प्रक्रिया आहे ?
- जीव - रासायनिक.
०३) सागराची खोली कोणत्या एककाने मोजली जाते ?
- फेदम.
०४) सूर्यकुलाचा शोध कोणी लावला ?
- कोपर्निकस.
०५) रबराच्या झाड़ापासून चिक काढन्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात ?
- टेंपिंग.
०१) पृथ्वीवर ऋतूंची निर्मिती कशामुळे होते ?
- पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे.
०२) साखर कारखान्याचा जिल्हा कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे ?
- अहमदनगर.
०३) मराठी व्याकरणातील विभक्तीची एकूण रूपे किती ?
- आठ.
०४) १९ फेब्रुवारी या दिवशी कोणता उत्सव असतो ?
- शिव जयंती उत्सव.
०५) इंद्रजीत भालेराव हे नाव कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?
- कवितालेखन,साहित्यलेखन.
०१) भारतातील पहिला माळढोक पक्ष्यासाठी प्रजनन केंद्र कोठे सुरू करण्यात येणार आहे ?
- जैसलमेर,राजस्थान.
०२) खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेचे थीम काय आहे ?
- हिंदुस्थान का दिल धडका दो.
०३) ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आदर्श गावाचे नाव काय आहे ?
- राळेगण सिद्धी.
०४) शालेय पोषण आहार योजना केव्हा सुरू झाली ?
- २२ नोव्हेंबर १९९५.
०५) भारतात प्रथमच कोणत्या ठिकाणी लिथियमचा साठा सापडलेला आहे ?
- रियासी जिल्हा,जम्मू काश्मीर.
०१) रायगड जिल्ह्याचे जूने नाव काय ?
- कुलाबा.
०२) स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन ची स्थापना कधी केली ?
- १८९७.
०३) मंगल पांडे यांनी कोणत्या छावणीत इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली ?
- बराकपूर.
०४) मानवी शरीरामध्ये पाऱ्याच्या संचयामुळे कोणता रोग होतो ?
- मिनामाटा.
०५) आधुनिक अर्थशास्त्र जनक कोणास म्हटले जाते ?
- ॲडम स्मिथ.
०१) 'पर्यावरण दिवस' केव्हा साजरा केला जातो ?
- ५ जून.
०२) महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते ?
- ताम्हण/जारूळ
श
०३) महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणत्या शहरास म्हणतात ?
- पुणे.
०४) 'नागझिरा' हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
- गोंदिया.
०५) आशिया खंडातील सर्वात मोठी नैसर्गिक गुफा कोणती आहे ?
- कचारगड.(गोंदिया)
०१) कोणत्या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आहे ?
- यवतमाळ.
०२) जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो ?
- ११ जुलै.
०३) राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कधी झाली ?
- १९९३.
०४) महाराष्ट्र राज्यामध्ये वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू झाला ?
- १९७२.
०५) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये अरण्याची (जंगल) टक्केवारी सर्वात जास्त आहे ?
- गडचिरोली.
०१) महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता ?
- अहमदनगर.
०२) सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह कोणता ?
- नेपच्यून.
०३) सूर्याभोवती परिभ्रमण करणारे ग्रह किती आहेत ?
- आठ.
०४) 'विजयी विश्व तिरंगा प्यारा' हे झेंडा गीत कोणी लिहिले ?
- शामलाल गुप्ता.
०५) सिग्नल चा शोध कोणी लावला ?
- गॅरेट मॉर्गन.
०१) महाराष्ट्र राज्याची राजभाषेचे नाव काय आहे ?
- मराठी.
०२) महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणता?
- हरियाल.
०३) महाराष्ट्र राज्याच्या राज्यवृक्षाचे नाव काय आहे ?
- आंबा.
०४) महाराष्ट्र राज्याच्या खेळाचे नाव काय आहे ?
- कबड्डी.
०५) महाराष्ट्र राज्याचे उच्च न्यायालय कोठे आहे ?
- मुंबई.
०१) आपल्या भारत देशाचे राष्ट्रगीत हे सर्वप्रथम कोठे गायले गेले ?
- भारतीय राष्ट्रीय कोंग्रेसच्या अधिवेशनात.(कोलकत्ता)
०२) 'ग्राम गणराज्य' ची संकल्पना कोणाची होती ?
- महात्मा गांधी.
०३) भारत देशातील चिनीमातीचे उत्पादन कोठे होते ?
- केरळ,सिंगभुम.(झारखंड)
०४) भारत देशाच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशाची संख्या किती ?
- सात.
०५) सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?
- नर्मदा.
०१) महाराष्ट्रात सध्या किती माळढोक पक्षी आहेत ?
- केवळ एक.
०२) इलेक्ट्रिक वाहने,मोबाईल अशा उपकरणांच्या बॅटरी तयार करण्यासाठी कशाचा वापर करण्यात येतो ?
- लिथियम.
०३) क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक ठोकणारा पहिला भारतीय कर्णधार कोण ठरला आहे ?
- रोहीत शर्मा.
०४) संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस कोण आहेत ?
- ॲटोनियो गुटेरेस.
०५) १५०० एकराचे जंगल शाबूत ठेवण्यासाठी पेटून उठलेल्या मध्यप्रदेश राज्यातील महिलेचे नाव काय आहे ?
- उजीयारो केवटीया,समनापूर जि.डींडोरी.
०१) गोल घुमट कुठे आहे ?
- विजापूर.
०२) महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणत्या शहरास म्हणतात ?
- कोल्हापूर.
०३) जैन साहित्याला काय म्हणतात ?
- आगम.
०४) कौटिल्य हा कुटनितीज्ञ कोणत्या राजाचा गुरु होता ?
- चंद्रगुप्त मौर्य.
०५) तांब्याच्या जाड पत्र्यावर कोरून तयार केलेल्या मजकूराला काय म्हणतात ?
- ताम्रपट.
०१) भारतातील कोणत्या राज्यात संगमरवराचे साठे जास्त आहेत ?
- राजस्थान.
०२) वेरूळचे कैलास लेणे कोणत्या राजघराण्याने घडविले आहेत ?
- राष्ट्रकूट.
०३) मोनालिसा या जगप्रसिध्द कलाकृतीचे निर्माते कोण आहे ?
- लिओनार्दो दा विंची.
०४) वास्को-द-गामा हा कोणत्या देशाचा दर्यावर्दी होता ?
- पोर्तुगीज.
०५) तेनालीराम हा कोणाच्या दरबारात होता ?
- कृष्णदेवराय.(विजयनगर)
०१) भारतीय सभागृहाचे नाव काय आहे ?
- संसद.
०२) जागतिक कामगार संघटनेची स्थापना केव्हा झाली ?
- १९४६ साली.
०३) आवाजाची तीव्रता कशामधे मोजतात ?
- डेसिबल.
०४) भारतीय अवकाश यान उड्डाण केंद्र कोठे आहे ?
- श्रीहरिकोटा.
०५) तांबे व जस्त यांच्या मिश्रनातुन काय बनते ?
- पितळ.
०१) समाजस्वास्थ्य मासिक कोणी सुरू केले ?
- र.धो.कर्वे.
०२) शरीरातील फॉस्फरसच्या कमतरतेमुळे काय होते ?
- वाढ खुंटते.
०३) मानवी किडणीत कोणता खडा आढळतो ?
- कॅल्शियम ऑक्सोलेट.
०४) कागद बनवण्यासाठी कशाचा वापर केला जातो ?
- बांबू.
०५) लाल बहादूर शास्त्री अकॅडमी कोठे आहे ?
- नाशिक.
०१) राज्यसभेतील सभासदाचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?
- सहा वर्ष.
०२) मेंढ़ीच्या केसापासून काय बनविले जाते ?
- लोकरी.
०३) भारतातील कमी साक्षरतेचे राज्य कोणते ?
- बिहार.
०४) इंडिया गेट राष्ट्रीय स्मारक कोठे आहे ?
- दिल्ली.
०५) गेटवे ऑफ इंडिया कोठे आहे ?
- मुंबई.
०१) 'काका' या नावाने बॉलिवूडमधील प्रसिद्ध असणारा अभिनेता कोणता?
- राजेश खन्ना.
०२) आर.के.लक्ष्मण हे कशासाठी प्रसिद्ध आहेत ?
- व्यंगचित्रकार.
०३) भारताचा "मॅक्झिम गॉर्की" असा गौरव कोणत्या महान साहित्यिकाचा केला जातो ?
- अण्णाभाऊ साठे.
०४) 'स्त्री-पुरुष तुलना' हा ग्रंथ कोणी लिहिला ?
- ताराबाई शिंदे.
०५) 'सुपर मॉम' या नावाने कोणती भारतीय महिला खेळाडू परिचित आहे ?
- मेरी कोम.
०१) कोणाच्या घोड्याचे नाव चेतक असे होते ?
- महाराणा प्रताप.
०२) कोणत्या पक्षाला 'शांतीदूत' असे म्हटले जाते ?
- कबूतर.
०३) एका वर्षात कमाल किती व्यक्तींना भारतरत्न हा पुरस्कार दिला जातो ?
- तीन.
०४) 'लोकनायक' असे कोणास म्हटले जाते ?
- जयप्रकाश नारायण.
०५) महात्मा गांधी यांचा वध कोणी केला ?
- नथुराम गोडसे.
०१) राजीव गांधी यांचे समाधी स्थळाचे नाव काय आहे ?
- विरभूमी.
०२) कोणत्या देशात सर्वांधिक लोह खनिज साठे आहेत ?
- रशिया
०३) भारतातील पहिला बोलपट कोणता ?
- आलमआरा.
०४) आसाम राज्याची राजधानी कोणती आहे ?
- दिसपूर.
०५) भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरूवात कोणी केली ?
- कुशाण.
०१) रमेश बैस हे महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल आहेत ?
- विसावे.
०२) राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ?
- रेखा शर्मा.
०३) जगातील सर्वाधिक डाळ व विशेषता तूरडाळ सेवन करणारा देश कोणता ?
- भारत.
०४) केंद्रीय निवडणूक आयोगाने कोणाला शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह दिले ?
- शिंदे गट.
०५) पृथ्वीवरील सर्वात मोठा सजीव प्राणी कोणता ?
- देवमासा.(व्हेल)
०१) 'आनंदमठ' या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण ?
- बंकिमचंद्र चटर्जी.
०२) 'शाळा' कादंबरीचे लेखक कोण आहेत ?
- मिलिंद बोकील.
०३) गौतम बुद्धांच्या पूर्वजन्मीच्या कथांना काय म्हणतात ?
- जातक कथा.
०४) कोणत्या कायद्याला काळा कायदा असे म्हटले जाते ?
- रौलेट कायदा.
०५) बार्डोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते ?
- सरदार वल्लभभाई पटेल.
०१) आधुनिक मराठी कादंबरीचे जनक कोण ?
- ह.ना.आपटे.
०२) जागतिक आरोग्य दिवस कधी साजरा करण्यात येतो?
- ७ एप्रिल.
०३) तीन राजधान्या असलेले पहिले राज्य कोणते होते ?
- आंध्रप्रदेश.
०४) महाराष्ट्रातील पहिल्या फायटर पायलट ठरलेल्या महिला कोण ?
- अंतरा मेहता.
०५) जम्मू काश्मीर मध्ये ३७० हे कलम केव्हा हटवले ?
- ०५.०८.२०१९.
०१) बिहार रेजिमेंटचे आदर्श वाक्य काय आहे ?
- करम ही धरम.
०२) भारतातील सर्वांत मोठे पात्र असलेली नदी कोणती आहे ?
- ब्रम्हपुत्रा.
०३) केंद्रीय डाळींब संशोधन केंद्र कोठे आहे ?
- सांगोला.(महाराष्ट्र)
०४) मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली आहे ?
- दादोबा पांडूरंग तर्खडकर.
०५) भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे ?
- दिल्ली.
०१) चौधरी चरणसिंह यांचे समाधी स्थळाचे नाव काय आहे ?
- किसान घाट.
०२) राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन कधी साजरा करण्यात येतो ?
- ११ मे.
०३) भारतातील सर्वांत पहिले पंचतारांकित हाॅटेल कोणते ?
- ताजमहल.(मुंबई)
०४) अरूणाचल प्रदेश राज्याची राजधानी कोणती आहे ?
- इटानगर.
०५) मौर्य घराण्याचा शेवटच्या राजाचे नाव काय होते ?
- बृहद्रथ.
०१) विभक्ति' हा शब्द कोणत्या विभागातील आहे ?
- व्याकरण विभाग.
०२) उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली आहे ?
- लातूर.
०३) परभणी जिल्ह्यात कोणते विद्यापीठ आहे ?
- मराठवाड़ा कृषी विद्यापीठ.
०४) भारतात कोणत्या राज्यात पुरुषांपेक्षा स्रियांचे प्रमाण अधिक आहे ?
- केरळ.
०५) गोविंदग्रज यांचे पूर्ण नाव काय आहे ?
- राम गणेश गडकरी.
०१) ३५ वे महाराष्ट्र राज्य पक्षिमित्र संमेलन केव्हा पार पडले ?
- ११ ते १२ मार्च २०२३.
०२) एअरो इंडिया शो - २०२३ चे ब्रीदवाक्य काय होते ?
- अब्जावधी संधीकडे नेणारी धावपट्टी.
०३) 'जय जय महाराष्ट्र माझा' या राज्यगीताचा प्रारंभ कोणत्या जिल्ह्यातून करण्यात आला ?
- चंद्रपूर.
०४) जीवनसत्त्व ब - १ चे रासायनिक नाव काय आहे ?
- थायमिन.
०५) महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री कोण आहे ?
- सुधीर मुनगंटीवार.
०१) महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कुठे सुरू झाली ?
- सातारा.
०२) UPI चा लॉंगफॉर्म काय आहे ?
- Unified Payments Interface.
०३) भारतीय जनता पक्षाची (भाजप) स्थापना कधी झाली होती ?
- १९८०.
०४) महाराष्ट्रात बस सेवा सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम बस कोणत्या दोन शहरा दरम्यान धावली ?
- पुणे ते अहमदनगर.(१९४८)
०५) स्वराज्याचा कारभार पाहण्यासाठी शिवाजी महाराजांनी कशाची निर्मिती केली ?
- अष्टप्रधान मंडळ.
०१) वनस्पती आपले अन्न पानांमध्ये जमा करतात त्या अन्नाला काय म्हणतात ?
- हरितद्रव्य.
०२) संगणकीय भाषेत MB म्हणजे काय ?
- मेगा बाईट.
०३) फुलपाखराच्या अळीला काय म्हणतात ?
- सुरवंट.
०४) कोळी या किड्याचे इंग्रजी नाव काय ?
- स्पाईडर.
०५) आंध्र प्रदेश या राज्याचे विभाजन होऊन तयार झालेले राज्य कोणते ?
- तेलंगणा.
०१) 'दी प्राॅब्लेम ऑफ रूपी' हा ग्रंथ कोणी लिहिला ?
- डाॅ.बाबासाहेब आंबेडकर.
०२) निरूपयोगी तांबड्या पेशींचे विघटन कोठे होते ?
- प्लिहा.
०३) महार रेजिमेंटचे आदर्श वाक्य काय आहे ?
- यश सिद्धी.
०४) आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हणतात ?
- राजा राममोहन राॅय.
०५) शरीरातील सर्वांत लहान हाड कोणते ?
- स्टेप्स.(कानाचे हाड़)
०१) महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहे ?
- एकनाथ शिंदे.
०२) गंधक या खनिजाचे उत्पादक राज्य कोणते ?
- तामिळनाडू.
०३) स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री म्हणून कोणाला ओळखले जाते ?
- पंडित जवाहरलाल नेहरू.
०४) देहू ही महाराष्ट्रातील कोणत्या थोर संताची कर्मभूमी आहे ?
- संत तुकाराम.
०५) संगणक बंद करण्याच्या क्रियेला काय म्हणतात ?
- शट डाऊन.
०१) 'हरित मुख्यमंत्री' म्हणून कोण ओळखले जातात ?
- शिवराजसिंह चौहान,मुख्यमंत्री मध्यप्रदेश.
०२) लिव्हिंग हेरिटेजचा मान मिळवणारे जगातील पहिले विद्यापीठ कोणते ?
- विश्वभारती विद्यापीठ.
०३) नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
- बी.व्ही.आर.सुब्रमण्यम.
०४) राज्याभिषेक प्रसंगी शिवरायांनी कोणती नाणी तयार केली ?
- होन व शिवराई.
०५) जीवनसत्त्व ब - ३ चे रासायनिक नाव काय आहे ?
- नायसिन.
०१) अष्टविनायकापैकी थेऊरच्या गणपतीचे नाव काय आहे ?
- चिंतामणी.
०२) मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूंचा प्रतिकार करतात ?
- पांढऱ्या पेशी.
०३) आग्रा शहर कोणी तयार केले आहेत ?
- सिकंदर लोदी.
०४) उज्जैन चे प्राचीन नाव काय होते ?
- अवंतिका.
०५) चिकनगुनिया या रोगाची साथ पसरविणारा डास कोणता ?
- एडिस इजिप्ती.
०१) महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे ?
- जायकवाडी.(पैठण)
०२) खजुराहो येथील प्रसिद्ध लेणी कोणत्या राज्यात आहेत ?
- मध्यप्रदेश.
०३) भारतातील सर्वात मोठी मशीद कोणती ?
- जामा मशीद.(दिल्ली)
०४) 'मॉर्निंग स्टार' असे कोणत्या ग्रहाला म्हणतात ?
- शुक्र.
०५) पाण्याचा गोठणबिंदू किती असतो ?
- ०° (शून्य अंश सेल्शिअस)
०१) भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरु झाली ?
- कोलकाता.
०२) हायड्रोक्लोरिक आम्ल असणारे फळ कोणते ?
- लिंबू.
०३) पहिल्या भारतीय पाणबुडीचे नाव काय आहे ?
- कलवरी.
०४) परमवीरचक्र मिळविणाऱ्या पहिल्या व्यक्तीचे नाव ?
- मेजर सोमनाथ शर्मा.
०५) क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता ?
- अहमदनगर.
०१) राज्यपालाची नेमणूक कोणाद्वारे होते ?
- राष्ट्रपती.
०२) भुईमूग या पिकाचे सर्वांधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते ?
- गुजरात.
०३) जागतिक शेतकी प्रदर्शन दिल्ली येथे कोणी भरविले ?
- डाॅ.पंजाबराव देशमुख.
०४) भारताच्या अणू विज्ञानाचे जनक कोण आहे ?
- डाॅ.होमी भाभा.
०५) तेलबियाचा राजा कोणत्या पिकाला म्हणतात ?
- भुईमूग.
०१) लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा कितवा क्रमांक लागतो ?
- पहिला.
०२) भारतीय शास्त्रीय संगीताच्या दोन प्रमुख पद्धती कोणत्या ?
- हिंदुस्थानी संगीत,कर्नाटकी संगीत.
०३) भारताची राजधानी कोणती आहे ?
- नवी दिल्ली.
०४) भारताचे प्रवेशद्वार कोणते ?
- गेट वे ऑफ इंडिया.
०५) भारतातील प्रमुख व्यवसाय कोणता आहे ?
- शेती.
०१)आयोडिनच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता ?
- गलगंड.
०२) मानवी छातीच्या पिंजऱ्यात एकूण बरगडयांची संख्या किती असते?
- २४.
०३) निरोगी मानवी हृदयाचे दर मिनिटास किती स्पंदने होतात ?
- ७२.
०४) युनिव्हर्सल डोनर (सर्वयोग्य दाता) असे कोणत्या रक्तगटास म्हणतात ?
- ओ.
०५) भारतीय चलनावरील नोटेवर किती भाषा लिहलेल्या असतात ?
- १७.
०१) भारतात किती भाषांना अधिकृत मान्यता देण्यात आली आहे ?
- बावीस.
०२) स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर कोण ?
- लॉर्ड माउंटबॅटन.
०३) भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता ?
- हॉकि.
०४) नोबेल पुरस्काराचे पहिले भारतीय मानकरी कोण ?
- रविंद्रनाथ टागोर.
०५) भारताचे राष्ट्रीय फुल कोणते ?
- कमळ.
०१) महाराष्ट्र राज्याच्या राजभाषेचे नाव काय आहे ?
- मराठी.
०२) महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणता ?
- हरियाल.
०३) महाराष्ट्र राज्याच्या राज्यवृक्षाचे नाव काय आहे ?
- आंबा.
०४) महाराष्ट्र राज्याच्या खेळाचे नाव काय आहे ?
- कबड्डी.
०५) महाराष्ट्र राज्याचे उच्च न्यायालय कोठे आहे ?
- मुंबई.
०१) जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?
- जिनिव्हा.
०२) हॉकीचा जादूगार कोणाला म्हणतात ?
- मेजर ध्यानचंद.
०३) आहारातील 'ड' जीवनसत्वाच्या अधिक्यामुळे आढळणारे सामान्य लक्षण कोणते ?
- निद्रानाश.
०४) मैग्नेशियम या मुलद्रव्याची संज्ञा काय आहे ?
- Mg.
०५) आंतरराष्ट्रीय महिला दिन केव्हा साजरा केला जातो ?
- ८ मार्च.
०१) सोलापूर कशासाठी प्रसिद्ध आहे ?
- चादरीसाठी.
०२) तुळजाभवानी मातेचे मंदीर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
- उस्मानाबाद.
०३) रेणुका मातेचे मंदीर कोठे आहे ?
- माहूर.
०४) महाराष्ट्रातील प्रशासनातील सर्वोच्च पद कोणते ?
- मुख्य सचिव.
०५) लीप वर्षा मध्ये एकूण किती दिवस असतात ?
- ३६६ दिवस.
०१) औरंगाबाद आता कोणत्या नविन नावाने ओळखले जाणार आहे ?
- छत्रपती संभाजीनगर.
०२) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नीचे नाव काय होते ?
- सईबाई.
०३) महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली ?
- १ मे १९६०.
०४) जीवनसत्त्व ब - ७ चे रासायनिक नाव काय आहे ?
- बायोटिन.
०५) भारतातील सर्वात विकसित शहर कोणते आहे ?
- बंगलोर.
०१) राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२१ मध्ये प्रथम क्रमांक कोणी पटकावला ?
- प्रमोद चौगुले.
०२) भारतात सर्वाधिक बोलली जाणारी तिसऱ्या क्रमांकाची भाषा कोणती ?
- मराठी.
०३) 'पक्ष्यांचा राजा' असे कोणत्या पक्ष्याला म्हटले जाते ?
- गरूड.
०४) जीवनसत्त्व 'के' चे रासायनिक नाव काय आहे ?
- फायलोक्विनोन
०५) शिवरायांचे बालपण कुठे गेले ?
- पुणे.
०१) कशाच्या अभावामुळे रक्तातील हिमोग्लोबीन कमी होऊन व्यक्तीस रक्ताक्षय(Anemia) हा रोग होतो ?
- लोह.
०२) भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरु झाली?
- कोलकाता.
०३) लहान बाळाला दिली जाणारी बीसीजी लस कोणत्या रोगापासून बचाव करते ?
- क्षयरोग.
०४) कोणत्या जीवनसत्वाअभावी मनुष्यास रात आंधळेपणा हा रोग होतो ?
- अ जीवनसत्व.
०५) राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम’ कोणी लिहले आहे ?
- बंकिमचंद्र चटर्जी.
०१) धातूंचा राजा कोणाला म्हटले जाते ?
- सोने.
०२) मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली होती ?
- चंद्रगुप्त मौर्य.
०३) हिराकुंड धरण कोणत्या नदीवर बांधले गेले आहे ?
- महानदी.
०४) पृथ्वी वर एकूण किती महासागर आहेत ?
- पाच.
०५) पृथ्वी वर एकूण किती महाद्वीप (खंड) आहेत ?
- सात.
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
